श्री अशोक श्रीपाद भांबुरे
*पान*
(प्रस्तुत है श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की  एक भावप्रवण कविता।)

 

भाव होते प्रेम होते टाळले का मी तरी ?

गाव माझ्या अंतरीचे जाळले का मी तरी ?

 

वाट माझ्या भावनांची मीच होती रोखली

आसवांचे चारमोती गाळले का मी तरी ?

 

माय-बापाची प्रतिष्ठा थोर तेव्हा वाटली

त्याच खोट्या इभ्रतीला भाळले का मी तरी

 

प्रेम का नाकारले मी ते कळेना आजही

शब्द साधे एवढे ते पाळले का मी तरी ?

 

प्रीतिच्या ग्रंथात माझे नाव नव्हते नेमके

पान माझ्या जिंदगीचे चाळले का मी तरी ?

 

अशोक भांबुरे, धनकवडी, पुणे.

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

[email protected]

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Sujata Kale

खूप सुंदर कविता… संवेदनशील ….