मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तू आहेसच…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “तू आहेसच” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

ईश्वर – परमेश्वर – देव —भगवान…

तुझी असंख्य नांवे…. अनेक रूपे

तू नाहीस असं ठिकाणच नाही …. चराचरात भरून राहिला आहेस तू…

हो तू आहेसच …. मी मानतेच तुला. ..

तुझी पूजा, नैवेद्य, आरती करत असते …. तुझी स्तोत्र.. मंत्र म्हणत असते … जप करते..

सप्तशतीचा पाठ करते…

 

आताशा एक जाणीव मात्र  व्हायला लागली आहे की…

हे सगळे बाह्योपचार झाले रे…. … आणि इतके दिवस त्यातच रमले मी …. ..

पण आता मात्र….. सगुणातून निर्गुण भक्तीकडे वळावे असे वाटायला लागले आहे…

मनाला सगुण भक्तीची सवय आहे त्यामुळे ती सवय लगेच सुटणार नाही पण…..

…. खोलवर जाऊन अगदी मनापासून तुझ्या जवळ यावं असं वाटायला लागलेल आहे….

 

आता तुझ्याकडे एक विनम्र विनवणी आहे. …

मी जे वाचते जे म्हणते  … त्यातले जे ज्ञान आहे जी शिकवण आहे  जे तत्त्वज्ञान आहे…

……  रोजच्या जगण्यात ते माझ्या…. वाणीतून …. कृतीतून …. विचारातून …. वर्तनातून … अंतरंगातून

प्रगट होऊ दे….. तनामनातून पाझरू दे….. मगच  ती तुझी खरी पूजा होईल. आणि मला माहित आहे..

तुलाही भक्तांकडून हेच अपेक्षित आहे….

प्रसाद म्हणून सद्गुरूंचा हात हातात असू दे त्यांची कृपा माझ्यावर राहू दे….

 

नुसतं शांत बसावं…

आत्मसमर्पण हा खूप मोठा मार्ग आहे..  कठीणही आहे…

पण आता चालायला सुरुवात करावी म्हणते……

चालताना अडखळायला, ठेचकळायला …. थोडं भरकटायलाही होईल ……पण सावधपणे सावकाशपणे चालत राहीन.. .. हळूहळू तो मार्ग ओळखीचा होईल……

चिंतन कशाचं करायचं याचाही अभ्यास करायचा आहे…

 

एक खरच मनापासून सांगू का? खूप काही नको आहे

आता राहिलेलं आयुष्य सहज सोपं करून जगायचं आहे….

देणारा हात …  दुःख ओळखून ते बघू  शकणारे डोळे ….  सत्य ऐकणारे कान …  निर्मळ मन … 

 आणि मधुर वाणी………

… तू आहेसच की वाट दाखवायला …,.. आणि  तुझा हात हातात आहे हे केवढे मोठे भाग्य आहे ….

.. मग जमेलच……

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कैकयी. तिच्यामुळेच रामायण घडले. वनवासात जाण्यापूर्वी राम  हा इतर राजांप्रमाणे फक्त रामराजा होता. पण रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा तो अयोध्येस परत आला तेव्हा तो” प्रभू रामचंद्र” झाला. शुद्ध परात्पर राजाराम वगैरे  सर्व विशेषणे त्याला त्यावेळेला लागली. आणि यासाठी कैकयीच  कारणीभूत आहे.

ती केकय देशाच्या अश्वपती राजाची कन्या होती. दशरथा पासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. आपल्या मुलाला अयोध्येचे राज्य मिळावे म्हणून तिने सावत्र मुलगा राम याला वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. परंतु पुत्र विरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे  तिला खलनायिका ठरवतात.”माता न तू, वैरिणी “या प्रसिद्ध

गाण्यामुळे तर ती जास्तच दुष्ट वाटू लागते. पण प्रत्यक्षात तसे नाही.

कैकयी अत्यंत सुंदर, धाडसी ,युद्धकलानिपुण, ज्योतिषतज्ञ होती .त्यामुळे दशरथाची सर्वात लाडकी राणी होती. एकदा देवराज इंद्र संब्रासुर नावाच्या राक्षसाशी लढत होता. पण तो राक्षस खूप शक्तिशाली होता म्हणून इंद्राने दशरथाकडे मदत मागितली. दशरथ युद्धाला सज्ज झाला. कैकयीदेखील त्याच्याबरोबर गेली. युद्धामध्ये दशरथाच्या सारथ्याला बाण लागला.  दशरथ हादरला. पण कैकयीने स्वतः उत्तम सारथ्य केले. दुर्दैवाने रथाचे एक चाक खड्डयात अडकले. कैकयी पटकन रथातून खाली उतरली. रथाचे चाक खड्डयातून बाहेर काढले. ते पाहून राक्षस घाबरला आणि पळून गेला. दशरथाचे प्राण वाचले. त्याने तिला दोन वर दिले.

रामाचा राज्याभिषेक ठरला. कैकयीने वराप्रमाणे दशरथाला रामाला 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक असे दोन वर मागितले. त्याची खरी कारणे खालील प्रमाणे आहेत.

१)कैकयी ज्योतिष जाणत होती. तिने रामाच्या राज्याभिषेकावेळी कुंडली मांडली. त्यावेळी तिच्या लक्षात आले की सध्या चौदा वर्ष जो कोणी सिंहासनावर बसेल तो स्वतःचा आणि रघुवंशाचा नाश करेल. ते टाळण्यासाठी तिने रामाला वनवासाला पाठवले.

२) ती युद्ध कला निपुण होती. त्यावेळी वाली नावाचा एक राजा होता. त्याला वरदान मिळाले होते की जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची निम्मी शक्ती त्याला मिळत असे. त्याच्याशी युद्ध करायला दशरथ आणि कैकयी गेले. पण दशरथ हरला. तेव्हा वालीने त्याला दोन अटी घातल्या. तुला सोडतो पण मला कैकयी  देऊन टाक किंवा तुझा राजमुकुट दे. अर्थात् दशरथाने आपला राजमुकुट त्याला दिला. ही गोष्ट फक्त या दोघांनाच माहीत होती. राजमुकुटाशिवाय राज्याभिषेक करता येत नाही . म्हणून तिने राज्याभिषेकाच्या आदल्या  रात्री रामाला बोलावले. विश्वासात घेऊन हे सांगितले .” तू वनवासाच्या निमित्ताने वालीचा वध कर आणि तो  राजमुकुट घेऊन ये.”  राम तयार झाला. आणि म्हणूनच राम जेव्हा रावणाचा, वालीचा ,वध करून अयोध्येस परत आला तेव्हा त्याने सर्वात प्रथम कैकयीला नमस्कार केला नंतर कौसल्येला.

३) श्रावणबाळाच्या मातापित्यांनी दशरथाला शाप दिला होता की तू देखील आमच्यासारखाच पुत्रशोकाने प्राण सोडशील. राज्याभिषेकाच्या वेळी दशरथ तसा वृद्धच झाला होता. रामाच्या मृत्यूपेक्षा विरहाच्या पुत्रशोकाने दशरथाचा मृत्यू झालेला बरा. असा सूज्ञ विचार करून , रामाचा मृत्यू योग टाळण्यासाठी तिने रामाला वनवासात पाठवले.

४) रामाचा जन्मच मुळी रावण किंवा सर्व राक्षसांचा वध करणे यासाठी होता.  राज्याभिषेकाच्या वेळी सर्व देवांना चिंता पडली की हा जर इतर राजांप्रमाणे राज्यकारभार करू लागला तर राक्षसांचा वध कोण करणार? ते सगळे सरस्वतीला शरण गेले. सरस्वती मंथरा दासीच्या जिभेवर आरूढ झाली. तिने कैकयीला गोड बोलून भुलवले आणि रामाला वनवासात पाठवण्यास भाग पाडले.

५) खरे तर तिचे भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम होते. ती भरताबरोबर रामाला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावर गेली. व म्हणाली, मी कुमाता आहे. तू मला क्षमा कर. तेव्हा रामाने तिची समजूत घातली.” तू सुमाता आहेस. ज्या मातेने भरतासारखा भाऊ मला दिला ती सुमाताच आहे .”

… मग आपणही तिला कुमाता न म्हणता सुमाताच म्हणूया ना?

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बुवा.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ बुवा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ट्रकने मुंबईत प्रवेश केला तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. एका साध्या टपरीवजा हॉटेलपाशी ट्रक थांबला. बुवा ड्रायव्हर शेजारीच बसले होते. ड्रायव्हरनं खाली उडी मारली. बुवांनाही जाग आली. रात्रभर म्हणावी तशी झोप लागलीच नव्हती. आणि रात्रभरच्या ट्रक प्रवासात ते शक्यही नसतं. पहाटे कुठं डोळा लागला तर मुंबई आलीच.

बुवांचं वय झालं होतं. त्यांना ट्रकच्या केबिन मधुन खाली उडी मारणं शक्य नव्हतं. ड्रायव्हर सोबतच्या माणसानं कशीतरी कसरत करुन बुवांना खाली उतरवलं. टपरीपुढे एक लाकडी टेबल होता.. आणि चार लोखंडी खुर्च्या. बुवा तेथे टेकले. प्लास्टीकच्या जगमधुन पेल्यात पाणी ओतले. खळखळुन चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं. खांद्यावरच्या पंच्याला तोंड पुसलं.

टवके उडालेल्या कपात एका पोरानं चहा आणुन दिला. त्या गरम चहाचा पहिला घोट घेतल्यावर बुवांना जरा बरं वाटलं. थोडी तरतरी आली.

ट्रक ड्रायव्हर नंतर चहाचे पैसे दिले.. ते ठरलेलंच असायचं. बुवांची परिस्थिती ड्रायव्हरला माहीत होती. म्हणुन तर तो नेहमी बुवांना कोल्हापूर पासुन मुंबई पर्यंत घेऊन यायचा.. काहीही पैसे न घेता. जातानाही तसंच.. त्याच ट्रकमधून बुवा पुन्हा कोल्हापुरला जायला निघायचे.

चालत चालत बुवा निघाले.. आणि पंधरा मिनिटांत आकाशवाणी केंद्रावर आले. त्यांचा अवतार बघून खरंतर गेटवर त्यांना अडवायला पाहिजे होतं.. पण बुवांना आता तिथे सगळे जण ओळखत होते. चुरगळलेला सदरा.. गाठी मारलेलं धोतर.. झिजलेल्या वहाणा.. पण दाढी मात्र एकदम गुळगुळीत. काल रात्री निघण्यापूर्वीच बुवांनी दाढी केली होती.

आकाशवाणी केंद्राच्या प्रतिक्षा गृहात बुवा आले. नेहमीच्या सोफ्यावर बुवांची नजर गेली. तो रिकामाच होता. बुवांना जरा बरं वाटलं. तिथे कुणी बसायच्या आत बुवा घाईघाईने गेले.. आणि सोफ्यावर चक्क आडवे झाले. दोनच मिनिटांत बुवा छानपैकी घोरु लागले.

एवढा आटापिटा करून कोल्हापुराहुन मुंबईला येण्याचं काय कारण? तर केवळ पैसा..

बुवांची परिस्थिती खुपच हलाखीची होती. साक्षात सवाई गंधर्वांचा आशिर्वाद मिळालेल्या कागलकर बुवांची सध्या ही अशी परिस्थिती होती. एकेकाळी सवाई गंधर्वांचे शिष्य म्हणून त्यांना कोण मान होता. पण आर्थिक नियोजनचा अभाव. कुणीतरी सांगितलं.. मुंबई आकाशवाणीवर गाण्याचा कार्यक्रम केला की साठ रुपये बिदागी मिळते. त्यांनी आकाशवाणी केंद्रावर चकरा मारायला सुरुवात केली.

तिथं त्यांना सांगण्यात आलं.. ’ तुम्ही कोल्हापूरचे.. त्यामुळे पुणे केंद्रावर जा. ’

पण झालं होतं काय.. पुणे केंद्रावर कलाकारांची गर्दी.. तिथं नंबर लागणं कठीण.. शिवाय बिदागी पण कमी.. म्हणून मग मुंबई केंद्रावर चकरा.

अखेर कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुंबईचा असाच एक डमी पत्ता दिला.. आणि आपण मुंबईकर आहोत असं सिद्ध केलं. मुंबई केंद्रावर त्या वेळी रविंद्र पिंगे अधिकारी होते. त्यांनीही समजुन घेतलं. वर्षाकाठी पाच सहा कार्यक्रम देण्याची व्यवस्था केली.

आकाशवाणी केंद्रावरच्या माणसांनी बुवांना जागं केलं. बुवांच्या रेकॉर्डिंगची वेळ झाली होती. बुवा उठले चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं.. ताजेतवाने झाले.. आणि रेकॉर्डींग रुममध्ये आले.

गळ्यात दैवी सुर घेऊन जन्मलेले कागलकर बुवा गायला बसले.. आणि..

.. त्यांच्या अलौकीक गायनानं सगळा रेकॉर्डींग रुम भारुन गेला.

अर्ध्या तासाचं रेकॉर्डींग झालं.. बुवा बाहेर आले. केंद्रावर असलेल्या कॅन्टीन मध्ये एक रुपयात राईस प्लेट मिळत होती. तिथे जेवण केलं. साठ रुपयांचा चेक खिशात टाकला.. आणि डुलत डुलत पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले.

उमेदीच्या काळात मिळालेला पैश्यात भविष्य काळाची तरतूद करणं सगळ्यांना तरच जमतं असं नाही. मग म्हातारपणी त्यांची ही अशी अवस्था होते. कागलकर बुवांचं नशीब थोडंफार चांगलं.. त्यांना आकाशवाणीनं मदतीचा हात दिला.

कागलकर बुवा ज्याला त्याला अभिमानाने सांगत.. पु. ल. देशपांडे यांनी माझा गंडा बांधला होता. आता पु. ल. तर बालगंधर्वांच्या गायकीचे चहाते.. मग सवाई गंधर्वांचे शिष्य असलेल्या कागलकर बुवांचा गंडा ते कसे बांधणार?

हाच प्रश्न एकदा रविंद्र पिंगे यांनी पु. लं. ना विचारला.

पु. ल. देशपांडे म्हणाले..

मी तेव्हा बेळगावात रहात होतो. कागलकर बुवा पण तेव्हा बेळगावातच रहात होते. मी बुवांची परिस्थिती पाहिली. दोन पैसे मिळावेत म्हणून त्यांनी गाण्याचा क्लास काढला होता. पण त्यांना विद्यार्थी मिळेनात.

मी विचार केला.. मी जर बुवांचा गंडा बांधला, तर बुवांचा जरा गाजावाजा होईल‌.. त्यांना विद्यार्थी मिळतील. केवळ म्हणून मी बुवांचा गंडा बांधला.. त्यामुळे मला अपेक्षित असलेला बोलबाला झाला.. त्यांच्याकडे बरेच विद्यार्थीही आले हे खरं.. पण माणूस मात्र खुपच गुणी.. त्यांच्यासारख्या थोर गायकाला अश्या परिस्थितीतला सामोरं जावं लागलं हे दुर्दैव..

आणि हे आम्हाला पाहायला लागतं आहे.. हे आमचं दुर्दैव!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आईचा खिसा’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आईचा खिसा’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की बाबांना कसा खिसा असतो, त्यात ते पेन , सुट्टी नाणी, कधी कधी बंद्या नोटा ठेवतात,तसा आईला खिसा का नसतो?शाळेची फी भरताना बाबा कसे ऐटीत खिशातून काढून फीसाठी पैसे देतात , किंवा प्रगति पुस्तकावर खिशातलं पेन काढून ऐटीत सही करतात. तसा आई जवळ खिसा का नसतो? आणि जर असलाच खिसा तर नेमका कुठे असतो? आईला विचारलं तर ती फक्त हसायची. “तुला भूक लागली असेल ना?” असं म्हणून पदर खोचून शिऱ्यासाठी रवा भाजायला घ्यायची .  रवा भाजण्याच्या त्या वासावर भुकेशिवाय दुसरं काही सुचत नसे. एकदा खेळताना पडल्यावर पायाची जखम पुसायला कापसाचा बोळा मिळाला नाही म्हणून चक्क कॉटनच्या नव्या साडीच्या टोकाने  माझी जखम तिने पुसून काढली आणि  कपाटातील कैलास जीवन काढून त्यातलं लोण्याच्या गोळ्यासारखं मलम माझ्या जखमेवर लावलं.

मला रात्री लवकर झोप यायची, तेव्हा घरातली कामं लगबगीने आवरून ती तिच्या जुन्या साडीचा काठ घडी करून मला दिव्याच्या उजेडाने  त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांवर मांडायची आणि मला त्या साडीसारखीच अगदी तलम निद्रा यायची.

कुठे बाहेर जाताना बाबा खिशातून पैसे काढून रेल्वेची तिकीट काढायचे आणि आई मात्र खिडकीतून झो झो येणारा वारा माझ्या कानाला बसतो म्हणून माझ्या काना- केसांभोवती आपला पदर गुंडाळून घ्यायची. तेव्हाही माझं लक्ष खिडकीतल्या बाहेरच्या दृश्याबरोबर बाबांच्या खिशाकडे असायचं.

मोठा झाल्यावर मीसुद्धा बाबांसारखा खिसा शिवून घेऊन त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवणार, हे ठरवून ठेवले होते. नेमकी तेव्हाच आई पदराच्या टोकाला गुंडाळून ठेवलेली गोळी (मला तहान लागली असताना) हळूच माझ्या जिभेवर ठेवायची. तृषा पूर्ण शांत व्हायची. कधी खेळताना सर्व मुलं बॉल आणण्यासाठी वर्गणी काढत. अशा वेळी आई तिच्या पदरात बांधलेला रुपया- दोन रुपये काढून देत असे आणि वर रुपया देऊन “उन्ह फार आहे. पेपरमिंट खा चघळायला,” म्हणून सांगत असे. मित्र म्हणत, ” तुझी आई खूप छान आहे रे!” तेव्हा कॉलर टाईट होत असे.

आईकडे खिसा नसताना बाबांपेक्षा जास्त गोष्टी तिच्याकडे कशा, हा प्रश्न मला  थोडा मोठा  होताना पडू लागला. आणि एक दिवस मला माझंच उत्तर सापडून गेलं. आईकडे खिसा असतो. आणि त्या खिशाला चौकट नसते. तो आईचा पदर असतो, जो कायम मुलांसाठी सुखं बांधून ठेवत असतो आणि तोच आईचा कधीही  रिक्त न होणारा खिसा असतो .

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आनंदनिधान’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आनंदनिधान’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक  – आनंदनिधान

लेखक – श्री.विश्वास देशपांडे. 

प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन. 

पृष्ठ संख्या – १६०

किंमत – २००/

पुस्तकाचे मुखपृष्ठच इतके आकर्षक रंगसंगती व मन प्रसन्न करणारे आहे.निळ्या आकाशात सूर्यमुखी फुले. जणू असे वाटते, पुस्तकरुपी आनंदाकडे आकर्षित होणारे वाचक आहेत. एकूण ३३ लेखांच्या माध्यमातून आनंदाचा वर्षाव केला आहे.

पुस्तक उघडल्यावर प्रथम दिसतात मनोगताचे दोन शब्द…

ते वाचताच जाणवते आतील लेख आपल्याला आनंदा बरोबर खूप काही  देणार आहेत.आणि पुढील लेखांची उत्सुकता अजूनच वाढते.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

पहिलाच लेख आनंदनिधान …. आपल्या आयुष्यातील आनंदाची ठिकाणे की जी जवळ असतात पण वेळेवर आठवत नाहीत. हे सांगताना सुरुवातीची वाक्येच मनाची पकड घेतात. एखादी खरोखरची सुंदर गोष्ट असते ती कायम स्वरूपी आनंद देणारी असते. त्या गोष्टीजवळ कधीही गेले तरी ती आनंदच देते.

असाच आनंद देणारी काही ठिकाणे पुढील काही लेखातून भेटायला येतात. त्यात  आनंद व ज्ञान मिळणारी पुस्तके,ग्रंथ,निसर्ग,गाणी,चांगले वक्ते त्यांचे कार्य यांचे महत्व वाचायला मिळते. 

काही लेख वैचारिक मंथनातून उतरलेले व आपल्याला विचार करायला लावणारे आहेत हे जाणवते. जसे धन्यवाद हो धन्यवाद यात धन्यवादाचे महत्व आपल्याला विचार करायला लावते. परतफेड मध्ये अपेक्षा ठेवल्यावर काय होते हे सांगितले आहे. पण शेवट एकदम उत्तम व सर्वांनी अंमलात आणावे असे सोपे तत्व सांगून होतो. मी प्रतिज्ञा करतो की…  असे म्हणताना प्रतिज्ञा व तिचे महत्व खरेच आपल्या गळी उतरते. साखळी मानव्याची कल्पक शिक्षक चांगली क्रांती कशी घडवू शकतो याचा पाठच घालून दिला आहे. भिंत बांधताना मनाच्या भिंती दिसतात. तर इकडची स्वारी संबोधन व नाती काळानुसार कशी बदलतात या कडे लक्ष वेधतात.

खाणाऱ्याने खात जावे म्हणता म्हणता खाणे व गाणे यांची छान संगती चाखायला मिळते.व शेवटच्या ओळी अगदी लक्षात राहतात…

“बनवणाऱ्याने बनवत जावे

खाणाऱ्याने खात जावे

खाता खाता एक दिवस

बनवणाऱ्याचे हात घ्यावे.”

जुने जाऊ द्या मरणा लागुनी म्हणत ध्यानाचे फार उत्तम तत्व विषद केले आहे. मुखवटे वास्तवाचे भान देतात. तर काही खुसखुशीत लेख खूपच हसू फुलवतात. असं आहे अशा माणसांच्या हसू आणणाऱ्या क्वचित इतरांना नकोशा वाटणाऱ्या सवयी सुहास्य तुझे मनास मोही म्हणत हसण्याचे फायदे सांगत दिल है छोटासा व  राम का गुणगान करिए पण म्हणतात. आणि  छोट्या विश्वासच्या शाळेची सफर घडवून आणतात. त्यातच लक्षात येते वाचन लेखनाचे बीज कोठे व कसे रोवले गेले. हा प्रवास कृतज्ञता मधून याची देही याची डोळा अनुभवलेला अपघात दाखवतो  आणि  बुद्ध लेण्यातून बुद्ध दर्शनही घडवतो. आपण सर्व जण अजिंठ्याची लेणी बघतो. बरेचदा शाळेच्या सहली बरोबर! पण हा लेख वाचून जर लेणी बघितली तर खऱ्या अर्थाने लेणी समजतात. जशी सुरुवात आनंद निधान ने होते तसेच शेवट म्हणणे योग्य नाही. पण या पुस्तकातील शेवटचा लेख आनंदाची गुढी उभारून नवीन पुस्तकाची सुरुवात करून देतो आणि वाचकांना आनंदी आनंद देऊन जातो.

एकंदरीत सर्वार्थाने भिन्न भावना व विचार एकत्र एकाच पुस्तकात अनुभवू शकतो.यात सर्व लेखात आपल्याला दिसते ती कोणत्याही वयोगटाला समजणारी सहज सुलभ भाषा, सर्वत्र  सकारात्मकता.  त्यातून हलक्या कानपिचक्याही मिळतात. आणि आपल्याला लिखाणासाठी नवीन विषय मिळतात.

लेखात योग्य ठिकाणी गाणी,श्लोक,काव्य याचाही समर्पक वापर दिसतो.

एकंदर आनंद ते आनंद असा आपला छान आनंदी प्रवास वेगवेगळ्या भावना अनुभवून होतो. आणि  आनंदनिधानाशी आपली गाठ लेखक घालून देतात.

अशा आनंदी अनुभवासाठी खूप खूप धन्यवाद व पुढील पुस्तकाची प्रतीक्षा.

(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ ) 

पुस्तक परीक्षण – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 49 – तुम्हारी याद का सावन… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – तुम्हारी याद का सावन।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 49 – तुम्हारी याद का सावन… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

करम तेरी निगाहों का जरा-सा जो इधर रहता 

तो क्या, घर में मेरे, तनहाइयों का जानवर रहता

*

वहाँ मौसम बदलते हों, यहाँ तो एक ही ऋतु है 

तुम्हारी याद का सावन, बरसता सालभर रहता

*

हवायें कब, संदेशा मौत का, लेकर के आ जायें 

इसी से, घर के दरवाजे, हमेशा खोलकर रहता

*

उसे, मैं भूल भी जाऊँ, मगर वह याद रखता है 

मेरे हालात से, इक पल नहीं वह बेखबर रहता

*

गिला, शिकवा-शिकायत, भूलकर भी मैं नहीं करता 

भले, माने न वह, लेकिन मैं अपना मानकर रहता

*

इशारा यदि जरा-सा भी, मुझे ‘आचार्य’ कर देते 

तो मैं ताजिन्दगी जाकर उन्हीं के द्वार पर रहता

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 125 – नव संवत्सर आ गया… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “नव संवत्सर आ गया…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 125 – नव संवत्सर आ गया… ☆

नव संवत्सर आ गया, खुशियाँ छाईं द्वार ।

दीपक द्वारे पर सजें, महिमा अपरंपार ।।

चैत्र शुक्ल प्रतिपदा को, आता है नव वर्ष।

धरा प्रकृति मौसम हवा, सबको करता हर्ष।।

 *

संवत्सर की यह कथा, सतयुग से प्रारम्भ।

ब्रम्हा की इस सृष्टि की, गणना का है खंभ।।

 *

नवमी तिथि में अवतरित, अवध पुरी के राम ।

रामराज्य है बन गया, आदर्शों का धाम ।।

 *

राज तिलक उनका हुआ, शुभ दिन थी नव रात्रि।

राज्य अयोद्धा बन गयी, सारे जग की धात्रि ।।

 *

मंगलमय नवरात्रि को, यही बड़ा त्योहार।

नगर अयोध्या में रही, खुशियाँ पारावार।।

 *

नव रात्रि आराधना, मातृ शक्ति का ध्यान ।

रिद्धी-सिद्धी की चाहना, सबका हो कल्यान ।।

 *

चक्रवर्ती राजा बने, विक्रमादित्य महान ।

सूर्यवंश के राज्य में, रोशन हुआ जहान ।।

 *

बल बुद्धि चातुर्य में, चर्चित थे सम्राट ।

शक हूणों औ यवन से,रक्षित था यह राष्ट्र।।

 *

स्वर्ण काल का युग रहा, भारत को है नाज ।

विक्रम सम्वत् नाम से, गणना का आगाज ।

 *

मना रहे गुड़ि पाड़वा, चेटी चंड अवतार ।

फलाहार निर्जल रहें, चढ़ें पुष्प के हार।।

 *

भारत का नव वर्ष यह, खुशी भरा है खास।

धरा प्रफुल्लित हो रही, छाया है मधुमास।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मानदंड ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – मानदंड ? ?

सफेद कैनवास पर

बिखर जाते हैं रंग

कैनवास रंगमिति से

उर्वरा हो जाता है

सृजन की बधाई देने

समूह पहुँचता है…..

सफेद साड़ी पर

भूल से छितर जाती है

रंग की एकाध बूँद,

आँचल तनिक फहराता है

हाहाकार मच जाता है,

घुटते रहने की हिदायतें देने

समूह पहुँचता है…..

कलमकार स्वप्न देखता है-

काश! फ्रेम पर

तान देता सफेद साड़ी

और औरत को

ओढ़ा पाता कैनवास!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 मर्यादापुरुषोत्तम श्रीराम को समर्पित साधना मंगलवार (गुढी पाडवा) 9 अप्रैल से आरम्भ होगी और श्रीरामनवमी अर्थात 17 अप्रैल को विराम लेगी 💥

🕉️ इसमें श्रीरामरक्षास्तोत्रम् का पाठ होगा, गोस्वामी तुलसीदास जी रचित श्रीराम स्तुति भी करें। आत्म-परिष्कार और ध्यानसाधना भी साथ चलेंगी 🕉️

 अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 341 ⇒ चंदू पारखी… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चंदू पारखी।)

?अभी अभी # 341 ⇒ चंदू पारखी? श्री प्रदीप शर्मा  ?

अगर हमारे जीवन में टीवी और फिल्म जैसा माध्यम नहीं होता, तो क्या हम चंदू पारखी जैसी प्रतिभाओं को पहचान पाते। मराठी रंगमंच और हिंदी सीरियल व्योमकेश बख्शी से अपनी पहचान बनाने वाले इस कलाकार की कल २६वीं पुण्यतिथि थी।

इंदौर में जन्मे इस शख्स के बारे में मैं केवल इतना ही जानता हूं कि सन् ६४-६५ में हम दोनों एक ही स्कूल श्री गणेश विद्या मंदिर के छात्र थे। मुझे याद नहीं, कभी हमारी आपस में बातचीत भी हुई हो, क्योंकि चंदू एक अंतर्मुखी और एकांतप्रिय छात्र था। हमेशा कमीज पायजामा पहनने वाला, अक्सर उदासीन और कम बोलने वाला और अपने काम से काम रखने वाला।।

स्कूल कॉलेज में कौन आपका दोस्त बन जाए, कुछ कहा नहीं जा सकता। लेकिन कुछ नाम और चेहरे किसी खासियत के कारण स्मृति पटल पर कायम रहते हैं। उचित अवसर पर कुछ प्रकट हो जाते हैं, और शेष जाने कहां गुम हो जाते हैं ;

पत्ता टूटा डाल से

ले गई पवन उड़ाय।

अबके बिछड़े कब मिलेंगे

दूर पड़ेंगे जाय।।

और यही हुआ। चंदू पारखी जैसे कई साथी जीवन के इस सफर में कहां खो गए, कुछ पता ही नहीं चला। वह तो भला हो कुछ हिंदी टीवी सीरियल का, जिनमें अचानक चंदू पारखी वही चिर परिचित अंदाज में दिखाई दिए। पहचान का भी एक रोमांच होता है, जो किसी भी परिचित चेहरे को ऐसी स्थिति में देखकर महसूस किया जा सकता है। अरे ! यह तो अपना चंदू है, ठीक उसी अंदाज में, जैसे हमारे प्रदेश के बाहर हमें कोई MP 09 वाला वाहन देखकर होता है, अरे यह तो अपने इंदौर की गाड़ी है।

उनके पौत्र यश पारखी के अनुसार ;

चंदू पारखी 150 रुपए लेकर मुंबई की ओर निकल पड़े थे… चंदू पारखी का जीवन कठिनाइयों से भरा था। कलाकार ने अपने अंदर के अभिनय प्रतिभा को उम्दा तरीके से समझ लिया था। उन्होंने ठान लिया था कि अब अपना जीवन रंगभूमि को समर्पित करूंगा। मात्र 150 रुपए अपने कपड़े की झोली में रखकर अपनी मंजिल को पाने के लिए चल दिए। वे कला की नगरी मुंबई पहुंच गए। नए लोग और नई चुनौतियों के बीच हमेशा ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम गुनगुनाते थे। इस गाने का उन पर बहुत बड़ा प्रभाव पड़ा। वे कपड़े की झोली में लहसुन की कलियां रखते थे। जब भी भूख लगती एक-दो कलियां खा लिया करते थे। मायानगरी में पहला नाटक आचार्य अत्रे द्वारा लिखित तो मी नव्हेच में काम करने का मौका मिला। इसमें प्रमुख भूमिका में नटश्रेष्ठ #प्रभाकर_पणशीकर थे। नाटक में चंदू पारखी जी ने न्यायाधीश की भूमिका निभाई थी। उन्हें असली पहचान निष्पाप नाटक के बाद मिली।

बड़ी कठिन है डगर अभिनय की। अवसर कभी दरवाजे पर दस्तक नहीं देते। प्रतिभाओं को ही अवसर तलाशना पड़ता है। जिन दर्शकों ने टीवी पर जबान संभाल के सीरियल देखा है, उन्हें चंदू परखी की प्रतिभा के बारे में कुछ कहने की जरूरत नहीं है। मराठी सस्पेंस फिल्म अनपेक्षित में भी चंदू पारखी के अभिनय को बहुत सराहा गया।।

आज जब मैं टीवी सीरियल जबान संभाल के, के चंदू पारखी के रोचक और मनोरंजक पात्र चतुर्वेदी के किरदार को देखता हूं, और स्कूल के सहपाठी चंदू से उसकी तुलना करता हूं, तो दोनों में जमीन आसमान का अंतर होते हुए भी, कहीं ना कहीं, अभिनय की संभावनाओं का अनुभव तो हो ही जाता है।

बस चंदू पारखी को कोई नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर जैसा पारस मिल जाए, तो वह सोना क्या हीरा हो जाए। अफसोस, इन प्रतिभाओं की उम्र विधाता कम ही लिखता है। १४ अप्रैल १९९७ को मेरा यह भूला बिसरा सहपाठी, मुझसे मिले बिना ही बिछड़ गया। बस स्मृति शेष में केवल श्रद्धा सुमन ही बचते हैं ..!!

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मेरी डायरी के पन्ने से # 7 – एक और कर्ण – ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार।आज प्रस्तुत है आपकी डायरी के पन्ने से …  एक और कर्ण )

? मेरी डायरी के पन्ने से…  – एक और कर्ण ?

मुंबई की बारिश से तो सभी परिचित हैं। भारी बारिश हर वर्ष सबका जीवन उथल-पुथल कर देती है। गरीबों का तो निर्वाह करना ही कठिन हो जाता है। चाहे मिट् टी की बनी हुई झोंपड़ी हो या पतरे का बना हुआ झोंपड़ा सभी कुछ जलमग्न हो जाता है। कुछ भाग्यशाली ऐसे भी हैं जो थोड़ी ऊँचाई पर रहते हैं और कुछ अच्छे बड़े कॉलोनी के इर्द-गिर्द उनका घर बना हुआ है। ये झोंपड़ियाँ तो जलमग्न होने से बची रहती हैं पर उनकी पतरे की छतें टपकती ही रहती हैं। जिस कारण घर के भीतर के सामान गीले ही हो जाते हैं। बड़ी कॉलोनी के इर्द-गिर्द रहनेवाले झुग्गी-झोंपड़ी के निवासियों को कोई न कोई काम मिल ही जाता है।

बात हाल ही की है। लगातार कई दिनों तक वर्षा होती रही। अब दो दिन से बारिश बंद हुई। आसपास के खुले मैदान और खुली जगहों पर जहाँ दीवारें हैं या तार लगे हुए हैं वहाँ ये झोंपड़ी के निवासी अपनी गुदड़ियाँ और गीले कपड़े टाँगकर सुखाने की व्यवस्था कर लेते हैं। ज़मीन अभी गीली है, जहाँ पक्की सड़क नहीं वहाँ लोगों के आने-जाने के कारण कीचड़ ही कीचड़ हो गया है। गीले कपड़े वहाँ भी नीचे जमीन पर फैलाकर सुखाए जाते हैं साधारणतया देखा जाता है कि फुटपाथ पर बेचारे गरीब अपनी गीली गुदड़ी सूखने के लिए रख देते हैं।

मुंबई वासी भी इस बात को जानते हैं, संवेदनशील हैं और गुदड़ी के ऊपर से चलने से बचते हुए साइड से निकल जाते हैं।

गणराज नाम का व्यक्ति इसी तरह के एक टीन के पतरेवाले घर में निवास करता था। बड़े कॉलोनी के बाहर रास्ते के उस पार कुछ इस तरह की अस्थायी घर बने हुए थे। वह कॉलोनी के निवासियों की गाड़ियाँ धोता था। चुप रहने वाला, स्वभाव से नम्र व्यक्ति था। कई साल से काम करता आ रहा था। काम भी साफ़ और आदमी भी ईमानदार था।

सुबह-सुबह दूध लेने के लिए कोल्ही साहब अपनी कॉलोनी के गेट के बाहर आए थे। लौटते समय बहुत शोर मचाने लगे। वॉचमैन से पूछताछ करने लगे। समस्या यह थी कि कॉलोनी के बाहर वाली दीवार पर किसी ने अपनी एक गुदड़ी सूखने के लिए फैला रखी थी। कोल्ही साहब को इस बात से बहुत परेशानी थी कि शानदार कॉलोनी की दीवार के बाहर इस तरह की चीजें टाँगकर उसकी शान को बट् टा लगाया जा रहा था। शोर – पुकार सुनकर पास पड़ोस से कुछ लोग उपस्थित हो गए। वॉचमेन ने बताया कि वह गुदड़ी गणराज सुबह ही फैला गया था। पर वहाँ गणराज उपस्थित न था। वह तो कॉलोनी के भीतर लोगों की गाड़ियाँ साफ़ कर रहा था। कर्तव्यपरायण जो था वह।

उसी कॉलोनी में रहने वाले मलिक साहब सुबह – सुबह सैर करके लौट रहे थे। कोल्ही साहब की बात सुनकर उनकी पीठ पर हाथ रखते हुए बोले, ” सुबह-सुबह क्यों नाराज़ होते हैं सर, चलिए बात करते हैं गणराज से। हटवा देंगे। आप चिंता ना करें। ”

कोल्ही साहब को एक तरह से खींचते हुए वे उन्हें कॉलोनी के अंदर ले आए। कोल्ही जी भुनभुनाते हुए अपने घर चले गए।

मलिक साहब अभी लिफ्ट में घुसने ही वाले थे कि गणराज दिख गया। उन्होंने उससे कहा, “अपनी गुदड़ी हमारी बिल्डिंग की छत पर जाकर सूखने के लिए रख दो। कोई कुछ नहीं कहेगा। कोई कुछ कहे तो मुझसे बात करने के लिए कहना। वह छत किसी की बपौती नहीं है अतः वहाँ पर गरीब की गुदड़ी सुखाई जा सकती थी। ”

अब तक कॉलोनी में काम करनेवालों ने कोल्ही साहब के गुस्सा होने की बात गणराज के कान तक पहुँचा ही दी थी।

मलिक साहब अपने घर में घुसते ही साथ पत्नी से बोले, ” सरला, अपने पास कोई पुराने कंबल और चादरें हो तो निकाल के रखो। गणराज के घर के सारे सामान गीले हो गए हैं। ”

सरला सुबह-सुबह नाश्ता बना रही थी। रसोई का काम बिटिया के हाथ में सौंपकर तुरंत कपड़े निकालने चली गई। दो खेस और दो पुरानी चादरें अलमारी से निकाल कर लाईं। ये चादरें फटी हुई नहीं थीं, हाँ पुरानी ज़रूर थीं। किसी के काम ज़रूर आ सकती थीं।

थोड़ी देर में गणराज ने बेल बजाया। बिटिया ने दरवाज़ा खोला। माँ ने जो खेस और चादरें निकालकर रखी थीं उसके हाथ में रख दिए। वह देखता ही रहा।

इतने में सरला ने अपने बेटे को आवाज लगाई और कहा, दरवाजे पर गणराज खड़ा है उसे ये भोग चढ़ा दो। ” एक ठोंगे में चार आलू के पराँठे बाँध दिए। बेटे ने वे पराठें भी गणराज को दिए और कहा, ” भैया, पराँठे गरम हैं अभी खा लेना। ”

आँखों में आँसू लिए दुआएँ देता हुआ गणराज वहाँ से चला गया। अपने आप से कह रहा था आज समझ में आया कि मोहल्ले वाले मलिक साहब के पीछे उन्हें *उदार कर्ण कहकर क्यों संबोधित करते हैं!!!*

© सुश्री ऋता सिंह

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares