मराठी साहित्य – जीवनरंग ☆ म्हाई… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पाहिले – ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज  म्हाई येणार आमच्याकडे,.  एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘.आता इथून पुढे)

दिपू यादी आणि पिशव्या घेऊन गेला. तिला अंदाज होता वासू वस्तू द्यायचा नाही. कारण गेल्या चार महिन्यापासून त्याचे बिल द्यायचे होते. पाच मिनिटात दिपू धावत आला. ” आई वासू काका म्हणतात, म्हाईच्या दिवशी आम्ही कुणाला उधार देत नाही.’ तिला अंदाज होताच. आता म्हाई यायला पाच तास बाकी होते.  एवढ्या माणसांचे  जेवणखांन व्हायलाच हवे. तिचा डावा हात गळ्याकडे गेला. गळ्यातील मंगळसूत्रात तीन चार ग्रॅम सोने होते. आता हाच एकमेव उपाय. तिला खूप वाईट वाटले. गावातील सर्वात प्रतिष्ठित मानकर यांची ही परिस्थिती. प्रतिष्ठित मानकरी  म्हाईच्या भक्तांना जेवण घालू शकत नाही? ज्या घरात कुळाकडून वसुलीसाठी  घोडे ठेवले होते, रोज दहा वीस बाहेरची माणसे जेवून जात होती, सकाळपासून चुलीवर ठेवलेले चहाचे आधन बंदच होत नव्हते, ज्या घरातील शिल्लक अन्नावर तीन चार कुटुंब रोज जेवत होती, त्या कुटुंबाची आज काय परिस्थिती? घरात रिकामे डबे या कुटुंबाच्या आश्रयावर मोठा झालेला वासू दुकानदार  म्हाईसाठी माल नाही म्हणतो॰ “.

दिपूच्या आईला रडू येत होते. हुंदक्यावर हुंदके येऊन गळ्यावर आदळत होते. पण तिने डोळे पुसले. दिपूला म्हणाली ” दिपू चल माझ्याबरोबर.’

” कुठे आई?

” रघु सोनार कितीपर्यंत दुकान उघडे ठेवतो? तिने गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत विचारले.

” सहा पर्यंत ‘.

” मग चल चप्पल घाल ‘.

तिने घरात नेसलेली साडी ठीकठाक केली. डोळे कोरडे केले. केसावरून हात फिरविला आणि पायात चप्पल घातली. चप्पल घालून ती आणि दिपू चार पावले चालली एवढ्याच संज्या डोक्यावरून टोपली आणताना दिसला. ती संजय कडे पहात म्हणाली  ” काय हे संज्या?

” आईने पाठवले तुमच्याकडे,’. संजयच्या डोक्यावर जड होणारी टोपली दिपूच्या आईने हाताला धरून खाली घेतली. उतरलेल्या टोपलीकडे दिपूची आई पहातच राहिली. टोपली तीन चार किलो तांदूळ, गव्हाच्या पिठाच्या दोन पिशव्या, तेलाची पिशवी, कांदे बटाटे, वाटाणे, साखर इत्यादी होते.

” अरे हे कोणासाठी संज्या? दिपूची आई आश्चर्याने ओरडली.

” तुमच्यासाठी काकी, तुमच्याकडे म्हाई येणार ना, मग हा दिपूचे बाबा एसटीतून उतरले तेव्हा माझ्या बाबांना वाटेत भेटले. तेव्हा ते रडत होते. माझ्या बाबांना म्हणाले, ” संस्थेने फसवलं, खोटा चेक दिला,  आज आमच्याकडे म्हाई येणार, तिच्याबरोबर वीस पंचवीस लोक असणार त्यांचे जेवण करावे लागणार. घरात अन्न शिजवायला धान्य नाही ‘. माझ्या बाबांनी आईला हे सांगितलं. आई म्हणाली” संजय ताबडतोब हे सामान दिपूच्या घरी पोहोचव, आज त्यांना याची गरज आहे. गावच्या मानकऱ्यांचे घर ते. त्या घराण्याच्या जीवावर अनेक जण जेवले, मोठे झाले, आज त्यांची परिस्थिती खराब आहे. पुन्हा त्यांचे दिवस येतील. माझ्या आईने ही टोपली भरली आणि  तुमच्याकडे हे सामान पोहोचवायला सांगितलं ‘.

दिपू ची आई रडत रडत खाली बसली. ” काय हे संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू मी. म्हाई रात्री येणार खरी पण संज्याच्या आई मला खरी म्हाई तुमच्या रूपात आत्ताच भेटली.’. दिपूची आई चटकन उभी राहिली डोळे पुसले आणि पुढे येऊन संजयला जवळ घेतले. ” बाळा, माझ्यासाठी डोक्यावर टोपलीतून एवढे सामान आणलंस, तुला द्यायला लाडू पण नाही रे घरात ‘. संजाने आणि दिपू ने सर्वसामान घरात घेतले. आईने त्यांना डबे दाखवले त्या डब्यात भराभर भरले.

आता दिपूच्या आईच्या अंगात हत्तीचे बळ आले. तिने भराभर दोन चुली पेटवल्या. वाटाणे पाण्यात फुगत घातले. बटाटे कांदे चिरायला घेतले. कोथिंबीर मोडून ठेवली. एका चुलीवर तेल तापवून पुऱ्या करायला घेतल्या.

इकडे देवळात ढोलांचे ताशांचे आवाज सुरू झाले. ढम… धम..ढम, ताशांचे आवाज ताड ताड ताड, शिंग वाजले पु… उ…. पु……

.म्हाई निघाली, म्हाई निघाली, भक्तांच्या भेटीला  म्हाई निघाली. सगळ्या गावात उत्साह संचारला.

दिपूच्या आईची घाई होत होती. दोन चुली रट्टा रट्टा पेटत होत्या. तिने दोन अडीच तासात सगळा स्वयंपाक पुरा केला. आधी पूजा बाबांनी आंघोळ केली आणि सोवळे नेसून ते तयार राहिले. दिपूच्या आईच्या मदतीला शांती भाजीवाली हजर झाली तसेच शेजारची शोभा काकी पण आली. दिपूच्या आईने अंघोळ करून घेतली, आणि त्यातल्या त्यात चांगले लुगडे ती दिसली. दिपू ही आंघोळ करून तयार झाला.

साडेअकरा वाजले आणि ढोल ताशे जवळ वाजायला लागले. ढम…ढम… ढम, ताड.. ताड… ताड…., शिंग वाजू लागले. दिपूच्या बाबांनी  म्हाईला घरापर्यंत आणलं. दिपूच्या आईने सर्वांच्या पायावर पाणी ओतून त्यांना आत घेतलं. म्हाईची पालखी आत ओसरीवर आली. दिपूच्या आईने तिची ओटी भरली. पुजार्यांनी गाऱ्हाणे घातले. तीर्थप्रसाद सर्वांना दिला. मग सोबतची मंडळी विसावली. गेले कित्येक वर्षे देवीच्या मानकर यांच्या घरी सर्व भक्तांना जेवण असते. त्याप्रमाणे पत्रावळी मांडून त्यांना जेवण वाढले. दिपू च्या मदतीला शांती भाजीवाली आणि शोभा काकी पण होत्या. भराभर वाढून झाले. मंडळींनी  ” पुंडलिक वरदे ‘ म्हणत जेवणाला सुरुवात केली. वरण-भात, वाटाण्याची बटाट्याची भाजी, कोशिंबीर, शेवयाची खीर आणि पुरी. भक्त मंडळी भरपूर जेवली. सर्वांनी दिपूच्या आई-वडिलांना आशीर्वाद दिले आणि म्हाईची पालखी दुसऱ्या घरी जायला निघाली.

रात्री दिपूची आई अंथरुणावर पडली पण तिच्या डोळ्यासमोर संज्याची आई होती. संजय ची आई  म्हाई सारखी धावली म्हणून गावच्या मानकरांची अब्रू वाचली, नाहीतर……

दिपू च्या आईला झोप येईना. आज दिवसभर जो मनस्ताप झाला त्याची तिला एक सारखी आठवण येत होती.

सकाळ झाली. म्हाईच्या ढोलांचा आवाज लांब लांब ऐकू येत होता. दिपूच्या आईने डब्यात शेवयाची खीर, पुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी घेतली. आणि ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली. त्याच अळीत शेवटचं घर संज्याच. संजयच्या घरी मागच्या दरवाजावर तिने टकटक केले. संजयच्या आईने मागचं दार उघडलं. तिला पाहता दिपूची आई पुढे गेली आणि तिने  संजयच्या आईला मिठीच मारली. रडत रडत ती बोलू लागली  ” संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही काल सामान पाठवले नसते तर गळ्यातील मंगळसूत्र मोडाव लागणार होतं. त्यात तरी काय तीन-चार ग्रॅम सोनं. पण गावातील सोनारासमोर घराण्याची अब्रू जाणार होती. सज्यांच्या आई, माझी म्हाई मला काल संध्याकाळीच भेटली.संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई “.

” असं बोलू नका दिपूच्या आई, अश्रू आवरा.’

” कशी आवरू संज्याच्या आई, रात्री आलेल्या म्हाईला आमची काळजी असती, तर आमचे कष्टाचे पैसे त्या संस्थेने बुडवले असते का, आणि ज्यांनी पैसे खाल्ले ते गाड्या घेऊन मजेत. आमची म्हाई त्यांना शिक्षा देत नाही. संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई.’.

संजयच्या आईला मिठी मारून दिपूची आई रडत होती आणि संजय ची आई तिला समजावत होती. त्यांचे बोलणे रडणे ऐकून तेथे आलेले संजय चे बाबा आणि संजय आपले डोळे पुसत होते.

– समाप्त –

म्हाई – गावदेवीची पालखीतून काढलेली मिरवणूक

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आज 31 डिसेंबर 2023, उद्या एक जानेवारी 2024… दोन दिवसातलं अंतर फक्त 24 तासंच…. या दिवसापासून त्या दिवसाकडे पोहोचायला मात्र वर्षभर वाट पहावी लागली… ! 

शिखरावर जाऊन झेंडा रोवायचं काम फक्त एक मिनिटाचं… पण त्यासाठी जीव धोक्यात घालून अख्खा डोंगर चढायला लागतो, तसंच काहीसं हे…! 

झेंडा रोवण्यापेक्षा जीव धोक्यात घालून तुम्ही कसे चाललात हे जास्त महत्त्वाचं….! 

किनाऱ्याशी आल्यावर, किनारा आणि नाव यामध्ये अंतर फक्त एका पावलाचं असतं… पण त्या अगोदर अख्खी नदी पालथी घालताना; वल्ही मारून धाप लागलेली असताना, तुम्ही कसे तरलात हे जास्त महत्त्वाचं…!!

एखाद्या ठिकाणी पोचण्यापेक्षा, पोचण्यासाठी केलेला प्रवास, वाटेत आलेल्या अडचणींचा सामना म्हणजे आयुष्य…! 

आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? तर ज्ञान आणि भान… 

कोणत्या वेळी काय करावं, याचं “भान”म्हणजे “ज्ञान”…

आणि कोणत्या वेळी काय करू नये, याचं “ज्ञान” म्हणजे “भान”…! 

गाडी जोरात पळवायची असेल तर काय महत्त्वाचं ?एक्सीलेटर ??…मुळीच नाही…! 

गाडी जोरात पळवायची असेल, तर सर्वात महत्त्वाचा असतो तो ब्रेक…! 

निष्णात ड्रायव्हर, गाडी सुरू केल्यानंतर पहिल्यांदा चेक करतो तो ब्रेक…

थांबण्याची खात्री असेल, तरच त्या जोरात पळण्याला अर्थ आहे…  ब्रेकच नसेल तर पुढे जाऊन आदळणार हे नक्की…

गाडी चालवणं हे झालं “ज्ञान” आणि योग्य वेळी ब्रेक दाबून थांबणं हे झालं “भान”…! 

ज्ञान आणि भानाचं समीकरण एकदा कळलं की आयुष्यातलं गणित सोपं होवुन जातं….

ज्ञान असूनही भान हरवलेली किंवा भान असूनही ज्ञान नसलेली अनेक मंडळी या वर्षभरात मला भेटली… अनेक भले बुरे अनुभव आले आणि मी त्यातून समृद्ध होत गेलो. 

अनेक भल्या भुऱ्या गोष्टी या वर्षाने माझ्या झोळीत घेत गेलो….

डिसेंबर महिन्यात आपल्या साथीने घडलेल्या घटनांचा हा लेखाजोखा आपणास सविनय सादर…

भिक्षेकरी ते कष्टकरी

  1. थंडीसाठी स्वेटर विणायला घ्यावं आणि थंडी निघून गेली तरीही काही कारणानं ते अपूर्णच राहावं… अशी अनेक अपूर्ण आयुष्यं आजूबाजूला दिसतात…

अशीच एक प्रौढ महिला….

बालपण आणि तरुणपण काबाडकष्ट करून आई-वडिलांना जगवण्यात गेलं…. कालांतराने आई वडील गेले; पुढे हिला अपंगत्व आलं. 

कुणी नोकरी देईना आणि स्वतःचा व्यवसाय टाकण्यासाठी भांडवल नाही…. शेवटी नाईलाजाने जगण्यासाठी शनिवार वाडा परिसरात भीक मागायला सुरुवात केली. 

28 डिसेंबर रोजी छप्पर असलेली एक हातगाडी आणि विक्री योग्य सामान तिला घेऊन दिले आहे, ती आता त्या गाडीत बसून व्यवसाय करुन सन्मानानं जगते आहे. 

चला, बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वेटर आज तुम्हा सर्वांच्या साथीने या थंडीत विणून पूर्ण झालं….! 

  1. चार अंध ताईं आणि एक दादा यांना या महिन्यात नवीन वर्षाचे कॅलेंडर विकायला दिले. यांचं”न्यू इयर”…” हॅप्पी” करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न…!
  2. सध्या जातीवरून”राजकारण” सुरू आहे, आम्ही जातींचा उपयोग करुन”समाजकारण” करत आहोत…

चर्मकार समाजाचे एक आजोबा रस्त्यात भीक मागत आयुष्य जगत होते, त्यांना चप्पल विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे…. 

नाभिक समाजाचे दुसरे आजोबा रस्त्यावर भीक मागत होते, त्यांना केश कर्तन आणि दाढी कटिंगचा व्यवसाय टाकून दिला आहे…. 

ज्या ठिकाणी हे लोक भीक मागतात…. शक्यतो त्याच ठिकाणी मी त्यांना व्यवसाय टाकून देतो…. 

ज्या मातीत हजारदा आयुष्याची कुस्ती हरलो…. त्याच मातीत, त्याच जागेवर जिंकण्याची नशा काही और असते…! 

जमिनीला पाठ लागली म्हणुन कुणी हरत नसतं… पडूनही न उठणं म्हणजे हरणं….! 

वरील आठही व्यक्तींच्या चेहऱ्यावरचं समाधान घेवून आम्ही 31 डिसेंबर साजरा करत आहोत. 

आयुष्यातलं आणखी एक वर्ष संपलं…. ???  संपू दे…. . पर्वा कुणाला….? 

आठ नवीन आयुष्यं उभी राहिली या नशेत आम्ही अजून झुलतो आहोत…! 

– क्रमशः भाग पहिला  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ व्यक्ती…  वल्ली…  आणि स्टेटस् – भाग-२ – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ व्यक्ती…  वल्ली…  आणि स्टेटस् – भाग-२  – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(पण माझा मुलगा मांचुरियन शिवाय काही खात नाही असे अभिमानाने सांगणारे महाभाग आपल्याला बरेच दिसतात.) इथून पुढे —–

हाच प्रकार डोमिनोज किंवा मॅकडॉनल्ड्स च्या बाबतीत.   एक तर यांच्याकडे  सगळं मटेरियल असतं ते फ्रोजन मध्ये.  फ्रेश काहीही  नसतं.  फक्त हिट अँड इट या तत्वावर यांचे काम चालते.  पिझ्झा म्हणजे अक्षरशः एका ब्रेडच्या लादीवर काही भाज्यांचे तुकडे आणि केवळ घातलय म्हणायला घातलेले चीज …..  आणि यासाठी आपण चारशे – पाचशे रुपये देतो आणि हा पिझ्झा तिथे सेंटरवर जाऊन खायचा नाही ….. तो होम डिलिव्हरी ने घरी मागवायचा……  म्हणजे आसपासच्या लोकांना कळतं यांच्याकडे पिझ्झा मागवतात , स्टेटस दाखवायचा हा ही एक प्रकार.

मॅकडॉनल्ड्स सुद्धा  मुलांच्या मानसिकतेचा बरोबर विचार करून मार्केटिंग करत असते.  उदाहरणार्थ हॅप्पी मिल ……एका हॅपी मिल बरोबर एक छोटे खेळणे मोफत आणि पालक सुद्धा माझ्या मुलाला ही वेगवेगळी खेळणी जमवायला आवडतात म्हणून हॅप्पी मिल खरेदी करत असतात.  आता या मिल मध्ये एक बर्गर,  फ्रेंच फ्राईज आणि कोक असतो.  कुठल्या अँगलने हे मिल होऊ शकते ? पण माझा मुलगा हट्टच करतो…..  त्याला हेच आवडतं म्हणून  सांगणारे  खूप लोक  आहेत आणि माझ्याकडे इतकी खेळणी जमा झाली आहेत असे फुशारकीने सांगणारी मुले …..

अजून लोकांचा एक प्रकार असतो तो  म्हणजे ट्रीप ला जाणारी  लोकं . ही लोकं उत्तर भारताच्या ट्रीपला गेली की इडली सांबार मिळत नाही म्हणून अस्वस्थ होतात आणि दक्षिण भारताच्या ट्रीपला गेली की यांना छोले,परोठे पाहिजे असतात .

आमचे एक शेजारी आहेत.  ते एका नामांकित ट्रॅव्हल एजन्सी मार्फत काश्मिर ट्रीप ला गेले होते.  आल्यावर ते अभिमानाने सर्वांना सांगत होते की …..  आम्हाला गुलमर्गमध्ये नाश्त्याला कांदे पोहे दिले आणि श्रीनगर मध्ये तर चक्क पुरणपोळीचे जेवण दिले . आता या माणसापुढे हसावे की रडावे हे कळेना.  अरे बाबा आयुष्यभर कांदेपोहे आणि पुरणपोळी खातच जगला आहेस की …….. आता गेलाच आहेस काश्मीरला तर तेथील स्थानिक खाणे खा की ……… तिथला प्रसिद्ध कहावा पी ….  शाकाहारी असशील तर कमल काकडी ची भाजी खा ……पराठे खा ….. छोले  खा… राजमा खा …  नॉनव्हेज खात असशील तर वाझवान  पद्धतीचे नॉनव्हेज खा …. पण नाही ….. हे सगळीकडे वरण-भात  आणि कांदे पोहे मागतच फिरणार.

जर तुम्ही दिल्लीत गेलात तर पहाडगंज,  करोल बाग,  जुनी दिल्ली आणि लाल किल्ला या परिसरात गेलात तर रोज एक नवीन पदार्थ ट्राय करायचा तर एक वर्ष पुरणार नाही एवढी व्हरायटी मिळते . एकंदरीतच दिल्लीच्या बाजूचे लोक खाण्यापिण्याचे  शौकीन . साधे चाट खायचे म्हणले तरी कमीत कमी पन्नास प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला मिळणार . …..

उदाहरण सांगायचे झाले तर राम लड्डू….. आता लड्डू म्हणल्यावर आपल्याला गोड पदार्थ आठवतो ….  परंतु हा राम लड्डू म्हणजे मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ भिजवून व बारीक करून त्याच्यात बऱ्याच प्रकारचे मसाले घालून तळलेली मोठीच्या मोठी भजी …..त्याच्यावर बारीक कापलेला मुळा आणि कोबी … त्यावर  मिरची – पुदिना चटणी आणि गोड चटणी घालून  देतात …..  अत्यंत वेगळा असा हा पदार्थ ….

त्याच प्रमाणे राजकचोरी हा सुद्धा तिकडचा एक अत्यंत वेगळा प्रकार …. मोठ्या पुढच्या आकाराची ही कचोरी ….. त्यामध्ये दही भल्ला , उकडलेला बटाटा, उकडलेले छोले,  आलू टिक्की, बारीक शेव, गोड तिखट चटणी आणि इतर अनेक मसाले घालून वरून भरपूर दही घालतात  ….  ही राजकचोरी एकट्या माणसाला संपवणे जवळपास अशक्य …..

तसेच अजून एक मिळणारा वेगळा पदार्थ म्हणजे दहीभल्ला ….  आपल्याकडच्या दहीवड्याचा चुलत भाऊ म्हणलं तरी हरकत नाही ….. फक्त हा उडदाच्या डाळीची ऐवजी  मुगाच्या डाळीपासून तयार केला जातो …..  असा हा दहीभल्ला ….. त्यावर तिखट आणि गोड चटण्या …. चाट मसाला आणि शेव ….. तसेच बेडमी पुरी , आलू पुरी,  कांजी बडा,  कचोरी , छोले भटूरे, कुलचे छोले, भीगा कुलचा, ईमरती … किती पदार्थ सांगू….

चांदणी चौकातल्या पराठेवाली गल्ली मध्ये तर जवळपास दीडशे प्रकारचे पराठे मिळतात ….. अगदी कारल्याचा पराठा ,पापड पराठा, रबडी पराठा, ड्रायफ्रुट पराठा, फ्रुट पराठा ,…..असे कितीतरी आपल्याकडं न मिळणारे प्रकार  येथे मिळतात ……….पण नाही आम्हाला इथे वरण भातच  पाहिजे…..

नागपूर म्हणजे ज्यांना झणझणीत खाणे आवडतं त्यांच्यासाठी तर स्वर्गच  …… सकाळचा नाष्टा म्हणजे  तर्री पोहे …..  कांदेपोह्या मध्ये हरभर्‍याची उसळ व  वरून मस्तपैकी झणझणीत रस्सा ….. वरुन थोडासा मक्याचा चिवडा आणि चिरलेला कांदा ….. आणि नंतर गरमागरम चहा …… दिवसाची सुरुवात अशी झाली तर दिवस कसा जाईल हे वेगळे सांगायची गरज नाही…..  नागपुरी वडा भात ही पण एक नागपूरची स्पेशल डिश ….  गरमा गरम वाफाळता भात त्यावर डाळीचे वडे कुस्करून घातलेले आणि वरून घातलेली मिरचीची फोडणी …..  सोबत कढी… क्या बात है ……  तसेच नागपूर साईड चे वांग्याचे भरीत सुद्धा आपल्यापेक्षा वेगळे असते ……. नागपूरची वांगीच वेगळी ….  छान पैकी तुराट्या वर ठेवून ही वांगी भाजायची नंतर फोडणी करून त्याच्यामध्ये कांदा, भरपूर मिरची,  भाजून बारीक केलेले वांगे घालायचे आणि छान पैकी परतायचे ….. परतून झाल्यावर त्यावर कांद्याची पात आणि तळलेले शेंगदाणे घालायचे ….  हे  भरीत तुम्हाला कळण्याच्या भाकरीबरोबर  किंवा पुरी बरोबर मस्त लागते…….  तसंच पाटवडी रस्सा,  शेव भाजी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सांबारवडी …… आता या सांबारवडी चा आणि साऊथ इंडियन सांबार याचा काही संबंध नाही बर का ……  नागपूर साईडला सांबार म्हणजे कोथिंबीर …… तर ही कोथिंबीरीची वडी ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने करतात आणि नागपूर साईडला वेगळ्या पद्धतीने करतात ….. कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये मिरची ,आलं, लसूण यांची पेस्ट, धने पूड, जिरे पूड, मीठ  घालतात आणि नंतर हरभरा डाळीचे पीठ व गव्हाचे पीठ  यांचे मिश्रण करून त्याची पोळी लाटतात व त्या पोळी मध्ये हे  कोथिंबिरीचे मिश्रण भरतात आणि तळतात आणि ते तर्री  किंवा कढी बरोबर खायला देतात .. हल्दीराम ची दुधी भोपळा आणि संत्र्याचा रस या पासून बनवलेली संत्रा बर्फी नागपुरात जाऊन खाल्ली नाही तर तुम्हाला शंभर टक्के पाप लागणार….. कारण का ही बर्फी जास्त काळ टिकत नसल्याने नागपूरच्या बाहेर फारशी कोठेही मिळत नाही.  ….पण नाही …..  आम्हाला इथेही वरण-भातच  पाहिजे ………

जसे उत्तरेकडील जेवण चमचमीत आणि झणझणीत तसेच दक्षिणेकडील जेवण एकदम सौम्य आणि सात्विक.  आपल्याला वाटते दक्षिणेत काय फक्त इडली, डोसा आणि भात  मिळणार……. पण नुसती इडली म्हणाल तर साधी इडली,  रवा इडली ,बटन इडली, गुंटूर इडली,  तट्टे इडली,  कांचीपुरम इडली , पोडी इडली,  रागी इडली , दही इडली , घी इडली ……. किती प्रकार सांगू…..  याशिवाय उडीद वडा,  डाळ वडा,  मैसूर बोंडा , आलुबोंडा, साधा डोसा, मसाला डोसा, बेन्ने डोसा, नीर डोसा, रवा डोसा,  कट डोसा, उत्तपा आणि भातात म्हणाल तर पुलियोगरे , बिशीबाळी,  चित्रांन्ना,  स्वीट पोंगल,  पोंगल , लेमन राईस , टोमॅटो राईस, कर्ड राईस….. किती नाव सांगू. नुसत्या  रस्सम आणि सांबारचेच दहा बारा प्रकार असतात .

हिरव्यागार केळीच्या पानावर वाढलेला उकड्या तांदळाचा वाफाळलेला भात ….. आणि त्यावर गरमागरम सांबार …… हे संपल्यावर पुन्हा भात आणि त्यावर गरमागरम रस्सम ……. आणि शेवटी दहिभात ……. सोबतीला पापड , केळाचे वेफर्स आणि लोणचे. ……  वा…  याशिवाय जगात दुसरे कोणते सुख असूच शकत नाही. …..  पण इथेही काही लोक छोले भटोरे, आलू पराठा आणि टोमॅटो सूप हुडकत फिरत असतात.

जाऊ दे …. गाढवाला गुळाची चव काय हे म्हणतात तेच खरं.

क्रमश : भाग दुसरा 

लेखक : अभय कुलकर्णी, कराड

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆’जिप्सी’ला सलाम – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘जिप्सी’ला सलाम – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

अरुण दातेंनी सांगितलेली एक हृद्य आठवण-

“मला एकदा अचानक मंगेश पाडगावकरांचा फोन आला. ते म्हणाले, “मी एक नवीन कोरं गाणं लिहिलं आहे. अजून कागदावरची शाईसुद्धा वाळलेली नाही. मी तुला फोन करण्याच्या पाच मिनिटं आधी देवसाहेबांशी बोललो आणि त्यांना गाणं ऐकवलं. आम्ही दोघांनीही हे ठरवलं आहे की, या गाण्याला फक्त तूच न्याय देऊ शकतोस.”ते गाणं म्हणजे, ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’! हे गाणं गाऊन माझी प्रसिद्धी तर वाढलीच, पण माझ्या चाहत्यांप्रमाणे मलाही हे गाणं बरंच काही शिकवून गेलं.

या गाण्याची एक आठवण फारच हृद्य आहे. तो विलक्षण अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो.

माझ्या नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये मध्यंतरात माझा बालपणीचा मित्र आणि साहित्यिक वसंत पोतदार मला भेटायला आला. त्याच्याबरोबर एक तरुण मुलगाही होता. त्याला पुढे करून वसंता मला म्हणाला, ‘‘या मुलाला दोन मिनिटे स्टेजवर काही बोलायचे आहे.’’ त्यावर मी त्याला म्हणालो की, ‘‘मी याला ओळखत नाही आणि तो काय बोलणार आहे, हे मला माहीत नाही. त्यामुळे मी परवानगी कशी देऊ?’’ यावर वसंता मला पुन्हा म्हणाला, ‘‘माझ्यावर विश्वास ठेव, त्याला जे बोलायचे आहे, ते फार विलक्षण आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावे अशी माझी इच्छा आहे.’’ मी म्हटले, ‘‘ठीक आहे, मी त्याला पाच मिनिटे देतो. कारण रसिक गाणी ऐकायला थांबले आहेत.’’

वसंता त्याला घेऊन स्टेजवर गेला आणि त्या मुलाने बोलणे सुरू केले. ‘‘जवळपास एक ते दीड महिन्यांपूर्वीपर्यंत मी पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेलेला मुलगा होतो. ड्रग्जशिवाय मला कुठलेही आकर्षण उरले नव्हते. अगदी आयुष्याचेसुद्धा! असाच एकदा कासावीस होऊन एके सकाळी मी ड्रग्जच्या शोधात एका पानाच्या दुकानाशी आलो. तेव्हा माझ्या कानावर एका गाण्याचे शब्द पडले. ते संपूर्ण गाणे मी तसेच तेथेच उभे राहून ऐकले आणि ड्रग्ज न घेता किंवा त्याची विचारपूसही न करता तिथून निघालो. एका कॅसेटच्या दुकानाशी येऊन दुकान उघडण्याची वाट बघत राहिलो. दुकान उघडताक्षणी मी पाच मिनिटांपूर्वी ऐकलेल्या गाण्याची कॅसेट विकत घेतली. दिवसभरात तेच गाणे किमान ५० वेळा ऐकले आणि पुढचे १०-१२ दिवस हेच करत राहिलो. त्यानंतर वसंत काकांकडे गेलो आणि त्यांना म्हटले की, ‘कुठल्याही परिस्थितीत या गाण्याचे गायक अरुण दाते साहेबांना मला भेटायचे आहे.’ काका म्हणाले, ‘अजिबात चिंता करू नकोस. पुढल्या महिन्यात अरुणचा कार्यक्रम नाशिकमध्ये आहे. आपण त्याला भेटायला जाऊ.’ ज्या गाण्याने माझे संपूर्ण आयुष्य पालटले आणि मी स्वत:चे माणूसपण शोधायला लागलो, ते गाणे आहे,  ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि त्याकरिताच मी सर्वांसमोर दाते साहेबांचे मुद्दाम आभार मानायला आलो आहे.’’

त्या मुलाचे बोलणे झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवशीची सगळ्यात मोठी दाद त्या मुलाच्या बोलण्याला मिळाली होती.

मला वसंताने स्टेजवर बोलावले आणि त्या मुलाने अक्षरश: माझ्या पायावर लोटांगण घातले. मी त्याला उठवून प्रेमाने जवळ घेतले आणि माईक हातात घेऊन रसिकांना आणि त्याला म्हणालो, ‘‘जे श्रेय तू मला देतो आहेस त्याचे खरे हकदार कविवर्य मंगेश पाडगावकर आणि संगीतकार यशवंत देव आहेत. मी तर या गाण्याचा फक्त गायक आहे. म्हणून मी मुंबईला गेल्यावर तुझे हे धन्यवाद त्या दोघांपर्यंत नक्की पोहोचवीन.’’

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तूच गं ती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री सुहास सोहोनी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  तूच गं ती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री सुहास सोहोनी ☆

श्री आशिष बिवलकर   

? – तूच गं ती… – ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

कोल्ह्याला द्राक्ष लागतात आंबट,

तो ही पून्हा एकदा बघेल चाखून |

मादक सौंदर्य तुझं लावण्यवती ,

कोणीही न्याहाळेल श्वास रोखून |

कामुक नजरेतून तूझ्या सुटती,

मदनाचे मनमोहक बाण |

घायाळ  करतेस पामरांना,

एका अदेत होतात गतप्राण |

विश्वमित्राची तपश्चर्या भंग करणारी,

मेनका तूच ग तीच असणार |

कलयुगात  पुन्हा अवतरलीस,

सांग आता ग कोणाला तू डसणार |

द्राक्षांचे घड मिरवतेस अंगावर,

उगाच कशाला वाढवतेस त्यांची गोडी |

एक एक द्राक्ष झाला मदिरेचा प्याला,

नकोस ग काढू खाणाऱ्यांची खोडी |

चालण्यात ऐट तुझ्या,

साज तुझा रुबाबदार |

ऐन गुलाबी थंडीत,

वातावरण केलेस ऊबदार |

महाग केलीस तू द्राक्ष,

गोष्ट खरी सोळा आणे |

अजून नको ठेऊ अंगावर,

होतील ग त्यांचे बेदाणे |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

श्री सुहास सोहोनी

? – तूच गं ती… – ? ☆ श्री सुहास सोहोनी ☆

( २ ) 

आधीच तुझ्या नजरेत केवढी

ठासून दारू भरलेली

त्यात आणखी द्राक्षांनीच तू

आपादमस्तक भारलेली ll

तूच सांग बाई आता

किती नशा झेपवायची

आधीच केवढी तप्त भट्टी

आणखी किती तापवायची ??

वाईन करण्यापूर्वी द्राक्षे

अशीच “पक्व”त असतील काय ?

दूध तापण्यापूर्वीच त्यावर

अशीच “डक्व”त असतील साय ??

जे काही करीत असतील

करोत,आपलं काय जातं

समोर आहे खाण तोवर

भरून घेऊ आपलं खातं ll

कवी : AK (काव्यानंद) मराठे

कुर्धे, पावस, रत्नागिरी

मो. 9405751698

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 172 – गीत – जैसे नहीं मिली हो…. ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका एक अप्रतिम गीत – जैसे नहीं मिली हो।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 172 – गीत  –  जैसे नहीं मिली हो…  ✍

कहने को कुछ खास नहीं है

यही पुराने रस्ते

आते जाते देखा देखी

दो दो बार नमस्ते

खुशबू न्यौता देती रहती

लगती भली भली हो।

 

कभी अगर कुछ कहा सुना तो

वह भी केवल इतना

देखो सीखी नई बुनाई

कोर्स हुआ है इतना

पढ़ना चाहो मुझको पढ़ लो

पढ़ने कहाँ चली हो।

 

अक्सर होंठ फड़कते देखे

देखी आँख भटकती

सम्मन पाकर अँगड़ाई का

सारी नसें चटकती

गंध उम्र ने सौंपी लेकिन

अब तक नहीं खिली हो।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 170 – “रोपे थे जो कठिन समय में…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत  रोपे थे जो कठिन समय में...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 170 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “रोपे थे जो कठिन समय में...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

सोच रहा फुटपाथ यहाँ पर

लैम्प पोस्ट नीचे ।

लोग चल रहे कैसे

अपनी ऑंखों को मीचे ॥

 

उजड़ी जहाँ वनस्पतियाँ हैं

उभय किनारों की ।

पगडंडियाँ कर रही निंदा

शुष्क विचारों की ।

 

विद्वानों ने सुखा दिये हैं

ज्ञान समन्वय के-

रोपे थे जो कठिन समय में

अभिनव बागीचे ॥

 

लोग जहाँ सन्दर्भ हीन

दिख रहे कहानी में ।

वहाँ खोजती सत्व

नायिका यथा जवानी में ।

 

वहीं इसी चौराहे पर

क्यों हुये इकट्ठे हैं –

आपस में मुट्ठियाँ तानते

हुये होंठ भींचे ॥

 

कैसे भूले लोग अद्यतन

जाती सुविधायें ।

जो सामाजिक संरचना की

होतीं समिधायें ।

 

जिनके पारगमन की चिन्ता

सड़कें करती हैं –

अपने हिरदय पर लक्षमण की

रेखा को खींचे ॥

©  श्री राघवेन्द्र तिवारी

02-11-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – तुम लिखो कविता! ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

?संजय दृष्टि – तुम लिखो कविता!  ? ?

उन्होंने कविता और

कवित्व की हँसी उड़ाई,

मैंने कलम उनके हाथ थमाई

और कहा, अब तुम लिखो कविता!

 

उनकी हँसी अचकचाई,

दृष्टि सकुचाई,

मैंने कलम ली उनके हाथ से

लिखी पक्तियाँ उसी

अचकचाने-सकुचाने पर

और उन्हें ही प्रति थमाई।

 

सृजन यों ही नहीं जन्मता,

देखना, दृष्टि में यों ही नहीं बदलता,

कविताओं के छत्ते से

तुम भरपूर शहद

भले ही जुटा पाओगे,

स्मरण रहे,

मधुमक्खी तो तब भी नहीं हो पाओगे!

 

बाहरी जगत के विस्तार का

माइक्रोचिप बनाएगी कविता,

जब कभी भीतर देखना होगा

उन्हें रास्ता दिखायेगी कविता!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – व्यंग्य ☆ शेष कुशल # 36 ☆ व्यंग्य – “इंग्लिश बनाम इंग्लिश” ☆ श्री शांतिलाल जैन ☆

श्री शांतिलाल जैन

(आदरणीय अग्रज एवं वरिष्ठ व्यंग्यकार श्री शांतिलाल जैन जी विगत दो  दशक से भी अधिक समय से व्यंग्य विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी पुस्तक  ‘न जाना इस देश’ को साहित्य अकादमी के राजेंद्र अनुरागी पुरस्कार से नवाजा गया है। इसके अतिरिक्त आप कई ख्यातिनाम पुरस्कारों से अलंकृत किए गए हैं। इनमें हरिकृष्ण तेलंग स्मृति सम्मान एवं डॉ ज्ञान चतुर्वेदी पुरस्कार प्रमुख हैं। श्री शांतिलाल जैन जी  के  स्थायी स्तम्भ – शेष कुशल  में आज प्रस्तुत है उनका एक विचारणीय व्यंग्य  इंग्लिश बनाम इंग्लिश।) 

☆ शेष कुशल # 36 ☆

☆ व्यंग्य – “इंग्लिश बनाम इंग्लिश” – शांतिलाल जैन 

मेरा एक मशविरा है श्रीमान कि अब से किसी बाथरूम को बाथरूम कहने की गलती मत करिएगा, गंवार समझे जाने लगेंगे. बाथरूम अब वॉशरूम हो गया है. मौका सलूजा साब के फ्लैट में गृहप्रवेश का था. मास्टर बेडरूम से जुड़े गुसलखाने को मैंने शानदार बाथरूम कह दिया. उनके चेहरे पर ऐसा भाव आया मानों कि वे एक गंवार आदमी से मुख़ातिब हों. अपार्टमेंट को फ़्लैट कहा जाना भी उन्हें नागवार गुजरा. उन्होंने कहा था एलेवंथ फ्लोर पर इलेवेटर से आ जाईएगा. हम बहुत देर तक इलेवेटर ढूंढते रहे, फिर पता लगा कि सामने लगी लिफ्ट को ही इलेवेटर कहते हैं. ये इंग्लिश बनाम इंग्लिश का समय है श्रीमान. आपको अंग्रेजी आती हो इतना काफी नहीं है, आपको नए जमाने की अंग्रेजी आनी चाहिए. जब मिसेज सलूजा ने ब्लेंडर का जिक्र किया तो मुझे पत्नी को अंग्रेजी से अंग्रेजी में अनुवाद करके बताना पड़ा कि ये मिक्सी की बात कर रहीं हैं. सलूजा साब के किड्स प्राइमरी स्कूल के स्टूडेंट नहीं हैं, जूनियर स्कूल के हैं. जिन्दगी भर पेन्सिल से लिखा आप जिस रबर से मिटाते रहे वो उनके लिए इरेजर है. वे खाते बिस्किट हैं, कहते कुकीज हैं. समझे ब्रदर, आई मीन ब्रो. तो जब आप मिलें सलूजा साब से इंट्रोडक्शन मत दे दीजिएगा – इंट्रो इज इनफ.

नए जमाने की अंग्रेजी का आलम ये कि इन दिनों बायो-डाटा तो लोग चपरासी की पोस्ट के लिए नहीं देते, रिज्यूम देना पड़ता है. फुटपाथ अब पैदल चलनेवालों के लिए नहीं होते, पेवमेंट पर से वाक् करके जाना पड़ता है. इंग्लिश अब इंग्लिश से मात खाने लगी है तभी तो गिनती लाख-करोड़-अरब में नहीं होती, मिलियन-बिलियन-ट्रिलियन में होती है. आतंकवादी अब ‘किल’ नहीं किए जाते, न्यूट्रलाईज किए जाते हैं.

ये जेन-झेड का समय है. गंवार हंड्रेड परसेंट सही होते हैं और जेन-झेड सेंट-परसेंट. अपन हंड्रेड परसेंट सही हैं श्रीमान.

-x-x-x-

© शांतिलाल जैन 

बी-8/12, महानंदा नगर, उज्जैन (म.प्र.) – 456010

9425019837 (M)

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ ‘आहत…’ श्री संजय भारद्वाज (भावानुवाद) – ‘Indomitable Warrior…?’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of n

ational and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem आहत.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना

? संजय दृष्टि – आहत ? ?

आहत हूँ

पर क्या करूँ,

जानता था

सारी आशंकाएँ मार्ग की,

सो समूह के आगे

चलता रहा,

डग भरने से चोटें

घिसटने से खरोंचेेंं,

पीछे चलनेवालों के घात,

पीछे खींचनेवालों के आघात,

रास्ता दिखाने वालों के पास

आहत होने के सिवा

कोई विकल्प भी तो

नहीं होता ना..!

© संजय भारद्वाज

(प्रातः 11:10 बजे, 6.6.2019)

मोबाइल– 9890122603, संजयउवाच@डाटामेल.भारत, [email protected]

☆☆☆☆☆

English Version by – Captain Pravin Raghuvanshi

? – Indomitable Warrior??

I’m hurt; Yes, I’m hurt…

but then, what to do…

Knowing all through

the weariness of the path,

Kept marching ahead,

pioneering the caravan…

 

Injuries caused by the

arduousness of the path,

Scratches caused by the

impregnable thorny routes…

Kept facing the ambushes

of the plotting followers…

 

Endured the blows of those

who kept pulling me back,

What options do the

pioneers ever have other

than combating the hurt..?

~Pravin

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares