स्वाती दाढे “सुखेशा” हे नाव वाङ् मय क्षेत्रात सुपरिचित आहे. गेली अनेक वर्षे अनेक दर्जेदार मासिकांमधून तिच्या कविता प्रकाशित होत आहेत.
सुखेशा झाडाझुडपात, पानाफुलात, पक्षांमध्ये रमणारी संवेदनशील कवयित्री,तिची कविता तिच्या सौम्य, मृदुल व्यक्तिमत्त्वासारखीच तरल, हळूवार आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश नाही. या कवयित्रीने कुठलीच पताका खांद्यावर घेतलेली नाही, या कवितेत कुठलाच “वाद” नाही तरीही ही समग्र कविता अतिशय प्रगल्भ आहे,
या कवितांना आध्यात्मिक बैठक आहे, निसर्गाची ओढ आहे,स्त्रीजाणिवा, मैत्री, प्रेम, सामाजिक बांधिलकी, आई…..असे अवती भवतीचे सारे विषय ही कविता चितारते!
“जाणिवांच्या परिघात” हा सुखेशाचा दुसरा कविता संग्रह आहे. तिचा “मन हिंदोळा हिंदोळा” हा कविता संग्रह २०१५ मधे प्रकाशित झाला आहे. “जाणिवांच्या परीघात” मध्ये त्यानंतरच्या म्हणजे २०१६ ते २०२१ या कालखंडात लिहिलेल्या आहेत, बहुतांश कविता विविध मासिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत!
या संग्रहातील कविता सुसंस्कृत मनाचे हुंकार आहेत, एक शिस्तबद्ध सहजसुंदर, सुरेख शब्दकाळा असलेली ही कविता निश्चितच मोहात पाडते. कवयित्रीने आपल्या कवितेचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. पहिल्या भागात सुंदर अभंग रचना आहेत.
कमलिनी पत्र कोरडे जलात
निर्लिप्त, स्वमग्न डोलतसे ॥
या अभंग रचनेमागे कवयित्रीचे फार मोठे चिंतन आहे हे जाणवते, एकूणच काव्य रचनेत चिंतन, मनन, अभ्यासू वृत्ती, व्यासंग जाणवतो!
व्यासांची प्रतिमा उष्टावे जगात
ते महाभारत नित्य येथे ॥
जीवनातील सत्य उकलून दाखवणारे अनेक अभंग दाद घेऊन जातात.
स्वशोधाची, आत्मभान असलेली ही कविता आहे. स्री म्हणून जगताना आलेले अनुभव, क्वचित कुचंबणा,उपेक्षा खूप बारकाईन तिची लेखणी टिपते, तिने केलेल्या रचनांना ती गझलसदृश म्हणते, ती कुठल्याही वादात अडकत नाही,
या ठिकाणी मला ख्यातनाम हिंदी कवी निरज यांचा कुणीतरी सांगितलेला किस्सा आठवला, ते गझल समीक्षकांना म्हणाले होते, “तुम्ही माझ्या रचनांवर काही टीका करा, त्या माझ्या गितिका आहेत. “
सृष्टी घेते बहुविध रूपे,मोहक कधी भेसूर
परी न लोपो अंतरीचा तो निर्मळ उमदा सूर
या सर्व कवितांमध्ये कवयित्रीने अंतरीचा निर्मळ उमदा सूर जपलेला आहे.अनेक रचना खूप मोहक आहेत, अगदी मनात रुंजी घालणा-या !
नकळत हासुनि पाहता तुझ्याकडे
वावडि इश्काची उठवतात लोक
किंवा
हवे तसे सजून धजून, पुरव हौस स्वतःची
हाक येता सोडून सारे निघायला हवे
या सर्व कवितांमधे आत्मचिंतन आहे, ही कविता प्रांजळ,प्रामाणिक आणि स्वच्छ आहे! या कवितेने स्वानंद स्वर जपलेला आहे.कवयित्रीने बंगाली भाषा आत्मसात केली,त्यात विशेष प्रावीण्यही मिळवले. मा.रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा अभ्यास व अनुवाद केला आहे, सुखेशाची लेखणी चौफेर संचार करणारी आहे,या कवयित्रीला चांगल्या गोष्टींचा ध्यास आहे आणि एकला चालो रे…..या उक्ती प्रमाणे ती आत्ममग्न राहून हा ध्यास जपते आहे.
माझ्यावर मी टीका करणे आहे सोडून दिले
मीच स्वतःला कमी लेखणे आहे सोडून दिले
आजकालच्या जमान्यात प्रत्येकाची श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ लागलेली दिसते, अत्यंत सामान्य वकुबाची माणसेही बढाचढाकर स्वतःच्या कार्य कर्तृत्वाची खोटी शेखी मिरवताना दिसतात तेव्हा खरोखर असा प्रश्न पडतो आपणच का स्वतःला इतकं कमी लेखतोय? विनयशील रहातोय? आपल्याकडे जे आहे ते स्वतःचं आहे, प्रांजळ आहे, निखळ आहे मग का स्वतःला कमी लेखतोय आपण?
या संग्रहातील पुढील द्विपदी पहा–
भरभर किती बाई आवरु हा पसारा
चिडचिड अति होई कोंडला जीव कारा
अशी अप्रतिम रचना ती सहजपणे लिहून जाते.
तिस-या भागात संमिश्र कविता आहेत, तृणी या पादाकुलक वृत्तातील कवितेत मनोहर निसर्ग चित्र आहे, “रद्दी” ही कविता मला विशेष आवडली,यात प्रत्येक कवयित्री/लेखिकेचे सनातन दुःख नेमकेपणाने आले आहे, प्रतिभा ही ईश्वरदत्त देणगी असलेल्या स्त्रीची उपेक्षा…श्रेय न देण्याची वृत्ती हे सार्वत्रिक सत्य आहे, ” ” श्रेयाचा लाभ न होणं,या सारखा दुसरा शाप नाही ” असं म्हटलं जातं ते “रद्दी” या कवितेत दिसतं.
“तिनोळी” या नाजूक काव्य प्रकारातल्या काही कणिका–
माघाची चाहूल
खोडांवर खळबळ
आली की पानगळ
*****
वाढतं वय
ओसरतं सौंदर्य
मनभर औदार्य
या सर्व कवितांमध्ये विविधता आहे,जीवनातील महत्वपूर्ण असे विषय या कवितांमधे आले आहेत.
सावळ मेघांनी कोंदले आभाळ
आता रानोमाळ जलोत्सव
ही कवयित्री निसर्गावर नितांत प्रेम करते हे तिच्या अनेक कवितांमधून जाणवते!
स्त्रीपुरूष समानतेची तिची मागणी सौम्य शब्दात ती व्यक्त करते.
सद्यस्थितीवर भाष्य करणारी दोन विडंबन गीते अंतर्मुख करणारी आहेत. “जाणिवांच्या परिघात” दखल घेण्याजोगा, वाचनीय, आरस्पानी कविता संग्रह आहे. या कवितांमधून कवयित्रीच्या प्रगल्भ जाणिवा जाणवत राहतात!हा काव्यसंग्रह अनाहत प्रकाशनाची सुंदर पुस्तक निर्मिती आहे.
१९८२-ची घटना.जानेवारी महिना; दुपारची वेळ,. मध्यप्रदेशातील राजनांदगांव स्टेशन. एक साधारण ३५शीतली बाई, खांद्याला पर्स कम बॅग,. आणि दोन्ही हातात कशीबशी सांभाळलेली, म्हणजे जरा कसरत करतच धरलेली सतार — अगदी छान गवसणी घातलेली, घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट बघत उभी होती. जरा कावरीबावरी, भिरभिरती नजर, चेहर्यावर पुर्ण बावळटपणा.
तेवढ्या धाडधाड करत गाडी आली.
काही मिनिटांचा हॉल्ट म्हणुन सगळा जामानिमा सांभाळत, फारसा विचार न करता., शिरली समोर येऊन थांबलेल्या डब्यात.
“बहेनजी रिझर्वेशनका डिब्बा है, आप अंदर नही आ सकती”.अशा येणाऱ्या सूचनांकडे सोईस्कर दुर्लक्ष केले.
ओळखलेत ना सख्यांनो, कोण होती ती महाभाग.अहो कोण काय? “अस्मादिक”. हो मीच.
अन् गाडी सुटली की हो लगेच.
चला. कुठला का डबा असेना,
गाडी तर मिळाली म्हणुन “हुश्श” केले.
हातातली सतार सांभाळत कसेबसे पुढे जाणार. डोळे वर केले तर समोर काळ्या कपड्यातला टी. सी. वाटले बाणासुर, भस्मासुर. भीमासुर, बकासुर कोणीही समोर उभा ठाकला असता तरी घाबरले नसते हो. कारण कृष्णसखा, भीम, अर्जुन यांचा धावा तरी करता आला असता मदतीसाठी.
पण आता कोणाचा धावा करु? चेहरा करता येईल तेवढा ओशाळवाणा केला.”चला आयते सावज समोर आले” या नजरेने टी.सी.महाराज माझ्याकडे नखशिखांत बघायला लागले.सीतामाईसारखी धरणी नसली तरी रेल्वे पोटात घेईल तर बरे असे वाटु लागले.
“बहेनजी, programme से आयी हो बंबईतक जाना है?.टिकेट दिखाओ, ये स्लीपर कोच है.आपका सीट नंबर?”
मनातल्या मनात “”अरे देवा. मुंबई कुठली? नागपूरपर्यंतचे साधे तिकीट आहे बाबा माझ्याकडे”.
पण आवंढा गिळत, मनात जुळवाजुळव करत, माझ्या फर्मास हिंदीमध्ये, “भाईसाब, वो क्या हुआ की, जल्दीसे, चुकीसे, सॉरी गलतीसे मैं जो सामने आया वो डब्बे मे चढ गई. मुझे नागपुरतकही जाना है. आप कहते हो तो अगले स्टेशनपर दुसरे डब्बे मे जाऊंगी”. माझा जरा सामोपचार.अगदी बिनशर्त.
टी.सी. “आप पहिली बार इस ट्रेनसे ट्रॅवल कर रही होंगी.नागपुरतक ये ट्रेन कोनसेही स्टेशनपे जादा देर रुकती नही.आपको फाईन देना होगा”.
हरे रामा. पुर्ण जर्नीच्या दीडपट–म्हणजे कलकत्ता-मुंबई तिकिटाच्या दीडपट.डोळ्यातुन पाणी यायचे तेवढे बाकी होते.
तेवढ्यात, तिथल्याच कंपार्टमेंट बसलेले एक वयस्कर गृहस्थ,”बेटी आप खैरागड –संगीत युनिव्हर्सिटी से आयी हो?”
क्षणाचाही विलंब न लावता मी “हां, हां, वहीसे”
“आप सितार बजाती हो.आओ.नागपुरतकही जाना है ना.४,५घंटेका सवाल.यहॉं बैठ सकती हो.”
अन् टी.सी. ला नागपुरपर्यंतच प्रश्ण आहे. आणि आता ही बाई एकटी कुठे जाईल. वगैरे सांगून मला बसायला परवानगी देण्यास अगदी मधुर शब्दात.अस्सल हिंदीचा लहेजा सांभाळत सांगितले. टी.सी.
“पंडितजी, आप करह तो इसलिये मै मानता हुं. बहेनजी बैठ सकती हो. मैं भी सितार बजाता हुं. चेकिंग करके आता हुं. आपसे बातचीत करनेके लिये.”
परत, धर्मसंकट. कारण, सतार काय साधे तुणतुणे ही मला वाजवायला येत नव्हते.
झाले काय होते. माझी नणंद खैरागडला रहात होती. तिचे मिस्टर त्या युनिव्हर्सिटीत तबल्याचे प्रोफेसर होते. त्यांचे नुकतेच अकाली निधन झाले होते. आणि तिला तिच्या मुलांना घेऊन लगेच कोल्हापुरला आणले होते. आणि तिथली क्वार्टर सोडायची म्हणुन तिचे सर्व सामान आणायला हे, मी आणि तिचे दीर गेलो होतो.
सर्व सामान २,३ दिवसात पॅक केले पण ट्रक वेळेवर न आल्याने त्या दोघांना सामान लोड करे पर्यंत तिथे थांबणे भाग होते. नागपुरला बहिणीकडे माझ्या लहान मुलीला ठेवले होते म्हणुन मी मिळेल त्या गाडीने निघाले होते.नणंदेची सतार मला माझ्याबरोबर आणल्याशिवाय पर्याय नव्हता.
आणि माझ्या हातातील सतारीने मी कोणीतरी सतारवादक आहे असा गैरसमज झाला होता.आणि आता तो तसाच ठेवणे माझ्यादृष्टीने आवश्यकच होते.
कारण त्या सतारीमुळेच पंडितजींनी मला बसायला जागा दिली.
पण–पण बसल्याबसल्या पंडितजींनी गायन- वादन यावर माझे बौध्दिकच घेतले.शास्त्रीय संगीताचा माझा संबंध फक्त सा रे ग म —सरगमपुरताच.
बागेश्री, भीमपलास, मियाकी तोडी, जयजयवंती सगळे मला सारखेच.
काळी पाच, का काय ते ही मला माहित नाही. हिंदी बोलणे ही अगदी अफलातुन. पण पंडितजी खुप गप्पिष्ट. त्यात भर म्हणजे दिल्या शब्दाला जागुन टी. सी. महाशय ही
बातचीत करायला येऊन बसले. तेही संगीतातले दर्दी.
आणि मी ही तज्ञ(?) म्हणुन मलाही गप्पात सामिल करुन घेत होते.
कुठेतरी, काहीतरी जुजबी वाचलेले, ऐकलेले, आणि आठवणीत असलेले अधूनमधून बोलुन “हां भाईसाब, आप सही कहते हो.” “वा क्या बात है”
वगैरे वाक्ये फेकत, अस्तित्वात नसलेल्या गुरूचे, कधीही न केलेल्या मैफिलींचे – खोटे वाटणार नाही इतपत वर्णन करत – थापा मारत खिंड लढवत होते खरी. पण मनातल्या मनात कधी हसत , कधी घाबरत नागपुर लवकर येवो ही प्रार्थना करत होते.
कसाबसा प्रवास संपवला.
आणि घरी आल्यावर मात्र बहिण, मेहुणे, भाचे कंपनीला सर्वच किस्सा रंगवून सांगितला. आणि नंतरही जे भेटेल त्याला माझी कलाकारी सांगत होते,.
गायन -वादनातली नसेना का पण अभिनयातील औटघटकेची कलाकार म्हणुन यशस्वी ठरले.
दगड्या नेहमीसारखाच हलतडुलत, लटपटत, झोके खात घरी परतला. कुठे वाटेत न पडता घर आलं, म्हटल्यावर त्याला जग जिंकल्याचा आनंद झाला.
तसा उशीर खूपच झाला असावा. सगळी गपगार झोपली होती. दगड्या आला काय, नाय आला काय, वाटेतच कुठे झिंगून पडला काय, कोणालाच सोयरसुतक नव्हतं.
अचानक दगड्याला पोटात पडलेल्या प्रचंड खड्ड्याची जाणीव झाली. भुकेचा तो खड्डा एवढा प्रचंड होता, की चुलीपर्यंतचं चार पावलांचं अंतरही त्याला चार कोसांचं वाटलं.
जेमतेम दोन मुदी भात आणि गाडग्याच्या तळाला गेलेलं कालवण….. दगड्याचं पोट अर्धंमुर्धंही भरलं नाही. म्हातारीला उठवून जेवण बनवायला लावावं आणि पोटभर जेवावं,मग तिने शिव्या घातल्या तरी चालतील, असं त्याच्या मनात आलं. पण त्याच्यात तेवढंही त्राण नव्हतं. मग रागाने शिव्या घालत तो उठला. जेमतेम हात बुचकळून म्हातारीला ढकलून तो तिच्या बाजूला पटकुरावर आदळला. म्हातारी झोपेतच जराशी कण्हली . दादल्या, त्याची बायको चिमी चिप्प झोपली होती.
“ए मुडद्या, ऊठ की रं. सूर्य डोईवर आला. कामाबिमाला जायचं सोडून आयतं गिळायला जल्म घेतलाय. म्हातारीने या वयात जमत नसताना दुसऱ्याच्या शेतात जाऊन मरायचं आणि या म्हाराजानं निसतं ढोस ढोस ढोसायचं. चार मानसं काय खातील, इतकं हा एकटाच गिळतोय. दादल्या आणि चिमी तर तुला भायेर काढाया टपल्येयत. मी आणि भावड्या कसंबसं थोपवतोय त्यास्नी. आता दारू जरा कमी कर, मसन्या आणि कामाचं बघ.”
मजुरीवरून परत आलेल्या म्हातारीची तणतण ऐकून दगड्याची झोपमोड झाली. तो जाम वैतागला.
“चा हाय का तय्यार? चाचा प्येला भरला की मगच मला उठीव.”
फुर्रर्र फुर्रर्र चहा पिणाऱ्या दगड्याकडे लक्ष गेलं मात्र, म्हातारी एकदम दचकली.
“प्येला खाली ठ्येव. प्येला खाली ठ्येव की रं मुड…..”
पण दगड्याने पेला पुरा रिकामा झाल्यावरच खाली ठेवला. म्हातारी डोळे फाडून त्याच्याकडे बघतच राहिली.
“काय गं म्हातारे, भूत दिसल्यावाणी काय बघतीस?”
म्हातारीच्या तोंडून शब्दच फुटेना झाला. ती आपली टकाटका बघतच राहिली दगड्याकडे.
झालंच तर होतं तसं.त्याचे ओठ तोंडल्याच्या दुपटीने टरटरले होते. नाक फुललं होतं. गालाचा तर जाम फुगाच झाला होता.
“मारुती. व्हय. मारुतीच झालाय रं माझा दगड्या.”
किती वर्षांनी म्हातारीने आपल्याला ‘माझा’ म्हटलं, म्हणून दगड्या फुशारून गेला.
म्हातारीचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. खरंच. दगड्या थेट मारुतीसारखाच दिसत होता. म्हणजे मारुती आला का काय दगड्याच्या अंगात?
म्हातारीने दगड्यापुढे लोटांगण घातलं. दगड्याने डोळे विस्फारून म्हातारीकडे पाहिलं. आये, आणि नमस्कार घालतेय आपल्याला!रात्री ढोसलेल्या दारूची नशा आता जास्तच चढली का काय!पण म्हातारी खरंच झोपली होती, त्याचे पाय धरून.मग मात्र तो घाबरला, म्येलीबिली का काय ही?
सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
श्रीगणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात.
या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत.
पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस
दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस
तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची जयंती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो.
तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.
भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढय़ा मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते.
पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते.
दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.
तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे.
त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.
पूजा कशी कराल?
मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. नंतर, १६ उपचारांनी (षोडशोपचार) पूजा करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. अथर्वशीर्षाचे पठण करावे. अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे. मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्वशीर्षाचे पठण फलदायी ठरते.
या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी ४ पर्यंत केव्हाही पूजा करावी. त्यातही माध्यान्हावेळी अर्थात दुपारी १२ वाजताची वेळ उत्तम.
माघी गणेश जयंतीचा उत्सव हा एक दिवस की, त्याहून अधिक दिवस साजरा करावा, हा निर्णय प्रत्येकाने स्वत:चा स्वत: घ्यावा. स्वत:च्या सोयी आणि मर्जीनुसार ते ठरवता येते. माघी गणपतीला २१ दूर्वा का वाहतात, कारण मातृदेवता २१ आहेत, असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे. त्यामुळे त्याला २१ दूर्वा वाहतात, असे म्हटले जाते. गणपती हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते.
☆ मी प्रवासिनी क्रमांक १८ भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
झांबेझीवर झुलणारी झुंबरं
नैरोबीहून लुसाका इथे जाणाऱ्या विमानात बसलो होतो. लुसाका येण्यापूर्वी अर्धा तास वैमानिकाच्या केबिनमधून सर्वांना डावीकडे बघण्याची सूचना करण्यात आली. आफ्रिकेतल्या सर्वात उंच किलिमांजारो पर्वताचे विहंगम दर्शन विमानातून घडत होते. गडद निळसर- हिरव्या पर्वतमाथ्यावरचे शुभ्र पांढऱ्या बर्फाचे झुंबर सूर्यकिरणांमुळे चमचमत होते.
लुसाका ही झांबियाची राजधानी आहे. लुसाका येथून लिव्हिंग्स्टन इथे जगप्रसिद्ध ‘व्हिक्टोरिया फॉल्स’ बघायला जायचे होते. बसच्या खिडकीतून बाहेरचे रमणीय दृश्य दिसत होते. स्वच्छ सुंदर सरळसोट रस्त्यापलीकडे हिरव्या गवताची कुरणे होती. गहू, ऊस, मका, टोमॅटो, बटाटे यांची शेती दिसत होती. त्यात अधून-मधून अकेशिया ( एक प्रकारचा बाभूळ वृक्ष ) वृक्षांनी हिरवी छत्री धरली होती. हिरव्यागार, उंच, चिंचेसारखी पाने असलेल्या फ्लेमबॉयंट वृक्षांवर गडद केशरी रंगाच्या फुलांचे घोस लटकत होते. आम्रवृक्षांवर लालसर मोहोर फुलला होता.
थोड्याच वेळात अमावस्येचा गडद काळोख दाटला. काळ्याभोर आकाशाच्या घुमटावर तेजस्वी चांदण्यांची झुंबरं लखलखू लागली. आमच्या सोबतच्या बाबा गोडबोले यांनी दक्षिण गोलार्धातील त्या ताऱ्यांची ओळख करून दिली. नैऋत्य दिशेला शुक्रासारखा चमकत होता तो अगस्तीचा तेजस्वी तारा होता.सदर्न क्रॉस म्हणून पतंगाच्या आकाराचा तारकासमूह होता. आपल्याकडे उत्तर गोलार्धात हा तारका समूह फार कमी दिसतो.हूकसारख्या एस्् आकाराच्या मूळ नक्षत्रामधून आकाशगंगेचा पट्टा पसरला होता. मध्येच एक लालसर तारा चमचमत होता. साऱ्या जगावर असलेलं हे आभाळाचं छप्पर, त्या अज्ञात शक्तीच्या शाश्वत आशीर्वादासारखं वाटतं .
आम्ही जूनच्या मध्यावर प्रवासाला निघालो होतो. पण तिथल्या व आपल्या ऋतुमानात सहा महिन्यांचे अंतर आहे. तिथे खूप थंडी होती. लिव्हिंगस्टन इथल्या गोलिडे लॉजवर जेवताना टेबलाच्या दोन्ही बाजूंना उंच जाळीच्या शेगड्या ठेवल्या होत्या. दगडी कोळशातून लालसर अग्निफुले फुलंत होती त्यामुळे थंडी थोडी सुसह्य होत होती.
दुसऱ्या दिवशी आवरून रेल्वे म्युझियमपर्यंत पायी फिरून आलो. ब्रिटिशकालीन इंजिने त्यांच्या माहितीसह तिथे ठेवली आहेत. नंतर बसने व्हिक्टोरिया धबधब्याजवळच्या रेल्वे पुलावर गेलो.झांबेझी नदीवरील या पुलाला शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत. हा रेल्वे पूल ब्रिटनमध्ये बनवून नंतर बोटीने इथे आणून जोडण्यात आला आहे. या रेल्वेपुलाला दोन्ही बाजूंनी जोडलेले रस्ते आहेत. पुलाच्या एका बाजूला झांबिया व दुसऱ्या बाजूला झिंबाब्वे हे देश आहेत. या देशांच्या सीमेवरून वाहणाऱ्या झांबेझी नदीवर हा विशालकाय धबधबा आहे. पुलाच्या मध्यावर उभे राहून पाहिलं तर उंचावरून कोसळणारा धबधबा आणि खोल दरीतून वर येणारे पांढरे धुक्याचे ढग यांनी समोरची दरी भरून गेली होती. त्या ढगांचा पांढरा पडदा थोडा विरळ झाला की अनंत धारांनी आवेगाने कोसळणारे पांढरेशुभ्र पाणी दिसे. इतक्या दूरही धबधब्याचे तुषार अंगावर येत होते.
दोन डोंगरकड्यांच्या मधून पुलाखालून वाहणारी झांबेझी नदी उसळत, फेसाळत मध्येच भोवऱ्यासारखी गरगरत होती.पुलाच्या दुसऱ्या बाजूला बंगी जम्पिंगचा चित्तथरारक खेळ सुरू होता. कमरेला दोरी बांधून तरूण-तरूणी तीनशे फूट खोल उड्या मारत होत्या.झांबेझीने आपल्या प्रवाहात इंद्रधनुष्याचा झोपाळा टांगला होता. इंद्रधनुच्या झोक्यावर साहसी तरुणाई मजेत झोके घेत होती. साखरेच्या कंटेनर्सनी भरलेली एक लांबलचक मालगाडी रेल्वे पुलावरून टांझानियाच्या दारेसलाम बंदराकडे चालली होती.झांबियाची ही साखर जपान,अरब देश वगैरे ठिकाणी निर्यात होते.
दुपारी म्युझियम पाहायला गेलो. जगातील सर्वात प्राचीन मनुष्यवस्तीच्या खुणा आफ्रिकेत सापडतात. एक लक्ष वर्षांपूर्वीपासून मनुष्य वस्ती असल्याचे पुरावे या म्युझिअममध्ये ठेवले आहेत. अश्मयुगातील दगडी गुहांची घरे, त्याकाळच्या मनुष्याच्या कवट्या,दात हाडे आहेत. आदिमानवाने दगडावर कोरलेली चित्रे, मण्यांचे दागिने, शिकारीची हत्यारे, लाकडी भांडी, गवताने शाकारलेल्या झोपड्या, गवती टोपल्या, अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडांचे नमुने व माहिती दिलेली आहे.बाओबाओ नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहे. त्याला भाकरीचे झाड असेही म्हणतात. या झाडाची फळे खाऊन आदिमानवाचा उदरनिर्वाह होत असे. पिवळसर बुंधे असलेले हे बाओबाओ वृक्ष म्हणजे हत्ती व जिराफ यांचे आवडते खाणे आहे.
नंतर हेलिकॉप्टर राईडसाठी जायचे होते. एका वेळी तीन जणांना घेऊन हेलिकॉप्टर झेप घेते. झांबेझीच्या प्रवाहाभोवतीचा दलदलीचा प्रदेश, तसेच त्यातील पाणघोडे, हत्ती,गेंडे यांचे जवळून दर्शन झाले. आफ्रिकेतील गेंड्यांच्या नाकावर दोन शिंगे असतात. आपल्याकडे आसाममधील गेंडे एकशिंगी असतात. दरीतून वाहणाऱ्या झांबेझीच्या दोन्ही कडांवर इंद्रधनुष्याचे पंख पसरले होते. हेलिकॉप्टरबरोबर ते इंद्रधनुष्य पुढे पुढे धावत होते. हेलिकॉप्टरच्या पट्टीवर उतरलो तर समोर पन्नास फुटांवरून दहा-बारा थोराड हत्ती- हत्तीणी व त्यांच्या पिल्लांचा डौलदार कळप गजगतीने एका सरळ रेषेत निघून गेला.
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)।
☆ शब्दांजलि – सरस्वती की सुर साधिका सरस्वती में विलीन ☆ श्री कमलेश भारतीय ☆
भारत कोकिला, सुर साम्राज्ञी, सरस्वती पुत्री लता मंगेशकर आखिर उसी में विलीन हो गयीं। गीत- संगीत में एक पूरे युग का अंत हो गया। पिछले कुछ दिनों से लता मंगेशकर बीमार थीं और अस्पताल में जीवन व मृत्यु के साथ संघर्ष कर रही थीं लेकिन हार गयीं जिंदगी की जंग और जा मिलीं सरस्वती से। एक दिन पहले ही सरस्वती पूजन था, बसंत पंचमी थी और दूसरे दिन सरस्वती अपनी सबसे प्रिय पुत्री को अपने साथ ले गयीं।
लता मंगेशकर का जीवन संघर्षपूर्ण रहा। बचपन से ही पिता दीनानाथ मंगेशकर के निधन के बाद पांच भाई बहनों की जिम्मेदारी इनके कोमल कंधों पर आ गयी और कितने संघर्षों के बीच अपने परिवार का सहारा बनीं तो इसी सुर संगीत से। कुछ अभिनय भी किया शुरू में । इनकी बहन आशा को भी इसी क्षेत्र में सम्मान मिला । परिवार व भाई बहनों का पालन पोषण करते करते आजीवन अविवाहित ही रह गयीं। सचिन तेंदुलकर को अपने बेटे समान मानती थीं। इनके शौक थे क्रिकेट देखना, संगीत सुनना और कुछ कुछ राजनीति में भी रूचि रखती थीं। क्रिकेट के लिए तो इतनी दीवानगी थी कि आधी आधी रात तक जागतीं थीं, मैच का लुत्फ उठाने के लिए। संगीत की इतनी दीवानगी कि आखिरी पलों और दिनों में भी अपने पिता के संगीत को सुन रही थीं और खुद गुनगुनाने की कोशिश कर रही थीं। राजनीति में वे कभी जवाहर लाल नेहरू की तो आजकल नरेंद्र मोदी की प्रशंसक थीं।
जवाहर लाल नेहरू से पहली मुलाकात उसी मशहूर गीत से हुई जो उनकी मौजूदगी में गाया –
ऐ मेरे वतन के लोगो,
जरा आंख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
जरा याद करो कुर्बानी ,,,
इस गीत को सुन कर जवाहर लाल नेहरू की आंखों से झर झर आंसू बहने लगने थे और उन्होंने कहा भी कि बिटिया, तुमने तो हमें रुला ही दिया और इतना सम्मान दिया कि प्रधानमंत्री आवास पर चाय के लिए आमंत्रित किया। यह बात इस गीत के रचयिता प्रदीप ने बताई थी। प्रदीप के इस गीत को लता ने अपनी आवाज से अमर कर दिया। कितने गाने गाये लेकिन यह गाना सबसे हिट रहा और सदैव गाया जायेगा और याद दिलाता रहेगा कि लता की आवाज ही उनकी पहचान थी और रहेगी। प्रधानमंत्री मोदी पहले भी आशीर्वाद लेने गये थे और अंतिम यात्रा में भी शामिल हुए। इससे बड़ा सम्मान क्या होगा ?
यह भी एक कमाल की पंक्ति है कि मेरी आवाज ही पहचान है , ,, आज यह नये गायकों के लिए एक मंत्र है कि अपनी आवाज इतनी बढ़िया बनाओ कि यही आपकी पहचान बन जाये यानी इतना डूब जाओ अपने काम में कि आपकी पहचान खुद ब खुद बन जाये। पंजाबी, गुजराती, मराठी न जाने कितनी भाषाओं में गीत गाये और कीर्तिमान बनाये। सारे पुरस्कार/सम्मान इनके आगे छोटे पड़ते गये और लता दीदी इन सम्मानों से कहीं ऊपर पहुंच गयीं। यह भी एक मंत्र है कि सम्मान के पीछे न भागो, इतना काम करो अपने फील्ड में कि सम्मान आपके पीछे पीछे आएं। दिलीप कुमार को अपना राखी बंद भाई मानती थीं और उनके ही एक तंज से उर्दू सीख ली। बड़ी उम्र की होने के बावजूद नयी नायिकाओं के लिए गाना कोई खेल नहीं था पर वे इतना मधुर गाती कि लगता ही नहीं था कि कोई उम्रदराज गायिका गा रही है। फिर इतना करुणामय गाया कि सारा देश रो दिया और रो देता है आज भी जब आवाज आती है -ऐ मेरे वतन के लोगो,,,,
सच , ऐ मेरे वतन के लोगो अब लता दीदी हमारे बीच नहीं रहीं, यह विश्वास करना बहुत मुश्किल है पर विश्वास करना पड़ेगा और उनकी आवाज सदैव उनकी पहचान बनी रहेगी।
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है बुंदेली गीत “हिलमिलकर ही जीवन जीना… ”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
मनोज साहित्य # 19 – सजल – हिलमिलकर ही जीवन जीना… ☆