मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग – २ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –२ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”) – इथून पुढे 

धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते. रस्त्यावर चिखल झाला होता. माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती. मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती. त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले, तोच त्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली. साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले.

लोकमान्यांना अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले, आता आपण तरी जगून काय करायचे, असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली. तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला. त्याला दवाखान्यात नेले, पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला.

संध्याकाळचे ७ वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य ‘याचि डोळा’

अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, “आम्ही त्या रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो. अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले. हृदयात काय होत होते, हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूच्या धारा कोणत्या, हे समजेना, अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना.”

जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली. मृत्युलेख लिहिले, पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते. त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता. या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते,

” लोकमान्य, तुम्हाला आता कुठे पाहू? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू? तुम्हाला कुठे शोधू? तुम्हाला कुठे धुंडाळू? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते. लोकमान्य! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल? कुठे दिसाल? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे, त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य, आमचे प्राण तुमच्या स्वाधीन ! आमचे मन तुमच्या स्वाधीन ! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन ! “

“ लोकमान्य, आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात ! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य ! इतका सर्वव्यापी होता की, त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन, इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी, तपस्वी या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी का रे लागते। लोकमान्या, तुझ्याशिवाय जीव तुटतो रे।”

“ ४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या, अश्रूच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस? भारत देशाच्या कुलदीपक तिलका. आम्हास असाहय्य दीन, अनाथ केलेस? बोला, लोकमान्य बोला! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की, तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा?…

कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे! लोकमान्य बाळ गंगाधर, तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण, तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले? “

त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले. त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली. ती पुडी हृदयाशी लावली. काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले, तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते, ते स्वतःच्या पायावर चालत. पण, आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने, फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या.

केळकर लिहितात,

” जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले, पण येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धारण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले, येताना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जाताना ते वासनापूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाता जाता त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला.”

ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला, त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना. पण, यात वेगळे काहीच नाही, असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात,

” टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या? कोणकोणते बेत गूढ स्वरूपात होते? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्याचा शोध आता कसा लागणार? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का? सिकंदर किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की, त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात. पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे, हे एका आयुष्याला अशक्यच आहे! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल, पण पराक्रमी कधीही असणार नाही. आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात, त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही, तो याच कारणामुळे होय.”

” टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर ‘लोकमान्य’ ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. ‘लोकमान्य’ या शब्दाने यापुढील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये.” 

केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्ष झाले. टिळक जाऊन १०० वर्ष झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन !

लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल, तोवर टिकून राहो, लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवोत, या चिमण्या प्रार्थनेसह ‘सिंहगर्जनेचे सिंहावलोकन’ इथेच पुरे करतो… 

– समाप्त –

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

*

आख्याहि मे को भवानुग्ररूपोनमोऽस्तु ते देववर प्रसीद ।

विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यंन हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्‌ ॥३१॥

*

कसले हे उग्र रूप आपले देवश्रेष्ठा नमन तुला

प्रसन्न व्हा आदिपुरूषा दावी गुण ना तव रूपाला ॥३१॥

श्रीभगवानुवाच

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धोलोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।

ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥३२॥

कथित श्री भगवान

महाकाल मी नाशकर्ता तिन्ही लोकांचा

या समयाला या योद्ध्यांचा अंत व्हायाचा

शस्त्रसज्ज होउनी होई युद्धाभिमुख पार्थ

तव कर्माविनाही यांचा नाश आहे खचित ॥३२॥

*

तस्मात्त्वमुक्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्‍क्ष्व राज्यं समृद्धम्‌ ।

मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्‌ ॥३३॥

*

जिंकण्यास शत्रूला समरी यशःप्राप्ति करण्या 

युद्धास्तव उत्तिष्ठ भवान समृद्ध राज्य भोगण्या

तू तर केवळ कारण होशिल वीरांच्या या मृत्यूचा

सव्यसाची हे केला मीच अंत तयांच्या जीवनाचा ॥३३॥

*

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान्‌ ।

मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठायुध्यस्व जेतासि रणे सपत्नान्‌ ॥३४॥

*

द्रोण भीष्म जयद्रथ कर्णादि वीरांचा मम हस्ते अंत

साधन होउनिया माझे युद्धात करी तू त्यांचा अंत

विजयी होशिल या समरात हाचि कालाचा लेख

शंकित होउनिया मानसी होई ना तू युद्धपराङ्मुख ॥३४॥

संजय उवाच

एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी ।

नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णंसगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥३५॥

कथित संजय

ऐकुनिया ही केशववाणी अर्जुन भयभीत

प्रणाम करता झाला कृष्णा कंपित जरी हस्त

लीन होउनी पूरभु चरणांसी भावभरा तो स्वर 

व्यक्त करोनी भाव आपुले कथिता होई सत्वर ॥३५॥

अर्जुन उवाच

स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।

रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्‍घा: ॥३६॥

*

मुदित होतसे तुझ्या कीर्तने  इहलोक समस्त

धन्य जाहले तव अनुराग तयांस होता प्राप्त

समग्र सिद्धसमुदाय होत तव चरणांवर नत

असूर सारे करित पलायन होउनिया भयभीत ॥३६॥

*

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्‌ गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।

अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्‌ ॥ ३७ ॥

*

ब्रह्माचे आदिकर्ता अनंत सर्वश्रेष्ठ महात्मन

सदसत्परे अक्षर  देवेश ब्रह्म सच्चिदानंदघन 

तव चरणी लीन होउनी सर्वस्वाचे समर्पण 

शरण पातलो हे भगवंता तुम्हासी करितो नमन ॥३७॥

*

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम्‌ ।

वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥३८॥

*

आदिदेवा पुराणपुरुषा संरक्षण करुनी पाळता  तुम्ही या विश्वाला

अनन्तरूपी हे परमेशा परिपूर्ण अहात व्यापुनी अखिल जगताला ॥३८॥

*

वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्‍क: प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च।

नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥३९॥

*

अनल अनिल वरुण सोम प्रजापति ब्रह्मा ब्रह्मपिता

पुनःपुनः सहस्रावधी नमन तुम्हा चरणी हे जगत्पिता ॥३९॥

*

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व। 

अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वंसर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥४०॥

*

आदि ना अंत तव सामर्थ्या अष्टदिशांनी नमन तुम्हा

विश्वव्यापी सर्वरूपी अतिपराक्रमी प्रणाम असो तुम्हा ॥४०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गुंडाळी पोळी… – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ गुंडाळी पोळी… – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

शनिवारची शाळा म्हणजे अफाट आनंद. सकाळची शाळा, तीही अर्धा दिवस. दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजे अमर्याद सुख. शाळेतून परत येताना नुसता धुडगूस. बेस्ट च्या १७१ क्रमांकाच्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर, एकदम पुढच्या आसनावर,  खिडकीसमोर बसून वारा खात केलेला भन्नाट प्रवास. काहीतरी वेगळंच वाटत राहायचं. शनिवार रविवारची ही महती अगदी आजतागायत तशीच, काळ गोठल्यागत.

शनिवारचा मधल्या सुट्टीचा डबा म्हणजे पण काहीतरी वेगळाच अनुभव. कधी पोळीचा लाडू, कधी sandwich, कधी पोह्याचा चिवडा, कधी सुकी भेळ. तेव्हाचा तो quick bite. हा खाऊ पट्कन गिळून शाळेच्या प्रशस्त मैदानावर खेळण्यासाठी जाण्याची प्रचंड घाई. कधीकधी  पैसे मिळायचे खाऊसाठी, पण मर्यादित. आमच्या शाळेचं कॅन्टीन फार  भारी होतं. हॉट डॉग या प्रकाराशी तिथेच पहिल्यांदा ओळख झाली.

तो प्रकार मात्र आम्ही लांबूनच बघायचो. आमची झेप वडापाव नाहीतर इडली चटणी, इथपर्यंतच मर्यादित. काही सुखवस्तू घरातली, इंग्रजी माध्यमातली मुलं चवीपरीने तो पदार्थ खाताना आम्ही बघायचो आणि कोण हेवा वाटायचा त्या पदार्थाचा आणि तो खाणाऱ्या त्या मुलांचा सुद्धा!

पोरांच्या अलोट  गर्दीत प्रचंड लोटालोट करून हस्तगत केलेला वडा पाव  म्हणजे अगदी दिग्विजय . तो तिखटजाळ वडापाव खाऊन झाल्यावर,  नळाखाली ओंजळ धरून पाणी पिण्यात कोणालाच काही वावगं वाटायचं नाही. आज असं नळाचं पाणी पिणं म्हणजे महापाप. पोरांना बाटलीबंद  किंवा अति शुद्ध केलेल्या पाण्याची सवय. ती किती योग्य, किती अयोग्य यावर भाष्य करणे कठीण, पण आम्ही असं नळाचं पाणी पितच वाढलो, हे मात्र निर्विवाद सत्य.

कधीतरी अवचित, डब्यात गुंडाळी पोळी असायची. गुंडाळी पोळीत बहुतेक वेळा साजूक तुपाचा नाजूक लेप आणि त्यावर पिठी साखरेची पखरण असायची. पोळी गुंडाळून त्याचे दोन तुकडे केले जायचे आणि असे चार पाच तुकडे म्हणजे अगदी भारी काम असायचं. कधी पोळीवर साखरांबा नाहीतर गुळाम्बा पण लेपन होऊन यायचा. तेव्हा बाटलीबंद जॅम चा जमाना सुरू नव्हता झाला आणि हा घरगुती जॅम म्हणजेच परमोच्च बिंदू असायचा चवीचा, आईच्या किंवा आजीच्या मायेचा स्पर्श लाभलेला. जेव्हा wrap संस्कृती अस्तित्वात आलेली नव्हती, तेव्हा आईच्या हातचा हा मायेचा wrap मनाला आणि जिभेला सुख देऊन जायचा.

आजही या  गुंडाळी पोळीचा आस्वाद घेतच असतो मी वेळोवेळी. गरमागरम पोळीवर कधी तूप साखर,  तर कधी लसणीच्या कुटलेल्या तिखटाचा लेप लेऊन किंवा आंब्याच्या लोणच्याचा खार सोबत घेऊन जेव्हा हा साधासुधा पदार्थ समोर येतो तेव्हा चाळवलेल्या भुकेचं शमन तर होतंच पण  विस्मृतीत जाऊ पहात असलेल्या सुखकारक आठवणी पण सुखद समाधान देऊन जातात. तो काळ आणि रम्य भूतकाळ आज समोर येताना अतीव सुखाचं निधानच घेऊन येतो हे मात्र नक्की.

 

लेखक : श्री पराग गोडबोले

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “लाडकी बायको…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “लाडकी बायको…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.. वसुधा  पुस बरं ते डोळे.. तुला असं रडताना पाहून मला खूप यातना होतात गं…खरंच मला खूप वाईट वाटतयं मी तुझ्याशी लग्न केल्यापासून नीट वागायला हवं होतं.. सतत तुला मी रागावत होतो, चिडत होतो..माझं तुला कधीच काहीही पटत नव्हतचं… त्यात तुझे माहेरचे ते सगळे दिड शहाणे माझ्यापासून काडीमोड घे म्हणून सांगत होते.. मी एव्हढा मानसिक त्रास देत असताना.. तरीही तू मला सोबत राहिलीस.. जे मी मिळवून आणत होतो त्यात तूच समाधानी राहत होतीस नि मला अर्धपोटी ठेवत होतीस.. काटकसरीचा संसाराचे धडे मला गिरवायला दिलेस पण तू मात्र ऐषआरामी दिवस काढलेस.. मला सारं दिसत होतं, कळत होतं.. पण मी त्यावरून तुला साधं काही न विचारता भांडण तंटा, वादविवाद करत राहिलो तुझ्याशी… तुम्ही माझी हौसमौज भागविणार नाही तर मग शेजारचे जोशी, मराठे येणार काय मला हवं नको विचारायला असं जेव्हा तू डोळयात पाणी आणून विचारत असायचीस तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात जायची… असं असूनही तुझं माझ्यावर खरं प्रेम करत राहिलीस?.. आणि मी शंका घेत घेत खंगत गेलो… अशक्त झालो.. माझ्या सेवा करण्याच्या नावाखाली तुझा चंगळवाद अधिकच फुलून येत होता… मी तुला एकदा चांगलेच धारेवर धरले देखिल.. पैसै काही झाडाला लागत नसतात गं.. निदान मिळकत पाहून तरी खर्च, उधळपट्टी करत जा म्हणून त्यावर तू फणकाऱ्यानं म्हणालीस.. तुमच्या पैश्याची मला आता गरजच नाही  माझ्या खात्यात आता दरमहा  1500/रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत जमा होत आहेत, शिवाय एस. टी. चं अर्ध तिकिटात माहेराला जाता येतेयं, शिलाई मशीन आता फुकटात घरी येणार आहे, मुलींच्या शाळेची फी माफ झाली आहे… वेळ पडलीच तर मी ब्युटी पार्लर चा छोटा व्यवसाय महिला स्टार्टअप मधून सुरू करेन.. आता नवऱ्याच्या मिजाशीवर जगण्याचे दिवस कधीच संपले.. तेव्हा तुम्ही आता तुमचं तेव्हढं बघा…. तुझ्या त्या सरकारला बरी या लाडक्या बहिणीची त्या बदमाष भावाची काळजी घेता आली.. आणि आम्ही नवऱ्यानं काय घोडं मारलं होतं त्या सरकारचं… आमच्याच पगारातून तो प्रोफेशनल टॅक्स, इन्कम टॅक्स, भरमसाठ कापून घेऊन, आयजीच्या जीवावर बायजी उदार झाल्याचा सरकार आव आणतयं अशी सरकारी योजना पाहून माझा संताप संताप झाला आहे… आता मी देखील सरकारनं लाडकी बायको हि योजना कधी आणतील याचीच वाट बघून राहिलो आहे… ती योजना आली कि मग मी पण तुझ्या मिजाशीवर, तालावर नाचायला पळभरही थांबणार नाही… मग बसं तू तुझ्या माहेरीच सगळ्या लाडक्या योजनांच्या राशीत लोळत… आणि मी आणि सरकारी योजनेतील लाडकी बायको घरी आणून  तिच्या बरोबर सुखाने संसार सुरू करतो… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 143 ☆ लघुकथा – मम्माँज़ स्पेशल ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा मम्माँज़ स्पेशल। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 143 ☆

☆ लघुकथा – मम्माँज़ स्पेशल ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

मम्माँ! आपने हमारे लिए सत्तू क्यों भेज दिया ?

गाँव से लाए थे, थोड़ा तेरे लिए भी भेज दिया ऋतु, अच्छा होता है, गर्मी में पेट में ठंडक देता है। क्यों, क्या हुआ ?

माँ! क्या जरूरत है गाँव से चीजें ढ़ोकर लाने की? ऑनलाईन ऑर्डर करो घर बैठे सब मिल जाता है आजकल। बिना मतलब गाँव से इतना बोझा उठाकर लाओ।

अरे, अपने गाँव की पड़ोस की काकी ने बड़े प्यार से खुद बनाकर दिया है तेरे लिए। घर के बने सत्तू की बात ही कुछ और है। ये कंपनी वाले पता नहीं क्या मिलावट करते होंगे उसमें।

 सारी दुनिया ऑनलाईन शॉपिंग कर रही है। कंपनी वाले आपको ही खराब चीजें भेजेंगे? और अच्छा नहीं हुआ तो वापस कर दो, पैसे वापस आ जाते हैं।

‘अच्छा, ऐसा भी होता है क्या? हमें नहीं पता था। हमने तो अपनी माँ को ऐसे ही करते देखा था बेटा!। जब साल – दो साल में मायके जाना होता था, माँ वापसी के समय न जाने कितनी चीजें साथ में बाँध देती थी। लड्डू, मठरी, बेसन के सेव, गुड़, सत्तू और भी बहुत कुछ। आजकल तुम लोग हर चीज के लिए यही कहते रहते हो कि सब ऑनलाईन मिल जाता है, ऑर्डर कर लेते हैं। खरीद लो भाई सब ऑनलाईन, अब नहीं भेजेंगे कुछ। क्या करें माँ का दिल है ना!’ – सरोज ने झुंझलाते हुए कहा।

‘अरे! गुस्सा मत होईए, हम तो इसलिए कह रहे थे कि ट्रेन से सामान लाने में आपको परेशानी होती होगी, सामान बढ़ जाता है, सँभालना मुश्किल होता है और कोई बात नहीं है। ‘

‘हम पुरानी पीढ़ी के हैं बेटा। अब तुम लोग ऑनलाईन और गूगल युग के हो। जो चाहिए घर बैठे मँगा लो और जो कुछ पूछना हो तो गूगल गुरु हैं तुम्हारे पास, हमारे जैसों की क्या जरूरत?’ – सरोज के स्वर में थोड़ी मायूसी थी।

‘अच्छा छोड़ि‌ए यह सब, यह बताइए आपने हमें अपने हाथ के देशी घी के बेसन के लड्डू क्यों नहीं भेजे’ – ऋतु ने माँ को मनाते हुए कहा।

‘क्यों बेसन के लड्डू ऑनलाईन नहीं मिलते क्या, वह भी ऑर्डर कर लो, हम क्यों मेहनत करें’ — सरोज थोड़ी नाराजगी जताते हुए बोली।

‘हमें पता था गुस्से में आप यही बोलेंगी’ – ऋतु ने हँसते हुए कहा। ‘हमें कुछ नहीं पता माँ, आपके बनाए लड्डू खाने का बहुत मन हो रहा है। आपके हाथ के देशी घी के बेसन के लड्डू इतने स्वादिष्ट होते हैं कि नाम लेते ही मुँह में पानी आ जाता है। हॉस्टल में लड़कियों से छुपाकर रखना पड़ता था, नहीं तो एक दिन में ही सब खत्म। ‘मम्माँज़ स्पेशल लड्डू’ आपके सिवाय दुनिया में कोई भी नहीं बना सकता मम्माँ ! ’

‘अच्छा – अच्छा, अब माँ को मक्खन लगाना बंद कर, भेज दूँगी बेसन के लड्डू’ और दोनों फोन पर जोर से खिलखिलाकर हँस पड़ीं।

© डॉ. ऋचा शर्मा

प्रोफेसर एवं अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – richasharma1168@gmail.com  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 207 ☆ या अनुरागी चित्त की… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना या अनुरागी चित्त की। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 207 ☆ या अनुरागी चित्त की

भटकता हुआ मन कैसे, कब, कहाँ, किस ओर आकर्षित हो जाए ये कहा नहीं जा सकता। आँधी- तूफान की तरह विचारों का आना- जाना, सही गलत का भेद भुलाकर बस अपने लाभ की चिंता में सारा जीवन बिता देना। अंत समय में लेखा- जोखा की फाइल देखने पर सब कुछ शून्य बटे सन्नटा।

ऐसी स्थिति सभी की होती है, जीवन के हर पहलू को ध्यान से देखें तो समझ में आता है बिना मतलब इधर से उधर चहलकदमी करते हुए वक्त बिता दिया है। सारे परिणाम अपने अनुकूल कभी नहीं रहे, मजे की बात तो ये है कि जो कुछ मिला उसमें असंतुष्टि रही। भावना और संभावना के खेल में उलझते हुए कब समय बीत गया ये पता ही नहीं चला। पसंद और नापसंद के साथ जिसे रहना आ गया समझो वो विजेता की तरह लक्ष्य को साध ले जाएगा। क्या आपने महसूस किया कि परिणाम कभी आशानुरूप नहीं होते हैं, जब ऐसा लगता है कि बस मंजिल चार कदम की दूरी पर है तो अचानक से उम्मीद टूट जाती है। जो है जैसा है उसे बदलने से कहीं ज्यादा अच्छा ये होगा कि हम स्वयं के दृष्टिकोण को बदले, हर पल कुछ नया सीखते हुए समय का सदुपयोग करें। सकारात्मक चिंतन से सब कुछ संभव है।

जो लोग निरंतर अपने कार्यों में जुटे रहते हैं उन्हें देर- सबेर सही पर योग्यता से अधिक मिल जाता है इसीलिए सपनों का पीछा करते रहिए, अपने आपको उपयोगी बनाइए तभी सफलता मिलने पर आपको सच्चा आनन्द आएगा और शिखर पर लंबे समय तक टिक पायेंगे।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मुंशी प्रेमचंद जयंती विशेष – हँसी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  मुंशी प्रेमचंद जयंती विशेष – ? हँसी ? ? 

(कविता संग्रह- “चेहरे’ = प्रकाशन वर्ष- 2014)

31 जुलाई,  मुंशी प्रेमचंद की जयंती पर उन्हें नमन। बचपन में उनकी कहानी ‘घासवाली ‘ पढ़ी थी। उसकी नायिका के धुँधले-से अक्स और कहानी की पृष्ठभूमि ने बीस वर्ष बाद लिखी कविता को भी प्रभावित किया। मुंशी जी को समर्पित कविता साझा कर रहा हूँ।

? हँसी ?

भीड़ को चीरती-सी एक हँसी
मेरे कानों पर आकर ठहर गई थी,
कैसी विद्रूप, कैसी व्यावसायिक
कैसी जानी-बूझी लंपट-सी हँसी थी,
मैं टूटा था, दरक-सा गया था
क्या यह वही थी, क्या वह उसकी हँसी थी..?

पुष्पा गॉंव की एक घसियारिन थी,
सलीके से उसके हाथ
आधा माथा ढके जब घास काटते थे
तो उसके रूप की कल्पना मात्र से
कई कलेजे कट जाते थे…

थी फूल अनछुई-सी,
जंगली घास में जूही-सी,
काली भरी-भरी सी देह,
बोलती बड़ी-बड़ी-सी सलोनी आँखें,
मुझे शायद आँखों से अधिक सुंदर
उसमें तैरते उसके भाव लगते थे,
भाव जिनकी मल्लिका को
शब्दों की जरूरत ही नहीं,
यों ही नि:शब्द रचना रच जाती थी…

पुष्पा थी तो मधवा की घरवाली
पर कुँआरी लड़कियाँ भी
उसके रूप से जल जाती थीं
गांव के मरदों के अंदर के जानवर को,
कल्पनाओं में भी
उसका ब्याहता रूप नहीं भाता था,
लोक-लाज-रिवाजों के कपड़ों के भीतर भी
उनका प्राकृत रूप नज़र आ ही जाता था…

पुष्पा न केवल एक घसियारिन थी,
पुष्पा न केवल एक ब्याहता थी,
पुष्पा एक चर्चा थी, पुष्पा एक अपेक्षा थी…

गॉंव के छोटे ठाकुर … बस ठाकुर थे
नतीजतन रसिया तो होने ही थे,
जिस किसी पर उनकी नज़र पड़ जाती,
वो चुपचाप उनके हुक्म के आगे झुक जाती,
मुझे लगता था गाँव की औरतों में भी
कोई अपेक्षा पुरुष बसा है,
अपनी तंग-फटेहाल ज़िन्दगी में
कुछ क्षण ठाकुर के,
किसी रुमानी कल्पना से कम नहीं लगते थे,
काँटों की शय्या को सोने के पलंग
सपने सलोने से कम नहीं लगते थे…

खेतों के बीच की पतली-सी पगडंडी,
डूबते क्षितिज को चूमता सूरज,
पक्षियों का कलरव,
घर लौटते चौपायों का समूह,
दूर जंगल में शेर की गर्जना,
अपने डग घर की ओर बढ़ाती
आतांकित बकरियों की छलांग,
इन सब के बीच-
सारी चहचहाट को चीरते
गूँज रही थी पुष्पा की हँसी …

सर पर घास का बोझ, हाथ में हँसिया,
घर लौटकर, पसीना सुखाकर,
कुएँ का एक गिलास पानी पीने की तमन्ना,
मधवा से होने वाली जोरा-जोरी की कल्पना…

स्वप्नों में खोई परीकुमारी-सी,
ढलती शाम को चढ़ते यौवन-सा
प्रदीप्त करती अक्षत कुमारी-सी,
चली जा रही थी पुष्पा …

एकाएक,
शेर की गर्जना ऊँची हुई,
मेमनों में हलचल मची,
एक विद्रूप चौपाया
मासूम बकरी को घेरे खड़ा था,
ठाकुर का एक हाथ मूँछों पर था
दूसरा पुष्पा की कलाई पकड़े खड़ा था …

हँसी यकायक चुप हो गई,
झटके से पल्लूू वक्ष पर आ गया,
सर पर रखा घास का झौआ
बगैर सहारे के तन गया था,
हाथ की हँसुली
अब हथियार बन गया था…

रणचंडी का वह रूप
ठाकुर देखता ही रह गया,
शर्म से ऑँखें झुक गईं,
आत्मग्लानि ने खींचकर थप्पड़ मारा,
निःशब्द शब्दों की जननी
सारे भाव ताड़ गई-
ठाकुर, पुष्पा को क्या ऐसी-वैसी समझा है?
तू तो गाँव का मुखिया है,
हर बहू-बेटी को होना तुझे रक्षक है,
फिर क्यों तू ऐसा है,
क्यों तेरी प्रवृत्ति ऐसी भक्षक है…?

ए भाई !
आज जो तूने मेरा हाथ थामा
तो ये हाथ रक्षा के लिये थामा,
ये मैंनेे माना है,
एक दूब से पुष्पा ने रक्षाबंधन कर डाला था,
ठाकुर के पाप की गठरी को
उसके नैनों से बही गंगा ने धो डाला था,
ठाकुर का जीवन बदल चुका था
छोटे ठाकुर, अब सचमुच के ठाकुर थे…

पुष्पा की हँसी का मैं कायल हो गया था,
निष्पाप, निर्दोष छवि का मैं भक्त हो चला था,
फिर शहर में घास बेचती,
ग्राहकों को लुभाकर बातें करती,
ये विद्रूप हँसी, ये लंपट स्वरूप,
पुष्पा तेरा कौन-सा है सही रूप?

उसे मुझे देख लिया था
पर उसकी तल्लीनता में
कोई अंतर नहीं आया था,
उलटे कनखियों से
उसे देखने की फिराक में
मैं ही उसकी आँखों से जा टकराया था,
वह फिर भी हँसती रही…

गॉंव के खेतों के बीच से जाती
उस संकरी पगडंडी पर,
उस शाम पुष्पा फिर मिली थी
वह फिर हँसी थी…

बोली-
बाबूजी! जानती हूँ,
शहर की मेरी हँसी
तुमने गलत नहीं मानी है,
पुष्पा वैसी ही है
जैसी तुमने शुरू से जानी है,
हँसती चली गई, हँसती चली गई
हँसती-हँसती चली गई दूर तक…

अपने चिथड़ा-चिथड़ा हुए
अस्तित्व को लिए
निस्तब्ध, लज्जित-सा मैं,
क्षितिज को देखता रहा,
जाती पुष्पा के पदचिह्नों को घूरता रहा,
खुद ने खुद से प्रश्न किया
ठाकुर और तेरे जैसों की
सफेदपोशी क्या सही थी,
उत्तर में गूँजी फिर वही हँसी थी..!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रवण मास साधना में जपमाला, रुद्राष्टकम्, आत्मपरिष्कार मूल्याकंन एवं ध्यानसाधना करना है 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 294 ☆ आलेख – व्यंग्य शैली या विधा ? ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 294 ☆

? आलेख – व्यंग्य शैली या विधा ? ? श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

मुझे गर्व है कि मैने व्यंग्य को शैली से विधा बनते हुए देखा है. हरिशंकर परसाई को यह श्रेय जाता है कि उन्होंने साहित्य में कबीर के समय से अभिव्यक्ति की एक लोकप्रिय विधा पर इतना गद्य रचा कि साहित्य जगत को व्यंग्य को विधा के रूप में स्वीकार करना पड़ा. मैं अपने स्कूली जीवन से वह सब निरंतर पढ़ता रहा, और इसके प्रभाव से अछूता नहीं रह पाया तथा व्यंग्य लेखन करने लगा.

व्यंग्य को समाज सुधार का अचूक अस्त्र बताते हुए कहा जाता है कि ‘‘व्यंग्य साहित्यिक अजायब घर में लुप्त डॉयनासोर या टैरोडैक्टायल की पीली पुरानी हड्डियों का ढांचा नहीं बल्कि एक जीवंत विधा है जिसे बीसवीं सदी के साहित्य में अहम् भूमिका अदा करनी है. ’’ इसी संदर्भ में वक्रोक्ति संप्रदाय के आचार्य कुंतक ने वक्रोक्ति को काव्य की आत्मा घोषित करते हुए ‘‘वक्रोक्ति जीवितम्’’ ग्रंथ का प्रणयन किया. आचार्य ने वक्रोक्ति को ‘‘वैदग्ध्य भंगी भणिति’’ अर्थात् कवि कर्म-कौशल से उत्पन्न वैचिर्त्यपूर्ण कथन के रूप में स्वीकार किया है, अर्थात् जो काव्य तत्व किसी कथन में लोकोत्तर चमत्कार उत्पन्न करे उसका नाम वक्रोक्ति है. सीधे-सीधे जहां पर वक्ता कुछ कहे और श्रोता लक्षित संदर्भ बिना कहे ही समझ ले, वह वक्रोक्ति होती है. वक्रोक्ति के मुख्य दो प्रकार हैं, प्रथम श्लेष वक्रोक्ति, दूसरी काकु वक्रोक्ति. श्लेष वक्रोक्ति में शब्द प्रवंचना है और काकु में कण्ठ प्रवंचना. इन्हीं तथ्यों के आधार पर कहा जा सकता है कि व्यंग्य एक ऐसी साहित्यिक विधा है जिसमें समाज में व्याप्त विसंगतियों, कमजोरियों, कथनी-करनी के अंतर एवं समाज में व्याप्त अंधविश्वास व कुरीतियों को कुरेद कर व्यंग्यकार उजागर करता है, तथा इसके लिए जिम्मेवार व्यक्ति का साहसपूर्वक विरोध करता है. सामाजिक संरचना के विकास में निरंतर अवरोधक तत्त्वों का पर्दा गिराता है. वर्तमान संदर्भ व परिस्थितियों में साहित्य में व्यंग्य की नितांत आवश्यकता और बुद्धि चातुर्य व भाषा कौशल के साथ व्यंग्य के  अनुप्रयोग की सार्थकता ही स्वयमेव व्यंग्य शास्त्र है, और जब व्यंग्य का शास्त्र है तो स्पष्ट है कि व्यंग्य शैली नहीं विधा है. आज भी व्यंग्य को शैली कहने की भूल इसलिए की जाती है क्योंकि व्यंग्य विधा इतनी सहज है कि उसके प्रयोग किसी भी विधा के भीतर छोटे छोटे टुकड़ों में रचनाकार करते हैं, जिससे कहानी, लेख, कविता, लघु कथाएं इत्यादि जिसमे भी व्यंग्य का अनुप्रयोग अंतर्निहित हो, वह रचना जीवंत बन जाती है.

अस्तु, व्यंग्य मात्र शैली नहीं एक सुस्थापित प्रभावी पूर्ण विधा है.

© श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

म प्र साहित्य अकादमी से सम्मानित वरिष्ठ व्यंग्यकार

संपर्क – ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798, ईमेल apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ नाखून…  ☆ डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’ ☆

डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’

(डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’ जी  बेंगलुरु के नोबल कॉलेज में प्राध्यापिका के पद पर कार्यरत हैं एवं  साहित्य की विभिन्न विधाओं की सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में मन्नू भंडारी के कथा साहित्य में मनोवैज्ञानिकता, दो कविता संग्रह, पाँच कहानी संग्रह,  एक उपन्यास (फिर एक नयी सुबह) विशेष रूप से उल्लेखनीय हैं। इसके अतिरिक्त आपकी एक लम्बी कविता को इंडियन बुक ऑफ़ रिकार्ड्स 2020 में स्थान दिया गया है। आपका उपन्यास “औरत तेरी यही कहानी” शीघ्र प्रकाश्य। आप कई विशिष्ट पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता नाखून… ।)  

☆ कविता ☆ नाखून… ☆ डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’ ☆

नुकीले नाखूनों की कथा निराली,

अपनाया नाखून को अपनी खातिर,

स्वार्थी बना इन्सान…

ईश्वर ने इसे बनाया जीवों की पहचान,

यह बना मतलबी दुनिया का हिस्सा,

कभी राजनीति तो कभी सामाजिक चेतना,

दर असल नाखून तो करता,

समाज की प्रगति का इशारा,

यह तो प्रतीक है सूरज-चांद के पथ का,

कभी तो ज्योतिष शास्त्र को करता इंगित,

अनेक गुणों से भरा पड़ा है,

करता इशारा स्वास्थ्य का,

युगबोध कराता है यह,

निश्चेतना में चेतना जगाने का प्रयास,

चेतन जगत का मात्र आभास,

जीव को निर्जीव से अलग करता यह,

हर जीव की पहचान है नाखून,

प्राचीन में दाँत से पहले…

नाखून से काटने की प्रथा चली,

आज व्यक्ति हुआ ’स्व’ से मोहित,

किया लोहे का इस्तेमाल नाखून की जगह,

मात्र रह गया बनकर सौंदर्य का सामान,

काटकर कभी बनाया सौंदर्य का हिस्सा,

कभी बना खंजर तो कभी शमशीर,

भूगोल की दुनिया से परे…

इन्सान ने इसे आजमाया,

जब चाहा किया इसका प्रयोग,

जब नहीं चाहा किया तिरस्कार,

यह तो है चैतन्य मन का शृंगार,

हे मानव! दुरूपयोग इसका मत कर,

सही अर्थों में यह पहचान है चेतन जगत की,

इस पर मत कर अत्याचार,

दर्द होता इसे भी …

मत हावी होने देना अचेतन जगत पर कभी,

ज़रुरत पर काम आयेगा,

यह विज्ञान है परवरदीगार का!

शून्य की खोज की आर्यभट्ट ने,

तो खुदा ने बनाया नाखून।

© डॉ. अनिता एस. कर्पूर ’अनु’

संपर्क: प्राध्यापिका, लेखिका व कवयित्री, हिन्दी विभाग, नोबल कॉलेज, जेपी नगर, बेंगलूरू।

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 433 ⇒ स्टोव्ह… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “स्टोव्ह ।)

?अभी अभी # 433 ⇒ π स्टोव्ह π? श्री प्रदीप शर्मा  ?

Stove

आज सुबह सुबह सपने में स्टोव्ह महाराज के दर्शन हो गए। स्टोव्ह को आप ना तो चूल्हा कह सकते हैं और ना ही सिगड़ी, और गैस स्टोव तो कतई नहीं, क्योंकि यह घासलेट यानी केरोसिन से जलता था। हो सकता है, किसी घर में आज यह मौजूद हो, लेकिन शायद चालू हालत में नहीं, क्योंकि आजकल जितनी आसानी से पेट्रोल उपलब्ध है, उतनी आसानी से घासलेट नहीं। वैसे घासलेट भी एक पेट्रोल प्रॉडक्ट ही है। पहले हर किराने की दुकान पर भी यह आसानी से उपलब्ध हो जाता था। राशन की दुकान पर गेहूं चावल के साथ घासलेट का भी कोटा था।

इसे चलाना बड़ा आसान था। बस इसकी पीतल की टंकी में पेट्रोल भर दो, और बत्ती लगाकर चार पांच पंप मार दो। पहले थोड़ा भभकेगा लेकिन फिर लाइन पर आ जाएगा। अगर फिर भी नखरे दिखाए, तो इसके मुंह में स्टोव की पिन से उंगली करते ही रास्ते पर आ जाएगा।।

जब घरों में रसोई गैस नहीं पहुंची थी, तब घर घर सिगड़ी और चूल्हे का ही बोलबाला था। सिगड़ी के लिए कोयले और चूल्हे के लिए लकड़ी। चूल्हा जहां होता था, वह चौका कहलाता था। चौका चूल्हा, रोज लीपा जाता था। नो स्टैंडिंग किचन। बैठकर ही खाना बनाओ, और तमीज से बैठकर ही खाना खाओ।

सिगड़ी थोड़ी सुविधाजनक थी, आसानी से मूव हो सकती थी, लेकिन कोयले बहुत खाती कभी लकड़ी के, तो कभी पत्थर के। बस इसी बीच घरों में मिस्टर स्टोव्ह का आगमन हो गया। यह आसानी से कहीं भी ले जाया जा सकता था और बेचारा खुद घासलेट पी पीकर आपको चाय के साथ पकौड़े भी तलकर देता था।।

मेरी नौकरी की कुंवारी गृहस्थी इस स्टोव्ह ने ही तो जमाई थी, जब मुझे पहली बार घर छोड़कर बाहर जाना पड़ा था। एक बोरे में आवश्यक सामान के साथ मिस्टर स्टोव्ह भी लद लिए थे। शहर से चार घंटे की दूरी पर रोजाना आना जाना संभव जो नहीं था।

चार घंटे जाने के और चार घंटे आने के। हां वीकेंड और छुट्टियों में आना जाना सुविधाजनक रहता था।

छोटे से कस्बे में एक अकेले व्यक्ति को एक कमरा तब बीस रुपए में मिला था, लेकिन वह सन् १९७२ था। बोरे का मुंह खोलते ही स्टोव्ह सहित मेरी गृहस्थी का सामान बाहर निकल आया। बहन और मां का यह सम्मिलित प्रयास था। सबसे पहले तवा, चकला बेलन और चिमटा, संडसी और साथ में कढ़ाई, तपेली, परात सहित थाली, कटोरी, चम्मच और ग्लास भी। बिस्तरों का एक होल्डाल साथ में। बाकी जुगाड़ इतना मुश्किल नहीं था।।

स्टोव्ह पर आप चाय, सब्जी तो बना सकते हैं, लेकिन रोटी नहीं सेक सकते। हां मजे से तिकोने परांठे अथवा कड़ाही में पूरी भजिए भी तल सकते हैं। लेकिन हमने मध्यम मार्ग रोटी का ही चुना। रोटी को तवे पर पहले एक ओर से सेंक लिया, फिर उसे पलटकर एक सूती कपड़े से आहिस्ता आहिस्ता गुदगुदा दिया और रोटी फूलकर कुप्पा हो जाती थी। गैस कुकर के अभाव में सब्जी के साथ कभी कभी खिचड़ी भी बन जाया करती थी।

वैसे हमारी यह कुंवारी गृहस्थी केवल कुछ वर्ष ही चली, क्योंकि हमारा तबादला वापस हमारे शहर ही हो गया। आज सुबह मिस्टर स्टोव्ह ने दर्शन देकर बीते दिनों की याद दिला दी। आज स्टोव्ह की तो छोड़िए, घर में एक बूंद घासलेट भी नसीब नहीं होता। बहुत बहुएं जलकर मरी हैं इस मुए घासलेट से। आज मुझे स्टोव्ह की ना सही, लेकिन एक बोतल केरोसिन की जरूरत है, उंगली कट गई, तो थोड़ा घासलेट डाल दिया, डेटॉल का काम करता है। लोहे की जंग हो अथवा खटमल कॉकरोच की जंग, सबमें कारगर। अब तो काला हिट, lizol और हार्पिक का ही जमाना है। घासलेट की बदबू कौन सहे।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares