मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई मला जरा आराम हवा आहे – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ आई मला जरा आराम हवा आहे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली.

“अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामच करायचा आहे..”

मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला.

“आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिसच्या कामातून थकून गेल्येय मी पार..”

“अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामच करायचा आहे..”

मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो इतकी काय घाई आहे, एखादा वर्ष थांबू ना जरा..”

“अगं मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही, नंतर आरामच करायचा आहे..”

मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला..

“अगं तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या..थोडेच दिवस फक्त. मुलं मोठी झाली की आरामच करायचा आहे..”

ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला.

“अहो मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला..”

“मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे..”

ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला..

“आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता जरा निवांत झाले मी..”

“आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल. ती एक जबाबदारी पार पाडली की मग आरामच करायचा आहे..”

तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला..

“मुलं संसाराला लागली, आता मी आराम करणार..”

“अगं आपल्या सुधाला दिवस गेले आहेत ना. मुलीचं बाळंतपण माहेरी करायचंय असतं ना..”

मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला..

“चला, ही पण जबाबदारी पार पडली, आता मात्र आराम.”

मुलांचंही लग्न झालं. घरात नातू आला.

“सासूबाई मला नोकरी परत जॉईन करायची आहे..अथर्वला सांभाळाल का?”

नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला..

“चला नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या.. आता मी आराम करणार..”

“अगं ऐकलंस कां, गुडघे दुखताय माझे, उठून उभं रहायला जमत नाही..Bp वाढलाय वाटतं, डायबिटीस पण आहे..डॉक्टरने वेळेवर पथ्यपाणी करायला सांगितलंय बरं का..”

नवऱ्याची सेवा करत करत उरलं सुरलं आयुष्य गेलं..आणि आराम करायचा राहूनच गेला..

एक दिवशी देवच आला खाली, आराम करायचाय ना तुला? तिने हात जोडले आणि देव तिला  घेऊन गेला..अखेर तिला आराम मिळाला. चिरंतन आराम !!

सर्व स्त्रियांना समर्पित.

स्त्री दिनाच्या मनापासून शुभेच्छा…

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जराशी शाब्दिक गंमत …” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “जराशी शाब्दिक गंमत …” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

एक वेलांटी सरकली,

पिताकडून पतीकडे आली. 

*

एक काना सरकला, 

राम ची रमा झाली. 

*

दोन काना जोडले, 

शरद ची शारदा झाली. 

*

एक मात्रा सरकली, 

खेर ची खरे झाली. 

*

एक अक्षर घटले, 

आठवले ची आठले झाली. 

*

एक अक्षर बदलले, अन्

मालू ची शालू झाली.

कर्वे ची बर्वे झाली. 

अत्रे ची छत्रे झाली. 

गानू ची भानू झाली. 

कानडे ची रानडे झाली. 

*

लग्नानंतर नांवच उलटे केले, 

निलिमाची मालिनी झाली. 

*

पदोन्नती झाली, 

प्रधान ची राजे झाली. 

राणे ची रावराणे झाली. 

देसाई ची सरदेसाई झाली. 

अष्टपुत्रे ची दशपुत्रे झाली. 

*

झुरळाला भिणारी ती, 

दैवयोगाने वाघमारे झाली. 

*

लेकराला कुरवाळीत, 

पुढे लेकुरवाळी झाली. 

*

एक पिढी सरकली,  

सुनेची सासू  झाली !!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक” – कवी : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “आजी आजोबांचा व्हॅलेंटाईन वीक” – कवी : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

एक होती साधीभोळी आजी , 

पण आजोबा होते कहर !

काहीतरी वेगळं करण्याची, 

आजोबांना मध्येच आली लहर !!

 

“यावेळेस आपण करूया का गं, 

प्रेमाचा आठवडा साजरा ?”

लाजत मुरडत हो म्हणत , 

आजीने लगेच माळला गजरा !!

 

“रोझ डे” चा गुलाबी दिवस , 

केला गोडाधोडाचा भडीमार ! 

एकमेकांना भरवला गुलकंद , 

मग रोझ सरबत थंडगार !!

 

हीरो प्रमाणे गुडघ्यावर बसून , 

आजोबांनी मागणी घातली आजीला !

“प्रपोज डे” साजरा करून गेले, 

दोघं आठवडी बाजारात भाजीला !!

 

आता “चॉकलेट डे” ला काय द्यायचं ?,  

म्हणून आजीने केला आटापिटा !

शेवटी ग्लास भरून दूध घेतलं , 

त्यात घातला भरपूर बोर्नविटा !!

 

“टेडी डे” ला आजोबांनी आणली,  

छान अस्वलाच्या आकाराची उशी !

झोपेत दुखऱ्या मानेखाली ठेवताना, 

आजीने आजोबांनाच मारली ढुशी !!

 

दिवसभर लवंगा चघळण्याची, 

आजोबांना सवय होती फार !

 “प्रॉमिस डे” ला आजीने दिल्या, 

त्यांना प्रॉमिस टूथपेस्ट चार !!

 

म्हातार वयात काय हा चावटपणा ?, 

असं म्हणत आजी बसली अडून !

“कीस डे” लाच झालं भांडण अन् , 

दिवस सरला शब्दांचा कीस पाडून !!

 

वाद मिटवायला आजोबांनी आणले, 

आजीच्या आवडीचे खास बटाटेवडे !

अरेरे दुसऱ्या दिवशी पोट बिघडलं, 

पार पडला मराठीतला “हग डे” !!

 

अखेर एकदाचा गाठला त्यांनी , 

“व्हॅलेंटाईन डे” चा अवघड टप्पा !

गरमागरम चहासोबत रंगल्या ,  

राहिलेल्या बऱ्याच दिवसांच्या गप्पा !!

 

“जमायचं नाही बुवा आपल्याला, 

असलं नाटकी प्रेम करणं !”

नुसता सोहळा करायच्या नादात , 

असं उगाचच्या उगाच झुरणं !!”

 

“प्रेमाचा फक्त एकच दिवस , 

आपण म्हाताऱ्यांसाठी का असावा ? “ 

“प्रत्येक दिवस प्रत्येक श्वास , 

एकमेकांवर जीव लावून सोडावा !!”

 

सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा, 

आपलं मनातलं प्रेमच बरं !

दिसलं नाही कुणालाच तरी, 

एकमेकांवर असतं मात्र खरं !!

 

सगळ्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा, 

आपलं मनातलं प्रेमच बरं

दिसलं नाही कुणालाच तरी, 

एकमेकांवर असतं मात्र खरं !!

कवी : श्री क्षितिज दाते

ठाणे

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऐका गोष्ट बाराची… लेखक : अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

ऐका गोष्ट बाराची — लेखक : अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

12/12/12/12/12

बारा हा प्रिय अंक…

मोजण्यासाठी द्वादशमान

पध्दती…१२ची

फूट म्हणजे १२ इंच

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्षाचे महिने १२,

नवग्रहांच्या राशी १२

गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे

तप….१२ वर्षाचे,

गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे

घड्याळात आकडे…..१२,

दिवसाचे तास …..१२,

रात्रीचे तास …..१२ ,

मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२

मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२

एखादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२

सकाळच्या बाजारात उरला सुरला माल १२ च्या भावात काढतात..

पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..

इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग

बाळाचे नामकरण १२ व्या दिवशी केले जाते

मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..

बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,

बेरकी माणूस म्हणजे

१२ गावचं पाणी प्यायलेला

तसेच कोणाचेही न ऐकणारी रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.

ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,

कृष्ण जन्म….रात्री १२

राम जन्म दुपारी…१२ ,

मराठी भाषेत स्वर…१२

त्याला म्हणतात…बाराखडी

१२ गावचा मुखीया,

जमिनीचा उतारा ७/१२चा

इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा ईतर कोर्सेससाठी १२ वी नंतर प्रवेश

खायापिया कुछ नही , गिलास फोडा बाराना

बारडोलीचा सत्याग्रह

पळून गेला ——पो’बारा’

पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

एक गाव, १२ भानगडी

लग्न वऱ्हाडी ——— ‘बारा’ती

१२ जुलै १९६१ ला पानशेत धरण फुटले होते

आणि एक राहिलेच … १२ म्हणजे ” आता जाऊ द्या ना घरी ” असे म्हणण्याची वेळ.

अशी आहे ही १२ चीं किमया….

सर्वात महत्त्वाचे…

*MH12 अर्थात ……पुणे………….

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ येऊ द्या नवीन लाsssट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ येऊ द्या नवीन लाsssट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक  ” लाटा ” उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात… त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात…

पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती…

प्रत्येक बाल्कनी – टेरेस – अंगणात गव्हांकूर पिकू- डोलू लागले…

कॅन्सर, डायबेटीस.. बी. पी… गायब होणार होते

आणि आपण एकदम तंदुरुस्त होणार होतो..

कैक टन गव्हांकूर संपले… मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही 

व लाट ओसरली !

अल्कली WATER ची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती….

म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार होता…

२० हजार – ३० हजार मशीनची किंमत…

मशीन्स धूळ खात पडली…

आणि लाट ओसरली ! !

 

सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..

 वजन घटणार…

बांधा सुडौल होणार..

हजारो लिटर मध संपले…

हजार मिलीग्राम पण वजन नाही घटले…

लाट ओसरली  ! ! !

 

मग आली नोनी फळाची लाट

नोनीने  नाना – नानी आठवले

पण

तरीही नानी-नाना पार्कमधून काही मंडळी वैकुंठाला गेली….

 

अलोव्हेरा ज्यूस… !

सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी. पी. एकदम नॉर्मल होणार..

हजारो बाटल्या खपल्या… विशेष काही बदलले नाही… तीही लाट ओसरली ! ! ! !

 

मग रामदेव बाबांची बिस्किटे  आली.

५००० करोडचा व्यवसाय झाला…. बाबा उद्योगपती झाले..

 आणि इथे…. आमची आरोग्यस्थिती होती तशीच….

 

मग माधवबागवाले  आले.

तेल मसाज पंचकर्म करा.. हृदयाचे ब्लॉक घालवा म्हणाले..

राहता ब्लॉक विकायला लागला.. पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.

(आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो. )

 

मग आली दिवेकर लाट….

मग आली दीक्षित  लहर…

 

… ही लाट आता उसळ्या घेतेय….. ओसरेल लवकरच ! ! ! ! ! 

 

लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही. पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय

विचार करा.. आणि…..

Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा.

 

आणखी थोडा विचार करा..

आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद.. म्हणजे नियम शास्त्र.

रोजचे साधे घरगुती जेवण.. पालेभाजी, वेलवर्गीय भाजी, फळभाजी, मोड आलेली कडधान्ये, सँलड, साजुक तूप, बदलते गोडेतेल, गहू, ज्वारी, बाजरी, मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम.. पहा काय फरक पडतो 

 

आम्हाला शिस्त नकोय..

पैसा बोलतोय…

जीभ चटावलीय..

” घरचा स्वयंपाक नकोय… “

 

आता तर … पंधरा मिनीटात… ओला.. स्विगी… दारात…

….. आली लाट मारा उड्या

 

एवढे टाळूया…

हसत खेळत जगूया,…..

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम…….. बस्स ! ! ! 

 

सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं,

दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.

आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम सातत्याने करणे आवश्यक आहे 

 

आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर  सुरुवात करायला काय हरकत आहे ?

 

दीर्घायुष्य लाभावं, आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,

याकरिता आपला आहार, आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.

आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरीरात विकार निर्माण होतात….. तसेच व्यायामात नियमितता व सातत्य असावं.

 

आणि हो :-

या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच  स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल….

 

बघा पटलं तर घ्या..

नाहीतर…… चला.. येऊ द्या नवीन लाsssट……

लेखक : अज्ञात 

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ जात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जातीचं काय घेऊन बसलात राव .. अरे जात म्हणजे काय ? 

माहित तरी आहे का..?

अरे कपडे शिवणारा शिंपी, !

तेल काढणारा तेली, !

केस कापणारा न्हावी.!

लाकूड तोडणारा सुतार.!

दूध टाकणारा गवळी.!

गावोगावी भटकणारा बंजारा.!

पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण.!

वृक्ष लावणारा माळी.!

आणि लढाई लढणारा क्षत्रिय.!

*

आलं का काही डोस्क्यात..?

आरं काम म्हणजे जात.

आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला.

आता इंजीनीयर ही नवी जात .

कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात.

“सी. ए” ही पोटजात,

“एम. बी. ए” ही नवी जात.

*

बदला की राव कवाचं तेच धरुन बसलात!

घरीच दाढी करता नवं? 

मग काय न्हावी का?

बुटाला पालीश करता नव्हं?

मग काय चांभार का?

गैलरी टेरेस वर झाडे लावता ना !

मग माळी का?

घरच्या घरीच पुजा-अर्चा करता नव्ह?..,,मग ब्राम्हण का ?

दूध टाकणारा मुलगा गवळी का?

*

आरं बायकोच्या धाकानं का हुईना संडास साफ करता नव्हं?

*

आता अजून बोलाया लावू नका !

आरं कोण मोठा कोण छोटा? 

ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं?

ह्यालाबी खायला लागतं आणि त्याला पण?

*

आरं कामानं मोठं व्हा जातीनं न्हाय!

आरं तुम्ही ह्या जातीत जन्माला आला, 

हा काय तुमचा पराक्रम हाय व्हय?

मंग कशाला उगीचच बोंभाटा करता राव ?

*

सगळ्याला आता काम हाय!

सगळ्याला शिक्षण हाय!

शिकायचं कामं करायचे!

पोट भरायचे!

की हे नसते उद्योग करायचे!

*

*एक नवीन विचारधारा ! 

कवी – अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सारे भारतीय माझे ‘बांधव‘ आहेत…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “सारे भारतीय माझे ‘बांधव‘ आहेत…?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी शाळेत गेलो — त्यांनी माझी जात नोंदवून घेतली.

मग आम्ही सर्वांनी….

“सारे भारतीय माझे बांधव आहेत…!” – ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली..!

 

त्याला पुस्तके ड्रेस मिळाली, मी पण मागितली…

तर ते म्हणाले, — “तो गरीब आहे.”

“मी पण गरीबच आहे.”

“तू गरीब आहेस मान्य, पण तुझी जात वेगळी आहे.”

 

…. दोन गरीबांची पण जात वेगवेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं.

 

त्याला शासनाच्या…. फी माफी आणि अन्य सर्व सुविधा मिळत होत्या,

आणि …. माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती…!

 

आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली.

(इथे स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही का वाटत..?)

तो सिलेक्ट झाला…

मी नव्हतो झालो…!

 

मी मार्कलिस्ट बघितली तर…

त्याला 150 पैकी…. 108 मार्क होते

आणि मला 145…!

नंतर कळलं,

त्याने फॉर्मसोबत स्वतःचं जात प्रमाणपत्र जोडलं होतं.

स्पर्धेतही जातीची परीक्षा असते…… हे मला त्या दिवशी कळलं !

 

पुढे तो सेटल झाला… चांगला पैसा ही आला.

घर, गाडी सर्व आलं…. त्याचं आयुष्य मजेत चालू झालं…!

 

अधूनमधून कुठे कुठे व्याख्यानंही द्यायचा….

सामाजिक समानतेवर तो भरभरुन बोलायचा….!!

 

एके दिवशी त्याची एका सुंदर मुलीशी भेट झाली….

आणि बघताच त्याला ती खूप आवडली…!

तिच्या मनात काय हे याला नव्हतं माहीत,

तिच्यावर मात्र याची जडली होती प्रित…!

काहीही करुन हवी होती ती त्याला…

तिला मिळवण्याचा खटाटोप त्याने सुरु केला.

एके दिवशी मात्र तो गारच पडला,

तिची जात दुसरी…. हे माहीत झालं त्याला..!

प्रचंड संतापला ….. अन् पारा त्याचा चढ़ला,

जातीच्या ठेकेदारांवर …. जोराने ओरडला..!

….. हा जातिभेद काही मूर्खांनी तयार केला,

माणूस सर्व एकच असतो कोण सांगेल यांना…?

 

नंतर मग,

त्याच्या व्याख्यानाचा एकच विषय असायचा….

‘ जात गाडून टाका ‘

भरसभेत सांगायचा…!

 

आत्तापर्यन्त साथ देणारी ” जात “च बाधक झाली होती….

त्याची मात्र यामुळे पुरती गोची झाली होती…!

 

काय करावे सुचेना त्याला…

आपली जात आडवी येतेय…

सर्व आहे पण एका गोष्टीमुळे मन बैचैन होतेय…!

 

एके दिवशी तो असाच… स्वतःची फाईल चाळत होता,

रागारागाने तो आपल्याच ” जात ” प्रमाणपत्राकडे पाहत होता !

 

त्याच्याकडे बघून … ते प्रमाणपत्र ही हसले….

” चुकतोयस बेटा तू,.. जरा विचार कर “ म्हणाले…!

 

ज्या जातीने जगवलं तिचाच तुला आता राग येतोय….

फायदा बघून स्वतःचा….. तूच आज स्वार्थी होतोयस…!

 

तो बघ… तुझ्या सोबतचा “तो” गुणी मुलगा,

खाजगी कंपनीत जातोय….माझ्यामुळे बेट्या,

तू मात्र…. सुखाची रोटी खातोयस…!

 

जातिभेद वाईट…. हे कुणीही मान्य करेल,

पण तुला तेव्हाच हे खटंकतय …. 

जेव्हा ते तुझ्या हिताआड येतंय…!!

 

याआधी तूही तुझी जात अभिमानाने मिरवायचास…

जातीमुळे मिळणारे सर्व फायदे…तोऱ्यात उचलायचास…!

 

हे ऐकून तो थोडा स्तब्धच झाला….

मनाशी काही विचार करता झाला….!

 

त्या दिवशी “तो” माझ्या लग्नात आगंतुक पाहुणा म्हणून आला….

“जिंकलास गड्या तूच…” .. मजपाशी येऊन म्हणाला…!

 

रोख त्याच्या बोलण्याचा मलाही कळला होता….

त्याला आवडणाऱ्या मुलीच्या गळ्यात,

मी हार घातलेला होता…!

 

तीच सुंदरी माझी जीवनसाथी झाली होती,

कारण तिची न् माझी … जात एकच होती…!

 

कसं आहे ना भावा…

जीवनात प्रत्येकाला सर्वच मिळत नसतं…

कुठे न कुठे प्रत्येकाला नमतं घ्यावंच लागतं…!

 

तुला तुझी जात प्यारी तशीच माझी मलाही…!!

कशाला तत्वज्ञान सांगतोयस भावा….

फायद्यासाठी काहीही..?

 

खरंच दूर करायचेत का जातिभेद?

चल मग दोघे मिळून करु…

जातीवर नको,

जो आर्थिक गरीब त्यालाच स्कॉलरशिप,सवलती मिळवून देऊ…!

 

जात प्रमाणपत्रे कशाला वाटायची…

आपण फक्त भारतीय होऊ….

तू अन् मी एकच .. हीच शिकवण सर्वांना देऊ…!

 

ज्याच्यात असेल गुणवत्ता .. त्याचंच सिलेक्शन होईल…

त्या दिवशी माझा देश .. खऱ्या अर्थाने महान होईल….!

 

तू ही माणूस मी ही माणूस, मग कसला आपल्यात भेद?

जातीत विखुरला माणूस..  त्याचाच वाटतो खेद..!

 

जात हा मुद्दा भाऊ निवडणुकीतही गाजतो…

दरवेळी तुमचा उमेदवार इलेक्शन त्यावरच जिंकतो…!

 

तुझे अन् माझे लालच रक्त,

माणूस आपली जात…

स्वार्थ नको.. आणू थोडी उदात्तता हृदयात…!

 

माहीत मजला रुचणार नाही, हे कधीही सर्वांना अजिबात ….

कारण,

प्रत्येकाला हवीय येथे….आपल्या सोईची “जात”……!!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ न सांगितले गेलेले छत्रपती…!!! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ न सांगितले गेलेले छत्रपती…!!! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रमुख्याने फक्त या तीनच गोष्टी सांगितल्या जातात….!

1.अफजलखानाचा कोथळा 

2.शाहीस्तेखानाची बोटे आणि

3.आग्र्याहुन हून सुटका

पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतील….!

  1. आपल्या आईला जिजाऊ मॉसाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज”सामाजिक क्रांती” करणारे होते…!
  2. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे”लोकपालक” राजे होते…!
  3. सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे”उत्तम प्रशासक” होते…!
  4. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे”पर्यावरण रक्षक” होते…!
  5. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे”स्व-धर्मचिकित्सक” होते …!
  6. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून “अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारेचिकीत्सक राजे”
  7. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे !”जलतज्ञ” राजे छत्रपती शिवराय!!
  8. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे१०० राहून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते,”उत्तम अभियंते राजे”
  9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
  10. परस्त्री मातेसमान मानत महिलांनासन्मानाने वागवाणारे”मातृभक्त, नारीरक्षक” छत्रपती शिवराय
  11. संपुर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्री नर्तीका नाचवली गेली नाही की मद्याचे प्याले ही रिचवले गेले नाहीत

खऱ्या अर्थाने ते “लोकराजे” होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते हीच खरी शिवशाही होती…..!

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पण असं वाटतच नाही… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ पण असं वाटतच नाही… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

उंदीर  दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात. पण जर तो  जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही….

जर साप दगडाचा असेल तर सर्व  त्याची पूजा करतात. पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात….

जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येकजण पूजा करतो. पण ते जिवंत असताना तर त्यांची किंमत समजत नाही. !

फक्त हेच मला समजत नाही की जिवंताबद्दल इतका द्वेष आणि दगडांबद्दल इतकं प्रेम का आहे?  

लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्यकर्म  आहे…

पण जर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुषहाल होईल….

एकदा विचार करून बघा….

युधिष्ठराने एक सत्य सांगितलं होतं.. ” मरायचं सर्वांना आहे, परंतु… मरावंसं कोणालाच वाटत नाही.. “ 

आजची  परिस्थिति तर इतकी गंभीर आहे.. “अन्न ” सर्वांनांच हवंय.. पण.. “शेती” करावीशी कोणालाच वाटत नाही…

“पाणी” सर्वांनाच हवंय, पण… “पाणी”  वाचवावे असे कोणालाच वाटत नाही…

“सावली” सर्वांनाच हवीय.. पण.. “झाडे” लावावी, ती जगवावी असे कोणालाही वाटत नाही..

” सून ” सर्वांनाच हवी आहे.. पण.. तिला “मुलगी”च समजावी असं कोणालाच वाटत नाही…

…… विचार  करावा असे प्रश्न… पण… विचार करावा असं कोणालाच वाटत नाही….

….. आणि हा मेसेज सर्वांना आवडतो परंतु फॉरवर्ड करावा असं कोणालाच वाटत नाही.

 …. एक सत्य.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ क्षण प्रेमाचा…… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

क्षण प्रेमाचा लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

एक क्षण पुरेसा आहे,कोणाचं आयुष्य बदलून टाकायला. एखाद्या रस्त्यावरच्या भुभू च्या अंगावरून प्रेमाने,मायेने हात फिरवा…त्याचं प्रेम ते भुभु नक्की व्यक्त करेल.

झाडं,पानं,फुलं सगळ्यांना प्रेमाची भाषा व्यवस्थित समजते. मोकळ्या वातावरणात,मुक्तपणे वाढणारी झाडं आणि फुलं अधिक सुंदर, तेजस्वी भासतात…त्यांना वाढायला पूर्ण मोकळेपणा असतो.कोणाचं बंधन नसतं..निसर्गाचं चक्र त्यांना अधिक तेजस्वी,अधिक बलवान बनवतं.निसर्गाचं प्रेमचं आहे तसं…हे ऋतुचक्र तसचं तर ठरवल गेलं आहे की.

खायला अन्न,प्यायला पाणी, सूर्यप्रकाश,सुखावणारा वारा, पक्षांचं गोड कुजन,फुलांचे वेगवेगळे आकार आणि सुगंध, गवताची…पानांची…वेलींची घनदाट सुखद अशी हिरवाई, पाण्याचं फेसळण…कड्या वरून झेप घेणं..किनाऱ्यावर नक्षी काढणं…एखाद्या लहानग्याप्रमाणे खिदळत, अवखळपणाने पुढचं मार्गक्रमण करणं…

…असं आणि किती अगणित रुपात निसर्ग आपल प्रेम व्यक्त करत असतो.

सगळ्या संतांनी पण सांगून ठेवलं आहे…भगवंत प्रेमाचा भुकेला आहे…त्याला मोठे समारंभ नकोत,फुलांची आरास नको, उदबत्यांचा गुच्छ नको,अवडंबर नकोच…एक क्षण त्याला द्यावा, ज्यात फक्त त्याची आठवण…त्याचेच विचार असतील. खूप मिळतंय आपल्याला…एक क्षण पुरे आहे ते सगळ अनुभवण्याचा आणि व्यक्त होऊन देण्याचा.

तुमचा पैसा,शिक्षण,बुद्धिमत्ता प्रदर्शन कोणाला नको असतो…एक क्षण द्या तुमच्या प्रेमाचा…एक हसू, एखादा संदेश, एखादी मदतीची कृती…व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी…पण माझ्या पद्धतीने झालं नाही तर ते कसल व्यक्त होणं…अस नसत हो.ही निसर्गाची, भगवंताची ….प्रेमाची हाक त्यांच्याच पद्धतीने होत असते…ती ऐकून घेण्याची संवेदनशीलता आपल्यात शोधून वाढवायला हवी.

आपल्यातील हे प्रेम वाढवायला हवं…भगवंताची देणगी आहे ही.!

हे आपल्यातलं प्रेम वाढलं ना…भगवंताबद्दल, निसर्गाबद्दल…जी प्रत्येक आत्म्याची गरज आहे…की आपण नक्की बदलायला लागू…स्वतःबरोबर इतरांना समजून घ्यायला सुरुवात करू, अहंकार मुक्त होऊ,स्वच्छ सात्विक होऊ,प्रेम मय,आनंदमय होऊ…या जगाला त्याची खूप गरज आहे

आपल्याबरोबर…

फक्त रोज एक क्षण हवा.

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares