(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जीका हिन्दी बाल -साहित्य एवं हिन्दी साहित्य की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य” के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक “बाल कहानी – जादू से उबला दूध”)
☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 166 ☆
☆ बाल कहानी – जादू से उबला दूध ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆
“आओ रमेश,” विकास ने रमेश को बुलाते हुए कहा, “मैं जादू से दूध उबाल रहा हूँ। तुम भी देख लो।”
“हाँ, क्यों नहीं?, में भी तो देखें कि जादू से दूध कैसे उबाला जाता है?” रमेश ने बैठते हुए कहा।
” भाइयों, आपे से मेरा एक निवेदन है कि आप लोग मैं जिधर देखें उधर मेत देखना। इस से जादू का असर चला जायेगा और आकाश से आने वाली बिजली से यह दूध गरम नहीं होगा। “विकास ने कहा और एक कटोरी में बोतल से दूध उँडेल दिया।
“अब मैं मंत्र पढूँगा। आप लोग इस दूध की कटोरी की ओर देखना।” यह कहकर विकास ने आसमान की ओर मुँह करके अपना एक हाथ आकाश की और बढ़ाया, ” ऐ मेरे हुक्म की गुलाम बिजली ! चल जल्दी आ! और इस दूध की कटोरी में उतर जा।”
विकास एक दो बार हाथ को झटक कर दूध की कटोरी के पास लाया, “झट आ जा। लो वो आई,” कहने के साथ विकास ने दूध की कटोरी की ओर निगाहें डाली। उस दूध की कटोरी में गरमागरम भाप उठ रही थी। देखते ही देखते वह दूध उबलने लगा। विकास ने दूध की कटोरी उठा कर दो चार दोस्तों को छूने के लिए हाथ में दी, ” देख लो, यह दूध गरम है?”
” हाँ,” नीतिन ने कहा, “मैंने पहले भी कटोरी को छू कर देखा था। वह ठंडी थी और दूध भी ठंड था।”
अब विकास ने कटोरी का दूध बाहर फेंक दिया। तब बोला, ” यह दूध जादू से नहीं उबला था।”
“फिर?” रमेश ने पूछा।
“मैं ने मंतर पढ़ने और बिजली को बुलाने के लिए ढोंग के बहाने इस दूध में चूने का डल्ला डाल दिया था। इससे दूध गरम हो कर उबलने लगा। यह कोई जादू नहीं है।”
“यह एक रासायनिक क्रिया है इसमें चूना दूध में उपस्थित पानी से क्रिया करके ऊष्मा उत्पन्न करता है। जिससे दूध गरम हो कर उबलने लगता है।” विकास ने यह कहा तो सबने तालियां बजा दी।
” लेकिन ऐसे दूध को खानेपीने में उपयोग न करें दोस्तों!” विकास ने सचेत किया।
(हिंदी साहित्य के सशक्त हस्ताक्षर डॉ. राकेश ‘चक्र’ जी की अब तक कुल 148 मौलिक कृतियाँ प्रकाशित। प्रमुख मौलिक कृतियाँ 132 (बाल साहित्य व प्रौढ़ साहित्य) तथा लगभग तीन दर्जन साझा – संग्रह प्रकाशित। कई पुस्तकें प्रकाशनाधीन। जिनमें 7 दर्जन के आसपास बाल साहित्य की पुस्तकें हैं। कई कृतियां पंजाबी, उड़िया, तेलुगु, अंग्रेजी आदि भाषाओँ में अनूदित । कई सम्मान/पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत। भारत सरकार के संस्कृति मंत्रालय द्वारा बाल साहित्य के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य श्री सम्मान’ और उत्तर प्रदेश सरकार के हिंदी संस्थान द्वारा बाल साहित्य की दीर्घकालीन सेवाओं के लिए दिए जाने वाले सर्वोच्च सम्मान ‘बाल साहित्य भारती’ सम्मान, अमृत लाल नागर सम्मान, बाबू श्याम सुंदर दास सम्मान तथा उत्तर प्रदेश राज्यकर्मचारी संस्थान के सर्वोच्च सम्मान सुमित्रानंदन पंत, उत्तर प्रदेश रत्न सम्मान सहित पाँच दर्जन से अधिक प्रतिष्ठित साहित्यिक एवं गैर साहित्यिक संस्थाओं से सम्मानित एवं पुरुस्कृत।
(पूर्वसूत्र – “नाही वहिनी. आम्ही आणि डॉक्टरांनी काहीच केलेले नाही. आम्ही फक्त निमित्त होतो. बाळ वाचलंच नाहीय फक्त तर ते ‘वर’ जाऊन परत आलंय.” लेले काका सांगत होते,”आत्ता पहाटे आम्ही इथे आलो ते मनावर दगड ठेवून पुढचं सगळं अभद्र निस्तरण्याच्या तयारीनेच आणि इथे येऊन पहातो तर हे आक्रित! दादा, तुम्हा दोघांच्या महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच या चमत्कार घडलाय.बाळ परत आलंय.”
या आणि अशा अनेक अनुभवांचे मनावर उमटलेले अमिट ठसे बरोबर घेऊनच मी लहानाचा मोठा झालोय.सोबत ‘तो’ होताच…!)
पुढे तीन वर्षांनी बाबांची कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला बदली झाली ते १९५९ साल होतं. कुरुंदवाड सोडण्यापूर्वी आई न् बाबा दोघेही नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेले.आता नित्य दर्शनाला येणं यापुढे जमणार नाही याची रुखरुख दोघांच्याही मनात होतीच. आईने दर पौर्णिमेला वाडीला दर्शनाला येण्याचा संकल्प मनोमन सोडून ‘माझ्या हातून सेवा घडू दे’ अशी प्रार्थना केली आणि प्रस्थान ठेवलं!
किर्लोस्करवाडीला पोस्टातल्या कामाचं ओझं कुरुंदवाडपेक्षाही कितीतरी पटीने जास्त होतं.पूर्वी घरोघरी फोन नसायचे.त्यामुळे ‘फोन’ व ‘तार’ सेवा पोस्टखात्यामार्फत २४ तास पुरवली जायची.त्यासाठी पोस्टलस्टाफला दैनंदिन कामांव्यतिरिक्त जादा
रात्रपाळीच्या ड्युटीजनाही जावे लागायचे. त्याचे किरकोळ कां असेनात पण जास्तीचे पैसे मिळायचे खरे, पण ती बिले पास होऊन पैसे हातात पडायला मधे तीन-चार महिने तरी जायचेच. इथे येऊन बाबा अशा प्रचंड कामाच्या दुष्टचक्रात अडकून पडले.त्यांना शांतपणे वेळेवर दोन घास खाण्याइतकीही उसंत नसायची. दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जायचा आईचा नेम प्रत्येकवेळी तिची कसोटी बघत सुरू राहिला होता एवढंच काय ते समाधान. पण तरीही मनोमन जुळलेलं अनुसंधान अशा व्यस्ततेतही बाबांनी त्यांच्यापध्दतीने मनापासून जपलं होतं. किर्लोस्करवाडीजवळच असलेल्या रामानंदनगरच्या आपटे मळ्यातल्या दत्तमंदिरातले नित्य दर्शन आणि सततचे नामस्मरण हा त्यांचा नित्यनेम.कधीकधी घरी परत यायला कितीही उशीर झाला तरी त्यांनी यात कधीही खंड पडून दिला नव्हता!
मात्र बाबांच्या व्यस्ततेमुळे घरची देवपूजा मात्र रोज आईच करायची. माझा धाकटा भाऊ अजून लहान असला तरी त्याच्यावरच्या आम्हा दोन्ही मोठ्या भावांच्या मुंजी नुकत्याच झालेल्या होत्या. पण तरीही आईने पूजाअर्चा वगैरे बाबीत आम्हा मुलांना अडकवलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग…
पोस्टलस्टाफला किर्लोस्कर कॉलनीत रहायला क्वार्टर्स असायच्या. आमचं घर बैठं,कौलारू व सर्व सोयींनी युक्त असं होतं. मागंपुढं अंगण, फुलाफळांची भरपूर झाडं, असं खऱ्या ऐश्वर्यानं परिपूर्ण! आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा घरात अर्थातच साधी जमिनच होती. पण कंपनीतर्फे अशा सर्वच घरांमधे शहाबादी फरशा बसवायचं काम लवकरच सुरू होणार होतं. त्यानुसार आमच्याही अंगणात भिंतीना टेकवून शहाबादी फरशांच्या रांगा रचल्या गेल्या.
त्याच दिवशी देवपूजा करताना आईच्या लक्षात आलं की आज पूजेत नेहमीच्या दत्ताच्या पादुका दिसत नाहीत. देवघरात बोटांच्या पेराएवढ्या दोन चांदीच्या पादुका होत्या आणि आज त्या अशा अचानक गायब झालेल्या!आई चरकली.अशा जातील कुठ़ न् कशा?तिला कांहीं सुचेचना.ती अस्वस्थ झाली. तिने कशीबशी पूजा आवरली. पुढची स्वयंपाकाची सगळी कामंही सवयीने करीत राहिली पण त्या कुठल्याच कामात तिचं मन नव्हतंच. मनात विचार होते फक्त हरवलेल्या पादुकांचे!
खरंतर घरी इतक्या आतपर्यंत बाहेरच्या कुणाची कधीच ये-जा नसायची. पूर्वीच्या सामान्य कुटुंबात कामाला बायका कुठून असणार?
धुण्याभांड्यांसकट सगळीच कामं आईच करायची. त्यामुळे बाहेरचं कुणी घरात आतपर्यंत यायचा प्रश्नच नव्हता. आईने इथं तिथं खूप शोधलं पण पादुका मिळाल्याच नाहीत.
बाबा पोस्टातून दुपारी घरी जेवायला आले. त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत आई गप्पगप्पच होती. नंतर मात्र तिने लगेच ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली.ऐकून बाबांनाही आश्चर्य वाटलं.
“अशा कशा हरवतील?”
“तेच तर”
“सगळीकडे नीट शोधलंस का?”
“हो..पण नाही मिळाल्या”
आई रडवेली होऊन गेली.
“नशीब, अजून फरशा बसवायला गवंडीमाणसं आलेली नाहीत.”
“त्यांचं काय..?”
“एरवी त्या गरीब माणसांवरही आपल्या मनात कां होईना पण आपण संशय घेतलाच असता..”
त्या अस्वस्थ मनस्थितीतही बाबांच्या मनात हा विचार यावा याचं त्या बालवयात मला काहीच वाटलं नव्हतं,पण आज मात्र या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतंय!
नेमके त्याच दिवशी गवंडी आणि मजूर घरी आले. पूर्वतयारी म्हणून त्यांनी जमीन उकरायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने घरातले सगळे कानेकोपरेही उकलले गेले. पण तिथेही कुठेच पादुका सापडल्या नाहीत. पूजा झाल्यानंतर आई ताम्हणातलं तीर्थ रोज समोरच्या अंगणातल्या फुलझाडांना घालायची. ताम्हणात चुकून राहिल्या असतील तर त्या पादुका त्या पाण्याबरोबर झाडात गेल्या असायची शक्यता गृहीत धरून त्या फुलझाडांच्या भोवतालची माती खोलवर उकरून तिथेही शोध घेतला गेला पण पादुका मिळाल्याच नाहीत.
मग मात्र आईसारखेच बाबाही अस्वस्थ झाले. नेहमीप्रमाणं रोजचं रुटीन सुरू झालं तरी बाबांच्या मनाला स्वस्थता नव्हतीच.कुणाकडूनतरी बाबांना समजलं की जवळच असणाऱ्या पलूस या गावातील सावकार परांजपे यांच्या कुटु़ंबातले एक गृहस्थ आहेत जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत.ते केवळ अंत:प्रेरणेने हरवलेल्या वस्तूंचा माग अचूक सांगतात अशी त्यांची ख्याती आहे म्हणे.बाबांच्या दृष्टीने हा एकमेव आशेचा किरण होता! बाबा स्वत: त्यांनाही जाऊन भेटले. आपलं गाऱ्हाणं आणि मनातली रूखरूख त्यांच्या कानावर घातली. त्यांनीही आपुलकीने सगळं ऐकून घेतलं. काहीवेळ अंतर्मुख होऊन बसून राहिले.तोवरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या शांतपणाची जागा हळूहळू काहीशा अस्वस्थपणानं घेतलीय असं बाबांना जाणवलं. त्यांची अंध,अधूदृष्टी क्षणभर समोर शून्यात स्थिरावली आणि ते अचानक बोलू लागले.बोलले मोजकेच पण अगदी नेमके शब्द!
“घरी देवपूजा कोण करतं?” त्यांनी विचारलं.
“आमची मंडळीच करतात”
बाबांनी खरं ते सांगून टाकलं.
” तरीच..”
“म्हणजे?”
” संन्याशाची पाद्यपूजा स्त्रियांनी करून कसं चालेल?”
“हो पण.., म्हणून..”
” हे पहा ” त्यांनी बाबांना मधेच थांबवलं.” मनी विषाद नको, आणि यापुढे हरवलेल्या त्या पादुकांचा शोधही नको. त्या कधीच परत मिळणार नाहीत.”
” म्हणजे..?”
” त्या हरवलेल्या नाहीयत. त्या गाणगापूरच्या पादुकांमध्ये विलीन झालेल्या आहेत.”
बाबांच्या मनातली अस्वस्थता अधिकच वाढली.कामात मनच लागेना ‘घडलेल्या अपराधाची एवढी मोठी शिक्षा नको’ असं आई-बाबा हात जोडून रोज प्रार्थना करीत विनवत राहिले.भोवतालच्या मिट्ट काळोखातही मनातला श्रध्देचा धागा बाबांनी घट्ट धरुन ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती पण ती फरुद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार होणं आवश्यक होतं!आणि एक दिवस अचानक……?
पौषातली दुपार निरोप घ्यायच्या तयारीत होती. थंड वारा सुटला होता. धरणीधरची धाकटी मावशी आणि तिचे पती आले होते. धरणीधर- मुग्धा हे पती-पत्नी उतरत्या उन्हाची दुलई ओढून त्यांच्यासोबत गप्पा मारत होते.
“चहा कधी करणार?” धरणीधरने हातावर हात चोळत विचारलं,” काय काका! एक-एक कप गरम चहा मिळाला,तर रक्त गोठण्यापासून आपली सुटका होईल ना!”
मुग्धा हसतहसत उठून उभी राहिली.”जरा कुठे मावशींबरोबर बोलत होते,तर मध्येच…”
डॉ अमिताभ चौधुरी
“सॉरी मॅम, पण मोठमोठ्या लोकांचं बोलणं एका खेपेत थोडंच आटोपतं? बोलणी तर चालूच राहतात. आता हिंदुस्थान-पाकिस्तानच्या बोलण्यांचं ,वाटाघाटींचं बघा ना. चहा करून आण. मग गप्पांचा दुसरा एपिसोड चालू करू या.”
मुग्धा स्वयंपाकघरात गेली,तोच टेबलावरचा धरणीधरचा फोन वाजायला लागला.
मुग्धाने हाक मारली,”अहो, तुमचा फोन वाजतोय.”
“यावेळी कोणाचा फोन?” धरणीधरला खुर्ची सोडून उठावंच लागलं. नाव धरणीधर,पण मोबाईलचं ओझंपण त्याला पेलवत नाही. तो भार,तो पत्नीवरच सोपवतो.
“हॅल्लो!” पलीकडून आवाज आला. पण रस्त्यावरच्या कलकलाटाने ते शब्द स्वाहा केले.
“कोण बोलतंय?”
“अरे,धरणी. मी शंभुदयाल बोलतोय. ओळखलंस?” एक अस्पष्ट आवाज स्मृतीच्या सागरापलीकडून हलक्या हाताने टकटक करत होता.
“अरे यार! कसा आहेस? किती दिवसांनी! ”
“दिवस नाही.वर्षं म्हण.बस्स! अडतीस वर्षं नोकरी करून आता रिटायर झालोय. बसल्याबसल्या जुन्या मित्रांना फोन करतोय.”
“वा! पण माझा नंबर कसा मिळाला?”
“अरे,मोहनकडून मुरलीचा, मुरलीकडून मोतीलालचा..असं करत करत मिळाला.”
“काय म्हणतोयस? रिटायरमेंटनंतर मुक्काम कुठे?”
“परत आलो बनारसला. सर्वांहून सरस,आमची काशी-बनारस. जमुहरा बाजारात ढीगभर लोकांनी घरं बांधली.रिटायर होत गेले आणि तिथेच फॅक्टरीपासून लांब जमीन विकत घेऊन घरं बांधत गेले.तीन-चार एकर जमिनीत लोक घर बांधतात. तेवढ्या पैशात बनारसमध्ये कबुतरांच्या कॉलनीतलं एखादं खुराडंपण मिळणार नाही.”
“आणि मुलं? ती काय करतात?”
थोडा वेळ शंभुदयालचा आवाजच बंद झाला.
नंतर ” मला दोन मुलगे आहेत. दोघेही सेटल झालेत. मोठा बंगलुरूच्या सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर आहे. धाकटा भोपाळच्या एका पॉलिक्लिनिकशी अटॅच्ड आहे.”
“वा,बच्चू! मला वाटतं,तू एकदा फोनवर बोलला होतास,मोठा मुलगा इंजिनिअर आणि धाकटा डॉक्टर. म्हणजे लक्ष्मी तुझ्या घरी पाणी भरतेय, म्हणायची.”
“तुझ्या मुलीचं लग्न झालं ना? ती ऑस्ट्रेलियात असते म्हणे.”
“हो.”
“आणि तुझा मुलगा टाटा सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये पीएचडी करतोय ना?”
“अरे! तू तर सीआयडीसारखी सगळी इन्फॉर्मेशन गोळा केलीयस.”
” हा हा! माझं काय? दिवसभर बसून असतो. प्रायमरीपासून कॉलेजपर्यंतच्या जुन्या मित्रांना – ज्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, त्यांना फोन करत राहतो. कोणाला तुझ्याविषयी विचारतो.मग तुझ्याकडून दुसर्या कोणाचीतरी माहिती काढीन. बस्स. इन्फॉर्मेशन कम्प्लिट.”
हायस्कूलमधल्या दोन मित्रांच्या गप्पा अशाच चालू राहिल्या.
“जगन्नाथ तुझा जिवलग मित्र होता. तो कसा आहे,ठाऊक आहे का तुला?” शंभुदयालने विचारलं,” काही वर्षांपूर्वी मालाची डिलिव्हरी घ्यायला आसनसोलला गेलो होतो, तेव्हा मला भेटला होता.”
“काय सांगू तुला? तो अगदी एकटा पडलाय आता,” धरणीचा आवाज उदास झाला,”मुलगी चेन्नईला नोकरी करते. आणि मुलगा भुवनेश्वरला. मला वाटतं,त्याचं शिक्षण अजून पुरं नाही झालं.”
“चांगलंच आहे की! पण एकटा पडलाय म्हणजे?”
” त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता. तेव्हा बिचारा मुंबईला टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आणि कुठे कुठे धावाधाव करत होता. पण कॅन्सर म्हणजे असला रोग ,साक्षात यमराजाशी गाठ. त्यानंतर कधी भेटला नाही तुला तो?”
“नाही. माझ्याकडे त्याचा नंबर नाही. तुझ्याकडे कधी येईन,तेव्हा त्याचा नंबर घेईन. आणि बोलेन त्याच्याशी.”
“नक्की ये. या म्हातारपणात बालपणीच्या गप्पा होतील.”
” बरोबर बोललास. काय सांगू? त्रेसष्ट वर्षांचा होता होता सहाशे तीस रोग लागले माझ्यामागे.”
” चल. नंतर गप्पा मारू या. शिवीगाळ करू या. भेटायला आलास,की चहा पाजीन आणि इरसाल बनारसी शिव्यांनी तुझं आदरातिथ्य करीन. आता मावशी आणि काका आले आहेत.”
“ठीक आहे. भेटू या कधीतरी.”
“नक्की ये. अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही. पण एक फोन कर. नाहीतर तू यायचास आणि नेमकं त्याच वेळी आम्ही दोघं दहा मिनिटांसाठी बाहेर जायचो. ओ.के.”
फोन ठेवून धरणीधर मावशी-काकांकडे आला.
“पहिलीपासून आम्ही एका वर्गात होतो. हायस्कूलपर्यंत बरोबर होतो. मग दोघांचे सब्जेक्ट वेगवेगळे झाले. मी वेगळ्या कॉलेजमधून इंटर केलं.”
” पहिल्या इयत्तेतला मित्र! अरे वा!” मावशीचा चेहरा खुलला.
“हो. त्याच्याकडे हजार-बाराशे फोन नंबर आहेत,म्हणत होता. सगळ्यांना फोन करत असतो. काय बडबडतो देवाला ठाऊक! आमच्या जमान्यात वर्गात मेंढरांसारखी मुलं भरलेली असायची. पण सत्तर-ऐंशीपेक्षा जास्त थोडीच असणार! आणि हायस्कूलमध्ये पोहोचेपर्यंत त्यापैकी काही मुलं रिसर्च स्कॉलर बनली. मग उरली किती?….नंतर त्याच्या ऑफिसात किंवा आयआयटीमध्ये असून असून किती मित्र असणार! फार तर पन्नास -शंभर . का कोणास ठाऊक! तोंडाला येईल ,ते बडबडत होता.”
चहा आला. घोट घेताघेता धरणीधरचं स्मृतिमंथन चाललं होतं,” तसं तर,लहानपणीही थापा मारायची सवय होती त्याला. मला आठवतं, त्या दिवसांत सगळ्यांना शायरीची बाधा झाली होती. तर एक दिवस त्यानेपण स्वतःची शायरी ऐकवली,’बदल जाएं अगर माली, चमन होता नहीं खाली, बहारें फिर भी आती हैं,बहारें फिर भी आएंगी’ ”
“अरे,हे तर ‘बहारें फिर भी आती हैं’ या सिनेमातलं गाणं आहे!”
“बघा ना!”
“याआधी कधी बोलणं झालं होतं तुमचं?” आता काकांनाही मजा वाटत होती.
“हो. दोन-तीनदा त्यानेच फोन केला होता. पहिल्यांदा जवळजवळ वीस-पंचवीस वर्षांपूर्वी. शेवटचा तीन-चार वर्षांपूर्वी. तेव्हा म्हणत होता,’आता रिटायर होणार,तेव्हा बनारसला येऊन जुन्या मित्रांना भेटू या.’ ”
” जुन्या मित्रांशी तुझं बोलणं होतं?” मावशीने हसतच विचारलं.
” कुठून होणार? हं. दोघं-तिघं जणं बाजारात वगैरे भेटतात,तेव्हा थोडं बोलणं होतं. नाहीतर कोणाला हार्ट प्रॉब्लेम,तर कोणाला डायबिटीस, कोणाकोणाला तर दोन्ही रोगांचं वरदान. आता शंभू बोललाय,येतो म्हणून, पण येतो की नाही,ते बघू या.”
आणि तेच झालं. कित्येक महिने गेले. शंभुदयाल ना धरणीधरच्या घरी आला,ना त्याने पुन्हा फोन केला. धरणीनेही त्याचा नंबर सेव्ह केला नव्हता. त्यामुळे कॉलबॅकची शक्यता नव्हती .दिवस-रात्री उलटत गेल्या. जग आपल्या चालीने चक्कर काटत राहिलं….
— (क्रमशः भाग पहिला )
मूळ लेखक :डॉ. अमिताभ शंकर रॉय चौधुरी
मूळ हिंदी कथा : कांच की जन्नत
मराठी अनुवाद :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री. विनायक दामोदर सावरकर , आज आपल्या पश्चात जवळपास साडेपाच दशकांचा कालावधी उलटून गेला, पण आपण स्वातंत्र्यवीर की माफी वीर, हा वाद काही मिटता मिटत नाही. परवाच रणदीप हुडाने तयार केलेला आपल्या जीवनी वर आधारीत नवनिर्मित सिनेमा पाहिला आणि माझ्या मनात या द्वंद्वाने पुन्हा उचल खाल्ली. तुमच्या विषयींचे मनोगत, हे तुम्हाला सांगणेच योग्य म्हणून हा प्रपंच…..
प्रथमदर्शनी तर हेच दिसते आहे की चूक नव्हे प्रचंड मोठा अपराध हा तुमच्याकडूनच झाला आहे. संपूर्ण आयुष्यात तुम्ही लहानमोठ्या इतक्या चूका केलेल्या लक्षात येते की त्यामुळेच तुमच्या कार्यकर्तृत्वाची ही जी काही आजही उपेक्षा सुरू आहे, हे योग्यच आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. मी जरा जास्त स्पष्टपणे माझे मत मांडतो आहे, कृपया राग मानू नये. काय करणार… तुमचाच स्पष्टवक्तेपणा कणभर का होईना झिरपला आहे… अर्थात हा दोषही तुमचाच.असो.
खरं पाहता छान शिष्यवृत्ती मिळालेली, त्या काळात विलायतेत राहून अभ्यास पूर्ण करून , बॅरिस्टरची पदवी पदरात पाडून, तिथेच सेटल व्हायचे , अथवा भारतात परतून तत्कालीन इतर बॅरिस्टर मंडळींप्रमाणे छान प्रॅक्टीस करत गडगंज पैसा कमवत ऐषोआरामाचे जीवन जगत केवळ एक छंद, टाईमपास म्हणून सवडी नुसार राजकारण करायचं, ही पद-पैसा-प्रतिष्ठा मिळवून देणारी त्रिसूत्री अवलंबायची सोडून नको ते डोहाळे तुम्ही स्वताचे पुरवत बसलात. यात सर्वस्वी दोष तुमचाच आहे, हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. नेहरू, गांधी, जिन्ना यांची जीवनशैली, यशस्वीता , प्रसिद्धी पाहून सुद्धा तुम्हाला कधी आपला मार्ग तसूभरही बदलावा वाटला नाही हे एक महद् आश्चर्यच !!!!
अहो, तुम्ही शिक्षणासाठी विलायतेला गेलात आणि शिक्षणासोबत नको नको त्या गोष्टी करत राहिलात.स्वत: तर भरकटलातच पण सोबतच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासा पासून विचलीत करण्यात यशस्वी झालात. काय गरज होती १८५७ चे स्वातंत्र्य समर , सहा सोनेरी पाने अशी पुस्तके लिहिण्याची ? तुम्ही अभ्यास करत होता वकिलीचा आणि इकडे इतिहास संशोधन व दुरुस्ती. काय साधलं त्यातून ?? म्हणे दृष्टीकोन बदलायचा आहे. तुम्ही काय मानसशास्त्रज्ञ झाला होता ? अहो, जिथे गीता-ज्ञानेश्वरी वाचून काही फरक पडला नाही, राजा हरिश्चंद्र, श्रीराम, श्रीकृष्ण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज प्रभृतींनी आपल्या जीवाचं रान केलं तरी ज्यांचा दृष्टीकोन बदलला नाही , असे आम्ही दगड , आणि तुम्ही अशा दगडांना घडवायला निघालात !!!!
१८५७ साली जे काही झालं , त्याला शिपायांचे बंड म्हणा किंवा भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले गेलेले सशस्त्र युद्ध म्हणा , त्याने काय मोठा फरक पडणार आहे ? सर्वसामान्य जनता तेव्हाही उदासीन होती व आजही उदासीनच आहे. कारण त्यातून भाकरी मिळत नाही तात्या. पोटाची भूक नाही भागत. राजकीय स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी जुन्या पिढीतली मंडळी अजूनही इंग्रजी राज्य होतं तेच बरं होतं अशी हळहळ व्यक्त करताना दिसतात. काय आहे ना , की आम्हाला तुमच्या सारखे स्वताच्या सुखी संसाराला स्वताच्या हाताने चूड लावणे नाही पटत. तुमच्या हट्टापायी, देशप्रेमापायी तुम्हा दोघा भावांना काळा पाण्याची शिक्षा झाली, संपूर्ण घराची अन्नान्न दशा झाली. तुमच्या वंशाच्या अस्तित्वावरच संकट आले…. क्षमा करा पण हा पूर्णपणे अव्यवहारी वेडाचार आहे. अहो, शिवाजी जन्माला यावा , त्याने रामराज्य निर्माण करावं , हे सगळे आदर्श वाचायला बोलायला ठीक आहेत.
…. पण हे सगळं शेजारच्या घरात, आम्ही त्याचे फायदे घेण्यात , सुखात भागीदार होण्यात नक्कीच धन्यता मानू , पण आम्हाला काही त्रास होता कामा नये, असेच धोरण असायला नको का ? जेणेकरुन आमच्या जीवनाची शांती, सुरक्षितता, आमची लाईफस्टाईल कुठेही बाधीत होणार नाही, आणि याची काळजी मलाच कुटुंब प्रमुख म्हणून घ्यायला हवी , ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी “
आपण मात्र प्रत्येक क्षणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वताच्या व सावरकर कुटुंबाच्या , तसेच तुम्हाला मानणाऱ्या इतर तरुण क्रांतिकारकांच्या आयुष्याचा होम करत होतात. तुम्ही एवढे भारावले होता की, ज्यांच्या साठी एवढा आटापिटा तुम्ही आयुष्यभर चालवला होता, त्यांना ते हवे आहे का ? याचा किंचितही विचार करण्याची तुम्हाला गरज सुद्धा वाटली नाही….
चिखलात लोळणाऱ्या आम्हा डुकरांना, उकिरड्यातच स्वर्ग उपभोगणाऱ्या गाढवांना तुम्ही आलिशान महालात नेवू पाहण्याचा हा तुमचा अट्टाहासच आजच्या तुमच्या या अवस्थेला जबाबदार आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे.
लक्षात घ्या, छत्रपतींना स्वराज्य स्थापनेपासूनच सर्वात जास्त संघर्ष वा विरोध कुणाचा सहन करावा लागला ?? सो कॉल्ड, खानदानी मराठ्यांचा, त्यांच्याच जातभाईंचा .
क्रांतिकारकांच्या लपण्याच्या जागांची माहिती इंग्रज अधिकाऱ्यांना कोण पुरवत होते, भारतीयच ना….
तुम्ही तुरूंगवासातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या स्वागताला किती जण होते, हे जनतेने तेव्हाच तुम्हाला दाखवून दिले होते. तुमच्या त्यागाची, भावनांची , संघर्षाची , कष्टाची किंमत त्यांना किती आहे ते. तुमचे विचार म्हणजे वाघिणीचे दूध, ते वाघाचा बछडाच पचवू शकतो. आमच्या सारख्या मेंढरांचे ते कामच नाही. तेव्हा ही ते शक्य नव्हते व आजही नाहीच.
अजून एक सांगायचं राहून गेलं. आजकालचा फण्डा आहे, ” जो दिखता है , वही बिकता है ” पण अशी आपली दिखावा करण्याची मानसिकताच नाही, मग समाजमान्यता तुम्हाला मिळणार तरी कशी ?? तुम्ही अंदमानात सहन केलेल्या यमयातनांची, अमानवीय छळाची मार्केटिंग करावी असा तुमचा पिंडच नसल्याने तिथला तुमचा जाच , शारीरिक पिडा , उपासमार, बौद्धिक, भावनिक कोंडमारा यापेक्षा आम्हाला सूत कताई सोबत केलेल्या प्रतिकात्मक उपोषणाचे महत्त्व जास्त वाटलं तर यात आमचा दोष कसा काय असू शकतो ??
वर्गात जो विद्यार्थी प्रत्येक वेळी पहिला असतो, शिवाय खेळात , नाटकात ….तो इतर विद्यार्थ्यांच्या रोषालाच पात्र ठरतो. कारण तो सर्व शिक्षकांचा आवडता असतो. प्रत्येक शिक्षक त्याचच कौतुक करत असतात, त्याचच उदाहरण सर्वांना आदर्श म्हणून घालून देत असतात. आपण भारतमातेचे लाडके सुपुत्र आहात , तिच्या गळ्यातील रत्नहार आहात, पण आपलं अनेकांगी व्यक्तिमत्त्व, आपली नैतिक, वैचारिक, बौद्धिक उंची आमच्या कल्पनेच्याही खूप खूप पलिकडची. तुमची बरोबरी आम्ही नाही करू शकत. मग निर्माण होणाऱ्या द्वेषाचे, असूयेचे काय करायचे ? तुमच्या छोट्या बंधूंना १९४८ साली दगडांनी ठेचून ठेचून मारण्याच्या महापराक्रमाने आम्ही हे दाखवून दिलेलेच आहे.
शेवटचं पुन्हा सांगतो, तात्याराव सर्व आयुष्य भर तुम्ही या देश, धर्म अन् समाजा करता केलेले सर्वस्व समर्पण. तुमची ओजस्विता , तेजस्विता , सर्व सर्व काही आमच्या दृष्टीने मातीमोल . आकाशातील सुर्य आकाशीच शोभून दिसतो. आम्ही तुम्हाला आमच्या रंगाने नाही रंगवू शकत… तुमचं तेजही नाही सहन करू शकत. म्हणूनच तुमच्या वर थुंकण्याचा आमच्या लायकी प्रमाणे आम्ही प्रयत्न करत राहणार. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडच राहणार , आमची ही अगतिकता तुम्हीच समजून घ्याल अशी अपेक्षा करून आता आपला निरोप घेतो.
आसमंतात धुकं नुसतं भरून राहिलंय. माझ्या जवानांनी मस्तपैकी शेकोटी पेटवून ठेवलीये माझ्या खोलीतल्या शेकोटीच्या जागेत….छान ऊब मिळतीये काश्मिरातल्या त्या नाजूक लाकडांतून उठणा-या सडपातळ ज्वाळांची. मी अंगावर रजई पांघरूण पडलो आहे निवांत भिंतीला गुडघे टेकवून. सारं कसं धुंद आहे….आपण प्रेमात असतो ना तेंव्हा वाटतं तसं…सगळं मधाळ. केनेथ ब्रुस गोरलिक ज्याला सर्वजण केनी जी म्हणतात…त्याचं स्मूद जॅझ सॅक्सोफोन कानांवर हलकेच पडतं आहे….द मोमेंट वाजवतो आहे केनी.
पण खोलीच्या बाहेर रात्रीच्या अंधारात इकडून तिकडे सतत येरझारा घालणारा प्रकाशझोत आहे आणि त्याचा उजेड थोड्याथोड्या वेळाने खोलीत येऊन जातोय…..हा प्रकाश डोंगरावर काहीतरी शोधतो आहे डोळ्यांत तेल घालून. माझी एके-४७ माझ्या हाताशीच आहे….या शस्त्राचा तो थंड स्पर्श! यातून सुटणारा आगीचा लोळ क्षणार्धात समोरचा देह कायमचा थंड करणारा…..आणि म्हणूनच या सुंदर वातावरणात वास्तवाचं भान सुटता सुटत नाही. आणि ते सोडून चालणार नाही. मी इथं जीवनाचा आनंद घेण्यासाठी, सुट्टीवर आलेलो नाहीये. आपल्या सीमेत कुणीतरी घुसण्याच्या प्रयत्नांत आहे….शत्रू! आणि त्याला थोपवण्यासाठी,संपवण्यासाठी या जीवघेण्या थंडीतही अंगात ऊब टिकवून ठेवायला पाहिजे…..मी जागाच आहे.
आज पहाटे दोन वाजताच आम्ही शत्रूच्या मागावर निघालो होतो….सात वाजेपर्यंत चालू होता आजचा खेळ. आम्ही दबा धरून बसलो होतो….प्रचंड साचलेल्या बर्फात….अंगातील हाड न हाड गोठून चाललेलं….सर्वांच्या हातातील एके-४७ रायफल्स….एखाद्या बाळाला जसं हातांवर अलगद झुलवत रहावं तसं या रायफल्स खेळवत,सांभाळत सर्व सज्ज होतो! आम्ही त्यांची वाट पहात होतो….शिकार रायफल्सच्या टप्प्यात येण्याची वाट पहात बर्फात निजलेलो होतो….कसलाही आवाज न करता…आमच्या श्वासांचाही आवाज बहुदा होत नसावा…श्वासांना वेळकाळ समजते!
पण आज त्यांची शंभरी भरलेली नसावी बहुदा….आम्ही आयोजित केलेल्या या स्वागतसमारंभाकडे मंडळी फिरकलीच नाहीत….त्यांना बहुदा आमचा अंदाज आलेला असावा. किंवा मिळालेली गुप्त माहिती अपुरी असावी! असं होतं कित्येकदा. पण बेसावध राहून चालत नाही! आम्ही परत आलो आहोत! पण लवकरच त्या आगंतुक पाहुण्यांची गाठ पडणार हे निश्चित!
हे शब्द आहेत एका नीडर आणि तरीही मनाने अत्यंत कोवळ्या असलेल्या एका सैन्याधिका-याचे….आपल्या प्रिय पत्नीला सुभाषिणीला लिहिलेल्या एका पत्रातील. अशी चारशेपेक्षा अधिक पत्रं संग्रही आहेत वीरनारी सुभाषिणी वेणुगोपाल यांच्याकडे. आणि या पत्रांचे लेखक आहेत कर्नल वसंथा वेणुगोपाल.
वेणुगोपाल साहेब १९८९ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या ‘घातक नववी’ म्हणून ख्यातकीर्त असलेल्या नवव्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. त्यांची सैन्य कारकीर्द तब्बल १८ वर्षे बहरत राहिली. २००६ मध्ये वेणुगोपाल साहेबांना याच नवव्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी मिळाली….कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या नेतृत्वात यावेळी ही बटालियन जम्मू-काश्मिरातील उरी येथे कर्तव्यावर होती. आणि बटालियनच्या प्रत्येक अतिरेकी विरोधी अभियानात कर्नल साहेब जातीने पुढे असत. एकदा त्यांच्या आईसाहेबांनी त्यांना विचारले होते….कर्नल दर्जाच्या अधिका-यास असं प्रत्येक वेळी प्रत्येक कामात पुढं असावंच लागतं का? त्यावर साहेबांनी मातोश्रींना हसत हसत सांगितलं होतं…अम्मा….माझी माणसं जिथं तिथं मी! जवानाचं नेतृत्व असं अग्रभागी राहूनच करावं असं मला वाटतं!
आजही असंच केलं साहेबांनी. ३० जुलै २००७…पाकिस्तानातून अतिरेक्यांचा एक मोठा गट उरीमध्ये घुसण्याच्या तयारीने सीमा पार करून आपल्याकडे घुसलेला आहे….ही खबर पक्की होती. साहेबांनी आपले कमांडो सज्ज केले आणि स्वत: पुढे निघाले. अतिरेक्यांसाठी भरभक्कम सापळा रचला. अतिरेकी रात्रभर बर्फाच्या कड्यांच्या आडोशाने लपत छ्पत पुढे येत होते….गुहांमध्ये लपत होते. पण आपल्या जवानांनी त्यांना नजरेने टिपलेच…
कर्नल साहेबांनी आता मात्र त्यांना चारी बाजूंनी घेरलं…त्यांना आपल्याकडे घुसू तर द्यायचेच नाही पण परत पाकिस्तानी सीमेत जिवंतही पळून जाऊ द्यायचे नाही….हा प्रत्येकाचाच निर्धार होता. प्रचंड बर्फ होतं…..वीस-तीस फुटांच्या घळी होत्या वाटेत. त्यांच्या निमुळत्या जागांमध्ये आडवे झोपून अतिरेक्यांच्यावर लक्ष ठेवून रहावे लागत होतं. वेणुगोपाल साहेबांना आपला वेढा करकचून आवळत आणला. साहेबांसोबत रेडिओ ऑपरेटर लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव नावाचा मर्दमराठा शूर गडी सावलीसारखा होता.
३१ जुलै,२००७ची सकाळ उजाडली होती…काही तासांपूर्वी तुफान गोळीबार करीत राहणारे अतिरेकी आता एकाएकी शांत झाल्याचे वाटले. म्हणून शशिकांत यांनी अर्धवट उभे राहून गुहेच्या दिशेने पाहिले तर तिकडून एके-४७ ची मोठी फैर शशिकांत साहेबांच्या छातीत घुसली….पण कोसळता कोसळता या पठ्ठ्याने समोरच्या अतिरेक्याला अचूक टिपून वरती पाठवले. आता मात्र वेणुगोपाल साहेब चवताळून पुढे सरसावले. अतिरेक्यांसमोर त्यांचा साक्षात मृत्यूच उभा ठाकला होता..
साहेबांनी एकाला तर अगदी समोरासमोर उडवला….पण इतर अतिरेक्यांनीही नेम साधले आणि साहेब गंभीर जखमी झाले आणि वीस फूट खाली कोसळले…जवानांनी त्यांना पुन्हा वर आणले व सुरक्षित जागी निजवले…पण तशाही स्थितीत साहेबांनी सूचना,नेतृत्व आणि स्वत: गोळीबार जारी ठेवला…रक्तस्राव सुरू असतानाही. वैद्यकीय मदत मिळायला अवकाश होता….! साहेबांनी अशाही स्थितीत आणखी दोन शत्रू टिपले….घातक नववी मराठा बटालियन आता अतिरेक्यांवर आवेशाने तुटून पडली….एकूण आठ अतिरेकी होते….कर्नल साहेब, शशिकांत साहेब आणि उर्वरीत कमांडोज यांनी मिळून हे आठ राक्षस निर्दाळले होते.
पण लान्स नायक शशिकांत गणपत बच्छाव जागीच वीरगतीस प्राप्त झाले होते तर कर्नल वसंथा वेणुगोपाल साहेब रूग्णालयात उपचार मिळेपर्यंत स्वत:चे प्राण राखू शकले नाही….प्रचंड जखमी झाल्याने त्यांच्या श्वासांचाही नाईलाज होता!
कर्नल साहेबांना मरणोत्तर अशोक चक्र सन्मान दिला गेला. लान्स नायक शशिकांत बच्छाव यांना मरणोत्तर वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. २५ मार्च ही कर्नल साहेबांची जन्मतिथी. आज ते ५५ वर्षांचे असते आणि त्यांच्या आंतरीक इच्छेनुसार निवांत जीवन जगत असलेले असते…पण…असो. भावपूर्ण श्रद्धांजली…साहेब.
शहीद कर्नल वसंथा वेणुगोपाल यांच्या पत्नी श्रीमती सुभाषिणी वेणुगोपाल पती गमावल्यानंतरच्या अवघ्या तीनच महिन्यांत निश्चयाने उभ्या राहिल्या…त्यांनी सैनिकांसाठी काम सुरू केले आणि हे काम अतिशय उत्तम सुरू आहे.
कर्नल साहेबांच्या दोन्ही मुलींनी मिळून फॉरएव्हर फोर्टी नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात कर्नल साहेबांनी कुटुंबियांना लिहिलेल्या चारशेच्या वर पत्रांचा उल्लेख,संदर्भ आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याची माझी इच्छा आहे. पुस्तक मागवले आहे. लवकरच त्याबाबतीत कार्यवाही सुरू करीन. कारण ही शूर आयुष्यं आणि त्यांच्या धीरोदात्त कुटुंबियांचा संघर्ष सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजेत…असं वाटत राहतं.
(वरील छायाचित्रात डाव्या बाजूला कर्नल साहेब आणि उभे असलेले लान्स नायक शशिकांत साहेब दिसत आहेत.)
सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील, हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला. त्यामुळे इंग्लिश मध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते.
अशीच एक सिरीयल बघत होते. त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून, नोकरी करून, मुलं सांभाळून, शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती.
मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे. हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकलच्या डब्यातपण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेतसुद्धा सुरू असेल.
तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली, पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, “ए, तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा, अभ्यास, मोठ्यांचे आजार सगळं छान मॅनेज करत होतीस. तुला आम्ही कधीही थकलेलं पाहिलं नाही.”
यावर ती आज्जीबाई छान गोड हसते आणि म्हणते, “मी थकत असे कधीकधी, पण मला ताण मात्र कधीही आला नाही. कारण मला पर्फेक्ट व्हायची भूक नव्हती. किंबहुना आमच्या काळी असं ‘पर्फेक्ट असं काही नसतं’ असं लोकांना मान्यच होतं.
आई म्हटल्यावर ती चुरगळलेल्या ड्रेसमध्ये केस विस्कटलेली असू शकते. मुलांनी भरलेलं घर हे पसारायुक्तच असणार. चाळीशी पार केलेला मुलांचा बाबा, टक्कल असणारच त्याला. पर्फेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टाहाससुद्धा नव्हता. त्यामुळे सोप्पं गेलं जरा तुमच्यापेक्षा.”
पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग आहे हा.
का अट्टाहास करतोय आपण पर्फेक्ट असण्याचा आणि कुणासाठी?
जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळीसुद्धा तरतरीत आणि केससुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते, कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर गॅसजवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो. सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी नाही सांभाळू शकत सगळ्या, त्याऐवजी कुर्ता घातला असेल तर सरसर कामे करता येतात.
ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्यादिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावेच लागणार आहे.मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्याही ग्रंथात सांगितलेले नाही. चित्रातल्यासारखं आवरलेलं घर हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतं.
स्वतःहून अभ्यास करणारी आणि पहिले नंबर वगैरे आणणारी मुलं तर मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात. कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा तिसरा चवथा पाचवा येणारच. अभ्यास छान करून घ्या, पण नंबर येऊ दे की पंचविसावा. नोकरी देताना शाळेतला चवथी ब मधला नंबर कोण विचारतो?.
तब्येत सांभाळावी हे ठीक, पण पन्नाशीच्या बाईने पंचविशीतील दिसण्याचा अट्टाहास कशासाठी?वजनाचा काटा आटोक्यात असावा जे ठीक, पण ‘साइझ झिरो’ चा हट्ट कशाला? सगळ्यांना वन पीस चांगलाच दिसला पाहिजे, हा हट्ट कशासाठी ? काहींची वळणे साडीमध्ये काय सुरेख दिसतात. टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत दुखावणार्या हाय हील कशासाठी. टाच महत्वाची आहे की फोटो?
मुळात या पर्फेक्शनच्या व्याख्या कोण ठरवते आहे?
ऑफिसला काय घालावे, घरी काय घालावे, कसे रहावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे दिसावे, कुठे फिरायला जावे, काय आणि कधी खावे, अगदी कुठल्या गादीवर आणि कसे झोपावे, सगळं काही ठरवण्याचे हक्क आपण मिडियाला नेमके का आणि कधी दिले?
एक माणूस दुसर्या सारखं कधीही नसतं मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल?
करा की मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम. होऊ देत घराचं गोकुळ. अघळपघळ गप्पा मारा मुलांशी, नवर्याशी. मस्त मोठमोठ्याने गाणी म्हणत फिरा घरभर गबाळ्या अवतारात. आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा गोष्ट सांगायचा. सध्या दुर्मिळ होत चाललेली कला आहे ती.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता “आदमी सूरजमुखी सा…” ।)