मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 221 ☆ व्यासंग… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा: ।

यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ।।११।।

*

वेदज्ञानी म्हणती ज्या परमपदा अविनाशी

प्रवेशती ज्यात यत्नशील महात्मा सन्यासी

आचरती ब्रह्मचर्य इच्छुक ज्या परमपदाचे

कथन करितो तुज श्रेष्ठत्व त्याचि परमपदाचे ॥११॥

*

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।

मूर्ध्न्याधायात्मन: प्राणमास्थितो योगधारणाम् ।।१२।।

*

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् ।

य: प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ।।१३।।

*

सर्वद्वारांना संयमित करुन हृदयात मना स्थिरावून

जित मनाने योग धारणे प्राणा मस्तकात स्थापून

ॐकाररूपी एक अक्षरी ब्रह्म करुनिया उच्चारण

देहासी त्यागता  परम गती  आत्म्यासी प्राप्त प्रसन्न  ॥१२,१३॥

*

अनन्यचेता: सततं यो मां स्मरति नित्यश: ।

तस्याहं सुलभ: पार्थ नित्ययुक्तस्य योगिन: ।।१४।।

*

अनन्य चित्ते स्थिर मज ठायी स्मरण माझे सतत  

एकरूप त्या योग्याला होतो मी सुलभ  प्राप्त ॥१४॥

*

मामुपेत्य पुनर्जन्म दु:खालयमशाश्वतम् ।

नाप्नुवन्ति महात्मान: संसिद्धिं परमां गता: ।।१५।।

*

अशा महात्म्या पुनरपि नाही पुनर्जन्म गती

दुःखाने भरलेल्या देहाची पुनश्च नाही प्राप्ती ॥१५॥

*

आब्रह्मभुवनाल्लोका: पुनरावर्तिनोऽर्जुन ।

मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ।।१६।।

*

आब्रह्मलोक समस्त असती पुनरावर्ती अर्जुन 

ष्राप्ती कोण्या लोकाची तरीही त्यांना पुनर्जन्म 

मी असल्याने कालातीत प्राप्ती माझी थोर

त्यानंतर मग कोणलाही नसतो पुनर्जन्म घोर ॥१६॥

*

सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदु: ।

रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जना: ।।१७।।

*

सहस्रयुगे कालावधी एक विरंचीदिनाचा

तितकाच काळ प्रजापतीच्या एका निशेचा

योग्याला ज्या झाले याचे आकलन ज्ञान 

कालतत्व ते पूर्ण जाणती ज्ञानी योगीजन ॥१७॥

*

अव्यक्ताद्व्यक्तय: सर्वा: प्रभवन्त्यहरागमे ।

रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ।।१८।।

*

ब्रह्मदेव दिन उजाडता होते उत्पन्न 

समस्त जीवसृष्टी अव्यक्तापासुन

रात्र होता प्रजापतीची भूतसृष्टी विरुन

अव्यक्तातच पुनरपि जाते होऊन लीन ॥१८॥

*

भूतग्राम: स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।

रात्र्यागमेऽवश: पार्थ प्रभवत्यहरागमे ।।१९।।

*

प्रकृतीच्या वश असतो जीव समुदाय

दिवसा होई उत्पन्न रात्रीस पावतो लय ॥१९॥

*

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातन: ।

य: स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ।।२०।।

*

अव्यक्ताच्या या अतीत सनातन भाव अव्यक्त 

सर्वभूत जरी नष्ट जाहले दिव्य षुरुष तो अनंत ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक आनंद दिवस आणि बालकवींची पुण्यतिथी… – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

जागतिक आनंद दिवस आणि बालकवींची पुण्यतिथी… – लेखक : श्री श्रीकांत उमरीकर ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

५ मे १९१८ ची गोष्ट आहे. अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरूण आपल्या धुंदीत चालला होता. जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणार्‍या छोट्या पायवाटेने निघाला. दोन रूळ एकत्र येवून पुढे जाणार्‍या ठिकाणी तो उभा होता. तेवढ्यात त्याला मालगाडीची शिट्टी एैकू आली. ही गाडी दुसर्‍या रूळावरून जाईन असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रूळावर आली. घाईघाईत रूळ ओलांडताना त्याची चप्पल तारेत अडकली. ती सोडवण्यासाठी तो खाली झुकला. तोपर्यंत मालगाडी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून निघून गेली. 

एरव्ही ही घटना पोलीसांच्या नोंदीत अपघात म्हणून जमा झाली असती. पण हा तरूण म्हणजे कोणी सामान्य इसम नव्हता. मराठी कवितेत ‘बालकवी’ म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही गोष्ट आहे. जळगांव जिल्ह्यातील भादली या रेल्वेस्टेशनवर हा अपघात घडला. किती जणांना आठवण आहे या कवीची?

जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस आजच म्हणजे ५ मे रोजी आहे. 

आनंदी आनंद गडे

इकडे तिकडे चोहिकडे

वरती खाली मोद भरे

वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला

दिशांत फिरला

जगांत उरला

मोद विहरतो चोहिकडे

आनंदी आनंद गडे !

अशी सुंदर आनंदावरची कविता लिहीली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणार्‍यांना होणार नाही. आनंदाचे तत्त्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहीणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे

स्वार्थाच्या बाजारात

किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो

सोडुनी तो स्वार्था जातो

द्वेष संपला  

मत्सर गेला  

आता उरला

इकडे तिकडे चोहिकडे

आनंदी आनंद गडे

बालकवींचा जन्म १३ ऑगस्ट १८९०  रोजी धरणगाव (जि. जळगांव) इथे झाला. केवळ २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणार्‍या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारूड करून ठेवले आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी 

हिरवळ दाटे चोहीकडे, 

क्षणात येती सरसर शिरवे 

क्षणात फिरूनी उन पडे 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालीचे 

हरित तृणाच्या मखमालीचे 

त्या सुंदर मखमालीवरती 

फुलराणीही खेळत होती

या सारखी गोड रचना असो. आपल्या साध्या सुंदर शब्दकळेने बालकवी वाचकाच्या मनात घर करून राहतात. अशा सुंदर साध्या गोड कविता लिहीणार्‍याला आपण विसरून जातो. त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आमच्या लक्षातही राहत नाहीत. गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात. तेंव्हा ज्यांची जन्मशताब्दि होवून गेली आहे अशा मराठी कविंवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही? एक साहित्य संमेलन केवळ शताब्दि साहित्य संमेलन म्हणून नाही का साजरे करता येणार? केशवसुत, बालकवी पासून ते कुसूमाग्रज, मर्ढेकर, अनिल, इंदिरा संत, ना.घ.देशपांडे, बा.भ.बोरकर, वा.रा.कांत, ग.ल.ठोकळ, ग.ह.पाटील अशी कितीतरी नावे आहेत. शंभरी पार केल्यावरही टिकून राहणार्‍यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे.

या जून्या कविंची आठवण का काढायची? कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे. पण जर जूनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी रहात नाही. बा.भ.बोरकर लिहून जातात

तू नसताना या जागेवर 

चिमणी देखील नच फिरके

कसे अचानक झाले मजला 

जग सगळे परके परके

आणि पन्नास साठ वर्षे उलटल्यावर संदिप खरे सारखा आजचा कवी लिहीतो

नसतेच घरी तू जेंव्हा 

जीव तुटका तुटका होतो

जगण्याचे तुटती धागे 

संसार फाटका होतो

आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जूने कवी वाचावे लागतात. त्यांची कविता समजून घ्यावी लागते. जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही? आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचेच नुकसान होते.

आजकाला सर्वच गोष्टींना जातीचा रंग चढवला जातो. मग बालकवी म्हणजे त्यांची जात कोणती? त्याचा काय फायदा आहे? त्याप्रमाणे त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करायची की नाही ते ठरते. कुठलाही खरा प्रतिभावंत नेहमीच जातीपाती, देश, काळ याच्या सीमा ओलांडून आपली निर्मिती करत असतो. 

बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे. त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे  त्यांचे स्नेही आप्पा सोनाळकर पोत्यात भरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वहात होते. बालकवींच्या सदर्‍याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे. बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे

घड्याळांतला चिमणा काटा

टिक_ टिक् बोलत गोल फिरे

हे धडपडते काळिज उडते

विचित्र चंचल चक्र खरे!

घड्याळातला चिमणा काटा

त्याच घरावर पुन्हा पुन्हा

किति हौसेने उडत चालला

स्वल्प खिन्नता नसे मना!

काळावर इतकी सुंदर कविता लिहीणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत, नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा?

शंभर वर्षांपूर्वी होवून गेलेला हा कवि आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्यापुढे कवितेत ठेवून गेला आहे. त्याच्या डोळ्यापुढचे त्याच्या स्वप्नातले जग कसे होते?

सूर्यकिरण सोनेरी हे 

कौमुदि ही हंसते आहे

खुलली संध्या प्रेमाने

आनंदे गाते गाणे

मेघ रंगले

चित्त दंगले

गान स्फुरले

इकडे तिकडे चोहिंकडे 

आनंदी आनंद गडे !

बालकवींना १०६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

लेखक : श्रीकांत उमरीकर

जनशक्ती वाचक चळवळ, छत्रपती संभाजीनगर

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊलखुणा ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊलखुणा 😔 श्री सुहास सोहोनी ☆

आताच म्हनं त्यो युन ग्येला

म्या तर बा झुपलोच हुतो

आला कंदी नि ग्येला कंदी

मुटकुळं घालून निपचित हुतो

*

थबकल्याली पावलं त्याची

आवाज त्यांचो येनार कसा

समद्यांना भेटून बोलून ग्येला

म्या तं झोपलो मुडदा जसा

*

सावत्याभाऊच्या शेतात म्हनं

त्यानं बक्कळ पाऊस पाडला

माज्या आंगनांत चार थेंब

शिंपडाया मातुर इसरुन ग्येला

*

तुक्या नाम्या हासत ख्येळत

पार लांब दिसले गेले

टाळी देत गप्पा हानत

द्रिष्टीच्याही पल्याड गेले

*

बहिना, मुक्ता, सखू, जनाई

ओवी आभांग म्हनत गेल्या

जाता जाता भान इसरुन

झिम्मा फुगड्या घालून ऱ्हायल्या

*

म्या तं बा कप्पाय करंटा

ऐन वख्ताला झोपुन ऱ्हायलो

भाकर तुकडा समद्यांस्नी गावला

म्या तं पापी उपाशीच ऱ्हायलो

*

सोतावरतीच रुसलो चिडलो

डोल्यात पानी भरून रडलो

डोले टिपता आयन्यांत पाह्यलं

नि तीन ताड उडुन राह्यलो

*

इस्वासच बसेना आसं झालं

कुनि तरि यून ग्येलं हुतं

कपायावं माज्या आबिर बुक्का

नि गुलालाचं बोट टेकलं हुतं

*

मंजिरिंचा हार गल्यातं दिसला

नि खिशात फुटान्यांची पुडी

ह्या खरां कां सपान कललंच न्हाई

पन् हातांची मातर जमली जुडी

*

आशीच नाती ऱ्हाउंद्या द्येवा

आवती भोवती फिरत ऱ्हावा

किरपा तुमची हाय याची

चिन्हा मातर दावित जावा

☘️

© सुहास सोहोनी

दि. ३०-४-२०२४

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रुबाया… ☆ प्रेमकवी दयानंद ☆

प्रेमकवी दयानंद

? कवितेचा उत्सव ?

☆ रुबाया ☆ प्रेमकवी दयानंद

अजून ऐकू येते

कृष्णाची बासरी

त्या मधुर सुरांची जादू

मन गेले, यमुनातिरी….

*

मंदिराच्या बाहेर

काही बसलेत भिकारी

मी आत,मागणारा

तसेच सारे भोवताली…

*

जवळ नाही कोणी

माझा रिकामा खिसा

सारे आहेत, पण दूर दूर

नाही कोवावर भरोसा….

*

आता कुठे ऋतुचे आगमन

जरा सावकाश उमला

फुलांनो नका करु घाई

फार उशीर नाही जाहला…

*

हे विद्वानांचे पुणे

आता फक्त गर्दीचे

इथे, खूपच वेगवेगळे

रंग-ढंग,प्रदूषणांचे….

*

इथे रोजच भरते

विद्वानांची जत्रा

होते,परंपरेची पूजा

आहे, प्रत्येकजण भित्रा…

*

प्लॕस्टीकची फुले

त्यांचा सुगंध कसा येणार

कागदी पाखरे शोभेची

आकाशी कशी भरारी घेणार..

*

तो अलिकडेच येवून गेला

बुद्ध,महावीर,येशू रुपात

आता नाही येणार

गेला प्रत्येक वेळी निराश होऊन…

*

पुण्याजवळ आळंदी

तेथे समाधी योगियाची

अधुन-मधून गर्दी असते

मिरविणा-या भाविकांची…

*

सारी माणसे

चांगलीच असतात

स्वार्थासाठी काहीजण

कपट, कारस्थानं करतात…

© प्रेमकवी दयानंद

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गोड गोडुला ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गोड गोडुला श्री प्रमोद वामन वर्तक ☆

जागतिक पुस्तकदिनाच्या शुभेच्छा !

न कळत्या वयामधे 

धरून पुस्तक हाती

मन लावून शोधतो

जणू जगाची उत्पत्ती

*

पाहून ही एकाग्रता

चक्रावली मम मती

वाचाल तर वाचाल

हे त्रिवार सत्य अंती

*

आदर्श गोड गोडुल्याचा

सगळ्यांनी तो घ्यावा

चांगल्या पुस्तकात मिळे

तुम्हां ज्ञानामृताचा ठेवा

तुम्हां ज्ञानामृताचा ठेवा

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 229 ☆ मृदगंध ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 229 ?

☆ मृदगंध ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 पुढच्याच महिन्यात पाऊस येईल,

मृगाचा!

जून मधला पाऊस मला खरा वाटतो,

तुझ्यासारखा!

दरवर्षी नवा !

— कोऱ्या पाठ्यपुस्तकांसारखा!!

त्या कोऱ्या पुस्तकांचा वास

आणि मृदगंध!

कुठल्याही सुवासिक फुलाला किंवा

महागड्या अत्तरालाही,

नाहीच त्याची सर !

 

नेमेचि येतो…..म्हणण्या सारखा,

नाही राहिला पाऊस!

तो ही आता बेभरवशाचा!

 

पण आठवणी नेहमीच

असतात भरोश्याच्या…शाश्वत!

मला जून मधला पाऊस,

जुन्या आठवणींच्या गावात घेऊन जातो !

ती शाळा..भिजलेली वाट…

वर्ग…खिडकी ..पाऊसधारा!

 

आपलं गाव दुष्काळी,

पण पाऊस नेहमीच असतो,

सुजलाम सुफलाम!

  वैशाख वणव्यात तापलेल्या

धरणीला तृप्त करताना,

दरवळणारा मृदगंध—

थेट प्राणात जाऊन पोहचलेला,

 

आणि सखे तू ही तशीच !

 

 म्हणायचीस,

“जिवंतपणी तर मी तुला विसरूच शकत नाही पण,

मेल्यानंतरही तुझी आठवण,

माझ्या आत्म्याबरोबर असेल”

आणि

तू  अकालीच निघून गेलीस….

पण थेट प्राणात रुतून बसली

आहेस—-

 

पाऊस कसाही मोसमी- बेमोसमी,

 

तू मात्र शाळेत असल्यापासून,

श्वासात भरून घेतलेल्या,

मृदगंधासारखी !!!

© प्रभा सोनवणे

४  मे २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिस्त… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ शिस्त… ☆ सौ. गौरी गाडेकर

अब्जावधी प्रकाशवर्षं व्यापून राहिलेल्या

अफाट विश्वाती ल

अनंत अवकाशातील

अगणित आकाशगंगा

त्यातले असंख्य ग्रहतारे

अनादी कालापासून

भ्रमण चाललंय त्यांचं

आपापल्या कक्षेत

आपापल्या गतीने

एका शिस्तीत

विज्ञानाधिष्ठित नियमांत.

म्हणूनच तर शक्य झाला ना

श्रीरामाच्या भाळावरचा सूर्यतिलक अचूक वेळेला.

ग्रहणं, वेध…. सर्व काही

नियमांत बांधलेलं

गणिताने अचूकरीत्या

वर्तवता येणारं

 

निसर्गचक्रही फिरत असतं शिस्तवार

सागर, नद्या, डोंगर

सगळेच निसर्गाच्या नियमानुसार

 

प्राणी, पक्षी, झाडं, वनस्पती

जलचर, भूचर, उभयचर

सगळ्यांचीच जीवनचक्रं,

विणीचे, पुनरुत्पादनाचे मोसम विज्ञानाधिष्ठित

गणिती धारणांनी आखीवरेखीव

म्हणून तर

करोडो कोसांचे अंतर

पार करून

स्थलांतर करणारे पक्षी

पोचतात योग्य वेळी

योग्य ठिकाणी

 

सर्व शिस्तबद्ध

निसर्ग नियमांनुसार

 

याला अपवाद एकच

निसर्गाचा लाडका पुत्र: मानव

नव्हे,

लाडावलेलं, बिघडलेलं कार्टं :माणूस

सगळे नियम, सगळी शिस्त

धाब्यावर बसवून

निवळ आपल्या स्वार्थासाठी

वागतोय मनःपूत, बेशिस्त

 

आणि त्यामुळेच

शिस्तशीर वागणाऱ्या

निसर्गाचाही

ढळलाय तोल.

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ 05… जागतिक हास्य-दिन !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

05… जागतिक हास्य-दिन !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

या जगात दुसऱ्याला सहज देता येणारी एकच गोष्ट असेल, ती म्हणजे हास्य!! 

बाळाचे निरागस हास्य सर्वात आनंददायी असते.

‘हास्या’ला तसे ‘मूल्य’ नाही कारण ते ‘अमूल्य’ आहे.

या जगात प्रवेश करताना ‘रडणारा’ मनुष्य जर ‘हसतमुखाने’ मेला तर तो ‘खरा’ जगला असे म्हणता येईल.

रडायला कोणीतरी मायेचे लागते, पण हसायला मात्र अनोळखी मनुष्यही चालतो

रडण्यासाठी मनुष्याला ‘कारण’ लागते पण हसण्यासाठी कारण लागतेच असे नाही.

 रडण्याच्या बदल्यात काय मिळेल ते सांगता येईलच असे नाही, परंतु हास्याच्या बदल्यात हास्य मिळण्याची शक्यता जास्त असते.

चेहऱ्यावरील ‘स्मितहास्य’ तुमच्या चेहऱ्याचे ‘मूल्य’ वाढविते.

म्हणून हसा आणि लठ्ठ व्हा !!

ती हसली, मनापासून हसली आणि भोवताली दाटत असलेल्या छाया क्षणार्धात अदृश्य झाल्या.

पूर्वी लिहिलेली एक कविता इथे देत आहे…

*

हास्यातूनी पाझरे तुझ्या टिपुराचे चांदणे

मनास मुग्ध करी तुझे रूप हे लोभसवाणे

*

हास्यातुनी तुझ्या प्रगटती आरस्पानी दवबिंदू

श्रावणात जशा बरसती जलधार, जलसिंधू

*

हास्यातुनी तुझ्या गवसे मातृहृदयी निर्मळ मन

तव हास्यधारांच्या संगे सांत होई व्याकुळ मन

*

सदैव मुखी स्मितहास्य विलसावे कान्ह्यासारखे

विहरत राहावे गगनी परी तटस्थ कृष्णासारखे

*

दिवसभरात किमान एक तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर ‘हास्य’ आणायचा संकल्प आजच्या शुभदिनी करावा.

जागतिक हास्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #236 ☆ फूलपाखरू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 236 ?

फूलपाखरू ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कळते मजला परि ना वळते

दुःख स्वतःचे स्वतःच गिळते

जेव्हा करते हरिचा धावा

जिवाशिवाशी नाते जुळते

*

शेण मातिने घर सारवले

पोतेऱ्याने ते आवरले

घरात नाही कचरा काडी

तरी कशाने मन हे मळते

*

चरण शृंखला नव्हते तोडे

जगता जगता झिजले जोडे

गोल भिंगरी या पायांना

मृत्यु पासून दूरच पळते

*

हळूच गेली दूर सावली

वाटत होती माय माऊली

मधुर सुखाचा काळ संपता

शीतल छाया कोठे मिळते

*

कायम कष्टी असतो मानव

जीवन वाटे त्याला बेचव

फुलाफुलांवर फूलपाखरू

मजेत उडताना आढळते

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print