मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क्युआर कोड आणि लग्न” – लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

☆ “क्युआर कोड आणि लग्न” – लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर ☆ प्रस्तुती : श्री अमोल अनंत केळकर

आज बऱ्याच दिवसांनी केके उर्फ कमलाकर कदम याला भेटायचा योग आला .

योग कसला केकेनेच फोन करून बोलावले होते.तसाही तो दिवसभर लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये बसूनच असतो.पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे आम्हाला आवडते.

गप्पा मारताना त्याच्यासमोर पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले. सहज म्हणून मी ते उघडले तर ती लग्नपत्रिका वाटत होती.पण त्यावर कोणाचेच नाव छापले नव्हते फक्त मोठा क्यूआर कोड होता.

मी ते केके दाखविले.तसा तो हसला.

“भाऊ डिजिटल लग्नपत्रिका आहे ही “

“अरे वा “असे म्हणून मी माझा फोन काढून तो कोड स्कॅन करायचा प्रयत्न केला पण ते ओपन होत नव्हते.

“भाऊ ज्यांना पत्रिका दिलीय त्यांच्याच नंबरवरून ओपन होईल ते” असे म्हणून त्याने स्वतःचा फोन घेऊन स्कॅन केला .ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्न पत्रिका आणि एक गूगल फॉर्म आला .

” हा फॉर्म भरून द्यावा लागेल .तू येणार आहेस का ? ” त्याने विचारले.

मलाही उत्सुकता वाटली.

मी होय म्हणालो.

“हे बघ, त्यानी कधी येणार विचारले आहे . म्हणजे सकाळी की संध्याकाळी ?”केकेने विचारले.

मी गमतीने म्हटले” दोन्ही वेळेस”.

त्याने माणसेच्या कॉलममध्ये दोन आकडा टाकला.

“भाऊ, त्याने मला फक्त संध्याकाळी स्वागत समारंभाला बोलावले आहे .म्हणजे संध्याकाळीच जाऊ.सकाळचे दोन स्लॉट आपल्यासाठी बंद आहेत.”

“दोन स्लॉट ?” मी प्रश्नार्थक चेहरा केला.

“सकाळी अक्षता टाकायला एक स्लॉट .जेवायला दुसरा आणि संध्याकाळी स्वागत समारंभाला तिसरा स्लॉट .”त्याने उत्तर दिले.

मग संध्याकाळी किती वाजता जायचे त्याचे टायमिंग लिहिले .

“भाऊ एक तास पुरे का ? आठ ते नऊ लिहितो “त्याने माझा होकार समजून लिहिले .

“जेवण काय हवेय ?” त्याने पुन्हा प्रश्न केला.

“अरे जे आहे ते खाऊ ? “मी चिडून म्हटले.

“तसे नाही भाऊ .हल्ली लग्नात काऊंटरवर दिसतील ते पदार्थ घेतात आणि नंतर टाकून देतात .त्यांनी लिस्ट दिलीय त्यातून पदार्थ निवड” माझ्या हाती फोन देत तो म्हणाला.

जेवणाचे बरेच पदार्थ लिस्टमध्ये होते.अगदी लोणचे सॅलेड पासून पान सुपारी पर्यंत.वरती माझे नाव होते.

जवळजवळ वीस पदार्थ होते .मी त्यातून भात,पुरी वरण, बासुंदी ,पनीर भाजी, सॅलेड ,आईस्क्रीम सिलेक्ट केले .

“वा भाऊ, मोजकेच जेवतोस ? छान सवय आहे .लग्नाच्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठ वाजता ये नऊ ला हॉलमधून बाहेर पडू .” केकेने त्याचा मेनू सिलेक्ट करीत फॉर्म सबमिट केला.

लग्नाच्या दिवशी बरोबर आठ वाजता हॉलमध्ये पोचलो .

अरे, हॉलचा दरवाजा बंद होता. लग्न कॅन्सल झाले की काय ?माझ्या मनात शंका .

पण केके बेफिकीर दिसला .त्याने दरवाजावरील क्यू आर कोड स्कॅन केला. ताबडतोब त्याला ओटीपी आला त्याने दरवाजावरील कीपॅडवर ओटीपी दाबला आणि दरवाजा उघडला .

आतमध्ये नेहमीसारखे लग्नाचे वातावरण होते.पण कुठेही गडबड गोंधळ दिसत नव्हता .आम्ही स्टेजवर पाहिले तर वधुवर उभे होते पण त्यांच्या आजूबाजूला फारशी गर्दी दिसत नव्हती.

पण स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे क्यूआर कोड दिसत होते .

“भाऊ आहेर किती देणार ?” केकेने विचारले.

“पत्रिका तुला आहे मला नाही ?” माझ्यातील मराठी माणूस जागा झाला .

त्याने हसून मान डोलावली आणि नवऱ्याच्या बाजूच्या क्यूआर कोडवर हजार रु स्कॅन केले .पैसे पोचल्याची रिसीट मिळाली .मग त्याने ओळखीच्या लोकांना भेटायला सुरवात केली .

अचानक नवरा नवरीच्या डोक्यावर ठेवलेल्या डिस्प्ले मध्ये केकेचे नाव आले.तसा केके मला घेऊन स्टेजवर गेला .नवऱ्याची आणि माझी माझी ओळख करून दिली .नवरा अर्थात केके ला ओळखत होता . बहुतेक त्याचाच विद्यार्थी असावा.आमचा एक फोटो काढला .

“चल जेवू या ?”

केके मला घेऊन खाली गेला .तिथेही मोजकीच माणसे जेवत होती . केकेने काऊंटरवर त्याचा नंबर सांगितला आणि आम्ही बाजूच्या टेबलवर बसलो .पाच मिनिटात आमची दोन ताटे घेऊन एक वेटर टेबलवर आला .

आयला ! मी जे पदार्थ सांगितले होते तेच पदार्थ ताटात होते .

“केके ,दुसरा एखादा पदार्थ पाहिजे असेल तर ? “मी केकेच्या ताटातील गुलाबजामकडे पाहून कुतूहलाने विचारले .

“मिळणार नाही ? त्या दिवशी चान्स होता सिलेक्ट करण्याचा तो सोडलास .याला चंचल मन म्हणतात.”

केके शांतपणे जेवू लागला .अतिशय मोजकेच पदार्थ असल्यामुळे आमचे जेवण पटकन संपले अर्थात त्यातील पदार्थ पाहिजे तितके घेण्याची सोय होती पण आमचे पोट भरले होते.सवयीनुसार मी बासुंदी वाटी अजून एक मागून घेतली .

“भाऊ नऊ वाजत आले” त्याने मोबाईल दाखविला .

च्यायला ! मोबाईलमध्ये अलार्म वाजत होता .

“अरे कोण ओळखीचा भेटला तर वेळ होणारच ना ?”मी चिडून केकेला म्हटले.

“त्यासाठी दहा मिनिटे वाढवून दिलीत.पण नंतर बाहेर नाही पडलो तर दरवाजा आपल्यासाठी लॉक होईल आणि नवरा नवरी सोबतच बाहेर पडू .मंजूर आहे का ?” त्याने शांतपणे मला विचारले.

मी नाईलाजाने मान डोलावली .

तिथे पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते . त्यावर एक व्हाट्स अप नंबर दिला होता. बहुतेकजण वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होते .ग्रुपफोटो ही बरेचजण काढत होते .फोटो काढले की त्या व्हाट्स अप नंबरवर सेंड करत होते.

“केके हा काय प्रकार ?”माझा पुन्हा एक प्रश्न.

“भाऊ इथे फोटो काढून व्हाट्सअप वर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोटो एडिट करून टाकण्यात येतील .म्हणजे एकाच लोकेशनवर सारख्याच पोजमध्ये फोटो रिपीट होणार नाहीत आणि स्टेजवरची गर्दी टाळता येईल. ” केके सहज स्वरात म्हणाला आणि माझा हात धरून दुसऱ्या दरवाजाने ओटीपी नंबर दाबून बाहेर पडला.

बाहेर येताच मी केके ला विचारले “यामागे डोके तुझेच ना ?”

केके हसला .

“भाऊ लग्न मनासारखे एन्जॉय केलेस ना ? थोडी शिस्त आणि कठोरपणा आहे .पण सर्वाना मनाप्रमाणे एन्जॉय करता आले ना .आता बघ ना तुझा वेळ वाचला .तुला पाहिजे ते मनासारखे खाता आले .अन्न फुकट गेले नाही.लोकांची धक्काबुक्की नाही .वधूवराना घाई नाही .स्टेजवर पाकीट द्यायला रांग नाही .तू जितका वेळ दिलास तितका वेळ तुला लग्न एन्जॉय करता आले . तू एक तास दिलास आम्ही तुला एका तासात मोकळे केले .तू जितका जास्त वेळ दिला असतास तितकाच वेळ आम्हीही घेतला असता “.केके हसून म्हणाला .

“पण ही आयडिया कशी आली तुझ्या डोक्यात ?” मी विचारले.

“त्या दिवशी तुकाराम कदमाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो .लग्न दुपारचे जेवणाची आणि लग्नाची वेळ सारखीच त्यामुळे खूप गडबड उडाली होती.अरे ,लग्नाचे विधीही करू देत नव्हते.वधूवर उभे राहिले की लोक आहेर द्यायला धावायचे.पुन्हा फोटोही काढायचे. जेवायला ही गर्दी .त्यात हॉल छोटा .अन्नाची प्रचंड नासाडी .बिचाऱ्या कदमांनी खूप खर्च करून लग्नाचा घाट घातला होता.त्यांच्याकडून काहीच कसर बाकी ठेवली नाही तरीही लोक बडबड करीत होती .नावे ठेवत होती. पैसे खूपच खर्च केले होते पण नियोजन नव्हते .मग मीच ठरविले यावर काहीतरी मार्ग काढायचा . आपल्या पोरांना क्यू आर कोड तयार करायला लावले म्हटले हेच वापरून नियोजन करायचे.त्यात हे लग्न ठरले .मग मी वधू वर त्यांचे आईवडील आणि खास नातेवाईक याची मिटिंग घेतली आणि ही प्रोसिजर सेट केली. दोन्हीकडून किती माणसे येतील ? त्यात दिवसभर कोण असणार ? पटकन येऊन कोण जाणार ? याची वर्गवारी केली .जेवण फुकट घालवायचे नाही हा दोन्ही पार्ट्याचा प्रमुख आग्रह होता.विधी पूर्ण झाले पाहिजे यावर दोघांचे एकमत होते.थोडा वाईटपणा घ्यायला ते तयार होते .मग काय लावले आपल्या पोरांना कामाला .आपल्या पोरांनाही काम मिळाले माझे ही थोडे सुटले तुलाही मनासारखे जेवण मिळाले ” केके माझ्या हातावर टाळी देत म्हणाला .

“धन्य आहेस बाबा तू ” मीही त्याला हात जोडीत म्हणालो .

लेखक : श्री. किरण कृष्णा बोरकर

प्रस्तुती – श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(दुसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन ठेऊ. आपल्याला उसना उत्साह दाखवावाच लागेल.”) – इथून पुढे  

मी गप्प राहिले, मला चहा करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती, अरुण ने सकाळी चहा केला, आपल्यासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवला. मग अरुणने धावपळ करून एक छोटा हॉल ठरवला. 50 माणसांसाठी लग्नाची तयारी केली, जुहू मधील एका मोठ्या हॉटेलात रिसेप्शन ठेवले. शंभर पत्रिका छापल्या. जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पत्रिका आणि काहींना फोन करून आमंत्रण दिले. सर्वांनाच धक्का बसला, माझी आई, बहिणी, अरुणची बहीण, भाचा, भाची सर्वजण आश्चर्यचकित झाले. कोणाला काही अंदाजच नव्हता. अरुण गावी जाऊन देवांना आणि घरच्या माणसांना आमंत्रण देऊन आला.

लग्नाच्या आधी दोन दिवस अमिता आणि जॉन आले. जॉन मला भेटायला आला. मला तो मुळीच आवडला नाही. वाढवलेले केस, दाढी, ढगळ कपडे, तोंडात सतत इंग्लिश मध्ये शिव्या, भारताला कमी लेखणे. पण मी असाहाय्य होते, माझ्या मुलीने त्याच्याशी लग्न केले होते, अरुण ला पण तो आवडला नव्हता हे कळत होते, पण अरुण तोंड मिटून गप्प होता.

यावेळी माझी मुलगी मला अनोळखी वाटली, तिचे प्रेम आटून गेले की काय अशी मला शंका आली. ती तिच्या बाबांना स्पष्टपणे म्हणाली, “अमिता – बाबा, आता मी फारशी भारतात येणार नाही, तुम्हा दोघांना वाटल्यास तुम्ही अमेरिकेत या. जॉन हा अमेरिकेतील मोठा पॉप सिंगर आहे. त्याच्या गाण्याचे त्याला खूप पैसे मिळतात. मी पण नोकरी सोडणार नाही. मला अमेरिकेत डॉलर्स मध्ये पैसे मिळतात. त्यामुळे यापुढे माझ्यासाठी पैसे जमवू नका. आता दोघांनी आराम करा. व्यवसाय कोणाकडे तरी सोपवून मोकळे व्हा.” 

तिचे हे बोलणे ऐकून तिचा बाबा गप्पच झाला. आमच्या समाधानासाठी अमिता आणि जॉन यांचे आमच्या पद्धतीने छोटेसे लग्न लावले. दुसऱ्या दिवशी जुहू मधील मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवले. माझ्या माहेरील सर्वजण  हजर होते, अरुण च्या घरची मंडळी पण उपस्थित होती. सर्वजण अभिनंदन करत होते, कौतुक करत होते, पण मला कळत होतं काही काही लोकांच्या डोळ्यात कुचेष्टा होती, काहींच्या सहानभूती. प्रत्येकाच्या डोळ्यात मी वाचत होते, एकुलती एक मुलगी आई-वडिलांना न जुमानता निघाली असल्या धेंडा बरोबर लग्न करून.

दोन दिवस मुंबईत राहून अमिता आणि जॉन अमेरिकेला निघाले. मला वाटले होते जाताना तरी अमिता माझ्या गळ्यात पडेल, मला मिठी मारून रडेल, बाबाला सावरेल… पण तसे काहीच झाले नाही. ती अतिशय आनंदात तिच्या जॉन बरोबर अमेरिकेला गेली.

गाडीतून परत येताना अरुण गप्प गप्प होता. तो तसा मनस्वी, मनातील खळखळणारा समुद्र जाणवू न देणारा. मी मात्र सुन्न झाले होते. कशासाठी आणि कोणासाठी ही सर्व धडपड.?

घराचे दार उघडून आम्ही दोघे घरात आलो आणि अरुण ओक्साबोक्सी रडू लागला. “आपली लेक आपल्याला परकी झाली गं, मुंबईत आली चार दिवस पण परक्यासारखी वावरली. जन्म दिला आपण, लहानाचे मोठे केले आपण, शिक्षण दिले संस्कार दिले आपण आणि त्या जॉन पुढे आपण तिला परके झालो”.

मग मी पुढे झाले, त्याला जवळ घेत मी म्हणाले, “खूप धडपडलास तू आमच्यासाठी, मुंबईत आलास तेव्हा तुझ्याकडे काहीही नव्हतं. आपलं लग्न झालं तेव्हा तू मामाकडे राहत होतास. मग छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवलंस. मग अमिताचा जन्म झाल्यानंतर तू आणखी धडपडलास, स्वतःची जागा घेतलीस, ऑफिस साठी जागा घेतलीस, मग पुण्याला एक फ्लॅट घेतलास, घर, गाडी, फर्निचर, सर्व झालं, पण हे कुणासाठी? माझ्यासाठी आणि त्यापेक्षा लाडक्या लेकीसाठी, किती धडपड करशील रे…? कुणाला त्याची काही किंमत तरी आहे का? ती आपली लेक सांगून गेली, ‘आता सर्व कमी करा’ मग करा ना कमी सर्व, आपणा दोघांसाठी कितीसं काही लागणार आहें?

तुमच्या गावात तुमच्या चुलत भावाबरोबर कोर्टात केस? दहा गुंठे जमिनीसाठी? दहा वर्षे झाली त्या केसला, अजून काही निकाल लागत नाही, कशाला हवी गावची जमीन? तुमचा चुलत भाऊ झाला तरी तो तुम्हा मांजरेकर कुटुंबापैकीच आहे ना? म्हणजे तुझे आणि त्याचे आजोबा एकच. मग मिळू दे त्या मांजरेकर कुटुंबातील माणसाला. दुसऱ्यांनी जमीन खाण्याऐवजी तुझ्या कुटुंबातील एकाला मिळाली तर का नको? घेऊन टाक ती केस मागे, सर्व मांजरेकर कुटुंब एक होऊ दे. 

तुझ्या मित्राचा मुलगा तुझ्याबरोबर व्यवसायात आहे, गेली कित्येक वर्षे इमाने इतबारे काम करतोय, हळूहळू त्याच्या हातात सर्व धंदा दे. पुण्यात तुझ्या बहिणीचा मुलगा अश्विन आहें, त्याला जागा नाही आहें, त्याला म्हणावं आपल्या फ्लॅटमध्ये राहा, हळूहळू सर्व काही कमी करायला हवं रे, जिच्यासाठी राखून ठेवलं होतं तिला त्याची गरज नाही, मग ज्यांना गरज आहे त्यांना का देऊ नये?

सांभाळ स्वतःला, आम्ही बायका रडत असलो तरी आतून खंबीर असतो, लहानपणापासून अनेक त्याग करायची सवय असते बायकांना.

आपल्या आई-वडिलांना, भावा बहिणींना सोडून आम्ही नवऱ्याच्या घरी जातो, आमचं नाव सुद्धा विसरतो आम्ही, पण तुम्ही पुरुष बाहेरून कणखर दाखवता पण मनातून मेणा सारखे मऊ असता. आपली लेक आपल्याला टाटा करून गेली, तिच्या मनातही आलं नाही की आपल्या आई-वडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. 

नटसम्राट नाटकात गणपतराव बेलवलकर बोलून गेलेत, “आपण उगाच समजतो, आपण आई झालो, बाप झालो, खरं तर आपण कुणीच नसतो. अंतराळात फिरणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने खाली उतरतो, आणि आम्ही समजतो आई झालो, बाबा झालो’.

अरुण, आपली पोर आपल्यासाठी तीस वर्षांपर्यतच होती असं म्हणायचं, आणि गप्प राहायचं. त्या पेक्षा तूझ्या ऑफिस मधील शरद सतत तुझी काळजी करतो, तुला किंवा मला बरं नसतं तर त्याचा जीव कासावीस होतो, तो जवळचा नाही का?

“अरुण, पुरे झालं हे शहर, इथे धड श्वास घायला मिळत नाही, पुरे झाले पैशासाठी धावणे…. आता इथला पसारा कमी करून तूझ्या गावी जावू, जुने घर आहें, ते नवीन बांधू, तुम्ही मांजरेकर एक व्हा, पुन्हा पूर्वी सारखे सण साजरे करूया.”

माझे बोलणे अरुणला पटले असावे बहुतेक, डोळे पुसत तो मान हलवत होता, मी त्याला थोपटता थोपटता सलील कुलकर्णी म्हणतो ते गाणे गुणगुणु लागले. 

“सांगायचे आहें माझ्या सानुल्या तुला,

दमलेल्या बाबाची कहाणी तुला,

तूझ्या जगातून बाबा हरवेल का गं,

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं 

ना.. ना… ना, ना.. ना.. ना…

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दमलेल्या बाबाची गोष्ट… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

नवरा ऑफिसमध्ये गेला आणि माझी आवराआवर सुरू झाली. आज अंथरुणं पांघरूणं धुवायला काढायची असं मी म्हणत होते, एवढ्यात मोबाईल वाजला म्हणून मी फोन घेतला, कन्येचं नाव दिसलं म्हणून मी खुश झाले. गेल्या महिन्याभरात किमान दहा स्थळांचे फोटो मी पाठवले होते. तिचे एवढे फोन आले पण कुठल्या स्थळाबद्दल तिने होकार कळवला नव्हता. पण माझा अंदाज होता एक दोन दिवसात ती निश्चित कळवेलच, कदाचित त्यासाठीच तिचा अचानक फोन असेल ह्या उत्सुकतेने मी फोन उचलला.

“मग काय, आज सकाळी सकाळीच फोन, म्हणजे भारतात सकाळ गं, नाहीतर तुझा रात्रीचा फोन ठरलेला. हाच फक्त सकाळी आला. आईशीच काही बोलायचे का? कुठला फोटो आणि कुठलं स्थळ तुला पसंत सांग लवकर?” 

“अगं आई, त्या करताच मी फोन केला. तू मला एवढ्या स्थळांचे फोटो पाठवू नकोस, माझ्या लग्नाची तयारी पण करू नकोस, आम्ही लग्न ठरवलंय. ‘

लग्न ठरवलं हे ऐकून माझा श्वासच अडकला. “अगं आम्ही म्हणजे कोणी?”

“मी आणि जॉन ने. “

मी घाबरून किंचाळले, “अगं कोण हा जॉन?”

“अग आई, मागे मी तुला फोटो पाठवलेला ना जॉनचा. “

“अगं असे तुझ्या मित्र-मैत्रिणींचे फोटो तू नेहमीच पाठवतेस, माझ्या कसं लक्षात राहील जॉन कोण आणि  कोणता ते. “

“अगं जॉन, जॉन विली त्याचं नाव, पॉप गायक आहे तो. “

” केवढा धक्का दिलास तू अमिता, मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती, तुझ्या बाबाला आता केवढा धक्का बसेल माहिती आहे? आणि काकांना मावशी ना काय सांगू गं मी?” 

मी रडू लागले. फोन बंद करून खुर्चीत बसले. केवढ्या अपेक्षा या मुलीकडून ठेवल्या होत्या आम्ही? तिच्या लग्नाच्या तयारीसाठी काय काय जमवत होते मी. तिचा बाबा तर तिच्या बाबतीत खूपच सेन्सेटीव्ह, एकुलती एक मुलगी, त्यात पहिल्यापासून हुशार. तिच्या बाबाला गर्व होता की आपल्यासारखी हुशार म्हणून.

नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेली पण आज ना उद्या भारतात परत येईल ही आशा आम्हाला होतीच. तिची आता तिशी जवळ आली तशी आम्हाला आता जास्त काळजी वाटायला लागली. कुठून कुठून तिच्यासाठी स्थळं येत होती, त्यातील चांगल्यात चांगलं स्थळ तिच्यासाठी आम्ही निवडणार होतो पण….

मला माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याची, अरुणची जास्त काळजी वाटायला लागली. मी निदान रडून तरी दाखवीन, तो बाहेरून दाखवायचा नाही पण आतल्या आत कोसळून जाईल. एकुलत्या एक मुलीसाठी आयुष्यभर झटतोय, अजून उमेदीने व्यवसाय वाढवतोय, या वयात आठवड्यातून एकदा तरी दुसऱ्या शहरात व्यवसायासाठी धावतोय, कुणासाठी हे सर्व?

मी दिवसभर कॉटवर झोपून राहिले. काही करायची इच्छाच मला होईना, एवढी एवढी छोटी अमिता, शाळेत जाणारी अमिता, टेनिस खेळायला जाणारी अमिता, इंजिनीरिंग ला जाणारी अमिता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी अमेरिकेत जाणारी अमिता मला आठवत राहिली. अमेरिकेत जायला माझा विरोध होताच पण तिच्या बाबाचा तिला पाठिंबा होता.

सायंकाळी अरुणला कसं सांगायचं याचा मी विचार करत होती, कदाचित तिने बाबाला फोन केला पण असेल, मी तिचा फोन कट केला तसा बाबा फोन कट करणार नाही, तो शांतपणे तिचं म्हणणे ऐकून घेईल, आतून कोसळेल पण बाहेर दाखवणार नाही. मला माझ्या नवऱ्याची अरुणची पद्धत माहिती होती. तॊ जेव्हा जास्त टेन्शनमध्ये असेल तेव्हा जास्त हसेल, गडबड करेल. आपलं टेन्शन दुसऱ्याला दाखवणार नाही. आतल्या आत आपणच ते सहन करील.

आज रोजच्या पेक्षा लवकर अरुण घरी आला. येताना माझ्या आवडीचे गुलाब जामुन घेऊन आला. तेव्हाच मी ओळखले याला सर्व कळले आहे. माझा तणाव घालवण्यासाठी याने मुद्दाम गुलाबजामून आणलेत. हाच तो माझी जास्त चेष्टा करेल, गमती जमती सांगेल. मनातल्या मनात रडत असेल पण बाहेर दाखवायचा नाही.

माझ्या हातात गुलाबजाम देऊन तो म्हणाला, “चल आज कुठेतरी फिरून येऊ”.

“आज एवढा खुशीत का, लाडक्या लेकीचा फोन आलेला दिसतो. “

“हो ना, तिनं लग्न ठरवलंय म्हणे, जॉन बरोबर. “

“मग झापलं नाहीस तिला, का खूप आनंद झाला जॉन बरोबर लग्न ठरवले म्हणून, एवढे गुलाबजामून आणलेस म्हणून विचारले. “

“विरोध करून काही उपयोग नसतो गं, उगाच आपल्या मुलीच्या मनातून आपण उतरतो, ती आता तिशीची झाली, तिचे बरे वाईट तिला कळते. “

“म्हणून काही उघड्या डोळ्यांनी आपण लग्न लावून द्यायचं? मी आई आहे तिची, कोण कुठला तो जॉन, ना ओळखीचा ना पाळखीचा, आपल्या मुलीच्या शरीराचा मनाचा तो मालक होणार, आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं?”

” मग काय करू शकतो आपण? तिने लग्न करू का हे विचारलेले नाही, तिने याआधीच त्याच्याशी लग्न केले आहे ना”

“काय म्हणतोस?” मी किंचाळत विचारले.

“होय, तिने त्याच्याशी रजिस्टर लग्न केले आहे, दोन महिन्यापूर्वी. “

“आणि ती आता आम्हाला सांगते? आपली मुलगी एवढी परकी होते?”

“हे असंच असतं, तिला तिचा साथीदार मिळाला की तिचे आई-वडील पण परके होतात, तेव्हा तिला कसलाही विरोध न करता त्यांना आशीर्वाद देणे हेच योग्य”.

“पण अरुण, मी दुखावले गेले आहे रे, माझ्या मुलीकडून मलाही अपेक्षा नव्हती. मी तिला माफ करू शकणार नाही”.

“काय करू शकतो आपण? आपण तिला मोठ्या मनाने माफ करायला हवे, आपल्याला आपल्या मुलीला गमवायचे नसेल तर आपण तिला माफ करायलाच हवे”.

“पण तिने या आधीच लग्न करून ती मोकळी झाली, आणि ही गधडी आत्ता सांगते लग्न केले म्हणून? आपले संस्कार कुठे कमी पडले का? आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना काय सांगायचे? तिने दोन महिन्यापूर्वी लग्न केले म्हणून? माझी आई काय म्हणेल? माझ्या बहिणी, भाऊजी, तुझे गावचे भाऊ, काय उत्तर द्यायचे त्यांना?”

“उत्तर हे द्यावेच लागेल, लग्न याआधी झाले हे कळवायचे नाही कुणाला, मी अमित शी बोलतो, तिला म्हणतो तुम्ही दोघेही भारतात या, आपण त्यांचे परत इथे लग्न लावूया, एखादे रिसेप्शन ठेवूया, त्याला सर्वांना बोलऊया, आणि एक लक्षात ठेव, people’s memory is always short, कोणाला फारसे आठवणार पण नाही काही दिवसांनी. “

मी जेवण न करता उशीत डोकं खुपसून रडू लागले, अरुण येरझाऱ्या घालत होता. त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजला असेल याची मला कल्पना होती. काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचे मला ऐकू येत होते.. निश्चितच तो अमिताशी बोलत असणार.

सकाळी अरुण मला म्हणाला, पुढील महिन्यात अमिता आणि जॉन भारतात येत आहेत. आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळी साठी परत एकदा त्यांचे लग्न करू. दुसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन ठेऊ. आपल्याला उसना उत्साह दाखवावाच लागेल. “

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गोड बोलून…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “गोड बोलून…” ☆ श्री मंगेश मधुकर 

“कदम,जरा केबिनमध्ये या”साहेबांचा फोन.सकाळीच बोलावणं म्हणजे महत्वाचं काम असणार म्हणून कदम लगबगीनं केबिनमध्ये गेले. समोर बसलेल्या तिशीतल्या तरुणीशी साहेब बोलत होते. 

“हियर ही इज,अवर बेस्ट अँड मोस्ट एक्सपिरीयन्स स्टाफ.ज्यांच्याविषयी सांगत होतो तेच आमचे कदम,गेली २० वर्षे एक्सलंट काम करत आहेत.”साहेबांनी अचानक केलेल्या कौतुकानं कदम संकोचले. 

“तुमचा पाठिंबा आणि मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झालं.यू आर ग्रेट लीडर.” कदमांकडून स्तुती ऐकून साहेब सुखावले. 

“मला बोलावलं होतं”कदमांनी विचारलं.

“ओ येस,ही सारिका,माझ्या मैत्रिणीची मुलगी,आपल्याकडे जॉइन होतेय.एमबीए आहे.तुमच्या हाताखाली ट्रेन करा.”

“मॅडम,वेलकम टू फॅमिली” 

“कदम सर,फक्त सारिका म्हणा.तुमच्यापेक्षा ज्ञानानं,अनुभवानं,वयानं खूप लहान आहे”

“ओके”कदमांनी मान डोलावली.कदमांच्या मार्गदर्शनाखाली सारिकाचं ट्रेनिंग सुरू झालं.कामातले छोटे छोटे बारकावे समजून घेत वर्षभरात सारिका तयार झाली.सोबत वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन होतचं.

प्रोजेक्टविषयी चर्चा सुरू असताना अचानक साहेब म्हणाले “दोन महिन्यांनी देशपांडे रिटायर होतायेत.चांगला माणूस कमी होतोय.एक बरयं की तुम्ही अजून दहा-पंधरा वर्ष आहात म्हणून काळजी नाही.” 

“मीपण तीन वर्षानी रिटायर होतोय.”

“काय सांगता.तुमच्याकडे बघून वाटत नाही.चांगलं मेंटेन केलेय.अजूनही कामाचा झपाटा जबरदस्त आहे.सारिकाविषयी काय वाटतं”साहेब 

“हुशार,मेहनती आणि प्रामाणिक आहे.”

“आता तिला मोठ्या जबाबदाऱ्या द्याव्यात का?”

“नक्कीच”

“कदम,इतकी वर्षे कंपनीच्या अनेक जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडत आहात.हॅट्स ऑफ टू यूवर डेडीकेशन.”कदमांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली कारण साहेबांकडून कौतुक म्हणजे काहीतरी वेगळं घडणार याची पूर्वसूचना. 

“तुमच्यावर कामाचा खूप लोड आहे.जर हरकत नसेल तर त्यातला थोडा भार कमी करुयात”. 

“नो प्रॉब्लेम”कदमांना नाईलजानं परवानगी द्यावीच लागली.पर्याय नव्हता.निर्णय झाला होता फक्त तोंडदेखलं विचारण्याचं नाटक साहेब करत होते.काही दिवसातच कंपनीच्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी कदमांच्या ऐवजी सारिकाकडं देण्यात आली.अनेकांना हा बदल आवडला नाही.तीव्र पडसाद उमटले.कदमांनासुद्धा हा धक्का होता.त्यानंतर साहेब कदमांशी चर्चेचे नाटक करून एकेक जबाबदाऱ्या देत सारिकाचं कंपनीतलं महत्व वाढवत होते.’खुर्चीपुढं गरजवंत हतबल असतो’ या न्यायानं कदम शांत होते.  

—   

दरवर्षीप्रमाणं कंपनीमध्ये अॅन्युअल डेला प्रमोशन जाहीर होणार होती.प्रचंड उत्सुकता होती.एकेक प्रमोशन जाहीर होऊ लागली तसा जल्लोष वाढत होता.अभिनंदनाचा वर्षाव,हसणं,गप्पांचा गदारोळ सुरू होता.सिनॅरिटीप्रमाणं कदम सर ‘मॅनेजर’ होणार याविषयी सर्वांना खात्री होती.आपल्या माणसाचं यश साजरं करण्यासाठी म्हणून खास तयारी केली होती.काही वेळानं साहेबांनी “मॅनेजर”चं प्रमोशन जाहीर केल्यावर एकदम शांतता पसरली.सारिकाची मॅनेजर म्हणून झालेली निवड धक्कादायक होती.उघडपणं बोललं नाही परंतु सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. पार्टीचा मूड बदलला.साहेबांनी टाळ्या वाजवून सारिकाचं अभिनंदन केलं तेव्हा कोणीच प्रतिसाद दिला नाही.पुढे येऊन कदमांनी अभिनंदन केलं तेव्हा सारिकानं नजरेला नजर देणं टाळलं.

“कदमसर,तुम्हांला राग आला नाही”एकानं विचारल्यावर कदमांनी नकारार्थी मान डोलावली. 

“आला तरी ते नेहमीप्रमाणे दाखवणार नाहीत”

“कदम सर,आज तरी बोला की तुम्हांला सहन करण्याची सवय झालीय.”

“जे व्हायचं ते होऊन गेलंय.आता यावर बोलून काय उपयोग?”जेवणाची प्लेट घेऊन कदम कोपऱ्यात जाऊन बसले.

“कदम,लेका आज तरी मनात ठेवू नकोस.मन मोकळ कर.”देशपांडे शेजारी बसत म्हणाले.

“जाऊ दे”

“का’?”

“तू रिटायर होतोयेस.मला अजून कंपनीत तीन वर्षे काढायचीयेत”

“साहेबांनी चुकीची निवड केलीय.मी त्यांच्याशी बोलतो”

“उपयोग नाही.आपण साहेबांच्या मर्जीतले नाही.ती आहे.” 

“म्हणून असले अन्याय सहन करायचे.”

“कसला अन्याय,काय बोलतोयेस”

“कालची पोरगी मॅनेजर आणि तू इतकी वर्ष कंपनीत काय xx xxxx..प्रामाणिकपणे काम करून काय मिळालं”

“जाऊ दे ना.उगीच नको त्या विषयावर चर्चा नको.”

“मॅनेजर कोण होणार याची माहिती होती”देशपांडेनी विचारल्यावर कदम फक्त सूचक हसले. 

“बोल ना.साहेबांनी सांगितलं होतं”

“नाही पण काल संध्याकाळी बोलावलं तेव्हा अंदाज आला.”

“कशावरून”

“साहेबांची गोड बोलण्याची स्टाईल!!काल एकदम माझ्या कामाचा,प्रामाणिकपणाचा,मेहनतीचा,

कंपनीसाठी दिलेल्या योगदानाचा पाढा पुन्हा एकदा वाचायला सुरवात केली.कंपनीसाठी मी किती महत्वाचा आहे हे पटवून सांगायला सुरवात झाली.त्याचवेळी वारंवार माझ्या वाढत्या वयाचा आणि जबाबदाऱ्याचा उल्लेख करत होते.”

“मग!!”

“आपण मॅनेजर होणार नाही हे लगेच लक्षात आलं”

“कसं काय?”

“साहेब विनाकारण कधीच गोड बोलत नाही.सगळी साखर पेरणी सारिकासाठी होती. साहेबांच्या खास मर्जीतली असल्यानं तिला जॉइन मोठी पोस्ट आणि स्पेशल फेव्हर मिळणार याचा अंदाज होता परंतु माझ्याकरवी ट्रेनिंग देऊन मॅनेजर करून माझाच पत्ता कापला जाईल.असं वाटलं नव्हतं.”

“याविरुद्ध आवाज उठवायला हवा.गप्प बसू नकोस.कानामागून आली अन ….”

“आतापर्यंत कधीच कोणासमोर हात पसरले नाहीत.पद मिळवण्यासाठी तर नाहीच नाही.चमचेगिरी जमत नाही.साहेबांना,त्यांच्या हुकुमावर नाचणारा,हो ला हो करणारा,स्वतःचं डोकं न चालवणारा मॅनेजर हवा होता.तिथंच माझी अडचण झाली.”

“तुला डावललं याचं सगळ्यांना  खूप वाईट वाटतंय.”

“माझ्यापेक्षा जास्त तुम्ही दु:खी झालात.अरे,इतका आपलेपणा रक्ताच्या नात्यातले पण दाखवत नाहीत.हीच तर माझी खरी कमाई.”

“हा आदर  आपल्या प्रेमळ वागण्यानं तू मिळवला आहेस तरीपण चांगल्या लोकांची कदर होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”

“ जेव्हा जेव्हा वशिला आणि प्रामाणिकपणा एका पारड्यात मोजला जातो तेव्हा नेहमीच वशिल्याचं पारडं जड ठरतं. हाच इतिहास आहे,हेच वर्तमान आणि हेच भविष्य आहे.तसंही नोकरी म्हणजे मनाविरुद्ध केलेली तडजोड.आतापर्यंत इतक्या केल्यात त्यात अजून एक तडजोड.वाईट एवढंच वाटतं की साहेबांनी असला खेळ खेळण्यापेक्षा स्पष्ट सांगितलं असतं तर एवढा त्रास झाला नसता.राजकारण करून बाजूला सारलं हे मनाला खूप लागलं रे….” डोळे पुसण्यासाठी कदमांनी मान फिरवली.

“थोडक्यात केसानं गळा कापून काटा काढला.”

“अं हं,*गोड बोलून…….*” नेहमीच्या शांतपणे कदम म्हणाले 

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – कथा – वेष की मर्यादा ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – कथा – वेष की मर्यादा ? ?

(‘वह लिखता रहा’ संग्रह से।)

(दैनिक चेतना में 24 जनवरी 2024 को प्रकाशित।)

ठाकुर जी का मंदिर कस्बे के लोगों के लिए आस्था का विशेष केंद्र था। अलौकिक अनुभूति कराने वाला मंदिर का गर्भगृह, उत्तुंग शिखर, शिखर के नीचे उसके अनुज-से खड़े उरूश्रृंग। शिखर पर विराजमान कलश। मंदिर की भव्य प्राचीनता, पंच धातु का विग्रह और बूढ़े पुरोहित जी का प्रवचन..। मंदिर की वास्तु से लेकर विग्रह तक, पुरोहित जी की सेवा से लेकर उनके प्रवचन तक, सबमें गहन आकर्षण था। जिस किसी की भी दृष्टि मंदिर पर जाती, वह टकटकी बांधे देखता ही रह जाता।

मंदिर पर दृष्टि तो उसकी भी थी। सच तो यह है कि मंदिर के बजाय उसकी दृष्टि ठाकुर जी की मूर्ति पर थी। अब तक के अनुभव से उसे पता था कि पंच धातु की मूर्ति कई लाख तो दिला ही देती है। तिस पर सैकड़ों साल पुरानी मूर्ति याने एंटीक पीस। प्रॉपर्टी का डेप्रिसिएशन होता है, पर मूर्ति ज्यों-ज्यों पुरानी होती है, उसका एप्रिसिएशन होता है। मामला करोड़ों की जद में पहुँच रहा था।

उसने नियमित रूप से मंदिर जाना शुरू कर दिया। बूढ़े पुरोहित जी बड़े जतन से भगवान का शृंगार करते। आरती करते हुए उनकी आँखें मुँद जाती और कई बार तो आँखों से आँसू छलक पड़ते, मानो ठाकुर जी को साक्षात सामने देख लिया हो। मूर्ति की तरह ही पुरोहित जी भी एंटीक वैल्यू रखते थे।

आरती के बाद पुरोहित जी प्रवचन किया करते। प्रवचन के लिए बड़ी संख्या में लोग जुटते। उनका बोलना तो इतना प्रभावी ना था पर जो कुछ कंठ में आता, वह हृदय तल से फूटता। सुनने वाला मंत्रमुग्ध रह जाता। अनेक बार स्वयं पुरोहित जी को भी आश्चर्य होता कि वे क्या बोल गए। दिनभर पूजा अर्चना, ठाकुर जी की सेवा और रात में वही एक कमरे में पड़े रहते पुरोहित जी।

इन दिनों वेष की मर्यादा पर उनका प्रवचन चल रहा था।

“…श्रीमद्भागवत गीता का दूसरे अध्याय का 62वाँ और 63वाँ श्लोक कहता है,

“ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते। सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति।

अर्थात विषयों का चिन्तन करनेवाले मनुष्य की उन विषयों में आसक्ति पैदा हो जाती है।  आसक्ति से कामना उत्पन्न होती है। कामना का अर्थ है, वांछा, प्राप्त करने की इच्छा। अतः आसक्ति से विषयभोग की इच्छा प्रबल हो जाती है। प्रबलता भी ऐसी कि विषयभोग में थोड़ा-सा भी विघ्न भी मनुष्य सहन नहीं कर पाता। यह असहिष्णुता क्रोध की जननी है।

क्रोध आने पर मनुष्य का विवेक नष्ट हो जाता है। उसमें सम्मोह (मूढ़भाव) उत्पन्न हो जाता है। सम्मोह से स्मृति में भ्रम हो जाता है। स्मृति में भ्रम हो जाने पर बुद्धि का नाश हो जाता है। बुद्धि का नाश होनेपर मनुष्य कार्य-अकार्य में भेद नहीं कर पाता, सही-गलत का भान नहीं रख पाता। ऐसा मनुष्य अपनी स्थिति से गिर जाता है, उसकी आंतरिक मनुष्यता का पतन हो जाता है।

पूरी प्रक्रिया पर विचार करेंगे तो पाएँगे कि मनुष्यता कहीं बाहर से नहीं लानी पड़ती। सच्चाई, सद्विचार मूल घटक हैं जो हर मनुष्य में अंतर्भूत हैं। ये हैं तभी तो दोपाया, जानवर न कहलाकर मनुष्य कहलाया।

ध्यान रखना, हर मनुष्य मूलरूप से सच्चा होता है। दुनियावी  लोभ, लालच कुछ समय के लिए उसे उसी तरह ढके होते हैं जैसे जेर से भ्रूण। देर सबेर जेर को हटना पड़ता है, भ्रूण का जन्म होता है।

ढकने की बात आई तो वेष की भूमिका याद आई। आदमी की सच्चाई पर उसके वेष का बहुत असर पड़ता है। वह जिस वेष में होता है, उसके भीतर वैसा ही बोध जगने लगता है। सेल्समैन हो तो सामान बेचने के गुर उमगने लगते हैं। शिक्षक हो तो विद्यार्थी को विषय समझाने की बेचैनी घेर लेती है।  चौकीदार का वेश हो तो प्राण देकर भी संपत्ति, वस्तु या व्यक्ति की रक्षा करने के लिए मन फ़ौलाद हो जाता है…।”

…वह पुरोहित जी के वचन सुनता, मुस्करा देता।

आरती और प्रवचन के लिए रोज़ाना आते-आते पुरोहित जी से उसका संबंध अब घनिष्ठ हो चुका था। मंदिर के ताला-चाबी की जगह भी उसे ज्ञात हो चुकी थी। एक तरह से मंदिर का मैनेजमेंट ही देखने लगा था वह।

प्रवचन की यह शृंखला तीन दिन बाद संपन्न होने वाली थी। हर शृंखला के बाद चार-पाँच दिन विराम काल होता। तत्पश्चात पुरोहित जी फिर किसी नये विषय पर प्रवचन आरंभ करते। आज रात उसने अपने सभी साथियों को बता दिया था कि विराम काल में ठाकुर जी का विग्रह कैसे अपने कब्ज़े  में लेना है। कौन सा दरवाजा कैसे खुलेगा, किस-किस दरवाज़े का ताला टूट सकता है, किसकी डुप्लीकेट चाबी वह बना चुका है। आज से तीसरी  रात योजना को सिद्ध करने के लिए तय हुई।

तीसरे दिन प्रवचन संपन्न हुआ। इस बार पुरोहित जी का स्वास्थ्य निरंतर बिगड़ता गया था। आज तो उन्हें बहुत अधिक थकान थी, ज्वर भी तीव्र था। उनका एक डॉक्टर शिष्य आज गाड़ी लेकर आया था। उसने ज़ोर दिया कि इस बार दवा से काम नहीं चलेगा। कुछ दिन दवाखाने में एडमिट रहना ही होगा।

पुरोहित जी, अपने ठाकुर जी को छोड़कर नहीं जाना चाहते थे। डॉक्टर शिष्य, स्थिति की नज़ाकत समझ रहा था, सो पुरोहित जी को साथ लिए बिना जाना नहीं चाहता था। अंतत:  जीत  डॉक्टर की हुई।

गाड़ी में बैठने से पहले पुरोहित जी ने उसे बुलाया। धोती से बंधी चाबियाँ खोलीं और उसके हाथ में देते हुए बोले,…”ठाकुर जी की चौकीदारी की ज़िम्मेदारी अब तुम्हारी। भगवान ने खुद तुम्हें अपना रक्षक नियुक्त किया है। आगे मंदिर की रक्षा तुम्हारा धर्म है।”

उसके बाँछें खिल गईं। उसने सुना रखा था कि ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड़कर देता है। सुने हुए को आज फलित होता देख भी रहा था। जीवन में पहली बार उसने मन ही मन सच्चे भाव से भगवान को माथा नवाया।

…रात का तीसरा पहर चढ़ चुका था। वह मंदिर के भीतर प्रवेश कर चुका था। अपनी टोली के आने से पहले सारे दरवाज़े खोलने थे। …अब केवल गर्भगृह का द्वार बाकी था। उसने चाबी निकाली और ताले में लगा ही रहा था कि गाड़ी में बैठते पुरोहित जी का चित्र बरबस सामने घूमने लगा,

“ठाकुर जी की चौकीदारी की ज़िम्मेदारी अब तुम्हारी। भगवान ने खुद तुम्हें अपना रक्षक नियुक्त किया है। आगे मंदिर की रक्षा तुम्हारा धर्म है।”

जड़वत खड़ा रह गया वह। भीतर नाना प्रकार के विचारों का झंझावात उठने लगा। ठाकुर जी के जिस विग्रह पर उसकी दृष्टि थी, उसी को टकटकी लगाए देख रहा था। उसे लगा केवल वही नहीं बल्कि ठाकुर जी भी उसे देख रहे हैं। मानो पूछ रहे हों,….मेरी रक्षा का भार उठा पाओगे न?…

विचारों की असीम शृंखला चल निकली। शृंखला के आदि से इति तक प्रवचन करते पुरोहित जी थे,

“….सम्मोह से स्मृति में भ्रम हो जाता है। स्मृति में भ्रम हो जाने पर बुद्धि का नाश हो जाता है। बुद्धि का नाश होनेपर मनुष्य कार्य-अकार्य में भेद नहीं कर पाता, सही-गलत का भान नहीं रख पाता..।”

उसकी स्मृति पर से भ्रम का कुहासा छँटने लगा था।

“…ध्यान रखना, हर मनुष्य मूलरूप से सच्चा होता है। दुनियावी  लोभ, लालच कुछ समय के लिए उसे उसी तरह ढके होते हैं जैसे जेर से भ्रूण। देर सबेर जेर को हटना पड़ता है, भ्रूण का जन्म होता है ।”

उसके अब तक के व्यक्तित्व पर निरंतर प्रहार होने लगे। भ्रूण जन्म लेने को मचलने लगा। जेर में दरार पड़ने लगी।

तभी दरवाज़ा खुलने की आवाज़ ने उसकी तंद्रा को भंग कर दिया। लाठियाँ लिए उसकी टोली अंदर आ चुकी थी।

“….आदमी की सच्चाई पर उसके वेष का बहुत असर पड़ता है। वह जिस वेष में होता है, उसके भीतर वैसा ही बोध जगने लगता है।”

ठाकुर जी के चौकीदार में बिजली प्रवाहित होने लगी। चौकीदार ने टोली को ललकारा। आश्चर्यचकित टोली पहले तो इसे मज़ाक समझी। सच्चाई जानकर टोली, चौकीदार पर टूट पड़ी।

चौकीदार में आज जाने किस शक्ति का संचार हो गया था।  वह गोरा-बादल-सा लड़ा। उसकी एक लाठी, टोली की सारी लाठियों पर भारी पड़ रही थी। लाठियों की तड़तड़ाहट में खुद को कितनी लाठियाँ लगीं, कितनी हड्डियाँ चटकीं, पता नहीं पर लहुलुहान  टोली के पास भागने के सिवा और कोई विकल्प नहीं बचा।

शत्रु के भाग खड़े होने के बाद उसने खुद को भी ऊपर से नीचे तक रक्त में सना पाया। किसी तरह शरीर को ठेलता हुआ गर्भगृह के द्वार तक ले आया। संतोष के भाव से ठाकुर जी को निहारा। ठाकुर जी की मुद्रा भी जैसे स्वीकृति प्रदान कर रही थी। उसके नेत्रों से खारे पानी की धारा बह निकली। हाथ जोड़कर रुंधे गले से बोला,

“…ठाकुर जी आप साक्षी हैं। मैंने वेष की मर्यादा रख ली।”

कुछ दिनों बाद मंदिर के परिसर में पुरोहित जी की समाधि के समीप उसकी भी समाधि बनाई गई।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बिझी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

बिझी…” ☆ श्री मंगेश मधुकर

कंपनीत महत्वाची मिटिंग असल्यानं टेंशन होतं. गडबडीत आवराआवर करत असताना बायको म्हणाली,    “ पुढचा सोमवार फ्री ठेव. आत्यांच्या मुलाचं लग्नयं. घरातलंच कार्य असल्यानं तुला यावं लागेल. नेहमीचं ‘बिझी’च कारण देऊ नकोस.”

“अजून चार दिवस आहेत..तेव्हाचं तेव्हा बघू ” 

घराबाहेर पडलो.  नंतर दिवसभर मीटिंग्ज, प्रेझेंटेशन, मोबाईलमध्ये बिझी झालो. रात्री उशिरा घरी आलो. भूक नव्हती पण उपाशी झोपू नये म्हणून दोन घास खाल्ले. 

“ दुपारी काय जेवलास ? ”बायकोनं विचारलं. 

“ जेवलो नाही पण सँडविचेस,वेफर्स आणि कॉफी……”

“ त्रास होतो.मग कशाला असलं खातोस? व्यवस्थित जेवायला काय होतं ? ”

“ अगं,आजचा दिवस खूप पॅक होता. क्लायंटबरोबर पाठोपाठ महत्वाच्या मिटिंग्ज् होत्या. वेळच मिळाला नाही.”

“ हे नेहमीचच झालंय. आठवड्यातले चार दिवस टिफिन न खाता परत आणतोस. दरवेळेस तीच कारणं…”

“ चिडू नकोस. सतत सटरफटर खाणं होतं म्हणून मग जेवायचं लक्षात राहत नाही. डार्लिंग,ऐक ना,आज खूप दमलोय.यावर नंतर बोलू.प्लीज..”–  

“ आज लग्नाला यायला हवं होतसं. सगळे आलेले फक्त तू नव्हतास. प्रत्येकजण विचारत होता.”

“ महत्वाचं काम होतं.”

“ ते कधी नसतं?.”

“ तू,आई,बाबा होता ना… नाहीतरी मी तिथं बोर झालो असतो आणि एक लग्न अटेंड केलं नाही म्हणून काही बिघडत नाही.”

“ नातेसंबंध बिघडतात ”

“ स्पष्ट बोल ”

“ गेल्या दहा वर्षात तू सर्वच समारंभ चुकवलेत. नातेवाईकांशी तुझा कनेक्ट राहिलेला नाही.”

“ सो व्हॉट !! महत्वाची कामं होती म्हणून आलो नाही. त्याचा एवढा इश्यू कशाला? ”

“ कामं तर सगळ्यांनाच असतात. कंपनीच्या पलीकडं सुद्धा आयुष्य आहे.ऑफिसबरोबर घरच्यासुद्धा जबाबदाऱ्या असतात. कशाला महत्व द्यायचे हे समजलं पाहिजे.”

“ ऑफकोर्स, तेवढं समजतं. सध्या करियरचा पीक पिरीयड आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे पर्सनल गोष्टी बाजूलाच ठेवाव्या लागतात.”

“ कंपनीत बाकीचे लोकपण आहेत ना ? ”

“ आहेत. कंपनीत माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. सध्यातरी इतर गोष्टींपेक्षा कामाचं महत्व जास्त आहे.”

“ पस्तीशीतच घर, गाडी, बँक बॅलेन्स सर्व मिळवलंस. अजून काय पाहिजे ? थोडा दमानं. जे कमावलयं त्याचा तरी उपभोग घे.” 

“ आराम वगैरे करायला आयुष्य पडलंय. लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाचा एक टप्पा झालाय.  अजून बरंच काही मिळवायचयं. पन्नाशीला कुठं असणार हे ठरलंय.”

“ पन्नाशीचं प्लॅनिंग? बापरे इतक्या लांबचा विचार आताच कशाला? “

“ तुला कळणार नाही. आयुष्य कसं प्लान्ड असावं ”

“ माझ्याशीच लग्न करायचं याचंसुद्धा प्लॅनिंग केलं होतसं का? ”

“ हे बघ उगीच शब्दात पकडू नकोस ”

“ बरं !! गंमत केली.  लगेच चिडू नकोस. एवढंच सांगायचयं की उद्याचा दिवस चांगला करताना ‘आज’ ला  विसरु नकोस.”

“ पुन्हा तेच !! माझ्या प्रायोरीटीज ठरलेल्यात.”

“ तू स्वतःसकट आम्हांलाही खूप गृहीत धरतोस ”

“ म्हणजे ?”

“ प्रत्येकवेळी तुझ्या मनासारखं व्हायला पाहिजे हा हट्ट योग्य नाही. तुला माणसांची किंमत नाही ”

“ असं काही नाही. पैसा असला की माणसाला किंमत येते. आणि सध्या तोच कमावतोय.”

“ बरंच काही गमावतोस सुद्धा. घर, मुली,आईबाबा यांच्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही.”

“ तू आहेस ना ”

“ हो, मला पण आधाराची गरज लागते. मी एकटीच आहे ना. घरात आपण प्रवाशासारखं राहतोय ”

“ पुन्हा तीच रेकॉर्ड नको. अजून काही वर्ष तुला एडजेस्ट करावं लागेल. नो चॉइस !!”

“ आतापर्यंत तेच तर करतेय. आम्हांला नाही निदान स्वतःला तरी वेळ देशील की नाही ? ”

“ काय ते नीट सांग.”

“ आताशा फार चिडचिडा झालायेस. सतत अस्वस्थ, बेचैन, तणावाखाली असतोस. वेळेवर जेवत नाही की झोपत नाहीस. डोळ्याखाली काळी वर्तुळ झालीत. थोड चाललं की धाप लागतीय. तब्येत ठीक नाहीये. कामांच्या नादात दुखणं अंगावर काढू नकोस. मागे ब्लडप्रेशर वाढलं तेव्हाच डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं..  पण तू साफ दुर्लक्ष केलंस.”

“ आय एम फाइन ”

“ नो,यू आर नॉट. तुला त्रास होतोय पण कामाच्या नादात…..ऐक,डॉक्टरांकडे जाऊ या. सगळया तपासण्या करू.”

“ ओके, नक्की जाऊ. फक्त थोडे दिवस जाऊ दे. आत्ता खूपच बिझी आहे.”

“ कामं कधीच संपणार नाहीत. अजून वेळ गेलेली नाही. शरीरानं इंडिकेअटर्स दिलेत. कामाच्या बाबतीत जेवढा जागरूक आहेस तेवढाच तब्येतीबाबत बेफिकीर आहेस म्हणून काळजी वाटते.”

“ डोन्ट वरी, मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात सुट्टी घेतो तेव्हा डॉक्टरांकडे जाऊ ”

“ प्रॉमिस ? ” .. बायको. 

“ हजार टक्के ” 

बायकोला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळच आली नाही. खरं सांगायच तर दोन तीन दिवस तब्येत ठीक नव्हती. परंतु महत्वाच्या  कामामुळे दुर्लक्ष केलं अन त्याच दिवशी मिटिंगमध्येच कोसळलो. डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. नंतर कळलं पॅरेलिसिसचा अटॅक आला. जीव वाचला परंतु उजवी बाजू निकामी झाली. जबरदस्त धक्का बसला. वास्तव स्वीकारायला फार त्रास झाला. उतारवयातल्या आजाराला तरुणपणीच गाठल्यानं खूप हताश, निराश झालो. एकांतात भरपूर रडलो, स्वतःला शिव्या घातल्या पण पश्चातापाव्यतिरिक्त हाती काही लागलं नाही. आयुष्य ३६० डिग्री अंशात बदललं. स्वतःला नको इतकं गृहीत धरलं त्याची शिक्षा मिळाली. आधी हॉस्पिटलमध्ये..  नंतर घरात असे दोन महीने काढल्यावर हल्लीच घराबाहेर पडायला लागलोय. संध्याकाळी काठी टेकवत हळूहळू चालतो तेव्हा लोकांच्या नजरेतील सहानभूती आणि कीव करण्याचा फार त्रास होतो. काही दिवसांपूर्वी खूप खूप बिझी असलेला मी आता वेळ कसा घालवायचा या विवंचनेत असतो. गॅलरीतून रस्त्यावर पाहताना बहुतेकजण माझ्यासारखेच वाटतात… सो कॉल्ड बिझी ….. उद्यासाठी आज जीव तोडून पळणारे….

…. एक महत्वाचं सांगायचं राहिलं .. .. माझ्या आयुष्यातील घडामोडीचा कंपनीच्या कामावर काहीही परिणाम झाला नाही. माणसं बदलून काम चालूच आहे. कुठंही अडलं नाही. मला मात्र उगीच वाटत होतं की……. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ न आवडणार्‍या गोष्टी — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ न आवडणार्‍या गोष्टी  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

“आई गं किती वेळा सांगितलं मी तुला, मला कोथिंबीर आवडत नाही म्हणून? तरीही सगळ्या भाज्यात इतर पदार्थात बचकभर कोथिंबीर घातल्या शिवाय चैन पडत नाही तुला.” प्रतिमा किंचाळलीच.

आई म्हणाली, “बाहेरची भेळ, मिसळ, पावभाजी खाताना बरं चालतं सगळं. आईलाच फक्त रागवायचं का? आणि उद्या लग्न झाल्यावर काय करणार? तिथं खाशीलच ना गुमान ? तिथे स्वत: स्वयंपाक करताना तूच स्वत: घालशील.”

प्रतिमा आणि आईचे हे रोजचे म्हटले तरी वाद चालत. ती म्हणायची, “तेव्हा खावे लागणार म्हणून आता तरी मला मना सारखे खाऊ दे….” तर आई म्हणायची, “नंतर खावे लागेल म्हणून आता पासूनच नको का सवय करायला?”

अशाच कुरबुरीत प्रतिमाचे लग्न झाले. तिला छान सासर मिळाले होते. सासू सासरे, दीर, नणंद असलेले सुशिक्षित , धनाढ्य सासर. 

प्रतिमाची सासू तशी मायाळू होती. प्रतिमाला कोथिंबीर आवडत नाही म्हणून ती तिच्यासाठी सगळे वेगळे काढून मग बाकीच्यांच्यासाठी पदार्थात कोथिंबीर घालायची. काही दिवसांनी प्रतिमालाच स्वत:ची लाज वाटू लागली आणि हळूहळू ती कोथिंबीर खाऊ लागली; नव्हे तिला ती आवडू लागली. अजूनही बर्‍याच अशा गोष्टी होत्या ज्या तिला आवडत नव्हत्या त्या तिच्या आवडीच्या बनल्या. याला कारणही तिची सासूच होती. 

सासूने सांगितले लग्न ठरवायच्या वेळी जेव्हा तिच्या घरी पहिल्यांदा प्रमोद जेवायला आला होता तेव्हा त्यांच्याघरी भरल्या वांग्याचा बेत होता. प्रमोदला वांगेच आवडत नव्हते म्हणून त्याने सगळ्यात आधी ती भाजी संपवली की जेणेकरून आवडीचे पदार्थ नंतर नीट खाल्ले जातील. पण झाले उलटेच प्रमोदच्या ताटातील भाजी संपलेली पाहून त्याला पुन्हा ती वाढली. याने परत ती खाऊन टाकल्यावर जावईबापूंना वांगे फार आवडते दिसते असे वाटून पुन्हा पुन्हा आग्रह करून वांग्याची भाजी खाऊ घातली. एवढेच नाही तर त्या नंतर जेव्हा जेब्हा प्रमोद तिकडे जेवायला आला तेव्हा तेव्हा लक्षात ठेऊन वांग्याची भाजी फार आवडते वाटून तीच भाजी खावी लागली. 

आता मात्र प्रतिमाला हसू आले आणि आपल्यासारखीच गत प्रमोदची झाली हे ऐकून गंमत वाटली. पण प्रमोदने हे कुणाला कळू न देता चेहर्‍यावर तसे दाखवू न देता खाल्ले याबद्दल कौतूक अभिमान पण वाटला. त्याने आपल्यासाठी स्वत:ला बदलले मग आपणही बदलायला पाहिजे याची जाणिव झाली. आणि बर्‍याच गोष्टिंशी तडजोडही केली.

पण म्हणतात ना ‘काहीही झाले तरी शेवटी सासू ती सासूच’ असा ग्रह प्रतिमाचा झालाच. कारण सणवार असले, कोणाकडे जायचे असले की प्रतिमाची सासू म्हणायची “ड्रेस जिन्स काय घालतेस? साडी नेसायची. नुसते बारीक मंगळसूत्र काय? चांगले ठसठशीत आहे ना… ते घाल… कपाळाला टिकली नाही? ती आधी लाव… हातात बांगड्या नकोत का? घाल गंऽऽ.” अशा एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून सासूला काय आवडत नाही हे प्रतिमाला कळायला लागले. पण सासूचे मन आणि मान दोन्ही राखण्यासाठी ती तसे तसे नाईलाजाने का होईना पण वागत होती.

बघता बघता प्रतिमाच्या लग्नालाही २५ वर्ष झाली. तिची २२ वर्षाची मुलगी प्रिती आजीची फार लाडकी होती. लग्नाच्या २५व्या वाढदिवसा निमित्ताने छोटेखानी फंक्शन ठेवले होते. प्रितीने जिन्स शॉर्ट टॉप घातले होते. मग त्याला सूट होत नाही म्हणून कपाळाला टिकली नाही, गळ्यात, कानात काही नाही, हातात बांगड्या देखील नाहीत हे पाहून प्रतिमाच प्रितीला रागवली आणि ‘निदान आज तरी हे घाल की’ म्हणू लागली. तशी आजी म्हणाली, “अगं तिला नाही ना आवडत तर नको करू बळजबरी. राहू दे अशीच. काही वाईट नाही दिसत. आमची प्रिती आहेच छान.”

“अहो पण आई तुम्हाला हे चालणार आहे का?….” प्रतिमाने विचारले आणि सासूबाई म्हटल्या, “अगं आताच त्यांना मनमुराद जसे हवे तसे जगू द्यायला हवं नाही का? नाहीतरी हे सगळं घालायचा कंटाळाच येतो. कधीतरी रहावं असचं. मेघाविन मोकळे सौंदर्य पहायला सुद्धा कोणीतरी टपलेले असतवच की….”

शेवटी प्रत्येक गोष्टीसाठी काळ हेच औषध असते. कालौघात अशाच न अ‍ावडणार्‍या गोष्टी आवडू लागतात हेच खरे!!

प्रतिमाला नव्या सासूचा शोध लागला आणि अचानक सासूबाईपण जास्त म्हणजे आईपेक्षाही जास्त आवडू लागल्या होत्या.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सखी, प्रिय सखी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सखी, प्रिय सखी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पाहिले – तिने आमच्या घरच्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. आता ती फक्त कवितेच्या विश्वात असते. आता ती कविता करते. थोड्याफार तिच्या कविता छापून पण येतात.  आता इथून पुढे)

प्रविण – आनंद आहे. माझ्या लक्षात येतं, मी म्हटलेल्या कविता तिच्या तोंडपाठ व्हायच्या तेव्हाच मी ओळखलं हिला कवितेत अंग आहे. पण कौटुंबिक व्यापामुळे तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

आशु – अत्रे साहेब, मी आपणाला फोन अशा करता केला की, येत्या १५ जुलैला आईची एकशष्ठी वेंगुर्ल्यात साजरी करायची आहे. तिच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता, तुमचे काव्यवाचन वेंगुल्यात व्हावे अशी तिची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही येऊ शकाल का?

प्रविण – अवश्य येईन. मी पण आता निवृत्त झालोय. खूप दिवसांनी मी माझ्या कविता म्हणणार .आहे.

अशा रितीने प्रविण अत्रेंचे काव्यवाचन १५ जुलैला ठरले. आनंदयात्री ग्रुपने प्रविण अत्रेंचे काव्यवाचन आणि सहभोजन आयोजित केले. सर्व वर्तमानपत्रात ज्योती पारकर यांचा एकशष्ठी कार्यक्रम आणि प्रविण अत्रेंचे काव्यवाचन अशा बातम्या आल्या.

दि. १५ जुलै,

स्थळ – साई दरबार हॉल, वेंगुर्ले

आनंदयात्री ग्रुप यांनी ज्योतीताई पारकर यांच्या एकशष्ठी निमित्त पुण्याचे कवी प्रविण अत्रे यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला. वर्तमानपत्रात सतत या कार्यक्रमाची बातमी येत होती. त्यामुळे आणि आनंदयात्री ग्रुपच्या मेहनतीमुळे कार्यक्रमास तोबातोबा गर्दी होती. सायंकाळी ४ च्या सुमारास कार्यक्रम सुरु होण्याआधी हॉलमधील सर्व खुर्च्या भरलेल्या होत्या. शिवाय बाहेर व्हरांड्यात पॅसेजमध्ये लोक दाटीवाटीने उभे होते. थोडेफार उशीरा येणार्‍यांना आत प्रवेश मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु आनंदयात्री ग्रुपच्या स्वयंसेवकांनी श्रोत्यांना कमीत कमी त्रास होईल या दृष्टीने खूप प्रयत्न केले.

व्यासपीठावर ज्योतीताई पारकर यांच्याबाजूला आनंदयात्री ग्रुपच्या अध्यक्षा वृंदाताई कांबळी बसल्या होत्या. एवढ्यात आशु कवी प्रविण अत्रेंना घेऊन आला. तशा जोरदार टाळ्या पडल्या. प्रविण अत्रेंना पाहुन ज्योतीताई उभ्या राहिल्या. जवळ जवळ चार वर्षांनी प्रविण अत्रे समोर उभे होते. ज्योतीताई पुढे आल्या. आणि त्यांनी आनंदयात्री ग्रुपमधील कांबळी मॅडम आणि इतर सर्वांची ओळख करुन दिली. आनंदयात्री ग्रुपमधील सुषमा प्रभुखानोलकर यांनी मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे स्वागत केले. स्वागत करताना त्या म्हणाल्या, ‘‘ज्योतीताई पारकर यांना आम्ही वेंगुर्लेकर क्लॉथ मर्चंट म्हणून ओळखत होतो. गेल्या २५-३० वर्षांत पारकर एंटरप्रायझेस तालुक्यातील नं.१ चे कापड दुकान झाले आणि ४ वर्षापासून ज्योतीताईंनी घुमजाव केले. सर्व व्यापार मुलाच्या आणि सूनेच्या हातात दिला आणि स्वतःला कवितेमध्ये बुडवून घेतले. आता आम्ही त्यांच्या घरी गेलो तर आजुबाजूला कवी ग्रेस, वंसत बापट, आरती प्रभू, पाडगांवकर पासून ते गुरु ठाकूर, संदिप खरे ठाण मांडून बसलेले दिसतात. आज त्या साठ वर्षे पुर्ण करत आहेत. परंतु कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांनी त्यांना ज्यांनी कवितेची ओढ लावली त्या प्रविण अत्रे यांचे काव्यवाचन आयोजित केले. आणि अत्रे साहेब आमच्या वेंगुर्लेकरांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या लांब आले. यानंतर अत्रे साहेबांना मी त्यांच्या कविता वाचायला सुरुवात करावी अशी विनंती करते.
प्रविण अत्रे उठले. त्यांनी चार वर्षापूर्वी एका टूरमध्ये आपली आणि ज्योतीताई यांची भेट झाली हे सांगून त्या टूरच्या प्रवासात आपण म्हटलेल्या कविता ऐकून त्यांच्यातील कवयत्री जागी झाली. एवढेच नव्हे तर गेली ४ वर्षे त्या कवितेत पूर्ण बुडून गेल्या हे ऐकून मला खूप आनंद झाला. प्रविण अत्रेनी काव्यवाचन सुरु केले.

नदीला घरात घ्यावे थेट, एवढी नाही हिंमत माझ्यात…

दारातून वाहत रहा, दूरातून पाहत रहा, इतकेच मी सांगू शकतो.

माझ्याच आदल्या कैक जन्मांची ही पापं,

मी धोपटतोय तुझ्या काठावर…

कर क्षालन धुवून पवित्र या जन्मात

उद्धार अंधार…. सोडीन मी दिवे तुझ्या पात्रात…

अत्रे एका पाठोपाठ एक कविता म्हणत होते आणि श्रोते तल्लीन झाले होते. दिड तासानंतर अत्रे थांबले.

‘‘वेंगुर्लेकर मंडळी, मी गेली दिड तास तुमच्या समोर कविता म्हणतोय, आता मी तुम्हा सर्वांच्यावतीने ज्योतीताई पारकर हिला विनंती करतो की, यापुढील कविता तिने सादर कराव्यात.’’ टाळ्यांचा एकदम कडकडाट झाला. ज्योती कावरीबावरी झाली. छे ! छे ! मला सवय नाही. मी कधी कविता म्हटलेली नाही. मला जमायचे नाही, इतक्या लोकांसमोर मला जमायचं नाही. परंतु श्रोत्यांनी ज्योतीताई ज्योतीताई अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्या. वृंदाताई, प्रितम ओगले, आणि सीमा मराठेंनी तिच्या हाताला धरुन माईकसमोर उभे केले.

ज्योतीने डोळे मिटून घेतले आणि ती हात जोडून सर्वांना म्हणाली – ‘‘मी आयुष्यात प्रथमच एवढ्या मोठ्या श्रोत्यांसमोर उभी आहे मला सांभाळून घ्या. शाळेत असताना मराठे बाईंनी मला कवितेची आवड लावली. मी कविता तन्मयतेने म्हणते हे पाहून त्या म्हणायच्या – ज्योती कवितेला सोडू नकोस, कविता तुझी सखी होईल.’’ आज मला मराठे बाईंची आठवण येते. मराठे बाई तुम्ही जेथे असाल तेथे माझा नमस्कार. दुसरे हे प्रविण अत्रे. त्यांच्या कविता ऐकून माझ्या लक्षात आले आपला जन्म फक्त व्यवसाय करण्यासाठी नाही. कविता ही माझी पहिली आवड आहे. त्यांच्या भेटीनंतर मी कवितेत रमले. आता आयुष्याची सेकंड इनिंग माझ्या सखीसोबत.’’ असे म्हणून ज्योतीने आपल्या कविता म्हणायला सुरुवात केली.

तू लिंपल्यास भिंती अज्ञानाच्या अन्

रेखलास त्यावर शब्दांचा प्रवास…

विहिरींच्या कडांवर उभे होते जडावलेले जीव

ओटीत घेतलास त्यांना,

आणि प्रकाश दाखवलास या जगातला…

माझ्या मैत्रिणी, त्यांना सांगायलाच हवं

केवळ कुंकूवाची चिरी रेखून कपाळावर

नाही होता येत, चौकटी उधळत व्यवस्था बदलणारी बाई

अर्थ जाणून घ्यावा लागतो प्रतिकांचा

आणि एक एक चिरा रचत

बांधाव्या लागतात भिंती नव्या घराच्या…

ज्योती आत्मविश्वासाने एक एक कविता म्हणत होती आणि श्रोते तल्लीन झाले होते. टाळ्या वाजत होत्या. प्रविण अत्रे सुध्दा व्वा ! व्वा !! अशा शाबासकी देत होते.

व्यासपीठावरील कांबळी बाई, अजित राऊळ, प्रसाद जोशी, शैलेश जामदार सारेजण मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी –

घरादारासाठी लावतेस दिवा,

अंधाराचा रावा फडफडे

लावताना दिवा सुटलेली हवा,

विझलेली पेटताना तेलामध्ये वात, तशी दिनरात

गुदमरे बाई उंबर्‍यात,

सैपांक रांधला, भुकेला दादला

भाजताना भाकर करपली

तुझ्या पदरात, तुझ्या उदरात वंशाचा दगड रोवलेला

सर्व श्रोते भारावले होते. व्यासपीठावरील सर्वांच्या कौतुकाच्या नजरा ज्योतीवर होत्या. टाळ्यांचा कडकडात सुरुच होता. ज्योतीने सर्व श्रोत्यांना हात जोडून नमस्कार केला. व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार केला.

कार्यक्रम संपला आणि प्रेक्षकातील लोक ज्योतीचे अभिनंदन करायला व्यासपीठावर यायला लागले. ओळखीचे लोक, अनोळखी लोक तिच्या एकशष्ठी निमित्त आणि काव्य वाचनाचे कौतुक करत होते. एवढ्या कौतुकाची ज्योतीला सवय नव्हती. ती सद्गतीत झाली होती. प्रत्येकाचे पुन्हा पुन्हा आभार मानत होती.

व्यासपीठावरील गर्दी थोडी कमी झाली. एवढ्यात दोन स्त्रिया प्रेक्षकांतून पायर्‍या चढून तिच्या दिशेने येताना दिसल्या. त्या वर आल्या आणि ज्योतीने निरखून पाहिले आणि पटकन ओळखले या तर शाळा मैत्रिणी – सुलभ आणि यमुना. ज्योती धावत त्यांच्या जवळ गेली. शाळा सुटल्यानंतर इतक्या वर्षात दोघी भेटल्याच नव्हत्या. आज कशा काय आल्या ? तिने कडकडून मिठी मारली. तिघांच्याही तोंडातून एकाचवेळी कविता बाहेर आली –

‘‘पाय सोडूनी जळात बसला असला औदुंबर’’

आणि यमुना म्हणाली – ज्योती किती वर्षांनी ही कविता आपण तिघांनी एकत्र म्हटली नाही? सुलभा म्हणाली – ज्योती तुझ्या कविता किती छान गं. अगदी शाळेची आठवण आली. त्यावेळी तू पुस्तकातल्या कविता जोरजोराने म्हणायचीस आणि आता स्वतःच्या कविता म्हणतेस. ज्योती तू केवढी मोठी कवयत्री झालीस गं. एवढं म्हणून त्या दोघी पटकन मागे वळल्या आणि पायर्‍या उतरल्या आणि एका वयस्क स्त्रीच्या हाताला धरुन पायर्‍या चढू लागल्या. ज्योती पाहत होती. कुणाला आणत आहेत या दोघी ? असा विचार येईपर्यंत सुलभा आणि यमुनाने त्या स्त्रीला हळूहळू पायर्‍या चढत वर आणले. ज्योती निरखून पाहत होती. क्षणार्धात तिच्या मेंदूला जाणीव झाली. आणि ती किंचाळली – ‘‘कोण मराठे बाई तुम्ही… ?’’ ज्योती धावली आणि तिने मराठे बाईंचे पाय धरले. डोळ्यात धारा लागल्या होत्या… आनंदाच्या. मराठे बाईंनापण आनंदाश्रू आवरत नव्हते. बाईंनी तिचे खांदे धरुन तिला वर उचलले. ‘‘बाई बाई तुम्ही कशा आलात? मला वाटत होतं माझं पहिलं वहिलं काव्यवाचन ऐकायला तुम्ही हव्या होतात, पण तुम्ही कशा आलात? तुम्हाला कोणी आणलं? सुलभा आणि यमुना एक सुरात बोलल्या – ‘‘आम्ही आणल’’ अगं आम्हा दोघींचीही घर माजगांवात आणि बाई मळेवाड मध्ये राहतात हे माहीत होतं. तुझ्या एकशष्ठीचे आणि काव्यवाचनाची बातमी पेपरमध्ये वाचली तेव्हा बाईंकडे जाऊन तुम्ही येणार का असे विचारले. तेव्हा बाईंनी एका सेकंदात मी येणारच म्हणून हट्ट धरुन बसल्या. म्हणून आज रिक्षा करुन त्यांना घेऊन आलो.

मराठे बाईंनी ज्योतीच्या डोळ्यातले आनंदाश्रू पुसले. ‘‘झालीस गं मोठी ज्योती तू… केवढ्या धिटाईने स्वतःच्या कविता म्हटलेस, मला भारी कौतुक वाटलं. शाळेतील १२-१३ वर्षाची चुणचुणीत ज्योती डोळ्यासमोर उभी राहिली. मी तुला वर्गात सांगत असे. ज्योती, या सखीचा हात घट्ट धर.

‘‘सखी नव्हे, प्रिय प्रिय सखी..’’

मागे उभे राहून हे सर्व कौतुक पाहणारे प्रविण अत्रे उद्गारले आणि सर्व एका सुरात म्हणाले –

‘‘नुसती सखी नव्हे, प्रिय प्रिय सखी….’’

 – समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सखी, प्रिय सखी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सखी, प्रिय सखी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात  आपण पाहिले – आपली दुकाने विविध मिलची कापडे, रेडिमेड कपडे, नको नको. तिच्या लक्षात आले, हे कुसुमाग्रज, वसंत बापट, कवी ग्रेस हे सर्व आपल्याला आवडतयं, जवळचं वाटतंय… आता इथून पुढे )

गाडी मुंबईच्या दिशेने धावत होती. ज्योती कवितेत रमली होती. तिला शाळेत म्हटलेल्या कविता आठवू लागल्या. एका सुरात सुलभा, यमुनासह म्हटलेल्या.

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश…’

मोठ्या वर्गात गेल्यानंतर बालकवींची कविता –

‘ऐल तटावर, पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून…

चार घरांचे गाव चिमुकले, पैल टेकडीकडे…

शेतमळ्याची दाट लागली, हिरवी गर्दी पुढे…’

बालकवींची ही कविता कित्येक वर्षानंतर तोंडात आली. कसे झाले हे ? राजापूरच्या गंगेचे झरे अचानक उसळतात म्हणे, तशा कविता उसळल्या का आपल्या मनातून ? ज्योती मुंबईत पोहोचली. रात्रीच्या जगदंबा ट्रॅव्हल्सने वेंगुर्ल्याला यायला निघाली. इकडे आई येणार म्हणून आशु आणि प्राजक्ता दहा दिवसांचा हिशोब घेऊन तयार होती. आई आली की दहा दिवसांतील रोजची विक्री, आलेला माल, संपलेला माल, बँकेचे पासबुक, नोकरवर्गाची हजेरी गैरहजेरी आई सर्व पटापटा विचारणार यात काही हयगय झालेली तिला चालत नाही. प्राजक्ता आलेला माल पुन्हा पुन्हा तपासत होती. आईच्या नजरेतून जरा काही सुटायचे नाही. आलेला माल कोणत्या मिलचा हे ती बरोबर ओळखेल. पंचवीस वर्षे या व्यवसायात काढली तिने. आईने सही करुन दिलेले चेकबुक आशु तपासत होता. यातील किती चेक वापरले किती नाही हे पुन्हा पुन्हा बघत होता.

गाडी वेंगुर्ल्यात आली. आशु स्कुटर घेऊन तयार होता. गाडी जवळ जाऊन आईचे सामान उतरुन घेतले. सर्व सामान खांद्याला लावून स्कुटरवर ठेवले. आता स्कुटर सुटली की आई धंद्याच्या एक एक गोष्टी विचारणार हे त्याला माहित होते. पण आश्चर्य घर येई पर्यंत आईने त्याला पारकर एंटरप्रायझेसची एकही गोष्टी किंवा हिशेब विचारला नाही. आशु मनातल्या मनात म्हणाला आता घरी पोहोचलो की आई विचारेल. घरी गेल्यावर त्याने सर्व सामान तिच्या खोलीत ठेवले. त्याने पाहिले जाताना आईच्या दोन बॅगा होत्या. आणखी भरलेली बॅग नवीन दिसते. काय आणले असेल एवढे ? त्याला वाटले घरात आणि दुकानच्या सर्व स्टाफसाठी खाऊ आणला असेल. आता प्रâेश होईल, चहा घेईल आणि आणलेला खाऊ दाखवेल. प्राजक्ताने चहा आणून दिला. ज्योतीने चहा घेतला आणि नवीन बॅग उघडून त्यातील कवितेची पुस्तके कौतुकाने आशु आणि प्राजक्ताला दाखवू लागली. टुरमध्ये प्रविण अत्रे नावाचे कवी कसे भेटले, त्यांच्या कविता ऐकल्या आणि त्यांच्यासोबत जाऊन पुण्यात एवढी कवितेची पुस्तके खरेदी केली.

आशुला आपली आई कोणी वेगळीच वाटली. एवढी वर्षे पारकर एंटरप्रायझेस हे तिचे आयुष्य होते. त्याच्यापासून एक सेकंद ती लांब राहत नव्हती. आणि आता येऊन दोन तास झाले तरी एकदाही पारकर एंटरप्रायझेसचे नाव नाही. आल्यापासून तिची कवितेची पुस्तके आणि कविता यांचेच कौतुक. रात्रौ प्राजक्ताने जेवण वाढले तेव्हा आशुने दहा दिवसातील पारकर एंटरप्रायझेस मधील एक एक गोष्टी आईला सांगायला सुरुवात केली. सुरवातीला फक्त हु हु करणारी ज्योती आशुला म्हणाला, ‘‘आशु, पुरे कर तो हिशोब. आता यापुढे सर्व व्यवसाय तुम्ही दोघांनी बघायचा आहे. मी आता त्यातून अंग काढून घेणार. खरं म्हणजे मी याआधीच त्यातून बाहेर पडायला हवे होते. पण माझ्या मनाचा आनंद कोठे आहे हे लक्षात येत नव्हतं. या टुर दरम्यान लक्षात आले की माझी प्रिय सखी कोठे आहे? शाळेत असताना मराठे बाई सांगायच्या – ‘‘ज्योती, तू अत्यंत तन्मीयतने कविता म्हणतेस, तुझी आवड कवितेत आहे. कविता तुझी सखी आहे तिला जप.’’ पण आयुष्यात पायावर स्थिर होण्यासाठी धडपडले आणि सखीला विसरले. पण आशु आणि प्राजक्ता माझ्या आयुष्याचा पुढचा काळ ह्या सखी समवेत घालवणार. तुम्ही दोघे पारकर एंटरप्रायझेस सांभाळा. कधी कळी अडचण आली तर मी आहेच.’’ आशु आणि प्राजक्ताने मान हलवली.

दुसर्‍या दिवशी ज्योतीने बॅगेतील पुस्तके बाहेर काढली. कवी ग्रेस, शांता शेळके, इंदिरा संत, पाडगांवकर ते नव्या पिढीतले सौमित्र, निलश पाटील, महेश केळुसकर, संदिप खरे तिच्या अवतीभवती जमले. इंदिरा संतांचे पुस्तक तिने उघडले.

किती वाटा, चुकल्यामुळे चुकलेल्या…

चुकल्यामुळे न भेटलेल्या… राहूनच गेलेल्या…

किती योगायोग… हुकलेले आणि न आलेले…

येऊनही न उमजलेले… धुक्यात किती राहून गेलेले…

ठरवलेले न ठरवलेले….

मग कवी ग्रेस –

‘भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी जातो, तु मला शिकविलेले देते

भय इथले संपत नाही…’

मग सुधीर मोघे यांचे पक्ष्यांचे ठसे मधील –

‘माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले…

माझे प्राण तुझे प्राण, उरलेल्या वेगळाले…’

पुन्हा सुधीर मोघे यांची दुसरी कविता –

‘काही वाटा आयुष्यात उगीचका येतात ?

चार घटका सोबत करुन कुठे निघून जातात ?

एक वाट येते मिरवीत चिमणी पाऊल ठसे

शंख शिंपल्यानी भरुन वाहतात

काही वाटा आयुष्यात उगीच का येतात ?’

ज्योतीला वाटले, शब्दांशी खेळण्यात किती गंमत आहे? प्रत्येक वेळी प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळाच लागतो. ज्योतीने कित्येक कविता तोंडपाठ केल्या. दिवाळी अंकात येणार्‍या नवनवीन कविता ती वाचू लागली. नवकविता पण समजून घेता यायला हवे. वेंगुर्ल्यातील ‘‘आनंदयात्री’’ म्हणून एक साहित्य ग्रुप होता तिथे आठवड्यातून एकदा कथा, कविता याबाबत चर्चा होत. खर्डेकर कॉलेजमधील प्रोफेसर्स, आजुबाजूचे शिक्षक, नवोदित लेखक, कवी या ग्रुपमध्ये असत. ज्योती या ग्रुपमध्ये जॉईन झाली. तिथे ती कवितेबद्दल चर्चा करु लागली. वेंगुर्ले कुडाळ भागात अनेक काव्या कार्यक्रम होत. ती कार्यक्रमात हजर असायची. ही मंडळी कविता कशा वाचतात, कुठल्या शब्दावर जोर देतात यावर तिचे बारीक लक्ष होते. सहा महिन्यानंतर ज्योतीला आत्मविश्वास वाटू लागला की, मी आता कविता करु शकेन. तिने पेपर समोर ओढला –

जेव्हा जेव्हा तुम्हाला हताश वाटेल,

किंवा उदास वाटेल

तेव्हा,

तुम्ही तुमच्यातल्याच दुसर्‍याला आवर्जुन भेटा

शेवटी तो तुमच्यातलाच दुसरा आहे, तुम्ही नाही…

१५ जुलै हा ज्योतीचा वाढदिवस. आशुचे लक्षात आले. या १५ जुलैला आई साठ वर्षे पूरी करणार. आशु प्राजक्ताने ठरविले. आईची एकशष्ठी साजरी करायची. आशुने आईला विचारले. काय काय करायचे तुझ्या एकशष्ठीला? ज्योती म्हणाली – माझ्या एकशष्ठीला कोणतेही धार्मिक विधी नकोत. फक्त काव्य वाचन ठेवायचं, ते पण

एकाचचं. आशु म्हणाला, कुणाचं काव्य वाचन ठेऊया? ज्योती म्हणाली, प्रविण अत्रेचं. ज्यांच्या प्रेरणेने मी कविता करु लागले, म्हणू लागले. त्यांना वेंगुर्ल्यात बोलवुया.

त्यांच्या कविता मी कित्येक वर्षात ऐकल्या नाहीत.

माऊली ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमधून आशुने प्रविण अत्रेंचा फोन मिळविला. दुसर्‍याच दिवशी आशुने फोन लावला.

आशु – हॅलो ! प्रविण अत्रे का ?

प्रविण – हो, हां, बोलतोय, कोण आपण ?

आशु – मी आशुतोष पारकर, वेंगुर्ल्याहून बोलतोय. माझी आई ज्योती पारकर, चार वर्षापूर्वी माऊली टूर्सच्या सहलीत गेली होती. त्यावेळी तुम्हीपण त्या सहलीत होता. तुमच्या कविता तीला फार आवडायच्या. तुम्ही तिला पुण्यात कवितेंची पुस्तके घेऊन दिलात.

प्रविण – हो, हो, आठवलं. मग ती कविता वाचते का?

आशु – अहो त्यापासून तिचे आयुष्य बददले. तिने आमच्या घरच्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. आता ती फक्त कवितेच्या विश्वात असते. आता ती कविता करते. थोड्याफार तिच्या कविता छापून पण येतात.

– क्रमश: भाग ३ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सखी, प्रिय सखी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सखी, प्रिय सखी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पाहिले – त्या कवितेनंतर इतर प्रवाशांनीही काही काही कार्यक्रम केले. पण ज्योतीचे त्याकडे लक्ष नव्हते. ती कविता पुन्हा पुन्हा आठवत राहिली. ‘‘बाकी उरण महत्त्वाचं, तेवढीच श्री शिल्लक’’ आहाहा काय विचार आहे सुंदर विचार आहे! आता इथून पुढे )

सर्वांचे कार्यक्रम संपले, तसे गाडीतील इतर प्रवासी डुलक्या काढू लागले. फक्त चौथ्या सीटवरील अत्रे सोडून. तो पुन्हा पुस्तकात मग्न झाला होता. तिने अत्रेंकडे पाहिले. तिच्या सीटवरुन त्याची एक बाजू दिसत होती. गोरा रंग, किंचित पांढुरके झालेले केस, काळा चष्मा, निळी जीन्स आणि पांढरा टीशर्ट. मध्यम उंचीचा असावा. मघाच्या कवितेतील ओळी आणि त्याचे अर्थ काढे काढेपर्यंत गाडी सायंकाळच्या चहा ब्रेकसाठी थांबली. एका रेस्टॉरंटच्या हिरवळीवर छोटी छोटी टेबले आणि सभोवती खुर्च्या. गाडीतील मंडळी आपआपल्या कुटुंबासह टेबलाभोवती बसली. ज्य्ाोतीची कुणाशी फारशी ओळख नव्हती. त्यामुळे ती एकटीच एका टेबलाच्या शेजारी बसली. एवढ्यात अत्रे गाडीतून सर्वात शेवटी उतरले. इकडे तिकडे रिकामी खुर्ची बघता बघता त्यांना ज्योतीसमोरची खुर्ची दिसली. त्यांनी ती खुर्ची मागे ओढली आणि तिच्याकडे पाहत म्हणाले,

‘‘नमस्ते, मी प्रविण अत्रे. मी इथे बसू शकतो का? ’’

‘‘हो, हो. बसा ना. मी ज्योती पारकर. मघा तुम्ही कविता म्हटली तेव्हा तुमचे आडनाव कळले अत्रे. आता तुमचे नाव कळले प्रविण अत्रे.’’

‘‘तुम्ही ऐकली काय कविता? आश्चर्य आहे. सध्या कुणाला कथा, कविता वाचायला ऐकायला आवडत नाही. प्रत्येकजण व्हॉटस्अप, फेसबुकवर बिझी असतो. त्याच्याकडे छोटंमोठं येत असतं ते वाचायचं आणि फॉरवर्ड करायचं.’’

‘‘नाही नाही, मी तुमची कविता लक्षपूर्वक ऐकली. आणि मला जवळ जवळ पाठ पण झाली.’’

‘‘आश्चर्य आहे !’’

‘‘म्हणून दाखवू का?’’ आणि ज्योती कविता म्हणू लागली.

पहिली ठिणगी पडते जेव्हा, विचार व्हावा पाणी

नको नको आलं माझ्या लक्षात. काय खायचं?

कर्नाटकात डोसे इडली छान मिळतात.

डोसा चालेल.

ओके.

अत्रेने दोन डोश्यांची आणि कॉफीची ऑर्डर दिली.

तुम्हाला कविता आवडतात की, तुम्ही कविता करता?

छे हो, गेल्या कित्येक वर्षात मी कवितेची एक ओळ सुध्दा वाचलेली नाही. वेळच नाही मिळाला. आयुष्यभर धावत होते. आता थोडी विसावली.

‘‘सतत धावू नये. अधुन मधून सावलीसाठी बसावे. कोकीळेचे कुहूकुहू ऐकावे, झर्‍याचे पाणी प्यावे.’’

ज्योतीच्या मनात आले, अत्रे किती छान बोलतात. तेवढ्यात गाडी सुरु होण्याचा इशारा आला. दोघांनी झटपट खाणे संपवले आणि गाडीत आपआपल्या जागेवर जाऊन बसली. उटीला पोहोचे पर्यंत काळोख पडला होता. हवा अतिशय थंड होती. ट्रॅव्हल्स कंपनीने एका तलावाशेजारील लॉज बुक केले होते. सर्व मंडळी झटपट प्रâेश झाली. हॉटेलवाल्याने लॉनवर शेकोटी पेटवली होती. आणि त्या भोवती खुर्च्या मांडून जेवण ठेवले होते. मस्त गरम गरम जेवण घेताना पूर्ण ग्रुप उत्साहीत झाला. ग्रुपमधील मुंबईचे वझे प्रविण अत्रेंना पाहून म्हणाले,

‘‘अत्रे, अरे काय गारवा आहे इथे, मस्त गारव्याची एखादी कविता असेल तर म्हणा.’’

प्रविण अत्रे म्हणू लागला –

तीच प्रित, तीच रात, तोच राग मारवा

तोच श्चास, तीच आस, हवा हवासा गारवा…

कवितेतील गारवा हा शब्द आल्याबरोबर ग्रुपमधील मंडळीनी एकच गल्ला केला. टाळ्याचा कडकडाट केला. ज्योतीला पण आश्चर्य वाटले. प्रविण अत्रेनी एवढ्या झटपट कविता कशी बनविली. आता वझे पुरते पेटले. अत्रे ! गारवा आला आता पुढे काय?

अत्रे पुढे म्हणू लागले –

तेच भाल, गौर गाल, पुनवेचा चांदवा

तेच अधर, अधीर तेच, तोच आहे गोडवा…

हवा हवासा गारवा….

अत्रे कविता म्हणत होते, वातावरण धुंदफूंद झाले. ज्योतीला कविता ऐकत रहायची इच्छा होती. पण हवेतील थंडी खूप वाढली. तशी मंडळी आपआपल्या रुममध्ये गेली. ज्योती झोपण्याचा प्रयत्न करत होती. परंतु मघा अत्रेंनी म्हटलेली कविता तीच्या समोर हात जोडून उभी राहिली.

तोच श्वास, तीच आस, हवा हवासा गारवा….

ज्योतीला वाटले आयुष्यातील पंचावन्न छप्पन वर्षात हृदय असे हळूवार असे झालेच नाही. आसक्ती, प्रेम वाटे पर्यंत लग्न झाले. पत्नीला मन असतं, प्रेम भावना असते हे कळेपर्यंत आई झाले. आणि पोटासाठी, मुलासाठी व्यवसायात उतरले आणि आणखी मोठे होण्याच्या नादात मनातील प्रेम भावना करपून गेली काही कळलेच नाही. ज्योतीला झोप लागली. पण झोपेतही गारवा आणि मारवा तीचा पिच्छा सोडत नव्हते. सहलीत दुसर्‍या दिवशी ज्योतीची अत्रेंची भेट झाली. तेव्हा ज्योती अत्रेंना म्हणाली – ‘‘तुम्हाला कविता कशा सुचतात?’’ अत्रे म्हणाले – तुम्हालाही सुचतील. तुम्ही मोठ्या कवींचे कविता संग्रह वाचत रहा. एकदा नव्हे, अनेक वेळा वाचा. त्यावेळी मन स्थिर ठेवा. काही कविता पाठ करा. गुणगुणत रहा. हळूहळू शब्द आपल्या ओठात येतात. प्रयत्न करा.

‘‘मग असे कविता संग्रह कोठे मिळतील ? आणि कुणाचे कविता संग्रह वाचायचे?’’

‘‘आपली सहल परत गेली म्हणजे पुण्यात तुम्हाला पुस्तकांच्या दुकानात नेतो. तेथे हवे तेवढे कवी तुमच्या भेटीसाठी येतील. ती पुस्तके घरी न्या. मनापासून वाचा. आणि तुम्हाला खरचं मनापासून कविता आवडत असतील तर तुम्हाला निश्चित सुचतील.’’

‘‘मी शाळेत असताना छान कविता म्हणायचे. सर्व कविता पाठ होत्या. नंतर सर्व काही विसरले.’’

‘‘हरकत नाही, त्या शाळेतील कविता आठवा. त्या मनातल्या मनात म्हणायला लागा.’’

ज्योती गाडीत आपल्या सीटवर बसली. कित्येक वर्षानंतर तिला मराठे बाई डोळ्यासमोर आल्या. त्यांनी म्हटलेली कविता ऐकू येऊ लागली.

ढगांचं घरटं सोडून दूर, पावसाचं पाखरु आलं गं दूर…

अलगद त्याच्या पंखावरुन, येईन भिजून, येईन भिजून…

वर्गातील मैत्रिण सुलभा दिसू लागली. यमुना दिसू लागली. ज्योतीचे मन कातर झाले. कुठे असतील आपल्या मैत्रिणी ? गेल्या कित्येक वर्षात आपण त्यांची चौकशीपण केली नाही. मराठे बाई असतील का हयात ? काल अत्रे म्हणाले – ‘‘कविता तुमच्या आजूबाजूला असतात, मनाचे अ‍ॅन्टीना जागृत ठेवा. त्याला कधी सिग्नल मिळतील सांगता यायचे नाही.’’ छान बोलतात अत्रे. आपण आपल्या मनाचे अ‍ॅन्टीना बंदच करुन टाकले होते. धंदा वाढविणे आणि पैसे मिळविणे हेच ध्येय ठेवले होते. आपल्या आयुष्यात कवितेला काही स्थान आहे का? नसेल तर अत्रेंच्या कविता का आवडतात आपल्याला? की आपल्यात एक झोपलेली कवयत्री आहे ? तिला उठवायला हवे आहे का ?
माऊली ट्रॅव्हल्सची गाडी दक्षिण भारताचा दौरा करुन पुण्यात आली. प्रविण अत्रेंनी ज्योतीला आप्पा बळवंत चौकात नेऊन पुस्तकांची दुकाने दाखविली. एवढी पुस्तकं दुकाने एका ठिकाणी ज्योती प्रथमच पाहत होती. प्रत्येक दुकानदार अत्रेंना हाक मारत होता. एका दुकानातून अत्रेंनी कुसुमाग्रजांचे विशाखा आणि मंगेश पाडगांवकरांचे सलाम खरेदी केले आणि ज्योतीला भेट म्हणून दिले. ज्योतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी बरीच पुस्तके खरेदी केली. माऊली टूर्स मधील पुण्यातील लोक इथे उतरणार होते. अत्रे पण आपली बॅग घेऊन उतरले. सर्वांना बाय बाय करत गर्दीत दिसेनासे झाले.

ज्योतीने कुसुमाग्रजांचा कविता संग्रह उघडला.

‘‘पुरे झाले चंद्र सूर्य, पुर्‍या झाल्या तारा,

पुरे झाले नदी नाले, पुरा झाला वारा…

मोरा सारखा छाती काढून, उभा रहा

जाळा सारख्या नजरेत नजर बांधून पहा…

सांग तीला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा….

आहाहा ! हे कुसुमाग्रजांचे वैभव तिला आपले वाटत होते.

आपली दुकाने विविध मिलची कापडे, रेडिमेड कपडे, नको नको. तिच्या लक्षात आले, हे कुसुमाग्रज, वसंत बापट, कवी ग्रेस हे सर्व आपल्याला आवडतयं, जवळचं वाटतंय…

– क्रमश: भाग २ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 

Please share your Post !

Shares
image_print