“सायंकाळी मी बेलसानी गावात शुषमाच्या घराचा पत्ता विचारत जावून पोचलो .आवाज देताच सुष्माने दार उघडले ती माझी वाट पहात होती हे जाणवले. खाट टाकून त्यावर चादर टाकत ती बसा सर असेम्हणत आत वडिलांना बोलव्यायला गेली ,तिचे आई वडील दोघेही बाहेर आले नमस्कार सर म्हणत जवळ येऊन उभे राहिले तेव्हड्यात पाण्याचा ग्लास घेऊन सुषमा आली.मी सुरुवात कुठून करावी या विचारात असतानाच ,तिचे वडील बोलायला लागले,बरे झाले सर तुम्ही आले ही पोरगी ऐकतच नाही जी शिकतोच म्हणते का करावं जी समजतं नाही गुरुजी.मी त्याला उलट विचारले ती शिकतो म्हणते तर शिकू द्या न अभ्यासात हुशार आहे ती. एक गंभीर उसासा टाकून नामदेव बोलायला लागला सर तुम्हाला आमची परिस्थिती नाही समजायची गुरुजी.ही पोरगी एका डोळ्याने आंधळी आहे .लहानपणी विटू दांडा खेळताना विटी इच्या डोळ्याला येवून लागली. गावच्या वैदान पानाचा रस टाकला डोयात डोळा पुरा पांढरा झाला सर टिक पडल्या वानि . आता मी गडी माणूस दुसऱ्याच्या शेतावर काम करणारा .इच्यासंग कोण लगीन करणार सर कोणी गडी माणूसच ना जी,जास्त शिकली तर कोण करण लगण भोकण्या पोरिसंग सांगाजी तुम्हीच काय करावं आम्ही. आता खरी समस्या माझ्या लक्षात आली होती.चहाचा कप हातात देत सुषमा अधिरपणे माझ्याकडे पहात होती.
मी चहाचे घोट घेत विचार करू लागलो कुठून सुरुवात करावी.मला त्यांची अगतिकता कळत होती पण सुषमाचे शिक्षण सुटु नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होत. सुषमाच्या आईच्या आवाजाने मी भानावर आलो ,गुरुजी शिकवाची इच्छा आहे जी आमची पण हीच्या डोळ्याचा प्रश्न आहे जी.दोन भाऊ लहान आहे त्याईच भी पहा लागणं नाजी. उद्या जास्त शिकणं त पोरगा भी जास्त शिकलेला लागणं जी कोणी मास्तर करण काजी मह्या पोरीसंग लगीन. मी विचारात पडलो. आव्हनडा गिळून मी बोलायला सुरवात केली मला वाटते तुम्ही तीच शिक्षण बंद न करता तिला पायावर उभी करावी म्हणजे ती तुमच्यावर भार होणार नाही. सुषमा दारा मागून माझ्याकडे पाहत होती.तिची माझ्याकडून अधिक अपेक्षा असावी हे मला जाणवत होते, पण अधिक काय बोलावे हे सुचेना .विचार करून विचारले शुषमाचा हा डोळा चांगला असता तर तुम्ही तिला शिकविले असते काय . नक्कीच….. दोघेही एका सूरात बोलले .मला एक दिशा मिळाल्यासारखे वाटले. सुषमाला खुणेनेच सांगितले चिंता करू नको करतो काही तरी.निरोप घेऊन निघालो.नामदेव कार पर्यंत पोहचवायला आला, म्हणाला सर पोरीसाठी करा काहीतरी, मी मान हलवून निघालो, घरी अलोतरी मन कुठे लागेना, सुषमाचे डोळे पुन्हा पुन्हा समोर येत होते. त्याच वर्षी मी जेसिज या सामाजिक संस्थेचाही अध्यक्ष होतो. एक नेत्रशस्त्रकिया शिबीर घेणार होतो वर्धेचे सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक डॉक्टर अधलखिया येणार होते. चेन्नयी ची अँपास्वामी कंपनी लेन्स प्रायोजित करणार होती.नकळत मी डॉक्टरांना फोन लावला सुषमाची केस सांगितली डॉक्टर म्हणाले प्रत्यक्षात पाहिल्यावरच सांगता येईल जर कार्निया सुरक्षित असेल तर बरेच काही करता येईल, मला एक आशेचा किरण सापडला.मनाशी खूणगाठ बांधून दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो सुषमा आली नव्हती.पुढे आठवडा भर आलीच नाही.मीच गेलो तिचा गावाला ठरवून टाकले शिक्षणाचे बोलायचे नाही.अपेक्षेप्रमाणे माझे थंड स्वागत झाले पाहून न पहात केल्यासारखे करून तिची आई म्हणाली गुरुजी येत नाही जी आतासुषमा कॉलेजात, तुम्ही त्यायाले काही मनू नका.
☆ जीवनरंग ☆ लघु कथा – मरवा … ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆
घरात ते दोघेच … आजी आणि आजोबा. बाल्कनीत गुलाब,मोगरा, अनंत ह्या बरोबरच तुळस आणि मरवा. अजून पर्यंत तरी ह्या बागेचे नुसतंच बाहेरून दर्शन. आजी – आजोबांची नुसती नजर ओळख… ती सुद्धा बाल्कनीत बसून चहा घेताना. हळूहळू जाता येता हात उंचावून चौकशी, मग बोलणं सुरु झालं. ओळख वाढली. एके दिवशी ऑफिस मधून घरी येता येता आजींनी घरात बोलावलं. बाल्कनीत बसून चहापान झालं.मंजिरींनी लगडलेल्या तुळशीच्या बाजूलाच असलेल्या कुंडीत हिरवा गार मरवा होता. मंद असा घमघमाट बाल्कनीत पसरला होता. आजोबा बोलते झाले … “ह्या मरव्याचं कसं असतं माहीत आहे कां?” माझी प्रश्नार्थक नजर बघून आजोबा हसले. म्हणाले, “ऐक… हा मरवा ना… नुसतं नावालाच झाड. ना फळं, ना फुलं. पण मंद का होईना सुगंध अप्रतिम.आपल्याकडे काहीही नसताना आपल्या अस्तित्वाने मात्र दुसऱ्यांना प्रसन्न करण्यात आपलं जगणं घालवणार.” हे सांगताना मात्र आजोबा एकदम खिन्न झाले…
घरा बाहेर पडत असताना माझी नजर एका फोटो कडे गेली.अपघातात गेलेल्या त्यांच्या मुलाचा फोटो होता. मी सुन्न. संसारवेलीवरचं उमललेलं फूल गळून पडलं होतं. मी घरातून बाहेर पडलो. डोक्यात विचार घेऊन…. आज काय होतं त्या वृद्ध दांपत्याकडे ..? मनाचं पंगुत्व? परावलंबित्व? की दैवाने दिलेली हतबलता? नाही.नक्कीच नाही. नशिबाचे फासे उलट पडलेले असताना समोरचा क्षण आपला मानून तो इतरांबरोबर साजरा करायचा आणि आपल्या स्वभावातल्या गोड सुगंधाने दुसऱ्यांना प्रेमळ पणे आपलंस करायचं. त्या कुंडीतल्या मरव्या सारखं. माझ्या घरात शिरताना सहज मागे वळून बघितलं…
कुंडीतला तो मरवा अजूनच हिरवाकंच दिसत होता. त्याचा तो मंद सुगंध त्या घरासोबत माझ्याही मनात दरवळत होता… माझ्या घरात शिरू पहात होता.
बाळराजा आणि भ्रातार याच्या पाठोपाठ, विपुल ओव्या सापडतात, त्या बंधुजीबद्दल लिहीलेल्या. बंधुजी कसा? तर गळ्यातला ताईत जसा. ताईत जसा अगदी जवळ गळ्याला लागून बांधलेला असतो, तसाच भाऊ मनाच्या अगदी जवळ, मनाला बिलगून असतो. ताईत, इडा-पीडा, आंनिष्टापासून रक्षण करतो, असा मानलं जातं, भाऊदेखील तसाच रक्षणकर्ता असणार, याची खात्री असते. म्हणूनच अशा ’ताईता बंधुराजाच्या प्रेमाच्या मायेच्या तिने खूप खूप ओव्या गायल्या आहेत. त्यातून त्याच्या रुबाबाचं, दिलदारपणाचं, त्याच्या कर्तृत्वाचं वर्णन केलय. ‘आटपाट नगराचा। भाऊ माझा ग राजा। टोलेजंग इमारत । भरजरी गाजावाजा।।‘ यात भावाच्या कर्तृत्वाचं आणि रुबाबाचं दोन्हीचं वर्णन आहे. त्याची टोलेजंगी इमारत आहे. गावात त्याचा ‘गाजावाजा’ आहे. काइतुक, आदर, कीर्ती असं सगळच त्या ‘गाजावाजा’ शब्दातून व्यक्त होतय. गाजावाजा तिला भरजरी वाटतो. म्हणजे नजर्दीपावणारा वाटतो. ‘भरजरी’ हाशब्द भावाची समृद्धी व्यक्त करण्यासाठीही आलेला असेल.
बहीण – भावाचं प्रेम कसं? तर ती म्हणते, सीताफळासारखं. ‘फोडील ग सीताफळ। आत साखरेची काया।।
बहिणीचा लग्न होतं. ती सासरी येते. साना-वाराला तिला माहेरी न्यायला भाऊ मुराळी येतो. बहीण मनोमणी हरखते. त्याचं आदरातिथ्य, त्याचा पाहुणचार किती करू आणि किती नको, असं तिला होऊन जातं. ‘पंचामृताचं जेवण।याला गुळाचं लेवण। असा जेव माझ्या बंधू । भाऊबीजेचं जेवण।। तो उशिरा आला, तिन्हीसांजेला आला, तरी त्याच्यासाठी काही करणं तिला जड जात नाही. अनारशासारखा किचकट वेळखाऊ पदार्थ करण्याचीही तिची तयारी आहे.
आपल्या भावाचा रुबाब राजासारखा आहे, हे सुचवताना ती म्हणते, बंधू पाहुणा आला तर,
‘सया ग म्हणती कोण राजा? राजा ग नव्हे त्यो ग बंधू माझा।।
आपला हा बंधू दिलदार असल्याचही ती सांगते. कसा? ‘काळी नि ग चंद्रकळा। एका धुण्यानं झाली गोळा।‘ तर ‘धाकल्या बंधुजीनं दिलं रुपये साडे सोळा।।’ असा मायेचा बंधुजी आणि माया का असणार नाही? अखेर ‘अशी ना बहीण भावंड । एकया झाडाची संतर ‘ च ती. एका झाडाची संत्री, एका झाडाची फुलं, फळं आशा तर्हेचं वर्णन ओव्यातून येतं.
अशा या राजस भावाला परदेशी सांभाळ असं ती सूर्यनारायणाला विनवते. ‘नारायण बाप्पा तुला सोन्याचं कमळ। भाई राजसाळा माझ्या परदेशी सांभाळ।।’ तसच ती आई लक्ष्मीला विनवते, ‘आई तू सोन्याच्या पावलांनी ये आणि माझ्या बंधूचा धरला पालव तू सोडू नको.’ भावाची भरभराट पाहून बहिणीला समाधान वाटतं. ‘ती म्हणते, ‘लक्ष्मीबाई आली पांगळया पायाची। बंधूला केली बोली नाही फ्रून जायाची।।
अशा या राजबिंडया भावाचं लग्नं होतं. लाडा -कोडाची भावजय घरात येते. शहाणी, समजुतदार नणंद म्हणते,
‘काई बंधुजी ग आपाइला। भावज का लोकाची कशी म्हणू। बचा नागाची ती ग पद्मीण।।‘
हा समजूतदारपणा दुही अंगी हवा पण भावजय हळू हळू आपले रंग दाखवू लागते. तरी पण सामोपचाराने घेत ती म्हणते, ‘आपुल्या सोन्यासाठी चिंधी करावी जतन।’ भाऊ सोन्यासारखा तर भावजय चिंधीसारखी. सोन्यासाठी तिला सांभाळायलाच हवीजुन्या काळात जुन्या फाटक्या कपड्यांच्या चिंध्या म्हणजे त्या काळातला बायकांचा लॉकरच. निगुतीनं त्यात सोनं बांधून ठेवायचं. त्यासाठी चिंधीही सांभाळून ठेवायचे. म्हणजेच भावासाठी भावजयीला ही मान द्यायचा. बहीण-भाऊ एका झाडाची संत्री खरी, पण भावजय आली आणि तिने अंतर पाडलं. ‘अशी साखरची पुडी। कशी मुंग्यांनी वेढीली। भावाला होती माया। भावजयीनं तोडली ।।
भावा-बहीणीतलं अंतर हळू हळू इतकं वाढत जातं की आता तो तिला माहेरीदेखील न्यायला येइनासा होतो. सणाला बाकीच्या माहेरी चालल्या आहेत. भाऊ मुराळी त्यांना घेऊन जातोय. आपल्या दारावरून आशा किती तरी गाड्या जाताहेत. आपल्या दाराशी मात्र गाडी थांबत नाही, याची खंत ती सूचकतेने व्यक्त करते.
बाईला कधी तरी माहेरी जावसं वाटतच. पण तिथे काय अनुभव येतो?
‘आई- बापाच्या ग राजामंदी। दुधा ग तुपाची केली न्याहारी। भाऊ नि भावजयच्या राजामंदी। शिळ्या ताकाची मला चोरी।।
आता दिवस बदलले आहेत. भाऊ वेगळा राहू लागलाय. ते पाहून तीदेखील कष्टी होते.
‘काई मावबिगळ्याच्या घरी। भाच्या बाळाची ग सवती खोली। काई ग धाकट्या बंधुजीनं। निम्म्या राज्याची केली बोली।।
हे सगळं भावजयीमुळे झालं, असंही तिला वाटत राहतं. अर्थात सगळ्याच जणी काही आशा घर मोडणार्या आणि माणसं तोडणार्या नसतात. अशा पद्मिनीचं गुणगानही ओव्यातून केलेलं आढळतं. सुंदर, तरुण, गुणी बाईसाठी पुष्कळदा ‘पद्मीनी’ असं अनेक ओव्यातून म्हंटलं गेलय.
कसंही झालं, तरी एक तरी भाऊ हवाच, असं बाईला आसासून वाटतं. एका अहिराणी ओवीत म्हंटलय,
‘दुबळा पाबळा बंधू बहिणीले असावा। पावलीनी चोळी एक रातना विसावा।‘ अगदी अशीच एक ओवी कोल्हापूरच्याकडे ऐकायला मिळाली.
‘काई बहिणीला भाऊ बाई। एक ग तरी असावा। काई चोळीचा एक खण। एक रातीचा ग विसावा।।
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘तिफण’ – श्री दयासागर बन्ने ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तकाचे नाव : तिफण
कवी : श्री दयासागर बन्ने
प्रकाशक : अक्षरवाड्मय प्रकाशन
मूल्य : रू 120/-
तिफण:भावभावनांची गुंफण
अनुभवांच्या विविधतेने नटलेले आणि विविध भावनांनी ओथंबलेले असे अनुभूतीचे पाचशेअकरा क्षण म्हणजे कविवर्य श्री दयासागर बन्ने यांचा ‘तिफण’ हा पाचशेअकरा हायकूंचा संग्रह.नुकताच वाचून झाला. त्यानिमीत्ताने…
शाळेत असताना पाठांतरासाठी अनेक श्लोक असत. दोन किंवा चार ओळींचे. नंतर आठवी ते अकरावी या वर्गात शिकताना संस्कृत भाषेतही दोन किंवा चार ओळींची सुभाषिते असत. हे श्लोक किंवा सुभाषिते त्यांच्या अर्थ पूर्णतेमुळे सहज पाठ होऊन जात. पुढे त्याचा अनेक ठिकाणी उपयोग ही झाला. त्याची आठवण यायचे कारण म्हणजे या ‘तिफणी’ तून बाहेर पडलेले हे टपोरे हायकू!
जपानी साहित्यातून आलेला हा काव्य प्रकार मराठीत रूढ केला तो ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांनी. त्यानंतर अनेक कवींना हायकू ने आकृष्ट केले. त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे श्री दयासागर बन्ने. आपल्या संग्रहात त्यांनी या काव्य प्रकाराविषयी
माहिती दिलीच आहे. शिवाय संग्रहाचे शेवटी ‘मराठी हायकूंची चौदाखडी’ या लेखात हायकूच्या रचनेचे तंत्र आणि गुपीत सर्वांसाठी उघडे केले आहे. ते सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल . या लेखात ते म्हणतात, “हायकूतून दृक्-श्राव्य-स्पर्श- गंध संवेदना येणे हे अनुभवांच्या गहिरेपणावर अवलंबून आहे.” या विधानाचा प्रत्यय ‘तिफण’ वाचल्यानंतर येतो.
या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हा काव्य प्रकार मूळचा जपानी भाषेतील. पण आपल्या मराठी भाषेत तो रूजवताना शिरीष पै यांच्याप्रमाणे श्री बन्ने यांनीही रचनेमध्ये काही बदल केले आहेत. जपानी भाषेत असलेले पाच सात पाच असे शब्द रचनेचे बंधन न पाळता, अर्थाच्या दृष्टीने आवश्यक तेवढे शब्द वापरले आहेत. त्यामुळे वाचकाला कविच्या भावना निःसंदिग्धपणे समजून येतात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विषयांचा सर्वस्पर्शीपणा! जपानी हायकू कारांप्रमाणे ते निसर्ग पुरते मर्यादित न ठेवता मानवी जीवनाच्या सर्व अंगांची नोंद घेतात. त्यात निसर्ग तर आहेच पण नात्यागोत्यापासून अगदी ग्लोबलायझेशनपर्यंत सर्व विषय हाताळले गेले आहेत.
काव्यसंग्रहाच्या ‘तिफण’ या नावाचा अर्थ स्पष्ट करणारे श्री विष्णू थोरे यांचे आकर्षक मुखपृष्ठ आणिअक्षरवाड्मय प्रकाशनच्याश्रीबाळासाहेब घोंगडे यांनी त्याचे आत्मियतेने केलेले प्रकाशन यामुळे समकालीन मराठी काव्यात मोलाची भर पडली आहे यात शंकाच नाही.
हा संग्रह त्यांनी लहान लहान चौदा विभागात आपल्या समोर ठेवला आहे. कविमनाचे,दुष्काळाचे, नात्यांचे, निसर्गाचे, असे विविध विषय हाताळले आहेत.यापैकी कोणत्याही विभागतील हायकू वाचल्यावर त्यांच्या भावनाशील मनाचे दर्शन होते.
नात्यांच्या हायकू इतकेच गावशिवाराचे हायकू मनातलं बोलून जातात. पाखरांचे आणि निसर्गाचे हायकू वाचताना नजर पुस्तकावर आणि मन खिडकीबाहेर असते. पावसाच्या हायकूत मन चिंब होते तर पडझडीचे हायकू डोळ्यातून पाणी काढतात.सर्वच विभागातील हायकू वाचनीय व स्मरणीय आहेत यात शंकाच नाही.
काव्यसंग्रहाविषयी लिहीताना कविच्या काव्यपंक्ती थोड्या प्रमाणात तरी वाचकाला वाचायला मिळाल्या पाहिजेत असे मला वाटते. त्याशिवाय कविप्रतिभेची लज्जत कशी चाखणार ? त्यामुळे मला इथे काही हायकू उद्धृत करावेसे वाटतात. पण गोंधळ असा होतो की नेमके कोणते तुमच्या समोर ठेवू? एक निवडला तर तो दुसरा का नको असे वाटते. कारण सगळेच चांगले वाटतात. मग ‘लकी ड्रॉ’ करावा लागतो.
काही हायकू नमुन्यादाखल :
कवी मेल्यावर पाऊस येतो
आयुष्यभर पेटला क्रांतीने
त्याला विझवू म्हणतो .
फुटले नाहीत
मेघांना पान्हे
पोरकी राने.
गालावरची खळी
मातीची का खुलली
पावसाची स्वारी आली.
झाडांना वाटतं पाखरांनी
फांद्यावर वसवावं गाव
त्यांची क्षितिजाकडे धाव.
आठवणींचे
साचून दवबिंदू
काळीज सिंधू.
टेबलाखाली
जुळून आले सूत
यंत्रणा भूत.
मेंदू गहाण पडला
जीभ अभिव्यक्तीची गळाली
पुरस्काराची रसद मिळाली.
असे किती सांगू? यावर उपाय एकच. संपूर्ण संग्रहाचे वाचन. अवघ्या तीन ओळींत बरच काही व्यक्त करणारा, सांगून जाणारा हा काव्य प्रकार आपल्या समोर आणल्या बद्द्ल श्री दयासागरजी बन्ने यांना धन्यवाद. त्यांच्या पुढील कसदार साहित्य शेती साठी त्यांना शुभेच्छा!
( ई-अभिव्यक्ति संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों / अलंकरणों से पुरस्कृत / अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक समसामयिक विषय पर विचारणीय रचना “हाशिए पर…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन ।
आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 54 – हाशिए पर…☆
एक दिन पहले मैंने सुझाव देते हुए सहयोग की अपील की और अगले ही दिन मुस्कुराते हुए कहा आप से बेहतर इसे कोई नहीं कर सकता अब इसे आप संभालें। जब डिब्बे में घुन का ही राज्य हो तो अनाज अपने आप ही पिस जायेगा। गेंहू के साथ घुन भी पिसता है,ये तो तब होगा जब गेंहू चक्की में पिसने हेतु जाए। पर यदि अनाजों में घुन लगा हो तो क्या होगा ?
आकर्षक रंग रोगन से युक्त डिब्बा है ही इतना सुंदर कि कोई ये देखता भी नहीं कि इसमें कीड़े तो नहीं पड़े हैं। बस सुंदरता पर मोहित हो भर दिया सारा अनाज, अब न तो रोते बन रहा है न हँसते। धीरे – धीरे बिना चक्की के सारा अनाज बुरादे में बदलता जा रहा है। वो कहते हैं न कि जो होता है, अच्छे के लिए होता है। सो सकारात्मक सोच लेकर बढ़ते रहो। जो लोग सचेत नहीं होंगे उनका नुकसान तो बनता ही है। जब कुछ मिटेगा तभी तो नए का सृजन होगा। नए का दौर चलते ही रहना चाहिए वैसे भी रुका हुआ जल, पुरानी सोच व एक ही व्यक्ति इन सबको समय के साथ बदलना तो चाहिए। बदलाव तो उन्नति का चिन्ह है।
सबको बदलते हुए व्यक्ति ये भूल जाता है कि आज नहीं तो कल वो भी समय के तराजू में तौला जाने वाला है। क्या करें समय और बाँट किसी के सगे नहीं होते। ये तो वही दिखाते हैं जितना असली वज़न होता है।अब व्यवहार का क्या है ? ये तो कभी असली कभी नकली मुखौटा पहन कर सबको धोखा देने में माहिर होता है। कई बार देखकर सब कुछ अनदेखा करना ही पड़ता है। शांति और सामंजस्य की कीमत चुकाना कोई आसान कार्य नहीं होता है इसके लिए तिल – तिल कर जलना होगा।
जलना और जलाना इन्हीं दो शास्त्रों पर तो पूरी दुनिया टिकी हुई है। बस कुछ न कुछ करते रहिए, क्योंकि खाली दिमाग शैतान का घर होता है। जब कर्म करेंगे तो कभी न कभी फल मिलेगा ही। हो सकता है सूद सहित मिले। वैसे भी गीता का गान तो यही कहता है कि फल की इच्छा न रखें। महँगाई और कीटनाशकों का प्रभाव फलों भी पड़ रहा है सो फलों को खाकर ताकत आयेगी ये कहना भी आसान नहीं है।
चक्कर पर चक्कर चलाते हुए वे सबको घनचक्कर बना रहे हैं और एक हम हैं जो पृथ्वी गोल है ये मानकर ही हर बार अपनी धुरी पर घूमते हुए जहाँ से चले थे वहीं पहुँच कर अपना पुनर्मूल्यांकन करते नजर आते हैं। और हर बार स्वयं से प्रण करते हैं कि इस बार चौगुनी तेजी से कुछ नया कर गुजरेंगे। बस इसी जद्दोजहद में उम्र तमाम हुई जा रही है। जब कदम बढ़ते हैं, तभी न जाने कहाँ से हाशिया आ जाता है और हम स्वयं को हाशिए पर खड़ा पाते हैं। पर क्या करें, हम तो ठहरे भगवतगीता के अनुयायी सो कृष्ण मार्ग पर चलते हुए आज नहीं तो कल चक्रव्यूह भेद कर ही दम लेंगे और विजयी भव के साथ अपना परचम फहराते हुए कुछ नया कर गुजरेंगे।
जैसे ही कोई नया कार्य शुरू हुआ कि झट से कोई न कोई शिकारी बाज की तरह टपक पड़ता है, अब कार्य पर ध्यान दें या शिकारियों पर। खैर वही घिसा पिटा राग अलापते हुए उसी दौड़ में फिर से शामिल हो गए। जोड़- तोड़ में तो उनकी मास्टरी है। जहाँ उनको स्नेह से बुलाया नहीं कि सारी योजना चौपट, फिर वही अपना रंग फैलाते हुए हर समय सबको अपने रंग में रंगने की अचूक कोशिश करने लगते हैं। यहाँ भी वही पृथ्वी गोल है का किस्सा, जिन नीतियों को कोई पसंद नहीं करता है, उसे फिर से चलाने लगे। अब क्या किया जाए चुपचाप देखते रहो क्योंकि जैसे ही सक्रियता बढ़ाई, सबके चहेते बनने की कोशिशें की, तभी पुनः हाशिए पर धकेलने हेतु कोई न कोई नयी योजना द्वार पर दस्तक देते हुए कह उठेगी आप लोग जागरूक बन कर चिंतन करें। स्वयं के साथ- साथ सबको जगाएँ।
कितना भी प्रयास करो हाशिए पर आना ही होगा,ये बात अलग है कि यदि पूरी ताकत से कोशिश की जाए तो हाशिए पर आप की जगह आपको हाशिए पर पहुँचाने वाला हो सकता है।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
☆ THE LITTLE BOOK OF HAPPINESS: Simple ways to Beautify your Life – By Jagat Singh Bisht ☆
I am happy to share with the readers and writers of e-abhivyakti that I have published a book THE LITTLE BOOK OF HAPPINESS: Simple ways to Beautify your Lifeon Amazon.
About the book:
This book is about simple ways to beautify your life.
You can create your own happiness. It is hassle-free and you can do it yourself.
This book describes activities derived from the modern science of happiness as well as ancient spirituality, based on years of study and practical sessions with people.
You will learn about flow, work-happiness, mindfulness, laughter meditation, and happiness activities. There are beautiful parables and inspirational quotes inside.
You can experience new joy and freedom on reading the book.
Preview of the book:
This is a free preview of the book. Just click on the link, then the book cover, and flip through the pages. You can read from the pages of the book:
भवन निर्माण कार्य जोर-शोर से चल रहा था। सुगिया वहा ईंट-गारा ढोनेके काम में लगी थी। हमेशा की तरह काम पूरा होने के बाद मुकादम के सामने पैसे लेने के लिए खड़ी थी। हिसाब देते हुए मुकादम ने एकबारगी उसका हाथ थाम लिया और बोला, ‘कितना नरम मुलायम है ये तेरा हाथ, एकदम मक्खन जैसा। ईंट-गारा ढोने के बावजूद भी कितना नाजुक…. चल मेरे साथ…सुगिया उसकी बदतमीजी सह न सकी। उसकी बात खतम होने से पहले ही उस के पंजे से हाथ छुड़ाकर वह घर की ओर दौड़ पड़ी।
झुग्गी में पहुँची तो मर्द को उसकी राह ताकते पाया। बिना दारू के उसका गला सूख रहा था। उस ने रोते हुए सारी घटना अपने मर्द से कह सुनायी। फिर … फिर क्या? वो तो बरस ही पड़ा उसके ऊपर। झापड, लात, घूसें… चप्पल लेकर भी पीटता रहा वो और बड़बड़ाता रहा, ‘हाथ पकडा तो क्या हुआ? क्या लूट गया? बडी आयी पतिव्रता।‘
उस दिन झुग्गी में बर्तन भूखे… पतीली, थाली भूखी… बच्चे भूखे… वो और पति भी भूखे…
दूसरे दिन सुगिया काम पर गई। आज रोजी लेते वक्त उसने स्वयं ही मुकादम का हाथ थाम लिया। चार दिन का पैसा कमर के बटुए में खोस लिया। मुकादम उसे बिल्डिंग के अधूरे हिस्से में ले गया, जो बिल्कुल वीरान था।
सुगिया घर लौटकर अपने बिस्तर पर लेटी। आज भी झुग्गी में बर्तन भूखे… पतीली, थाली, भूखी… बच्चे भूखे… वो और पति भी भूखे… बिस्तर पर लेटी हुई वो सोचने लगी, दोनों में क्या सहनीय? शराबी पति से मार खाना? या फिर मुकादम का बोझ उठाना, जो उसे नोच- नोच कर खाना चाहता है