मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 3 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆

☆ अनुवादित दीर्घकथा – द्वारकाधीश… भाग 3 – श्री भगवान वैद्य ‘प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

(त्यातला एखादाच डोंगर असा असतो की जो स्वत:च्या उंचीमुळे, या वादळांमध्येही आपली ओळख टिकवून ठेवण्यात यशस्वी होतो…’ ) इथून पुढे —– 

राजारामच्या वागण्या-बोलण्यातला मनापासूनचा आपलेपणा खरंतर रत्नालाही खूप आवडतो… तिलाही तो जवळचा वाटतो. त्याच्या भेटीचा तो एक प्रसंग तर तिच्यासाठी अगदी अविस्मरणीय ठरला आहे… म्हणजे जेव्हा राजाराम आम्हाला शिर्डीमध्ये अगदी अचानक भेटला होता, तो प्रसंग… मी गाडी घेतल्यानंतरच्या लगेचच्याच उन्हाळ्याच्या सुट्टीत साईबाबांच्या दर्शनासाठी सहकुटुंब शिर्डीला गेलो होतो. तिथे आम्हाला राजाराम आणि रेणुकावहिनी अगदी अनपेक्षितपणे भेटले. मग आम्ही सगळ्यांनी एकत्रच प्रसाद घेतला… दोन तीन तास एकत्रच होतो आम्ही. निघायची वेळ झाली तेव्हा मी माझ्या मुलांना त्या दोघांच्याही पाया पडायला सांगितलं. आणि फक्त दोन्ही मुलांनीच नाही, तर रत्नानेही त्या दोघांना वाकून नमस्कार केला. ते पाहून राजारामला खूपच भरून आलं होतं… डोळेही पाणावले होते त्याचे… माझ्याशी तर बोलूही शकला नव्हता तो. पण हात जोडून रत्नाला म्हणाला होता… ‘‘ वहिनी, मी तुमच्यापेक्षा फक्त वयाने मोठा आहे. बाकी सगळ्या बाबतीत तुम्ही दोघे माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. मी तुमचा ‘ सुदामा ’ आहे असं समजून माझी कायम आठवण ठेवा…” त्यानंतर आमची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही. पण त्यानंतर जेव्हा-केव्हा त्याची आठवण काढली जाते, तेव्हा रत्ना राजारामविषयी ‘सुदामा’ या नावानेच बोलत असते—-

श्री भगवान वैद्य प्रखर

राजाराम झोपून उठल्यावर मी आमच्यासाठी चहा टाकला. तेवढ्यात तो तयार होऊन आला.. चहा घेता घेता त्याने विचारलं… ‘‘ रिटायर झाल्यावर दिले जातात, ते सगळे पैसे मिळाले असतील ना तुला? ”… राजारामने एक खडा टाकून पाहिला … पाणी किती खोल आहे याचा अंदाज घेत होता बहुतेक तो… ‘‘ हो… थोडे फार मिळाले… पण अजून बरेच मिळायचे बाकी आहेत… सरकारी काम आहे बाबा… आणि ते कधीच सहजपणे होत नाही, हे तर जाहीर आहे.”… मी पण त्याला माझ्याकडच्या पैश्यांचा थांगपत्ता लागू दिला नाही. 

‘‘ आणि रत्नावहिनींची नोकरी व्यवस्थित चालली आहे ना? ”– हा त्याचा दुसरा प्रयत्न आहे, असंच मला वाटून गेलं.

‘‘ ठीक चालली आहे असंच म्हणायला हवं… दोन-दोन महिन्यांचा , कधी कधी तर तीन तीन महिन्यांचाही पगार दिला जात नाही तिच्या ऑफिसकडून…” … वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा आधार घेऊन मी सारखं त्याच्याशी चक्क खोटं बोलत होतो. तो आणि मी काही वेळ जणू एक अनामिक खेळ खेळत होतो… ज्यात मी होतो फळांनी लगडलेला एक वृक्ष… आणि राजाराम होता एक लहानसा निष्पाप मुलगा… जो अतिशय साध्या-सरळ मनाने बाण मारत राहिला होता आणि वृक्ष मात्र अतिशय हुशारीने आपली फळं वाचवत राहिला होता. 

पाच वाजायच्या जरासं आधीच मी राजारामला घेऊन बस-स्टँडवर पोहोचलोही होतो. बस अजून लागली नव्हती. राजारामला तिथेच थांबायला सांगून, मी त्याच्यासाठी पान आणायला गेलो. परत येईपर्यंत बस लागलेली होती. राजाराम बसमध्ये चढतच होता, इतक्यात रत्ना जवळजवळ पळतच बसपाशी आली. 

‘‘ वहिनी तुम्ही?… अहो इतकी धावपळ करत इतक्या लांब यायची काय गरज होती…”

‘‘ गरज होती दादा. खरं तर सुधाच्या लग्नासाठी आम्ही रामटेकला यायलाच हवं होतं. पण तुम्ही समजून घ्याल याची खात्री आहे मला. भावाच्या घरीही त्याला मदत करायला कुणी नाहीये. त्यामुळे आम्हा दोघांनाही काही दिवस आधीच त्याच्याकडे जावं लागणार आहे… हे घ्या.. सुधाच्या लग्नानिमित्त आमच्याकडून भेट…” तिने राजारामच्या हातात एक प्लॅस्टीकची पिशवी ठेवली… ‘‘ रेणुकाताईंना म्हणावं की लग्नात ही साडी नेसायची. हा रंग अगदी खुलून दिसेल त्यांना… आणि त्याच पिशवीत शर्ट-पॅन्टचं कापडही आहे… तुमच्यासाठी.. अजून लग्नाला थोडे दिवस आहेत. गेल्या गेल्या शिवायला टाका.” 

‘‘ वहिनी उगीचच इतका खर्च कशाला केलात? तुम्ही दोघं लग्नाला आला असतात तर वेगळी गोष्ट होती.” 

‘‘असू दे हो… आणि रेणुकाताईंना ही चिठ्ठी द्या.”… पर्समधून एक पाकिट काढून तिने राजारामला दिलं… ‘‘ नीट सांभाळून ठेवा हं खिशात. वधू-वरांना आमचा आशिर्वाद सांगा, आणि लग्न पार पडल्यावर रेणुकावहिनींना घेऊन चार-आठ दिवस रहायलाच या आमच्याकडे… नक्की या.” 

…. एवढ्यात कंडक्टरने घंटा वाजवली आणि राजाराम जाऊन त्याच्या सीटवर बसला. रत्ना आणि मी आपापल्या स्कूटरवरून घरी आलो. मला घर एकदम सुनंसुनं वाटायला लागलं… हि-या-मोत्यांनी भरलेली नौका समुद्रात अचानक दिसेनाशी झाल्यावर दु:ख.. निराशा दाटून यावी… तशाच दु:खात… तशाच निराशेत मी जणू बुडून चाललो होतो. माझी मन:स्थिती रत्नाला बहुदा नेमकी कळली होती… ‘‘चला, चहा घेऊया.” 

‘‘ नको… आत्ता नको… नंतर घेऊ या….  बिचारा राजाराम… त्याला मी वीस हजार देईन या आशेने आला होता. त्याची एकूण परिस्थिती पाहून वाटलंही होतं… द्यावेत म्हणून…”

‘‘ मग का नाही दिलेत? त्याला वीस हजार देऊन टाकले तर आपण कंगाल होऊ असं  वाटलं होतं का तुम्हाला? अहो जन्मभराची तुमची मैत्री… वीस हजार रूपये त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटले का तुम्हाला? घरातले दोघं दोघं नोकरी करत असतांना सुद्धा, एखाद्या मित्राला त्याच्या गरजेच्या वेळी जर ते उपयोगी पडू शकले नाहीत, तर त्यांच्या आयुष्यातली अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही… जाऊ दे आता. आणि ऐका… आता असे हताश होऊ नका… मी एकवीस हजार रूपयांचा बँक ड्राफ्ट काढून तुमच्या ‘सुदामा’ च्या हवाली केला आहे. त्या पाकिटात तो ड्राफ्टच होता. आणि म्हणूनच तो नीट सांभाळून न्यायला सांगत होते त्यांना……  आता चालेल ना चहा?” … असं म्हणत रत्ना चहा करण्यासाठी आत निघून गेली… 

आणि मी विचार करत राहिलो… ‘आज रत्नाने किती सहजपणे मला “ द्वारकाधीश “ बनवून टाकलं आहे’……..  

— समाप्त —

मूळ हिंदी कथा – ‘ द्वारकाधीश’ – कथाकार – श्री. भगवान वैद्य ‘प्रखर’ 

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पोच पावती… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ पोच पावती… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक आजोबा स्टाफला विचारत होते, ” ह्याची पोचपावती मिळेल ना ?”

बरेचदा मीही हिला सांगतो ‘ acknowledgment म्हणून जपून ठेव ग !!! ‘

नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली…… 

….. पोचपावती ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही का असू नये ?? 

ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.

कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना ‘ appreciation ‘असू शकतं.

ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा. 

घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला, कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात, “ छान झाला बरं का आजचा कार्यक्रम. ” आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो !

पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते. एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं appreciation देऊन बघा.. अगदी मनापासून… बघा त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं. 

आमच्या घरकामवालीला गजरे, फुलं घालून यायची फार आवड ! कधी त्या मोठा गजरा घालून आल्या कामाला, की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येत ” प्रमिला काय मस्त दिसते आहेस. चल एक फोटो काढते तुझा !” ह्यानेसुद्धा खूप खुश होतात त्या. लहानांपासून मोठ्यांपर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते…… एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो, की वर्गात ” छान निबंध लिहिलास हो ” असं म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो. 

ह्या पोचपावती साठी माणूस फक्त जवळचाच हवा असंही काही नाही. कधीतरी आपल्याच दुकानदारालाही म्हणावं 

” काका तांदूळ चांगले होते हं तुमच्या कडून घेतलेले. “

सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांपर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, आणि ही दखल घ्यायला आणि द्यायलाही वयाचं बंधन नसावं कधीच.…. काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात, पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो ..! 

बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही …..  तसं करूही नये.  

… कारण पोचपावती जितकी उत्स्फूर्त, तितकीच जास्त खरी !! 

पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर कधी डोळ्यातून, कधी कृतीतून, तर कधी स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं, तशी तशी ती पोचवावी … कधी योग्य आदर ठेवून, कधी गळा मिठी मारून, कधी अगदी ” च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या “, अशी वेगळ्या भाषेतूनही यावी. 

माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उत्स्फूर्त. 

महत्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच..  ह्या मुलांच्या भाषेत cool dude ..  हवा. 

ह्या पोच पावतीने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो…

….. आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी फारसं काही लागत नाही….  लागतं फक्त मोकळं आणि स्वच्छ मन … !!!

तर मग होऊन जाऊ द्यात एखादी झकास, दिलखुलास दाद !!!

लेखिका — अज्ञात 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तपोवनातील बोधिवृक्षाचा कुलवृत्तान्त… श्री प्रदीप गबाले ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

तपोवनातील बोधिवृक्षाचा कुलवृत्तान्त श्री प्रदीप गबाले ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

पाण्याच्या खजिन्याकडून कळंबा गावाकडे जाताना प्रथम कळंबा फिल्टर हाऊसचा थोडासा चढ लागतो. हा चढ चढून पुढे गेलो की, दूरवर उजव्या हाताला असणारा गर्द झाडीचा एक हिरवा ठिपका आपलं लक्ष वेधून घेतो. कळंबा आयटीआयपर्यंत आल्यानंतर मात्र या गर्द ठिपक्याचे रूपांतर भल्या मोठ्या वृक्षाच्या पसाऱ्यात झालेले असते. हा हिरवागार वटवृक्ष ही तपोवन जवळ आल्याची खूण असते.

तपोवन आणि वृक्षारोपण यांचं फार जुनं नातं आहे. विद्यापीठ शाळेला भेट देणाऱ्या नामांकित पाहुण्यांना तपोवनात नेऊन त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून, त्यांची स्मृती जपण्याची आगळी वेगळी परंपरा विद्यापीठाचे एक संस्थापक दीक्षित गुरुजी यांनी सुरू केली. यासाठी तपोवन आश्रमात राहणारे विद्यार्थी आणि स्वतः दीक्षित गुरुजी ४  फूट लांब, ४ फूट रुंद आणि 3 फूट खोलीचा खड्डा स्वतः कष्ट करून खणत असत. त्यामध्ये चांगली माती भरून नंतर वृक्षारोपण केले जाई. तपोवनात आतापर्यंत संत श्री मेहेर बाबा, संत श्री केसकर महाराज, संत तुकडोजी महाराज, डॉ. अरुंडेल, भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. वळे, जपानमधील भारतीय राजदूत मो. ज्ञा. शहाणे, तेंडोलकर वकील, लोहिया शेठजी, प्रभाकरपंत कोरगावकर, रावबहादूर सर रघुनाथराव सबनीस, लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात, चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर, नाना धर्माधिकारी , लेफ्टनंट जनरल नागेश, भारताचे माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई , प्रसिद्ध दिग्दर्शक यशवंत पेठकर, नॉर्वेच्या विदुषी सुमतीबाई, डॉ. रा.शं. किबे, दादा धर्माधिकारी, कु. विमलाताई ठकार, वि.म. परांजपे, नाना गबाळे तसेच अनेक नामवंत लेखकानी वृक्षारोपण केले आहे.  

या सर्व नामवंतामध्ये विद्यापीठ सोसायटीचेे पहिले अध्यक्ष डॉ. जॉर्ज एस. अरुंडेल यांचे नाव महत्त्वाचे आहे. २९ नोव्हेंबर १९२८ रोजी डॉ. जॉर्ज एस्.अरुंडेल हे तपोवनात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी, भारतीय भरतनाट्यम या नृत्यप्रकाराला जागतिक पातळीवर नेणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना, डॉ. रुक्मिणीदेवी अरुंडेल याही होत्या.   डॉक्टर अरुंंडेल हे त्यावेळी होमरूल चळवळीच्या प्रणेत्या डॉ.ॲनी बेझंट यांचे सहायक म्हणून काम करत होते. तपोवन आश्रमाची उभारणी ज्या थिऑसॉफीच्या (विश्वबंधुत्व) तत्त्वावर झाली होती, त्या थिऑसाॅफीचे जागतिक मुख्यालय मद्रास (चेन्नई ) येथील अड्यार या ठिकाणी आहे. या अड्यारच्या केंद्रात असणाऱ्या अतिशय प्राचीन वटवृक्षाचे एक रोपटे डॉ.ॲनी बेझंट यांनी तपोवनात लावण्यासाठी म्हणूून पाठवले.  डॉ. जॉर्ज अरुंडेल हे वटवृक्षाचे रोपटे घेऊन स्वत: तपोवनात आले. दीक्षित गुरुजींनी डॉ. जॉर्ज अरुंडेल यांच्या हस्तेच हे वटवृक्षाचे रोप लावून घेतले. तो शुभ दिवस होता २९ नोव्हेंबर १९२८. ‘ बोधिवृक्ष ‘ असे या वटवृक्षाचे नामकरण करण्यात आले. या बोधिवृक्षाचे रोपटे मद्रासच्या ज्या थिऑसॉफी केंद्रातून तपोवनात आणले गेले त्या केंद्रात तो मूळ वृक्ष आजही आहे. अड्यार नदी मद्रासला ज्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते, त्या ठिकाणी हा भारतातील सर्वात वयोवृद्ध वृक्ष आजही डौलात आणि ताठ मानेने उभा आहे. त्याचे आयुष्यमान सुमारे ४५० वर्षाचे असावे असा तज्ज्ञांचा अंदाज असून, हा वृक्ष केवळ भारतातीलच नव्हे तर कदाचित जगातील सर्वात पुरातन वृक्ष असण्याची शक्यता आहे. या झाडाच्या पारंब्या जेथे जेथे जमिनीवर टेकल्या आहेत तेथे तेथे जणू दुसरा बुंधाच तयार झालेला आहे. असे हजारो बुंधे तयार झाल्यामुळे झाडाचा मूळ बुंधा कोणता हे ओळखता येत नाही. याच्या फांद्यांचा पसारा ६२००० चौरस फुटापर्यंत पसरलेला असून झाडाच्या फांद्या जमिनीपासून चाळीस फूट उंचीवर आहेत. एकेका फांदीचे वजन 30 टनापेक्षा जास्त भरेल असा अंदाज आहे. समुद्रकिनारी बहुतेक नारळ – पोफळीची झाडे वाढतात. पण हा वटवृक्ष त्याला अपवाद आहे.  झाडाचे जतन व्हावे म्हणून या झाडाभोवती एका विस्तीर्ण उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली असून अड्यार नदीकाठच्या या उद्यानाचा पसारा २६० एकर इतका विस्तीर्ण आहे. या उद्यानाचे नाव ‘ हडलस्टोन गार्डन ‘ असे असून या बागेत इतरही शेकडो दुर्मिळ वृक्ष आहेत. वटवृक्षाच्या शीतल छायेतून चालताना आपणास अंतर्मनातील शांततेचा अनुभव येतो. या बागेत दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे .अनेक प्राण्यांचेही वास्तव्य येथे आहे. या ठिकाणी अहिंसा धर्माचं पालन तंतोतंत केलं जातं. अहिंसा म्हणजे केवळ प्राणी, झाडे यांची हत्या न करणे असा नसून, आपल्या एखाद्या शब्दानेही कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेणे. विचाराने, आचाराने आणि उच्चारानेही कोणाचे मन दुखावले जाणार नाही हे पाहणे म्हणजेच विश्वबंधुत्व. विश्वबंधुत्वाचा अर्थ केवळ मानवजातीपुरता मर्यादित नसून हे बंधुत्वाचं नातं मानवाबरोबरच वृक्ष, प्राणी आणि इतर जीवांशीही जोडले जाते. म्हणूनच तेथे वृक्ष किंवा एखादी फांदी तोडण्यासही मनाई आहे. अड्यार येथील अशा पवित्र वटवृक्षाचे रोप जागतिक थिऑसाॅफी फेडरेशनचे माजी अध्यक्ष आणि विद्यापीठ सोसायटीचे पहिले अध्यक्ष डॉ. जॉर्ज एस. अरुंडेल यांनी स्वतः आणून, स्वतःच्या शुभहस्ते तपोवनात लावले आहे. तपोवन हे खऱ्या अर्थाने ‘तपोवन’ आहे याची साक्ष हा बोधिवृक्ष आजही देत आहे. 

आज तपोवनातील बोधिवृक्षाचाही सुमारे अर्धा एकर परिसरात विस्तार झाला आहे. या वृक्षावर सकाळी विविध पक्षांचा किलबिलाट आपल्याला ऐकावयास मिळतो. विशेषत: हिरव्यागार पानांच्या देठांमधून लालचुटुक,  गोलाकार फळांनी हा वटवृक्ष  बहरला की त्याचे सौंदर्य वेगळेच असते. ही लालचुटुक फळं खाण्यासाठी साळुंकी, तांबट पक्षी,  कावळे ,कोकीळ, बुलबुल, मैना, यासारख्या पक्षांची जणू स्पर्धाच लागते. या झाडावर घार आणि कावळे यांची शेकडो घरटी आहेत. आपली मान गर्रकन फिरवणारे शेकडो पिंगळे या वडाच्या ढोलीमध्ये  लपलेले असतात. आता झाडाच्या मोठमोठ्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचल्या असून त्याचे रूपांतर जणू दुसऱ्या बुंध्यामध्ये होऊ लागले आहे. तपोवनाच्या शेजारी असणाऱ्या कलानिकेतनच्या मुलांना हा विशाल वटवृक्ष जणू नेहमी साद घालत असतो. ही कलाकार  मुले या डेरेदार वृक्षाचे पेंटिंग करताना स्वतःला विसरून जाताना दिसतात. तपोवनात असलेल्या शाळेतील विद्यार्थी, तसेच जवळ असणाऱ्या आयटीआय चे विद्यार्थी दुपारच्या वेळी या वटवृक्षाच्या सावलीत निवांतपणे अभ्यास करताना दिसतात. तपोवनाचे संस्थापक पूज्य दीक्षित गुरुजींनी एक सुंदर बाग या वटवृक्षाच्या सभोवती तयार केली होती, परंतु काळाच्या ओघात ती बाग आता नाहीशी झाली आहे. पण गुरुजींनी या वृक्षाभोवती बांधलेला मोठमोठ्या घडीव दगडांचा पार अजूनही सुस्थितीत आहे. वटवृक्षाचा पसारा आता खूप लांबूनही पाहायला मिळतो. सेेवा, स्वाध्याय, स्वावलंबन आणि साधी राहणी या तपोवन आश्रमाच्या चतु:सूत्री  बरोबरच अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचे संस्कार दीक्षित गुरुजींनी, या बोधिवृक्षाच्या साक्षीने  तपोवनातील आश्रमीय विद्यार्थ्यांवर केले .सध्या 93 वर्षाचे आयुष्यमान असणारा तपोवनातील हा बोधिवृक्ष लवकरच शतायुषी होईल.

लेखक – श्री प्रदीप गबाले (तपोवनवासी)

निवृत्त मुख्याध्यापक, विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.

9766747884

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दोन हिरे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

☆ दोन हिरे… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एका व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता. आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली. व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने उंट विकत घेऊन घरी नेला !

घरी पोहोचल्यावर व्यापाऱ्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले..!  काजव्याच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली, ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरे व रत्नांनी परिपूर्ण आहेत  ..! सेवक ओरडला, ” मालक , तुम्ही  एक उंट विकत घेतला, परंतु त्या बरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा !”

व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखीच चमकत होते.

व्यापारी म्हणाले:  “मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे !” 

नोकर मनात विचार करत होता, ” माझा मालक किती मूर्ख आहे….!”

तो म्हणाला:  ” मालक यात काय आहे हे कुणालाही कळणार नाही !”  तथापि, व्यापाऱ्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली. 

उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, ” मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान हिरे मी काजव्याखाली लपवले होते.  आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा!” 

व्यापारी म्हणाला,  ” मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे, म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही !”  जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता….!

शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला: “ खरं तर मी थैली परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते. “ या कबुलीजबाबानंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने थैली रिकामी केली आणि त्यातील हिरे मोजले !

—  पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जसेच्या तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही, तेव्हा तो म्हणाला, “ हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान हिरे कोणते ? “

 व्यापारी म्हणाला…. ” माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान….!”

 विक्रेता मूक होता !

—  ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, ‘ स्वाभिमान अन् प्रामाणिकपणा ‘, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे….!

आपले हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते

आणि….

जेव्हा आपले हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते !!*……

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सोनेरी किरणे धरतीवर – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?सोनेरी किरणे धरतीवर? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

रविराज अस्ताला जाता

धरतीवर तम हळुहळू येतो

 पांधरूनी काळी शाल जगी

कुशीतली उब सकलांना देतो

निद्रीस्त  होती, विश्रांती घेती

श्रमणारे जीव आपोआप

काही ठिकाणी अंधारातच

चोरटेपणाने फिरते पाप

 पूर्वदिशेला दिनकर येता

 तमस हळू निघूनी जातो

 सोनेरी किरणे धरतीवर

 कणकण उजळीत रहातो

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #175 – 61 – “लोगों को जोड़ सके वो मेहरबान चाहिए…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “लोगों को जोड़ सके वो मेहरबान चाहिए…”)

? ग़ज़ल # 61 – “लोगों को जोड़ सके वो मेहरबान चाहिए…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

मुझे न कट्टर हिंदू न मुसलमान चाहिए,

उदार हिंदू और उदार मुसलमान चाहिए।

नफ़रत भरे दिलों में खिलता कँटीला खार,

मुझे प्यार भरे गुलों का गुलिस्तान चाहिए।

उतार कर फेंको धर्मों का अहंकारी नक़ाब,

मुझे सभ्य समानता का संविधान चाहिए।

जो हो चुका वो बदलने वाला नहीं अब,

नहीं काल्पनिक अखंड हिंदुस्तान चाहिए।

आपस में लड़े तो मारे जाएँगे हम सभी,

लोगों को जोड़ सके वो मेहरबान चाहिए।

नफ़रती पौधों की नर्सरी में खिलते काँटे,

काँटों में फूल उगा दे वो क़द्रदान चाहिए।

न हों आबाद खार ओ खस की महफ़िलें,

दिलों में गीत ग़ज़ल का अरमान चाहिए।

अंगड़ाई लें राम रहीम के दोआबी तराने,

ख़ंजर जिसे प्यारे नहीं वो शैतान चाहिए।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ “काँच के घर” (उपन्यास)– डॉ हंसा दीप ☆ चर्चाकार – श्री मुकेश दुबे ☆

श्री मुकेश दुबे

☆ पुस्तक चर्चा  ☆ “काँच के घर” (उपन्यास)– डॉ हंसा दीप ☆ चर्चाकार – श्री मुकेश दुबे ☆

पुस्तक  : काँच के घर (उपन्यास)

लेखिका : डॉ हंसा दीप

प्रकाशक : भारतीय ज्ञानपीठ, नई दिल्ली

मूल्य : 260/

☆ साहित्यिक बदसूरती का खूबसूरत दस्तावेज है यह उपन्यास” – मुकेश दुबे ☆

जीव विज्ञान और आयुर्विज्ञान की एक शाखा है ‘शारीरिकी’ या ‘शरीररचना-विज्ञान’ जिसे अंग्रेजी में Anatomy कहा जाता है । इस विज्ञान के अंतर्गत किसी जीवित (चल या अचल) वस्तु का विच्छेदन कर, उसके अंग प्रत्यंग की रचना का अध्ययन किया जाता है। हंसा दीप ने अपने सद्य प्रकाशित उपन्यास काँच के घर में हिन्दी साहित्य की बजबजाती और सड़ांध मारती देह का सूक्ष्मता से विच्छेदन किया है। यह उनकी लेखनी का कौशल है कि वर्तमान साहित्यिक कुरूपता भी लच्छेदार तंज और भाषायी सौंदर्य से संवर कर मनभावन हो उठी है। लेखिका रह भले ही विदेशी धरती पर रही हैं किन्तु इनकी लेखनी आज भी स्वदेशी सरोकारों को केन्द्र में रखकर सृजन कर रही है।

समकालीन साहित्यिक परिदृश्य में लेखन से महत्वपूर्ण है लेखक का कद और वो बढ़ता है पुरस्कार से, सम्मान से। इस धारणा को कुछ लोग व संस्थाओं ने अपनी कर्मभूमि बनाकर नवीन व्यवसाय बना लिया है। मुद्दा यह नहीं क्या लिखा है, महत्वपूर्ण है किसने लिखा है… लिखे गए को कितने पुरस्कार मिले हैं और उनमें अन्तरराष्ट्रीय स्तर के कितने हैं। जाहिर है कि इस ट्रेंड में साहित्य दोयम दर्जे का और सम्मान मुख्य हो गया है। एक जगह हंसा दीप जी लिखती हैं इसी किताब में “सम्मान के लिए साहित्य की क्या जरूरत है”, सटीक व धारदार व्यंग्य है आज की भाषाई सेवा व सृजनशीलता पर। सम्मान की जुगाड़ और बंदरबांट में लगे तथाकथित बुद्धिजीवियों व साहित्यकारों और उनकी इस कमजोरी को पोषित कर फायदा उठाने वाली संस्थाओं के क्रियाकलापों को जमीन बनाकर लिखा गया यह उपन्यास सत्य के इतना करीब लगता है कि इसके मुख्य पात्र मोहिनी देववंशी व नंदन पुरी अपने आसपास के अनगिनत साहित्यकारों में नज़र आने लगते हैं। दरअसल ये फकत नाम नहीं हैं, ये जाति विशेष के प्रतिनिधि चेहरे हैं, स्वयंभू हिमालय हैं। ये अपने आप को आसमान में दमकता सितारा समझते हैं भले ही अपनी झूठी शान की आँच में इनका रोम-रोम झुलसता रहे लेकिन प्रतिद्वंदिता की पाशविक प्रवृत्ति इन्हें इंसान रहने ही नहीं देती और ये स्वयं को शीर्ष का साहित्यकार मानते हैं। साहित्य इनके लिए शतरंज की बिसात से अधिक कुछ नहीं है। शह और मात की लत में ये इतना नीचे गिर गये हैं कि मानवता भी शर्मसार है इन पर बस इनको शर्म नहीं आती है।

डॉ. हंसा दीप

स्वनामधन्य इन साहित्यकारों की कुकुरमुत्ते सी उगी साहित्यिक संस्थाएँ हिन्दी भाषा की सेवा की ओट में तरह-तरह का शिकार कर रही हैं। लेखिका के अनुसार “बहुत कुछ बदला था। सब अपनी सुविधाओं के अनुसार चीजें बदल रहे थे। लोग सिर्फ़ समूहों में ही नहीं बँटे थे, उनके दिल भी बँट गये थे।” कितना सही आकलन किया गया है लेखिका द्वारा। दिल बँट गये हैं और आत्मा शायद मृतप्राय है। वैचारिक मतभेद अब मनभेद बन गये हैं जिन्हें समयकाल व परिस्थितियों के अनुकूल कर सही साबित करने के लिए बाकायदा किलाबंदी कर सुनियोजित चालें चली जाती हैं। इन शतरंजी नबावों के वजीर, हाथी-घोड़े व पैदल भी होते हैं जो अपनी कूवत अनुसार खाने बदलते रहते हैं और कभी-कभी तो बड़ी शय पर छोटे मोहरे भी बाजी पलट देते हैं। कथानक में एक दृश्य खासा प्रभावित करता है। मोहिनी देववंशी की बेटी का विवाह और विवाह की मजबूरी पढ़ते हुए सामान्य भले लगे परन्तु हंसा जी ने इस ढेले से कई चिड़िया मार गिराई हैं। यही वो भाषाई अभिभावक बन रहे हैं जिनसे अपनी संतान का पालन ठीक से नहीं हो सका और चले हैं हिन्दी का पोषण करने। ऐसे अनेक दृश्य व उदाहरण हैं कथानक में जो गहरा प्रभाव छोड़ते हैं मन-मस्तिष्क पर।

लोकोक्तियों व मुहावरों के प्रयोग से भाषाई पंच और अधिक पैना हो गया है। संवाद जब समाप्त होता है, होठों की कमान पर व्यंग्य का तीर कस जाता है और लक्ष्य भेदन के साथ बरबस ही मुस्कान बिखर जाती है। शायद ही कोई पहलू शेष रहा हो हंसा जी की दृष्टि से। लेखन, सम्पादन, प्रकाशन व प्रचार-प्रसार पर भी गहरे प्रहार किए हैं आपने। विदेशी मुद्रा के बदले लिए जाने वाले फायदों को भी समाहित कर लिया है। ‘लिटरेरी फेस्टिवल’ की असलियत भी जान जायेगा पाठक और हो सकता है शीघ्र ही ऐसे किसी किसी आयोजन की भूमिका बनाने लगे। छद्म वाहवाही और सम्मान के आढ़तियों को भी नहीं बख्शा है हंसा जी ने। अंत में बड़े सम्मान की आस में भारत आए प्रवासी साहित्यकारों को खाली हाथ लौटाकर यह संदेश भी दिया है कि अभी सब कुछ समाप्त नहीं हुआ है। रचना ही मूल है रचयिता की पहचान का, सप्रयास बढ़ाया कद ढलते सूरज की धूप है जो परछाईं को बड़ा तो कर सकती है लेकिन स्थाई नहीं बना सकती। क्षणिक सुख केवल मरीचिका है।

लेखिका – डॉ. हंसा दीप

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada  Phone – 001 647 213 1817 Email – hansadeep8@gmail.com

समीक्षक – मुकेश दुबे

संपर्क – विजय विला, 107, डी.डी. एस्टेट, कॉलोनी सीहोर (म.प्र.) 466001 मोबाइल – 9826243631 ईमेल –  dubeymukesh63@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – सार्थक ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

हम श्रावणपूर्व 15 दिवस की महादेव साधना करेंगे। महादेव साधना आज शनिवार दि. 4 फरवरी से महाशिवरात्रि तदनुसार 18 फरवरी तक सम्पन्न होगी।

💥 इस साधना में ॐ नमः शिवाय का मालाजप होगा, साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ भी करेंगे 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – सार्थक ??

सारे रास्ते बंद होने का अर्थ

सब कुछ समाप्त होने की

आशंका नहीं होता,

कहीं से भी बेधकर अवरोध,

नये रास्ते बनाने की

अपार संभावना होता है…!

रात 11:03 बजे, 3 फरवरी 2023

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 53 ☆ मुक्तक ।। बहुत कुछ करके जाना है बस चार दिन की कहानी जिंदगानी में ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण मुक्तक ।।बहुत कुछ करके जाना है बस चार दिन की कहानी जिंदगानी में।।)

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 53 ☆

☆ मुक्तक  ☆ ।।बहुत कुछ करके जाना है बस चार दिन की कहानी जिंदगानी में।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

सपनों का टूटना और बनना ही तो जिंदगानी है।

ख्वाबों का बिखरना संवरना ही तो निशानी है।।

हमारे अंतरद्वंद आत्मविश्वास की परीक्षा है यह।

प्रभु की कितनी  ही  बेमिसाल कारस्तानी है।।

[2]

जिंदगी चार दिन की बस जैसे आनी जानी है।

मतकरो काम हो जिससे किसी को परेशानी है।।

जिंदगी आजमाती है हर तरह के इम्तिहान से।

यूं ही नहीं बनती दुनिया किसी की दीवानी है।।

[3]

समय की धारा में यह  उम्र यूं बह जाती है।

करते अच्छा काम तो  यादगार कहलाती है।।

हाथ की लकीरों नहीं अपने हाथ इसे बनाना।

यूं ही चले गए तो इक कसक सी रह जाती है।।

[4]

जाना तो है एक दिन पर निशान छोड़कर जाना।

हरेक पासअपने दिल का मेहमान छोड़कर जाना।।

बना कर जाना एक कोना हर दिल दिमाग में।

कुछ और नहीं अपनी पहचान छोड़कर जाना।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 117 ☆ ग़ज़ल – “यहाँ जो आज हैं नाजिर…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक ग़ज़ल – “यहाँ जो आज हैं नाजिर…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ काव्य धारा #118 ☆  ग़ज़ल  – “यहाँ जो आज हैं नाजिर…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

खुशी मिलती हमेशा सबको, खुद के ही सहारों में।

परेशानी हुआ करती सभी को इन्तजारों में।।

 

किसी के भी सहारे का, कभी भी कोई भरोसा क्या,

न रह पाये यहाँ वे भी जो थे परवरदिगारों में।।

 

यहाँ जो आज हैं नाजिर न रह पाएंगे कल हाजिर

बदलती रहती है दुनियां नये दिन नये नजारों में।।

 

किसी के कल के बारे में कहा कुछ जा नहीं सकता

बहुत  बदलाव आते हैं समय के संग विचारों में।।

 

किसी के दिल की बातों को कोई कब जान पाया है?

किया करती हैं बातें जब निगाहें तक इशारों में।।

 

बड़ा मुश्किल है कुछ भी भाँप पाना थाह इस दिल की

सचाई को छुपायें रखता है जो अंधकारों में।।

 

हजारों बार धोखे उनसे भी मिलते जो अपने हैं

समझता आया दिल जिनको कि अपने जाँनिसारों में।।

 

भला इससे यही है अपने खुद पै भरोसा करना

बनिस्बत बेवजह होना खड़े खुद बेकरारों में।।

 

जो अपनी दम पै खुद उठ के बड़े होते हैं दुनिया में

उन्हीं को मान मिलता है चुनिन्दा कुछ सितारों में।।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

vivek1959@yahoo.co.in

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares