मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्लिप…” – भाग-1 ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “क्लिप…” – भाग-1 ☆ श्री मंगेश मधुकर 

सकाळी जाग आल्यावर सवयीनं सगळ्यात आधी नमानं मोबाईल चेक केला तर एकशेवीस अनरीड मेसेज आणि सतरा मिस कॉल.नमाला प्रचंड आश्चर्य वाटलं.सर्वात जास्त कॉल शुभाचे.लगेच तिला कॉल केला.

“नमे,कुठंयेस.किती फोन केले मेसेज केले पण एकांचही उत्तर नाही”

“अगं.रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते.फोन सायलेंटवर होता.आत्ता बघितलं”

“म्हणजे तुला अजून काहीच माहिती नाही”

“काय ते”

“बोंबला!!क्लिप फिरतीये.”

“कसली क्लिप?”

“तू आणि विनीत,तुमच्या बागेतल्या लिपलॉकची……..”

“काय!!”नमा किंचाळली.

“अगं नमा,तू सोडून सगळ्या जगानं पाहिलंय.तुला क्लिप पाठवलीय,बघ.”

भीतभीत नमानं क्लिप सुरू केली.तिचे विनीतसोबतचे खाजगी क्षण लपून शूट केले होते.अवघ्या काही सेकंदाचा व्हिडिओ पाहून नमाचं धाबं दणाणलं.भीतीनं हात-पाय थरथरायला लागले.घशाला कोरड पडली.डोकं बधीर झालं.श्वासाचा वेग वाढला. जोरजोरात रडताना हातातून मोबाईल पडला आणि दारावर टकटक दोन्हीचा आवाज एकदमच झाल्यानं नमा दचकली.आईचा आवाज ऐकून जीवात जीव आला. रूममध्ये शिरताच आईनं विचारलं “नमा,हे काय गं”

“मला आत्ताच कळलं”

“काल रात्रीपासून तो व्हिडिओ फिरतोय.सोसायटी,नातेवाईक सगळे तुझ्याविषयीच विचारतायेत.सारखा फोन  वाजतोय.काही निर्लज्ज लोकांनी नाही नाही त्या चौकशा केल्या.”

“बाबा कुठं आहेत”

“हॉलमध्ये फोन बंद करून बसलेत.लँडलाईनचा रिसिव्हरसुद्धा बाजूला काढलायं.”

“विनीत”

“फोन बंद करून बसलाय.त्याला कोणाशीच बोलायचं नाहीये असं त्याच्या आईनं सांगितलं”

“आई,आता काय करू”

“जवळ जायच्या आधी विचारलं नाहीस”. 

“आई!!जे घडलं ते भावनेच्या भरात घडलं अन कितीवेळ तर अवघे काही सेकंद.” 

“तेच सेकंद गावभर फिरतायेत आणि बघणारे मजा घेतायेत.”

“आता!!”

“आधी तो फोन बंद कर आणि मी सांगत नाही तोपर्यंत रूमच्या बाहेर येऊ नकोस.”

“काहीच्या काही होऊन बसलं.खूप टेंशन आलंय”

“माझी तर अक्कल बंद झालीय.विनतचं ठीकये पण तुला कंट्रोल करता आलं नाही”

“आई!!”नमा ओरडली. 

“उगीच माझ्यावर डाफरून काय उपयोग.लोकांना फुकट तमाशा दाखवलास.”

“बोल!!अजून जे जे मनात आहे ते सगळं बोल.साखरपुड्याच्या सेलिब्रेशनसाठी बागेत गेलो.छान गप्पा मारताना एकांत होता म्हणून जरा …….”

“म्हणजे आपली चूक झालीय असं तुला वाटत नाही का?”

“पब्लिक स्पेस मध्ये असं वागायला नको होतं.माझी नुसती चूक नाही तर घोडचूक झालीये”माय-लेकी बोलत असताना बाबा रूममध्ये येऊन नमाचा मोबाईल घेऊन गेले.नमाकडं बघितलं सुद्धा नाही.त्याचं परक्यासारखं वागणं नमाला खूप खोलवर लागलं. 

“घराची अब्रू तू चव्हाट्यावर आणलीस”आई पुन्हा सुरू झाली.

“उगाच काहीही बोलू नकोस.”

“तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस.वागताना थोडी काळजी घ्यायची ना”

“परत तेच.मोहाच्या बेसावध क्षणी ते घडलं.जे झालं त्याचा फार पश्चाताप होतोय.सॉरी!!” 

“आता बाण सुटल्यावर माफी मागून काही उपयोग नाही.ही जखम आयुष्यभर सोबत करणार.सगळं संपलं.”आईचा आवाज कातर झाला.डोळे भरले.नमाची अवस्था वेगळी नव्हती.

“आता काय करायचं”नमानं विचारलं. 

“जे समोर येईल त्याला सामोरं जायचं’

“म्हणजे”

“पुढं काय वाढून ठेवलंय ते माहिती नाही.विनीतचं ठीक आहे तो पुरुष आहे पण त्याला कोण बोलणार नाही.सगळे तुलाच नावं ठेवणार.”

“असं का??”

“कितीही मॉडर्न वागत-बोलत असलो तरी प्रत्येक घरात मुली-बायकांसाठी वेगळे अलिखित नियम असतात.अदृश्य नियम,अटी बाईला पाळावेच लागतात.तुझे बाबा रागावले,चिडले असते तर ठीक परंतु ते काहीच बोलले नाहीत.याचीच भीती वाटतीये.”

“कसली भीती”

“ते काय करतील याची.”

“दोघं द्याल ती शिक्षा मान्य आहे”

“तुझं हे प्रकरण अजून काय काय पहायला लावणार आहे देवालाच माहीत”

“प्रकरण???,खाल्ली माती आता काय करू ते सांग”

तोंड फिरवून जाताना आईनं आपटलेल्या दाराच्या आवाजनं नमाचे कान बधीर झाले.उशीत तोंड खुपसून रडायला लागली. सारखी क्लिप डोळ्यासमोरून फिरत होती.मित्र,मैत्रिणी,

कॉलेज,सोसायटी,नातेवाईक, रूममधल्या निर्जीव वस्तु सगळे आपल्याकडं पाहत हसत आहेत असं वाटत होतं.डोळे गच्च  मिटले तरी जोरजोरात हसण्याचा,घाणेरड्या कमेंटचा आवाज कानावर आदळण्याचा भास व्हायला लागला.त्यातच थरथरणाऱ्या हातातून ग्लास पडून सगळ्या बेडवर पाणी सांडलं.डोक्यात फक्त निगेटिव्ह विचारांच ट्राफिक सुरू होतं.एकामागोमाग येणारे भयानक विचार भीती वाढवत होते.सगळ्या अंगाला दरदरून घाम फुटला.हृदयाचे ठोके वाढले.स्वतःला दोष देत सारखं तोंडात मारून दोन्ही गाल लाल झालेले,डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.काही क्षणाच्या उत्कट भावेनेची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल असं वाटलं नव्हतं.आपण खूप एकटे आहोत.आई-बाबांचा आधार घ्यावा तर तेच खचलेले आणि भावी जोडीदार तोंड लपवून बसलेला.प्रचंड हताश,निराश नमा रुममध्ये भिरभिरत्या नजेरेनं अस्वस्थपणे येरझारा मारताना बडबडायला लागली.“द एन्ड.होत्याचं नव्हतं झालं.ज्यानं क्लिप बनवली तो मजेत मी मात्र बरबाद. हलकटपणा त्यानं केला आणि गुन्हेगार मी.हा कलंक कधीच पुसला जाणार नाही.मीच नालायक,महामूर्ख नको ते करून बसले.आता करियर, लग्न,संसार काही काही नाही.लोकांच्या नजरेत फक्त आणि फक्त ती क्लिपचं असणार.ईथून पुढं विशिष्ट नजरा आणि नालायकपणे हसणारे चेहरे बघत आयुष्य काढावं लागणार.माझ्यामुळेच फक्त त्रास आणि त्रासच होणार.आयुष्य कधीच पूर्वीसारखं होणार नाही.मग .. हे विनाकारण तोंड लपवून जगणं कशासाठी?कुठंपर्यंत आणि कोणासाठी.. आपला एक निर्णय सगळं काही क्षणात थांबेल.”नमा एकदम बोलायची थांबली.

“आई,बाबा सॉरी!!मी चुकले पण त्याची शिक्षा तुम्हांला नको” एवढीच चिठ्ठी लिहून डोळे पुसून नमानं आरशासमोर “गुड बाय” म्हणत आवडत्या जांभळ्या ड्रेसच्या ओढणीचं टोक सिलिंग फॅनला अडकवलं आणि दुसरं टोक गळ्याभोवती अडकवून टिपॉयवर उभी राहिली आणि मोठ्यानं ‘धाडकन’ आवाज आला??????

— क्रमशः भाग पहिला 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तरुणाई… ☆ श्री श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

☆ तरुणाई… ☆ श्रीरंग खटावकर  ☆

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं, आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते. मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला.”

तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट! “दात दोनच असले, तरी कडक बुंदीचा लाडू खातो अजून.”

“खातोस की चघळतोस रे” ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.

“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले!”

असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील, मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही. फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.

“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो “

“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?

एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!

त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.

” अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना!त्यालाच सोडायला गेलो होतो”

“कुठे??”

अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ” त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!” “काही म्हणा, मन्या भाग्यवान हो!

लेक अमेरिकेतून येतो काय, हाटेलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला, तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”

बाकी सगळे खिन्नपणे हसले. मी म्हंटलं, “तात्या इतकं लाईटली घेताय?”

“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”

मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!

दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या, आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”

“पार्टी?”

“अरे, नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे, फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”

“बास एवढंच ना? दिलं!”

“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते, आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो, आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”

मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!

मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो, आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला  असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल?

असायलाच हवी !

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,

 

“कल खेल में, हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यही दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहा मरना यहा,

इसके सीवा जाना कहा !!”

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-2 – लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

नमुना

मी, …… जर कोणत्याही आजारामुळे अथवा अपघातामुळे माझ्या उपचारासंबंधी निर्णय घेण्यास असमर्थ झालो, तर निम्निलिखित सूचनांचे  काटेकोरपणे पालन व्हावे, अशी माझी इच्छा आहे.

सूचना –

ज्यामुळे पुन्हा अर्थपूर्ण वा सर्वसामान्य ((Normal) जीवन अशक्य होईल, किंवा उपचार करूनही सहा महिन्यांच्या आत मृत्यू संभवेल, अथवा कायमची बेशुद्धावस्था (unconsciousness and/or brain death) अशी माझी स्थिती झाल्यास.

‘मला रुग्णालयात ठेवू नये, तसेच भरपाई होऊ शकणाऱ्या आरोग्यविमा रकमेपेक्षा जास्त खर्च करू नये.

‘मेंदू मृत म्हणून डॉक्टरांनी घोषित केल्यास माझे जीवन लांबविणारा कोणताही उपचार करू नये. उदा. शस्त्रक्रिया, कृत्रिम श्वसन (ventilator , life support), तसेच डायलिसिस, औषधे, रक्त/रक्तजन्य पदार्थ तसेच कृत्रिमरित्या अन्नपाणी देऊ नये.

‘मला वेदना होत असल्यास वेदनाशामके द्यावीत. तसेच मी आक्रमक/हिंसक झाल्यास शांत करण्यासाठी आवश्यक ते उपचार जरूर करावेत. 

माझी काळजी घेणारी कोणतीही व्यक्ती तसेच संबंधित डॉक्टर यांच्यावर अवघड निर्णय घेण्यासाठी जबाबदारी देऊ नये व त्यांची अप्रतिष्ठा होऊ नये या हेतूने हे इच्छापत्र मी उत्तम मानसिक स्थिती असताना व परिणामांचा काळजीपूर्वक विचार करून लिहीत आहे.

या इच्छापत्रासंबंधी निर्णय घेण्याचे व त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मी खालील व्यक्तींना देत आहे.

१)………………….

२)……………..

                                                           स्वाक्षरी

                                                         ……………..

हा वैद्यकीय इच्छापत्राचा फक्त नमुना आहे. त्यातील कोणतेही मुद्दे तुम्ही कमी जास्त करू शकता. मृत्युपश्चात अवयवदानापासून ते अंत्यविधीसाठीच्या खर्चापर्यंत अनेक मुद्दय़ांचा यात समावेश करता येतो.

इच्छापत्र करताना

  • आपल्या शरीरावरील उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचे हे इच्छापत्र आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते. 
  • त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे, असे लिहून त्यावर डॉक्टर सही करतात.
  • या वेळी पती अथवा पत्नी तसेच मुले व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सह्य़ा घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावे लागते.
  • त्यानंतर त्याच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या.

हा लेखी दस्तऐवज असल्याने कायद्याच्या दृष्टिकोनातूनही तो ग्राह्य़ धरला जातो.

आपल्या परिचयात किंवा आजूबाजूला वृद्धांसाठी विशेष, वेगळं  कार्य करणाऱ्या विशेषत: मुंबई, पुणे परिसराबाहेरच्या संस्था असल्यास आपण आम्हाला कळवू शकता. 

आमचा पत्ता – लोकसत्ता, चतुरंग, प्लॉट नं. ई.एल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई ४०० ७१०. 

ईमेल –  [email protected] किंवा [email protected]

वैद्यकीय इच्छापत्रासंदर्भात अधिक माहितीसाठी  संपर्क साधा –                    

लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन 

मो – ९०२८६६४३३३   

प्रस्तुती  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ताटी लावता आली पाहिजे..! ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ताटी लावता आली पाहिजे..! ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

प्रत्येकाला हे करता आले पाहिजे.स्वतःला आतून काही काळ तरी बंद करून घेता आले पाहिजे.

मनाला आतून थांबवायचं.!

विचारांना आतून थांबवायचं..!

चक्क कडी घालायची..!

विरक्तपणाची कडी..!

माउलींना हे सहज शक्य झालं..!

कारण त्यांनी विचारांची झेप  त्यांच्या नियंत्रणात ठेवली होती.

 

आपलं तसं नाही.

आपल्याला स्वतःला आवरायला अवघड आहे.

पण जमलं पाहिजे.

समाजाला काही काळ नाकारता आलं पाहिजे.

नात्यांना काही काळ लांब ठेवता आलं पाहिजे.

अगदी तो विश्वंभर ही शक्य तेवढा बाजूला ठेवावा.

श्वास सुद्धा सखा नाही याची जाणीव व्हावी.

 

ताटी लावून घ्यावी..!

 

कुणाशी वैर नाही..

दुस्वास नाही..

स्पर्धा नाही..

पण अंतर ठेवावं.!

 

ताटी घट्ट करावी..!

 

ताटीबाहेरच्या जगाला त्यांच्याप्रमाणे वागू द्यावं.!

तो कोलाहल, त्या हाका ऐकूनही न ऐकल्यासारख्या कराव्या.

 

आणि आतल्या आत्मारामाचा आक्रोश ऐकावा.!

आतली हाक समजून घ्यावी.

स्वतःला समजावून द्यावी.!

 

न जाणो ती हाक जेव्हा आपल्याला कळेल तेंव्हा आपल्या आयुष्यात ही मुक्ताई आपल्या झोपडीबाहेर अवतरेल..!

ताटीची गरजच पडणार नाही.

तीच हाका देईल..!

जोहार मांडेल..!

अशा वेळी ताटी उघडून तिच्या कुशीत जाणं म्हणजे आयुष्याचं सार्थक. 

:: राम कॄष्ण हरि ::

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “स्वप्न असेही…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “स्वप्न असेही…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

एकेक साडी उलगडताना

स्वप्न  विक्रीचे उमलून येते

तशीच साडी फेकली की

विस्कटून तयाच्या  मागे पडते

महिला साड्या पहातातच

अगदी निरखून आणि पारखून

नकार देत आणखी दाखवा

म्हणतात सारखे आवर्जून 

एकामागून  एक घडी येते

नकार घेऊन  मागे पडते

पडलेल्या साड्यांचा ढीग.. 

.. त्याची उंची वाढतच जाते

ढिगाखाली  आपसूकच 

विक्रेत्याची अपेक्षा घुसमटते

एवढ्या साड्या पाहूनही जर 

महिला तशीच उठून  जाते

आणि विक्रेत्याच्या चेहऱ्यावरती

हताशाच केवळ उरते  

तरीही उमेदीने परत घड्या घालतो

कारण ती त्याला परत परत

उलगडून दाखवायची असते …… 

…कुणातरी एकीला आवडेपर्यंत 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 96 ☆ मुक्तक ☆ ॥ मानवता की जीत दानवता की हार हो जाये॥ ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

☆ “श्री हंस” साहित्य # 96 ☆

☆ मुक्तक ☆ ।।मानवता की जीत दानवता की हार हो जाये।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

मानवता की जीत दानवता की हार हो जाये।

प्रेम से दूर अपनी हर तकरार हो जाये।।

महोब्बत हर जंग पर होती भारी है।

यह दुनिया बस इतनी सी समझदार हो जाये।।

[2]

संवेदना बस हर किसी का सरोकार हो जाये।

हर कोई प्रेम का खरीददार हो जाये।।

नफ़रतों का मिट जाये हर गर्दो गुबार।

धरती पर ही स्वर्ग सा यह संसार हो जाये।।

[3]

काम हर किसीका परोपकार हो जाये।

हर मदद को आदमी दिलदार हो जाये।।

जुड़ जाये हर दिल से हर दिल का ही तार।

तूफान खुद नाव की पतवार हो जाये।।

[4]

अहम हर जिंदगी में बस बेजार हो जाये।

धार भी हर गुस्से की बेकार हो जाये।।

खुशी खुशी बाँटे आदमी हर इक सुख को।

गले से गले लगने को आदमी बेकरार हो जाये।।

[5]

हर जीवन से दूर हर विवाद हो जाये।

बात घृणा की जीवन में कोई अपवाद हो जाये।।

राष्ट्र की स्वाधीनता हो प्रथम ध्येय हमारा।

देश हमारा यूँ खुशहाल आबाद हो जाये।।

[6]

वतन की आन ही हमारा किरदार हो जाये।

दुश्मन के लिए जैसे हर बाजू ललकार हो जाये।।

राष्ट्र की गरिमा और सुरक्षा हो सर्वोपरि।

बस इस चेतना का सबमें संचार हो जाये।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेलीईमेल – Skkapoor5067@ gmail.com, मोब  – 9897071046, 8218685464

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – शपथ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  शपथ ? ?

जब भी

उबारता हूँ उन्हें,

कसकर जकड़ लेते हैं 

और

मिलकर

डुबोने लगते हैं मुझे,

सुनो-

डूब भी गया मैं तो

मुझे यों श्रद्धांजलि देना,

मिलकर

डूबतों को उबारने की

शपथ लेना !

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 243 ⇒ गरीब की जोरू… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “गरीब की जोरू।)

?अभी अभी # 243 ⇒ गरीब की जोरू… ? श्री प्रदीप शर्मा  ?

ना तो गरीब कोई गाली है, और ना ही जोरू कोई गाली, लेकिन यह भी एक सर्वमान्य, सनातन सत्य है कि एक गरीब का इस दुनिया में सिर्फ अपनी जोरू पर ही अधिकार होता है। होगा पति पत्नी का रिश्ता, प्रेम और बराबरी का आपके सम्पन्न और शालीन समाज के लिए, गरीब की जोरू तो बनी ही, जोर जबरदस्ती के लिए है।

हमारे समाज ने पत्नी को अगर धर्मपत्नी और अर्धांगिनी का दर्जा दिया है तो एक आदर्श पत्नी भी अपने पति को परमेश्वर से कम नहीं मानती। सात फेरों और सात जन्मों का रिश्ता होता है पति पत्नी का। लेकिन एक गरीब और उसकी जोरू समाज के इन आदर्श दायरों में नहीं आते।।

हम भी अजीब हैं। बचपन में कॉमिक्स की जगह हमने चंदामामा में ऐसी ऐसी कहानियां पढ़ी हैं, जिनका आरंभ ही इस वाक्य से होता था। एक गरीब ब्राह्मण था। समय के साथ थोड़ा अगर सुधार भी हुआ तो शिक्षकों को गुरु जी की जगह मास्टर जी कहा जाने लगा और उनके कल्याण के लिए एक गृह निर्माण संस्था ने सुदामा नगर ही बसा डाला।

लेकिन वह तब की बात थी, जब लोग सुदामा को भी गरीब समझते थे और एक मास्टर को भी। जिसकी आंखों पर अज्ञान की पट्टी पड़ी हो, उसे कौन समझाए। सुदामा एक विद्वान ब्राह्मण थे, श्रीकृष्ण के बाल सखा थे, और हमेशा पूरी तरह कृष्ण भक्ति में डूबे रहते थे। आज सुदामा नगर जाकर देखिए, आपको एक भी शिक्षक नजर नहीं आएगा। सभी सुदामा नगर के वासी आज उतने ही संपन्न और भाग्यशाली हैं, जितने सुदामा श्रीकृष्ण से मिलने के बाद हो गए थे।।

बात गरीब की जोरू की हो रही थी। आप अगर एक गरीब की पत्नी को जोरू कहकर संबोधित करते हैं, तो उसे बुरा नहीं लगता, क्योंकि उसका पति भले ही गरीब है, पर वह उसका मरद है। हमने अच्छे अच्छे मर्दों को घर में घुसते ही चूहा बनते देखा है। लेकिन गरीब की जोरू का मरद तो और ही मिट्टी का बना होता है। वहां मरद को दर्द नहीं होता, लेकिन जब वह अपनी जोरू को मारता है, तब जोरू को दर्द होता है। आखिर एक मरद और जोरू का रिश्ता, दर्द का ही रिश्ता ही तो होता है। गरीबी और मजबूरी वैसे भी दोनों अभिशाप ही तो हैं।

हमारे लिए तो मजबूरी का नाम भी महात्मा गांधी है। जब कि गरीब का दुख दर्द, अभाव और मजबूरी अपने आप में एक मजाक है। जो किसी की गरीबी का मजाक उड़ाता है, उसके लिए किसी गरीब और जोरू के लिए दर्द कहां से उपजेगा।।

जब रिश्तों में मूल्य नहीं होते तो रिश्ते भी मजाक बन जाते हैं। मजाक और हंसी मजाक में जमीन आसमान का अंतर होता है। क्या गरीबों के लिए हमारा दर्द, मुफ्त राशन की तरह एक मजाक बनकर नहीं रह गया है।

जी हां, यही है हमारे मजाक का स्तर। गरीब की जोरू सबकी भाभी। यहां हम गरीब का ही नहीं, उसकी गरीबी का ही नहीं, उसकी पत्नी का भी मजाक उड़ा रहे हैं। हें, हें ! कैसी बात करते हैं। देवर भाभी में तो मजाक चलता रहता है, और वास्तविकता में भी चल ही रहा है। गरीबी आज मजाक का विषय ही है। गरीब की जोरू सबकी भाभी।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  3

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #219 – 106 – “करने कितने काम हैं…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल करने कितने काम हैं …” ।)

? ग़ज़ल # 106 – “करने कितने काम हैं…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

जब से तेरे इश्क़ की शहद ओंठों से लगाई है,

तब से दिल में मीठ सा दर्द मीठी सी तन्हाई है।

सांसद चुनते रहते हम हर दफ़ा पाँच सालों में,

सरकारी मेहनत का फल सिर पर मंहगाई है।

वो पेड़ा भगवान को दिखाकर ख़ुद ही चढ़ा जाते,

भ्रष्टाचारी की अब तक बनी ना कोई दवाई है।

भारत को राष्ट्र हितैषी नेता अब मिल पाया है,

असली आज़ादी पचहत्तर वर्ष बाद मिल पाई है।

करने कितने काम हैं अभी बाक़ी देश हित में,

देखिए आगे है क्या अभी तो लम्बी लड़ाई है।

राष्ट्र में एकरूप नागरिक संहिता लागु होना है,

तब कौन कहेगा अलग हिंदू मुस्लिम सिक्ख ईसाई है।

रामलला दरबार सज़ रहा है सरयू किनारे पर,

आतिश को अब रोज-रोज मिलनी मीठी मलाई है।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ हास्य रचना ☆ अटैची की सैर ☆ प्रो. नव संगीत सिंह ☆

प्रो. नव संगीत सिंह

☆ हास्य रचना ☆ अटैची की सैर प्रो. नव संगीत सिंह

आप सोच रहे होंगे कि ‘अटैची’ किसी देश या शहर का नाम है। अरे नहीं, यह वही ब्रीफकेस है, जिसमें कपड़े आदि रखे रहते हैं। तो जनाब, यह ढाई दशक पहले की बात है, मेरी शादी को एक हफ्ता ही हुआ था कि छुट्टियाँ खत्म हो गईं और मैं कॉलेज-टीचर की ड्यूटी के लिए पटियाला से तलवंडी साबो कॉलेज पहुँच गया। कुछ दिनों तक मैं अपनी पत्नी के साथ अपने माता-पिता के पास पटियाला में रहा।

एक दिन मेरे माता जी, जिन्हें मैं बी-जी कहता था, मेरी पत्नी के साथ तलवंडी साबो आये। मैं बस उन्हें स्टैंड पर लेने गया था। उनके पास मौजूद सामान में एक ब्रीफकेस था, जिसे कभी खोला नहीं गया था। दो-एक दिनों के बाद मैंने अपनी पत्नी से पूछा कि ब्रीफकेस में क्या है? पत्नी ने कहा, “मुझे नहीं पता, यह बी-जी का होगा।” मैंने बी-जी से पूछा तो उन्होंने कहा कि मैंने सोचा कि यह तुम्हारी पत्नी का होगा, इसलिए हम इसे ले आए। मुझे बहुत आश्चर्य हुआ कि उन दोनों ने चार घंटे तक बस में एक साथ यात्रा की और एक बार भी एक-दूसरे से नहीं पूछा कि अटैची किसका है! दरअसल अटैची (ब्रीफकेस) मेरा ही था, जिसमें मैंने एक्स्ट्रा कपड़े डाल कर पटियाला रखा हुआ था। खैर… इस तरह अटैची पहले तलवंडी साबो आया फिर बस का सैर-सफ़र करके वापस पटियाला चला गया।

अब हम जब भी कहीं कुछ समान वगैरह लेकर जाते हैं तो एक-दूसरे से पूछते हैं, “यह किसका है भई?… कहीं अटैची जैसी बात न बन जाए…।”

© प्रो. नव संगीत सिंह

# अकाल यूनिवर्सिटी, तलवंडी साबो-१५१३०२ (बठिंडा, पंजाब) ९४१७६९२०१५.

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares