हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 99 ☆ # कितने दूर, कितने पास… # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “#कितने दूर, कितने पास…#”

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 99 ☆

☆ # कितने दूर, कितने पास… # ☆ 

सुबह सुबह मार्निंग वाक में

घूमते हुए

ठंडी ठंडी शुद्ध हवा को

चूमते हुए

हमारा पुराना रिटायर्ड मित्र मिला

बातों का चल पड़ा सिलसिला

उसी समय उसके अमेरिका वाले

पुत्र का फोन काल आया

हमारा मित्र खुशी से मुस्कुराया

पुत्र ने पूछा,’ पापा ! आप और मम्मी कैसे हैं ?

दोनों की तबीयत कैसी है ?

मित्र ने कहा,’ सब बढ़िया है

आप लोग भी खुश रहो,

मुस्कुराते रहो ‘

 

कुछ देर बाद दूसरे पुत्र का फोन आया,

पापा,’ आपकी तबियत कैसी है?

शुगर नार्मल है या पहले जैसी है?

मित्र ने कहा – यार, मस्त हूँ 

अपने आप में व्यस्त हूँ

कल ही चेक कराया है,

सब नार्मल आया है

सब खा पी रहा हूँ,

मस्ती में जी रहा हूँ.

मित्र ने बताया यह एयर फोर्स में है,

हमको प्यारा मोस्ट है,

श्रीनगर में पोस्ट है

 

दोनों बेटे सुबह सुबह फोन करते हैं,

हाल चाल पूछते रहते हैं,

दोनों बड़े सुशील समझदार बच्चे हैं,

यार, मुझसे तो दोनों अच्छे हैं

मैंने कहा,’ भाई तुम भाग्यवान हो,

किस्मत वाले इन्सान हो

तुम्हे जीते जी मोक्ष मिल गया है

जीवन में ही स्वर्ग खिल गया है

वरना –

आज के युग में

बच्चे माँ-बाप को बोझ कहते हैं

बुढ़ापे में लोग क्या क्या सहते हैं

साथ में रहकर भी

माँ-बाप को कोई पूछता नहीं है

बीबी बच्चे के सिवा उनको

कुछ सूझता नहीं है

हमारे जैसे कितने साथ रहकर भी

बच्चों से कितने दूर हैं

यह बात बहुत ही खास है

कि

तुम्हारे बच्चे देश-विदेश में रहकर भी ,

तुम्हारे कितने पास है /

© श्याम खापर्डे

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

विद्याधर गोखले

विद्याधर संभाजीराव गोखले (4 जानेवारी 1924 – 26 सप्टेंबर 1996) हे पत्रकार व संगीत नाटककार होते.

प्रथम गोखले शिक्षक म्हणून काम करत होते.नंतर ते पत्रकार म्हणून ‘नवभारत’मध्ये व पुढे ‘लोकसत्ता’त गेले.त्यांनी ‘साप्ताहिक लोकसत्ते’ची  पूर्ण जबाबदारी सांभाळली. पुढे  ते ‘दैनिक लोकसत्ता’चे संपादक झाले.

अमरावतीत त्यांना ‘सावधान’ या वृत्तपत्राच्या वीर वामनराव जोशी यांचा सहवास लाभला. त्याबरोबरच गोखलेंनी न. चिं. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, शि. म. परांजपे यांच्या लेखनाचा खास अभ्यास केला. संपादकीय लेखनाचे धडे त्यांनी ह. रा. महाजनी यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. त्यांनी विपुल प्रमाणात संपादकीय लेखन केले.

त्यांची शैली गांभीर्यापेक्षा रंजकतेकडे झुकणारी होती. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यातील वचने व कल्पना ते आपल्या अग्रलेखात वापरत.संपादकाने प्रक्षोभक लिहिण्यापेक्षा मुद्यांकडे,भाषेच्या व शब्दांच्या नेटक्या वापराकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांचे मत होते. त्यांचे लेखन सरळ, सुबोध असून त्यात विनोदाचा शिडकावा असे.

‘सं.जय जय गौरीशंकर’, ‘सं. पंडितराज जगन्नाथ’, ‘सं. मदनाची मंजिरी’, ‘सं. मंदारमाला’, ‘सं. सुवर्णतुला’,  ‘सं.स्वरसम्राज्ञी’  वगैरे गोखलेंनी लिहिलेली नाटके रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. त्यांनी ‘झंझावात’ ही कादंबरीही लिहिली.

गोखलेंनी रंगशारदा प्रतिष्ठानची स्थापना केली.

ते 1989-1991 या काळात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई या संस्थेचे ते 1995-1996 दरम्यान अध्यक्ष होते.

1993मध्ये सातारा येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

पुण्यात विद्याधर गोखले यांच्या नावाचे, संगीताचे व अभिनयाचे कार्यक्रम करणारे संगीत- नाट्य प्रतिष्ठान आहे.

मुंबईतील दादर येथील बाळ गोविंददास मार्ग व सेनापती बापट मार्ग हे दोन रस्ते एकमेकांना मिळून तयार झालेल्या चौकास नाटककार विद्याधर गोखले यांचे नाव दिले आहे.

मुंबई पत्रकार संघातर्फे दरवर्षी चांगल्या लेखक -पत्रकाराला विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार देण्यात येतो.

विद्याधर गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली!🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नंदादीप… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नंदादीप … ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

अंधाराचा नाश करून

दिवा देतो प्रकाश

यासाठी तो पूजनीय,वंदनीय

अंधारात कसे चालावे?

धडपडणार नाही का आपण?

सरळ रस्ता सोडून

जाऊ की हो भलत्याच मार्गावर!…

दाटला अंधार माणसाच्या मनात

दिसत नाही त्याला

काय चांगले काय वाईट.

भरकटत जातो मग

आणि पडतो की हो खड्यात…

महाराष्ट्राची परंपरा मोठी

लावले त्यांनी ज्ञानदीप

माणसाला प्रकाश देण्यासाठी

पंत संत तंत

वाटा उजळविल्या त्यांनी

सुश्लोक वामनाचा

ओवी ज्ञानेशाची

अभंग तुकयाचा

आर्या मयूरपंताची

हीच पणती मिणमिणती,

हीच समई नि हाच लामणदिवा…

ज्ञानेशांचा ज्ञानदिवा

अखंड तेवत आहे

सामान्यांना परमात्म्याचे

ज्ञान वाटत आहे.

असीम त्यांचे शब्दभांडार

जीवनातील द्दृष्टांत देऊन

आत्मज्ञानाचा प्रकाश टाकत आहे

मनावरची मळभे दूर सारत आहे…

तुकाराम,नामदेव,जनाबाई

संत प्रत्येक जातीतले

संसाराच्या दरेक वस्तूत

दिसला त्यांना साक्षात परमेश्वर

वाट दाखविली भक्तीची

महिमा वर्णिला समर्पणाचा

अंधःकार दूर झाला

माणसाच्या मनातला…

संसार करता करता

ठेचकाळला माणूस अंधारात

विसरला त्याचा धर्म,त्याची कर्तव्ये

दासांनी दिला बोध प्रापंचिकाला

दिवटी धरून हातात सन्मार्ग दाखविला…

सुभाषितांनी केले ज्ञानाचे वाटप

शिकविला भल्या बुर्‍यातला फरक

कोणा वंदावे कोणा निंदावे

जाणिले सज्जन आणि दुर्जनांना

सतत तेवत आहे हा नंदादीप…

आभार ह्या दीपाचे कसे मानावे?

त्याने दाखविलेल्या वाटेने चालावे

हीच त्याची पूजा हीच कृतज्ञता…

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 99 ☆ तूच आहे मनोहरा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

 

?  हे शब्द अंतरीचे # 99 ? 

☆ तूच आहे मनोहरा… ☆

कृष्णा केशवा माधवा,

आलो शरण मी तुला

नको अंत पाहू माझा

घोर लागला जीवाला…०१

तूच आहे मनोहरा

माझा सदैव कैवारी

नको मला काही दुजे

बहू त्रासलो संसारी…०२

किती जन्म वाया गेले

माझे मला न कळले

गणित अवघड पहा

नाही कोडे, कधीच सुटले…०३

चालू जन्म माझा कृष्णा

तुझ्याचं लेखी लागावा

राज जीवनाचे कठीण

धाव मोहना, समयाला…०४

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार – पुष्प – भाग ३६ – परिव्राजक १४ – मध्यभारत ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जुनागडहून स्वामीजी पालिताणा, नडियाद, बडोदा इथे फिरले. जुनागडच्या दिवाण साहेबांनी बडोद्याला जाताना ज्यांच्या नावे परिचय पत्र दिलं होतं ते बहादुर मणीभाई यांनी बडोद्याला स्वामीजींची व्यवस्था केली होती. तिथून स्वामीजी लिमडीच्या ठाकूर साहेबांखातर महाबळेश्वरला गेले. ठाकुर साहेबांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली होती. तिथे ते एक दीड महिना राहिले. त्या काळात महाबळेश्वर हे एक श्रीमंत व्यापारी आणि धनवंत संस्थानिक यांचं, दिवस आरामात घालवण्याचं एक ठिकाण मानलं जात होतं. इथला मुक्काम आणि ठाकूर यांची भेट आटोपून, ते पुण्याहून ते खांडवा इथं गेले आणि तिथले वकील हरीदास चटर्जी यांच्याकडे उतरले. दोन दिवसातच त्यांना स्वामीजी एक केवळ सामान्य बंगाली साधू नसून, ते असाधारण असं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे हे कळलं. तिथे अनेक बंगाली लोक राहत होते, त्यांचीही स्वामीजींची ओळख झाली. काही वकील, न्यायाधीश, संस्कृतचे अभ्यासक असे लोक भेटल्यानंतर स्वामीजींचे उपनिषदातील वचनांवर भाष्य, संगीतावरील प्रभुत्व, आणि एकूणच त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व यामुळे हे लोक भारावून गेले होते.(खांडवा म्हटलं की आठवण झाली ती अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार गांगुली यांची, हे सिनेसृष्टीतले गाजलेले कलावंत सुद्धा या खांडव्याचेच राहणारे.)

खांडव्याहून स्वामीजींनी इन्दौर, उज्जैन, महेश्वर, ओंकारेश्वर या ठिकाणी भेटी दिल्या. भारतातल्या  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवाचे स्थान असलेले उज्जैन शहर, महाकवी कालीदासांचे उज्जैन, दानशूर आणि कर्तृत्ववान असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे  इन्दौर आणि महेश्वर, अशी पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणं पाह्यला मिळाल्याने स्वामीजींना खूप आनंद झाला. ही ठिकाणं फिरताना स्वामीजींना खेडोपाड्यातली गरीबी दिसली. पण त्या माणसांच्या मनाची सात्विकता आणि स्वभावातला गोडवा पण दिसला. हीच आपली खरी संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. याच्याच बळावर आपल्या देशाचं पुनरुत्थान घडवून आणता येईल असा विश्वास त्यांना वाटला होता. कारण त्यांना भारतातील सामान्य जनतेचं प्रत्यक्ष दर्शन झालं होतं.

या भागात त्यांनी जे पाहिलं आणि त्यांना जाणवलं ते वर्णन आपल्या दिवाण साहेबांच्या प्रवास वार्तापत्रात ते करतात. ते म्हणतात, “एक गोष्ट मला अतिशय खेदकारक वाटली ती म्हणजे, या भागातील सामान्य माणसांना संस्कृत वा अन्य कशाचेही ज्ञान नाही. काही आंधळ्या श्रद्धा आणि रूढी यांचे गाठोडे हाच काय तो सारा यांचा धर्म आहे आणि त्यातील सर्व कल्पना, काय खावे, काय प्यावे, किंवा स्नान कसे करावे एव्हढ्या मर्यादेत सामावल्या आहेत. धर्माच्या नावाखाली काहीही सांगत राहणारे आणि वेदातील खर्‍या तत्वांचा गंध नसलेले स्वार्थी व आप्पलपोटे लोक समाजाच्या अवनतीला जबाबदार आहेत”.

हा प्रवास संपवून स्वामीजी पुन्हा खांडव्याला हरीदास चटर्जी यांच्याकडे आले. हरीदास पण स्वामीजींच्या व्यक्तिमत्वावर भारावून गेले होते. त्यातच शिकागो इथं जागतिक सर्वधर्म परिषद भरणार आहे ही बातमी त्यांना समजली होती. हरीदास बाबू स्वामीजींना म्हणाले, आपण शिकागोला जाऊन हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करावे. हा विषय स्वामीजींच्या समोर याआधी पण मांडला गेला होता. धर्मपरिषद म्हणजे, विचार मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ. पण स्वामीजी म्हणाले, प्रवास खर्चाची व्यवस्था होईल तर मी जाईन. धर्म परिषदेला जायला तयार असल्याची इच्छा स्वामीजींनी पहिल्यांदाच व्यक्त केली होती.

हरीदास बाबूंचे भाऊ मुंबईत राहत होते. हरीदास बाबूंनी स्वामीजींना परिचय पत्र दिलं आणि सांगितलं की, माझे बंधू तुमची मुंबईत, बॅरिस्टर शेठ रामदास छबिलदास यांची ओळख करून देतील. त्यांची यासाठी काही मदत होऊ शकते. मध्यप्रदेशातली भ्रमंती संपवून स्वामीजी मुंबईला आले. हरीदास बाबूंच्या भावाने ठरल्याप्रमाणे स्वामीजींचा छबिलदास यांच्याशी परिचय करून दिला. छबिलदास यांनी तर स्वामीजींना आपल्या घरीच आस्थेने ठेऊन घेतले. छबिलदास आर्यसमाजी होते. स्वामीजी जवळ जवळ दोन महीने मुंबईत होते. छबिलदासांकडे स्वामीजींना काही संस्कृत ग्रंथ वाचायला मिळाले त्यामुळे ते खुश होते. छबिलदास एकदा स्वामीजींना म्हणाले, “अवतार कल्पना आणि ईश्वराचे साकार रूप यांना वेदांतात काहीही आधार नाही. तुम्ही तो काढून दाखवा मी आर्य समाज सोडून देईन”. आश्चर्य म्हणजे स्वामीजींनी त्यांना ते पटवून दिलं आणि छबिलदास यांनी आर्यसमाज खरंच सोडला. यामुळे त्यांच्या मनात स्वामीजींबद्दल खूप आदर निर्माण झाला हे ओघाने आलेच.

आता स्वामीजी मुंबईहून पुण्याला जायला निघणार होते. छबिलदास त्यांना सोडायला स्टेशनवर आले होते. रेल्वेच्या ज्या डब्यात स्वामीजी चढले त्याच डब्यात योगायोगाने बाळ गंगाधर टिळक चढले होते. ते छबिलदास यांच्या जवळचे परिचयाचे असल्याने त्यांनी स्वामीजींचा परिचय करून दिला आणि यांची व्यवस्था आपल्या घरी करावी असे टिळकांना सांगीतले. बाळ गंगाधर टिळक नुकतेच राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले होते. तर स्वामीजींना राजकारणाशी काहीही कर्तव्य नव्हते पण, हिंदूधर्माविषयी प्रेम, संस्कृत धर्म ग्रंथांचा अभ्यास, भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान, अद्वैतवेदांताचा पुरस्कार या गोष्टी दोघांमध्ये समान होत्या. तसच भगवद्गीते विषयी प्रेम हा एक समान धागा होता. देशप्रेमाचे दोघांचे मार्ग फक्त वेगळे होते. दोघांचा रेल्वेच्या एकाच डब्यातून मुंबई–पुणे प्रवास सुरू झाला.

 © डॉ.नयना कासखेडीकर

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्रोत्सव : देवीच्या मातृरूपाची उपासना ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ नवरात्रोत्सव : देवीच्या मातृरूपाची उपासना ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

भाद्रपद सरत येतो, तशी पाऊसही ओसरू लागतो. मग घरोघरी सुरू होते लगबग नवरात्रोत्सवाची. कृषी संस्कृतीतून आलेला हा उत्सव. नवं धान्य शेतात तयार झालेलं असतं. वेगवेगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, वेल-भाज्या यांनी शिवार डोलत असतं. सगळीकडे आनंदी – आनंद असतो. हा आनंद नवरात्रोत्सवातून प्रगट होतो. नवरात्रातील प्रथा, परंपरा बघितल्या, तर लक्षात येतं, ही देवीच्या मातृरूपाची उपासना आहे. तिच्या सृजनशक्तीचा गौरव आहे.

वर्षातून तीन वेळा आपण देवीचा उत्सव साजरा करतो. चैत्रगौर ही वैभवाची, समृद्धीची देवता आहे. तिचे सालंकृत रूप आपण मखरात बसवतो. तिच्यापुढे आरास केली जाते. गृहिणी क्ल्पकतेने नाना रूपात तिची सजावट करते. गृहिणी तिच्या त्या रूपात स्वत:ला बघते. तृप्त होते. समाधान पावते. यात सहभागी करून घेण्यासाठी नातेवाईक, शेजारणी-पाजारणी, मैत्रिणी-गडणी यांना हळदीकुंकवाला बोलावलं जातं.

भाद्रपदात येणार्याल गौरीकडे कन्यारूपात बघितलं जातं. माहेरवाशीणीसारखं तिचं कौतुक केलं जातं. तिला नटवलं, सजवलं जातं. भाजी-भाकरी, पुराणा-वरणाचं जेवण होतं. रात्री झिम्मा-फुगड्या, फेर-गाणी यांची धमाल उडते. तीन दिवसांचं माहेरपण उपभोगून गौर परत जाते.

नवरात्रात ती मातृरूपत घरोघरी अवतरते. आईच्या स्वागतासाठी घरोघरी धांदल उडते. घराचा काना-कोपरा झाडून-पुसून लख्ख केला जातो. हांतरूण-पांघरूण, जास्तीचे कपडे-लत्ते, गोधड्या-चिरगुटे धुवून स्वच्छ केली जातात. आईने म्हणायला हवे ना, लेक गुणवती आहे. घरोघरी थाळीत पत्रावळ घेऊन त्यावर माती पसरतात. त्यात गहू, ज्वारी, बाजारी, मूग, मटकी, चवळी अशी नऊ प्रकारची बी-बियाणे रुजत घालतात. या मातीच्या मधोमध असतो, मातीचा सच्छिद्र घट. त्यावर विड्याची पाने आणि त्यावर नारळ. त्यावर फुलांची माळ सोडली जाते. शेजारी अखंड तेवणारी समई किंवा निरंजन ठेवले जाते.  मातीचा घट हे पावसाची देवता, वरूणदेव याचे प्रतीक आहे तर तेवणारा दीप हे सूर्याचे. धान्य रुजण्यासाठी माती, पाणी, आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. घरात असं प्रतिकात्मक शेत तयार केलं जातं. त्यातलं बियाणं हळू हळू रुजू-वाढू लागतं. अंकूर येतात आणि आई धनलक्ष्मी त्यातून प्रगट होते. नवमीपर्यंत हे अंकूर चांगले बोट-दोन बोट उंच होतात. नंतर शेजारच्या पाच मुलांना बोलावून त्याची कापणी केली जाते. ते अंकूर कानात, टोपीत खोवायचे, देवाला अर्पण करायचे, शेजारी पाजारी द्यायचे ( जशी काही आपण नव्या धान्याचा वानोळा शेजारी-पाजारी देत आहोत. ), अशी पद्धत आहे.

नवरात्राला ‘देव बसले’ असंही म्हणण्याची पद्धत आहे. या उत्सवाला आणखीही एक प्रथा जोडली आहे. त्याची मुळे पुराणकथेत आहेत. महिषासूर या उन्मत्त दैत्याने देव-मानवांना हैराण करून सोडले होते. जगणे मुश्कील केले होते. देवीने नवरात्राचे नऊ दिवस त्याच्याशी युद्ध करून, त्याचा दसर्यातच्या दिवशी वध केला. या काळात देव तपश्चर्येला बसले आणि त्यांनी त्याचे पुण्य देवीच्या पाठीशी उभे केले. देव तपश्चर्येला बसले, तेव्हा त्यांना हलवून त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणायचा नाही, म्हणून या काळात एरवी देवांची पूजा केली जाते, तशी पूजा केली जात नाही. आदल्या दिवशी पूजा करून एका डब्यात देव घातले जातात. याला म्हणायचं ‘देव बसले’  म्हणजे देव तपश्चर्येला बसले. दसर्या च्या दिवशी या बसलेल्या देवांना उठवतात व नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा करून त्यांची देव्हार्यासत प्रतिष्ठापना केली जाते.

आई जन्म देते. पालन-पोषण करते. रक्षणही करते. तिचं जन्मदेचं रूप घरात शेत तयार करून साकार केलं जातं. देवीच्या नैवेद्याच्या रूपाने घरात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. यातून भरण – पोषण अधीकच रूचीसंपन्न होतं.  पण पोषण केवळ शरीराचं होऊन भागणार नाही. ते मनाचंही व्हायला हवं. नवरात्रीच्या निमित्ताने, भजन, कीर्तन, प्रवचन, भाषणे होतात. गीत-नृत्य, नकला, नाटुकल्या इ. संस्कृतिक कार्यक्रम होतात. या सार्यारतून मनाचे पोषण होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो.

आई रक्षणकर्तीही असते. शत्रू नेहमी बाहेरचेच असतात, असं नाही. आपले स्वभावदोष हेही आपले शत्रूच. खोटे बोलणे, अहंकार, द्वेष, मत्सर, असे किती तरी स्वभावदोष आपलं व्यक्तिमत्व काजळून टाकतात. आपल्या मुलात हे दोष वाढू  नयेत, म्हणून आई प्रयत्नशील असते. मुलांना प्रसंगी रागावूनसुद्धा त्यांच्यातील असले दोष दूर करण्याचा ती प्रयत्न करते. नवरात्रातील, भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने इ. मधून याची शिकवण दिली जाते. सुसंस्कार केले जातात.

आशा तर्हे ने जन्मदात्री, पालनकर्ती, रक्षणकर्ती या तीनही दृष्टीने नवरात्रातील देवीची उपासना ही तिच्या मातृरूपाची उपासना असते. नवरात्रात अनेक घरातून पिठा-मिठाचा जोगवा मागायची चाल आहे. एकनाथांनी या प्रथेवर एक अतिशय सुंदर ‘जोगवा’ लिहिला आहे. नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासक वरील स्वभाव दोष त्यजून वारीला कशी जाते, हे बघण्यासारखे आहे. ते लिहितात,

‘अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासूर मर्दनालागुनी ।

त्रिविध तापाची कारवाया झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी ।

आईचा जोगवा जोगवा मागेन । आईचा जोगवा जोगवा मागेन ।

द्वैत सारुनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।

भेदरहित वारिसी जाईन ॥ आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नवविध भक्तीचं भक्तीचं नवरात्र । धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र।

ओटी भरोनी मागेन ज्ञानपुत्र। दंभ सासरा सांडेन कुपात्र ।

आता मी साजणी झाले गे नि:संग। विकल्प नवर्या्चा सोडीयेला संग ।

केला मोकळा मारग सुरंग।  आईचा जोगवा जोगवा मागेन ।

नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासिका दंभ, सासरा, विकल्प नवरा असे  सर्व  स्वभाव दोष त्यजून, पोटी ज्ञानपुत्र मागते. भेदरहित होऊन वारीला जाते. त्या उपासिकेइतके नाही, तरी काही प्रमाणात आपल्याला आपल्या स्वभाव दोषांवर नियंत्रण मिळवता आलं तर? तर आपण खर्यान अर्थाने नवरात्रोत्सव साजरा केला, असे म्हणता येईल, होय ना?

© श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170 email-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “पारूबाई…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

?जीवनरंग ?

☆ “पारूबाई…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

सकाळी सव्वासहा.

घड्याळाचे काटे, काटा लगाऽऽ म्हणत सुसाट पळत सुटलेत.

मी मात्र ,सकाळ इतक्या लवकर कशी झाली ? म्हणत डोळे चोळतोय.

मागे स्वयंपाकघरातून ,कढईत पोहे ढवळल्याचा ‘वास’ येतोय.

डोळे ऊघडताच मला पारूबाई दिसते.

मला हात धरून ऊठवणं..

ब्रश करून आणणं..

आंघोळ घालणं.

ब्रेकफास्ट भरवणं.

दप्तर भरून , युनिफाॅर्म चढवणं..

हाताला धरून शाळेत पोचवणं.

दुपारी शाळेतून घरी आणणं.

भरवणं..

झोपवणं…

ऊठल्यावर चहा करून पाजणं.

ठिय्या मारून शेजारी बसणं.

मी अभ्यास करतोय की नाही ?..

शिकली नसल्यामुळे असेल कदाचित , शिक्षणाचं महत्व तिला खूप कळायचं.

त्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत नो काॅम्प्रमाईज.

अभ्यास आवरला की मला ग्राऊंडवर घेवून जाणं.

ग्राऊंडवरनं घरी परत आणणं.

होता होता संध्याकाळचे सहा वाजायचे.

तोवर आई बाबा यायचे.

मग पारूबाईची सुटका व्हायची.

सकाळी सहा ते संध्याकाळी सहा.

पारूबाईशिवाय आमचं घर, घर वाटायचंच  नाही.

आई बाबा दोघंही नोकरी करणारे.

आई सकाळचा ब्रेकफास्ट करून आॅफिसला पळायची.

बाबा पण लगेचच.

मग स्वयंपाकघर पारूबाईच्या ताब्यात.

मला शाळेत सोडल्यावर, पारूबाई स्वयंपाक करायची.

डबेवाला यायचा.

आईबाबांच्या आॅफिसला डबा जायचा.

माझी शाळा कोपर्यावर.

मधल्या सुट्टीत पारूबाई, शाळेत डबा घेवून यायची.

संध्याकाळी आई आली की, चहाचा कप तयार .

आई सेटल झाल्याशिवाय पारूबाई कधीच गेली नाही.

पारूबाईच्या हाताला चव होती.

आईचीच…

नर्सरी ते बारावी .

पारूबाईनी माझे जगात सगळ्यात जास्त लाड केले.

मग काॅलेज.

नोकरी आणि लग्न.

माझी बायको पहिल्यांदा घरी आली, तेव्हा आईच्या बरोबरीने पारूबाईनेही ओवाळली तिला.

हळूहळू पारूबाई थकली.

मी किती सेल्फीश असेन बघा , इतक्या वर्षात पारूबाईच्या घरी कोण कोण आहे? याची कधी चौकशीही केली नाही.

पारूबाईला एकुलती एक मुलगी.

माझ्याहून लहान .

माझ्यापाठोपाठ तिचंही लग्न झालं.

आम्ही सगळे गेलो होतो

मी खरंच तिचा अपराधी आहे.

आईची सगळी माया पारूबाईने ,आमच्या घरावरच उधळलेली.

ती पोर बिचारी आजीच्याच खांद्यावर वाढली.

नवरात्रीला पारूबाईच आमच्या घरची सवाष्ण.

नाकात भलीमोठी नथ.

प्रसन्न चेहरा.

भलंमोठं कुंकू..

मला तर साक्षात  देवीच वाटायची.

 माझ्या लेकीचा जन्म झाला अन् पारूबाई रिटायर्ड.

दर एक तारखेला मी पारूबाईच्या घरी जायचो.

दोन हजार रूपये द्यायचो.

पारूबाईचं पेन्शन…

खरं, तिनं जे माझ्यासाठी केलं ,त्याचं मोल करताच येणार नाही…

तरीही..

या वेळी माझ्या लेकीला घेवून गेलो.

पारूबाई खूष.

लेक शहाण्यासारखी पाया पडली.

पारूबाईने तिच्या हातात दहा रूपयांची नोट ठेवली.

तीही खूष.

वाटेत , लेकीनं सहज प्रश्न विचारला .

बाबा , पारूबाईची जात कोणती ?

असे प्रश्न आठ वर्षाच्या मुलांच्या डोक्यात येतातच कसे ?

मला विलक्षण अपराधी वाटलं.

 मी जाम हादरलो.

 उत्तर मला माहित नव्हतं.

अन् त्याची गरजही नव्हती कधी.

मला कळेना , काय उत्तर द्यावं.

विचार करून म्हणलं..

“पारूबाईची जात ‘आई’ची..”

तिला पटलं.

नवीन आजी तिला आवडली.

 ती मनापासून हसली.

अन् मीही…

* माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही *

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरचा डाव जोडला… अशी ही गोड कहाणी ! ) इथून पुढे 

यानंतर पुढच्या दोन दिवसात मला आणखी चार दिव्यांग तरुण भेटले….

यापैकी दोघांचे टेलरिंगचे व्यवसाय होते…. परंतु कोविड  काळात व्यवसाय थांबला… रोजच्या घरखर्चासाठी शिलाई मशीन सुद्धा मातीमोल किमतीने विकाव्या लागल्या…. दोन्ही कुटुंबे उघड्यावर पडली…! 

माणसाने नेहमी झऱ्यासारखं वहात रहावं…. कारण हे वाहणे थांबलं की याच झऱ्याचं डबकं तयार होतं…. झऱ्यावर नेहमी राजहंस येतात…. परंतु डबक्यावर मात्र येतात ते डास आणि घाणेरडे किडे…! …. यांच्याही आयुष्याचं वाहणं थांबलं…. मनामध्ये डबकं साठलं….पुढे अंधार दिसायला लागला…. आणि मग वाईट-साईट विचार या साचलेल्या डबक्यावर घोंघावायला लागले…!

या दोघांनाही शिलाई मशीन द्यायचं आम्ही ठरवलं…! 

श्री. जिगरकुमार शहा सर Upleap Social Welfare Foundation या सामाजिक संस्थेत सक्रिय – सन्माननीय सभासद आहेत.  या संस्थेमार्फत त्यांनी एक शिलाई मशीन आम्हास मिळवून दिले. …… “अर्ध्यावर फाटलेला डाव या मशीनवर शिवायचं आपण आता ठरवलं आहे …!”

उरलेले इतर दोघे…. एका चाळीत राहतात….घरासमोरच्या बोळातच काही न काही वस्तूंची विक्री करून आपलं कुटुंब चालवत होते…! कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने दोघांचीही घरं हळूहळू लुटून नेली…! 

“आमच्या वाईट काळात आमच्याच नातेवाइकांनी आमचे पाय खेचले…. आम्हाला गाळात घातलं “  यातला एक जण डोळ्यातून येणारे अश्रू, पालथ्या मुठीने पुसत म्हणाला होता…

“ दुसऱ्याचं घर लुटायला “पोती” घेऊन येतात ती कसली “नाती” मित्रा ? अशा नात्यांचा विचार करू नकोस इथून पुढे….आणि कायम लक्षात ठेव…. आपले पाय खाली खेचणारे लोक नेहमी आपल्या पायाशीच असतात….  असे लोक फक्त आपल्या पायाशीच घुटमळतात ; परंतु ते कधीही आपल्या हातापर्यंत पोहोचू शकत नाहीत….कारण त्यांची “उंची” तितकी नसते…हातात दम आहे तोवर कुणी पाय खेचले तर विचार करू नकोस…!”

या दोघांनाही विक्रीयोग्य सर्व साहित्य देऊन ” पुन्हा त्यांना पायावर उभं करण्याचं ” आपण ठरवलं आहे…!

…. “अर्ध्यावर मोडलेले संसार पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत…!”

यानंतर माझे सहकारी श्री मंगेश वाघमारे आणि श्री अमोल शेरेकर यांना झटपट आवश्यक त्या सर्व सूचना देऊन …. आम्ही सर्वांनी आपापसात कामे वाटून घेतली…. करावयाची कामे आणि हातात असलेला वेळ यांची सांगड घालता; सर्व बाबी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी १४ एप्रिलला करण्याचे आम्ही ठरवले. माझ्या दोन्ही सहकार्‍यांनी जीवतोड मेहनत घेऊन दोन दिवसात सर्व घडामोडी जुळवून आणल्या. 

१४ एप्रिल रोजी साईबाबा मंदिर, तोफखाना, शिवाजीनगर कोर्ट पुणे जवळ, या सर्वांना एकत्र बोलावलं…. आणि या सर्व गोष्टी श्री. जिगरकुमार शहा साहेब यांच्या हस्ते या सर्व दिव्यांग व्यक्तींना अर्पण केल्या…! 

श्री जिगरकुमार शहा साहेब आणि Upleap Social Welfare Foundation दोहोंचे आम्ही ऋणी आहोत…! 

कोणताही समारंभ नाही, कसलाही गाजावाजा नाही …. रस्त्यावर मी, डॉ मनीषा, श्री जिगर कुमार आणि आमची याचक मंडळी…. यांच्या सहवासात हा हृद्य सोहळा पार पडला…! … नाही म्हणायला दुपारचं कडकडीत ऊन पडलं होतं…. सूर्य आग ओतत होता….पण खरं “तेज” मला या पाचही जणांच्या चेहऱ्यावर झळकत असलेलं दिसत होतं….! जाताना त्यातला एक जण हात जोडत म्हणाला, “ मनापासून आभारी आहे सर…. आम्ही शून्य झालो होतो….तुम्ही आम्हाला जगण्याची…. उभं राहण्याची परत संधी दिलीत…”

त्याने बोललेल्या या वाक्यावर सहज मनात विचार आला… 

प्रत्येक जण शून्यच असतो… पण प्रत्येक शून्याला त्याची स्वतःची एक किंमत असते… या शून्याची किंमत जर आणखी वाढवायची असेल…. तर “कुणीतरी” त्या शून्याच्या शेजारी जाऊन फक्त उभं राहायचं असतं “एक” होऊन…! अशाने त्या शून्याची किंमत तर वाढतेच…. पण किंमत वाढते त्या शेजारी उभ्या राहणाऱ्या “कुणातरी एकची” सुद्धा !!!

या विचारात असतानाच फोन वाजला…. पलीकडून आवाज आला, “अहो सर येताय ना ? आम्ही वाट पाहत आहोत….” मी गोंधळलो…. “कुठे यायचं आहे मी ?“

“अहो सर, आज भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर सरांच्या नावे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आहे ना ? तिथे आम्ही आपली वाट पाहत आहोत, तुम्हाला आणि डॉ मनीषा दोघांनाही आज पुरस्कार आहे, विसरलात काय, मागे मी फोन केला होता …!”

— ओह…. मी या सर्व गडबडीत हे पूर्ण विसरून गेलो होतो…मी संयोजकांची मनापासून माफी मागून….

सकाळ पासून  घडलेल्या सर्व बाबी सांगितल्या…!

संयोजक मनापासून माफ करत म्हणाले…., “ आज खुद्द आदरणीय बाबासाहेब जरी इथे असते, तर ते म्हणाले असते…. ‘ इथे येवून पुरस्कार स्विकारण्यापेक्षा, तिथल्या गोरगरिबांच्या सुख-दुःखात समरस हो…. मला ते जास्त आवडेल….!’  आदरणीय बाबासाहेबांना जे आवडलं असतं…. असेच आज तुम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त वागला आहात…. आम्ही तुम्हाला इथे एक पुरस्कार देणार होतो … पण तुम्ही तिथे राहून ५-५ पुरस्कार मिळवले…. अभिनंदन डॉक्टर…!!! “ हे ऐकून, माझ्या डोळ्यात पाणी तरळलं….! आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या…. या “महावीरांच्या” चरणांशी  मनोमन आम्ही नतमस्तक झालो…! 

यानंतर मग हसणारे पाच चेहरे मनात साठवत…. मी आणि डॉ मनीषा आम्ही गाणं गात निघालो ….

“अर्ध्यावरचा डाव जोडला…. अशी ही गोड कहाणी …!”

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शास्त्रीय सत्य… ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ शास्त्रीय सत्य… ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

 १. बायका पंचेंद्रियांचा वापर करताना डावा आणि उजवा या दोन्ही मेंदूंचा वापर एकाच वेळी करतात. पुरुष फक्त डावा मेंदू वापरतात. त्यामुळे एकाच वेळेस अनेकविध काम करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा बायकांकडे जास्त आहे.

२. पूर्वीच्या काळी बायका घर संभाळणे, मुले, संकटांपासून संरक्षण अशी अनेक कामे एकाच वेळेस करायच्या. त्यामुळे उत्क्रांतीच्या टप्प्यात त्यांची peripheral vision तयार झाली. कारण सगळीकडे एकाच वेळी लक्ष द्यायचे असल्याने त्यांच्या डोळ्यातील बुब्बुळे जलद हालचाल करतात . पुरूषांच्या तुलनेत बायकांची बुब्बुळेआकाराने  लहान आणि डोळ्यांतील पांढरा भाग मोठा असतो. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत बायकांची नजर जास्तीत जास्त गोष्टी झटक्यात निरीक्षित करते. याउलट पुरुषांनी पूर्वी शिकारीचे काम केले आहे. त्यामुळे त्यांची tunnel vision तयार झाली. त्यांच्या बूब्बुळ्ळांची वेगाने हालचाल होत नाही. बायकांच्या तुलनेत हं ! driving साठी अशी  tunnel vision चांगली. तर जबाबदारीच्या किंवा मोठ्या कामांकरता बायकी नजर चांगली. 

३. बायकांच्या शरीरात अँक्सिटोसिनचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. त्यामुळे पुरुषांपेक्षा त्यांचे स्पर्शज्ञान चांगले असते.

४. पुरुषांचा मेंदू विश्रांती घेतो तेव्हा मेंदूचे 70% कार्य बंद असते. बायकांच्या मेंदूने विश्रांती घेतली तरी 90% कार्य सुरू असते. बोला आता, कोणाचा मेंदू किती active आहे ! दरवर्षी परीक्षांमध्ये बाजी मारणाऱ्या मुलींचे इथे उदाहरण देते. ……..

अजून काय सांगू ? गांधीजींनी म्हटले आहे, ‘ सत्याग्रहाच्या काळात पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती स्त्रियांच्यात दिसून आली आहे.‘ — “रंग आणि नक्षीकाम यापलिकडेही आम्ही बरेच काही आहोत !!!! “ 

संग्राहिका : आनंदी केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 30 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 30 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४४.

छाया प्रकाशाचा लपंडाव जिथं चालला आहे,

वसंतामागोमाग वर्षाऋतूंच आगमन जिथं होतंय

त्या ठिकाणी बसावं,

तो लपंडाव, ते आगमन पहावं,

यात मला आनंद आहे.

 

 अज्ञात आकाशातून

 शुभवार्ता आणणाऱ्या दूतांनो. . . !

 रस्त्यावरून वेगानं जाण्यापूर्वी मला दर्शन द्या.

 

माझं ऱ्हदय भरून आलंय..

वाहणाऱ्या वाऱ्याचा श्वास किती मधुर आहे!

 

पहाट प्रहरापासून संध्यासमयापर्यंत

मी माझ्या दाराशी वाट पहात बसलो आहे,

तुझ्या दर्शनाचा सुखद क्षण

अचानक येणार आहे, हे मला ठाऊक आहे.

 

तोपर्यंत मी एकटाच स्वतः साठी हसत, गात राहणार आहे.

तुझ्या आश्वासनाचा मधुर गंध

आसमंतात दरवळून राहणार आहे.

 

४५.

तो येईल, तो येईल, तो येईलच. . . . .

त्याच्या पावलांचा नि:शब्द आवाज

तुला ऐकू येत नाही?

 

क्षणाक्षणाला आणि प्रत्येक युगात,

दिवसा – रात्री तो येतच असतो.

 

मनाच्या कोपऱ्यात एका भावावस्थेत

मी किती गीतं गायली

प्रत्येक गीतामधून एकच स्वर उमटतो –

‘ तो येत आहे, तो येत आहे, तो येतच आहे. . . ‘

 

सूर्यप्रकाशाच्या स्वच्छ एप्रिल महिन्यातल्या

सुगंधीत दिवसांत,रानावनातून,

‘तो येतो,तो येतो, तो येतच असतो. . . . ‘

 

जूलै महिन्याच्या पावसाळ्या रात्रीच्या

उदासीनतेत गडगडणाऱ्या मेघांच्या रथातून

‘तो येतो, तो येतो, तो येतच असतो. . . . ‘

 

एकामागून एक येणाऱ्या

त्याच्या पावलांचा ठसा

माझ्या ऱ्हदयावर उमटत राहतो

आणि त्याच्या सुवर्णमय पदस्पर्शाने

माझा आनंद पुलकित होत राहतो.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print