(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि। संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है सॉनेट – मतदान।)
आंब्याच्या झाडावर कोकीळ पक्षाचे “कुहू” ऐकू येते आणि वसंत ऋतुच्या आगमनाची वर्दी मिळते. चैत्राची चाहूल जाणवते. नववर्षाची सारीच नवलाई घेऊन सृष्टीही बहरते.
सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार चैत्र महिना सुरू होतो. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची बोंबाबोंब आणि रंगपंचमीच्या रंगात नहाल्यानंतर वसंत ऋतु एखाद्या राजासारखा, दिमाखात अवतरतो. नवा उत्साह, नवी उमेद, चैतन्याचे नजराणे घेऊन तो कसा ऐटीत येतो.
जुने जाते नवे येते. वृक्ष नव्या, कोवळ्या, हिरव्या रंगाच्या पालवीने बहतात. गुलमोहराला अपूर्व रक्तीमा चढतो. पिवळा बहावा फुलतो. पलाश वृक्षाची अग्नी फुले डोळ्यांना सुखावतात. मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. आणि कोकणचा राजा रस गाळतो. उत्तम उत्तम गोष्टींची मनमुराद पखरण करणारा हा वसंत! ना कशाची वाण ना कशाची कमतरता. सारेच साग्रसंगीत, उच्च अभिरुची दर्शवणारे.
।। गंधयुक्त तरीही उष्ण वाटते किती ..।।
आसमंत उष्णतेने भरून जातो. उन्हाच्या झळा जाणवतात. तप्त वारे वाहतात पण तरीही हे वारे गंधयुक्त असतात. अनंत आणि मोगऱ्यांचा दरवळ जाणवतो. जंगलात कुठेतरी पिवळी धमक सुरंगीची फुलं उमलतात. आणि त्याचा सुगंध साऱ्या सृष्टीला व्यापून राहतो.
चैत्र महिना— वसंत ऋतु म्हणजे सृजनोत्सव. चैत्र महिन्याच्या साक्षीने आनंदाचे एक महोत्सवी स्वरूपच प्रकटते. या मासाचे आपल्या सांस्कृतिक जगण्याशी उत्कट नाते आहे.
या आनंदोत्सवाचे स्वागत उंच गुढ्या उभारून शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते. दृष्टांचा संहार आणि सुष्टांचा विजय म्हणून हा विजयोत्सवही ठरतो. या ब्रह्मध्वजाच्या पूजेनेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तोच हा चैत्रमास! चंद्र, चित्रा नक्षत्राच्या सानिध्यात असतो म्हणून हा चैत्र मास.
संस्कृतीची, धार्मिकतेची, सृजनाची, सौंदर्याची जाण देणारा हा टवटवीत, तजेलदार, तालबद्ध मास— वसंत आत्मा— मधुमास.
चैत्रगौरी पूजनाच्या निमित्ताने आंब्याची डाळ,कैरीचे पन्हे याचा रसास्वाद घेणे म्हणजे परमानंदच. अंगणात चैत्रांगण सजते.
या महिन्याला जसे श्रद्धा, भक्तीरसाचे वलय आहे तसेच शृंगार रसात न्हालेल्या प्रणय भावनेचाही अनुभव आहे.
पक्षी झाडावर घरटी बांधतात. त्यांची मधुर किलबिल मिलनाची हाक देतात. मधुप फुलातल्या परागाशी प्रीतीचे नाते जुळवतात. तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज ऐकू येते. कवी कल्पनांना प्रणय गीतांचे धुमारे फुटतात. चाफा फुलतो आणि बोल घुमताँँं
“या विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण
उणे करु आपण दोघेजण रे..”
साऱ्यासृष्टीतच या शृंगार रसाची झलक जाणवत असते. निर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या भावनांना हळुवारपणे गोंजारणारा हा चैत्र महिना, राधा कृष्णाच्या प्रीतीत रमणारा हा चैत्र महिना, कुणाच्या कवितेत असाही फुलतो..
सिंगार सिसकता रहा
बिलखता रहा हिया
दुहराता रहा गगन से चातक
पिया पिया …
किंवा,
ऋतू वसंत से हो गया कैसा ये अनुराग
काली कोयल गा रही
भान्ती भान्ती के राग…
तर असा हा नवीनतेचा, प्रेमाचा, उत्पत्तीचा, चैतन्याचा संदेश घेऊन येणारा, सुगंधाचा दरवळ पसरवणारा, हसरा बागडणारा, धुंद करणारा चैत्र मास …किती त्यास वर्णावे?
☆ व्हॅलेंटाईन डे आणि वासुदेवाची गीता… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
तारीख १४ फेब्रुवारी. संध्याकाळचे सहा वाजत होते आणि त्याला, त्याच्या प्राथमिक शाळेच्या (त्याला तेव्हा शिकवायला असलेल्या) मुख्याध्यापिका बाईंचा फोन आला.
“काय रे, मोकळा आहेस का ?” बाईंचा प्रश्न.
“म्हणजे काय ? अहो बाई, तुमचा फोन आला की बाकी सर्व कामं बाजूलाच ठेवणार की. बोला, आज कशी आठवण काढलीत ?” तो.
“नाही रे, आज तुमचा व्हॅलेंटाईन डे आहे ना ! मग ? आम्हा म्हाताऱ्यांची लुडबुड नको, म्हणून विचारलं हो.” बाई साळसूदपणे पृच्छा करत होत्या.
बाई आणि त्यांचे विद्यार्थी – विद्यार्थिनी हे एक अजब रसायन आणि त्याहून गजब समीकरण होतं. आज कदाचित तो स्वतःच्या आईसमोर, त्याची स्वत:ची पन्नाशी उलटून गेली होती तरी, “व्हॅलेंटाईन डे” असा शब्दही उच्चारायला धजला नसता, पण बाईंशी बोलताना असले काही विधिनिषेध नसत.
“अहो बाई, लग्नाला पंचवीस वर्षे होत आली माझ्या. आता कसला व्हॅलेंटाईन डे ? आज रात्री जेवायला भाकरी, भोपळ्याचं भरीत आणि सकाळची उरलेली वांग्याची भाजी आहे. व्हॅलेंटाईन डे कसला कप्पाळ !” तो काहीसा उदास होऊन आणि वैतागून म्हणाला.
“कसले रे तुम्ही असे रडे ?” बाईंनी त्याला फैलावर घेतलं. असंही बाई आपल्या विद्यार्थ्यांच्या बायका आणि विद्यार्थिनींचे नवरे यांना “माझ्या लेकी आणि लेक आहेत ते” असं म्हणत जास्त झुकतं माप द्यायच्या. (“हो, आणि आम्ही भाकरीच्या तुकड्याच्या मोलावर विकत घेतलेले” असं बाईंचे विद्यार्थी कृतककोपाने म्हणायचे.)
“व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय फक्त गुलाब अन् चॉकलेटं, इतकंच का ? लग्नाला दोन पाच वर्षे उलटली म्हणजे संपतं कसं रे तुमचं प्रेम ? हॉटेलात जाऊन वारेमाप पैसे उधळले म्हणजेच तुमचं प्रेम सिद्ध होतं का आणि त्याहीपलीकडे जाऊन, प्रेम म्हणजे फक्त नवरा बायकोचंच का ? आणि एवढ्या तेवढ्याश्या गोष्टींनी कसले रे तुम्ही लगेच ढेपाळता आणि उदास होता ?”
बाईंनी सरबत्ती सुरू केली आणि तो निरुत्तरही झाला आणि अंतर्मुखही.
बाई निवृत्त होऊन दहा वर्षे होऊन गेली होती. इतक्या वर्षांत नखातही रोग नसणाऱ्या बाईंना गेल्या वर्षी अचानक कर्करोगाचे निदान झालं होतं. पण बाई त्या सगळ्याच अनुभवाला – त्या केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि लांबसडक केसांच्या त्या गळण्याला – या सगळ्यालाच असामान्य धीराने आणि हसतमुखाने सामोऱ्या गेल्या होत्या. ना कपाळावर एकही आठी, ना माझ्याच नशिबात हे का म्हणत नशिबाला दोष देणं.
“अरे, माझ्यावर जगावेगळं प्रेम केलं ते माझ्या नवऱ्यानं,” हा इकडे भूतकाळात हरवलेला, आणि बाई तिकडे बोलत होत्या, “लग्न झाले तेव्हा मी फक्त अकरावीपर्यंत शिकले होते. त्या काळात, माझ्या नवऱ्यानं, मी शिकावं म्हणून जिद्द धरली नसती – हट्ट धरला नसता, इथून तिथून पैसे उभे करून माझ्या शिक्षणाच्या फीया भरल्या नसत्या, तर मी शिक्षिकाच झाले नसते. आणि पुढचं हे सगळं इतकं छान घडलंच नसतं.
आपली सून शिकलेली आहे आणि शिक्षिका आहे म्हणून माझ्या सासूनं माझ्यावर निर्व्याज प्रेम केलं. कधी गावातल्या घरात जमीन सारवू दिली नाही, की धुणीभांडी करू दिली नाही. ‘तू चार बुकं शिकलेली आहेस, तू न्हायी अशी कामं करायची’ सासूबाई म्हणायच्या.”
आणि खरंच होतं ते.
त्याला आठवू लागलं. ‘माणसं जोडा रे’ हे अगदी बाईंचं ब्रीदवाक्य होतं. त्या बोलून दाखवायच्या नाहीत असं कधी, त्यांच्या कृतीतून पदोपदी दिसायचं ते.
आणि म्हणूनच मग प्राथमिक शाळेतले एवढुस्से विद्यार्थीही प्रचंड विश्वासाने आपल्या अडीअडचणी बाईंना सांगायचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर बाळगणारे पालकही त्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी विश्वासाने बाईंकडे यायचे.
याच प्रेमाने एखाद्या विद्यार्थ्याची आई तिच्या दोन भावजयींसह आणि त्या तिघींच्या चार पाच मुलांसह, दिवाळीच्या सुट्टीत, खुशाल बाईंच्या पुण्यातल्या घरी दोन दिवस राहायला यायच्या आणि ऐन थंडीत, संध्याकाळच्या वेळी आलेल्या, बायकोच्या या विद्यार्थ्याच्या आई, काकू आणि मुलांना थंडी बाधू नये म्हणून हातपाय धुण्यासाठी बाईंचे यजमान पाणी तापवून द्यायचे.
आजही बाईंच्या मुलाचा मित्र अगदी हक्काने बाई, त्यांचे यजमान, बाईंची मुलगी या सगळ्यांना गाडीत घालून आपल्या घरी घेऊन जातो आणि भरपेट जेवण झाल्याशिवाय आणि त्याहूनही भरपेट गप्पा झाल्याशिवाय त्यांना सोडत नाही.
आज बाईंचे विद्यार्थी वयाने – मानाने मोठे झालेत, पण अजूनही बाईंचा वाढदिवस असला की बाईंच्याच मुलीला विश्वासात घेत, त्यांना थांगपत्ता न लागू देता, त्यांच्याच घरी कार्यक्रम आयोजित करतात आणि बाईंना मोठ्ठं सरप्राईज देतात.
बाईंच्या आजारपणात, त्यांच्या डॉक्टर – हॉस्पिटलच्या वाऱ्यांत शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांची बाईंना सोबत करण्यासाठी, त्यांना नेण्या – आणण्यासाठी चढाओढ लागलेली असे.
बाईंची प्रकृती सुधारावी म्हणून बाईंच्या विद्यार्थ्यांनी, शेजाऱ्यापाजाऱ्यांनी नवस बोलले होते, अनुष्ठानं केली होती, आणि बाई बऱ्या झाल्यावर, नवस फेडण्यासाठी बाईंची ठाण्याची विद्यार्थिनी अश्विनी तर पार ठाण्याहून प्रभादेवीच्या सिद्धीविनायकापर्यंत ३५ किलोमीटर अंतर चालत आली होती.
“प्रेम म्हणजे नुसती शारीरिक भावना, धांगडधिंगा आणि महागाच्या भेटवस्तू असं नसतं रे. परवाचीच गोष्ट. दिवसभराचं रहाटगाडगं आटोपलेलं, मी आपली स्वामी समर्थांना नमस्कार करून झोपायच्या खोलीत आले, तर आमचे हे टक्क जागे, झोप येत नाही म्हणाले.
मग काय, त्या रात्री अडीच वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालल्या. लग्न झालं तेव्हा अक्षरश: भांडीकुंडीही नव्हती रे, कागदाच्या पुड्यांमध्ये डाळ तांदूळ बांधून ठेवायचे, तिथपासून संसाराची सुरुवात झाली, एकमेकांना सांभाळून घेत मस्त संसार झाला. परवा त्या सगळ्या प्रवासाची मस्त उजळणी झाली.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काही फार जगावेगळं नसतं रे. ते तुमच्या कॉलेजमध्ये NSS राष्ट्रीय सेवा योजनेचे घोषवाक्य आहे ना – ‘not me, but you’ ते म्हणजेच प्रेम, नाही का?
स्वतःच्या आवडीनिवडींपेक्षा तुमच्या विद्यार्थ्याला, त्याच्या पालकांना, शेजाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आईवडिलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जोडीदाराला काय हवं आहे याचा विचार आधी करणं, आणि त्याप्रमाणे वागणं, म्हणजेच प्रेम, नाही का ?
आणि एकदा हा विचार रुजला की मग भाजी भाकरीही गोड लागते, ती एन्जॉय करायची. याहून बेश्ट व्हॅलेंटाईन तो काय वेगळा असणार आहे ?”
बाईंनी नेहमीप्रमाणे संदर्भासहित स्पष्टीकरण देत निरगाठ उकल तंत्राने विषय सोप्पा करून सांगितला.
“बाई, कमाल आहे हां तुमची. प्रेम या विषयात मास्टरी आहे अगदी !” तो.
“आहे म्हणजे काय, असलीच पाहिजे. अरे, माहेरचं नावच मुळी प्रेमा आहे माझं !” बाईंनी हसत हसत फोन ठेवला.
आजही त्यांनी पाडगावकरांसारखं ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ असं स्पष्ट सांगितलं नव्हतं, पण नेहमीप्रमाणे आपल्या उदाहरणांतून – आपल्या कृतीने समोरच्याला पटवून दिलं होतं.
तो छान हसला, मगाचची त्याची मरगळ केव्हाच दूर पळाली होती. तो उठला, आणि त्याच्या ‘व्हॅलेंटाईन’बरोबर भाजी भाकरी एन्जॉय करण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळला.
☆ सिग्नलला भेटलेली कविता !… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
तिन्ही सांजची वेळ… हवेतला उष्मा बराच नरम झाला होता. रस्ताही कधी नव्हे तो निवांत वाटत होता. ना वाहनांची फारशी वर्दळ, ना माणसांची… उन्हाच्या दिवसभराच्या तडाख्यानंतरचा हा हलकासा माहोल खरंतर दिलासा देणारा असाच होता. कधी गाडीच्या खिडकीतून बाहेर कटाक्ष टाकत, तर कधी हातातल्या कवितेच्या पुस्तकातल्या ओळींकडे पाहत माझा प्रवास चालला होता. बाहेरचा प्रवास आणि आतला प्रवास दोघंही बरोबर विरुद्ध दिशेने जात होते त्यामुळे मन काहीसं अस्वस्थ होतं. कवितेतल्या कडव्यांवरून नुसतीच नजर फिरत होती. ना अर्थ पोहोचत होता, ना लय गवसत होती.
थोडा वेळ डोळे बंद करून मी आतल्या प्रवासाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. शेजारी बसलेला नवरा मध्येच मला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. पण मला त्याच्या बोलण्यालाही नीट प्रतिसाद देता येत नव्हता. वास्तव-कल्पना यांच्यामध्ये तोल सांभाळणारा लंबक आज जरा भरकटलाच होता. कारण सारं काही यंत्रवत, रुटीनसारखं वाटत होतं. मनाला स्पर्श होणारं, भावणारं, नवं निर्मितीला चालना देणारं असं काही भवतालात घडतंय असं वाटत नव्हतं. लिहायचं तर होतं पण शब्द मध्येच कुठेतरी रुसून बसले होते. काय करावं?
पुन्हा डोळे उघडले. कवितेच्या ओळींवर नजर फिरवली आणि मनातल्या मनात घोकत पुन्हा डोळे मिटले. असाच थोडा वेळ गेला. अचानक कर्कश्श आवाज यायला लागले. म्हणून डोळे उघडून पाहिलं तर आमची गाडी सिग्नलला थांबली होती. आजूबाजूच्या वातावरणात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटलं. टिश्यू पेपर विक्रेते, खेळणी विक्रेते, फळवाले, फुलवाले या साऱ्यांना जणू ग्रीन सिग्नल मिळाला होता. जणू त्यांचं थांबलेलं जग सुरू झालं होतं.
उत्सुकतेनं माझ्या औदासिन्यावर मात केली. मी आजूबाजूला पाहू लागले. इतक्यात रस्त्याच्याकडेला पण मधोमध फुलं घेऊन विकणाऱ्या एका बाईने माझं लक्ष वेधून घेतलं. कमाल सौंदर्य होतं ते… सावळा रंग, अंगावर साधी पण कसंलतरी फुलांचं डिझाईन असलेली साडी, त्याला अजिबात सूट न होणारा वेगळ्याच रंगाचा ब्लाऊज. चेहरा अगदी चंद्रासारखा गोल, विलक्षण बोलके रेखीव टपोरे डोळे, सरळ टोकदार नाक, त्याला अगदी प्रमाणबद्ध अशी जिवणी आणि मुख्य म्हणजे अत्यंत प्रसन्न, आनंदी चेहरा. रस्त्यावरतीच उभं असलेल्या एकाशी ती बोलत होती. काय बोलत होती हे माहित नाही पण बोलताना तिचा चेहरा प्रसन्न होता. तिच्या पुढ्यात असलेल्या टोपल्यातल्या फुलां इतकीच टवटवीत दिसत होती. बोलता-बोलता तिने मान खाली केली आणि टोपलीतली फुलं काढून आपल्या हातात धरली. तेव्हा तिच्या जाडजूड आणि काळ्याभोर अंबाड्याकडे माझं लक्ष गेलं. त्यावरती तिनं दोन-तीन गजरे मस्त गोलाकार फिरवून माळले होते. सावळ्या हातात अलगद धरलेल्या त्या रंगीबेरंगी फुलांकडे पाहू की तिच्या चेहऱ्याकडे असं मला प्रश्न पडला. फुलवालीला एकूणच नीटनेटकेपणाची आवड होती असं जाणवत होतं. नक्की काय जास्त सुंदर आहे? असा विचार करत तिचा फोटो टिपावा म्हणून मी माझा मोबाईल काढायला पर्स उघडली…
इतक्यात एक कोवळा आवाज आला. ‘ताई गजरा घ्या ना मोगऱ्याचा आहे पन्नासला पाच.’ नकळत मी वळून पाहिलं तर एक सात-आठ वर्षाचा मुलगा हातात गजरे घेऊन आमच्या कारच्या खिडकीशी उभा होता. मी नकळतच त्याला नाही म्हटलं. तसं त्याचा चेहरा जरा पडला. ‘निदान एक तरी घ्या’ असं तो म्हणू लागला. तेव्हा मात्र माझं त्याच्या चेहऱ्याकडे व्यवस्थित लक्ष गेलं आणि एकदम चमकायला झालं. फुल विकणाऱ्या त्या बाईचाच तो मुलगा होता हे त्याचा तोंडावळा सांगत होता. त्याचे साधे कपडे, पण नीटनेटकेपणा, चेहऱ्यावरचे शांत भाव, विलक्षण बोलके डोळे… हे सगळं अतिशय सात्विक, निरागस होतं.
‘घ्या ना ताई एक तरी’ तो पुन्हा म्हणाला. यावेळी त्याच्या डोळ्यात आर्जव दिसलं… ज्या प्रकारे त्यानं गजऱ्यांना हातात जपून धरलं होतं त्यात निरागसता आणि त्या फुलांविषयीची त्याची आपुलकी दिसली. माझ्या मनात आता द्वंद्व सुरू झालं घ्यावं की?? नं घ्यावं?? शेजारी बसलेल्या नवऱ्याने ते अचूक ओळखलं. “अगं घे एखादा तरी, तो एवढं म्हणतोय तर…” तो असं म्हणता क्षणी त्या मुलाचा चेहरा क्षणात आनंदाने चमकला. आणि ते पाहून काय झालं ते मला कळलं नाही मी पटकन म्हटलं, “एक नको मला पन्नासचेच दे!” हे म्हणताच क्षणी तर त्याचा चेहरा आनंदाने फुलून आला होता. मग मी त्याला विचारलं, ‘सुट्टे पैसे आहेत का रे बाळा?’ तेव्हा त्यांनं निराशेनं नाही अशी मान डोलावली. मी म्हणलं, “हरकत नाही थांब! माझ्याकडे असतील मी शोधते.” आता त्याला परत नाराज करणं हे मलाच बरोबर वाटत नव्हतं. मग आम्ही दोघेही आपापल्याकडच्या पैशांमध्ये सुट्टे पैसे शोधू लागलो. नवरा म्हणाला, “सिग्नल संपत आलाय लवकर आटप… ” तो मुलगाही थोडासा बैचेन झाल्यासारखा वाटला. घाई गडबडीत हाताला लागतील ती तीन-चार नाणी गोळा केली आणि त्याच्या हातात पटकन सोपवली. “किती झाले रे?” अंधार पडत असल्यामुळे मला पटकन लक्षात आलं नाही. तो म्हणाला, “पस्तीस रुपये झालेत ताई, अजून पंधरा हवेत.” गडबडीने मग दोघांनी मिळून उरलेले पंधरा रुपये कसेबसे त्याच्या हातात दिले. तोवर सिग्नल सुटला होता.
गाड्या हळूहळू हॉर्न वाजवत आमच्या पुढून जायला लागल्या होत्या. ‘सांभाळून जा रे बाळा’ असं मी मागं वळून त्याला म्हणत होते. तेव्हा त्याचा फुललेला, आनंदी झालेला चेहरा मला खूप समाधान देऊन गेला. मला वाटलं आता हे पैसे जेव्हा तो त्याच्या आईला देईल तेव्हा तिचा आधीच प्रसन्न आणि आनंदी असलेला चेहरा आणखीन आनंदाने फुलून येईल. मग दोन चालती बोलती सुगंधी झाडं आनंदाने डवरलेली मला डोळ्यांपुढं दिसू लागली. मघाचची उदासीनता कुठल्या कुठे पळून गेली. सहज वर आकाशात बघितलं तर तिथेही बिनवासाची पण चमचमणारी फुलं हळूहळू उमलत होती. एकदा त्यांच्याकडे पहात आणि एकदा हातातल्या गजऱ्यांचा वास घेत माझा पुढचा प्रवास सुरू झाला. आता कवितेच्या पुस्तकात डोकावण्याची गरज नव्हती कारण सिग्नललाच मला एक जिवंत कविता भेटली होती.
खरंच काही साध्या घटना किती निरागस आनंद सहजपणे देऊन जातात ना!
☆ हृदयस्पर्शी भाग – २ – लेखिका : वर्षा कुवळेकर ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले☆
प्रास्ताविक करताना नर्मदालय काय आहे हे स्वतः भारती ताईंनी सांगितले. सुरुवात कशी झाली, घटनाक्रम कसा होत गेला, आज काय आहे आणि भविष्यातील उद्दिष्टे काय डोळ्यासमोर आहेत हे मितभाषी ताईंनी अगदी नेमक्या शब्दात जरी सांगितले तरी प्रत्यक्ष तिथे असल्यामुळे तो प्रचंड आवाका मला जाणवत गेला. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या मुलीला आजूबाजूचे लोक पाहत होतेच पण एका नागा साधूने ताईंच्या कामाची विशेष दखल घेतली . स्वतः हुन या साधुबाबा नी आपली पाच गुंठे जमीन दान केली. नवल वाटून ताई म्हणाल्या ,” मला नाही गरज,” तेव्हा साधू म्हणाले ,” तुला नाहीच देत मी जमीन, ज्या छोट्या मुलांसाठी तू काम करते आहेस त्यांच्यासाठी देतोय.” एक महान काम उभे राहायची ती सुरुवात होती. खडबडीत जमिनीवर झोपडीत ही राहणाऱ्या ताईंनी कष्ट सुरू केले. ते पाहून लोकाश्रय मिळाला. आजवर कोणतीही सरकारी मदत न घेणाऱ्या या संस्थेने महान काम करून दाखवले ते केवळ कष्ट, तळमळ, प्रामाणिक व्यवहार या जोरावर. समविचारी लोक मदतीला उभे राहिले. आज चार मोठ्या इमारती उभ्या आहेत, पाचवी तयार होते आहे. शिक्षणाची वेगवेगळी दालने त्यातून सज्ज झाली आहेत. सरकारी अभ्यासक्रम तर आहेच पण स्वावलंबी करणारे शिक्षण प्रामुख्याने दिले जाते आहे. छोट्या छोट्या मुलांची जबाबदारी घेणारी ही एक भगव्या कफनीतील तपस्विनी किती विलक्षण खंबीर आहे हे मला आत कळत गेले. एका जंगलात राहून असंख्य अडचणीला तोंड देणारी, छोट्या मुलांना उराशी कवटाळून त्यांना सुरक्षित आयुष्य देणारी ही स्त्री मनाने किती हळवी आहे हे त्यांचे मनोगत ऐकताना प्रकर्षाने जाणवले. त्यांचा दिग्विजय, गोलू, शंकर, जितेन अशी मुले काय काय करतात हे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाले. लहान लहान सात आठ वर्षांची ही मुले ताईंना मिळाली. आज विशी बाविशितील ही मुले हे चमत्कार आहेत. गोलू तेरा चौदा वर्षाच्या मुलांना मदतीला घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या मंडळींचे नाश्ता, जेवण तयार करत होता. ही मुले गोशाळा सांभाळतात, दैनंदिन व्यवहारात संपूर्ण मदत करतात, छोट्या मुलांची सगळी जबाबदारी पेलतात. एव्हढे काहीच नाही तर नवीन इमारतीतील तेवीस टॉयलेट्स या मुलांनी स्वतः केली. टाइल्स बसवल्या प्लंबिंग पूर्ण केले. . सायन्स मधील वेगवेगळी आव्हाने मुले स्वीकारत आहेत. टाटा, बी ए आर सी , व्ही एन आय टी सारख्या संस्थांनी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्या संस्थेसोबत affiliation आनंदाने दिले आहे. रुरल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट यातून अनेक नवीन प्रशिक्षणे सुरू आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षण कसं असावं ते ताईंनी प्रत्यक्षात आणले आहे. आज ही मुले निश्चित पायावर खंबीर उभी होत आहेत.
हे सगळे सांगत असताना गेल्यावर्षी म्हणजे सप्टेंबर 2023 ला आलेल्या पुरात या आठ दहा मुलांनी अतुलनीय साहस दाखवून जे काम केले ते सांगताना भरती ताई सद्गदीत झाल्या. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, त्यांची सर्व व्यवस्था हे झालेच परंतु लेपा पासून आठ दहा किमी वर भट्ट्याण येथे आणखी एक आश्रम शाळा तिथल्या मुलांसाठी सुरू केली आहे. निवासी मुलं नाहीत तिथे तरी जवळपास एकशे सत्तर मुलं शिकायला येतात. ती शाळा नदीच्या पात्रापेक्षा भरपूर उंचीवर असूनही अतिरेकी पावसाने धोक्यात आली. एखादा फूट अजून चारी बाजूंनी माती ढासळली असती तरी शाळा धाराशायी झाली असती. मुलांना तिथे पाठवणे अजिबातच सुरक्षित नव्हते. ही शाळा वाचवण्यासाठी या लहान मुलांनी स्वतः च्या जीवावर उदार होवून पंधरा दिवसरात्र जे काम यशस्वी पणे करून दाखवले त्याबद्दल बोलताना ताईंनी प्रयासाने हुंदका आवरला. हे सारे ऐकताना आधी एका बोटाने डोळ्यातले पाणी थोपवणारे आम्ही अनावर होऊन डोळ्यांना रुमाल लावून बसलो. या मुलांना सर्वांच्या साक्षीने शौर्य पुरस्कार दिले. किती कौतुक करावं हो, शब्द थिटे आहेत.
कोणताही क्लास, शिकवण्या न लावता 92 @% मार्कस मिळवणाऱ्या मुलांचे कौतुक झाले. धनश्री ताई ऑनलाईन संस्कृत शिकवत होत्या . त्याचे चीज 99 मार्क या विषयात मिळवून मुलांनी करून दाखवले. एक मुलगा तर फक्त संस्कृत विषयात पास झाला.हे ऐकून तर फारच विशेष वाटले. एखादा शिक्षक आवडला तर काय आश्चर्य घडू शकते त्याचे हे द्योतक आहे. मला स्वतः ला एक सत्कार विशेष हृद्य वाटला. एक सातवी मधील मुलगा . त्याला मंचावर बोलावले. ताई म्हणाल्या हा माझा विशेष आवडता मुलगा. एका दूरवरच्या खेडेगावात डोंगरावर याचे एकट्याचे घर आहे. कमालीची गरिबी. ताईंजवळ असतो. अभ्यासात अजिबात गती नाही . तो आपणहून गोशाळेत कामाला पळायचा. दिवस दिवस तिथेच. त्याच्या शिक्षकांवर ताई नाराज झाल्या , की आधीच तो अभ्यासात बरा नाही त्याला कशाला तिकडे पाठवता? ते सगळे म्हणाले आम्ही नाही duty दिली तो आपणच जातो. गोशाळा आणि स्वयंपाकघर ही त्याची आवडीची ठिकाणे . इथेच तो रमतो. हे जाणून ठीक आहे, हे कर तू, पण अभ्यास ही करायला हवास हे ताईंनी ठसविले मनात . आणि यंदा हा मुलगा सर्व विषयात 42/43 % मिळवून पास झाला. बेस्ट स्टुडंट चे पारितोषिक त्याला दिले. त्याच्याकडे बघून वाटले की इतक्या सर्वांसमोर माझा सर्वात आवडता मुलगा असं ताई म्हणाल्या, यापेक्षा इथून पुढे सर्वोत्तम होण्यास बळ मिळायला काय हवे ? 42 टक्के ही सन्मानाचे असू शकतात हा अनुभव श्रोत्यांना ही धडा होता.
नर्मदालयातील मुले उत्तम गातात, त्यांचा वाद्यवृंद आहे. त्यांनाही सुयोग्य व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीवनाच्या सर्व अंगांना भिडायचे, यश मिळवायचे, आनंद घ्यायचा, द्यायचा किती किती गोष्टी सहज कृतीतून मुलं शिकत आहेत. शाळेतील सर्वात लहान मुले भारती ताईंच्या जवळ राहायला असतात. थोडी मोठी झाली की मोठे भय्या त्यांना सांभाळतात. एकही मूल केविलवाणे नाही. जशी आपली घरातील मुले तशी उत्साहाने निथळणारी, आनंदी मुलं. माझ्या नातवाशी फोनवर बोलायला बोलावले मी जवळ . खूप आनंदाने प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. नंतर मलाही बिलगली ती . त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताना इतके छान वाटले. छान तेल लावून भांग पाडलेली, तयार होऊन आली होती. जी ताई, जी ताई करून प्रेमानी आदराने बोलणारी ही मुले आमच्या मुलांनी, नातवंडांनीही पाहायला हवीत असं वाटले.
त्यांच्या दिग्विजयची दोन छोटी मुलं जन्मापासून तिथे आहेत. धाकटे पिल्लू सुध्दा मीठ वाढायला आले तर भरून आले एकदम. मोठा अभ्युदय ढोलकी वाजवतो. ढोलकी पेक्षा मूर्ती लहान आहे. पण त्या गाणाऱ्या चमूत आहे. सगळे बसलेत, भारती ताई एकेकाशी बोलत आहेत , मध्येच दिग्विजयचे शेंडेफळ जवळून दौडत जाते, सहज ताई प्रेमाने ओढून जवळ, मांडीवर घेतात. तेही पिल्लू आरामात त्यांच्या वक्षावर टेकून हातपाय उडविण्याचा आपला कार्यक्रम सुरू ठेवते हे माझ्या मनावर कोरले गेलेले दृश्य आहे, जे कधीही विस्मरणात जाणार नाही.
– समाप्त –
लेखिका : वर्षा कुवळेकर
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ श्रीमंत म्हणून जगा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
बरेच ज्येष्ठ नागरिक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!
स्थावर मालमत्तेमध्ये वरिष्ठ नागरिक मनाने गुंतलेले असतात, तसे हल्लीची पिढी करीत नाही. आधुनिक पिढी ही त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे. पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली, ती मुलांसाठी आणि नातवंडांसाठी देखील! कमावलेला सारा पैसा बहुतेकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला. ना हे वरिष्ठ कुठे लांब सहलीला गेले, ना त्यांनी कधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केले. ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला, ना बर्गर! नाटक- सिनेमा सुद्धा वर्षातून दोन- तीन वेळा! पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे, झालेच तर एक दुसरा फ्लॅट घेऊन ठेवायचा, जो स्वतःसाठी काही उपयोगाचा नाही. शहरात राहात असतील तर गावी घर बांधायचे, जमीन विकत घ्यायची, असे उद्योग केले.
परिणाम काय झाले? तर मुलांना आधुनिक शिक्षण दिले, जे फक्त आणि फक्त नोकरीभिमुख आहे. कुठलीही शाळा, किमान भारतातील तरी, व्यवसाय वा धंदा किंवा उत्पादनाभिमुख उद्योग कसा करावा हे शिकवित नाही. डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोटी रुपये लहानपणापासून खर्च येतो. मग तो वसूल करण्यासाठी, सर्व नसतील तरी बहुतेक सारे नवीन डॉक्टर, डॉक्टरी म्हणजे सेवा व व्यवसाय नसून धंदा या दृष्टीने पाहायला लागलेत. त्यामुळे औषधे व उपचार या दोन्हींमध्ये भ्रष्टाचार व स्कॅम सुरु आहेत. इंजिनियर होऊन दहा हजारातील एक मुलगा उत्पादनप्रणित उद्योगांकडे वळतो. बाकीचे ९९९९ इंजिनिअर फक्त इतर शहरात किंवा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतात. स्थिर होईपर्यंत पाच सात कंपन्या सोडलेल्या असतात. आपल्या मूळ गावी न राहिल्यामुळे, इतर ठिकाणी, दुसऱ्या शहरात वा परदेशात कायम वास्तव्य करायचे ठरवल्याने इथल्या मालमत्तेमध्ये नवीन पिढीला अजिबात रस नसतो! पुढील पिढीला हे घर, जमीनजुमला याकडे पाहायला, त्याची निगा राखायला वेळ नाही. आणि त्यांना त्यात रस नाही, निष्ठा नाही. मग आईवडिलांचे निधन झाल्यावर काही मुले ती जमीन, घर विकून पैसे घेऊन निघून जातात. परदेशात राहाणारी कित्येक मुले मुली, आईवडील जिवंत असताना येत नाहीत, वेळ नाही या सबबीवर! पण ते वर गेल्यावर मात्र त्यांना इथे सारे आर्थिक हिशोब निपटायला एक- दीड महिन्याची रजा मिळते. हे मी अनुभवले आहे. बँकेत अशा काही मुलांचा, जेष्ठ नागरिकांचा अनुभव आलेला आहे. आश्चर्य म्हणजे मागील पिढीचा मोह, मुलांविषयीच्या अपेक्षा काही कमी होत नाहीत. सगळ्या स्थावर व बँकेतील पैशांना वारस म्हणून आपल्या मुलाला वा मुलीलाच ठेवतात, जे दूर राहून, परदेशी राहून, कधी आईबापाच्या आजारपणातदेखील भेटायला न येणाऱ्या ह्या मुलांना, ते गेल्यावर एक छोटी मोठी लॉटरीच लागते ! हे मी अनुभवांती बोलतोय. कारण मी वीस- पंचवीस वर्षे पब्लिक रिलेशनमध्ये काम केले आहे.
हे वरिष्ठ नागरिक, पूर्वीची पिढी सोन्या चांदीचे दागिनेही आपल्या मुलाबाळांसाठी करून ठेवतात. हल्लीच्या पिढीला जुन्या नक्षीकामाचे दागिने पसंत नाहीत, तर पाश्चात्य लोकांप्रमाणे नव्या डिझाईनचे / खोटे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पसंत आहे. म्हणजे त्याचाही हल्ली काही उपयोग नाही.
नवी पिढी पैसे कमावणे आणि पैसे खर्च करणे एवढेच जाणते! पण त्यांना पैसे कमावण्यायोग्य ज्या पिढीने केले, त्यांचे अनुभव, त्यांची आस्था, प्रेम, निष्ठा याच्याशी नवीन पिढीला काहीही कर्तव्य नाही. पूर्वीच्या पिढीने आपल्या कर्तव्यापुढे आपली मौजमजा बाजूला ठेवली. गरजेनुसारच खर्च केला. पण मुलांना अगदी कुठल्याही अडचणींशिवाय, त्रासापासून मुक्त असे वाढविले. जे आपल्याला मिळाले नाही, त्याची वानवा नव्या पिढीला पडू नये, याची काळजी घेऊन उच्च शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार दिले. पण बरेच वरिष्ठ आपल्या पुढच्या पिढीला हवे तसे चांगले संस्कार देण्यात कमी पडले , कमी पडत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.
आपले आईवडील आपल्याला परिस्थितीची जाणीव देत असत. आपण गरीब आहोत, की मध्यमवर्गीय, हे मुलांना ठाऊक असे. पैसेवाले देखील आपल्या मुलांचे पाय जमिनीवर राहावेत याची काळजी घेत. पूर्वी अगदी क्वचित कोणी बाईक वा कारने शाळेत येत असे. अन्यथा श्रीमंत मुले फार तर सायकलवर येत. पूर्वीच्या पिढीने खाऊ वाटताना आपला- परका असा मुलांमध्ये भेदभाव केला नाही. हुशार विद्यार्थ्यांना काही श्रीमंतांनी मदत केली पुढे जायला.आता मात्र चित्र बदलले आहे. नवी पिढी बऱ्यापैकी स्वार्थी झाली आहे, अन ह्याला कारण पूर्वीचीच पिढी आहे. नवी पिढी स्वतःच्या सुखाकडे म्हणजे ऐहिक सुखाकडे जास्त लक्ष देत आहे. टी व्ही, फ्रिज, कार, लॅपटॉप, नवनवे मोबाईल, बाईक, स्कुटी आणि घरातील इतर सुखसोयी त्यांना नाते वा संस्कार यापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात!
वरिष्ठ आता आपला भार मुलांवर पडू नये, असे शक्यतो पाहातात. पण हल्ली नातवंडांची जबाबदारी देखील, जर एकत्र राहात असतील तर घेतात.
ही जी जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव मागील पिढीला होती व आहे,तीच जाणीव आताच्या पिढीमध्ये कमी होत चालली आहे.
आधीच्या पिढीने आता हे ध्यानात ठेवावे, q की आयुष्यमान वाढते आहे, राहणीमान महाग होते आहे, अशा वेळी तुम्ही स्वतःकडे केव्हा पाहाणार आहात? आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतर इथेच राहाणार आहे. पुढील पिढीला ती आयती संपत्ती मिळाल्यावर त्यांना त्या संपत्तीचे मोल असणार नाही. कारण रुपयाचे अवमूल्यन कमी होत आहे. कालचे तुमचे हजार रुपये आज एक रुपया समान आहे. आता तरी पुढील पिढीच्या सुखासाठी आपले सुख बाजूला सारु नका. तुम्ही त्यांना कमावण्यायोग्य बनवले आहे. ते त्यांचे जीवन जगत आहेत. तुम्हीही तुमचे जीवन जगा.
जीवनाचा आनंद घ्यायला आता तरी शिका. बरेच भारतीय आपले जीवन कंजुषपणाने जगतात, काटकसरीने खर्च करतात ते केवळ पुढील पिढीने श्रीमंत व्हावे, त्यांना काही कमी पडू नये म्हणून.पण आता हे बंद करा. स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे छंद, इच्छा यावर खर्च करा. राहिलेल्या इच्छांची एक यादी करा. त्या यादीतील एक एक इच्छा पुरी करण्यासाठी जगा. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा!
साठ- पासष्ठ म्हणजे काही मरण्याचे वय नव्हे! आता अजून किती दिवस जगणार आहोत, हा विचार सोडा. समजा, तुम्हाला परमेश्वराने नव्वद ते शंभर वर्षांचे आयुष्य दिले असेल तर अजून तुमच्याकडे वीस- पंचवीस किंवा तीस वर्षे शिल्लक आहेत, जी तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी जगू शकाल.पुरे झाले आता इतरांसाठी जगणे. “आता आपले काय राहिलेय..?” हा विचार करीत राहाल तर शेवटची काही वर्षे आजारपणात, इतरांच्या वर अवलंबूनराहत काढावी लागतील, हे लक्षात ठेवा.
दीर्घायुषी व्हा, निरोगी राहा. गरीबीत भले जन्माला आला असाल, श्रीमंत म्हणून फक्त मरू नका, तर श्रीमंतीत जगा! मस्तीत राहा, लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा!
लेखक :अज्ञात
प्रस्तुती :सौ.शशी नाडकर्णी – नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-14 – नाटक के लिए छोड़ दी ऊ़ची पदवी!☆ श्री कमलेश भारतीय ☆
(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)
आज जालंधर को याद करने जा रहा हूँ अपने थियेटर या नाटकों के प्रति अथाह लगाव के लिए! जब मैंने होश संभाला तब हमारे ही घर की बैठक यानी उस जमाने के ड्राइंग रूम में मोहल्ले में होने वाली कृष्ण लीला के ब्रज से आये कलाकार मेकअप कर रहे होते! हमारा घर मोहल्ले के ऐन बीच में था और घर के बाहर सीमेंट के बने ऊंचे थड़े बने हुए थे, जो कृष्ण लीला के लिए बने बनाये मंच का काम देते और मैं देखता कि कैसे साधारण से दिखने वाले कलाकार कोई कृष्ण तो कोई राधा तो कोई यशोदा और कितने ही रूपों में आ जाते! कृष्ण लीला के बाद लोग इनके चरण छूकर निहाल हो जाते! मतलब ये साधारण इंसान न रहकर देवी देवता बन जाते ! यहीं से इस कला के प्रति मेरी रूचि बढ़ी हालांकि मैंने कभी रंगमंच पर कदम नहीं रखा लेकिन रंगमंच देखने का जुनून आज तक सिर चढ़ कर बोल रहा है !
आइए आज मिलाता हूँ आज आपको जालंधर के थियेटर के लोगों से ! शुरू करता हूँ आकाशवाणी और दूरदर्शन केंद्रों के नाटक प्रोड्यूसर्स से! जहाँ तक मेरी जानकारी होगी, मैं उतना ही बता सकूंगा, मेरी सीमायें भी हैं और आप उन्हें माफ कर देंगे।
मुझे याद हैं विनोद धीर, जो आकाशवाणी, जालंधर के ड्रामा प्रोड्यूसर बाद में बने, मैंने गुरु नानक देव विश्वविद्यालय के जालंधर के लायलपुर खालसा काॅलेज में हुए यूथ फेस्टिवल में विनोद धीर द्वारा निर्देशित नाटक ‘ गोदो की आमद’ यानी ‘ वेटिंग फॉर गोदो’ नाटक देखा था, मैं उन दिनों अपने कॉलेज की ओर से यूथ फेस्टिवल में पोएट्री कम्पीटीशन में भाग लेता था। वहीं यूथ फेस्टिवल में ‘ वेटिंग फाॅर गोदो’ नाटक देखा था, जिसे विनोद धीर ने इतने शानदार तरीके से निर्देशित किया कि लिखते समय आज भी वह नाटक जैसे मेरी आंखों के सामने मंचित हो रहा हो ! हम अपने जीवन में किसी न किसी फरिश्ते का इंतज़ार करते रहते हैं लेकिन वह कहीं नहीं होता, बस इंतज़ार ही इंतज़ार रह जाता है, जीवन भर ! किसी फरिश्ते के इंतज़ार में ज़िंदगी न गंवायें बल्कि अपने भरोसे पर जीवन जियें !
इसके बाद विनोद धीर हिमाचल के हमीरपुर आकाशवाणी केंद्र में ट्रांसफर हो गये!
इनके बाद अगर मुझे याद है तो हमारे ही नवांशहर के आर के आर्य काॅलेज में हुए यूथ फेस्टिवल में मंचित नाटक ‘खींच रहे हैं’ की ! इसे कपूरथला के रंगकर्मी रवि दीप ने निर्देशित किया था। जहाँ कपूरथला का जिक्र जानबूझकर कर रहा हूँ क्योंकि कपूरथला में मेरी ससुराल है और रवि दीप इसी शहर के मूल निवासी हैं, जो आजकल मुम्बई रह रहे हैं। उनके नाटक की याद है कि बच्चा पतंग उड़ाता है, जो उसकी खुशी है, जैसे हमारी इच्छाओं की यह डोर बढ़ती और रंग बदलती जाती है, यही जीवन है हमारा और हम अपनी इच्छाओं की डोर खींचने यानी पूरा करने में ही जीवन व्यतीत कर देते हैं ! रवि दीप दूरदर्शन, जालंधर के ड्रामा प्रोड्यूसर रहेक्ष। मेरी पत्नी नीलम भी नाटक देखना पसंद करती है और जैसे ही उसे पता चला, वह पूरी टीम को घर ले आई और रात का खाना बना कर खिलाया अपने मायके के रंग कर्मियों को ! कैसे भूल सकता हूँ उस दिन को !
फिर हमारे ही नवांशहर का पुनीत सहगल बना ड्रामा प्रोड्यूसर ! पहले आकाशवाणी केंद्र, जालंधर का और फिर दूरदर्शन का ! आजकल वही दूरदर्शन केंद्र, जालंधर का प्रोग्राम हैड है और एक साठ एपिसोड का सीरियल बना रहा है लेकिन पहले यह बता दूँ कि नवांशहर में रहते हम लोगों ने ‘कला संपर्क’ नाम से कल्चरल संस्था बनाई थी, जिसके दो नाटकों का निर्देशन किया था- ब्लड डोनेशन के लिए प्रोत्साहन देने के लिए पहला नाटक और दूसरा नाटक प्रसिद्ध लेखक मंटो की कहानी पर आधारित ‘रिश्तेयां दा की रखिये नां’ ! इनके निर्देशन पुनीत सहगल ने ही किये थे, जिसके कलाकार रातों रात छोटे से शहर के हीरो बन गये थे ! आज भी देवेंद्र नाटक लेखन में सक्रिय हैं और इसमे मेरे छोटे भाई प्रमोद ने भी एक पागल की भूमिका निभाई थी और सुधा जैन आजकल मोहाली रहती है और खूब लिखती है, हाल ही में उसे भाषा विभाग, पंजाब से पुरस्कार मिला है !
अब याद आ रहे हैं प्रसिद्ध रंगकर्मी पाजी गुरशरण सिंह, जिन्होंने भाखड़ा नंगल डैम में लगी अपनी ऊंची पोस्ट छोड़कर नाटकों को जीवन अर्पित कर दिया। वे अमृतसर रहते थे लेकिन खटकड़ कलां में हर साल शहीद भगत सिंह के शहीदी दिवस से पहले तीन दिन पहले आते और मेरी उनसे जान पहचान बढ़ती गयी और वे बिना किसी मंच के दो खाली बैलगाड़ियों को उल्टे लगा कर मंच बना कर नाटक खेलते ! इस तरह वे पंजाब के नाटक के चर्चित चेहरे बन गये ! उनकी विचारधारा शहीद भगत सिंह की विचारधारा को बढ़ाती थी और उनका ‘ भाई मन्ना सिंह’ जालंधर दूरदर्शन पर तेरह किश्तों में प्रसारित हुआ जिससे उनकी घर घर पहचान बनी ! वे अपनी बेटियों को भी नायिका लेते जिनमें से एक बेटी एम डीयू, रोहतक में कुछ वर्ष इक्नामिक्स की प्राध्यापिका रही और दूसरी एम बी बी एस कर पंजाब के मोहाली स्थित गवर्नमेंट अस्पताल में डाक्टर रहीं।
खैर! आज यहीं विराम! भाई मन्ना सिंह को दो बार हिसार भी यहाँ के कामरेड संगठनों ने बुलाया और हमारी मुलाकातें हिसार में भी हुईं, इनकी इंटरव्यू मेरी पुस्तक ‘ यादों की धरोहर’ में शामिल है!