हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा-कहानी #22 – परम संतोषी भाग – 8 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

श्री अरुण श्रीवास्तव 

(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे।  उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आपने ‘असहमत’ के किस्से तो पढ़े ही हैं। अब उनके एक और पात्र ‘परम संतोषी’ के किस्सों का भी आनंद लीजिये। आप प्रत्येक बुधवार साप्ताहिक स्तम्भ – परम संतोषी   के किस्से आत्मसात कर सकेंगे।)   

☆ कथा – कहानी # 22 – परम संतोषी भाग – 8 ☆ श्री अरुण श्रीवास्तव 

असहमत फिर से, क्या करते हैं आप आज असहमत का कार्यक्रम सुबह फिर जलेबी-पोहा खाने का बना. सबेरे यही किया जाता है, ब्रेकफास्ट और कड़क चाय के बाद ही लोग सोशल मीडिया पर सक्रिय होते हैं. तो घर से बाहर निकलकर, सीधे सीधे सत्तर कदम चलने के बाद नुक्कड़ पर असहमत के कदम थम गये. दो रास्ते थे, राईट जाता तो मंदिर पहुंचता और लेफ्ट जाता तो गरमागरम जलेबियाँ खाता. असहमत, स्वतंत्र विचारों की रचना थी, गरमागरम जलेबी खाने का फैसला अटल था तो राइट नहीं लेफ्ट ही जाना था. पर नुक्कड़ पर चौबे जी खड़े थे. दोनों एक दूसरे को नज़र अंदाज़ कर सकते थे पर जब असहमत ने चौबे जी से “हैलो अंकल” कहा तो बात से बात निकलने का सिलसिला शुरु हो गया. चौबे जी तो श्राद्ध पक्ष से ही असहमत से खार खाये बैठे थे तो मौके का भरपूर प्रयोग किया. “अरे प्रणाम पंडित जी कहो, अंगरेज चले गये औलाद छोड़ गये. “

असहमत : अरे पंडित जी औलाद नहीं अंगरेजी है, अंग्रेजी छोड़ गये.

चौबे जी: तुम्हारे जैसे अंग्रेजों के गुलाम ही हिंदू धर्म को कमजोर कर रहे हैं तुम नकली हिंदुओं के कारण ही हिंदू एक नहीं हो पाते.

असहमत: अरे चोबे जी, ऐसा तो मत कहो, मैं मंदिर जाता हूँ जब मेरा मन अशांत होता है. “इस्लाम खतरे में है ” बोलबोलकर उन्होंने सरहद पार आतंकवादियों की फसल तैयार कर दी, अब आप हमको क्या सिखाना चाहते हो. भक्त और भगवान का तो सीधा लिंक है फिर ये एकता वाली चुनावी बातें किसलिए.

चौबे जी : हमको ज्ञान मत बांटो, तुम्हारे जैसे दो टके के लोग वाट्सएप पढ़ पढ़ कर ज्ञानी बने घूमते हैं. चलो हमारे साथ, राईट टर्न लो जहाँ मंदिर है.

असहमत : मैं अभी तो लेफ्ट ही लूंगा क्योंकि गरमागरम जलेबी और पोहा मेरा इंतजार कर रहे हैं, डिलीवरी ऑन पेमेंट. चलना है तो आप चलो मेरे साथ. चौबे जी का मन तो था पर बिना मंदिर गये वो कुछ ग्रहण नहीं करते थे.

तो चौबे जी ने अगला तीर छोड़ा ” हिंदू धर्म मानते हो तुम, मुझे तो नहीं लगता.

असहमत : अरे पंडित जी, ऐसी दुश्मनी मत निकालो, बजरंगबली का भक्त हूं मैं, थ्रू प्रापर चैनल पहुंचना है राम के पास. मेरे धर्म में मंदिर हैं, दर्शन की कतारें हैं, पूजा है, आरती है, जुलूस हैं, भंडारे हैं, ऊंचे पर्वतों पर माता रानी बैठी हैं और गुफाओं में शिव, बजरंगबली के दर्शन कभी कभी मंगलवार को कर लेता हूं पर जब यन अशांत होता है तो जरूर मंदिर जाता हूं, बहुत शांति और ऊर्जा मिलती है मुझे.

असहमत के जवाबों और अंदर की आस्था ने, धर्म के ब्रांड एम्बेसडर को हिला दिया. तर्क का स्थान असभ्यता और अनर्गल आरोपों ने ले लिया.

चौबे जी : चल झूठे, दोगला है तू, साले देशद्रोही है.

अब पानी शायद असहमत के सर से ऊपर जा रहा था या फिर गरमागरम जलेबी ठंडी होने की आशंका बलवती हो रही थी पर देशद्रोही होने का आरोप सब पर भारी पड़ा. जलेबी और पोहे को भूलकर, असहमत ने चौबेजी से कहा: अब ये तो आपने वो बात कह दी जिसे कहने का हक आपको देश के संविधान ने दिया ही नहीं. आप मुझे नकली हिंदू कहते रहते हैं मुझे बुरा नहीं लगता पर देशद्रोही, कैसे

  1. मैं तिरंगे का अपमान नहीं करता
  2. जब राष्ट्र गीत बजता है तो मैं चुइंगम नहीं खाता.
  3. मैं रिश्वत नहीं खाता, चंदा नहीं खाता
  4. आपत्तिजनक नारे नहीं लगाता
  5. सेना में भर्ती होना चाहता था पर उनके मानदंडों पर पास नहीं हो पाया.
  6. न मैं देशविरोधी हूँ और ना तो मैं सोचता हूँ न ही मेरी औकात है
  7. मैं कोई अपराध भी नहीं हूँ, बेरोजगारी मुझे कभी कभी गुस्सा दिलाती है तो मैं जिम्मेदार लोगों की आलोचना करने लगता हूँ. मैं अपना वर्तमान सुधारने में लगा हूँ और वो इतिहास सुधारने में. अरे भाई लोगों मेरी चिंता करो, मुझे मेरे वोट का प्रतिदान चाहिये, मेरी समस्याओं का समाधान चाहिये, आपके वादों के परिणाम चाहिए. और आप हैं लगे हुये अगली वोटों की फसल उगाने में. एक फसल जाती है फिर दूसरी आती है और हमारे जैसे लोग हर गली हर नुक्कड़ पर इंतजार करते हैं वादों और सपनों के साकार होने का.

बात चौबे जी के लेवल की नहीं थी, उनके बस की भी नहीं तो उन्होंने इस मुलाकात का दार्शनिक अंत किया, वही संभव भी था और मंदिर की ओर बढ़ गये.

 “होइ हे वही जो राम रचि राखा, को करि तर्क बढावे साखा”

© अरुण श्रीवास्तव

संपर्क – 301,अमृत अपार्टमेंट, नर्मदा रोड जबलपुर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 13 (71-75)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #13 (71 – 75) ॥ ☆

सर्गः-13

राम पुनः मिले सचिव से जो थे वृद्ध महान।

बढ़ी श्मश्रु से जोदिखे बट के वृक्ष समान।।71।।

 

ये सुग्रीव विपद सखा, ये विभीषण रणधीर।

ऐसा कहते राम के भरत हो उठे अधीर।।72अ।।

 

लक्ष्मण से पहले मिले उनसे सादर धाय।

विनत वंदना की पुनः उनको-गले लगाय।।72ब।।

 

फिर लक्ष्मण से यों मिले छाती से लपटाय।

इंद्रजीत की शक्ति कृत दाग न फिर दुख जाय।।73।।

 

पाकर आज्ञा राम की धर कर मनुज शरीर।

वानर-पति चढ़े गजों पै जो मद-वर्षी धीर।।74।।

 

हुये विभीषण भी अचर उन रथ पै आसीन।

रामाज्ञा पा जिनसे थे मायारथ भी हीन।।75।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ मार्च – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  मार्च –  संपादकीय  ? 

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ९ मार्च -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मराठी नाट्यसृष्टी’ असे शब्द उच्चारले, तरी एक नाव अपरिहार्यपणे डोळ्यापुढे येतं , ते म्हणजे वि. भा. देशपांडे अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे.  त्यांनी काही आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजवली नाही. त्यांनी नाट्यसृष्टीबद्दल विपुल लेखन केलं. ते बराच काळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी होते. २०१५पर्यन्त त्यांनी एकूण ५१ पुस्तके लिहिली. त्यापैकी २५ पुस्तके नाट्यविषयक आहेत. मराठी नाट्यकोश हा १२०० पानी ग्रंथ लिहिला आणि कोश वाङमयात मोलाची भर टाकली.

नाटकातील माणसं, गाजलेल्या भूमिका, नाटक नावाचे बेट, निळू फुले, नाट्यभ्रमणगाथा, निवडक नाट्यप्रवेश ( पौराणिक ), वारसा रंगभूमीचा, आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा ही त्यांची गाजलेली काही पुस्तके.  नाटक, साहित्य, संगीत यावर त्यांनी नितांत प्रेम केले. आजवरच्या प्रवासात त्यांना भेटलेली माणसे, आणि त्यांचे आलेले अनुभव, म्हणजेच नाट्यभ्रमणगाथा हे त्यांचे पुस्तक. अनेक मोठमोठ्या नाट्यकलाकारांशी त्यांची ओळख झाली. स्नेह जुळले. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये, वि. भां. नी ओघवत्या शैलीत लिहिली. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना- प्रसंगही त्यातून उलगडले आहेत.

वि. भां.ना मिळालेले पुरस्कार 

  1. उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार
  2. कॉसमॉस
  3. नाट्यगौरव
  4. नाट्यदर्पण
  5. माधव मनोहर
  6. रंगत संगत
  7. राजा मंत्री
  8. वी.स. खांडेकर नाट्य समीक्षक म्हणून पुरस्कार
  9. पिंपरी-च्ंचवड महापालिकेने त्यांचा सन्मान करून गौरव केला.

वि. भां.चा जन्म ३१ मे १९३८ तर स्मृतिदिन ९ मार्च १९१७. त्यांच्या नाट्यक्षेत्रातील कार्याला मानाचा मुजरा. ?

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस असा पडावा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस असा पडावा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

पाऊस असा पडावा

जुना शिशिरही कळावा.

पानगळीच्या वृक्षांशी,

स्नेह नव्याने जडावा.

 

पाऊस असा पडावा,

रक्तात मल्हार न्हावा.

मैफलीत सांगतेच्या,

स्वर आतला कळावा .

 

पाऊस असा पडावा,

पाऊस असा जडावा.

अव्यक्त सार्‍या व्यथांचा,

अभिव्यक्तीने व्यक्त व्हावा.

 

पाऊस असा पडावा ,

पाऊस असा कळावा.

थेंब होउन छोटा,

पापणीत बंद व्हावा.

 

पाऊस असा पडावा,

मृदगंधाचा सुगंध यावा.

मृगदुग्धांच्या सरींनी ,

अर्थ आईचा कळावा.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ महिला दिना निमित्त – स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ☆☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

?विविधा ?

☆ महिला दिना निमित्त – स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(नमस्कार रसिकहो! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव करून भारतीय स्त्रीशक्तीला प्रस्तुत लेखाद्वारे मानाचा मुजरा प्रदान करीत आहे.)

भारतीय संस्कृतीत ‘स्त्रीला’ अनन्य साधारण स्थान आहे. पुरातन काळापासून आजच्या अत्याधुनिक युगापर्यंत ती ‘शक्ती देवता’ म्हणून ओळखल्या जाते.  ती मांगल्य, सुचिता, पावित्र्य यांची मूर्ती आहे.  प्रेम, वात्सल्य, ममता यांची कीर्ती आहे.  नररत्नांची खाण आहे. कुटुंबाची शान आहे. समाजाची मान आहे.

आजची स्त्री उच्चविद्याविभूषित आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आपल्या कर्तव्य कर्मात उभी आहे.  चूल व मूल ही दोन्ही क्षेत्रे सांभाळून तिने आर्थिक बाजूही सांभाळली आहे.  खरेच कुटुंबाची ती ‘कणा’ आहे. स्वाभिमान,अस्मिता हा तिचा बाणा आहे.  जवळ जवळ सर्वच क्षेत्रे तिने आज पादाक्रांत केली आहे.  केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अंतराळात जाणारी भारतीय पहिली स्त्री कल्पना चावला हिने हा मान मिळविला आहे.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या.  प्रतिभाताई पाटील यांनी पहिल्या राष्ट्रपती पदाचे स्थान भुषविले आहे. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे असेल तर स्वाती महाडिक व सुप्रिया म्हात्रे यांचे देता येईल.  तसेच अगदी अलीकडे अंतराळात गेलेली भारतीय महिला म्हणजे शिरीष बंदला ही होय.

स्त्रीचे महत्व हे नदीसारखे असते. म्हणून केवळ प्रसंगोचित तिचा उदो उदो न करता नेहमीच तिला शाश्वत मानबिंदू देणे समाजाचे कर्तव्य नव्हे का?  कोणत्याही विकृत भावनेला बळी न पडता समाजाने तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.  या नवीन दृष्टिकोनाचे पालन केल्यास आज आपण समाजात तिचे भेसुर, भयान, निंदास्पद अपमानकारक चित्र बघतो ते मिटविण्यास मदत होईल.  स्त्री एक आदर्श माता आहे. याचा अंगीकार केल्यास जिजाबाई ला शिवबा निर्माण करता येईल.  नव्या युगाला औरंगजेबाची गरज नसून शिवबाची नितांत गरज आहे.  शिवरायाचा आदर्श व आदर म्हणजेच स्त्रीत्वाचा गौरव होईल व स्त्रीत्वाचा गौरव हाच तिला केलेला  मानाचा मुजरा होईल. म्हणूनच कवी म्हणतो,

| मूर्तिमंत लक्ष्मी तू घरादारांची

     कुशल अष्टपैलू मंत्री तू जीवनाची

    शिल्पकार तू नवनिर्मितीची

     खाण असे तू नररत्नांची |

  | दुर्गा असे तू जीवन संघर्षाची

    कालिका भासे तू रौद्ररुपाची

    राणी असे तू स्वातंत्र लक्ष्मीची

    संगम देवता तू शक्तीयुक्तीची |

  | ढाल असे तू कुटुंब देशाची

    प्रतिकाराच्या तलवारीची

    कीर्तिवंत तू कर्मभूमीची

    सदा वंदनीय तू युगायुगांची |

या स्त्रीच्या यशोगाथेचा गौरव करून माझ्या लिखाणाला पूर्णविराम देते

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अष्टभूजेच्या कन्या – डाॅ. आरती किणीकर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ अष्टभूजेच्या कन्या – डाॅ. आरती किणीकर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गेली अनेक वर्षे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो, अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात, कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, मी विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती आठ मार्चच्या निमित्ताने लिहिल्या आहेत. आज मी ज्या महिलेचा परिचय करून देणार आहे ती अत्यंत कर्तृत्ववान आणि उच्चविद्याविभूषित स्त्री आहे, कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात त्या,प्रमाणे….”दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती” …तशीच जिच्या दिव्यतेची गेली अनेक वर्षे प्रचिती वैद्यकीय क्षेत्रात येत आहे ती डाॅ.आरती किणीकर !

डाॅ. आरती किणीकर कार्य कर्तृत्ववाने महान आहे पण वयाने माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे मी तिला एकेरी संबोधत आहे.

आरती किणीकर बी.जे.मेडिकल काॅलेजमध्ये प्रोफेसर असून, ससून हाॅस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ (विभाग प्रमुख ) आहे.

विद्यार्थीप्रिय प्रोफेसर, निष्णात डॉक्टर अशी ख्याती असूनही कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व नसलेलं, मृदू भाषिक, प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.आरती किणीकर!
बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे लहानमुलांच्या आजारावर विशेष संशोधन, थॅलेसेमिया या आजाराविषयक जागरूकता निर्माण करून यशस्वी उपाय योजना, ससून हाॅस्पिटलच्या माध्यमातून अनेक खेडी दत्तक घेऊन कुपोषित बालकांच्या समस्येवर उपाय शोधून, त्या बाबतीतही भरीव कार्य करीत आहे.

डाॅ. आरती किणीकर शालेय शिक्षण काॅन्व्हेंट मधे झाले असून, वडिलांच्या बदलीच्या नोकरी मुळे पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, धुळे, जळगाव, औरंगाबाद, मुंबई इ.शहरात शालेय शिक्षण झाले!

वैद्यकीय शिक्षण एम.बी.बी.एस.,एम.डी( मुंबई ), एम.आर.सी.पी.(इंग्लंड)

अतिशय बुद्धिमान विद्यार्थिनी, यशस्वी डॉक्टर! कर्तव्यदक्ष संसारी स्त्री, पत्नी, सून, आई या सर्व भूमिकेत उत्कृष्ट महिला!

कोरोनो काळात कोविड 19 च्या जागतिक संकटाच्या काळात पुण्यात प्रतिबंधक उपायांसाठी दहा डॉक्टर्स ची टीम नियुक्त करण्यात आली त्यात डॉ.आरती किणीकरचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत – व्हेंटिलेटरचा तुटवडा पडल्याने अनेक रूग्ण दगावले, डाॅ. आरती किणीकर यांनी स्वतः संशोधन करून विशिष्ट प्रकारचे व्हेंटिलेटर्स अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून दिले, इतरही अनेक वैद्यकीय यशस्वी प्रयोग केलेआहेत.

डॉक्टर असल्यामुळे कोरोना योद्धा तर आहेच.अतिशय व्यग्र असूनही घर संसारही अतिशय नीटनेटका, वयोवृद्ध सासू सासरे यांची अतिशय उत्तम देखभाल आणि निगराणी राखली! पती डाॅ.अविनाश किणीकर हे सुद्धा बालरोग तज्ज्ञ आहेत. मुलगा आशुतोष इंजिनिअर आहे.

डाॅ. आरती किणीकर पूर्वाश्रमीची नयना चव्हाण, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ती माझी मावस बहीण आहे.

डॉक्टर म्हणून ती ग्रेट आहेच पण माणूस म्हणूनही खूप चांगली आहे. वैद्यकीय व्यवसायातलं तिचं कार्यकर्तृत्व मोठं आहेत, त्या क्षेत्रात तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, गेली अनेक वर्षे मी तिचे तिच्या क्षेत्रातील अथक परिश्रम पहात आहे!

आठ मार्चच्या निमित्ताने तिचे अभिनंदन आणि कौतुक!

स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणा-या स्वयंसिद्ध स्त्रिया म्हणजे मला अष्टभूजेच्या कन्याच वाटतात. विविध क्षेत्रातील या अष्टभूजेच्या कन्यांना माझा सलाम!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रूप्या…भाग 2 ☆ मेहबूब जमादार ☆

? जीवनरंग ❤️

☆ रूप्या…भाग 2 ☆ मेहबूब जमादार ☆

हे पाहून मालकीन म्हणाली,

“असं का वो? पहिलं डोळं पुसा. अन ती भाकरी खावा”

“अगं! जीवापल्याड जपलंय मी रूप्याला. आता तो म्हातारा झालाय म्हणून त्येला ईकायचा. मरू दे की दावणीला त्याला. ईकायचं म्हणजे कसायाला द्याचा. हे बरं वाटतय का तुला?”

“हे सारं खर हाय. पण बापूसाबानां कोण सांगणार? आपलं सारं घरच ते चालवित्यात. कारभारी हायत घरांच. “

“ते भी खरं हाय”

“मग लई इचार करू नका. पहिलं जेवा”

तिनं भाकरी पुढं सारली. थाटीत कालवण दिलं . भाकरीवर खर्डा दिला. उरली भाकर धडप्यावर ठेवली. एरव्ही चवीनं खाणा-या तात्यानं कशीबशी एक भाकर खाल्ली. बाकीची तशीच ठेवली.

एरव्ही चवीनं जेवणारा तात्या पण आज त्याचा जेवणाचा मूडच गेलावता. तरीभी मालकिनीच्या आर्जवांवर त्यानं निम्मं जेवण केलंवत.

त्या दिवशी दुपारी झोपणा-या तात्याची झोप उडाली होती. तो सारखा रूप्याकडे बघत होता.

सायंकाळचा वकूत. तात्याचा थोरला भाऊ बापू एका गि-हाईकाला घेवून गोट्यात आलावता.

“आर्ं शामू!जरा रूप्याला ऊठव. एक गि-हाईक आलय”

हे बोलणं ऐकल्यावर तात्याच्या डोळ्यांत चटकण पाणी आलं.

“बापू माझ्या रूप्याला तेवढं ईकू नका. मी त्येला दावणीवर मरू देणार हाय. त्याचं सारं मी करणार हाय”

“आरं शामू खूळा हायस का काय?हे बघ आता त्येला कामांचं काय जमणार हाय का? आज चालतूय तोवर विकू या. चार-पांचशे रू. तरी येतील. जरा शहाण्यासारखा वाग. “

तात्याला काय बोलावं ते कळंनासं. तात्याचं वडील काटी टेकत आलं. ते भी काय बोललं नाय. त्यात तात्या धाकटा. जनावराचा कारभारी. चोवीस तास घरगड्यासारखा वागणारा. पण त्याच्या हातात कारभार नव्हता.

पाच सहा दिवस असेच निघून गेले. तात्याला वाटलं बहूधा रूप्याला ईकायचा बेत रद्द झालाय. त्याला बरं वाटलं.

आज तात्या दुपारी  वैरण आणायला माळाच्या पट्टीकडं गेलावता. जरा ऊन्ह असल्यानं तसा त्याला आज वकूतच झालावता. वैरण आणेपर्यंत दिवस मावळावता. का कुणास ठावं मात्र तात्याला कधी नव्हं तो उशीर झालावता.

तात्या गोट्याकडं आला त्यावेळी सांज झालीवती. त्यानं गोट्यापुढं वैरण टाकली. पण नेहमीप्रमाणं गोटा जागा झाला नाही. म्हसरं ऊटली पण सोन्या काय उटला नाय. तात्यानं पाहिलं रूप्याची दावण रिकामी दिसत होती. हे पाहील्यावर तात्या मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं. शेवटी बापूनीं त्याचा शब्द खरा केला होता. बरं त्याला आडवणारं कोण होतं?. घरातली बापूचीच बाजू घेत.

तात्यानं बिंडा सोडला नाय. त्याला तो सोडावा असंही वाटलं नाय. तात्याचं काळीज फाटलं होतं. काळजात रूप्याची सय दाटून आली. तात्याशिवाय तो टाकलेली वैरण खात नव्हता कि पाणी पित नव्हता. तात्याला सारं आठवलं. डोळ्यांत ढग दाटलं.

तात्या वैरण न टाकताच घराकडं आला.  बापू सोप्यात बसला होता.

“बापू ईकायचा होता तर माझ्या समोर ईकायचा. मी माझ्या हातानं त्याला भाकरी भरवणार होतो. तू बाकी डाव साधलास बघ!”

तात्या सोप्यात रडू लागला. बापू गप्प होता. एक खरं होतं की तात्या असता तर तात्यानं रूप्याला जाऊच दिलं नसतं . रूप्याही सजागती गेला नसता. त्यामूळं नेमकं बापूला हेच नको होतं. तात्याच्या डोळ्यांत पाणी बघून बापू पण हेलावला.

“आरं शामू एवढं हळवं व्हायचं नसतं. “

त्यानं ऊटून तात्याच्या डोळ्यांत आलेलं पाणी पुसलं. तात्याला ऊठवलं. तात्याला लईच उचंबळून आलं.

पण हे बेगडी प्रेम होतं हे तात्याच्या कवाच लक्षात आलं होतं. तसं असतं तर त्यानीं माझ्या रूप्याला केंव्हाच विकला नसता.

तात्या ऊटला. सरळ गोट्याकडं आला. बरचं अंधारलवतं. तात्यानं डोळं पुसलं. वैरणीचा बिंडा सोडला. थोडी थोडी वैरण त्यानं सोन्याला अन म्हसरानां टाकली. माझ्या रूप्याची वैरण म्हणत त्याला उचंबळून आलं. तो ढसाढसा रडू लागला. त्या दिवशी तात्या ना जेवला ना झोपला. मालकिनीनं ,पोरानं मस्त मिनत्या केल्या पण काय उपेग झाला नाय.

तात्या दोन दिवस न जेवल्याचं कळताच वाडीतले रामरावआण्णा तात्याकडं आले. त्यानां पाहताच तात्याला जोरात हुंदका फुटला.          

“आरं शामू हे रं काय? असा खुळ्यासारखा का रडतूयस. हे बघ!ही जगरहाटी हाय. आजचा तरणा बैल उद्या म्हातारा होणार. चार महिन्यांनतर का हूईनां शेवटी तो बसणारच हूता. पुन्हा त्येला कोण ऊटवणार? पहिलं दिवस न्यारं हूतं. माणसाला माणूस उभा रहात हूता. असं करू नगस. चार घास खा बघू. “

क्रमश: …..

– मेहबूब जमादार

मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा

जि-सांगली.मो-९९७०९००२४३

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक क्रमांक १९ – भाग ३ – विद्या आणि कला यांचं माहेरघर – ग्रीस ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक १९ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ विद्या आणि कला यांचं माहेरघर– ग्रीस ✈️

दुसऱ्या दिवशी सॅऺटोरिनी बेट ते अथेन्स हा प्रवास एका अवाढव्य क्रूझमधून केला. अडीच ते तीन हजार माणसं आणि कितीतरी मोटारी , ट्रक पोटात घेऊन ती क्रूझ, पोपटी पाण्यावर पांढऱ्या समुद्र फेसाची नक्षी काढत डौलात चालली होती. प्राचीन काळापासून ग्रीकांची समुद्रावर सत्ता होती. इथूनच धाडशी खलाशांनी आपली गलबतं रशिया आणि पार इंग्लंड फ्रान्स इटलीपर्यंत नेऊन व्यापार केला होता.  ग्रीसच्या वैभवात भर टाकली होती.

आज अथेन्सहून डेल्फी इथे जायचं होतं. ग्रीक पौराणिक कथांप्रमाणे झ्यूस हा देवांचा देव आहे.  डेल्फी हे झ्यूसच्या मुलाचं म्हणजे अपोलोचं ठिकाण आहे.  अथेन्सपासून डेल्फीपर्यंतचा रस्ता अतिशय सुंदर होता. पारोसनेस पर्वतांच्या निळ्या-हिरव्या सलग रांगा पसरल्या होत्या. सुपीक जमिनीत द्राक्षं, सफरचंद, पीच, चेरी यांच्या बागा व गहू मका अशी शेती होती. ऑलिव्ह वृक्षांच्या बागा होत्या. मेपल आणि बर्चची झाडं होती.ग्रीक पुराणकथेप्रमाणे झ्यूस देवाने  पृथ्वीचे मध्यवर्ती स्थान शोधण्यासाठी पूर्व आणि पश्चिमेला दोन गरुड पाठविले. त्यांची गाठ डेल्फी इथे पडली. म्हणून डेल्फी ही पृथ्वीची बेंबी आहे असं ग्रीक मानत.

पाच हजार वर्षांपूर्वी पर्वतांच्या कुशीमध्ये अपोलोचं व अथिनाचं अशी दोन महाप्रचंड देवालये होती. या धर्मकेंद्रात भाविकांचा ओघ असे. लोकप्रिय व श्रीमंत अशा या देवालयांनी  एक हजार वर्षांचा सुवर्णकाळ अनुभवला. नंतर रोमन सम्राट थिओडोसिअस याने डेल्फीचा नाश केला. नंतरच्या भूकंपामध्ये दोन्ही मंदिरे व डेल्फी जमिनीत गाडली गेली.  साधारण दोनशे वर्षांपूर्वी उत्खननातून हे अवशेष मिळाले.

उंचावरील अपोलोच्या देवळाच्या मूळ ४० खांबांपैकी आता सहाच खांब शिल्लक आहेत.पुढे ॲ॑फी  थिएटरचे अवशेष आहेत. आता या ठिकाणी प्राचीन नाट्यशास्त्र,पुरातत्व,नाटकं, संगीत या विषयांवरील परिषदा आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

म्युझियमची इमारत प्रशस्त, देखणी आहे. आतल्या तेरा मोठ्या दालनात प्राचीन इतिहास, संस्कृती, कला यांची झलक दाखविणारी शिल्प व इतर वस्तू आहेत.म्युझियमच्या प्रवेशद्वाराजवळ ओम्फालस म्हणजे नाभी- स्तंभ आहे.  उत्तम कोरीव काम असलेल्या या शिल्पाला कळीसारखा शेंडा आहे.

अपोलोची चार घोड्यांच्या रथावरील मूर्ती अतिशय देखणी आहे. स्त्री-पुरुषांच्या इतर अनेक शिल्पातून स्नायूंची प्रमाणबद्धता, मानवी शरीराची रचना, चेहऱ्यावरील भावभावना, पोशाख, केशरचना, दागिने यांचं मार्बलमधून कोरलेलं, जिवंत वाटणारं दर्शन होतं. मोझॅइक भित्तीचित्र आहेत. भाजलेल्या मातीचे रंगविलेले कलश,  उंच उभे रांजण, भूमितीमधील त्रिकोण, षट्कोन, वर्तुळ यांच्यातील सुंदर आकृती, दागिने ठेवण्याची नक्षीदार पात्रे, गर्भवती स्त्रिया, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया अशा प्रकारच्या अनेक कलाकृतीतून एका समृद्ध, संपन्न संस्कृतीचं दर्शन होतं.

ब्रांझच्या रथाचा सारथी उजव्या हाताने घोड्याचा लगाम खेचतोय. त्याचा डावा हात अर्धवट तुटलेला आहे. पण त्याच्या पायघोळ वस्त्राच्या चुण्या, डोळ्यातील जिवंत भाव पहाण्यासारखे आहेत. सुवर्ण विभागात स्त्रियांच्या गळ्यातील नाजूक डिझाईनचे हार, नाना प्रकारचे रत्नजडित अलंकार, रत्नजडित भांडी, डिश, पेले आहेत. देवालयाच्या स्तंभांवरील कोरीव पट्टिका, सिंहाचं अंग आणि  मानवी चेहरा व पंख असलेला स्फिंक्स, डोक्यावर ब्रांझच्या मोठ्या  घमेल्यात यज्ञकुंड घेतलेली स्त्री ,मार्बलच्या कोरीव स्टॅन्डवरील तीन देवतांच्या मूर्ती अशा सार्‍या कलाकृती बघण्यासारख्या आहेत.

गाईडने एका उंचावरील हॉटेलमध्ये स्थानिक पद्धतीचं जेवण घेण्यासाठी नेलं. हॉटेलच्या काचेच्या खिडक्यांमधून दूरवरील डोंगर रांगा आणि खालची दरीतली घरं, हिरवी शेती, झाडं, दिसत होती. प्रथम लिंबाचं सरबत व उकडलेल्या, सॉस घातलेल्या  भाज्यांची डिश दिली.  त्या नंतर मोठ्या टोमॅटोमध्ये भरलेला भात आला.या भाताला  याहिस्ता असं म्हणतात. आम्ही एके ठिकाणी द्राक्षाच्या पानात गुंडाळलेला डोल्मा राईस खाल्ला होता. त्यापेक्षा याहिस्ता चविष्ट होता. सुवलाकी म्हणजे चिकन किंवा मेंढीचे मांस भाजून केलेला पदार्थ लोकप्रिय आहे. टोमॅटो राईसनंतर चॉकलेट पुडिंग्जचा आस्वाद घेऊन स्थानिक जेवणाला मनापासून सलाम केला. बाहेर बाजारात घेतलेली बकलावा म्हणजे ड्रायफ्रूट भरलेली छोटी गुंडाळी चविष्ट होती.

आम्ही ग्रीसला गेलो त्यावेळी ग्रीसची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली होती. एक कोटीहून अधिक लोकसंख्या असलेला  ग्रीस, ‘आहे मनोहर तरी……..’ अशा परिस्थितीत होता. वरवर उत्तम, सुंदर दिसंत असलं तरी प्रत्यक्षात ग्रीसचा एक पोकळ डोलारा झाला होता. अर्थव्यवस्था घसरणीला लागली होती.१९७३ साली  ग्रीसमध्ये प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाली. नंतर तो देश नाटोचा मेंबर झाला. १९८१ मध्ये ग्रीस युरोपियन युनियनचा सदस्य झाला. पश्चिम युरोपच्या मदतीने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे पण त्याची गती खूपच कमी आहे. क्षमतेपेक्षा जास्त कर्जाची उचल, वाढती वित्तीय तूट, आणि ती तूट भरून काढायला अधिक कर्ज असं दुष्टचक्र सुरू आहे. राजकीय अस्थैर्य वाढलं. बेरोजगारी आणि असंतोष वाढला .अथेन्समधील भिंती निषेधाच्या काळ्या रंगातील ग्राफिटीने भरून गेल्या होत्या. युरोपियन युनियनच्या आधीन झालेल्या या देशाला कडक आर्थिक निर्बंधाना तोंड द्यावं लागत  आहे.

सध्याच्या अतिवेगवान जगामध्ये इतिहासकालीन समृद्धीवर, स्मरणरंजनावर फार काळ जगता येणार नाही हा धडा ग्रीस कडून मिळाला आहे.

सॅ॑टोरीनी  बेटावर जाताना अथांग, पोपटी पारदर्शक समुद्राच्या दोन्ही कडांचे पर्वत पाहून ,’ समुद्र वसने देवी, पर्वत:स्तन मंडले….’ या श्लोकाची आठवण येत होती. सध्या या ‘विष्णुपत्नी लक्ष्मी’ चा ग्रीसवरील रुसवा घालविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

भाग 3 व ग्रीस समाप्त

 © सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी मुक्तामधले मुक्त… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

मी मुक्तामधले मुक्त… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

मी मुक्तामधले मुक्त,

तू कैद्यांमधला कैदी।

माझे नि तुझे व्हायाचे,

ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते,

या मंद-समीरण लहरी।

माझ्यावर चित्रित होते,

गरूडाची गर्द भरारी।

जड लंगर तुझिया पायी,

तू पीस कसा होणार?

माझ्याहून आहे योग्य,

भूमीला प्रश्न विचार।

 

आभाळ म्हणाले ‘नाही’,

भूमिही म्हणाली ‘नाही’।

मग विनायकाने त्यांची,

आळवणी केली नाही।

 

पापण्यांत जळली लंका,

लाह्यांपरि आसू झाले।

उच्चारून होण्याआधी,

 उच्चाटन शब्दां आले।

की जन्म घ्यायच्या वेळी,

गंगेस हिमालय नाही।

शाई न स्पर्शली असूनी,

हे अभंग नदिच्या‘बाही’।

 

दगडाची पार्थिव भिंत,

तो पुढे अकल्पित सरली।

‘मी कागद झाले आहे,

चल ‍‍‍‍‍‍लिही’ असे ती वदली।

 

(वीर सावरकरांनी अंदमानात असताना, कागद-पेन यांना बंदी म्हणून गुपचूप बोरीचा काटा सोबत नेऊन, अंदमानाच्या भिंतीवर कोरून कविता लिहिल्या, काट्याची लेखणी झाली, भिंतीची वही झाली… ते रेखाटणारी एक कविता…!!)

कवी कोण आहे हे समजू शकले नाही.

प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – यह घर किसका है ? ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ लघुकथा ☆ यह घर किसका है ? ☆ श्री कमलेश भारतीय ☆

अपनी धरती , अपने लोग थे । यहां तक कि बरसों पहले छूटा हुआ घर भी वही था । वह औरत बड़ी हसरत से अपने पुरखों के मकान को देख रही थी । ईंट ईंट को, ज़र्रे ज़र्रे को आंखों ही आंखों में चूम रही थी । दुआएं मांग रही थी कि पुरखों का घर इसी तरह सीना ताने, सिर उठाये, शान से खड़ा रहे ।

उसके ज़हन में घर का नक्शा एक प्रकार से खुदा हुआ था । बरसों की धूल भी उस नक्शे पर जम नहीं पाई थी । कदम कदम रखते रखते जैसे वह बरसों पहले के हालात में पहुंच गयी । यहां बच्चे किलकारियां भरते थे । किलकारियों की आवाज साफ सुनाई देने लगीं । वह भी मुस्करा दी । फिर एकाएक चीख पुकार मच उठी । जन्नत जैसा घर जहन्नुम में बदल गया ।परेशान हाल औरत ने अपने कानों पर हाथ धर लिए और आसमान की ओर मुंह उठा कर बोली-या अल्लाह रहम कर । साथ खड़ी घर की औरत ने सहम कर पूछा- क्या हुआ ?

– कुछ नहीं ।

– कुछ तो है । आप फरमाइए ।

– इस घर से बंटवारे की बदबू फिर उठ रही है । कहीं फिर नफरत की आग सुलग रही है । अफवाहों का धुआं छाया हुआ है । कभी यह घर मेरा था । एक मुसलमान औरत का । आज तुम्हारा है । कल … कल यह घर किसका होगा ? इस घर में कभी हिंदू रहते हैं तो कभी मुसलमान । अंधेर साईं का, कहर खुदा का । इस घर में इंसान कब बसेंगे ???

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares