सोशल मीडिया वर त्यांची ओळख झाली.थोड्या जुजबी गप्पातून आवड निवड जुळली.तिला माहिती होते,अशा ओळखी होतात थोडा वेळ राहतात आणि गायब होतात जणू सशाच्या डोक्यावरचे शिंग.म्हणून तीही कुठे अडकत नव्हती.जपून बोलत होती.
एक दिवस तो तिला भेटला.ती अंतर ठेवून वागते हे त्याच्या लक्षात आले होते.ती अनुभवाने शहाणी किंवा सडेतोड वागणारी झालेली. तर तो फार हळवा प्रत्येक गोष्ट तिला सांगणारा अगदी मना पासून कोणतेही नाते निभावणारा.तसा तो पारदर्शक वाटत होता.तसे वागतही होता.पण हिच्या मनात एकच प्रश्न आपले नाते काय? तो म्हणे सगळ्याच नात्यांना नाव का द्यायचे?नाते फुलू द्यायचे.म्हणजे नाते आपोआप तयार होते.ही एकच गोष्ट सोडली तर प्रत्येक बाबतीत त्यांचे एकमत होत असे.आवडी निवडी पण सारख्या होत्या.त्या मुळे एकमेकांची जणू सवयच लागली होती.पण ती मध्येच अस्वस्थ व्हायची.आणि नात्याचे नाव शोधू लागायची.
एक दिवस रस्त्यात फुले विकणाऱ्या मुला कडून त्याने लाल गुलाब घेतला आणि तिला दिला.त्या दिवशी ती छान दिसते हे ऑफीसमध्ये खूप लोकांनी सांगितले होते. ती पुरती गोंघळून गेली.तिला वाटले त्याच्या या कृतीचा अर्थ काय असावा?त्या नंतर ती त्याला टाळू लागली.जेवढ्यास तेवढे बोलू लागली.
एक दिवस तो धावत पळत तिच्या घरी आला.
एका हातात एक बॉक्स तर दुसऱ्या हातात पोस्टाचे पाकीट.तिला म्हणाला बहिणीने राखी पाठवली आहे. तूच बांध आणि हा माझ्या कडून ड्रेस.ती परत गोंधळात पडली.
एक दिवस सिनेमाची तिकिटे काढली.दोघे त्याच्या हट्टामुळे सिनेमाला गेले.त्यात हिरोची आई मरते असे दृश्य होते.तो इतका भावना विवश झाला.घरी येऊन तिच्या मांडीवर डोके ठेवून मनसोक्त रडला.ती डोक्यावर हात फिरवत राहिली.
नोकरी बदलताना, ड्रेस घेताना कोणतेही छोटे मोठे निर्णय तिला विचारून घेत होता.
प्रत्येक गोष्ट तिला सांगत होता.ही सगळे आनंदाने ऐकत होती,सल्ले देत होती.पण मध्येच हीचा प्रश्न डोके वर काढायचा. आपले नाते काय?
तिच्या मनातील घालमेल त्याला समजली.एक दिवस त्याने तिला आपल्या बरोबर नेले.रस्त्याने ऊन लागत होते.तिने स्कार्फ बांधून घेतला.रस्त्यात वाळवणे दिसली.ऊन आवश्यक असणारी आणि ऊन त्यांना किडी पासून वाचवणार होते.पुढे उन्हाळ्यात चालणारी रस्त्याची,काही सफाईची कामे दिसली.त्यांना एक बांधकाम दिसले.ते काम पावसाळ्या पूर्वी पूर्ण व्हायला हवे म्हणून मालक कडक सूचना देत होता.तिथल्याच झाडा खाली काही प्राणी उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून झाडा खाली बसले होते.दुसऱ्या झाडाखाली एका मजुराचे बाळ झोळीत झोपले होते.आणि त्याची आई त्याला ऊन लागू नये म्हणून जपत होती.
एकीकडे फुले सुंदर फुलली होती तर एकीकडे नाजूक गवत करपत होते.
हे सगळे त्याने तिला दाखवून दिले आणि विचारले आता सांग ऊन कसे आहे?ती पुन्हा विचारात पडली.आणि उत्तर शोधू लागली.मग तोच पुढे म्हणाला,ज्यावेळी मी तुला लाल गुलाब दिला त्या वेळी तुझ्यात मला प्रेयसी दिसली होती.ज्या वेळी मी राखी बांधून घेतली त्यावेळी तुझ्यात बहीण दिसली होती.ज्या वेळी मी हळवा होऊन रडलो त्यावेळी तुझ्यात आई दिसली होती.प्रत्येक सल्ला घेताना तुझ्यात उत्तम सल्लागार दिसला होता.प्रत्येक गोष्ट शेअर करताना एक जिवलग मैत्रीण दिसत होती.
जशी उन्हाची विविध रूपे दिसली,ऊन चांगले की वाईट हे त्याच्या त्या त्या वेळे नुसार ठरते.तसेच आपले नाते आहे.आता त्याला कोणते नाव द्यायचे हे तूच ठरव.आणि जास्त गोंधळात पडू नको.आणि आपण आपल्या या सगळ्यात समाधानी आहोत,तर प्रत्येक नात्याला नाव देण्याचा अट्टाहास करू नको.कदाचित नात्याला नाव देण्या मुळे आपण दुरावले जाऊ.
या सगळे तिला मनापासून पटले आणि नवीन मैत्रीच्या विविध धाग्यांनी विणलेला गोफ सोबत घेऊन ती समाधानाने शांत चित्ताने घरी गेली.
☆ किंमत… भाग – 2 … श्री श्रीपाद सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे☆
(आधी नुसता फेरफटका मारू, मग ठरवू काय करायचं ते, असा विचार करून तिने निरुद्देश चालायला सुरुवात केली. ) इथून पुढे —-
तंद्रीत अचानक ती स्विमिंग पूलच्या समोर येऊन उभी राहिली. तिथे तीन चार जण पाण्यात डुंबत होते. ती गडबडीने मागे फिरणार तेव्हढ्यात तिला हाक ऐकायला आली,
” ए मुली, लाजू नको. ये इकडे….”
पन्नास वयाची अट असताना इथे मुलगी कशी काय आली? हे पाहण्यासाठी तिने मान वळवली. नऊवारी साडीतल्या एक आजी स्विमिंग पूलमधून बाहेर येता येता तिलाच हाक मारत होत्या. पन्नाशी उलटलेली मुलगी ! तिला गंमत वाटली. तोपर्यंत आजी तिच्याजवळ पोहोचल्या होत्या. तिला शेकहॅंड करत त्या म्हणाल्या,
” मी अरुणा प्रधान. तुला पोहता येत नसलं तरी नुसतं डुंबायला येऊ शकतेस. अगं, पाण्यात शिरलं ना, की तन आणि मन आपोआप हलकं होऊन जातं. जगाचा विसर पडतो, षडरिपू गळून पडतात. मला तर आईला भेटल्यासारखं वाटतं.”
पाण्याला आईची उपमा दिलेली पाहून ती हळवी झाली. बराच वेळ त्या दोघी पाण्यात खेळत राहिल्या. खेळताना मध्येच ती प्रधान आजींना म्हणाली,
” मला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल.”
“आधी जेवूया मग झाडाखाली बसून गप्पा मारू.”
जेवण झाल्यावर एक छानशी जागा बघून तिथे ऐसपैस बसल्यावर आजी म्हणाल्या,
” माझ्याबद्दल मी तुला सांगते. तूही मनमोकळेपणाने स्वतः बद्दल सांग. आधी तू बोलत्येस की मी बोलू?”
“आधी मी बोलते.”
असं म्हणून तिने सकाळी घडलेला किस्सा सांगितला आणि म्हणाली,.. ” तीस वर्षं व्रतवैकल्यं केली,उपासतापास केले. जे केलं ते नक्की कोणासाठी केलं? असं आताशा माझ्या मनात यायला लागलं आहे. कारण जे काही मी करते ते मला वाटतं म्हणून करते, असा सर्वांचा भाव असतो. माझ्या राबण्याला, माझ्या भावनांना किंमत नाही असं आताशा वाटू लागलंय. पण आता बास झालं असं मी ठरवलं आणि इथे येण्याचा निर्णय घेतला. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती….. आमच्या संसाराला तीस वर्षं झाली. आतापर्यंत नातं परिपक्व व्हायला हवं होतं नाही? पण, काहीतरी ‘मिसिंग’ आहे, असं उलटंच वाटायला लागलंय. ‘अपूर्णतेतंच खरा आनंद आहे ‘, ‘ भिन्नतेतच गंमत आहे ‘, वगैरे विचार डोक्यात येतात, पण हे सर्व भंपक आहे असंही वाटतं. तीस वर्षांनंतरही पावलोपावली मतभिन्नता? खरं तर आम्ही नाटक-सिनेमाला जातो, हॉटेलिंग करतो, वर्षांतून दोन तीन ट्रीप असतात. पण आता हेही सर्व रूटीन झाल्यासारखं वाटतं. सगळं निरस होत चाललंय. नवरा वाईट नाही, पण टिपीकल पुरुषी मनोवृत्ती आहे. सध्या मी गोंधळलेली आहे. मला नेमकं काय हवंय ते कळत नाहीये. पण खात्री आहे की कधीतरी सापडेल. तोपर्यंत शोध घ्यायचाय. त्याचाच भाग म्हणून मी इथे आल्येय.” .. दीर्घ श्वास घेऊन ती थांबली. आता आपण बोलायचं आहे हे ओळखून, प्रधान आजींनी डोळे मिचकावत तिला विचारलं,
” हं…. तर काय जाणून घ्यायचंय माझ्याबद्दल…..?”
” किती छान आहात तुम्ही. खरं तर स्वतः विषयी जे जे सांगाल ते सर्व ऐकण्याची उत्सुकता आहे.”
ह्या तिच्या वक्तव्यावर प्रधान आजी हसून म्हणाल्या,
” मी अरुणा प्रधान, वय वर्षे शहात्तर. एक मुलगा आहे, ऑस्ट्रेलियात असतो. पस्तीस वर्षं अर्धांगिनी होऊन संसार केला, आता गेली पंधरा वर्षं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते. नाही… नाही…. गैरसमज करून घेऊ नकोस. नवरा तोच आहे. माझ्यापुरतं मी स्टेटस बदललंय. आता मी अर्धांगिनी नाही आणि वामांगीही नाही. संसारात राहूनही अलिप्त झाल्येय. गरज असेल तेव्हा आम्ही एकमेकांना जमेल तेवढी मदत करत असतो. पण एकमेकांवर अवलंबून नाही, उत्तरदायी नाही. आम्ही एकमेकांना मोकळं केलं आहे.”
” म्हणजे एका वेगळ्याच प्रकारे तुम्ही वानप्रस्थाश्रम एन्जॉय करताय….” ती हसत हसत म्हणाली.
” अगदी बरोबर ! अगं, पंधरा वर्षांपूर्वी माझ्या स्टोरीत नवऱ्याची, मुलाची, सुनेची, नातवंडांची स्टोरी इतकी मिसळलेली होती की ती फक्त माझी स्टोरी नसायची. आता मात्र तसं नाहीये. माझी स्टोरी ही फक्त माझीच स्टोरी आहे. ‘ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ असं पाडगांवकरांनी म्हटलंय. पण असं प्रेम करण्यासाठी आपल्याला नोकरी-व्यवसाय करताना, संसाराचा गाडा ओढताना वेळ कुठे मिळतो? आणि म्हणूनच आपल्यासारख्यांच्या आयुष्यात, वानप्रस्थाश्रम महत्त्वाचा टप्पा ठरतो. सहजीवनातील प्रेम, आदर, मैत्री आणि सहवासाची गरज उतार वयातही असते. पण सहजीवनाच्या बरोबरीने स्वजीवनही असतंच की…. आणि म्हणूनच स्वजीवनाचा आनंद घेण्यासाठी मी स्वतःला बंधनातून मोकळं केलंय.”
” प्रधान साहेबांचं काय मत आहे? “
तिने उत्सुकतेने विचारलं.
” तुला काय वाटतं, तूच कल्पना करून सांग.”
प्रधान आजींच्या प्रश्नाने ती भांबावली. तिचा चेहरा पाहून त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या,
“अगं, माझा नवरा जगावेगळा आहे. त्याचं म्हणणं असं आहे, की आपला संसार कसा असावा, आपलं नातं कसं असावं ह्याचा विचार समाजाच्या अदृष्य दडपणाखाली बरीचशी जोडपी ठरवत असतात. संसारातील गोडी टिकवायची असेल तर, प्रत्येक जोडप्याने दर दहा वर्षांनी किमान सहा महिन्यांसाठी वेगळं रहायला हवं. माझ्या नवऱ्याची अशी मतं असल्यामुळे मला निर्णय घेणं खूपच सोपं गेलं. ‘ लिव्ह इन रिलेशनशिप ‘ ही कल्पना त्याला बेहद्द आवडली. खरं सांगू, बंधन नसल्यामुळे आता आम्ही एकमेकांना उलट जास्तच समजून घेतो.”
तिचा गंभीर चेहरा पाहून आजींनी तिला जवळ घेतलं. तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या, ” नको काळजी करू एवढी. उद्या रात्रीपर्यंत इतकी धमाल कर, की घरी जाताना एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. अधूनमधून इथे येत जा. वर्षातून एकदोनदा, दहा पंधरा दिवसांची सोलो ट्रीप कर. बघ तुझ्यात कसा आमूलाग्र बदल होतो की नाही ! शेवटी एकच कानमंत्र देते, जी गोष्ट सहज प्राप्य असते तिची किंमत नसते.”
— समाप्त —
लेखक – श्री श्रीपाद सप्रे
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आमच्या लग्नानंतर अनेकदा, सुनीलला माझ्यासाठी जीन्सची पँट घ्यावीशी वाटे. मला लांब कुर्ता आणि जीन्समधे पहायला सुनीलला मनापासून आवडे. मला खरेदीला सवड नसल्याने वा, या ना त्या कारणाने ‘जीन्स’ची खरेदी राहून जाई. आमचे ‘मंगलदीप’ चे कार्यक्रम शक्यतो शनिवारी-रविवारी असल्याने, त्यावेळी खरेदीची इच्छाही होत नसे. एरव्ही थोरली बहीण उषाताई अमेरिकेहून आली, की ती माझ्यासाठी बॅगा भरभरून वेगवेगळ्या फॅशनचे, सुंदर सुंदर कपडेच कपडे आणायची. तिला, मला त्या कपड्यांत सजवून पाहताना किती सार्थकता वाटे! मला मात्र क्षणाक्षणाला कपडे बदलून फॅशन परेड करायचा खूप कंटाळा येई! तरी बहिणीचे प्रेम पाहून आनंदही होई!
आमच्या लग्नाच्या एका वाढदिवशी मात्र, सुनीलची ही मनापासूनची इच्छा मी पूर्ण करायची असं ठरवलं. याचं खरं कारणही तसंच होतं. मला दूरदर्शनच्या एका दिवाळी स्पेशल कार्यक्रमात, एका मोठ्या मॉलची गिफ्ट कुपन्स मिळाली होती. तिचा योग्य वेळेत वापर करायचा होता. बऱ्याच वर्षांनी दोघांना वेळ होता आणि खरेदीचा योग आणि मूडही होता.
एरव्ही स्लीम ट्रीम दिसणाऱ्या तरुण मुलींची फिगर पाहून मला हुरहूर वाटे. आपल्याला लग्नापूर्वीसारखं असं होणं, आता अशक्यच वाटे! त्यांच्यासारखी, जणू काही अंगालाच घट्ट शिवल्यासारखी टाईट फिटिंग्सची जीन्स आपण कधीच घालू शकणार नाही. त्यातून व्यायामही करायचा आळस! आणि भरीला तासन् तास संगीताच्या रियाजाचं तसंच शिकवण्याचं बैठं काम ! म्हणजे सर्व आनंदी आनंदच ! असो.
आज त्या मॉलमधे मी आणि सुनील अगदी नवपरिणित दांपत्यासारखे आनंदाने बऱ्याच वर्षांनी, हौसे-मौजेने बागडत खरेदीला गेलो. चार पाच मजले फिर फिर फिरून दागिने, घड्याळं, हिऱ्याच्या अंगठ्या, सर्व काही पाहिलं, पण काही पसंतीस पडेना. बरंच फिरल्यावरही माझ्या आणि सुनीलच्या मापाचे कपडेही काही इथं मिळेनात. तेव्हा म्हटलं, “बहुतेक ह्या मॉलमधे आपल्यापेक्षा बारीक व्यक्तींसाठीच कपडे ठेवले असावेत, किंवा आपण ‘स्पेशल एक्स्ट्रा लार्ज’ या कॅटेगरीत मोडत असू. आपल्याला हवी ती ‘जीन्स’ इथं काही मिळणार नाही.
इतक्यात जीन्स दाखवणाऱ्या सेल्सगर्लने मला ओळखलं, “मॅडम, तुम्ही टीव्हीवर गाता का?” मी होकारार्थी मान हलवल्यावर तिला खूप आनंद झाला. म्हणाली, “माझी आई तुमची खूप मोठी फॅन आहे!” तिनं इतर सहकाऱ्यांना सांगून सगळीकडून भराभर उत्खनन करून, पटापट माझ्या मापाच्या जीन्स शोधून आणवल्या. अजूनही काही बारामतीची फॅन मंडळी भेटली. “अय्या, प्रत्यक्षात कित्ती बारीक दिसताय तुम्ही!” असा प्रत्येक स्त्रीला (उगाच!) भुलवणारा आणि सुखावणारा डायलॉग त्यांनी उच्चारला!
मीही आधीच्या सगळ्या भानगडी विसरून (ट्रायलरूमच्या आरशात पाहिलेलं आपलं अजस्र रूप विसरून!) काही क्षण मनोमन सुखावले…आणि त्यातली एक जीन्स आम्ही पसंत करून घेतलीही!
एवढ्यात एक ठेंगणी-ठुसकी, सामान्य तोंडवळ्याची, सावळ्या वर्णाची स्त्री मला भेटली आणि म्हणाली, “आप पद्मजाजी हैं ना? आप तो मेरी शादी में आयी थीं, मैं धीरज धानकजी की बहू हूँ।”… (धीरजजी माझ्या ‘गीत नया गाता हूँ’, ‘घर नाचले नाचले’ अशा अनेक गाण्यांच्या CD चे संगीत संयोजक. तसेच आर.डी. बर्मन, एस. डी. बर्मन , मदनमोहन, लक्ष्मीकांत – प्यारेलाल अशा अनेक दिग्गजांबरोबर अफलातून संगीत संयोजन करणारे प्रतिभावंत कलाकार! त्यांनीच सर्वप्रथम माझं संगीत ऐकून मला सुरुवातीलाच प्रोत्साहन दिलं होतं. स्वतः नवोन्मेषाचा, चैतन्याचा धबधबा असलेले, आजूबाजूचं वातावरण क्षणात तणावमुक्त करणारे धीरजभाई, जे गाणं हातात घेतल्यावर, त्या गाण्याला सजवून कुठच्या कुठे उंचीवर नेऊन ठेवत! उदा… दिवे लागले रे, आओ फिरसे दिया जलायें… ई.)
इथे धीरजजींच्या सुनेच्या दोन्ही बाजूला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन सुंदर पिल्लं लगडलेली! “चलो बेटा, नमस्ते करो अंकल आँटी कोऽऽऽ।” असं म्हटल्यावर, नमस्कार करत त्या मुलीनं सुंदर स्मित केलं अन्…. माझ्या डोक्यात अक्षरशः लख्खकन् वीज चमकली!
काय ही दैवाची करणी! साक्षात् धीरजभाईंचं जस्संच्या तस्सं तेजस्वी रूप, कोरल्यासारखं तिच्यात उतरलं होतं ! ‘परमेश्वर’ नावाच्या कोण्या एकाने हे ‘जीन्स’ मात्र अगदी ‘फिट्ट’ बसवले होते! तेच डोळे, तोच वर्ण, तेच हास्य…. परमेश्वराच्या अदाकरीचा – कलाकृतीचा हा नमुना पाहून मात्र, माझ्या डोळ्यांतली आसवं मी थांबवून ठेवली होती.
खरंतर जन्म मरणाचं चक्र भारतीय तत्त्वज्ञानाने अपरिहार्य मानलं आहे. जीव कुडी सोडून जातो. नष्ट होत नाही. पण एका पिंजर्यातून प्राणपक्षी दुसर्या पिंजर्यात जातो. चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधे प्रवेश करून पुन्हा धरतीवर सजीव प्राण्यांमध्ये येतो. जीन्सच्या रुपाने आज धीरजभाई यांना त्यांच्या या नातीमधे वास करताना मी पाहिलं. प्रत्यक्ष धीरजभाईंचं रूप पाहून आनंद आणि ते या जगात नसल्याची खंत!.. अशी संमिश्र भावना डोळ्यांत दाटून आली होती. मात्र ही मंडळी नजरेआड झाल्यावर माझा बांध मी मोकळा करून दिला…!
☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ६ ते १० — मराठी भावानुवाद. ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)
देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या ऋचा उषा देवतेला आवाहन करतात.
या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या सहा ते दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
ऊ॒र्ध्वस्ति॑ष्ठा न ऊ॒तये॑ऽ॒स्मिन्वाजे॑ शतक्रतो । सम॒न्येषु॑ ब्रवावहै ॥ ६ ॥
कार्यांमध्ये पराक्रमांच्या करि संरक्षण अमुचे
सामर्थ्यशाली देवेंद्रा उभे उठुन ऱ्हायचे
हे शचीपतये तुमच्या अमुच्या मध्ये कोणी नसावे
संभाषण अमुचे आता तुमच्यासवेचि हो व्हावे ||६||
योगे॑योगे त॒वस्त॑रं॒ वाजे॑वाजे हवामहे । सखा॑य॒ इंद्र॑मू॒तये॑ ॥ ७ ॥
वैभवाची आंस जागता अमुच्या आर्त मनात
शौर्य अपुले गाजविण्याला तुंबळ रणांगणात
भक्ती अमुची देवेन्द्रावर चंडप्रतापी तो
सहाय्य करण्या आम्हाला त्यालाची पाचारितो ||७||
आ घा॑ गम॒द्यदि॒ श्रव॑त्सह॒स्रिणी॑भिरू॒तिभिः॑ । वाजे॑भि॒रुप॑ नो॒ हव॑म् ॥ ८ ॥
मूर्तिमंत तू भाग्य तयांचे स्तुती तुझी जे गाती ||१०||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
आपण जेवढी बडबड लोकांशी दिवसभर करतो ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त मनातल्या मनात करतो..
बघा हं…
(सकाळचा अलार्म झाल्यावर)
यार्रर्रऽऽऽ झाली लगेच सकाळ..
आत्ता तर डोळा लागला होता..
(ब्रश करताना)
काय भाजी बनवू आता..?
(गॅस जवळ आल्यावर)
एवढीच झाली भाजी…! पोरं खातील की नाही देव जाणे…
(आंघोळीला जाताना)
कोणता ड्रेस घालू याऽऽऽऽर… सापडत नाही एकही जागेवर… निळ्यानी गरम होईल.. काळा कालच घातला.. पांढरा पावसाने खराब होईल… जाऊ दे पिवळा अडकवते… (त्यात एखादा कपडा अंगावर पडतो… तेव्हा कपड्यांनाही आपण बोलतो..)
या… या.. आता माझ्या अंगावर, पडा एकदाचे.. नाही, या ना या.. कितीही आवरा… पुन्हा तेच!
(घरातून निघताना)
×××ला, काय घड्याळ पळतंय… कितीही लवकर उठा, तीच बोंब…
(रेडिओ बंद करताना, भीमसेन जोशींचा अभंग चालू असतो)
पंडितजी, तुम्ही कसलं भारी गाताय! पण माफ करा, मला जावं लागेल आता.. सात वाजलेत..
(गाडी चालवताना – एखादा ओव्हरटेक करत असेल तर..)
“नाही, ये ना ये… घाल माझ्या अंगावर एकदाचा… तूच राहिला होतास.. कुठं झेंडे गाडायचेत देव जाणे…. तूही यमसदनी जा आणि मलाही ने….
(खूपजण बॅक मिरर मधून मागे बघत असतात…. तेव्हा)
अरे बाबा काय बघतोस मागे? दोन दोन पोरांची आई आहे मी… चल नीघ पुढं…
(शाळेत पोचल्यावर)
हुऽऽऽऽऽऽश्…. झालं एकदाचं टाईममधे इन.. झालं… देव पावला..
(लिफ्ट बंद असेल तर)
नाही बरोबर आहे देवा…. माझ्या वेळीच तू लिफ्ट बंद करणार… घे अजून काबाडकष्ट करुन घे माझ्याकडून… हाडं मोडून जाऊ देत माझी…
(जेवताना)
किती लवकर ब्रेक संपतो… भारत सरकारने निदान जेवायला तरी नीट वेळ द्यावा..
(दुपारी पाठ टेकवताना)
×××ला कंबरडं मोडतं का काय देव जाणे एखादं दिवशी…. टेकली एकदाची पाठ बाबा….. देवा..
(चहाच्या वेळी)
कोणी एखादा कप चहा करुन देईल तर शपथ….. वॉकिंग करावं लागेल.. ढिगभर वजन वाढतंय… या वजनाचं एक काय करावं.. देव जाणे…
(वॉक करताना)
आताच फोन उरकून घ्यावेत, वॉकिंग टाईम पण लवकर संपतो…..
एखादी बाई फास्ट वॉक करत असेल तर..
नाही जा अजून जोरात, करा वॉकिंग, मला काही फरक पडत नाही… कुणाकुणाला माधुरी दीक्षित बनायचंय? बना.. मला काही फरक पडत नाही..
(संध्याकाळी स्वयंपाक करताना)
एखाद्या दिवशी पण कुणी म्हणत नाही..
आज काऽऽऽऽऽऽऽही करु नको..
अजिबात भूक नाही…. एवढी भूक लागतेच कशी माणसाला?
(किचन आवरताना)
नाही आवरतेना… मीच आवरते… सगळं मीच करते…. कुण्णी काही करु नका.. बसा सगळे सोफावर….. सिंहासन आणून देऊ का…??
(झोपताना)
आता कुणीही माझ्या खोलीत टपकू नका तासभर….. जरा बघू द्या मोबाईल मला.. इतके मेसेज येतात, एक धड वाचून होत नाही….
(दुसऱ्याचे स्टेटस बघून)
यांना बरा भटकायला वेळ मिळतो.. इथं मला मरायला फुरसत नाही….
काय बाबा, हल्ली तर कुणी काही पण कपडे घालतं….
(झोप आली असताना)
झोपा बाबा आता…. पुन्हा पाचला उठायचं आहे….. सुट्टी नाहीये उद्या… परिक्षा चालू आहेत, वेळेच्या आधी तडमडावं लागेल..
(आणि मध्यरात्री जाग आल्यावर)
बापरे, तीन वाजले…? दोन तासात उठायचंय… झोपा पटकन् थोडा वेळ..
……..
लेखक : अज्ञात.
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में अवश्य मिली है किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है स्त्री विमर्श आधारित एक विचारणीय लघुकथा ‘गणेशचौथ’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद # 123 ☆
☆ लघुकथा – गणेशचौथ ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆
‘आज गणेश चौथ है आप भी व्रत होंगी?’ सासूजी खुद तो व्रत रखती ही थीं आस-पड़ोसवालों से भी पूछती रहतीं –‘ नहीं’ या ‘हाँ’ के उत्तर में सामने से एक प्रश्न दग जाता – ‘और आपकी बहू?’ ‘उसके लड़का नहीं है ना? हमारे यहाँ लड़के की माँ ही गणेशचौथ का व्रत रखती है। ‘
ना चाहते हुए भी मेरे कानों में आवाज पड़ ही जाती थी। तभी मैंने सुना आस्था दादी से उलझ रही है – ‘दादी। लड़के के लिए व्रत रखती हैं आप! लड़की के लिए कौन-सा व्रत होता है?’
‘ऐं — लड़कियों के लिए कोई व्रत रखता है क्या?’- दादी बोलीं
‘पर क्यों नहीं रखता’ – रुआँसी होती आस्था ने पूछा।
‘अरे, हमें का पता। जाकर अपनी मम्मी से पूछो, बहुत पढ़ी-लिखी हैं वही बताएंगी।’
आस्था रोनी सूरत बनाकर मेरे सामने खड़ी थी। आस्था के गाल पर स्नेह भरी हल्की चपत मैं लगाकर बोली – ‘ये पूजा- पाठ संतान के लिए होती है।’
‘संतान मतलब?’
‘हमारे बच्चे और क्या।‘
आस्था के चेहरे पर भाव आँख – मिचौली खेल रहे थे। सासूजी पूजा करने बैठीं, तिल के लड्डूओं का भोग बना था। उन्होंने अपने बेटे रजत को टीका करने के लिए आरती का थाल उठाया ही था कि रजत ने अपनी बेटियों को आगे कर दिया – ‘पहले इन्हें माँ’। तिल की सौंधी महक घर भर में पसर गयी थी।
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “रहिमन फाटे दूध को मथे, न माखन होय…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 161 ☆
☆ रहिमन फाटे दूध को मथे, न माखन होय… ☆
जन्मोत्सव से लेकर नामकरण संस्कार तक अनेको आयोजन हुए। ये बात अलग है कि सारी डफलियों को जोड़कर एकरूपता देने की कोशिश की गयी किन्तु सभी ने अपने – अपने राग अलापने की आदत को नहीं छोड़ा। बेसुरे राग से हैरान होकर नाम को खंडित रूप में प्रस्तुत किया गया। जब पहला कदम लड़खड़ाता है तो बच्चे को उसके माता – पिता सम्हाल लेते हैं लेकिन यहाँ तो कौन क्या है ये समझना मुश्किल है।
सब एकजुटता तो चाहते हैं किन्तु स्वयं को बदले बिना। कहते हैं परिवर्तन प्रकृति का मूलाधार है, पर नासमझ व्यक्ति या जो जानबूझकर कर अंजान बन रहे हों उन्हें कोई कैसे जाग्रत करें। लंबी रेस का घोड़ा बनना कभी आसान नहीं होता है उसके लिए पर्याप्त अभ्यास की आवश्यकता होती है। कोई क्या करेगा जब घोड़े अस्तबल में रहकर ही रेस का हिस्सा बनने का दिवा स्वप्न देख रहे हों ?
खैर दौड़- भाग करते रहिए, जो सामने दिखेगा वही बिकेगा, घूरे के भी भाग्य बदलते हैं सो कभी आपका भी नंबर लग सकता है। किसी बहाने सही पर एकजुटता का विचार तो आया। एक- एक करके ग्यारह बन सकते हैं बस सच्चे मन से कोशिश करते रहिए। जनता सबका मूल्यांकन करती है सो कथनी- करनी के भेद से बचना चाहिए।