मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऐन थंडीत… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ऐन थंडीत… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

या आश्वस्त वृक्षांनीच

विश्वासघात केला आमचा

ऐन थंडीत.

आसरा अव्हेरणं

त्यांना अशक्य झालं,

तेव्हा त्यांनी

विटा काढून घेतल्या

आपल्या घराच्या भिंतींच्या

आता उघडे पडलेले आम्ही

वाट बघतोय

पिसे झडण्याची

किंवा

कुणा शिका-याच्या

मर्मभेदी बाणाची

……………….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 124 ☆ प्रश्न बहु, गांभीर्याचा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 124 ? 

प्रश्न बहु, गांभीर्याचा

(स्त्रीच्या मनाची वेदना..)

स्त्रीच्या मनाची वेदना

मौन्य असते ललना

कशा मांडाव्या वेदना

शब्द तिज सापडेना.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

प्रश्न बहु, गांभीर्याचा

जरी आहे महत्वाचा

कुणी बरे मांडायचा.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

हर्ष तिज नसे कधी

पूर्ण आयु, कष्टी दुःखी

साहे तिची, तिचं व्याधी.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

सल सलत राहते

वर अंगरखा छान

आत जखम असते.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

प्रेम तिजला मिळावे

पोट मारून जगते

स्नेह भाष्य असावे.!!

 

स्त्रीच्या मनाची वेदना

राज माझे उक्त केले

शब्द प्रपंच उद्योग

ऐसे हे, लिखाण झाले.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

गेले चार दिवस अगदी धो धो पाऊस पडला, म्हणून रमाला बाहेर पडता आलेच नाही. आज छान ऊन पडलं आणि  हवाही छान पडली होती. ‘ संध्याकाळी  जाऊया जरा फिरायला आणि भाजी, सामान आणून टाकू,’ असा विचार केला तिनं. रमाच्या मैत्रिणींचा छान ग्रुप होता. नुसत्याच गप्पा नसत मारत त्या सगळ्या,तर सतत एकमेकींच्या  संपर्कात असत. एकमेकांची सुखदुःखे शेअर करत. प्रसंगी मदतीला धावून जात.

सकाळीच वीणाचा फोन आला होता, “ रमा ,बरी आहेस ना ग.  ये की चहा प्यायला आणि पोहे खायला. ये ग! ” वीणाची बिल्डिंग कोपऱ्यावरच होती. साडी बदलून आणि कुंडीतली छान जास्वंदीची फुलं घेऊन रमा वीणाकडे गेली ! दोघींच्या जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. वीणाची दोन्ही मुलं परदेशात. मिस्टर अचानकच गेले चार वर्षांपूर्वी. या फ्लॅटमध्ये वीणा एकटीच रहाते. रमाचीही स्थिती काही वेगळी नाही. फरक इतकाच की तिची मुलं परदेशात नाहीत, तर मुलगा दिल्लीला आणि मुलगी बंगलोरला स्थायिक ! म्हणून रमाही एकटीच. तिचे यजमान माधवराव सहा वर्षांपूर्वी हार्ट अटॅकने गेले, तेव्हापासून रमाही एकटीच पडली. 

 पण या दोघीही आर्थिक दृष्टया स्वतंत्र होत्या. दोघींचीही नोकरी एकाच बँकेत, त्यामुळे मैत्री अगदी घट्ट झाली. राहणी अतिशय साधी पण अभिरुचीपूर्ण. आणि दोघी मैत्रिणी अगदी रसिक. दोघींनीही छान  सेव्हिंग्ज केलेली आणि पुन्हा पेन्शन तर होतेच. अधून मधून दोघीही लहानशी ट्रिप करून येत आणि  ताज्यातवान्या होत.यांची मैत्री हा हेव्याचाच विषय होता इतर बायकांचा, पण या ते जाणून होत्या. आणि आपल्या मैत्रीत कधीच कसलीही बाधा येऊ द्यायची नाही, हा अलिखित करार होता त्यांचा .. 

कालच रमाला अखिलचा … तिच्या नातवाचा फोन आला होता. अखिलचं पोस्टिंग पाच वर्षासाठी लंडनला झालं होतं आणि तो बायकोला आणि मुलीला घेऊन लंडनला गेला होता. पण ते कॉन्ट्रॅक्ट आता चार वर्षांनीच सम्पले होते, आणि त्याला कंपनीने पुन्हा पुण्यात पोस्टिंग दिले होते. अखिलने आजीला फोन करून विचारलं, “ आजी, मी, रेणू आणि माझी मुलगी तन्वी, तुझ्याकडे काही दिवस राहायला आलो तर चालेल का? तन्वीची शाळा तुझ्या घरापासून जवळच आहे आणि रेणूला पुन्हा नोकरी बघता येईल. अचानकच माझं इथलं कॉन्ट्रॅक्ट एक वर्ष आधीच संपलं म्हणून जरा पंचाईत झालीय. ” रमा म्हणाली “ या की! त्यात काय ! मलाही छान कंपनी होईल तुमची ! ” आज हे रमाने सहज म्हणून  वीणाला सांगितलं.

नाही म्हटलं तरी वीणा रमापेक्षा जास्त व्यवहारी होती. रमा भावना प्रधान आणि  भावनेच्या भरात पटकन कोणतेही निर्णय घ्यायची. आणि तिचा त्यामागचा हेतू चांगला असला, तरी मागून तिलाच त्याचा त्रास व्हायचा. वीणा हे जाणून होती. म्हणून लगेच तिने रमाला विचारलं, ” रमा, किती दिवस येणार आहे ग अखिल? “ .. “ तसं काही बोलला नाही बाई तो ! मी तरी लगेच कसं विचारणार ना ? नाही म्हटलं तरी मुलीचा मुलगा ! तिकडून तिलाही यायचा राग, की आईनं एवढी सुद्धा मदत नाही केली माझ्या मुलाला म्ह्णून !” रमा म्हणाली. हेही अगदी बरोबरच होते म्हणा !

रमाचा फ्लॅट खूप मोठा आणि सुरेखच होता. तिचे पति माधवराव चांगल्या नोकरीत होते आणि एकूण सधन कुटुंबातलीच होती रमा.  वीणाने शांतपणे रमाचे ऐकून घेतले आणि जे जे होईल, ते ते पहावे म्हणत गप्प बसली. ठरल्यावेळी अखिल,रेणू आणि तन्वी  रमाच्या फ्लॅट मध्ये दाखल झाले.  रमाने मोठी बेडरूम त्यांना दिली. सगळी बेडरूम तिने अतिशय नीटनेटकी करून, कपाटे रिकामी करून ठेवली होती. काम करणाऱ्या बाईना सांगितलं, “ मी तुम्हाला पगार वाढवते सुलूबाई ,आणि तुम्ही माझ्याकडे पोळीभाजी पण करायला या. एकदम तीन माणसं वाढली म्हणजे खूप कामही वाढणार तुमचं. मग मी इतका इतका पगार वाढवते ! चालेल ना? “ सुलूबाई हसत तयार झाल्या. आजींचा उदार हात त्यांनाही माहीत होताच. पहिले काही दिवस खूप गडबडीत गेले. तन्वीची ऍडमिशन, अखिलचे रुटीन, रेणूचेही बस्तान बसवायला– नाही म्हटलं तरी सगळ्यांना अवघड जातच होते. थोड्या दिवसात सगळं नीट लागी लागलं. रेणूला जवळच एका शाळेत पार्टटाईम जॉब मिळाला. सगळं घर अगदी बिझी होऊन गेलं. सकाळी अखिल रेणू आणि तन्वी गेले, की मगच रमा रिकामी होई.  त्यांचे  नाश्ता, चहा सगळे बाईंकडून रमा करून घेई.  रेणू जमेल तशी मदत करे, पण ती तन्वीच्याच मागे असे. तिचा डबा, स्कूल बस, मग आपली तयारी. रमा हे सगळं बघत असे.  

गम्मत  वाटायची तिला. दोन लागोपाठची आपली मुलं, सासूसासरे, नोकरी, हे सगळं तिनंही लीलया पेललंच की. मग एकच मुलगी, नोकर चाकर, शिवाय मी, असताना हिला एवढे उरकत कसे नाही? या मुलीनं लंडनला कसं काय केलं असेल? तिकडे तर ना नोकर ना मदत. कालच मुलीचा बंगलोरहून फोन आला होता .”आई, कसं चाललंय सगळं? तुझी अडचण नाहीये ना होत? दोन नोकर जास्त ठेव ग बाई ! रेणूला कामाची सवय नाही. तन्वी तर किती पसारा करते ना. आणि अखिल तर कधीच काही आवरत 

नाही. ” कौतुकाने बंगलोरहून माया, रमाची मुलगी लाडेलाडे बोलत होती. रमाचे डोके सटकलेच, पण ती वेळ काही बोलायची नव्हती. रमाने काहीतरी बोलत वेळ  मारून नेली. आता तिला खूप काम होते. 

तिला पसारा अजिबात चालायचा नाही. तिचं घर कसं नेहमी आवरलेलं ,चकचकीत आणि आरशासारखं ठेवलेलं! हा पसारा अजिबात आवडायचा नाही तिला. पण तिनं एक पथ्य पाळलं होतं, त्यांच्या रूममध्ये जायचं नाही, आवरायचं नाही. काय वाटेल तसे का पडलेले असे ना ! 

अखिल रेणू येऊन सहा महिने होऊन गेले. रेणूनं एक दिवस विचारलं, “ आजी, उद्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी येणार आहेत चहाला. तर सुलूबाई करतील ना इडली सांबार, शिरा? ”  रमा म्हणाली, “ नाही ग करणार ! तुला माहीत आहे ना, त्यांना दहा घरची  कामं आहेत. तू कर ना! तुझ्या मैत्रिणी येणारेत ना….  बघ आणि मगच ठरव हं !” रमाच्या अपेक्षेप्रमाणे, सुलूबाई नाहीच म्हणाल्या. रेणू शाळेत गेल्यावर त्या रमाला म्हणाल्या, “ बाई,राग नाही ना आला माझा? अहो ! आज सहा महिने बघतेय,जराही जाणीव नाही तुमची या बाईला ! काय हो पसारा,आणि उरक म्हणून न्हाय. काय ती बेडरूम पसरलेली ! माझा घाम निघतोय आवरून ! मी करतेय इडली सांबार—   वाट बघा ! करू देत की त्यांना. बाई, तुम्ही बी नका करू बरं का !तुम्ही पडल्या भिडस्त !” सुलूबाई हसायला लागल्या. “ बाई, कायम राहणार का इथं हे लोक? आपण एकमेकींना साहेब असल्यापासून ओळखतो न्हवं का ? बाय,, घेऊ नका हं हे लचांड  मागं लावून ! “

रमाही हसली आणि तिला सुलूबाईंचं कौतुक वाटलं. किती बरोबर ओळखलं तिनं सगळ्यांना. रेणू मात्र चिडलेली दिसली..सुलूबाईंच्या  नकारानं पार्टीचा बेत कॅन्सल झालेला दिसला. ‘ अजिबात उरक नाही  स्वतःला, आणि त्या बिचाऱ्या सुलूबाईंचा जीव घेणार ही ! वर  त्यांना चार जास्त पैसेही देणार नाही, मग कसं कोण काम करणार?’ 

त्या दिवशीही असंच झालं.  रेणूच्या  शाळेत काही प्रोग्रॅम होता. “ आजी तन्वीला  बसस्टॉपवरून  आणाल का प्लीज ? मला येता येत नाहीये घरी. “  रेणूचा रमाला फोन आला. धडपडत उन्हाचं तन्वीच्या बस स्टॉप वर जावे लागले रमाला. पुन्हा आल्यावर “ आजी, हेच नकोय खायला, पोहेच करून दे,“ हे करून झालेच! थकून गेली अगदी रमा. तीही आता सत्तरी कडे झुकली होतीच की. रेणू त्या दिवशी संध्याकाळी सहाला आली. आल्यावर एक शब्द नाही की, “ आजी सॉरी! अचानक उशीर झाला. तुम्हाला त्रास झाला ना?”  रमाला हे दिवसेंदिवस डोईजड व्हायला लागले. सांगता येईना आणि सहन करता येईना अशी परिस्थिति झाली तिची. असेच  एक वर्ष गेले.

एक दिवस अखिलला आईशी बोलताना चुकून रमाने ऐकले, “आई ,गेले वर्षभर राहतोय आम्ही इथं. आम्हाला आवडतो हा आजीचा फ्लॅट! काय हरकत आहे ग हा आम्हाला द्यायला तिनं? बाकीच्या नातवंडांना कोणालाही नकोय. सगळे तर परदेशात आहेत.  तू बोलून बघ ना आजीशी ! माझं तर फार सेव्हिंगही नाहीये ग ! तिकडे काहीच पैसे  सेव्ह नाही झाले. मला दुसरा फ्लॅट घेणं शक्य नाही, आणि औंधचा माझा फ्लॅट किती लहान आहे ! मी कसला तिथे रहातोय. आजींचा केवढा प्रशस्त आहे ग !” 

— रमाला हे ऐकून भयंकर संताप आला.

– क्रमशः भाग पहिला .  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाचणाऱ्या मना .. जरा थांब ना… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ वाचणाऱ्या मना .. जरा थांब ना… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

तुमच्याबाबतीत असं कधी घडलं आहे का, की आपण आवर्जून एखादं पुस्तक वाचायला घेतो. बसल्या बैठकीत वाचून काढायचं असं पण मनाशी ठरवतो. उत्साहात १००-१५० पानंसुद्धा वाचून झालेली असतात. मध्येच काही कारणाने खंड पडतो आणि तेवढ्यातच दुसरं एखादं नवीन आपणच मागवलेलं पुस्तक आपल्या पुढ्यात येतं. झालं! आता नवीन पुस्तकानं आपलं मन वेधलेलं असतं. त्यात काय असेल ते वाचण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नसते. मन अगदी उतावीळ होतं‌. मन काय आपल्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करायला तयारच असतं. लगेच बहाणा शोधतं.‌ आता या पुस्तकात इतकं वाचून झालंय तर थोडा ब्रेक घेऊया म्हणजे पुढचं वाचताना नवं काही सापडेल का ते पाहता येईल, त्याच्यावर चिंतन करता येईल. आणि मग परिचय लिहिताना आपल्याला काही अवांतर मुद्दे सुचतील. सतत एकाच विचारानंं सगळं वाचण्यानं, वाचताना पण मोनोटोनस झाल्यासारखं वाटतं. तसं न वाटता प्रत्येक पान फ्रेश विचारातून वाचलं गेलं पाहिजे. म्हणजे मग पुस्तक आपल्याला खऱ्या अर्थाने उमगेल वगैरे वगैरे. 

असा विचार करून पुढ्यात आलेलं नवं पुस्तक थोडं वाचूया म्हणून ते उत्साहाने हातात घेतलं जातं. पाहता पाहता आपण त्याच्यामध्ये रमून जातो. त्याचीही शंभर एक पानं होतात. आपण ठरवलेलं टार्गेट बऱ्यापैकी पूर्ण करत आलेलो असतो पण ते ठरवलेल्या पुस्तकाबाबत नव्हे. कालांतराने दोन्ही पुस्तकं सारखीच प्रिय होतात आणि मग कुठलं पूर्ण करावं यावर मनात द्वंद्व सुरू होतं. 

पहिल्या पुस्तकातल्या एखाद्या पात्रानं मनावर पकड घेतलेली असते आणि त्याचवेळी दुसऱ्या पुस्तकातल्याही एखाद्या पात्रानं मनावर पकड घ्यायला सुरुवात केलेली असते. आता मनाच्या आणि पात्रांच्या आपसातल्या युद्धात कुठलं पुस्तक विजयी ठरणार हे आपल्याला समजत नसतं. अशावेळी नाईलाजानं जास्त ताण घेऊयात नको म्हणून दोन्हीही पुस्तक बाजूला ठेवली जातात. आणि या आधीच वाचून काढलेलं ज्याच्यावर चिंतन, मनन वगैरे सगळं करून झालं आहे असं तिसरंच पुस्तक आपण हाती घेतो. 

पण आता हे तिसरं पुस्तक वाचताना आपलं मन त्याच्यात अजिबात गुंतलेलं नसतं. आधीच्या दोन्ही पुस्तकांतली आपल्याला आवडलेली दोन्ही पात्रं या तिसऱ्याच पुस्तकात मध्येच डोकावत असतात आणि आपली स्वतःची वेगळीच गोष्ट घुसडण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात आल्यावर आपण ते तिसरं पुस्तक निमूटपणे बाजूला ठेवतो. 

या सगळ्या गडबडीत दिवस संपून जातो. खरी मजा  झोपताना येते. आपल्या दोन्ही अर्धवट राहिलेल्या पुस्तकांची कथा आता सतावत असते. एखाद्या पात्राचा उत्कंठावर्धक प्रवास तर दुसऱ्या पात्राचा गुढ प्रवास उलगडायचा राहिलेला असतो. एखाद्याचा तरी प्रवास पुढे नेऊयात म्हणून आपण अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी ते पुस्तक दामटून वाचायला घेतो. वाचता वाचता दोन्ही पुस्तकातली पात्रं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये घुसून आपली तिसरीच गोष्ट निर्माण करतात. 

‘टार्गेट असद शाह’ आणि ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या दोन पुस्तकांतील पात्रं एकमेकांच्या दुनियेत शिरली आणि त्यांनी प्रचंड धमाल केली. टार्गेट असद शाह मधल्या कबीरनं ‘मायसेलियम’ म्हणजे झाडांच्या बुरशीच्या जाळ्याच्या सहाय्यानं इंटरनेटवरून गम्बोला अरबाज़च्या ठिकाणाविषयी माहिती दिली. आणि त्याला पाइनच्या जंगलात पकडलं. अरबाज़ जंगलात आला तेव्हा जंगलातल्या सर्व वृक्षांनी एक विषारी वायू जंगलात सोडला आणि त्यामुळे तिथे लपलेल्या कवचकुंडलच्या आर्मी ऑफिसर्सना त्याचा पत्ता लागला. असं बऱ्यापैकी भन्नाट कथानक तयार झाल्यावर आपण गुंगीत असलो तरी नंतर लक्षात येतं आपण काहीतरी भलतंच वाचतोय आपल्याला जे वाचायचंय ते हे नाही. अजून एक दोनदा प्रयत्न केला जातो पण तसंच घडायला लागल्यावर मग निमुटपणे हातातलं पुस्तक बाजूला ठेवून दिलं जातं आणि आपण झोपेच्या स्वाधीन होतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठता क्षणी आपल्या टेबलवर पडलेली ती दोन पुस्तकं आपलं टार्गेट पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्याकडे अतिशय आशेने पाहत असतात आणि त्यावेळी पुन्हा मनात आज यापैकी कुठलं निवडावं याचं द्वंद्व सुरू होतं.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-1 …  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-1…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

(संत श्री ज्ञानदेव महाराजांनी योगीराज चांगदेवांच्या कोर्‍या पत्राला दिलेलं उत्तर म्हणजे चांगदेव पासष्टी. संत ज्ञानदेवांच्या काळचं प्राकृत म्हणजेच मराठी आजच्या संदर्भात, सर्वसामान्य लोकांना कळायला अवघड आहे. म्हणून सुश्री शोभना आगाशे यांनी सध्या प्रचलित असलेल्या मराठीत या चांगदेव पासष्टीचं केलेलं रूपांतर प्रस्तुत करीत आहोत.)

जंव अप्रकट परमेश

विश्वाचा होतसे भास

प्रकट होई तो जेधवा

नुरे विश्व भास तेधवा॥१॥

 

अप्रकट तो जरि भासे

प्रकट परि नच दिसे

दृश्यादृश्य परे

गुणातीत असे बरे॥२॥

 

विशाल जसजसा होत

व्यापतसे तो जगत

भासचि हा परि जाणी

असुनि नसे घे ध्यानी॥३॥

 

रूपे बहु घेई जरी

अरूपातच असे खरी

अलंकार बनले जरी

सुवर्णा ना उणे तरी॥४॥

 

लाटांच्या झिरमिळ्या

सागरास पांघरल्या

भासचि हा जाण केवळ

सकळ असे निव्वळ जळ॥५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ || अखेर भीती संपली ||… लेखक : अस्मिता (वार्ताहर) ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ || अखेर भीती संपली ||… लेखक : अस्मिता (वार्ताहर) ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

|| एकदा आपल्या मुलींना यांच्या जागेवर ठेऊन पाहूयात???…..अखेर भीती संपली ||

आज दादर प्लॅटफॉर्म बाहेर तिकीट काउंटर येथे सहा शिकणाऱ्या मुली जमिनीवर अंथरलेल्या एका बॅनरवर बसलेल्या, त्रस्त असलेल्या, चिंतीत व भयभीत अवस्थेत दिसल्या.. 

मुंबईत हे दृश्य सायंकाळच्या 7.30 ते 8.00 च्या वेळेचे होते… या मुली बाहेर जमिनीवर अश्या का बसल्या आहेत ? विचारणा केली असता किती वाईट व्यवस्था व भीतीदायक परिस्थिती आहे हे कळाले…. 

आपल्या गांव खेड्यातून येणाऱ्या एकट्या मुलींसाठी ही किती गांभीर्याची बाब आहे …… ( सदिच्छा मनीष साने, ही MBBS शिकणारी तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली असता एकाएकी बेपत्ता होते आणि मग तिचा खून या घडलेल्या घटनेनेही आपण सावध अजूनही नाही कसे????) …हे मुंबईत घडत असताना आपण इतके निष्काळजी कसे ?????…..

अश्या अनेक मेहनती मुली आपल्या कुटुंबीयांचे आधार असतात….मुंबईत एकट्या येतात परीक्षा देतात आपल भवितव्य घडविण्यासाठी….

नाशिक जिल्ह्यातून अश्याच या सहा मुली मुंबईत नायगांव येथे पोलिस भरती परीक्षेला आलेल्या आहेत, आपल्या आई वडिलांच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या घरी वाट बघत असलेल्या  या लाडक्या मुली दुर्दैवाने त्यांना पोलिस भरती प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी नायगांव येथे राहण्याची जागा अचानक नाकारण्यात येते, जागा तुडुंब भरलेली असल्याने तेथून त्यांना सकाळपर्यंत परतवण्यात येते…. पण कुठे राहायचे हे त्यांना सांगितले जात नाही… या बिचाऱ्या सहा मुली तेथे खूप वेळ वाट बघत पण कोणीच कसलीच मदत करत नाहीत … आम्ही रात्र काढायची कुठे??? याचे कोणी उत्तर देत नाही…. खरंच शरमेची गोष्ट आहे….

या सहा मुली रात्री कुठे जातील?? कुठे राहतील?? काय खातील?? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सुरक्षा बाहेर अंधारात कोण करतील???? किंवा रस्त्याकडील फूटपाथ वर या मुलींचे संरक्षणाचे काय???….  हा विचार कोणालाही पडला नाही ???? मग काही अनर्थ घडले की मेणबत्ती घेऊन आपण सगळे काही वेळ मैदानात….मग आपआपल्या घरी…. ही दयनीय व्यवस्थेची अवस्था पाहून भीतीदायक वाटले आणि या सहा मुलींची चिंता वाटू लागली आणि वाईटही…

आपल्या शेतकऱ्यांची ही मुले गावा खेड्यातून पोलिस भरतीसाठी प्रचंड मेहेनत घेऊन मुंबईत येत, या मुली आपल्या कुटुंबीयांचा आधार असत आणि पोलिस परीक्षेला मुंबईत आल्यावर या मुलींनाच आपल्या सुरक्षेची भीती वाटणारे घडत…. सायंकाळच्या वेळेस नायगांव पोलिस भरती ग्राउंड वर राहण्याची सोय नाकारण्यात येत…. मग नंतर कोणीतरी 5000 रुपये मागत गेस्ट रूम चे…. 

कुठून देणार या शेतकऱ्यांच्या मुली इतके पैसे एका रूम चे???म्हणून या मुली एकत्र पुन्हा दादर स्टेशन परिसरात आल्या…व तेथे बसल्या….व प्रत्येक मुलगी चिंतेत होती रात्री काय होईल आपले ????कसे होईल ???

दादर प्लॅटफॉर्म बाहेर असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबल ला विचारले असता त्यांनी ही चौकशी केली पण त्यांना प्लॅटफॉर्म वर असलेल्या विश्रामगृहात 2 तासांच्या वर राहता येणार नाही असे ते म्हणाले..मग दोन तासांनी या 6 मुली रात्री कुठे जाणार????…. 

या सहा मुली जेथे बसलेल्या होत्या तेथे गर्दुल्ले, पाकीट मार सतत फिरतात हे ही पोलिस कॉन्स्टेबल यांनी सांगितले म्हणाले रात्रीचे इन्चार्ज या मुलींना बसू देणार नाहीत मी आहे तोवर इथे बाहेर बसा पण सामानाची काळजी घ्या….मी इथेच आहे काही वेळ….

रात्रीच्या भीतीच्या विचारात असताना मी या सहा मुलींना पाहिले व ही सगळी बाब ऐकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला व त्यांचा फोन व्यस्त असल्याने लगेचच वर्षा बंगल्यावर फोन केला, तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे हे होते, त्यांनी हे सगळं एकताच ताबडतोब स्टेशन मास्टर अमित खरे व डेप्युटी स्टेशन मास्तर पाण्डेय यांच्याशी फोनवर संवाद साधला व त्या सहा मुलींना रात्री सुखरूप राहण्याची व विश्रांतीसाठी महिला वेटिंग रुममध्ये तत्काळ व्यवस्था केली …. 

सकाळी 5.00 वाजता ग्राउंड वर धावण्याची, अंग कासरतीची परीक्षा म्हणजे आदल्या दिवशी पुरेस जेवणं आणि पुरेशी झोप…या सहा मुलींना सुरक्षेचं कवच म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सचिव हे कर्तव्यात खरे उतरले…. 

या सहा मुली व त्यांचे आई वडील हे ऐकून निर्धास्त झाले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सचिव अमित बराटे वा रेल्वे स्टाफ यांचे मनःपुर्वक आभार मानले…CM एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे असे या मुलींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे….

रात्रीची भीती ?…अखेर संपली….

पण जर पूर्णतः संपल्यास बरे होईल अशी ग्वाही या मुलींच्या कुटुंबीयांनी दिली आहे….या परिस्थतीचा विचार करून प्रशासनाने काळजी घेत योग्य तो निर्णय घेऊन GR काढला तर बाहेरगावाहून येणाऱ्या या आपल्या मुली मुंबईतही पूर्ण: सुरक्षित राहतील ……

जरा आपण सगळ्यांनी काही क्षणासाठी आपल्या मुलींना या मुलींच्या जागेवर ठेऊन पाहूयात ???? किती भीतीदायक आहे असे घडणे.  

लेखक : अस्मिता (वार्ताहर)

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #186 ☆ व्यंग्य – जानवरों की बेअदबी ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक विचारणीय  व्यंग्य  ‘जानवरों की बेअदबी’। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 186 ☆

☆ व्यंग्य ☆ जानवरों की बेअदबी

कहीं पढ़ा कि एक राज्य में कुछ समझदार लोगों ने ‘हलाल मीट’ के विरुद्ध आवाज़ उठाते हुए माँग की कि बाज़ार में ‘हलाल मीट’ की जगह ‘झटका मीट’ ही बेचा जाना चाहिए। यानी जानवर को एक झटके में ही इस दुनिया से रुखसत किया जाए, वध के तरीके में कोई मज़हबी कर्मकांड न हो।

उल्लेखनीय है कि आदमी के जन्म से ही अनेक पशु-पक्षी और समुद्री-जीव उसके ज़ायके के लिए खुशी-खुशी अपनी जान की कुर्बानी देते रहे हैं। मनुष्य- जाति का इतिहास लिखते समय पशुओं की इस कुर्बानी को स्वर्णाक्षरों में लिखा जाना चाहिए।

सभी धर्मग्रंथ मानते हैं कि हर जीव का जन्म और मृत्यु पूर्वनियत है। शायद इसीलिए पशुओं का वध करते समय आदमी को हिचक नहीं होती। जब सब कुछ पूर्व निश्चित है तो आदमी को केवल ऊपर वाले की इच्छा की पूर्ति का निमित्त ही माना जा सकता है। इस हिसाब से देखें तो आदमी की हत्या पर मिलने वाला दंड भी अटपटा लगता है। कुछ लोग इतने ‘पशु-प्रेमी’ होते हैं कि, बिना माँस के, निवाला उनके हलक से नीचे नहीं उतरता।

ऊपर बताए गये वाकये में जब हल्ला- गुल्ला ज़्यादा बढ़ा तो अधिकारी हरकत में आये और हलाल और झटका के तरफदारों को अलग-अलग समझाइश देने की कोशिश शुरू हुई, लेकिन बहुत मगजमारी के बाद भी पशु-वध के किसी एक तरीके पर दोनों पक्षों की सहमति नहीं बन सकी। तभी एक अधिकारी, जिन्हें उनकी न्यायप्रियता और संवेदनशीलता के कारण सनकी माना जाता था, ने एक नूतन प्रस्ताव पेश किया। उन्होंने सुझाव रखा कि बेहतर होगा कि इस मामले पर प्रभावित पक्ष यानी मुर्गो और बकरों की रायशुमारी करा ली जाए कि वे किस तरीके से स्वर्ग जाना पसन्द करेंगे।

अधिकारी के इस प्रस्ताव पर सभी पक्षों की सहमति बन गयी और प्रस्ताव पेश करने वाले अधिकारी को ही रायशुमारी की ज़िम्मेदारी सौंप दी गयी। अधिकारी ने तुरन्त वोटिंग-मशीन का इन्तज़ाम किया जिस पर पाँव से बटन दबाकर अपनी पसन्द अंकित की जा सकती थी। तीन विकल्प रखे गए— झटका, हलाल और नोटा, यानी ‘इनमें से कोई नहीं’।

नगर के बकरों-मुर्गों को इकट्ठा करके उनका वोट डलवाया गया। जब परिणाम सामने आया तो सभी पक्ष ठगे से रह गये क्योंकि सभी पशुओं ने ‘नोटा’ का बटन दबाया था, यानी वे फिलहाल इस दुनिया से रुखसत नहीं होना चाहते थे।

देखकर अधिकारियों के मुँह का ज़ायका बिगड़ गया। ऐसी बेअदबी! दिस इज़ ओपिन डिफाएंस ऑफ अथॉरिटी। ‘हमने उन्हें अपनी बात रखने का मौका दिया और वे हमारा ज़ायका बिगाड़ने पर तुल गये! इतने दिन तक दाना-पानी देने का ये सिला!’ कुछ लोगों ने रायशुमारी कराने वाले अधिकारी की लानत-मलामत की क्योंकि उन्होंने ‘नोटा’ का विकल्प शामिल किया था।

अन्त में निष्कर्ष निकला कि अधिकारियों ने पशुओं को उनकी किस्मत का फैसला करने का मौका दिया, लेकिन उन्होंने उसका गलत फायदा उठाया। इसलिए इस मामले में आगे उनसे कोई राय न ली जाए। अब एक तीन-सदस्यीय समिति गठित की जाएगी जो दो महीने के भीतर मनुष्य-जाति के दोनों पक्षों से बात कर सहमति बनाने की कोशिश करेगी। तब तक पशुओं को रुखसत करने के लिए वर्तमान तरीके ही अपनाये  जाएंगे।

 © डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media # 133 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

? Anonymous Litterateur of Social Media# 133 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 133) ?

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus. His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like, WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

? English translation of Urdu poetry couplets of Anonymous litterateur of Social Media # 133 ?

☆☆☆☆☆

Friendship 

बेपरवाह वक्त तो चलता रहा,

पर जिंदगी सिमटती गई

दोस्त तो तमाम बढ़ते गए,

पर दोस्ती घटती गई… !

☆☆ 

Unheeding time kept on moving

But the life kept shrinking…

Though friends kept on increasing,

But friendship kept decreasing.

☆☆☆☆☆

बस निभाने वाले ही तो

नहीं मिलते हैं, साहब,

चाहने वाले तो हर

एक मोड पर खड़े हैं…!

☆☆

Those who can fulfill promises

are just not found, Sire…

While adorers are waiting at

every nook and corner…!

☆☆☆☆☆

इन संगदिल चलते-फिरते बुतों  को

भला क्यों कर कोई इंसान माने

इंसान तो वो ही कहलाता है

जिसके जिस्म में एक जिंदा रूह हो…!

☆☆  

Why must these heartless statues

be considered as human beings,

They only deserve to be humans,

Who’ve a live soul in their body…!

☆☆☆☆☆

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 184 ☆ ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 184 सुगंध ?

सिग्नल खुलने की प्रतीक्षा में खड़ा हूँ। एक व्यक्ति गुलाब के पुष्पगुच्छ और पंखुड़ियों की माला बेच रहा है। सौदा लेकर मेरे पास भी आता है। खरीदने का कोई कारण नहीं है तथापि चिंता और चिंतन का कारण अवश्य है। माला हो या पुष्पगुच्छ, दोनों में से किसी तरह की कोई सुगंध नहीं आ रही। एकाएक नथुने लगभग चार दशक पीछे लौटते हैं और तन-मन सुगंधित हो उठते हैं।

स्मरण आता है कि उन दिनों महाविद्यालय में कोई युवक किसी युवती को देने के लिए अपने बैग में छिपाकर गुलाब का एक पुष्प ले आता तो सारी कक्षा महक उठती। पुष्प किसके लिए लाया गया, यह तो पता नहीं चलता पर कक्षा में किसीके पास गुलाब है, इसकी जानकारी हर एक को हो जाती। गुलाब की गंध ही उसका सबसे बड़ा परिचय थी।

तब और अब का मंथन हुआ, विचार जन्मा। पिछले कुछ दशकों से पुष्पों की भाँति ही जीवन से भी सुगंध कहीं दूर हो चली है। सारे हाइब्रीड पुष्प अब एक जैसे, बड़े आकार के और अधिक सुंदर दिखने लगे हैं। विचार की परिधि में मनुष्य भी आया। पैसे और पद के अहंकार से हाइब्रीड-सा एलिट मनुष्य पर भीतर से सद्गुणों को डिलीट कर चुका मनुष्य। प्रदर्शन के भाव का मारा मनुष्य, भीतरी सुगंध के अभाव से हारा मनुष्य।

प्रदर्शन के समय में दर्शन की बात करना बहुधा हास्यास्पद हो सकता है किंतु विचारणीय है कि प्रदर्शन में मूल शब्द दर्शन ही है। दर्शन बचा रहेगा तो अन्य संभावनाएँ भी बची रहेंगी। मूल नष्ट हुआ तो अन्य सभी के नष्ट होने की आशंका भी बनी रहेगी।

संत कबीर लिखते हैं,

शीलवंत सबसे बड़ा, सब रत्नन की खान।

तीन लोक की संपदा, रही शील में आन।।

शील अर्थात सद्गुण ही सबसे बड़ी सम्पदा और रत्नों की खान है। शील में ही तीनों लोकों की संपत्ति अंतर्निहित है।

भौतिक संपदा के साथ-साथ यह आंतरिक त्रिलोकी भी व्यक्ति पा ले तो व्यक्तित्व को सुगंधित होने में समय नहीं लगेगा।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 आपदां अपहर्तारं साधना श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च को संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र सूचित की जावेगी।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 132 ☆ – गीत – नदी मर रही है… – ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित  गीत “~ नदी मर रही है… ~”)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 132 ☆ 

~ गीत ~ नदी मर रही है ~ ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

नदी नीरधारी, नदी जीवधारी,

नदी मौन सहती उपेक्षा हमारी

नदी पेड़-पौधे, नदी जिंदगी है-

भुलाया है हमने नदी माँ हमारी

नदी ही मनुज का

सदा घर रही है।

नदी मर रही है

*

नदी वीर-दानी, नदी चीर-धानी

दी ही पिलाती बिना मोल पानी,

नदी रौद्र-तनया, नदी शिव-सुता है-

नदी सर-सरोवर नहीं दीन, मानी

नदी निज सुतों पर सदय, डर रही है

नदी मर रही है

*

नदी है तो जल है, जल है तो कल है

नदी में नहाता जो वो बेअकल है

नदी में जहर घोलती देव-प्रतिमा

नदी में बहाता मनुज मैल-मल है

नदी अब सलिल का नहीं घर रही है

नदी मर रही है

*

नदी खोद गहरी, नदी को बचाओ

नदी के किनारे सघन वन लगाओ

नदी को नदी से मिला जल बचाओ

नदी का न पानी निरर्थक बहाओ

नदी ही नहीं, यह सदी मर रही है

नदी मर रही है

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

१२.३.२०१८, जबलपुर

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares