मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रारंभ – भाग-4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ प्रारंभ – भाग-4 ☆ श्री आनंदहरी

आत्याबाई रंजनाला घेऊन बायका शेवया वळत होत्या तिथं गेल्या.  तिथं प्रवेश करताच सगळ्या बायका कधी न पाहिल्यासारखे रंजनाकडे पाहतच राहिल्या.

‘एवढे सारे घडूनसुद्धा, नवऱ्याने टाकूनसुद्धा रंजी काहीच न घडल्यासारखी कशी काय? ‘ असा प्रश्न प्रत्येकीच्या मनात आला होता पण आत्याबाई असल्याने कुणाच्याच ओठावर मात्र आला नाही.

प्रत्येकीच्या डोळ्यातील प्रश्न रंजनाला जाणवला तसा तिचा चेहरा पडला. आत्याबाईंना ते जाणवले.

“कवा बगीतलं नसल्यावानी काय बगतायसा रंजीकडं ?   ए तू उठ गं.. आन च्या ठ्येव जा समद्यास्नी. आन रंजे, तू बस शेवया चाळाय.. “

आत्याबाईंनी शेवयाच्या मालकिणीला चहा करायला सांगून स्वयंपाकघरात पिटाळले आणि तिथं रंजनाला बसवले. कुणी रंजनाचा विषय काढू नये म्हणून दुसराच विषय काढून बोलत बसल्या.

संध्याकाळी रंजनाला सोडायला म्हणून आत्याबाई घरी गेल्या. आत्याबाईंमुळेच इतक्या दिवसानंतर रंजना घराबाहेर पडली होती. तिथंसुद्धा कुणीही तिला काहीच विचारले नव्हते. प्रत्येकजण जणू काही घडलेच नाही असेच वागत होती आणि हे सारे घडले होते ते फक्त आत्याबाईंमुळे. रंजनाच्या मनातला आत्याबाईंविषयीचा आदर जास्तच वाढलेला होता. या साऱ्यांमुळे आणि  वेगळ्या वातावरणामुळे ती काहीशी सावरली होती. तेवढ्या वेळात मनात काहीच विचार आले नव्हते. शेवया करण्याचे काम हसत-खेळत चालल्यामुळे कितीतरी दिवसांनी ती हसली होती. तिला खूप बरे वाटत होते.

” दादा, उद्याच्याला येळ काडा.. येरवाळीच पावण्याकडं जाऊन येऊया..”

घरात शिरताच आत्याबाई रंजनाच्या वडिलांना म्हणाल्या.

” काय म्हंत्यात त्ये बगू.. त्या पोरासंगतीबी बोलायचं हाय मला.. “

” अहो, आत्त्याबाई, पण…”

“दादा, आता पन-बिन काय नगो. अवो,  इनाकारण जर कुणी तरास देत आसंल.. आन सवंनं सांगूनबी त्येला समजत नसंल तर वाकड्यात शिराय लागतंच..  अवो, तुकोबानं सांगून ठ्येवल्यालं हाईच की, ‘ नाठाळाचे माथी हाणू काठी ।’ उद्या येरवाळीच येत्ये मी.”

आत्याबाईसमोर कुणाचंच काही चालत नव्हते. दादांचेही चालले नाही आणि रंजनाच्या सासरच्या मंडळींचेही चालले नाही. आत्याबाई अन् दादा रंजनाच्या सासरी जाऊन आले. तिथं गेल्यावर तितक्याच चारपाच मातब्बर लोकांना पंच म्हणून बोलावून त्यांच्यासमोर रंजनाच्या नवऱ्याची, सासरच्या लोकांची चूक त्यांच्या पदरात घालून आणि लग्नात दिलेले सारे काही घेऊन परत आले. येताना पंचांच्या साक्षीने सासरच्या मंडळींकडून ‘रंजनाचा काही दोष नसल्याचे, चूक नसल्याचे आणि तिचा नवराच चुकीचा असून तोच लग्नानंतर रंजनाशी संसार करायला तयार नसल्याचे लिहून घ्यायला आत्याबाई विसरल्या नव्हत्या.

दादा परतले तरी मनात अस्वस्थ होते. काहीही असले तरी आज ना उद्या सारे काही सुरळीत होईल, रंजना परत सासरी जाईल. तिचा संसार सुरळीत सुरू होईल अशी क्षीण का होईना पण एक आशा त्यांच्या मनात होती.. आत्याबाईंबरोबर जाऊन आल्यावर ती पूर्णतः संपली होती. आत्याबाईंनी केले ते योग्य की अयोग्य हे त्यांना स्वतःला ठरवता येत नव्हते. पण तरीही त्यांच्या मनात आत्याबाईबद्दल राग नव्हता.

घरी आल्यावर दादांनी सारे सांगितले तेंव्हा रंजनाच्या आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले. एकीकडे रंजनाबद्दल वाईट वाटत होते त्याचवेळी आत्याबाई मदतीला धावून आल्या आणि रंजनाच्या आयुष्यातील  त्रासदायक प्रकरणाचा शेवट झाला. आता पुन्हा नव्याने आयुष्याचा विचार करता येईल, नव्याने आयुष्य जगता येईल असा विचार त्यांच्या मनात येऊन त्यांनी सुटकेचा सुस्काराही सोडला होता.  झाले ते चांगले झाले की वाईट ? कुणाला काहीच ठरवता येत नव्हते.. अगदी रंजनालाही.

‘उगा घोगडं भिजत ठेवायचं कशापाय? जलम एकडावच आस्तुय दादा.. त्यो बी असाच जाऊ द्याचा ?  अवो, पोरीच्या मनाचा, तिच्या जलमाचा तरी इचार करा.. आपली पोरगी सुकानं नांदावी आसं वाटतं… पर योक बैल दुसरीकडं वड खात आसंल तर गाडी सळ्ळी कशी चालायची ? दुसऱ्या बैलाला त्येचा किस्ता तरास हुतो ती दुसऱ्याला न्हाय उमगत. नुसती जीवाची वडाताण हुती.. सुख म्हणून कायच ऱ्हात न्हाय… उगा गाडीला जुंपलंय म्हणून जलमभर वडीत ऱ्हायाचं … दुसरा बैल वडील तिकडे जाऊन उगा कुठंतरी खड्यात जाण्यापरिस जू सोडून बाजूला झाल्यालं लय ब्येस… लोकं काय म्हंतीली ह्येचा इचार करत बसून पोरीला जलमभर आगीत ढकलायची का पोरीला चटकं बसायला लागल्यात ही बगून तिला भायेर काडायचं ह्येचा इचार करायचा ?’

रंजनाच्या सासरी सारं काही ऐकल्यावर बाजूला घेऊन आत्याबाई दादांना म्हणाल्या होत्या. त्ये दादांना आठवत होते. आत्याबाई अडाणी, शाळा न शिकलेल्या.. पण जीवनाच्या शाळेतील अगाध ज्ञान मिळवलेल्या. त्या बोलत होत्या त्यावेळी दादांना सगळे म्हणणे पटत होते.. तरीही.. तरीही ‘ रंजनाचे पुढे कसे व्हायचे ? सारे आयुष्य जायचं आहे तिचं.. आपण चार दिवसाचे सोबती.. सारे आयुष्य एकटेपणाने काढणे सोपे का असतं ? ‘हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता.

क्रमशः …

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका गृहिणीचं मनोगत – श्री सुहास आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

? मनमंजुषेतून ?

☆ एका गृहिणीचं मनोगत – श्री सुहास आपटे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

माझं असं का होत माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं पण उत्तर काही मिळत नाही !

 

घरात प्रचंड पसारा असतो त्याचवेळी सगळे येतात,

फर्निचरच्या धुळीवरून हळूच एक बोट फिरवतात !

मी मनात खजील, तर ते गालातल्या गालात हसत असतात,

बाई फारच आळशी म्हणून चक्क एक शेरा ठोकतात !

घर टकाटक आवरल्यावर कुणीच कसं येत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं पण उत्तर काही मिळत नाही !

 

दिवसभराच्या कामानं मीही दमलेली असते !

रात्री फक्त खिचडी हीही ठरलेली असते !

किचनचा लाइट off  करणार, तेवढ्यात बेल जोरात वाजते,

surprise म्हणून पाहूणे येतात, खिचडीला पाहून नाके मुरडतात,

चार पदार्थ वेगळे असतात तेव्हा कुणीच कसं येत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बर, दर वेळेला असच होत पण उत्तर काही मिळत नाही !

 

कधीतरी माझ्या हातात चार पैसे खुळखुळत असतात,

लक्ष्मी रोडवरचे dress आता मला बोलवायला लागतात,

त्यांच्या हाकेला ओ देऊन मी लगेच पुण्याला जाते,

नेमके त्याच वेळी सेल संपून हाय प्राइस लागते !

matching आणि size चे ही गणित का जुळत नाही,

माझं असं कां होतं माझं मला कळत नाही !

बर, दर वेळेला असंच होतं, पण उत्तर काही मिळत नाही !

 

गणिताचाच पेपर माझ्या स्वप्नात येतो,

पेपर चालू झाला पण मला उशीर झालेला असतो,

मायनस झिरो मार्क मला दिसायला लागतात,

भीतीने लटपट पाय कापायला लागतात !

स्वप्नात तरी मी विद्यापीठात पहिली का येत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं पण उत्तर काही मिळत नाही !

 

नेहमीच मी ठरवते जरा कमी बोलायचं,

स्वतःचीच टकळी लावण्याआधी दुसऱ्याचं थोडं ऐकून घ्यायचं !

परदेशातून मावशी आली, मी माझीच cassette लावली,

Backlog भरून काढण्यासाठी मी बडबड चालू केली !

मौनाचं महत्त्व माझ्यासाठी का applicable होत नाही?

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं ,दर वेळेला असंच होतं, पण उत्तर काही मिळत नाही !

 

आत्ताच मी ठरवलं मुद्दाम काही लिहायचं नाही,

ओढून ताणून शब्द जुळवून कविता त्याला म्हणायचं नाही !

कुणीही काहीही म्हटले तरी कवयित्री अशी होत नसते,

आपलीच फजिती इतरांना सांगून पाठ आपली थोपटायची नसते !

तरीही मी लिहायचं कधी सोडत नाही,

माझं असं का होतं माझं मला कळत नाही !

बरं, दर वेळेला असंच होतं, पण उत्तर काही मिळत नाही……।।

 

– श्री सुहास आपटे. 

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 21 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 21 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

२८.

    पायातला साखळदंड अवजड असतो.

    तो तोडायचा प्रयत्न मी करतो.

    तेव्हा ह्रदयात कालवाकालव होते.

 

    मला स्वातंत्र्य हवं पण त्याची हाव धरणं

    मला लाजिरवाणं वाटतं.

 

    हे माझ्या मित्रा, तुझ्याकडे अमाप संपत्ती आहे.

    पण माझ्या दालनातला पातळ पडदा

    दूर करण्याचं बळ माझ्यात नाही.

 

    धूळ आणि मृत्यू

    यांचं आवरण असलेलं हे वस्त्र-

    याचा मला तिरस्कार असला तरी प्रेमानं

    मी ते लपेटून घेतलंय.

 

    माझ्यावर कर्जाचा बोजा असून

    मी अंध: पतित आहे.

    माझी लज्जा बोजड पण लपलेली आहे.

   पण माझ्या उध्दाराची प्रार्थना करताना

    मला भिती वाटते की

    माझी प्रार्थना मान्य करशील.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

pmk2146@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रपटावर बोलू काही ☆ राकेट्री (हिंदी सिनेमा) – दिग्दर्शक – आऱ्. माधवन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

🎞️ चित्रपटावर बोलू काही 🎞️

☆ Rocketry (हिंदी सिनेमा) – दिग्दर्शक – आऱ्. माधवन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

आज Rocketry हा हिंदी सिनेमा बघण्याचा योग आला. योगच म्हणावे लागेल कारण गेल्या आठवड्यापासून तो सिनेमा बघण्याचे मनात असले तरी वेळ काढता आला नाही. आज मात्र ठरवून रॉकेट्री सिनेमा बघितला.

डॉक्टर विक्रम साराभाईंनी ज्यांच्यावर मुलासारखं प्रेम केलं, ज्यांच्या प्रचंड बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवला, ज्यांचा विक्षिप्तपणा सांभाळून घेतला, तेच डॉ. नंबी नारायणन ह्यांच्या आयुष्यावर चित्रित केलेला हा सिनेमा. आर. माधवन ह्या अभिनेत्याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे , आणि स्वतःच डॉ. नंबी नारायणन ह्यांची भूमिका केली आहे. हा सिनेमा बनवून, त्याने आपल्या भारत देशातील सगळ्या देशवासीयांसमोर एक असा काही नजराणा ठेवला आहे की तो आपण प्रत्येकाने स्वीकारून त्याचा नुसता आस्वाद न घेता, त्याचे स्मरण आपल्या आयुष्यात कायम राहील ह्याची खात्री बाळगली पाहिजे. 

डॉ एस. नंबी नारायणन (जन्म १२ डिसेंबर १९४१ ) हे रॉकेट वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता होते , ज्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) इथे काम केले आणि विकास रॉकेट इंजिनच्या विकासात योगदान दिले. २०१९ मध्ये त्यांना भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. भारताने प्रक्षेपित केलेल्या पहिल्या PSLV मध्ये वापरलेल्या विकास इंजिनसाठी फ्रान्सकडून तंत्रज्ञान घेतलेल्या संघाचे त्यांनी नेतृत्व केले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO ) चे वरिष्ठ अधिकारी म्हणून ते क्रायोजेनिक्स विभागाचे प्रभारी होते

अतिशय हुशार आणि प्रामाणिक असणाऱ्या डॉ नंबी नारायणन ह्यांना नासा ( National Aeronautics and Space Administration ) कडून खूप मोठ्या पगाराच्या नोकरीचा प्रस्ताव आला होता. पण फक्त नि फक्त त्यांचे देशप्रेम आणि आपल्या देशाचे नाव जगात अव्वल असावे ह्यासाठी त्यांनी तो प्रस्ताव ठोकरला. 

अशा प्रामाणिक आणि देशप्रेमी डॉ नंबी नारायणन ह्यांच्यावर १९९४ मध्ये हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना केरला सरकारकडून अटक करण्यात आली. एप्रिल १९९६ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने त्यांच्यावरील आरोप फेटाळले आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव केरळ सरकारला तपास सुरू ठेवण्यापासून रोखले. संपूर्ण दोन वर्षे ते आपल्या परिवारापासून लांब जेलमध्ये होते. दरम्यान ह्या सगळ्या प्रकाराचा त्यांच्या बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला आणि  तिच्यावर मनोविकारतज्ञाकडून इलाज करावे लागले. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने, दीपक मिश्रा यांच्या खंडपीठामार्फत, डॉ नंबी नारायणन यांना ५०,००,००० रुपयांची भरपाई देऊन त्यांना निर्दोष ठरविले. तिरुअनंतपुरम येथील उपन्यायालयात केरला राज्याविरुद्ध दाखल केलेला खटला निकाली काढण्याच्या डिसेंबर २०१९  च्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, कोषागारातून १.३ कोटी रुपयांची अतिरिक्त भरपाई डॉ नंबी नारायणन ह्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली.

दिग्दर्शक आणि डॉ नंबी नारायणन ह्यांची भूमिका केलेले आर. माधवन ह्यांनी ह्या सिनेमात खूप काही दाखविले आहे. भारताची अवकाश संशोधन संस्थेमधील गुपितं पाकिस्तानला विकल्याच्या आरोपावरून डॉ नंबी नारायणन ह्या देशनिष्ठ शास्त्रज्ञाला केरला सरकारने तुरुंगवास कसा घडविला- डॉ नंबी नारायणन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने शारिरीक आणि मानसिक हालांना तोंड कसे दिले- एका न्यायी सीबीआय ऑफिसरमुळे तुरुंगातून ते बाहेर तर आले, पण काही राजकीय पक्ष्याच्या पाठिंब्यामुळे लोकांनी केलेला तीव्र धिक्कार कसे सोसत राहिले- संपूर्ण कुटुंबाची होणारी वाताहात घट्ट मनाने कसे सहन करत राहिले – हे सगळे यात दाखवले आहे.  तुरुंगातल्या छळाने डॉ नंबी नारायणन यांचे शरीर दुबळे झाले होते पण त्यांच्या बुद्धीची धार आणि संशोधनाची आस तशीच तेजस्वी होती.

डॉ नंबी नारायणन ह्यांची मे १९९६ मध्ये सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. तरीही २०१८ पर्यंत त्यांना अनेक वर्षे  कायदेशीर लढायांना सामोरे जावे लागले, कारण निर्दोष सुटल्यानंतर लगेचच केरळ सरकारने पुन्हा चौकशीचे आदेश दिले होते आणि त्यांना डॉ नंबी नारायण ह्यांनी आव्हान दिले होते आणि सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

आर. माधवनच्या ‘Rocketry’ सिनेमाने प्रेक्षकांना अभिमानाचे क्षण दिले आहेत, तसेच नकळत डोळ्यांतून पाणीही आणले आहे. पण मुख्यतः ह्या सिनेमांत डॉ नंबी नारायणन ह्यांच्या बुद्धिमत्तेचे दाखले दाखविले आहेत. एक मात्र नक्की, डॉ नंबी नारायणनसारखी असामान्य माणसे जेव्हा देशासाठी अशी  काही असामान्य कामे करतात तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसांना त्यांच्या असामान्य कामाची निदान थोडी फार जाणीव तरी असलीच  पाहिजे.

मी सर्वांनाच अतिशय नम्रपणे आवाहन करतो की हा सिनेमा नक्की बघावा, म्हणजे डॉ नंबी नारायणन ह्यांनी आपल्या देशासाठी काय काय केले आणि त्याबद्दल त्यांना काय काय सोसावे लागले ह्याची आपल्याला जाणीव होईल.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #150 ☆ व्यंग्य – दलिद्दर की बीमारी ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर व्यंग्य दलिद्दर की बीमारी। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 150 ☆

☆ व्यंग्य – दलिद्दर की बीमारी 

दलिद्दर अपनी कंजूसी के लिए विख्यात हैं। माँ-बाप ने तो उनका नाम चंद्रमा प्रसाद रखा था, लेकिन उनके सूमपन को देखकर मोहल्ले वालों ने उनका नाम दलिद्दर रख दिया था। चंद्रमा प्रसाद ने भी इस नाम को स्वीकार कर लिया था। जब लोग उन्हें ‘दलिद्दर’ कहकर पुकारते तो वे घूम कर प्रेम से जवाब देते, ‘हाँ भैया।’

दलिद्दर ने कौड़ी कौड़ी जोड़कर भारी मकान खड़ा किया था। उसमें छोटे-छोटे कमरे बनाकर चार किरायेदार घुसा दिए थे। मकान बनते वक्त दलिद्दर ने खुद ही ईंटें ढोयीं थीं और मिस्त्री का काम भी किया। इसमें उनका उद्देश्य सिर्फ पैसा बचाने का था।

अब दलिद्दर अपने किरायेदारों को हलाकान किये रहते थे। रोज उन्हें पच्चीस निर्देश देते। उनका व्यवहार ऐसा था जैसे मकान किराये पर देकर उन्होंने कोई एहसान किया हो, या जैसे किरायेदार मुफ्त में रह रहे हों।

दलिद्दर हमेशा गंदी कमीज़ और पायजामा पहनते थे और अक्सर नंगे पाँव रहते थे। संपन्न होने के बाद भी वे हरएक के सामने अपने कष्टों का रोना रोते रहते। कोई उनकी संपन्नता की बात करता तो वे मुँह पर भारी दुख लाकर कहते, ‘अरे भैया, साँप के पाँव साँप को ही दिखते हैं। यहाँ गिरस्ती का बोझ उठाते कमर टूट रही है और तुम्हें मजाक सूझता है। तुम क्या समझते हो ये गंदे कपड़े पहनने का मुझे शौक है?’ कई बार वे अपनी तकलीफों का बयान करते आँखों में आँसू भर लाते।

दलिद्दर शाम को चौराहे पर चाय की दूकान के पास खड़े रहते। कोई परिचित दिखता तो खिलकर कहते, ‘आओ भई, मैं देख रहा था कोई दोस्त मिले तो चाय का जुगाड़ हो जाए। बड़ी कड़की चल रही है।’

कोई उनसे चाय पिलाने को कहता तो वे या तो ठंडी आह भरकर ज़मीन की तरफ देखने लगते, या कहते, ‘यार, अभी पिछले महीने ही तो पिलायी थी। एक महीना भी तो नहीं हुआ। हम कोई धन्नासेठ हैं जो रोज चाय पिलायें।’

दलिद्दर अपनी या परिवार की दवा- दारू पर बहुत कम पैसा खर्चते थे। कभी कोई बीमार पड़ता तो दवा की दूकान पर जाते और कहते, ‘भैया, बुखार की कोई सस्ती गोली दे दो।’ जब हालत चिन्ताजनक हो जाती तभी डॉक्टर के पास जाते। तब भी अगर डॉक्टर दस दिन दवा खाने को कहता जो पाँच दिन में ही बन्द कर देते।

एक बार दलिद्दर को बुखार आया। दलिद्दर जाते और दूकानदार से पूछकर सस्ती गोलियाँ लेकर खा लेते। लेकिन बुखार ठीक नहीं हुआ। आखिर हारकर दलिद्दर डॉक्टर के पास पहुँचे। डॉक्टर ने जाँच की, कहा, ‘कंजूसराम, रोग बिगाड़ कर अब हमारे पास आये हो? दवा खानी हो तो हम लिखें, नहीं तो भोगते रहो।’

दलिद्दर दुखी भाव से बोले, ‘खाएँगे। आप लिख दो।’

डॉक्टर बोला, ‘नहीं खाओगे तो ऊपर चले जाओगे। सोच लो, पैसा बचाना है या जान।’

दलिद्दर कुछ खीझ कर बोले, ‘कहा न। खाएँगे। लिख दो।’

डॉक्टर ने परचा दिया तो दलिद्दर बोले, ‘आपके पास तो नमूने की दवाइयाँ पड़ी होंगीं। उन्हीं में से दे दो। आपको पुन्न होगा।’    

डॉक्टर बोला, ‘ये दवाइयाँ मेरे पास नहीं हैं। दूकान से खरीदनी पड़ेंगीं। फिर तुम जैसे आदमी को मुफ्त में दवा देने से मुझे कोई पुण्य नहीं होने वाला।’

दलिद्दर चुप हो गये। फिर उन्होंने अपनी जेबें घिस घिस कर बड़ी देर में नोट निकालकर डॉक्टर की फीस दी। फिर वे मुँह लटकाये दवा की दूकान पर पहुँचे। दवा के दाम पूछे। दाम सुनकर वापस लौट कर डॉक्टर के पास आ गये, बोले, ‘यह कैसी दवा लिखी आपने। एक  कैप्सूल दस रुपये का। रोज तीन कैप्सूल खाना है। तीस रुपये के हुए। कोई सस्ती दवा लिखिए।’

डॉक्टर बोला, ‘पहले आ जाते तो सस्ती दवा से काम चल जाता। अब यही दवा खानी हो तो खाओ नहीं तो घर जाकर यमराज का इंतज़ार करो।’

दलिद्दर गुस्सा होकर ‘अंधेर है’ कह कर चले गये।

इसके बाद दलिद्दर एक हफ्ते बाद दिखाने आये। उनके चेहरे पर हवाइयाँ उड़ रही थीं और शरीर दुबला दिख रहा था। डॉक्टर ने जाँच की, बोला, ‘बुखार तो ठीक है, लेकिन तुम्हारी हालत क्या हो रही है?’

दलिद्दर दुखी भाव से बोले, ‘पता नहीं। जी घबराता है, रात को नींद नहीं आती। भूख गायब है। लेकिन कोई नयी दवा मत लिख देना।’

अगले हफ्ते दलित आये तो उनका मुँह और लटका था। डॉक्टर जाँच करके बोला, ‘अब बुखार तो बिल्कुल ठीक है, लेकिन तुम लटक क्यों रहे हो?’

दलिद्दर भन्ना कर बोले, ‘हमसे पूछ रहे हैं कि हम क्यों लटक रहे हैं। पन्द्रह दिन की दवा में एक हजार से ज्यादा खर्च हो गये। इतने तो हमने जिन्दगी में कभी दवा पर खर्च नहीं किये होंगे। इतनी मँहगी जिन्दगी से तो मौत अच्छी।’

डॉक्टर हंँसकर बोला, ‘चलो, अब खुश हो जाओ। अब तुम ठीक हो गये। अब और पैसा नहीं लगेगा।’

दलिद्दर मनहूस चेहरा लिये उठे। उठ कर बोले, ‘खुश कैसे हो जाएँ? जो खर्च हो गया है उसको पूरा करने में दो चार महीने लग जाएँगे। किफायत से रहना पड़ेगा। आपने एक बीमारी ठीक करके दूसरी लगा दी। पहली बीमारी तो जल्दी ठीक हो गयी, दूसरी ठीक होने में टाइम लगेगा।’

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 102 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

?  Anonymous Litterateur of Social Media # 102 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 102) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>  कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of  Anonymous litterateur of Social Media# 102 ?

☆☆☆☆☆

मैं तो बस एक

खुशनुमा ख़्याल हूँ

कभी भी बिन

बुलाए आ जाऊंगा…!

I’m just a pleasant

thought…

I may visit anytime

uninvited…!

☆☆☆☆☆

हर रोज चुपके से

निकल आते नये पत्ते,

यादों के दरख्तों में

क्यूँ पतझड़ नहीं होते…

New leaves keep coming

out secretly everyday,

Why there’s no autumn in

the trees of memories…

☆☆☆☆☆ 

न थाम हाथ सके

न पकड़ सके दामन,

बड़े क़रीब से उठकर

यूंही चला गया कोई

Couldn’t just clasp the hands

couldn’t even grasp the stole,

Someone just got up from

so close and went away…!

 ☆☆☆☆☆ 

मिजाज़ में थोड़ी सख़्ती

ज़रूर रखिए, हुज़ूर

वरना पी जाते लोग समंदर

अगर वो खारा  ना होता …!

Be a little strict with your

temperament, my dear Sir

Otherwise, people would have even

drunk the sea if it wasn’t salty…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 148 ☆ सदाहरी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ संजय उवाच # 148 ☆ सदाहरी ?

आवश्यक मीटिंग में भाग लेने के लिए निकला हूँ। सामान्यतः भीड़भाड़ के मुकाबले तुलनात्मक रूप से कम भीड़ वाली जगह से निकलना मुझे पसंद है, फिर भले ही रास्ता कुछ लंबा ही क्यों ना हो। इसी स्वभाव के चलते भीड़भाड वाले सिग्नल के बजाय बीच की एक गली से निकला। पाया कि जिस भीड़-भड़क्के से बचने के लिए इस गली में प्रवेश किया था, उससे किसी प्रकार की मुक्ति का कोई लक्षण यहाँ भी नहीं दिख रहा है। अनुभव हुआ कि भीड़ के अधिकांश लोग गर्दन ऊँची किये कुछ देख रहे हैं। खरबूज़ों को देखकर खरबूज़े ने रंग बदला और मेरी गरदन भी ऊँची होकर उसी दिशा में देखने लगी।

आँखों ने देखा कि खेल-तमाशा दिखाने वाला एक नट सड़क पर चला जा रहा है। आगे-आगे चलती उसकी पत्नी डफली बजा रही है। अलबत्ता इसमें मजमा जुड़ने जैसी कोई बात नहीं थी। गले से पैंतालीस डिग्री ऊँची उठी आँखों को एकाएक भीड़ जमा होने का कारण मिल गया। नट के सिर पर उसके दस-बारह साल की बेटी रीढ़ की हड्डी सीधी किये खड़ी है। उसके दोनों पैर आपस में लगभग जुड़े हुए हैं । कंधे पर खड़े कलाबाज तो अनेक देखे पर सिर पर खड़े होकर संतुलन साधना आज देख रहा हूँ। बीच-बीच में बिटिया हाथों से कुछ करतब भी दिखा रही है। एकाग्र, लक्ष्यकेंद्रित, दायित्व के बोध से पिता के सिर का बोझ कम करती बेटी।

रुककर फोटो खींचने की स्थिति नहीं थी, अतः मन के पटल पर भीतर के कैमरे ने दृश्य को उकेर दिया। नन्ही आयु में माता-पिता के साथ कंधे से कंधा मिलाकर नहीं अपितु उनके कंधों से भी ऊँचा उठकर रोटी कमाने का दायित्व उठाती बेटी।

वस्तुत: हर हाल में माता-पिता के साथ खड़े होनेवाली बेटियों को अब तक भी समाज से समुचित स्थान नहीं मिला है। कहा जाता है कि हर बेटी के भाग्य में माता-पिता होते हैं पर बेटी का माता-पिता होना सौभाग्य होता है। संचित पुण्य से मिलता है सौभाग्य। बचपन से माँ से सुनता आया हूँ कि पुण्य की जड़ सदा हरी रहती है। ‘सदाहरी’ का उल्लेख हुआ तो इसी शीर्षक की अपनी कविता बरबस याद हो आई-

तपता मरुस्थल / निर्वसन धरती,

सूखा कंठ / झुलसा चेहरा,

चिपचिपा बदन / जलते कदम,

दूर-दूर तक,

शुष्क और / बंजर वातावरण था,

अकस्मात / मेरी बिटिया हँस पड़ी,

अब / लबालब पहाड़ी झरने हैं,

आकंठ तृप्ति है/ कस्तूरी-सा महकता मन है

तलवों में जड़ी मखमल है/ उर्वरा हर रजकण है,

हरित वसन है / धरा पर श्रावण है..!

बेटी का माता-पिता होने का सौभाग्य हर युगल को मिले।..तथास्तु!

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी   ☆  ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 102 ☆ सॉनेट ~ छंद सलिला ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित सॉनेट ~ छंद सलिला)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 102 ☆ 

☆ सॉनेट – छंद सलिला ☆

(अभिनव प्रयोगः प्रदोष सॉनेट)

नव मुखिया को नमन है

सबके प्रति समभाव हो

अधिक न न्यून लगाव हो

हर्षित पूरा वतन है

 

भवन-विराजी है कुटी

जड़ जमीन से है जुड़ी

जीवटता की है धनी

धीरज की प्रतिमा धुनी

 

अग्नि परीक्षा है कड़ी

दिल्ली के दरबार में

सीता फिर से है खड़ी

 

राह न किंचित सहज है

साथ सभी का मिल सके

यह संयोग न महज है

 

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

२२-७-२०२२

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: salil.sanjiv@gmail.com

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख – आत्मानंद साहित्य #133 ☆ मानव जीवन में हाथों उपयोगिता ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”

☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य# 133 ☆

☆ ‌ मानव जीवन में हाथों उपयोगिता ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

हिंदी भाषा में एक  कहावत है कि – हाथ कंगन को आरसी क्या पढ़े लिखे को फ़ारसी क्या?  जो मानव जीवन में हाथ की महत्ता दर्शाती है ।

सूरदास जी का यह कथन भी हाथ की महत्ता समझाता है जिसके पीछे विवशता, खीझ, तथा चुनौती का भाव स्पष्ट दिखाई देता है।

हाथ छुड़ाये जात हो, निर्बल जानि के मोय।

हृदय से जब जाओ, तो सबल जानूँगा तोय।। 

वैसे तो जीव जब योनियों में पलता है, तो  उसका आकार प्रकार योनि गत जीवन व्यवहार वंशानुगत गुणों के आधार पर तय होता है और शारीरिक संरचना  की बनावट अनुवांशिक गुणों के आधार पर तय होती है। जीव जगत के अनेकों भेद तथा वर्गीकरण है। पौराणिक मान्यता केअनुसार चौरासी लाख योनियां है, जिसमें जलचर, थलचर, नभचर, कीट पतंगों तथा जड़ चेतन आदि है। सबकी शारीरिक बनावट अलग-अलग है। रूप रंग का भी भेद है। हर योनि के जीव की आवश्यकता के अनुसार शारिरिक अंगों का  विकास हुआ है। इसी क्रम में मानव शरीर में हाथ का विकास हुआ, जिसे भाषा साहित्य के अनुसार हस्त, भुजा, पाणि, बाहु, कर, आदि समानार्थी नाम से संबोधित करते हैं।

चक्र हाथ में धारण करने के कारण भगवान विष्णु का नाम चक्रधर तथा चक्रपाणि पड़ा तथा हमारे ‌षोडस संस्कारों में एक प्रमुख संस्कार पाणिग्रहण संस्कार भी है जिससे हमारे जीवन की दशा और दिशा तय होती है। आशीर्वाद की मुद्रा में उठे हुए हाथ जहां व्यक्ति के भीतर अभयदान के साथ प्रसंन्नता प्रदान करता है वहीं दण्ड देने के लिए सबल के उठे हाथ  आश्रितों के हृदय में सुरक्षा का भरोसा दिलाते हैं।

हमारी पौराणिक मान्यता के अनुसार हाथ की बनावट तथा उसकी प्रकृति के बारे में हस्त रेखाएं बहुत कुछ कहती हैं, पौराणिक मान्यताओं अनुसार

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती।

करमूले स्थ‍ितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्।।

अर्थात् हाथ के अगले भाग में लक्ष्मी, मध्य में  विद्या की देवी सरस्वती तथा कर के मूल में सृष्टि सृजन कर्ता ब्रह्मा का निवास होता है इस लिए प्रभात वेला में उठने के पश्चात अपना हाथ देखने से इंसान मुखदोष दर्शन से बच जाता है। ज्योतिष शास्त्र के अनुसार हाथ में ही सूर्य, चंद्रमा, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतु आदि नवग्रहों के स्थान  निर्धारित है, जिसके उन्नत अथवा दबे हुए स्थान देख कर व्यक्ति जीवन के भूत भविष्य वर्तमान के घटनाक्रम की भविष्यवाणी की जाती है तथा नवग्रहों की शांति के लिए सबेरे उठ कर हमारे शास्त्रों में नवग्रह वंदना करने का विधान है, ताकि हमारा दिन मंगलमय हो।

ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु: शशि भूमि सुतो बुधश्च।

गुरुश्च शुक्र शनि राहु केतव सर्वे ग्रहा शांति करा भवंतु।

हाथ जहां हमारे दैनिक जीवन की नित्य क्रिया संपादन में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं वहीं हाथ लोकोपकार करते हुए, सबलों से निर्बलों की रक्षा करते हुए उद्धारक की भूमिका भी निभाते हैं, अपराधी को दंडित भी करते हैं। उसमें ही हस्त रेखा का सार छुपा बैठा है।

व्यक्ति  के हाथ के मणिबंध से लेकर उंगली के पोरों तथा नाखूनों की बनावट व रेखाएं देखकर इंसान के जीवन व्यवहार की भविष्यवाणी एक कुशल हस्तरेखा विशेषज्ञ कर सकता है। हाथों का महत्व  मानव जीवन में एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है। तभी किसी विद्वान का मत है कि हाथों की शोभा दान देने से है, कंगन पहनने से नहीं ।

© सूबेदार  पांडेय “आत्मानंद”

संपर्क – ग्राम जमसार, सिंधोरा बाज़ार, वाराणसी – 221208, मोबा—6387407266

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ ॥ मार्गदर्शक चिंतन॥ -॥ नर नारी सहयोग ॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ मार्गदर्शक चिंतन

☆ ॥ नर नारी सहयोग ॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆

एक सडक़ जंगल से होकर गुजरती थी। वन में सडक़ के किनारे एक पुराना पेड़ था। पेड़ के पास ही बरसात में एक लता उत्पन्न हो गई। वह पेड़ का सहारा लेकर बढ़ चली। उस पेड़ से लिपटकर वह धीरे-धीरे ऊपर बढ़ते हुये पेड़ की ऊंचाई तक पहुंच गई। पेड़ की डालों पर छा गई और फूलने-फलने लगी। जो भी पदयात्री रास्ते से निकलते उनकी दृष्टि वृक्ष पर जाती। बेल के फूल-फलों से वृक्ष बड़ा सुन्दर दिखता था। उस वृक्ष की विशालता से सौंदर्य का भी विस्तार हो रहा था। इस से वृक्ष को अहंकार हो गया कि लता के विकास और सौंदर्य का श्रेय तो उसे ही है। यदि उसने लता को आश्रय न दिया होता तो लता कहां होती और उसका सौंदर्य कहां होता जो सब राह चलने वाले निहार कर खुश होते हैं और प्रशंसा करते हैं। यदि उस का सहारा न मिलता तो लता कब की नष्ट हो गई होती।

उसने एक दिन लता को धमकाते हुये कहा- ‘अरी! ना समझ बेल, इतनी इठलाती क्यों है? मेरी बात मान कर रहा कर नहीं तो मैं तुझे गिराकर मिट्टी में मिला दूंगा।’

जब वह लता को यों डांट रहा था तभी वहां से दो पथिक रास्ते से निकले। वे आगे जा रहे थे। एक ने दूसरे से कहा- ‘बन्धु देख रहे हो, यह सामने वाला ऊंचा पेड़ कितना सुन्दर दिखाई दे रहा है। इसकी छाया कितनी सघन और मोहक है। इसके साथ जो बेल चढ़ी हुई है उसके फूल कितनी अच्छी सुगंध फैला रहे हैं। आओ, इसके नीचे छाया में थोड़ी देर विश्राम कर लें फिर रुक कर आगे चलेंगे।’

उनकी बातें सुन वृक्ष अपना अभिमान भूल गया। उसे पथिकों की बातों से स्पष्ट समझ में आ गया कि उसका अभिमान व्यर्थ है, क्योंकि उन्होंने लता और उसमें लगे फूलों की सुगन्ध से आकर्षित होकर वृक्ष और उसकी छाया की प्रशंसा की थी और वहां पर थोड़ी देर रुकने का मन बनाया था। उसकी प्रशंसा का कारण लता का साथ था। अपने झूठे अभिमान में व्यर्थ ही वह लता को डांट रहा था। यदि लता उसके सहारा से विकसित न हुई होती तो उस पेड़ का सौंदर्य कहां उभरा होता। उसकी प्रशंसा लता के ही कारण संभव हो सकी थी।

कथा का मर्म यह है कि जैसे पेड़ की शोभा लता से है और लता की शोभा व प्रशंसा वृक्ष के सहारे और संग से होती है, वैसे ही समाज में पुरुष और नारी की स्थिति है। उनके साथ और सहयोग से ही दोनों की शोभा, सम्मान और दोनों की पारस्परिक उन्नति होती है। दोनों ही एक दूसरे के सहयोगी तथा पूरक सहचर जीवनयात्री है। प्रत्येक एक दूसरे के परिपूरक हैं। न कोई छोटा है न कोई बड़ा। हां सच में एक के बिना दूसरा अधूरा है। दोनों को एक-दूसरे का सम्मान करना चाहिये और दोनों को मिलकर रहना चाहिये तभी उनकी शोभा है।

 © प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

 ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, म.प्र. भारत पिन ४६२०२३ मो ७०००३७५७९८ apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares