मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शांतीनिकेतन” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “शांतीनिकेतन” ☆ श्री सुनील शिरवाडकर

शिक्षण क्षेत्रात आपण काहीतरी करावे असे रविंद्रनाथ टागोरांना नेमके केव्हा वाटु लागले? का वाटु लागले?तो काळ इंग्रजीच्या शिक्षणाला अवास्तव महत्त्व देणारा होता. अगदी आजच्या सारखाच. इंग्रजी भाषा आली की आपल्याला सर्व काही आलेच..असे मानणार्या बुध्दिजीवी वर्गाचा.

बंगालमधील शहरी समाजात बंगाली भाषेविषयी एक प्रकारची तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. दुरगावी गेलेल्या मुलांना पत्र लिहायचे म्हटले तरी वडील ते मात्रुभाषेतुन न लिहीता इंग्रजीत लिहीत.

त्या काळात कॉंग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन बंगालमध्ये झाले होते. त्यावेळी रविंद्रनाथांनी भाषण केले ते बंगालीत.तत्कालीन राष्ट्रप्रेमींनी त्यांच्यावर त्याबद्दल टीकाही केली होती.. चेष्टाहि केली. साधारण त्याच काळात रविंद्रनाथांनी ठरवले की, या भाषेच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी आपण काहीतरी करावयास हवे. आपली सगळी बुद्धी, प्रतिभा या कामासाठीच वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

सर्व शहरी सुखसोयींचा,सुविधांचा त्याग करून आपल्या कुटुंबासह ते बाहेर पडले. फार पूर्वी म्हणजे जेव्हा रविंद्रनाथ ११-१२ वर्षाचे होते.. तेव्हा त्यांच्या वडिलांसह ते वीरभुम मध्ये आले होते. या जागेपासून जवळच एका दरोडेखोरांची वस्ती होती. तेथील निवांतपणा.. निसर्गाचे वैभव मनात साठवत त्यांचे वडील देवेंद्रनाथ तेथे ध्यान लावून बसत.तेथील दरोडेखोरांच्या मनात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. ते पण जवळ येऊन बसत.त्यातील कित्येकांनी वाटमारीचा व्यवसाय सोडला. देवेंद्रनाथांना आपल्या व्यथा, अडचणी सांगत. 

आणि आता रविंद्रनाथ पुन्हा त्या माळावर आले .त्यांना जाणीव झाली.. हिच..होय हिच जागा योग्य आहे. आत्मचिंतन करण्यासाठी.. ध्यान करण्यासाठी. त्यांनी तो माळ विकत घेतला.त्यावेळी एक लहान टुमदार बंगली बांधली. त्या सुंदर बंगल्याचेच नाव…’शांती निकेतन’.

१९०१ साली रविंद्रनाथांनी शांतीनिकेतनमध्ये प्रथमच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या सोबतीला होती त्यांची पत्नी आणि दोन मुले. तेच त्यांचे पहिले विद्यार्थी. येथे मुलांना शिकवण्यासाठी पाठवणे म्हणजे सर्वसाधारण बंगाल्यांच्या द्रुष्टीने धाडसाचेच होते.

खुद्द इंग्रज या शाळेकडे संशयाने पाहत होते. भारतीयांमध्ये आपली भाषा..आपली संस्कृती याबद्दल अभिमान निर्माण करणे म्हणजे राजद्रोह होता. त्यामुळे रविंद्रनाथांनांकडे शिकवण्यासाठी मुले पाठवणे तर जाऊ द्या.. त्यांच्याशी संपर्क ठेवणे सुध्दा लोक टाळत होते. सरकारी नोकरीत असलेल्या उच्चवर्गीय बंगाल्यांनी आपली मुले शांतीनिकेतनमध्ये पाठवु नये असा गुप्त आदेशच इंग्रज सरकारने काढला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा काहींनी आपली मुले रविंद्रनाथांनांच्या स्वाधीन केली होती.

कशी होती ही शांतिनिकेतन शाळा? ऋतुमानानुसार बदलणारी.. निसर्गाचे रुप..सौंदर्य मुलांना समजले पाहिजे म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक आश्रमपध्दती स्वीकारली होती. जीवनातील आनंदाची नानाविध क्षेत्रे मुलांना मोकळी करून द्यायला हवी. त्यासाठी त्यांनी त्या विस्तीर्ण माळरानावर तपोवनाची उभारणी केली. त्या मुक्त छत्राखाली नांदणारे ते छात्र..आणि त्यांना गौरवाची दिशा देणारे हे गुरु. गुरु शिष्यांनी एकत्र येऊन केलेली ती आनंद साधना होती. 

तत्कालीन ब्रिटीशांच्या शिक्षण पध्दतीपेक्षा सर्वार्थाने वेगळी ही शाळा होती.

रविंद्रनाथ म्हणतात.. मी स्वतः शाळेतून पळून आलेला मुलगा. शिकवावं कसं हे मला ठाऊक नव्हतं.मला मुलांनी जसं शिकावं असं वाटत होतं ,त्याला योग्य अशी पाठ्यपुस्तके देखील नव्हती. अभ्यासक्रमही नव्हता. शहरातल्या सुखसोयींपासुन दुर अशा शाळेत तर सुरुवातीला कोणी येतही नव्हते.

मग रविंद्रनाथ या मुलांना काय शिकवायचे? नृत्य.. गायन..कविता.. निसर्गाशी एकरूप होऊन रहावे.. मुसळधार पावसात त्या पर्जन्यधारांखाली चिंब भिजायला मुलांना उत्तेजन मिळत होते. आश्रमाजवळुन वाहणारी नदी पावसाळ्यात फुगुन वाहु लागली की गुरु आणि शिष्य बरोबरीनेच त्यात उड्या मारुन पोहोण्याचा आनंद लुटत.भूगोलाच्या पुस्तकातील ही हवा.. ते वारे..याचा आनंद वार्याबरोबर गात गात गाणी म्हणत लुटत.तो वारा पुस्तकाच्या पानापानातुन नव्हे तर मनामनातुन गुंजत राही.मुलांनी मुक्तपणे हे सर्व शिकावे हीच त्यांची खरी धडपड होती.

त्यांच्या मते दडपण आणि विकास या दोन गोष्टी एकत्र राहुच शकत नाही. त्यामुळे मुलांनी मुक्तपणे शिकावे यासाठी त्यांनी संगीताचा मार्ग निवडला. सर्व काही.. म्हणजेच कामे.. शिक्षण गात गात झाले तर त्यात असलेला रस टिकून राहील हे त्यांना जाणवले. निरनिराळे सण..उत्सव.. जत्रा यातून भारतीय संस्कृती टिकून आहे हे त्यांना माहित होते. त्यांनी शांतीनिकेतनमध्ये पौष जत्रा भरवण्यास सुरुवात केली. निसर्गाशी नाते जोडण्यासाठी मग छोटी छोटी रोपे पालखीत घालून त्यांची मिरवणूक काढण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्या जोडीला सुंदर सुंदर गाणी. झाडांशी.. वेलींशी मुलांचे नाते जडण्यास सुरुवात झाली.

इथल्या वातावरणात साधेपणा होता. पण त्यात रुक्षपणा त्यांनी कधीही येऊ दिला नाही. प्रसन्नता.. सौंदर्य.. आनंद यापासुन विद्यार्थ्यांची ताटातूट कधी होऊ दिली नाही. शिक्षकांना पोटापुरते मिळत होते, पण मानसिक श्रीमंती खुपच मोठी होती. बाजारात मिळणाऱ्या छानशौकिच्या गोष्टींची, ऐश्वर्याची विद्यार्थ्यांनांच काय, पण शिक्षकांनाही कधी आठवण होत नव्हती. बंगाली विणकरांकडुन विणुन घेतलेली सुती वस्त्र रविंद्रनाथांपासुन सर्व जण वापरत.पण त्यात कलात्मकता कशी येईल याकडे लक्ष दिले जाई.

बाराखडींची,शब्दांची ओळख होण्यासाठी ‘सहजपाठ’ या नावाने त्यांनी इतक्या सुबोध शब्दात सुंदर सुंदर कविता रचल्या की गाता गाता मुलांना अक्षर ओळख होऊन जात असे. हे ‘सहजपाठ’ अजूनही बंगालमधील पाठ्यपुस्तकांत आजही आपले स्थान टिकवून आहे. बंगाली लोकांमध्ये असलेले कलेचे.. संगीताचे प्रेम वाढीस लागण्याचे खरे कारण म्हणजे हे ‘सहजपाठ’.

७ मे…. रविंद्रनाथांची  जयंती….  त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही एक आदरांजली !

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ १९४७ मधली गोष्ट – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ १९४७ मधली गोष्ट – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

– डॉ. आर. एच. कुलकर्णी व कुटुंबीय 

डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी नामक २२ वर्षाच्या तरूणाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगढ़ गावी दवाखान्यात नोकरी मिळाली. दवाखान्यात तुरळक पेशंटस् असायचे.

जुलै महिन्यात रात्री तुफान पाऊस पडत होता. आर्. एच्. के. चा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं.

बाहेर दोन गाड्या घोंगडी पांघरलेली, हातात लाठ्या -काठ्या घेतलेली सात – आठ माणसं उभी होती. काही कळायच्या आतच त्यांना गाडीत ढकलण्यात आलं. सुमारे दीडेक तासात गाडी थांबली. काळाकुट्ट अंधार! लाठीधार्‍यांनी डॉक्टरांना एका खोलीत ढकललं. खोलीत एक चिमणी मिणमिणत होती. खाटेवर एक तरुण मुलगी, बाजूला एक म्हातारी स्त्री बसली होती.

डाॅक्टरांना तिचं बाळंतपण करण्यासाठी फर्मावण्यात आलं. ती मुलगी म्हणाली, “डाॅक्टर, मला जगायचं नाही. माझे पिताजी खूप श्रीमंत जमीनदार आहेत. मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही. घरी शिकवायला एक शिक्षक ठेवला. मला या नरकात ढकलून तो पळून गेला. गावाच्या बाहेर या घरात या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं.

त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला, पण बाळ रडलं नाही. ती म्हणाली, “मुलगीच आहे ना? मरू दे तिला. माझ्यासारखे भोग नशिबी येतील. ” कुलकर्णी डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा वापर करून बाळाला रडायला लावले. डाॅक्टर बाहेर येताच त्यांना १०० रु. देण्यात आले, त्या काळी ही रक्कम मोठी होती. आपलं सामान घेण्याच्या मिषानी डाॅक्टर खोलीत आले. त्या मुलीच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले, “आक्का, आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरं-वाईट करून घेऊ नको. संधी मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग काॅलेजला जा, आपटे नावाच्या माझ्या मित्राला डाॅ. आर्. एच्. कुलकर्णीनी पाठवलंय सांग, ते तुला नक्की मदत करतील. भावाची विनंती समज. “

नंतर आर्. एच्. नी स्त्री-प्रसूतीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला एका काँन्फरन्स्ला गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डाॅ. चंद्राच्या भाषणानी खूप प्रभावित झाले.

डाॅक्टर चंद्राशी बोलत असताना कोणीतरी त्यांना हाक मारली. डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी असं ऐकताच चंद्रानं चमकून पाह्यलं. “सर, तुम्ही कधी चंदगढ़ला होतात?”

“हो, पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला… “

“तर मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल. “

“चंद्रा, मी तुला आज पहिल्यांदा बघतोय, तुझं भाषण खूप आवडलं म्हणून तुझं कौतुक करायला भेटलो. असं घरी यायचं म्हणजे……. “

“सर प्लीज…. “

“आई बघितलंस का कोण आलंय?”

चंद्राच्या आईने डाॅक्टरांचे पायच धरले.

“तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले, स्टाफ नर्स झाले. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं, तुमचा आदर्श ठेवून स्त्री विशेषज्ञ डाॅक्टर बनवलं. “

“कुठंय ती मुलगी?”

चंद्रा चटकन पुढे झाली.

आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डाॅक्टरांची होती.

“चंद्रा, तू मला कसं ओळखलंस?”

“तुमच्या नावामुळे. सतत जप चाललेला असतो आईचा… “

“तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव ‘चंद्रा’ ठेवलं. तुम्हीच आम्हाला जीवदान दिलंय. चंद्रा गरीब स्त्रियांना निःशुल्क तपासते, तुमचा आदर्श ठेवून… “

डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या, सुप्रसिद्ध लेखिका, इन्फोसिसच्या सुधा मूर्तींचे वडील…!!!

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नेसा –बांधा – घाला – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

नेसा –बांधा – घाला – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

वेगवेगळ्या कपड्यांसाठी मराठीत वेगवेगळी क्रियापदं आहेत. हीच खरी भाषेची श्रीमंती. पण नवख्या माणसाची त्याने थोडी अडचण होऊ शकते. कोणत्या कपड्याला कोणतं क्रियापद हे लक्षात राहत नाही आणि मग त्यातूनच साडी घालणे वगैरे गोंधळ होतात.

एक युक्ती सांगते. ती लक्षात ठेवा. म्हणजे हे असे गोंधळ टळतील. कोणती ती युक्ती ? पाहू.

एक लक्षात ठेवा. शिवलेलाच कपडा घालायचा. म्हणून लेंगा, सदरा, टोपी, पगडी, हाप्पँट या सगळ्या गोष्टी घालायच्या. पण बिनशिवलेला कपडा चुकूनसुद्धा घालायचा नाही. म्हणून साडी, धोतर वगैरे घालणं शक्य नाही.

असा बिनशिवलेला कपडा जर कंबरेखाली परिधान करणार असू तर तो नेसायचा. म्हणून धोतर, सोवळं, साडी, लुंगी नेसा.

हेच जर बिनशिवलेला कपडा कंबरेवर परिधान करणार असू तर तो घ्यायचा. म्हणून ओढणी, उपरणं घ्या. अगदी पदरसुद्धा घ्या.

आता जर अशा बिनशिवलेल्या कपड्याने सगळं अंग झाकणार असू तर तो पांघरायचा. म्हणून शेला, शाल पांघरा.

तोच बिनशिवलेला कपडा जर डोक्यावर परिधान करणार असू तर तो बांधायचा. म्हणून मुंडासं, पागोटं, फेटा बांधा.

आता याखेरीज काही अगदी वेगळी क्रियापदं काही मोजक्याच ठिकाणी वापरतात. तीदेखील पाहू.

म्हणजे मफलर गुंडाळतात. कधीकधी घाईघाईत साडीदेखील गुंडाळतात ! निऱ्या काढतात आणि खोचतात. कामाला सुरुवात करण्यापूर्वी पदर खोचतात. नऊवारी साडीचा किंवा धोतराचा काष्टा मारतात. असो.

हा लेख संपला आणि अनेकांच्या मनातला गोंधळ देखील ! आता बिनधास्त शर्ट अडकवा, पँट चढवा आणि कुठे बाहेर जायचं ते जा!

कवी : अज्ञात. 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “चंद्रनागरीचा शब्द” – (काव्य-संग्रह)- कवी : प्रा. अशोक दास ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “चंद्रनागरीचा शब्द” – (काव्य-संग्रह)- कवी : प्रा. अशोक दास ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : चंद्रनागरीचा शब्द (काव्यसंग्रह)

कवी : प्रा. अशोक दास

प्रकाशक : तेजश्री प्रकाशन

प्रथमावृत्ती: ११|१२|२०२३

मूल्य : रु. १५०

भावनांच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला चंद्रनागरीचा शब्द प्रा. अशोक दास यांच्या ‘ चंद्रनागरीचा शब्द ‘ या काव्यसंग्रहाची सुरूवातच ‘ वारीस जाऊ चला ‘ या भक्ती काव्याने होते. इथून पुढे शब्दांच्या सहवासात वाटचाल करताना या मार्गावरूनच आपल्याला जायचे आहे असेच जणू काही कवीला सुचवायचे आहे. कवीच्या घरातील धार्मिक वातावरण व त्यातून झालेली सांस्कृतिक जडणघडण यांच्या प्रभावामुळे कवीच्या अनेक रचना या सात्त्विकतेने ओथंबलेल्या आहेत हे स्पष्टपणे जाणवते. ‘संतांची अमृतवाणी’ आपले जीवन घडवण्यासाठी वाट दाखवत असते याची जाणीव कवीला आहे. तोच वारसा पुढे चालू रहावा म्हणून कवीही ज्ञानदेव माऊलींप्रमाणे खळजनांचे मन सुंदर व्हावे आणि पांडुरंगाने सर्वांना सुखी करावे एवढेच ‘ मागणे ‘ मागत आहे. वारक-यांच्या ‘दिंडी’ तून अभंग गात गात जाताना माय मराठी तर धन्य होतेच आहे पण वातावरणच असे भक्तीमय होऊन जाते की ‘ देव सर्वांच्याच मनात ‘ वास करू लागतो. अशा भक्तीप्रवाहात डुंबत असताना सुखदुःखे, अहंकार, काळाचे भान सारे काही विसरून जायला होते आणि नकळत मन ‘ अध्यात्मिक ‘ बनून जाते. विठ्ठलाचे ‘ दर्शन ‘ झाल्यावर नेत्र सुखावतात आणि जन्मोजन्मी हेच मुख दिसत राहो एवढी एकच आस मनाला लागून राहते. पण काही कारणाने वारी घडलीच नाही तर ? तरी काही हरकत नाही. कारण आतून भक्ती करणा-याचा देव पाठीराखा असतो.. चराचरी त्याचे दर्शन होते. आपली दृष्टी विशाल असेल तर ‘ सर्वांठायी पांडुरंग ‘ भेटतो. अशी दृष्टी लाभली की पांडुरंगाच्या ठायी दिसू लागतात  ‘रुपे श्रीरामाची’. त्याच्या विविध गुणांचे दर्शन होते. नकळतपणे सितापती ‘ रखुमापती ‘ बनतो आणि भक्तांच्या अंतःकरणात वास करतो. अशा भक्तांना सुखी करण्यासाठी ‘विठ्ठल आमुचा कैवारी’ आहे याची खात्री पटलेली असते. संतांच्या ‘ भक्तीचा मळा ‘ तर चंद्रभागेकाठी कायम फुललेला असतो. याच ‘ संतांचे स्मरण करावे ‘ आणि त्यांनी शिकवलेल्या धर्माचे पालन करावे. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून अवघे ज्ञान साठवावे

अशी अपेक्षा व्यक्त करणा-या अनेक कविता आपल्याला या संग्रहात वाचायला मिळतात. कवीचा पिंड त्यातून दिसून येतो. डाॅ. वासमकर यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे कवीचे व्यक्तीमत्व त्याच्या कवितेतून प्रतिबिंबित होत आहे यात शंकाच नाही.

या संग्रहातील भक्तीमय काव्य रचना जशा लक्ष वेधून घेतात तशाच निसर्ग कविताही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसात भिजल्याशिवाय आणि पावसाची आठवण काढल्याशिवाय कोणताच कवी आपली लेखणी थांबवू शकत नाही. त्यामुळे श्री. दास सरही त्याला अपवाद नाहीत. पावसाच्या थेंबामुळेच बीज अंकुरत आहे आणि हिरवाई भराला येणार आहे. ‘समृद्धीचा सागर ‘ पावसाच्याच हाती आहे. अशा पावसाची फार वाट पाहणे शक्य नाही. जीवघेणी प्रतिक्षा सहन होत नसल्यामुळेच कवी बरसण्यासाठी ‘पावसास आवाहन’ करीत आहे. नंतर कोसळणा-या या पावसात आपल्याच तो-यात नाचताना कवी फुलांच्या गंधात न्हाऊन निघत आहे. पण नको तेव्हा पडणारा ‘ अवकाळी पाऊस’ शेतात राबणा-याला उद्ध्वस्त करतो तेव्हा मात्र कवीचे मन उद्विग्न होते. मग तो ‘ वरुणास आवाहन ‘ करतो आणि तांडव थांबवण्याची विनंती करतो.

याच पावसातून उगवलेल्या झाडांकडे जेव्हा कवीचे लक्ष जाते तेव्हा कवीच्या हे लक्षात येते की ‘ झाडे ‘ म्हणजे निसर्गातील संतच आहेत. निरपेक्षपणे देत राहणे, स्पर्धा न करता आपला ध्यास जपत राहणे, दुस-याच्या प्रगतीत आनंद मानणे असे सगळे सद्गुण कवीला झाडांच्या ठायी दिसतात. यातून कवीच्या दृष्टीचे वेगळेपण दिसून येते. जगाव कसं हे शिकवणा-या या झाडांतून मग कुठेतरी डवरलेला, बहरलेला पारिजात दिसतो. आभाळाचे दान लाभलेला हा पारिजात जेव्हा मातीस्तव फुलून येतो तेव्हा आपले मनही विरक्तपणे त्या सुगंधी सौंदर्याचा आस्वाद घेते. असा हा पारिजात श्रावणाशिवाय कसा डवरेल ? कवीला तर ‘ श्रावण म्हणजे अवघा उत्सव ‘ वाटतो. रंग गंधाच्या या मासाचे कवीने केलेले चित्रण त्यातील ध्वनीसह डोळ्यासमोर श्रावणमास उभे करते. ऊनपावसाच्या जरतारी सरी लेवून येणारा हा मांगल्याचा मास कवीचा ‘ लाडका श्रावण ‘ होऊन जातो. असा निसर्ग काव्यातून उभा करता करता कवीची शब्द फुलांची बागही फुलून येते आणि सा-या परिसरात शब्द गंध पसरुन राहतो.

असा निसर्ग डोळेभरून जो पाहतो आणि संतांची शिकवण मनात साठवून ठेवतो, त्या कवीची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी असेल ? ऋतूच्या रंगांनी निसर्ग बहरावा तसे कवीचे जीवनही सुखदुःखाच्या ‘ ‘ऋतरंगा’नी रंगून गेले आहे. आलेल्या सर्व ऋतूंना अंगावर झेलत कवी ‘ आयुष्य ‘ नावाच्या नव्या ऋतूलाही सामोरा जात आहे. ही ताकद कुठून येते. निसर्गच तर शिकवतो, फक्त शिकून घ्यायला पाहिजे. ‘श्रावण’सरीत न्हाऊन निघणारा प्राजक्त विरक्ती शिकवतो, मनाची निर्मळता शिकवतो. दुस-याच्या जीवनात सुगंध पेरायला शिकवतो. आपल्या दुःखाचा बाजार न मांडता दुःख खांद्यावर घेऊन चालण्याचा आणि इतरांना आधार देऊन त्यांच्यासाठी सावली बनण्याचा ‘ धडा ‘ आत्मसात ‘ केल्याशिवाय मनाची एवढी तयारी होऊ शकत नाही. ‘ कालचक्रा ‘ च्या फे-यामध्य गेलेल्याचा, सरलेल्याचा शोक न करता निसर्ग नियम समजून घेऊन कालक्रमण करत राहणे यातच खरा पुरुषार्थ आहे. फुलांच उमलणं आणि कोमेजणं समजून घेऊन त्यांच्याप्रमाणं आपल जीवन सार्थकी लावावं. सुख दुःखाच्या लहरी येतील आणि जातील, आपणच आपल्या आयुष्याच गणित सोडवायचं असतं.

भक्तीच्या मार्गाने आणि निसर्गाच्या सहवासात जीवनाचा अर्थ शोधत असताना कवीचे भवताली घडणा-या घटनांकडेही लक्ष आहे. सत्ता, संपत्ती, स्वार्थ यांत गुरफटलेल्या समाजात संयम आणि सत्य यांना मात्र फारसे स्थान नाही. एकीकडे युगपुरुषांचा

जयजयकार करत दुसरीकडे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणारे नेते पाहिले की कवीचे मन विषण्ण होऊन जाते. गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतक-याला मदत करण्याचे नाटक करतानाही एकमेकांशी स्पर्धा करणारे पुढारी केवळ खुर्चीसाठी पळापळ करत असतात हे जनतेने आता ओळखले आहे. मतांचा जोगवा मागायला झुंडीने येणारे पुढारी हे लोकांचे तारणहार होऊच शकत नाहीत. सत्ता ही उपभोगासाठी नसते तर ते सेवेचे फक्त साधन असते हे यांना कधी समजणार ? तरीही कवी आशा सोडत नाही. कृतीशून्य सत्तांधाना फेकून देऊन नवी नीती घडवणारे नवे नेते, नवे राष्ट्रपुरुष जन्माला येतील अशी कवीला खात्री आहे. समाजातील आपपरभाव नष्ट करुया आणि एकमेकांचे मैत्र बनून राहुया हे कवीचे स्वप्न आहे. सर्वांची ताकद एकवटली तर मानवतेचे मंदिर उभारणे अशक्य नाही. या संग्रहातील गारपीट, झुंडी, सारे सारे आपुले, मानवतेची मंदिरे, ठेकेदार, नवे नेते नवी नीती या कवितांतून कविच्या सामाजिक जाणीवा स्पष्ट होतात.

या संग्रहात ‘ मैत्री ‘ चा चंद्रमा आहे. ‘ गुरुजनांच्या’ आठवणी आहेत. ‘ संस्कारशील घरा ‘ चे चित्र आहे. अनंत काळ सर्वांचे हित होत राहो अशी प्रार्थना आहे. प्रत्येकाचे मन आभाळाचे झाले तर विश्व सुखी व्हायला वेळ लागणार नाही हा आशावाद आहे. शहिदांचे मनोगत आहे अन् दीपाचेही मनोगत आहे. कवी बादासाहेबांच्या कार्याचा गौरवही करतो आणि आईच्या आठवणी मनात बाळगत तिच्या नसण्याच्या दुःखाने हळवाही होत आहे. तो कधी जगाच्या पसा-यापासून दूर जाऊन आत्ममग्न होतो तर कधी बालकांच्या समवेत गीतांमध्ये रमून जातो. हे सगळे कशामुळे शक्य होते ? केवळ शब्दांनी इमानाने साथ दिली म्हणून. एकप्रकारे ‘ शब्दांतूनच आयुष्य कहाणी ‘ सांगण्याची किमया कवीला साधली आहे. कवी खुल्या दिलाने मान्य करतो

 “शब्दांनीच जगण्याचे बळ दिले

 शब्दांनीच रस्ता ही दाखविला

 शब्दांनीच, आतल्या आत 

 रडताना

 आपसूक डोळे पुसण्याची क्रिया

 केली “

कवितासंग्रहातील अनेक कविता मुक्तछंदातील असल्या तरीही काही कवितांमधून उत्तम लय साधली आहे. संतांची अमृतवाणी, पारिजात मी, पाऊस, मैत्री, शोध या कवितांचा त्यादृष्टीने उल्लेख करावा लागेल. काही काव्यपंक्तीही उल्लेखनीय वाटतात. उदाहरणार्थ —- समृद्धीचा सागर पावसाच्या हाती, आयुष्य नावाचा ऋतुरंग, सत्ता सेवेचे केवळ साधन असते, इत्यादी. काही शब्द कदाचित सदोष छपाईमुळे अशुद्ध स्वरुपात छापलेले दिसतात. परंतू निरभ्र मुखपृष्ठावरील पूर्णचंद्र आणि अंतरंगातील शब्दांचे चांदणे मनाला शीतल करते यात शंकाच नाही. पूर्णचंद्राच्या प्रकाशात शब्दाचे हे चांदणे जास्त जास्त पसरत राहो एवढीच सदिच्छा !

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 52 – नाहक, तीरथधाम किया है… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – नाहक, तीरथधाम किया है।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 52 – नाहक, तीरथधाम किया है… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

ऊँचा, तेरा नाम किया है 

पर, तुमने बदनाम किया है

*

तुम कतराते रहे, हमेशा 

मैंने, सदा प्रणाम किया है

*

वादा किया, न फिर भी आये

जीना यहाँ हराम किया है

*

मैंने, रात तड़पकर काटी 

तुमने तो आराम किया है

*

दर्शन तेरे, हुए न पहले 

नाहक, तीरथधाम किया है

*

चलो, देर से ही आये, पर 

वातावरण ललाम किया है

*

प्रणय कथानक, बढ़ सकता है

अभी न, पूर्ण विराम किया है

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 128 – सजल – एक-एक कर बिछुड़े अपने ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपकी भावप्रवण कविता “सजल – एक-एक कर बिछुड़े अपने। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 127 – सजल – एक-एक कर बिछुड़े अपने ☆

समांत – आह

पदांत – नहीं है

मात्रा भार – सोलह

 

मन में अब उत्साह नहीं है।

दिखती मुझको राह नहीं है।।

 *

अपनों ने जो जख्म दिए हैं।

उसकी कोई थाह नहीं है।।

 *

मैंने खूब सजाया आँगन।

पर उनको परवाह नहीं है।।

*

एक-एक कर बिछुड़े अपने।

इक जुटता की चाह नहीं है।।

 *

पूरा जीवन खपा दिया जब।

मन में चिंता, दाह नहीं है।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – क्षितिज ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  क्षितिज ? ?

छोटेे-छोटे कैनवास हैं

मेरी कविताओं के

आलोचक कहते हैं,

और वह बावरी

सोचती है

मैं ढालता हूँ

उसे ही अपनी

कविताओं में,

काश!

उसे लिख पाता

तो मेरी कविताओं का

कैनवास

क्षितिज हो जाता!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक 💥

🕉️ श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 157 ☆ “रामायण महत्व और व्यक्ति विशेष” – अनुवादक – डॉ. मीना श्रीवास्तव ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है डॉ. मीना श्रीवास्तव जी द्वारा श्री विश्वास विष्णु देशपांडे जी की मराठी पुस्तक का हिन्दी अनुवाद – रामायण महत्व और व्यक्ति विशेषपर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 157 ☆

“रामायण महत्व और व्यक्ति विशेष” – अनुवादक – डॉ. मीना श्रीवास्तव ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

पुस्तक चर्चा 

रामायण महत्व और व्यक्ति विशेष

विश्वास देशपान्डे की किताब का हिन्दी अनुवाद

अनुवादक डा मीना श्रीवास्तव

सोहम क्रियेशन अन्ड पब्लिकेशन

पहला संस्करण २०२३, पृष्ठ १३६, मूल्य २००रु

ISBN 978-81-958488-5-0

डॉ मीना श्रीवास्तव

दैनिक संघर्षो का ही दूसरा नाम जीवन है। अपनी योग्यता और शक्ति के अनुरूप प्रत्येक मनुष्य जीवन रथ हांकते हुये संकटों का सामना करता है पर अनेकानेक विपत्तियां ऐसी होती हैं जो अचानक आती हैं, जो हमारी क्षमताओ से बड़ी हमारे बस में नही होतीं। उन कठिन परिस्थितियों में हमें एक मार्गदर्शक और सहारे की जरूरत पड़ती है। ईश्वर उसी संबल के लिये रचा गया है। भक्ति मार्ग पूजा, पाठ, जप, प्रार्थना और विश्वास का सरल रास्ता प्रशस्त करता है। ज्ञान मार्ग ईश्वर को, जीवन को, कठिनाई को समझने और हल खोजने का चुनौती भरा मार्ग बताता है। कर्म मार्ग स्वयं की योग्यता विकसित करने और मुश्किलों से जूझने का रास्ता दिखाता है। ईश्वर की परिकल्पना हर स्थिति में मनो वैज्ञानिक सहारा बनती है। राम, कृष्ण या अन्य अवतारों के माध्यम से ईश्वर के मानवीकरण द्वारा आदर्श आचरण के उदाहरणो की व्याख्या की गई है।

आजकल कापीकैट चेन मार्केटिंग में मैनेजमेंट गुरू बताते हैं कि बिना किसी घालमेल के उनके व्यापारिक माडेल का अनुकरण करें तो लक्ष्य पूर्ति अवश्यसंभावी होती है। जीवन की विषम स्थितियों में हम भी राम चरित्र का आचरण अपना कर अपना जीवन सफल बना सकें इसलिये वाल्मिकी ने रामायण में ईश्वरीय शक्तियों से विलग कर श्रीराम को मनुष्य की तरह विपत्तियों से जूझकर जीतने के उदाहरण के रूप में प्रस्तुत किया है। रामायण नितांत पारिवारिक प्रसंगो से भरपूर है। राम चरित्र में आदर्श पुत्र, आदर्श भाई, आदर्श पति, जिम्मेदार शिष्य, कर्तव्य परायण राजा, विषम परिस्थितियों में धैर्य के संग चुनौतियों का सामना करने वाला राजकुमार, नेतृत्व क्षमताओ से भरपूर योद्धा, इत्यादि इत्यादि गुण परिलक्षित होते हैं। राम चरित्र भारत की सांस्कृतिक धरोहर है। धार्मिक मनोवृत्ति वाले सभी भारतीय, जन्मना आस्था और आत्मा से श्रीराम से जुडे हुये हैं। श्री राम का जीवन चरित्र प्रत्येक दृष्टिकोण से हमारे लिये मधुर, मनोरम और अनुकरणीय है। मानस के विभिन्न प्रसंगों में हमारे दैनंदिक जीवन के संभावित संकटों के श्रीराम द्वारा मानवीय स्वरूप में भोगे हुये आत्मीय भाव से आचरण के मनोरम प्रसंग हैं। किन्तु कुछ विशेष प्रसंग भाषा, वर्णन, भाव, प्रभावोत्पादकता, की दृष्टि से बिरले हैं। इन्हें पढ, सुन, हृदयंगम कर मन भावुक हो जाता है। श्रद्वा, भक्ति, प्रेम, से हृदय आप्लावित हो जाता है। हम भाव विभोर हो जाते हैं। भक्तों को अलौलिक आत्मिक सुख का अहसास होता है। इतिहास साक्षी है कि आक्रांताओ की दुर्दांत यातनाओ के संकट भी भारतीय जन मानस राम भक्ति में भूलकर अपनी संस्कृति बचा सकने में सफल रहा है। ज्ञान मार्गी रामायण की जाने कितनी व्यापक व्याख्यायें करते रहे हैं, अनेको ग्रंथ रचे गये हैं। कितनी ही डाक्टरेट की उपाधियां रामायण के किसी एक चरित्र की व्याख्या पर ली जा चुकी हैं। किन्तु सच है कि हरि अनंत हरि कथा अनंता।

श्री विश्वास विष्णु देशपांडे

मूल मराठी लेखक विश्वास देशपांडे जी ने भी “रामायण महत्व और व्यक्ति विशेष” के अंतर्गत रामायण के पात्रों और प्रसंगो पर छोटे छोटे लेखों में उनके सारगर्भित विचार रखे हैं। ईश्वरीय प्रेरणा से डा मीना श्रीवास्तव उन्हें पढ़कर इतनी प्रभावित हुईं कि उन्होंने इन लेखों का हिन्दी, अंग्रेजी अनुवाद कर डाला। यही अनुवाद इस छोटी सी किताब का कलेवर है। व्यक्तित्व खण्ड में श्री राम, सीता, लक्षमण, भरत, शत्रुघन, उर्मिला, हनुमान, विभीषण, कैकेयी, रावण पर संक्षिप्त, पठनीय लेख हैं। इन समस्त चरित्रों पर हिन्दी साहित्य में अलग अलग रचनाकारों ने कितने ही खण्ड काव्य रचे हैं और विशद व्याख्यायें, टीकायें की गई हैं। उसी अनवरत राम कथा के यज्ञ में ये लेख भी सारगर्भित आहुतियां बन पड़े हैं।

राम कथा का महत्व, रामायण पारिवारिक संस्था, रामायण कालीन समाज, रामायण कालीन शासन व्यवस्था, रामायण की ज्ञात अज्ञात बातें जैसे आलेख भी जानकारियो से भरपूर हैं। अस्तु पुस्तक पठनीय, और संग्रहणीय है।

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 361 ⇒ संतुलन (Balance) ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “संतुलन (Balance)।)

?अभी अभी # 361 ⇒ संतुलन (Balance) ? श्री प्रदीप शर्मा  ?

आर्थिक संतुलन के लिए जिस तरह हमारे खाते में समुचित बैलेंस जरूरी होता है, ठीक उसी तरह एक व्यवस्थित जीवन का आधार भी संतुलन ही है,

जिसमें संतुलित आहार से लगाकर बोलचाल, रहन सहन और आचार विचार तक शामिल है। हमारे मानसिक संतुलन को ही तो हमने मति, समझ और बुद्धि का नाम दिया है। फिर भी इंसान की कभी मति मारी जाती है, और कभी मति, फिर भी जाती है। विनाश काले विपरीत बुद्धि।

तराजू को हम तुला अथवा balance भी कहते हैं।

तराजू के दो पलड़े होते हैं, जब दोनों पलड़े बराबर होते हैं, तब सौदा खरा और सच्चा होता है। हमारे न्याय की देवी के हाथ में भी इंसाफ का तराजू होता है, और आंखों पर काली पट्टी बंधी होती है। निर्माता निर्देशक बी.आर.चोपड़ा को कानून से इतना प्यार था कि उन्होंने सन् १९६० में पहले एक अपराध फिल्म कानून बनाई। फिर भी उनका मन नहीं भरा और सन् १९८० में पुनः एक बार इंसाफ का तराजू फिल्म बना डाली।

लोगों का क्या है, वे तो अंधा कानून जैसी फिल्म भी देख लेते हैं। ।

बाबू जी धीरे चलना,

प्यार में ज़रा संभलना

बड़े धोखे हैं इस राह में ..

सिर्फ प्यार में ही नहीं, जीवन की राह में, हर मोड़ पर हमें संभलकर ही चलना होता है, और फिसलते वक्त अपना संतुलन भी कायम रखना पड़ता है। अपने आप पर काबू रखना, आपा नहीं खोना, हर तरह की सावधानी बिना mental balance के संभव नहीं। सावधानी हटी, दुर्घटना घटी।

मानसिक संतुलन को आप मनोयोग भी कह सकते हैं। आज रपट जाएं, तो हमें ना उठइयो ! फिसलना, रपटना किसी के लिए खेल हो सकता है। बगीचे की फिसल पट्टी पर फिसलने और झूला झूलने में, बच्चों को डर लग सकता है, लेकिन फिर बाद में धीरे धीरे उसकी आदत पड़ जाती है। कई बार सड़क पर वाहन चलाते चलाते, एकाएक बैलेंस बिगड़ जाता है, और हम धड़ाम से गिर जाते हैं। ।

बैलेंस अथवा संतुलन एक तरह का मानसिक अनुशासन है, जो हमारे स्वस्थ समाज का निर्माण करता है। जीवन की सभी विसंगतियों की जड़ में संतुलन और अनुशासन का अभाव होता है। फिल्म मासूम(१९६०) का यह गीत शायद यही संदेश देता है ;

हमें उन राहों पर चलना है।

जहाँ गिरना और संभलना है।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ प्रेमा के प्रेमिल सृजन… परशुराम जयंती विशेष  – भगवान परशुराम ☆ श्रीमति योगिता चौरसिया ‘प्रेमा’ ☆

श्रीमति योगिता चौरसिया ‘प्रेमा’ 

(साहित्यकार श्रीमति योगिता चौरसिया जी की रचनाएँ प्रतिष्ठित समाचार पत्रों/पत्र पत्रिकाओं में विभिन्न विधाओं में सतत प्रकाशित। कई साझा संकलनों में रचनाएँ प्रकाशित। दोहा संग्रह दोहा कलश प्रकाशित, विविध छंद कलश प्रकाशनाधीन ।राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय मंच / संस्थाओं से 200 से अधिक सम्मानों से सम्मानित। साहित्य के साथ ही समाजसेवा में भी सेवारत। हम समय समय पर आपकी रचनाएँ अपने प्रबुद्ध पाठकों से साझा करते रहेंगे।)  

☆ कविता ☆ प्रेमा के प्रेमिल सृजन… परशुराम जयंती विशेष  भगवान परशुराम ☆ श्रीमति योगिता चौरसिया ‘प्रेमा’ ☆

(परशुराम जयंती विशेष – 2 मई)

अमर जयंती शुभ दिवस ,शुक्ल पक्ष तिथि आज।

परशुराम वह नाम है, शूर वीर के काज।।

शूर वीर के काज,विष्णु के जो अवतारी ।

पुत्र हुए मिल पाँच, पिता यह आज्ञाकारी।।

करे योगिता जाप,प्रगट है पूजें संती।

अक्षय मिले वरदान,मनातें अमर जयंती ।।1।।

मात रेणुका हर्ष में , चहुँदिशि देख प्रकाश।

परशुराम जमदग्नि सुत,करते दूर निराश।।

करते दूर निराश, बढ़ी खुशियांँ जग भारी।

ओज शौर्य में पूर्ण, कहें सब फरसाधारी।।

कुल द्रोही बन आप,हुए भू अनालुंबुका।

पाप मिटाते पुत्र,नमन कर मात रेणुका।‌।2।।

 *

वंदन बारंबार है, योद्धा जन्में वीर।।

अस्त्र-शस्त्र संज्ञान से, कहलाते रणधीर।।

कहलाते रणधीर,तभी सब काँपे रिपु दल।

छटे विष्णु अवतार, कष्ट का देते सब हल।।

प्रेमा करें प्रणाम, तिलक कर माथे चंदन।

शुभ अक्षय शुचि प्राप्त, करें जो इनको वंदन।।3।।

 

© श्रीमति योगिता चौरसिया ‘प्रेमा’

मंडला, मध्यप्रदेश

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares