मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जराशी गंमत —… ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ जराशी गंमत —… ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

फक्त तुझ्या गंधाने 

मम मोह अनावर होतो

रसनेचा लगाम सुटतो 

मी सहज ओढला जातो।  

 

पाहुन पिवळी तव कांती

मी अति भुकेला होतो 

हातात यायच्या आधी 

नजरेने खाऊन घेतो। 

 

मग पाव पांघरूनी वरती 

लसणीची चटणी भरूनी  

तळल्या मिरचीच्या संगे

मी तुजला उचलून घेतो। 

 

प्रकृती स्वास्थ्य वाद्यांचा 

किती विरोध झाला तरीही 

हे प्रेम न माझे घटते 

आस्वाद तुझा मी घेतो।

बटाटवड्याचे एव्हढे अप्रतिम वर्णन आजपर्यंत कोणी केले नसेल

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला आवडलेली बोधकथा… भाग -2 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

मला आवडलेली बोधकथा… भाग -2 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

(आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत.” )

इथून पुढे —

“मी ताबडतोब ती औषधी घेतली. कारण त्याच्यामागे फक्त आपल्याला काही पैसे देणे हा उद्देश होता. परंतु आपण पैसे घेण्याला नकार दिला. ‘बस, ठीक आहे’ म्हणालात. जेव्हा मी आग्रह केला तेव्हा आपण म्हणालात की ‘ आजचे खाते बंद झाले आहे.’  मला काहीच समजले नाही. परंतू  या दरम्यान आपल्याकडे एक व्यक्ती आला. त्याने आपली चर्चा ऐकून मला सांगितले की, “ आजचे खाते बंद झाले म्हणजे वैद्य महाराजांना आजच्या दिवसाची घरेलू खर्चासाठी लागणारी राशी, जी त्यांनी भगवंताला मागितली होती, तेवढी भगवंताने त्यांना रोग्यांमार्फत दिली आहे. त्याशिवाय ते अधिक पैसे कुणाकडूनही घेत नाही. “ 

मी काहीसा परेशान झालो कारण मी माझ्या मनानेच लज्जित झालो. माझे विचार किती निम्न होते आणि हा सरलचित्त वैद्य किती महान आहे. मी जेव्हा घरी जाऊन पत्नीला औषधि दाखवली आणि सारा प्रसंग तिच्यासमोर उभा केला तेव्हा तिला भगवतदर्शनाचा आनंद झाला, तिच्या डोळ्यातून पाणी आले, मन भरून आले, आणि ती म्हणाली “ ते वैद्य म्हणजे कुणी व्यक्ती-माणूस नसून माझ्यासाठी तो देवतारूप माध्यम बनून आला आहे. आजवर एवढी सारी औषधी घेतली, एवढे वैद्य, हकीम, डॉक्टर झाले, आज मला माझ्या मनीची इच्छा पूर्ण करणारा भगवंत या वैद्याच्या रूपाने, या औषधी स्वरूपाने भेटला आहे. हे औषध माझ्या संततीसुखाचे कारण आहे, आपण दोघेही श्रद्धेने हे औषध घेऊ यात. “

कृष्णलाल वैद्याला पुढे सांगू लागला, “ आज माझ्या घरी दोन फूले उमलली आहेत. आम्ही दोघे पति-पत्नी हरघडीला आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. इतक्या वर्षात व्यवसायामुळे मला वेळच मिळत नव्हता की  स्वतः येऊन आपल्याला धन्यवादाचे  दोन शब्द बोलावे म्हणून. इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आहे आणि कार केवळ आणि मुद्दाम इथेच थांबवली आहे.” 

“ वैद्यजी आमचा सारा परिवार इंग्लंडमध्ये सेटल झाला आहे. केवळ माझी एक विधवा बहीण आणि तिची मुलगी इथे भारतात असते. आमच्या त्या भाच्चीचे लग्न या महिन्याच्या २१ तारखेला होणार आहे. का कोण जाणे जेव्हा-जेव्हा मी आपल्या भाच्चीसाठी काही सामान खरेदी केले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपली ती छोटीशी मुलगी यायची, आणि मग प्रत्येक सामान मी डबल खरेदी करायचो. मी आपल्या विचारांना, तत्वाला, मूल्यांना जाणत होतो, की संभवतः आपण हे सामान न घेवोत, परंतू असे वाटत होते की माझ्या सख्ख्या भाच्चीच्याबरोबर मला नेहमी जो चेहरा दिसत आहे, ती पण माझी भाच्चीच तर आहे. माझे तिच्याशी एक नाते त्या भगवंताने असे जोडले आहे, आणि म्हणून आपण त्या नात्याला नकार देणार नाही, कारण माझ्या भाच्चीबरोबर या भाच्चीचा ‘भात भरण्याची’ माझी ज़िम्मेदारी त्याने मला दिली आहे.”

वैद्याचे डोळे आश्चर्याने उघडेच्या उघडेच राहिले आणि सौम्य आवाजात म्हणाले, ” कृष्णलालजी, आपण जे काही म्हणत आहात ते मला काहीच समजेनासे झाले आहे, ईश्वराची काय माया आहे हे त्याचे तोच जाणे. आपण माझ्या ‘श्रीमती’च्या हाताने लिहिलेली ही चिठ्ठीबघा ” असे म्हणून वैद्यांनी ती चिठ्ठी कृष्णलालजींना दिली. —– तिथे उपस्थित सारे ती चिठ्ठी बघून हैराण झाले, कारण ” लग्नाचे सामान” याच्यासमोर लिहिले होते ”हे काम परमेश्वराचे आहे, त्याचे तोच जाणे “

कंपित आवाजात वैद्य म्हणतात, ” कृष्णलालजी, विश्वास करा की, आजपावेतो कधीही असे झाले नाही की  पत्नीने चिठ्ठीवर आवश्यकता लिहिली आहे आणि भगवंताने त्याची व्यवस्था केली नाही. आपण सांगितलेली  संपूर्ण हकीकत ऐकून असे वाटते की भगवंताला माहित होते की, कोणत्या दिवशी माझी श्रीमती काय लिहिणार आहे. अन्यथा आपल्याकडून इतक्या दिवस आधीपासून या सामान खरेदीचा आरंभ परमात्म्याने कसा करवून घेतला असता?–वाह रे भगवंता, तू महान आहेस, तू दयावान आहेस. मी खरंच हैराण आहे की, तो कसे आपले रंग दाखवतो आहे.”

चातकाची तहान किती | तृप्ति करूनि निववी क्षिती ||१||

धेनु वत्सातें वोरसे | घरीं दुभतें पुरवी जैसें ||२||

पक्कान्न सेवुं नेणती बाळें | माता मुखीं घालीं बळें ||३||

एका जनार्दनीं बोले | एकपण माझें नेलें ||४||

वैद्यजी पुढे म्हणतात, ” जेव्हापासून मला समजू लागले, केवळ एकच पाठ मी वाचला आहे. सकाळी उठून तुझी भक्ती करण्यासाठी मी अजून जिवंत आहे, म्हणून त्या परमात्म्याचे आभार मानायचे, संध्याकाळी आजचा दिवस चांगला गेला म्हणून त्याचे आभार मानायचे, खाताना, झोपताना, श्वास घेताना, असा हरघडीला त्याचे स्मरण करायचे, त्याचे आभार मानायचे. 

दळिता कांडिता | तुज गाईन अनंता ||१||

न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी ||२||

नित्य हाचि कारभार | मुखी हरि निरंतर ||३|| 

मायबाप बंधुबहिणी | तू बा सखा चक्रपाणि ||४|| 

*लक्ष लागले चरणासी | म्हणे नामयाची दासी |५||

— समाप्त —

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला आवडलेली बोधकथा… भाग -1 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

मला आवडलेली बोधकथा… भाग -1 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

एका जुन्या इमारतीत त्या वैद्याचे घर होते. घराच्या मागच्या भागात त्याने संसार थाटला होता आणि पुढच्या भागात दवाखाना. त्याच्या पत्नीची सवय होती कि, दवाखाना उघडण्यापूर्वी संसाराला लागणारी, त्या दिवसाच्या सामानाची एक चिठ्ठी, ती दवाखान्यात ठेवत असे. पूजाअर्चा करून वैद्य महाराज दवाखान्यात येत आणि भगवंताचे नाव घेऊन ती चिठ्ठी उघडत. पत्नीने ज्या गोष्टी त्यात लिहिल्या आहेत, त्यांच्यासमोर ते त्या वस्तूंचे भाव लिहीत असत आणि त्याचा हिशेब करत असत. 

नंतर मग परमात्म्याची प्रार्थना करून म्हणत, “हे दयाघना भगवंता, मी केवळ तुझ्याच आदेशानुसार, तुझी भक्ती सोडून, इथे या दुनियादारीच्या चक्रात येऊन बसलो आहे.” वैद्यजी कधीच आपल्या तोंडाने रोग्याला फ़ी मागत नसत. कुणी द्यायचे तर कुणी नाही, परंतु एक बाब निश्चित होती, कि त्या दिवसाच्या सामानाचा लावलेल्या हिशेबाची रक्कम पूर्ण झाली की, नंतर आलेल्यांकडून ते काहीच फी घेत नसत, मग तो येणारा रोगी कितीही पात्र आणि श्रीमंत असो. 

एक दिवस वैद्याने दवाखाना उघडला. गादीवर बसून परमात्म्याचे स्मरण करून पैशाचा हिशेब लावण्यासाठी चिठ्ठी उघडली आणि ते अवाक झाले, एकटक बघतच राहिले. काही क्षण त्यांचे मन भरकटले, डोळ्यासमोर तारे चमकायला लागले. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानी आपल्या मनावर नियंत्रण मिळवले. गव्हाचे पीठ, तेल-तूप-मीठ, तांदूळ-डाळ या सामानानंतर पत्नीने शेवटी लिहिले होते, “मुलीचे लग्न येत्या २० तारखेला आहे, तिच्या लग्नाला, हुंड्याला लागणारे सामान”.

काही वेळ विचार करून बाकी सगळ्या सामानांची किंमत लिहून लग्नाला लागणाऱ्या सामानासमोर त्यांनी लिहिले, “हे काम भगवंताचे आहे, तो जाणे आणि त्याचे काम जाणे.” 

नेहेमीप्रमाणे काही रोगी आले, त्यांना वैद्यांनी औषधी दिली. या दरम्यान एक मोठीशी कार त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन थांबली. वैद्यांनी काही खास लक्ष दिले नाही, कित्येक कार त्यांच्याकडे येत असत. आधी आलेले रोगी औषधी घेऊन चालले, गेले. तो सूटा-बुटातला साहेब कारमधून बाहेर आला आणि नमस्कार म्हणत बेंचवर बसला. वैद्य म्हणाले, “आपल्याला जर औषधी पाहिजे असेल तर आपण इकडे स्टूल वर या म्हणजे मी आपली नाड़ी परीक्षा करू शकेन आणि कुणा इतरांसाठी औषधी हवी असेल तर रोगाचे, स्थितीचे वर्णन करा.”

ते साहेब म्हणू लागले, ” वैद्यजी, तुम्ही मला ओळखले नाही का? माझे नाव कृष्णलाल आहे. आणि आपण तरी कसे ओळखणार, कारण मी १५-१६ वर्षानंतर आपल्याकडे आलो आहे. आपल्याला मी आपल्या मागच्या मुलाखतीबद्दल सांगतो, म्हणजे सारे काही समजून येईल. जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा मी स्वतःहून आलो नव्हतो, खरे तर ती ईश्वरी योजनाच होती. ईश्वराला माझ्यावर कृपा करण्याची इच्छा झाली होती, कारण त्याला माझे घर आबाद करायचे होते, माझ्या जीवनात भरभरून सुख आणायचे होते. आणि आपली ती पहिली भेट आठवली की, आज देखील ईश्वराच्या त्या साहजिक कृपेच्या प्रसंग आठवणीने, मी विनम्र होतो, नतमस्तक होतो, नि:शब्द होतो. “

“ झाले असे होते की, मी आपल्या पैतृकांच्या घरी जात होतो. अगदी आपल्या दवाखान्याच्या समोर माझी कार पंक्चर झाली. ड्रायव्हर कारचे चाक काढून पंक्चर काढायला गेला. आपण बघितले की, मी उन्हामध्ये कारजवळ उभा आहे. आपण माझ्याजवळ आलात आणि दवाखान्याकडे बोट दाखवून आत यायला विनंती केली, इथे खुर्चीमध्ये सावलीत बस म्हणून म्हणालात. आंधळ्याला काय दोन डोळेच पाहिजे असतात, मी खुर्चीमध्ये येऊन बसलो. आपण मला यथोचित गूळ-पाणी देऊन तृप्त केले. का कोण जाणे पण ड्रायव्हरने देखील काही जास्तच वेळ घेतला होता. दुपार झाली होती. एक छोटीशी मुलगी आपल्या गादीपाशी उभी होती आणि म्हणत होती, “चला ना बाबा, मला भूक लागली आहे.” आपण तिला म्हणत होता, ‘ बाळा थोडा धीर धर,, जाऊयातच आपण. ‘ “ 

“ मी हा विचार केला की इतक्या वेळचा आपल्याजवळ बसलो आहे आणि माझ्यामुळे आपण जेवायला देखील जाऊ शकत नाहीत. म्हणून काहीतरी औषधी विकत घेऊन टाकू, म्हणजे माझ्या बसण्याचा भार हलका होईल, काही उद्देश प्राप्त होईल.  मी आपल्याला बोलता बोलता म्हणालो, “वैद्य महाराज, मागच्या ५ – ६ वर्षांपासून मी इंग्लंडमध्ये राहतो, व्यवसाय करतो तिथे. इंग्लंडला जाण्यापूर्वीच माझे लग्न झाले आहे, पण संतती-सुखापासून मात्र अजून वंचित आहे. इथे भारतात देखील बरेच इलाज केले, तिथे इंग्लंडमध्ये देखील दाखवले, पण पदरी निराशाच पडली आहे. “ 

“आपण म्हणालात, ” भगवंतापासून निराश होऊ नका, तो अत्यंत दयाळू आहे, तो खूप मोठा दाता आहे. आपण म्हणालात, लक्षात ठेवा त्याच्या कोषागारात कशाचीही कमी नाही. कशाचीही आस तो पूर्ण करतो. संतती, धन-दौलत, इज्जत, सुख-दुःख, जीवन-मृत्यु, सारे काही त्याच्याच हातात आहे. ते कुणा वैद्य किंवा  डॉक्टरच्या हातात नसते. ते कोणत्या औषधाने मिळत नाही. जे काही व्हायचे असते ते सारे भगवंताच्या आदेशाने होत असते. संतती जरी द्यायची असेल तरी दाता तोच आहे.” –  आजदेखील तो प्रसंग जशाच्या तसाच माझ्या नजरेसमोर आहे. माझ्याशी हे सारे बोलत असताना, आपण एकीकडे औषधाच्या पुड्या बांधत होतात. सगळ्या औषधी आपण दोन भागात विभाजित करून, दोन वेगवेगळ्या पाकिटात टाकल्या, आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत.” 

– क्रमशः भाग पहिला. 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नाव नसलेले भांडे….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “नाव नसलेले भांडे….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

पूर्वी घराघरात एक पद्धत अस्तित्वात होती. ती पद्धत म्हणजे दुकानातून घरात वापरायची कोणतीही भांडी आणली की ती दुकानातून आणतांना त्यावर नावे घालून आणायची. भांडे लहान वा मोठे प्रश्नच नसे, त्यावर नांव हे असलेच पाहिजे. समजा बायको सोबत नसतांना नवरा एकटा दुकानात गेला व गरजेचे भांडे घेतले व घरी आला की गृहिणी भांडे नंतर पहायची. आधी त्यावर नांव काय घातले आहे की नाही ते पहात असे. त्या भांड्यावर तिला तिचे नांव दिसले की देव भेटल्याचा आनंद मिळत असे. नांव जर दिसले नाही तर मात्र काही खरे नसे, ती आल्या पावली नवऱ्याला परत दुकानात पाठवून त्यावर नांव घालून आणा असे सांगत असे किंवा स्वत: जाऊन नांव घालून आणून मगच ते वापरायला सुरवात करीत असे.  आजही तुमच्या घरात नांव घातलेली खूप भांडी असतील पहा.

लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे, नांव घातलेली व नांव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देण्या घेण्यासाठी वापरली जात असत. अशी ही नांव नसलेली भांडी या हातातून त्या हातात, या घरातून त्या घरात नुसती फिरत रहायची, उपयोग काहीच नाही.

असो हे सारे आले कशावरुन तर नांवावरुन. आता ती भांडी जरा घडीभर बाजूला ठेवा व विचार करा.  आपला देह हे एक पंचमहाभूतांनी बनलेले भांडेच आहे. ते जन्माला येते तेव्हा त्यावर काही नांव नव्हते. ते असेच फिरत फिरत आपल्या घरात आले, मग त्या देहाला नांव दिले जाते ते मरेपर्यंत रहाते.  पण देह संपला- नांव संपले – व बिना नावाचा आत्मा पुन्हा योनी योनीतून फ़िरायला जातो.

आता ही पळापळ थांबायला उपाय काय सांगितला आहे..? आपल्या संत, सत्पुरुष, गुरु, सद्गुरु, समर्थांनी सांगितले आहे की, ‘ जमेल तेव्हा जमेल तसे जमेल तितके देवाचे नाव घे. म्हणजे काय होईल ? देह पडला तरी देवाचे नाव तुझ्यासोबत येईल. ते नांव देवाने पाहिले की देव म्हणेल याच्यावर माझे नाव आहे, याला माझ्या घरात पाठवा. ज्या भांड्यांवर माझे नांव नसेल त्यांना पाठवून द्या या घरातून त्या घरात –  म्हणजे या योनीतून त्या योनीत फ़िरायला.’ 

आपले काय होते माहिती आहे का ? आपण म्हणतो जमेल तसे, जमेल तेव्हा, जमेल तिथे नांव घे, नाम घे असे सांगितले आहे.  झाले– आपण पळवाट शोधण्यात पटाईत. आपण म्हणतो जमेल तसे ना ! अहो नाही जमले त्याला आम्ही काय करणार. मग देव म्हणतो– हरकत नाही मग रहा फिरत निवांत घरोघरी, या योनीतून त्या योनीत….. 

नाम घे असे देव कधीच सांगत नाही, तो म्हणतो हे सांगायचे काम मी माझ्या प्रतिनिधींना म्हणजे संत, सत्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थ यांना दिले आहे व ते काम ही मंडळी चोख करतात. माझे काम फ़क्त भांडे माझ्याकडे आले की त्यावर नांव आहे का ते पहायचे. नांव असेल तर माझ्यापाशी ठेवायचे व नांव नसेल तर पुढील प्रवासाला पाठवणे.

बघा –  वाचा –  व विचार करा. 

लेखक – अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असं कुठं असतं का देवा ?… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ असं कुठं असतं का देवा ?… लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी

चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर

जन्म दिलास माणसाचा..

हाच एक जन्म जिथून

मार्ग खुला मोक्षाचा….. 

 

दिलंस एक मन त्यात

अनेक विचारांचा वावर..

आणि म्हणतोस आता

या विचारांना आवर…… 

 

दिलेस दोन डोळे

सौंदर्य सृष्टीचे बघायला..

आता म्हणतोस मिटून घे

आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला…… 

 

नानाविध चवी घेण्यास

दिलीस एक रसना..

आणि आता म्हणतोस

अन्नावर ठेवू नकोस वासना…… 

 

जन्मापासून नात्यांच्या

बंधनात अडकवतोस..

बंध सगळे खोटे असतात

असं आता म्हणतोस…… 

 

भाव आणि भावनांचा

इतका वाढवतोस गुंता..

आणि मग सांगतोस

व्यर्थ आहे ही चिंता…… 

 

संसाराच्या रगाड्यात

पुरता अडकवून टाकतोस..

म्हणे शांतपणे ध्यान कर आता

अशी कशी रे मजा करतोस ?…… 

 

मेजवानीने भरलेले ताट 

समोर बघून उपास करायचा..

हाच अर्थ का रे

सांग बरं मोक्षाचा ?…… 

 

वर बसून छान पैकी

आमची बघ हो तू मजा..

पाप आणि पुण्याची 

मांड बेरीज आणि वजा…… 

 

माहीत नाही बाबा मला

मिळेल की नाही मोक्ष..

तू जवळ असल्याची फक्त

पटवून देत जा साक्ष……….. 

लेखक : अज्ञात…🙏 

संकलन : सुश्री नेहा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆”वपु यांच्या लेखनातली काही विचारपुष्पे  —…” ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 “वपु यांच्या लेखनातली काही विचारपुष्पे  —…”  🍃 प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

व. पु. काळे सरांच्या कथा आणि कादंबऱ्यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात.

त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे सर्व वपुप्रेमींना समर्पित…..

१) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात 

२) सर्वात जीवघेणा क्षण कोणता? — खूप सदभावनेने  एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच  यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. 

३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. 

४) प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. 

५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो.

६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो. 

७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते. 

८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा. 

९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही. 

१०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे. 

११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त “बापच” विकत घेऊ शकतो.

१२) खर्च केल्याचे दुःख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

१३) सर्वात जवळ असणाऱ्या माणसाने धोका दिल्याशिवाय जाग येत नाही. 

१४) नातवंडं झाल्यावर म्हाताऱ्याचा विरोध बोथट होतो म्हणतात. 

१५) माणसाने समोर बघायचे का मागे – यावरच पुष्कळसं सुख दुःख अवलंबून असते. 

१६) मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येते, स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचा मन.

१७) लोक खरं  मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात.

१८) आपल्याला वाटतं तितकं आपण स्वतंत्र नसतो.

१९) समजूत घालायला कोणी नसले की स्वतःलाच बळ आणावं लागतं. . 

२०) अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्टीत जास्त आनंद असतो. नाही का?

२१) जो गेल्यानंतरच कळतो त्याला “तोल” म्हणतात.

  •  वसंत पुरुषोत्तम काळे 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लोकमान्य टिळक, चिमण्या आणि मंडाले तुरुंग… ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ लोकमान्य टिळक, चिमण्या आणि मंडाले तुरुंग… ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

लोकमान्य टिळकांची राजद्रोहाच्या दुसऱ्या शिक्षेत मंडाले तुरुंगात रवानगी झाली आणि काही महिन्यातच त्यांच्या सहृदयी स्वभावाचा अनुभव तुरुंगातील कैदी, तुरुंग अधिकारी आणि चक्क चिमण्यांनी सुद्धा घेतला.

लोकमान्य, त्यांना तुरुंगातून मिळणाऱ्या शिध्यातील धान्य, म्हणजे कधी डाळ तर कधी तांदूळ चिमण्यांना खायला घालत असत आणि किती तरी वेळ त्यांच्याकडे बघत असत. काही दिवसातच चिमण्यांना त्यांचा इतका लळा लागला की त्या थेट या सिंहाच्या अंगाखांद्यावर खेळत कलकलाट करू लागल्या !!!!  असे काही दिवस सुरू राहिल्यावर त्या धीट झाल्या आणि खोलीत येऊन पुस्तकांवर व टेबलावर बसू लागल्या. कधी लोकमान्य जेवत असताना त्यांच्या ताटाभोवती देखील त्या गोळा होत.  एकदा या चिमण्या टिळकांच्या खोलीत असताना तुरुंग अधीक्षक तेथे आला आणि हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. लोकमान्य त्याला म्हणाले – “ आम्ही त्यांना खात नाही, आम्ही त्यांना घाबरवत नाही. उलट त्यांना खायला धान्य देतो, त्यामुळे त्या आम्हाला घाबरत नाहीत. “ . तुरुंग अधीक्षकाला या प्रसंगाची मोठी गम्मत व आश्चर्य वाटले.

काही वर्ष हा क्रम सुरु होता, टिळकांची आणि चिमण्यांची आता गट्टी जमली होती.  लोकमान्यांसाठी, नियुक्त केलेला स्वयंपाकी  (वासुदेव रामराव कुलकर्णी ) सातारा जिल्ह्यातील – कलेढोण गावचा राहणारा होता. 

चिमण्यांच्या थव्याच्या मध्यभागी ध्यानस्थ बसलेले टिळक एखाद्या तपस्व्यासारखे वाटू लागले. सहा वर्षाची शिक्षा आता संपत आली होती, लोकमान्य टिळकांना आता घरचे वेध लागले होते. काहीशा परकेपणाने ते आपल्या कोठडीकडे पाहत होते. ठरलेली वेळ झाल्यावर चिमण्या किलबिलाट करू लागल्या. त्यांच्या खाण्याची वेळ झाली होती. टिळक उठले आणि ममतेने त्यांनी चिमण्यांना दाणे घातले आणि म्हणाले – 

— “ यापुढे इतक्या विश्वासाने इथे येऊ नका, कारण इथला नवा रहिवासी कदाचित तुम्हालाच गट्ट करून टाकणारा असेल. “ 

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं… 😎☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

१. त्यांचं आडनाव आयुष्यभर एकच असतं.

२. त्याचं फोनवरचं संभाषण ३० सेकंदात संपतं.

३. ५/६ दिवसांच्या सहलीसाठी त्यांना एक जीन्स पुरेशी असते.

४. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं तरीही त्यांची मैत्री टिकून राहते.

५. आयुष्यभरासाठी त्यांची एकच hair style टिकून राहते.

६. २५ नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तर त्यांना २५ मिनिटे पुरतात.

७. एखाद्या पार्टीला गेल्यावर दुसऱ्या माणसाने same शर्ट घातलेला बघून त्यांना मत्सर वाटत नाही. उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र बनून जास्त एन्जॉय करतात.

थोडक्यात काय तर  ……

पुरुष हे बटाटयाप्रमाणे असतात — कोणत्याही भाजीबरोबर एडजेस्ट होतात. 

बटाटे कुठले !!!!!!

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक वेगळं ज्ञान” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक वेगळं ज्ञान ” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कामानिमित्त लोहाराकडे गेलो असता,

काम झालं, आणि त्याला सहज विचारलं की 

“बाबा, ऐरण व हातोडी ही तुमची साधने ! तर किती वर्ष झाली हातोडी व ऐरणीला?”

*

लोहार म्हणाला, “हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण कायम टिकून आहे”

मी विचारलं, “असं का ?”

त्यावर लोहाराने जे उत्तर दिले ते जणू मला जगण्याचा अर्थच सांगून गेले. 

लोहार म्हणाला—  

“जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ते कायम अभंग राहतात !”

*

मनोमन त्याला राम राम करून निघालो — 

— एक वेगळं ज्ञान घेऊन !

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ || अखेर भीती संपली ||… लेखक : अस्मिता (वार्ताहर) ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ || अखेर भीती संपली ||… लेखक : अस्मिता (वार्ताहर) ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

|| एकदा आपल्या मुलींना यांच्या जागेवर ठेऊन पाहूयात???…..अखेर भीती संपली ||

आज दादर प्लॅटफॉर्म बाहेर तिकीट काउंटर येथे सहा शिकणाऱ्या मुली जमिनीवर अंथरलेल्या एका बॅनरवर बसलेल्या, त्रस्त असलेल्या, चिंतीत व भयभीत अवस्थेत दिसल्या.. 

मुंबईत हे दृश्य सायंकाळच्या 7.30 ते 8.00 च्या वेळेचे होते… या मुली बाहेर जमिनीवर अश्या का बसल्या आहेत ? विचारणा केली असता किती वाईट व्यवस्था व भीतीदायक परिस्थिती आहे हे कळाले…. 

आपल्या गांव खेड्यातून येणाऱ्या एकट्या मुलींसाठी ही किती गांभीर्याची बाब आहे …… ( सदिच्छा मनीष साने, ही MBBS शिकणारी तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली असता एकाएकी बेपत्ता होते आणि मग तिचा खून या घडलेल्या घटनेनेही आपण सावध अजूनही नाही कसे????) …हे मुंबईत घडत असताना आपण इतके निष्काळजी कसे ?????…..

अश्या अनेक मेहनती मुली आपल्या कुटुंबीयांचे आधार असतात….मुंबईत एकट्या येतात परीक्षा देतात आपल भवितव्य घडविण्यासाठी….

नाशिक जिल्ह्यातून अश्याच या सहा मुली मुंबईत नायगांव येथे पोलिस भरती परीक्षेला आलेल्या आहेत, आपल्या आई वडिलांच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या घरी वाट बघत असलेल्या  या लाडक्या मुली दुर्दैवाने त्यांना पोलिस भरती प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी नायगांव येथे राहण्याची जागा अचानक नाकारण्यात येते, जागा तुडुंब भरलेली असल्याने तेथून त्यांना सकाळपर्यंत परतवण्यात येते…. पण कुठे राहायचे हे त्यांना सांगितले जात नाही… या बिचाऱ्या सहा मुली तेथे खूप वेळ वाट बघत पण कोणीच कसलीच मदत करत नाहीत … आम्ही रात्र काढायची कुठे??? याचे कोणी उत्तर देत नाही…. खरंच शरमेची गोष्ट आहे….

या सहा मुली रात्री कुठे जातील?? कुठे राहतील?? काय खातील?? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सुरक्षा बाहेर अंधारात कोण करतील???? किंवा रस्त्याकडील फूटपाथ वर या मुलींचे संरक्षणाचे काय???….  हा विचार कोणालाही पडला नाही ???? मग काही अनर्थ घडले की मेणबत्ती घेऊन आपण सगळे काही वेळ मैदानात….मग आपआपल्या घरी…. ही दयनीय व्यवस्थेची अवस्था पाहून भीतीदायक वाटले आणि या सहा मुलींची चिंता वाटू लागली आणि वाईटही…

आपल्या शेतकऱ्यांची ही मुले गावा खेड्यातून पोलिस भरतीसाठी प्रचंड मेहेनत घेऊन मुंबईत येत, या मुली आपल्या कुटुंबीयांचा आधार असत आणि पोलिस परीक्षेला मुंबईत आल्यावर या मुलींनाच आपल्या सुरक्षेची भीती वाटणारे घडत…. सायंकाळच्या वेळेस नायगांव पोलिस भरती ग्राउंड वर राहण्याची सोय नाकारण्यात येत…. मग नंतर कोणीतरी 5000 रुपये मागत गेस्ट रूम चे…. 

कुठून देणार या शेतकऱ्यांच्या मुली इतके पैसे एका रूम चे???म्हणून या मुली एकत्र पुन्हा दादर स्टेशन परिसरात आल्या…व तेथे बसल्या….व प्रत्येक मुलगी चिंतेत होती रात्री काय होईल आपले ????कसे होईल ???

दादर प्लॅटफॉर्म बाहेर असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबल ला विचारले असता त्यांनी ही चौकशी केली पण त्यांना प्लॅटफॉर्म वर असलेल्या विश्रामगृहात 2 तासांच्या वर राहता येणार नाही असे ते म्हणाले..मग दोन तासांनी या 6 मुली रात्री कुठे जाणार????…. 

या सहा मुली जेथे बसलेल्या होत्या तेथे गर्दुल्ले, पाकीट मार सतत फिरतात हे ही पोलिस कॉन्स्टेबल यांनी सांगितले म्हणाले रात्रीचे इन्चार्ज या मुलींना बसू देणार नाहीत मी आहे तोवर इथे बाहेर बसा पण सामानाची काळजी घ्या….मी इथेच आहे काही वेळ….

रात्रीच्या भीतीच्या विचारात असताना मी या सहा मुलींना पाहिले व ही सगळी बाब ऐकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला व त्यांचा फोन व्यस्त असल्याने लगेचच वर्षा बंगल्यावर फोन केला, तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे हे होते, त्यांनी हे सगळं एकताच ताबडतोब स्टेशन मास्टर अमित खरे व डेप्युटी स्टेशन मास्तर पाण्डेय यांच्याशी फोनवर संवाद साधला व त्या सहा मुलींना रात्री सुखरूप राहण्याची व विश्रांतीसाठी महिला वेटिंग रुममध्ये तत्काळ व्यवस्था केली …. 

सकाळी 5.00 वाजता ग्राउंड वर धावण्याची, अंग कासरतीची परीक्षा म्हणजे आदल्या दिवशी पुरेस जेवणं आणि पुरेशी झोप…या सहा मुलींना सुरक्षेचं कवच म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सचिव हे कर्तव्यात खरे उतरले…. 

या सहा मुली व त्यांचे आई वडील हे ऐकून निर्धास्त झाले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सचिव अमित बराटे वा रेल्वे स्टाफ यांचे मनःपुर्वक आभार मानले…CM एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे असे या मुलींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे….

रात्रीची भीती ?…अखेर संपली….

पण जर पूर्णतः संपल्यास बरे होईल अशी ग्वाही या मुलींच्या कुटुंबीयांनी दिली आहे….या परिस्थतीचा विचार करून प्रशासनाने काळजी घेत योग्य तो निर्णय घेऊन GR काढला तर बाहेरगावाहून येणाऱ्या या आपल्या मुली मुंबईतही पूर्ण: सुरक्षित राहतील ……

जरा आपण सगळ्यांनी काही क्षणासाठी आपल्या मुलींना या मुलींच्या जागेवर ठेऊन पाहूयात ???? किती भीतीदायक आहे असे घडणे.  

लेखक : अस्मिता (वार्ताहर)

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares