हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 59 ⇒ सृजन सुख… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “सृजन सुख “।)  

? अभी अभी # 59 ⇒ सृजन सुख ? श्री प्रदीप शर्मा  ? 

जीवन, सृजन का ही तो परिणाम है। सृष्टि का चक्र सतत चलायमान रहता है, यहां कुछ भी स्थिर नहीं हैं। सब अपनी अपनी धुरी पर घूम रहे हैं, घूमते वक्त पहिया हो या चाक, वह स्थिर ही नजर आता है। पंखा गति में चलकर हमें हवा दे रहा है, लेकिन स्थिर नजर आता है। संगीत में, नृत्य में, जितनी गति है, उतनी ही स्थिरता भी है।

एक थाल मोती भरा, सबके सर पर उल्टा पड़ा। लेकिन वह कभी हम पर गिरता नहीं। चलायमान रहते हुए भी स्थिर नज़र आना ही इस सृष्टि का स्वभाव है, इसीलिए इसे मैनिफेस्टशन कहते हैं। इसके ऊपर, अंदर, बाहर, रहस्य ही रहस्य है। ।

इसे मेनिफेस्टेशन इसलिए कहते हैं, क्योंकि इसका कर्ता अदृश्य होता है, आप उसे चाहे जो नाम और रूप दे दें, उसे कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि वह तो सर्वत्र व्याप्त है, आपके अंदर भी। और आप भी उस मेनिफेस्टेशन के एक आवश्यक अंग हो। आप रहें ना रहें, यह दुनिया यूं ही चलती रहेगी। ।

एक बीज की यात्रा मिट्टी से शुरू होती है, बस यही सृष्टि की शुरुआत है। एक बीज ही पूरा वृक्ष बनता है, फलता फूलता है, फल फूल बिखेरता है। फिर वही फल का बीज पुनः जमीन में जाकर ऐसे कई वृक्षों की बहार लगा देता है।

बीज मंत्र में ही पूरी सृष्टि का सार है। मुर्गी ही अंडा देती है, सृजन का कॉपीराइट महिलाओं के पास रिजर्व है। पुरुष मां नहीं बन सकता। संसार का सबसे बड़ा सृजन का सुख केवल औरत को नसीब है, आप तो बस मर्द और बाप बने घूमते रहो। बच्चे को अपना नाम देकर खुश होते रहो, जब कि वह तो उसकी मम्मा का बेटा है। ।

प्रकृति में यह माता पिता का भेद नहीं। यहां बच्चे का नामकरण नहीं होता। यह प्राणी प्रकृति की संतान है। नर मादा अपना कर्तव्य निभाकर अनासक्त तरीके से उसे उसका आसमान सौंपकर निश्चिंत हो जाते है। ना किसी की शादी ब्याह की चिंता, न नौकरी की चिंता। ।

सृजन कार्य दो व्यक्तियों द्वारा ही निष्पादित किया जाता है, अकेला चना भाड़ नहीं फोड़ सकता। परमात्मा की यह देन दोनों की झोली में अवतरित होती है, वे इसके माता पिता कहलाते हैं। वे अचानक दृष्टा से सृष्टा बन जाते हैं। बस वही परिवार एक वृक्ष की भांति फलता फूलता रहता है और आपका वंश धन्य हो जाता है।

पहली बार संतान सुख का एक अलग ही आनंद होता हैं। हमें प्रकृति के रहस्यों का पता चलता है। कितना कुछ मौजूद है, पृथ्वी के इस गर्भ में और प्रथ्वी के इस धरातल पर। रोज फूल खिल रहे हैं, रोज नदियां कल कल बह रही हैं, रोज मंद पवन चल रही है, सूरज की रोशनी से ही तो हमारी सृष्टि है, हमारी दृष्टि है। हमारे लिए ही खेत अनाज उगाते हैं, गायें दूध देती हैं। सृष्टि हमारी मां है, वही हमारा लालन पालन करती है। ।

सृजन के कई आयाम हैं।

पुरुष मात्र, मातृ सुख से ही वंचित हो सकता है, लेकिन उसके लिए भी सृजन के कई द्वार खुले हैं। वह साहित्य का सृजन करे, संगीत का सृजन करे, कोई खोज करे, कोई आविष्कार करे। विभिन्न इल्मी विधाओं में भी सृजन का सुख खोजा जाता है।

प्यार का पहला खत, लिखने में वक्त तो लगता है, वैसे यह बात परिंदों तक चली जाएगी, अतः एक सृजन प्रेमी लेखक को जो सुख सृजन में मिलता है, वह किसी मातृ सुख से कम नहीं होता। पहली रचना अभी नहीं, तो कभी नहीं। यहां कोई परिवार कल्याण नहीं, स्वयं का ही कल्याण होना है, जब आपकी छोटी बड़ी रचनाएं, दैनिक अखबार और साहित्यिक पत्रिकाओं में उछलकूद मचाती नजर आएंंगी तो क्या आपको खुशी नजर नहीं आएगी। ।

ज्ञानोदय में छपी यह रचना आपकी है, जी हां अपनी ही है। वाह, क्या कमाल की रचना है। बधाई। क्या यह सुख किसी मातृत्व सुख से कम है। बस फिर तो रचनाएं ना जाने कहां कहां से उतरने लगती हैं, पत्र पत्रिकाओं में छाने लगती हैं। आप भी सोचते हैं, अब इन सबका सामूहिक विवाह कर दूं और एक पुस्तकाकार रूप में पाठकों को समर्पित कर दूं।

बड़े अरमानों के बाद विमोचन के मंडप में आपकी पहली कृति का लोकार्पण होता है। है न यह मातृ सुख और पितृ सुख का मिला जुला तोहफा। बच्चा सबको पसंद आता है, लोग रचना को नेग भी देते हैं, आपकी रचना कमाऊ पुत्री निकल जाती है। ।

आज बाजार में आपकी कई रचनाओं की चर्चा है। किसी रचना को शिखर सम्मान मिल रहा है तो किसी को सरस्वती सम्मान। आप चाहते हैं मेरी किसी रचना को अगर नोबेल ना सही तो साहित्य अकादमी या ज्ञानपीठ पुरस्कार ही मिल जाए, तो मैं भाग्यशाली, खुद ही अपनी पीठ थपथपा लूं। लोग खुश तो होते हैं, लेकिन अंदर से बहुत जलते हैं।

मेरी किसी रचना को किसी की बुरी नजर ना लगे। पिछली बार कोरोना में कुछ रचनाओं को दीमक लग गई थी। आप भी अपनी अच्छी रचना की नज़र उतरवा लें। सृजन है, तो सृजन सुख है। ।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 70 ☆ ।। यह छोटी सी जिंदगी प्रेम के लिए भी कम है ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

☆ मुक्तक  ☆ ।। यह छोटी सी जिंदगी प्रेम के लिए भी कम है ।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

[1]

ज्ञान बुद्धि विनम्रता   तेरे  आभूषण हैं।

सत्यवादिता प्रभु  आस्था तेरे भूषण हैं।।

मत राग द्वेष कुभावना    धारण करना।

ईर्ष्या और घृणा कुमति भी     दूषण हैं।।

[2]

आत्म विश्वास से खुलती सफल राह है।

सब कुछ संभव यदि जीतने की चाह है।।

व्यवहार कुशलता  बनती उन्नति साधक।

बाधक बनती हमारी नफरतऔर डाह है।।

[3]

मत पालो क्रोध  प्रतिशोध  बन जाता है।

मनुष्य स्वयं जलता औरों को जलाता है।।

प्रतिशोध का  अंत  पश्चाताप  से है होता।

कभी व्यक्ति प्रायश्चित भी नहीं कर पाता है।।

[4]

विचार आदतों से ही चरित्र निर्माण होता है।

इसीसे तुम्हारा व्यक्तित्व चित्र निर्माण होता है।।

तभी बनती तुम्हारी   लोगों के दिल में जगह।

गलत राह पर केवल दुष्चरित्र निर्माण होता है।।

[5]

बस छोटी सी जिंदगी प्रेम के लिए भी कम है।

नफरत बन  जाती   जैसे लोहे की जंग   है।।

बदला लेने में बर्बाद नहीं  करें इस वक्त को।

तेरा सही रास्ता ही लायेगा सफलता का रंग है।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 134 ☆ बाल गीतिका से – “भगवान हमें प्यार का वरदान दीजिये…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित बाल साहित्य ‘बाल गीतिका ‘से एक बाल गीत  – “भगवान हमें प्यार का वरदान दीजिये…” । हमारे प्रबुद्ध पाठकगण   प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

 ☆ बाल गीतिका से – “भगवान हमें प्यार का वरदान दीजिये…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

भगवान हमें प्यार का वरदान दीजिये ।

औरों के कष्ट का सही अनुमान दीजिये ॥

 

दुनिया में भाई-भाई से हिलमिल के सब रहें

है द्वेष जड़ लड़ाई की – यह ज्ञान दीजिये ॥

 

होता नहीं लड़ाई से कुछ भी कभी भला

सुख-शांति के निर्माण का अरमान दीजिये ॥

 

निर्दोष मन औ’ शुद्ध भावनाओं के लिये

हर व्यक्ति को सबुद्धि औ’ सद्ज्ञान दीजिये ॥

 

दुनिया सिकुड़ के  आज हुई एक नीड़ सी

इस नीड़ के कल्याण का विज्ञान दीजिये ॥

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॐ तत् सत्…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ॐ तत् सत्… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(७२५व्या ज्ञानेश्वरीस ज्ञानचरणनत् ज्ञानेश ज्ञानसमृध्दी शुभेच्छार्पण !)

त्रिगुणे त्रैलोक्यज्ञानी

ब्रम्हांड बीज सुखांनी

ज्ञान देई ज्ञानेश्वरी

ओवी-श्लोकादि मुखांनी.—

 

पसायदान श्रेष्ठ

संत ज्ञानेश ज्येष्ठ

देव लोक प्रसन्न

कृपासेवेशी पृष्ठ.—

 

ताटी उघडी तव

कष्ट जीवाशी डंक

मुक्ता होई माऊली

ऐसा ज्ञानी निःशंक.—

 

अठरा अध्यायादि

मोक्षप्रबंध वर

जन्म-मृत्यू रहस्य

टिका गीता सादर.—

 

सकळ मानवासी

कर्म-भक्ती साक्षात

प्रत्यक्ष लिही ज्ञाना

महात्म्य युगे बोलती

आम्ही बालके गुन्हा.——

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 155 – गुरूकृपा योग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 155 – गुरूकृपा योग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

सौभाग्ये लाभला।

गुरूकृपा योग।

सरतील भोग।

जन्मांतरी।।१।।

 

प्रेमे बाळकडू।

पाजते माऊली।

संस्कार सावली।

आद्यगुरू।।२।।

 

जीवनाचा वारू।

सावरण्या दृष्टी।

संगे प्रेमवृष्टी।

पितृछत्र।।३।।

 

ज्ञान विज्ञानाची।

उजळली ज्योत।

ज्ञानमयी स्रोत।

गुरूजन।।४।।

 

बहुव्यासंगी ते।

माझे गुरूजन।

ठेवा ज्ञानधन।

दिधलासे।।५।।

 

ज्ञान मकरंद।

असे चराचरी।

मधुमक्षी परी।

ध्येय हवे।।६।।

 

अनंत स्वरुपे।

गुरू माऊलीची।

वाट प्रकाशाची।

नित्य दावी।।७।।

 

गुरूपदी हवी।

श्रद्धा भक्ती खरी।

तेव्हा मुक्ती चारी

साधतील।।८।।

 

गुरूकृपा योग।

परीस दुर्लभ।

जीवन सुलभ।

सर्वार्थाने।।९।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  वटपौर्णिमा अशी असावी— ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

🌳 विविधा 🌳

☆ वटपौर्णिमा अशी असावी— ☆ सौ. विद्या पराडकर ☆

आज वटपौर्णिमा…  भारतीय संस्कृतीने जतन केलेला पती,पत्नीच्या अतूट व अलौकिक प्रेम धाग्यात गुंफलेला एक अजोड पुष्पहारच जणू. पौराणिक कथेनुसार यमराजाच्या हातून ज्या सावित्रीने सत्यवानाला अत्यंत नम्र विनंती करुन, बुध्दीचातुर्याने, विवेकाने ज्या निर्धाराने सोडविले व चार वर मोठ्या  खुबीने मिळविले, .म्हणजेच सौभाग्य मिळविले, ती सावित्री त्रिखंडात अजरामर आहे. पतीवरील नितांत प्रेम व अखंड सौभाग्याची शिंपण ही ह्या व्रतामागील मूलभूत प्रेरणा आहे.

आज समाज कितीतरी बदलला आहे. मानवी जीवनाची गतिमानता वाढली आहे  शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन असल्यामुळे आजची स्त्री घराचे कुंपण ओलांडून बाहेर पडली आहे. शिक्षणाने ती समृद्ध झाली आहे. तिचा भौतिक विकास झाला आहे. तिचा शैक्षणिक विकास झाला आहे. परंतू शिक्षणाचा जो दुसरा आणि महत्त्वाचा उद्देश ‘संस्कृती संवर्धन व नैतिक मूल्यांची जोपासना करणे‘ आहे– हे कार्य आजचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आजच्या स्त्रीला परंपरागत जीवन जगणे अशक्यप्राय झाले आहे.  आजच्या प्रगत समाजात प्रगत जीवन पद्धतीत स्त्रीला दोन्ही तारांवर नाचता येत नाही. पण दोन्ही मतांचा सुवर्णमध्य मात्र साधता येतो. जीवनाच्या अंधारमय रस्त्यावर नव्या विचारांच्या नव्या प्रकाश वाटा दिसू लागतात. या सुवर्ण मध्याचा उपयोग केल्यास मानवी जीवन सुखकर होऊन समृद्ध होऊ शकते.

ढासळलेल्या कुटुंब पद्धतीला व समाजाला आधार देण्याचे काम हा सुवर्णमध्य साधू शकतो. एकत्र कुटुंब पद्धतीतील सेवा व्रत हे कोणत्याही धार्मिक व्रताच्या योग्यतेचे नव्हे का? प्रेम जिव्हाळा आपुलकी यांना पारख्या झालेल्या नात्याला नव संजीवनी मिळू शकते व निद्रिस्त नात्याला उजाळा मिळू शकेल.

आजच्या समानतेच्या जीवन संघर्षात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे. कधी तिला कौटुंबिक, सामाजिक, तर कधी आर्थिक संघर्ष करावा लागतो. या संघर्षात पतीने पत्नीला साथ देणे आवश्यक आहे.  भारतीय स्त्री ही समर्पिता आहे. षड्ररिपूवर नियंत्रण ठेवून, कर्तव्य म्हणजेच देव मानणारी तिची भूमिका असावी. सुख व दु:ख पती पत्नीचे समान खेळणे असावे. यशस्वी संसाराकरता, समृद्ध जीवनासाठी उत्तम संकल्पाचे बीजारोपण केल्यास मानवी जीवन वृक्ष वृध्दींगत होऊ शकतो.

आज आपण कलियुगाच्या मध्यावर आहोत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विशाल छायेत माणूस राहत आहे.  भौतिक व चंगळवाद व दहशतवाद यांचे प्रचंड तांडव आज सुरू आहे. अहंकाराला कवेत घालून माणूस जगत आहे. मानवी मूल्यांचा नाश‌ होत आहे. अशा वेळी मानव्याला जपणाऱ्या संस्कारांची नितांत गरज आहे. ही गरज वटसावित्री या सणातून आधुनिक सावित्री भागवू शकते. नात्यातील समरसता, प्रेम, निष्ठा, कर्तव्य भावना, विशाल दृष्टिकोन, सेवाभाव, सहकार्याची भावना, ही सर्व या व्रताची सूत्रे आहेत. ही सूत्रे परस्परांनी जोपासल्यास कुटुंब व्यवस्था भर भक्कम पायावर उभी राहून समाजाला उन्नत अवस्था प्राप्त होईल… आधुनिक सावित्री या वाटेने गेल्यास प्रेमवीणेवरून संसाराची तार छेडली जाईल. जुने व नवे यांचा मेळ घालून, सणांचे ओझे न घेता, मानवी मूल्यांचे जतन करून, स्त्री समृद्ध होऊ शकेल.

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “फुलपुडी”… भाग 2 ☆ श्री क्षितिज दाते ☆

? जीवनरंग ❤️

☆ “फुलपुडी”… भाग 2 ☆ श्री क्षितिज दाते ☆

(मागील भागात आपण पाहिले – हे ऐकून तिला थोडंसं हायसं वाटलं.

“ हुश्श !!.. थांबा लगेच त्याचे ३ महिन्याचे राहिलेले पैसे ट्रान्सफर करते !”.

“ नको नको … आता मी स्वतः जाऊनच देतो .. त्याचे आभार प्रत्यक्ष मानतो. मला इतक्या दिवसांनी बघून त्यालाही जरा बरं वाटेल!” आता इथून पुढे )

एका चकार शब्दाने पैशाबद्दल न विचारता सलग इतके महीने फुलपुडी देत होता तो.

बाबांच्या लेखी त्या फुलपुडीचं महत्व बघता हे कुठल्याही उपकारापेक्षा कमी नव्हतं. आता मात्र बाबांना कधी एकदा संध्याकाळ होतेय आणि स्वतःच्या हातानी त्याला पैसे देऊन मनापासून कृतज्ञता व्यक्त करतोय असं झालं होतं. संध्याकाळी स्वयंपाकाच्या मावशी आल्या आणि तडक बाबा फुलवाल्याकडे गेले.  तिथे जाऊन बघतात तर काय ? त्या ठिकाणी कुठलीशी चहा-वडापावची टपरी होती. बाबांनी कुतुहलाने त्याला विचारलं,

“ अरे, इथे फुलांचं दुकान होतं त्यांनी काय नवीन गाळा घेतला काय ?’

“ नाय काका .. तो गेला .. माझा गाववाला होता तो !!”. 

“ कुठे गेला ? मला पत्ता दे बरं !”.

“ वारला तो काका .. २-३ महिनं झालं !”.

“ बाप रे !! काय सांगतोस काय ? मग ते दुकान दुसरं कोणी चालवतं का ?”.

“ नाय ओ काका ! फुलांचा धंदाच बंद केला. आता मी चालवतो हे दुकान “.

हे ऐकून बाबांना चांगलाच धक्का बसला पण आता त्यांच्या मनातल्या विचार डोहात एका नवीन प्रश्नानी उडी मारली.  फुलांचं दुकान जर बंद झालं तर मग दाराला रोज फुलपुडी कोण अडकवून जातंय?

त्यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं. त्यांच्या बागेतल्या मित्रांकडे चौकशी केली. संस्थेतर्फे आलेल्या मुलाची शक्यता पडताळून पहिली. लेक विसरली म्हणून जावयानी चेन्नईहून काही व्यवस्था केली का याची सुद्धा खातरजमा केली. पण फुलपुडीबद्दल सगळेच अनभिज्ञ होते. शेवटी त्यांनी सोसायटीच्या वॉचमनला या बाबत विचारलं.

“ ओ हां शाब .. एक लोडका आता है रोज .. शायकील पे .. कोभी शाम को आता है.. कोभी रात को लेट भी आता है !!“

“ अरे … अपने जान पहचान का है क्या ?”

“ पैचान का ऐसे नही… वो रोज आता है इतने दिनसे .. तो जानता है मै. “

“ अभी आज आयेगा तो मुझे बताओ !”

आता बाबांच्या डोक्यात एकाच विचाराचा भुंगा… . तो कोण असेल?

संध्याकाळनंतर बरीच वाट बघून शेवटी बाबा झोपून गेले पण रात्री उशिरा कोणीतरी फुलपुडी अडकवलीच होती.

दुसऱ्या दिवशी मात्र बाबांनी ठरवलं. वॉचमनवर विसंबून राहायचं नाही.  कितीही उशीर झाला तरी याचा सोक्षमोक्ष लावायचाच. संध्याकाळपासूनच दार किलकिलं करून बाबा थोड्या थोड्या वेळाने अस्वस्थपणे येरझारा घालत होते. अधून मधून बाहेर बघत होते.

मध्येच दाराशी खुडबुड आवाज झाला . धावत त्यांनी दार उघडलं. एक तरुण मुलगा गडबडीने खाली उतरत त्याच्या सायकलपाशी जात होता. बाबा काहीसे मोठयाने ..

“ अरे ए , इकडे ये .. ए … !!“

तो मुलगा लगेच वर आला.

“ आजोबा कशे आहे तुम्ही आता ?”

“ मी बरा आहे. पण तू कोण रे बाळा ?? . मी ओळखलं नाही तुला . पण तुला बघितल्या सारखं वाटतंय कुठेतरी . आणि तू फुलपुडी आणतोस का रोज ?.. कोणी सांगितलं तुला ? त्या फुलवाल्यानी का ? त्याच्याकडे कामाला होतास का?”

बाबांचं कमालीचं कुतूहल त्यांच्या या प्रश्नांच्या सरबत्तीतून बाहेर पडत होतं.

“ आजोबा sss . तुम्ही डिशचार्ज घेतल्यावर अँब्युलंसनी आलते किनई घरी,   त्या अँब्युलंसचा डायवर मी !”.

“ अरे हां हां … आता तू सांगितल्यावर आठवला बघ चेहरा. ये आत ये. बस इकडे.. पण तू …. फुलपुडी ? .. त्याला खुर्चीवर बसवता बसवता एकीकडे बाबांचे प्रश्न सुरूच होते. त्याचं काय झालं .. त्यादिवशी तुमचं ते तंगडं मोडलं असून पण ssssss … सॉरी हा आजोबा .. ते रोज नुसते पेशंट, मयत, लोकांचं रडणं वगैरे बघून बघून आपलं बोलणं थोडं रफ झालंय, . पण मनात तसं काय नाय बर का !”..

“ अरे हरकत नाही …   बोल बोल !!”

“ हां ss  तर तुमचा एवढा पाय फ्रँक्चर असून पण तुम्ही ते ताईला फुलपुडीचं सांगत होते ते मनात पार घुसलं होतं बघा माझ्या .तुम्हाला आजींची किती काळजी वाटते ते ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलतं. नंतर येके दिवशी येका पेशंटला आणायला सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलतो अन् माझ्याच समोर एक बॉडी आत आली. बघतो तर तो फुलवाला sss . शॉक लागून मेला बिचारा. पण आई शप्पथ खरं सांगतो आजोबा, त्याची बॉडी बघून मला पहिलं तुम्ही आठवला. आता आजींच्या फुलपुडीचं काय होणार हा प्रश्न पडला.

तेव्हाच ठरवलं की ते बंद होऊन द्यायचं नाय.  मग येक दोन दिवस त्याची कामाला ठेवलेली पोरं दुकान बघत होती त्यांच्याकडून आणून दिली मी फुलपुडी तुम्हाला. नंतर गाशाच गुंडाळला ओ त्यानी. येकदा वाटलं त्या तुमच्या ताई पैशे भरतात त्यांना समजलं तर करतील काहीतरी पण नंतर वाटलं, त्या तरी बाहेरगावाहून काय करणार ? मलाच काही कळना झालं. म्हंटलं डबल झाली तरी चालेल पण आपण देऊ की थोडेदिवस फुलपुडी. माझ्या घराजवळ एक फुलवाला आहे पण त्याच्याकडे घरपोच द्यायला माणसं नाही. म्हंटलं आपणच देऊया. पण मी दिवसभरचा असा कुठं कुठं जाऊन येतो. देवाला घालायची फुलं म्हणल्यावर अशी नको द्यायला. म्हणून रोज घरी जाऊन आंघोळ झाली की मग सायकलवर येतो. बरं आपला घराला जायचा एक टाईम नाय. म्हणून कधी उशीर पण होतो. बरेच दिवस बघितलं तर दाराला कधीच दुसरी पुडी दिसली नाही म्हणजे म्हंटलं आजोबांनी दुसरा फुलपुडीवाला धरला नाही अजून. आता आपणच द्यायची रोज. तेवढाच आजींच्या आनंदात आपला पण वाटा.’

“ अरे मग इतक्या दिवसात एकदा तरी बेल वाजवून आत यायचंस . भेटायचंस. !”

“ अहो . आधीच तुमची तब्येत बरी नाही त्यात तुम्हाला का त्रास द्यायचा आणि भेटण्यापेक्षा फुलपुडी वेळेत मिळणं मत्त्वाचं !”.

“ अरे पण पैसे तरी घेऊन जायचेस की !! फुलवाल्याचे द्यायचेत अजून की तू दिलेस ?.

हे घे पैसे . ” .. पाकिटात हात घालत बाबा म्हणाले.

“ हाय का आता आजोबा . छे छे..  मी नाही घेणार पैसे. पण त्याची काही उधारी नाही बर का. एकदम द्यायला जमत नाही म्हणून रोजचे रोख पैशे देतो मी त्याला !”

“ अरे पण तू का उगीच भुर्दंड सहन करणार ? उलट इतके दिवस तू हे करतोयस त्याचे आभार कसे मानू हेच समजत नाहीये बघ मला. काय बोलावं हेच सुचत नाहीये.

“ अहो भुर्दंड काय ? अन् आभार कसले ? माझे पण आई वडील हैत की गावी . तिकडं असतो आणि माझ्या आईला फुलं हवी असती तर फुलपुडी आणली असतीच की मी. त्यांची इच्छा होती की मी गावात राहावं अन् मला मुंबईतच यायचं होतं. म्हणून त्यांनी बोलणं टाकलंय ओ माझ्याशी. त्याचंच वाईट वाटतं बघा. ही फुलं देऊन मला माझ्या आईला आनंद दिल्याचं समाधान मिळतंय हो!”.

बाबांचे डोळे एव्हाना आपसूक पाणावले होते. त्यांनी त्या मुलाचा हात अलगद हातात घेतला. तो मुलगा सुद्धा भावूक झाला….

“ सीरियस पेशंटला घेऊन जातो तेव्हा वेळेत पोचेपर्यंत जाम टेन्शन असतं आजोबा.

वरच्या सायरनपेक्षा जास्त जोरात माझं हार्ट बोंबलत असतंय . आणि एकदा जीव वाचला की नई  मग भरून पावतं बघा. आपली ड्यूटीच आहे ती, पण त्यादिवशी तुम्ही ते म्हणले होते ना “आईच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची कळी फुलण्यासाठी फुलपुडी॥ ”  .. मला काय असं छान छान बोलता येत नाही तुमच्यासारखं .. पण तुमचं बोलणं ऐकून एक गोष्ट डोक्यात फिट्ट  बसली की..  “ मरणाऱ्यांना जगवणं मोठं काम हायेच पण “ जगणाऱ्यांना आनंदी ठेवणं ” पण तितकंच मत्त्वाचं आहे, म्हणून आता पुढच्या महिन्यात मी गावी जातो आणि आमच्या म्हातारा-म्हातारीला पण जरा खुश करतो. चला….  निघतो आता….  उशीर झाला. जरा जास्त बोललो असलो तर माफ करा हां आजी आजोबा!’

हे सगळं ऐकून आई आत देवघरापाशी गेली. संध्याकाळी दिवा लावून झाल्यावर देवापुढे ठेवलेली साखरेची वाटी घेऊन आली आणि ती त्या मुलाच्या हातात ठेवली. आपला थरथरता हात त्याच्या डोक्यावरून, गालावरून प्रेमाने फिरवला. आणि मृदु आवाजात म्हणाली ….

“ अहो बघा sss  दगडात देव शोधतो आपण .. पण तो हा असा माणसात असतो. नाहीतर या मुलाचं नाव सुद्धा आपल्याला माहिती नाही पण माझ्या आनंदासाठी तो इतके दिवस झटतोय! .. धन्य आहे बाळा तुझी!”

आई दारापाशी गेली. या सगळ्या गप्पात दाराला तशीच अडकून राहिलेली फुलपुडी काढली.

खुर्चीत बसली आणि प्रसन्न अन् भरल्या अंतःकरणानी, पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक बघत बसली ती दिवसागणिक आनंद देणारी इवलीशी “फुलपुडी”. 

– समाप्त –

© श्री क्षितिज दाते

ठाणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 2 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 2 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

डाॅ.भालचंद्र फडके 

(“जू तुमच्या मानेवर नेहमीच असते.” असं म्हणून स्त्रियांच्या रोजच्या जीवनातील विविध प्रकारच्या  जूचे त्यांनी वर्णन केले.)  इथून पुढे. 

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तेव्हा धुळे जिल्हा होता. धुळे जिल्ह्य़ातील महाविद्यालयीन प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिका-यांच्या जिल्हा बैठकीसाठी विभागातील आम्ही सगळे अधिकारी धुळयाला गेलो होतो. एका गेस्ट हाऊसमध्ये आदल्या रात्री आमचा मुक्काम होता. रात्रीचे जेवण आटोपल्यावर आम्ही सगळेजण झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी जिल्हा बैठक होती. रात्री साधारणत: एक वाजला असेल. मी सहज गेस्ट हाऊसच्या बाहेर पडलो. पुढच्या खोलीतला लाईट जळत होता. तिथे फडके सर होते. दुसऱ्या दिवशी सरांशी बोलताना समजलं की, काही दिवसांतच त्यांचं एक व्याख्यान होतं. त्याची टिपणे काढण्यासाठी सर रात्रभर जागे होते. 

गुजरातमधील एका विद्यापीठातर्फे  एक राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र होतं.आमच्या विभागातर्फे या चर्चासत्रासाठी मी जावं असं सरांनी सांगितलं. यापूर्वी चर्चासत्र, कृतिसत्रं वगैरेमध्ये भाग घेण्याचा मला बिलकुल अनुभव नव्हता. तेही महाराष्ट्र सोडून इतर राज्यात तर अजिबात नव्हता. सरांच्या या निर्णयाने मी पुरता भांबावून गेलो होतो. या चर्चासत्रासाठी कुलगुरूंची मंजूरी वगैरे तांत्रिक बाबी सरांनीच पूर्ण केल्या.

पुणे ते मुंबई आणि मुंबईहून सुरत असा प्रवास करत मी  सुरतमार्गे बलसाडला पोहोचलो. टीव्हीवर काळे कोट  घातलेली माणसं गंभीर चेह-याने चर्चासत्रात बसलेले मी पाहिले होते. इथं ते अनुभवलं. उद्घाटनानंतर लगेच मला पेपर सादर करण्यास सांगण्यात आलं. सगळं बळ एकवटून मी मनाचा हिय्या करून पेपर सादर केला. सुरवातीला वाटलं होतं तितकंसं अवघड वाटलं नाही. आपल्या ज्युनियर सहका-याला संधी देऊन त्यासाठी त्याला मदत करण्याची सरांची ती कार्यपध्दत मला आयुष्यात खूपच मौलिक वाटली. 

माझं लग्न रजिस्टर पध्दतीनं झालं. सर्व धार्मिक बाबींना यात फाटा दिला होता. काही निवडक लोकांसाठी  लग्न  झाल्यावर सायंकाळी रिसेप्शन ठेवलं होतं. सर आवर्जून आले होते. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या हातात एक बाॅक्स त्यांनी ठेवला. ” सर,कोणताही आहेर किंवा भेटवस्तू आणू नयेत असं आम्ही पत्रिकेत म्हटलं होतं” असं मी सरांना बोललो.

“अहो शिरसाठ, हा आहेर नाही. मिठाई आहे ”  सरांनी  दिलेल्या मिठाईचा मी अव्हेर करू शकलो नाही.

भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सरांनी काम केले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे केलेल्या धर्मांतराच्या वेळी झालेल्या नाटकाचे दिग्दर्शन सरांनी केले ही आठवण कुणीतरी मला सांगितली होती. बाबासाहेबांसोबत काम केल्याने सामाजिक परिवर्तन आणि समाजातील उपेक्षित, सर्वसामान्य माणसांविषयी सरांना वाटणारी कळकळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि संपूर्ण जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिली होती. भारतातील अनेक विद्यापीठांतून प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरू होता. मात्र ह्या कार्यक्रमातून साक्षरता प्रसाराबरोबरच समाजप्रबोधन आणि परिवर्तन घडवून आणण्याची दिशा सरांनी घालून दिली होती. त्यामुळेच गावोगावचे प्रौढ शिक्षण कार्यक्रम हे समाजपरिवर्तनाची केंद्रे बनली होती. यातून अनेक सामाजिक कार्यकर्ते तयार झाले. लोकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वावलंबी बनविणे हे प्रौढ शिक्षण कार्यक्रमाचे ध्येय बनले  होते. या कार्यक्रमातून अनेक ध्येयवादी कार्यकर्ते तयार झाले. सामाजिक अभिसरणाच्या अनेक यशोगाथा या कार्यक्रमातून उदयाला आल्या. मला चांगलंच आठवतं, विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण केंद्रातील प्रौढांचा एक आनंदमेळावा आम्ही दापोडी येथील जीवक संस्थेत आयोजित केला होता. विविध सामाजिक स्तरांवरील शेकडो स्त्री-पुरुष प्रौढ या मेळाव्यात सहभागी झाले होते.

साहित्य क्षेत्रात लिहू लागलेल्या अनेक नवोदित लेखक, कवींच्या पाठीशी सर नेहमीच उभे असत. त्यांना ते लिहिण्याला सतत प्रोत्साहन देत. दलित साहित्याचे ते खंदे समर्थक होते. खेडोपाडी, झोपडपट्टीतील अनेक दलित कार्यकर्त्यांना ते नेहमीच मदत करत .यामुळे ‘ दलित फडके’ अशी त्यांच्यावर टीका होई. मात्र समाजपरिवर्तनाचा झेंडा सतत खांद्यावर घेणा-या सरांनी अशा टीकाही हसत हसत स्वीकारल्या.

सर खूप आजारी होते. विभागातील आम्ही अनेकजण त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. सर बोलू शकत नव्हते. मात्र नेहमीप्रमाणे हसून त्यांनी आमचे स्वागत केले. अशाही स्थितीत डाव्या हाताने ते लिहीत होते. एका लढवय्या वीराची ती जिद्द नक्कीच प्रेरणादायी होती.

सर गेले, तरी त्यांच्या पत्नी हेमाताई आणि कन्या सई यांच्याशी माझा संपर्क होताच. विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर एकदा मी माझे एक पुस्तक त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. फडके बाई थकल्या होत्या. मात्र मी पाहिलं की,आईची सेवा करणं हे आपलं जीवनकार्य समजून सई त्यांचं सगळं करत होत्या. बाईंनी लिहिलेलं पुस्तक- ‘ जीवनयात्री ‘ त्यांनी मला दिलं. हे पुस्तक मी अनेकदा वाचून काढलं. त्यातील त्यांचं एकूणच लिखाण वाचून वाटलं, हे पुस्तक त्यांनी शाईने नाही तर  डोळ्यातील अश्रूंनी लिहिलं आहे. या पुस्तकात बाईंनी सरांविषयी लिहिलंय. सर त्यांना म्हणायचे, ” तू  एखादया पाटलाची बायको व्हायची तर माझ्यासारख्या  गरीब  मास्तराची बायको झालीस ” बाईंना मात्र असं कधीच वाटलं नाही. आपल्या गोड स्वभावाने अनेक लोकांचं प्रेम सरांनी मिळवलं होतं. आर्थिक बाबतीत त्यांची स्थिती फारशी चांगली नव्हती. पण मनाने मात्र  ते नक्कीच अतिश्रीमंत होते.

— समाप्त — 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हो ‘पोनोपोनो’… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ हो ‘पोनोपोनो’… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

डॉक्टर इलाहीकेला हयू लेन.

आज आपण एका अतिशय सुंदर ध्यान-साधने संबंधी जाणून घेऊ या।

याची माहिती मागच्या वर्षी एका अंकात आलेली आहे पण अंक कायम रहात नाहीत, ब्लॉगवर आणि पोस्ट द्वारे ही कोणीही केव्हाही वाचू शकेल।

तर काय झालं, काही वर्षांपूर्वी हवाई बेटावर एक हॉस्पिटल होतं जे केवळ खुनशी वेड्यांसाठी होतं। ज्यांना समाजाने ‘क्रिमिनली इनसेन’ ठरवून हाता – पायात साखळदंड बांधून डांबून टाकलं होतं.

त्यांना भेटायला फारसं कुणी येत नसे। ती इतकी भीषण जागा होती की नर्सिंग स्टाफ, स्वयंपाकी व डॉक्टर ही काही आठवडे, एखाद – दोन महिन्यांच्यावर तिथे टिकू शकत नसत.

अनेक रिसर्च सेन्टर्स, हॉस्पिटल, मनोवैज्ञानिक लोक मात्र येऊन येऊन वेगवेगळी संशोधनं करत।

रुग्णांवर त्याचा काहीही परिणाम होत नसे। ही थोर माणसं येऊन निष्कर्ष करून डिग्र्या घेत, ते कैदी मात्र आपल्या काळ्या विश्वात तळमळत, संतापत असत।

मग एक नवा माणूस आला. ‘ मी एक काही प्रयोग करू का?’ म्हणाला.

तिथले मोठे डॉक्टर्स म्हणाले, ‘ कर बाबा, तू ही ‘ कर।

त्याने सगळ्या रुग्णांच्या फाईल्स मागवल्या. एक छोटी खोली पुरेल म्हणाला. तो रोज सकाळी ९ला यायचा। खोलीचं दार बंद करून आतच असायचा. संध्याकाळी ५ वाजता निघून जायचा। परत दुसऱ्या दिवशी ९ला हजर.

तिथल्या लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही. मग काही आठवड्यात फरक जाणवू लागला।

‘अरेच्चा ! हे खुनशी लोक जरा बरं वागतायत की.’ 

हळूहळू त्यांच्यात सुधारणा होऊ लागली. संताप, उद्विग्नता, क्रौर्य कमी दिसू लागलं.

ती परोलवर जाण्या योग्य झाली… बाहेरच्या कसलाही कंट्रोल नसलेल्या जगात, त्यांच्या राग – संतापाच्या नात्यात जाऊनही, ते मुदत संपल्यावर नीट परत येऊ लागले।

नर्सिंग स्टाफ, स्वयंपाकी, माळी, सुरक्षा कर्मचारी, सगळेच टिकू लागले. बदल होत होत ते रुग्ण बरेही होऊन बाहेर जाऊ लागले।

आणि चारच वर्षांनंतर एक दिवस असा उजाडला, की आता रुग्णच नाहीत म्हणून ते हॉस्पिटल चक्क बंद करावं लागलं ! असे दोनच राहिले होते ज्यांना सरकारने अमेरिकेतल्या हॉस्पिटलात हलवलं आणि ते खुनशी वेड्यांचं हॉस्पिटल बंद केलं !

सर्वच मानसोपचार तज्ञ, संशोधक, प्रसार माध्यमांना चक्रावून टाकणारी गोष्ट होती ही….. 

त्यांनी विचारलं की ‘ हा चमत्कार झाला कसा?’ 

तिथल्या नर्सेस, डॉक्टर, सगळ्यांनी सांगितलं की ‘आधी’ व ‘नंतर’ यात ‘तो’ माणूस हा एकच फरक होता।

खरं तर तो एकाही रुग्णाला प्रत्यक्ष भेटलाही नाही. ‘ तुझं दु:ख सांग ‘ नाही, ‘ रडून मोकळा हो ‘ नाही, – काहीच नाही. त्याने नक्की काय केलं, ते आता त्यालाच विचारा, पण हे रुग्ण मुळापासून बरे झाले आहेत हे मात्र खरं।

ते गेले त्याच्याकडे। म्हणाले, ‘ नक्की काय केलात तुम्ही? इतके रुग्ण, तेही सगळी दुष्ट कर्म केलेले, वेडे, मनावर ताबा नसलेले, तुम्ही बरे कसे केलेत? काय जादू केलीत? ‘

त्या हवाईयन माणसाचं नाव होतं डॉक्टर इलाहीकेला हयू लेन.

त्याने हसून शांतपणे उत्तर दिलं….. 

“आमच्या हवाईयन प्रथेत असं मानतात की बाहेरच्या जगात, समाजात जे काही चाललं आहे, ते फक्त आपल्या आत मनात जे आहे, केवळ त्याचंच प्रतिबिंब आहे. तुम्हाला बाहेरची परिस्थिती बदलायची असेल तर तुमच्या मनाची स्थिती बदला. “

त्यांनी स्वत:वर उपचार केले होते ! —- 

— कसे?

त्यांनी हवाईयन संस्कृतीतलं ‘हो’पोनोपोनो’ केलं होतं. या शब्दाचा अर्थ आहे ‘ चूक दुरुस्त करणं ‘.

डॉक्टर लेननी प्रत्येक गुन्हेगाराची केस-फाईल आधी नीट वाचली. त्याने केलेले खून, दरोडे, सगळं जाणून घेतलं. मग फाईल बंद करून शांतपणे बसून त्या व्यक्तीला उद्देशून मनाशी चार वाक्यं म्हटली —

१. माझं चुकलं. (I am sorry).

२. मला माफ कर. (Please forgive me).

३. मी तुझे आभार मानतो. (Thank you).

४. माझं तुझ्यावर प्रेम आहे. (I love you).

समाजात सगळ्या प्रकारच्या वृत्ती – प्रवृत्ती असतात. संताप, निराशा, हिंसा, क्रूरपणा – मनाने दुर्बल असलेले — या वृत्ती एखाद्या स्पंजसारख्या शोषून घेतात. मग त्याच गुणाकाराने सगळीकडे वाढतात.

डॉक्टर लेननी असं मानलं की “ माझ्या मनातल्या अशा सुप्त वृत्तींचंच बाह्य प्रक्षेपण या रुग्णांतून होत आहे. यांना सुधारायचं असेल तर मला माझ्या मनातली हिंसा कमी केली पाहिजे.” 

प्रत्येक रुग्णाची फाईल वाचून त्याला ‘ माझं चुकलं’, ‘मला माफ कर’, ‘मी तुझा आभारी आहे’ व ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं सांगून त्यांनी त्या रुग्णाला तर सबळ, सकारात्मक बनवलाच, पण स्वत:च्या मनातली सुप्त हिंसाही शांत केली.

आपल्याला जगात काय चाललंय ते कळतच नाही, ‘ लोक असे कसे वागतात न? ‘ असं म्हणायची खोड आहे, पण स्वत:च्या मनाचा अजिबात थांग नसतो. आजूबाजूच्या जगातल्या घडामोडीमधून तुम्हाला जर सतत हिंसाच दिसत असेल तर तुमच्या मनात ती भरपूर आहे. तिची खाज कमी करायच्या प्रयत्नात तुम्ही त्या बातम्या चवीने वाचता, चर्वितचर्वण करता, घरच्यांवर भडकता, सरकारला शिव्या देता व सगळ्यांना फाशी दिल्याशिवाय देशाचं काही भलं होणारच नाही असं छातीठोकपणे सांगता….. 

विचार करा !— 

ही चार वाक्यं एक अतिशय शक्तिशाली अशी साधना आहे. तुम्ही प्रत्येकाने ही नक्की करून बघा.

कशी करावी?—-

एक जागा निवडून तिथे डोळे मिटून २ मिनिटं {तरी!} शांत बसा.

ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध चांगले नाहीत, त्रास होतो, तिला नजरेसमोर आणा.

मग तिला उद्देशून ही ४ वाक्यं मनापासून म्हणा.

मनातच म्हणायची आहेत, म्हणून माफी मागायला हरकत नसावी !

आपल्या कुटुंबियांपासून सुरुवात करा.

तुम्हीच त्यांना जन्म घेण्याआधी निवडलं आहे, म्हणून संबंध सुधारून पुढच्या प्रगतीसाठी मोकळे व्हा।

Ps: The Hawaiian word ho’oponopono comes from ho’o (“to make”) and pono (“right”). The repetition of the word pono means “doubly right” or being right with both self and others. In a nutshell, ho’oponopono is a process by which we can forgive others to whom we are connected.

ओम शांती

माहिती संग्रहिका : सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ …Mother’s Day म्हणजे… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ …Mother’s Day म्हणजे ….  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

जिने बोट धरून पाटीवर अक्षर गिरवण्यास शिकवले… तिला मोबाईलवर टाईप करायला शिकवणं म्हणजे …Mother’s Day

लहानपणी आपल्या जिभेचे चोचले ज्या आईने पुरवले….. *तिला एखाद्या तांराकित हाॅटेल मध्ये दिलखुलास ट्रीट देणं म्हणजे…*,

…Mother’s Day

लहानपणी साडीच्या निर्‍या करायला जिच्याकडून शिकलो, ..त्या आईला केव्हातरी जीन्समध्ये पाहण्याची गंमत म्हणजे …. …Mother’s Day

ज्या आईने आपल्या चेहरा अगदी पुस्तकासारखा वाचून काढला … तिला या टेक्नोसॅव्ही जगात FB शी ओळख करून देणं म्हणजे … …Mother’s Day

बाबांची नजर चुकवून जिने साखरेच्या डब्यात साठवलेले पैसे आपल्यासाठी withdraw केले त्या आईला ATM..मधून पैसे काढायला शिकवणं म्हणजे … …Mother’s Day

जिचा हात पकडून आपण भरभर जिने उतरलो, आणि चढलो,…तिला आताच्या ESCALATOR …वरून सांभाळून घेऊन जाणं म्हणजे…. …Mother’s Day

Best wishes to  wonderful and powerful mother 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares