मराठी साहित्य – आलेख ☆ बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंती विशेष – आंबेडकरी जनता आणि ऑनलाइन जयंती उत्सव ☆ श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है. आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है. एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। आज प्रस्तुत है परम आदरणीय  बाबासाहेब भीमराव आम्बेडकर जी  की जयंती के अवसर पर उनका विशेष आलेख  आंबेडकरी जनता आणि ऑनलाइन जयंती उत्सव। 

 

☆ आंबेडकरी जनता आणि ऑनलाइन जयंती उत्सव☆

 

सध्या जगभरात कोरोनाने जो हाहाकार माजवला आहे. त्यात जगभरातून लाखांवर बळी गेलेत. एका जागी कधी न थांबणारा माणसाने स्वतःला एका जागी कोंडून ठेवलेय. आणि याचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून जगभरातील सरकारे आपापल्या परीने प्रयत्न करताहेत. आणि सगळ्या जगाला कळून चुकले की स्वतःला घरात ठेवण्या शिवाय सध्यातरी पर्याय नाहीये. म्हणूनच लाॅकडाऊनचा पर्याय सध्या प्रभावी मानला जातोय आणि भारताने सुद्धा हाच पर्याय निवडला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 144 देशात लागू आहे. आणि पुर्णपणे संचारबंदी लागू आहे.

अशा परिस्थितीत श्रीराम नवमी, हनुमान जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि आज बाबासाहेबांचा जन्मोत्सव. वरिल दिवस म्हणजे भारतीय संस्कृती आणि प्रत्येक भारतीयांसाठी सणच. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करणे, सामाजिक बंधूत्वाची भावना वाढीस आणून आपापसातील सामाजिक एकोपा निर्मान करणे हा उद्देश असतो. आणि दरवर्षीच जगासाठी ही मिसाल बनून जातो.

पण अशा उत्सव काळात ‘लाॅकडाऊन ‘ सुरू असल्यामूळे एकत्र येऊन उत्सव साजरा करणे धोक्याचे आहे. हे जाणून या वर्षी एकदम आगळं- वेगळं असं ऑनलाइन जयंतीचं उदाहरण भारताने पुन्हा एकदा जगासमोर ठेवले. एकीकडे जगभरात लाखांवर लोक गेली. आणि लाखो ग्रसित असतांना जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर असणारा भारतात मात्र ही संख्या आटोक्यात आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटींवर असून सुद्धा काही हजार रूग्ण आहेत म्हणून भारत त्यामानाने सुदैवी आहे. पण गाफील राहुन चालणार नाही. म्हणून विविध उपाययोजना सरकार करतेय. आणि शासनामार्फत खबरदारीसाठी जे काही निर्णय घेण्यात येत आहेत. मग त्यात काही कठोर निर्णयही आहेत. ते अगदी योग्य आहेत. आणि जनतेने त्यांना स्विकार केले आहेत. जनतेचा आणि सरकारचा हा समन्वय खरोखर कौतुकास्पद आहे.

बाबासाहेब नेहमी म्हणायचे की ‘मी प्रथमतः आणि अंतीमतः भारतीय आहे’. वैचारीक पातळीवर विरोध असला तरी. बाबासाहेबांचं वरिल वाक्य आज जनतेने सुद्धा अबाधित ठेवले आहे. आणि आपण किंवा एखादा समुदाय किंवा आपला धर्म याही पेक्षा ‘देश’ मोठा आहे. हे जनतेने आणि शासनाने मिळून सिद्ध केले आहे.

आणि म्हणून या भिम जन्मोत्सवच्या शुभ समयी भारतीय जनतेने एका ठिकाणी न जमता ऑनलाइन पद्धतीने जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. सोशल मिडिया द्वारे विविध स्पर्धा असतील, निबंध लेखन असेल, बाबासाहेबांच्या जीवनावरील प्रश्नावली असेल, असे अनेक उपक्रम राबवून हा भिमोउत्सव साजरा केला जातोय. आणि आंबेडकरी जनतेने खरोखर जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे.

याबद्दल जनजागृतीसाठी शासकीय पातळीवर, आणि इतरही सामाजिक संघटनांमार्फत, राजकीय पक्षांमार्फत आणि जनतेनेही वयक्तीक रित्या जनजागृती करून जयंती घरीच साजरी करायची असे आवाहन केले. त्याबद्दल त्यांचे आभार मी मानतो. कारण प्रत्येकाने निस्वार्थ पणे आपापली जबाबदारी पेलली आहे. सामाजिक एकोपाचे हे एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवले. आणि हाच एकोपा कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचा संकल्प या जयंतीवेळी मी यापुढेही करणार आहे.

असेच सामाजिक बंधूत्व टिकवून ठेवा. घरीच राहा. सुरक्षित राहा. सर्व भारतीयांना भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

जय भिम जय भारत

 

वंदीतो बाबा तुम्हास मी

होऊनी चरणी नतमस्तक

बीज रूजवले तूम्ही समतेचे

लिहून घटनेचे पुस्तक

© कपिल साहेबराव इंदवे

मा. मोहीदा त श ता. शहादा, जि. नंदुरबार, मो  9168471113

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 40 – पत्रलेखन – आये, काळजीत नगं काळजात रहा ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील  एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है  उनके द्वारा शहर में आये एक युवक द्वारा अपनी माँ को  लिखा गया अत्यंत भावुक एवं मार्मिक पत्र  “आये, काळजीत नगं काळजात रहा”। आप प्रत्येक गुरुवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। ) 

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #40 ☆ 

☆ पत्रलेखन – ‘आये, काळजीत नगं काळजात रहा.’ ☆ 

(कोरोनाच्या संकटामुळे भयभीत झालेल्या  गावाकडील आईस ,  शहरात कामधंद्यासाठी आलेल्या  एका तरूणाने पत्रलेखनातून दिलेला हा बोलका दिलासा जरूर वाचा.)

पत्रलेखन

‘आये, काळजीत नगं काळजात रहा.’

आये. . पत्र लिवतोय तुला. . .  जरा  निवांत बसून वाच. शेरात कामधंद्यासाठी आल्या पासून  आज येळ मिळाला बघ तुला पत्र लिवायला. आधी डोळं पूस. मलाबी हिकडं रडायला येतया.

आये . . तू काळजी.करू नकोस मी बरा आहे सध्या शहरात सगळं काही बंद आहे. त्या कोरोना इषाणू मुळं.आये तुझी माया मला कळतीया.परं गावाकडं प्रवास करून येताना ह्या कोरोनाचा धोका जास्त हाये बघ. ह्यो साथीचा रोग आहे. ‘माणसान माणसाला टाळल तर ह्याची लागण हुणार नाय आसं जाणकार सांगत्यात.’

आये, आमच्या कामगारांची मालकानं हॉटेल मध्येच रहायची सोय केली हाय बघ. जेवना ची काय बी आबाळ होत नाय तवा काळजी करू नगस. माझा इचार करू नगंस. पगार पाणी माझं चालू रहाणार हाय . हिथं शेरात एका हॉटेलात आमी चार पाच जणं राह्यतोया. आक्षी चारा छावणीत राह्यलाय वानी वाटतयं बघ. चहा, नाश्ता, जेवण सारं बैजवार अन येळच्या येळी  मिळतया. आये तू माझी काळजी करू नगंस.

आये तू बी थोडं दिस घरीच थांब. शेताकडं जाताना तोंडाला एखाद फडकं बांधून जात जा. बा ला  बी सांग. जनावरांना चारापानी दिल्यावर,  घरात येताना हात साबनान चांगलं धू.. .तोंडावर रूमाल बांधून राह्य.  हळद घालून दूध दे समद्यास्नी. सकाळी फक्कड  आल  आन गवती चहा घालून चाय दे समद्यास्नी. हसू येतय नवं?  अशीच हसत राह्य. आये ही येळ काळजी करण्याची नाय तर सोताची काळजी घेण्याची हाय. म्या हिथं माझी काळजी घेतोया.तकडं तुमीबी जीवाला जपा. खोकला, सर्दी जास्त दिस अंगावर काढू नगं.

आये.. मी गाव सोडून

शहरात येताना

तूझ्या डोळ्यात

पाणी का दाटून आलं होत

ते आज कळतंय…

आज खरंच गावाकडची खूप आठवण येतेय

पोटाच्या भुकेच्या प्रश्नाचं

उत्तर शोधत

मी ह्या शहरातल्या

उंच इमारतीच्या गर्दीत

कधी हरवून गेलो कळलंच नाही

पण आता परिस्थिती समोर

नक्की कुठे जावं कळत नही…

माझी अवस्था तुह्या  किसना सारखी झालीया

त्याला  जन्म देणारी देवकी पण हवीय

आणि संभाळणारी यशोदा सुध्दा.

आये, हिथं तुझ्या वानी राधा मावशी हाय आमच्या जेवणाची काळजी घ्यायला. मलाबी सध्या निस्तं बसून रहावं लागतया. मनात नगं नगं त्ये इचार येत्यात.वाटत आत्ता  उठावं. . .   आनं मिळेल त्या वाहनानं  गाव गाठावं आनं तुला येऊन भेटावं. परं आये तुच म्हनती नव्हं ? “हातचं सोडून पळत्या पाठी धावायचं नाय” आये, आक्षी खरं हाय तुझं. त्यो  कोराना (त्ये महामारी सावट) जसं आलं तसं निघून बी जाईल.  आपून त्याच्या पासून दूर राह्यचं हाय. त्यांन मरणाच्या भितीनं सा-या जगाला नाचवलय. पर आये त्याला काय धिंगाणा घालायचा त्यो घालू द्येत. आपून  त्या नाचात  सामिल हुयाचं नाय. दुरूनच तमाशा पघायचा आन सोताला जपायचं ह्ये ध्यानात ठेवलंय.

आये. .  समजून घेशील नव्हं ? म्या हिथं सुखरूप हाय. , ‘काळजीत नगं काळजात रहा…’  ह्ये तुझं बोल ध्यानात ठ्येवलय. तू  दिलेली गोधडी  काळीज म्हणून पांघरलीया. लई आठवणी जाग्या झाल्यात बघ.  आता  एकटं वाटत नाय. आये ह्ये कोरीनाचं सावट दूर झालं की भेटू  आपण तवर सोत्ताची,  बा ची आन धाकल्या भावडांची काळजी घेऊ, घेशील नव्हं. म्या इथं सुखरूप हाय ध्यानात ठेव. पत्र लवकरच तुला मिळंल. तवा रडू नगं.  सावर सोताला. नमस्कार करतो. आये असाच आशिर्वाद राहू दे.

..तुझा लाडका

..सुजित

 

© सुजित कदम

मो.७२७६२८२६२६

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 43 – समारोप ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  एक अविस्मरणीय संस्मरण  “समारोप । वास्तव में जीवन के कुछ अविस्मरणीय क्षण होते हैं जिन्हें हम आजीवन विस्मृत नहीं कर सकते । वे क्षण कुछ भी हो सकते हैं  किन्तु,  हाईस्कूल से कॉलेज में पदार्पण के पूर्व हाईस्कूल का फेयरवेल जिसमें लड़कियां साड़ियां और लडके फॉर्मल्स में  सम्मिलित होते हैं, बेहद रोमांचक क्षण होते हैं। उस समय की मित्रता और  भविष्य के स्वप्न संजोते ह्रदय का स्मरण कर या मित्रों में साझा कर एक रोमांच का अनुभव होता है और लगता है  कि  काश वे दिन एक बार पुनः लौट आते जो कि असंभव हैं।  सुश्री प्रभा जी ने उन क्षणों को अपने इस संस्मरण से सजीव कर दिया है। इस भावप्रवण अप्रतिम  सजीव संस्मरण  साझा करने के लिए उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 43☆

☆ समारोप ☆ 

आयुष्यात समारोपाचे अनेक प्रसंग आले, लक्षात राहिल असा एकच समारोप, शाळेत असताना मैत्रीणीबरोबर चा अकरावीला घेतलेला शाळेचा समारोप!

मी अकरावीला असताना, शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत शिकत होते, शाळेत भेटली जिवाभावाची मैत्रीण राणी गायकवाड! शाळेच्या send off ला आम्ही साड्या नेसलो होतो,आणि दोघी एकमेकींना खुप छान दिसतेस म्हणत होतो! राणीची मैत्री ही मला आयुष्यात मिळालेली अनमोल देणगी! त्या दिवशी ती माझ्याकडे राहिली होती आणि रात्रभर जागून गप्पा मारल्या होत्या! खरोखर शिरूर मधले दिवस हे मंतरलेलॆ दिवस होते! अकरावी चा अभ्यासही आम्ही एकमेकींच्या घरी रात्री जागून केला, ब-याचदा मी झोपून जायचे आणि ती अभ्यास करत असायची, एकदा रात्री खुप भूक लागली, मी तिच्या घरी गेले होते, तिनं स्वयंपाक घरात पाहिलं फक्त भात शिल्लक होता आणि कांदे, बटाटे, टॉमेटो दिसले आम्ही टॉमेटोची चटनी केली…आयुष्यात ला तो काही पदार्थ बनविण्याचा तो दोघींचाही पहिलाच प्रसंग पण चटणी खुपच टेस्टी झाली होती आम्ही भाताबरोबर खाल्ली!

अकरावीच्या परीक्षेच्या वेळी युनिफॉर्म घालण्याची अट नव्हती पण आम्ही म्हटलं आपण युनिफॉर्मचं घालू कारण नंतर कधीच परत घालता येणार नाही. सगळ्या मैत्रीणी रंगीबेरंगी कपडे घालून यायच्या पण आम्ही आकाशी निळा स्कर्ट आणि पांढरा ब्लाऊज घालून जात होतो! शेवटच्या पेपराच्या दिवशी खुप भरून आलं….कारण तो शाळेच्या समारोपाचा दिवस होता…त्या दिवशी रात्री आम्ही तंबूत माला सिन्हा चा हमसाया सिनेमा पाहिला होता…वो हसीन दर्द दे दो जिसे मै गले लगा लू…..म्हणणारी माला सिन्हा अजूनही आठवते……

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ कोरोना व्हायरसमुळे देशभरात होणारे स्थलांतर,त्याचा वाढता धोका आणि आपली जबाबदारी☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है आपकी एक समसामयिक विषय पर  एक शिक्षाप्रद आलेख  “कोरोना व्हायरसमुळे देशभरात होणारे स्थलांतर,त्याचा वाढता धोका आणि आपली जबाबदारी।)

☆ कोरोना व्हायरसमुळे देशभरात होणारे स्थलांतर,त्याचा वाढता धोका आणि आपली जबाबदारी ☆

संवाद एक विचार अनेक चर्चा सत्र 

कोरोना विषाणू जागतिक संकटातून बचावात्मक प्रतिबंधक उपाय म्हणून हा लाॅकडाऊन याची गांभीर्याने  सर्व प्रथम दखल घ्यायला हवी.  दारिद्र्य रेषेखालील लोकांना  उपासमारी,  बेरोजगारी सहन करावी लागत आहे पण महापालिका प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे.  सध्या स्थलांतर करण्यापेक्षा आहे त्या निवा-यात सुरक्षित राहून कोरोना प्रतिबंधकात्मक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. जसे वारंवार हात धुणे. घरात स्वच्छता ठेवणे. टाॅयलेट बाथरूम स्वच्छ ठेवणे वैगरे.  मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करणे  इत्यादी.

सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळले तर कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यात  आपण यशस्वी होऊ शकतो हे  लक्ष्यात  घेऊन वागायला हवे.  कोरोना बाधित  व्यक्ती जास्त निर्माण होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने दिलेल्या सुचनांचे पालन काटेकोर पणे करायला हवे.

स्थलांतर टाळून अत्यावश्यक मदत कशी मिळेल याकडे लक्ष केंद्रित करून  प्रत्येकाने  सतर्क रहाणे  क्रमप्राप्त झाले आहे. अन्नधान्य,  औषधे, जीवनावश्यक वस्तू  उपलब्ध करून देण्यात महापालिका प्रयत्नशील आहेत. त्यांना  सहकार्य करावे.  मनुष्यबळ आणि परीसर निर्जंतुकीकरण याची निकड निर्माण झाली आहे. स्थलांतरित होऊन संसर्गाचा धोका  अधिक फैलावेल तेव्हा  जिथे  आहात तिथे राहून  आरोग्य सांभाळणे अधिक महत्वाचे ठरेल.

पायी प्रवास करून संसर्गाला  खतपाणी घालण्यापेक्षा घरात सुरक्षित थांबून कोरानाचा संसर्ग  रोखता येईल असे मला वाटते.   वैद्यकीय मदत मिळेल  अशी  उपाय योजना सर्व स्तरावर व्हायला हवी. स्थलांतरित होताना होणारा संसर्ग धोका लक्षात घेऊन  आहे त्या ठिकाणी कसे सुर्य रहाता येईल याचा विचार करून  उपाय योजना करा.  गावी जाणे टाळावे.  तरच हा धोका टाळता येईल.

स्थलांतर नको, स्थित्यंतर हवे. अफवे पेक्षा मदतीचा हात अशा वेळी जास्त महत्वाचा आहे. ही मदत कशी करता येईल याचा विचार करून प्रत्येकाने  वागले पाहिजे.  टिंगल टवाळी थांबवून  गांभीर्याने ही समस्या हाताळायला हवी.

स्थलांतर  न करता अशा लोकांना अन्नदान केले तर  त्यांचा प्रवास थांबवता येईल. जन संपर्क  मदतीसाठी करावा निरर्थक जनसंपर्क टाळला तर आपण या समस्येवर मात करू शकतो.  आर्थिक मदत ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर करावी.

पुढ्यातले ताट द्या पण बसायचा पाट देऊ नका या म्हणीचा अन्वयार्थ लक्ष्यात घेऊन वागायला हवे. मदत  आणि  काळजी आरोग्य  सावधानी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. त्या पाळणे अनिवार्य आहे.

स्वतःचे, कुटुंबाचे  आरोग्य आणि स्वच्छते ची

काळजी  योग्य प्रकारे घेऊन आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणून प्रत्येक जण या  लढाईत सहभागी होण्याची वेळ  आली आहे.   .अनावश्यक  घराबाहेर पडणे टाळले तरी  आपण खूप मोठे योगदान देऊ शकतो हे लक्ष्यात घ्या. .

वेळ महत्वाची संयमाची,  वैचारीक कृतीची आहे.  आपण  घेतलेली आपली काळजी आपल्याला वाचवू शकते.  परोपकार मदतकार्य करताना माणुसकी म्हणुन करा. फोटो ची अपेक्षा धरून मदत कार्य करू नका. आता स्वतःला वाचवा  आणि मौलिक योगदान द्या. असे  आवाहन करण्याची वेळ आली आहे. जय हिंद. जय भारत.

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 28 ☆ बुकीची सून ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है।  श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके स्वानुभव  एवं  संबंधों  पर आधारित  संस्मरणात्मक कथा  “बुकीची सून ”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है।  ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 28 ☆

☆ बुकीची सून ☆ 

(विषय   :- व्यक्तिरेखा )

दिवाळीची सुट्टी सुरू झाली होती त्यामुळे मोठी मुलगी व तिच्या मुली आल्या होत्या.सकाळच्या वेळी मी अंगण झाडत होते माझ्या दोन्ही नाती अश्विनी अक्षया माझ्या मागेपुढे करत होत्या.त्या शहरात रहात असल्याने त्यांना मोठ्ठ अंगण म्हणजे अगदी अप्रूप वाटायचं.

दसरा नवरात्रीची धामधूम संपली की आमच्या दारावर रांगोळी विकणाऱ्या बायका येतात.तशीच एक जाडजूड काळी बाई डोक्यावर रांगोळीचं भांड घेऊन “रांगोळी

..ए ..असं जोरजोरात म्हणत

आली अन्  माझ्या जवळच थांबली न् मला म्हणाली ” आवो ,ऽऽ घ्यावो ..ऽऽ. ताई… एकदम पांढरी लयी छान हाय बगा.”

दसऱ्याला घेतलेली बरीच रांगोळी शिल्लक असल्यानं मी तिच्या बोलण्याकडं लक्ष दिलं नाही मी माझं हातातलं काम करत राहिले तशी घ्याहो.. म्हणून माझ्या मागेच लागली. मी म्हटल मागचीच शिल्लक आहे आणि आता घरादारात फरशा बसवल्यात त्यामुळे रांगोळी फार संपत नाही गं…मग मात्र माझं लक्ष वेधून घेण्यासाठी ती जोरात म्हणाली आवो ताई  तुमच्या ” बुकीची सून हाय ओ….मी….!” .

तिचं बोलणं ऐकून माझ्या दोन्ही नातींना काही उलगडा होईना .

या भिकारणीसारख्या दिसणाऱ्या  बाईची सासू …आजीची ” बुकी “… म्हणजे काय..?..

पण मला झाला..

कारण….

सुमारे पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी भिक्षा मागण्यास बंदी नव्हती. त्यावेळी आमच्या पेठेत एक भिकारीण रोज यायची. तेव्हा आजच्या सारख्या घंटागाड्याही नव्हत्या. कोपऱ्या कोपऱ्यावर नगर परिषदेच्या कचरा कुंड्या असायच्या.

तर ही भिकारीण आमच्या सगळ्यांच्या घरच्या केरकचऱ्याच्या बादल्या त्या कुंडीत रित्या करायची. आणि त्याबदल्यात तिला सर्व घरातील उरलेलं शिळं अन्न दिलं जायचं.

ती मुकी असल्यानं तिचं नाव कुणाला माहीत नव्हतं ऐकूही येत नसल्यानं तिच्याशी कोणाचा संवाद नसायचा, पण मी मात्र तिच्याशी खाणाखुणांनी बोलायचे. कधीमधी तिला छान  ताज ताक, थंडगार कलिंगडाची फोड द्यायचे. तिला ते खूप  बरं वाटायचं खाऊन पिऊन झाल्यावर ती मला  स्वत:च्या छातीवर हात ठेवून जीभ टाळ्याला लावून टक्क् असा मोठ्ठा आवाज करायची म्हणजे खूप छान होतं, आवडलं .! असं सुचवायची.

मलाही खूप बरं वाटायचं.तशी ती नाकी डोळी नीटस होती.

तिला मुकी भिकारीण असं ल़ोक म्हणत आणि ते माझ्या मुलांना आवडायचं नाही. म्हणून त्यांनी तिचं नाव शाॅर्टमधे करायचं ठरवलं. मुकी भिकारीण म्हणून आधी ” भुकी ” म्हणायचं असं  सर्वांनी ठरवलं पण त्यातून ती भुकेली आहे असा निष्कर्ष निघतो इति माझा मोठा मुलगा ! मग तो म्हणाला आपण तिला “बुकी” म्हणूया…मग सर्वांनी एकमताने अनुमोदन देऊन तिचे नामकरण “बुकी” असे झाले.तेव्हापासून ती आमच्या पेठेची बुकी झाली.

तिचं येणं नित्यनियमाचं असायचं.एकदा बरेच दिवस ती आलीच नाही बरं.. चौकशी तरी कुठं करायची.दोन अडीच महिन्यांनी एकेदिवशी ती दिसली.सगळ्यांनी विचारुन तिला बेजार केलं. मग मीच तिला एक दिवस खुणेनं विचारलं तेव्हा लाजत लाजत कपाळावरच्या कुंकवाकडे हात दाखवून नवऱ्याकडे गावी गेले‌होते असं. म्हणाली.

असेच काही दिवस गेले आणि ती पोटुशी असल्याचं लक्षात आलं.मग आम्ही तिला जरा आंबट चिंबट पदार्थ लोणची असं देऊन आम्ही आनंद घेत होतो.व तिचं जरा कौतुक करत होतो तीलाही ते आवडत होतं.मग तिला मुलगा झाला.त्याला काखेच्या झोळीत बांधून ती यायला लागली.ते बाळही गुटगुटीत छान होतं विशेष म्हणजे ते बोलू शकतं हे खुणेनेच  सांगताना तिला झालेल्या आनंदाचं वर्णंनच नाही करता येणार.?

कालांतराने भिक्षा मागण्यास शासनाने मनाई केल्यामुळे की काय ती परत आम्हाला दिसलीच नाही. आम्हीही आमच्या रोजच्या घर ऑफिस मुलं सुना नातवंडे यात गुंतल्याने तिला विसरून गेलो.

आणि आज माझ्या “बुकीची सून” प्रत्यक्ष माझ्या समोर उभी !

आता नको असली तरी अधूनमधून मी तिच्याकडून रांगोळी घेते. तिचा आवाज मात्र भसाडा घोगरा आहे…ती ” रांगोळी ‘.. म्हणून ओरडत येते तेव्हा कानावर हात ठेवावा लागतो. आता हिचं नाव काय ठेवावं असा प्रश्न पडलाय.

सुचवाल कां एखादं नाजूक सुंदर नाव…

माझ्या बुकीच्या सूनेसाठी…!

कां आपलं हेच बरं आहे..” बुकीची सून ‘!!!

 

©®उर्मिला इंगळे

सतारा  मो –  9028815585

दिनांक:-.२१-३-२०

!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – आलेख ☆ उतारवयातील लग्न… ☆ सौ .योगिता किरण पाखले

सौ .योगिता किरण पाखले

(आदरणीया सौ .योगिता किरण पाखले जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की  सशक्त हस्ताक्षर हैं। आप कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी रचनाएँ स्तरीय पत्र पत्रिकाओं / चैनलों में प्रकाशित/प्रसारित हुई हैं। आज प्रस्तुत है आपकी  जीवन के संध्याकाळ में विवाह पर एक विचारोत्तेजक आलेख    उतारवयातील लग्न… ।  आपने इस आलेख में  उपरोक्त विषय पर जीवन के संध्याकाळ में होने वाले विवाह का भरे पूरे परिवार पर प्रभाव साथ ही यदि वृद्ध युगल में कोई एक शेष रहता है अथवा वृद्धाश्रम में रहता है तो जीवन पर प्रभाव पर विस्तृत विमर्श किया है।  हम भविष्य में आपकी और चुनिन्दा रचनाओं को प्रकाशित करने की अपेक्षा करते हैं।)   

 ☆ उतारवयातील लग्न… ☆

काही दिवसांपूर्वी व्हाट्स अप वर एका लेखकाचा प्रेमाविषयीचा लेख वाचला. प्रेमाचे अनेक टप्पे ज्यात त्यांनी मांडले होते. प्रत्येक वयात होणाऱ्या प्रेमाचे स्वरूप ,त्याची कारणं आणि गरज सुद्धा वेगवेगळी असते. मग ते प्रेम किशोर वयातील प्रेमापासून  ते वृद्धत्वा पर्यंत नव्हे तर  शेवटच्या श्वासापर्यंतचे असो….

प्रेमाला वयाचं बंधन कुठे? होय ना … आणि ते नसतंच आणि नसावं सुद्धा.

“संसारी लोणचं मुरतं  तारुण्य सरल्यावर

चाखतो चव त्याची जशी प्रेमात पडल्यावर”

पण या मुरलेल्या लोणच्याची चव चाखण्यासाठी जोडीदार मधेच सोडून गेला तर ?आज समाजात बघितले तर 50 ते 60 वर्षापुढील माणसे ही एकटी आहेत. संसाराच्या अर्ध्या वाटवेर जोडीदाराने साथ सोडली. त्यांच्या परिवारात मुलं ,मुली ,नातवंड आहेत पण….. उणीव आहे ती हक्काच्या आधाराची !!!

ती मिळवून देण्यासाठी समाजाने घालून दिलेली किंबहुना स्वतःच कुठेतरी बिंबवून घेतलेली अलिखित नियम आडवी येतात. काळानुसार बदल आणि गरजेनुसार काळ कुठेतरी बदलतोय म्हणून या अलिखित नियमांच्या (चौकटीच्या) बाहेर जाऊन या वयात लग्न ही गोष्ट जन्म घेऊ लागली आहे.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजेच दोन चार भाऊ आणि त्यांचे कुटुंब एकत्र होते. त्यात जर कुणाचा जोडीदार सोडून गेला याचे दुःख हे कुटुंबासोबत राहून विरून जायचे.आणि मी वर म्हटल्याप्रमाणे अलिखित नियम तर होताच; परंतु फार फार तर दोन किंवा एक अपत्य असलेल्या आई वडिलांच्या जीवनात असा प्रसंग येतो तेव्हा हा विचार जन्म घेतो.

आता हा विचार योग्य की अयोग्य या दोन शब्दात उत्तर देणं म्हणजे फक्त बुद्धी किंवा मन याच्या एकाच अंगाने विचार करण्यासारखे असेल. खरं तर कुठलीही गोष्ट ही व्यक्तिपरत्वे तिच्या प्राप्त परिस्थितीनुसार  योग्य आणि अयोग्य यात बांधली जाते. परंतु एक तटस्थ व्यक्ती एका बाजूला झुकलेल्या मापापेक्षा फक्त मधोमध असलेल्या काट्या कडे पहातो तेव्हा तो विचार हा योग्य आणि अयोग्य या शब्दांच्या पलीकडचा होतो. त्याला वास्तवाची झालर असतेच असते.

जर या वयातील व्यक्तींनी दुसरा जोडीदार निवडला तर त्याची आज 30 ते 35शीत असलेली मुलं, मुली हे बाहेरून आलेली आई किंवा वडील स्वीकारतील का ?त्यांना आई बाबा म्हणून हाक मारतील का ? सख्यांसारख नाही पण किमान आपूलकीचं नात निर्माण होईल का? याच उत्तर कदाचित हो राहील असतं पण जेव्हा मुलं ही लहान असती. कारण लहानपणापासून त्यांचं संगोपन बाहेरून आलेल्या आई किंवा वडिलांनी केलं असतं .पण मुलांचीही आज 4 ते 5   वर्षाची मुलं असतात ते त्याचा संसारात गुंतलेली असतात अशात आई वडिलांचे लग्न हे स्वीकारणे खरचं झेपेल का? हे झालं मुलांच्या बाबतीत. पण सुनेचा विचार केला तर आज सख्खे सासू सासरे ही जिथे नको असतात तिथे परक्या व्यक्तीचा विचार होईल की नाही  याची शाश्वती कशी देणार..?

उदाहरणासह सांगायचं तर (सासूचा विचार करू) सासूचे दुसरे लग्न करायचे यात  बघितलं तर सासूला हक्काचा जोडीदार मिळेल म्हणजेच तिची आर्थिक जबाबदारी त्याचप्रमाणे भविष्यात  वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक व्याधी याची मोठया प्रमाणात जबादारी जोडीदार घेईल. यामुळे आपोआपच सासूचे मुलं, सूना यातून बऱ्याच अंशी  जबाबदारीतून मोकळे होतील.

परंतू जेव्हा घरात नवीन आई, सासू आणायची आहे तेव्हा मुलं व सुनेची जबाबदारी वाढेल  सर्वच बाजूने. या सर्व परिणामांचा विचार सर्व अंगाने करणे गरजेचे आहे.

एक सत्य घटना नमूद करावीशी वाटते. ‘एका व्यक्तीने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरे लग्न केले . मुलांची इच्छा नसतांना. तो आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन. त्याची मुले ही कमावती ज्यांना वडिलांच्या संपत्तीची हाव आणि गरज नाही . ते जोडपे  त्या मुलांमध्ये न रहाता वेगळे रहायचे. ती व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याची पत्नी काळजी देखील घेत नव्हती आणि शेवटी ती व्यक्ती वारली  या आधीच त्या व्यक्तीची सर्व संपत्ती त्या बाईने स्वतःच्या नावावर करून ठेवली होती . तुमचा  बाप वारला हे सुद्धा त्या मुलांना  कळविण्याची तसदी तिने घेतली नाही .  याचे मुलांना फार वाईट वाटले .तिचा हेतू फक्त संपत्ती मिळवणे इतकाच होता.’ या घटनांचा विचार अशा वयात लग्न करतांना घ्यायला हवा.

ज्यांना मुलबाळ नाही व जीवनसाथी अर्ध्यात सोडून गेला त्यांच्यासाठी या वयातील लग्न हे त्यांच्या आयुष्याला सुखाचे वळण नक्कीच देणारे आहे. ज्यांची मुले  त्यांचा सांभाळ करीत नाहीत अथवा वृद्धाश्रमात रहातात अशा साठी सुद्धा जीवनसाथी मिळणं सुखावह आहे.

तारुण्यात लग्न करतांना शिक्षण, सौंदर्य, पैसा ,प्रतिष्ठा या गोष्टीचा मुख्यतः विचार होतो मात्र  उतरत्या वयात फक्त निखळ प्रेम,आधार आणि सगळ्यात महत्त्वाचा शुद्ध हेतू ठेवून लग्न व्हायला हवीत कारण या वयात जर विश्वासघात झाला तर ते दुःख सहन करण्याची ताकद कशी बरं राहील…..!

उतरत्या वयात होणारी लग्न ही काळाची गरज आहे. हा बदल स्वागतार्ह नक्कीच आहे  परंतु तो  प्रत्येकाच्या कौटुंबिक परिस्थिती नुसार ,वास्तविकतेला अनुसरून,परिणामांचा विचार या सर्व बाबी (condition) त्यात रहाणाऱ्या आहेतच. जशा नाण्याला दोन बाजू असतात त्यातील एक बाजू किंवा दोन्ही बाजू देखील  बघून चालणार नाही तर त्याची तिसरी बाजू जो बघू शकतो तो यशस्वी नक्कीच होईल यात शंका नाही.

 

© सौ. योगिता किरण पाखले, पुणे

मोबा 9225794658

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 39 – त्या हळूवार, अलवार  क्षणांची  साक्षीदार ……… ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ  “कवितेच्या प्रदेशात” में  उनके चौदह वर्ष की आयु से प्रारम्भ साहित्यिक यात्रा के दौरान उनके साहित्य  के   ‘वाङमय चौर्य’  के  कटु अनुभव पर आधारित एक विचारणीय आलेख “त्या हळूवार, अलवार  क्षणांची  साक्षीदार ……….  सुश्री प्रभा जी  का यह आलेख इसलिए भी विचारणीय है, क्योंकि  हमारी समवयस्क पीढ़ी को साहित्यिक चोरी का पता काफी देर से चलता था जबकि सोशल मीडिया के इस जमाने में चोरी बड़ी आसानी से और जल्दी ही पकड़ ली जाती है। किन्तु, शब्दों और विचारों के हेर फेर के बाद  ‘वाङमय चौर्य’  के  अनुभव को आप क्या कहेंगे। प्रत्येक व्यक्ति अपने जीवन को अपने तरीके से जीता है।  जैसे वह जीता है , वैसा ही उसका अनुभव होता है।  इस अतिसुन्दर  एवं विचारणीय आलेख के लिए  वे बधाई की पात्र हैं। उनकी लेखनी को सादर नमन ।  

मुझे पूर्ण विश्वास है  कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी  के उत्कृष्ट साहित्य का साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 39 ☆

☆  त्या हळूवार, अलवार  क्षणांची  साक्षीदार ……… ☆ 

वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी कविता माझ्या आयुष्यात आली. शाळेत असताना हस्तलिखिताच्या निमित्ताने!

विसाव्या वर्षा नंतर कविता थांबेल असं मला वाटलं होतं, पण काही  वर्षे थांबल्या नंतर….कवितेच्या पुन्हा प्रेमात पडले, कवितेला व्यासपीठ मिळालं, अनेक ग्रुप मिळाले,  एका ग्रुप मधल्या बारा तेरा वर्षांनी मोठ्या असलेल्या कवयित्री बरोबर मैत्री झाली. आमची घरे जवळ असल्यामुळे  एकमेकींच्या घरी जाणं, कविसंमेलनात एकत्र सहभागी होणं, रिक्षा शेअर करणं यामुळे मैत्री वाढली, पण काही वर्षापासून असा शोध लागला की त्या कवयित्री कडे स्वतःची चांगली कविता नाही, ती सादर करत असलेल्या, दाद घेणा-या सर्व कविता मान्यवर कवींच्या चोरलेल्या कविता आहेत, हल्ली फेसबुक, व्हाटस् अॅप मुळे तिच्या चो-या उघडकीस आल्या, तिने त्या त्या कवींची माफीही मागितली पण निर्ढावलेपण अंगी मुरलेलं, वयाची पंचाहत्तरी उलटून गेली तरी व्यासपीठावर कविता सादर करण्याची इच्छा, दुस-यांच्या कविता वाचून दाद, मोठेपणा मिळवायची सवय लागलेली, कवयित्री म्हणून प्रतिमा पूर्ण डागाळलेली……पण मैत्रीच्या नात्याचं काय?

काही आयोजकांच्या मते आता तिच्या या वयात तिला वाळीत टाकणं म्हणजे तिला धक्का बसून ती कोलमडून जाईल, म्हणून वाङमय चौर्य हा गुन्हा माफ करायचा का ? थोड्या थोडक्या नव्हे वीस पंचवीस चोरलेल्या कवितांच्या आधारे सगळी कारकीर्द गाजवली! बाई उच्चशिक्षित, मराठीत एम.ए. असलेली, पण कवितेची चोर नव्हे तर अट्टल दरोडेखोर! तिला वृत्ताची जाण नाही पण अनेक वृत्तबद्ध कविता अनेक वर्षे सादर केल्या इतकंच नव्हे त्या दुस-यांच्या कविता स्वतःच्या संग्रहातही छापल्या. एका कवीने “पोलिसकेस करीन” म्हटल्यावर तिने  त्याला जाहीर माफी पत्र लिहून दिले ते फेसबुक वर प्रसिद्ध झाले!

केवढी ही शोकांतिका! असे मोह का होत असतील? तिच्या बरोबर केलेल्या अनेक मैफिली आठवल्या, तिचं खोटेपण, चोरटेपण आज लक्षात आलं!

कवयित्री म्हणून ती निश्चितच बाद झाली पण मैत्री चं काय?? त्या हळूवार, अलवार  क्षणांची  साक्षीदार असलेली पण सतत काव्यक्षेत्रात दुस्वास करणारी, कुरघोडी करू पहाणारी ती……एक प्रश्नचिन्ह बनूनच राहिली आहे!

तिने मुक्तपणे माळली, दुस-याच्या बागेतली

सुंदर सुंदर फुले स्वतःच्या केसात…

आणि मिरवली

गंध स्वतःच्याच मालकीचा असल्याच्या तो-यात,

ती फुलं ही दुस-याची आणि गंधही परकाच असल्याचं समजलं सगळ्यांना

आणि बागेतल्या सा-याच फुलांनी केला  उठाव…..

तिची लूट थोपवण्यासाठी…

कवितेचे कित्येक ताटवे…   परतताहेत आता…

आपापल्या मालकांकडे  !

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ कुसुमाग्रज – जन्म दिवस विशेष – मी मराठी बोलतेय… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज – जन्म दिवस विशेष

कविराज विजय यशवंत सातपुते

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है  स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज – जन्म दिवस पर विशेष  आलेख  “मी मराठी बोलतेय…”)

 ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज – जन्म दिवस विशेष –  मी मराठी बोलतेय…☆

 

“होय.. तुमची माय मराठीच बोलतेय! सर्व प्रथम माझ्या वर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व सान थोर सुपुत्रांना अनेकानेक शुभाशिर्वाद. आज विष्णू वामन शिरवाडकर  उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. या दिवशी मला राजभाषा म्हणून माझा गौरव दिन साजरा करण्यात येतो आहे हे पाहून मन भरून आलय. मित्र हो,  आज मला बोलायचय.!”

“महानुभाव पंथीय काळापासून आपण माझा प्रचार प्रसार करीत आला आहात.  अकराव्या शतकापासून मी तुम्हाला  आणि तुम्ही मला समृद्ध करीत  आलो आहोत. गुरू बंधू निवृत्ती नाथ यांच्या कृपाशार्वादाने संत  ज्ञानेश्वरांनी *भावार्थ दीपिका* लिहिली आणि माझे विकास पर्व सुरू झाले.”

ग्रामीण संस्कृती परंपरा,  उत्सव, रिती रिवाज,  बालसाहित्य,  लोकसाहित्य,  लोककला सारं काही मौखिक स्वरूपात घराघरातून ऐकू यायचं. अभंग, भूपाळी, भजन, कीर्तन,  ओवी, कीर्तन, भारूड तमाशा ही सारी माझी संवाद माध्यमे. . . ! संत कवी, पंत कवी, तंत कवी यांनी मला लेखनातून शारदीय सारस्वतात मानाचं स्थान दिलं.  छंदोबद्ध रचनांनी, ललित  अलंकारिक, वैचारीक, गूढ,  आणि वैज्ञानिक साहित्याने माझं अंतःकरण समृद्ध केले. मला  एका पिढीतून दुसर्‍या पिढी कडे सन्मानाने पोहोचवले. माय भाषा, मायबोली म्हणून माझा सन्मान केला. !”

“कौतुकाचे गोडवे पुस्तक पोथ्या पुराणात बंदिस्त झाले आणि दैनंदिन व्यवहारात मात्र माझे स्वरूप संमिश्र, धेडगुजरी, झाले.  अनेक भाषा भगिनी  एकत्र येऊन माझ्या  आश्रयाने स्वतःची पथारी पसरू लागल्या. मराठी शाळेचे भवितव्य धोक्यात आले आणि मग मात्र मला माझ्या  अस्तित्वाची चिंता वाटू लागली.”

“बकुळीच्या फुलाप्रमाणे दरवळणारी मी (मराठी) आतल्या आत घुसमटत राहू लागले. *वाचन संस्कृतीचा -हास* हे नवे संकट समोर  उभे ठाकले.  ओवी ज्ञानेशाची,  गाथा तुकोबांची माझे शब्द   पूर्णब्रम्ह,  करणारी असली तरी संत परंपरा,  आणि  प्रबोधन काळ मागे पडला. प्रबोधन  आणि वैचारिक साहित्य पुस्तकात बंदिस्त झाले. नाही म्हणायला संतकवी,  पंतकवी, यांनी संस्कारांचा पारीजात रूजविला. त्याची पाळेमुळे,  अभिजात साहित्याकडे झेपावली.”

“कधी भक्ती, कधी शक्ती, कधी सृजन मातीत

नृत्य, नाट्य, कला, क्रीडा, यातून माझा प्रवास सुरू होता. नवरस,अलंकार,वृत्त छंद,साज हे सारं पुढच्या पिढीत पोहचत नाही ही खंत मनाला जाचत आहे

आजही अय्या,ईश्य,उच्चाराला, अन्य भाषेत तितका प्रभावशाली प्रती शब्द आलेला नाही!”.

“माझ्या लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, गायक, लोककलावंतानी माझा   कला संस्कृती वारसा आजही जोपासला आहे. त्याचा मला अभिमान आहे शाहीरांच्या पोवाड्यात,माझा आरसा दिसतो आहे!”

“मला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी माझे   काही सुपुत्र अत्यंत निष्ठेने प्रयत्न करत आहेत. भाषा हे संवाद माध्यम  असले वैचारिकता, सृजनशीलता आणि संशोधन संक्रमित करण्यात तीचा वाटा नेहमीच महत्त्व पूर्ण राहिला आहे.  भाषा सक्ती पेक्षा भाषेची  आसक्ती निर्माण होईल  असे  उपक्रम,  असे संस्कार लेकरांनो आपण पुढच्या पिढीवर करू शकलात तर मला कोणताच धोका नाही.”

“गौरव दिन हा शब्द समारंभा पुरता असू नये, त्यातील मतितार्थ प्रत्येकाच्या बोलीभाषेत व्यक्त झाला तरी, तुमची मायबोली म्हणून मिरवल्याचे, माझ्या वैभवशाली परंपरेचे सार्थक होईल, असे मला वाटते. लेकरांनो मला कुणाला दोष द्यायचा नाही पण  .. . *तुझी आई फाटकी साडी नसते* हा आरोप विनाकारण सहन करू नका. तुमच्या वैचारिक संपन्नतेत मी आलंकृत आहे.  लेकरांनो स्वतः मोठे होताना  इतरांना मोठे करायला विसरू नका.  बंदिस्त साहित्य नव्या पिढीला वाचायला द्या. माणसाने माणसाला वाचू देत. माणूस माणसाला वाचायला शिकला ना की त्याची मायबोली पण सालंकृत झालीच समजा. !”

“शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, संगणकीय तंत्रज्ञान प्रत्येक ठिकाणी मला तुमची साथ द्यायला आवडेल. कुणी कसा, किती, केव्हा आणि  कधी माझा वापर करायचा हे मात्र लेकरांनो सर्वस्वी तुमच्याच हातात आहे.  *ज्ञानार्जन* *ज्ञानदान* आणि *नव निर्मिती* यात माझे पाऊल कधीही मागे नव्हते, मागे नाही आणि मागे नसेल याची खात्री बाळगा. मी तुमची आहे  आणि तुम्ही माझे  आहात याची जाणीव सदैव  असू देत.”

“अच्छा .. चला निरोप घेते. या निमित्ताने मन मोकळे झाले. जय हिंद. जय महाराष्ट्र !”

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य ☆ जन्म दिवस विशेष – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ पुण्य स्मरण ☆ सुश्री स्वप्ना अमृतकर

स्व विष्णु वामन शिरवाडकर

जन्म : 27  फ़रवरी 1912, पुणे
निधन : 10 मार्च 1999, नाशिक

ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित सुप्रसिद्ध मराठी  साहित्यकार (कवी , लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक) स्व विष्णु वामन शिरवाडकर अपने  उपनाम कुसुमाग्रज के नाम से जाने जाते हैं। आपको 1987 में ज्ञानपीठ पुरस्कार से सम्मानित किया गया। विश्व में  आपके जन्मदिवस को मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस के रूप में मनाया जाता है।

इस सन्दर्भ में सुश्री ज्योति  हसबनीस जी का स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘ कुसुमाग्रज ‘  जी  पर आधारित आलेख को  निम्न लिंक पर क्लिक कर अवश्य पढ़ें। यह मेरा सादर आग्रह है। 

☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 6  – अनाम वीरा  – कुसुमाग्रज  ☆ 

ई-अभिव्यक्ति उनके जन्मदिवस पर उनके गौरवपूर्ण साहित्य सृजन के लिए स्व विष्णु वामन शिरवाडकरजी का  पुण्य स्मरण एवं उन्हें नमन करता है।

इस अवसर पर ई-अभिव्यक्ति से सम्बद्ध युवा साहित्यकार स्वप्ना अमृतकर की भावनाएं हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ साझा करना चाहते हैं। 

☆ जन्म दिवस विशेष – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ पुण्य स्मरण – सुश्री स्वप्ना अमृतकर☆

आज दि. २७ फेब्रुवारी २०२० हा दिवस प्रतिभासंपन्न महान कवी, लेखक श्री. वि.वा.शिरवाडकर सरांचा जन्मदिवस आहे, त्यांच्यावर मी काही माझ्या शब्दांत माझे भावतरंग मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मनातले भावतरंग श्री.वि.वा.शिरवाडकरांसाठी:

व्यक्त अव्यक्त विचारांची खोल दरी ओलांडूनी नितळ मनाच्या काठावर येवून सुरेख शब्दांचासाठा लेवूनी महान शब्दसखा कवितेच्या प्रवासात कवितेलाच बालपणांत, यौवनांत रूजवून अनेक रूपरंगांत काळीजकूपीतून अत्तरासम शब्दांना कवितांमध्ये पसरवूनी हलकीशी जागा देत देत आशयबद्धतेत मोहरून कवितेची प्रतिभा मराठी साहित्य जगतात उंचावून, प्रतिभासंपन्न कवी श्री वि. वा. शिरवाडकर सरांनी स्वत:ची ओळख लेखणीतून भक्कम करून मराठी भाषेला सन्मान देण्यात यशस्वी ठरले होते.
त्यांना शतश:नमन ..

स्वप्ना अमृतकर (पुणे)..

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 35 – आज प्रेम बदलत चाललयं का…? आणि निखळ प्रेम  कसं असावं…? ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

 

(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं।  सुश्री रंजना  एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं।  सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से  जुड़ा है  एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है।  निश्चित ही उनके साहित्य  की अपनी  एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज  प्रस्तुत है  आपका एक सामयिक एवं विचारोत्तेजक आलेख  “आज प्रेम बदलत चाललयं का…? आणि निखळ प्रेम  कसं असावं…?)

☆ साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य # 35 ☆ 

 ☆ आज प्रेम बदलत चाललयं का…? आणि निखळ प्रेम  कसं असावं…?

आज प्रेम बदलत चाललयं का ? असा विचार करण्या पेक्षा आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम आहे हे समजून घेण्याची आज खरी गरज आहे. आयुष्यातील अनेक वळणावर आपल्याला अनेक व्यक्ती आवडून जातात, मग ते एखाद्या मित्र असेल, मैत्रीण असेल,एखादा सहकारी असेल, शिक्षक असतील, शिक्षिका असतील किंवा आणखी  कुणी असेल, जीवानात येणाऱ्या प्रत्येकाचा वेगळा रंग,वेगळा ढंग,  वेगळी जीवन शैली, वेगवेगळे स्वभाव, गुण आपल्या मनात नकळत घर करून जाते याचा अर्थ माझं समोरच्या व्यक्तीवर प्रेम आहे असं समजणे आणि त्याला खतपाणी घालणे कितपत बरोबर आहे  आणि असं असेल तर आयुष्यात किती वेळा आणि किती जणांशी आपण प्रेम करणार आहोत परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की कुठेतरी याच आकर्षणाला आज प्रेम समजून त्याला खतपाणी घातलं जातं….! ज्याच्या एखाद्या पैलुवर भाळून आपण प्रेम करायला लागलो त्याचे इतर गुण/  बाबी नाही आवडल्या की ब्रेकअप असा प्रकार सर्रास पाहायला मिळतो परंतु ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला त्याच्या गुणदोषासह स्विकारणं म्हणजे प्रेम असतं हा संस्कारच आज समूळ नष्ट होताना दिसत  आहे. एक प्रियकर किंवा प्रेयसी शंभर टक्के परफेक्ट असणे हे फक्त नाटक /सिनेमातच   शक्य आहे आपल्याला कधी कळणार आहे कोण जाणे …….!

जगात फक्त प्रियकर आणि प्रेयसी, नवरा/ बायको एवढीचं नाती आहेत का…..? विश्व बंधुत्वाची परंपरा जपणाऱ्या देशात निख्खळ मैत्री, मानस भाऊ बहीण, आई वडील,काका मामा, आजी आजोबा ही सगळी लयाला गेली आहेत का…?

थोडंस आपलं लहानपणीचे दिवस आठवा वडिलांचे सगळे मित्र काका त्यांची मुले ताई-दादा, आत्त्याच्या मैत्रीणी आत्त्या आईच्या माहेरी सगळे मावशी मामा आजी आजोबा असायचे. ही सगळी नाती तितक्याच आत्मियतेने सांभाळली जायची यात  जिव्हाळा, प्रेम,आपुलकी, सुरक्षितता ओतप्रोत भरलेली असायची परंतु आजच्या चौकोनी कुटुंबात पाचवा माणूस परका समजला जातो…! हीच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मग ज्याच्या बद्दल आपल्या मनात अशी जिव्हाळ्याची सुरक्षिततेची भावना निर्माण होते तो प्रियकर किंवा प्रेयसी असा अर्थ लावून  मोकळे होतो आणि पुढचे मनोरे बांधायला सुरुवात करतो आणि नकळत ते ढासाळले की ….. ! अनेक विकृतींचा यातूनच जन्म होतो….।

खरी गरज आहे या चौकोनातून बाहेर पडून ताईची मैत्रीणी ताई अन् दादाचा मित्र दादा असू शकतो हे वास्तविक संस्कार  मनावर बिंबवण्याची…अन्यथा कुठलाही कायदा ही परिस्थितीत बदलण्यासाठी असमर्थ ठरतील यात वादच नाही.

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

Please share your Post !

Shares
image_print