(सुप्रसिद्ध युवा कवियित्रि सुश्री स्वप्ना अमृतकर जी का अपना काव्य संसार है । आपकी कई कवितायें विभिन्न मंचों पर पुरस्कृत हो चुकी हैं। आप कविता की विभिन्न विधाओं में दक्ष हैं और साथ ही हायकू शैली की सशक्त हस्ताक्षर हैं। हमने आपका “साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती” शीर्षक से प्रारम्भ
किया है। आज प्रस्तुत है सुश्री स्वप्ना जी की हायकू शैली में कविता “मोहक थेंब”। )
☆ साप्ताहिक स्तम्भ – स्वप्ना अमृतकर यांची कविता अभिव्यक्ती # -5 ☆
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है उनका एक आलेख -संस्मरण देवकुंड वारी ।)
☆ देवकुंड वारी ☆
वसंतात वसुंधरने
हिरवी शाल ओढली
पावसाच्या अमृत धारेने
अवघी सृष्टी खुलली
कोकण दर्शन तेही पावसाळ्यात करतांना वरिल ओळी सहज सुचुन जातात. आजचे अनुभव हेच उद्याची आठवण बनून रहातात. आणि या आठवण मालिकेचे भाग रोजच अनुभवायला मिळतात. असाच माझा एक अनुभव “देवकुंड वारीचा”. देवकुंड धबधबा तसा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करणारा. आणि आषाढ म्हटला म्हणजे पर्यटकांना ती निसर्ग सफरीची मेजवानीच असते. याच मेजवानीचा आस्वाद मी आणि माझे सवंगडयांनी पुरेपुर घेतला.
मागच्या शनिवारी आमची देवकुंड वारी झाली. माझा मित्र, मित्र काय जिवच म्हणा. मित्र आणि परिवारात भेद न करणारा. आणि घरच्या सदस्यांप्रमाणे मैत्री निभावना-या माणसाला अजुन काय म्हणणार ? तसं उगाच कोणाला महान बनवणारा माझा स्वभाव नाही. पण माणुस जरी योग्य असला तर बनवायला हरकतही नाही. त्याला बनवण्याची गरज नसते. तो असतो. असो.
शनिवार, रविवार दोन दिवस त्यांच्या कंपनीला सुटी होती. या सुटीचा आनंद घ्यावा. म्हणुन त्याने आणि त्याच्या कंपनीच्या मित्रांनी मिळुन हा भन्नाट प्लॅन केला. मला ज्यावेळी मेहुल आणि सागरने सांगीतलं तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता लगेच होकार दिला. कारण नवनवीन ठिकाणी विषेशतः निसर्गरम्य ठिकाणी जाणं आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणं मला खुप आवडते. म्हणुन माझा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी सहाला रूमवरून निघालो. खबरदारी म्हणुन सागरने भेळ घेतली. आणि मेहुलने चटणी-पोळ्या घेतल्या. जवळपास एक तास वाट पाहिल्यानंतर एकतानगरच्या बस स्टॉप वर गाडी आली. आम्ही गाडीत बसलो. वेगवेगळ्या ठिकाणी उभे असलेले आमचे मित्रांना सोबत घेतले. तोपर्यंत नऊ वाजले होते. पुण्याच्या बाहेर एका हाॅटेलवर थांबून नाश्ता केला. आणि नऊ वाजेच्या सुमारास आमची गाडी देवकुंडच्या दिशेने निघाली. बाहेरचं वातावरण पावसाचं होतं. पाऊस अधुन मधुन रिमझीम तर कधी जोरदार पडत होता. वातावरणात गारवा, पर्वत माथ्यावर जमलेले ढग, आणि पृथ्वीच्या पाठीवर पसरलेली हिरवाई असं निसर्गाचं सौदर्य न्याहाळत आम्ही निघालो होतो. दरम्यान एका ठिकाणी गाडी थांबवली. तेथे छानपैकी धुकं जमलं होतं. रस्त्याच्या कडेने पाणी वाहत होतं. तेथे काही वेळ घालवला. फोटो सेशनही झाले. आणि शेवटी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तत्पूर्वी पाटणुस या गावी आम्हाला गावात नुसतं प्रवेश करण्याचे प्रत्येकी दहा रूपये द्यावे लागले. आम्हाला नवल वाटले. पण ‘जैसा देश वैसा भेस’ असं करत पैसे दिले. आणि पावती घेऊन निघालो.
पुढे गेल्यावर गाडी पार्क केली. धबधब्याकडे जाणा-या मुख्य रस्ताजवळ पोहोचलो. तेथे आमच्याही आधी बरीच गर्दी जमा झालेली होती. तेथे जाऊन आम्हाला कळले कि येथेही प्रत्येकी पन्नास रुपयांची पावती घ्यावी लागेल. त्या पावतीसाठी आम्ही बराच वेळ तेथे उभे राहीलो. अगदी बोअर झालं होतं सगळ्यांना. नंतर कसंतरी आम्हाला पावती भेटली आणि शेवटी आमची स्वारी धबधब्याच्या दिशेने निघाली. जाण्यासाठी पायवाट होती. पाऊस सुरू असल्याने चिखल झाला होता. तसाच चिखलाचा कधी दगडाचा तर कधी डोंगरातुन वाहत्या पाण्याचा रस्ता तुडवत जंगलातून आम्ही साधारणतः दिड तासाच्या जंगल सफारीनंतर धबधब्याजवळ पोहोचलो. दरम्यान आमचे काही मित्र दुस-या रस्त्याने पळाले होते. ते पोहोचले तेव्हा आमचं फोटोसेशन सुरू होतं. मेहुल आणि त्याच्यासोबत आलेले मुलं पाण्याच्या पलिकडे होते. म्हणुन पाण्यात उतरलो आणि दुस-या बाजुला गेलो.
सगळेजण सोबत झालो तेव्हा आम्ही पाण्याशी मनसोक्त मस्ती केली. फोटो काढत असतांना तोल जाऊन त्या पाण्यात एक माणुस वाहुनही चालला होता. पण काही दुर वाहत गेल्यावर पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने तो थांबला. त्याला पाण्यातुन काढण्यात आले. आम्हीही पाण्यासोबत खेळून थकलो होतो.
एक तर वरून पडणारे पावसाचे पाणी आणि धबधब्याचे थंड पाणी यांची जुगलबंदी मला महागात पडली. मला खुप थंडी भरली होती. ती एवढी कि मला पाण्याचा एक थेंबही नको वाटत होता. आणि परततांना पुन्हा ते पाणी पार करून पलिकडे जावे लागणार होते. सर्वांनी केलेही. पण मी मात्र जाण्याच्या स्थितीत नव्हतो. मी जेव्हा सागरला म्हटले कि मला खुप थंडी वाजतेय. तेव्हा मला त्याने परत जायला सांगीतले. दोनदा मी पाण्यातुन परत आलो. तेव्हा त्यांच्या कंपनीचे प्रोडकशन मॅनेजर विकास सरांनी मला पाण्याच्या बाहेर काढले. आम्ही परत यायला निघालो. यावेळी रस्त्यात चिखल अधिक झाला होता. आणि जाणा-या येणा-यांची गर्दीही वाढली होती. बाकीची मुलं पुढे पळत निघुन गेले. मागे आम्ही विकास सर, आकाश सर, सागर, सुजीत, मेहुल आणि मी असे काही जण राहीलो होतो.
एका ठिकाणी बसुन आम्ही सोबत आणलेली भेळ आणि पोळीवर ताव मारला. सागरने जेव्हा सांगीतले की कपिल कविता लिहीतो. तेव्हा स्वाभाविकच एखादी चारोळी ऐकायचं मन होतंच तसं विकास सरांनी मला म्हटलंही कि या वातावरणात तुला सुचत असलेली एखादी कविता एकवं. पण खरं तर माझी मनस्थिती तशी राहीली नव्हती. म्हणुन त्यांना चारोळी ऐकवू शकलो नव्हतो.
चिंब भिजलीय पावसात अवनी
झाला आहे हिरवाईचा गजर
उंच अशी ही पर्वतराजीही गुलाबी झालीय
घेऊनी लाजेने ढगांचा पदर
पर्वतमाथ्यावर निर्भिडपणे फिरणा-या ढगांना पाहुन असं वाटत होत कि, एखाद्या नव्या नवरीने लाजुनी डोक्यावर पदर घ्यावा तसा त्या पर्वतावर ते ढग भासत होते. आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे ते सौदर्य अगदी मोहक दिसत होते. आम्ही परत गाडीजवळ आलो. ओले कपडे बदलून कोरडे कपडे घातले. आणि परतीच्या प्रवासाला लागलो. घरी पोहोचायला आम्हाला रात्रीचे साडेबारा वाजले होते. पण दिवसभरात जो अनुभव आला तो अविस्मरणीय होता. अगदी न विसरता येणारा असा. आणि हाच अनुभव उद्याची अविस्मरणीय आठवण बनून नेहमीच स्मरणात राहील…..
इस प्रश्न का विज्ञान सम्मत उत्तर इस वीडियो में दिया गया है।
आनंद के आधुनिक विज्ञान के अनुसार, हमारे जीवन में आनंद तीन बातों पर निर्भर करता है : सेट पॉइंट या निर्दिष्ट बिंदु, जीवन की परिस्थितियां और हमारी ऐच्छिक गतिविधियां।
इस वीडियो में इन तीनों कारकों की व्याख्या की गयी है जिसके बाद जीवन में स्थायी रूप से आनंदित रहने का उपाय आप जान जायेंगे।
जीवन में स्थायी रूप से आनंदित कैसे रहें ?
– जगत सिंह बिष्ट
Founders: LifeSkills
Jagat Singh Bisht
Master Teacher: Happiness & Well-Being; Laughter Yoga Master Trainer Past: Corporate Trainer with a Fortune 500 company & Laughter Professor at the Laughter Yoga University. Areas of specialization: Behavioural Science, Positive Psychology, Meditation, Five Tibetans, Yoga Nidra, Spirituality, and Laughter Yoga.
Radhika Bisht:
Yoga Teacher; Laughter Yoga Master Trainer Areas of specialization: Yoga, Five Tibetans, Yoga Nidra, Laughter Yoga.
(हम प्रतिदिन इस ग्रंथ से एक मूल श्लोक के साथ श्लोक का हिन्दी अनुवाद जो कृति का मूल है के साथ ही गद्य में अर्थ व अंग्रेजी भाष्य भी प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से आप प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू हो सकेंगे। आज प्रस्तुत है उनकी कविता “अबला नहीं सबला ”।
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य – # 7 ☆
(सुश्री कमला सिंह ज़ीनत जी एक श्रेष्ठ ग़ज़लकार है और आपकी गजलों की कई पुस्तकें आ चुकी हैं। आज प्रस्तुत है एक गजल । सुश्री कमला सिंह ज़ीनत जी और उनकी कलम को इस बेहतरीन अमन के पैगाम के लिए सलाम। )
(प्रस्तुत है श्री सुरेन्द्र कुमार अरोड़ा जी की मानवीय संवेदनाओं पर आधारित लघुकथा ‘उदासी’। हम भविष्य में श्री अरोड़ा जी से उनके चुनिन्दा साहित्य की अपेक्षा कराते हैं।)
☆ भूल -भुलैया☆
” क्या हुआ? आज फिर मुहं लटकाए बैठा है. कल तो जिंदगी के सुहानेपन के गीत गुनगुना रहा था.”
” हाँ गुनगुना रहा था क्योंकि कल सुहावनापन था. ”
” मौसम तो आज भी वैसा ही है जैसा कल था.”
” पर आज वो तो नहीं है न! ”
” क्या कल वो थी? ”
” भले ही नहीं थी पर उसने फोन पर कहा था कि वो है.”
” ऐसा तो उसने बहुत बार कहा है? ”
” कल दिन भर मेरे सामने थी पर बात दूसरों से करती रही.”
” यह तो तुम दोनों के बीच बहुत दिनों से होता रहा है तो फिर अब मुहं लटकाने का क्या मतलब?”
” अब मैंने भी तय कर लिया है कि न तो उसका फोन सुनुँगा और न ही उसे फोन करूंगा.”
” तो फिर अब रोना कैसा. छूट्टी खराब मत कर. चल उठ, निकल. कहीं चल कर मस्ती करते हैं.”
” हाँ यही ठीक है, यही करेंगें.”
” वह बिस्तर से निकलने को हो आया कि तभी फोन की ट्यून बज उठी. उसने स्क्रीन पर नजर डाली. ट्यून की लहरों के बीच चमक रहा था “नम्रता कॉलिंग.”
” मित्र ने स्विच आफ करने की ओर हाथ बढ़ाया ही था कि उसने रोक दिया और कुछ देर तक टनटनाती ट्यून को देखने के बाद मोबाईल को कान से लगा कर आत्मीयता से बोला,” हेलो नमु. गुड मॉर्निंग! कैसी हो.”
“…………………………………………..!”
मित्र ने पाया कि यह तो फिर से उसी भूल -भुलैया में खो गया है. इसके पास रुकने का कोई फायदा नहीं है.
(डॉ भावना शुक्ल जी को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। उनके “साप्ताहिक स्तम्भ -साहित्य निकुंज”के माध्यम से अब आप प्रत्येक शुक्रवार को डॉ भावना जी के साहित्य से रूबरू हो सकेंगे। आज प्रस्तुत है डॉ. भावना शुक्ल जी की शिक्षाप्रद लघुकथा “भरोसा”। )
☆ साप्ताहिक स्तम्भ – #5 साहित्य निकुंज ☆
☆ भरोसा☆
आज बहुत अरसे बाद मेरी मुलाकात संस्कृति से हुई, उसे देखकर ऐसा लगा जैसे उसके चेहरे की रौनक चली गई हो। हेलो, हाय सामान्य औपचारिकता के बाद हमसे रहा नहीं गया हमने पूछ ही लिया …
“क्या बात है संस्कृति सब ठीक है न, आज कल तुम पहले की तरह चहकती हुई नहीं दिखाई दे रही।”
“नहीं कोई बात नहीं सब ठीक है।”
“इतने बुझे शब्दों में तो तुमने कभी उत्तर नहीं दिया था, आज क्या हो गया? अच्छा संस्कृति मैं सामने ही रहती हूँ, चलो घर बैठकर बात करते हैं।”
“अब तुम नि:संकोच मुझे बताओ, मैं तुम्हारे साथ हूँ।”
“अब कुछ नहीं हो सकता न ही कोई कुछ कर सकता है, गया हुआ समय वापस नहीं आ सकता।” इतना कहते ही संस्कृति फूट-फूटकर रोने लगी।
हमने कहा “रोओ मत, कहो मन की बात। अब बताओ.”
तुम जानती हो मेरी पक्की दोस्त ख़ुशी को, उसकी नौकरी हमारे ही शहर दिल्ली में लगी। एक रात उसका फोन आया मैं आ रही हूँ, मेरी नौकरी लग गई है बैंक में। यह सुनते ही मैं ख़ुशी से पागल हो गई और कहा – अरे तुम ज़रूर आओ.
मैंने अपने हसबेंड को बताया, ख़ुशी आ रही है। इन्होने भी कहा कोई बात नहीं आने दो तुम्हें भी सहारा मिल जायेगा नए मेहमान आने में ज़्यादा समय नहीं है। मेरी ख़ुशी का ठिकाना नहीं था बहुत बरसों के बाद दो दोस्त मन की बातें करेंगे।
ख़ुशी आई। हमने अपने हसबेंड से मिलवाया, ख़ुशी ने कहा हम आप लोगों की लाइफ को डिस्टर्ब नहीं करेंगे 15 दिनों में हमें घर मिल जायेगा, हम चले जायेंगे। हमने कहा कोई बात नहीं तुम यहां भी रह सकती हो।
एक सप्ताह बाद मेरी तबीयत ख़राब हुई मैं अस्पताल में भर्ती हो गई. डॉ. ने कहा बच्चे को खतरा है, डॉ ने बहुत कोशिश की पर बच्चा खो दिया, पति ने गुस्से से कहा तुमने मेरे साथ बहुत ग़लत किया। मैं करीब 5 / 6 दिन भर्ती रही और यही सोचती रही बच्चा खोने में मेरी क्या गलती है?
अगले दिन घर पहुंची तो आराम करना ज़रूरी ही था, ख़ुशी मेरी बहुत सेवा करती रही, पर पतिदेव बहुत ही रुष्ट नजर आये। हमने उन्हें बहुत समझाने की कोशिश की पर कोई फर्क नहीं पड़ा। ख़ुशी ने कहा कोई बात नहीं सब ठीक हो जायेगा। इसी आशा से रोते–रोते सो गई जब आँख खुली तो कुछ आवाजें सुनाई दी। मैं बाहर हॉल में गई तो देखा पतिदेव ख़ुशी के साथ हाथ में हाथ डाले बैठे थे। मैंने कहा ख़ुशी ये क्या?
ख़ुशी के पहले ही पतिदेव बोल पड़े, साली है आधी घरवाली का दर्जा है।
मैंने कहा, सुबह होते मुझे तुम दिखनी नहीं चाहिए।
अगले दिन सुबह मेरे होश ही उड़ गए जब देखा ख़ुशी तो नहीं गई पर पतिदेव ने कहा संस्कृति इस घर में तुम्हारी कोई जगह नहीं है। ख़ुशी ने मुझे वह ख़ुशी दी है जो आज तक तुमसे नहीं मिली।
ख़ुशी मैंने कभी नहीं सोचा था, तुम मेरी हंसी–ख़ुशी, सुख–चैन सब कुछ छीन लोगी।
मैंने कहा “अरे इतना सब कुछ तुम अकेले झेलती रही और कहाँ रही अब तक?”
“यहीं दिल्ली में अलग रूम लेकर रह रही हूँ मेरा तलाक हो चुका है। उन दोनों ने शादी कर ली है मौज से रहते है।”
“जहां तक मुझे याद है, तुमने लव मैरिज की थी।”
“हां सही याद है।”
“मुझे बाद में पडौसी से पता चला जब मैं अस्पताल में थी तब ही ख़ुशी ने इन्हें अपने कब्जे में कर लिया था।”
“क्या कभी शोभित मिलने नहीं आये या कुछ बोला नहीं, कोई अफ़सोस?”
“अब तो उस शख्स के बारे में सोचना भी नहीं चाहती, सोचकर धोखे की बू आती है।”
“जब जो मेरा अपना था, उसने ही भरोसा तोड़ा तो दोस्त की क्या बिसात?”
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये “कुठे चाललोय आपण? . . . समाज पारावरून . . . !” ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – पुष्प सातवे # 7 ☆
☆ कुठे चाललोय आपण? . . . समाज पारावरून . . . ! ☆
*जमाना बदललाय भाऊ* असं म्हणत प्रत्येक पिढीने सोयीस्कर रित्या आपले रहाणीमान बदलले. चुकांचे समर्थन करण्यासाठी नवे साधन मिळाले. सुनेने सासू ला आत्याबाई सोडून आई म्हणायला सुरवात केली. मामंजीचे पप्पा झाले. पण नात्यातला संघर्ष होतच राहिला. जनरेशन गॅप तशीच राहिली. फक्त तिचे स्वरूप बदलले.
सासुबाई नऊवारी साडीतून पंजाबी ड्रेस मध्ये आल्या. मामंजी धोतरातून सुट बूट, सलवार कुडता अशा पेहरावात आले. नातवंडे मुलांच्या इच्छेने वाढू लागली. वडील धा-यांनी नातवंडांचे फक्त लाड करायचे आणि वेळप्रसंगी आजी आजोबांनी नातवंडांचा संभाळ करायचा एवढ्या परीघात नाती फिरू लागली.
मौज मजा, ऐषोराम, एकमेकांवर केलेला खर्च यात नात्याचा हिशोब होऊ लागला. रक्ताची नाती गरजेपोटी उपयोगात आणण्याचा नवा प्रघात सुरू झाला आणि ग्रामीण भागातील समाज पारावर पिंपळपारावर खळबळ माजली. वृद्धाश्रम आणि पाळणाघर यांना काळाची गरज आहे अशी शहरी लोकांनी दिलेली मान्यता गावातील वृद्धांना घातक ठरू लागली. गावातल्या गावात एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांची दोन घरे झाली. शेतातल घर अर्थातच म्हाताऱ्याच्या वाट्याला आले. आणि गावातील घर दुमजली होऊन दोन भाऊ स्वतंत्र दोन मजले करून वरती खाली राहू लागले. शेती करण्यासाठी पगारी मजूर बोलावताना जुनी पिढी हळहळली पण त्याच वेळेस आलेले उत्पन्न वाटून घेताना उगाचच कुरकुरली.
समाज पारावर देखील अनेक बदल घडत आहेत. माणूस माणसापासून दूर जातो आहे. आणि याला कारणीभूत ठरला आहे तो पैसा. बदलत्या जमान्यात *माणूस ओळखायला शिकले पाहिजे* हेच वारंवार कानी पडते. हा माणूस ओळखायच्या स्पर्धेत आपण मात्र कंपूगिरी करत आहोत. आपल्या उपयोगी पडणारा तो आपला. गरज सरो नी वैद्य मरो या उक्ती प्रमाणे आपल्या माणसाची व्याख्या बदलते आहे. बदलत्या काळात जात पात धर्म भेदभाव नष्ट होत असले तरी आर्थिक विषमता हे मूळ माणसामाणसात प्रचंड दरी निर्माण करीत आहे. ही विघातक दरी जनरेशन गॅप पेक्षा ही विनाशकारी आहे.
आपण सर्व जण ज्या मार्गाने जात आहोत त्या मार्गावर वाडवडिलांचे आशिर्वाद, संस्कार अभावानेच आढळतात. पण महत्व कांक्षी विचारांना पुढे करून स्वार्थाला दिलेले अवाजवी महत्त्व माणसाला एखाद्या वळणावर तो एकटा असल्याची जाणीव करून देत आहे.
माणूस किती शिकला? काय शिकला? यापेक्षा तो आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे का याची चर्चा माणसातला आपलेपणा नष्ट करते. बसा जेवण करूनच जा असा आग्रह करणारे आज फालतू कारणे शोधून बाहेर हाॅटेलमध्ये स्नेहभोजनाचे जंगी बेत आयोजित करतात यातून व्यवहार सांभाळत पुढे जायचे हा कानमंत्र एकमेकांना देत ही कंपूगिरी समाजात एकमेकांना धरून रहाते.
मन दुखावले की नाती संपली. भुमिका बदलल्या. पात्रे बदलली. पैसा सोबत असला की माणसांची गरज नाही. पैशाने माणूस विकत घेता येतो हा विचार करत सर्व जीवन प्रवास चालू आहे. संवाद माध्यमातून प्रबोधन करणारी पिढी समोरासमोर आली तरी ओळख दाखवताना दहा वेळा विचार करून ओळख दाखवते अशी सद्य परिस्थिती आहे. नवीन पिढीला आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करून देताना आपण आपल्याच लेकरांना चार भिंतीची ओळख करून देतो पण त्या भिंतीवर असणाऱ्या छप्पराचे , त्या चार कोनाचे कौटुंबिक महत्त्व सांगायला विसरतो.
नव्या वाटेने चालताना जुन्या आठवणींना उजाळा देणारे प्रसंग घडतात. तेव्हा आपली माणसे आपल्या सोबत असावीत. नव्या जमान्यात वावरताना आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपला जीवनप्रवास ह्रदयापासून ह्रदयापर्यत व्हायला हवा इतके जरी आपण ठरवले तरी मला वाटत आपण माणसांना घेऊन, माणसासोबत आपला जीवन प्रवास सुरू ठेऊ. होय ह्रदयापासून ह्रदयापर्यत.