श्री आशिष  बिवलकर

? मनमंजुषेतून ?

☆ “सैतानी क्रौर्य —” ☆ श्री संभाजी बबन गायके 

नमस्कार,

‘ द केरला स्टोरी ‘ हा बहुचर्चित सिनेमा बघितला. धर्मांध झालेली  माणसे पशुपेक्षा किती क्रूर वागतात  हे पाहून मनाचा  थरकाप उडाला.  काफिरांच्या  मुलींना पद्धतशीरपणे  ट्रॅप करून  त्यांचे योनशोषण करणे, त्यांना हिंदू धर्माचा  तिरस्कार करायला लावणे, प्रेग्नेंट करून त्यांना धर्मांतर करायला लावणे, धर्माचे  युद्ध खेळणारे सैनिक म्हणून सिरीयात  पाठवणे, माणसांच्या  रूपातील हैवानांच्या लैंगिक वासना  भागवण्यासाठी मुलींना गुलाम ( sex slave) करणे, वापरून झाल्यावर निर्दयीपणे  हत्या करणे.. एकापेक्षा एक भयानक  वास्तव त्यात दाखवले  आहे.

मला  जुळ्या मुली आहेत, आई  वडील  म्हणून त्यांना चांगले  संस्कार देण्याचं आमचं  कर्तव्य डोळ्यात तेल घालून  आम्ही पार पाडत  असतो. पण  हा सिनेमा बघितल्यावर शांतीधर्मीय मुलांच्यापेक्षा त्यांच्या मुलींची  भीती  जास्त वाटू  लागली आहे. या सिनेमात असिफा  नावाची  मुलगी एजंट  बनून कसं  पद्धतशीरपणे  तिच्या रूममेटचे  ब्रेनवॉश करत  असते हे दाखवलं आहे. जर एखादी असिफा आपल्या मुलींची  मैत्रीण झाली तर .. या विचाराने झोप उडाली  आहे.

हा चित्रपट मनोरंजन म्हूणन नका  बघू, आपल्या डोळ्यात अंजन  टाकण्याचं  काम  या सिनेमाने केले आहे. कोणत्याही प्रकारचा  तेढ  निर्माण व्हावा हा मुळीच  हेतू नाही.

मी तर म्हणतो शांतीधर्मिय मुलींनी पण हा सिनेमा बघावा. अरब  देशांच्या मानाने हिंदुस्थानमध्ये स्त्री किती सुरक्षित आहे हे त्यांना कळेल.

द केरला  स्टोरी पाहून  सुचलेले पुढील काव्य आपण  वाचावे  आणि आपल्या मित्र मंडळीना फॉरवर्ड.. शेअर  करावे…

 द केरला स्टोरी

तुमच्या आमच्या  वेलीवर,

उमलणारी सुंदर कळी !

लव्ह जिहादच्या विखराला,

पडतेय नकळत बळी !

 

घरातल्या ओसरीवर,

मुक्त बागडणारी ती चिमणी !

भुर्रर्रकन कुणा संगे उडून जाई,

शिक्षा ठरावी ती जीवघेणी !

 

एखादे नासके फळ ,

संपूर्ण पेटीच  नासवते !

एखादी असिफाची संगत,

तुमच्या मुलींना फसवते !

 

आंधळ्या जिहादी प्रेमासाठी,

कुठल्याही थराला जाऊन झुकते !

गतप्राण झालेल्या बापाला,

काफीर म्हणत तोंडावर थुकते !

 

भाबड्या मुलींच्यासाठी,

प्रेमाचे  जाळे  विणले जाते !

जातीनुसार पटवणाऱ्याला,

इनामाची बोली मात्र मिळते !

 

त्या बनतात मुलं काढायचं यंत्र,

नंतर दिला जातो काडीमोड !

उशीर झालेला  असतोच तिला,

आयुष्यभराची मोडते खोड !

 

कुणी फसते इसिसच्या जाळ्यात,

पाठवली जाते तिला सिरीयात !

वासनाधुंद लांडगे लचके तोडती,

आयुष्य होऊन जाते तिचे बरबाद !

 

हजारो कोवळ्या कळ्या,

कुस्करल्या गेल्यात आजवर !

पस्तीस तुकडे बघितले तरी,

अक्कल कशी न येई ठिकाणावर !

 

द केरला स्टोरी

आहे धकधकते वास्तव !

तुम्हा आमच्या पदरातला,

दाखवणारा विस्तव !

 

तरुण मुलींनी तर बघाच,

त्यांच्या पालकांनी ही बघावा !

राष्ट्रापुढचा भविष्यातला धोका,

आजच पाहून तो ओळखावा !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments