? वाचताना वेचलेले ?

🍃 “वपु यांच्या लेखनातली काही विचारपुष्पे  —…”  🍃 प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

व. पु. काळे सरांच्या कथा आणि कादंबऱ्यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात.

त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे सर्व वपुप्रेमींना समर्पित…..

१) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात 

२) सर्वात जीवघेणा क्षण कोणता? — खूप सदभावनेने  एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच  यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. 

३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. 

४) प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. 

५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो.

६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो. 

७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते. 

८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा. 

९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही. 

१०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे. 

११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त “बापच” विकत घेऊ शकतो.

१२) खर्च केल्याचे दुःख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

१३) सर्वात जवळ असणाऱ्या माणसाने धोका दिल्याशिवाय जाग येत नाही. 

१४) नातवंडं झाल्यावर म्हाताऱ्याचा विरोध बोथट होतो म्हणतात. 

१५) माणसाने समोर बघायचे का मागे – यावरच पुष्कळसं सुख दुःख अवलंबून असते. 

१६) मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं. एका वेळेला एकच साधता येते, स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचा मन.

१७) लोक खरं  मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात.

१८) आपल्याला वाटतं तितकं आपण स्वतंत्र नसतो.

१९) समजूत घालायला कोणी नसले की स्वतःलाच बळ आणावं लागतं. . 

२०) अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्टीत जास्त आनंद असतो. नाही का?

२१) जो गेल्यानंतरच कळतो त्याला “तोल” म्हणतात.

  •  वसंत पुरुषोत्तम काळे 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments