मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – बाबांना मिळणाऱ्या अगम्य अशा भविष्यसूचक संकेतांच्या वाचासिध्दीसदृश इतर सकारात्मक प्रचितींच्या तुलनेतला हा काळजाचा ठोका चुकवणारा एक अपवादात्मक अनुभव मनात बाबांच्या आठवणींना चिकटून बसलाय!)

दत्तमहाराजांवरील बाबांची श्रद्धा उत्कट होती हे खरं पण रोजची पूजाअर्चा, जपजाप्य यासाठी फारसा वेळ ते देऊच शकायचे नाहीत.हे त्यांनी जरी मनोमन स्विकारलेलं असलं तरी गुरुचरित्राचं पारायण करायचं त्यांच्या बरेच दिवस मनात असूनही ते शक्य झालं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे घरी ती पोथी नव्हती, कुणाकडून तरी मागून घेऊन ती वाचणं बाबांना रुचणं शक्य नव्हतं आणि स्वतः पोथी विकत घेण्याइतकी सवड आर्थिक ओढग्रस्तीत त्यांना मिळालेली नव्हती.या गोष्टीची रुखरुख मात्र बरेच दिवस त्यांच्या मनात होतीच.ती अधिक तीव्र झाली त्याला निमित्त ठरलं वर्तमानपत्रात आलेल्या ‘ढवळे प्रकाशन, पुणे’ या प्रसिद्ध प्रकाशनसंस्थेच्या एका जाहिरातीचं! ती जाहिरात अनेक दिवस रोज ठळकपणे प्रसिद्ध होऊ लागली. गुरुचरित्राची कापडी आणि रेशमी बांधणी अशा दोन प्रकारची नवी आवृत्ती प्रकाशित होणार असल्याची ती जाहिरात होती.त्यासाठी प्रकाशनपूर्व सवलतही जाहीर झालेली होती. शिवाय दहा प्रतींची ऑर्डर देणाऱ्यास एक प्रत मोफत मिळणार होती.ही सवलत अर्थातच पुस्तक विक्रेत्यांसाठी असल्याचे गृहित धरुन बाबांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. एरवीही रेशमी बांधणीपेक्षा कापडी बांधणीच्या प्रतीची किंमत कमी असूनही ती प्रत विकत घेणंही बाबांच्या आटोक्यात नव्हतंच.या पार्श्वभूमीवर अचानक एक दिवस गुरुचरित्राच्या रेशमी बांधणीची एकेक प्रत विकत घेणारे अनेक इच्छुक बाबांना येऊन भेटले व त्यांनी बाबांना सहकार्य करण्याची विनंती केली. ‘आमच्या प्रत्येकी एकेक अशा प्रतींची एकत्रित नोंदणी करणे, त्या व्हीपीने येतील तेव्हा ती व्हीपी सोडवून घेणे हे व्याप दहाजणांनी आपापले करण्यापेक्षा आम्हा दहा जणांचे पैसे आधीच गोळा करून ते आम्ही तुमच्याकडे देऊ.तुम्ही एकत्रित दहा प्रतींची ऑर्डर बुक करा म्हणजे आमचे काम खूप सोपे होईल.त्या बदल्यात दहा प्रतींवर मिळणारी रेशमी बांधणीची एक मोफत प्रत तुम्ही तुमच्यासाठी ठेवून घ्या’ असा त्यांचा प्रस्ताव होता. यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. बाबांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि घरबसल्या त्या सर्वांचं काम तर झालंच आणि कांहीही पैसे खर्च न करता गुरुचरित्राची एक प्रत आणि तीही रेशमी बांधणीची बाबांना घरपोच मिळाली. त्याक्षणीचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कधीच विसरणार नाही.मी माझ्या त्या बालवयात अंत:प्रेरणेनेच त्या पोथीतला रोज एक अध्याय वाचायला सुरुवात केली होती.ते माझं दत्तसेवेच्या वाटेवरचं पहिलं पाऊल होतं! पुढे कालांतराने आम्ही सर्व भावंडे स्थिरस्थावर झाल्यावर नोकरीनिमित्ताने वेगवेगळ्या दिशांना विखुरले गेलो तरी पुढे अनेक वर्षे ती गुरुचरित्राची पोथी माझ्या देवघरात मी बाबांकडून मिळालेला प्रसाद या भावनेनेच जपली होती.ती पोथी हाताळताही न येण्याइतकी जीर्ण होईपर्यंतच्या प्रदीर्घकाळांत गुरुचरित्राचे नित्य वाचन, पारायण हे सगळं माझ्या आनंदाचाच एक भाग होत वर्षानुवर्षे माझ्या अंगवळणीच पडून गेलं होतं!

माझ्या हातून यथाशक्ती सुरू असणाऱ्या दत्तसेवेचं समाधान आणि आम्हा भावंडांच्या पाठी असणारी आई बाबांची पुण्याई माझ्यादृष्टीने अतिशय मोलाची होती हे खरे, पण म्हणून त्यामुळे माझ्या पुढील जीवनवाटेवर खाचखळगे आलेच

नाहीत असं नाही.किंबहुना मिळेल त्या दिशांचा परस्पर वेगळ्या वाटांवरचा आम्हा सर्वच भावंडांचा प्रवास क्षणोक्षणी आमची कसोटी पहाणाराच होता.

माझ्या आयुष्यातल्या अशा अस्थिर प्रवासाला सुरुवात झाली तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. त्या नेमक्या क्षणी स्वतः पूर्णतः परावलंबी होऊन अंथरुण धरलेल्या माझ्या बाबांनी त्यांच्या अंत:प्रेरणेने मला दिलेली अमूल्य भेट मी आजही जपून ठेवलेली आहे. तो सगळाच प्रसंग आत्ता या क्षणी पुन्हा घडत असल्यासारखा मला स्पष्ट दिसतो आहे!

अर्थात या आधी सांगितलेल्या कांही मोजक्या आठवणींच्या तुलनेत खूप वर्षांनंतरची ही गोष्ट आहे.बाबा निवृत्त होईपर्यंत माझ्या दोन्ही बहिणींची लग्ने झालेली होती. आई, बाबा न् आम्ही दोन भाऊ किर्लोस्करवाडी सोडून माझं कॉलेजशिक्षण सोयीचं व्हावं म्हणून मिरजेत रहायला आलो होतो. लहान मोठी नोकरी करत राहिलेल्या माझ्या मोठ्या भावाला माझं काॅलेज शिक्षण संपण्याच्या दरम्यान नुकताच स्टेट बँकेत जॉब मिळून त्याचं पोस्टिंग इस्लामपूरला झालं होतं. आम्ही सर्वजण मग मिरज सोडून तिकडे शिफ्ट झालो.

तिथे गेल्यानंतर काही दिवसातच बाबांनी अंथरूण धरलं ते अखेरपर्यंत त्यातून उठलेच नाहीत. त्याच दरम्यान मला मुंबईत एक जेमतेम पगाराची खाजगी नोकरी मिळायची संधी आली, तेव्हा ती स्वीकारून चांगल्या नोकरीच्या शोधात रहायचं असं ठरलं आणि मी माझी बॅग भरू लागलो. माझं वय तेव्हा जेमतेम १८/१९ वर्षांचं. तोवर घर सोडून मी कुठे बाहेर गेलेलो नव्हतो. मुंबई तर पूर्वी कधी पाहिलीही नव्हती. त्यामुळे जायचं ठरलं त्या क्षणापासून मनावर एक विचित्र असं दडपण होतं आणि अनामिक अशी भीतीही. निघायच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना देवघरातल्या पादुकांवर मी फुलं वाहू लागलो आणि माझे डोळे भरून आले. गुरुचरित्राच्या पोथीलाही मी फुलं वाहून नमस्कार केला तेव्हा ‘माझं तिथं सगऴं व्यवस्थित मार्गी लागू दे’ हा विचार मनात नव्हताच. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या पादुकांच्या नित्यपूजेत मात्र आता प्रदीर्घ काळ खंड पडणार आणि गुरुचरित्र नित्यवाचनही जमणार नाही या कल्पनेनेच मी अस्वस्थ झालो होतो. ‘मला अंतर देऊ नका..’ अशी कळवळून मी केलेली प्रार्थना आजही मला आठवतेय.आश्चर्य म्हणजे माझ्या मनातली ती कळकळ दत्तगुरुपर्यंत पोचल्याची प्रचिती मला घर सोडण्यापूर्वीच मिळाली आणि तीही अंथरुणावर निपचित पडून असलेल्या बाबांच्यामार्फत! हे सगळं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं तर होतंच पण आजही तितकंच अनाकलनीय!

निघताना मी बाबांचा निरोप घ्यायला गेलो, तेव्हा बाबा थोडे अस्वस्थ झाल्याचं मला जाणवलं.

“जपून जा.” अंथरुणावर पडल्यापडल्याच ते म्हणाले. मी नमस्कारासाठी वाकणार तेवढ्यात आपला थरथरता हात कसाबसा वर करीत त्यांनी माझा आधार घेतला आणि ते महत्प्रयासाने उठून बसले. मी त्यांना वाकून नमस्कार केला.

” तुला काय देऊ?” त्यांनी विचारलं

खरंतर पूर्णतः निष्कांचन असणाऱ्या त्यांनी मला उचलून काही द्यावं अशी माझी अपेक्षा नव्हतीच आणि तसं कांही देण्यासारखं त्यांचं स्वतःचं असं लौकीकार्थानं त्यांच्याजवळ काही नव्हतंही. पण अलौकिक असं खूप मोलाचं कांही देण्याचा ते विचार करत असतील असं माझ्या मनातही आलं नव्हतं.उलट ‘तुला काय देऊ?’ या त्यांच्या प्रश्नात मला काय हवंय यापेक्षा आपण याला काही देऊ शकत नाहीय हीच खंत त्यांच्या मनात होती असंच मला वाटून गेलं. त्यांना बरं वाटावं म्हणून तत्परतेने मी म्हणालो,

“बाबा, खरंच कांही नको. आशीर्वाद द्या फक्त”

ते स्वतःशीच हसले. त्या स्मितहास्यात एक गूढ अशी लहर तरंगत असल्याचा मला भास झाला. त्यांनी मला स्वतःजवळ बसवून घेतलं. थोपटलं. आपला थरथरता हात अलगद माझ्या डोक्यावर ठेवून म्हणाले,

“बाळा, आशीर्वाद तर आहेतच रे. आणि ते नेहमीच रहातील. एवढ्या मोठ्या कामासाठी जातो आहेस, मग कांहीतरी द्यायला हवंच ना रे?..” बोलता बोलता त्यांनी त्यांच्या गादीचा कोपरा अलगद वर दुमडला.तिथली त्यांची डायरी उचलली.त्या डायरीत निगुतीने जपून ठेवलेला एक फोटो अलगद बाहेर काढला आणि तो माझ्यापुढे धरला..

“घे.हा फोटो हेच माझे आशीर्वाद आहेत असं समज. नीट जपून ठेव.रोज याचे नित्य दर्शन घेत जा.तीच तुझी नित्य सेवा .तोच नित्यनेम.सेवेत अंतर पडेल ही मनातली भावना काढून टाक.या फोटोच्या रुपात महाराज तुझी सोबत करतील. सगळं सुरळीत होईल.काळजी नको.”

मी भारावलेल्या अवस्थेत त्यांचा शब्द न् शब्द मनात कोरुन ठेवत होतो. ते बोलायचे थांबले तसा मी भानावर आलो.कृतज्ञतेनं बाबाकडे पाहिलं. सकाळी पूजा झाल्यानंतर मी पादुकांसमोर, पोथीसमोर डोकं टेकवलं तेव्हाची माझ्या मनातली कातरता मला आठवली आणि आताची बाबांच्या नजरेतली चमक आणि त्यांच्या शब्दात भरून राहिलेला, मला स्वस्थ करणारा गाभाऱ्यातूनच उमटल्यासारखा त्यांचा अलौकिक स्वर …मी अक्षरशः अंतर्बाह्य शहारलो. त्याच मनोवस्थेत त्यांच्या हातातला तो फोटो घेतला आणि त्यांना नमस्कार केला.

तो एक अतिशय छोट्या आकाराचा दत्ताचा फोटो होता! छोटा आकार म्हणजे किती तर आपल्या बोटाच्या दोन पेरांएवढ्या उंचीचा न् फार तर एका पेराएवढ्या रुंदीचा. पिवळ्या धमक रंगाचं जरीकाठी सोवळं नेसलेलं, हसतमुख प्रसन्न मुद्रा असलेलं ते दत्तरूप होतं!

या दत्तरूपानं मला पुढं खूप कांही दिलंय. पण प्रकर्षाने कृतज्ञ रहावं असं काही दिलं असेल तर ते म्हणजे बाबांच्या वाचासिद्धीची थक्क करणारी प्रचिती! ती कशी हे सगळंच सांगायचं तर तो एक वेगळाच प्रदीर्घ लेखनाचा विषय होईल. पण माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अवेळेला, माझी कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांच्या वेळी किंवा अगदी उध्वस्त करू पहाणाऱ्या नैसर्गिक संकटांच्या वेळीही फक्त मलाच जाणवेल असा आधार, दिलासा आणि माझ्या विचारांना योग्य दिशा दिलीय ती या दत्तरूपानेच!

आज इतक्या वर्षांनंतरही तो फोटो मी माझ्याजवळ जपून ठेवलाय! आजही त्याचे नित्य दर्शन मी घेतो तेव्हा ‘तो’ माझ्याजवळ असतोच आणि त्याच दत्तरुपाशी निगडीत असणारी माझ्या बाबांची आठवणसुध्दा!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा नऊवारी साडीची… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ कथा नऊवारी साडीची… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

“अगं स्वानंदी आजच आत्याचा फोन आलाय.आपल्याकडे मुक्काम आहे बरं का तिचा “असं म्हणतच मी  घरात  शिरलो.मला वाटलं  आश्चर्याने आणि आनंदाने टाळ्या वाजवील स्वानंदी.

.इतकी तिला माझी आत्या आवडायची.पण बाईसाहेब आपल्याच नादामध्ये होत्या. हातात साडीची घडी आणि डोळ्यातून वहाणाऱ्या अश्रूंच्या सरी.. हुंदका दाबतच त्या नऊवारी साडीवर तिने डोक टेकवलं.मी निरखून बघितलं तर ती माझ्या सासूबाईंसाठी आणलेली नऊवारी साडीची घडी होती.

सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहीला…हो देवयानीच्या आमच्या लेकीच्या लग्नातली गोष्ट. सिमंत पूजन झालं.. मानपान यथोचित,  यथास्थित पार पडले.  सगळे खुश होते.  कुजबूज ऐकायला आली. सकाळी लवकर चा मुहूर्त म्हणून अंथरूणावर अंग टाकणार, एवढ्यात स्वानंदी धावत पळत आली,आणि म्हणाली, “अहो ऐका ना,आत्ताच वर पक्षाकडे चाललेली कुजबूज कानावर आली. युगंधरच्या आजी म्हणे हट्टाला पेटल्या  आहेतआणि  म्हणताहेत , माझ्या बहिणीचा मानपान कां नाही केला मुलीकडच्यांनी.?आत्ताच्या आत्ता तिला नऊवारी साडी नेसवा.नाहीतर मी चालले घरी.उद्या अक्षता टाकायला पण येणार नाही म्हणावं मी. हंसून मी हीला म्हणालो, ” अग त्यात काय एवढं ? मग दे की आपल्या जवळची एखादी चांगली भारी  साडी. पण हे बघ आजींना दुखवायला नको हं!, हो व्याह्यांनी बजावून सांगितल आहे, ‘आमच्या घरात आईचा शब्द प्रमाण असतो. आम्ही सगळे तिला जपतो.शब्दानेही कधी दुखवत नाही. आनंदी म्हणाली, ” अहो हे सगळं मला माहित का नाहीय्ये,अहो पण  आपल्याआहेराच्या बॅगेत   नऊवारी साडीच नाही. आणि आणू म्हटलं तर ती आणायची कशी ? आणि कुठून? आत्ता रात्रीचे बारा वाजलेत. आणि सकाळी लवकरचा साडेसहाचा मुहूर्त आहे लग्नाचा. आत्ता रात्रीचे बारा वाजलेतआणि सकाळी सातला दुकानं तर उघडी हवीत ना ? ऐन वेळेला नऊवारी कुठून आणायची ? स्वानंदी रडकुंडीला येऊन मला सांगत होती.एक तर हे लग्न युगंधर कडे कुणालाच पसंत नव्हतं, कारण त्यांनी पसंत केलेली मुलगी नाकारून युगन्धरचा आमच्या देवयानी शीच लग्न करण्याचा हट्ट  होता.तो मला म्हणाला होता,” बाबा आमच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत तुम्ही माझ्या माणसांना सांभाळा. ते म्हणतील तस्स करा प्लीज. पुढचं मी बघतो पण ती वेळ फक्त माझ्यासाठी.. फ़क्तमाझ्या साठी निभाऊन न्या. “आणि मग मीही शब्द दिला होता जावयाला. मनात आलं नऊवारी साडी देणं म्हणजे कित्ती साधी गोष्ट आहे. पण ती आणणं किती अवघड आहे. याची कल्पना मला बायकोने दिल्यावर मी हादरलो. देवयानीचा माझ्या मुलीचा रडवेला चेहरा, स्वानंदीची उलघाल, आणि माझी हतबलता,माझ्या सासूबाईंच्या नजरेतून सुटली नाही. त्या म्हणाल्या, ” जावई बापू , स्वानंदी,अगं काय झालंय ? मला सांगाल का ? किती अस्वस्थ  आहात तुम्ही! मुलाकडच्यांनी  गाडी , स्कूटर, मागितली आहे का ?”..” अगं आई गाडी काय!  अगदी विमान मागितल असत तरी कॅश दिली असती आपण.” असं म्हणून आमच्या अर्धागिनीने सारी कथा कथन केली. ती ऐकल्यावर सासूबाई जरा विचारत पडल्या.कारण परिस्थितीच तशी होती बहिणीला नऊवारी नेसवल्याशिवाय आजी मांडवात येणारच नव्हत्या . आणि आजी शिवाय लग्न होणारच नव्हतं.आत्ता यावेळी सगळे दुकानदार दुकानं बंद करून घरी घोरत असतील. आणि थंडीच्या साखर झोपेतून ते लवकर दुकानात येणं म्हणजे अशक्य बाब होती. आता काय करायचं ? युगंधरचा अगदी कळवळून हात जोडून सांगितलेला अगदी केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर येत होता. मागणी साधी होती, पण गहन विचारात टाकणारी होती.सासूबाई लगबगीने  उठल्या. आणि उजळत्या चेहऱ्याने परतल्या.त्यांच्या हातात साडीची पिशवी होती. ती स्वानंदीच्या हातात देत त्या म्हणाल्या,” घ्या काखेत कळसा आणि गावाला वळसा,’ स्वानंदी  अगं ही नऊवारी साडी दे देवयानीच्या मावस आजे सासूबाईंना. ” माझा चेहरा उजळला. केवढं मोठ्ठ कोडं सोडवलं होतं सासुबाईंनी. पण देवयानीच्या, माझ्या मुलीच्या बोलण्याने मी भानावर आलो. नात आजीला म्हणत होती, “अगं काय हे आजी? अगदी खूप दिवसापासून ची तुझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून  आईने खास तुझ्यासाठी  ही  हिरव्या रंगाची साडी मुद्दाम येवल्याहून तयार करून आणलीय.आई सांगत होती, घरची गरिबी, आत्या काकांचं आजी-आजोबांचं व इतर गोतावळ्यांच्  करण्यातच तुझं सारं आयुष्य त्या धबड्ग्यातच गेलं म्हणे. आजोबांच्या कमी पगारात तु नेहमी स्वतःच्या मनाला मुरड घालायचीस. सोनं काय साधी भारी साडी पण तुझ्या अंगाला कधी लागली नाही. नंतर आजोबांच् आजारपण, . औषध पाणी, ऑपरेशनचा खर्च. आईने सगळं लक्षात ठेवलय आणि मुद्दाम तुझ्यासाठी नऊवारीचा खास वाण येवल्यावरून आणला आहे.” नातीचा धबधबा थांबवत आजी म्हणाली, देवयानी बाळा खरंय तुझं म्हणणं, राणी तुमच्या भावना कळतात गं मला, पण आता वेळ साजरी करणं महत्वाचं आहे . लग्नात झालेल्या कुरबुरी आयुष्यभर सुनेला ऐकाव्या लागतात आणि तुझ्या सासरच्यांना दुखावून कसे चालेल ?तरीपण देवयानी आपलं घोडं पुढे दामटतच म्हणाली, ” आजी तुमच्याकडे हिरवं घ्यायचं नाही ना म्हणून ही नऊवारी खास कारागिराकडून आणलीय. तुझ्या हौसेला मुरड घालावी लागलेली आम्हांला नाही आवडणार. आयुष्यभर मन मारूनच राहणार आहेस का तू ? ठेव ती साडी बॅगेत. उद्या नेसायचीय ती तुला माझ्या लग्नात. या संभाषणात मी आणि स्वानंदी गोंधळून गेलो होतो.

काय करावं ? काही कळतच नव्हतं. सासूबाईंनी अखेर हीच्या हातात साडी ठेवली आणि म्हणाल्या, “स्वानंदी चल लवकर ओटीची तयारी कर. आपण आत्ताच त्यांना मानाची साडी देऊया.उद्या त्यांना नेसता येईल. आणि चिडलेल्या देवयानीला त्यांनी समजावलं,. “पोरी सासरच्यांवर रागावू नकोस . हीच वेळ आहे भावी संसार  सांवरण्याची . आपल्या माणसांची मन जिंकण्याची. मनाचा तळ कधीही गढूळ नाही होऊ द्यायचा. नितळ मनाने केलेला संसारही नितळच होतो.” आणि मग सासूबाई मानाचे पान घेऊन निघाल्या, विहीण बाईंकडे. इतका वेळ आता काय करायचं? हे विचारायला प्रश्नचिन्ह घेऊन दाराआड उभा राहिलेला युगंधर पुढे झाला. स्वानंदी कडे वळून तो म्हणाला,” भाग्यवान आहात तुम्ही. अशा आभाळा एवढ्या स्वच्छ मनाच्या आई तुम्हाला मिळाल्यात.असं म्हणून तो पुढे होऊन आजीच्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या पायाशी वाकला.सारे संवाद त्यांनी ऐकले होते.भारावून तो म्हणाला, ” आजी ग्रेट आहात तुम्ही. दोन घरं सलोख्यांनी जोडण्याचं तुमचं कसब अजब आहे. माझ्या माणसांना न दुखवता मला हे लग्न करायचं होतं.

माझ्या भावना जाणल्यात तुम्ही. माझी आजी तशी चांगली आहे हो! पण  कुणीतरी कानाशी लागलं असावं म्हणून तिच्या मनांत हे असं आल, आणि तिचं मन भरकटल.

तर मित्र-मैत्रिणींनो इतकं सगळं रामायण सांगण्याचं कारण  महाभारत न घडता लग्न खेळीमेळीत पार पडलं. मावस आजी कमालीच्या खुश झाल्या .  नऊवारी नेसून हरखल्या आणि आनंदाने बहिणी बहिणी लग्नात मिरवल्या. युगंधर च्या आजी म्हणाल्या, “वय झालं म्हणून काय झालं ? म्हातारपणीही हौस, ही  असतेच की.शिवाय व्याह्यांनी  मानाने दिलेली साडी मिरवण्यात आनंद असतो. “.माझ्या मनांत आलं,एखाद्याचं आयुष्य मनाला मुरड घालण्यातच सरतं. परिस्थितीमुळे अगदी साध्या गोष्टीही त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत.  सासूबाईंच्या बाबतीत तेच झालं आणि अजूनही होतंय. पण सासूबाई समाधानी होत्या . घेण्यापेक्षा देण्यातच त्यांना आनंद वाटायचा. तर  अशा या गोडव्यात शुभमंगल मंगलमय रितीने पार पडलं. मंडळी खरी कथा आणि  व्यथा पुढेच आहे. नंतर आम्ही छान नऊवारी घेण्यासाठी दोन वेळा  बाहेर पडलो. पण कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते.कारण पहिल्यावेळी सासुबाई आजारी पडल्या.आणि आणि दुसऱ्या वेळी तर….तर…त्या स्वर्गवासी झाल्या. एखाद्याचं नशीबच असं असतं.  कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते ते अगदी खरंय …काळ सरला… पण राहून गेलेल्या दुःखाची बोच  स्वानंदीच्या मनात बोचतच राहयली.तिच्या दुःखावर मलमपट्टी करायलाच हवीय नाही का! मी तिला समजावलं “अंथरुणावर  पडून वेदनेने त्रासलेल्या सासूबाईची दया येऊन देवाने त्यांचं सोनंचं केलं . हे बघ  कुणी कुणाचं दुखणं आणि दुःख नाही वाटून घेऊ शकत. तुमचे मुलांचे सुखाचे संसार बघून तृप्त मनाने त्या गेल्या .दैवगती आहे ही. स्वतःला सांवर.” रडवेली माझी बायको अगतिक होऊन म्हणाली ,”सगळं कळतय हो मला , पण अधिक महिना आलाय. ही साडीची घडी कुणाला देऊ मी ? माझी अपुरी इच्छा आईची ओटी भरायची कशी पुरी होईल   हॊ ? स्वानंदीचे डोळे पुन्हा भरून आले.

” अगं त्यात काय ! मी आहे ना.!.मी होईन तुझी आई .” डोळे पुसत स्वानंदी म्हणाली, “कोण ?आत्या ! तुम्ही.?..

तुम्ही..कधी आलात?” , “पोरी अगं सारं बोलणं ऐकलय मी . तुझ्या नवऱ्याने तुझी खंत मला सांगितली.आणि आम्ही एक प्लॅन आखला. अधिक मासात दुर्देवाने आई नसली तर मावशी, जाऊबाई कुठलीही मायेची माय 

चालते. आपण नवीन पद्धत पाडू . आज पासून तू माझी मुलगी झालीस .चल !  पूस ते डोळे , उठ पटकन् ! ओटी ची तयारी कर …..पण काही म्हण स्वानंदी , हिरव्या नऊवारीची मला  खूप हौस होती  हं.लगेच घडी मोडीन मी.

मग काय ! उत्साहाने  उठत  डोळे पुसत, विजेच्या चपळाईने आमच्या बायकोने ओटी सोहळा पार पाडला.साडीची घडी आत्त्याच्या हातात दिली.

गोऱ्या पान आत्त्या च्या अंगावर हिरवीगार साडी खूपच छान दिसत होती. आणि मग नऊवारीत  खुलून दिसणारी आई आणि अपुरे स्वप्न पुर्ण झाल्याच्या तृप्तीने , आईकडे बघणाऱ्या लेकीच्या भारावलेल्या डोळयांत आनंदाश्रू चमकले. वातावरण हंसर व्हायला हव,  म्हणून मी म्हणालो,” ऐक  नां आत्त्या 

ही तुझी लेक नां ? मग मी जावई झालो तुझा. पण मग जांवयाला चांदीच्या ताटात अनारशाच वाण दे ना मलालवकर , “

मला चापट मारून आत्या म्हणाली,”अरे लबाडा ! सरळ सांग ना मला अनारसे आवडतात म्हणून.”  आणि मग स्वानंदी पण खुदकन् हंसली.

मित्र मैत्रिणींनो आता यापुढे कितीतरी अधिक मास येतील आणि जातीलही .पण हा अधिक मास आमच्या कायम लक्षात राहील. सण साजरे करायचे ते आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी.मग हा  बदल तुम्हाला आवडला तर सांगाल कां मला ?

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तेरी मेरी कहानी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

तेरी मेरी कहानी…☆ श्री मंगेश मधुकर 

‘एक प्यार का नग़मा है, मौजों की रवानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं, 

तेरी मेरी कहानी है’

—-  गीतकार संतोष आनंद यांनी जगण्याचा सारीपाट या गाण्यात फार सुंदर मांडलाय.

जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो, तेव्हा तेव्हा ते खोलवर भिडतं. आजपण तसंच झालं. 

 

…. रविवारी अचानक रेडियोवर हे गाणं लागलं अन मन गुंग झालं.

जगण्याचा सहज सोपा अर्थ सांगणारी रचना ऐकून  एकेक गोष्टी नजरेसमोर आल्या. 

कसं असतं ना माणसाचं जगणं, वेगवेगळं आयुष्य असलं तरी प्रत्येकाच्या जगण्याचा घटनाक्रम हा सारखाच .. 

सुरुवात जन्मापासून,– त्यावेळी होणारे लाड,कौतुक,मिळणारं प्रेम, – पूर्ण परावलंबी असलं तरी  फार मस्त असतं ते आयुष्य. त्या निरागस वयात स्वार्थाशिवाय काहीच कळत नाही. तेच बरं असतं.

अर्थात सगळ्यांच्याच नशिबी हे नसतं हे देखील तितकंच खरयं.

 

सरत्या दिवसांसोबत वय वाढत जातं. हळूहळू विचार करायला शिकतो. आजूबाजूला चाललेलं समजायला लागतं. काय बरोबर,काय चूक ठरवता येतं. आणि मग!!

— मग निरागसतेची जागा व्यवहार घेतो. एकेक करून सगळंच बदलतं. 

लहानपणीचा बहारदार काळ ओसरून सुरू होतो अपेक्षांचा खेळ .. शाळेपासून चिकटलेल्या ‘अपेक्षा’ नंतर आयुष्यभर सोबत करतात. महत्वाकांक्षा, स्वप्न यांच्यामागे धावताना नोकरी,व्यवसाय,लग्न,संसार,मुलं एकेक जबाबदाऱ्या येतात. स्वरूप बदलतं पण ‘अपेक्षा’ साथ सोडत नाहीत. 

— हे मिळवायचं,ते मिळवायचं म्हणून चाललेला जीवाचा आटापिटा. कितीही मिळालं तरी कमी होत नाही.

दमतो,थकतो तरी पळणं थांबत नाही. टेन्शन नावाचा वेताळ पाठ सोडत नाही. तो नवनवीन प्रश्न निर्माण करतो  अन आपण उत्तरं देत राहतो. हा सिलसिला थांबत नाही. जगण्याची तऱ्हा निरंतर चालू राहते

स्वप्न,इच्छा प्रत्येकाच्या असतात. काहींच्या पूर्ण होतात तर काहींच्या …. 

चांगल्या-वाईट घटना घडत राहतात. सुख-दु:ख,ऊन सावली सारखं कूस बदलतात  

.. पराकोटीचा आनंदही मिळतो अन टोकाच्या वेदनासुद्धा. 

 

प्रतिकूल परिस्थितीनं निराशा दाटते. उदास वाटतं. वैताग येतो. संयमाचा कस लागतो. तरीही —

सगळं व्यवस्थित होईल, हा विश्वास जगण्यातली उमेद जिवंत ठेवतो. कितीही संकटं आली तरी हार मानली जात नाही. जगण्यातली हीच  गंमत आहे. 

 

नेहमी वाटतं की, आयुष्य म्हणजे चटकदार भेळ… कधी आंबट तर कधी गोड, कधी तिखट,झणझणीत डोळ्यातून पाणी काढणारी – – तरी भेळ आवडीनं खाल्ली जातेच.   

शंभर टक्के कोणीच सुखी नाही अन दु:खीही नाही, कितीही चढ उतार आले तरी जगण्यावरचं ‘प्रेम’ कमी होत नाही. 

– – जगणं म्हणजे – संतोष आनंद यांच्याच शब्दात सांगायचं तर — 

“आँखों में समंदर है, आशाओंका पानी है 

ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी हैं ”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक रामरत्न आणि दोन भारतरत्न ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एक रामरत्न आणि दोन भारतरत्न ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

संस्कृतातील रम धातू म्हणजे रमणे आणि घम धातू म्हणजे ब्रम्हांडाची पोकळी….ही सर्व पोकळी व्यापून उरले ते राम…प्रभु श्री राम ! 

योगी ज्या शून्यात रमतात त्या शून्यास राम म्हणतात. तुलसीदासजी म्हणतात “स्वयं प्रभु श्रीरामांना आपल्या स्वत:च्या नावाचं वर्णन नाही करता येत”…इतकं ते अवर्णनीय आहे.  रामनामाचा केवळ एक उच्चार पुण्यप्रद आणि दोनदा उच्चार तर तब्बल १०८ वेळा नामजप केल्याचं फल देणारा! म्हणून आजवरच्या सर्वच संतांनी राम नाम जपायला सांगितलं, रामचरित्र गायचा आग्रह धरला ! 

ज्यांची प्रतिभा एखाद्या संत-महात्म्यापेक्षा कमी नव्हती असे पंडित नरेंद्र शर्मा यांनी संतांचा हाच विचार आधुनिक भाषेत मांडला. आणि या शब्दांना महान मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतात बांधले. राम रत्नाचे गुण गायला खळे काकांनी एक नव्हे तर दोन दोन रत्नं मिळवली…भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि भारतरत्न लता मंगेशकर! या दोघांशिवाय या ईश्वरी शब्दांना न्याय देणारं दुसरं होतं तरी कोण? पण ही दोन रत्नं एकत्र आणण्याचं काम मोठं अवघड. श्रीनिवासजींचा लतादीदींवर प्रेमाचा अधिकार होताच. मराठीत माऊली ज्ञानोबारायांच्या आणि जगदगुरू तुकोबारायांच्या शब्दांना लतादीदींनी खळे काकांच्याच स्वरमार्गदर्शनाखाली श्रोत्यांच्या काळजापर्यंत पोहोचवले होते. पंडित भीमसेन जोशी हे खरे तर शास्त्रीय गाणारे! परंतू त्यांना या रामनामासाठी राजी करायला वेळ लागला नाही…कारण रामाचे भजन हेचि माझे ध्यान सारख्या रचना त्यांनी आधी गायल्या होत्याच आणि त्यात त्यांना समाधान लाभल्याचा अनुभव होताच.

पंडित नरेंद्र शर्मांना दीदी ‘पप्पा’ म्हणून संबोधित असत. मास्टर विनायकांच्या घरी दीदींची आणि पंडितजींची पहिली भेट झाली होती आणि त्यातून ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या त्या पडल्याच. पंडितचे घर दीदींचे घर बनले आणि त्यांचे सर्व नातेवाईक दीदींचे नातेवाईक. एवढं असूनही पंडितजी दीदींना ‘बेटा,बेटी’ असं काहीही न म्हणता लताजी! असं म्हणत….ते आत्यंतिक प्रेमाने आणि दीदींचा अधिकार जाणून! पंडितजींचे शब्द आणि ते ही श्रीरामस्तुतीचे असं म्हणल्यावर दीदी त्वरीत तयार झाल्या पण पंडित भीमसेन जोशींसारख्या हिमालयासोबत उभं राहण्याच्या कल्पनेनं भांबावून गेल्या. ज्योतीने तेजाची आरती अशी काहीशी त्यांची मनोवस्था. कारण भीमसेनजींचा शास्त्रीय संगीतातील उच्चाधिकार इतरांप्रमाणेच दीदीही जाणून होत्या. पण खळे काकांनी दीदींना आश्वासन दिले….मी आहे सोबत! 

त्यानुसार योजना झाली आणि ‘राम शाम गुणगान’ नावाच्या हिंदी श्रीरामभजनाच्या संगीत अल्बमच्या ध्वनिमुद्रणास आरंभ झाला. इथं श्रीनिवास खळेकाकांनी मात्र एक वेगळा प्रयोग केला. भारदस्त ताना,आलाप घेणा-या पंडित भीमसेनजींना त्यांनी साधे सरळ गायला लावले. अर्थात पंडितजींचे ‘साधे-सरळ’ गाणं सुद्धा अगदी पट्टीच्या गवयांना अवाक करणारे. गाण्याचे शब्द होते…राम का गुणगान करीये! यात आरंभी भीमसेनजींनी तिस-या वेळी म्हणलेला ‘गुणगान’ शब्द ऐकावा काळजीपूर्वक! तर…खळेकाकांनी दीदींना मात्र ताना,आलाप घेण्याची जबाबदारी दिली! साहजिकच दीदींना प्रचंड मानसिक तणाव आला! बरं दीदी काही कच्च्या गुरुंच्या चेल्या नव्हत्या. पिताश्री मास्टर दीनानाथ आणि पुढे उस्ताद अमानत अली खान आणि अमानत खान आणि अन्य काही श्रेष्ठ शास्त्रीय संगीत शिक्षकांकडे दीदी शास्त्रीय शिकल्या होत्याच. जर त्या चित्रपट संगीताकडे वळल्या नसत्या तर त्या निश्चित प्रसिद्ध शास्त्रीय गायिका झाल्या असत्या! 

दोन महासागर काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि गळाभेट घेतात.परंतू एकमेकांना कमी लेखत नाहीत. समोरच्याला आपला रंग आहे तसा ठेवू देतात. पंडितजींनी असेच केले. पण त्यांच्याविषयीच्या परमादरामुळे दीदी नाही म्हटले तरी मनातून हलल्या होत्या. यावर उपाय म्हणून श्रीनिवास खळेंनी ध्वनिमुद्रण करताना या दोन गायकांच्या मध्ये चक्क एक छोटे लाकडी आडोसा (पार्टीशन) लावून घेतले होते. म्हणजे दोघे एकमेकांना पाहू शकणार नाहीत असे. पण दोघांच्याही गाण्यात कुठेही आडोसा असल्याचे जाणवत नाही. एकदा का रामनामाची धून काळजातून कंठात आली की सर्व राममय होऊन जातं. तसंच झालं….राम शाम गुणगान मधील एकेक गाणं म्हणजे एक एक महाकाव्य म्हणावे असे झाले. १९८५ मध्ये प्रसिद्ध झालेला हा संगीतठेवा आजही अत्यंत श्रवणीय आहे! ही प्रत्यक्ष त्या श्रीरामचंद्रांची कृपाच! यात राम का गुणगान हे अहिर भैरव रागातील गाणे म्हणजे दिव्य कोंदणातील अतिदिव्य हीराच! 

आजचे आघाडीचे गायक शंकर महादेवन हे त्यावेळी केवळ अकरा वर्षांचे होते. त्यांनी या गाण्यांसाठी, या अल्बममध्ये वीणावादन केले आहे, हे किती विशेष! 

‘राम शाम गुणगान’ म्हणजे एका रामरत्नाचे गुणगान दोन रत्नांनी करावे हाही एक योगच होता श्रोत्यांच्या नशीबातला. आज ही दोन्ही रत्ने आणि त्यांचे मोल जाणणारे पदमभूषण पंडित नरेंद्र शर्मा आणि पदमभूषण श्रीनिवास खळे हे या जगात नाहीत, पण त्यांची स्वरसृष्टी अमर आहे. 

राम का गुणगान करिये, राम का गुणगान करिये।

राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये॥

राम के गुण गुणचिरंतन,

राम गुण सुमिरन रतन धन।

मनुजता को कर विभूषित,

मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये॥

सगुण ब्रह्म स्वरुप सुन्दर,

सुजन रंजन रूप सुखकर।

राम आत्माराम,आत्माराम का सम्मान करिये, ध्यान धरिये॥

(अर्थातच हे सर्व मी इतरांचे वाचून रामनवमीनिमित्त तुमच्यासमोर मांडले आहे. माहितीमध्ये काही तफावत असेल तर दिलगीर आहे. पण यानिमित्ताने सर्वांच्या मुखातून राम का गुनगान व्हावे अशी इच्छा आहे. वरील ओळी आपण वाचल्या म्हणजे आपल्याकडून गुणगान झालेच की! ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अपूर्ण कविता … कवी : श्री पुनीत मातकर ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ अपूर्ण कविता … कवी : श्री पुनीत मातकर ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा

आवाज विरत नाही, तोच

सुसाट वेगानं मी पोहोचायचो

घराच्या दारात…

*

पाठीवरलं दप्तर फेकून

घोड्यागत उधळत

पोहोचायचो मैदानात,

मस्तवाल बैलासारखा

धूळमातीत बेभान होऊन

मिरवत राहायचो स्वतःचं

पुरुष असणं..

*

तीही यायची शाळेतून..

चार रांजण पाणी…

घरअंगणाची झाडलोट…

देव्हा-यातला दिवा लावून

ती थापायची गोल भाक-या

अगदी मायसारखीच

अन् बसून राहायची उंब-यावर..

रानातून माय येईस्तोवर

*

ती चित्रं काढायची..

रांगोळ्या रेखायची..

भुलाबाईची गाणी अन्

पुस्तकातल्या कविता

गोड गळ्यानं गायची….

धुणंभांडी..सडा सारवण

उष्टं खरकटं..सारं मायवानीच करायची

*

मी पाय ताणून निजायचो,

ती पुस्तक घेऊन बसायची….

दिव्याच्या वातीत उशिरापर्यंत…

*

एकाच वर्गात असून मास्तर

माझा कान पिळायचे

कधीकधी हातानं….

कधी शब्दानं …

“बहिणीसारखा होशील तर

आयुष्य घडवशील…” म्हणायचे,

मग करायचो कागाळ्या

मायजवळ…

*

मॕट्रिकचा गड

मी चढलो धापा टाकत..

तिनं कमावले मनाजोगते गुण,

बाप म्हणला

दोघांचा खर्च नाही जमायचा

त्याला शिकू दे पुढं…

टचकन डोळ्यात आलेलं पाणी

तसंच मागं परतवत

ती गुमान बाजुला झाली

पाठच्या भावाच्या रस्त्यातून…

*

ती शेण गोव-या थापत राहिली..

मायसंगं रानात रापत राहिली

काटे तणकट वेचत राहिली…

बाईपण आत मुरवत राहिली

*

तिच्या वाट्याचा घास घेऊन

मीही चालत राहिलो

पुस्तकांची वाट… 

कळत गेलं

तसं सलत राहिलं

तिनं डोळ्यातून परतवलेलं

पाणी…

*

तिला उजवून बाप

मोकळा झाला..

मायला हायसं वाटलं..

मी मात्र गुदमरतो अजूनही

अव्यक्तशा

ओझ्याखाली…

*

दिवाळी..रसाळी..राखीला

ती येत राहते

भरल्या मनानं..

पाठच्या भावाच्या वैभवानं हरखते..

बोटं मोडून काढते दृष्ट..

टचकन आणते डोळ्यात पाणी..

पाठच्या भावासाठी

जाताना पुन्हा सोडून जाते..

मनभरून आशीर्वाद…

*

ती गेल्यावर मी हुरहुरत राहतो

ज्योतीसारखा

जिच्या उजेडात ती

उशीरापर्यंत वाचायची पुस्तकं ,

पाठ करायची कविता…

जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण….

कवी: श्री.पुनीत मातकर

गडचिरोली

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मोगर परडी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मोगर परडी?  सुश्री वर्षा बालगोपाल 

हिरव्या पानात

सुगंधी दरवळ

घमघमाटला

मोगरा निर्मळ

*

मोहवते मला

मोगा-याची झाडी

हिरव्या साडीस

सुगंधी ती खड़ी

*

तुझ्याच हाताने

मोगरा माळला

अंतरात माझ्या

दर्या उफाळला

*

तुलाही आवडे

त्याचा तो सुगंध

प्रतीक प्रेमाचे

करीतसे धुंद

*

स्वतः चा तो गंध

आला उधळीत

गुण द्यावे सर्वां

जगाला सांगीत

*

द्यावा मोद जगा

भरून दुथडी

आयु कर देवा

मोगर परडी

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #229 – कविता – अब गुलाब में केवल काँटे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता “अब गुलाब में केवल काँटे…” ।)

☆ तन्मय साहित्य  #229 ☆

☆ अब गुलाब में केवल काँटे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

बातें अपनी

कुछ जन-मन की

किससे कहें, सुनें

विचलन की।।

 

नित नूतन आडंबर लादे

घूम रहे राजा के प्यादे

गुटर गुटर गू करे कबूतर

गिद्ध अभय के करते वादे,

बात शहर में

बीहड़ वन की।…

 

सपनों में रेशम सी बातें

करते हैं छिपकर फिर घातें

ये बेचैन, विवश है रोटी

वे खा-खा कर, नहीं अघाते,

बातें भूले

अपनेपन की।……

 

अब गुलाब में केवल काँटे

फूल, परस्पर खुद में बाँटे

गेंदा, चंपा, जूही, मोगरा

इनको है मौसम के चाँटे,

 रौनक नहीं रही

 उपवन की।……,

 

है,अपनों के बीच दीवारें

सद्भावों के नकली नारे

कानों में मिश्री रस घोले

मिले स्वाद किंतु बस खारे

कब्रों से हुँकार

गगन की।….

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 53 ☆ रामलखन… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “रामलखन…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 53 ☆ रामलखन… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

भरी जवानी में बूढ़ा

दिखता है रामलखन।

 

पौ फटते ही

मज़दूरी के लिए निकल जाता

साँझ ढले पर

लुटा-पिटा सा घर को आ पाता

 

आते घरवाली कहती

अब बचा नहीं राशन।

 

बिना फ्राक के

मुनिया कैसे जायेगी स्कूल

छप्पर टूटा

कहता मुझको न जाना तुम भूल

 

अब की बारिश के पहले

कर लेना कोई जतन।

 

पिछड़ों में भी

नाम लिखाया था पटवारी को

बहन लाड़ली

में भी जोड़ा था घरवारी को

 

नहीं कहीं है सुनवाई

विपदा भोगे निर्धन।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लघुकथा – प्रेम ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  लघुकथा – प्रेम ? ?

– कितने साल बाद मिले उससे?

– यही कोई 35-36 साल बाद।

– क्या बात हुई?

– कुछ ख़ास नहीं।

– कुछ तो कहा होगा उसने।

– वही उलाहने, वही शिकायतें। मुझसे शिकवा, गिला। जिस वज़ह से हमारी राहें ज़ुदा हुई थीं, वे सारी वज़हें अब भी ज्यों की त्यों हैं। रत्ती भर भी फ़र्क नहीं आया उसकी सोच में।

– वह उलाहने देती है, शिकायतें करती है,…मतलब अब भी तुमसे आस है उसे। अब भी वह प्रेम करती है तुम्हें, मरती है तुम पर।…और हाँ, मेरी बात याद रखना, मरते दम तक वह मरती रहेगी तुम पर.!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 श्री हनुमान साधना – अवधि- मंगलवार दि. 23 अप्रैल से गुरुवार 23 मई तक 💥

🕉️ श्री हनुमान साधना में हनुमान चालीसा के पाठ होंगे। संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही। मंगल भव 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – आलेख ☆ साहित्य के बदलते “आयाम”!… जन जन तक पहुँचती “कलम”! ☆ श्री आशीष गौड़ ☆

श्री आशीष गौड़

सुप्रसिद्ध साहित्यकार श्री आशीष गौड़ जी का ई-अभिव्यक्ति में स्वागत है।

आपका साहित्यिक परिचय आपके ही शब्दों में “मुझे हिंदी साहित्य, हिंदी कविता और अंग्रेजी साहित्य पढ़ने का शौक है। मेरी पढ़ने की रुचि भारतीय और वैश्विक इतिहास, साहित्य और सिनेमा में है। मैं हिंदी कविता और हिंदी लघु कथाएँ लिखता हूँ। मैं अपने ब्लॉग से जुड़ा हुआ हूँ जहाँ मैं विभिन्न विषयों पर अपने हिंदी और अंग्रेजी निबंध और कविताएं रिकॉर्ड करता हूँ। मैंने 2019 में हिंदी कविता पर अपनी पहली और एकमात्र पुस्तक सर्द शब सुलगते ख़्वाब प्रकाशित की है। आप मुझे प्रतिलिपि और कविशाला की वेबसाइट पर पढ़ सकते हैं। मैंने हाल ही में पॉडकास्ट करना भी शुरू किया है। आप मुझे मेरे इंस्टाग्राम हैंडल पर भी फॉलो कर सकते हैं।”

आज प्रस्तुत है आपका एक ज्ञानवर्धक एवं विचारणीय आलेख साहित्य के बदलते “आयाम”!… जन जन तक पहुँचती “कलम”!

☆ साहित्य के बदलते “आयाम”!… जन जन तक पहुँचती “कलम”! ☆ श्री आशीष गौड़

साहित्य क्या है? साहित्य लैटिन शब्द साहित्य से बना जिसका अर्थ है ‘अक्षर’| इसका शब्दिक अर्थ है अक्षरो का उपयोग।साहित्य, पश्चिम में, सुमेर के दक्षिणी मेसोपोटामिया क्षेत्र (लगभग 3200 BC) में उरुक शहर में उत्पन्न हुआ और मिस्र में, बाद में ग्रीस में (लिखित शब्द फिलीशियनों से शुरू हुआ था) और वहां से रोम में फला-फूला। .दुनिया में साहित्य की पहली कृति, जिसे इसी नाम से जाना जाता है, उर के उच्च-पुरोहित एनहेदुआना (2285-2250 ईसा पूर्व) जहां, सुमेरियन देवी इन्ना की स्तुति में भजन लिखे गए थे।

मध्यकाल में, कन्नड़ और शास्त्रीय में साहित्य क्रमशः 9वीं और 10वीं शताब्दी में सामने आया। बाद में मराठी, गुजराती, बंगाली, असमिया, उड़िया और मैथिली में साहित्य सामने आया। इसके बाद हिंदी, फ़ारसी और उर्दू की विभिन्न बोलियों में भी साहित्य छपने लगा।

हिंदी भाषा का पहला साहित्य था पृथ्वीराज रासो जो 1170 ई. में आया |हिंदी साहित्य के इतिहास-लेखन का गंभीर एवं उल्लेखनीय प्रयास पं. रामचन्द्र शुक्ल ने किया था। उनके द्वारा लिखित—हिन्दी साहित्य का इतिहास, यह विषय एक शास्त्रीय पुस्तक है। इसकी शुरुआत में उनकी एक और महत्वपूर्ण कृति-हिंदी शब्द सागर की भूमिका लिखी गई थी।

पहले साहित्य लिखने वाले लोग भाषा के और व्याकरण के प्रकांड पंडित थे |साहित्यकार अनेक लेख और कथा कहानियां लिखते थे जो पुराणिक भारत की, इतिहास से जुड़े या धर्म से मेल खाती कहानी लिखते थे | ये साहित्य सर्व व्यापी नहीं था | साहित्य उस समय सिर्फ उन्ही लोगों ने ही पढ़ा था जो या तो साहित्य से जुड़े थे, साहित्य पढ़ते थे फिर साहित्य पढाते थे | जन साधारण में साहित्य इतना सर्वव्यापी नहीं रहा | जन साधारण सिर्फ धर्म और पौराणिक रीतियों से जुड़ी कहानियाँ ही पढ़ता रहा |इसका एक पहलू यह भी हो सकता है कि पुराण बहिरवर्ती थे और वेद अंतरवर्ती थे | जब सामाजिक सोच बहिर्वर्ती से अंतरवर्ती हुई तभी साहित्य ने भी नई राह पकड़ी |

भारत में साहित्य का इतिहास अत्यंत समृद्ध और विविध है। साहित्य इतिहास , भारतीय संस्कृति, साध्य, लोक कथाएँ और रीति रिवाज़ के साथ गहरा जुड़ा हुआ है। यह अनेक वर्णमाला में लिखी गई है, जैसे कि संस्कृत, हिंदी, अरबी, तमिल, जनजाति, बंगाली, गुजराती, पंजाबी, आदि।

साहित्य एक ऐसा साधन है जो समय के साथ बदलता रहता है, और इसमें समाज, संस्कृति और व्यक्तित्व के मानक आयाम हैं। हिंदी के भाषा साहित्य समाज  इसी दिशा में साहित्य को नए आयामों तक ले गए हैं। प्राचीन काल की उत्पत्ति से लेकर आधुनिकता और विज्ञान के युग तक, हिंदी साहित्य में समाज के लोकतंत्र का चित्रण किया गया है।

जैसी जैसी भाषा बदली और भाषा में नए प्रयोग किए गए वैसे वैसे साहित्य भी बदलता गया|साहित्य धार्मिक और इतिहास कथाओं से बदल कर अब सामाजिक, राजनीतिक और मनोवैज्ञानिक विषयों पर लिखा जाने लगा | बदलते समाज की नई तस्वीर साहित्य का हिस्सा बानी और कथाकारो ने अपने हिसाब से नवीन समय के समाज को सार्थक दिशा की तरफ मोड़ने के लिए जो प्रयोग किया वह भी साहित्य का हिस्सा बन गया |

धीरे धीरे साहित्य बदल रहा था |

प्राचीन काल के साहित्यकार जैसे कबीर, सूर दास और तुलसीदास जी ने जहां भक्ति काल का साहित्य रचा | वही उनके आगे आए रहीम जिन्होंने सत्य, प्रेम और मानवता के मुद्दे को अपने साहित्य में उकेरा | प्रेमचंद के लेखन ने गाव , देहात और समाज के गरीब और पिछड़े वर्ग की रोज़ मर्रा की जीवन गाथा को कहानियों में पिरोया। तो वही निराला, बच्चन, और मुक्ति बोध ने नई धारा को प्रवाह दिया |

आज के युग का साहित्य |

आज के समय के अनुभव, सामाजिक समीक्षा, तकनीकी बदलाव और तरक्की आज के साहित्य के बदलते चेहरे की वजह है |आज की राजनीतिक हवा और क्षेत्रीय समीक्षा भी आज के साहित्य का बड़ा हिस्सा है |आज का साहित्य सर्वव्यापी है | आज के साहित्य और काव्य की लिपि निजी है, और उसका मुख्य कारण कला का विकेंद्रीकरण और कैनवास का लोकतंत्रीकरण है |कविता की लोकप्रियता, लेख में तिरोहित विचारधारा और साहित्य में राजनीति और सामाजिक जागरूकता की खिचड़ी सबके घर परोसी जाए और सबका स्वाद वापस फिर रसोई घर और रसोईये को पता लगे इसका पूरा श्रेय है हैशटैग # की ताकत |

कला का विकेंद्रीकरण और कैनवास का लोकतंत्रीकरण

आज का साहित्य और कला दोनों ही समाज के विभिन्न पहलुओं को व्यक्त करने का एक माध्यम हैं। कला के विकेंद्रीकरण ने आधुनिक कला और साहित्य को नए और अनूठे रूपों में प्रस्तुत किया है, जो समाज में गैहरा परिवर्तन और प्रभाव लाया है।लेखन, फोटोग्राफी, चित्रकला, फिल्म, और ऑडियो-विजुअल मीडिया का एक संगम साहित्य को और भी रोचक और बौद्धिक बना रहा है।

डिजिटल साहित्य इंटरनेट का उपयोग करते हुए, लेखकों और कलाकारों को अपनी रचनाओं और कला को आसानी से व्यक्त करने का अवसर मिलता है। इलेक्ट्रॉनिक साहित्य या डिजिटल साहित्य एक ऐसी शैली है जहां डिजिटल क्षमताएँ जैसे अन्तरक्रियाशीलता, बहु-तौर-तरीके और अलोगोरिदम पाठ का सौंदर्यपूर्ण उपयोग किया जाता है। इलेक्ट्रॉनिक साहित्य के कार्यों को आमतौर पर कंप्यूटर, टैबलेट और मोबाइल फोन जैसे डिजिटल उपकरणों पर पढ़ा जाता है।

ब्लॉग, सोशल मीडिया, और ऑनलाइन प्लेटफ़ॉर्म्स के माध्यम से, साहित्य और कला विभिन्न लोगों तक पहुंच रही हैं।आज के युग में, साहित्यिक आदान-प्रदान भी नए और विविध रूपों में हो रहा है। लेखकों, कवियों, और कलाकारों के बीच विचारों और विचारों का दिमागी तूफान , उन्हें साझा करना और उनके संदेश को बढ़ावा देना आम हो गया है।इस प्रकार, कला के विकेंद्रीकरण और आज का साहित्य एक साथ काम करके, समाज को नए और अनूठे रूपों में सोचने और अनुभव करने का अवसर प्रदान कर रहे हैं। यह उत्कृष्ट साधन है जो विभिन्न पहलुओं को समाहित करता है और समाज के विकास में महत्वपूर्ण योगदान करता है।

हैशटैग # की ताकत

आज के युग में हैशटैग की शक्ति ने साहित्य को फैलाने में बड़ी भूमिका निभाई है। हैशटैग सोशल मीडिया का एक महत्वपूर्ण तत्व है जो किसी भी विषय को वायरल करने और उसे बढ़ाने में मदद करता है। साहित्य के क्षेत्र में भी, हैशटैग एक प्रभावशाली और शक्तिशाली उपकरण है।हैशटैग का प्रयोग करके लेखक और कवि अपने ब्लॉग को सार्वजनिक रूप से साझा कर सकते हैं। यह उन्हें अपने वैज्ञानिक कार्यों को बड़े पैमाने पर लोगों तक पहुंचाने का एक अच्छा माध्यम प्रदान करता है।

इसके अलावा, हैशटैग के माध्यम से लेखक और कवि अपने विचार और दृष्टिकोण को दुनिया के साथ साझा कर सकते हैं, जो शास्त्र समुदाय में वाद-विवाद और साझा दृष्टिकोण को दार्शनिक कर सकते हैं।सोशल मीडिया के दिग्गज जैसे कि ट्विटर, सोशल मीडिया और फेसबुक पर हैशटैग का प्रयोग साहित्य के प्रचार और इसके प्रचार में महत्वपूर्ण भूमिका निभाता है। लेखक, विचारक और कवि अपनी रचनाओ और दृष्टिकोण को हैशटैग के ज़रिये जन साधारण तक पहूचा सकता है ।इस प्रकार, हैशटैग आज के युग में साहित्य को नए आयामों तक पहुँचाने का एक महत्वपूर्ण माध्यम बन गया है। यह आर्टिस्ट और पेंटिंग को अपने थिएटर के साथ साझा करने का एक उत्कृष्ट माध्यम प्रदान करता है।

साहित्य का बदलता आयाम और जन-जन तक पहुंचति कलम का आधार है कला का विकेंद्रीकरण, कैनवास का लोकतंत्रीकरण और हैशटैग की ताकत | इन्ही तीन करणों के साथ आज के लेखक की नई अस्थिर निज्जी लिपि और व्याकरणहिंता के बावजुद साहित्य सर्व व्याप्त है |

©  श्री आशीष गौड़

वर्डप्रेसब्लॉग : https://ashishinkblog.wordpress.com

पॉडकास्ट हैंडल :  https://open.spotify.com/show/6lgLeVQ995MoLPbvT8SvCE

https://www.instagram.com/rockfordashish/

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares