हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #163 ☆ भावना के दोहे – मीरा ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत है  “भावना के दोहे – मीरा ।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 163 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे – मीरा ☆

धुन मुरली की बज रही, दिल में बजते साज।

मैं मीरा घनश्याम की, झूम रही है आज।।

नाच रही हूं मगन मैं, उर में है बस श्याम।

बजती है बस श्याम धुन, छाए है घन श्याम।।

मैं मोहन की माधुरी, मुरली की  मैं जान।

रोम रोम में बस रहे, मनमोहन में प्रान।।

जादू है घन श्याम का, चहुं ओर है उमंग।

मीरा रहती श्याममय, मन में उठी तरंग।।

कैसे तुझसे क्या कहूँ, हूँ तुझमें मैं लीन।

मैं मीरा राधा नहीं, मैं हूँ श्याम विलीन

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #150 ☆ एक पूर्णिका – “हमने देखे हैं अश्क़ तेरी आँखों में…” ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  एक पूर्णिका – “हमने देखे हैं अश्क़ तेरी  आँखों में…। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 150 ☆

☆ एक पूर्णिका – हमने देखे हैं अश्क़ तेरी  आँखों में… ☆ श्री संतोष नेमा ☆

बोल कर झूठ आँख चुराता क्यों है

मुझसे खफा है तो छुपाता क्यों है

वक्त के  साथ लोग  बदल जाते हैं

ये  जानते हैं मगर  बताता  क्यों है

रोशनी  जिससे  हो रही है  दिल में

चिराग वफ़ा का यूँ बुझाता क्यों  है

अगर डर है तुझको  इस जमाने से

तो दिल हमसे फिर लगाता  क्यों है

हमने देखे हैं  अश्क़ तेरी  आँखों में

छुपा के  गम तू  मुस्कराता  क्यों  है

पास रहके न पहचान सके जिसको

देख कर दूर से हाथ हिलाता क्यों है

जो करते  हैं  नाटक खुद  सोने  का

उनको  “संतोष”  तू  जगाता क्यों  है

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ती परत आली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

💃 ती परत आली ! 🙆‍♀🖊️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

आली गुलाबी थंडीला

पुन्हा एकदा लहर,

सुरू केला बघा तिने

परत तिचा तो कहर !

 

बाहेर काढा परत

स्वेटर आणि शाली,

ऊब घ्या तयांची

मऊ मऊ मखमली !

 

आता घसरले आहे

इतके काही टेंपरेचर, 

करून टाकले तिने

मुंबईचे महाबळेश्वर !

 

पेटतील गावोगावी

रोज रोज शेकोट्या,

जमून सारे करतील

आनंदाने “पोपट्या” !

 

बेभरोशी हवामानाची

पाहून अशी गती,

कुंठली आहे सध्या

मानवाची “मंद” मती !

 

पण

आपणच बघा मोडले

पर्यावरणाचे कंबरडे, 

आता रोज रोज मरे

त्याला कोण बरं रडे ?

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #156 ☆ संस्कार सावली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 156 – विजय साहित्य ?

☆ संस्कार सावली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(4 जानेवारी – कै सिंधुताई सापकाल स्मृतीदिवस दिना निमित्त)

अनाथांची माय

करुणा सागर

आहे भोवताली

स्मृतींचा वावर…!

 

ममतेची माय

आदर्शाची वाट

सुख दुःख तिच्या

जीवनाचा घाट..!

 

परखड बोली

मायेची पाखर

आधाराचा हात

देतसे भाकर…!

 

जगूनीया दावी

एक एक क्षण

संकटाला मात

झिजविले तन…!

 

पोरकी जाहली

माय ही लेखणी

आठवात जागी

मूर्त तू देखणी…!

 

दु:ख पचवीत

झालीस तू माय

संस्कार सावली

शब्द दुजा नाय..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शेकोटी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ शेकोटी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

वातावरणाच्या हेराफेरीत हल्ली कधीपण पाऊस पडतो.सध्या हवेत इतकी उष्णता आहे की हा थंडीचा महिना आहे का ?असा प्रश्न निर्माण झालाय.हाही ग्लोबल वॉर्मिंगचा प्रसाद.या श्रुष्टीचे काय होणार ? ते श्रुष्टी निर्मात्यालाच माहीत!

सहजच मला आमच्या लहानपणीचे थंडीचे दिवस आठवले.ऑक्टोबरपासूनच थंडीची चाहूल लागायची.दिवाळीत कडाक्याची थंडी पडायची.सर्वत्र दाट धुके पडायला सुरुवात व्हायची.शेत शिवार धुक्यात नहायचे.झाडांच्या पानावरून दवाचे थेंब टपकायचे.हातापायाला  भेगा पडायच्या.ओठ फुटून रक्त यायचे,गालाची त्वचा फुटून खरबरीत काळे मिट्ट दिसायचे गाल.कोल्ड क्रीम वगैरे तसले काही प्रकार नसायचे,डोक्याला तेल लावताना तोच तेलाचा हात चेहऱ्यावर,हातावर,पायावर दररोज फिरवायचा.जाड जाड वाकळा अंगावर घेतल्या तरी झोपेत थोडीशी जरी हालचाल झाली की थंडी पांघरुणात शिरायची म्हणून उठल्या उठल्या पहिल्यांदा चुलीपुढं जाऊन बसायचं.

दिवाळीच्या अंघोळीला तर पहाटे उठूच वाटायचे नाही.तेल लावून कडक पाण्याचा तांब्या अंगावर ओतेपर्यंत अंग काकडून जायचे.अंघोळ केली की चुलीपुढं ऊबीला बसायचं थोडं फटफटायला लागलं की मग फटाके उडवायला  अंगणात जायचं.

शेतकरी पीक राखणीला शेतात जायचे.जागोजागी मग शेकोट्या पेटायच्या.अंगणात,रस्त्याच्या कडेला,शेतात आसपासचे चार पाच शेतकरी मिळून शेकोट्या करायचे आणि गप्पा मारत शेकोटीभोवती बसायचे.शेतात चगळाची कमी नसायची त्यामुळं शेकोटीच्या ज्वाला कमरेइतक्या ,डोक्याइतक्या उंच उंच जायच्या.रात्रभर असे आळीपाळीने जागून पहाटे पहाटे झोप घ्यायची,दिवस उगवला की घरला यायचे.

आम्हीही वाकळेतून उठून पहिले चुलीपुढं बसायला जागा धरायचो.चुलीपुढं गर्दी होऊ लागली की तिथून उठून अंगणात येऊन शेकोटी पेटवायचो.पूर्वी प्रत्येकाच्या परसात उकिरडा असायचा,त्यामुळं चगळाची कमतरता नसायची पण जो पण शेकोटीला येईल त्याने स्वतःचा चगाळ आणायचाच नाहीतर शेकोटीपासून हकलपट्टी व्हायची त्यामुळं नियम पाळलाच जायचा.चगाळ,पालापाचोळा ,चिपाड एखादं शेणकूट बारकी वाळलेली झुडुपे आमच्या शेकोटीला काही चालायचे.शेकोटी जसजशी रसरसायची तसा गप्पांचा फड रंगायचा.कधी कविता कधी पाढे ,नकला तर कधी सिनेमातली गाणी! प्रत्येकाची काहीतरी विशेषता असायचीच. बरेचदा गाण्यापेक्षा विडंबनच जास्त असायचे.

त्या त्या वेळच्या फेमस गाण्यात आपलं कायतर घुसडून जोडायच न त्याचं विडंबन करायचं.

मेहबुबा मेहबुबा  या गाण्यावर त्यावेळी वात्रट पोरांनी केलेलं खट्याळ विडम्बन असायचं-

मेहबुबा मेहबुबा

छ्ड्डीत शिरला नागोबा..आणि अशीच गाण्यांची, कवितांची विडंबन…

हातापायाला ऊब मिळेपर्यंत पाठ गार पडायची. मग शेकोटीकडे पाठ करून बसायचे.बऱ्याचदा तोंडाने फुंकर मारून जाळ पेटवताना एकदम ज्वाला भडकायची आणि पुढील केसांना हाय लागून तिथले केस प्लास्टिक जळल्यासारखे गोळा व्हायचे.दाताला तिथंच बसून राखुंडी लावायची ,ऊबीपासून दूर जावेच वाटायचं नाही .पाठीवर उन्ह येईपर्यंत शेकोटीची ऊब अंगावर घेत राहायचो.कधी शेंगा तर कधी हरभऱ्याचे ओले किंवा सुकलेले डहाळे विझत आलेल्या शेकोटीच्या आरात टाकायचे आणि भाजल्यावर राखेतून शोधून खायचो,ओठ,बोटे,गाल काळेमिट्ट व्हायचे पण ते आम्हाला महत्वाचे नव्हते, भाजलेला हावळा खाण्याचा आनंद अभाळाएव्हढा मोठ्ठा होता.

लहान मुलांच्या शेकोटीला मोठी माणसे कधी येत नसत,चुकून आलेच कुणीतरी आम्हाला खूप आनंद व्हायचा.किती मजेशीर आणि आनंदी होते जीवन! कुठली घाई नाही की जीवघेणी स्पर्धा नाही की कोणता ताण नाही! उन्ह चढू लागतील तसतशी एक एक मेंबर शेकोटीपासून काढता पाय घ्यायचे.कुणाला मधूनच हाक आल्यावर घरी जावे लागायचे.शेवटी जो थांबेल त्याने गरम राखेवर पाणी ओतायचे अन्यथा आसपासचा उकिरडा किंवा गंजी पेटण्याचा धोका असायचा म्हणून शेवटच्या सदस्याने पाणी ओतायचे किंवा माती टाकायची.

घरातले मोठे शेताभातात जायचे,म्हातारे कोतारे घर राखायला अन आम्ही शाळेला.शेकोटीची राख मात्र आम्ही पुन्हा यायची वाट पहात तिथेच बसायची.

आजही आम्ही तिथेच शेकोटीपुढं आहोत आणि शेकोटीच्या उबेत आहोत असे वाटतेय. काय नव्हतं त्या ऊबीत?सवंगड्यांचे अतूट स्नेहबंध,आसपासच्या शेजाऱ्यांची आपुलकी,मोठ्यांचा धाक,मुक्त ,निष्पाप ,समृद्ध बाल्य,अवतीभवतीचा संपन्न निसर्ग आणि बरेच काही जे काळाबरोबर वाहून गेलं.आमच्या मोकळ्या वेळेवर फक्त आमचाच अधिकार होता.

आज निसर्गचक्र बिघडलेय माणसाच्या चुकीमुळेच.शेकोटीच्या उबीची मजा अनुभवयाला ना हवामान तसे राहिले न माणसे!दिवस उगवायच्या आधीच मुलांना गरम पाण्यात बुचकळून स्कूल बसमध्ये बसावे लागते आणि बसच्या चाकाच्या गतीतच बाल्य सम्पते.कुठे असतो वेळ स्वतःच्या मनाप्रमाणे घालवायला किंवा निसर्गातील गमतीजमती अनुभवयाला?आणि ते न अनुभवल्यामुळेच निसर्गाची ओढ अन प्रेमही उत्पन्न होत नाहीय.

भिंतीतल्या शाळेसाठी भिंतीबाहेरची शाळा भिंतीबाहेरच रहाते.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घरात राहणारी बाई – भाग 2 (भावानुवाद) – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ घरात राहणारी बाई – भाग २ – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

मागील भागात  आपण पाहीलं – महानगरात पस्तीस वर्ष रहाणार्‍या बाईला किती वेळा सांगायचं , ‘बाई ग, बाहेर जाताना बाकी सगळं विसरलं तरी चालेल, पण मोबाईल न्यायचा विसरू नको. पण हिची पर्स कुठे आहे? पर्स…. पर्स दिसत नाही आहे. अरे, लॅच कीची दुसरी चावी पण इथेच पडलीय. आणि हा कसला कागद? टी.व्ही.वर पडलाय. उं…उं… पत्र दिसतय … बघू या, काय लिहिलय… आता इथून पुढे 

‘अनुरोध … नाही… श्रीमान अनुरोधजी,

मी जात आहे. आपल्याला काही संधी मिळावी आणि आपण मला बाहेर काढावं, त्यापूर्वी मी स्वत:च निघून जातेय. बस… इतक्याच दिवसाची माझी आणि आपला साथ होती.आता आणखीन मी आपल्या सोबत राहू शकत नाही. क्षणभरसुद्धा नाही.

मी कुठे गेलीय, जाणून घेऊ इच्छिता? घ्या. मीच सांगते. आईकडे जातेय मी. चिता करू नका. अंधेरी ते पनवेल मी जाऊ शकते. आईकडे अशासाठी की ती जागा सुरक्षित आहे. आपण तिथे येणार नाही. माझ्या बाबांचं ( आपले सासरे होते पण आपण नेहमीच त्यांच्याशी शत्रू असल्यासारखे वागलात. ) निधन झालं, तेव्हा वाटत होतं, कदाचित याल आपण पण आपण घरी नाही, थेट स्मशानभूमीत आलात. तिथे येऊन आपण आपला मूल्यवान वेळ का खर्च केलात कुणास ठाऊक? बिझनेस सुरू करण्यासाठी सासरे पाच लाख रुपये देऊ शकले, नाहीत, तर त्यांच्या इंजिनिअर जावयाने त्यांच्या दाह संस्काराला कशाला जावं?डिलिव्हरीसाठी मी माहेरी गेले होते.बंटीला घेऊन परत आले, तेव्हापासून आपण माझा माहेराशी असलेला संबंध नेहमीसाठी तोडून टाकलात. एक-दोनदा बाबा इथे आले होते, या फ्लॅटवर  पण आपण त्यांच्याशी असे वागलात, जसा कुणी एलियन घरात शिरलाय.

आज बंटी तीस वर्षाचा आहे. कुठे आहे बंटी? माझा मुलगा…

मला अजूनही बेड रूममधून आवाज येतो. ‘बाबा दरवाजा उघडा ना!’

‘बाबा, मी अर्ध्या तासासाठी बाहेर येऊ इच्छितो. प्लीज… मला गुदमारायला होतय इथे.’   ‘पंखा वाढव. अशाने इंजिनीअर कसा बनशील? टॉप करायचाय तुला. मी जे करू शकलो नाही, ते तुला करून दाखवायचय. आपल्या नातेवाईकात कुणीच केलं नाही. असं काही तरी तुला करून दाखवायचय.’

करून दाखवलं त्याने. बोर्डात अव्वल नंबरने पास झाला. पिळाणीतून इंजिनीअर केलं. पण आपण त्याला एका क्षणासाठीसुद्धा मोकळा श्वास घेऊ दिला नाहीत. परिणाम काय झाला? ‘

कुठे गेला बंटी?’

‘मला माहीत नाही.’

‘अशी नाही सांगणार तू!’

‘…..’

‘बोल. कधीपासून तिथे जात होता?आता काय सांगून गेलाय? असं कसं जाऊ दिलास तू त्याला?त्याच्या शिक्षणावर माझे किती तरी लाख खर्च झाले. माझी सगळी स्वप्नं चूर चूर झाली.

आपले पैसे… आपली स्वप्ने… मला पहिल्यापासून माहीत होतं, तो इस्कॉन मध्ये जाऊन तासण तास बसतो. तिथे त्याला शांती, समाधान मिळतं. त्याने आपल्यासाठी चिठ्ठी ठेवली होती ना?

‘बाबा मी जातोय. आत्तापर्यंत आपण जे सांगितलंत ते मी ऐकलं. इच्छेने, अनिच्छेने. आपण आता काही सांगू नका. कारण आता मी आपलं ऐकणार नाही. मी माझा रास्ता शोधलाय. आपण त्याला मारमारून ‘हिरा’ बनवू इच्छित होता.  आपल्याला मारणच तेवढं येतं॰ तासणं, कोरणं नाही. मी माझा मुलगा गमावला. पण बंटी वाचला. आपल्या पकडीतून सुटून स्वामी श्रीपाद बनला. कुणा नशेड्याची आई बनण्यापासून देवाच्या दयेने मी वाचले.

लकने आपल्या जीवनाचा जोडीदार स्वत:च निवडला. काय करणार? आपल्याकडे वेळ कुठे होता तिच्यासाठी? अमेयला घेऊन आपला आशीर्वाद मागण्यासाठी आली होती नं? आपण तिला आपल्या नजरेपासून दूर व्हायला सांगितलंत. काय कमी आहे अमेयत? एका बॅंकेत अधिकारी आहे. जात वेगळी आहे. एवढाच. पण इतकंच नाही.. यापेक्षाही काही जास्त आहे. आणिते आहे आपला अहंकार. आपल्या परवानगीशिवाय, या घरात दुसर्‍या कुणाला श्वास घेण्याची परवानगी नाही. सीझर झाल्यानंतर पुलक सिरीयस झाली होती. त्यासाठी अमेयचा फोन आला होता. माझं रक्त मॅच होत होतं, म्हणून दिलं. धावपळ करत आपण येण्यापूर्वी घरी आले. सगळी परिस्थिती मी आपल्याला सांगितली. पण काय म्हणालात आपण?

‘मरू द्यायचं होतं तिला. आता ती काही माझी मुलगी नाही. ती माझी कोणीच लागत नाही.’  

‘पण माझी मुलगी आहे. मुलाला गमावलं. कमीत कमी मुलगी तरी हिसकावून घेऊ नका. ‘

उत्तरादाखल कमरेचा बेल्ट साप बनून मला डसू लागला. पाठीवर, कमरेवर उमटलेल्या खुणा हळू हळू  अस्पष्ट होऊ लागल्या. पण काळजाला झालेली जखम दिवसेंदिवस खोल खोल चरतच गेली.

पुलकने पुनीतचा पाचवा वाढदिवस साजरा केला. किती आग्रहाने बोलावलं होतं त्यांनी आपल्याला. कुठल्या आजीला वाटणार नाही की एका शहरात असलेल्या आपल्या नातीला भेटावं? तेदेखील पाच वर्षांनंतर? पण आपण ‘जायचं नाही’ म्हणालात आणि मी गेले नाही. …. अमेयचा अ‍ॅक्सिडेंट झाला होता. हॉस्पितलमधून फोन आला होता. आपण ‘जायचं नाही’ म्हणालात आणि मी गेले नाही.माझी आई  ब्याऐशी वर्षाची आहे.एकटी रहाते. जायचं तर दूरच आपण तिच्याशी फोनवर बोलण्यालासुद्धा नकार दिलात. भाऊ याच शहरात राहतो. त्याच्या मुलाचं बारसं, घराची वास्तुशांत… अनेक कार्यक्रम झाले त्याच्याकडे. त्याने प्रत्येक वेळी बोलावलं. आपण नाही म्हणालात, त्यामुळे गेल्या बाबीस वर्षात मी त्याच्या घरी गेले नाही. त्याबद्दलही फारसं काही नाही. पण परवा आपण जे केलंत, ते अगदी असह्य झालं मला.

भावाच्या मुलाचा विवाह होता. मी आपल्याला सांगितलं, ‘त्याच्या घरातलं हे शेवटचं कार्य आहे.सगळे लोक, नातेवाईक येतील. किती तरी वर्षांनंतर माझी सर्वांशी भेट होईल. संध्याकाळी परत येईन.’

आपण म्हणालात, ‘’खबरदार जर घराच्या बाहेर पडशील तर’

‘फक्त यावेळेला जाऊ दे. एकदा डोळ्यांनी सगळ्यांना बघीन. मग पुढे आयुष्यात कधीही…’

‘गेलीस, तर परत येऊ नकोस. या फ्लॅटचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचा बंद झालाय, असा समज. मी तीन दिवसांनी चायनाहून परत येईन. गेलीस, तर लॅच बंद करून चावी आत टाकून जा. चावी मिळाली नाही, तर मी तुझ्याविरुद्ध चोरीचा रिपोर्ट करीन.’[

माझी तडफड झाली. अश्रूंची जशी झडी लागली. आणि आपण रात्री घरी उशिरा परत आलात. का? मला ‘चेक’ करण्यासाठी. माझी उत्कट इच्छा पाहून आपल्याला वाटलं होतं की आपण किती का नाही म्हणा ना, मी लग्नाला जरूर जाईन. आपण चायनाला जाणार असल्याचा मी जरूर फायदा उठवीन आणि आपण माझी चोरी पकडाल. जर मी तसं केलं असतं, तर आपण काय केलं असतंत? मला घराबाहेर काढलं असतंत, हेच नं? पस्तीस वर्षांचा माझा संसार वाचवण्यासाठी मी माझ्या काळजाच्या तुकड्यांची, माझ्या मुलांचीसुद्धा पर्वा केली नाही. त्याचं हे फळ मिळालं मला. अनुरोधजी, चोरी मी पकडलीय आपली. आपल्याला त्या दिवशी चायनाला जायचच नव्हतं. त्या दिवशी आपला कुठेही बाहेर जायचा कार्यक्रम नव्हता. मला छ्ळण्यासाठी आपण हा खोटा बहाणा केला होतात. दिवसभर इथेच आपली मीटिंग होती. आपल्या ऑफीसमधून आलेल्या एका फोनमुळे माझ्या सगळं लक्षात आलं. आपला विश्वास मिळवण्यासाठी आता डावावर लावायला माझ्याकडे काहीही नाही. एवढं मात्र जरूर सांगेन की जो स्वत:वरचाच विश्वास गमावून बसलाय, तो दुसर्‍यावर विश्वास कधीच ठेवत नाही.

आपल्या शब्दात- मी म्हणजे घरात रहाणारी एक नालायक, निरुपयोगी बाई

– o –

अनुरोधने पत्र वाचून ते सेंटर टेबलवर असं भिरकावलं, जसं काही पेपरबरोबर आलेला कागदाचा फालतु तुकडा आहे. आता ते ड्रॉइंगरूमची खिडकी उघडून बाहेर बघू लागले. बाहेर रस्त्यावरून अनेक वाहने वेगाने धावत होती. अनुरोधला वाटलं, त्याची कार या धावणार्‍या वाहनात पुढे आहे. सर्व वाहनात त्यांची कार सगळ्यात पुढे आहे. एवढ्यात त्यांची कार अचानक थांबली. कुणी तरी हवाच काढून घेतली, त्यांच्या कारच्या चारही चाकांमधली. क्षणभरासाठी रस्त्यात चक्का जाम झाला. पण दुसर्‍याच क्षणी त्यांच्या कारच्या बाजूने रास्ता काढत सगळ्या वाहनांनी आपापला वेग घेतला.

– समाप्त

मूळ हिंदी  कथा – ‘घर में रहनेवाली औरत’  मूळ लेखक – श्री भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १३ (आप्री सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १३ (आप्री सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १३ (आप्री सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – आप्री देवतासमूह 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बाराव्या सूक्तात मधुछन्दस वैश्वामित्र या ऋषींनी अग्निदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री

सुस॑मिद्धो न॒ आ व॑ह दे॒वाँ अ॑ग्ने ह॒विष्म॑ते । होतः॑ पावक॒ यक्षि॑ च ॥ १ ॥

यज्ञामध्ये अग्निदेवा हवी सिद्ध जाहला

प्रदीप्त होऊनी आता यावे स्वीकाराया हविला

हे हविर्दात्या सकल देवता घेउनी सवे यावे 

पुण्यप्रदा हे  अमुच्या यागा पूर्णत्वासी न्यावे ||१|| 

मधु॑मन्तं तनूनपाद्य॒ज्ञं दे॒वेषु॑ नः कवे । अ॒द्या कृ॑णुहि वी॒तये॑ ॥ २ ॥

प्रज्ञानी हे अग्निदेवा स्वयंजात असशी

अर्पण करण्या हवीस नेशी देवांच्यापाशी

मधुर सोमरस सिद्ध करुनिया यज्ञी ठेविला

यज्ञा नेवूनी देवतांप्रति सुपूर्द त्या करण्याला ||२||

नरा॒शंस॑मि॒ह प्रि॒यम॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये । मधु॑जिह्वं हवि॒ष्कृत॑म् ॥ ३ ॥

मधुर अतिमधुर जिव्हाधारी हा असा असे अग्नी

अमुच्या हृदया अतिप्रिय हा असा असे अग्नी

स्तुती करावी सदैव ज्याची असा असे अग्नी

पाचारण तुम्हाला करितो यज्ञा या हो अग्नी ||३||

अग्ने॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ दे॒वाँ ई॑ळि॒त आ व॑ह । असि॒ होता॒ मनु॑र्हितः ॥ ४ ॥

आम्हि अर्पिल्या हवीस अग्ने देवताप्रती नेशी

तू तर साऱ्या मनुपुत्रांचा हितकर्ता असशी

सकल जनांनी तुझ्या स्तुतीला आर्त आळवीले

प्रशस्त ऐशा रथातुनी देवांना घेउनी ये ||४||

स्तृ॒णी॒त ब॒र्हिरा॑नु॒षग्घृ॒तपृ॑ष्ठं मनीषिणः । यत्रा॒मृत॑स्य॒ चक्ष॑णम् ॥ ५ ॥

लखलखत्या दर्भांची आसने समीप हो मांडा

सूज्ञ ऋत्विजांनो देवांना आवाहन हो करा

दर्शन घेऊनिया देवांचे व्हाल तुम्ही धन्य 

त्यांच्या ठायी दर्शन होइल अमृत चैतन्य ||५||

वि श्र॑यन्तामृता॒वृधो॒ द्वारो॑ दे॒वीर॑स॒श्चतः॑ । अ॒द्या नू॒नं च॒ यष्ट॑वे ॥ ६ ॥

उघडा उघडा यज्ञमंडपाची प्रशस्त द्वारे 

सिद्ध कराया यागाला उघडा विशाल दारे

त्यातुनि बहुतम ज्ञानी यावे यज्ञ विधी करण्या

पवित्र यज्ञाला या अपुल्या सिद्धीला नेण्या ||६||

नक्तो॒षासा॑ सु॒पेश॑सा॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये । इ॒दं नो॑ ब॒र्हिरा॒सदे॑ ॥ ७ ॥

सौंदर्याची खाण अशी ही निशादेवीराणी

उषादेवीही उजळत आहे सौंदर्याची राणी

आसन अर्पाया दोघींना दर्भ इथे मांडिले

पूजन करुनी यज्ञासाठी त्यांसी  आमंत्रिले ||७|| 

ता सु॑जि॒ह्वा उप॑ ह्वये॒ होता॑रा॒ दैव्या॑ क॒वी । य॒ज्ञं नो॑ यक्षतामि॒मम् ॥ ८ ॥

दिव्य मधुरभाषी जे सिद्ध अपुल्या प्रज्ञेने 

ऋत्विजांना हवनकर्त्या करितो बोलावणे

पूजन करितो ऋत्विग्वरणे श्रद्धा भावाने

हवन करोनी या यज्ञाला तुम्ही सिद्ध करावे ||८||

इळा॒ सर॑स्वती म॒ही ति॒स्रो दे॒वीर्म॑यो॒भुवः॑ । ब॒र्हिः सी॑दन्त्व॒स्रिधः॑ ॥ ९ ॥

यागकृती नियमन करणारी इळा मानवी देवी

ब्रह्मज्ञाना पूर्ण जाणते सरस्वती देवी

त्यांच्या संगे सौख्यदायिनी महीधरित्री देवी 

आसन घ्यावे दर्भावरती येउनीया त्रीदेवी ||९|| 

इ॒ह त्वष्टा॑रमग्रि॒यं वि॒श्वरू॑प॒मुप॑ ह्वये । अ॒स्माक॑मस्तु॒ केव॑लः ॥ १० ॥

विश्वकर्म्या सर्वदर्शी तुम्ही सर्वश्रेष्ठ

केवळ अमुच्यावरी असावी तुमची माया श्रेष्ठ

अमुच्या यागा पावन करण्या तुम्हास आवाहन

यज्ञाला या सिद्ध करावे झणी येथ येऊन ||१०|| 

अव॑ सृजा वनस्पते॒ देव॑ दे॒वेभ्यो॑ ह॒विः । प्र दा॒तुर॑स्तु॒ चेत॑नम् ॥ ११ ॥

वनस्पतिच्या देवा अर्पण देवांसी हवि  करी

प्रसन्नतेच्या त्यांच्या दाने कृतार्थ आम्हा करी 

यजमानाला यागाच्या या सकल पुण्य लाभो

ज्ञानप्राप्ति होवोनीया तो धन्य जीवनी होवो ||११||

स्वाहा॑ य॒ज्ञं कृ॑णोत॒नेन्द्रा॑य॒ यज्व॑नो गृ॒हे । तत्र॑ दे॒वाँ उप॑ ह्वये ॥ १२ ॥

यजमानाच्या गृहात यज्ञा इंद्रा अर्पण करा

ऋत्वीजांनो यज्ञकर्त्या प्रदान पुण्या करा 

सर्व देवतांना आमंत्रण यज्ञी साक्ष करा

देवांना पाचारुनि यजमानाला धन्य करा ||१२|| 

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.

https://youtu.be/U2ajyRxxd-E

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 13 Marathi Geyanuvad :: ऋग्वेद मंडळ १ सुक्त १३ मराठी गेयानुवाद

Rugved Mandal 1 Sukta 13 Marathi Geyanuvad :: ऋग्वेद मंडळ १ सुक्त १३ मराठी गेयानुवाद

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रोज एक टक्का सुधारणा — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रोज एक टक्का सुधारणा — ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

रोज तुम्ही स्वतःमध्ये 1 टक्का जरी सुधारणा केलीत, तरी वर्षभरात तुमच्यामध्ये 365 टक्के सुधारणा झालेली असेल.

एअरपोर्टच्या जवळ लिहिलेले एक सुंदर वाक्य: आकाशात भरारी दररोज घ्या, पण संध्याकाळी खाली जमिनीवर या. कारण तुमच्या यशानंतर आपुलकीने टाळ्या वाजवणारे व मिठी मारणारे मित्र जमिनीवरच राहतात.

ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नाही. पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते!

आयुष्यात व्यवहार तर खूप  होतात; पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही.

आकाशात उंच भरारी घेणाऱ्या गरुडालाही पाण्याच्या एका थेंबासाठी खाली यावे लागते. परंतु खाली येणे, ही त्याची हार नसते,तर पुन्हा आकाशात झेप घेण्याची तयारी असते.

यशस्वी तर भरपूर जण असतात; परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हा जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो.

जीवनात उंची गाठण्यासाठी एखादी पदवी हवीच असते, असे काही नाही. मधुर वाणी आणि चांगली वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनवू शकते.

तुमच्यात पात्रता असूनही काही माणसं तुम्हांला पाठिंबा देत नाहीत. कारण, त्यांच्या मनामध्ये एकच भीती कायम असते. ती म्हणजे हा आपल्यापुढे निघून जाईल. नातं कोणतंही असू द्या… फक्त इमानदार असलं पाहीजे.

जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते! साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं!

माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो… परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..? तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढंच ना…? परंतू मला वाटतं… माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं… जिथं जावं, त्याचं सोनं करून यावं..

प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून उडवायला शिका, म्हणजे काळजाला बोचऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उचलावा लागणार नाही…!

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ अस्तित्व… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अस्तित्व… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“.. अगं तारामती !चल चल लवकर पाय उचलत राहा… अजून तालूक्याचं गाव आलं नाही!.. पाच सहा मैलाची रपेट करायची आपल्याला… आपल्या कनवाळू  मायबाप सरकारने यंदाच्या दिवाळी साठी दुर्बल कुटुंबांना दिवाळीसामानाचं पॅकेट देणारं आहेत फक्त शंभर रुपयात….त्या स्वस्त शिधावाटप दुकानातून… आपल्याला तिथं जाऊन नंबर लावला पाहिजे तरच ते आपल्याला मिळेल…त्यासाठी आधी बॅंकेत जाऊन हया महिन्याची स्वातंत्र्य सेनानी पेंशन योजनेतील जमा झालेली पेंशन काढायला हवी… तुला एक खादीची साडी आणि मला जमला तर खादीचा सदरा घ्यायला हवा…गेली दोन अडीच वर्षे कोरोना मुळे फाटकेच कपडे तसेच वापरले गेले आणि आता तेही घालण्याच्या उपयोगी नाही ठरले… यावर्षीची दिवाळी आपली खास जोरदार दिवाळी होणार आहे बघ… एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो तेल, एक किलो डाळ, अंगाचा साबण, सुवासिक तेलाची बाटली हे सगळं त्या पॅकेट मधे असणार आहे… ते आपल्याला मिळाले कि दिवाळीचा सणाचा आनंद होणार आहे… अगं चल चल लवकर… तिकडे बॅकेत किती गर्दी असते तुला ठाऊक नाही का? . मग पैसे मिळाले की त्या रेशन दुकानावर किती गर्दी उसळली असेल काही सांगता येत नाही… “

…बॅकेत पोहचल्यावर त्यांना सांगण्यात आलं…स्वातंत्र्य सेनानीं ची पेंशन मध्ये वाढ द्यायची का नाही यावर शासनाचा निर्णय प्रलंबित असल्याने निर्णय झाल्यावरच पेंशन खात्यावर जमा होईल… तेव्हा पेंशन धारकानी बॅकेत वारंवार चौकशी करू नये… खादीची साडी नि सदरा, दिवाळीचं पॅकेट दुकानात वाट बघत राहिलं… अन पेपरला बातमी आली… सरकारी दिवाळी पॅकेज कडे लाभार्थींनी पाठ फिरवली त्यामुळे सगळी पॅकेटची खुल्या बाजारात  विक्री करण्यास अनुमती दिली आहे…

… रेशन दुकानाच्या पायरीवर ते दोघे थकून भागून बसले.. पिशवीतून आणलेल्या पाण्याच्या बाटलीतले चार घोट पाणी पिऊन तरतरीत झाले…आजही स्वतःच्या अस्तित्व टिकविण्याच्या धावपळीत  त्यांना पंचाहत्तर वर्षापूर्वीचा स्वातंत्र्य लढ्यात केलेल्या धावपळीचा भूतकाळ आठवला… तन,मन,धन वेचून देश स्वतंत्र व्हावा म्हणून त्यांनी योगदान दिले होते… देश स्वतंत्र झाला पण…पण  स्वतंत्र देशाच्या अनुशासनाचे आजही  ते गुलामच राहिले आहेत…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 109 ☆ लघुकथा – वोट के बदले नोट ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है  शिक्षा के क्षेत्र में राजनीतिक विमर्श पर आधारित एक विचारणीय लघुकथा ‘वोट के बदले नोट’। डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 109 ☆

☆ लघुकथा – वोट के बदले नोट ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

हैलो रमेश ! क्या भाई,  चुनाव प्रचार कैसा चल रहा है ?

बस चल रहा है । कहने को तो शिक्षा क्षेत्र का  चुनाव है लेकिन कथनी और करनी का अंतर यहाँ भी दिखाई दे ही जाता है । कुछ तो अपने बोल का मोल होना चाहिए यार ? मुँह देखी बातें करते हैं सब, पीठ पीछे कौन क्या खिचड़ी पका  रहा है, पता ही नहीं  चलता ?

अरे छोड़ , चुनाव में तो यह सब चलता ही रहता है। जहाँ चुनाव है वहाँ राजनीति और जहाँ राजनीति आ गई वहाँ तो —–

पर यह तो विद्यापीठ का चुनाव है, शिक्षा क्षेत्र का! इसमें उम्मीदवारों का चयन उनकी अकादमिक योग्यता के आधार पर ही होना चाहिए ना !

रमेश किस दुनिया में रहता है तू ? अपनी आदर्शवादी सोच से बाहर निकल। अकादमिक योग्यता, कर्मनिष्ठा ये बड़ी – बड़ी बातें सुनने में ही अच्छी लगती हैं । तुझे पता है क्या कि अभय ने कई मतदाताओं के वोट पक्के कर लिए हैं ?

कैसे ? मुझे तो कुछ भी नहीं पता इस बारे में ।

इसलिए तो कहता हूँ अपने घेरे से बाहर निकल, आँख – कान खुले रख । खुलेआम वोट के बदले नोट का सौदा चल रहा है । बोल तो तेरी भी बात पक्की करवा दूं ? ठाठ से रहना फिर, हर कमेटी में तेरा नाम और जिसे तू चाहे उसका नाम डालना। चुनाव में खर्च किए पैसे तो यूँ वापस आ जाएंगे और सब तेरे आगे – पीछे भी रहेंगे ।

नहीं – नहीं यार,  शिक्षक हूँ मैं, वोट के बदले नोट के बल पर मैं जीत भी गया तो अपने विद्यार्थियों को क्या मुँह दिखाऊंगा। अपनी अंतरात्मा को क्या जवाब दूंगा ?

 

©डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

संपर्क – 122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

 

Please share your Post !

Shares