मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सामान — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ सामान — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकतीच दिवाळी होऊन गेली  आणि दिवाळी निमित्ताने भारतात आलेली कीर्ती परत अमेरिकेत जायला निघाली.

आई- वडिल, सासू -सासरे इतर काही नातेवाईक यांच्या गोतावळ्यात बसलेली कीर्ती एका डोळ्यात हसू एका डोळ्यात आसू घेऊन रमलेली होती. 

सगळे तुला जाताना हे हवे का? ते हवे का? विचारत होते. आई- सासूबाई वेगवेगळी पिठे लोणची ई. खायचे पदार्थ द्यायची तयारी करत होते. 

सहज कीर्ती म्हणाली किती सामानाची अदलाबदल करत असतो ना आपण••• लहानपणची भातुकली बाहुला बाहुली लग्नाचे वय झाले की सोडतो, लग्न झाले की माहेर , माहेरच्या काही गोष्टी सोडतो, लग्नानंतरही नवर्‍याची बदली, दुसरे घर बांधणे , ई काही कारणाने नेहमीच सामान बदलत रहातो. आणि मग बदल हा निसर्ग नियम आहे असे वाक्य कीर्तीला आठवले आणि आपण सतत सामान बदलतो आहे म्हणजे नैसर्गिक जीवन जगतो आहे असे वाटले.

आता सुद्धा भारतात यायचे म्हणून अमेरिकेहून काही सामान मुद्दाम ती घेऊन आली होती आणि जाताना ते सामान तिकडे मिळते म्हणून येथेच सोडून नव्याच सामानासह ती अमेरिकेला निघाली होती.

आपल्या माणसांचे प्रेम जिव्हाळा पाहून ती सुखावली असली तरी यांना सोडून जायचे म्हणून मन भरून येत होते.

कितीही निवांत सगळी तयारी केली, आठवून आठवून आवश्यक सामानाने तिची बॅग भरली तरी ऐनवेळी जाताना लगीन घाई होऊन कोणी ना कोणी अगं हे असू दे ते असू दे म्हणून तिच्या सामानात भर घालतच होते.

जाण्याचा दिवस आला आणि सगळे सामान  घेऊन ती बाहेर पडली आणि गोतावळा भरल्या अंत:करणाने तिला निरोप देत होते. बायबाय टाटा करत होते आणि अरे आपले खरे सामान म्हणजे हा गोतावळा आहे आणि तेच आपण येथे ठेऊन अमेरिकेत जात आहोत या विचाराने तिच्या काळजात चर्रर्रss झाले आणि ते भाव तिच्या डोळ्यातून गालावर नकळत वाहिले.

काही जण विमानतळापर्यंत तिला सोडायला आले होते. तेथेही पुन्हा यथोचित निरोप घेऊन कीर्ती एकटीच आत गेली. फ्लाईटला अजून उशीर असल्याने वेटिंगरूम मधे बसली आणि आपली मुले नवरा तिकडे अमेरिकेत वाट पहात आहेत. तिकडे आपले घर आहे आपल्याला त्यासाठी तिकडे जावेच लागणार••• नाईलाज आहे याची जाणिव होऊन कीर्ती सावरली. 

तरी तिच्या मनातून ईथले क्षण, इथला परिवार त्यांचे बोलणे हसणे वागणे हे जातच नव्हते. तिकडच्या आठवणींनी जबाबदारी तर इकडच्या आठवणीतून जपलेली आपुलकी माया प्रेम दोघांची सरमिसळ होऊन मन हेलकावू लागले असतानाच तिला तिचे कॉलेजचे दिवस पण आठवू लागले•••

ती आणि विजय एकाच कॉलेजमधे वेगवेगळ्या शाखांमधे शिकत असले तरी स्पर्धांच्या निमित्ताने एकत्र येत होते. दोघांचे विचार जुळले आणि नकळत ते प्रेमात गुंतले. पण लग्न करायचे म्हटल्यावर त्याच्याघरून कडकडून विरोध झाला आणि विजयनेही तिला सॉरी म्हणून विसरून जा म्हटले. 

किती भावूक झाली होती ती••• त्यातून नकळत तिच्या तोंडून पूर्ण गाणेच बाहेर पडले होते•••

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

ओ ओ ओ ! सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं

और मेरे एक खत में लिपटी रात पड़ी है

वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है – २

पतझड़ है कुछ … है ना ?

ओ ! पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट

कानों में एक बार पहन के लौट आई थी

पतझड़ की वो शाख अभी तक कांप रही है

वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

एक अकेली छतरी में जब आधे आधे भीग रहे थे – २

आधे सूखे आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी

गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो ! 

वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो

एक सौ सोला चांद कि रातें एक तुम्हारे कांधे का तिल – २

गीली मेंहदी कि खुशबू, झुठ-मूठ के शिकवे कुछ

झूठ-मूठ के वादे सब याद करा दूँ

सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो – २

एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

मैं भी वहीं सो जाऊंगी

खरच असे कितीतरी सामान आपण आपल्या मनातही ठेवत असतो नाही का? पण परिस्थिती आली तर अवघड असूनही ते सामानही फेकून देता आले पाहिजे. आणि तेच कीर्तीने केले असल्याने ती नव्या माणसाचे नव्या घरातले सामान त्यामधे ठेऊ शकली होती.

मग अध्यात्माने तिचे मन नकळतच भरले आणि आपल्या मनाची सफाई जो नेमाने करतो त्याचे जीवन सौख्य शांती समाधानाने भरून पावते हे वाक्य आठवले. काही लोकांबद्दलचा राग, मत्सर, हेवा ई. अनेक विकारांचे सामान मनात साठले तर शांती समाधान सौख्य ठेवायला जागा उरत नाही म्हणून वेळीच हे नको असलेले सामान बाहेर फेकून दिले पाहिजे तरच सगळे व्यवस्थित होऊ शकते. याचा अनुभव तिने घेतलाच होता.

फ्लाईटची वेळ आली आणि ती सगळे सोपस्कार करून विमानात बसली मात्र, तिला जाणवले साधा प्रवास म्हटला तरी आपण किती सामान जमवतो? आधारकार्ड,पासपोर्ट,व्हिसा,एअर टिकेट••• प्रवास संपला तर टिकेट फेकून देतो पण इतर सामान जपूनच ठेवतो.

अमेरिकेत पोहोचायला २२ तासांचा अवधी होता. कीर्तीचे विचारचक्र चालूच होते.

तिच्या बाजूच्या सीटवरील व्यक्ती सांगत होती, त्या व्यक्तीचे वडील काही दिवसांपूर्वी वारले आणि त्यासाठी सगळी महत्वाची कामे सोडून त्या व्यक्तीला भारतात यावे लागले होते. 

आपल्याच विचारात गर्क असलेली कीर्ती अजून विचारात गढली गेली. जाणारी व्यक्ती निघून गेली पण तिने जमा केलेली माया मालमत्ता स्थावर जंगम हे सगळे इथेच सोडून गेली की••• हौसेने,जास्त हवे म्हणून, आवडले म्हणून, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून, आपल्या माणसांना आवडते म्हणून आयुष्यभर माणूस कोणत्याना कोणत्या कारणाने सामान जमवतच जातो पण तो••• क्षण आला की सगळे सामान येथेच ठेऊन निघूनही जातो•••

तेवढ्यात तिला आठवले कोणीतरी सांगितले होते की परदेशात जायचे तर तिथली करंन्सी न्यायला लागते. मग इथले पुण्यकर्म हीच परलोकातील करन्सी असल्याने हे पुण्यकर्माचे सामानच जमवले पाहिजे. 

ती अमेरिकेत पोहोचली होती पण आता ती पुण्यकर्माचे आधारकार्ड, स्वर्गाचा व्हिसा आणि सुगुणांचा पासपोर्ट हे सामान जमवण्याच्या विचारातच …

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। योगायोग ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ।। योगायोग ।। – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(नीताची नोकरी संपली आणि  नीता रिटायर झाली.होणाऱ्या निरोप  समारंभाला तिने निक्षून नकार दिला आणि घरी परत आली. आता ती करेल तेवढ्या वाटा तिला बोलावत होत्या.) इथून पुढे —

मेघनाने नीताला फोन केला आणि म्हणाली, “आई आता जर कारणं सांगितलीस तर बघच. झाली ना नोकरी पूर्ण? मग कधी येतेस माझ्याकडे ते सांग.” तिने न विचारता नीताला तिकीटच पाठवलं आणि नीताला मग मात्र अमेरिकेला जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. एअरपोर्टवर आलेल्या गोड नातीनं आजीच्या कमरेला मिठी मारली आणि ‘ आज्जू ‘ अशी हाक मारल्यावर नीताचे डोळे भरूनच आले. मेघनाने तिला जवळ घेतले आणि कारमध्ये बसवलं. वाटेत नात अस्मि नुसती चिवचिवत होती आणि तिला खूप आनंद झाला आपली आज्जू आली म्हणून. किती तरी साठलेलं बोलून घेतलं मायलेकींनी आणि दिवस कसे जात हेच समजेना नीताला. मेघनाला नीताने सांगितलं नव्हतं की ती ब्रेल शिकली आणि ब्लाइंड स्कूलमध्ये जाते. तिला मुद्दाम सांगायची वेळच आली नाही.

त्या दिवशी नीताला घेऊन मेघना आणि अस्मि तिथल्या लायब्ररीत  गेल्या होत्या. सहज बघितलं तर नीताला तिकडे एक सम्पूर्ण सेक्शन ब्रेल पुस्तकांचा दिसला. नीता अतिशय   एक्साइट होऊन त्या सेक्शनमध्ये गेली. तिकडे वाचनाचीही सोय होती. काही मोठी अंध मुलं, काही लहान मुलं ब्रेल पुस्तकं घेऊन वाचत होती. नीताचे हृदय भरून आलं. त्या अंध छोट्या मुलाजवळ ती  आपण होऊन गेली आणि म्हणाली “ खूप सुंदर पुस्तक आहे ना हे? फेअरी टेल्स? तू हॅन्स अँडर्सनच्या परीकथा वाचल्या आहेस का? जरूर वाच हं. आहेत बरं का त्या ब्रेल मध्ये.”  तिने त्याला एक गोष्ट वाचून दाखवली. तो मुलगा इतका खूष झाला. “ आंटी, प्लीज आणखी एक स्टोरी वाचाल का? तुम्ही इंडियन आहात का? तुमचा एक्सेन्ट अमेरिकन नाही, पण तुम्ही छान वाचता. थँक्स.” त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.  म्हणाली, “ माझा ख्रिस जन्मांध नाही पण हळूहळू त्याची दृष्टी कमी होत गेली. खूप उपाय केले आम्ही पण नाही उपयोग झाला. तुम्ही किती सहज ब्रेल पुस्तक वाचले.मला येईल का हो शिकता? “ नीता म्हणाली “ नक्की येईल. इथे अशा संस्था नक्की असतील ज्या तुम्हाला ब्रेल शिकवतील. करा चौकशी. नाही तर मी शिकवींन तुम्हाला. मी इथे आहे अजून चार महिने “ नीताचा फोन नंबर घेऊन त्या आभार मानून निघून गेल्या. मेघना हे थक्क होऊन बघत होतो. “आई,अग काय हे ! कधी शिकलीस तू हे? कित्ती ग्रेट आहेस ग! “ नीता मेघना अस्मि घरी आल्या. अतुलला हे सगळं मेघनाने सांगितलं..,तो म्हणाला, “ आई खरच ग्रेट आहात हो तुम्ही.”

नीताच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आपल्या मैत्रिणी आपल्याशी कशा  वागल्या ,माणसं कशी लगेच बदलतात हे सांगितलं आणि म्हणाली, “ माझा आता त्यांच्यावर राग नाही ग. मला उलट ही नवी वाट सापडली म्हणून मी आभारच मानेन त्यांचे. नाहीतर बसले असते पिकनिक करत आणि वेळ वाया घालवत.” मेघना आणि अतुलला अतिशय कौतुक वाटले नीताचे. मिसेस वॉल्सने ही बातमी सगळ्या मैत्रिणींना सांगितली आणि नीताचे कौतुक केले. ख्रिसची शाळा बघायला याल का असा फोन आला मेघनाला. पुढच्या आठवड्यात  नीताला घेऊन अस्मि मेघना अतुल ब्लाइंड स्कूलमध्ये गेले. ती छोटी छोटी अंध मुलं बघून अस्मि रडायला लागली आणि सगळ्यांचे डोळे पाणावले. ख्रिस नीता जवळ आला आणि म्हणाला, “ ही आंटी माझी फ्रेंड आहे. हो ना आंटी?” नीता म्हणाली “ हो तर !माझा छोटा मित्र ख्रिस आणि तुम्हीही सगळे माझे नवीन छोटे दोस्त. मी आता तुम्हाला माझ्या भाषेतली ,पण तुमच्यासाठी मी इंग्लिश ट्रान्सलेट केलेली गोष्ट वाचून दाखवू का?” मुलं आनंदाने हो म्हणाली. नीताने त्यांना बिरबलाची सुंदर गोष्ट वाचून दाखवली. तिथल्या प्रिंसिपलला फार आश्चर्यआणि कौतुक वाटले नीताचे. तुम्ही आमच्या या मुलांसाठी दर वीकला एकदा येत जाल का?” त्यांनी विचारले. नीता म्हणाली “अगदी आनंदाने येईन मी ! ब्रेल लिपी फार अवघड नाही. तुम्ही या मुलांच्या पालकांना शिकवा ना,, ही लिपी..घ्या त्यांचेही   क्लासेस.”

नीता आनंदाने  घरी परतली.मेघनाला अतिशय आश्चर्य आणि कौतुक आणि अभिमान वाटला आपल्या आईचा. दर आठवड्याला नीताला शाळेची बस न्यायला यायला लागली आणि या मुलांना शिकवताना, त्यांचे नवीन नवीन साहित्य बघताना नीताही खूप काही शिकली या शाळेतून.  बघता बघता नीताचा इथला मुक्काम संपत आला. एक दिवस लाजरा ख्रिस म्हणाला “आंटी माझ्या घरी याल? मला आमचं घर आणि माझी रूम दाखवायची आहे तुम्हाला.” नीताला गहिवरून आलं.” नक्की येईन ख्रिस!” ती म्हणाली. ती जाण्याच्या आधी शाळेतल्या मुलांनी तिला तिने शिकवलेली गाणी म्हणून दाखवली, नाच करून दाखवले. शाळेने नीताचा छोटासा सत्कार केला आणि पुन्हा पुन्हा या ,आमच्या मुलांना तुमच्या भाषेतली गाणी शिकवा, गोष्टी सांगा, असं म्हणत निरोप दिला.

नीताचा हा यावेळचा मुक्काम अतिशय अविस्मरणीय झाला. सहज ती त्या लायब्ररीत जाते काय आणि ब्रेल पुस्तकं तिला दिसतात काय आणि चिमुकला ख्रिस तिथे भेटतो काय ! नीताला अतिशय आनंद झाला. भारतातून आणलेली छोटी ब्रेल पुस्तकं तिने शाळेला दिली आणि ख्रिसला तर आणखी स्पेशल पुस्तक आणि वाजणारे टॉय. मेघना आणि अतुल घरी आले आणि मेघनाने आईला मिठीच मारली. “ आई किती ग कौतुक करु तुझं मी. स्वप्नातसुद्धा वाटलं नाही की तू हे शिकली असशील. खूप मोठं काम करते आहेस ग तू ! मेघनाचे डोळे भरून आले. बाबा गेल्याचे दुःख तर अजूनही आहेच ग.. पण तू धीराने सावरलंस स्वतःला.आणि ही वेगळी वाट निवडलीस याचा अभिमान आहे आम्हाला. आम्ही या  इथल्या शाळेला देणगी देऊच पण हा चेक तुझ्या पुण्यातल्या शाळेला अस्मिकडून.”

“ आज्जू,आता तू दरवर्षी ये आणि  त्या ब्लाइंड स्कूलमध्ये अशीच जात जा आणि ख्रिससारख्या मुलांना

भेट. आज्जू,किती आपण लकी ग.. आपल्याला डोळे आहेत. आणि मी हट्ट करते की मला हेच हवं आणि हाच ड्रेस हवा. आज्जू,थँक्स.मी आता कधीही हट्ट करणार नाही आणि नेहमी मॉमबरोबर ख्रिसला भेटायला जाईन.” चिमुकली अस्मि म्हणाली. नीताने तिला जवळ घेतले. गहिवरून ती मेघनाला म्हणाली, ” मेघना, हे सगळं घडायला संजयला जायलाच हवं होतं का ग? त्याला किती अभिमान वाटला असता ना.”

मेघना म्हणाली, “आई नको रडू तू. बाबा जिथे कुठे असतील तिथून हे नक्की बघत असतील. पण अस्मि म्हणते तशी दर वर्षी येत जा ग.”

नीता त्यांचा निरोप घेऊन परत आली. तिची इथली गरीब मुलं, तिची शाळा, तिची वाट पहात होती. कुठेही गेलं, कोणतीही भाषा-देश-वर्ण कोणताही असला तरी दुःखाची भाषा मात्र एकच असते हे त्या चिमुकल्या  अंध मुलांना बघून पुन्हा एकदा नीताला प्रकर्षाने जाणवलं.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। योगायोग ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ ।। योगायोग ।। – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

संध्याकाळ झाली होती.नीता अंगणात पायरीवर बसली होती. हा दगडी भक्कम बंगला तिच्या आहे सासऱ्यांचा!कित्ती भक्कम  आणि सुंदर बांधलेला होता तो. नीता अंगणात आली आणि शेजारी फुललेल्या जाईची फुलं तिनं ओंजळ भरून घेतली आणि आत वळणार तोच  पलीकडे रहाणाऱ्या आजींनी हाक मारली.” नीता, ये की चहा प्यायला ! ये !छान केलाय गवती चहा घालून !” नीता कम्पाउंड ओलांडून पलीकडे गेली आणि आजींच्याजवळ झोपाळ्यावर बसली.आजींनी गरम चहा तिच्या हातात ठेवला आणि म्हणाल्या, “ घे ग ही आल्याची वडी !आत्ताच केल्यात– बघ बरी झालीय का? “

“ आजी,एकदम मस्त झालीय. किती हौस हो तुम्हाला या वयात सुद्धा !” नीता म्हणाली.” 

“ अग, आवडतं हो मला करायला. सुनेला ,नातसुनेला कुठला आलाय वेळ? पण मला आवडेल ते करते 

मी ! आहेत भरपूर नोकरचाकर हाताशी. काही काम नसतं  मला ! बरं, कधी आलीस अमेरिकेतून? बरे आहेत ना सगळे?  संजय फार लवकर गेला ग ! एकटी पडलीस बाळा, पन्नाशी जेमतेम उलटली नाही तोवरच ! “ आजींनी मायेने हात फिरवला नीताच्या पाठीवरून ! डोळे भरून आले  नीताचे. 

“आजी राहिले की मी सहा महिने ! आणखी किती रहाणार लेकीकडे. ते सगळे तिकडे सुखात आहेत,

नात मोठी होईल आता आणि शेवटी आपलं घर ते आपलं घर. मला कायम राहायला नाही हो आवडणार तिकडे. आपलं घर आणि आपला परिवार खरा शेवटी. आणि आहेत की तुमच्यासारखे सख्खे शेजारी. आणि मी काम करते ते ब्लाइंड स्कूल, तिथली गोड छोटी मुलं माझी वाट बघत असतील ना ! “ नीता हसत म्हणाली. जाईची ओंजळ तिने झोपाळ्यावर रिकामी केली आणि म्हणाली, “ येते हं.. आजी.थँक्स चहाबद्दल.”  

सहा महिने राहिल्यावर नीता मागच्याच महिन्यात भारतात परतली. दोन वर्षांपूर्वी अचानकच काहीही हासभास नसताना संजय हार्टअटॅकने गेला. नीताची एकुलती एक मुलगी  मेघना लग्न होऊन अमेरिकेला गेली होती आणि तिला तिकडे छान नोकरीही होती. बाबांचे अचानक निधन झाल्यावर मेघना लगेचच भारतात आली आणि एक महिना राहिली. “आई,तू माझ्या बरोबर येतेस का? चल.बरं वाटेल ग तुला.” 

पण नीता नको म्हणाली. “ नको ग मेघना,खूप कामं उरकावी लागतील मला. संजयच्या पेन्शनचं बघावं लागेल, बँकेचे व्यवहार बघावे लागतील. मग नंतर येईन मी नक्की. अग माझी काळजी नको करू तू !

माझी अजून चार वर्षे नोकरी आहे कॉलेज मध्ये. मग मलाही मिळेल पेन्शन. मी घरी बसून तरी काय करू? कॉलेजमध्येही जायला सुरुवात करीन.” नीताने मेघनाची समजूत घातली आणि मेघना एकटीच गेली अमेरिकेला. नीताने आपले रुटीन सुरू केले.  

नीताचे आईवडील नीताच्या लग्नानंतर लवकरच गेले आणि  नीताचे भाऊ  भावजय कोल्हापूरला रहात होते. नीता पुण्यात एकटीच होती. कॉलेजमध्ये तिचा वेळ सुरेख जायचा. तिच्या सहकारी मैत्रिणी मित्र आणि स्टुडंट्सनी नीताला कधी एकटं पडू दिलं नाही. संजय असतानाही अनेक वेळा ती या ग्रुपबरोबर चार दिवसाच्या ट्रीपला सुद्धा जायची.  सहज लक्षात आलं नीताच्या … आपला नेहमीचा ग्रुप चार दिवस दिसला नाही. मग तिने हाताखालच्या  रश्मीला विचारलं “ अग मानसी सुहास कुठे दिसल्या नाहीत ग?”   रश्मी म्हणाली “ मॅम, त्यांचा ग्रुप चार दिवस कोणाच्यातरी फार्म हाऊसवर नाही का गेला? तुम्हाला माहीत नाही का? “ नीता गप्प बसली. पुढच्या आठवड्यात सुहास तिच्याजवळ आली आणि म्हणाली “ रागावलीस का? पण तुला कसं विचारावं असं वाटलं आम्हाला ! आम्ही सगळे कपल्स ग आणि तू एकटी ! तुला  ऑकवर्ड झालं असतं ग, म्हणून नाही बोलावलं. “ नीता काहीच बोलली नाही पण तिनं खूणगाठ बांधली मनाशी की संजय गेल्याने आपल्या आयुष्याचे संदर्भ बदलले. तिला म्हणावेसे वाटले, ‘ संजय असतानाही मी एकटीच तर येत होते कितीतरी वेळा, तेव्हा हा प्रश्न कसा आला नाही तुमच्या मनात ‘. नीताने हळूहळू या ग्रुपशी संबंधच कमी करून टाकले. आपल्यामुळे त्यांना अडचण नको. मनातून अतिशय वाईट वाटलं तिला, पण हे करायचंच असा निर्णय घेतला तिनं. एका माणसाच्या जाण्यानं आपल्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स उभे रहातील याची कल्पनाच नव्हती नीताला. तिने आपलं मन काढून घेतलं या लोकांतून !अतिशय मानसिक त्रास झाला तिला पण मुळात अतिशय खम्बीर असलेली नीता हाही आघात झेलू शकलीच. 

त्या दिवशी दबक्या पावलांनी सुहास नीता जवळ आली आणि म्हणाली, “ नीता अशी नको आमच्याशी तुटक वागू !आपली किती वर्षाची  मैत्री एकदम तोडून नको टाकू. आम्हाला खूप वाईट वाटतं ग. परवा माझ्या मुलीचं, तुझ्या लाडक्या अश्विनीचं मी डोहाळजेवण करतेय. तू नक्की नक्की ये बरं का..मला फार वाईट वाटेल तू नाही आलीस तर. “ .यावर शांतपणे नीता म्हणाली, “ खूप खूप अभिनंदन सुहास.आणि थँक्स मला तू बोलावलंस म्हणूनही. पण तुझ्या घरी आजेसासूबाई, सासूबाई आहेत. त्यांना माझ्यासारखी विधवा आलेली चालणार नाही. मी ओटी भरलेली तर मुळीच नाही चालणार..  नकोच ते. मी येणार नाही. अग मी हे तुझ्यावर रागवून नाही म्हणत पण आता अनुभव घेऊन शहाणी नको का व्हायला? अश्विनीला माझे आशीर्वाद सांग.” गोऱ्यामोऱ्या झालेल्या सुहासकडे न बघता नीता तिथून उठून गेली. हा बदल नीताने स्वीकारला पण तिला ते सोपे नाही गेले. आता नोकरीची तीन वर्षे राहिली होती. नीताने विचार केला ही नोकरी संपली की आपण काहीतरी सोशल वर्क करूया. नीताने आता कॉलेज सुटल्यावर ब्रेल लिपी शिकण्याचा क्लास लावला. फार आवडला तिला तो. हळूहळू नीता ब्रेलमधली पुस्तकं सहज वाचायला शिकली. तिचा जुना मैत्रिणीचा ग्रुप कधी सुटला तिला समजलं पण नाही आणि वाईट तर मुळीच वाटलं नाही. 

नीताला  ब्रेल शिकवणारी मुलगी अगदी तरुण होती. तिने एम एस डब्ल्यू  केल्यावर ब्लाइंड स्कूलमधेच नोकरी करायची ठरवली होती आणि आपण होऊन ब्रेल शिकणाऱ्या नीताचे तिला फार कौतुक वाटले. आता रोज नीता ब्लाइंड स्कूलमध्ये जाऊन छोट्या मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवू लागली. किती आनंदाच्या वाटा खुल्या झाल्या नीताला ! नीता रमून गेली तिकडे. ही  ब्रेल शिकवणारी तरुण मुलगी नीना तर तिची मैत्रिणच झाली .नीताची नोकरी संपली आणि  नीता रिटायर झाली. होणाऱ्या निरोप  समारंभाला तिने निक्षून नकार दिला आणि घरी परत आली. आता ती करेल तेवढ्या वाटा तिला बोलावत होत्या. 

क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ थ्रिल —– भाग – 2 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ थ्रिल —– भाग – 2 ☆ श्री दीपक तांबोळी

(“ते सोड.एक गोष्ट लक्षात ठेव तिथंही तुला दारु,सिगरेट पिता येणार नाही.गुटखा खाता येणार नाही.मुलींसमोर तुझी इमेज खराब करु नकोस”

“तुमची शपथ दादा.मी हातही लावणार नाही”) इथून पुढे —

पुढच्या महिन्यात सुऱ्या अष्टविनायक यात्रेला गेला.त्याअगोदर मी या सायकल सफरीची बातमी आणि सहभागी तरुणांचे फोटो वर्तमानपत्रात दिले होते .आपलं नांव आणि फोटो पेपरमध्ये पाहून सुऱ्याला आनंदाचं उधाण आलं.आपल्या सगळ्या टपोरी मित्रांना ते तो दाखवत सुटला.

अष्टविनायक सफर करुन परत आल्यावर सुऱ्या मला भेटायला आला.जाम खुष होता.किती सांगू किती नाही असं त्याला झालं होतं. सुसंस्कृत मुलामुलींमध्ये राहिल्यामुळे त्याच्या वागणूकीत प्रचंड फरक पडला होता.बोलण्यात, वागण्यात सभ्यपणा आला होता.

” दादा आता यापुढे काय करायचं?”उत्साहाने त्याने विचारलं.

” यापेक्षाही चांगलं थ्रिल तुला पाहिजे असेल तर तुला हिमालयात ट्रेकिंगला जावं लागेल”

” ट्रेकिंग?काय असतं हे?”

मी त्याला सविस्तर सांगितलं.राँक क्लायंबिंग आणि रँपलिंगचीही माहिती दिली.तो रोमांचित झाला

“पण याकरीता खुप पैसा लागतो.त्याच्यासाठी तुला काम करुन तो जमवावा लागेल”

“सांगा दादा.मी काहीही काम करायला तयार आहे”

” माझे एक वकील मित्र आहेत.त्यांना आँफिसकामासाठी एका मुलाची गरज आहे.तू जाशील?पाच हजार देतील ते”

” जाईन दादा.असाही टपोरीगिरी करण्यापेक्षा पैसे कमवले तर घरचेही खुष रहातील”

” हो पण तिथे गेल्यावर असं तोंडात गुटखा ठेवून काम नाही करता येणार.नाहितर ते वकीलसाहेब पहिल्याच दिवशी तुला हाकलून देतील”

” नाही दादा.ड्युटी संपल्यावरच मी गुटखा खाईन “

 सुऱ्या देशमुख वकीलांकडे जायला लागला.देशमुख वकील खुप हुशार,इमानदार पण कडक स्वभावाचे होते.सुऱ्याचं आयुष्यच तिथे बदलणार होतं.

५-६ महिने काम करुन पैसे जमवल्यावर मी सुऱ्याला ट्रेकिंगला हिमालयात पाठवलं.तिथलं साहस,निसर्गसौंदर्य पाहून तो वेगळी द्रुष्टी घेऊनच परत आला.आयुष्यातलं खरं थ्रिल पाहून तो दारु,सिगारेटमधलं थ्रिलं विसरला.आमची भेट झाल्यावर तो मला म्हणाला.

” प्रशांतदादा आयुष्यात काहीतरी असंच वेगळं करत रहावं असं वाटतंय पण काही सुचत नाहीये”

“सुऱ्या अरे तू रोज देशमुख वकीलांकडे जातो.निरपराधी लोकांना गुन्ह्यातून सोडवणं,न्याय मिळवून देणं आणि अपराधी लोकांना सजा देणं हे काम ते नेहमीच करत असतात.त्यात तुला थ्रिल वाटत नाही का?”

त्याचा चेहरा उजळला

” हो वाटतं ना!पण माझा त्याच्याशी काय संबंध?”

“सुऱ्या अरे तू वकील झालास तर हे थ्रिल तुला अनुभवता येईल”

त्याचा चेहरा गोंधळलेला आणि केविलवाणा दिसू लागला.

“दादा मी आणि वकील…?”

“हो सुऱ्या.तू मनावर घेतलं तर तेही होईल.पण त्याअगोदर तुला बारावी पास व्हावं लागेल”

“बघतो दादा.विचार करतो”

गोंधळलेल्या अवस्थेतच तो गेला.बारावीच्या परीक्षा जवळच होत्या.मी त्याला फाँर्म भरायला लावला.त्याने परीक्षा मात्र मनापासून दिली.निकाल लागला.आश्चर्य म्हणजे सुऱ्या चांगल्या मार्कांनी पास झाला.तोही काँप्या न करता.सुऱ्याच काय त्याच्या कुटुंबातले सर्वच जण आनंदले.सुऱ्याला मी लाँ काँलेजला प्रवेश घेऊन दिला.सुऱ्या देशमुख वकीलांकडे काम करता करता काँलेजातही जाऊ लागला.

या घटनेला पाच वर्ष होऊन गेली.मी माझ्या विश्वात रमलो.दरम्यान माझंही लग्न झालं.दीड वर्षात मुलगीही झाली.सुऱ्याची आणि माझी भेट आता क्वचितच होत होती.अर्थात देशमुख वकीलांकडून मला सुऱ्या चांगलं काम करत असल्याचं कळत होतंच.अधूनमधून मधूकाकाही येऊन सुऱ्याची ख्यालीखुषाली कळवत होते.पोरगा चांगल्या लाईनला लागला म्हणायचे.त्याचं गुटखा खाणं आणि दारु पिणं बंद झाल्याचं ते आनंदाने सांगायचे.एका बापाला मुलाकडून अजून काय हवं असतं?

एक दिवस संध्याकाळी मोबाईल वाजला.सुऱ्या बोलत होता.

“प्रशांतदादा घरी आहात का?येऊ का भेटायला?”

“का रे काही प्राँब्लेम?”

“दादा गुड न्युज आहे.मी वकील झालो.मला सनद मिळाली.”

“वा वा सुऱ्या काँग्रँट्स्!ये लवकर मी वाट पहातोय”

तो वकील झाल्याचा मलाच खुप आनंद झाला.माझ्या नजरेसमोर तो गुटखा खाणारा,मुलींची छेड काढणारा आणि लगेच वकीलाचा काळा कोट घातलेला सुऱ्या तरळला आणि माझे डोळे आनंदाने भरुन आले.

 संध्याकाळी मधूकाकांसोबत तो आला.आल्याआल्या माझे पाय त्याने धरले.मी त्याला उचलून जवळ घेतलं तर ढसाढसा रडायला लागला.

“दादा तुमच्यामुळे हे सगळं होऊ शकलं.तुम्ही दिशा दाखवली नसती तर आजही मी तसाच टपोरी राहीलो असतो.”

“अरे मी काहीच केलं नाही सुऱ्या ! मी फक्त तुला आयुष्यातलं खरं थ्रिल काय असतं ते दाखवून दिलं.तू मनाने चांगला होताच फक्त संगतीने बिघडला होतास.तू मेहनत घेतली,कष्ट करुन शिकलास.बघ त्याचे किती चांगले परिणाम झाले.”

“खरंय दादा”

त्याने डोळे पुसत पुसत मला पेढा दिला.

“आता सुऱ्या मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे.तुझ्यासारखे अनेक तरुण,त्यात तुझे काही मित्रही असतील,व्यसनांना थ्रिल समजुन वाया जाताहेत.त्यांना योग्य मार्गावर आणायचं काम तुला करायचं आहे.सुऱ्याने माझ्याकडे विश्वासाने पाहिलं आणि म्हणाला

“नक्की दादा.आजपासूनच त्याची सुरुवात करतो”

तो गेला आणि अशा बिघडलेल्या मुलांना सुधारण्यातही एक वेगळंच थ्रिल असतं याची जाणीव मला झाली.

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ थ्रिल —– भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ थ्रिल —– भाग – 1 ☆ श्री दीपक तांबोळी

काँलेजमधून घरी येतांना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरुन मी वळलो तेव्हा सुऱ्या मला तिथे उभा असलेला दिसला.फकाफका सिगारेट पित होता.मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो.त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं

“काय सुऱ्या कसं काय चाललंय?”

मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं तसा सुरेश उर्फ सुऱ्या एकदम गडबडला.हातातली सिगारेट त्याने पाठीमागे लपवली.मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली.टाईट जिन्सची फाटलेली पँट,इन केलेला लालभडक शर्ट,डोळ्यावर काळा सडकछाप गाँगल.टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार.

“नको लपवू सिगारेट.मी पाहिलंय तुला पितांना” 

त्याने हातातली सिगारेट दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसून म्हणाला.

“साँरी प्रशांतदादा.प्लिज घरी सांगू नका ना”

” नाही सांगणार” 

मी असं म्हंटल्यावर तो कसंनुसं हसला.पण मग त्याने खिशातून विमल गुटख्याची पुडी काढली आणि फाडून तोंडात पुर्ण रिकामी केली.

“अरे काय हे सुऱ्या?सिगरेट झाली, आता गुटखा?कशाला करतो हे सगळं? मधूकाकांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना!”

” थ्रिल!थ्रिल असतं त्यात दादा.तुम्हांला नाही कळणार त्यातलं!”

“हे असलं थ्रिल काय कामाचं?शरीराची नासाडी करणारं.तुला असली थ्रिल अनुभवायचंय?”

” असली थ्रिल??ते काय असतं?दारु पिणं तर नाही ना?ते असेल तर आपल्याला माहितेय!सगळ्या प्रकारची दारु प्यायलोय दादा आपण.गांजा,अफू सगळं झालंय आपलं “

तो ज्या अभिमानाने सांगत होता ते पाहून मला धक्काच बसला.मधूकाका खरंच म्हणत होते पोरगं वाया गेलंय.

“नाही त्यापेक्षा वेगळं आहे.तू शनिवारी संध्याकाळी मला घरी येऊन भेट मी सांगेन तुला”

” बरं दादा तुम्ही म्हणता तर येतो”

मी निघालो पण घरी येईपर्यंत सुऱ्याचेच विचार डोक्यात होते.सुऱ्याचे वडिल ज्यांना आम्ही मधूकाका म्हणायचो,माझ्या वडिलांच्या आँफिसमध्ये शिपाई होते.वडिलांची आणि त्यांची चांगली घसट.सुऱ्या त्यांचा धाकटा आणि लाडाचा मुलगा.इनमीन अठरा वर्षाचा.अति लाड आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला.काँप्या करुन  दहावीत कसाबसा पास झाला पण बारावीत त्याची गाडी अडकली.आँक्टोबरमध्येही नापास झाल्याने त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं.दिवसभर पानाच्या टपऱ्यावर सिगारेट पित,गुटखे खात,येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढण्यात त्याचा दिवस पार पडायचा.त्याला समजावण्याचे सगळे प्रयत्न त्याने हाणून पाडले होते.कुणी व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत त्याला समजावलं की तो एका कानाने शांततेने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा.या व्यसनांना पैसा हवा म्हणून तो स्वतःच्या घरातही चोऱ्या करायचा असं ऐकण्यात आलं होतं.

दोनतीन दिवस सुऱ्याला काय थ्रिल असलेलं काम सांगावं या विचारात असतांनाच एकदिवस मधूकाका घरी आले.सुऱ्याने एका पोरीवरुन कुठंतरी माऱ्यामाऱ्या केल्या होत्या.पोलिसांनी त्याला पकडून नेलं होतं.”तुमच्या पोलिसखात्यात खुप ओळखी आहेत साहेब.प्लिज सुऱ्याला सोडवा ना ” अशी ते वडिलांना विनवणी करत होते.सुऱ्याच्या या नेहमीच्याच भानगडी होत्या म्हणून वडिल नाही म्हणत होते.मग मीही वडिलांना आग्रह धरला.सुऱ्याची चांगल्या वर्तणूकीची ग्वाही दिली.शेवटी वडिलांनी सुऱ्याला सोडवून आणलं.

शनिवारी सुऱ्या मला भेटायला आला.

“काय दादा कसलं थ्रिल सांगणार होते तुम्ही मला?”

” तुझ्याकडे सायकल आहे ना?तिच्यात हवा भर,आँईलिंग कर.उद्या आपल्याला अजिंठ्याला जायचंय सायकलने”

तो एकदम चमकला

” काय?सायकलने?आणि अजिंठ्याला?काय चेष्टा करता दादा?आजकाल कुणी सायकल चालवतं का?आणि तेही इतक्या दूर?त्यापेक्षा बाईकने जाऊ ना”

” काय सुऱ्या कसा रे तू इतका लेचापेचा?बाईकने जाण्यात कसलं आलं थ्रिल?तसं तर कुणीही जाऊ शकतं.आणि तुझ्यापेक्षा आमच्या काँलेजच्या मुली चांगल्या! पाच मुली आणि पाच मुलंही येणार आहेत आपल्या सोबत” 

ही मात्रा बरोबर लागू पडली.मुली आपल्यापेक्षा वरचढ आहेत हे सुऱ्याला कदापिही सहन होणार नव्हतं.

“बरं येतो मी.पण मला जमेल का दादा?”

तो जरा अनिच्छेनेच म्हणाला.

“मुलींना जमू शकतं तर तुला का नाही जमणार?”

तो तोंड वाकडं करुनच गेला.

रविवारी पहाटेच आम्ही निघालो.सुऱ्याच्या पँटचे खिसे सिगारेट्स आणि गुटख्याच्या पुड्यांनी भरलेले खिसे माझ्या लक्षात आले. मी त्या मुलामुलींना सुऱ्याबद्दलची सर्व कल्पना देऊन ठेवली होती.प्रत्यक्षात मी सुऱ्याची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी करुन दिली.सुऱ्या खुष झाला.खरं तर माझ्यासोबतची मुलं सायकलिंग एक्सपर्ट होती.त्यांच्या सायकलीही वजनाने हलक्या आणि चांगल्या होत्या.त्यामुळे त्यांच्या वेगाने चालवणं सुऱ्याला जड जाऊ लागलं.तो मागे पडू लागला की मी त्याला हळूच म्हणायचो “बघ तू सिगरेट पितोस ना त्याचे परिणाम आहेत हे “त्याला ते पटायचं.त्याचबरोबर ” मुलींसमोर गुटखा खाऊ नको त्या तुझा तिरस्कार करतील.पुन्हा कधी ट्रिपला तुझ्यासोबत येणार नाहीत “असं सांगून मी त्याला गुटख्यापासून लांब ठेवत होतो.

रात्री आम्ही परतलो तेव्हा सुऱ्या जाम थकून गेला होता.आधी ठरवून दिल्याप्रमाणे सगळ्या मुलामुलींनी “साधी सायकल असूनही तू खुप चांगली सायकल चालवली.काय स्टँमिना आहे यार  तुझा!” असं म्हंटल्यावर सुऱ्या चांगलाच खुष झाला.सगळे गेल्यावर मला म्हणाला

“मजा आली दादा.काहीतरी वेगळंच थ्रिल होतं यात.पुन्हा काही असं असेल तर जरुर सांगा”

” अरे हीच मुलं पुढच्या महिन्यात अष्टविनायक यात्रेला जाताहेत सायकलने.जायचं का तुला?”

” दादा जायची तर खुप इच्छा आहे पण खुप खर्च येईल ना!”

” काही नाही फक्त ४-५ हजार रुपये.तू जमव काही.उरलेले मी देईन तुला”

“धन्यवाद दादा”

” ते सोड.एक

गोष्ट लक्षात ठेव तिथंही तुला दारु,सिगरेट पिता येणार नाही.गुटखा खाता येणार नाही.मुलींसमोर तुझी इमेज खराब करु नकोस”

“तुमची शपथ दादा.मी हातही लावणार नाही”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एकाकीपणा विकत घेणे आहे – लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

🌸 जीवनरंग 🌸

☆ एकाकीपणा विकत घेणे आहे – लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले

निमिषच्या फोनवर मेसेज आला ‘ फिरायला जायचं आहे, येशील का ? वेळ संध्याकाळी पाच ते सात.’  त्याने चटकन yes रिप्लाय केला. त्याने पत्ता पाठवला. त्याने वॉकिंगच्या स्मायली टाकल्या. आईची चाहूल लागली की फोन बंद केला. आई बघत राहिली. काही विचारावेसे वाटले; पण त्याचा मुड जाईल म्हणून गप्प बसली. चहा घेणार ? विचारले तर मानेनेच नकार दिला. आई निघून गेली.

हल्ली सतत हेच चालले होते. संध्याकाळी 4 नंतर तो जायचा ते 11 पर्यंत यायचा नाही. आईला काळजी वाटायची. सरळ साधा, हळवा, प्रेमळ असणारा निमिष पदवी मानसशास्त्रात घेतली होती. पण नोकरी मिळत नव्हती. कोणताही व्यवसाय करावा तर त्याला भांडवल देण्याची ऐपत नव्हती. नोकरी नाही तर छोकरी नाही हे व्यवहारी गणित त्यांच्याबाबतीत जुळून आलेले. वडीलही कापडाच्या दुकानात काम करत होते. आई डबे करत असे.

त्याच्या बाहेर जाण्याचे गूढ वाढत चालले होते. आईला आता काळजी वाटू लागली की हा रोज कुठे जातो. ह्याला काही वाईट संगत लागली की काय ? असे वाटू लागले होते. आज काल वाट्टेल ते ऐकायला येत होते. अगदी मुले पैसे मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतात त्या सर्व वाईट गोष्टी वाटून गेल्या. स्मगलिंगपासून जिगेलोपर्यंत सगळ्या शंका डोकावून गेल्या. त्याचे काय चालले आहे ते कळत नव्हतं. आजही तो बाहेर पडला की निमिषची आई, सुहृदाने बाबांना, सुमितला फोन केला. आजही निमिष न सांगता गेला. आजही कुणाचा तरी मेसेज आला आणि तो गेला. मला त्याची फारच काळजी वाटू लागली म्हणाली. बाबा म्हणाले “ तो जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत आपण ही बोलायचे नाही. तो वाईट मार्गाला जाणार नाही याची खात्री आहे. तू शांत रहा मी आल्यावर बोलूया “आणि फोन ठेवला.

फोन ठेवला खरा पण काळजी तर त्यांनाही वाटत होतीच दुकान मालकाला सांगून आज लवकरच बाहेर पडले. नेहमीची बस मिळाली नाही म्हणून थोडे वाट पहात झाडाखाली थांबले. एवढ्यात त्यांना निमिष दिसला. त्याला हाक मारावी म्हणून तोंड उघडणार एवढ्यात त्यांना त्याच्याबरोबर एक वयस्कर बाई दिसली. तिच्या सोबत हा चालला होता. ती बाई त्याच्यासोबत बरीच ओळख असल्यासारखी बोलत होती. ते गप्प बसले. त्याचे ह्यांच्याकडे लक्ष नव्हते, ती दोघे निघून गेली. बाबांना काहीच कळेना. ह्या बाई कोण ? तसेच घरी आले. निमिष आलाच नव्हता. पत्नीला काही बोलले नाहीत.

दोन दिवस गेल्यावर त्यांचा एक मित्र म्हणाला, “ परवा निमिषला मॉलमध्ये बघितले एका महिलेसोबत. तुझा विश्वास बसणार नाही म्हणून फोटो काढून आणला. बघ जरा ह्या कोण आहेत. तुमच्या बऱ्याच नातेवाईक स्त्रिया मला माहिती आहेत. ह्या वेगळ्याच वाटल्या. त्यांनी फोटो पाहिला. त्या दिवशीच्या बाईपेक्षा ही वेगळीच होती.”  आता मात्र ते चक्रावले पण तसे दाखवले नाही. त्याला म्हणाले ? हो, ह्या तुला माहिती नाहीत. पत्नीकडच्या आहेत.” घरी गेल्यावर पत्नीशी बोलायचे ठरवले.

घरी आल्यावर सुहृदाला म्हणाले, “ मला तुझ्याशी बोलायचे आहे;”  तर ती म्हणाली “ आधी मला बोलू द्या. आज माझी मावशी नाटकाला गेली होती. तिथे तिला निमिष vip रांगेत बसलेला दिसला. ह्याने तिला ओळख दिली नाही. जाताना मोठ्या गाडीने निघून गेला. तिने बघितले. एवढी मोठी गाडी घेतली आम्हाला बोलली नाहीस असे म्हणून ती रागावली व फोन बंद केला. आता मात्र हद्द झाली. हा काय करतो ते आज कळलेच पाहिजे.”  एवढ्यात बाबांचा फोन वाजला मालकांचा होता. घरी अर्जंट पत्नीसह बोलावले होते. बाबा म्हणाले आधी जाऊन येवू मग बोलू.

मालकाच्या घरी मोठी पार्टी सुरू होती. सर्वांना आमंत्रण दिले होते. घरात देखरेखीसाठी विश्वासू असल्याने ह्यांना बोलवले होते. मालकांच्या वडिलांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा होता. सगळी तयारी झाली होती. आता त्यांची एन्ट्री होणार म्हणून सगळे त्यांच्यावर फुले टाकायला उभे राहिले होते. शानदार गाडी, दाराशी आली त्यातून उतरला तो निमिष. त्याने आजोबांना धरून उतरवले. सुमित व सुहृदा त्याला तिथे बघून चमकले. काहीच बोलले नाहीत. सोहळा पार पडला. सगळे घरी जाण्यासाठी निघाले. निमिषला आजोबा म्हणाले, “ तू आपल्या गाडीने जा, रात्र झाली आहे.” त्याने बाबांना जाताना पाहिले. त्यांना थांबवले.  ‘ गाडीतून जाऊ ‘ म्हणाला. सुमितला वाटले ह्याने मालकांच्या वडिलांच्या केअरटेकरची नोकरी पत्करली आहे. त्यांचा स्वाभिमान दुखावला होता.

पण आजोबांनी निमिषचे कौतुक करायला सुरुवात केली. ते म्हणाले, “ तू फार भाग्यवान आहेस की हा तुझा मुलगा आमच्यासारख्या वृध्द एकाकी लोकांचा आधार बनला आहे.”  सुमितला कळेना हे काय बोलत आहेत. आजोबा म्हणाले, “ हा तुझा मुलगा जे काम करत आहे, त्याचे खूप मोठे पुण्य त्याला मिळणार आहे.”  त्यांनी विचारले, “  तुम्ही ह्याला कसे ओळखता, तुमची ह्याची भेट कशी झाली ?”  

त्यावेळी निमिष म्हणाला मी सांगतो बाबा ऐका….. “ मी कामाच्या शोधात खूप फिरत होतो. त्यावेळी मला तऱ्हेतऱ्हेच्या माणसांशी गाठ पडली. मी असेच काम मिळेना म्हणून हताश होऊन बागेत बसलो होतो.  तेथे एक आजी येवून बसल्या. सुरुवातीला मला राग आला. त्यांनी माझी चौकशी केली. मी फक्त हो/ नाही करत राहिलो. त्याच त्यांचे काहीबाही सांगत होत्या. बराच वेळ झाला. मग त्या म्हणाल्या ‘ माझा नातू तुझ्याएवढाच आहे. तुला बघून तोच आठवला म्हणून बोलले एवढे. तो परदेशी असतो. पती वारले आहेत. घरी मी एकटीच. दिवसभर कोणाशी बोलणार? कामाच्या बायकांव्यतिरिक्त कोणी येत नाही. कोणाशी बोलू ? मग इथे बागेत येते. कोणाशी तरी बोलत राहते. ऐकून घेणारे कोणीतरी भेटते. बोलले की जीव हलका होतो. नाहीतर खाण्याखेरीज तोंड उघडत नाही दिवसभर. बरं निघते मी. ये उद्या बोलायला असाच.” 

त्या आजीशी मी फार बोललो नाही. त्याच खूप काही बोलल्या तरी त्यांना बरे वाटले आणि मला माझे काम सापडले तिथेच. मी विचार केला या जगात अशी एकाकी असणारी अनेक माणसे आहेत. त्यांना फक्त ऐकणारे कुणीतरी हवे आहे. साथ देणारे हवे आहे… सिनेमाला, नाटकाला, खरेदीला, फिरायला, खेळायला, बोलायला आणि त्यापेक्षाही ऐकायला माणूस हवा आहे. मोबाईल, टीव्ही या यांत्रिकी मनोरंजनाचा माणसाला कंटाळा आला आहे. घरात माणसे कमी, असलेली कामावर जाणारी, घरी आली की मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसणारी, कुणाला कुणाशी बोलायला, बोलणे ऐकायला वेळ नाही. एखादी कलाकृती बघताना सोबत जर समान इंटरेस्ट असणारा असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. मी मानसशास्त्रात पदवी घेतली असल्याने हे काम करायचं ठरवलं. मग एक जाहिरात तयार केली…..  

“ एकटेपणा विकत घेणे आहे….  तुमचे ऐकणे, तुम्हाला खरेदीला, नाटकाला, सिनेमाला, बँकेत जाण्यासाठी सोबत करणारा एक साथीदार मिळेल. कोणतेही अनाहुत सल्ले न देणारा, तुम्हाला जज न करता तुम्हाला सोबत करणारा, गॉसिप न करणारा, विश्वासार्ह साथीदार मिळेल.” –  संपर्क क्रमांक दिला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला खूप फोन येवू लागले. ह्यात मी स्वतःला काही बंधने घालून घेतली. वेळ, स्थळ माझ्या मर्जीने ठरवतो. आधी त्यांचा बायोडाटा बघतो आणि मग ठरवतो. ह्यातून अनेक चांगल्या लोकांच्या ओळखी होत गेल्या. पैसे मिळू लागले. त्याचाच एक भाग म्हणून या आजोबांशी ओळख झाली. म्हणून आज कार्यक्रमाला आलो होतो. हे मला तुम्हा दोघांना सांगायचे होते पण तुम्हाला हे आवडणार नाही असे वाटले. ह्यात काही लपविण्याचा हेतू नव्हता. त्यादिवशी मावशीला मी नाटकाला दिसलो ते असेच एका काकूंना नाटकाची खूप आवड. पतीला अजिबात नाही म्हणून सोबत केली. बाबा तुम्हालाही बघितले होते. त्या मावशींना रस्त्यावर खरेदी करायला आवडते पण घरच्यांच्या स्टेटसला शोभत नाही म्हणून करता येत नाही. मग मला बोलावले त्यांनी. आम्ही मनसोक्त खरेदी केली. एका आजीना वाचायचा नाद आहे त्यांना पुस्तके वाचून दाखवतो, तर एका मावशींना खूप बोलायला आवडते. दिवसभर घरी कोणीच नसते ऐकायला सगळे कामाला जातात, मी त्यांचा श्रोता होतो.”

“आई बाबा मी कोणतेही वाईट काम करत नाही. उलट मदतच करत आहे. तुमचे चांगले संस्कारच मला इथे उपयोगी पडतात. कुणाचा सुहृद, कुणाचा सखा, कुणाचा श्रोता, कुणाचा खरेदीचा पार्टनर तर कुणाचा खाबुगिरीतला दोस्त. माझ्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढे करतो आहे. ह्याला इतका रिस्पॉन्स मिळेल असे वाटले नव्हते. पण मनुष्याच्या एकाकीपणामुळे माझ्या या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.” 

आई-बाबा निमिषकडे बघतच राहिले. नव्या युगातील या नव्या व्यवसायाचे कौतुक करावे की, माणूस सगळ्यात असून एकटा पडला ह्याची खंत वाटावी, ह्या द्विधा मनस्थितीत घरी परतले.

लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद

पंढरपूर.

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्पेस — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

स्पेस — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आय.टी. क्षेत्रात काम करणारे सुशांत प्रज्ञा आपापल्या कंपनीत अतिशय चांगले काम करत होते. लग्न करून शहरात नोकरी निमित्ताने स्थिर होऊ पहात होते.

दोघांचाही पगार लाखांच्या पलिकडचा त्यामुळे सगळ्या ऍम्यूनिटिज असलेल्या महागड्या टाऊनशिपमधे त्यांचे सर्व सोयींनी युक्त असे टू बीएचके चे घर. 

सकाळी उठून दोघेही आपापल्या कारनी ऑफिसला जायचे. संध्याकाळी यायची वेळ निश्चित नाही पण यायचे आणि तरी समोर लॅपटॉप उघडून बसायचे आणि मोबाइलवर सतत कॉल्स. 

एकमेकांशी बोलायला वेळ नाही आणि धडपणे जेवायला जमत नाही. अशी गत•••. स्वयंपाक करायचा कोणी? बाईने केला तरी तो थंड स्वयंपाक खायचा कोणी? नकोच असले काही म्हणून दोघांनीही रोज आपल्या आवडीचे जेवण बाहेरून मागवायचे, जमलेच तर एकत्र जेवायचे नाहीतर ज्याला जसे जमेल तसे त्याने खाऊन घ्यायचे. 

एकमेकांबरोबर कुठे जाणे सोडाच, पण एकमेकांशी धडपणे बोलताही येत नव्हते त्यांना. पाच दिवस काम दोन दिवस सुट्टी, असे असले तरी सुट्टीच्या दिवशीही एकतर बरेच उशीरा उठायचे आणि मग ५ दिवसांचे कामाचे प्लॅनिंग, काही क्लायंटसच्या शंका कुशंका सोडवणे आणि इतर काही गोष्टींमुळे दोघे आपल्यातच व्यग्र.

कामापुरते जुजबी गोष्टीच ते एकमेकांशी बोलायचे. घर आणि रहाणीमान पाहून सगळ्यांना वाटायचे ‘ वा काय मस्त संसार चालला आहे राजा राणीचा ••’ त्यांच्या आपसातील प्रेमाचा(?) हेवाच वाटायचा प्रत्येकाला.

१-२ महिन्यांनी गावाकडून बोलावणे यायचे. मग दोघांनी आनंदाने प्रेमाने जावे की नाही? पण नाहीच, त्यावरूनही कधी सुशांत तर कधी प्रज्ञा चिडायची. अरे आपल्याला आपली काही स्पेस हवी की नाही? एरवी नोकरी, क्लायंटस आणि सुट्टीच्या दिवशी काय तर म्हणे आई-बाबा आजी यांना भेटायला जाऊन दमायचे. कधी मिळणार आपल्याला आपल्यासाठी स्पेस?

झाऽऽऽले या दोघांमधे कोणी नको म्हणून गावाकडच्यांनी यांना शहरात रहायला परवानगी दिली, अभिमानाने कौतुकाने यांच्याबद्दल गावातल्या सगळ्यांना सांगत होते. मग हे दोघेच एकत्र रहात होते तरी त्या दोघांनाही मनाप्रमाणे एकमेकांना वेळ देता येत नव्हता, तसेच स्वत:साठीही वेळ देता येत नव्हता, तेवढी स्पेस त्या दोघांना मिळत नव्हती ही फॅक्ट होती•••

एका विकेंडला असेच गावाकडे जाण्यावरून दोघांचेही बिनसले. प्रज्ञा म्हणाली, “ यावेळी मी नाही येत, तूच एकटा जा.”  तर सुशांत म्हणाला, “ तुझ्या आई बाबांकडे मी येतो ना? मग माझ्या आई बाबांकडे जाताना तुला का प्रॉब्लेम येतो?”  ती म्हणाली, “ मी पण येतेच की, पण आज मला शांतता हवी आहे. मला माझी स्पेस हवी आहे. थोडी विश्रांती हवी आहे. तर तू मला माझी स्पेस देणारच नाहियेस का? ”

असे बोलून ती एका बेडरूममधे जाऊन दार लावून बसली. तिने घट्ट डोळे मिटून घेतले. डोके ओढणीने बांधून घेतले. पडदे ओढून अंधार करून ती पलंगावर पडली. हळूहळू तिला थोडे शांत वाटायला लागले, आणि तिला तिची आई आजी दिसू लागले•••

आई बाबा काका काकू आजी, आम्ही दोघे भावंडे आणि चुलत दोन भावंडे, असे ९ जण एका कुटुंबात रहात होतो. आई घरातील मोठी सून म्हणून सगळी जबाबदारी तिच्याकडे होती. पण सगळ्यांच्या आवडी निवडी, आजीचे मत, सगळे सांभाळून ती आनंदाने रहात होती. वडिलांच्या कामात हातभार लावून मधेअधे सिनेमा नाटके फिरायला जाणे हे सगळे ती करू शकत होती. 

मग प्रज्ञाला आठवले … एकदा तिने आईला याविषयी विचारलेही होते, “ तू कसे हे सांभाळू शकतेस? कसं जमतं गं तुला? “ तेव्हा आई म्हणाली होती, “अगं हे सगळं मी आपल्या माणसांसाठीच करते ना? मग आपल्या माणसांसाठी काही केले तर ते कष्ट जाणवत नाहीत. ते कष्टच वाटत नाहीत. फक्त त्यासाठी थोडी तडजोड आवश्यक आहे.”

“अजून एक सांगते बघ••• मला जेव्हा त्रास व्हायला लागतो ना? तेव्हा मी सासूबाईंचा विचार करते. अगं आपलं तर तेव्हा २०-२५ जणांचं कुटुंब होतं. तरी त्यांनी नाही सगळं सांभाळलं? त्यांना पती पत्नींना एकमेकांसाठी वेळ देणं तर सोडाच पण एकमेकांशी बोलताही येत नव्हतं. मग एकमेकांशी बोलणे नाही जमले तरी कोणाच्याही नकळत एकमेकांना स्पर्श करणं. काही खोड्या करणं यातूनच तर प्रेम बहरलं. एकमेकांच्या हृदयात घर केलं. ( हृदयात स्पेस निर्माण केली) सगळं घर हसतं खेळतं ठेवलं.”

“मग त्यांच्याही सासर्‍यांचे निधन झाले म्हणून घराच्या वाटण्या झाल्या आणि त्यांच्या ४ मुलांसवे वेगळ्या राहू लागल्या. तरी सणवार,लग्न, मुंज आदि सोहळ्यांना उपस्थित राहून त्यांनी इतरांच्या मनातही असलेली स्पेस जपलीच ना? तेव्हा घरात जागा नसेल कदाचित पण प्रत्येकाच्या मनात निश्चित जागा होती. हे सगळे पाहिले आणि मग थोडा त्याग, थोडी आपल्या भावनांना मुरड घालता आली तर आपणच आपली स्पेस निर्माण करू शकतो हे पटलं. म्हणून मी पण सासूबाईंच्या नकळत त्यांचा हा गुण चोरला म्हटलीस तरी हरकत नाही.” 

प्रज्ञाला हे आठवले मात्र. तिने डोळे खाडकन उघडले . तिच्या मनात असंख्य विचार भिरभिरून गेले. आपण दोघेच रहात असलो, घर मोठं असलं तरी आपल्याला स्पेस नाही हा किती कोता विचार आहे हे लक्षात आले. आपल्याला स्पेस मिळण्यासाठी कुणाच्यातरी मनात स्पेस निर्माण करता यायला हवी हे तिला पटले. 

तेव्हा स्पेस नसेलही कदाचित, पण एकमेकांच्या मनातील स्पेसमुळेच सगळी सुख दु:खे संकटे यांना सामोरे जायचे धैर्य मिळत होते, खंबीरता लाभत होती. आता एवढी स्पेस असूनही एकमेकांच्या मनातच स्पेस नाही त्यामुळे संकटकाळी अडीअडचणींना एकट्यानेच सामोरे जावे लागते आहे.  तेवढे धैर्य आपल्यात नसले तरी वरवर ते आपण दाखवतो आणि आतल्या आत खचतो. 

ही खच कोणाच्याही हृदयात स्पेस नसल्याने कोणालाच कळत नाही. आता आपणही अशीच स्पेस निर्माण करायला हवी हे तिने आता भांडून घेतलेल्या स्पेसने तिला शिकवले होते.

प्रज्ञा बाहेर आली आणि सुशांतला म्हणाली,” चल आपण गावाकडे जाऊ.” गावाकडील लोकांच्या मनात स्पेस करण्याच्या या विचाराने सुशांतच्या हृदयातील तिची स्पेस जरा बळकट झाली होती.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पश्चात्ताप… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पश्चात्ताप… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण  पहिले – पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा?” नरेशने विचारलं – आता इथून पुढे)

“आम्हांला वेळ मिळत नाही असं म्हणणारे तासंतास टिव्ही बघत बसलेले असतात नाहीतर मोबाईलवर व्हाँट्सअप,फेसबुकमध्ये बुडून गेलेले असतात.मी त्याऐवजी वेळेचं मँनेजमेंट केलं.अर्थात खुप स्ट्रिक्टली नाही कारण मग आपण जे करतो त्यातला आनंद हरवून जातो.आणि मी जे करत होतो ते आनंदासाठी.मला काही त्यात करीयर करायचं नव्हतं”

नरेशला आपलं आयुष्य आठवलं.नोकरी एके नोकरी आणि नोकरी दुणे घर याशिवाय त्याला दुसरं काही माहित नव्हतं.अफाट पैसा कमवायचा मग तो कोणत्याही मार्गाने असो आणि तीन पिढ्या बसून खातील अशी प्राँपर्टी जमवायची हे त्याच्या आयुष्याचं एकमेव ध्येय होतं.हे ध्येय साधतांना आपण कधीही न मिळणारे आनंदाचे क्षण गमावतोय हे कधी त्याच्या लक्षात आलं नाही.निवृत्त झाल्यावर आपल्याला भरपूर वेळ असेल.तेव्हा जे करायचं राहून गेलंय ते करता येईल असं त्याचं मत होतं.

” मीही आता ठरवलंय.उरलेलं आयुष्य मजेत घालवायचं” नरेश म्हणाला ” आताशी तर आपण साठी गाठलीये.अजून दहा वर्ष तरी काही होत नाही आपल्याला”

” तसं झालं तर सोन्याहून पिवळं.पण आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं ग्रुहीत धरुनच मी माझं जीवन जगलो”

सुनीलच्या या म्हणण्यावर नरेश जोरात हसून म्हणाला

” डोंट वरी यार.तुही काही लवकर मरत नाहीस.आता हे जग मला दाखवण्याची जबाबदारी तुझी.बरं ते जाऊ दे.तुझी मुलं काय करताहेत?लग्नं झाली असतील ना त्यांची?”

“हो तर! मुलगी डेंटिस्ट आहे आणि मुलगा चार्टर्ड अकाउंटंट. मुलगा माझ्याच सोबत रहातो आणि मुलगीही याच शहरात असल्याने नातवंडासोबत माझे दिवस झकास चालले आहेत”

नरेशचा चेहरा पडला.वर्षभरापासून बंगलोरला रहाणारी मुलं घरी न आल्याने नातवंडाशी त्याची भेट आजकाल व्हिडीओ काँलवरच व्हायची.

“घरबीर बांधलंस की नाही?”त्याने उत्सुकतेने सुनीलला विचारलं

” हो तर!तुझ्यासारखा बंगला नाहीये माझा पण एक टूबीएचकेचं घर आहे.मुलगा चांगला कमावतोय.तो बांधेल मोठा बंगला पुढे. शेवटी त्यालाही काहीतरी स्वकष्टाची प्राँपर्टी केल्याचं समाधान मिळायला हवं ना!तुझी कार मात्र झकास आहे हं”

“तू केव्हा पाहिलीस?”नरेश आनंदाने फुलून म्हणाला

“मगाशी तू आलास तेव्हा मी बाहेरच होतो”

“अच्छा!लग्न लागल्यावर चल.तुम्हांला गाडीतून घरी सोडतो”

“अरे मी आणलीये ना माझी गाडी.तुझ्या गाडीइतकी आलिशान नाहिये पण ठिक आहे.माझं काम भागतंय तिने”

नरेशचा चेहरा पडला.”अरेच्चा!आपण  कमावलेल्या सगळ्या गोष्टी सुनीलकडेसुध्दा आहेत.मग आपण एवढा गर्व का करतोय?”त्याच्या मनात विचार आला.सुनीलला कमी लेखून आपण मोठी चुक करतोय हेही त्याच्या लक्षात आलं. तेवढ्यात नवरदेवाची मिरवणूक आली.अर्ध्या तासात लग्न लागलं.सुनीलला पाहून बरेच लोक त्याला आनंदाने भेटत होते.तरुण मुलंमुली त्याच्या पाया पडत होते.सुनीलला पाहून नवरीला खुप आनंद झाला.त्याच्या पाया पडून ती नवऱ्याला म्हणाली ” हे आमचे भागवत सर.यांनी आम्हांला भरभरून जगायला शिकवलं.शिकणं आणि जगणंसुध्दा किती आनंददायी असतं हे त्यांच्यामुळेच आम्हांला कळलं” तिच्या नवऱ्याने सुनीलला वाकून नमस्कार केला.

सुनीलला मिळणारा आदर पाहून नरेश मनातून खट्टू झाला.त्याला आठवलं.निवृत्तीनंतर तो आँफिसला दोनतीन वेळा गेला तेव्हा तिथल्या स्टाफने त्याची दखलसुध्दा घेतली नव्हती.ही ब्याद कशाला इथे आली असेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते.

जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्र एकमेकांना घरी यायचं निमंत्रण देऊन निघाले.

नरेशने ठरवलं आता सुनीलसारखं जगायचं.आहे ते उरलेलं आयुष्य आनंदात घालवायचं.आता त्याला त्याचा एकटेपणा खटकू लागला.म्हणून मग त्याने दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नागरीक संघाची सदस्यता घेतली.आतापर्यंत कट्ट्यावर बसणारे हे म्हातारे त्याला आवडत नव्हते.हळुहळू त्याची त्यांच्याशी मैत्री झाली. माँर्निंग वाँक त्यांच्यासोबत होऊ लागला.एक दिवस तो त्याच्या बायकोला घेऊन गाण्याच्या कार्यक्रमाला गेला.या वयातही संगीत आपल्याला आवडतं,आपल्या मनाला भारुन टाकतं हा नवीन शोध त्याला लागला.अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांना कधी त्याने हात लावला नव्हता.वपु.काळे,चेतन भगत,पाऊलो कोएल्होची पुस्तकं आता टेबलवर उपस्थिती देऊ लागली.स्वयंपाक हे बायकांचं क्षेत्र आहे असं तो आजपर्यंत मानत होता.पण आता नवीन रेसिपीज तो बायकोला सुचवू लागला आणि ती बनवण्यासाठी तिला मदतही करु लागला.एक दिवस ज्येष्ठ नागरीक संघाच्या सदस्यांना त्याने एका चांगल्या हाँटेलात पार्टी दिली.सुनीललाही त्याने स्पेशल गेस्ट म्हणून बोलावलं.आपल्या या मित्रामुळेच आपण आनंददायी जीवन जगायला सुरुवात केली आहे याचा त्याने सर्वांसमक्ष उल्लेख केला.सुनीलनेही मग आपण कसं जीवन जगलो आणि उरलेलं आयुष्य कसं भरभरुन जगलं पाहिजे याबद्दल एक खुमासदार भाषण ठोकलं.

सिंगापूर, मलेशियाच्या टूरला आता चारपाचच दिवस उरले होते.ही टूर झाली की हिस्टोरिकल युरोपची टूर करायची हे नरेशने ठरवून टाकलं.आपलं हे सुंदर आयुष्य फार कमी उरलंय याचा खेद त्याला आजकाल वाटू लागला होता.

टुरला दोन दिवस बाकी होते.तो सकाळी आपल्या मित्रांसोबत माँर्निग वाँक करत होता.जाँगिंग ट्रँकचे तीन राऊंड त्याने पुर्ण केले.चवथ्या राऊंडला त्याने सुरुवात केली आणि त्याच्या छातीत कळ आली.कळ इतकी जोरदार होती की तो खालीच कोसळला.पडता पडता त्याचा उजवा गुडघा जोरात आपटला.त्याच्याबरोबरचे सगळे धावून आले.सगळ्यांनी मिळून त्याला बेंचवर झोपवलं.घामाच्या धारांनी तो न्हाऊन निघाला होता.अँब्युलन्स बोलवण्यात आली.त्याला हाँस्पिटलमध्ये अँडमिट करण्यात आलं.ट्रिटमेंट सुरु झाली. दोन तासांनी तो शुध्दीवर आला. समोरच त्याची बायको आणि डाँक्टर उभे होते.

“कसं वाटतंय?”त्याच्या बायकोने मीराने विचारलं.त्याच्या अंगात अजिबात त्राण नव्हतं.उजवा गुडघा भयंकर दुखत होता.

“मला काय झालं होतं?”खोल गेलेल्या आवाजात त्याने डाँक्टरला विचारलं.    “तुम्हांला मासीव्ह हार्ट अटँक आला होता.त्यात तुम्ही नेमके गुडघ्यावर आपटल्यामुळे तुमचा गुडघा तुटलाय.त्याचं आँपरेशन करावं लागणार आहे.”

” मग करुन टाका.आम्हांला दोन दिवसांनी सिंगापूरला जायचंय”

डाँक्टर हसले. म्हणाले,

“साँरी मिस्टर नरेश.यु हँव टू फरगेट अबाउट युवर टूर.तुमची शुगर आणि बी.पी.जोपर्यंत नाँर्मल होत नाहीत तोपर्यंत आँपरेशन शक्य नाही.आँपरेशन नंतरही तुम्हांला लवकर चालता येईल असं वाटत नाही.दुसरी गोष्ट उद्या तुमची एंजिओग्राफी करणार आहोत.हार्टमधल्या ब्लाँकेजेसवर तुमची बायपास करायची की एंजिओप्लास्टी ते ठरेल.माझ्या अनुभवानुसार तुमची बायपासच करावी लागेल असं वाटतं.आणि बायपास झाल्यावर कमीतकमी तीन महिने तरी तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही”

नरेशने हताशपणे बायकोकडे पाहिलं.

जाऊ द्या .तुम्ही अगोदर बरे व्हा.मग बघू कुठे जायचं ते” ती त्याला समजावत म्हणाली ” जीव वाचला ते काय कमी आहे? सिंगापूर काय नंतर केव्हाही करता येईल!”

नरेश काही बोलला नाही.पण त्याला समजून चुकलं होतं.त्याच्या जीवाचं काही खरं उरलं नव्हतं.नशीबात असलं तर टूर होतीलही पण ते कायम तब्ब्येतीच्या काळजीने भरलेले असतील.त्यात आनंद,उत्साह यांचा अभाव असेल.जीवनात आता कुठेशी रंगत येऊ लागली होती आणि त्यात हे असं घडलं.आयुष्य हे क्षणभंगुर आहे असं सुनील म्हणाला होता.खरंच होतं ते!आता टूरच काय आयुष्यात राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी करता येणार नव्हत्या.’अनेक गोष्टी योग्य वयातच केलेल्या चांगल्या असतात ‘ असं सुनील जे म्हणत होता ते चुकीचं नव्हतं हे त्याला आता ठाम पटलं होतं.क्षणभर त्याला सुनीलचा हेवा वाटला.आणि त्याच्यासारखं आयुष्य आपण का जगलो नाही या पश्चातापाने त्याचं मन भरुन गेलं.

 – समाप्त –

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

(त्यामुळे सुरवातीला कुरानाच्या आयाती मध्ये ज्यु आणि ख्रिश्चनांविषयी ‘people of book’ असा चांगला उल्लेख येतो.) इथून पुढे — 

पण अरबस्थानातील ज्यु टोळ्यांनी मुहम्मद पैगंबराला ज्युं धर्माचा पैगंबर म्हणून स्वीकारले नाही. या नंतर उतरलेल्या कुराणाच्या आयातीमध्ये ज्यु लोकांविषयी अपशब्द येऊ लागले. मदिनेतील तीन ज्यु कबिल्यांना छोटी छोटी कारणे काढून मदिनेतून हाकलून देण्यात आले. नंतर उतरलेल्या कुराणाच्या आयतीमध्ये ज्यु लोकांचे समूळ उच्चटन करण्याचा आदेश मुसलमानांना दिल्याचे दिसते. 

ई स 632 मध्ये मुहंमद पैगंबर साहेबांचा मदिनेत मृत्यू झाला. त्यांच्या हयातीत त्यांच्या तलवारीच्या धाकाने संपूर्ण अरेबीया मुस्लिम झाला होता. परंतु पैगंबरांच्या मृत्यू नंतर बहुतेक सर्व अरब जमातांनी उठाव करून इस्लामचे जोखड टाकून दिले आणि ते परत आपल्या पूर्वज्यांच्या बहुईश्वरवादी धर्माकडे वळले. पैगंबरांच्या वारसदारांची पहिली दोन वर्ष हा उठाव दडपण्यात गेली. नंतर मुस्लिम अरब टोळ्यांनी अरबस्थानाच्या बाहेर प्रचंड वेगाने साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. वाळवंटातील प्रतिकूल हवामानात राहणाऱ्या अरब लोकांमध्ये कमालीचा काटकपणा आलेला होता.  क्रूरपणा नसेल तर वाळवंटासारख्या प्रतिकूल हवामानात जिवंत राहनेही शक्य नसते. वळवंटी भागात जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला क्रूरपणा अरब लोकांमध्येही आलेला होता.  त्यात अरबांमध्ये नव्या धर्माच्या शिकवणी नुसार धार्मिक कडवेपणा निर्माण झालेला होते. धर्मवेडाने आंधळे झालेले अरब लढताना मरून जन्नतमध्ये जाण्यासाठी उतावळे झाले होते. त्यांनी निर्भीडपणे मोठमोठ्या फौजा अंगावर घेतल्या. अरब फौजांनी लवकरच आजूबाजूचे सर्व देश जिंकून घेतले. ई स 638 साली अरब मुसलमानांनी जेरूसलाम जिंकून घेतले. 

एकाच कुरैश काबील्यातील मुहम्मद पैगंबरांच्या हशीम या भावकीचे उम्मायद या भावकीशी पाच पिढ्याचे वैर होते. या उम्मयद या भावकीचा अबू सुफियान हा मुहम्मद पैगंबरांच्या आक्रमक धर्मप्रचारामुळे त्यांचा कट्टर शत्रू झाला होता. पुढे मदिनेला स्थलांतर केल्यावर मुहम्मद पैगंबरांची ताकत वाढत गेली. मुसलमानांनी मक्केच्या कुरैश लोकांच्या व्यापारी काफील्यांची लूटमार सुरु केली. त्यातून दोन्ही गटात संघर्ष होऊ लागले. मदिनेतील मुसलमाचे मक्केतील मूर्तिपूजक कुरैश लोकांसोबत झालेल्या प्रत्येक युद्धात अबू सुफियान मुसलमानांच्या विरुद्ध लढला होता. पुढे पैगंबर साहेबांनी मक्का जिंकल्यावर अबू सुफियानला नाविलाजास्तव मुसलमान व्हावे लागले होते. नंतर उमर खलिफा असताना या अबू सुफियानच्या मुलाला म्हणजे मुआवियाला सिरिया-पॅलेस्टीन या प्रभागाचा गव्हर्नर नेमले गेले. अबू सुफियान आणि त्याचे कुटुंबीय स्वतः होऊन मुसलमान झाले नव्हते. परिस्थिती समोर झुकत ते ”मरून मुटकुन मुसलमान’ झाले होते. त्यामुळे ते कधीच कडवे मुसलमान झाले नाहीत. मुआवियाची बायको ख्रिश्चन होती. त्याच्या सैन्यात सिरिअन ख्रिश्चन सैनिकच जास्त होते. या मुआवियाने पैगंबरांचा सख्खा चुलत भाऊ आणि लाडक्या लेकीचा नवरा असलेल्या अली विरुद्ध साफिनचे युद्ध केले. या युद्धात त्याने तीस हजार मुसलमान मारले. या मुआवियने मुहम्मद पैगंबरांच्या हसन(अली आणि फातिमाचा मुलगा) या नातवाकडून खलिफत काढून घेतली. याच मुआवियाने हसनला त्याच्याच बायकोमार्फत विष घालून मारले. या मुआवियाचा मुलगा याजिद हुसेन सोबत झालेल्या करारा विरुद्ध खलिफा झाला. त्याच्या आदेशानुसार मुहम्मद पैगंबराच्या हुसैन या दुसऱ्या नातवाला करबालाच्या युद्ध मैदानात ठार मारले गेले.

जिझिया कर मिळाला की मुआविया आणि इतर उम्मायद खलिफा धर्मनिरपेक्ष होते. झिजिया मिळणे कमी होऊ नये म्हणून एका उमायद खलिफाने इस्लामात धर्मांतर करण्यावर बंदी घातली होती. त्यांनी कुराणच्या आदेशा विरुद्ध अरब नसलेल्या नवमुस्लिमांवरील झिजिया बंद केला नाही. वरवर मुस्लिम असल्याने उम्मयदांच्या आधीपत्याखाली जेरूसलाम असल्याना ज्यु लोकांची फारशी कत्तल झाली नाही. पण मुस्लिम प्रशासनात शेतीवरील असलेल्या वाढीव करामुळे आणि जिझिया सारख्या जाचक करप्रणालीमुळे धरपरिवर्तन वा पलायन हेच मार्ग शिल्लक होते. धर्माच्या बाबतीत कट्टर असलेले ज्यु लोक परत मायाभूमीतून परगंदा होऊ लागले. त्यांचे परंपरिक शत्रू असलेल्या मूर्तिपूजक ग्रीक पॅलेस्टिनी लोकांनी इस्लामात धर्मपरिवर्तन करून घेतले. तरी काही ज्यु जास्तीचे कर भरून आपल्या मातृभूमीत पाय रोवून होते.

पुढे पोप अर्बन दुसरा याच्या प्रेरणेमुळे युरोपतील ख्रिश्चन सम्राज्यांनी येशूची पवित्र भूमी मुस्लिम लोकांपासून मुक्त करण्यासाठी धर्मयुद्ध पुकारले. क्रूसेडर फौजेने ई स 1099 साली जेरूसलाम जिंकून घेतले. शहरात असलेल्या सर्व मुस्लिम आणि ज्यु लोकांची सरसकट कत्तल झाली.

पुढे मायभूमीत ज्यु लोकांवर होणाऱ्या सततच्या अत्याचारांमुळे अनेक ज्यु युरोपातील धर्मनिरपेक्ष वातावरणात स्थायिक झाले. फ्रान्स आणि जर्मनीत स्थायिक झालेल्या ज्यु लोकांना ॲश्कनाझी ज्यु म्हटले गेले. स्पेन आणि पोर्तुगाल मध्ये स्थायिक झालेल्या ज्यु लोकांना सफारडीक ज्यु म्हटले गेले. इजिप्त यमन आणि इराक मधील ज्यु लोकांना मिझराही ज्यु म्हटले गेले. मध्य आशिया आणि कोकसस पर्वत रांगामध्ये वसलेल्या ज्यु लोकांना बुखारान ज्यु म्हटले गेले. बाहेरून आलेले हे हुशार लोक कानामागून आले आणि तिखट झाले. कष्टाळूपणामुळे ते लवकरच श्रीमंत झाले तसेच मोठमोठ्या पदावर जाऊन बसले. त्यांच्या प्रगतीवर जाळणारे लोक वाढू लागले. मग त्यांच्या धार्मिक वेगळेपणावरून युरोपात ज्यु विरोधी वातावरण निर्माण केले जाऊ लागले. बरेच ॲश्कनाझी ज्यु सतराव्या आणि अठराव्या शतकात धर्मनिरापेक्ष असलेल्या अमेरिकेत स्थायिक झाले. 

ई स 1516 मध्ये जेरूसलाम ऑटोमन तुर्क सम्राज्याचा भाग झाले. ऑटोमन सम्राज्य जिझिया कर दिल्यानंतर तसे काही अंशी धर्मनिरपेक्ष होते. ते सुद्धा कुराणाप्रमाणे फारसे चालत नव्हते. अशा काहीश्या धर्मनिरापेक्ष वातावरणात जेरूसलाम मधील ज्यु लोकांनी परत कष्टाने आपली प्रगती केली. ज्यु लोकांनी व्यापारात प्रगती केली आणि मोठ्या प्रशासकीय पदांपर्यंत ज्यु पोहचले. 1492 नंतर पोर्तुगाल आणि स्पेन मधून हाकलून दिलेल्या सफारडीक ज्यु लोकांना ऑटोमन सम्राट बायझीड दुसरा याने त्यांना त्यांच्या मायाभूमीत स्थायिक होऊ दिले.

युरोपात राहणारे ज्यु लोक अतिशय हुशार आणि कष्टाळू होते. त्यांच्या प्रगतीचा तिरस्कार करणाऱ्यांचे प्रमाण युरोपात हळूहळू वाढू लागले होते.

1860 मध्ये ज्यूविश पत्रकार थिओडॉर हर्झ याने ‘डर जुडेनस्टेट’ अर्थात ‘ज्युंचे स्वतःचे राज्य’ नावाचे पत्रक काढले. ज्युसाठी त्यांच्या पारंपरिक मायाभूमीत स्वतःचे राज्य असावे आणि जगातील सर्व ज्यु लोकांनी तिथे राहायला जावे असा विचार त्याने मांडला. त्याला जगभरातील ज्यु लोकांनी पाठिंबा दिला. 1897 ला स्वित्झरलंड मधील बेझेल येथे पहिली झायोनिस्त परिषद भरली. ज्युसाठी स्वतःचे राज्य असावे यासाठी जगातील मोठया नेत्यांची मनधरणी सुरु झाली. पण त्याचा उपयोग झाला नाही. पण ज्यु लोकांनी आपला प्रयत्न सोडला नाही. पहिले महायुद्ध चालू असताना त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. 1917 साली ब्रिटिश सरकारचे परराष्ट्र सचिव अर्थर बालफोर यांनी जाहीरनामा काढून मध्यपूर्व भागात ज्यु लोकांना हक्काची मायभूमी असावी असे जाहीर केले.

1019 साली पहिले महायुद्ध संपले आणि ऑटोमन साम्राज्य नष्ट झाले. मध्यपूर्वचा हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्या वेळी रोमन सम्राटाने मुद्दाम दिलेल्या पॅलेस्टीन या नावानेच ज्युंची मायभूमी ओळखली जाई. हा भाग ब्रिटिश अंमलाखाली आल्यावर जगभरातून लाखो ज्यु लोग या भागात स्थानांतरित झाले. स्थानिक अरब लोकांचा या स्थानांतराला विरोध असल्याने ज्यु लोकांचे अरब लोकांसोबत खटके उडू लागले. ज्यु लोकांनी आपल्या वस्त्यांची सुरक्षा करण्यासाठी 1920 साली हागानह (Defence) ही पॅरामिलिटरी संघटना सुरु केली. ज्यु लोकांचे होणारे स्थलांतरण आणि ब्रिटनचा त्याला न होणारा विरोध पाहून अरब लोकांनी 1936 ते 1939 या वर्षात मोठा हरताळ पाळला.

ब्रिटनने 1939 साली व्हाईट पेपर काढून जु आणि अरब लोकांचे वेगवेगळे राज्य व्हावे अशी फाळणीची योजना मांडली. अरब लोकांनी ती फेटाळली आणि उठाव केला. ज्यु लोकांच्या शास्रधारी गटांनी त्याचा सशस्त्र प्रतिकार केला. 

– क्रमशः भाग तिसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पश्चात्ताप… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ पश्चात्ताप… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

नरेशने आपली आलिशान गाडी मंगल कार्यालयासमोर पार्क केली आणि बायको-मीराला घेऊन तो कार्यालयात शिरला. हाँलमध्ये तुरळक लोक बसले होते. नरेशला आश्चर्य वाटलं. लग्न लागायला फक्त पंधरा मिनिटं बाकी असतांना उपस्थिती एवढी कमी कशी? त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की नवरा मुलगा नुकताच मिरवणुकीला गेला असून तो अजून दोन तास तरी येणार नव्हता. वऱ्हाडातील बरीच मंडळी या मिरवणूकीत गेल्यामुळे हाँल रिकामा वाटत होता. मीरा ओळखीच्या बायका दिसल्यावर त्यांच्यात जाऊन बसली. नरेशने हाँलमधल्या व्यक्तींवर नजर टाकली. कुणी ओळखीचं दिसतंय का हे तो शोधू लागला. एक चेहरा ओळखीचा वाटला पण तो कोण हे त्याच्या लक्षात येईना. तरीसुद्धा तो त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याला पाहिल्याबरोबर त्या माणसाने स्मित केलं.

“तुम्हांला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण लक्षात येत नाहिये” नरेश जरा अवघडून बोलला

“काय राव नरेश मला ओळखलं नाही? अरे मी सुनिल भागवत. आपण दोघं दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो. आठवलं? “

नरेशच्या डोक्यात ट्युब पेटली.

“हो हो आठवलं. अरे एकाच बेंचवर तर बसायचो आपण!अरे पण तू इतका तरुण कसा दिसतोस? आपण तर एकाच वयाचे असू ना? “

“यार किती वर्षांनी भेटतोहेस आणि दिसण्याचं काय घेऊन बसलास? “सुनीलने त्याला उठून आलिंगन दिलं.

“चल बसून निवांत बोलूया. लग्न लागायला अजून भरपूर अवकाश आहे”

दोघंही खुर्च्यात बसल्यावर नरेश संतापून म्हणाला “बघ यार सुनील या लोकांना वेळेची अजिबात किंमत नाही. उशीराच लग्न लावायचं होतं तर मुहूर्त काढायचाच कशाला? “

“जाऊ दे रे. हाच तर चान्स मिळतो नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना नाचण्याचा. करु दे त्यांना भरपूर एंजॉय. हेच तर दिवस आहेत त्यांचे एंजॉय करायचे. आता आपल्याला नाचता येणार आहे का? आणि बघ आपल्याला तर आता भरपूर वेळ आहे. मी तर रिटायर्ड झालोय. तुझं काय? अजून करतोच आहेस का नोकरी? “

” नाही रे. मीसुध्दा रिटायर झालोय. पण मला सांग तू कुठल्या तरी शाळेत शिक्षक होतास ना? मग रिटायर्ड होतांनाही शिक्षकच होतास का? “

” शेवटची दोन वर्ष हेडमास्तर होतो. म्हणजे तसा शिक्षकच”

” तुला खरं सांगू सुनील, मला शिक्षकी पेशा कधीच आवडला नाही. दँटस् ए व्हेरी बोअरिंग जाँब. त्यात काही थ्रिल नाही, चँलेंज नाही, जबाबदाऱ्या नाहीत. मी तर नेहमी म्हणतो शिक्षक लोक फुकटाचा पगार घेत असतात. त्यातून आजकाल शिक्षकांबद्दल काय भयंकर ऐकू येतंय. दारु पिणं काय!विद्यार्थीनींवर बलात्कार काय!बापरे!या लोकांनी तर शिक्षण क्षेत्र पार बदनाम करुन टाकलंय”

सुनील चिडला नाही. हसून म्हणाला,

‘ शिक्षकांबद्दल असे गैरसमज बरेच जण करुन घेतात. सगळेच शिक्षक तसे नसतात. तुझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात टवाळखोर कामचुकार आणि चारीत्र्यहिन  शिक्षकच आले असतील. त्यातून वीसपंचवीस लाख रुपये देऊन नोकरीला लागलेले शिक्षक दुसरं काय करणार? त्यामुळे तुला दोष देण्यात काही अर्थ नाही. माझ्याबाबतीत म्हणशील तर मला दिवसभर फुरसत नसायची. शाळेत सतत काही ना काही प्रकल्प चालायचे. त्यातून जनगणना आहे, निवडणूका आहेत, वर्षभर चालणाऱ्या परीक्षांचं सुपरव्हिजन आहे, पेपर तपासणी आहे अशा सगळ्या कामात वर्ष कधी संपून जायचं ते कळायचं नाही. बरं मला एक सांग, तू कुठल्यातरी सरकारी खात्यात होतास ना? “

” हो मी सुपर क्लास वन आँफिसर होतो. खरं तर एक मामुली क्लार्क म्हणून मी नोकरी ची सुरुवात केली होती. प्रमोशन मिळवत मिळवत क्लासवन आँफिसर झालो” नरेश अभिमानाने म्हणाला ” आपल्या हाताखालच्या स्टाफकडून काम करुन घेणं किती अवघड आणि चँलेंजिंग असतं हे तुमच्यासारख्या पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांना नाही कळायचं. शासनाकडून मला त्यासाठी बरेच पुरस्कार देखील मिळालेत”

” वा खुप छान. पण मलाही तेच म्हणायचंय. तुझ्या हाताखालचे सर्वच कर्मचारी इमानदार, प्रामाणिक आणि कष्टाळू होते का? “

” अरे बाबा सरकारी खात्यात तर पन्नास टक्के लोक फक्त दिवस भरतात. त्यांना कामाशी काही देणंघेणं नसतं”

” शिक्षकांचीही तीच परीस्थीती आहे. काही मोजके नालायक शिक्षक पुर्ण शिक्षण क्षेत्राला काळीमा फासतात. त्याला काही इलाज नाही. आम्ही मात्र आमचं शिकवण्याचं काम जीव तोडून केलं. मोठ्या हुद्दयावरचे आमचे विद्यार्थी आता भेटले की पाया पडतात तेव्हा आपली किंमत कळते”

” पण तेवढ्याने हुरळून जायचं कारण नाही. तुम्ही आयुष्यात काय कमावता ते महत्वाचं आहे. माझ्याकडे बघ. मला नोकरीत असतांना किती मानमरातब मिळायचा. शिवाय माझा पगार, वरची कमाईही भरपूर असायची. आज माझ्याकडे काय नाही ते विचार. मोठा बंगला आहे, आलिशान गाडी आहे. मुंबई पुण्यात लक्झरीयस फ्लँट आहेत. दोन्ही मुलं बंगलोरमध्ये चांगल्या कंपनीत रग्गड पगारावर नोकरीला आहेत. पुढच्या महिन्यात मी फिरायला सिंगापूर मलेशियाला चाललोय. तुमच्यासारख्या शिक्षकांना हे सगळं शक्य आहे? “

नरेशच्या बोलण्यात अहंकार गच्च भरला होता. सुनीलच्या ते लक्षात आलं. तो हलकसं हसला आणि म्हणाला

” या अगोदरही फाँरेनला कुठे गेला होतास? “

नरेशने नकारार्थी मान हलवली

“जमलंच नाही रे. कामात खुप बिझी असायचो. क्लास वन आँफिसरला वेळ कुठून असणार? “

सुनीलने स्मित केलं

” नरेश मी एकवीस देशात फिरुन आलोय. “

 काय्य!!!काय सांगतोस? “आ वासून नरेश त्याच्याकडे पाहू लागला

“हो नरेश. तुला माहीत नसेल मी गणिताचा मास्टर आहे. गणिताच्या परिषदांमध्ये व्याख्यान देण्यासाठी मी भारतातच नाही तर बऱ्याच देशातही गेलोय. मागच्याच महिन्यात मी कोरीयाला जाऊन आलो”

नरेशने सुनीलला वरपासून खालपर्यंत पाहिलं. त्याच्या साध्या कपड्यावरुन तो इतका विद्वान असेल असं वाटत नव्हतं.

” बरं मला एक सांग भारतात तू कुठंकुठं जाऊन आलाहेस” सुनीलने विचारलं

” महाराष्ट्र आणि दिल्लीशिवाय कुठंच जाता आलं नाही बघ. रिटायर झाल्यावर फिरु असं ठरवलं होतं”

” तुला काही आजारबिजार आहेत? “

“आहेत ना. बीपी आणि डायबेटीस. कोलँस्ट्रोलही वाढलंय. कारे असं का चारतोस? “आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरुन हात फिरवत नरेशने विचारलं

“नरेश अरे आता या म्हातारपणात आणि असे आजार घेऊन तू कितीसा फिरणार आणि ते फिरण्यात तुला काय मजा येणार? मला सांग गोव्यातल्या बिचवरच्या सुंदर मुलींना पाहून तुला आता काय मजा वाटणार आहे? उत्तराखंडमधल्या व्हँली आँफ फ्लाँवरला तू आता जाऊ शकणार नाहीस. गेलास तरी ती फुलं पाहून तुला काहीच आनंद वाटणार नाही. तरुणपणी याच गोष्टींनी तुला कितीतरी आनंद दिला असता. मंदिरात जाण्याचे आपले दिवस. ही प्रेक्षणीय स्थळं पाहून कुठली मजा आपल्याला येणार? काही गोष्टी योग्य वयातच केल्या पाहिजेत. नंतर केल्या तर त्यातला आनंद नाहिसा झालेला असतो. “

नरेश चिडून म्हणाला

“मला एवढं लेक्चर देतोहेस. तू तरी या गणिताच्या परिषदांव्यतिरिक्त कुठं फिरला आहेस का? “

सुनील हसला.

” नरेश शिक्षकी पेशा मी जाणूबुजून स्विकारला. मला खरं आयुष्य जगायचं होतं. त्यातला आनंद लुटायचा होता. लहानपणापासूनच मी वेगळं आयुष्य जगण्याची स्वप्नं पहात होतो. घरच्या गरीबीमुळे ते शक्य नव्हतं. पण नोकरी लागली आणि मला पंख फुटले. गणित, विज्ञान हे माझे आवडते विषय. त्यात मी मास्टरी केली. शाळेच्या सहलींची जबाबदारीही मी माझ्यावरच घेतली. त्यातून मला खुप अनुभव आला शिवाय अनेक स्थळंही बघता आली. मग मी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरचे ग्रुप घेऊन जाऊ लागलो. त्यातून मला खुप कमाई होऊ लागली. त्या पैशांची बचत करुन मी अख्खा भारत पालथा घातला. या काळात मला साहसाची आवड निर्माण झाली. एकदा मनात आलं. सायकल काढली. ग्रुप जमा केला. सायकलने नेपाळला जाऊन आलो”

“बापरे नेपाळला? “नरेश थक्क होऊन म्हणाला.

“नुसतं नेपाळच नाही तर, गोवा, लडाख, अरुणाचल, मेघालय इत्यादी सात राज्येही मी सायकलवर फिरलो. युरोपलाही जाणार होतो पण पैशांअभावी ते जमलं नाही. मग मी ट्रेकिंग करायला सुरुवात केली. हिमालयासहीत भारतातल्या जवळजवळ सर्वच पर्वतरांगात मी ट्रेकिंग केलंय. राँक क्लायंबिंग, रँपलिंग, व्हँली क्राँसिंग हेही मी केलंय. हे आयुष्य पुन्हा नाही हे मला माहित होतं. शिवाय म्हातारपणात या गोष्टी शक्य होत  नाहीत म्हणून मी तारुण्याचा पुरेपुर फायदा उचलला. या प्रोसेसमध्ये मी माझ्या प्रमोशनकडेही दुर्लक्ष केलं. असाही मी मँनेजमेंटच्या मर्जीतला नव्हतो. त्यामुळे मँनेजमेंटने मला ज्युनियर असलेल्या आणि लायकी नसलेल्या व्यक्तींना माझ्या अगोदर प्रमोशन दिले. अर्थात मी ते कधी मनावर घेतलं नाही. मी माझ्या पध्दतीने आयुष्याचा आनंद घेत राहिलो. तू ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’हा पिक्चर बघितलाय? “

“नाही “

” जरुर बघ. आयुष्य कसं जगायचं ते तुला कळेल”

” पण कारे इतकं सगळं करत असतांना तुझं घरादाराकडे दुर्लक्ष होत असेल? “नरेशने विचारलं.

“अजिबात नाही. कारण मी या गोष्टी सुट्यांमध्येच करायचो. शिवाय बऱ्याचशा सहलीत माझी पत्नी आणि मुलंही सोबत असायची. त्यामुळे त्यांनी कधी तक्रार केली नाही. घर, परीवार, छंद आणि नोकरी यांची व्यवस्थित सांगड मला घालता आली. त्यामुळे मी भरभरुन जगलो. संगीताचीही मला आवड होती. माझा आवाज चांगला नव्हता. त्यामुळे गाणं शिकण्याऐवजी मी वाद्यं शिकलो. बासरी, हार्मोनियम, गिटार, व्हायोलिन ही वाद्यं वाजवण्यात पारंगत झालो”” पण एवढं सगळं करायला तुला वेळ तरी कसा मिळायचा? ” नरेशने विचारलं. 

—-पश्चात्ताप—-  क्रमश: भाग 1 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print