मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #178 ☆ भावनांचा रंग… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 178 ?

भावनांचा रंग… ☆

भावनांचा रंग आहे वेगळा

ओठ माझा त्यास वाटे जांभळा

 

डाग नाही एकही अंगावरी

टाकुनी तो रंग झाला मोकळा

 

काय सांगू मी घरी सांगा मला

खंत नाही त्यास तो तर बावळा

 

पेटते होळी तशी देहातही

साजरा दोघे करूया सोहळा

 

धूळ माती फासली अंगास तू

रंग गोरा जाहला बघ सावळा

 

आग आकाशात होती पोचली

पाहिलेला सोहळा मी आगळा

 

शांत झाली आग आहे कालची

लाकडांचा फक्त दिसतो सापळा

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होळी… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ होळी… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

आपण भारतीय लोक उत्सव प्रेमी लोक. भारत संस्कृती प्रधान देश. कृषी प्रधान देश. आपल्या संस्कृतीत सणांना खूपच महत्त्व आहे. सर्व सण हे पर्यावरणावर आधारित असेच आहेत. फाल्गुन हा मराठी वर्षाचा शेवटचा महिना. शेतकऱ्यांचा थोडा निवांतपणाचा काळ. सृष्टीमध्ये नवनवीन रंग घेऊन येणाऱ्या, वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत आणि थंडीला निरोप असा हा सण  म्हणजे होळी.

हा सण फाल्गुनी पौर्णिमेला साजरा केला जातो. काही ठिकाणी तो दोन दिवस , तीन दिवस तसेच पाच दिवसही साजरा करतात. पौर्णिमेच्या दिवशी ‘ होळी ‘ दुसरे दिवशी धुळवड, आणि पाचवे दिवशी रंगपंचमी असा साजरा करण्याची प्रथा आहे. ‘होलीका ‘  या नावावरून ‘,होळी’ हे नाव या सणाला पडले आहे .आपल्या देशाच्या उत्तर भागात ‘ होरी ‘ किंवा  ‘दोलायात्रा ‘असेही म्हणतात. गोवा, महाराष्ट्रात कोकणात ‘ शिमगा ‘ ‘हुताशनी ‘ ‘होलिका दहन ‘ ‘ फाल्गुनोत्सव ‘ वसंतोत्सव  तसेच दक्षिणेत काम दहन असेही म्हणतात.

पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाणले होते .त्यानंतर त्यांनी रंग रूपाने पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे हाही या उत्सवा मागील हेतू आहे. आणखीही अशी कथा सांगितली जाते की ,लहान मुलांना  पीडा देणाऱ्या ‘ होलिका ‘, किंवा  ‘होलाका ‘   ‘ढुंढा’, ‘ पूतना,’ यासारख्या राक्षसींच्या प्रतिकांचे होळी पेटवून दहन केले जाते.

त्याचबरोबर आणखीही अशी कथा सांगतात की ,हिरण्यकश्यपू या अहंकारी राजाचा प्रल्हाद हा मुलगा नारायणाचा भक्त होता. राजाला नारायणाचे नाव घेतलेले पसंत नव्हते. अनेक प्रकारे तो प्रल्हादाला घाबरवत होता. जेणेकरून त्याने नारायणाची भक्ती सोडून द्यावी .राजाने आपली बहीण ‘होलीका ‘ हिच्याकरवी एक योजना आखली. ‘ होलीकेला’ अग्नीवर विजय मिळविण्याचे वरदान मिळाले होते .त्यामुळे होलीकेला राजाने सांगितले की, तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बैस . त्याप्रमाणे ती  प्रल्हादाला घेऊन चितेवर बसली. प्रल्हाद नारायणाच्या नामस्मरणात लीन झाला होता .इतक्यात होलिका जळायला लागली. आकाशवाणी झाली . तिला वरदानात असं सांगितलं होतं की, तिच्या वरदानाचा तिने दुरुपयोग केला तर , ती स्वतः जळून जाईल. त्याप्रमाणे ती स्वतः भस्मसात झाली .आणि प्रल्हादाला काहीच झालं नाही .सृष्टीचा दृष्टांवर होणाऱ्या  विजयाचे प्रतीक म्हणून ही होळी .

होळी प्रज्वलित करताना, रचनेच्या मध्यभागी खोड उभे केले जाते . त्याला ‘माड ‘ असे म्हणतात. .त्याच्याभोवती इतर लाकडे रचली जातात. होळी प्रज्वलित करताना कर्त्याने शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. “सहकुटुंबस्य मम  ढुंढा राक्षसी प्रित्यर्थं  तत्पीडा परिहारार्थ होलिका पूजनमहं करिष्ये” असा मंत्र म्हणून, समिधा वाहून होळी पेटवितात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात. आणि नारळ अर्पण करतात. फाल्गुन पौर्णिमेला ‘पूर्वा फाल्गुनी ‘ नक्षत्र येते. त्या नक्षत्राची ‘भग ‘ ही देवता आहे. महाराष्ट्रात भगाच्या नावाने बोंबा मारत होळीभोवती प्रदक्षिणा घालतात. यामागचे मानसशास्त्रीय कारणही आहे .मनात जे किल्मिष, द्वेष, राग ,चीड ,असे शड्ररिपू  बाहेर पडून जावेत. मन स्वच्छ  हॅलो अँड एमटी असे व्हावे . मनातले अमंगल अशुभ होळीच्या अग्नीत जाळून नाश करायचे. आणि चांगल्या शुभ, मंगल अशा गोष्टींचा स्वीकार करायचा हा संदेश होळीचा आहे. होळी शांत झाली की दूध आणि तूप शिंपडून शांत केली जाते.

उत्तर भारतात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात .इंदूर शहरात वेगळी पद्धत आणि एक  शान असते .या दिवशी शहरातील सर्व लोक राजवाड्याजवळ एकत्र येऊन होळी साजरी करतात. हा सण सुरुवातीला बंगालमध्ये खेळला जात असला तरी, ब्रजप्रदेशातील श्रीकृष्णाच्या मथुरा , वृंदावन ,बरसाना ,नंदगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने ते पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. रात्री नृत्य गायनाचा कार्यक्रम करून करमणूक  केली जाते .इंग्रजीत या सणाला ” होली फेस्टिवल ऑफ कलर्स ” असे म्हणतात. वजीराला होळी दिवशी पुरुष– महिला  एकमेकांना रंग लावतात. आणि महिला पुरुषांना काठीने मारतात . ही प्रथा पाहण्यासाठी लोक मुद्दाम  व्रजयान या ठिकाणी जातात. आपण टीव्हीवरही प्रथा पाहतो.पहाताना गंमत वाटते.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला ‘ ‘धुळवड’, असे म्हटले जाते. या दिवशी, आदल्या दिवशीच्या होळीच्या रक्षेची म्हणजे धुळीची पूजा करून ,रक्षेची प्रार्थना करतात. ” वंदितासि  सुरेंद्रेण ब्रम्हणा शंगकरेणच ।

अतस्तं  पाहिनो देवी भूतो भूतिप्रदा भव ।। हे देवी धुली, तू ब्रम्हा, विष्णू ,महेशानी  वंदित आहेस. म्हणून तू आम्हाला ऐश्वर्य देणारी हो. आणि आमचे रक्षण कर. असे म्हणून ती रक्षा, शेण, आणि चिखल असे पदार्थ अंगाला लावून नृत्य गायनही करतात. आयुर्वेदात मडथेरपी अशाच पद्धतीची असावी.

फाल्गुन वध पंचमीचा दिवस म्हणजे ” रंगपंचमी “.महाराष्ट्रात किंवा इतरही ठिकाणी ग्रुप करून, एकमेकांच्या घरी जाऊन, रंग आणि गुलाल लावण्याची किंवा उडवण्याची प्रथा आहे.  ” “बुरा मत मानो,  होली है।असं म्हणतात. पूर्वीच्या काळी केशराचे आणि नैसर्गिक रंग उडवून आनंद लुटत असत .रासायनिक रंग उडवणे म्हणजे प्रकृती बिघडवून घेणे होय.

आता होळी साजरी करत असताना, आपणही मनातील किल्मिष, एकमेकांबद्दल वाटणारा राग सोडून देऊन नवीन वर्ष रंगा रंगात  न्हाऊन जाऊन एकमेकात आदर आणि प्रेम प्रस्थापित करूया. होळीला नमस्कार करून आशीर्वाद घेऊ या.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ इस्तू आणि पदर – ☆ प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके ☆

? जीवनरंग ❤️

☆ इस्तू आणि पदर – ☆ प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके ☆

“चल बास झालं गं आता!” आपल्या बारा-तेरा वर्षांच्या लेकीचे, नलिनीचे केस विंचरत बसलेल्या कांताबाईंनी म्हटलं आणि फणी बाजूला ठेवली. नलिनी उठून तोंड धुवायला मोरीपाशी गेली. स्वत:च्या केसांमधून मोजून तीन-चार वेळा घाई-घाईत फणी फिरवून कांताबाई उठल्या, दोन्ही हात खसाखसा स्वच्छ धुतले. “मी एवढं पापड देऊन येते मेसमध्ये. तोवर तू भाजी फोडणीला टाकशील का?” त्यांनी पिशवीत पापडांची चवड भरता भरता नलूला विचारलं.

“आई, येताना मेस मधूनच काहीतरी भाजी घेऊन ये की चवदार एखादी!” नलूने उत्तरासोबत पर्यायही सांगितला तशा कांताबाई म्हणाल्या, ”आज तुझ्या आवडीचा आंबट चुका असेल मेसमध्ये!” यावर नलू आराशात बघतानाच ओरडली….. “मी करते कांदा-बटाटा किंवा बटाटा-कांदा, किंवा दोन्ही मिक्स!” आणि यावर दोघी मायलेकी मनमुराद हसल्या! नलूला आंबट भाजी अजिबात आवडत नसे. आज घरी कुणी पाहुणे येणार होते, ते नलूला समजलं होतं, त्यामुळे आईने आज जरा बरी चवदार भाजी करावी, असं नलूला वाटून गेलं होतं.

एका वस्तीत राहणाऱ्या कांताबाईंचे यजमान शेजाऱ्याशी झालेल्या किरकोळ भांडणात हकनाक जीवाला मुकले. नलू त्यावेळी पाच वर्षांची होती. कुठंही जा, मुलीवर असा प्रसंग येणं हे माहेरच्यासाठी बरीचशी अडचणींची स्थिती असते. माहेरी भावजया आलेल्या असतात,आई-वडिलांच्या आर्थिक बोलण्याला कमी किंमत असते आणि भावांना त्यांचा वाढता संसार पेलायचा असतो. त्यामुळे माहेरी जाऊन राहण्याच्या विचारांचा दोरखंड कांताबाईंनी लगेचच कापून टाकला होता. 

यजमानाच्या घरी, म्हणजे कांताबाईंचे सासर, आधीच दुष्काळाच्या योगानं गाव सोडून मुंबईच्या झोपडपट्टीत जाऊन राहिलेलं, त्यामुळे दिवसा-कार्याला आलेली सासरची आणि माहेरची मंडळी, ”काही लागलं तर सांग!” एवढं म्हणण्यापेक्षा जास्त काही म्हणूही शकत नव्हती आणि देऊही शकत नव्हती. आणि कांताबाईंना कुणाकडे काही मागण्याचा सरावही नव्हता!

पंधरवडा-महिन्यातच कांताबाई आपल्या पाच वर्षांच्या नलूला घेऊन या दुसऱ्या वस्तीतल्या लहान खोपटात रहायला आल्या होत्या. खोपटं लहान म्हणून भाडंही कमी होतं, पण म्हणून वस्तीपातळीवरच्या अडचणी कमी नव्हत्या.

एवढ्याशा पोरीला कुणाच्या भरवशावर घरी टाकून बाहेर कामावर तरी कसं जाणार बाईमाणूस? म्हणून मग कांताबाईंनी पोरीला सोबत येऊ देतील अशा घरांत धुण्या-भांड्यांची कामं पत्करली. सदैव सावचित्त असलेल्या कांताबाई कामाच्या ठिकाणच्या घरांतील पुरूषांशी जेवढ्यास-तेवढ्या वागत-बोलत असत. कुणी काही म्हटलं की म्हणायच्या, “जग खूप चांगलं असेल हो खूप. पण आपल्याच वाट्याला एखादा इस्तू आला तर करायचं काय? त्यापेक्षा कुणी चढेल म्हणो, शिष्ट म्हणो… आपण आपलं खाली मान घालून कामाशी काम ठेवलेलं बरं.”

इस्तू म्हणजे विस्तव…निखारा! आणि याच वास्तवाच्या विस्तवाचा चटका कांताबाईंनी त्यांच्या सावत्रबापाकडून सोसला होता!

पुढं घरच्या घरी मसाले, पापड करून देण्याचं काम मिळालं. आता नलू दुसऱ्यांच्या नाही तर आपल्या आईच्या घरी, तिच्या नजरेसमोर राहणार होती. नलू पाटी-पेंसिल आणि पोळपाट-लाटणं या दोन्ही आयुधांमध्ये लवकरच तरबेज झाली. शाळेत जाताना मस्तपैकी चटणी-रोल तिचा ती करुन घेऊन जाई.

मेसमध्ये जाताना नलूला सायकलवर बसवून शाळेत सोडणे आणि तिला शाळेत स्वत जाऊन घेऊन येणे, हे तत्व कांताबाईंनी कितीही त्रास झाला तरी पाळले होते. कांताबाईंना सायकल फक्त एकाच प्रकारे चांगली चालवता यायची….. खाली उतरून! नंतर नलू त्यांच्यापेक्षा चांगली सायकल चालवू लागली. पण वस्तीच्या उतारावरून नलूला सायकल चालवण्याची परवानगी नव्हती.  

वस्तीतल्या इतर अनेक मुली इतर मुलींच्या पालकांच्या दुचाक्यांवर तिघी-तिघी बसून जायच्या. नंतर काहींनी रिक्षा लावल्या. पण कांताबाईंनी त्यांची सायकल सोडली नाही. थोडक्यात, वस्तीजवळच्या सोसायटीमधल्या एखादी ‘मम्मी’  आपल्या मुलीबाबतीत जेवढ्या ‘काळजीवाहू’ असेल तेवढ्याच काळजीवाहू कांताबाई सुद्धा होत्या!

अशीच आठ-नऊ वर्षे आणि कांताबाईंच्या काळजाच्या वहीतील पानेही उलटून गेली. फक्त या पानांवर काळजी तेवढी कायम होती. नलूला नेमकं किती शिकवायचं याचा हिशेब त्यांच्या मनात पक्का होता. बारावी संपेपर्यंत अठरा वर्षे पूर्ण होतात मुलांना. नलू दहावीला असतानाच नात्या-गोत्यातल्या एखादा मुलगा नजरेसमोर ठेवायचा आणि वेळप्रसंग आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील तारीख पाहून अक्षता टाकायच्या, हा त्यांचा बेत.

पण कसं कुणास ठाऊक, कांताबाईंच्या मनाच्या वाळलेल्या पाचोळ्यावर कुठूनशी ओल्या थेंबांची टपटप वाजली. तिच्या गावाकडचा गहिनी तिच्या मेसमध्ये जेवताना दिसला तिला अचानक. पापड देण्यासाठी गेलेल्या कांताबाईला त्याने पहिल्याच नजरेत ओळखलं. ‘इथंच आलोय कायमचा रहायला, एका साहेबांच्या गाडीवर ड्रायवरचं काम लागलंय, त्यांच्याच बंगल्यात रहायची सोय होणार आहे’, असं काहीबाही सांगत होता तो. मात्र सोबत कोण राहतं याबद्दल अवाक्षर नाही.

तसा गहिनी कांताबाईंच्या शाळेत एक दोन वर्षे पुढच्या वर्गात होता. होता म्हणजे फक्त शाळेत यायचा म्हणून होता म्हणायचं.

आपण कुठं राहतो हे आपण याला नाही सांगितलं तरी त्याला ते मेस मधून आज ना उद्या समजणारच होतं म्हणून कांताबाईंनी त्याला आपल्या वस्तीतला पत्ताही मोघमपणे सांगितला. दोघांचा जाण्या-येण्याचा रस्ता एक पडला. एकदा तर त्याने घाईघाईने चालत निघलेल्या कांताबाईंना चक्क त्याच्या मोटारीतून मेसपर्यंत लिफ्टही देऊ केली होती. पण कांताबाईंनी ते टाळले होते. 

एके दिवशी गहिनीने कांताबाईंना रस्त्यावर गाठून थेट लग्नाचीच मागणी घातली. कांताबाई बावरून गेल्या. त्याने पहिली बायको सोडली होती आणि त्याची चौदा वर्षांची पोरगी त्याची बायको सोबत घेऊन गेल्याचं त्यानं लपवलं नाही.

गहिनील्या शाळेत असताना आपण आवडत असू, हे त्यांना ठाऊक होतं. पण त्याला आवडणाऱ्या आपण काही एकमेव नव्हतो, हे ही त्या लहान वयात सुद्धा जाणून होत्या. आणि आता ही अवचित मागणी ऐकून सुरूवातीला गांगरलेल्या कांताबाई लगेचच सावरल्या. “एक मुलगी आहे पदरात. तिच्यासह मला स्विकारावं लागेल!” त्यांनी आपली महत्त्वाची अट सांगितली आणि गहिनी पटकन हो म्हणाला. “अगं,माझी पोरगी सुद्धा तुझ्याच मुलीच्या वयाची आहे की!”

कांताबाईंच्या एका साहेबांनी अगदी म्हातारपणी लग्नगाठ बांधल्याची आठवण कांताबाईंच्या मनात होतीच. पण हे असं मोठ्या लोकांच्यात चालतं, अशी त्यांची समजूत.

नाही म्हणायला, कांताबाईंच्या एका वयस्कर मालकीण बाईंनी ‘एकटं राहू नकोस!’ असा प्रेमाचा सल्लाही दिलेला त्यांना आठवला. त्या बाईंनी ‘पुनर्विवाह’ असा शब्द उच्चारलेला, पण कांताबाईंना तो ‘पूर्ण विवाह’ असा ऐकला होता! “हो,बाई, विवाह करायचा म्हणजे पूर्णच केला पाहिजे की!” असंही त्यांना कांताबाई म्हणून गेल्या होत्या. आणि मग चूक लक्षात आल्यावर हसल्याही होत्या.

गहिनी एका दिवशी संध्याकाळी थोडा उशीर करूनच कांताबाईंच्या घरी आला. सोबत त्याच्या नात्यातली एक बाई होती… जी कांताबाईंच्याही दूरच्या नात्यातली असावी. नलू काही आणायला गल्लीतल्या किराणा दुकानात गेलेली होती.

गहिनी आत आला. हातातली पिशवी खाली ठेवली. पिशवीत बहुदा काही खायला आणलेलं असावं. एक पातळासारखं पॅंकिंगही होतं सोबत.  गहिनी आणि सोबतची बाई, कांताबाईंनी टाकलेल्या चादरीवर बसले. त्यांची नजर घरभर भिरभिरती होती. कांताबाईच्या नवऱ्याच्या मळकट फोटोकडे गहिनीने एक ओझरती नजर टाकली.

कांताबाईंनी घरातल्या कंदिलाची वात जराशी मोठी केली. काल पासून वीज गायब होती तिच्या घरातली. तेवढ्यात नलू दुकानातून परतली आणि घरात अनोळखी माणूस पाहून दारातच थबकली.

घरातल्या कंदिलाच्या उजेडाने दारात उभ्या असलेल्या नलिनीची अंधारी बाह्य आकृतीच गहिनीला दिसत होती. त्याने त्या अंधारातूनही नलिनीकडे पाहिले आणि पहात राहिला.

कांताबाईंनी गहिनीच्या डोळ्यांकडे पाहिले आणि तिला तिच्या सावत्र वडिलांचे डोळे आठवले. “नलू, अगं परत दुकानात जा. तीन किलो जवारी दे म्हणावं भैय्याला. आणि तशीच मागच्या गिरणीत उभं राहून दळूनच आण….जा!” असं म्हणून कांताबाईंनी नलूला परत पिटाळलं! पाहुणे बहुदा आज जेवायला घरी थांबणार असा नलूने अंदाज बांधला.

“गहिनी, विचार बदललाय मी. ह्या पोरीचं नीट सगळं बयजवार झाल्याशिवाय मी काही दुसऱ्या घरोब्याचा विचार करणार नाही”

हे ऐकून गहिनी आल्यापावली निघून गेला. कांताला याही वेळी कितीही पटवलं तरी ती ऐकणार नाही याची त्याला खात्रीच होती.

अर्ध्या-पाऊण तासाने नलू परतली. घरात मघाशी आलेला पाहुणा नव्हता. “गेले होय पाहुणे?” 

“नले, तुझं लगीन झाल्यावर तु मला तुझ्या सोबत तुझ्या घरी ठेवशील का गं म्हातारपणी?” कांताबाईंनी भाकरी करायला घेता-घेता नलूला विचारलं आणि डाव्या हातानं चुलीतून एक निखारा बाहेर ओढला…जरा जास्त पेटला होता म्हणून. भाकरी करपली असती.

तिच्या बोटांना तो विस्तव थोडासा भाजला तेंव्हा ती बोटं, भाकरी मळण्यासाठी घेतलेल्या पाण्याच्या लोटीत चटकन बुडवली. “आत्ता भाजला असता बघ इस्तू! आणि पदरावर पडला असता तर मोठा भोसका पडला असता!”  

आपल्या लग्नाच्या आणि आईला घरात ठेवून घेण्याच्या प्रश्नावर नलू म्हणाली, “आई, अगं अशी काय बोलतीयेस… आपण आपला घरजावईच बघू….!”

यावर दोघीही हसल्या. कांताबाईंनी चुलीत जोरात फुंकर घातली आणि त्या प्रकाशात दोघा माय-लेकींचे चेहरे उजळून निघाले!.

लेखक – श्री संभाजी बबन गायके

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी … सुश्री पल्लवी पाटणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी … सुश्री पल्लवी पाटणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मूलभूत पायर्‍या.    

एकाच जोकवर आपण परत परत हसत नाही. तर मग एकाच दुःखावर आपण परत परत का रडतो?

कधी विचारलं आहे आपण स्वतः ला की आपण एकाच दुःखावर वारंवार का विचार करतो, आणि जर करतोय हे जाणवते आहे तर मग त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतः ची मदत कशी आणि किती करतोय?

मानसोपचाराच्या क्षेत्रात गेली 15 वर्षे सतत काम करताना मला ही गोष्ट नेहमीच जाणवत राहिली की आपण सगळेच आपल्याला किती आणि कसा त्रास होतोय, कोणामुळे होतोय हे पुनःपुन्हा बोलत असतो आणि त्या प्रत्येक वेळी पुनःपुन्हा स्वतः ला नकारात्मक विचारांमधे घेऊन जात असतो. हे अगदी नकळतच होते, पण त्याने त्या प्रत्येक वेळी होणारा त्रास मात्र अधिकाधिक वाढतच राहतो हे लक्षात येत नाही.

भावनिक त्रास कमी करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण किती दुर्दैवी आहोत, आपल्यावर कसा अन्याय झाला आहे, कोणी आपला किती छळ केलाय, आपणच किती भोगलय, किती असह्य झालय आणि आपला कसा बळी गेलाय किंवा आयुष्याची कशी माती झालीय त्यामुळे आता काही होऊ शकणार नाही इत्यादी…… सगळे स्वतः ला सांगणे पुर्णपणे बंद करणे.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला हेच तर जमत नाही, हे विचार बंद करणं इतक सोपं असतं तर मी केव्हाच केलं असतं ना असेही स्वतः ला सांगणे थांबवले तरच एक पाऊल पुढे म्हणजेच प्रगतीच्या, भावनिक सौख्याच्या दिशेने जाता येईल.

स्वतः ला आपणच देत असलेले नकारात्मक संदेश बंद करणे ही उपचाराची पहिली पायरी म्हणूया.

मग दुसर्‍या पायरीवर काय येईल तर आपण स्वतः ला काय सांगावे याचा सराव करणे. हा सराव तुम्हाला रोज काही सकारात्मक तार्किक विचार लिहून करता येतो आणि दीर्घ श्वसन करून शांत झालेल्या मनालाही स्वयं सूचना देऊन करता येतो.

१. मी एक सामान्य व्यक्ति आहे जी नकारात्मकतेकडे जाऊ शकते, खचू शकते, दुखावली जाऊ शकते. पण तरीदेखील हे दुःख म्हणजे माझे सर्व आयुष्य नसून हा माझ्या आयुष्यातला एक छोटासा हिस्सा आहे, ज्यातून मी अगदी सहजपणे बाहेर पडू शकेन.

२. माझा स्वतः वर ठाम विश्वास आहे की मी प्रत्येक संकटातून यशस्वीपणे बाहेर पडू शकेन.

३. कोणत्याही दुःखाचा माझ्यावर अंमल चढू न देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याची मानसिक शारीरिक ताकद माझ्यात आहे यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. 

४. ज्या गोष्टी चे दुःख, त्रास आहे ती सोडून माझ्या आयुष्यात इतर खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि प्राधान्य आहेत ज्यावर मी माझे लक्ष केंद्रित करून तिथे माझी शक्ति वापरून त्यातला आनंद वाढवू शकेन.

५. कोणी माझ्याशी कसे वागले याचा विचार करण्यापेक्षा मी नको असलेल्या, इतरांच्या नकारात्मक वागण्याला महत्व न देणे यावर माझा पूर्ण ताबा आहे.

६. भूतकाळात जे काही घडले त्यावर मात करून वर्तमानात जगण्याची आणि त्यातून आनंद मिळवण्याची क्षमता माझ्यात आहे.

आता तिसरी पायरी म्हणजे या विचारांचा लिहून आणि स्वयंसूचना देऊन अगदी नियमितपणे श्रद्धेने सराव करणे. करताना मात्र याचा कधी फायदा होईल, होईल की नाही, किती दिवस करावे लागेल असे जर पुन्हा नकारात्मक विचार केले, तर मग जे काही कराल त्याचा फायदा मिळत नाही. खूप प्रयत्न केले पण आमचा त्रास कमी होत नाही असे जेव्हा लोक म्हणतात, तेव्हा त्यामागे मूळ कारण हे आहे की प्रयत्नांमध्ये सातत्य नसते, विश्वासाचा अभाव असतो आणि जे प्रयत्न आहेत त्याबद्दल साशंकता असते.

जर योग्य दिशेने, योग्य प्रमाणात, संपूर्ण सकारात्मकतेने प्रयत्न केले तर नक्किच आहे त्या भावनिक त्रासातून बाहेर पडता येईल हे सगळ्यांपर्यंत पोहोचावे या प्रामाणिक उद्देशाने लिहिलेला हा लेख.

धन्यवाद . 

लेखिका :  सुश्री पल्लवी पाटणकर

(Psychotherapist) 

संग्राहिका : सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ धोंडी महार… – लेखक – श्री आनंद नाईक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ धोंडी महार… – लेखक – श्री आनंद नाईक ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

अठराव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात “थिओडोर कुक” या, बोरघाटात ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेसाठी काम करणाऱ्या ब्रिटीश अभियंत्याने “धोंडी महार” या त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कामगाराच्या मदतीने खंडाळा घाटातील वनस्पतींच्या नोंदी करून सखोल अभ्यास केला आणि “फ्लोरा ऑफ दी प्रेसिडेंन्सी ऑफ बाॅम्बे” हा वनस्पतीशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ त्याने त्या वेळी त्याच “धोंडी महार” या व्यक्तीस सादर अर्पण केला होता, त्याची गोष्ट…..

मुंबईत रेल्वे आली होती. पण पुण्यात येण्यासाठी रेल्वेमार्ग नव्हता, त्या काळातली ही गोष्ट. पूर्वीच्या काळी मुंबई पुणे प्रवासासाठी १८ तास लागायचे. इतक्या कमी वेळात पुण्यातून मुंबईस जाता येतं  म्हणून लोक खुषीत असायचे.

तो प्रवास कसा असायचा, तर पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की, सगळ्या लोकांना खाली उतरवून तिथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसवून सर्वांना घाटाखाली खोपोलीत आणले जायचे. ठाकर आणि कातकरी लोकांच्याकडे सामान वहाण्याचे काम होते. लोकांना अशा प्रकारे खंडाळ्यातून खोपोलीस घेऊन जाण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटची या पारशी व्यापाऱ्याकडे होते. हा प्रवास अठरा तासात पूर्ण व्हायचा आणि इतक्या कमी वेळात पुणे-मुंबई प्रवास होतो, म्हणून लोक खूष असायचे.

याच काळात कर्जत पळसदरीवरून बोरघाट खोदण्याचे काम चालू होते. इंग्रज अभियंता असलेला थिओडोर कुक यांच्या मार्गदर्शनाखाली बोरघाटात रेल्वेलाईन टाकण्याचे व बोगदे खोदण्याचे काम सुरू होते.

आजही घाट पाहिल्यानंतर जाणवते की, त्या काळात पुरेशा सोईसुविधा नसताना देखील हे काम कसे केले असेल. या कामासाठी लाखांहून अधिक कामगार दिवसरात्र खपत होते. कोणतीही यांत्रिक अवजारं नसल्याने मजुरांकरवी साधी घमेली, फावडी व लोखंडी पहारी अशी जुजबी हत्यारं वापरून हे काम चालायचे. साहजिक त्यामुळे दररोज शेकडो अपघात होत असत. 

दिवसाला याची गणती कशी होती, तर दर दिवशी १०० एक अपघात व्हायचे. त्यामध्ये कित्येकांची हाडे तुटायची, कुणाच्या पायावर भल्लामोठ्ठा दगड पडायचा. खरचटण्यापासून जीवघेण्या अपघातापर्यन्तच्या जखमा व्हायच्या. इतक्या मोठ्या कामगारांसाठी वैद्यकीय सेवा उभारणे ही त्यावेळी अशक्य कोटीतली गोष्ट होती. नाही म्हणायला आठ दहा डॉक्टर प्राथमिक उपचार करण्यासाठी तळ ठोकून असल्याच्या नोंदी मिळतात, मात्र लाखोंच्या संख्येने असणाऱ्या कामगारांवर उपचार करण्यासाठी असणारी डॉक्टरांची संख्या असून नसल्यासारखी होती.

अशा वेळी लाखभर लोकांसाठी उपचार असायचा, तो धोंडी नावाच्या व्यक्तीचा. धोंडी इथेच मजूर म्हणून काम करीत होता. पण त्याला वनस्पतीशास्त्राची चांगली माहिती व जाणीव होती. कुणाचा पाय मुरगळला किंवा मोठमोठ्या जखमा झाल्या तर मजूर धोंडीकडे जात. तो जंगलातला पाला तोडून आणत असे, आणि त्यावर तात्काळ उपचार करीत असे. पिचलेली हाडे तो वनस्पतींचा लेप लावून ठीक करत असे. आपल्या डॉक्टरांकडून उपचार होत नाहीत, पण इथे असणाऱ्या या धोंडी महार या व्यक्तीकडून कसे पटकन उपचार होतात, जखमा बऱ्या होतात, असा प्रश्न मुख्य इंजिनियर असणाऱ्या थिओडोर कुक्स या अधिकाऱ्याला पडत असे.

त्याने धोंडी महार या व्यक्तीला सोबत घेतलं आणि संपूर्ण बोरघाट पालथा घातला. घाटात असणाऱ्या वनस्पतींची इत्यंभूत माहिती, त्यांचे औषधी गुणधर्म नोंद करुन घेतले. वनस्पतींचे नमुने गोळा करून त्यांची हुबेहुब चित्रं काढून घेतली आणि वनस्पतीशास्त्रावर इत्थंभूत माहिती असणारा इंग्रजी ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे नाव ‘फ्लोरा ऑफ दी प्रेसिडेंन्सी ऑफ बाॅम्बे’. वनस्पतीशास्त्रात हा ग्रंथ आजही आधारभूत गणला जातो.

विशेष म्हणजे कुकने हा ग्रंथ धोंडी महार या व्यक्तीस अर्पण केला. त्याने पुस्तकामध्ये हा ग्रंथ ‘धोंडी महार’ यास नम्रपणे  अर्पण करत असल्याचे नमूद केले आहे.

संदर्भ : प्रबोधनकार ठाकरे समग्र साहित्य

लेखक : श्री आनंद नाईक 

9822314544.

संग्रहिका : सौ प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं ! ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 आजी …  लेखक – अज्ञात 🌼 संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

निर्माल्याच्या जवळ असूनही,

कमाल असते ताजी !

अस्थिर हाती सुस्थिर माया,

म्हणजे खंबीर आजी !

 

आईहुनही घाली पाठीशी,

चूका करुनही माफ !

माया सांगे आत उकळती,

चश्म्यावरची वाफ !

 

एका पिढीला मधे ठेऊनी,

जिची उडी आवेगी !

तरलपणाने तिला समजते,

सगळे बसल्या जागी !

 

आता केवळ शतकासाठी,

नगण्य उरले कमी !

शतकपूर्तीची तिला असावी,

शंभर टक्के हमी !

 

रसाळ होता कमाल आंबा,

ठिबकत असते आजी !

पूर्ण फुलानी भरली फांदी,

तशीच झुकते आजी !

 

आजी असते निरांजनातील,

थरथरती फुलवात !

भविष्य आणि भूतामधली,

वर्तमानी रुजवात !

 

जरी उसवला तरीही असतो,

आजी भक्कम पीळ !

आणि घराच्या गालावरचा,

सौंदर्याचा तीळ !

 

घरात कायम आजी म्हणुनी,

दार घराचे खुले !

तिन्हीसांजेला अध्यात्माचे,

फूल भक्तिवर फुले !

 

🙏🏻 सगळ्या आजीना समर्पित  🙏🏻 

 

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 129 – शब्द, अब नहीं रहे शब्द… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  एक भावप्रवण गीत – शब्द, अब नहीं रहे शब्द।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 129 – शब्द, अब नहीं रहे शब्द…  ✍

शब्द, अब नहीं रहे शब्द

शब्द को ब्रह्म कहा गया है

और

ब्रह्म को देखा नहीं किसी ने

शब्द को भी

कोई कहाँ देख पाता है।

हाँ,

सुन पाता है उसे

अगर सुनना चाहे तो।

मगर क्या होता है

मात्र सुनने से

जबकि अर्थहीन हो गए हों शब्द

लगता है

शब्दों की केंचुली उतर गई है

बदल गई है उनकी तासीर

अब प्रेम शब्द ना तो स्निग्धा देता है

ना ऊर्जा

और विश्वास का दावा

कानों में उड़ेल देता है

पिघला शीशा

संबोधन के सारे शब्दों से

सड़ी मछली की बू आने लगी है

शब्द, अब शब्द नहीं रहे…। 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 128 – “धरती भीगी मैं भी भीगी…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  धरती भीगी मैं भी भीगी)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 128 ☆।। अभिनव गीत ।। ☆

धरती भीगी मैं भी भीगी… ☆

बदली के बालो को छू कर

बोली मधूलिका

नही जा रही वहाँ कदापि

मैं फिर अमेरिका

 

तुम क्या बरसी बहकर आयी

फसलों की दुनिया

तुम को पाकर हुई चंचला

जल की चुनमुनिया

 

धरती भीगी मैं भी भीगी

गहरे गहरे गहरे तक

पेड़ो से कह कह कर हारी

व्यव्हल कुमारिका

 

आसमान की छत से डगमग

देख रही शुभकर

जिस को पढ़ने तारा मंडल

उतरा है भू पर

 

एक घास का छज्जा आगे

को झुकर सा आया

कहता है कुछ छंद सुनाओ

मुझ को सागरिका

 

कभी कभी तारों को छूती

हुई निकलती हो

लगता जैसे चाँदी की पाय लें

बदलती हो

 

जगमग तारों मैं दिख जाती

मुझ को भी जब तब

कभी रुपहली कभी सुनहली

झिल मिल निहारिका

©  श्री राघवेन्द्र तिवारी

03-03-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – होली पर्व विशेष – प्रह्लाद ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – होली पर्व विशेष – प्रह्लाद  ??

मेरे लिखे ख़त,

जब-जब उसने

आग को दिखाए,

कागज़ जल गया

हर्फ़ उभर आए,

झुंझलाई, भौंचक्की-सी

हुई बार-बार दंग,

कई होलिकाएँ जल मरीं;

प्रह्लाद सिद्ध हुआ

हर बार मेरे प्रेम का रंग..!

नेह और सौहार्द का प्रह्लाद चिरंजीव रहे। आपको एवं आपके परिवार को होली की हार्दिक बधाई एवं मंगलकामनाएँ।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 कृपया आत्मपरिष्कार एवं ध्यानसाधना जारी रखें। होली के बाद नयी साधना आरम्भ होगी 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – “बेरंग होली” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

  ☆लघुकथा – “बेरंग होली” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

होली का दिन । दम साधे बैठे रहे दिन भर कि कोई रंग लगाने आएगा । आमतौर पर पड़ोसी इकट्ठे होकर आ जाते और गेट पर ही गुलाल मल देते , माथे पर तिलक लगाकर छोड़ देने की गुहार बेकार जाती । फिर हमें भी अपने साथ लेकर दूसरे पड़ोसी के द्वार पर दस्तक देते । सब होली लगाने आने वालों को कुछ न कुछ मीठा खिलाते । नये नये आए थे तब पता नहीं था इधर के रीति रिवाज का । फिर पता चला तो हम भी रंग के पैकेट्स लाने के साथ साथ मिठाई भी लाने लगे ताकि सबका मुंह मीठा करवा सकें । कल शाम हम मिठाई और रंग के पैकेट्स खरीद लाये थे और नजरों व हाथ के करीब ही रखे थे ताकि दूसरों को रंगने में चूक न जायें और मुंह भी मीठा करवा सकें । होली पर पहने जाने वाले कपड़े भी छांटकर रख लिए थे ।

होली का दिन धीरे धीरे सरकने लगा और सरकता ही गया । पहले सोचा कि नाश्ता वाश्ता करके लोग निकलेंगे । बच्चों की पिचकारियाँ तो शुरू होकर कब की खत्म भी हो गयीं लेकिन बड़े नहीं निकले तो दिन भर नहीं निकले ।

न कोई कोरोना , न किसी के घर कोई शोक और न दुख । फिर क्या हुआ इस बार ? होली बेरंग क्यों रह गयी ? हमारे आस पड़ोस की सड़क रंगों से सराबोर क्यों न हो पाई ?

-ओह । आप भूल गये क्या मेरी सरकार ।

-क्या ? क्या भूल गये हुजूर ?

-वो पड़ोस वालों को अपने घर के आगे कार पार्क करने से आपने रोका जो था ?

-अच्छा ? चलो । वो तो हमने रोका पर सबके सब एक दूसरे को तो रंग लगा सकते थे ।

-कैसे ? फिर भूल गये भुलक्कड़ साहब ।

-अरे यार । एक बार में बता दो न । क्या छोटे छोटे सीन बता कर उत्सुकता बढ़ाती जा रही हो ।

-याद नहीं ? जब पड़ोस के सरदार जी रिनोवेशन करवा रहे थे , तब उनका सारा सामान कहां पड़ा रहता था ?

-वो सामने वाले खट्टर के घर के सामने ।

-याददाशत तो सही है ।

-क्यों फिर यह कैसे भूल रहे हो कि इसी बात को लेकर दोनों में इतनी लड़ाई हुई कि बात पुलिस तक शिकायत तक पहुंची ।

-हां । यार । खूब याद दिलाई । मुझे भी पुलिस चौकी बुला रहे थे पर मैं पड़ोसियों के झमेले में गया ही नहीं । हाथ जोड़कर माफी मांग ली थी ।

-आप दोनों ओर से बुरे बन गये । फिर आपके रंग लगाने कौन आता ?

-ओह । यह बेरंग होली ,,,,

क्या आगे भी बेरंग होती जायेगी ?

मेरे लाये रंग और मिठाई मेरा ही मुंह चिढ़ा रहे थे ।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print