मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #121 – विजय साहित्य – महाबली हनुमान! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 121 – विजय साहित्य ?

☆ महाबली हनुमान!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

बलभीम वीर। आंजनेय सूत॥

केसरीचा पूत। हनुमान॥१॥

 

नाशिक हा जिल्हा । अंजिनेरी ग्राम॥

देवभूमी धाम। चिरंतन॥२॥

 

शक्ती सिद्धी युक्त। घेतलीसे धाव ॥

इंद्रवज्र घाव। हनुवटी॥३॥

 

शेंदूर नी तेल। रूई फुले पाने ॥

मंदिर घोषाने। निनादले॥४॥

 

शाप मिळालेला। विसर शक्तीचा॥

व्यासंग भक्तीचा। रामनामी ॥५॥

 

घडे रामभेट। शब्द चिरंजीव॥

दासभक्ती नीव । हनुमंत ॥६॥

 

जांबुवंत कृपे। परतली शक्ती॥

रामनामी भक्ती। स्थिरावली॥७॥

 

सीता शोध कार्य। झाला अग्रेसर ॥

रावणाचे घर। पेटविले॥८॥

 

जानकीचा शोध। वायुपुत्र घेई॥

संदेश तो देई। राघवासी॥९॥

 

जिथे जिथे राम। तिथे हनुमान॥

भक्ती शक्ती वाण। अलौकिक॥१०॥

 

चातुर्य नी शौर्य। पराक्रम गाथा॥

लीन होई माथा। बजरंगी॥११॥

 

मारुतीचे स्तोत्र। भीमरुपी पाठ॥

महारूद्र वाट। फलदायी॥१२॥

 

संकट मोचन। बल उपासना॥

समर्थ प्रेरणा। रामदासी॥१३॥

 

बजरंग बली। उपासना मंत्र॥

यशदायी तंत्र। हनुमंत॥१४॥

 

चिरंजीवी दास। देव पंचमुखी॥

रामनाम मुखी। अव्याहत॥१५॥

 

कविराज शब्दी। वर्णाया मारुती॥

द्यावी अनुभूती। रामराया॥१६॥

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वळीव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ वळीव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

खिडकीतून बाहेर आकाशाकडे पहाताना उन्हाच्या झळा घरात बसून सुध्दा अंगाला जाणवत होत्या! एप्रिल महिन्याचा मध्य म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता खूप जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसतात होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होतं!

लहानपण डोळ्यासमोर आले,परिक्षा संपण्याच्या आनंदाबरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टी ची चाहुल लागलेली असे.ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आतासारखे टिव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हते, फार तर परिक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुटीत पत्ते खेळणे, समुद्रावर फिरायला जाणे आणि गाण्याच्या भेंड्या,डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे हीच करमणूक होती.सकाळी आटवल भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यत आम्ही घरात फिरकत नसू!आंबे बाजारात सुरु झाले की रोज आमरसावर ताव मारणे,फणस,काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे.घामाच्या धारा वहात असायच्या,पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझणवार्या’सारखा वाटायचा.

बालपण कोकण चा मेवा खात कधी संपलं कळलंच नाही आणि काॅलेजसाठी देशावर आले.देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे, पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी ४/५नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वार्या बरोबरच बाहेरची हवाही बदलती असे.दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वार्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे! हाॅस्टेलवर रहात असताना जानेवारी नंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे.आमच्या काॅलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत, अधून मधून वावटळीत सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे.वसंत ऋतूच्या चाहुलीने निसर्गात सृजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई.झाडांवर पालवी फुटलेली दिसे.कोकिळेचे कूजन ऐकायला येई, कुठेतरी निष्पर्ण चाफा पांढर्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या, जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा,मदनबाणाची छोटी छोटी झुडुपे  पांढर्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत.संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे! पांढरे शुभ्र ढग हळूहळू करडे बनत,बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाईल.ढगांचा कडकडाट, आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रूपच पालटून टाकत असे.जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत आणि मग जी वळवाची सर येई त मृद्गगंध उधळीत, जीवाला शांत करीत येई!तो पाऊस अंगावर झेलू की टपटप पडलेल्या गारा वेचू असं होऊन जाई, छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे.डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मन मोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही.पावसाची पहिली सर अंगावर घेतली कि तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबताच आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते.पांढर्याशुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग!असा ओथंबून येतो की,त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते. कधी कधी मनाला प्रश्र्न पडतो की,ते पांढरे ढग काळ्यामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भावव्याकुळ ढग प्रुथ्वीवर रिते कसे बरं होतं असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग?अशा आशयाचा वि.स.खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्ही ही तितकेच महत्त्वाचे!काळ्या ढगांचे अस्तित्व च मुळी पांंढर्या ढगांवर अवलंबून! विचारांच्या आवर्तातही ही. ढगाळलेली अवस्था येते कधी कधी! विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात, तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे दाटून येते आणि काळे बनतात.योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत रहातात आणि मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! नवनिर्मिती करणार्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पहात रहाते!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हृदयस्पर्शी – स्वाभिमान ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ हृदयस्पर्शी  – स्वाभिमान ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

मी ऑफिस मधून घरी जाता जाता एका हॉटेलमध्ये गेलो,वेळ  संध्याकाळची

तरी सात वाजलेले

तेच हॉटेल, तोच कोपरा,

तोच चहा अणि मित्राची वाट पहात बसलो होतो…

 

चहाचा एक झुरका अणि एक सीप घेतला तेंव्हा माझ्या टेबलासमोरील

दुसर्‍या टेबलवर एक माणूस

आणि आठ दहा वर्षांची त्याची मुलगी ..

शर्ट ही फाटका…

अगदी त्याच्या सारखाच

वरची दोन बटनं गायब ,

मळकी पँट, थोडी फाटकी

मजुरी करणारा वेठबिगार असावा.

 

मुलीनी छान दोन वेण्या घातलेल्या साधारण फ्रॉक पण स्वच्छ…

धुतलेला वाटत होता..

 

तिच्या चेहर्‍यावर…

अतिशय आनंद आणि कुतूहल दिसत होते

ती हाॅटेलमध्ये सगळीकडे डोळे मोठ्ठे करून फडफडत पाहात होती डोक्यावर थंडगार हवा सोडणारा पंखा …खाली बसायला गूबगूबीत सोफा

ती अगदी सूखावलीच …

 

वेटरने दोन स्वच्छ ग्लास,

थंडगार पाणी त्याच्या समोर ठेवलं …पोरी करता एक डोसा आना की

माणसाने वेटरला सांगितलं …

मुलीचा चेहरा अजून खुलला …

 

आणि तुम्हाला ….

 

नाय , मला काय नग …

 

डोसा आला…

चटणी सांबार वेगळं

गरमागरम मोठ्ठा फूललेला …

मुलगी डोसा खाण्यात गुंग

तो तिच्याकडे…

कौतुकाने पहात पहात

पाणी पीत होता ….

 

तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला

आजकालच्या भाषेत डब्बा फोन

तो मित्राला सांगत होता

आज पोरीचा वाढदिवस आहे …

तिला घेऊन हॉटेलात आलोय …

 

शाळेत तिचा पहीला नंबर आला तर…तुझ्या वाढदिवसाला  मी …

हाॅटिलात मसालाडोसा खायला

घालीन म्हणालो होतो …

 

ती खातीय डोसा

थोडा पॉज ….घेऊन

 

नाय र दोगांना कुटलं परवडतयं!

घरी पिठलं भाकर हाये मला …

 

गरमागरम चहाच्या चटक्याने

मी भानावर आलो….

 

कसा ही असू दे …!!

श्रीमंत किंवा गरीब

बाप लेकीच्या चेहर्‍यावर हसू

बघण्यासाठी काही ही करेल …

 

मी काऊंटरवर चहाचे आणि

त्या दोन मसाला डोसाचे

पैसे भरलो आणि सांगितलं ..

अजून एक डोसा आणि चहा

तिथे पाठवा …

पैसे का नाही…

असं विचारलं तर सांगा

 

आज तुमच्या

मुलीचा वाढदिवस आहे ना ….

तुमची मूलगी

शाळेत पहिली आली नां ….

आम्ही ऐकलं तुमचं बोलणं  …..

म्हणुन आमच्या हॉटेल तर्फे खास

असाच अभ्यास कर म्हणाव ….

ह्याचं बिल नाही …..

 

पण ……. पण …..

फुकट हा शब्द वापरु नका …

 

त्या वडीलांचा स्वाभिमान मला

दुखवायचा नव्हता ….!!

 

आणि अजून एक डोसा

त्या टेबलवर गेला ..

मी बाहेरून पाहात होते..

बाप कावराबावरा झाला

म्हणाला ….

 

येकचं म्हनालो होतो मी …

 

तेव्हा मॅनेजर म्हणाले …

 

अहो तुमची मूलगी

शाळेत पहिली आली …

आम्ही ऐकलं ते …

म्हणून हाॅटेल तर्फे,

आज दोघांना फ्री …

 

वडीलांच्या डोळयांत पाणी आलं

लेकीला म्हणाला …

बघ असाच अभ्यास केलास तर

काय काय मिळतया …

 

बाप वेटरला म्हणाला,

हा डोसा बांधून द्याल कां …

मी आणि माझी बायको

दोगं बी अर्धा-अर्धा खाऊ …

तीला कूटं आसं

खायाला मिळतयं …

 

आणि आता माझ्याही डोळयांत

खळ्ळकनं पाणी आलं ….

 

अतिशय गरीबीतही माणूसकी जपणारी माणसं आहेत अजून या जगात.

आनंद आनंद म्हणजे काय ते त्या पोरीच्या आणि तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचाच……….

संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! नवीन अंगाई गीत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 नवीन अंगाई गीत ! 😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर आणि आपल्या चाळीची बातमी आली आहे आजच्या पेपरात पान सहावर, ती आठवणीने वाचा, येतो मी !”

“कसली बातमी मोऱ्या ?”

“पंत तुम्ही वाचलीत तर तुम्हांला कळेल ना आणि त्या बातमीत माझं पण नांव छापून आलं आहे, अगदी फोटो सकट !”

“अरे गाढवा तू ती बातमी सांगितलीस तर तुझी जीभ काय झडणार आहे ? आणि तुझा फोटो कशासाठी छापलाय पेपरात ? तू साधा गल्लीतला नेता पण नाहीस अजून !”

“तसं नही पंत, तुमच्यामुळेच ती बातमी आणि माझा फोटो छापून आला आहे पेपरात !”

“माझ्यामुळे ? ते कसं काय ?”

“अहो पंत, तुम्हीच नाही का मला गेल्यावेळेस नवीन आयडिया दिलीत त्या बद्दलच ती बातमी आहे !”

“मोऱ्या, नेहमी तू मला ‘कोड्यात बोलू नका’ असं सांगतोस आणि आज तू स्वतःच कोड्यात बोलतोयस ! आता मला जर ती बातमी उलगडून नाही सांगितलीस तर उद्यापासून आमच्या पेपरला हात लावायचा नाही, कळलं ?”

“असं करू नका पंत ! अहो तुमचा पेपर वाचल्या शिवाय माझी ‘प्रातरविधी’ पासूनची सारी कामं अडतात हे तुम्हांला पण माहित आहे !”

“हॊ ना, मग आता मुकाट्यानं मला ती बातमी सांगतोस का उद्यापासून आमचा पेपर वाचण बंद करतोस ?”

“सांगतो सांगतो पंत ! आता तुम्ही माझ्या वर्मावरच वार करायला निघालात तर….”

“उगाच अलंकारिक बोलायला जाऊ नकोस, पट पट बोल !”

“पंत, अहो गेल्यावेळेला तुम्ही नाही का म्हणाला होतात, की आपल्या अहमद सेलरच्या आठ चाळीत रोज कोणाकडे ना कोणाकडे कसलं तरी मंगल कार्य असतं आणि लोकं हजारो रुपये खर्च करून DJ लावून ते साजर करीत असतात, त्या ऐवजी…….”

“त्याच पैशातून गरीब हुशार विद्यार्थ्यांना मदत करावी अथवा कुठल्यातरी सामाजिक संस्थेला देणगी द्यावी, असं मी सुचवलं होत खरं !”

“बरोबर पंत आणि चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी तो कार्यक्रम यशस्वीपणे राबवला त्याचीच बातमी आली आहे आजच्या पेपरात !”

“अरे व्वा ! तुझं अभिनंदन मोऱ्या !”

“धन्यवाद पंत, पण तुमच्यामुळेच हे शक्य झालं ! येतो आता !”

“मोऱ्या थांब जरा, माझं काम आहे तुझ्याकडे !”

“कसलं काम पंत ?”

“अरे माझा मित्र वश्या जोशी पूर्वी डोंबिवलीला रहात होता, अगदी स्टेशन जवळ आणि आता तो ठाण्यात घोडबंदरला आला आहे रहायला !”

“बरं मग ?”

“मोऱ्या वश्याला ठाण्यात आल्यापासून निद्रानाश जडला आहे, रात्रभर झोप म्हणून लागत नाही त्याला !”

“मग जोशी काकांना एखाद्या डॉक्टरकडे जायला सांगा ना !”

“अरे चार, पाच डॉक्टर करून झाले त्याचे पण काडीचा उपयोग झाला नाही त्याला, उगाच पैशा परी पैसे गेले ते वेगळेच !”

“पंत जोशी काकांच्या निद्रानाशावर जर चार पाच डॉक्टरांनी हात टेकले असतील तिथे मी बापडा काय करू शकणार सांगा ?”

“सांगतो ना ! अरे परवाच वश्याचा फोन आला होता आणि तो माझ्याकडे अगदी रडकुंडीला येवून, त्याच्या निद्रानाशावर काहीतरी उपाय सांग रे असं म्हणत होता ! त्यावर मी बराच विचार करून एक उपाय शोधला आहे, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल, म्हणून तुला थांब म्हटलं !”

“असं होय, बोला पंत काय मदत हवी आहे तुम्हाला माझ्याकडून ?”

“मोऱ्या त्या तुमच्या DJ च्या कर्कश्य आवाजावरूनच मला एक उपाय सुचलाय बघ !”

“कोणता?”

“सांगतो ना, अरे त्याची डोंबिवलीची जागा अगदी स्टेशन जवळ, म्हणजे दिवस रात्र ट्रेनचा खडखडाट बरोबर ?”

“बरोबर, मग ?”

“म्हणजे रोज रात्री झोपतांना वश्याला ट्रेनच्या खडखडाटाचे अंगाई गीत ऐकायची सवय आणि ते अंगाई गीत ठाण्यात त्याच्या कानावर पडत नाही, म्हणून वश्याला निद्रानाशाचा विकार जडला असावा असं माझं ठाम मत आहे !”

“मग पंत मी तुम्हाला यात काय मदत करू शकतो ते तर सांगा !”

“मोऱ्या तू मला फक्त एका CD वर, ट्रेनचा भरधाव जायचा आवाज, रेल्वे ट्रॅकच्या खडखडा सकट एखाद दुसऱ्या ट्रेनच्या हॉर्न बरोबर रेकॉर्ड करून दे, बास्स !”

“त्यानं काय होईल पंत ?”

“अरे तोच वश्याच्या निद्रा नाशावर उपाय, कळलं ?”

“नाही पंत !”

“अरे गाढवा, मी वश्याला सांगणार, ही CD घे आणि रात्री झोपतांना हे तुझं अंगाई गीत ऐकत ऐकत सुखाने झोप ! नाही तुला निद्रादेवी प्रसन्न झाली तर नांव बदलीन माझं !”

“धन्य आहे तुमची पंत !”

© प्रमोद वामन वर्तक

ताजा कलम – आपल्यापैकी कोणी नुकतीच स्टेशनं जवळची जागा बदलली असेल आणि वश्या सारखा झोपेचा प्रॉब्लेम आपणास सतावत असेल तर वरील उपाय करून बघायला हरकत नाही !

२२-०४-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ 72वर्षा पूर्वीच्या हळदी-कुंकवाच्या निमंत्रण पत्रिका ☆ संग्रहिका – सुश्री स्नेहल रोकडे ☆

☆ इंद्रधनुष्य ☆

☆ 72वर्षा पूर्वीच्या हळदी-कुंकवाच्या निमंत्रण पत्रिका ☆ संग्रहिका – सुश्री स्नेहल रोकडे ☆

☆ 72वर्षा पूर्वीच्या हळदी-कुंकवाच्या निमंत्रण पत्रिका ☆

संग्राहिका : सुश्री स्नेहल रोकडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 91 ☆ फाँस ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक संवेदनशील लघुकथा ‘फाँस’. डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस ऐतिहासिक लघुकथा रचने  के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 91 ☆

☆ लघुकथा – फाँस ☆ 

अर्चना बालकनी में खड़ी बिजली के तार पर बैठी गौरैया को देख रही थी जिसने बच्चों के उड़ जाने के बाद अभी – अभी घोंसला छोड़ दिया था। घोंसला सूना पड़ा था। कुछ दिन पहले ही चूँ –चूँ  की आवाजों से लॉन गूँजा करता था।  जैसे बच्चों के रहने से घर में रौनक बनी रहती है। घोंसले का सूनापन घर के सन्नाटे को और बढ़ा रहा था। फ्लैशबैक की तरह पति की  एक- एक बात उसके दिमाग में गूँज रही थी –  ‘टू बेडरूम हॉल किचन के फ्लैट से क्या होगा ? कम से कम थ्री बेडरूम हॉल किचन का फ्लैट होना चाहिए। एक  बेटे – बहू का, दूसरा बेटी- दामाद या कोई मेहमान आए तो उसके लिए और तीसरा बेडरूम हमारा। ऐश करेंगे यार, पैसे कमाए किस दिन के लिए जाते हैं।‘  बड़े चाव से खरीदे तीन बेडरूम के फ्लैट में आज सन्नाटा पसरा था। बेटी की शादी हो गई,  कभी – कभार आ जाती हैं सुख – दुख में। बेटे को एम.एस करने विदेश भेजा था,  वह वहीं रम गया।  तीसरे में अकेली रह गई वह। क्यों ???  शादी के बीस साल बाद उसके पतिदेव को समझ में आया कि वे दोनों अब साथ नहीं रह सकते। उसने पति के फोन पर कई बार उसके ऑफिस की एक महिला की चैट पढ़ी  थी। इस पर उसने सवाल भी किए थे पर पति ने उसे तो यही जताया कि ‘तुम हमें समझ ही नहीं सकीं। गल्ती तुम्हारी ही है जो मुझे बांधकर ना रख सकीं। यह तो औरतों का काम होता है पति और बच्चों को संभालना। मेरा क्या ? ‘जो भी राह में मिला, हम उसी के हो लिए’ गीत गुनगुना दिया उसने। दो बेडरूम  खाली रह सकते हैं यह तो उसे मालूम था लेकिन तीसरा ?

 फाँस बहुत गहरी चुभी थी। समझ ही नहीं पाई कि कहाँ,  क्या गलत हो गया? खुद को  कितना समझाती पर चुभन कम नहीं होती। फाँस कुरेद रही थी  उसे भीतर ही भीतर – ‘ इतने वर्षों का साथ, पर एक पल नहीं लगा घरौंदा बिखरने में ? पति और बच्चों के इर्द- गिर्द ही तो जीवन था उसका। मकान को घर बनाने में उसने जीवन खपा दिया। किसी बात का कोई मोल नहीं ? ‘ आँसू थम नहीं रहे थे, दिल बैचैन जोर से धड़कने लगा,  घबराकर फिर से बालकनी में जाकर घोंसले को देखने लगी। गौरैया आकाश में दूर उड़ गई। अर्चना हसरत भरी निगाहों से गौरैया को उड़ते देख रही थी।

© डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – [email protected]  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 96 ☆ बहकते कदम दर कदम… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक सार्थक एवं विचारणीय रचना  “बहकते कदम दर कदम…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 96 ☆

☆ बहकते कदम दर कदम… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’  

जिधर देखो उधर बस हंगामें  की स्थिति नज़र आ रही है। कभी पिक्चर, कभी शोभा यात्रा, कभी अजान, कभी चालीसा। कोई भी कहीं थमना नहीं चाहता। बस भागम- भाग में अशांति का वातारण बनाते हुए दोषारोपण की राजनीति हो रही है। ऐसा लगता है मानो सारे निर्णय पलक झपकते ही होने लगे हैं। पहले तो वर्षों बीत जाते थे, फाइल खिसकने में तब कहीं जाकर कोर्ट से डेट मिलती वो भी इलास्टिक की तरह खींच- तान का शिकार होकर कई बार टूट कर अपना अस्तित्व तक खो देती थी। 

शायद यही सब वजह है लोगों के इतना अशांत होने की। शांति और सन्नाटा दो अलग- अलग चीजे हैं। एक में सुकून की आहट छुपी होती है तो दूसरे में अनचाहा डर समाहित होता है। एक छोर को  दूसरे छोर से मिलाने की होड़ में हम लोग अपने -अपने दायित्व भूलकर अधिकारों की माँग जब -तब उठाते हुए देखे जा सकते हैं। सही भी है लोगों ने हर चीज का इतना इंतजार किया है कि अब वे बात- बात पर भड़कने लगे हैं। इसी संदर्भ में एक किस्सा याद आता है।

पिक्चर देखकर  लौटते हुए चार दोस्त आपस में बात- चीत करते हुए चले आ रहे थे।  पहले ने कहा नाम देखकर ही पता चल जाता है कि पिक्चर अच्छी होगी या नहीं, दूसरे ने कहा इतंजार नाम था  बेचारे दर्शक इंतजार ही करते रहे गए, तीसरे ने कहा गीत तो अच्छे थे हीरोइन भी अच्छी होती तो बात बन जाती। चौथे ने कहा  अधूरी सी लग  रही थी फिल्म इसका मतलब इंतजार करो, आगे भाग दो भी आयेगा, तब सारी मनोकामनाएँ पूरी हो जायेंगी।

क्या यार? यही तो मुश्किल है, पहले पहली तारीख़ का इंतजार करो फिर फ़िल्म के पहले शो का पहला टिकिट, फिर दोस्तों का,फिर फिल्म के पसंद आने का फिर इसके रिटर्न्स इंतजार 2 का बस यही  जिंदगी है? ऐसा लगने लगा है।

दूसरे ने कहा तू  इतने से ही घबरा गया अभी तो बहुत से इम्तहान बाकी हैं,तीसरे ने कहा बिल्कुल वैसे ही जैसे पिक्चर अभी  बाकी है, चौथे ने दार्शनिक अंदाज़ में कहा इंतजार का फल मीठा होता है सखे।

चारो  दोस्त खिलखिला कर हँस पड़े और गुनगुनाते हुए  चल  दिए …..

इन्तहा हो गयी, इंतजार की,

आयी न  कुछ ख़बर मेरे…भविष्य की।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – कविता – बारिश ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – कविता – बारिश ??

देखी तो होगी

तुमने बारिश,

सारा गर्द

झाड़-पोंछकर

प्रकृति का

मूल शृंगार लौटाती;

उसे फिर हरा बनाती,

बस कुछ इसी तरह है

आँख का पानी

और उसका बरसना..,

सारा गर्द धोकर

फिर भर देता है

पुतलियों में अनंत स्वप्न,

सपने देखने की अभीप्सा,

यथार्थ कर सकने की

अदम्य जिजीविषा..!

© संजय भारद्वाज

 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 110 –“शिवाजी व सुराज” … श्री अनिल माधव दवे ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जिन्होने  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक से यह स्तम्भ लिखने का आग्रह स्वीकारा। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है।  उनका पारिवारिक जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है श्री अनिल माधव दवेजी  की पुस्तक “शिवाजी व सुराज” की समीक्षा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 110 ☆

☆ “शिवाजी व सुराज” … श्री अनिल माधव दवे ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆ 

पुस्तक – शिवाजी व सुराज

लेखक. अनिल माधव दवे, दिल्ली

पृष्ठ संख्या 224

प्रभात प्रकाशन, दिल्ली

भारत के इतिहास में छत्रपति शिवाजी महाराज एक सर्वगुण संपन्न सुयोग्य शासक के रूप में प्रतिष्ठित है। उनका चरित्र वीरता , राज्य व्यवस्था, राजनैतीक चातुरी, परिस्थितियों की समझ, समस्याओं के समाधान निकालने की सूझबूझ और शांति की चिन्ता के गुण उन्हे युग युगों तक एक आदर्श राजा  के रूप में याद करने को विवश करते रहेंगे। वे आदर्श राजा थे और  विवेकशील  निर्णय लेकर उसे जनहित में कार्यान्वित करने में अद्वितीय सफल शासक थे। भारत 15 अगस्त 1947 को ब्रिटिश शासन से मुक्त हो  गया पर अभी तक सुराज स्थापित नहीं हो सका है। मार्ग में नित नई कठिनाइयाॅं आ पड़ती हैं। लेखक एक विवेकवान व्यक्ति है। अतः आज की परिस्थितियों में सुधार कैसे हो, सुराज की स्थापना कैसे की जाय इसकी चिंता है और इसी भावना को व्यक्त करने के लिये उन्होंने इस पुस्तक की रचना की है । जिसमें शिवाजी के राज्य काल की व्यवस्था उनके सफल निर्णयों की योग्यता, उनके जन हित कारी दृष्टिकोण से संकलित सभी कार्यो का प्रमाणिक प्रस्तुतीकरण कर (शिवाजी के राज्य व्यवस्था के विभिन्न दस्तावेजों की प्रति देते हुये) एक सही रीति नीति के अपनाये जाने का संकेत आज के शासन करता के लिये उपस्थित किया है। आज शिवाजी महाराज की रीति नीति अनुकरणीय है यही लेखक के द्वारा संकेत दिया गया है।

शिवाजी के बचपन से उनके राज्य के सुयोग्य शासक होने तक के विभिन्न प्रसंगों का उल्लेख मार्ग की समस्याओं और उनके सामयिक सफल निर्णयों का सहज उल्लेख कर लेखक ने शासन को सुखद और सफल रीति से संचालन को शिवाजी से सीखने का मनोभाव है। प्रतिकूलतायें व्यक्ति को तराषती हैं। गल्तियाॅं उपलब्धियाॅं और अवसर से हर रोज एक नया पाठ पढ़ाते है। समय के साथ चलते-चलते यही व्यक्तित्व एक आकार ग्रहण कर लेता है। 

आज  भारतीय राजनीति के विभिन्न पदों पर पहुॅंचने के लिये पाखण्ड प्रधान गुण बन गया है। छद्म विनम्रता का अभिनय, संस्था संगठन व सरकारों में चयन और निर्णयों के कारण बनने लगे तब हर शासक के लिये यह समय सम्हल कर चलने और स्वयं को सार्वजनिक जीवन में जीवन बनाये रखने के लिये पूर्व नायकों से सीख लेकर सत्य व धर्म की स्थापना कर सुव्यवस्थित सरकार  चलाने की जरूरत का है। उन सबके लिये जो आज शासन में किसी भी पद पर है, शिवाजी के स्वराज संचालन के सभी गुण दिशा सूचक यंत्र बनें तथा उनके सफलता मंत्र भी। इस आस्था और विश्वास के साथ यह कृति सत्य के साधकों को सादर प्रस्तुत है।

व्यक्तिगत गुण – निर्भीकता, शीघ्र निर्णय क्षमता, परिस्थिति की सही समझ और दूरदर्शिता, सही समय पर निर्णायक चोट करने की योग्यता, जन साधारण के प्रति स्नेह भाव, चारित्रिक पवित्रता, धार्मिकता, आत्म विश्वास, स्त्री जाति के लिए सम्मान की भावना, ईमानदारी, देश प्रेम, सबके साथ सद्भाव व प्रामाणिक व्यवहार, शासन में सदाचार, कुशल शासन व्यवस्था, कृषि, व्यापार की प्रगति की नीति, न्याय की प्रखर व्यवस्था, जन संपर्क की सजगता कर्मचारियों के मन में विश्वास जगाना उनका उचित सम्मान, दुष्मन के प्रति कठोरता, विज्ञान की प्रगति, आवागमन के साधनों को बढ़ाना। विद्वत जनों की सुरक्षा तथा सम्मान योग्य मंत्रि मण्डल का गठन सेना का सही संगठन और प्रशिक्षण, कूटनीति, योजाना संचालन, भ्रष्टाचार पर रोक,  विकास के उपक्रम व सुराज के संवर्धन की हार्दिक चाह और कार्य शिवाजी के मौलिक गुण हैं जो सबके लिए अनुकरणीय हैं।

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ समय चक्र # 106 ☆ कविता – पांचाली का चीर ☆ डॉ राकेश ‘चक्र’ ☆

डॉ राकेश ‘ चक्र

(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी  की अब तक शताधिक पुस्तकें प्रकाशित हो चुकी हैं।  जिनमें 70 के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों  से  सम्मानित/अलंकृत।  इनमें प्रमुख हैं ‘बाल साहित्य श्री सम्मान 2018′ (भारत सरकार के दिल्ली पब्लिक लाइब्रेरी बोर्ड, संस्कृति मंत्रालय द्वारा  डेढ़ लाख के पुरस्कार सहित ) एवं उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान द्वारा ‘अमृतलाल नागर बालकथा सम्मान 2019’। आप  “साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र” के माध्यम से  उनका साहित्य आत्मसात कर सकेंगे । 

आज प्रस्तुत है आपका एक सार्थक एवं भावप्रवण कविता  “पांचाली का चीर”.

☆ साप्ताहिक स्तम्भ – समय चक्र – # 106 ☆

☆ पांचाली का चीर ☆ 

कीटों जैसा दंश मारता

कभी मनुज अलबेला।

करता तांडव नृत्य जगत यह

अद्भुत न्यारा मेला।।

 

मर रही है कामना सब भोगने की।

प्रार्थनाएं भी विफल हैं रोकने की।

फागुनी मधुमास भी फीका लगे है,

श्वान को आदत पड़ी है, भौंकने की।

 

पांचाली का चीर खींचती

नित्य अमंगल बेला।।

 

प्रार्थना भी शक्तिहीना हो गई अब।

मर रहीं संवेदनाएँ नित नई अब।

कामनाओं से हताहत जिंदगी है,

प्रेम की भी वर्जनाएँ हैं कई अब।

 

मार्ग रोकता है अर्जुन का,

दुर्योधन का रेला।।

 

अब हवाएँ थक रहीं दूषित कणों से।

पक्षपाती है सभा पूजित गणों से।

विदुर भी अब क्या करें, भगवत शरण में,

भीष्म भी धृतराष्ट्र के मरते फनों से।

 

शुक्राचार्य गुरू के भी सब,

खल कुमार्गी चेला।।

 

अस्मिता बचती रही ईश्वर शरण में।

अंतसी विश्वास है ,सेवा वरण में।

मैं युधिष्ठिर धर्म की हूँ सोचता,

मृत्यु का स्वागत करूँ,हर ही क्षण में।

 

मैं अकिंचन जीव मानव ,

भीड़ में  चलता अकेला।।

 

© डॉ राकेश चक्र

(एमडी,एक्यूप्रेशर एवं योग विशेषज्ञ)

90 बी, शिवपुरी, मुरादाबाद 244001 उ.प्र.  मो.  9456201857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares