हिन्दी साहित्य – आलेख ☆ इंसान पीढ़ियाँ और सोशल साइट्स ☆ श्री सूरज कुमार सिंह

श्री सूरज कुमार सिंह 

 

? इंसान पीढ़ियाँ और सोशल साइट्स ?

कहकर की संचार क्षेत्र मे क्रांति तुमने लाई है,

बिछुड़े मिलाए जानकारी पहुँचाये ऐसी चीज़ बनाई है।

 

तार, खत, टेलिफोन आदि सब को पीछे छोड़ आई है,

जो वस्तु सबके द्वारा सोशल साइट कहलाई है। 

 

ईमोटिकाॅन, शॉर्टकट शब्दावली ने शुद्ध भाषा मिटाई है,

अंतर्मुखी भी चैट करें ऐसी बेला आई है।

 

टेलिकॉम सेवा वाले सस्ते डेटा बरसाए हैं,

किताब-कलम छूटी हाथों से अब जो स्मार्टफोन आए हैं।

 

और तो और कोरोना की कैसी घड़ी यह आई है,

सोशल साइट्स की आंधी अब तो हर दिशा मे छाई हैI

 

आया जो फोन मे सोशल मीडिया रिश्तेदार मानो कोई आया है,

नए- नए विचार, प्रसंगों की बहार जीवन मे लाया है।

 

आया हुआ रिश्तेदार परंतु लेकर बहुत कुछ जाएगा,

नफरत और फ़िरकेबाज़ी मे सबको यह उलझाएगा।

 

जोड़ कर इन्होंने रिश्ते दो तोड़े हैं दो हज़ार

दूर हो गए वो जिनसे करते थे कभी हम प्यार।

 

समय और निजी  डेटा हमारे ऐसे चुराएँ हैं,

कर्ज़ किसी जन्म के जैसे हमने इनसे खाए हैं।

 

करना प्रयोग अवश्य इनके पर यह गौर फरमाना

मत देना चाबी जीवन की, नही तो भ्रष्ट हो जाएगा ज़माना।

 

© श्री सूरज कुमार सिंह

रांची

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 13 (51-55)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #13 (51 – 55) ॥ ☆

सर्गः-13

मुनिपत्नी अनसूया ने तापस जन स्नान।

हेतु त्रिपथगा गंगा का किया प्रवाह विधान।।51।।

 

निष्कम्पित तरू यहाँ के ऋषिगण सम ध्यानस्थ।

लगते जैसे योग में है सबके सब व्यस्त।।52।।

 

सफल यहाँ वटवृक्ष वह तव प्रार्थित तत्काल।

पद्यराग मणि सम फलों से शोभित खुशहाल।।53।।

 

देखो सीते! गंगा छवि नील यमुन से भिन्न।

कहीं जो उजली यष्टि सी नीलम जटित प्रसन्न।।54।।

 

कहीं नील संग सित कमल की माला अभिराम।

या मानसप्रिय हंसदल, श्वेत बीच ज्यों श्याम।।55।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ मार्च – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ५ मार्च –  संपादकीय  ? 

हरी नारायण आपटे

अर्वाचीन मराठी वाङमयाचे जनक, विशेषत: मराठी कादंबरी आणि लघुकथांचे जनक हरी नारायण आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ मध्ये झाला. पूर्वापार चालत आलेल्या लेखनापेक्षा अगदी वेगळ्या प्रकाराचं लेखन त्यांनी केलं. त्याचा प्रभाव पुढल्या लेखकांवर पडला म्हणून त्यांच्या कालखंडाला हरिभाऊ युग असे म्हणतात आणि हरीभाऊंना युगप्रवर्तक.

हरिभाऊंनी १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक कादंबर्या् लिहिल्या. याशिवाय २ स्वतंत्र नाटके, ३ रूपांतरित नाटके व ३ प्रहसने लिहिली. त्यांच्या सामाजिक कादंबरीत तत्कालीन सामाजिक, राजकीय, संस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडवते. त्यांच्या कादंबर्यां स्त्रीकेन्द्रित आहेत. स्त्रियांच्या दु:खाला वाचा फोडणे, हेच त्यांच्या कादंबरीचे सूत्र आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनुषंगाने निर्माण झालेली पुरुष जातीची व समाजाची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता त्यातून व्यक्त झाली आहे.

ह. ना आपटे ‘ज्ञानप्रकाश’ मासिकाचे काही काल संपादक होते. ‘आनंदाश्रम’ या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकही होते. ‘करमणूक’ या मासिकाचे संस्थापक सदस्य होते. केशवसुतांची कविता व गो.ब.देवल यांचे संगीत शारदा हे नाटक हरिभाऊंनी प्रकाशात आणले. त्यांनी अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना लिहिल्या. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली त्यांनी भास्कराचार्याँची लीलावती , राणी दुर्गावती इ. ची बोधप्रद माहिती प्रकाशित केली.

ह. ना. आपटे यांची काही महत्वाची पुस्तके – सामाजिक – १. पण लक्षात कोण घेतो? २. जग हे असे आहे. ३. चाणाक्षपणाचा कळस, ४. मधली स्थिती ५. मायेचा बाजार, ६. मी, ७. यशवंत खरे

यापैकी ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी कादंबर्यां चा मानदंड मानली जाते. १. ऐतिहासिक पुस्तके – १. उष:काल, २. केवळ स्वराज्यासाठी, ३. गड आला पण सिंह गेला, ४ चंद्रगुप्त व चाणक्य, ५ वज्राघात, ६. सूर्योदय, ७. रूपनगरची राजकन्या याशिवाय स्फुट गोष्टी भाग १ ते ६ हे त्यांचे कथा संग्रह आहेत, तर संत सखू व संत पिंगळा ही नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘हरीभाऊंची पत्रे ‘ म्हणून त्यांच्या पत्रांचेही संकलन, ससंपादन झाले आहे.

अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

ह. ना. आपटे यांच्या संबंधीची काही महत्वाची पुस्तके –

१. आलोचना – ह. ना. आपटे विशेषांक (१९६३)

२. ह. ना. आपटे चरित्र – रा.भी. जोशी

३. ह. ना. आपटे चरित्र व वाङ्मय विवेचन – वेणूताई पानसे

४. ह. ना. आपटे संक्षिप्त चरित्र – बापूजी मार्तंड आंबेकर

५. ह. ना. आपटे निवडक वाङ्मय- साहित्य अकादमी – संपादक विद्याधर पुंडलिक

६ हरिभाऊ आपटे – आत्मचरित्रात्मक कादंबरी- मी – डॉ. रेखा वडीरतार्य

☆ ☆ ☆ ☆ ☆

डॉ. नारायण गोविंद कालेलकर

डॉ. नारायण गोविंद कालेलकर हे मराठी भाषिक भाषावैज्ञानिक होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९०९चा. ५०च्या दशकात भाषाविज्ञान या विषयाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या लेखकांनी या विषयावर मराठीतून लिहायला सुरुवात केली. भाषेचा भाषा म्हणून वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येणारा अभ्यास या अर्थी भाषाविज्ञान ही संज्ञा आज वापरण्यात येते, त्या प्रकारच्या अभ्यासाचा प्रारंभ त्या काळात झाला. नव्या अभ्यास शाखेचा परिचय करून देणारे लेखन मराठीत करणार्याा लेखकांपैकी डॉ. कालेलकर हे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

फ्रेंच भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते सायाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती मिळवून पॅरीसला गेले. तिथून परतल्यावर बडोदायेथील महाविद्यालयात तसेच विद्यापीठात फ्रेंच भाषा, साहित्य आणि भाषाशास्त्र हे विषय शिकवले.

कल्चरल एक्स्चेंज फेलो म्हणून ते पुन्हा पॅरीसला गेले. तेथील विद्यापीठात त्यांनी ‘ऋद्धिपूर’ वर्णनावरचा ( हा महानुभाव ग्रंथ आहे.) आपला प्रबंध फ्रेंचमधे सादर केला व डी. लिट. मिळवली.

१९५५-५६ ला रॉकफेलर प्रतिष्ठानची ज्येष्ठ अभ्यासवृत्ती मिळवून ते अमेरिकेत गेले. तिथे येल विद्यापीठात भाषाविज्ञान विभागात त्यांनी अध्ययन केले.
पुण्याच्या डेक्कन कॉलेज – पदव्युत्तर व संशोधन संस्था इथे इंडो-आर्यन भाषांचे ते प्रपाठक होते. नंतर याच संस्थेत भाषाविज्ञान विभागाचे ते प्रमुख झाले.

लेखन- संपादन

सायाजी साहित्य मालेचे २४६वे पुष्प म्हणून रिचर्ड फिक यांच्या जर्मन ग्रंथाचा डॉ. शिरिष कुमार मैत्र यांनी केलेल्या इंग्रजी अंनुवादावरून ‘बुद्धकालीन भारतीय समाज’ हे पुस्तक लिहिले.

१. ध्वनीलहरी, २. भाषा आणि संस्कृती, ३. भाषा, इतिहास आणि भूगोल ही त्यांची भाषाविज्ञान या ज्ञानशाखेची तोंडओळख करून देणारी पुस्तके.
त्यांनी भाषाविषयक पुस्तकांची परीक्षणेही लिहिली. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत त्यांनी लेखन केले.

आधुनिक मराठी वाङ्मयाचे जनक असलेल्या ह. ना. आपटे आणि मराठीतील भाषाशास्त्राचे पंडीत डॉ. नारायण गोविंद कालेलकर यांच्या कार्याला शतश: प्रणाम.?

 

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आभाळाची सरते माया… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आभाळाची सरते माया… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त: वनहरिणी)

आभाळाची सरते माया अन् भूमीही हो अनुदार

पत्ता शोधित खुद्द स्वतःचा,फिरे अधांतर दारोदार!

 

बरीच बाकी तपोसाधना,खूप दूर ती अजून सिद्धी

अर्ध्यामुर्ध्या हळकुंडाने नकोस होऊ पिवळा फार!

 

दोनचार त्या तुटल्या फांद्या, अजुन मुळावर घाव कुठे

रान माजले विषवृक्षांचे, अवतीभवती अपरंपार !……

 

जिंकलीस तू चकमक केवळ,अंतिम रण ते अजून बाकी

रणझुंजारा! अजून तुजला झेलायाचे बरेच वार !…….

 

विश्वासाच्या होती चिंध्या,कृतघ्नतेचे डसती नाग

कंठी होता दाह विषाचा,जटेत घ्यावी गंगाधार !…

 

दिवसाढवळ्या डोळ्यांदेखत,इथे खलांचा नंगानाच……

संत महात्मे साधू सज्जन, किती उदासिन किती लाचार!

 

सप्तसुरांच्या मैफिलीत ह्या, नादब्रह्म कुणि आहे अळवित

कुणी न श्रोता कुणी न दर्दी, फक्त पोरके शून्य अपार !…..

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 92 – नाहकता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 92 – नाहकता ☆

शब्दांची गर्दी हवी कशास नाहकता।

शब्दाविना वाढते भावनांची सुंदरता ।।

 

एक आर्त नजर तुझी खुप काही सांगते ।

लपलेली व्यथा तुझ्या नजरेतून जाणवते

मूक कटाक्ष सुद्धा तुझा घायाळ करतो पुरता।।१।।

 

समाधानाची ढेकर अशी दाद देऊन जाते।

आर्धी उष्टी खीर तुझी माझी काळजी सांगते ।

कपभर चहा ने तुझ्या शीण जातो पुरता ।।२।।

 

रुसवे-फुगवे सारे तुला शब्दाविना कळतात।

पश्चातापाचे भाव तुझ्या नजरेतच उमटतात ।

सुगंधी गजराही पुरतो मग मध्यस्थी करता।।३।।

 

विश्वासची ढाल तुझी लढण्याचे बळ देते।

नित्य अशी साथ तुझी अखंड मला लाभते।

कौतुकाच्या थापेलाही भासे शब्दांची नाहकता।।४।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त्ताने…. सकाळपासून मोबाईल वर भाषा दिनानिमित्त चे विशेष वाचताना सहज लक्षात आलं ! महाराष्ट्राची प्रमाणित मराठी भाषा म्हणून जी आपण वापरतो ती पुस्तकातील भाषा ! पण बोली भाषा दर पाच मैलागणिक बदलते असे पूर्वी पासून ऐकून आहे! त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा देश, कोकण, खानदेश,वर्हाड या प्रत्येक भागातील मराठी आपले वेगळेपण दाखवते!

मी महाराष्ट्रातील या सर्व भागात थोडा थोडा काळ राहिले आहे.आणि अनुभवली आहे वेगवेगळी मराठी भाषा.मिरज- सांगली तील भाषेवर कर्नाटक जवळ असल्याने कानडी भाषेची छाप दिसून येते.प्रत्येक वाक्यात शेवटी ‘की’ चा उपयोग!’काय की,कसं की..इ.’खानदेशाजवळ गुजरात राज्य असल्याने तेथील मराठीत गुजराथी, अहिराणी भाषेचे शब्द आपोआपच येतात!

तर नागपूर च्या मराठी भाषेत हिंदी शब्दांचा वापर जास्त दिसून येतो.’करून राहिले, बोलून राहिले,होय बाप्पा’ असे शब्द प्रयोग वर्हाडी भाषेतच दिसतात!

भाषेचा प्रवास हा असाच चालतो.व्यवहारात,बोली भाषेत अशी भिन्नता दिसत असली तरी पुस्तकी भाषा ही साधारणपणे एकच असते. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून संस्कृतमधील भगवद्गीता त्याकाळात प्राकृत मराठीतून लिहिली पण आपण आता ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर ती भाषा आपल्याला पुष्कळ वेळा कळत नाही. त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ लागत नाहीत! त्यातील भाषेचे सौंदर्य कळायला पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात!

काळानुरूपही भाषा बदलत असते.लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच माध्यम असल्याने आई जे शब्द उच्चारेल तेच ते बाळ बोलते. म्हणून मातृभाषेचे महत्त्व फार आहे!आपण कितीही शिकलो, वेगवेगळ्या देशात गेलो तरी कोणतीही तीव्र भावना व्यक्त करताना आपण मातृभाषेतून च बोलतो.आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना शब्द संपदा कधी अपुरी पडत नाही! ओष्ठव्य, दंतव्य, तालव्य, कंठस्थ..

अशा सर्व प्रकारच्या अक्षरांनी ती संपन्न आहे! मराठी भाषा आपल्या शरीर मनाशी एकरूप झालेली असते.म्हणून ती मातेसमान आहे. त्या मराठी भाषेला आपण जतन केले पाहिजे,   

मराठी दिनासाठी ची शुभेच्छा!

एक  मराठीप्रेमी…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्हिलचेअर…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ❤️

? व्हिलचेअर…. अनामिक ? प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

विवियाना मॉल मध्ये रविवारी संध्याकाळची वेळ म्हणजे तरुणांची गर्दीची वेळ.. त्यांचा चिवचिवाट, भरलेले कॉफी हाऊसेस, सेल्फी टाईम.

अशा गर्दीच्या वातावरणात चटकन नजर गेली ती एका व्हीलचेअर वर एका आजीबाईंना प्रेमाने नेणारा एक माणूस आणि सोबत 12-13 वर्षाचा एक मुलगा.. मी आणि माझी मैत्रीण तिथे एका बाजूला बाकावर बसलो होतो. आम्ही बघत होतो.. व्हीलचेअर ढकलत तो माणूस त्या आजीबाईंना इकडून तिकडे नेत होता आणि त्याचा मुलगा ही त्याच्या सोबत होता..

 5 मिनिटांतच तो माणूस त्या आजींची व्हीलचेअर आमच्या अगदी बाजूला आणून उभं करून त्या मुलाशी इंग्रजीत बोलत होता. “मी ATM मधून पैसे काढून 1, 2 कामे करून येतो, तू आजी जवळ थांब” असं सांगून निघून गेला.

त्या आजी आमच्याकडे थोडं बघून हसल्या.. दोन – तीन मिनिटं गेली आणि हिंदीत मला सांगू लागल्या.. “हा माझा नातू. मुलाचा मुलगा, आणि तो गेला नां पैसे काढायला तो माझा मुलगा.. आम्ही ठाण्यातच राहतो.. आज ‘सुईधागा’ सिनेमा बघायला आम्ही आलो. सुनेला तिच्या कॉलेज ग्रुप बरोबर बाहेर जायचं होतं, मग माझ्या मुलांनी आमचा हा बेत जुळवून आणला..”

नकळत माझ्या तोंडून “अरे वाह!”  निघून गेलं..

आजी पुढे सांगू लागल्या… माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत..

अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजिचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्या बद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.

आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉल मध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. ‘बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'”

हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, “कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?”

आजीबाईंनी लगेच सांगितलं, “यहिपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।”

मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.

ते म्हणाले, “आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्बेत चांगली राहायला मदतच होते ना.”

आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, “माझ्या आईला तुमची सोबतच झाली” म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..

कुठे ही परिस्थिती नी कुठे ‘आईवडील नकोत’ ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात..  समाजात एकाच परिस्थिती बाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.

वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी ‘आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा’ ही भावना..

अशी ही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हां दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि किती तरी वेळ आम्ही शांत पणे त्या तिघांच्या पाठमोर्‍या आकृती कडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही…

@अनामिक.

??️?

सुश्री संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हॅलेन्टाइन… डॉ सुनिता दोशी ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ व्हॅलेन्टाइन… डॉ सुनिता दोशी ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆ 

कॉलेजमधील निरोप समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने चांगला रंगला …अचानक वक्त्याने प्रश्न विचारला,” मुलांनो तुमच्या जीवनात ‘व्हॅलेंटाईन’ या शब्दाला किती महत्त्व आहे? तुमचं ‘व्हॅलेंटाइन’ कोण आहे …. असा कधी विचार केलाय का?”… मुलांमध्ये खसखस पिकली .अरे हा काय प्रश्न झाला ?….आणि असेल कोणी व्हॅलेंटाईन …..तरी यांना सांगायचं की काय ?

……आणि तेही या व्यासपीठावर ?

एका वात्रट मुलाने मोठ्याने विचारले,” सर ,तुमचा व्हॅलेंटाइन कोण ?”

आता मात्र चांगलाच हशा पिकला… पाहुणे हसले…

“अगदी खरं सांगायच तर कोणीतरी मलाही विचारावं म्हणूनच मी हा प्रश्न विचारला होता …!”

पुन्हा जोरदार हशा….!

“आता सांगतो ,माझं जीवन हेच माझं ‘व्हॅलेंटाईन’ ज्यावर मी मनापासून प्रेम करतो….. नव्हेतर मी त्याच्या प्रेमातच पडलो आहे ….!जी आपली ‘व्हॅलेंटाईन’ , तिला जर आपण गुणदोषांसहित स्वीकारले तरच जीवन सुंदर होतं …अन्यथा ‘अर्ध्यावरती डाव मोडला ‘हे ठरलेलंच ….!तसेच जीवनातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी , घटना ,व्यक्ती ह्यांच्यासहित मी माझ्या जीवनाला स्वीकारलं आहे… मी जणू माझ्याच जीवनाच्या गळ्यात गळा घालुन गातो , नाचतो आणि रडतो देखील….!”

‘वाह क्या बात है….!

प्रत्येकाने मनापासून दाद दिली. व्हॅलेंटाईन म्हटले, की डोळ्यापुढे येते ती एखादी व्यक्ती …..जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो… विषेशतः प्रियकर… प्रेयसी किंवा पती-पत्नी… आयुष्याचा जोडीदार… वगैरे…! फारच विशाल मन असेल तर एखादी आदर्श व्यक्ती….

पण हे उत्तर मात्र अनपेक्षित होतं… विचार करायला लावणारं आणि तितकंच सुंदर होतं….!

खरंच आपण आपल्या जीवनावर प्रेम करतो का ?किंवा असं म्हणूया की आपण आपल्या जीवनाच्या प्रेमात पडतो का?…. प्रेमात पडणं तर दूरच…! पण मला यापेक्षा कितीतरी जास्त मिळायला हवं होतं ,ते मी डिझर्व करतो….! पण नशिबापुढे काय ?..असं म्हणत जीवनाचं जणू एकओझं ओढत  असतो आपण….! ‘आयुष्य ओघळुनी मी रिक्त हस्त आहे …!’अशीच अनेकांची स्थिती….!

आपल्या जीवनाच्या प्रेमात पडणारे जीवनाला सुख दुःखा सहीत स्वीकारणारे किती जण असतील बरं….?

विचार करता करता  मला एक व्यक्ती आठवली ,ती म्हणजे लहानपणी आमच्या घरी झाडलोट करणारी आवडाबाई! ही आवडाबाई एक रस्ता झाडणारी बदली कामगार होती रोज पहाटे हजेरीला जायचं.कोणी रजा घेतली तर, तिला काम मिळायचं …!नाही तर पुन्हा घरी येऊन इतरांची धुणी-भांडी झाडलोट अशी काम करायची..! महिन्यात सहा -सात बदल्या मिळायच्या ..! पण त्यासाठी दररोज हजेरीला मात्र जावं लागायचं …तेही सहा किलोमीटर चालत..! नवरा दारुड्या ,त्यामुळे “पैसे दे” म्हणून बायकोला मारहाण वगैरे नित्याचंच झालेलं…!पण अशा परिस्थितीतही आवडाबाई खूपच आनंदी असायची. तिचं आणि माझ्या आईचं चांगलं जमायचं !आवडाबाईला तिच्या नोकरीचा फार अभिमान…! अभिमान म्हणण्यापेक्षा भारी कौतुक..!

तिची नोकरी आणि त्याचं वर्णन ऐकणारा एकमेव श्रोता म्हणजे माझी आई! ती सगळं वर्णन करून सांगायची ,”साहेबानी ‘आवडाबाई ‘म्हटलं, की आपण म्हणायचं ‘हाजिर साहेब’म्हणायचं अशी आमची हजेरी असते..!” सरकारकडून मिळणारं साबण,  झाडू ,पाटी वगैरे सगळं तपशिलासह आईला ऐकवायची ती….! पगाराच्या दिवशी नवरा मारहाण करायचा, पैसे मागायचा… पण तो दिवस संपला की दुसर्‍या दिवशी मारहाणीच्या खुणा अंगावर एखाद्या दागिन्याप्रमाणे मिरवत गाणं गुणगुणत कामावर हजर….!

एकदा असंच नवऱ्याने मारलं… बिचारी रडत रडत कामावर आली… मंगळसूत्र काढून टाकलं , पांढरं कपाळ…खूप शिव्या दिल्या नवऱ्याला….!खूप रडली..!

दुसऱ्या दिवशी आमच्या घरी हळदीकुंकू होतं …ही पठ्ठी सगळं विसरून हजर..! छान ठेवणीतलं लुगडं.. कपाळभर कुंकू…डोरलं…. असा थाट !उखाणाही घेतला तिने…’आजघरात माजघर माजघरात पलंग पलंगावर सुरी…सुरी गेली सरकुन…रंगरावच्या हाताखाली पाचशे कारकून…’

‘अरे बाप रे इतके…?’ आम्ही मुलं  फिदीफिदी हसायला लागलो…! आई डोळ्यानेच दटावलं. “कसाही असला तरी  कुंकवाचा धनी आहे माझ्या…!”ती गोड अशी लाजली….

असाच एक प्रसंग… आईबरोबर बाजारात जायचं होतं, बरंच सामान आणायचंअसल्याने आवडाबाई बरोबर होतीच .रिक्षातुन आमची वरात निघाली… नेमकी रिक्षा ज्या भागातून जात होती ,तो आवडाबाईचा झाडायचा प्रभाग होता ..!आवडाबाईला कोण आनंद…”अगं बया.. हा तर माझाच ‘वेरिया’ हे बघा वहिनी या झाडापासून माझी हद्द सुरू होते ..पार त्या शाळेपर्यंत माझीच हद्द …हा भाग पण  माझाच….!

एखाद्या राजाने  आपल्या राज्याच्या सीमा दाखवाव्या त्या थाटात आवडाबाई तिचा ‘वेरिया’अर्थात ‘एरिया’ दाखवत होती.आई पण कौतुकाने “अगोबाई ,हो का ?”म्हणत तिच्या आनंदात सहभागी झाली होती .मला भारी गंमत वाटत होती. घरी आल्यावर मी आईला चिडवत होते.., “काय म्हणते तुझी मैत्रीण? चांगलीच मैत्री आहे का तुझी आवडाबाईशी…”                       

तशी आई म्हणाली,” अगं त्या आवडाबाईकडून शिकण्यासारखी एक गोष्ट लक्षात ठेव… जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि  जीवनावर प्रेम करण्याची वृत्ती…! जीवनाच्या सारीपाटावर पडलेलं दान माझ्या मनासारखं नाही म्हणून जीवनाला नावं ठेवणारे बरेच असतात… पण जे दान पडलं तेच माझं आहे…असं म्हणून त्या चांगल्या वाईट दानासह   जीवनाला आनंदाने कवटाळणारे आवडाबाई सारखे थोडेच असतात…!

व्हॅलेंटाईन म्हणजे काय हे आवडाबाईला माहीत नव्हतं आणि आईलाही…!  पण जीवनाला व्हॅलेंटाईन कसं बनवायचं हे त्यांना माहीत होतं…! आपलं जीवन हेच आपलं व्हॅलेंटाईन हे  मला नव्याने प्रत्ययाला येत होतं…!

 

डॉ सुनिता दोशी✍️

संग्राहक — ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पहिलं- श्रोत्यांनाही कविता आवडतात, हे त्यांच्या प्रतिसादावरून म्हणजे टाळ्यांवगैरे वरून कळत होतं. आता इथून पुढे – ) 

मी – पण काय ग, काव्यक्षेत्रात तू अशी स्थिरावली असताना, तू एकदम कविता करणं बंद कसं केलस?

उज्ज्वला – मी बंद केलं असं नाही, कविता माझ्या हातून निसटून गेली. माझं जसं गद्य लेखन वाढलं, ललित, वैचारिक लेख, व्यक्तिचित्रण , पुस्तकावरील अभिप्राय, तसतशी कविता माझ्यापासून दूर जाऊ लागली. मी १९७० मध्ये सांगलीला डी.एड. कॉलेजमध्ये नोकरीला लागले. कॉलेज मुलींचं, वसतिगृहयुक्त होतं. तिथे वेगवेगळ्या गावाहून, बर्या चशा खेड्यातून मुली राहायला यायच्या. त्या प्रत्येकीचे प्रश्न वेगळे, समस्या वेगळ्या, कथा-व्यथा वेगळ्या. त्यांच्या बोलण्यात मला कथांची बीजे दिसायची. पुढे मी कथा लिहायला लागले.

मी – कधीपासून बरं? आठवतय?

उज्ज्वला – साधारण १९७६पासून मी कथा लिहायला लागले. याशिवाय आसपास घेतलेल्या अनुभवातूंही मला कथाबीजे मिळाली आहेत.  मी तुला २-३ अनुभव सांगते. म्हणजे मी तिथे नोकरी करत नसते, तर तशा कथा माझ्याकडून लिहून झाल्या नसत्या असं मला तरी वाटतं.   मी – सांगच! नाही तरी मी तुला तुझ्या कथांबद्दल विचारणारच होते.

उज्ज्वला – आता साल माझ्या लक्षात नाही. आमच्या कोलेजमध्ये राधा नावाची मुलगी होती. ती पूर्व प्राथमिककडे होती. त्यावेळी शासनाने पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक असे २ भाग केलेले होते.

पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडीचे आणि इ. १ ली ते ४ थी पर्यन्त शिकवणार्याा शिक्षिका तर प्राथमिक म्हणजे इ. १ली ते ७वी पर्यन्त शिकवणार्याण शिक्षिका. मुली म्हणायच्या डी.एड. झालं की राधाची नोकरी पक्की. ‘कसं काय?’ मी विचारलं. इतर मुलींच्या बोलण्यातून कळलं, तिच्या गावात बालवाडी आहे. एक बाई त्या चालवतात. पण त्या ट्रेंड नाहीत. त्यामुळे सरकारी अनुदान नाही. तिढा खराच होता.  राधाचे सासरे सरपंच आहेत. त्यामुळी राधाची नोकरी नक्की. माझं मन मात्र  तिच्यापाशी रेंगाळत होतं, जी आजूनपर्यंत तिथली बालवाडी चालवते आहे.   राधा डी.एड. झाली की तिला शाळेत शिक्षिकेची नेमणूक द्यायची, म्हणजे शाळेला सरकारी अनुदान चालू होईल. शाळेच्या विकासासाठी अनुदान आवश्यकच होतं. पण, जिने ३-४ वर्षं काटकसरीत आणि कमी पगारात शाळा चालवली होती, तिचं काय?  त्यातून माझी ‘पायाचा दगड’ ही कथा लिहिली गेली. मराठी आणि हिन्दी दोन्ही भाषांच्या वाचकांना ती आवडली.

मी – खरं म्हणजे याच सुमाराला तू मुलांसाठीही कथा लिहिल्यास नाही का?

उज्ज्वला – हो. त्यालाही एक कारण झालं. शासनाच्या लघुशोध प्रकल्पाच्या माहितीचं एक सर्क्युलर आलं होता. त्यात एक विषय होता, किशोर मासिकाच्या ५ वर्षांचा अभ्यास व सुधारणेसाठी शिफारसी. विषय छान होता. किशोरचे ६० अंक वाचून होणार होते. म्हणून मी हा प्रकल्प निवडला. तो वर्षभरात पूर्ण केला. तो करता करता मुलांसाठी गोष्टी लिहायला मला सुचल्या. तसंच आणखी एक गोष्ट दिसली. मुलांसाठी लिहीलेल्या नाटिका कमी आहेत. मग मी नाटिकाही लिहिल्या. माझी नाटीकांची ५ पुस्तके झाली. त्यापैकी गवत फूल गात राहिलेला बाल कुमार साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला.

मी – तुझी एकूण बलवाङ्मायाची किती पुस्तके झाली आणि पुरस्कार कुणाला मिळाले? माझी बालवाङ्मयाची ३०-३२ पुस्तके झाली. दोन दोन आवृत्याही निघाल्या. त्यात कथा, नाटिका, चरित्र, भौगोलिक , कादंबरी, कविता सगळ्या प्रकारची आहेत. त्यात ‘गरगर गिरकी ‘ या कविता संग्रहाला साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा व ‘बदकाचे बूट’ ला बाल कुमार साहित्य संमेलनाचा आणि द्क्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळाला.

मी – डी.एड.ल असताना एका संस्थाभेटीतूनही तू कथा लिहिली होतीस, नाही का?

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माधवी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ माधवी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : माधवी

महाभारत वाचताना अनेक अनुकंपनीय दुर्दैवी स्त्रिया भेटल्या. पण माधवीच्या जीवनाचा संघर्ष, त्याग, आणि परवड पाहून हृदय हेलावून गेलं.

ययाती आणि देवयानी यांची अत्यंत सुस्वरूप आणि सद्गुणी कन्या माधवी. ही कथा महर्षी नारदांनी दुर्योधनाला सांगितलेली आहे.

विश्वामित्र ऋषींचा पट्टशिष्य गालव. त्याचे शिक्षण पूर्ण होताच गुरुदक्षिणा देण्याचा त्याने हट्ट धरला. विश्वामित्रांना गालव किती गरीब आहे हे माहीत होते म्हणून ते म्हणाले मला काही नको पण गालव आपला हट्ट सोडायला तयार नव्हता म्हणून विश्वामित्रांनी चिडून त्याला सांगितले की तुला द्यायचेच असेल तर मला श्यामकर्णी आणि शशिकिरणा सारखे आठशे घोडे दे. गालवाने आपला मित्र गरुड यांच्याकडे मदत मागितली. गरुड त्याला ययाती राजाकडे घेऊन गेला.

ययातिकडे तसे घोडे नव्हते पण आपल्या दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवणे त्याला योग्य वाटले नाही  म्हणून त्याने त्यावर तोडगा काढला की माझी अप्सरे सारखी सुंदर अशी उपवर कन्या आहे तिला हुंडा म्हणून कुणीही आठशे घोडे देऊ शकतो तू तिला घेऊन जा.

गालव अयोध्येचा राजा इश्वाकुकुलिन राजाकडे तिला घेऊन गेला. तो राजा  म्हणाला ही कन्या खुप सुंदर व सुलक्षणी आहे ती महापराक्रमी पुत्राला जन्म देईल. तिला माझ्याकडे एक वर्षे ठेव एक मुलगा झाला की दोनशे घोडे आणि ही मुलगी मी तुला परत देतो. असहाय माधवीने मान्य केले. तिला वसु मानस नावाचा पुत्र झाला 200 घोडे घेऊन ती परत ययातिकडे आली. त्यानंतर तिला काशीचा राजा दिवोदास यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यानेही एक वर्ष तिला ठेवून घेतले प्रतार्दन नावाचा मुलगा त्याला तिच्यापासून झाला. आणि दोनशे घोडे देऊन त्याने  तिला परत पाठवले. नंतर तिला भोजराजा उशिनरकडे पाठवण्यात आले. त्याच्यापासून तिला सिवी नावाचा पुत्र झाला आणि त्याने ही दोनशे घोडे देऊन तिला परत पाठवले. सहाशे घोडे घेऊन माधवी सह गालव गरुडाकडे पुढील दोनशे घोड्यांसाठी आला. गरुडाने सांगितले आता तुला उरलेले 200 घोडे मिळणारच नाहीत कारण पूर्वी फक्त वरुणाकडे  एक हजार घोडे  होते.  वरूणाला गाधी राजाच्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा  होती. गांधी राजाने ऋचिक ऋषींना सांगितले तुम्ही मला ते 1000 घोडे मिळवून दिलेत तर मी माझ्या मुलीचे लग्न वरुणाशी लावून देईन. वरुणाच्या यज्ञाचे ऋचिक ऋषीनी पौरोहित्य केले. वरुणाने खूश होऊन 1000 घोडे त्यांना दान केले. गाधी  राजाने  वरील3 राजांना दोन दोनशे प्रमाणे सहाशे घोडे दान दिले आणि उरलेले 400 घोडे नदीत वाहून गेले. विश्वामित्र हे गाधीचे पुत्र आहेत. आत्तापर्यंत प्रत्येकाने तिची किंमत 200 घोडे केली तर तू विश्वामित्रांना तिला अर्पण कर म्हणजे त्यांना दोनशे  घोडे मिळाल्या सारखे आहेत. विश्वामित्रांनी ते मान्य केले व त्यांना माधवी पासून अष्टक नावाचा पुत्र झाला. त्यांनी ते सहाशे घोडे कुरणात चरायला सोडून दिले व माधवीला परत पाठवले. पुत्र जन्मानंतर परत कुमारिका होण्याचे वरदान माधवीला असल्यामुळे ती अजूनही कुमारिका म्हणूनच पित्याकडे परत आली.ययातिने गंगा यमुना संगमा वर तिचे स्वयंवर मांडले. पण स्वाभिमानी माधवीला वैराग्य आले. आपल्या देहाची झाली इतकी विटंबना पूर्ण झाली असे समजून ती वनवासात निघून गेली.अनेक वर्ष  वनात हिंडत होती.

माधवी चे चारी पुत्र मोठे झाले .वसु मानस अतिशय सच्छील व धर्माचा रक्षण कर्ता होता. सिवी अत्यंत दानशूर होता. प्रतार्दन महापराक्रमी झाला. आणि अष्टक अनेक यज्ञ करून पुण्यवान झाला.

इकडे ययाती स्वर्गवासी झाला पण त्याच्या अहंकारी स्वभावामुळे इंद्रादी देवांनी त्याला पृथ्वीतलावर ढकलून दिले .ययातिने त्यांना इच्छा सांगितली जिथे सच्छील माणसे जमली असतील तिथेच मला पडू द्या. त्याच वेळी नैमिषारण्यात माधवीचे चारी पुत्र यज्ञ करत होते .ययाती त्या पवित्र ठिकाणी पडला. नेमकी माधवी पण त्या ठिकाणी हजर होती. तिने आपल्या पित्यास ओळखले.  मुलांनी पण आईला ओळखले पण ययातीला त्यांनी ओळखले नाही. माधवीने आपली सर्व मानखंडना विसरून चारी पुत्रांना सांगितले की तुमचे व माझे पुण्य आपण माझ्या पित्याला अर्पण करून त्याला सन्मानाने स्वर्गात परत पाठवू या. त्या पुण्याईच्या जोरावर ययाती परत स्वर्गात गेला पण माधवी मात्र पुन्हा निर्विकारपणे तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेली. अशी ही पितृभक्त माधवी. डोकं सुन्न करणारी तिची कथा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares