हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री ओमप्रकाश जी का साहित्य #181 – हाइबन – “कोबरा” ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक ज्ञानवर्धक हाइबन – “कोबरा

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 181 ☆

☆ हाइबन- कोबरा ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ 

रमन की नींद खुली तो देखा सावित्री के पैर में सांप दबा हुआ था।  वह उठा। चौका। चिल्लाया,” सावित्री! सांप,” जिसे सुनकर सावित्री उठ कर बैठ गई। इसी उछल कूद में रमन के मुंह से निकला,” पैर में सांप ।”

सावित्री डरी। पलटी । तब तक सांप पैर में दब गया था। इस कारण चोट खाए सांप ने झट से फन उठाया। फुफकारा ।उसका फन सीधा सावित्री के पैर पर गिरा।

रमन के सामने मौत थी । उसने झट से हाथ बढ़ाया। उसका फन पकड़ लिया। दूसरे हाथ से झट दोनों जबड़े को दबाया। इससे सांप का फन की पकड़ ढीली पड़ गई।

” अरे ! यह तो नाग है,” कहते हुए सावित्री दूर खड़ी थी। यह देख कर रमन की जान में जान आई ।

सांप ने कंबल पर फन मारा था।

पैर में सांप~

बंद आंखें के खड़ा

नवयुवक।

~~~~~~~

© श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

28-08-2020 

संपर्क – पोस्ट ऑफिस के पास, रतनगढ़-४५८२२६ (नीमच) म प्र

ईमेल  – opkshatriya@gmail.com मोबाइल – 9424079675 /8827985775

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 214 ☆ बाल गीत – मौसम करता अपनी बात ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक कुल 148 मौलिक  कृतियाँ प्रकाशित। प्रमुख  मौलिक कृतियाँ 132 (बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य) तथा लगभग तीन दर्जन साझा – संग्रह प्रकाशित। कई पुस्तकें प्रकाशनाधीन। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत। भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मानबाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्यकर्मचारी संस्थान  के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंतउत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित पाँच दर्जन से अधिक प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत। 

 आदरणीय डॉ राकेश चक्र जी के बारे में विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 संक्षिप्त परिचय – डॉ. राकेश ‘चक्र’ जी।

आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य प्रत्येक गुरुवार को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 214 ☆

बाल गीत – मौसम करता अपनी बात ☆ डॉ राकेश ‘चक्र’ 

बिजली कड़की , बादल गरजे

होती बेमौसम बरसात।

तेज हवाएँ शीतल – शीतल

मौसम करता अपनी बात।।

गुजर रहा बैसाख महीना

लू की होती अब छूट्टी

वायु प्रदूषण भू में सोया

धूल हो गई अब मिट्टी।।

 *

खूब नहाए पेड़ और पौधे

चुपके – चुपके पूरी रात।।

 *

एसी –  कूलर बंद हो गए

पंखा फर – फर हैं चलते

मच्छरदानी लगा पलंग पर

सैर सपन में सब करते।।

 *

कहीं – कहीं ओलों से आफत

बाग – बगीचों पर आघात।।

 *

नीम निबोली , तुलसी चमकीं

चढ़ी बेल तोरई लौकी

उपवन में पंछी हैं चहके

वर्षा ने लूएं रोकीं।।

 *

हर्बल चाय सुहाई सबको

देती है सेहत का साथ।।

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

Rakeshchakra00@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वसंत यावा आनंदाचा ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ वसंत यावा आनंदाचा…  श्री सुहास सोहोनी ☆

आजोबा :

झाडाच्या फांदीवर होते

पान एकले विसावले

झाडावरचे वेगवेगळे

खेळ बघोनी सुखावले …

 

आजी :

पानाच्या जोडीला होते

एक आणखी पान

जाणत होती दोन्ही पाने

एक‌ दुज्याचे मन …

 

मुलगा नि सून :

नकळत येऊन पाउस वारे

पान भिजावे पान डुलावे

नकळत फांदिस मिळता झोका

हिंदकळोनी पान हसावे …

 

नातू :

गाता पक्षी कुणी चिमुकला

येऊन पानासी बिलगावा

पानावरती तरंगणारा

थेंब चोचिने पिऊन जावा …

 

नात :

सानुकल्या लाघवी कळीने

लाजत घालावी साद

कुरवाळुनिया मग पानाने

द्यावा तिजला प्रतिसाद …

फांदी पाने कळ्या नि पक्षी

ऐसा मेळ जुळावा

वसंत यावा आनंदाचा

अवघा वृक्ष फुलावा …. .

☘️

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आईच्या बोलण्यातही तथ्य आहेच हे मला नाकारता येईना.खरंच.देवापुढे हात जोडून मनोमन संकल्प सोडताना माझ्या ध्यानीमनीही नव्हते की हा आपला बँकेतला जॉब आहे. तो ट्रान्सफरेबल आहे. कुठेही कधीही बदली होऊ शकेल. तेव्हा काय करायचं? बारा वर्षांचा दीर्घकाळ आपण याच परिसरात थोडेच रहाणार आहोत? पुढे नाही जमलं तर?’

या जर-तरच्या गुंत्यात मी फार काळ अडकून पडलो नाही. तरीही ही संकल्पसिद्धी सहज सोपी नाहीय याची प्रचिती मात्र पुढे प्रत्येक पावलावर मला येणार होतीच.)

पुढे चार-पाच महिने काहीच अडसर आला नाही. प्रत्येकवेळी पौर्णिमेला कधी पहाटे लवकर तर कधी ते जमलं नाही तर कितीही उशीर झाला तरी बँकेतली कामं आवरुन संध्याकाळनंतर उशिरा बँकेतून परस्पर नृ.वाडीला जायचं हे ठरुनच गेलं होतं.बसला पौर्णिमेदिवशी गर्दी असल्याने जातायेताचे दोन्ही प्रवास उभं राहूनच करावे लागायचे.पण त्या धावपळीचा कधी त्रास जाणवला नाही.तरीही मी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ-पूजा आवरायला लागल्याचे पाहून सुरुवातीला आईच मला समजवायची. म्हणायची,

“हे बघ,अगदी पौर्णिमेलाच जायला हवं हा अट्टाहास कशासाठी? पंचमीपर्यंत गेलं तरी चालतं. विनाकारण ओढ नको करत जाऊस.जे करशील ते तब्येत सांभाळून कर.ते महत्त्वाचं”

ती सांगायची त्यात तथ्य होतंच.पण अगदी जमणारच नसेल तर गोष्ट वेगळी असं मला वाटायचं.नाहीच जमलं तर पंचमीच्या आत जायचं आहेच की. पण ते अगदी अपरिहार्य असेल तेव्हाच.तो आपला हुकमाचा एक्का.जरुर पडली तरच वापरायचा. शक्यतो नाहीच.आपल्या सोयीसाठी म्हणून तर नाहीच नाही.’दर पौर्णिमेला मी दर्शनाला येईन’ असा संकल्प केलाय तर शक्यतो पौर्णिमेलाच जायचं हे मी ठरवूनच टाकलं होतं.शेवटी हातून सेवा घडवून घ्यायची की नाही ही ‘त्या’ची इच्छा हाच विचार मनात ठाम होता!

सगळं व्यवस्थित सुरु झालं होतं. पण…? जूनच्या पौर्णिमेचं दत्तदर्शन झालं आणि ध्यानीमनी नसताना १जुलैला अगदी अचानक मला ‘Designated post’ आॅफर करणारी,माझं ‘ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून महाबळेश्वर ब्रॅंचला पोस्टींग झाल्याची आॅर्डर आली.तीही ताबडतोब रिलीव्ह होऊन ४ जुलैच्या आत  महाबळेश्वर  ब्रॅंचला हजर होण्याचा आदेश देणारी!

वरवर पहाता खूप आनंदाने साजरी करावी अशी ही घटना होती. राष्ट्रीयकृत बँकांच्या नियमानुसार यापुढील प्रमोशन्ससाठी किमान एक टर्म रुलर ब्रॅंचला काम करणं अपरिहार्य होतंच.अनेकजण अतिशय गैरसोयीच्या खेडेगावी पोस्टिंग झाल्याने सर्वार्थाने खचून गेल्यामुळे जाॅब सॅटीस्फेक्शन अभावी नैराश्याने ग्रासलेले असायचे. या पार्श्वभूमीवर मला रुलर पोस्टिंग मिळालं होतं ते महाबळेश्वरसारख्या हिल स्टेशनवरच्या ब्रॅंचमधलं! हे आॅफीसमधे सर्वांच्याच कौतुकाचा विषयही ठरलं होतंच. पण ते आनंददायी असलं तरी त्या क्षणापर्यंतचं माझं शिस्तबध्दपणे सुरु असलेलं एकमार्गी रुटीन मात्र या घटनेने पूर्णत: ढवळून निघालं. कारण ही आकस्मिक घटना त्या क्षणापुरतीतरी माझ्यासाठी असंख्य प्रश्न निर्माण करणारीच ठरली होती. मनात गर्दी करुन राहिलेल्या त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पुढचे दोन तीन दिवस कापरासारखे उडून गेले.

माझा मुलगा सलिल तेव्हा चार वर्षांचा होता.तो बालवाडीत जायला लागल्याने आरतीने, माझ्या पत्नीने,एम.ए.नंतर लगेच करता न आलेलं, खूप दिवस मनात असलेलं बी.एड्. करण्यासाठी काॅलेजला अॅडमिशन घेतलेली होती.प्रश्न एक वर्षाचाच होता पण त्यात ही ट्रान्स्फर आॅर्डर आलेली.तिच्या मनातली अस्वस्थता पाहून कांहीतरी ठाम निर्णय मलाच घ्यावा लागणार होता.

“हे बघ,तुला मेरीटवर गव्हर्मेंट काॅलेजमधे अॅडमिशन मिळालीय ना?मग तात्पुरत्या अडचणींचा विचार करुन माघार घेऊ नको.वर्षभर मी तिकडे एकटा राहीन.इथलं सगळं योग्य नियोजन करुन कसं निभवायचं ते शांतपणे विचार करुन ठरवूया.”

तिला दिलासा द्यायला माझे शब्द पुरेसे होते.पण तरीही..

” तिथं तुमच्या जेवणाचं काय ?तब्येतीची हेळसांड होईल ती वेगळीच.नकोच ते.”

“माझं काय करायचं ते तिथं गेल्यानंतर परिस्थिती पाहून ठरवता येईल.आणि तसंही तिथल्या धुवांधार पावसाचा विचार करता पावसाळा संपेपर्यंत तरी आपल्याला कोल्हापूरहून शिफ्टिंग करता येणार नाहीच. तोवर तुझी पहिली टर्म पूर्ण होत आलेली असेल.मग दुसऱ्या टर्मपुरताच तर प्रश्न राहील.थोडा त्रास होईल पण निभेल सगळं.”   

ठामपणे निर्णय घेतला खरा पण तो निभवायचा कसा हा यक्षप्रश्न माझ्यापुढे ‘आ’ वासून उभा होताच.हेच उलटसुलट विचार मनात घेऊन ४ जुलैला जुजबी सामान सोबत घेऊन मी पहाटेच्या महाबळेश्वर बसमधे चढलो.बस सुरु झाली,घराबरोबर गावही मागं पडलं.तेच एकटेपण मनात घेऊन श्रांतपणे मान मागे टेकवून अलगद डोळे मिटणार तेवढ्यात कंडक्टर तिकिटासाठी आलाच.मी खिशातून पाकीट काढून पैसे दिले.त्यानं दिलेलं तिकीट न् सुटे पैसे पाकीटात ठेवत असतानाच आत निगुतीने ठेवलेला,बाबांनी मला कधीकाळी दिलेला ‘तो’ दत्ताचा फोटो मला दिसला न् मी दचकून भानावर आलो.गेले दोन -तीन दिवस मला गुंतवून ठेवणाऱ्या सगळ्या व्यवधानांत मी माझ्या दर पौर्णिमेला दत्तदर्शनासाठी नृ.वाडीला जायच्या संकल्पाचा विचार कुठंतरी हरवूनच बसलो होतो याची आठवण त्या फोटोनेच करुन दिली आणि त्याच संकल्पाचा विचार एक प्रश्न बनून मनाला टोचणी देत राहीला. खरंतर हा प्रश्न तातडीचा नव्हता. जुलैमधल्या पौर्णिमेला अजून किमान तीन आठवडे बाकी होते.पण तरीही..? हे दर महिन्याला नित्यनेमाने तिथून नृ.वाडीला येणं आपल्याला जमेल? मनातले इतर सगळे प्रश्न,सगळ्या विवंचना,नवीन ब्रॅंच कशी असेल,तिथला स्टाफ कसा असेल या विचारांचं उत्सुकतेत लपलेलं दडपण हे सगळं दूर सारत पौर्णिमेच्या नित्यनेमाबद्दलचा ‘हे निर्विघ्नपणे पार पडेल?’ हाच प्रश्न मनात ठाण मांडून बसला.मग पूर्ण प्रवासभर मनात त्यासंबंधीचेच विचार.

महाबळेश्वरपासून नृ.वाडी पर्यंतचं अंतर (त्याकाळी) साधारण सात-साडेसात तासांचं होतं.जातायेताचे पंधरा तास लागणार असतील,तर  पौर्णिमेलाच जायचा अट्टाहास चालणार कसा? पौर्णिमा कांही रविवारीच नसणाराय.मग? असू  दे.जमेल तितके दिवस यायचंच हे पक्कं ठरवूनच टाकलं.त्याच क्षणी ते कसं जमवायचं याचे विचार सुरु झाले.त्यासाठी ‘जे जे करावं लागेल ते ते कर्तव्य न् जबाबदाऱ्या यांच्याबाबतीत कोणतीही तडजोड न करता करायचं ‘ हा निर्धार पक्का झाला.ते कसं करायचं ते पुढचं पुढं.अशा मगळ्या उलटसुलट विचारांच्या गुंत्यात महाबळेश्वर स्टॅन्ड कधी आलं ते मलाच समजलं नाही. सगळं सामान कसंबसं एका हातात घेऊन आणि दुसऱ्या हातात लहान बॅगेसोबतच जमेल तशी छत्री धरायचा प्रयत्न करीत मी बसच्या पायऱ्या उतरू लागणार तेवढ्यात तिथेच थबकलो.कारण समोर माझ्या स्वागतालाच आल्यासारखा प्रपाताप्रमाणे  कोसळणारा अखंड पाऊस माझ्याकडे पाहून जणू विकट हास्य करीत माझी वाट अडवून ओसंडत होता. माझ्याइतकीच हतबल झालेली सोबतची छत्री न् सामान कसंबसं सावरत मी त्या भयावह धुवांधार प्रपाताला सामोरा गेलो ते  मनातल्या ‘त्या’च्या विचाराचं बोट घट्ट धरुनच!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विकी माऊस – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

☆ विकी माऊस – भाग-१ ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ ☆

हाताची कोपरं बाल्कनीच्या कट्ट्यावर टेकवून दोन्ही हात गालाला लावून रोहन बाल्कनीत उभा होता. सोसायटीत शिरणाऱ्या प्रत्येक कारवर तो नजर ठेवून होता.’आज आधी बाबा येतो का आई?एक खूप छान बातमी त्यांना सांगायचीय आणि नेमका आज त्या दोघांना उशीर होतोय’… रोहनचं विचार चक्र चालू होतं. ‘यापेक्षा आपण कला ऑन्टी बरोबर पिंकी ताईला आणायला तिच्या डान्स क्लासला गेलो असतो तर खूप बरं झालं असतं’.. ऑन्टी त्याला सांगून सांगून थकली,अन् शेवटी एकटीच गेली.

इतक्या दूर पायी चालत जायचा त्याला कंटाळा आला होता. शिवाय पैसे पण जवळ नव्हते सहा लॉलीपॉप आणायला!… चार आपल्या चौघांना, एक कला ऑन्टीला आणि एक’ विकीला’. ‘तोआपल्याकडे आलाय तर वेलकम सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं.’ विचार करून कंटाळला तसा तो दरवाजा उघडून कॉरिडॉर मध्ये आला. मोहितच्या घरातून  अंकल ‘स्टेफीला’ फिरवून आणायला बाहेर पडले होते.”स्टेफीऽ स्टेफीऽ” रोहनने हाक मारली. कान टवकारून त्याच्याकडे बघून मान हलवत स्टेफी लिफ्ट कडे धावली.

कित्ती क्यूट आहे स्टेफी’ रोहन विचार करत होता. ‘सगळ्यांच्याच घरात एक ना एक ‘पेट’ आहे. डाॅगी तर खूप जणांच्याकडे आहेत. शिवाय मांजरे, बर्ड्स, फिश पण आहेत. शिवानीकडे तर गिनीपिग आहे, त्यांच्या टेरेस वरील मोठ्या टॅंक मध्ये कासव सुद्धा आहे. ऋषीकडे दोन ससे आहेत आणि मृणाल कडे मुंगुस !फक्त… फक्त आपल्याकडेच ‘पेट’ नाहीय. आईला कितीला सांगितलं नुसती हसते. म्हणते,” बघू या, पिंकी आणि तू जरा मोठे व्हा मग आणूया एखादा छानसा प्राणी.” बाबा तर हसत म्हणतो “आपल्या घरातच आहोत की आपण चार प्राणी!…. आणखी एकाची भर कशाला?… आपल्या घराला तू प्राणी संग्रहालय म्हण किंवा सर्कस!”… पण नाही, आज रोहन कडे सुद्धा एक छानसा, छोटासा प्राणी आलाय. दुपारची वेळ… कला ऑन्टी ने हाक मारली, “रोहन बाबा, जरा लवकर इकडे ये….हा बघ पिंजऱ्यात एक उंदीरआलाय.” रोहन धावत आला. “ओऽहोऽ हो!”… उंदीर बघून तो आनंदाने नाचायलाच लागला. पिंकी क्रीम बिस्कीट चे छोटे छोटे तुकडे करून पिंजऱ्यात टाकू लागली. दोघंजणं जाम खुष! “ताई तो कसा पिंजऱ्यात छान रन काढतोय बघ. आता आपण ह्याला सांभाळू. हाच आपला ‘ पेट’….आणि त्याचे नाव काय ठेवू या?”दोघेजण विचार करू लागली.”कास्मो, नाही तर बॉस्की” कसं आहे?” पिंकी म्हणाली. रोहननं नकारार्थी मान हलवली. “पिंकी ताई जसा मिकी माऊस असतो ना तसा हा विकी माऊस! विकी नाव छान आहे ना?” “हो रे, मस्तच!” पिंकी उद्गारली. तोपर्यंत त्यांच्या मित्र-मैत्रिणीचा घोळका घरात आला आणि पिंजऱ्या भोवती गोल करून उभा राहिला. “हाय कित्ती क्यूट!”… “त्याचे पाणीदार डोळे पाहिलेस?”…” आणि नजर बघ किती शार्प आहे.” ” सो नाईस!”…” सो एनर्जिक”… “कसा क्रिकेटर सारखा रन काढतोय बघ”… “यार तुमचा विकी आम्हाला फार आवडला.” सगळे मित्र-मैत्रिणी म्हणत होते. शेजारी राहणाऱ्या एक दोघांनी तर काहीतरी खाऊ आणून पिंजऱ्यात टाकला.

आई बाबा एकदमच घरी आले. दोघांना विकी माऊसची कथा इत्थंभूत सांगून झाली. “आपण आता विकीला पाळणार आहोत.बाबा बघ,आला की नाही आपल्याकडे पण एक पेट.” रोहनच्या तोंडाला खळ नव्हती. आई, बाबाला आपण कितीही सांगितलं तरी कमीच आहे असं त्याला वाटत होतं. शेवटी “विकी बाय”म्हणत तो खेळायला निघून गेला.

” काय वेडा मुलगा आहे. आता काय करायचं?” आई म्हणत होती. बघू या उद्या संध्याकाळी देऊन टाकू त्याला जलसमाधी.” बाबाचं हे बोलणं बॅट घेऊन जायला घरात आलेल्या रोहननं ऐकलं. त्या बिचार्‍या सहा वर्षाच्या चिमुरड्याला त्याचा अर्थही कळला नाही.      

“जलसमाधी म्हणजे काय रे ?” रोहनने एक थोड्या मोठ्या मित्राला विचारलं. “जल मीन्स वॉटर अँड समाधी मीन्स?…. आय डोन्ट नो!” तोउत्तरला. दुसरा एक जण विकीला बघून गेलेला, एकदम जोरात ठासून म्हणाला ,”अरे वेड्या, तुझे बाबा विकीला पाण्यात बुडवून मारणार आहेत.” 

“ओह् नो!”रोहन रडकुंडीला आला. धावत घरात आला.

“बाबा तू आपल्या विकीला मारणार आहेस? पाण्यात बु..ड.वू…न”…. हुंदके देत देत तो विचारू लागला.” हे बघ बेटा, तू अजून लहान आहेस. फक्त सहा वर्षाचा… काही गोष्टी तुला समजण्यासारख्या नाहीत. मी तुला उद्या समजावून सांगेन.” बाबा त्याची समजूत घालत होता.

रोहनचं रडणं आणखीनच वाढलं. “सारखं सारखं तू आणि आई मी काही विचारलं तर हेच म्हणता, तू अजून लहान आहेस, मोठा झालास की तुला आपोआप समजेल. कधी होणार मी मोठ्ठा?” विचारताना हुंदके आवरत नव्हते…. आणि परवा ते सतीश अंकल, तुझे दोस्त म्हणत होते, “कशाला तुला मोठं व्हायचय रे?  मोठेपणीची दुःखं,त्रास, कटकटी, जबाबदाऱ्या… हे भगवान !मोठेपण चांगलं नसतं बच्चू ,जर मला आता देव भेटला आणि त्याने मला वर मागायला सांगितलं ना, तर मी म्हणेन देवा मला कायमच बालपणात ठेव.”

क्रमशः भाग पहिला 

©  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बाप आहे म्हणून…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “बाप आहे म्हणून” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मिटिंग बसलो होतो. माझ्या सोबत चारजण क्लासवन दर्जाचे अधिकारी बसलेले होते. तर काही उद्योजक आणि समाजसेवक ही होते. एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलण सुरु झालेलंच होतं. आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रिनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता. मी सर्वाना चेहऱ्याने खूणवून विनंती केली आणि फोन उचलला.

आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं “बोला अण्णा काय म्हणताय..”तर पलीकडून अण्णा म्हणले “कुठ हाईस..? “ मी म्हणलं,पुण्यात आहे अण्णा जरा मीटिंग मध्ये आहे.अण्णा म्हणाले “ते असू दे, काय खाल्लास का बाबा का पोटाला..?  मी होय म्हणलं.. अण्णांनी फोन ठेवला..आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं.. आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला..मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला…पलीकडून आण्णा म्हणाले “ हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये. तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडणं ..मी बर अण्णा म्हणलं…परत फोन ठेवला…मीटिंग सुरू झाली..आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला..मी शांतपणे पुन्हा फोन घेतला..पलीकडून अण्णा म्हणाले, “आर टिव्हीचा रिचार्ज संपलाय तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच…” मी होय आण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला..

तर लगेच परत फोन आला..अण्णा परत म्हणले “ हम्म आलाय आलाय बॅलन्स चालू झालं..” मी बर अण्णा म्हणून फोन ठेवला..सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला…मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं “ आरं ती भारताची मॅच कवा हाय..साऊथ आफ्रिका सोबत हाय नव्हं आता..त्यावेळी वल्डकप सुरू होता..अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे.मी बाजूच्या एकाला विचारलं, “सर कधी आहे ओ साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच..??? त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून….मी तसंच अण्णांना सांगितलं…मग अण्णांनी परत फोन कट केला…

चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय आण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहित होती.आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू…  माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती..पण मी काय लै लोड घेतला न्हाय..मीटिंग संपली..

मीटिंग संपल्यावर नाष्टा आला..नाष्टा करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिसकॉल पाहत होते.आणि मला ते समजावे म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते.माझ्या ही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबर वरून आलेले मिस कॉल दिसत होते…मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाष्टा पोटात ढकलू पाहत होतो..

त्यातला एकजण मला म्हणाला, दादा एक बोलू का? रागावू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लै बोलला तुम्ही..आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्वाचं ही नव्हतं.. तुम्ही मिटिंग संपल्यावर ही बोलू शकला असता त्यांना.? त्याच्या सुरात सगळ्यांनी सुर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले.

त्या सगळ्यांचं बोलण झाल्यावर मी फक्त इतकंच म्हणलं…

आज बापाचा आपल्याला दिवसातून हजारवेळा कॉल येतोय यासारखी सुंदर गोष्ट जगात दूसरी कुठलीच नाही साहेब …आणि साहेब मी जर फोन उचलला नसता ना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता..साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबर वरून कॉल येणार नाही..हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही.. आणि साहेब मिटिंग,कार्यक्रम वैगेरे होतच राहतील…माझं बोलणं सुरू होतंच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला…मी पटकन उचलला आणि स्पिकरवर टाकला…अण्णा जोरात बोलत म्हणाले,

“आर बोंबील घेताना खारा मासाबी जर चांगला भेटला तर किलोभर घेऊन ये..तोंडाला चव येईना लका…मी शांतपणे होय म्हणाल्यावर फोन ठेवला…

त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले..सगळेजण शांत झाले…डोळे पुसत ते म्हणाले, चंदनशिवे खरं आहे तुमचं…मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली.पण आता वेळ निघून गेली ओ.. आता नाही येत फोन माझ्या वडिलांचा. कारण वडीलच गेले ओ निघून पार पार दूर निघून गेले. रेंजच्या बाहेर गेले.सगळ्याचे डोळे पाणावले. आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंज मध्ये आहेत त्यांनी त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरवात केली. का कुणास ठाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले. मात्र परांजपे सरांचा हंबरडा आतल्या आत हंबरत राहिला.

आम्ही बाहेर पडलो.सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले. आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हंजे रुपेशला फोन केला..पलीकडून रूप्या शिवी देतच म्हणाला काय रे नालायक माणसा आज आठवण आली का तुला??. मी पण तसाच शब्द फिरवत म्हणलं, नालायका कोथरूडला ये ना बोंबील, सुकट आणि खारा मासा घेऊन.. आण्णाने घेऊन यायला लावलं आहे. तसा रुप्या हसत म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मघाशीच.. येतो घेऊन थांब तिथंच…तासाभराने रुप्या सगळं घेऊन आला.मी मात्र त्या बोंबलाच्या दरवळनाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागलो..

मित्रहो, बापाचा फोन येतोय ना.. येतोय ना..तर दुनिया गेली उडत..बापाचा फोन उचलायचा आधी..तुमची मिटिंग, तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाहीय. दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे.पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर. तिथून बाप फोन करू शकणार नाहीय. त्यावेळी कितीही तडफडून वाट बघितली तरी स्क्रिनवर हा नंबर येणार नाहीय. म्हणून दोस्ता दुनियेला जरा वाळत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं. बस्स इतकंच सांगायचं होतं.वाचून झालं असेल तर पहा वडिलांचा मिस कॉल पडलाय का? चला लावा बरं फोन आपल्या बापाला वाट पाहतोय ना तो तुमच्या फोनची…

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –१ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –१ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

कुणी चितेजवळ रडत होतं, कुणी राख छातीशी घेत होतं : टिळक गेले त्या वेळची गोष्ट…

“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिळक!”

“हजारो लोक मुंबईच्या सरदारगृहापुढे रस्त्यावर उभे होते. अखेर मध्यरात्र उलटली. १२ वाजून गेले. १ ऑगस्ट १९२०चा दिवस सुरु झाला आणि थोड्या वेळानेच लोकमान्यांचे देहावसान झाल्याची बातमी कोणीतरी लोकांना सांगितली. त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. त्याचे स्मरण झाले की, अजूनही अंगावर कंप उठतो. काही लोक तर धाय मोकलून रडले. ज्यांचे डोळे पाण्याने भरुन आले नाहीत, असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला नसता. लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली, मग रात्री झोप कोणाला येणार? लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबईनगरी त्या रात्री अक्षरशः ढळाढळा रडली, असे म्हटले तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये.”

टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्रेचे!

ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते.

टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीन वाढली.

त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग सुरु होता. बाराशे रुपयांची तिकीट विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल्ल झालेला. चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली. मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोल्हटकर थांबले. तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी विंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली.

खेळ आपसूकच बंद झाला. ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे, त्यांना ते मिळतील, अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीटबारीवर जाऊन थांबला… .. पण, पैसे मागायला कुणी येईचना, सुमारे हजाराचा तो रसिकवर्ग एकाएकी उठला सरदारगृहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला. टाचणी पडली तरी भलामोठा आवाज यावा, असा सन्नाटा थिएटरभर पसरला होता.

या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोल्हटकर लिहितात,

“पायांचे आवाजसुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले. जमिनीला कान लावून ऐकणाऱ्यालासुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे!”

रडण्याचे कढ हळूहळू वाढतच चालले होते. लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदारगृहाचे दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती. शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला, हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित होते.

ते सांगतात,

“प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला येई. टिळकांना बघितल्यावर त्याला भडभडून येत असे. एक माणूस म्हणाला, एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला. एक म्हातारा मनुष्य म्हणाला, बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे?” असे म्हणून मोठ्याने किंकाळी फोडून तो रडूच लागला.

“श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू, राजारामाचे अकाली मरण, पानिपतचा रणसंग्राम, नारायणराव पेशव्यांचा वध, सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास, या महाराष्ट्राच्या इतिहासातील ज्या भयंकर विपत्ती, त्यांच्याहून अणूमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून, तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलेले आहे,” अशा शब्दांत या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी।

टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनेच हादरली. रडू आवरत कसेबसे लोक मुंबईला जायला निघाले. नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या. सरकारला ज्यादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली.

टिळकांचे अंत्यसंस्कार पुण्यात व्हावे, अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती; इच्छा कसली त्यांचा हट्टच होता, नव्हे नव्हे हक्कही होता त्यांचा. कारण, पुणे ही टिळकांची कर्मभूमी! पण, मुंबईकरही हट्टाला पेटले होते. त्यांचेही म्हणणे बरोबरच होते, टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी ते आता एकट्या पुण्याचे राहिले नसून अवघ्या महाराष्ट्राचे ‘लोकमान्य’ झालेले होते.

तात्यासाहेब केळकर निघाले. पुण्याला आले. त्यांना ‘ केसरी ‘चा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती. याच ‘केसरी’च्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आले होते, लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापाने थोडी बिघडली आहे, पण काळजी करण्याचं काही कारण नाही. लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील..

आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे माहिती होतं की, पुढच्या ‘केसरी’च्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीज करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी लागणार म्हणून ! ‘केसरी ‘चा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला.

ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच् कैद्यांनी एक दिवस अन्नपाणी घेतले नाही. टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला.

आणि इकडे मुंबईत, अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाणयात्रा दुपारी दीड वाजता सुरू झाली. दोन लाखांच्यावर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती. स्त्रिया, पुरुष, म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन, हरेक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता.

आकाशाची शिवण उसवावी, आभाळ फाटावे असा पाऊस त्यादिवशी पडत होता. टिळकांच्या चितेला अग्नी दिलाच जाऊ नये, अशी त्या वरुणाचीही इच्छा असावी बहुतेक. त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाणयात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती, ती गर्जना होती, ‘टिळक महाराज की जय!’ लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते. टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते. घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती. माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येत नव्हते. खापर्डे, गांधी हेही लोकांच्या जथ्थ्यात हेलकावे खात इकडून तिकडे ढकलले जात होते.

या महानिर्वाणयात्रेत ३५-४० वर्षांचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हाताऱ्या आईला घेऊन तेथे आला होता. लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलकावे खात होती. तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय, अशी अवस्था होती. हे पाहून तिचा मुलगा म्हणाला,

आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुरलेला हात” – लेखक : श्री शिवप्रसाद मेढे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “मुरलेला हात” – लेखक : श्री शिवप्रसाद मेढे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

‘समोरची बंगाल्याची बायको स्वयंपाकात अजून मुरायची आहे. पदार्थ परतताना कढईचा केवढा आवाज करते!’ हे वाक्य मी लिहिलं आणि माझं मलाच हसू आलं.

करू दे ना तिला हवा तसा स्वयंपाक! ती तिच्या पद्धतीने करतीये. मी का वैतागावं?

पण तसं नाहीये. स्वयंपाक ही एक कला आहे. तसंच स्वयंपाकघरात वावरणं ही पण एक कला आहे.

महिलांचा आणि क्वचित काही पुरुषांचा दिवसभरातला खूपसा वेळ स्वयंपाकघरात जात असतो.

असे म्हणतात, स्वयंपाक घरावरून त्या संपूर्ण घराची ओळख पटते. हे नीटनेटकं, देखणं स्वयंपाकघर चालवायला गरज असते ती मुरलेल्या हातांची.

आपल्या भारतात स्वयंपाक करायच्या खूप पारंपारिक पद्धती आहेत. प्रत्येक प्रांतात, राज्यात, जातीत, धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने चवदार, चमचमीत, चविष्ट जेवण तयार करण्यात येतं. जेवण बनवण्याच्या परंपरा पूर्वापार चालत आल्या आहेत. काही काही पदार्थ तर पिढ्यानुपिढ्या पारंपारिक पद्धतीने जसेच्या तसे अजूनही बनत आहेत. पंचपक्वान्न (श्रीखंड, बासुंदी, रसगुल्ले), काही चमचमीत भाज्या (भरली वांगी, रस्से) उसळी, छोले भटुरे, मांसाहारी पदार्थ, (शाकुती), इडली डोसा असे अनेक पदार्थ. (यादी खूप मोठी आहे, हे केवळ उदाहरणादाखल पदार्थ.)

आपली खाद्य परंपरा ही आपल्या देशाची खासियत आहे. ती परंपरा टिकवून ठेवणे ही अजून एक खासियत! मला असं वाटतं, भारत सोडल्यास, जगातील इतर देशात अगदी चमचमीत असे जेवण – खाद्यपदार्थ क्वचितच बनत असतील.

ही परंपरा टिकवण्यामागे किंवा टिकण्यामागे एक खास कारण म्हणजे मुरलेला हात!

ओला – सुका मसाला बनवण्याची मक्तेदारी या मुरलेल्या हातांची.

वर्षभर टिकणारी लोणची ही ह्या मुरलेल्या हातानेच घालावीत.

चमचमीत पदार्थ करावेत मुरलेल्या हातानेच.

मुरलेल्या हाताला कधीही तवा, कुकर, कढईचा चटका बसत नाही किंवा चटक्याचे काळे डाग हातावर उमटत नाहीत.

वाफ कधीच तोंडावर येत नाही, की उकळतं पाणी अंगावर सांडत नाही.

मुरलेला हात स्वयंपाक करताना कधीच ढणढण भांड्यांचा आवाज करत नाही. कढईतला पदार्थ कसा हळूच कापसासारखा हलवला जाईल.

रवीने दही घुसळताना एक लयबद्ध आवाज येत राहील.

भात कधी चिकट होणार नाही किंवा ताटात तांदूळ वाजणार नाही.

आमटी फुळुक पाणी होणार नाही किंवा चटण्या, कोशिंबिरी, भाज्या वाहून जाणार नाहीत.

पोळ्यांचा आकार गोलाकार असेल.

लोणचं करताना मुरलेले हात, आधी ज्याचं लोणचं घालायचं तो जिन्नस (कैरी, लिंबू, मिरची, फ्लॉवर, गाजर, वगैरे, वगैरे) व्यवस्थित निवडून घेणार. मग ते देठ काढून, धुऊन, पुसून थोडा वेळ वाळत ठेवणार. त्याच्या जोडीला चिरायची विळी, ज्या काचेच्या बरणीत लोणचं घालायचं ती बरणी, ताटसुद्धा व्यवस्थित धुऊन, पुसून स्वच्छ कोरडे करणार. अजूनही पाणी राहण्याची शक्यता नको, म्हणून हलकेच पेटत्या गॅसवर सुकवून घेणार. मगच चिरून मसाला घालून लोणचे तयार करणार. मसाला पण घरीच बनवणार. तिखट, हळद, मीठ सुद्धा हलकेच तव्यावर गरम करून घेणार. सगळं कसं निर्जल करणार. काय बिशाद, लोणचे खराब होईल!

ती बरणी ठेवायची पण विशिष्ट पद्धत. खाली तळाशी मीठ पसरून, वरती लोणचं घालून, सर्वात वरती मिठाचा पुन्हा हलकासा थर. मग त्या बरणीच्या उघड्या तोंडावर स्वच्छ धुतलेला पांढरा कपडा, त्याचीच कड, एका बाजूला फाडून व्यवस्थित बांधणार आणि मग झाकण लावणारा हा मुरलेला हातच असतो.

मसाला करताना प्रत्येक घटक व्यवस्थित निवडून, साफ करून निरनिराळे  भाजून, एकत्र करून मगच मिक्सरमध्ये बारीक करून ठेवणार. तेव्हाच तो मसाला खमंग होणार.

मुरलेल्या हाताला वयाचं बंधन नसतं. अनुभवाचं शहाणपण, आत्मविश्वास आणि स्वयंपाकाची आवड असेल तर पुरे!

मुरलेल्या हाताचा स्वयंपाक झटपट आणि चविष्ट होणारच.

पाच माणसांचा स्वयंपाक एका तासाच्या आत करावा तर मुरलेल्या हातानेच.

त्या हाताची आपली अशी पद्धत आहे. कुठच्या वेळी काय करायचं हे त्या हाताला पक्क माहीत असतं.

आता बघा. या पद्धतीने पायर्‍या पायर्‍यांनी स्वयंपाक केला तर काय बिशाद स्वयंपाकात जास्त वेळ जाईल.

कणीक भिजवून बाजूला ठेवली. डाळ-तांदूळ धुवून कुकर लावला. कुकरची शिट्टी होईपर्यंत भाजी चिरून घेतली. शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक ठेवून दुसर्‍या गॅसवर भाजीला फोडणी टाकून शिजायला ठेवली. तोपर्यंत कुकरची मंद गॅसवर ठेवायची वेळ संपलेली. कूकर उतरवून त्यावर पोळ्यांसाठी तवा ! तवा तापेपर्यंत पोळपाट लाटणे, फुलके असतील तर चिमटा, पीठ, तेल यांची जमवाजमव. पोळ्यांना सुरुवात करण्यापूर्वी, भाजी ढवळून मीठ, खोबरे, इतर वाटण, चिंचेचा कोळ घालून शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवलं की तोपर्यंत तवा तापून तयार! पोळ्यांना सुरुवात केली की सलग दहा पंधरा मिनिटात पोळ्या होतात. एका पोळीला जास्तीत जास्त दोन मिनिटं लागणार. पोळ्या झाल्या की कढईतील भाजी एका छानशा पातेल्यात काढून डायनिंग टेबलवर झाकून ठेवायची . त्याच कढईत आमटी करण्यासाठी तवा उतरवून आमटी टाकता येते. जी काही डाळ, उसळ असेल तिला फोडणी टाकली; मिरच्या, कोथिंबीर मसाला इतर गोष्टी टाकून आमटी तयार! पोळ्या झाल्यावर त्याच गरम तव्यावर आमटीचा मसाला, इतर वाटण परतून घेता येईल.

आमटी उकळेपर्यंत ओटा आवरून पोळ्यांची परात, पोळपाट लाटणे धुवून जागेवर ठेवता येईल. उकळलेल्या आमटीवर झाकण ठेवलं की काम फत्ते. जेवायच्या वेळी फक्त गॅस पेटवला, गरमगरम आमटी खायला तयार! कितीसा वेळ लागला?

आहे न मुरलेल्या हाताची कमाल?

ह्या मुरलेल्या हाताची मोजमापं पण कशी तर, चिमुटभर, मुठभर, ओंजळभर. सगळा कारभार अंदाजपंचे.

ह्या मुरलेल्या हाताचा अंदाज इतका पक्का की पदार्थ कधी खारट, तिखट, आंबट, कडू होणार नाही. समतोल चवीचा रुचकर पदार्थ करावा तर मुरलेल्या हातानेच!

पदार्थ शिजला की नाही हे त्या मुरलेल्या हाताला बघूनच समजणार. वासावरून काय घातलं, राहिलं ते कळणार.

हे मुरलेले हात टीव्ही बघताना कधीच वेळ वाया घालवणार नाहीत. भाजी निवडणे, लोणी काढणे, डाळी,  कडधान्यं निवडून ठेवणं ही काम लगेच टीव्ही बघता बघता करून टाकतात.

उन्हाळ्याची कामं (सांडगे, पापड वगैरे) भल्या पहाटे उठून नाश्त्याच्या वेळेपर्यंत उरकून टाकणारे मुरलेले हातच !

पुन्हा सगळी रोजची कामे वेळच्यावेळी करण्यासाठी.

अशा सर्व मुरलेल्या हातांना माझ्याकडून नमस्कार.

लेखक :श्री शिवप्रसाद मेढे

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – लेकुरवाळा – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– लेकुरवाळा – ? ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे 

संत मांदियाळी विठूचे गोजिरे ||

*

ज्ञाना तुका नामा हाती कडी घेती

निवृत्ती सोपान सवे चालताती

लेकुरवाळे रूप पाहुनी भान नुरे

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||

*

वाळवंटी सारे संत जमा झाले

संतांच्या मेळ्यात देव दंग झाले

मायबाप हरी संगे विठू घोष पसरे

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||

*

वारीची पर्वणी जीव शिव जमले

चंद्रभागा तीर नाचू गाऊ लागले

दंग पंढरी क्षेत्र नामाच्या गजरे

सावळ्या हरीचे रूप हे साजिरे ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ भक्तांची आण… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? भक्तांची आणश्री प्रमोद वामन वर्तक ☆

विरह विठुरायाचा 

होणार आजला दूर

सावळ्याच्या पंढरीला

येई भक्तीचा महापूर

*

धन्य झाली चंद्रभागा

सारी पंढरी रंगली

पांडुरंगाच्या दर्शनाने 

भक्ती रसात दंगली 

*

नको देवू तू अंतर

जीव तुटे तुझ्याविण

घडुदे वारी दरवर्षी

तुला भक्तांची आण 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares