?  वाचताना वेचलेले  ? 

☆ येऊ द्या नवीन लाsssट… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

आरोग्याच्या बाबतीत समाजात अनेक  ” लाटा ” उसळत असतात व कालांतराने त्या ओसरतात… त्याला आता सोशल मीडियाची जोड मिळाल्याने लाटा जरा जोरकस वाटतात…

पूर्वी गव्हांकूराची प्रचंड लाट होती…

प्रत्येक बाल्कनी – टेरेस – अंगणात गव्हांकूर पिकू- डोलू लागले…

कॅन्सर, डायबेटीस.. बी. पी… गायब होणार होते

आणि आपण एकदम तंदुरुस्त होणार होतो..

कैक टन गव्हांकूर संपले… मानसिक समाधानापलीकडे विशेष काही घडले नाही 

व लाट ओसरली !

अल्कली WATER ची लाट तर जणू अमृतच मिळाले अशी होती….

म्हणाल तो रोग समूळ नष्ट होणार होता…

२० हजार – ३० हजार मशीनची किंमत…

मशीन्स धूळ खात पडली…

आणि लाट ओसरली ! !

 

सकाळी उठल्या उठल्या मध-लिंबू-पाणी..

 वजन घटणार…

बांधा सुडौल होणार..

हजारो लिटर मध संपले…

हजार मिलीग्राम पण वजन नाही घटले…

लाट ओसरली  ! ! !

 

मग आली नोनी फळाची लाट

नोनीने  नाना – नानी आठवले

पण

तरीही नानी-नाना पार्कमधून काही मंडळी वैकुंठाला गेली….

 

अलोव्हेरा ज्यूस… !

सकाळ संध्याकाळ प्या.. डायबेटीस, बी. पी. एकदम नॉर्मल होणार..

हजारो बाटल्या खपल्या… विशेष काही बदलले नाही… तीही लाट ओसरली ! ! ! !

 

मग रामदेव बाबांची बिस्किटे  आली.

५००० करोडचा व्यवसाय झाला…. बाबा उद्योगपती झाले..

 आणि इथे…. आमची आरोग्यस्थिती होती तशीच….

 

मग माधवबागवाले  आले.

तेल मसाज पंचकर्म करा.. हृदयाचे ब्लॉक घालवा म्हणाले..

राहता ब्लॉक विकायला लागला.. पण हृदयाचा ब्लॉक गेला नाही.

(आता माधव बाग जाहिरात करतात की डायबिटीस पूर्ण घालवतो. )

 

मग आली दिवेकर लाट….

मग आली दीक्षित  लहर…

 

… ही लाट आता उसळ्या घेतेय….. ओसरेल लवकरच ! ! ! ! ! 

 

लक्षात घ्या मंडळी, कुठच्याही गोष्टीबद्दल माझा पूर्वग्रह नाही वा आकसही नाही. पण काळानुसार बिघडलेल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोय

विचार करा.. आणि…..

Just एक पिढी मागे जाऊन आजी आजोबा कसे जगत होते हे आठवा.

 

आणखी थोडा विचार करा..

आयुर्वेद म्हणजे जगण्याचा वेद.. म्हणजे नियम शास्त्र.

रोजचे साधे घरगुती जेवण.. पालेभाजी, वेलवर्गीय भाजी, फळभाजी, मोड आलेली कडधान्ये, सँलड, साजुक तूप, बदलते गोडेतेल, गहू, ज्वारी, बाजरी, मिश्रपिठाची भाकरी पोळी व सोबत थोडा व्यायाम.. पहा काय फरक पडतो 

 

आम्हाला शिस्त नकोय..

पैसा बोलतोय…

जीभ चटावलीय..

” घरचा स्वयंपाक नकोय… “

 

आता तर … पंधरा मिनीटात… ओला.. स्विगी… दारात…

….. आली लाट मारा उड्या

 

एवढे टाळूया…

हसत खेळत जगूया,…..

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम…….. बस्स ! ! ! 

 

सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं,

दुपारी थोडीशी विश्रांती घेणं आवश्यक आहे.

आपल्या प्रकृतीनुसार व्यायाम सातत्याने करणे आवश्यक आहे 

 

आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून आपण जितकी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण त्यापेक्षाही महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या शरीराची घेत नाही. तर  सुरुवात करायला काय हरकत आहे ?

 

दीर्घायुष्य लाभावं, आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी निर्माण होऊ नयेत,

याकरिता आपला आहार, आपलं राहणीमान योग्य असणं महत्वाचं आहे.

आपल्या प्रकृतीनुसार आहार घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीविरुद्ध आहार घेतल्यास शरीरात विकार निर्माण होतात….. तसेच व्यायामात नियमितता व सातत्य असावं.

 

आणि हो :-

या सर्वांसोबत मानसिक शांतताही राखा. ताणतणाविरहित जीवन जगा. ध्यान, धारणा, योगासनं, प्राणायाम करा. ज्यामुळे तुम्ही नक्कीच  स्ट्रेस फ्री (stress free) राहू शकाल….

 

बघा पटलं तर घ्या..

नाहीतर…… चला.. येऊ द्या नवीन लाsssट……

लेखक : अज्ञात 

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments