सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ निरोप देताना… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
वर्षा मागून सरतील वर्षे
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर
रात्री मागून येईल पहाट
नित्य जीवनाच्या रहाटावर
निरोप देता सरत्या वर्षाला
किंतु परंतु मनी न राहावा
करता येईल कोणासाठी
काही विचार हा मनी यावा
आठवणींना जपून ठेवत
विसरून सारे झाले गेले
अनुभवांच्या आधारावर
भविष्याचेच बांधू इमले
चाहूल नवीन वर्षाची
तयारी करू स्वागताची
क्षणभर वळून मागे आता
फळी उभारू माणुसकीची
शिकवून गेले सारे सारेजण
सकारात्मकता मनी ठेवून
इच्छाशक्तीची उंच भरारी
नव्या आशेचे पंख लावून
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈