मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #142 ☆ संत जनाबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 142 ☆ संत जनाबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

गोदावरी तीरावर

गंगाखेड जन्मगाव

दमा करूंडाची लेक

जनाबाई तिचे नाव. . . . ! १

 

दामाशेट शिंप्याकडे

जीवनास घाली टाके

झाली नामयाची  दासी

सार्थ अभिमान दाटे. . ! २

 

ओवी आणि अभंगात

जनाबाई जाणवते

घरा घरातली बाई

पहा दळण दळते…! ३

 

वात्सल्याची जणू ओवी

त्यागी, समर्पण वृत्ती

पूर्ण निष्काम होऊनी

विठू रूजविला चित्ती. . . . ! ४

 

तत्कालीन संतश्रेष्ठ

अभंगात आलंकृत

संत जीवन आढावा

काव्य पदी सालंकृत….! ५

 

प्रासादिक संकीर्तन

कधी देवाशी भांडण

संत जनाबाई करी

सहा रिपूंचे कांडण…! ६

 

संत सकल गाथेत

ओवी अभंगाचे देणे

संत जनाबाई जणू

काव्य शारदेचे लेणे…! ७

 

जनाबाई अभंगांने

मुक्तेश्वरा मिळे स्फूर्ती

भाव भावना निर्मळ

साकारती भावमूर्ती…! ८

 

बोली भाषा ग्रामस्थांची

जनाबाई वेचतसे

विठू तुझ्या दालनात

सुख दुःख सांगतसे….! ९

 

साडे तीनशे अभंग

कृष्णजन्म थाळीपाक

प्रल्हादाच्या चरीत्राने

दिली  ईश्वराला हाक. . . . ! १०

 

हरीश्चंद्र आख्यानाचा

आहे  आगळाच ठसा

बालक्रीडा अभंगात

जना पसरते पसा. . . . ! ११

 

द्रौपदीचे स्वयंवर

अभंगाने दिली कीर्ती

मुक्तेश्वर नाथनातू

तया लाभली रे स्फूर्ती. . . . ! १२

 

नामदेव गाथेमध्ये

जनाबाई एकरूप

अभंगात  भक्तीभाव

विठ्ठलाचे निजरूप.. . ! १३

 

परमार्थ वेचियेला

संत विचारांचा ठेवा

नामदेवा केले गुरू 

केली पांडुरंग सेवा …! १४

 

आषाढाची त्रयोदशी

पंढरीत महाद्वारी

समाधीस्त झाली जना

करे अंतरात वारी…! १५

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ निरोप देताना… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ निरोप देताना… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

वर्षा मागून सरतील वर्षे

सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर

रात्री मागून येईल पहाट

नित्य जीवनाच्या रहाटावर

 

निरोप देता सरत्या वर्षाला

किंतु परंतु मनी न राहावा

करता येईल कोणासाठी

काही विचार हा मनी यावा

 

आठवणींना जपून ठेवत

विसरून सारे झाले गेले

अनुभवांच्या आधारावर

भविष्याचेच बांधू इमले

 

चाहूल नवीन वर्षाची

तयारी करू स्वागताची

क्षणभर वळून मागे आता

फळी उभारू माणुसकीची

 

शिकवून गेले सारे सारेजण

सकारात्मकता मनी ठेवून

इच्छाशक्तीची उंच भरारी

नव्या आशेचे पंख लावून

 

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चव आणि चटक… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ चव आणि चटक… ☆ श्री अरविंद लिमये ☆

चव, लज्जत, गोडी, रुचि, खुमारी असे वेगवेगळ्या अर्थछटा असणारे शब्द म्हणजेच ‘स्वाद’ या शब्दाची अर्थरूपे आहेत. स्वाद काय किंवा त्या शब्दाचे हे विविध अर्थ काय थेट खाद्यपदार्थांशी जोडले गेलेले आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण गोडी, रुचि म्हटलं की विविध चविष्ट पदार्थांच्या आठवणीनेच  तोंडाला पाणी सुटते. हे सगळेच शब्द ऐकतानाही स्वादिष्ट वाटावेत असेच! खरंतर विविध खाद्यपदार्थांच्या तितक्याच विविध चवी आणि त्यांचे वर्णन करणारी तशीच चविष्ट विशेषणे असा मोठा ऐवज स्वाद या अल्पाक्षरी शब्दात कसा सामावलेला आहे हे पहाणे अतिशय गंमतीचे ठरेल. त्यासाठी स्वाद या शब्दाचे आणि वर उल्लेख केलेल्या चव, रूचि आदी अर्थशब्दांचे मैत्रीपूर्ण धागे परस्परात  गुंफवत इतरही अनेक शब्द कसे आकाराला आलेले आहेत हे पहाणे अगत्याचे आहे. खमंग, चमचमीत,  झणझणीत,  चटकदार,  लज्जतदार,  मसालेदार,  चवदार,  खुमासदार,  मिष्ट, चविष्ट, खरपूस.. अशी अनेक विशेषणे त्या त्या पदार्थांच्या स्वादांचे असे कांही चपखल वर्णन करतात की ते पदार्थ न चाखताही त्यांचा आस्वाद घेतल्याचे (क्षणिक कां होईना) समाधान मनाला स्पर्शून जातेच.

खरंतर फक्त खाद्यपदार्थांनीच नव्हे तर अशा स्वादाधिष्ठीत असंख्य शब्दांनीही आपली खाद्यसंस्कृती समृद्ध केलेली आहे असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

अशा अनेक शब्दांतून व्यक्त होणारा आणि त्या त्या पदार्थांमध्ये मुरलेला स्वाद चाखणे म्हणजेच त्या पदार्थांचा आस्वाद घेणे!

या ‘आस्वाद’ शब्दाला अंगभूत अशी एक शिस्त अपेक्षित आहे. आस्वाद घेणे म्हणजेच चवीने खाणे. आस्वादाला बेशिस्त वर्ज्य आहे. म्हणूनच मटकावणे,  ताव मारणे,  फडशा पाडणे, ओरपणे म्हणजेही खाणेच पण हे ‘चवीने खाणे’ नसल्याने  ‘आस्वाद’ म्हणता येणार नाही. कारण आस्वादाला जशी शिस्त तसाच आनंदही अपेक्षित आहे. ताव मारण्यात किंवा फडशा पाडण्यात जिथे आस्वाद नव्हे तर हव्यास मुरलेला आहे तिथे आस्वाद घेण्यातला आनंद कुठून असणार?

एखाद्या पदार्थाची अशा हव्यासाने चटक लागते. आणि एकदा का अशी चटक लागली की पोट भरलेले असूनही तो पदार्थ समोर आला की परिणामांची पर्वा न करता तो खायचा मोह होतोच. हे खाणे आस्वाद घेणे नव्हे तर जिभेचे चोचले पुरवणेच ठरते!

आस्वादाला, चवीने खाण्याला आरोग्यदायी आनंद अपेक्षित आहे आणि हव्यासाची परिणती ठरलेली चटक मात्र अनारोग्याला आमंत्रण देते!

आस्वाद या शब्दाची चवीशी जुळलेली ही नाळ खाद्य संस्कृतीइतकीच आपल्या संपूर्ण जगण्याशीही निगडित आहे. आस्वाद या शब्दाचा परीघ आपलं संपूर्ण जगणं व्यापून अंगुलीभर उरेल एवढा विस्तृत आहे. म्हणूनच जगण्यातला आनंद फक्त चांगल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद पुरताच मर्यादित स्वरूपाचा नाही तर विविध आनंददायी गोष्टींचा आस्वाद घेत आपले जगणे समृद्ध करता येते.

गीत, संगीत, चित्रपट, नृत्य, नाटक अशा विविध कला प्रकारांचा आस्वाद हे याचेच उदाहरण ! अशा कलाप्रकारांमधे रस असणारे त्यांचा रसिकतेने आस्वाद घेऊ शकतात! मग एखादे गाणे आस्वाद घेणाऱ्याचे मन प्रसन्न करते, नृत्य त्याला मंत्रमुग्ध करते, चित्रपट सुखावतो, नाटक उत्कट नाट्यानुभव देते. हे सगळे विशिष्ठ कला सादर करणारे ते ते कलाकार सादरीकरणाचा आनंद घेत तल्लीन होऊन ती सादर करत असतात आणि रसिक रसिकतेने त्या सादरीकरणाचा आस्वाद घेत असतात म्हणूनच शक्य होते.

जगण्याचेही तसेच. आनंदाने जगणे म्हणजे तरी काय? तर समोर येणारा प्रत्येक क्षण आनंदाने स्वीकारून जगण्याचाही आस्वाद घेत जगणे. मग ते क्षण सुखाचे असोत वा दुःखाचे,यशाचे असोत वा अपयशाचे.. ते तात्कालिक आहेत, क्षणभंगुर आहेत हे जे जाणतात, तेच त्या त्या क्षणांचा आस्वाद घेत जगू शकतात. आपल्याला गोड पदार्थ आवडतात म्हणून फक्त गोड पदार्थच खात राहून इतर विविध चवींचे पदार्थ वर्ज्य करून कसे चालेल? कारण वेगवेगळ्या रुचि,रस,आणि स्वादच खाण्यातील गोडी टिकवून ठेवत असतात जे आरोग्य आणि आनंदी जगण्यासाठी पूरक ठरत असते. जगणेही यश-अपयश, सुख-दुःख, ऊन-पाऊस यांच्यातील पाठशिवणीच्या खेळामुळेच एखाद्या चविष्ट पदार्थ सारखे खुमासदार बनत असते!

खाण्यातली असो वा जगण्यातली अशी खुमारी चाखण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आस्वादक मात्र बनायला हवे !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घरात राहणारी बाई – भाग १ (भावानुवाद) – श्री भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ घरात राहणारी बाई – भाग १ – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सौ. उज्ज्वला केळकर

 गजर होताच अनुरोध रोजच्याप्रमाणे उठून बिछान्यावर बसला. सेल फोन काढून त्याने वेळ पहिली. साडे पाच. त्याने गजर बंद केला. पलंगावरून उतरून स्लीपर घातले आणि ड्रॉइंग रूमकडे वळला.जाता जाता त्याने एक नजर शेजारच्या बिछान्यावर टाकली. तो रिकामा होता. हं! ही उठलीय तर!. अनुमतीचा बिछाना नेहमीप्रमाणेच साफ-सुतरा होता. एक सुरुकुती नाही. ब्घणार्‍याला मुली वाटलंच नसतं की रात्री कुणी इथे झोपलय. कधी दोन्ही बिछाने एकमेकांना जोदोन असायचे व त्यावर एकच बेडशीट घातलेली असेल, तर दोन वेगळे पलंग आहेत, असं वाटणारच नाही कुणाला. चार-पाच वर्षं झाली, दोनहीची मध्ये एक सेंटर टेबल असं ठेवलं गेलाय, की जसं काही दोन रुळांच्या मध्ये फिश – प्लेट आहे.

त्यांनी फोन सेंटर टेबलच्या हवाली केला. किचनमध्ये जाऊन काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसून रोजच्याप्रमाणे जलपान करू लागले. पाणी पिता पिता किचन कट्ट्याकडे लक्ष गेलं. एकदम अस्पर्शीत. पाण्याचा एक थेंब नाही की  वापरलेलं भंड नाही. ‘आज काला चहा न पिताच मॅडम फिरायला गेलेल्या दिसताहेत. ब्रश करून ते ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसले. एरवी, बसताक्षणीच चहा हजार होतो. आज माडम्ला फिरून यायला उशीर झालेला दिसतोय. काय करावं? चहाविणा शरीराच्या घड्याळाचा काटा जसा काही पुढे सरकताच नाही. मग काय, स्वत: बनवून घ्यावा?हा प्रयोग केला, त्याला किती दिवस झाले! दिवस नव्हे, महाराजा, महीने…! थोडा वेळ वाट बघू या. बनवलेला तयार मिळाला, तर सोन्याला सुगंध. करायला लागलो, तर कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागेल, कुणास ठाऊक?डब्यात साखर किंवा चहा पावदरच नसायची. सेलफातील डबे शोधत बसावे लागेल. त्याला डिसूझा साहेबांचं बोलणं आठवलं. ‘यार, किचनमध्ये काही शोधायला जा. आपल्याला हव्या त्या गोष्टीचा दबा सगळ्यात शेव ती मिळणार. तोपर्यंत पन्नास डबे उघडावे आणि लावावे. आणि काय बिशद यावेळी जिथे मिळालाय, तिथेच पुढल्या वेळी मिळेल. अनुरोध व्साहेब, हे कैचा म्हणजे घराच्या आत बायकांनी आपला बनवलेला किल्ला असतो. तिथून त्या आपल्या सार्‍या लढाया लढतात. म्हणून आपल्या किल्ल्याचा भेद कुणी जाणावा, असं त्यांना वाटतच नाही.’  

एका मिनिटानंतर कुणी तरी पायर्‍या चढत असल्याचा आवाज आला. किती वेळा तिला सांगितलं, सकाळी घाई असते. वर येण्यासाठी लिफ्टचा वापर कर पण नाही… ती जिना चढूनच वर येईल. या बाईला बेल वाजवण्यात काय अडचण वाटते, कुणास ठाऊक? दरवाजा जरा खटखटला. सगळ्या अपार्टमेंटचा साऊंड पोल्युशन कमी करण्याचा ठेका जसा काही हिने एकटीने घेतलाय. मॅगॅसेसे अवॉर्डच मिळायला हवं हिला.कुणास ठाऊक, कुठून कुठून काय काय शिकते?. तरी बरं, सगळी मासिकं बंद करून टाकलीत. हा टी.व्ही तो मात्र घरात राहणार्‍या बायकांची डोकी फिरवून टाकतो. दरवाजा उघडला, तर तर समोर वर्तमानपत्र पडलेलं होतं. पेपर घेऊन आत येऊन ते बसले. पण देहाचा घड्याळ…. त्यांनी पेपर बाजूला ठेवला आणि आत येऊन चहा करायला लागले.

चहाच्या पाण्याबरोबरच मनातही काही उसळू लागलं…. आज सांगून टेकन, माझ्या चहापर्यंत परत येणं होणार नसेल, तर किचन कट्ट्यावर सगळं सामान काढून ठेव. चिमटा नाही. कुठला कापड नाही. आता या काय मायक्रोवेव्हवर ठेवायच्या गोष्टी आहेत? समोरच्या भिंतीवर स्टँड लावून दिलाय या सगळ्या गोष्टींसाठी. सगळ्या गोष्टी समोर दिसायला हव्यात. टाईल्समध्ये भोकं पाडताना किती त्रास झाला होतं. पण काय फाडा? घरात तिच्याशिवाय आणखी कोणी रहातं, याचा विचारच नाही. काय सांगायचं, पस्तीस वर्षाच्या संसारात, किमता, सूरी, किंवा किल्ल्या कुठे ठेवायच्या, याच्यावर काही एकमत होऊ शकलं नाही. स्सालं… हे काय जीवन आहे? 

चहा… चहा नाही, कसला तरी कडवट द्रव झाला होता. पण अनुरोधाने सगळा पिऊन टाकला कप खाली ठेवता ठेवता संडासला लागले. त्यांनी उठून दरवाजा आतून लॉक केला. आता या दरम्यान आली तर… लॅचची चावी घेऊन गेलीच असेल. ती कुठे विसरते? चावी आणि मोबाईल… मुलगा आणि मुलगीही इतके आत्मीय नसतील.

टॉयलेटला जाऊन आल्यावर त्यांनी पेपरमधल्या हेडलाईन्स बघितल्या. मग ऑफीस बॅग उघडून डायरी काढली आणि आजच्या एपॉइंटमेंटस् बघू लागले. साडे दहा वाजता सुप्रवायझर्स बरोबर मीटिंग होती. .भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे नजर गेली. ‘अरे, सात वाजले. हद्द झाली हिच्यापुढे. ही बाई वेडी-बिडी झालीय का? साडे आठची लोकल चुकली, तर वेळेवर पोचणार तरी कसे? ? ही खरोखर बेअक्कल आहे. खरंच एम. ए. झालीय ना? की वशिला लावून किंवा लाच देऊन सर्टिफिकेट मिळवलय?  हा… हा… मला तरी त्या वेळी काय सुचलं कुणास ठाऊक? चांगल्या इंडस्ट्रीअ‍ॅलिस्टच्या मुलीची ऑफर आली होती. शिकलेली, अगदी रियल सेन्सने. त्या काळात बी.ई. केलं होतं. म्हणजे पस्तीस वर्षांपूर्वी. आज असती तर आपलीसुद्धा ‘इन्फोसिस’ असती. ‘इन्फोसिस’ राहीलं. छोटी-मोठी कंपनी तर असतीच असती. पण बापाला आपल्या अ‍ॅग्रीकल्चर मित्राला उपकृत करण्याची पडली होती न!’

एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. त्याने पाहीलं, दरवाजाची वरची कडी आतून बंद केलीय. टॉयलेटला जाताना आतून कडी लावलेली असणार. थोडा वेळ बाहेरच उभं राहूदेत मॅडमना. तेव्हा कळेल, नवर्‍याला बॅग हातात घेऊन दरवाजाशी वेट करताना काय वाटतं?

– o –

  ‘ तू करतेस काय, एवढा वेळ दरवाजा उघडायला लागला ते?’

  ‘ मी ऑफीसला जात नाही, याचा अर्थ असा नाही की, दरवाजात उभी राहून आपली वाट बघत राहू? एक मिनीटसुद्धा झालं नाही बेल वाजून.’

   ‘तुम्हा घरात राहणार्‍या बायकांना कसं कळणार एका मिनिटाचं महत्व.

‘नोकरी करण्याची इच्छा कुणाला नव्हती? बोला ना! आपल्या बुटांना पॉलीश करण्यासाठी आणि आपण ऑफीसमधून परत आल्यावर बॅग हातात घेण्यासाठी बाई हवी होती घरात. कुणाला नोकरी करायची असेल, तर करणार तरी कशी?’

 बालकमंदिरातल्या दीड हजाराची नोकरी करण्यापेक्षा घरात राहून नवर्‍याच्या बुटांना पॉलीश करणं जास्त किफायतशीर आहे. ‘

– o –

दरवाजाची कडी काढताच एक विचित्र असा वास त्यांच्या नाकाला स्पर्श करत झापझाप करत पुढे निघून गेला. ‘ही भांडीवालीसुद्धा न …! थोडी दुरून जाऊ शकत होती ना! अनुमतीने डोक्यावर चढवून ठेवलय. नोकरांशी कसं वागावं, एवढही हिला कळत नाही. ’सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी त्यांनी ड्रॉइंग रूममधली खिडकी उघडली आणि खुर्ची पुढे ओढून पेपर उचलला. एका बातमीवर त्यांची नजर रेंगाळली. ‘सकाळची फिरत असताना टॅक्सीवाल्याने उडवलं.’ हे टॅक्सीवाले पण ना, खूप फास्ट चालवतात. सकाळी सकाळी ट्रॅफिक कमी असतो, म्हणून तर आणखीनच फास्ट. पोलीस नसतो, ना सिग्नल . असे जातात की जसा काही रास्ता त्यांना हुंड्यात आंदण मिळालाय. … अनुमतीलासुद्धा नीट रस्त्याने चलता येत नाही. पुढे कमी आणि मागे जास्त बघते. 

   ‘अठ्ठावनची झालीये. काही फरक पडणारच की चालण्यात!’

   ‘इथे मुंबईत ऐंशी वर्षाच्या बाया पळत सिग्नल पार करतात. पण तुला काय माहिती?’

‘ज्यांना रोज जावं लागतं, त्यांना सवय झालेली असते. मला तर कधी तरीच घराच्या बाहेर पडावं लगतं. तेही पूर्व परवानगीने. पूर्ण शोध घेऊन आणि पडताळणी करून ‘पोलीस इंन्क्वायरी’त समाधानकारक उत्तरे मिळाल्यानंतरच….. आईला भेटायला तर निघाली नाहीस ना… भावाने तर बोलावलं नाही ना… मुलगा तर भारतात आला नाही ना…. की मुलीने बोलावलय, नातीला आजीची आठवण आली म्हणून … सतराशे साठ प्रश्न.’

  ‘साहेब, आज मेंसाहेब नाही आहेत का?’

  ‘ का? बेसीनमध्ये भांडी तर आहेत ना?’

  ‘ होय, पण डिशवॉश लिक्विड संपलय. ‘

  ‘जेवढं असेल, तेवढ्याने आज काम चालव, नाही तर राहूदेत भांडी, तू जा. मला आंघोळीला जायचय.’

भांडीवाली निघून गेली, तशी ते उठून बेसीनशी आले. लिक्विड डिश वॉशचा पाऊच उचलून पहिला. खरोखरच संपला होता. ‘किती वेळेला सांगितलंय, मागायची वेळ यायला नको. बाथरूममध्ये संबण संपायला येत असतानाच दूसरा काढून ठेव. पण नाही…. या, घरात रहाणार्‍या बायका दिवसभर घरात काय करत असतात, कुणास ठाऊक? … अरे, पण हिला आज झालय काय? दुधाची पिशवी फ्रीजमध्ये पडलेली आहे. हां… भाजी. पार्कच्या जवळ सकाळी पालेभाज्या घेऊन भाजीवाले उभे असतात. जेव्हा बघावं, तेव्हा उचलून आणते आणि निवडत बसते दिवसभर. नोकरी करणार्‍या बायका हे काम हिंडत-फिरत किंवा येता-जाता करतात. कळतसुद्धा नाही, कधी भाजी निवडून टाकतात. पण यांच्यासाठी… हे एक मोठ्ठं काम असतं. काय करणार? कोणत्या कोणत्या गोष्टींवर म्हणून वाद घालायचा. जोडीदार वेगाने चालणारा असला, तर जीवन सुसह्य होतं. जाऊ दे झालं. सगळ्यांनाच, सगळं कुठलं मिळायला आणि लग्नं हा तर खरोखर नशिबाचा खेळ आहे. लॉटरी आहे लॉटरी! चला साहेब, आंघोळ करून घ्या.  आली तर उभी राहील बाहेर.

आंघोळ झाल्यावर येऊन घड्याळ पाहीलं. सात चाळीस. ‘ ओफ्हो! आता काय खाक ब्रेक फास्ट बनणार आणि काय खाणार? अजब बाई आहे. माझ्याच नशिबाला आली … पण इतका उशीर आजपर्यंत कधीच झाला नाही. चला महाराज, लोकांना मार्केटिंग शिकवता. थोडी मार्केटिंग घरातच करावी. इगो सोडा आणि मोबाईल लावून पहा. काही अ‍ॅक्सिडेंट वगैरे तर झाला नसेल ना!’

‘…. …. …. ‘

अरे, तिचा फोन तर इथेच वाजतोय. हा इथे फ्रीजवर आहे. मग काय मोबाईल घेऊनच गेली नाही. कमाल आहे. महानगरात पस्तीस वर्ष रहाणार्‍या बाईला किती वेळा सांगायचं , ‘बाई ग, बाहेर जाताना बाकी सगळं विसरलं तरी चालेल, पण मोबाईल न्यायचा विसरू नको. पण हिची पर्स कुठे आहे? पर्स…. पर्स दिसत नाही आहे. अरे, लॅच कीची दुसरी चावी पण इथेच पडलीय. आणि हा कसला कागद? टी.व्ही.वर पडलाय. उं…उं… पत्र दिसतय … बघू या, काय लिहिलय…

– o –

क्रमश: – भाग १

मूळ हिंदी  कथा – ‘घर में रहनेवाली औरत’  मूळ लेखक – श्री भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरते शेवटी.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ सरते शेवटी.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

पाहता पाहता २०२२ संपत आलं, नव्हे संपलंच. प्रत्येक नवीन वर्षात अनेक गोष्टी , अनेक घटना घडतात. काही खूप संवेदनशील असतात तर काही आयुष्यभर आनंद उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. तर काही हे घडलं नसतं तर बर झालं असतं, असे मनाला वाटून जाणाऱ्या  असतात. काही आनंद हे दुःखाची झालर वा अस्तर लावून येतात. पण चेहऱ्यावर कधीच त्याच्या छटा दिसू दिलेल्या नसतात. पण असं का ?  खरं जगावं, सुखात आनंदी, दुःखात थोडं निराशा दाखवण्याचे स्वातंत्र्य नाही का आपल्याला…! खरं जगूया, खरं बोलूया ! एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेऊ या..!

वेदनेचं गाणं करता यावं आणि संवेदनेने ते गात रहावं. आणि हो आनंदाचा उन्माद होऊ नये एवढं मात्र नक्की करावं

ग़म का ख़ज़ाना तेरा भी है, मेरा भी

ये अफ़साना तेरा भी है, मेरा भी

अपने ग़म को गीत बना कर गा लेना

राग़ पुराना तेरा भी है, मेरा भी

तू मुझको और मैं तुझको समझाऊं क्या

दिल दीवाना तेरा भी है, मेरा भी

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बाहुलीचा हौद — लेखक : अज्ञात☆ सुश्री शुभा गोखले ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ बाहुलीचा हौद — लेखक : अज्ञात☆ सुश्री शुभा गोखले ☆ 

 भाऊबीज… स्त्री पर्वात ‘सण’ म्हणून या दिवसाला खूप महत्त्व.

पण स्त्री इतिहासात या दिवसाला अजून एक महत्व आहे…

…आज ह्या दिवशी, म्हणजे या तिथीला… पुण्यनगरीत जवळपास १७५ वर्षापूर्वी या दिवशी एक खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली…ती म्हणजे… बाहुलीच्या हौदाचे लोकार्पण.

काय आहे हा बाहुलीचा हौद ? बाहुली कोण? या हौदाचे एवढे महत्व का ?… सांगते...

मी स्वतः इतिहासाची विद्यार्थिनी…

कॉलेजमधे असताना महात्मा फुले यांचे चरित्र अभ्यासताना, कुठेतरी वारंवार डॉक्टर विश्राम घोले यांचा उल्लेख यायचा. ते फार मोठे शल्यविशारद होते. ते माळी समाजातील बडे प्रस्थ. ते पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समिती अध्यक्ष होते… ते महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते. आणि त्याहीपेक्षा मह्त्वाचे म्हणजे ते सुधारक होते.

महात्मा फुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन  त्यांनी स्त्री शिक्षणाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली.

सुरुवात आपल्या घरातून करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुली… हिला शिकवण्यास सुरुवात केली.

बाहुली… खरोखरच नावाप्रमाणे बाहुली. वय अवघे ६-७. अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत… बाहुलीच्या शिकण्याला डॉक्टर घोले यांचे पाठबळ असले तरी घरातील जेष्ठ व्यक्ती, महिलाना त्यांची ही कृती पूर्ण नापसंत होती.  किंबहुना त्यांचा याला प्रखर विरोध होता.

अनेकदा डॉक्टर घोले यांना समजविण्याचा प्रयत्न जातीतील मान्यवरांनी केला. जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली. पण डॉक्टर घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही.

शेवटी ……. 

काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तींनी … काचा कुटुन घातलेला लाडू बाहुलीस खावयास दिला… अश्राप पोर ती…काचांचा लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूमुखी पडली… 

… बाहुलीचा मृत्यू झाला… स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी.

आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ डॉक्टर घोले यांनी बाहुलीचा हौद बांधला, आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी ठेवल्याची नोंद आहे… पण  इतिहासात बाहुलीच्या जन्म मृत्युच्या तारखेची नोंद मात्र आढळत नाही.

काळ बदललाय. कालपटावरील आठवणी धूसर झाल्यात. डॉक्टर विश्राम घोले यांच्या नावाचा घोले रोड आता सतत वाहनांच्या वर्दळीने धावत पळत असतो. पूर्वी शांत निवांत असलेली बुधवार पेठ आज व्यापारी पेठ म्हणून गजबजून गेलीये. फरासखाना पोलीस चौकीसुध्दा आता कोपऱ्यात अंग मिटून बसलीये… आणि त्या फरासखाना पोलीस चौकीच्या एका कोपऱ्यात बाहुलीचा हौद…  इतिहासाचा मूक साक्षीदार….स्थितप्रज्ञाची वस्त्रे लेवून उभा आहे…

बाहुलीचा फोटो मला खूप शोध घेतल्यावर इतिहास संशोधक मंडळातील एका जीर्ण पुस्तकात साधारणपणे सहा वर्षापूर्वी सापडला…

… आज बाहुलीची आठवण … कारण आजचा तो दिवस …

तिच्या स्मरणार्थ बांधलेल्या हौदाचा आजच्या दिवशी लोकार्पण सोहळा झाला होता… स्त्री शिक्षणासाठी आत्माहुती देणाऱ्या बाहुलीच्या निरागस सुंदर स्मृतीस मनोभावे वंदन.

लेखक – अज्ञात

प्रस्तुती : सुश्री शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्री स्वतःच पूर्णरुप… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले  ?

☆ स्त्री स्वतःच पूर्णरुप… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली.

पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा यशोधरेला समजली, तेव्हा ती उद्ध्वस्त झाली. पण तिने कुणाकडेही तक्रार केली नाही. जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहील, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे, असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली. पण तिने त्यास नकार दिला.

आणि एका सुंदर सकाळी…

ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले.

तिने शांतपणे त्यांना विचारले, “आता तुम्हाला लोक ‘बुद्ध’ म्हणून ओळखतात ना ?”

त्यांनीही तितक्याच शांतपणे उत्तर दिले, “होय. मी देखील तसे ऐकले आहे.”

तिने पुढे विचारले, “त्याचा अर्थ काय ?”

“जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !” ते म्हणाले.

ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली.

काही वेळाने ती म्हणाली, “आपण दोघेही काहीतरी नवे शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग समृद्ध होईल;पण मी जे शिकले आहे, ते फारसे जगापुढे येणारच नाही.”

बुद्धांनी तिला विचारले, “तू काय धडा शिकलीस ?”

तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या .

“तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते.”

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तू तर आनंदाची लकेर… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– तू तर आनंदाची लकेर – ? ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

माथी नाही छप्पर

नाही विसावा नाही घर

खळखळते हास्य तुझे

मजसाठी तू आनंदाची लकेर । १ ।

सपसप चालती कर

झपझप चालती पाय

निर्झरासम गुंजन तुझे

मजसाठी तू आनंदाची लकेर । २ ।

माथ्यावरी कष्टाची पाटी

वणवण भाळी पोटासाठी

डोळे तुझे जणू भ्रमर

मजसाठी तू आनंदाची लकेर । ३ ।

नाही गिरवले मी अक्षर

तरी असेन तुजसाठी तत्पर

करेन तुज मी साक्षर

मजसाठी तू आनंदाची लकेर । ४ ।

चित्र साभार –सौ. दीपा नारायण पुजारी

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी, फोन.नं. ९६६५६६९१४८

दिनांक – १३/१२/२०२२।

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #163 – है सब कुछ अज्ञात… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”  महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज नव वर्ष पर प्रस्तुत हैं आपकी एक अतिसुन्दर, भावप्रवण एवं विचारणीय कविता  “है सब कुछ अज्ञात……”। )

☆  तन्मय साहित्य  #163 ☆

☆ है सब कुछ अज्ञात…

फिर से नया वर्ष इक आया

है सब कुछ अज्ञात

न जाने क्या सँग में

सौगातें  लाया।

 

विपदाओं की करुण कथाएँ

बार-बार स्मृतियों में आये

बिछुड़ गए जो संगी-साथी

कैसे उनको हम बिसराएँ

है अनुनय कि विगत समय की

पड़े न तुम पर काली छाया

 फिर से नया वर्ष……..।

 

स्वस्ति भाव उपकारी मन हो

बढ़े परस्पर प्रेम सघन हो

हर दिल में उजास तुम भरना

सुखी सृष्टि, हर्षित जन-जन हो

नहीं विषैली बहे हवाएँ

रहें निरोगी सब की काया

फिर से नया वर्ष ……..।

 

सद्भावों की सरिता अविरल

बहे नेह धाराएँ निर्मल

खेत और खलिहान धान्यमय

बनी रहे सुखदाई हलचल

स्वागत में नव वर्ष तुम्हारे

 

आशाओं का दीप जलाया

फिर से नया वर्ष ……..।

 

विश्वशांति साकार स्वप्न हों

नव निर्माणों के प्रयत्न हों

देवभूमि उज्ज्वल भारत में

नये-नये अनमोल रत्न हों

अभिनंदन आगत का है

आभार विगत से जो भी पाया

फिर से नया वर्ष ……..।

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ “आवाज की खनक” – श्री मनोज शर्मा ☆ श्री कमलेश भारतीय☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ पुस्तक चर्चा ☆ “आवाज की खनक” – श्री मनोज शर्मा ☆ श्री कमलेश भारतीय ☆

मनोज शर्मा और उनकी कविता “मैंने एक कविता लिखी है” -कमलेश भारतीय

मनोज शर्मा जो मेरे छोटे भाई की तरह है । जिन दिनों नवांशहर में था उन दिनों मनोज अपनी हिंदी प्राध्यापिका अहिंसा पाठक के साथ नवांशहर आता । हमारी अनौपचारिक कवि गोष्ठियां उनके घर होतीं । खूब बातचीत भी । फिर मैं चंडीगढ़ चला आया दैनिक ट्रिब्यून में । तब भी मनोज जब जब चंडीगढ़ आता तब तब मुलाकातें होतीं । एक युवा कवि की अंतर की छटपटाहट इन मुलाकातों में हर बार देखने और महसूस करने को मिलती । फिर वह तबादलों की मार में मुम्बई जम्मू तक चला गया और हमारी मुलाकातें नहीं हुईं लेकिन सम्पर्क बना रहा हर शहर में । मैं काफी समय बाद पंचकूला पहुंचा । हरियाणा ग्रंथ अकादमी की जिम्मेवारी में । तब किसान भवन ज्यादा रहता था । एक दिन नीचे हाल में एक कार्यक्रम चल रहा था । यों हो नजर गयी जो मंच संचालन कर रहा था , वह मनोज शर्मा था । मुलाकात हुई । वह भी ट्रांस्फर होकर चंडीगढ़, नाबार्ड में आ चुका था । दोनों आसपास रहते भी फिर न मिल पाये । वह फिर जम्मू ट्रांस्फर हो गया और मैं अपना समय समाप्त होने पर वापिस हिसार । अब मनोज सेवानिवृत्त होकर होशियारपुर है और नया काव्य संकलन भेजा है -आवाज की खनक । मनोज को अपने भाई से बिना कहे एक उम्मीद रहती है कि कुछ तो लिखूंगा । पर थोड़ी देर हो गयी । यूं ही इधर उधर की व्यस्तताओं के चलते । अब तीन दिन से पढ़ रहा था मनोज की कविताएं । नववर्ष की पहली सुबह भी मनोज की कविताओं के साथ गुजारी ।

सच्ची बात कहूं कि मनोज इन वर्षों में कविता में बहुत आगे निकल चुका है । इसकी कविताओं की खनक अब देश सुन रहा है । समझ रहा है । इसकी एक कविता है – मैंने, एक कविता लिखी है । यदि इसे पूरा ही दे दूं तो लगेगा यह उसके पूरे संग्रह का मिजाज , उसकी कविता के तेवर और कविता लिखने की जरूरत सबको एकसाथ बयान करने के लिए काफी है । लीजिए :

एक उबलता कालखंड है

घरों से बाहर आ गये हैं लोग

कि औरतों ने तवे औंधे कर दिये हैं

और मैंने एक कविता लिखी है

जब चढ़ रहा है शेयर बाजार

संसद में आंख मार रहा है , चौकीदार

कोई एक तमाम नीलामियां खरीदता

दुनिया भर के अमीरों को

पिछाड़ने की जुगत में

मैंने एक कविता लिखी है !

लिखी है प्रकृति, जनांदोलन

स्मृति, साम्राज्यवाद, राजनिति लिखी है

बूढ़े मां बाप के इलाज के लिए तरसता

 वह चांद लिखा है

जो बेहिचक झोपड़ों में भी चढ़ आता है

पत्ते, हवायें, नदियां लिखी हैं

और बहुत कोशिश करके

संपादक से की है बात !

,,,

मैंने लिखी है कविता

इसी समय में

साथी भी लिख रहे हैं

कवितायें

धधकतीं !

बताइये पूरा मिजाज इस काव्य संकलन की कविताओं को समझने के लिए काफी नहीं ? इन कविताओं में कवि का दिल रो रहा है देश के वर्तमान कालखंड की दशा देखते हुए ! 

ऐसी ही कविता है -तर्पण । समाचारपत्र में गंगा नदी के किनारे बिना किसी परंपरा के कोरोना के समय शव मिट्टी में दबा दिये गये , जिस पर एक कवि के रूप में तर्पण किया मनोज शर्मा ने । ऐसे ही गूंज कविता में किसान आंदोलन की गूंज और दर्द साफ साफ सुनाई देता है । समाज में बढ़ती असहिष्णुता को बयान किया है -कौन जवाबदेह है कविता में ।

जब बची न हो

असहिष्णुता के बीच थोड़ी सी भी

जगह

सारी कथाओं के प्रति

 कौन जवाबदेह है,,,।।। ?

लीलाधर मंडलोई ने भी लिखा है मनोज के लिए कि यह समय ओर छोर विडम्बना का समय है । यह राजनीति , धर्म , पूंजीवाद से साम्राज्यवाद तक की विडम्बनाओं पर यथासंभव  नजर रखती है और यह अवसाद और असहायता में भी देख पाना सकारात्मक है ।

अनेक कवितायें है जो उल्लेखनीय हैं -जितना भूलना चाहता हूं से लेकर आवाज की खनक तक ! और चिंता रह कि

रोज उमड़ घुमड़ आती हैं

स्मृतियां

बची रहेंगीं कितनी …

ये स्मृतियां ही हैं जो उद्वेलित कर रही हैं और कवितायें जन्म रही हैं ।

मैं मनोज शर्मा को इस काव्य संकलन के लिए हार्दिक बधाई देता हूं । यह खनक आगे भी बनी रहे । शुभकामनाएं ।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares
image_print