हिन्दी साहित्य – कविता ☆ मुक्ता जी के मुक्तक ☆ –डा. मुक्ता

डा. मुक्ता

मुक्ता जी के मुक्तक 

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। प्रस्तुत है  डॉ मुक्ता जी के अतिसुन्दर एवं भावप्रवण मुक्तक – एक प्रयोग।)

 

आओ! आज तुम्हारी मुलाकात

खुद से करवाऊं

मन की ऊहापोह से

रू-ब-रू कराऊं

यूं तो ज़िन्दगी में तूफ़ान

आते जाते रहेंगे

आओ!तुम्हें सागर की लहरों से

पार उतरना सिखलाऊं

 ◆◆◆

कौन, कब, कहां मिल जाये

नहीं मालूम

उजड़े गुलशन में

कब बहार आ जाए

नहीं मालूम

यूं तो कांटों से भरी है यह ज़िन्दगी

हमसफ़र कब तक साथ निभाये

नहीं मालूम

◆◆◆

तेरी यादों के बियाबां में

भटक रहा इत उत

तेरी तलाश में

दरश पाने को बेकरार

मन बावरा

◆◆◆

मिलते हैं लोग

इस जहान में

बिछुड़ जाने को

बदलते मौसम की तरह

बदल जाती है पल भर में

उनकी फि़तरत, उनका मिजाज़

◆◆◆

समय की सलीब पर

लटका इंसान

आत्मावलोकन करता

अंतर्मन में झांकता

रोता चिल्लाता

प्रायश्चित करता

खुद की तलाश में

मरू सी प्यास लिए

इत उत भटकता

परन्तु उदासमना

खाली हाथ लौट जाता

◆◆◆

© डा. मुक्ता

पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी,  #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

ई-अभिव्यक्ति: संवाद-19 – हेमन्त बावनकर

ई-अभिव्यक्ति:  संवाद–19       

सर्वप्रथम आप सबको आप सबको भारतीय नववर्ष, गुड़ी पाडवा, चैत्र नवरात्रि एवं उगाड़ी पर्व की हार्दिक शुभकामनायें। पर्व हमारे जीवन में उल्लास तो लाते ही हैं साथ ही हमें एवं हमारी आने वाली पीढ़ी को हमारी संस्कृति से अवगत भी कराते हैं।

आज इन सभी पर्वों के साथ आप सबसे यह संदेश साझा करने में गर्व का अनुभव हो रहा है कि विगत दिनों www.e-abhivyakti.com परिवार के दो सदस्यों ने अभूतपूर्व सफलता अर्जित की जिसके लिए मैं दोनों सदस्यों को हार्दिक शुभकामनायें एवं बधाई देना चाहता हूँ।

इन पंक्तियों के लिखे जाने तक सम्माननीय साहित्यकार श्री संतोष ज्ञानेश्वर भुमकर जी की कविता “असीम बलिदान ‘पोलिस'” को विगत दो दिनों में 252 पाठकों  ने इस वेबसाइट पर पढ़ा। यह अपने आप में उनकी रचना के लिए एक कीर्तिमान है।

विगत दिवस  हमारी वरिष्ठ साहित्यकार श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी को मशाल न्यूज़  नेटवर्क स्पर्धा में   द्वितीय  पुरस्कार प्राप्त करने के लिए हार्दिक  अभिनंदन।

मैं आपका हृदय से आभारी हूँ। आप सभी साहित्यकार मित्रगणों  का स्नेह ही मेरी पूंजी है।  पुनः आपका सभी  साहित्यकार  मित्र गणों  का अभिनंदन एवं  लेखनी को सादर नमन।

आज बस इतना ही।

हेमन्त बावनकर

6 अप्रैल 2019

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति: संवाद-17 – हेमन्त बावनकर

ई-अभिव्यक्ति:  संवाद–17     

मेरे पास जितनी भी रचनाएँ आपसे साझा करने के लिए e-abhivyakti में आती हैं वास्तव में वे रचनाएँ साहित्य के सागर में किसी भी प्रकार से मोतियों से कम नहीं हैं। मेरा सदैव प्रयास रहता है कि मैं उन मोतियों को सूत्रधार की भांति एक माला में पिरोकर इस माध्यम से आप तक प्रेषित कर दूँ। प्रत्येक रचनाकार अपने पाठकों तक अपने हृदय के सारे उद्गार उन रचना रूपी मोतियों में सजा चमका कर मुझे प्रेषित कर देते हैं। फिर उन मोतियों से भी चुनिन्दा मोतियों को चुनकर प्रतिदिन आप तक पहुँचने का प्रयास बड़ा ही सुखद होता है। यह संवाद तो कदाचित उन मोतियों के माध्यम से अपनी भावनाओं की अभिव्यक्ति है जो मुझे आप से जोड़ती है।

मेरा तो सदैव यह प्रयास रहता है कि प्रतिदिन आपको चुनिन्दा रचनाएँ प्रस्तुत करूँ। आपका रुचिकर स्नेह मुझे साहित्य में नित नवीन प्रयोगों को आपसे साझा करने हेतु प्रोत्साहित करता है। प्रत्येक दिन आपको कुछ नया दूँ बस यही लालसा मुझे एवं e-abhivyakti के माध्यम से संभवतः मेरे-आपके साहित्य तथा साहित्यिक जीवन जीने की लालसा को जीवित रखती है।

अब आज की रचनाएँ देखिये न। दैनिक स्तंभों में श्री मदभगवत गीता के एक श्लोक के अतिरिक्त श्री जगत सिंह बिष्ट जी का गंगाजी के तट एवं हिमालय श्रंखलाओं के मध्य प्रकृति के गोद में शांतचित्त बैठ कर “निर्वाण” जैसे विषयों पर रचित रचना आपके मस्तिष्क के आध्यात्मिक तारों को निश्चित ही झंकृत कर देंगी।

इसी क्रम में श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी की कविता “सावली” मुझे चमत्कृत करती है। मराठी शब्द “सावली” का अर्थ “छाया” होता है। उनकी प्रथम दो पंक्तियाँ “अपनी ही छाया में जब उलझ जाता हूँ कभी कभी, तो सूर्य भी मुझ पर हँसता है कभी कभी।“ यह रचना श्री अशोक जी के गंभीर एवं दार्शनिक मनोभावों को अभिव्यक्त करती है।

इस बार बतौर प्रयोग आपके समक्ष नारी की भावनाओं पर दो कवितायें प्रस्तुत कर रहा हूँ। आप स्वयं रचनाओं की साहित्यिक तुलना किए बगैर निर्णय लें कि यदि नारी के मनोभावों को एक कवियित्रि डॉ भावना शुक्ल लिखती हैं और एक कवि श्री माधव राव माण्डोले “दिनेश” लिखते हैं तो उनकी दृष्टि, संवेदनशीलता की अभिव्यक्ति कैसी होती है। मैं तो आपको मात्र दोनों कवियों की अंतिम दो पंक्तियाँ उद्धृत करना चाहूँगा।

स्त्री है सबसे न्यारी

है वो हर सम्मान की अधिकारी।

  • डॉ भावना शुक्ल

 

पता नहीं पिंजरे में,

“मैं हूँ या मेरी भावनाएं ….?”

  • माधव राव माण्डोले दिनेश

 

इस संदर्भ में मुझे मेरी कविता कि निम्न पंक्तियाँ याद आ रही हैं:

 

कहते हैं कि –

स्त्री मन बड़ा कोमल होता है

उसकी आँखों में आँसुओं का स्रोत होता है।

 

किन्तु,

मैंने तो उसको अपनी पत्नी की विदाई में

मुंह फेरकर आँखें पोंछते हुए भी देखा है।

 

श्री प्रह्लाद नारायण माथुर जी कि प्रसिद्ध पुस्तक “सफर रिश्तों का” पर आत्मकथ्य एवं उनकी चर्चित  कविता “मृत्युबोध” अवश्य आपको जीवन के शाश्वत सत्य “मृत्यु” के “बोध” से अवश्य रूबरू कराएगी।

 

इस संदर्भ में भी मुझे मेरी कविता की कुछ पंक्तियाँ याद आ रही हैं:

 

जन्म के पश्चात

मृत्यु

सुनिश्चित है।

और

जन्म से मृत्यु का पथ ही

परिभाषा है

जीवन की।

 

आज बस इतना ही।

 

हेमन्त बावनकर

2 अप्रैल 2019

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कथा/लघुकथा – बीज अंकुरे अंकुरे – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

बीज अंकुरे अंकुरे

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति हसबनीस जी  की मानवीय सम्बन्धों पर आधारित व्यावहारिक लघुकथा ‘बीज अंकुरे अंकुरे’) 

‘चालव रे, चालव सपसप हात जरा, तोंड आवर आता ! ‘  घामाच्या धारांनी निथळत असलेला माळी त्याच्या सहकाऱ्यावर डाफरला ! आकाशात ढगांची जमवाजमव झाली होती , हलकं वारं आणि सळसळती पानं जणू  पावसाच्या आगमनाची वर्दीच देत होती . माती, खत , साऱ्याचा एक मोठ्ठा ढेपाळलेला ढिगारा  , वाफ्यातल्या उपटलेल्या शेवंतीचा बाजूला पडलेला भारा , कीटकनाशकाचं भलं मोठं बोचकं , आणि ह्या साऱ्या अस्ताव्यस्त पार्श्वभूमीवर सारं वेळेवारी आटपेल ना ह्या विवंचनेत ओढगस्त चेहऱ्याने बागेत अस्वस्थपणे येरझारा घालणारी मी !

जवळ जवळ प्रत्येकच मान्सूनमध्ये हे चिरपरिचित दृष्य आमच्या बागेत हमखास बघायला मिळतं . सगळ्या बागकामाचा फडशा एकट्याने पाडणारा आमचा माळी मात्र आताशा एका सहकाऱ्याला बरोबर आणायला लागला होता. त्यांचं मातीखतात बरबटणं, झाडांना सुबक कापून शिस्तीत वाढवणं, रोपं लावणं, फुलवणं, निगा राखणं, अधून मधून आपला कसबी हात बागेवरून फिरवत तिचा चेहरा मोहरा पाsर बदलवणं, वर्षभर किती विविध कामं सफाईदारपणे पार पाडतात ही मंडळी ! अगदी हातावरचं पोट असतं त्यांचं ! मेहनत , बागकामाचं ज्ञान , आणि गाठीशी असलेला कामाचा अनुभव  एवढ्या बळावर मिळेल तो बागेचा तुकडा इमाने इतबारे राखत , फुलवत खुष असतात ही मंडळी आपल्या संसाराच्या तारेवरच्या कसरतीत ! पण ह्या त्यांच्या कष्टांना जर त्यांनी संघटितपणाची जोड दिली तर ..! आणि त्या कल्पनेपाशी मी थबकलेच क्षणभर !

खरंच प्रचंड मेहनत करणारी ही कष्टकरी जमात संघटित का नाही होऊ शकत? माती रेतीखताचा योग्य समतोल राखून वाफे तयार करणं, बी बियाणं पेरून रोपं तयार करणं, तयार झालेली रोपं वाफ्यात लावणं, अधून मधून खुरपी करत मुळांना सुखाने  श्वास घ्यायला मदत करणं, कीड फवारणं, सुरेख लॅंडस्केपिंग करणं, झाडांना विविध आकारांत आटोक्यात ठेवणं अशी किती विभागणी होऊ शकते कामाची ! जशी ज्याची मती तशी त्याची गती ह्या न्यायाने ज्याला त्याला आपल्या आवाक्यानुसार कामं वाटून घेता येतील, बोलण्यात सफाई आणि व्यवहारात रोखठोक असणारा गडी कामं मिळवून वाटून देईल, जो तो आपलं नेमून दिलेलं काम तर करेलच प्रसंगी दुसऱ्यासही मदतीसाठी आपणहून सरसावेल, खरंच एक जर सिस्टीम लावली कामाची तर किती गोष्टी सोप्या होतील त्यांच्या आणि आपल्यासाठी देखील किती सुखाचं होईल माळ्याकरवी पार पडणारं बागकाम ! आपल्या सुखासाठी वेठीस धरलेल्या ह्या कष्टकऱ्यांची ही जमात बघितली ना की मला खरंच असं सुचवावंसं वाटतं की ‘ बाबांनो, तुम्ही संघटित व्हा, आणि मिळून नियोजनबद्ध कष्ट करा , नक्कीच त्यातून चांगलंच निष्पन्न निघेल, त्याचा तुम्हालाच फायदा होईल ..! आणि आमची देखील परवड थांबेल. ‘मनात आलेले विचार त्याच्यासमोर मांडावे म्हणून मोठ्या उत्साहात मी त्याच्याकडे वळले आणि, ‘मॅडम काम झालं, निघतो मी, गुडियाला शाळेत सोडायचंय ‘असं म्हणत तो गेलादेखील!

माती खताचे ढिगारे बागेत जागोजागी वाफ्यांमध्ये विसावले होते, वाफा बालशेवंतीने अगदी लेकुरवाळा भासत होता. नव्या झिलईतली बाग खुपच झोकदार वाटत होती. आपल्या कष्टाचा हात बागेवरून मायेने फिरवून , कलाकुसर करून माझा माळी तर कधीच दिसेनासा झाला होता पण माझ्या मनात मात्र त्यांच्या संघटनशक्तीच्या कल्पनेची बीजं रोवली गेली होती! काहीतरी आकारत होतं, देता येईल का त्याला नीटस रूप ह्या विचारांत थेंब थेंब पडणाऱ्या पावसाचं रूपांतर सरी कोसळण्यात कधी झालं कळलं देखील नाही!

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

मराठी साहित्य – आलेख – सोबत…सात जन्मांची – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

सोबत…सात जन्मांची

(प्रस्तुत है सात जन्मों के सम्बन्धों पर आधारित सुश्री ज्योति हसबनीस जी का आलेख ‘सोबत…सात जन्मांची’)

सात जन्माची सोबत करण्याच्या आणाभाका घेऊन हळूच एकमेकांच्या आयुष्यात प्रवेश करतो आपण. जोडीने संसार सुरू होतो. काडी काडी जमवून मेहनतीने घरटं बांधलं जातं. घरट्याला आकार देण्यात, वादळ वाऱ्याचा सामना करत घरट्यातली ऊब राखण्यात, घरट्यातल्या चिवचिवाटातलं स्वर्गसुख लुटण्यात आयुष्याची मध्यान्ह संपून उतरणीची ऊन्ह कधी सुरू होतात लक्षातच येत नाही. मध्यान्ह ओसरल्याचं निवलेपण तर असतं, पण सांजसावल्यांचं भय देखील मनात दाटायला सुरूवात होते. आपल्याच आपल्याला व्यापून टाकणाऱ्या लांब लांब सावल्या …मन काजळणाऱ्या …एक अनामिक हुरहूर लावणाऱ्या!

आतापर्यंतच्या प्रवासातील सारी वळणं, खाच खळगे, चढ उतार जोडीने पार केलेले असतात. अगदी कुठल्याही क्षणी हातावरची आश्वासक पकड कधी ढिली झालेली नसते, कायमच शब्दांच्या, स्पर्शाच्या खंबीर साथीने इथवरचा प्रवास झालेला असतो ….पण …अचानक हा हात हातातून सुटला …अगदी कायमचा तर …

अवचित एखाद्या कातरवेळी, हळव्या क्षणी मनात येणारा हा विचार अक्षरश: जिवाच्या पार चिंधड्या करून टाकतो, नाही का?

सकाळच्या चहापासून तर रात्रीच्या बातम्यांपर्यंतच्या दिवसभराच्या टाईम टेबलची एकमेकांच्या सोयीने केलेली आखणी, आणि तिचा सहज स्वीकार हेच अंगवळणी पडलेल्या मनाला, हे एकटेपण पेलवेल, झेपवेल??  व्यक्ती म्हणून स्वतंत्रपणे जगणं, स्वत:चा स्वतंत्र असा दिनक्रम आखणं, लौकिकार्थाने कुणाशी कायमच जोडलं गेलेलं पण आता केवळ स्वत:शीच उरलेलं नातं समर्थपणे निभावता येईल? अंधाराशी मैत्री करता येईल? रात्रीच्या कुशीत निवांतपणा साघता येईल? असे असंख्य विचार मनात थैमान घालू लागतात. काजळी धरलेली दिवली कशी अंधारालाच  उजळवत आपलं केविलवाणेपण जपते तशी मनाची अवस्था होते अशा वेळी…पण मनाची अशी घालमेल, अशी तगमग, आणि येणारी मरगळ थोपवता यायलाच हवी.

जिव्हाळ्याची मुलं बाळं, जोडलेली जिवाभावाची माणसं, जोपासलेले छंद, या साऱ्यांनी परिपूर्ण असलेलं आपलं आयुष्य ह्या एकाकीपणाला असं घाबरेलच कशावरून? आणि एकाकीपण कसं? आपल्या घरट्यात आहेतच की जोडीदाराची स्पंदनं! समान आवडीचे छंद जोपासतांना नकळत मनात तर साधला जाणारच आहे ना संवाद त्याच्याशी! खचल्या क्षणांना ऊभारी देणारे त्याचे शब्द जपलेच आहेत ना कायम मनाशी!

कृष्णमेघी वीज चमकावी आणि अवघा  आसमंत उजळून निघावा, अगदी तसा एक  विचार मनात आला, की  सात जन्माची सोबत अशी एवढ्यात  कशी संपणार? अजून तर कित्ती एकत्र प्रवास करायचाय, मधुर स्मृतींची खुप सारी गाठोडी बांधायची आहेत अगदी सात जन्म पुरतील एवढी … आणि हो ती एकत्र वाहायची देखील आहेत ..अगदी सात जन्म बरोबरीने! जोडीदाराची साथ असणारच आहे कायम, एकमेकांमध्ये असलेलं रूजलेपण सात जन्म पुरणारं तर नक्कीच आहे, उगाचच नाही म्हणत जोडीदाराला सात जन्मांचा सोबती ! खरंच त्याच्याबरोबरच्या मघुर क्षणांची सोबत अक्षरश: सात जन्मांची ..!!

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

हिन्दी साहित्य – व्यंग्य – मेरे लिखे को पढ़ने वाले – डॉ कुन्दन सिंह परिहार

डॉ कुन्दन सिंह परिहार

मेरे लिखे को पढ़ने वाले 

(डॉ  कुन्दन सिंह परिहार जी का  लेखकों की व्यथा का अत्यंत खोजपरख व्यंग्य)

यह लेखकों के लिए भारी संकट का समय है।लेखक मोटे-मोटे पोथे लिखकर पटक रहा है, लेकिन पढ़ने वाला कोई नहीं।पाठक सिरे से नदारद है।घोंघे की तरह अपने खोल में दुबक गया है।लेखक बार बार व्याकुल होकर आँखों पर हथेली की ओट लगाकर देखता है, लेकिन सब तरफ सन्नाटा पसरा है।पाठक ‘डोडो’ पक्षी की तरह ग़ायब हो गया है।

हालत यह है कि पत्रिकाओं में इने-गिने पच्चीस पचास लेखक ही बदल बदल कर कभी लेखक और कभी पाठक का चोला ओढ़ते रहते हैं। कभी वे लेखक बन जाते हैं, कभी पाठक।एक दूसरे की कमियां ढूँढ़ते रहते हैं और बगलें बजाते रहते हैं। कुछ लेखक पाठकों से इतने मायूस हो गये हैं कि अपने घर पर चाय का लालच देकर दस बीस मित्रों को बुला लेते हैं और उन से अपनी तारीफ सुनकर खुश हो लेते हैं।अगर कोई नासमझ,स्पष्टवादी श्रोता रचना की आलोचना करने लग जाए तो उसे तत्काल बाहर का रास्ता दिखा दिया जाता है।यानी लेखक का ह्रदय कोमल होता है,इसलिए उसे आघात न पहुँचाया जाए।

साहित्य-प्रेम की हालत यह है कि अब साहित्यिक कार्यक्रमों के निमंत्रण-पत्र में लिखा जाता है–‘सबसे पहले पहुँचने वाले और अंत तक रुकने वाले पाँच श्रोताओं को पुरस्कृत किया जाएगा।’ कार्यक्रम के बीच में दो तीन बार घोषणा होती है कि कार्यक्रम के अंत में सबके लिए चाय की व्यवस्था है।

इसी माहौल में जानी मानी मासिक पत्रिका ‘प्रलाप’ में मेरी एक रचना छपी और मैं उत्साह में मित्रों-परिचितों का मुँह देखने लगा कि कोई कहेगा कि वाह भई,क्या धाँसू रचना लिखी है।लेकिन मित्र और परिचित ‘हाय’ ‘हलो’ कहते आजूबाजू से गुज़रते रहे, किसी ने भी रुककर मुँह खोलकर यह नहीं कहा कि भाई, मैंने आपकी बेमिसाल रचना पढ़ी।

अंततः मेरा दिल बैठने लगा। दुनिया बेरौनक लगने लगी।लगा कि पृथ्वी पाठक-विहीन हो गयी।पाठक दूसरे लेखकों को भले न पढ़ें, कम से कम मुझे तो पढ़ें।लेकिन पाठक बड़ा निष्ठुर हो गया है।जब कद्रदाँ ही नहीं तो हुनर का क्या मोल!

हारकर मैंने एक दिन अपने मित्र पारखी जी को रास्ते में पकड़ लिया।उम्मीद से उनकी तरफ देखते हुए पूछा,’मासिक प्रलाप मँगा रहे हैं?’

वे नाक सिकोड़कर बोले,’जब से पेट्रोल चार रुपये मँहगा हुआ, अपन ने साहित्यिक पत्रिकाएं खरीदना एकदम बन्द कर दिया।अब अपन साहित्य वाहित्य ‘अफोर्ड’ नहीं कर सकते।साहित्य वाहित्य से होता भी क्या है?किस मर्ज की दवा है यह?’

मैंने उनके उच्च विचार सुनने के बाद मरी आवाज़ में कहा,’उस पत्रिका के नये अंक में मेरी रचना छपी है।’

वे बोले,’वाह, अच्छी बात है।सुनकर खुशी हुई।अगर पत्रिका कहीं मिल गयी तो जरूर पढ़ूँगा,फिर अपने बहुमूल्य मत से अवगत कराऊँगा।’

मैंने संकोच को परे रखकर कहा,’कहें तो पत्रिका आपके पास भेज दूँ?

वे मुफ्तखोरी की संभावना देख प्रसन्न होकर बोले,’इससे बेहतर क्या हो सकता है!मैं तत्काल पढ़कर आपसे विचार-विमर्श करूँगा।’

मैंने उनके स्कूटर की बास्केट में कुछ पुस्तकें देखकर पूछा,’ये कौन सी किताबें हैं?’

वे बोले,’यह बैंगन बनाने की सौ विधियों पर है और दूसरी शनि की साढ़ेसाती के लक्षणों और उनके उपचार के बारे में है।’

फिर वे थोड़े दुखी स्वर में बोले,  ‘दरअसल मेरे ग्रह अभी ठीक नहीं चल रहे हैं।घर में किसी न किसी वजह से अशांति बनी रहती है। वास्तु-विशेषज्ञ से पूछा तो उन्होंने अशांति की वजह यह बतायी कि हमारा टायलेट और किचिन साउथ-वेस्ट में है। टायलेट को नार्थ-वेस्ट और किचिन को साउथ-ईस्ट में ले जाना पड़ेगा।इसमें बीस-पचीस हजार का खर्चा होगा।’

मैंने सहानुभूति में कहा,’यह एक और सनीचर लग गया’

वे ठंडी साँस भरकर बोले,’क्या करें!जो लिखा है वह भोगना पड़ेगा।आप पत्रिका जल्दी भेज दें।मैं फटाफट पढ़ डालूँगा।’

मैंने जल्दी ही पत्रिका उनके पास भेज दी।फिर पन्द्रह-बीस दिन गुज़र गये, लेकिन उनका कोई फोन-वोन नहीं आया।धीरज खोकर मैंने उन्हें फोन किया।वे बोले,’गुरू दरअसल मैं तो वास्तुशास्त्र के चक्कर में फँसा रहा, इस बीच तुम्हारी पत्रिका मेरे साले साहब उठा ले गये।बड़े साहित्य-प्रेमी हैं।कहने लगे पहले मैं पढ़ूँगा।बस,मैं वापस ले लेता हूँ।एक दो दिन की बात है।’

फिर डेढ़ महीना बाद उन्हें फोन किया।जवाब मिला,’साले साहब कह रहे थे कि पत्रिका उनके ससुर साहब ले गये।वे भी घनघोर साहित्य-प्रेमी हैं।तुम्हारी रचना का अच्छा प्रसार हो रहा है।तुम चिंता मत करना।मैं पत्रिका वापस ले लूँगा।’

फिर एक दिन सड़क पर टकरा गये।बोले,’तुम्हारी पत्रिका तो साले साहब के ससुर के एक मित्र ले गये।वे भी बड़े पुस्तक-प्रेमी हैं।तुम्हारी रचना खूब पढ़ी जा रही है।’

छः महीने गुज़र जाने के बाद मैंने पारखी जी को फोन किया और निवेदन किया कि पत्रिका वापस कर दें,मुझे उसकी सख़्त ज़रूरत है।

वे बोले,’बंधुवर, फिलहाल तो पत्रिका का पता नहीं चल रहा है।साले के ससुर साहब के मित्र कुछ भुलक्कड़ हैं।उन्हें याद नहीं आ रहा है कि उन्होंने पत्रिका कहाँ छोड़ दी।वे उसे पढ़ भी नहीं पाये।उसमें उन्होंने एक सौ का नोट रख दिया था, वह भी चला गया।बेचारे बहुत परेशान हैं।’

फिर वे बोले,’आप ऐसा करो, पत्रिका की दूसरी प्रति मेरे पास भेज दो।मैं फटाफट पढ़ कर आपसे आपकी रचना पर चर्चा कर लूँगा।इस बार किसी को छूने भी नहीं दूँगा। आप निश्चिंत होकर भेज दो।आपकी रचना की प्रसिद्धि के लिए हमारी आलोचना ज़रूरी है।’

तब से मैं पारखी जी से बचता फिर रहा हूँ।मित्रों से पता चला है कि वे बेसब्री से पत्रिका की दूसरी प्रति का इंतज़ार कर रहे हैं।

© डॉ कुन्दन सिंह परिहार (मो. 9926660392)

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

मराठी साहित्य – आलेख – जीवन त्यांना कळले हो – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

जीवन त्यांना कळले हो

(प्रस्तुत है जीवन में छोटी-छोटी  बातों में प्रसन्नता ढूँढने के लिए आपको प्रेरित करता सुश्री ज्योति हसबनीस जी  का यह आलेख । )

छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधणं , आणि त्या आनंदात हरवून जाणं , हा एक स्वभाव असतो . हा जर आपला स्थायी भाव असला तर प्रतिकूल परिस्थितीतदेखील अनुकूलता निर्माण करण्याचं कसब अंगी मुरतं , आणि सारंच साधं सोपं सरळ वाटू लागतं . कामाचे डोंगर त्यातल्या अवघड चढणींसकट सुकर होतात लीलया पार होतात .

घराचं छोटंसं रिनोव्हेशनचं काम काढलं तेव्हा कामगारवर्ग खुप जवळून परिचयाचा झाला माझ्या . त्यांच्या सवयी , लकबी , स्वभाव , साऱ्या कंगोऱ्यांसकट अनुभवास आलं माझ्या . सकाळी कामावर येतांना नीटनेटकी चापून चोपून साडी नेसलेली नीला आल्या आल्या शर्टाचा डगला चढवून चेहऱ्यावर ओढणी गुंडाळणार आणि केसांत ओढणीच्या कडेने दोन टप्पोरी शेवंतीची फुलं माळणार ! टेबलावर ठेवलेल्या मोठ्ठ्या आरशासमोर क्षणभर थबकणार आणि समाधानाने पुढे सरकणार ! हवं ते मिळाल्याचा आणि आवडतं ते साधल्याचा आनंद तिच्या चमचमत्या डोळ्यातून ओसंडून वाहणार ! हो ..रसिकतेला बंधनं कुठली ? फुलं सजवायला अगदी फुलदाणीचंच बंधन कशासाठी …फुलं सजवायला एक  छोटासा पाईपचा तुकडा देखील पुरतो , आणि तो ठेवायला , मातीचे ढिगारे जरी असले तरी एखादा कोपरा देखील मिळतो . थोडीशी वाळू आणि थोडंसं पाणी टाकून सजवलेली फुलं दिवसभरच्या नीरस कंटाळवाण्या कामात देखील चेहऱ्याची टवटवी अबाधित ठेवायला मनापासून मदत करतात ही तिच्या वृत्तीतली किती मोठी सकारात्मकता !

ग्रॅनाईट मोल्डिंग फिटिंग चं काम करणारा युसूफ सतत गुणगुणत राहणार किंवा मोबाईलची गुणगुण ऐकणार! आवडतं गाणं ऐकतांना त्याचा चेहरा असा काही लकाकणार की वाटावं सारी सुखं याच्या पायाशी लोळण घेतायत जणू ! जुगाड करून खोलीत लावलेला ट्यूबलाईट,त्या लाईटमध्ये अखंड चालणारे त्याचे हात , कसंबसं चार्जर सांभाळत , लटकत, गुणगुणणारा बापडा मोबाईल ,आणि सूरात सूर मिसळत कामात तल्लीन झालेला , चिवटपणे कामाचा फडशा पाडणारा युसूफ ..! खरंच सूरात आनंद शोधत भान विसरत , समाधानाने वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडण्यात खरी गंमत आहे ही किती सकारात्मक मानसिकता !

चहा, जेवण एकत्र घेतांनाचा त्यांचा आपसातला संवाद , हास्य विनोद म्हणजे एक प्रकारचा life on a lighter mode ची झलकच जणू ! खरंच छोट्या छोट्या गोष्टी देखील किती शिकवतात आपल्याला . हातातोंडाची मिळवणी असलेलं त्यांचं चाकोरीतलं आयुष्य , आणि त्या चाकोरीत जगतांनादेखील सुखाचे छोटे छोटे कण वेचणं , त्यातला आनंद लुटणं , त्यातलं आंतरिक समाधान आणि त्याची पसरलेली चेहऱ्यावरची तृप्ती सारंच अगदी हातात हात घालून वावरत असतं असं जाणवतं या मंडळींना बघून !

आंतरिक समाधान पैशाच्या सुबत्तेवर , समाजातल्या प्रतिष्ठेवर , सामाजिक स्थानावर अवलंबून असतं हे यांच्या कधी गावीही नसतं मग अशा प्रश्नांचं उलटसुलट जाळं विणण्यात त्याची उत्तरं शोधण्यात  आपण का रंगून जातो आणि काल्पनिक सुखाच्या मागे धावत छोट्या छोट्या आनंदाला मुकतो , आयुष्याची लज्जत आणि रंगतच हरवून बसतो ??

© ज्योति हसबनीस

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138

मराठी साहित्य – आलेख – प्रतिसाद – सुश्री ज्योति हसबनीस

सुश्री ज्योति हसबनीस

प्रतिसाद 

(यह सत्य है  कि ईश्वर ने  मानव हृदय को साद-प्रतिसाद  के  भँवर में उलझा कर रखा है जबकि प्रकृति अपना कार्य करती रहती है। उसे प्रतिसाद से कोई लेना देना नहीं है। इस तथ्य पर प्रकाश डालती यह रचना सुश्री ज्योति हसबनीस जी के संवेदनशील हृदय को दर्शाती है।) 

*पाऊस मनातला*….

 

मनातल्या पावसाची रूपं एक का असतात ? सहस्त्रधारांनी कोसळणारा पाऊस …आणि लक्षावधी रूपांनी त्याचं मनाचा ताबा घेणं  ,  कधी आत आत झिरपत माझ्यातल्या ‘मी’शी मुक्त संवाद साधणं …कधी आठवणींचं बेट गदागदा हलवत हलकेच एखादा हळवा सूर आळवणं …तर कधी चिंब भंवतालाला डोळ्यात साठवतांना घरट्यातली ऊब अनुभवणं … त्याच्या बेताल वागण्यावर माझं चिडणं..त्याच्या लयबद्ध पदन्यासावर माझं ठेका धरणं ..त्याच्या फसव्या रूपाला बळी पडणं …तर लोभस रूपाला डोळे भरून पाहणं …त्याचं भरभरून देतांनाचा कृतकृत्य भाव आणि सारं काही देऊन झाल्यानंतरचं इंद्रधनुषी हास्य …सारं सारं मनात तस्संच जपणं आणि प्रत्येक भेटीच्या वेळी असाच आहेस ना रे तू असं त्याला आसूसून विचारणं …!

शैशव आणि अबोघ वयातल्या पावसाचं भेटणं , त्याच्याशी केलेली दंगामस्ती , त्याने केलेली तनामनाची पार घुसळण साऱ्याच्या गोड आठवणी पहिल्या पावसाच्या मृद्गंधासारख्या असतात , भरून येऊ दे आभाळ की मन भरून आलंच , आठवणींची कुपी उघडलीच , मृद्गंध दरवळलाच !

पाण्याच्या खळाळात सोडलेल्या होड्या , डौलात जाणारी त्यांची स्वारी , बुडणार तर नाही ना असं शंकाकुल मन …बिंधासपणे टू व्हिलरवर मुक्तपणे अंगावर घेतलेला पाऊस …रेनकोटचा जामानिमा करत मुलांची केलेली शाळेतली पाठवणी ..आणि आता परत तितक्याच उत्साहात चिमुरड्या नातींबरोबर खळाळात सोडलेल्या रंगीत होड्या …एक कटाक्ष त्यांच्यांतले उत्सुक सचिंत भाव हेरण्यात गुंतलेला तर दुसरा नितळ निळ्या आकाशाचा वेध घेण्यात गुंतलेला !

खरंय ..जीवनचक्र हे असेच असते सृष्टीचक्र हे असेच असते !!

पाऊस येऊ दे ना दरचवर्षी पण त्याला भेटायला आतुरलेल्या मनाचं हे अस्संच असतं …!

पहिला शिडकावा पावसाचा होऊ दे की आठवणीच्या किर्र रानातले असंख्य काजवे सारं रान उजळीत मुक्तछंद आळवू लागतात ….आणि होते थाटामाटात एका दैदिप्यमान उत्सवाची सुरूवात ,  गडगडाटात , कडकडाटात आणि लखलखाटात …!

त्या लखलखाटात वसुंधरेचे भंवतालात झिरपलेले तृप्तीचे हुंकार असतात , तिच्या डोळ्यातली हिरवाईच्या डोहाळ्याची चमचमती स्वप्न असतात , अंगाखांद्यावर झुलणारी पाचूची बेटं असतात , तृणपात्यांच्या गळ्यातले पाणीदार मोत्यांचे सर असतात , मनोहर रंगीबेरंगी फुलांचा मोहक कशिदा असतो आणि अशा अपूर्व हिरव्या शालू शेल्याच्या साजातलं तिचं रूप अगदी उत्सवी असतं ,मंत्रमुग्ध करणारं असतं !

 

*ज्योति हसबनीस*

Please share your Post !

Shares
Uncategorized
Warning: Trying to access array offset on value of type bool in /var/www/wp-content/themes/square/inc/template-tags.php on line 138
image_print