मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक लगीनगाठ…” भाग 3 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? जीवनरंग ?

☆ “एक लगीनगाठ…” भाग 3 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

(मागील भागात आपण पाहिले – “त्यांना दिदीच्या लग्नाची चिंता असावी व त्यामुळे त्याना दिलेली औषधे देखील काम करीत नाहीत असे मला वाटतेय. पण सध्या तरी याबाबत कोणता उपाय नाही. कारण त्यासाठी आम्हाला तिकडे महाराष्ट्रात गावी जावे लागणार आणि स्थळे पहावी लागणार. मी एवढा लहान आहे की मला यातले कांही म्हणजे कांहीच समजत नाही .”  आता इथून पुढे)

आता श्रीकांत विचार करू लागला. तसे पाहिले तर सुजाता पाहिल्या पाहिल्या नाकारण्या–सारखी मुलगी नव्हती. या दोन दिवसातले तिचे वागणे देखील मर्यादाशील होते. त्या सुरेखासारखी ती सतत पुढे पुढे करीत नव्हती. कॉलेजमध्ये ती हुशार आहे. तिच्या आई-बाबांची तिला काळजी आहे. वाह्यात खर्चाची मुलगी दिसत नाही. तिच्या बाबांच्या बाजूने विचार केला तर त्यांची काळजी चुकीची नाही. आप्पांकडून त्यांनी कांही मागणे हेदेखील अनाठायी नाही. अन्यथा आम्ही त्यांचे कांही देणे लागतो , हे नाकारणार कसे ? अरे, तो रिक्षावालासुद्धा वेळेला त्यांच्या उपयोगी पडतोय. असे असेल व आप्पाना ठरविले असेल की ‘यशवंतांच्या वेळेला उपयोगी पडुया ‘  तर ते व्यवहार सोडून नाही.  हां …. लगेच लग्न झाले तर माझे पुढचे शिक्षण कदाचित लांबेल, थांबेल किंवा मेरिटमध्ये होणार नाही. त्याचा त्रास मला आयुष्यभर होईल. त्यामुळे लग्नाला मान्यता द्यावी व दोन वर्षे थांबायला सांगावे, हे उचित होईल. असा विचार करीतच श्री उठला व रमेशला बोलला की ‘चल, घरी जाऊ.’

श्रीकांत घरी आला व सर्वाना म्हणाला, ” माई, आप्पा आणि काका, कांही गोष्टी तुम्ही समजून घ्या. माझे शिक्षण अजून दीड वर्षे शिल्लक आहे. नोकरी मिळायला सहा महिने जातीलच. त्यामुळे मला स्वतःच्या पायावर उभे राहायला अजून दोन वर्षे तरी जाणार आहेत. त्यामुळे आणखी दोन वर्षांनी मी हे लग्न करेन. तोपर्यंत सुजाताचे शिक्षण ही संपेल. ज्या प्रामाणिकपणाने आप्पानी रुपये परत केले त्याच प्रामाणिक वर्तणुकीचा हवाला देऊन मीही काकांना वचन देतो की मला नोकरी लागल्या लागल्या मी सुजाताशी लग्न करीन . पण सुजाताची तशी तयारी आहे का व मी तिला मान्य आहे का हेही तिने माझ्यासमोर सांगितले पाहिजे. ”

सगळेच गप्प बसले. कारण श्रीकांत कांही खुसपटे काढून लग्न दोन वर्षे पुढे ढकलू शकतो हे दोघांनीही आधीच ओळखले होते . त्यावर काय बोलायचे व त्याचे मन वळवायचे याचे उत्तर कोणाकडे नव्हते. कदाचित सुजातालादेखील श्रीकांतचे बोलणे पटले असते. पण ही मोठी माणसे तिला कांही चॉईस देतील याची शक्यता नव्हती. माईला घरी कामाला मदत करणारी सून हवी होती. आप्पाना सुनेला नोकरीला पाठवायची इच्छा नव्हती. त्यामुळे तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांच्यासाठी पुरेसे होते. तिच्यात दुसरी खोटदेखील नव्हती. त्यामुळे श्रीला लग्नासाठी तयार कारणे आणि एकदम कमी खर्चात मंगल कार्य त्वरित  उरकणे एवढीच प्राथमिकता दोघांकडे होती. यशवंत काका सुद्धा थोडे दु:चित होऊन बसले. श्रीकांतने त्याच्या पुरता हा प्रश्न सोडविला होता. ही रात्र मात्र त्याच्यासाठी झोपेचे खोबरे झाल्याची होती. तिसऱ्या दिवसाचा सकाळचा नाष्टा शांत शांत झाला. कोणी फारसे बोलले नाही. सुजाताला यातले बहुतेक कांहीच माहीत नव्हते. त्या दिवशी दोघांचीही कॉलेजिस सुरू होती. त्यामुळे दोन दोन लेक्चर्स अटेंड करून आम्ही दोन तासात परत येतो असे सांगून दोघे कॉलेजला पळाली. त्यावेळी आकरा वाजले असतील. गप्पा चालू असतानाच यशवंत काकांच्या छातीत पुन्हा दुखू लागले. रिक्षा आणायला श्रीकांतलाच पळावे लागले. तो चौकात आला व त्याला ती त्यांची नेहमीची रिक्षा दिसली. त्याने पटकन ‘यशवंत काकांना दवाखान्यात न्यायचे आहे’ असे सांगितले व रिक्षा घेऊन आला . रिक्षावाल्याला तो दवाखाना माहीत होता. ते दवाखान्यात गेले. डॉक्टर्सनी परत इसीजी काढला. तो काकांना आलेला दुसरा अटॅक होता. सिव्हीयर नव्हता, पण दुर्लक्ष करूनही चालणार नव्हते. डॉक्टरांनी अत्यावश्यक इंजेक्शन देऊन त्यांना झोपविले होते. कांही औषधे आणावी लागणार होती. रिक्षावाला अजून थांबला होता. त्याने पटकन जाऊन औषधे आणली. तोपर्यंत सुजाता आणि रमेश देखील दवाखान्यात आले. डॉक्टरनी संध्याकाळी काकांना डिस्चार्ज दिला खरा, पण त्यांना त्रास होईल, टेंशन येईल असे कोणी वागू नका असे त्यांनी बजावले. काकांनी जिने चढू नयेत किंवा उतरू नयेत हे सांगायला डॉक्टर विसरले नाहीत. थोडक्यात काकांची तब्येत हा त्या फॅमिलीचा कळीचा मुद्दा असणार आहे , हे श्रीकांतने ओळखले. कदाचित रात्री काकांना झोप नसावी व त्यामुळे त्यांना त्रास झाला असावा हीही शक्यता होती. दवाखान्यातून परत आल्यानंतर आप्पा श्रीकांतला बोललेच , “श्री, काकांना टेंशन-फ्री करणे हे केवळ तुझ्याच हातात आहे बघ. आता अशीही आणि तशीही सुजाता तुला पसंत आहे , तर आणखी दोन वर्षे थांबणे काकांवर अन्याय होतोय . मान्य आहे की लग्न लगेच झाले तर तुम्हा दोघांना दोन वर्षे तुमची मने मारावी लागणार आहेत. पण मग मी कशाला आहे? ती घरात म्हणजे आपल्या गावात तर थांबणार आहे व तुझे शिक्षण आम्ही करतोय ना ? माझ्या मित्राच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हे समजून घे रे ! “

श्रीकांत कांहीच बोलला नाही. मात्र विमनस्कपणे बाहेर गेला. ही मोठी माणसे मुलांकडून कशाकशाची अपेक्षा ठेवतील व इतरांबरोबर स्वतःला त्रास करून घेतील हे सांगता येत नाही , असे त्याच्या मनाने घेतले. तो बाहेर देवडीवर बसला असताना त्याला  सुजाता येताना दिसली. ” कांही नाही , शेजारी पाण्याची गरम पिशवी आणायला चाललेय.” ती बोलली व झपाझप पुढे गेली. श्रीकांतच्या डोक्यात आले की सुजाताच्या मनात काय आहे हे तिला विचारावे. पिशवी घेऊन आलेल्या सुजाताला त्याने थांबवले व “थोडा वेळ बैस” ,बोलला. ती पण अवघडून थोडे अंतर ठेवून बसली . श्रीकांतला नियतीचे हसू आले. “असे किंवा तसे , हिला माझी बायको व्हायचे आहे , तरीही नियती अशी लक्ष्मण रेषा का मारते?” त्याने स्वतःलाच विचारले. मात्र सुजाताला बोलला,

“कशी आहे आता काकांची तब्येत?”

“खूपच काळजी घ्यावी लागणार आहे.” ती खाली मान घालून बोलली.

“होय, खरे आहे,” श्रीकांत म्हणाला, ” पण हे असे किती दिवस ?”

” माझ्या लग्नाचे बाबांनी टेन्शन घेतलेय,” ती बोलली.

” म्हणजे तुला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत तर….?”

“होय, मी कांही आता लहान नाही. योग्य वयात मुलीचे लग्न व्हावे असे कोणत्या बाबाला वाटणार नाही? त्यात त्यांचा हा हार्टचा आजार. त्यांनी कोणावर भरोसा ठेवायचा? घरात आर्थिक तंगी आहेच. आता तर आजीच्या पेन्शनवर घर चाललेय. बाबाना त्यांच्या डोळ्यासमोर माझे लग्न व्हायला हवेय. तुम्ही इथे यायच्या आधी ते दररोज असेच बोलत असायचे. असेही म्हणायचे की तुझे लग्न मी ठरविले आहे गं. पण स्वतंत्र विचार करणाऱ्या तुम्हा मुलांवर अन्याय कसा काय करायचा? ” तिने सांगितले.

“बस्स … तुला एवढेच माहीत आहे? ” श्रीकांतने विचारले.

” म्हणजे ? तुम्हाला काय म्हणायचे आहे काय ? डॉक्टरनी आणखी कांही वेगळे सांगितले आहे काय ? ” तिने शंका घेऊन विचारले.

“अं … हं …! आजाराबद्दल नव्हे , मी लग्नाबद्दल विचारले.

“तुम्ही सांगा ना ?” तिने प्रश्नार्थक चेहरा केला.

“तुझ्या माझ्या लग्नाबद्दल . तुझ्या बाबांनी माझ्या आक्काच्या लग्नात आप्पाना पैसे देताना तुझ्या माझ्या लग्नाचे सूतोवाच केले होते. …..” श्री बोलला .

“अहो, हा तुमच्यावर अन्याय आहे. तुम्ही नका मान्य करू. आधी शिक्षण संपू दे. नोकरी किंवा व्यवसाय सुरू होऊ दे. आणि तुमच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न करा.” ती चकित होऊन बोलली.

“तुला मी पसंत नाही का? “

“तसे नाही हो. चुकीचा अर्थ नका घेऊ. मी तर खुश असेन हो…, पण संसाराच्याही प्रायोरिटी असतात. मुलांच्याही असतात आणि मुलींच्याही.  त्यात अशा भावनांचा गुंता नको.”

” अगं पण …. हे मोठे लोक प्रेशर आणतील. त्यावेळी तू ‘नकार’  देशील?

“तुम्ही द्याल का ? ” तिने साशंकतेने विचारले.

“आजपर्यंत मी आप्पांचा शब्द खाली पडू नाही दिला . खूप कष्टातून त्यांनी मला पुण्याला इंजिनिअरिंगला टाकतेय. त्यामुळे मी आप्पांच्या प्रस्तावाला नकार नाही देऊ शकणार. कदाचित तुझ्या लग्नाची चिंता मिटल्यामुळे काकांची तब्येत सुधारेल. औषधांना रिस्पॉन्स मिळेल. काकांना कांही कमी जास्त झाल्यास आप्पा त्यांना व मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. फार अवघडून गेलोय मी.” श्रीकांत बोलला.  

सुजाताच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ‘आपल्या बाबांसाठी हा तरुण स्वतःचे भविष्य पणाला लावतोय’ ही बाब तिच्यासाठी असाधारण होती. “हे पहा,” ती म्हणाली , ” माझ्या बाबांचा तुम्ही एवढा आत्मीयतेने विचार करताय. मला तर गुदमरल्यासारखे झालेय. मी एवढंच सांगते की मला तुम्ही तुम्हाला पाहिल्या दिवसापासून खूप आवडला आहात. आता तर अधिक आदर आणि अभिमान वाटतोय. तुम्ही जसे सांगाल तशी मी वागेन. तुम्हाला शिक्षण संपवून नोकरी लागेपर्यंत मी तुमच्याकडे ना कांही मागणार, ना कोणता हट्ट करणार , ना कसली तक्रार करणार. ना हॉटेल, ना सिनेमा, ना फिरणे, ना साड्या …. मी कसलीच मागणी करणार नाही. आप्पा व माईंच्या मी आज्ञेत राहीन. सध्या माझे बाबा हीच माझी प्रॉयोरिटी आहे. मी यापेक्षा अधिक कांहीच सांगू शकणार नाही.” आणि मुसमुसतच ती घरात पळाली.

श्रीकांतच्या मनातील मळभ दूर निघून गेले होते. त्याचा चेहरादेखील किंचित प्रसन्न झाला होता. सुजाता त्याच्या अपेक्षेपेक्षाही मॅच्युअर होती. तिचा तिच्या बाबांवर खूप जीव होता. असे म्हणतात की लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने आधीच स्वर्गात बांधलेल्या असतात. त्याचे प्रत्यंतर त्याला येत होते. त्याच्या भविष्याची कदाचित हीच मुहूर्तमेढ होती व म्हणून त्याने वडगाव ते बडोदा असा ध्यानी, मनी, स्वप्नी नसलेला प्रवास केला होता, यावर त्याने मनातल्या मनात शिक्का मारला आणि अचानक होणाऱ्या किंवा झालेल्या लग्नाबद्दल कॉलेजातील मित्रांना कसे तोंड द्यायचे? याची तो उजळणी करू लागला.

–  समाप्त 

मूळ लेखक – आनंद बावणे

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक लगीनगाठ…” भाग 2 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? जीवनरंग ?

☆ “एक लगीनगाठ…” भाग 2 – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

(मागील भागात आपण पाहिले –  यशवंत काकांची तब्येत सोडली तर घरातील वातावरण व सर्वांचे वागणे श्रीकांतला भावून गेले. त्या रात्री श्रीकांत रमेशच्या खोलीत लौकरच झोपी गेला. मात्र आप्पा, माई, काका आणि काकू बराच वेळपर्यंत गप्पा मारीत होते. आता इथून पुढे –

दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता झाल्यावर दहाच्या दरम्यान तिथला लक्ष्मी-विलास पॅलेस पाहायला जायचे होते. आप्पाना त्यात फार औत्सुक्य नव्हते, मात्र श्रीकांतला तो पहाण्यात खूप उत्सुकता होती. रमेश आणि सुजाता दोघेही बरोबर होते. काकांमुळे या दोघांनाही इथले कांही कर्मचारी ओळखत होते. काकांच्या त्या घरापासून अर्धा कि. मी. आत अंदाजे चारशे-पाचशे एकरातील निसर्गरम्य परिसरातील तो लांबीला अंदाजे पाचशे फूट , रुंदीला दोनशे फूट आणि तितकाच उंचीला असलेला प्रशस्त महाल म्हणजे जाणत्याना पडणारे एक स्वप्न असावे इतका तो देखणा होता. कांही कांही वास्तूंचे शब्दात वर्णन अशक्य असते, बस्स …पाहायचं आणि जेवढं डोळ्यात सामावेल तेवढं स्मृती पटलावर कोरून ठेवण्याचा प्रयत्न करायचा , एवढं करणं शक्य होतं. आप्पा तटस्थपणे पहात होते, माई विस्मयाने पहात होत्या व श्रीकांत जे दिसतंय त्याचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करीत होता. भारतीय, पर्शियन आणि इटालियन वास्तुकलेचा अद्भुत संगम असा तो महाल होता. आतून त्यांच्या नियोजित वापराप्रमाणे शैली व बाहेरून बव्हंशी इटालियन शैली असावी असे श्रीकांतला वाटले. सुजाता व रमेश त्यांना जे माहीत होते ते सांगत होते , पण त्या ऐकीव इतिहासाच्या पलीकडील ती बांधलेली, ठेवलेली, तासलेली, रंगविलेली कलाकृती होती. तिथल्या दर्शनीय वस्तू श्रीकांतने केवळ पुस्तकातून वाचलेल्या होत्या. नाही म्हणायला राजा रविवर्मा यांनी पुरुष आकारात साकारलेली व भिंतीवर माउंट केलेली धार्मिक चित्रे सर्वांच्या मनाचा ठाव गाठून गेली. धावत धावत सगळ्या तलवारी, भाले, स्टेच्यु, मूर्ती, वॉल हँगिंग, चित्रे, दगड, धोंडे, खडे, पुस्तके, राजांच्या वंशावळींचे माउंटिंग, सादर केलेली मांडणी, तिथली अनेक दालने, सगळे सगळे  पाहायला अडीच ते तीन तास लागले. जेंव्हा सर्वजण बाहेर आले, तेंव्हा  एखाद्या जादूनगरीतून आल्यासारखे त्या सर्वांना झाले. घरापर्यंतचे जाणे आणि दुपारचे भोजनदेखील लक्ष्मी-विलास च्या चर्चेत संपले.

सायंकाळी पाच वाजता चहा झाल्यानंतर आप्पानी एका गंभीर विषयाला तोंड फोडले. श्रीकांतच्या ध्यानी मनी नसलेला तो विषय होता. आप्पा बोलले ,

“श्रीकांत, आपण फक्त यशवंतला भेटायला आणि बडोदा पाहायला आलेलो नाही, तर आठ वर्षांपूर्वी तुझ्या आक्काच्या लग्नात ठरविलेले एक महत्वाचे वचन निभावायचे आहे व ते तुझ्या आयुष्याशी संबंधित आहे. खरे म्हणजे त्यासाठी आपण आलोय .”

श्रीकांतच्या कांहीच लक्षात नाही आले. तो थोडा सावरून बसला. यशवंत काकांनी सुजाताला व रमेशला  तिच्या खोलीत जायला सांगितले. त्यानंतर माई बोलली, ” श्रीकांत, त्यावेळी आम्ही खूपच अडचणीत होतो. यशवंत भाऊजी पुढे आले नसते तर आक्काचे लग्न मोडल्यात जमा होते. त्यांनी मदत केली हे खरेच, पण त्यावेळी ते सहज बोलून गेले की माझे पैसे मला परत मिळणार याची खात्री आहे. पण मला व्याज नको आहे. योग्य वेळी श्री साठी माझी मुलगी तुम्ही सून म्हणून पदरात घ्या. आम्ही यावर कांहीच बोललो नाही. मात्र  ‘ज्या त्या वेळी बघू ‘ असे तुझे बाबा मोघम बोलले होते. आता भाऊजी आजारी आहेत व त्यांना चिंता सुजाताच्या लग्नाची आहे. ही गोष्ट आम्हाला भाऊजीनी आधीच पत्रामध्ये कळविली होती. ‘आम्ही बडोद्याला येतो व तेंव्हा मुलांच्या इच्छेने ठरवू’ असे मोघम उत्तर तुझ्या बाबांनी दिले होते. तू दिवाळीला घरी येणार व त्यानंतर बडोद्याला यायचे त्यांनी आधीच ठरविले होते. मात्र मागील आठ वर्षात आम्हीही सुजाताला पाहिले नव्हते. आता दोन दिवस आपण एकत्र आहोत . आम्हा दोघांनाही सुजाता सून म्हणून पसंत आहे. भाऊजींचे म्हणणे आहे की श्री वर कोणताही दबाव नको. म्हणून ही बाब केवळ आपल्या पाचजणांत असेल. तू तुझे स्पष्ट मत द्यायला मोकळा आहेस. मात्र तू सर्व बाजूनी विचार करून निर्णय घ्यावास. तुझे शिक्षणाचे एक वर्ष अजून शिल्लक आहे व भाऊजीना त्यांच्या डोळ्यासमोर हे लग्न व्हावे असे वाटतेय. कारण त्यांचे हे अनिश्चित असलेले आजारपण. त्यांना स्वतःबद्दल भरोसा नाही आणि तुझ्या बाबांपुढे त्यांनी त्यांची व्यथा सांगितली आहे. तुझ्या आक्काच्या लग्नात जी आपली स्थिती होती, त्याच आर्थिक विवंचनेतून ते आज वाटचाल करताहेत. त्यांना तुझ्या बाबांकडून खूप आशा आहेत.”

सकाळच्या लक्ष्मीविलास पॅलेस च्या सुखस्वप्नातून श्रीकांतचे विमान अलगद त्याच्या संसाराच्या धावपट्टीवर उतरले. त्याच्यासाठी पटकन कांही उत्तर देणं शक्य नव्हतं. खरं म्हणजे तो त्याच्या आप्पांवर मनातून भडकला होता. पण ही गोष्ट आप्पानी किंवा माईने आधी सांगितली असती तर तो बडोद्याला आलाच नसता ! ही म्हातारी माणसे ‘आतल्या गाठीची असतात’ हेच खरे , तो मनोमन उसळला. त्याने सांगितले की ‘आप्पा, मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि हो…. रमेशला घेऊन जातो.’ आणि तो बाहेर पडला. पाच मिनिटांनी रमेश बाहेर आला व तो त्याला बोलला, “अरे चल … आपण पिक्चरला जाऊ.” रमेश ‘होय’ म्हणून पुन्हा घरात गेला व बाहेर आला. आणि दोघे निघाले. श्रीकांत थोडा विमनस्क होता, पण हे रमेशला दाखवणे जरुरीचे नव्हते. भटकताना रस्ता चुकू नये म्हणून केवळ त्याने रमेशला बरोबर घेतले होते. पाच-दहा मिनिटे दोघे चालले असतील. मध्येच तो बोलला , ” रमेश, जवळपास एखादे मंदिर आहे का रे. आपण तिथे जाऊन बसू थोडा वेळ “

रमेशने रिक्षा थांबवली व बोलला , ” काका, सुर्यमंदिर ला जायचंय .” आणि रिक्षा धावू लागली. रिक्षावाले काका रमेशच्या ओळखीचे असावेत. साधारण वीस मिनिटांनी रिक्षा थांबली. पैसे न घेताच रिक्षावाले काका निघून गेले. श्रीकांतला आश्चर्य वाटले. त्याने म्हटले , “अहो…. पैसे घ्या ना ….” काका हसले व निघून गेले होते.

“दादा, काका पैसे नाहीत घेणार. बाबांनी त्यांना मागे कधी चार वर्षांपूर्वी खूप मदत केली आहे. आता बाबांना दवाखान्यात नेताना, आणताना व रात्रीही हे काका आमच्यासाठी खूप वेळ देतात.” रमेश बोलून गेला.

सूर्य मंदिर खरंच खूप छान बांधलं होतं. कोणाही नवीन व्यक्तीने खुश व्हावं. पण श्रीकांतचं मन थाऱ्यावर असेल तर ना? अजून तिसऱ्या सेमिस्टर ची लास्ट टर्म आणि बी. इ च्या शेवटच्या वर्षाच्या दोन टर्म, खिशात स्वतःची कमाई शून्य, ‘बायको’ या विषयाबाबत मित्र-मंडळींमध्ये फक्त जोक आणि जोक्स केलेले दिवस आणि आप्पा म्हणताहेत ,” लग्न कर. तेही त्यांनी आधीच ठरविलेल्या मुलीशी . साला…. हे माझे आयुष्य आहे की आप्पांची मालमत्ता …. वाटेल ते ठरवायला ? साला…. ही सुजाता , हिच्या काय मनात आहे कुणास ठाऊक ? तिलाही अद्याप खूप शिकायचे असू शकते ना ? साला …. ही मोठी माणसे समजतात कोण स्वतःला? ” श्रीकांतच्या मनात असलेच असंबंध विचार येत होते व जात होते. रमेशबरोबर तो फक्त शरीराने होता. तो कुठेकुठे नेत होता व हा ‘देखल्या देवा दंडवत’  घालीत होता. पण सुर्यमंदिरा बाबत जे कांही रमेशने ऐकवले ते सगळे ‘नळी फुंकली सोनारे … इकडून तिकडे गेले वारे ‘  अशी श्रीची स्थिती होती . त्याने अचानक रमेशला विचारले , ” का रे , तुझ्या दीदीचे लग्न करणार आहेत हे तुला माहिती आहे काय? “

“बाबा आजारी पडल्यापासून सारखे हेच म्हणताहेत व त्यामुळे दीदी खूप गंभीर असते. बाबा आजारी पडल्यापासून तिने हसायचेच थांबवले आहे. तुम्ही घरात आल्यापासून बाबांच्या चेहऱ्यावर आम्हाला ‘हासू’ दिसले. नाहीतर ते गप्प गप्प असतात. त्यांना दिदीच्या लग्नाची चिंता असावी व त्यामुळे त्याना दिलेली औषधे देखील काम करीत नाहीत असे मला वाटतेय. पण सध्या तरी याबाबत कोणता उपाय नाही. कारण त्यासाठी आम्हाला तिकडे महाराष्ट्रात गावी जावे लागणार आणि स्थळे पहावी लागणार. मी एवढा लहान आहे की मला यातले कांही म्हणजे कांहीच समजत नाही .”

क्रमश: भाग २

मूळ लेखक – आनंद बावणे

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “एक लगीनगाठ…” भाग १ – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? जीवनरंग ?

☆ “एक लगीनगाठ…” भाग १ – लेखक – श्री आनंद बावणे ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

श्रीकांत कराडच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात होता. साल होते १९७४. त्याची पाचवी सेमिस्टर झाली व दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या. ड्रॉईंग, सबमिशन आणि स्टडीच्या जंजाळातून थोडासा मोकळा झालेला श्रीकांत आपल्या गावी म्हणजे वडगावला परतला. त्याला खरे म्हणजे या सुटीत  पाच-सहा दिवस मस्त झोप, खूपशी विश्रांती आणि शिवारातील शेतात मनसोक्त हुंदडायचे होते व अभ्यासाचा थकवा उत्साहात बदलायचा होता. तसे तो ठरवूनच गावी आला होता. पण ‘माणूस घडवितो आणि देव बि-घडवितो’ अशी एक इंग्रजी म्हण श्रीकांतने वाचली होती. त्याचे प्रत्यंतर त्याला आपल्या घरी नेमके याच दिवाळीला येईल , ही अपेक्षा नव्हती.

दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुगंधी तेल व उटणे लावून अंघोळ झाली , फराळ झाला आणि त्याच्या वडिलांनी म्हणजे आप्पानी त्याला विचारले,

“श्री, किती दिवस सुट्टी आहे रे ?”

“आप्पा , परीक्षा संपवून आलोय. त्यामुळे चांगले तीन आठवडे सुट्टी आहे . सुट्टीत मी शेतात काम करायचे म्हणतोय. ” श्रीकांत बोलला.

“ते ठीक आहे. पण परवा भाऊबीजेला तुझ्या आक्काकडे जाऊन ये. तिच्यासाठी व तुझ्या भाचरांसाठी कपडे आणलेत, तेच ओवाळणीला टाक. वाटल्यास एखादा दिवस रहा व लगोलग परत ये. माझा बडोद्याचा दोस्त यशवंता आजारी आहे व त्याला भेटायला मला जावे लागणार आहे. लांबचा पल्ला आहे व मी रेल्वेतून प्रवास नाही केलेला. तुला माझ्या सोबत यावे लागेल. तुझी आई तयार असंल तर तिला पण घेऊन जाऊ या. आलं का लक्षात ? “

” होय आप्पा, जाऊ या की. पण खर्च खूपच होईल. मी येईन बरोबर.” श्रीकांत बोलला.      

“आधी ते भाऊबीज तर करून ये. मग बघू कधी निघायचं ते .” आप्पा बोलले व तो विषय तिथेच थांबला.

श्रीकांत भाऊबीजेला आक्काकडे जाऊन आला. तिथे भाऊजीसकट सर्वांना त्याने कपडे दिले. आक्काने पण दुपारी गोडधोड आणि रातच्याला मस्त मटणाचा बेत केला. दुपारी आणि संध्याकाळी आग्रह करायला आक्काची नणंद सुरेखा होती. नुकतीच बारावी झालेली व नाकीडोळी नीटस , पण सावळ्या रंगातही उठून दिसणारी ती श्रीकांतच्या बळेच पुढे पुढे करीत होती. त्याची आक्कापण त्यासाठी तिला प्रोत्साहन देत होती. सगळ्यांच्या आग्रहाखातर तो भाचे कंपनीला घेऊन तिच्याबरोबर भाऊजींचे शिवार देखील बघून आला. थोडक्यात त्याचा वेळ झकास गेला. दुसऱ्या दिवशी त्याने आक्काला बाय बाय केले, पण बाकीच्यांच्या पेक्षा सुरेखाच जास्त वेळ हात हलवीत होती हे कांही त्याच्या नजरेतून सुटले नाही. बोलण्याचा ओघात त्याने आक्काला सांगून टाकले होते की आठवड्याच्या शेवटी माई आणि आप्पांच्या बरोबर तो बडोद्याला आजारी यशवंत काकाकडे जाणार आहे.

त्याच्या बहिणीला त्याबद्दल फार आश्चर्य वाटण्याचे कांही कारण नव्हते. ती काकांना श्रीकांतपेक्षा अधिक ओळखत होती व तिला ते काका आवडत ही होते. तिच्या लग्नात याच काकांनी पुढे होऊन आप्पाना खूप आर्थिक मदत केल्याचेही तिला माहीत होते. त्यामुळे सगळेजण काकांचा मनापासून आदर करीत होते.

श्रीकांत परत गावी आला व त्याने आक्काची , भाऊजींची खुशाली आप्पाना , माईला सांगितली. त्यावेळी आप्पा बोलले, ” यशवंत काका आजारी आहेत. तुझ्या आक्काच्या लग्नात यशवंत ने पुढे होऊन मला रुपये दहा हजार दिले होते. त्यामुळे तर आक्काचे हे मालदार स्थळ मला निभावता आले व तिच्या आयुष्याचे सोने झाले. यशवंतला त्याचे पैसे परत करण्यासाठीच आपण जातोय. त्याच्या बऱ्याच ऋणातून मला मोकळे व्हायचे आहे.”

श्रीकांतला बऱ्याच ऋणाचा अर्थ नाही समजला पण हे पैशाचे डिटेल्स आजच समजले. आक्काच्या लग्नावेळी तो दहावीत होता व पैशाचे व्यवहार त्याला कोणी सांगीत नव्हते. त्यावेळी नुकतीच दहावीची परीक्षा झाली असल्याने आक्काच्या लग्नात त्याने भरपूर मजा केल्याचे त्याला आठवत होते. यशवंत काकाही त्याला बाबांचे एक चांगले दोस्त म्हणून व लग्नात त्यांनी आप्पाना मदत केली होती म्हणून आवडत होते. काकांची सासुरवाडी बडोदा होती. तिथल्या गायकवाड वाड्यात त्यांचे सासरे कामाला होते व त्यांनी यशवंत काकांनादेखील तिथे नोकरी लावली होती. आता त्यांचे  सासरे नव्हते व त्या सर्व कुटुंबाचा भार यशवंत काकांवर होता. जे थोडेफार त्याच्या कानावर होते ते एवढेच होते. बडोद्याला माई-आप्पाना घेऊन जायचे म्हणजे पुण्याहून डायरेक्ट अहमदाबाद रेल्वे नव्हती. पुना ते मुंबई आणि मुंबई ते बडोदा असा प्रवास करणे आवश्यक होते. रिझर्वेशन करून गेल्यास कांही त्रास नव्हता. श्रीकांतने आप्पाना विचारून घेतले व पुण्याच्या मित्राला सांगून चार दिवसानंतरची तीन तिकिटे रिझर्व्ह केली. थोडक्यात सर्वांचा बडोदा प्रवास निश्चित झाला.

काकांचा आकरावीतील मुलगा रमेश त्यांना रेल्वे स्टेशनवर घ्यायला आला होता. घरी जाण्यासाठी रमेशने टांगा ठरविला होता. टांग्यातून ते घरी निघाले. श्रीकांतसारखा उंच, गोरा व बडबड्या रमेश श्रीकांतला आवडून गेला. त्याच्याकडून सर्वाना समजले की काकांना दवाखान्यातून घरी आणले होते . घरी काका, काकी, काकीची आई, रमेश आणि त्याची एक वर्षांनी मोठी असलेली बहीण सुजाता असे पाचजण होते. त्याचे घर चांगले पाच खोल्यांचे होते. गायकवाड वाड्यात यशवंत काकांना मान होता. अर्थात त्याला कारण काकांचे सासरे व दोघांचे प्रामाणिक काम होते. सरकारांच्या नियमानुसार मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार करीत होते व त्यामुळे सुजाता आणि रमेश उत्तम शिकत होते. सुजाता आता कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती. ती हुशार होती व घरी काकीना खूप मदतही करीत होती. तसे बडोद्यात मराठी बोलणारे लोक सरकार वाड्याच्या परिसरात बरेच होते. त्यामुळे तिथे कोणास परके वाटत नव्हते. हे सर्व श्रीकांतला रमेशने त्याच्या बडबड्या  व मोकळ्या स्वभावास अनुसरून टांग्याच्या घोड्याच्या टापांच्या आवाजात न विचारता सांगितले होते. श्रीकांतची व रमेशची गट्टी व्हायला त्यामुळे वेळ नाही लागला. टांग्यातून जाताना थोड्या अरुंद दहा-बारा फुटी रस्त्याने टांगा चालला होता. रस्त्याच्या बाजूला जुन्या पद्धतीच्या इमारती होत्या. जवळजवळ वीस मिनिटे झाल्यानंतर टांगा एका प्रशस्त रस्त्यावर आला. ही बहुतेक उच्चभ्रू लोकांची वस्ती असावी. चार-पाच मिनिटात टांगा एका प्रशस्त प्रवेशद्वारातून आत गेला. समोर दोनशे फूट अंतरावर एक वाडासदृश इमारत व त्याच्या दोन्ही बाजूला छान राहण्यासाठीच्या इमारती होत्या. त्यातील मोठ्या वाड्यापासून दूर असलेल्या इमारती जवळ टांगा थांबला. या इमारतीत देखील चार-पाच कुटुंबे रहात असावीत. इमारतीच्या बाहेर एक गोरटेली मुलगी साडीमध्ये उभी होती. रमेश बोलला, “माझी ताई तुम्हा सर्वांची बाहेर वाट पाहतेय . बहुतेक बाबांनी तिला पाठवले असावे “

टांग्यातून सगळेजण उतरले. रमेश व सुजाताने त्यांच्या सामानाच्या दोन बॅगा घेतल्या. श्रीकांतने दोन घेतल्या. माई आणि आप्पा सुजाताच्या मागोमाग निघाले. त्या इमारतीतील दोन नंबरच्या दरवाजातून सगळे आत गेले. आत यशवंत काका व काकी उभे होते. काकींच्या आई जुन्या लाकडी खुर्चीवर बसल्या होत्या. नमस्कार, क्षेम-कुशल झाल्यानंतर प्रवासाचा शीण घालवण्यासाठी हात-पाय धुणे झाले. चहा व कांदापोहे झाले. श्रीकांत आणि अप्पांची बॅग रमेशच्या खोलीत गेली. माईंची बॅग सुजाताच्या खोलीत गेली. काकीनी पाणी गरम करून ठेवले होते. आंघोळीची खोली एकच होती. त्यामुळे सर्वांची आंघोळ वगैरे आटोपायला चांगला दीड तास गेला. यशवंत काका व आप्पा बऱ्यापैकी बोलत बसले होते. श्रीकांतची आंघोळीची पाळी येईपर्यंत त्याने एक डुलकी घेतली, नंतर फ्रेश झाला , आंघोळ केली, नवीन स्वच्छ कपडे बदलले आणि तोही यशवंत काकाबरोबरच्या बोलण्यात सामील झाला. आता चांगले चार-पाच दिवस तिथेच काढायचे होते, ते कसे जाणार ही एकच चिंता त्याच्या मनात घर करून होती. बोलण्याच्या ओघात काकांना सौम्य हार्ट अटॅक आल्याचे व त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे समजले. कदाचित ऑफिसातील बैठ्या कामामुळे असेल, पण त्यांना दिलेल्या गोळ्यांवरून  त्यांची तब्येत नाजूक असावी असा कयास बांधता येत होता. सुजाता आणि रमेश दोघेही अभ्यासात हुशार होते. सुजाता बी कॉम.च्या पहिल्या वर्गात होती व रमेश आकरावीत होता. बारावीत मेरीटमध्ये येऊन त्याला इंजिनीअर व्हायचे होते. आप्पानी श्रीकांत समोर काकांना त्यांचे दहा हजार रुपये परत केले व त्यांनी मुलीच्या लग्नात केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. बडोद्याला आल्याचे मुख्य काम असे पूर्ण झाले होते. पहिला दिवस असा ओळखी, विश्रांती आणि एकमेकांचे क्षेमकुशल यातच गेला. यशवंत काकांची तब्येत सोडली तर घरातील वातावरण व सर्वांचे वागणे श्रीकांतला भावून गेले. त्या रात्री श्रीकांत रमेशच्या खोलीत लौकरच झोपी गेला. मात्र आप्पा, माई, काका आणि काकू बराच वेळपर्यंत गप्पा मारीत होते.

क्रमश: भाग १

मूळ लेखक – आनंद बावणे

संग्रहिका – सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ करामत… ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ करामत…  ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

शाळा सुटली ; पण नेहमीसारखी धमाल करावीशी वाटेना. कोणाबरोबर बोलावंसंही वाटेना. मग मी मित्रांना सोडून एकटाच निघालो.

तसं तर अधूनमधून आईचं आणि आजीचं भांडण होतच असतं. पण कालचं भांडण मात्र खूप मोठं होतं.

आता शनिवारी आजी-आजोबा गावच्या घरी राहायला जाणार.

मला आजी-आजोबा खूप आवडतात. आई-बाबांएवढेच.

आईबाबा रोज सकाळी ऑफिसात जातात, ते रात्री घरी येतात. दुपारी शाळेतून आल्यावर आजीआजोबांना बघितलं, की मला खूप बरं वाटतं. कितीही दमलो असलो, कंटाळलो असलो, तरीही मग मी शहाण्या मुलासारखे बूटमोजे काढून कोपऱ्यात ठेवतो, दप्तर जागेवर ठेवतो. कपडे बदलून युनिफॉर्म हँगरला लावतो. हातपायतोंड स्वच्छ धुतो. मग आम्ही तिघं जेवायला बसतो.

मला भेंडीची भाजी आवडत नाही, हे आजीला बरोब्बर ठाऊक आहे. म्हणून ती मला थोडीशीच भाजी वाढते. ती मी पटकन खाऊन टाकतो.

तर आता मला रडूच येतंय. सोमवारपासून मी घरी गेल्यावर आजीआजोबा नाही दिसणार.

कसं मिटणार त्यांचं भांडण? मी तर एवढुस्सा आहे. काहीच करू शकणार नाही मी. आईला सांगायला गेलं, तर ती मलाच ओरडणार आणि आजीशी बोलायला गेलं, तर ती म्हणणार, “बाळा, लहान मुलांनी मोठ्यांच्या मध्ये बोलू नये.”

ठीक आहे.आहे मी लहान. पण मला वाटलं –  सगळ्यांनी एकत्र राहावं, तर चूक आहे का ते?

तेवढ्यात आठवण झाली. सकाळी आई चिडून बडबडत होती, “या भांडणांनी डोकं नसतं थाऱ्यावर. शिवाय ऑफिसमधून यायला उशीर झालेला. मग लक्षातच नाही राहिलं, त्यांची औषधं आणायचं. इथे आहेत, तोपर्यंत आपली जबाबदारी आहे. तिकडे गावाला गेल्यावर त्यांनाच उठून जायला लागणार, तेव्हा कळेल.”

मी दूध पित होतो. एकदम मला सुचलं, “आई, मी आणू आजीची औषधं?”

“आणशील तू? बरं झालं. म्हणजे त्यांच्या दुपारच्या गोळ्या चुकणार नाहीत. हे घे पैसे. आणि हे प्रिस्क्रिप्शन. आणि उरलेले पैसे….”

“आई, मी उरलेल्या पैशांतून सुतरफेणी आणू आजोबांसाठी?”

आई काहीच बोलली नाही. म्हणजे ती ‘नको’ म्हणाली नाही. म्हणजे सुतरफेणी घ्यायची.

तर मी औषधांच्या दुकानात गेलो. काकांनी दिलेली औषधं नीट बघून घेतली. आईने मागे सांगितलं होतं, तसं त्यावरच्या तारखापण बघितल्या. बिलावरची बेरीज, उरलेले पैसे… सगळं मोठ्या मुलासारखं बघून, तपासून घेतलं.

मग शेजारच्या मिठाईवाल्याकडे गेलो. तिथे सुतरफेणी घेतली.

आजोबांना फक्त मऊ पदार्थच खाता येतात. घट्ट पदार्थ खावेसे वाटले, तरी ते खाऊ शकत नाहीत. सुतरफेणी तर त्यांची एकदम आवडती.

मी कधीकधी आजोबांना विचारतो, “आजोबा, मी तुम्हाला आवडतो?”

ते म्हणतात,”होsss.”

मग मी विचारतो, “किती?”

मग ते सांगतात, “खूssप.”

मग मी म्हणतो, “असं नाही, आजोबा. खूप म्हणजे किती, ते सांगा.”

मग आजोबा मला जवळ घेतात, माझा पापा घेतात आणि म्हणतात, “तू मला खूप खूप आवडतोस. अगदी सुतरफेणीपेक्षाही जास्त.”

आज मी त्यांना सांगणार आहे, “मी तुम्हाला सुतरफेणीपेक्षा जास्त आवडतो, ना? मग मला सोडून जाऊ नका. तुम्ही दोघंही इथेच राहा.”

मी घरी गेल्यावर बघितलं, तर आजी जेवायला वाढत होती. माझ्या ताटात खूप भेंडीची भाजी घातली होती. अगदी बटाट्याच्या भाजीएवढी. मग मी ठरवलं, आज भेंडीची भाजी असली, तरी सगळी भाजी खायची. नाहीतर आजीला वाईट वाटेल.

तेवढ्यात औषधांची आठवण झाली.

“आजी, ही घे तुझी औषधं.”

“अरे, तू आणलीस?”

“हो गं. काल आईला ऑफिसात खूप काम होतं ना? म्हणून तिला उशीर झाला आणि ती दमलीही होती. त्यामुळे औषधं आणायची राहिली. आज दुपारच्या गोळ्या चुकतील ना, म्हणून तिने मला आणायला सांगितलं. आणि हे बघ. आजोबांना आवडते, म्हणून तिने सुतरफेणी आणायला सांगितली.”

आजीच्या डोळयांत पाणी आलं.

“तशी गुणी आहे रे तुझी आई. ऑफिसमध्ये खूप काम, जबाबदारी, जाण्यायेण्याची दगदग…. दमून आल्यावर चिडचिड होते माणसाची. खरं तर, मीच समजून घ्यायला पाहिजे. आता नाही हो भांडायची मी.”

“मग तू इथेच राहशील ना? गावाला नाही ना जाणार?”

आजी काहीच बोलली नाही.

“आजी ss,”मी तिचा दंड धरून तिला हलवलं.

तरीही ती गप्पच होती.

“आजी, नको ना जाऊस मला सोडून.”

“नाही रे सोन्या. तुला इथे सोडून गेले, तर माझं लक्ष तरी लागेल का तिकडे? शिवाय मी गावाला गेले, तर ऑफिसातून आल्यावर घरातलं काम, तुझा अभ्यास…. सगळं तुझ्या आईवर, एकटीवर पडणार. झेपणार नाही रे तिला. तुझ्या बाबांना तर अजिबातच वेळ नसतो…”

आजीआजोबा इथेच राहणार, म्हणून मला एवढा आनंद झाला, की मला भेंडीची भाजीसुद्धा आवडली. मी आणखी मागून घेतली.

जेवून झाल्यावर हाततोंड धुतलं, तेवढ्यात आईचा फोन आला.

मग मी आईला सांगून टाकलं, “आई, आई, आजी म्हणत होती, तू खूप गुणी आहेस म्हणून. ती मला सांगत होती, तुला ऑफिसात किती काम असतं, जबाबदारीचं….”

“हो रे. त्यांना जाणीव आहे त्याची. कौतुकही आहे. माझंच चुकतं. मी उगाचच भांडत बसते त्यांच्याशी. यापुढे लक्षात ठेवीन मी आणि भांडणार नाही अजिबात.”

“मग आजीआजोबा गावाला…..”

“नाही, नाही. मी सांगेन त्यांना – इथेच राहा, म्हणून.”

“माझी शहाणी शहाणी आई!” असं म्हणून मी फोनवरच तिला पापा दिला.

 सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवघा देह आनंदला… श्री शशिकांत हरिसंगम ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ अवघा देह आनंदला… श्री शशिकांत हरिसंगम ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

गावातले मोठ्ठ सरकारी हॉस्पिटल. चांगलं चार पाच मजली. हॉस्पिटलच्या इमारतीवरील घड्याळतला काटा रात्रीच्या नऊ वर सरकला. तसे फ़ार काही वेळ झाली नव्हती पण बाहेर रास्त्यावर आज का कोण जाणे रात्रीचे बारा एक वाजले असावेत असे वाटणारी भयाण शांतता होती.

हॉस्पिटलच्या आत सर्व रोगी आपापल्या रूममध्ये आपापल्या कॉटवर पडले होते. काहीजण झोपी गेलेले, काही झोपण्याच्या तयारीत, काही कॉटवर बसलेल्या नातेवाईकांशी बोलत होते.

हॉस्पिटलमधल्या मोठ्या हॉल मधील  कोपऱ्यातील कॉटवर एक पेशंट अत्यवस्थ होता. त्यांच्या जीवाची नुसती घालमेल चालली होती. तो पेशंट सत्तरीच्या घरात असावा. चेहरा सुकलेला. डोळे खोल खोल गेलेले.

डॉक्टर शेजारीच होते त्या पेशंटच्या. त्याला तपासायला आले असावे. कॉट शेजारच्या टेबलावर त्याचे वैद्यकीय रिपोर्ट होते. ते पाहून अधिकच गंभीर होताना दिसत होते डॉक्टर. गेले पंधरा दिवस झाले औषधे, इंजकशनाने त्याला होतं असलेल्या जीवघेण्या वेदना कमी करण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत होते.तेथेच असलेली नर्स त्या पेशंटची खूप काळजी घेतं होती.

सारे आसपासच्या कॉटवरील पेशंट, डॉक्टर आणि ती नर्स काय समजायचे ते समजून गेली होती. डॉक्टरांनीनर्सच्या कानात काही सांगितले. हळुवार पावलांनी त्यांनी वार्ड सोडला.

रिसेप्शन काउन्टरवरला फोन उचलला. टेलेफोनची डायल फिरवली……

पठाणकोट लष्करी छावणीतला  फोन वाजला.

‘ मी डॉक्टर, मोकाशी, गव्हर्मेंट हॉस्पिटल मुबंईहून बोलतोय.’

‘ हां जी, मै कॅप्टन बालवरसिंग….’

‘ बालवरर्सिंगजी  ये देखो भाई  डॉक्टर मल्होत्राको फौरन मुंबई हॉस्पिटलमे भेज दो. पेशंट सिरीयस है. ‘

बोलून फोन खाली ठेवला.

त्या वृद्धाची अवस्था खूपच  वाईट झाली होती. डोळे उघडण्याचा निष्फळ प्रयत्न चालला होता त्याचा. ओठ हालत होते त्याचे पण ओठातून शब्द बाहेर येतं नव्हते. आपली एहलोकांची यात्रा संपत चालल्याचे त्याला त्या अवस्थेत कळले असावे. त्याचा जीव एकुलत्या एक मुलात गुंतला होता. त्याची अखेरची भेट व्हावी वाटत असावे त्याला. त्याचा चेहरा सांगत होता हे. मरणाच्या दारात माया माणसाला अडकवून ठेवते. माणसाच्या जवळ येत त्याला बिलगते.

औषध एका प्याल्यातून नर्सने त्या विकलांग पेशंटच्या ओठाशी लावले. औषध ओठातून गळून पडले.

नर्सने मनगटी घड्याळात पहिले. रात्रीचा एक वाजला होता. वार्डच्या दाराशी हालचाल झाली. नर्सने दाराच्या दिशेने पहिले….

डॉक्टर मोकाशी एक लष्करी जवानांस बरोबर घेऊन येतं होते.

नर्सने त्या विकलांग वृद्ध पेशंटच्या अंगावरील चादर नीट केली. डॉक्टर मोकाशी व जवान दोघेजण वृद्ध पेशंट जवळ आले. जवानाने पहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा हलली नाही. चकित झाले डाक्टर आणि नर्स. आपला वडील मरणासन्न आहे हे दिसत असूनही त्याची स्तब्धता जीव कापून गेली.

काही क्षणात त्या जवानाच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या.

‘ बाबा, तुमचा मुलगा भेटायला आला आहे.  ‘ म्हणत ओक्सबोकशी रडत जवान त्या पेशंटच्या अंगावर पडला.वृद्धाचा सुरकुत्या पडलेला हात आता

जवानाच्या पाठीवरून फिरू लागला.विकलांग वृद्धाच्या डोळ्यात आनंद धो धो वहात होता.किलकिल्या डोळ्यात तो विकलांग वृद्ध मुलाला साठवून घेतं होता. अस्पष्ट अस्पष्ट मुलांची आकृती दिसत असावी त्याला. त्या मुलाच्या अस्पष्ट दर्शनाने सुखावला होता तो. थरथरत्या ओठानी तो वृद्ध मुलाचे हात चुंबत होता. डोळ्यातून त्याचे दोन अश्रू टपकले  काना खालून त्या जवानाच्या  हातावर पडले

वृद्धाचे ओठ समाधानाने थरथरत होते. जवानांने आपला हात त्या वृद्धाच्या हाती दिला. वृद्धाचे डोके कपाळ कुरवाळू लागला. जवानांच्या खांद्यावरून फिरणाऱ्या वृद्ध हाताचा वेग मंदावत चालला… मंदावत .. मंदावत थाम्बला. वृद्धाने मान टाकली. जवानांने त्याचा हात वृद्धाच्या हातून सोडवला. वृद्धाकडे पहिले थोडेसे. चादर ओढून घेतली त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर.

त्या भयाण शांततेत घड्याळाची टिक टिक फक्त जीवघेणा आवाज करीत होती. वृद्धाच्या कॉट शेजारील  टेबलावरील औषधाच्या  अवाक होतं उघड्या पडल्या होत्या.

‘ सिस्टर, हा पेशंट कोण होता  ? ‘

त्या जवानांने विचारले. या प्रश्नाने त्या नर्सला धक्काचं बसला.

‘ हे काय तुमचे  वडील ना ते ? त्यांना ओळखत नाही ?

नर्सने प्रतिप्रश्न केला.

‘ नाही हे माझे वडील नाहीत. चुकीच्या माहितीमुळे मी इकडे आलो. आल्यावर मी जाणले. या वृद्धाची  काहीच मिनिटे राहिलीत. त्याला फक्त मुलाला अखेरचे भेटायचे होते. हे मला समजले. खरे सांगण्यात आता अर्थ नाही. त्यांच्या क्षीण झालेल्या दृष्टीला मुलगा ओळखता आला नाही. जवानच त्याचा मुलगा झाला.माझा हात त्यांच्या हाती दिला. हात हाती येताच समाधानाने त्याने प्राण सोडला.

जड अंतकरणाने तो जवान दवाखान्याच्या वार्डाबाहेर पडला. नर्स त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.

लेखक – श्री शशिकांत हरिसंगम

वालचंदनगर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(मी तुमच्यातलाच एक आहे,पण बाई म्हणून नाही जगणार !”) — इथून पुढे —

लक्ष्मी आणि इतर बायका बघतच बसल्या. “ अरे, तुला टोचा मारून मारून दुनिया जगू देणार नाही पोरा ! तुझ्यावर कधीतरी बलात्कार होणार, असे घाणेरडे आंबट शौकी लोक आहेत बाबा दुनियेत !”  

“ मावशी, तुम्ही वाचवाल ना मला? तुमच्यातला एक काहीतरी वेगळं करू बघतोय, तर मला द्या ना संधी. नाहीच जमलं तर आहेच, भीक मागत फिरणं हो.” लक्ष्मी, शबनम गहिवरल्या. त्यांनी श्यामची अलाबला घेतली. “ कर पोरा काय हवं ते ! आहे आमची वस्ती तुझ्यामागं. चला ग ! ए पोरा, लक्ष आहे आमचं तुझ्यावर. मोकळा सोडणार न्हाय.  न्हाय जमलं तर यावच लागलं झक मारत ! चला गं !’

श्यामने सुटकेचा निश्वास टाकला. सगुणा घाबरून त्या सगळ्यांकडे बघत होती. “ लेकरा,ह्याला मी जबाबदार आहे ! का घेतली मी असली औषधं आणि तुझा नाश केला रे.”

“ आई,असं म्हणू नको ! माझ्याच नशिबात हे होतं. एवढं होतं तर त्याच वेळी मारून टाकायचस गं. तुम्ही आणि मी सुटलो असतो.” उद्वेगाने श्याम म्हणाला. “ काय ग हे माझं आयुष्य. खेचराची जात आमची. धड  बाई नाही की धड पुरुष नाही. काय आहे ग मला भावी आयुष्य?”

 शामचा तोल सुटला. तो हुंदके देऊन रडायला लागला. “ आई,मी बाहेर शांत असतो, पण आत शंभर मरणं मरत असतो. मला लोकांसारखे साधे सरळ आयुष्य नाही. मरण सुद्धा नाही ग माझं नॉर्मल. कशाला मला जिवंत ठेवलंस? त्याच वेळी मारून टाकायचं ना!”

सगुणाने त्याला मिठीत घेतले. “नको लेकरा असं बोलू. कोणी नसेल तर मी जिवंत असेपर्यंत तुला आधार देईन. मला असं त्या लक्ष्मीसारख्या लोकांत नाही रे जाऊ द्यायचा तुला पोरा. निदान देवानं कला दिलीय हातात, तर उपयोग कर बाळा त्याचा. “

श्याम हळूहळू शांत झाला. त्याने डोळे पुसले, आणि कॉलेजला निघून गेला. श्याम सगळ्या परीक्षा उत्तम श्रेणीने पास झाला. त्याच्या हातात स्वयंपाकाची दैवदत्त कला होती. त्याने केलेले केक्स आणि त्याची डेकोरेशन्स भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावत.

अशीच शेवटच्या वर्षी  कुकिंगची स्पर्धा होती. दिल्लीहून मोठे मास्टरशेफ आले होते.

सर म्हणाले, “ श्याम, तू का भाग घेत नाहीस? तुला नक्की बक्षीस मिळेल. नाही मिळाले तर निदान या मोठ्या लोकांशी ओळखी तर होतील ना? आता हे शेवटचे वर्ष तुमचे ! भविष्याचा विचार करायला हवा तुम्ही मुलांनी.”

श्याम खिन्न हसला.म्हणाला, “ सर,तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलेत हेच खूप आहे हो माझ्यासाठी.. माझी टवाळी,कुचेष्टा नाही झाली आपल्या कॉलेज मध्ये.” 

सरांना भरून आले. “ श्याम,तू माझ्यासाठी एन्ट्री दे. कोणी काही का म्हणेनात. लक्षात ठेव, परीक्षकसुद्धा तुला हिणवतील, कुचेष्टा करतील, पण तू हरु नकोस. तुझ्या बोटातली जादू  येऊ दे जगासमोर ! “

वर्गातील मुलांनीही आग्रह केला आणि श्यामने घाबरत एन्ट्री फॉर्म भरला. त्याच्या वर्गातली टॉपर  शलाकाही होती  फॉर्म भरायला. “ श्याम, तू भरलास फॉर्म म्हणजे मी कसली येणार रे फायनल राऊंड पर्यंत !”

श्याम निष्पापपणे म्हणाला, ” शलाका, मी नको का भरू फॉर्म? तुला पुढे खूप चान्सेस आहेत ग ! माझं काय, मला अंधारच आहे बघ सगळा.”

शलाकाने त्याचे डोळे पुसले.” वेड्या, सहज कौतुकाने म्हणाले रे मी ! तू जिंकतोस की नाही बघच ही स्पर्धा. मी आहे की तुझ्याबरोबर! “ 

श्यामची प्राथमिक फेरीत निवड झालीच. त्याने केलेले दोन पदार्थ केवळ लाजवाब होते. त्याला सिलेक्ट केले तिथल्या तिथे. श्यामची खरी स्पर्धा सुरू झाली. कधी नावे सुद्धा न ऐकलेले पदार्थ आणि त्या कृती. वर प्रात्यक्षिक चालू असताना, धैर्य खच्ची करणाऱ्या परीक्षकांच्याच कॉमेंट्स. 

फिनालेपर्यंत पोचला श्याम. एव्हाना, टीव्हीवर बघणाऱ्या प्रेक्षकांना चांगलाच माहीत झाला होता श्याम.त्याचे उत्कृष्ट पदार्थ तर त्यांना  आवडूच लागले. कोणालाही सुचणार नाहीत असे पदार्थ तो दिलेल्या मोजक्या  सामानात आणि वेळात सहज करून दाखवी.

हळूहळू चेष्टा करणाऱ्या परीक्षकांचाही आवडता झाला श्याम. शेवटच्या तीन स्पर्धकात शलाकाही पोचली होती.

आज चार स्टार असलेल्या मिशेलिन शेफ कुणाल ने केलेला चार  मजली केक करून दाखवायचा होता. ५० मिनिटात कुणालने तो करून दाखवला. सामान, कृती आजीबात लिहिलेली नव्हती. सगळे नुसते लक्षात ठेवूनच ९० मिनिटात, पॅन्ट्रीतून सामान आणण्यापासून सर्व काही करायचे होते. 

 

बेल वाजल्याबरोबर सगळे धावत सुटले आणि सामान घेऊन आले. श्यामनेही कामाला सुरुवात केली. 

शेफ कुणाल जवळ आले, म्हणाले, “ काय श्याम ! इथपर्यंत मजल मारली खरी,पण बाकीचे दोन कॉम्पिटीटर कमी नाहीत बरं का. जरा चूक झाली तर घरी जायचे लगेच !”

श्याम शांतपणे  काम करत होता.

शेवटच्या पंधरा मिनिटात, मोठे मोठे शेफ स्पर्धा बघायला आमंत्रित केले होते. सगळीकडे बातमी पोचली होती —  एक तृतीयपंथी मुलगा फायनलपर्यंत पोचलाय. कौतुकमिश्रित कुतूहलाने सगळे वरच्या गॅलरीतून तिघांचे फायनल टचेस बघत होते.

तिघांच्यात शलाकाचा केक केवळ अप्रतिम झाला होता. लोकांना खात्री होतीच, शलाकाच विनर होणार म्हणून.

फायनल आईसिंग करताना शलाकाच्या लक्षात आले की,आपण आईसिंग शुगर विसरलोय. ती हताश झाली.  टीव्हीवर  लाइव्ह प्रोग्रॅम दाखवत होते. श्यामने कुणाल सरांना विचारले “ सर माझं सगळं काम झालंय. मी देऊ का उरलेली शुगर त्यांना?”

कुणाल हसले. म्हणाले, ” नो.इथे कोणी कोणाचे नसते श्याम ! अशी मदत  केलेली चालत नाही दुसऱ्या  कँडीडेटला. सो स्वीट आर यू डिअर.”

वेळ संपल्यावर तिघांचेही केक ट्रॉलीवरून नेऊन  परीक्षकांना दाखवले गेले. तीनही परीक्षकांनी  खाऊन बघितले आणि  कुणाल उठून उभे राहिले. ” श्याम मी कबूल करतो, तू आज हा केक माझ्यापेक्षा उत्तम करून दाखवला आहेस. तू जन्मजात शेफ आहेस खरा.” 

तिन्हीही परीक्षकांनी  एकमुखाने  शामचा केक उत्कृष्ट ठरवला. होताच तो सर्वोत्तम. श्यामला मास्टरशेफचा मानाचा कोट कुणालने चढवला. पंचवीस लाख रुपये आणि एक टीव्ही शो असे भव्य  प्राइझ त्याला मिळाले.

श्याम  हुंदके देऊन रडायला लागला. त्याची खेडवळ आई, वडील, भाऊ, सगळे  घाबरून,अंग चोरून प्रेक्षकांत बसले होते. 

श्याम म्हणाला, ” मी तृतीयपंथी आहे, हे मी कधीही लपवून  ठेवले नाही. देवाने आमच्यावर  फार मोठा अन्याय केलाय, पण मी त्याला कधी दोष  दिला नाही. आज त्याच देवाने, ही कला माझ्या हातात ठेवली आणि तुमच्यासारख्या लोकांनी माझे कौतुक केले. मला दुसरे काही नको. हे श्रेय माझ्या आईला देईन मी.  मला ती लहानपणापासून बरोबर स्वयंपाक करायला न्यायची. माझी आई अतिशय सुगरण आहे. कदाचित त्याचमुळे मी केटरिंग करायचा निर्णय घेतला असावा. आणि सर्वात महत्वाचे, शेफ नेहमी हॉटेलमध्ये आत असतो, लोकांसमोर थोडाच येतो?  मला  लोकांसमोर यावे लागणार नाही आणि मी असा असल्याने सतत किचन मधेच असेन –  हाही एक फायदाच की !”

 साधा सरळ श्याम लोकांना मनापासून आवडला. शामच्या आईची पण एक मुलाखत घेतली गेली. तेव्हा तर ती रडलीच. म्हणाली, “ या माझ्या लेकराने लई सोसलय हो लोकानो. किती अपमान, किती चेष्टा. शाळेतून पळून यायचं पोरगं. इथपर्यंत तुम्ही मायबापानी आणलं. असंच लक्ष राहू द्या.”

 श्यामचं नाव एका रात्रीत जगभर झालं. एक तर तो खरोखरच या सन्मानाला पात्र होता. आणि दुसरं म्हणजे, तृतीयपंथी लोकांप्रमाणे सहज हार न मानता, जिद्दीने त्याने कॉलेजशिक्षण  पुरे केले होते. 

—- आज ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला तृतीयपंथी होता.  

आज श्याम भारतात रहात नाही. त्याला मास्टरशेफ किताब  मिळाल्यावर देशोदेशी बोलावणी आली. श्यामने बँकॉक पसंत केले, जिथे त्याच्यासारख्या तृतीयपंथीयांना समाजात हीन लेखत नाहीत.

आज श्यामचे बँकॉकला मोठे स्टार हॉटेल  आहे, आणि त्यात मॅनेजरपासून ते वेटरपर्यंत फक्त आणि फक्त तृतीयपंथी लोकच काम करतात.

—  बँकॉकमधले अतिशय नावाजलेले अप्रतिम हॉटेल !! “ श्याम’स् हॉटेल !!!” 

— समाप्त —  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

।। गोष्ट अधल्यामधल्याची।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

लग्नानंतर अगदी दोनच महिन्यात दिवस गेले म्हणून सगुणाबाई अगदी नाराज झाली. तिला फार हौस, नटण्या मुरडण्याची, नवऱ्याबरोबर सिनेमाला जायची, जत्रेला जाऊन पाळण्यात  बसायची ! हे सगळं आता दिवस गेल्यावर  बंद पडणार, म्हणून तिला वाईटच वाटलं. सासू म्हणाली, ‘ का ग उगीच तोंड पाडून बसलीस? होतंय तर होऊ दे की  लगेचच. शेजारची रखमी मूल मूल करतीय आणि तुला नको म्हणायचा माज आलाय व्हय.’ 

सगुणी काहीच बोलली नाही. मुकाट्यानं  गेली परसात, कच्ची पपई खाल्ली, म्हणाली, ‘ जाईल पडून गर्भ. अजून तर दोन महिने पण नाही झाले.’ मग दुसऱ्या दिवशी चार अंडी खाल्ली. कोण जे सांगत होतं ते करत होती सगुणा. पण तो चिवट गर्भ काही पडेना. दिसामाशी तो वाढू लागलाच. नवराही शेवटी तिला रागावला, म्हणाला, ” काय ग चाललंय तुझं? दिलंय देवानं तर घे की मुकाट ! होतंय लवकर मान्य आहे पण तुला कुठं मोठं नोकरीला जायचंय ग? ”

  सगुणा काही बोलायची नाही, पण मनोमन तिरस्कारच केला  तिनं त्या गर्भाचा ! दिवस पुढे पुढे गेले,आणि त्या पोटातल्या बाळाने तिला खरोखर काहीच त्रास नाही दिला. योग्य वेळी सगुणा प्रसूत झाली. दवाखान्यात नर्सने डॉक्टरला बोलावून आणले. ‘ सर, तुम्हीच लवकर या. मला तर काही समजत नाहीये. ” डॉक्टर हा जगावेगळा निरोप ऐकून, तसेच रात्री दवाखान्यात आले. नर्स कोपऱ्यात उभी होती. ” सर,बाळ बघा ना ! “

 डॉक्टरांनी बाळ उघडे करून बघितले. त्या दुर्दैवी बाळाची दोन्ही लिंगे अविकसित होती. मुलगा, का मुलगी, हे त्यांनाही नीट ठरवता येईना. त्यांना अतिशय वाईटच वाटले. सगुणासारखी विचारत होती, 

” डॉक्टर, काय झालं मला? मुलगी असली तरी मला चालेल. नीट आहे ना माझं बाळ? “ डॉक्टराना तिला काय सांगावे हेच समजेना. होहो, छान आहे हं बाळ तुमचं, मग तुमचं आवरलं की देतो हं जवळ. ‘

  मुलांचे डॉक्टरही आले. त्यांनीही बाळ बघितलं. त्यांनी सगुणाच्या नवऱ्याला बोलावलं, खरी परिस्थिती सांगितली आणि म्हणाले,’ तुम्ही दोघे अजून तरुण आहात, तुम्हाला आणखीही अव्यंग संतती होईल. हे मूल  तुम्ही कसं सांभाळणार? माझा सल्ला असा की, काही संस्था अशी मुले फार चांगली सांभाळतात. त्यांना शिक्षण देतात. तिथे याची व्यवस्था होईल. विचार करा. तुमचे आणि त्यातही त्याचे आयुष्य त्याला घरी ठेवून वाया नका घालवू.”

सगुणा आणि तिचा नवरा म्हणाले, “ हे मूल असं झालं यात त्याचा काय दोष ? माझ्या बायकोला नकोच होता तो ! ती विषारी औषधे खाऊन तर नाही ना झालं असं?” डॉक्टर म्हणाले “ तसं काही नसतं. तुमच्या आणि त्याच्या नशिबात हे होतं. बघा,कसं काय करणार ?अवघड आहे हे. “

सगुणा खूप खूप रडली, स्वतःला दोष दिले, तिला खूप अपराधी वाटायला लागले.  मूल आपलं दिवसामाशी मोठं होत होतं. लहानपणी काही लक्षात येत नव्हतं पण मोठा झाल्यावर काय? सगुणा आणि नवऱ्याला या प्रश्नाने रात्रंदिवस झोप यायची नाही.

नंतर सगुणाला पुन्हा दिवस गेले. यावेळी,ती  शहाणी झाली. तालुक्याला जाऊन, सगळी नीट तपासणी करून आली. मूल छान  निर्व्यंग आहे, कोणताही दोष नाही, हे डॉक्टरांनी सांगितले.सगुणाला याही वेळेस मुलगाच झाला. पण किती नॉर्मल खणखणीत मुलगा .. त्या दोघांचे डोळे आनंदाने भरून आले. नवीन बाळ बघायला,  लहानगा श्यामही दवाखान्यात आला. आपला छोटा भाऊ बघून खूप आनंद झाला त्याला. याचे मात्र छान  बारसे  करून, राम नाव ठेवले, त्यांनी।

श्यामला  शाळेत घातले.  शाळेत आवडायचे  श्यामला. मन लावून अभ्यास करायचा श्याम आणि पासही  व्हायचा. जसजसा मोठा व्हायला लागला,तसतसा थोडा बायकी दिसायला लागलाच श्याम. पण तेही खूप लक्षात येण्यासारखा नाही. त्याला बायकी कपडे आवडत नसत., पण तरीही त्याच्यातले वेगळेपण लपत नसेच. 

रामची  वाढ नैसर्गिकरीत्या अगदी उत्तम होत होती. खेळात, मैदानावर अगदी उठून दिसायचा राम. श्याम स्वभावाने इतका चांगला होता, की त्याला कधी रामचा हेवा वाटला नाही की द्वेष.

श्याम घरी आईला मदत करायचा.त्याला स्वयंपाक करायला फार आवडायचा.चवही फार छान होती त्याच्या हाताला. सगुणाला अतिशय वाईट वाटे या मुलाचे. आपल्या मुळेच हे वैगुण्य आले या मुलात, असं म्हणत बसे ती.  निदान या छोट्या खेडेगावात, श्यामची चेष्टा तरी करत नसत मुलं. त्याचा गोड स्वभाव आवडायचा मुलांना.

श्याम मनाने खंबीर होता. त्याला आपल्यातले वैगुण्य चांगलेच माहीत होते. मोठा होऊ लागला, तसतसे हे वाढत जाणार होते. हॉर्मोनल बदल तर होणार होतेच. श्याम शक्यतो आरशासमोर उभा राहून,आपण बायकी हावभाव करत नाही, तसे चालत नाही हे बघत असे. थोडेसे आपोआप तसे होत असेच. पण ते अगदी प्रकर्षाने  लक्षात येण्यासारखे नव्हते.

सगुणाने शामला स्वयंपाक शिकवला. ती स्वतः फार सुगरण होती. गावात तिला खूपदा बायका कार्य असले की मदतीला बोलवायच्या. तिला पैसेही द्यायच्या. श्याम तिच्या हाताखाली तयार होऊ लागला. Ssc झाल्यावर श्याम म्हणाला, “ आई,मी पुण्याला जातो. तिकडेच बारावी करतो आणि मी कॅटरिंगचा डिप्लोमा घेतो.” 

सगुणा ला अतिशय वाईट वाटले. पुण्यासारख्या महासागरात या आपल्या असे वैगुण्य असलेल्या मुलाचा निभाव कसा लागणार? सगुणाने मनाशी निश्चय केला,आपण त्याच्याबरोबर पुण्यात राहायचे. राम आणि त्याचे वडील राहतील इथेच .

सगुणाने  गरीब वस्तीत भाड्याने खोली घेतली. ती लगेचच धुणीभांडी करू लागली. पुण्यासारख्या ठिकाणी तिला कामांना काय तोटा. हिला स्वयपाकाचीही चार कामे मिळाली. श्यामला केटरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. श्यामने पहिल्याच दिवशी वर्गात मुलांना सांगितले, “दोस्तहो! मी खूप ग्रामीण भागातून आलेला गरीब मुलगा आहे. मी तुमच्यातला नाहीये. मला समजून घ्या. तुमच्या लक्षात आलं असेल, मी  देवाने अन्याय केलेल्या त्या एक टक्क्यांपैकी आहे. यात माझा काय दोष? मलाही तुमच्यासारखे शिकू द्या. इतर  किन्नर लोकांसारखी मला सिग्नलला भीक नाही मागायची. कोणीतरी होऊन दाखवायचंय मला. शाळेत मुलं करायची रे चेष्टा, ‘ फलक्या, गणपत पाटील,’ पण मी लक्ष नव्हतो देत. मला सहकार्य कराल ना? एखाद्याला जन्मतः डोळे नसतात, कोणी मुके असतात, तसा मीही एक दुर्दैवी आहे.” बोलतांबोलता श्यामच्या डोळ्यात पाणी आले. क्लासमधील मुलं अतिशय  गंभीर होऊन हे ऐकत होती. हा साधा,पायजमा,शर्ट घातलेला मुलगा,आपण होऊन हे न लाजता सांगतोय, याने त्यानाही गलबलून आले.

 तो खूप बायकी नव्हता. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे, हे लक्षात आल्याशिवाय कसे राहील? वर्गातला भोसले उठून उभा राहिला.  मैदान गाजवलेला, खेळाडू होता भोसले. 

“ शाबास रे श्याम.  देतो आम्ही तुझ्या धीटपणाला आणि जिद्दीला. आम्ही सगळे तुझे मित्र आजपासून.काय ग पोरीनो,काय म्हणणे आहे तुमचे? ”

रेखा म्हणाली, “ भोसले, फार गोड आहे श्याम ! तुम्हीच त्याची पहिल्या दिवशी टिंगल  केलीत, पण आम्ही कधीच करणार नाही, केलीही नाही. श्याम, हे जाहीर सांगायचे धैर्य तुझ्यात आहे, हे केवढे मोठे आहे रे. खूप पुढे जाशील तू. आजपासून तू आमचा दोस्त.”

 शामला मनातून आनंद झाला. त्यांचा कोर्स सुरू झाला. पाठीमागे चर्चा होत असणार, हा मुलगा कोण, कसा..  पण श्यामने लक्ष द्यायचे नाही असंच ठरवलं होतं.

कमी त्रास नव्हता होत त्याला. वस्तीतही असा मुलगा आलाय,अशी बातमी पसरलीच. किन्नरांची टोळी टाळ्या वाजवत त्याला भेटायला आली. “ ए पोरा,कसलं करतो रे कालेज. ही दुनिया लै बेकार.. तुला काय जगू देणार व्हय. तू आमच्यातलाआहेस,आमच्यातच ये .बघ. ही रानी महिन्याला धा हजार कमावती. ही शबनम पन्द्रा. तू काय करतोस इथं? “

 श्यामने त्यांच्या पुढारी बाई लक्ष्मीला नमस्कार केला.

“ मावशी, तुमचं खरं आहे. पण मला साडी नाही नेसावीशी वाटत. मला कोणत्याही अनैसर्गिक भावना नाहीत. मला समजून घ्या मावशी ! काही गरज लागली, तर मी तुमच्याशिवाय कुठं जाणार? मी  तुमच्यातलाच एक आहे, पण बाई म्हणून नाही जगणार! “

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दिवा अन उदबत्ती …. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ दिवा अन उदबत्ती… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

वादळात अडकलेल्या एका पांथस्थाने जवळच्याच एका भग्न मंदिराचा आसरा घेतला.काळ्याकुट्ट ढगांनी सर्व परिसर झाकोळून गेलेला होता.कोणत्याही क्षणी आभाळ भुईवर उतरणार होतं अन कडाडणाऱ्या विजा प्रकाशाची वाट दाखवत त्यांना भुईवर उतरवणार होत्या.कुट्ट त्या अंधाराच्या मंदिरात पांथस्थास काहीच दिसेना.अडखळत चाचपडत तो कसाबसा गाभाऱ्याशी पोहचला.खिशातली काडीपेटी काढून तो काडी ओढायचा  प्रयत्न करू लागला पण सर्द पडलेला तो गुल पेटण्याचं नावच घेत नव्हता.अथक प्रयत्नाने एका काडीने शेवटी पेट घेतला.पांथस्थाला हायसे वाटले.त्याने इकडे तिकडे शोध घेतला. एका कोनाड्यात त्याला तेलाने भरलेला दिवा दिसला.हातातील आगीने त्याने दिवा पेटवला अन मूर्तीच्या पायाशी ठेवला.काळ्याकुट्ट पाषाणातील ती मूर्ती दिव्याच्या प्रकाशात उगीचच हसल्याचा त्याला भास झाला.त्याची नजर आता उदबत्तीस शोधू लागली ” दिवा आहे तर उदबत्तीही असणारच !” तो स्वतःशी पुटपुटला, इतक्यात मूर्तीच्या मागे त्याला उदबत्ती सापडलीच.दिव्यावर उदबत्ती पेटवून त्याने शेजारीच असलेल्या कपारीत खोचून दिली अन देवाला हात जोडून तो गाभाऱ्याबाहेर आला.गाभारा प्रकाश अन सुगंधाने भरुन गेला.त्या भयाण रात्रीत त्याला देवाचा सहारा मिळाला.थकलेला तो लवकरच निद्राधीन झाला.

सोसाट्याचा वारा ,कोसळता पाऊस अन विजांचे कल्लोळ चालूच होते.मध्यरात्र उलटली. दिव्याचे लक्ष सहजच स्वतःकडे गेले.रत्नजडित खड्यांनी मढलेले त्याचे रूप खासच सुंदर होते.त्याहून खूप सुंदर नाजूक नक्षी,उठावदार रंग, सुबक आकार त्याला खूपच आवडला.स्वतःच्या रूपाचा त्याला खूपच आनंद झाला आणि सौंदर्याचा अभिमानही !

शेजारी उदबत्ती जळत होती तिचं अस्तित्व काही क्षणांचं होतं. दिव्याला उदबदत्तीची कीव आली.

” काय ही उदबत्ती ! ना प्रकाश ना रूप ! काळा देह, हिला मुळी देखणेपण नाहीच!” तो स्वतःशीच पुटपुटला.त्याने उदबत्तीला न राहून विचारलेच,”काय गं उदबत्ती तुला माझ्या देखणेपणाचा जरासुद्धा मोह होत नाही का ? माझ्या सौंदर्याचा हेवा वाटत नाही का?”

तिने हसून उत्तर दिले ,” बिल्कुल नाही.ईश्वराने जे रूप मला दिलेय त्यात मी समाधानी आहे.प्रत्येकाला इथं नेमून दिलेले काम आहे अन आपण ते करायचे आहे ,एवढेच मला माहित आहे ;त्या पलीकडे मी जास्त विचार नाही करत.”

दिव्याला तिचं म्हणणं तितकंसं पटलं नाही तो तिला काही न काही म्हणतच राहिला अन उदबत्ती मौन बाळगून ऐकत राहिली.

इतक्यात सोसाट्याचा वारा सुटला आता मात्र दिव्याला आपला तोल सांभाळता येईना.उदबत्ती स्थिरपणे मंद मंद सुगंध दरवळत होती, अन …वाऱ्याचा प्रचंड झोत गाभाऱ्यात शिरला ! फडफडणारा दिवा क्षणात विझला.उदबत्ती शेवट पर्यंत जळत राहिली .

उत्तररात्री वादळ शांत झाले.पहाट होताच पक्ष्यांनी पंख झटकले.आभाळ निवळून निरभ्र शांत झाले.पांथस्थ उठला त्याला आता पुढं जायचं होतं.रात्रभर जीविताचं संरक्षण केल्याचे उपकार मानायला तो देवाच्या गाभाऱ्यात गेला. दोन्ही हात जोडून नतमस्तक होत उदबत्तीची राख त्याने भाळावर लेपली.बाजूच्या दिव्यावर काजळी साचली होती.त्याने दिवा उचलला व पुन्हा कोनाड्यात ठेऊन दिला .

रात्रभर प्रभू चरणाची सेवा करून कुणा सज्जनाच्या भाळावर मिरवत उदबत्ती दिमाखात पाऊले चालत राहिली अन दिवा अंधारल्या कोनाड्यात कुणा अवचित पांथस्थाची अभावीत पणे वाट पहात एकटाच  राहिला…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ममत्व… – श्री अशोक दर्द ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ ममत्व… – श्री अशोक दर्द ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर  

सावित्रीच्या मुलीच्या सासरहून फोन आला की पारोला मुलगा झालाय. आजी झाल्याच्या आनंदात तिने आसपास, परिचित नातेवाईक यांच्यामध्ये मिठाई वाटली. काही वेळाने मुलीचा फोन आला, ‘माझ्याकडे यायचं, तर आपला चांगला आब राखून ये. आपली इज्जत आणि प्रतिष्ठा वाढेल, अशी ये.’

पारोचं जेव्हा लग्नं ठरलं, तेव्हा मागणी तिच्या सासरच्यांकडून होती. त्यावेळी तिने आपले दागिने विकून आणि जी काही जमा-शिल्लक होती, ती काढून, मोठ्या थाटा-माटात तिचं लग्नं लावून दिलं होतं.

यावेळी मागणी तिच्या स्वत:च्या मुलीची होती. खरं तर पारोला आपल्या आईच्या परिस्थितीची चांगली जाणीव होती. सावित्रीने आपल्या दोन्ही मुलांना पारोच्या फोनबद्दल सांगितलं. पण दोघांनीही आपण स्वत:च पैशाच्या तंगीत आहोत, असं म्हणत हात झटकले. सावित्रीने मग आपल्या राहिलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या विकल्या. आपल्या नातवाला सोन्याची चेन केली. मुलीच्या सगळ्या परिवारासाठी कापड-चोपड घेतलं. फळांच्या आणि, मिठाईच्या टोपल्या घेतल्या आणि ती पारोकडे आली. पारोच्या सासरी तिची इज्जत वाचली पण ती जेव्हा घरी आली, तेव्हा तिच्यावर दु:खाचा पहाड कोसळला.

सावित्रीने आपल्या बांगड्या विकल्याचे ऐकून तिची मुलं आणि सुना अशा संतापल्या की वाद-विवाद, भांडणात ती दोन घास अन्नालाही महाग झाली. आता सावित्री मंदिरात सेवा करून आपला जेवणाचा आणि औषधापाण्याचा खर्च चालवते आणि तिथल्या धर्मशाळेच्या तुटक्या-फुटक्या खोलीत खंत करत आपलं म्हातारपणाचं ओझं वहाते.

इकडे मुलं आणि सुना सांगत फिरतात की आईला देवाची इतकी ओढ लागली आहे, आता ती घराच्या बंधनात बांधून राहू इच्छित नाही. ती आता संन्यासिनी झालीय. आता ती घरीदेखील येत नाही.

मूळ कथा – ममत्व  – मूळ लेखक – श्री अशोक दर्द  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ क्षमा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ क्षमा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

“क्षमा”…….!!!

पुण्याच्या आसपासचं गाव….कुटुंब ठिकठाक …एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन….. साहजीकच सुनेवर सर्व भार …. आधी किरकोळ कुरबुर…. मग बाचाबाची…. त्यानंतर कडाक्याची भांडणं…. सुनेचं म्हणणं…. घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका….. काम करुन हातभार लावा संसाराला ….. पण बाबा थकलेले….. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं… मुलानेही अडवलं नाही…

आले पुण्यात….कुणी म्हातारा म्हणुन काम देईना  आणि भुक जगु देईना…. भिक  मागण्यावाचुन पर्याय उरला नाही….

बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकुन  बाबा विचारायचे, येवु का रे बाळा घरी रहायला ?

“बाळ” म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण “हिला” विचारुन सांगतो…..

पण ….या बाबा घरी, असा निरोप बाळाकडुन कधी आलाच नाही…..!

आता बाबा अट्टल भिकारी झाले…..

झाले कि त्यांना केलं गेलं….. ?

अशीच भिक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली….

बोलताना बाबा म्हणायचे, डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो…. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणा-या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं…. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते…. कुणाचाच आधार नसतो म्हणुन…. तसंच हे म्हातारपण ….. झुकलेलं आणि वाकलेलं…. निष्प्राण वेलीसारखं…. !

बाबांची वाक्य ऐकुन काटा यायचा अंगावर माझ्याही…!

नाव पत्ता पिनकोडसहीत टाकुन पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं….नाहितर वर्षानुवर्षे पडुन राहतं धुळ खात पोस्टातच…. तसंच आमचं आयुष्य..! नाव पत्ता सग्गळं बरोबर पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणुन आम्ही इथं पडलेले….

असं बोलुन ते हसायला लागतात….

त्यांचं ते कळवळणारं हसु आपल्यालाच  पिळ पाडुन जातं…..

मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही… पण हे हसु खोटं आहे तुमचं… तर म्हणायचे… आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं…. हसण्याचं नाटकच केलं … आता या वयात तरी खरं हसु कुठुन उसनं आणु….???

मी निरुत्तर…. !

वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं  आयुष्य झालंय… कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं…. टोपलीत ठेवतं…. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली…. नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी,  शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय… सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा….?

बाबांच बोलणं ऐकुन मीच आतुन तुटुन जायचो….

काहीतरी काम करा बाबा , असं सांगुन मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती…. बाबा कामाला तयार नव्हते !

म्हणायचे , आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं…किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही ; पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील…. श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील…

नाटक असतं हो सगळं आयुष्यच …. प्रत्येकजण आपापली भुमिका पार पाडत असतं इतकंच…. !

इतकं असुनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच…. बॕट-या विकण्यासाठी त्यांना मदत केली…. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता… भिक  मागत नाहीत.

मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता…. !

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕट-या विकताना रस्त्यावर भेटले…. मला जरा बाजुला घेवुन गेले…. म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर …..

सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो…. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, “हिने” तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते…. पाया पडुन माफी मागायला तयार आहे… बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु.”

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला / सास-याला  भिक मागायला लावली…. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली….?

डाॕक्टर काय करु सल्ला द्या…

साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर हि वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु….. !

बाबा म्हणाले, डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगु ? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भिक मागताना…. चालेल तुम्हाला ?

मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवुन जाईन का ?अहो चुकतात तीच पोरं असतात….. माफ करतो तोच “बाप” असतो…..

अहो,  लहानपणापासुन प्रेम म्हणजे काय; माया म्हणजे काय , भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो….. त्यातुन तो किती शिकला माहिती नाही…. बहुतेक नाहिच शिकला, नाहितर ही वेळ नसती आली माझ्यावर…असो !

पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी “क्षमा” म्हणजे काय हे मला त्याला शिकवु द्या डाॕक्टर ….

आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला “क्षमा” करणार नाही…..

काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवु द्या मला डाॕक्टर …

असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत…

संग्राहिका – सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print