मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पोपट – भाग – 1– लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? जीवनरंग ❤️

☆  पोपट – भाग – 1 – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर 

१९९५ साल असावे. तेव्हा लॅण्डलाइन फोनचा जमाना होता. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्हा तिघांना ( मी, बायको, आई ) आत्याने फराळाला बोलावले होते.  दरवर्षी दिवाळीचा एक एक दिवस आम्ही एकमेकांकडे जात असू.

सकाळी आठ वाजता नितीनने दरवाजा उघडताच त्याची साडेतीन वर्षांची गोड मुलगी बब्ली हाॅलमधेच खाली फुलबाज्यांच्या पेट्या, सापाच्या गोळ्या, रंगीत काडेपेट्या वगैरे फटाके मांडून बसलेली दिसली. श्रेया बेलचा आवाज ऐकून लगबगीने बाहेर आली. आत्या किचनमधे देवपूजा करत असावी. कारण देव्हार्यातल्या घंटेचा किणकिणाट ऐकू येत होता.

“काल सकाळी आत्या घरी नव्हती का?” मी श्रेयाला विचारले.

” परवा त्या त्यांच्या नणंदेकडे गिरगावात राहिल्या होत्या, काल संध्याकाळी आल्या.” श्रेयाने सांगितले.

” तरीच!” मी हसत उद्गारलो.

” काय झाले?”

” ते आता नितीन सांगेल.”

मी हसू आवरत म्हणालो, “नितीन, काल सकाळी साडेसातला मी तुला आमचे आजचे येणे कन्फर्म करायला फोन केला. तू बर्‍याच वेळाने फोनवर आलास.”

” काल वसूबारस होती. मी  बब्लीला उटणं लावून आंघोळ घालत होतो. दिवाळीत ही ड्यूटी माझी असते.” नितीनने श्रेयाकडे बघत उत्तर दिले. यावर तिने फक्त मान उडवली.

“नितीनराजा फोन आधी तुझ्या बब्लीनेच उचलला, मी तिला, ‘तू काय करतेस’ हे विचारले, तर तिने ‘कार्टून बघतेय’ असे उत्तर दिले. त्यानंतर माझ्या सांगण्यावरून ती तुमच्यापैकी कुणाला तरी बोलवायला गेली.” आता खर सांग, “तू कुणाच्या बब्लीला उटण लावून आंघोळ घालत होतास?”

नितीनचा चेहेरा पहाण्यासारखा झाला. श्रेया उठून घाईघाईने किचनमधे गेली. आईने न ऐकल्यासारखे केले आणि माझ्या बायकोने मला एक करकचून चिमटा काढला!

” तूला काय करायचय?” बायको पुटपुटली.

” मला फक्त खात्री करायचीय!”  मी साळसूदपणे म्हणालो.

“तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही,” असे म्हणून तीही किचनमधे आत्या आणि श्रेयाशी बोलायला निघून गेली.

बाहेर टिव्हीवर कार्टून चालू होते आणि नितीन गप्प राहून ते बघण्यात गुंग आहे असे दाखवत होता. अशीच दहा मिनीटे गेली.

तेवढ्यात आत्या किचनमधून श्रेया आणि बायकोला घेवून बाहेर आली. आम्ही सर्वजण डायनिंग टेबलवर फराळासाठी बसलो. श्रेया खालमानेने सर्वांच्या डिशेश भरू लागली. आई म्हणाली, ” काय रे तूम्ही दोघं आता बब्लीच्या भावंडाचा विचार करताय ?”      

” नाही मामी.” दोघेही ठामपणे एकाच सुरात म्हणाले. नितीनचा हात अभावितपणे पोटावर गेला. मला श्रेयाने मारलेला तो प्रसिद्ध गुद्दा आठवलाआणि हसू आले

” अरे मग निदान बब्लीला खेळायला एखादं कुत्र- मांजर तरी आणा.” आईने सल्ला दिला. 

“काही नको वहिनी, हे दोघे रोज सकाळी नोकरीसाठी बाहेर पडणार. मग मलाच त्याचे सर्व करावे लागणार.” आत्याने नाराजी दर्शवली.

” नितीन त्यापेक्षा तू पूर्वीसारखा पोपट का आणत नाहीस? त्याचे फार काही करावे लागत नाही.” मी अल्टरनेटिव्ह दिला.

“पूर्वी तुमच्याकडे पोपट होता?’

श्रेयाला आश्चर्य वाटले.

“एवढंच नाही तर बालपणी नितीनला चाळीत नीतीनशास्त्री म्हणायचे.”

“आता हे काय नवीन? मला कळलेच पाहिजे.” श्रेया लगेच सरसावून बसली.

“तो बराच मोठा किस्सा आहे.”

पुढच्या आठवड्यात आपण चौघे महाबळेश्वर ट्रिपला जाणार आहोत तिथे आम्ही तो दोघे मिळून सांगू.”

हे ऐकताच नितीनच्या चेहेर्‍यावर त्याचे सिग्नेचर (बनेल) हास्य उमटले आणि मी समाधान पावलो.” 

**** 

त्यापुढच्या आठवड्यात आम्ही चौघेजण आमच्या मुलांना त्यांच्या आज्यांकडे सोपवून तीन दिवसासाठी महाबळेश्वरला आलो. छान थंडी पडली होती. रात्री हाॅटेलच्या आवारात मोठी शेकोटी पेटलेली होती. जेवणे झाल्यावर त्या शेकोटी भोवती आम्ही गप्पा मारत बसलो. श्रेयाने लगेच पोपटाचा विषय काढला.

नितीन सांगू लागला, ” मी प्रायमरी शाळेत असताना आम्हाला हिरव्या रंगाचे आणि लाल चोचीचे पोपटाचे पिल्लू कोणीतरी आणून दिले. ते इतके लहान होते की त्याला उडता देखील येत नव्हते. त्यामुळे त्याच्या पिंजऱ्याचे दार आम्ही उघडेच ठेवत असू. पिलू घरभर फिरे. ते कधी खांद्यावर बसून हातातली हिरवी मिर्ची खाई तर कधी वाटीतली कच्ची डाळ खाई. ते नर आहे की मादी हे न कळल्याने  त्याचे आम्ही तेव्हा नामकरण केले नाही.”

“मी तेव्हा अभ्यासाची एक रंजक पद्धत शोधली होती. शाळेची सर्व पुस्तके मी पिला पुढे पसरून ठेवे. मग चोचीने जे पुस्तक ते पहिल्यांदा पुढे ओढे त्याचाच मी अभ्यास करीत असे. यामुळे माझे कित्येक विषय मागे पडत. मग वर्षाअखेरी ते कव्हर करताना आईचा घाम आणि माझी सालटे निघत.”

नितीन थांब, मी उत्साहाने म्हणालो, “याच्या पाचवीच्या व माझ्या नववीच्या उन्हाळी सुट्टीत आम्ही नाशिकला आजी- आजोबांकडे एकत्र गेलो होतो. तिथे महिनाभर खूप मजा केली. रोज गंगेवर फिरायचो, पोहायचो, सरकार वाड्यातल्या वाचनालयात जायचो.”

“पण इच्छा असुनही आम्हाला अकबर सोडा वाॅटर फॅक्टरीचा काश्मीरी सोडा, भगवंतरावची दुध-जलेबी  आणि पांडे मिठाईवाल्याचे गुलाबजाम रोज खाणे परवडत नसे. याला कारण अपुरा पॉकेटमनी! त्यावेळी मुलांचा पॉकेटमनी ही आमच्या नोकरदार वडिलांसाठी खर्चाची लास्ट प्रायोरिटी असायची. तेव्हा वाटायचे हे जर व्यवसाय करत असते तर अशी वेळ आमच्यावर आली नसती. मला त्यावेळी प्रथमच समाजशास्त्राच्या सरांनी म्हटलेल्या, “मराठी माणूस हा मुळातच व्यवसायाभिमुख नाही” या वाक्यातील कळकळ कळली. मग  नितीनचे बौद्धीक घेत त्याला, “कोणत्याही व्यवसायास वयाची अट नसते, ती फक्त नोकरीसाठी असते,” हे सरांचे वाक्य गंभीरपणे ऐकवले.

मला तिथेच रोखत नितीन पुढे सांगू लागला, “मग असे मन मारून जगण्यापेक्षा काहीतरी व्यवसाय करून पैसे मिळवावे असे आम्ही ठरवले.”

“गंगेवर अनेक ज्योतिषी पोपट घेवून भविष्य सांगायला बसलेले असत. बाया- बापड्या त्यांना हात दाखवून आपल्या भविष्याचा वेध घेत. मी ते कुतुहलाने पहात असे. दोन रूपये घेतल्यावर ते ज्योतिषी पत्त्यांसारखी बरीच पाने पसरत. त्यानंतर पिंजर्‍यातल्या पोपटाला बाहेर सोडत. पोपट रूबाबात त्यातला एक पत्ता चोचीने पुढे ओढे. मग त्या पत्त्याच्या मागच्या बाजूला छापलेले भविष्य वाचून दाखवले जाई.”

” बराच काथ्याकूट केल्यावर दादाने वाचनालयाचा तर मी ज्योतिषाचा व्यवसाय करायचे ठरवले! हे दोन्ही धंदे आमच्या बजेटमधे बसत होते.”

“दादाच्या घरी विकत घेतलेली आणि लोकांची वाचायला आणून परत न दिलेली अशी शंभरहून अधिक पुस्तके होती तर माझ्या घरी वेल ट्रेंड पोपट होता.”

” सर्वप्रथम आम्ही दोघांनी काळ्या रामाच्या मंदिरात जावून, मराठी माणसा सारखे कूपमंडूक वृत्तीने न वागता, गुजराथी समाजाचा आदर्श ठेवून, व्यवसायासाठी जमेल तितकी मदत एकमेकांना करायची अशी शपथ घेतली.”

” मग पुढील दोन आठवडे सरावासाठी दादा वाचनालयात आणि मी ज्योतिष वृंदात जावून बसू लागलो.”

नितीनला थांबवून त्यापुढील गंमत मी सांगू लागलो, “पुस्तकांचे नंबरींग, रेकॉर्ड, जतन, नियोजन तसेच वाचकांचे रजिस्टर, ‘फी’चे हिशोब हे तिथल्या काकांकडून मी नीट शिकून घेतले. तर नितीनने भविष्य कथनातील ग्यानबाची मेख ठरेल अशी ‘चपखल भविष्यवाणी’ शिकून घेतली. अशा रितीने आमचा धंद्याचा क्रॅश कोर्स पुर्ण झाला. परत आल्यावर मी वाचनालय सुरू करायचे ठरवले. नितीनने कुठूनतरी एका नामशेष झालेल्या राजकीय पक्षाच्या कार्यालयाची जीर्ण पाटी शोधून आणली आणि तिच्यावर ‘विद्यार्थी वाचनालय’ असे रंगवले. त्याबदल्यात मीही नितीनला जुन्या बाजारातून एका बाजूला भविष्य छापलेला पत्त्यांचा कॅट आणून दिला. अशा रितीने आमच्या व्यवसायाची सामग्री पूर्ण झाली. मग एक नवीनच अडचण उद्भवली. लोकांकडून आणलेल्या प्रत्येक पुस्तकांवर त्यांच्या नावापुढे ” xxx याजकडून विद्यार्थी वाचनालयास सप्रेम भेट” असा मजकूर लिहूनही काही उपयोग झाला नाही. लबाड वाचक आपल्या पुस्तकांवर मालकी हक्क सांगून व्यवसायात भागीदारी मागू लागले. शेवटी नाईलाजाने सर्व भागधारकांना फी माफ करावी लागली. मग माझ्या पॅसीव्ह स्वभावानुसार फक्त पैसे देणार्‍या गिर्‍हाईकांची वाट बघणेच उरले. पण नितीन ॲक्टीव्ह होता. त्याने जणू व्यवसायाचे व्रत घेतले होते. नाशिकहून आल्यापासून नितीनने वागणे बदलले. तो सकाळी सात वाजता आंघोळ आटपून, त्याला मुंजीत घेतलेला जांभळा कद नेसून, उघड्या अंगाने देवपूजा करू लागला. ओल्या केशरी गंधात धागा बुडवून त्याच्या तीन रेषा जेव्हा तो आपल्या गोर्‍या कपाळावर ओढे तेव्हा साक्षात सोपानदेवच आळंदीहून अवतरलेत असे वाटे. आत्या नितीनच्या ह्या नव्या रूपाने चकित झाली. खूप खोदून विचारल्यावर नितीनने आत्यास त्याला पंचवटीतल्या  धुम्डूम महाराजांनी दीक्षा दिल्याचे सांगितले. आत्याला दीक्षा (आपणहून) घेतात हे माहीत होते पण हा (न मागता) देण्याचा प्रकार नाशकात नव्याने सुरू झाला असावा असे वाटले.

एके दिवशी त्याचे बाबा घरात नसताना नितीनने देवपूजा आटोपल्यावर ज्योतिर्विद्येचा पहिला प्रयोग आत्यावर केला. तिला समोर बसवून, धुपाच्या धुरात डोळे झाकून पाच मिनीटे ध्यान लावले. मग आवाजाच्या एका वेगळ्याच टिपेत त्याच्या रूपाने पंचवटीतील ध्यानस्थ धुम्डूम महाराज बोलू लागले –

” माई, तुझा भूतकाळ मला स्पष्ट दिसतोय… तुझं आयुष्य फार खडतर गेलं … संसारात सूख नाही… कष्टाला फळ नाही… तू सगळ्यांसाठी खूप केलेस… पण कुणाला त्याची जाण नाही… काम झाल्यावर ते मिरवले… तूला खड्यासारखे बाजूला काढले… तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला … तुझ्या सरळ बोलण्याचा तिरका अर्थ काढला … वाईट घटनांचा दोष तुझ्या माथ्यावर लादला … तुझ्या पायात लक्ष्मी आहे … गृहकलहामुळे ती उंबर्‍यापाशी अडली आहे … पण लवकरच इडा-पिडा टळणार आहे… तुझे ग्रह बदलणार आहेत… त्यासाठी येत्या चंद्र नवमीला कडक उपास ठेव… गुळ घालून केलेल्या रव्याच्या खिरीचा नैवेद्य सायंकाळी शनिपारापाशी ठेव…  मगच अन्न ग्रहण कर… ओम शांती… सुखी भव!”

एवढे बोलून झाल्यावर नितीनने सावकाश डोळे उघडले व तो  आत्याची प्रतिक्रिया पाहू लागला. आपल्या पूर्वजीवना विषयीचे असे अचूक भाष्य ऐकल्यावर आत्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. तिने उठून नितीनला  पोटाशी धरले. त्याला सिद्धी प्राप्त झाली आहे याची तिला खात्रीच झाली. आपण गरोदर असताना एकदा आळंदीला गेलो होतो हे तिला आठवले. तिथेच कुणातरी पुण्यात्म्याने आपली कुस धन्य केली असावी असे तिला वाटले.  

क्रमश: भाग –१

लेखक – श्री रविकिरण संत

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सात्विक पर्व संपले ” ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

??

☆ “सात्विक पर्व संपले ” ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

(३०जुलै १९२८—०४जुन २०२३)

४ जून ची संध्याकाळ. मावळत्या सूर्या बरोबर मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक तळपतं व्यक्तिमत्व अनंतात विलिन झालं. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रत्येकाच्या मनात आपुलकीची, जिव्हाळ्याची जागा निर्माण करणारे एक सोज्वळ, शांत, हसरं व्यक्तिमत्व हरपलं ते म्हणजे सुलोचनादीदी.

त्यांचं मूळ नाव ‘रंगू’. पण त्यांचे बोलके डोळे बघून भालजी पेंढारकरांनी त्यांचं नाव ठेवलं ‘सुलोचना’. तेच खूप लोकप्रिय झालं. त्या सर्वांच्या ‘दीदी’ झाल्या.

त्यांनी असंख्य मराठी हिंदी चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका केल्या. आपल्या अकृत्रिम अभिनयाने प्रत्येक भूमिका त्या जगल्या आणि आई, वहिनी, बहीण आजी ही त्यांची नाती प्रेक्षकांच्या मनात दृढ झाली. त्यांनी साकारलेली आई म्हणजे साक्षात वात्सल्यमूर्तीच होती. त्यांच्या ऐतिहासिक भूमिका रूबाबदार, भारदस्त, करारी होत्या. त्यांचं शांत, सोज्वळ, प्रसन्न रूप आणि प्रेमाची वत्सल नजर कायम मनात कोरली गेली आहे.

कितीतरी गाणी ऐकली की नजरेसमोर त्यांचे सात्विक रूप तरळून जाते. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, पडला पदर खांदा तुझा दिसतो, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं  पाणी जातं, रे उठ रानराजा झाली भली पहाट ही गाणी त्यांच्या अभिनयाने मनात ठसली  आहेत.

प्रत्यक्ष जीवनातही त्यांच्या मायाळू, सात्विक,  सौहार्दपूर्ण वागणुकीने सर्वांशी त्यांचे जवळचे नाते जुळले होते. त्यांचे जाणे आज प्रत्येकाला हेलावून गेले. आपल्याच घरातली कुणी जिव्हाळ्याची व्यक्ती गेली अशीच प्रत्येकाची भावना आहे. ज्यांच्या जाण्याने चटका लागतो, एक पोकळी निर्माण होते अशांपैकीच त्या एक होत्या. त्यांच्या जाण्याने एक सात्विक पर्व संपले आहे.

🙏  त्यांना अतिशय विनम्र आदरांजली 🙏

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मला आलेला विचित्र अनुभव… – लेखिका – सुश्री वैदेही मुळये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मला आलेला विचित्र अनुभव… – लेखिका – सुश्री वैदेही मुळये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

‘द केरला स्टोरी ‘ च्या पार्श्वभूमीवर मला आलेला अनुभव share करावासा वाटतोय, म्हणून हा लेख. 

नक्की वाचा. 

ही घटना कुठल्या दुसर्‍या शहरातील नाही तर मुंबईतली. मी शक्यतो कितीही घाईत असले तरीही काही गोष्टींची पडताळणी करते आणि मगच रिक्षा किंवा टॅक्सी यातून प्रवास करते. 

ही गोष्ट आहे एप्रिल महिन्यातली.  मी रिक्षेने प्रवास करत होते. (सर्व पडताळणी करूनच.) त्यातला रिक्षावाला- ‘ कुठून आलात, कुठे राहता, रोज याच वेळेत येता का,’ असे प्रश्न विचारायला लागला. मी स्पष्टपणे त्याला खडे बोल सुनावले. तो काही वेळ शांत बसला. परत थोड्यावेळाने ” या भागात ना मॅडम बस जात नाहीत. इतर रिक्षावाले पण जास्त पैसे घेतात.” अशी माहिती द्यायला त्याने सुरवात केली. 

माझं उतरायचं ठिकाण आलं. मी मीटरप्रमाणे त्याला पैसे द्यायला गेले.  तर त्याने चक्क 20 रुपये कमी घेतले. मी त्याला त्याचं कारण विचारलं तर म्हणाला, “आम्हाला पैसे नाही..  तुम्ही महत्त्वाचे आहात.” मला हे खटकलं. 

पुढे तो म्हणाला “ तुम्हाला साधारण किती वेळ लागणारे, मी थांबतो तुमच्यासाठी.”  मी म्हंटलं “ कशाला, मला 3 तास तरी लागतील.”   हे सांगितल्यावर देखील त्याची थांबायची तयारी होती. मी नको म्हंटलं तर म्हणाला “ मग तुमचा नंबर मला द्या मी फोन करतो.” आत्तापर्यंत हळू हळू सर्व प्रकार माझ्या लक्षात आला होता. त्यामुळे मी माझा नंबर न देता त्याचाच नंबर घेतला आणि नाव विचारलं. नाव माझ्या अपेक्षेप्रमाणेच निघालं- “हुसेन” 

तो पुढे काही बोलणार तेव्हाच मी नमस्कार करत म्हंटलं, “ दादा हे प्रकार थांबवा. श्रीराम तुमचं भलं करो.” 

हे म्हंटल्यावर अचानक त्याची खरी आपुलकी त्याच्या चेहर्‍यावर उमटली आणि तो निघून गेला. 

घटना साधी वाटते पण विचार केला आणि बुद्धी आणि डोळे उघडे ठेवले, तर किती गंभीर होती याचा अंदाज येईल. 

आणखी काही मुद्दे मी नमूद करू इच्छिते … 

– त्याचे दोन्ही कान टोचलेले होते. 

– त्याचं नाव आणि त्याचा पेहेराव, भाषा, यांचा ताळमेळ कुठेच जाणवत नव्हता.

– तो सगळे कामधंदे सोडून तीन तास थांबणार होता.(का???) याचा विचार तुम्ही करा. 

– मीटरपेक्षा 20 रुपये कमी.(पैसे वाचविण्यासाठी देखील एखादी मुलगी सहज फसू शकते.)

– नको तितकी आपुलकी. 

… या प्रत्येक मुद्द्यात मोठं कारस्थान आहे.  मी सावध होते म्हणून वाचले. प्रत्येक स्त्रीने सावध राहणं गरजेचं आहे.

या प्रसंगानंतर मी सेक्युलर नाही, तर सनातनी आहे याचा मला अधिक अभिमान वाटू लागला हे निश्चित. 

काळजी घ्या आणि ‘केरला स्टोरी’ नक्की पहा. 

धन्यवाद.

लेखिका : सुश्री वैदेही मुळ्ये

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हा औरंग मज प्यारा !… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ हा औरंग मज प्यारा !… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अबुल मुजफ्फर मुहउद्दीन मुहमद हे नाव वाचून फार बोध होणार नाही कदाचित. पण औरंगजेब हे नाव हा देश आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र कसा विसरू शकेल? औरंगजेब म्हणजे सिंहासनरत्न. आणि यालाच आलमगीर अशी उपाधी होती… म्हणजे जगज्जेता! छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूरायांच्या महाराष्ट्राच्या मातीतच या औरंगजेबाला मूठमाती द्यावी लागली. पण आपल्या स्मरणात हा धर्मांध,पाषाणहृदयी आणि सत्तापिपासु औरंगजेबही ठाण मांडून बसला आहे. 

पण हेच नाव धारण करणारा आणखी एक भारतीय आपण पुन्हा आठवला पाहिजे… आणि स्मरणातही ठेवला पाहिजे… औरंगजेब महम्म्द खान असे या वीराचे नाव…रायफलमॅन औरंगजेब खान… भारतीय सेना ! 

रायफलमॅन औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ भारतीय लष्करात जम्मू अ‍ॅन्ड कश्मीर लाईट इन्फंट्री मध्ये सैनिकी सेवा करून निवृत्त झाले आहेत. एक भाऊ आधीच सैन्यात आहे. रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या एका काकांनी दहशतवादी विरोधी कारवाईत आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. यांचे आणखी दोन भाऊ मोहम्मद तारीख आणि मोहम्मद शब्बीर प्रादेशिक सेनेत भरती होऊन देशसेवा करत आहेत. 

हे औरंगजेब खान जम्मू-कश्मीरच्या ४४व्या राष्ट्रीय रायफल्स जम्मू अ‍ॅन्ड कश्मिर लाईट इन्फंट्रीमधील वीर शिपाईगडी…तरणेबांड,नीडर नौजवान..२०१२ मध्ये भरती झालेले.  सैनिकी संस्कार रक्तात भिनलेले औरंगजेब सैनिक सोडून दुसरे काहीही होण्यासाठी जन्मालाच आलेले नव्हतेच मुळात. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून औरंगजेब यांनी फौजी वर्दी अंगावर चढवली. भारतात घुसलेले परकीय दहशतवादी आणि देशाशी बेईमान असलेले स्थानिक माथेफिरू यांच्याविरुद्ध भारतीय सेनेच्या सुरू असलेल्या अनेक कारवायांमध्ये रायफलमॅन औरंगजेब खान आघाडीवर होते. 

२०१८ हे वर्ष भारतीय सैन्य आणि अतिरेकी यांच्या संघर्षात भारताच्या बाजूने झुकते माप टाकणारे सिद्ध झाले होते. ४४,राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटने या वर्षी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल १९ अतिरेक्यांना त्यांच्या ‘आखरी अंजाम तक’ जाण्यात मोठी मदतच केली होती. ह्या युनिटच्या प्रवेशद्वाराबाहेर एक वाक्य लिहिलेला फलक आहे…त्यावर लिहिलेलं आहे…’ आज कॉन्टॅक्ट होगा ! म्हणजे आज आपली आणि अतिरेक्यांची समोरासमोर भेट होणारच आहे…तयारीत रहा गड्यांनो ! ….. ‘ 

अतिरेकीविरोधी कारवाई धडाक्यात सुरू होती…अनेक अतिरेकी मारले जात होते…त्यात एक मोठे नाव होते… समीर अहमद भट उर्फ टायगर ! हा हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयंघोषित कमांडर होता. यानेच मेजर मोहित शुक्ल यांना ‘मला मारून दाखव’ असे आव्हान विडीओद्वारे दिले होते. मेजर शुक्लसाहेबांनी त्याला त्याची विडीओ-धमकी चोवीस तास जुनी व्हायच्या आतच यमसदनी धाडला !

स्थानिक भागाची, इथल्या तरुणांच्या मानसिकतेची, त्यांच्या शक्ती आणि मर्मस्थळांची उत्तम माहिती असलेले औरंगजेब म्हणजे भारतीय सेनेच्या हातात असलेले अमोघ अस्त्रच बनले होते. अनेक धाडसी कारवायांमध्ये औरंगजेब सहभागी होते. अशाच एका कारवाईत बारामुल्ला मध्ये औरंगजेब यांनी एका जखमी सैनिकाचे प्राण वाचवताना तीन अतिरेक्याना ठार केले होते.

ईद जवळ आली होती. रायफलमॅन औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेऊन घरी निघाले होते. सैनिकांना सुट्टीवर जाताना शस्त्रे सोबत घेऊन जाण्याची अनुमती नसते. म्हणून औरंगजेब नि:शस्त्र होते. आपल्या युनिटच्या जवळूनच त्यांनी एका खाजगी कार चालकाकडे बसस्टॅन्डपर्यंत जाण्यासाठी लिफ्ट घेतली. परंतु दुर्दैवाने त्यांच्या हालाचालींवर शत्रूची नजर होती. कुणी तरी फितुरही झाले असावे बहुदा !  कार युनिटपासून दूर गेल्यावर लगेच त्यांच्यावर हल्ला केला गेला. कारमधून ओढून घेऊन शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आले. दूर जंगलात नेऊन त्यांच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. काश्मीर खो-यातील जे तरुण देशाच्या बाजूने उभे आहेत, त्यांना धाक दाखवण्यासाठी, मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्या अतिरेक्यांनी औरंगजेब यांचा विडीओ बनवून प्रसारित करण्याचा घाट घातला होता. त्यांना वाटले असावे…हा गडी घाबरेल..प्राणांची भीक मागेल ! पण यातले काहीही झाले नाही. रायफलमॅन औरंगजेब यांनी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून सांगितले…” फौजी हूं….मौत से कैसा डर? मै अपना फर्ज निभा रहा हूं….तुम्हे जो करना है कर सकते हो !” आणि हे सांगताना औरंगजेब यांच्या चेह-यावर भीती नावाच्या भावनेचा लवलेशही नव्हता. आणि अर्थातच याचा त्या अतिरेक्यांना प्रचंड संताप आला असावा….त्यांनी तब्बल दहा दिवस त्यांना अमानुषपणे छळले आणि दहाव्या दिवशी रायफलच्या गोळ्यांनी छिन्न विछीन्न झालेला औरंगजेब यांचा देह रस्त्यावर टाकून ते अतिरेकी जंगलात पळून गेले ! दिवस होता १४ जून २०१८. 

रायफलमॅन औरंगजेब खान यांच्या अंत्ययात्रेस हजारोंचा जनसमुदाय लोटला होता… अतिरेक्यांच्या अंत्ययात्रांना जमतो त्यापेक्षा कितीतरी जास्त ! भारतीय सैन्याने पूर्ण सैनिकी सन्मानाने त्यांना अंतिम निरोप दिला. या अलौकिक त्यागाची दखल घेत भारतीय सेनेने औरंगजेब यांना १४ ऑगस्ट २०१८ या दिवशी मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर केले. त्यांच्या जन्मगावातील काही तरुण गल्फ देशांमध्ये नोकरीस होते. त्यांनी भारतीय लष्करी दलांत सामील होऊन औरंगजेब यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्या नोक-या सोडून भारतात परतण्याचा निर्णय जाहीर केला… या बलिदानाच्या काहीच महिन्यानंतर औरंगजेब यांना मारण्यात सहभागी असलेला एक अतिरेकी आपल्या सैन्याने ठार केला. दुस-या वर्षीच औरंगजेब यांचे दोन धाकटे भाऊ प्रादेशिक सेनेत भरती झाले ! एका बलिदानाने देशाला आणखी काही सैनिक मिळवून दिले होते…ही बलिदानाची किमया… हुतात्म्यांच्या रक्ताच्या एक-एका थेंबातून एक एक सैनिक तयार होऊ शकतो… म्हणून बलिदाने सातत्याने तरुणांच्या नजरेसमोर असायला पाहिजेत ! 

१० मे २०२३ रोजी भारताच्या महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांनी एका विशेष समारंभात या शूर हुतात्मा सैनिकाच्या माता-पित्याकडे, महमद हनीफ आणि राजबेगम यांच्याकडे त्यांच्या बहादूर मुलाने मिळवलेले शौर्यचक्र सुपूर्द केले ! या कार्यक्रमात मेजर आदित्य कुमार (10,गढवाल रायफल्स) मुदस्सीर अहमद शेख (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर शौर्य चक्र, कॉन्स्टेबल रोहित कुमार (जम्मू-कश्मिर पोलिस) यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांने अत्यंत दु:खद अंत:करणाने हे पुरस्कार स्विकारले. या प्रसंगी महामहिम राष्ट्रपती महोदयांनी शिष्टाचार बाजूला सारत वीरपत्नी आणि वीरमातांना स्वत: पुढे होऊन आलिंगन दिले… त्यांचे अश्रू पुसले… आणि सारा भारत देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे… असा संदेश दिला. 

या भावपूर्ण समारंभात महामहिम राष्ट्रपती महोदयांनी विविध संरक्षण सेवांमधील शूरांना एकूण आठ कीर्ती चक्र (यात पाच मरणोत्तर), एकोणतीस शौर्य चक्र (यातील पाच मरणोत्तर) प्रदान केली. डिफेन्स इनव्हेस्टीचर नावाने ओळखला जाणारा हा पुरस्कार वितरण समारंभ वर्षातून एकदा आयोजित केला जातो. याचे चित्रण दूरचित्रवाणी बातम्यांमध्ये दाखवले जाते. असे समारंभ खरे तर राष्ट्रीय महत्त्वाचे ठरावेत, शाळांतून-महाविद्यालयांतून याची माहिती दिली गेली पाहिजे.  

या लेखातील सर्व छायाचित्रे नीट पहावीत, अशी विनंती आहे. हुतात्मा औरंगजेब यांना अखेरची सलामी दिली जात आहे आणि त्याच छायाचित्रात अतिरेक्यांच्या मगरमिठीत असतानाही नीडर राहिलेले औरंगजेब, त्यांच्या आई-वडीलांनी शौर्यचक्र स्विकारल्यानंतर मा.राष्ट्रपती महोदयांनी त्यांना हात जोडून केलेले अभिवादन, औरंगजेब यांचे दोन्ही भाऊ सैन्यात सामील झाले तेंव्हा त्यांच्या आईच्या चेह-यावरील अभिमान,मा.राष्ट्रपती महोदयांनी वीरमातेला दिलेले सांत्वन-आलिंगन ! हर तस्वीर कुछ कहना चाहती है ! यह देश कब सुनेगा उनकी बाते? सत्ता-संघर्ष, ख-या ख-या पैशांची क्रिकेट-सर्कस, राजकीय-सामाजिक आंदोलनं, मौज-मज्जा यांच्या गदारोळात हे असे महान समारंभ एका बाजूला राहतात….हे खेदजनक आहे, हे कुणीही मान्यच करेल ! 

… कोण जाणे, हे वाचून कुणी औरंगजेब सेनेची वर्दी शरीरावर परिधान करून देशरक्षणार्थ पुढे सरसावेलही !  जयहिंद !!!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘महापौर’ शब्दाचा जन्म… भाग – 1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(सावरकरांची अजोड तत्वनिष्ठा आणि साक्षात बृहस्पतीलाही लाजवेल अशी बुद्धिमत्ता.) 

दारावर मोठ्ठ्या, सोनेरी अक्षरात पाटी डकवलेली होती – 

— “गणपत महादेव नलावडे, मेयर“!

गणपतरावांनी एकवार पाटीकडे नजर टाकली आणि आत, कार्यालयात प्रवेश करते झाले. गेले चार दिवस रोज ही पाटी पाहात होते ते. पुण्याचे मेयर होऊन बरोब्बर चारच दिवस तर झाले होते त्यांना ! बरं कार्यालयात टेबल-खुर्च्या आणि इतर साधनं आहेत, म्हणून त्याला कार्यालय म्हणायचं फक्त. नाहीतर गेल्या चार दिवसांपासून अक्षरशः पुष्पभांडार झालंय त्याचं. हाऽऽ पुष्पगुच्छांचा ढीग ! हार-तुरे, शुभेच्छापत्रे, भेटवस्तू तर वेगळ्याच ! 

गणपतरावांनी खिन्नपणे एकवार सगळ्याकडे नजर टाकली. गणपतरावांना सारंच निरर्थक वाटत होतं.

जागेवर बसल्या-बसल्या न राहावून त्यांनी शिपायाला हाक मारली. तोही धावतच आला.

“जी…?”

“ही एवढीच पत्रं आलीयेत का रे…?”

“व्हय जी!”

“नीट आठवून सांग… एखादं पत्र म्हणा, पाकीट म्हणा वा गुच्छासोबत येते तशी चिठ्ठी म्हणा; नजरेतून सुटली तर नाही ना तुझ्या?”

“न्हाई जी. म्या सोत्ताच तर डाकवाल्याकडनं सारी घेऊन लावून ठेवली हितं!”

यावर गणपतरावांचा चेहरा पडला असावा. कारण, शिपायाने ताबडतोब विचारले– 

“कोन्ता खास सांगावा यायचा हुता का?”

“नाही नाही… काही नाही. जा तू.”

“सायेब, माज्याकडनं काई चूक झाली का?”

“नाही नाही… अरे खरंच तसं काही नाही. जा तू.”

गणपतराव चांगलेच वरमले. ‘ आपण जरा अतीच तर करत नाही ना,’ असंही क्षणभर वाटून गेलं त्यांना.

शिपाई बावळटासारखा चेहरा करून जायला लागला. तशी गणपतरावांनी त्याला थांबवलं. म्हणाले,

“अरे ऐक… आता मी जरा काम करत बसणार आहे. आज काही कुणाच्या भेटी-गाठी ठरलेल्या नाहीत ना…? ठीक आहे तर ! आता कुणालाच आत सोडू नकोस.”

“जी” म्हणून शिपाई निघून गेला. 

‘आपण स्वत:च करावी का चौकशी?’, गणपतरावांच्या मनात येऊन गेलं. पण ‘नको नको. ते बरं दिसणार नाही’, असं म्हणून त्यांनी तो विचार झटकला आणि समोरच्या कामाकडे लक्ष द्यायला लागले. 

हळूहळू तो विचार मागे पडला. त्यानंतर चांगले दोन-एक तास गणपतरावांनी स्वत:ला कामातच बुडवून घेतलं. समाधीच लागली होती जणू त्यांची.

गणपतरावांची समाधी भंगली ती कसल्याश्या कोलाहलाने. सुरुवातीचे एक-दोन क्षण काही समजलंच नाही. नीट लक्ष देऊन ऐकायला लागले तेव्हा जाणवलं की, त्यांच्या कार्यालयाच्या दाराशीच दोन व्यक्ती वाद घालतायत. गणपतरावांनी जागेवरूनच, “काय चाललंय रे? कोण आहे?” असं विचारलं. त्याबरोबर शिपाई धावतच आत आला. मागोमाग एक कार्यकर्त्यासारखा दिसणारा मनुष्यही आत शिरला. ते पाहून शिपायाच्या कपाळाला नकळतच आठ्या पडल्या. पण साहेबांसमोर चिडणं बरं दिसणार नाही म्हणून तो काही बोलला नाही. गणपतरावांनी इशाऱ्यानेच ‘काय झालं?’ असं विचारलं. त्यावर शिपाई सांगू लागला,

“सायेब पाहा ना, तुमीच म्हनले होते ना कुनालाच आत सोडू नको म्हनून. तर ह्ये सायेब ऐकेचनात. काय तर म्हने, टपाल द्यायचंय. म्या म्हनलं, टपालच हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी मी द्येतो सायबास्नी नंतर. तर म्हनले की, न्हाय, म्हासभेच्या हापिसातून आलोय न् म्हत्वाचा सांगावा हाय. तुमालाच द्यायचा म्हंत्यात…”

गणपतरावांनी आलेल्या व्यक्तीला एकवार आपादमस्तक न्याहाळलं. हिंदूमहासभेच्या कार्यालयातून आल्याचं सांगतोय हा माणूस, पण मग आपण कधी पाहिल्यासारखं का वाटत नाहीये याला?

त्यांचे भाव ओळखून तो समोरचा तरुण मघाशीच्या भांडणाचा लवलेशही न दाखवता उत्साही स्वरात सांगू लागला,— “ मी रविंद्र जगताप. राजापूरला असतो. नुकताच मुंबईला आलोय शिकायला. राजापूरला असल्यापासून महासभेचं काम करतो मी. आज कामानिमित्त पुण्यात येणार होतो. तर काल संध्याकाळीच तात्यारावांनी बोलावून घेतलं..”

— ‘तात्याराव? बॅ. सावरकर?’ हा उल्लेख होताच गणपतरावांनी कान टवकारले ! जगतापच्या ते यत्किंचितही लक्षात आलं नाही. त्याचा ओघ चालूच होता,

“…मी म्हटलं, देईन की त्यात काय ! आता साक्षात स्वा. सावरकरांनी काम सांगितलेलं. त्यांची सेवा करण्याची संधी म्हणजे साक्षात स्वातंत्र्यलक्ष्मीचीच सेवा करण्याची संधी की ! घेतलं पत्र आणि आलो इकडे ! तर हे महाशय आत सोडेचनात ! साहेब कामात आहेत म्हणे ! आता मला सांगा, सावरकरांच्या निरोपापेक्षा अजून कोणतं काम महत्वाचं असणार आहे? घ्या…!!!” – असं म्हणून जगतापने पत्र गणपतरावांच्या दिशेने सरकावले. 

गणपतरावांच्या हाताला हलकासा कंप सुटला होता. परंतु तसं जाणवू न देता त्यांनी ते पत्र हातात घेऊन एका बाजूला ठेवले आणि जगतापकडे वळून म्हणाले,

“जगतापसाहेब, चहा घेता ना?”

“छे छे साहेब, चहा नको. घाईत आहे मी जरा. बाहेर मित्र वाट पहात थांबलेयत. ते काय… ते पुण्यात नवा आहे ना मी. कार्यालय माहिती नव्हतं मला.”

यावर गणपतराव म्हणाले, “हरकत नाही. पुढच्यावेळी आलात तर चहाला जरुर या !” मग शिपायाकडे मान वळवून म्हणाले, “ पुढच्यावेळी हे आले तर अडवू नकोस रे यांना. पाहुणे आहेत आपले !”

शिपाई मान डोलावत अदबीने निघून गेला. ‘आपल्याला केवढा मोठ्ठा मान दिला जातोय ’ असं वाटून जगतापचीही छाती फुगली ! त्या आनंदातच तोही परतला.

– क्रमशः भाग पहिला 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “कृष्णकन्या संत सखू” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “कृष्णकन्या संत सखू” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆ 

पुस्तक – कृष्णकन्या संत सखू

लेखिका – सुश्री अनुराधा फाटक 

प्रकाशक – रावा प्रकाशन

पृष्ठ संख्या – 64 

किंमत – 120 रु

परिचय – मंजिरी येडूरकर. 

श्रीमती अनुराधा फाटक

लेखिका अनुराधा फाटक यांची एक नवीन लघुकादंबरी, ‘कृष्णकन्या संत सखू’ रावा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातून लेखिकेने संत सखूचा अगदी बालपणापासून विठ्ठलाच्या पायावर देह ठेवेपर्यंतचा जीवनपट उलगडून दाखवला आहे.आत्तापर्यंत आपण संत सखू भजनातून, गाण्यातून ऐकली होती, इथे मात्र कधी न बघितलेली सखू आपण सरूप पाहतो. नुसती पहात नाही तर हळूहळू आपण तिच्या डोळ्यात तिची कहाणी वाचायला लागतो, अनुभवायला लागतो. इतकी ती कथा जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या शब्दचित्रात आहे. तिचा कृष्ण, तिचा विठ्ठल, तिची कृष्णामाई सगळं आपलं होतं. अर्थात कृष्णामाईच आपल्याला सखू ची गोष्ट सांगते आहे म्हणजे तिला आपल्यासमोर सरूप यायलाच हवं नं! अनुराधाताईंच्या शब्दात, वर्णनात इतकी ताकद आहे की त्या सखूची आपल्याला ओढ लागते. तिच्या अनिवार विठ्ठल भक्तीत आपणही कुठेतरी हरवून जातो. असं हे पुस्तक आपल्या संग्रही असायलाच हवं!

© सौ.मंजिरी येडूरकर

मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 06 – हम बेघर बञ्जारे हैं… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – हम बेघर बञ्जारे हैं।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 06 – हम बेघर बञ्जारे हैं… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

जन्मजात हम रहे घुमन्तू

हम बेघर बन्जारे हैं

ठिगधर अपना नहीं ठिकाना

जहाँ जगह मिल जाती खाली

वहीं विवश हो तम्बू ताना

व्याकुल अनपढ़ भूखे बच्चे

हम अपने उद्यम के सच्चे

यद्यपि कर्मठ कर्मवीर हम

पर विपदा के मारे हैं

दौलत ने हमको दुत्कारा

यूँ तो रहे उपेक्षित लेकिन

हमें स्वार्थियों ने पुचकारा

जब चुनाव के दिन आते हैं

तब हम भी पूछे जाते हैं

जिन्हें जिताते रहे हमेशा

हम उनसे ही हारे हैं

रहा पीठ पर पूरा डेरा

अपना भी कुछ स्वाभिमान है

किन्तु आपदाओं ने घेरा

हम पर अँधियारे का पहरा

उजयारा तो दुश्मन ठहरा

आँच आन पर यदि आये तो

बन जाते अंगारे हैं

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 82 – मनोज के दोहे… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे…। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 82 – मनोज के दोहे…

 

1 साक्षी

सनकी प्रेमी दे गया, सबके मन को दाह।

दृश्य-कैमरा सामने, साक्षी बनी गवाह।

2 शृंगार

नारी मन शृंगार का, पौरुष पुरुष प्रधान।

दोनों के ही मेल से, रिश्तों का सम्मान।।

3 पाणिग्रहण

संस्कृति में पाणिग्रहण,नव जीवन अध्याय।

शुभाशीष देते सभी, होते देव सहाय।।

4 वेदी

अग्निहोत्र वेदी सजी, करें हवन मिल लोग।

ईश्वर को नैवेद्य फिर, सबको मिलता भोग।।

5 विवाह

मौसम दिखे विवाह का, सज-धज निकलें लोग।

मंगलकारी कामना, उपहारों का योग ।।

 ©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – प्रश्न ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – प्रश्न ??

प्रश्न है,

प्रकृति के केंद्र में

आदमी है या नहीं,

इससे भी बड़ा प्रश्न है,

आदमी के केंद्र में

प्रकृति है या नहीं?

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना- यह साधना आषाढ़ प्रतिपदा तदनुसार सोमवार 5 जून से आरम्भ होकर देवशयनी एकादशी गुरुवार 29 जून तक चलेगी। 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – यायावर जगत # 11 ☆ मसाईमारा की रोमांचक यात्रा ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार। आप प्रत्येक मंगलवार, साप्ताहिक स्तम्भ -यायावर जगत के अंतर्गत सुश्री ऋता सिंह जी की यात्राओं के शिक्षाप्रद एवं रोचक संस्मरण  आत्मसात कर सकेंगे। इस श्रृंखला में आज प्रस्तुत है आपका यात्रा संस्मरण – मेरी डायरी के पन्ने से…मसाईमारा की रोमांचक यात्रा)

☆ साप्ताहिक स्तम्भ –यात्रा संस्मरण – यायावर जगत # 11 ☆  

? मेरी डायरी के पन्ने से… मसाईमारा की रोमांचक यात्रा ?

नेशनल जॉग्राफ़ी और एनीमल प्लैनेट पर हमेशा ही जानवरों को देखना और उनके बारे में जानकारी हासिल करते रहना मेरा पुराना शौक है। फिर कहीं मन में एक उत्साह था कि किसी दिन इन्हें अपनी नजरों से भी देखें। वैसे तो जब चाहो इन पशुओं के दर्शन चिड़ियाघर में तो कभी भी हो सकते हैं पर मेरी तमन्ना थी कि इन प्राणियों को प्राकृतिक खुले स्थान में ही इन्हें देखूँ। और यह इच्छा ईश्वर ने बहुत जल्दी पूर्ण भी कर दी।

सितंबर का महीना सवाना में माइग्रेशन मन्त कहलाता है। हमने इसी कालावधि के दौरान कीनिया जाने का निर्णय लिया।

कीनिया, तानजेनिया , आदीसाबाबा या किसी भी अफ्रीकन देशों में यात्रा करने से पूर्व पर्यटकों को yellow fever से बचाव करने के लिए इंजेक्शन लेने की बाध्यता होती है। यह इंजेक्शन सरकारी अस्पताल से लेनी पड़ती है। इसके बाद जो प्रमाणपत्र सरकार की ओर से मिलता है उसे यात्रा के दौरान अपने साथ रखने की आवश्यकता भी होती है। उन दिनों इस इंजेक्शन के लिए मुम्बई जाना पड़ता था। इस इंजेक्शन की अवधि दस वर्ष की होती है। आजकल बड़े शहरों में यह सुविधा उपलब्ध है।

सन 2012 सितंबर हम मुम्बई से इथियोपिया के लिए रवाना हुए। आदिसाबाबा वहाँ की राजधानी है। हम पहले वहाँ उतरे, बड़ी संख्या में स्थानीय लोगों को देखकर अच्छा लगा कि अपने देश में सब प्रकार के काम वे ही संभाल रहे हैं। हँसमुख, मिलनसार तथा विदेशियों के साथ आतिथ्यपूर्ण उनका व्यवहार हमें अच्छा लगा। दो घंटे के हॉल्ट के बाद हम मोम्बासा के लिए रवाना हुए।

इथियोपिया से जब हवाई जहाज़ ने उड़ान भरी तो कुछ समय बाद ही पायलट ने अनाउंस किया कि हम किलमिनजारो के पास से गुज़रते हुए जाएँगे अतः सभी यात्री अपने -अपने कैमरे संभाल लें। साथ ही वे जानकारी भी दे रहे थे कि अफ्रीका का यह सबसे ऊँचा पर्वत है जहाँ बर्फ भी पड़ती है। जलवायु परिवर्तन के कारण अब इसके ऊपर से बर्फ की मात्रा कम होती जा रही है। कीबो मावेनज़ी और शीरा ये किलमिनज़ारो के तीन मुख्य ज्वालामुखीय मुख हैं। इस पर्वत की ऊँचाई 5895 मीटर है और यह संसार का एकमात्र ऐसा पर्वत है जो केवल एक मात्र चोटी के साथ खड़ा है। यह पर्वत तानज़ेनिया के भूभाग पर है। हमने जानकारी के साथ -साथ खूब तस्वीरें भी खींची। यह इस यात्रा के दौरान मिला हुआ पहला बोनस था जिसकी हमने अपेक्षा भी नहीं की थी।

मोम्बासा में उतरने से पूर्व ही हमने अपने फोन में वहाँ के सिमकार्ड डाल लिए थे। यह सिमकार्ड हमें अपने देश के ही ट्रैवेल एजेंट से मिला था। इस सुविधा के कारण एयरपोर्ट पर उतरते ही साथ वहाँ के ट्रैवेल एजेंट ने हमें फोन किया और एक्जिट गेट के पास हमारे नाम का प्लैकार्ड लिए वे स्वागत के लिए तैनात मिले। हँसमुख, मिलनसार जाति। स्त्री-पुरुष में कोई भेद न रखनेवाली जाति।

हम खाली हाथ ही एक्जिट गेट पर पहुँचे क्योंकि हमारे दो सूटकेस दूसरे फ्लाइट में चले गए थे जो दूसरे दिन शाम तक पहुँचने वाले थे। हम हमेशा अपनी दवाइयाँ और दो जोड़े कपड़े अपने हैंडबैग में लेकर ही चलते हैं। ऐसे समय पर ये अनुभव बड़े काम आते हैं।

हमारे रहने के लिए एक अत्यंत सुंदर होटल में व्यवस्था थी यह सारी व्यवस्था ऑनलाइन एजेंट द्वारा ही की गई थी। ये सारी ऑनलाइन बुकिंग बलबीर कई वर्षों से करते आ रहे हैं जिस कारण हम आराम से अपनी इच्छानुसार विश्वभ्रमण कर पाते हैं।

यहाँ के होटल का मैनेजर मूल रूप से भारतीय था जो चार पीढ़ी पहले गुजरात से युगांडा में रहने आया था। इदियामीन के भय से पलायन कर अब इनका परिवार मोम्बासा में आ बसा था।

दूसरे दिन हमें अपने सूटकेस के मोम्बासा पहुँचने का संदेश मिला,जिसे लेने के लिए हमें एयरपोर्ट जाना पड़ा। एयरपोर्ट शहर से बहुत दूर था। हमने होटल के मैनेजर से कोई गाड़ी मँगवाने के लिए कहा। होटल के मैनेजर ने गाड़ी मँगवाई। हमने दाम देना चाहा तो उसने कहा, अपने देशवासी आज मेरे इस देश में मेरे मेहमान हैं , इसे हमारी तरफ से सहायतार्थ योगदान समझें। उसने हाथ जोड़कर कहा तो हम मना न कर सके। यहाँ यह कहना ज़रूरी समझती हूँ कि कीनिया एक ग़रीब देश है फिर भी मेहमाननवाज़ी में वे पीछे नहीं रहते।

यह इस यात्रा के दौरान मिला हुआ दूसरा बोनस था।

तीसरे दिन प्रातः पाँच बजे हम होटल से रवाना हुए और एक लोकल एयरपोर्ट पहुँचे। वहाँ से हम एक छोटे – से 6 सीटर विमान द्वारा मसाईमारा सवाना के लिए रवाना हुए। यह विमान 17000 फुट की ऊंँचाई से अधिक ऊपर उड़ नहीं सकता इसलिए जब हम सवाना की तरफ पहुँचे तो हमें मारा रिवर में दरियाई घोड़े और मुँह खोलकर अपने शरीर को धूप में सेंकते हुए ढेर सारे मगरमच्छ नज़र आए। मन आनंदित हुआ, अपनी आँखों पर विश्वास ही नहीं हो रहा था ! मानो आँखें सपना देख रही थीं। विमान थोड़ा और नीचे उतरा तो खुले मैदान में हमें ज़ीब्रा और विल्डरबीस्ट घास चरते हुए दिखाई दिए। कुछ हाथियों के झुंड भी हमें पेड़ों की शाखाओं को तोड़ते और पत्तों को खाते हुए दिखाई दिए।

अचानक विमान नीचे उतरा। ना कोई एयरपोर्ट और न ही कोई रनवे ! मैदान के बीचोबीच!!

हमें विमान से नीचे उतारा गया। कुछ दूरी पर हिरणों के झुंड निर्विकार चित्त से घास चर रहे थे। मनुष्य को देखने का उन्हें कोई उत्साह नहीं था। अचानक खुले मैदान पर हमें उतारकर विमान जैसे अचानक उतरा था वैसे ही अचानक चार यात्रियों को लेकर उड़ान भरकर निकल गया।

मन में क्षण भर के लिए घबराहट- भी हुई कि कहीं हम पर शेरों ने आक्रमण कर दिया तो ? पर यह डर मनुष्य के हृदय का डर था। शेर अधिकतर अंधकार होने पर ही शिकार करते हैं। दिन में अठारह घंटे वे सोते हैं। एक और सच्चाई तो यह है कि पशु अकारण किसी पर हमला नहीं करते और मनुष्य उनके भोजन की सूची में भी नहीं हैं।

खैर ,हमारे स्वागत में चारों तरफ से खुली हुई लाल कपड़े से ढकी सीटों वाली जीप और चालक हमें लेने के लिए तैयार खड़े थे। यह उस रिसोर्ट द्वारा भेजा गया था जहाँ पर हम पाँच दिन रहने जा रहे थे। हमारे साथ एक फ्रेंच परिवार भी था। जीप का चालक मसाई जाति का था। वहीं का निवासी था। कामचलाऊ अंग्रेजी बोल लेता था। उसने हमें ऊपर से मारा नदी में खड़े दरियाई घोड़े और मगरमच्छों का दर्शन कराया। वे नीचे पानी में और पास की कीचड़ वाली जगह पर थे। और हम काफी ऊपर खड़े थे ताकि हम आराम से उन्हें देख सकें वरना दरियाई घोड़े आक्रमण करने में बहुत होशियार होते हैं। यह दर्शन हमारे लिए तीसरा बोनस साबित हुआ।

हम अपने होटल की ओर रवाना हुए। जाते समय कई विल्डरबीस्ट और ज़ीब्रा हमें नज़र आए। हमें देख कर भी उन्होंने हमें अनदेखा कर दिया। हमें उनमें रुचि थी, उन्हें हममें नहीं। कुछ दूरी पर हमें जिराफ़ का परिवार नजर आया और इन सब के बीच में दौड़ते हुए बबून भी दिखाई दिए।

एक अलग प्रकार के भयमिश्रित रोमांच के साथ हम अपने रिसोर्ट पहुंँचे। हमें जीप चालक ने जानकारी देते हुए बताया कि लाल कपड़े मसाई जाति के लोगों का वस्त्र है। वे गाय पालते हैं और उन्हें चराने के लिए खुले मैदानों पर ले जाते हैं। उनके पास अपनी सुरक्षा के लिए तीर- धनुष्य और भाला होता है। किसी समय वे जानवरों का शिकार करते थे। पर अब नहीं क्योंकि उन जानवरों को देखने के लिए हज़ारों की संख्या में पर्यटक आते हैं और मसाई लोगों को जीविका मिलती है। जंगली पशु उन लाल कपडे़वालों से दूर रहते हैं। पर्यटकों की सुरक्षा हेतु गाड़ी में भी इसीलिए लाल कपड़े रखे जाते हैं। उसने हमें दस फीट की दूरी से शेर के झुंड का दर्शन करवाने का आश्वासन दिया और कहा कि न तो हम उन्हें देखकर शोर मचाएँ न गाड़ी से नीचे उतरने का प्रयास ही करें। यह स्थान उन जानवरों के लिए है। वे अपनी टेरिटरी में किसी और का हस्तक्षेप बिल्कुल सहन नहीं करते। हम सबने चालक की हर बात गाँठ बाँध ली।

हमारा सामान हमारे लिए आरक्षित कमरे में ले जाया गया। यह मारा नदी से काफी ऊपर बनाए गए आवासीय व्यवस्था थी। लकड़ी से बने एक – एक विशाल प्लेटफार्म पर भारी भरकम सख्त – मजबूत टेंट लगाए गए थे। टेंट के भीतर सभी असबाब मजबूत लकड़ी से बने थे। टेंट के भीतर एक अलमारी, एक विशाल पलंग, मेज़- कुर्सी, तथा स्वच्छता गृह बनाया हुआ था। टेंट को बंद करने के लिए मोटे ज़िप लगे थे। और उस पर एक और मोटा कपड़ा लगाया हुआ था। टेंट के भीतर हवा के लिए जालीदार खिड़की सी बनी हुई थी। किसी पशु के लिए सीढ़ी चढ़कर टेंट तक आना सहज न था। इसलिए सारे टेंट ऊँचे प्लेटफार्म पर ही बनाए हुए थे। टेंट के सामने खुली जगह थी जहाँ से नदी में डुबकी लिए हुए आलसी दरियाईघोड़ों की आँखें दिखाई दे रही थीं।

हमें बताया गया था कि रात के नौ के बाद बिजली बंद कर दी जाती है क्योंकि दरियाई घोड़े रात होने पर अँधेरे में टेंट के आसपास घास खाने आते हैं। कई बार वे अपनी पीठ रगड़ने के लिए टेंट लगाए गए भारी भरकम खंभों का उपयोग करते हैं। घास खाते हैं तो खूब आवाज़ करते हैं। मुँह खोलते हैं तो दो बड़े नुकीले दाँत दिखाई देते हैं। भयंकर से दिखते हैं।

हर यात्री को सुरक्षा के लिए टॉर्च दिया जाता है। आवश्यकता पड़ने पर टेंट के भीतर बने झरोखों से टॉर्च दिखाए जाने पर पास ही सुरक्षा के लिए तैनात मसाई मदद के लिए पहुँच जाते हैं।

दोपहर के समय खुले मैदान पर एक बबूल के वृक्ष के नीचे अस्थाई रसोई की व्यवस्था के तहत हमें भोजन खिलाया गया। हम छह लोग थे। कई प्रकार के फल, सलाद, उबले आलू, तथा मांसाहारी पदार्थ परोसे गए।

यह सितंबर का महीना था। वर्षा समाप्त हो चुकी थी और सवाना हरा-भरा था। एक जिराफ़ पास के एक विशाल बबूल के वृक्ष के पत्ते इत्मीनान से सूँथ-सूँथकर खा रहा था। पास ही कुछ छोटे -बड़े बबून घूम रहे थे। हमें बताया गया था कि हम उन्हें किसी प्रकार का कोई भोजन न डालें। हमारा भोजन उनका भोजन न था।

हम सभी जानवरों के क्रियाकलापों को नज़दीक से देखना चाहते थे इसलिए

भोजन करते ही साथ कई जीप उन्हें देखने के लिए तीन बजे के क़रीब निकल पड़ीं।

हर जीपचालक के पास वॉकी- टॉकी था। वे एक दूसरे को जानवरों का पता बताते चलते रहे। एक पेड़ पर हमें जिराफ का मृत शावक दिखाई दिया। उसकी निचली टहनी पर एक बड़ा तेंदुआ सोया हुआ था। ये पशु अपने शिकार को सुरक्षित रखने के लिए उन्हें मारने के बाद पेड़ पर टाँग देते हैं। फिर फुर्सत से खाते रहते हैं। ऐसा दृश्य एनिमल प्लेनेट में टी वी पर अवश्य देखा था पर आज साक्षात सामने ही अपनी आँखों से देख रहे थे।

इसके तुरंत बाद किसी ने हमारे चालक को सिंह के एक झुंड की खबर दी। हम उत्साहपूर्वक उन्हें देखने गए। एक विल्डरबीस्ट का शिकार कर दल का लीडर एक सिंह उसका पूरा आनंद ले रहा था और दस – बारह सिंहनियाँ पास में ही मांस खाने के लिए प्रतीक्षा कर रही थीं। हमने खुले में दस फीट की दूरी से इन हिंस्र पशुओं को देखने का आनंद लिया। हमसे स्पष्ट कहा गया था कि हम न तो ऊँची आवाज़ में बोलेंगे न गाड़ी से नीचे उतरेंगे। हम सबने आलस में अंगड़ाई लेती शेरनियाँ देखीं। शेर महाराज को भोजन का अकेले में आनंद लेते हुए देख हम सब रोमांचित हो उठे। सच में एक राजा के समान!

इतने में हमारे चालक को खबर दी गई कि कहीं दो चीते भी नज़र आए हैं। हमारे चालक ने गाड़ी घुमाई और हम उस दिशा में चल पड़े। काफी दूर जाने पर एक ऊँची चट्टान पर हमें दो चीते दिखाई दिए। वे एक दूसरे को प्यार से चाट रहे थे। तेंदुए और चीते में फर्क है। चीते की आँखों के नीचे दो धारियां होती हैं।

हमें लौटते हुए विलंब हो रहा था, सूर्यास्त भी हो रहा था। एक जगह पर चालक ने गाड़ी रोक दी और कहा सामने देखिए। मैदान में हमें ज़मीन में बनाए गए बिलों में से लकड़बग्घे निकलते हुए दिखे। ये पूरा कुनबा साथ रहता है। एक वयस्क मादा बच्चों को संभालती है। खुले मैदान के बीचोबीच जीप रुकी और हमने लकड़बग्घों के झुंड को देखा।

दूसरे दिन सुबह- सुबह हम रवाना हुए मारा रिवर देखने के लिए जहांँ पर नदी के इस पार से उस पार पशु जाया करते हैं। इसे वे माइग्रेशन कहते हैं। यह माइग्रेशन हर साल होता है जब भारी वर्षा के पश्चात मारा रिवर एकदम उफनती हुई दिखाई देती है , तब नदी के इस पार से उस पार पशु जाते हैं। यह माइग्रेशन मौसम के अनुसार घास चरने और नवजात शावकों को जन्म देने का मौसम होता है।

हम बड़े उत्साह से नदी किनारे पहुंँचे। कुछ दूरी से हमने देखा कि बड़ी संख्या में विल्डर बीस्ट खड़े थे और धीरे-धीरे कवायद करती हुई उनकी बढ़ती संख्या नदी के किनारे जमा हो रही थी। हमें जीप चालक ने बताया कि जब हजारों की संख्या में विल्डरबीस्ट जमा हो जाते हैं तब वे एक साथ नदी को पार करने का कार्य करते हैं। नीचे नदी में काफी सारे मगरमच्छ घूम रहे थे। यह उनका ब्रेकफास्ट टाइम था। वे पशुओं के माइग्रेशन की ताक में रहते हैं।

विल्डरबीस्ट अभी पानी में छलाँग मारने का साहस नहीं जुटा पा रहे थे। उधर बड़ी संख्या में दौड़ते हुए और कई विल्डरबीस्ट जमा हो रहे थे। सारा वातावरण पशुओं के दौड़ने के कारण धूल से भरता जा रहा था। उन सबके रंभाने की आवाज़ से वातावरण गुंजायमान हो रहा था। हम कुछ दूरी पर अपने कैमरे संभालकर दिल थाम कर बैठे थे कि कब वह अद्भुत दृश्य देखने को मिलेगा। दूसरी तरफ बड़ी संख्या में ज़ीब्रा दिखाई दे रहे थे जो पानी पीने के लिए नदी पर आना चाहते थे लेकिन मगरमच्छों को देखकर भयभीत हो रहे थे।

फिर अचानक एक अद्भुत घटना घटी। हमने देखा एक विल्डर बिस्ट ने पानी में छलाँंग लगाई , उसके छलांँग लगाने के एक मिनिट बाद ही हजारों की संख्या में अनेकों विल्डरबीस्टों ने भी नदी में छलाँग लगाई परंतु उस एक मिनट के अंतर में पहला विल्डरबीस्ट भूखे मगरमच्छों का शिकार हो गया। पानी लाल – सा हो गया और मगरमच्छों में माँस के लोथड़े छीनने की स्पर्धा शुरू हो गई।

उधर अपने योग्य भोजन पाकर मगरमच्छ व्यस्त हो गए ,इधर अन्य विल्डरबीस्ट मौका पाकर नदी पार कर गए। समस्त वातावरण में भयंकर कोलाहल मचा था, पानी की छींटे ऊपर तक आ रही थीं, ऐसा लग रहा था मानो महायुद्ध छिड़ा हो। घंटे भर बाद सारे विल्डरबीस्ट और उनके बाद ज़ीब्रा नदी पार कर गए। अब नदी शांत हो गई। मगरमच्छ भरपेट भोजन कर अब धूप सेंकने तट पर आ गए और अपना जबड़ा खोलकर बैठ गए।

दरियाई घोड़े अपने पूरे शरीर को पानी में डुबोकर केवल अपनी आँखों को पानी के ऊपर रखकर सारे दृश्य का अवलोकन करने लगे। यहाँ एक और नई बात की जानकारी मिली कि अब घास खानेवाले दरियाई घोड़ा मांसाहारी होने लगे हैं। वे भी मौका पाकर माइग्रेट करनेवाले पशुओं के मांस का बड़े मज़े से स्वाद लेते हैं। वे अत्यंत आक्रामक और भयंकर प्राणी हैं।

तीसरे दिन हम मसाई विलेज देखने गए। उस गाँव की मुखिया एक वृद्धा स्त्री थी। हमारे आने की खबर मिलते ही साथ वे गीत गाने लगीं। शब्द तो हम पकड़ न पाए पर संयुक्त स्वर में उत्साह था,आतिथ्य की झलक थी और थी गीत में मिठास। हमें इस तरह का अद्भुत स्वागत बहुत भाया। मुखिया के दो बेटों ने गाँव के द्वार पर ऊँची -ऊँची छलाँग लगाकर हमारा स्वागत किया। यही उनकी प्रथा और संस्कृति है।

बीस से चालीस परिवार गोलाई में मिट्टी और लकड़ी से घर बनाते हैं। हर घर में जानवरों की चौड़ी चमड़ी लगी हुई है जिसपर वे सब सोते हैं। घर के भीतरी हिस्से में बुजुर्ग सोते हैं और बच्चों को लेकर युवा दरवाज़े की ओर वाले कमरे में सोते हैं।

गाँव के मुखिया के घर में प्रातः दो पत्थरों को घिसकर आग जलाई जाती है फिर यही आग लकड़ी की सहायता से दूसरे घरों तक पहुँचाई जाती है। यह प्रतिष्ठा , प्रभुत्व और एकता का प्रतीक माना जाता है।

भोजन में वे भूना मांस और गाय का कच्चा दूध पीते हैं। घर के भीतर लकड़ी और मिट्टी के कुछ पात्र रखे हुए दिखाई दिए। गाँव की युवा स्त्रियाँ लकड़ी से पशुओं की तराश कर मूर्ति बनाते हैं। वृद्धा पशुओं की खाल से वस्त्र और हड्डियों से माला बनाती हैं। पास की छोटी क्यारियों में औषधीय वनस्पतियाँ उगाती हैं। गाँव के पुरुष मवेशियों को चराने के लिए ले जाते हैं। प्यास लगने पर गाय के गले में तीर से छेद कर थोड़ा खून निकालकर पीते हैं। फिर उस स्थान पर वनस्पतियाँ हाथ से मसलकर लगा देते हैं। ऐसा करने पर रक्त का प्रवाह थम जाता है और घाव नहीं होता। इसके बारे में टीवी पर जानकारी मिली थी अब साक्षात देखने को भी मिला। गाँव की मुखिया ने मेरे गले में अपने गले का हार डाला इसका अर्थ उनकी प्रसन्नता व्यक्त करना है ऐसा हमें बताया गया। मुझे मसाई महिलाओं के साथ नृत्य करने का अद्भुत मौका मिला। यह इस यात्रा के दौरान मिला चौथा बोनस था।

मसाई में वैसे तो गर्मी के मौसम में पानी की कमी होती है, पर भारी वर्षा के बाद नदी भर उठती है। तब प्राणियों के प्रजनन की भी तैयारी शुरू होती है। मसाई की महिलाएँ भी गाढ़े लाल रंग के वस्त्र पहनती हैं। घुटने के नीचे का हिस्सा खुला रहता है। बाकी शरीर एक बड़े वस्त्र से ढका रहता है। वे अपने घर के आसपास जो औषधीय पौधे उगाती हैं उन्हें सुखाकर धुआँ निर्माण करते हैं और उससे अपने घुंघराले बाल और शरीर को स्नान कराने जैसे धुएँ से भर देते हैं। इन पौधों के जलने से एक सुगंध उत्पन्न होती है इसके कारण उनके शरीर स्वच्छ हो जाते हैं। सिर के घुंघराले बालों में जूँ नहीं पड़ते।

मसाई गाँव के बच्चे पास के कनाडियन स्कूल में पढ़ने जाते हैं। यहाँ कनाडा सरकार ने मसाई जनता को सिविलाइज्ड बनाने की जिम्मेदारी ली है साथ ही उनके बच्चों को पौष्टिक भोजन, औषधि आदि भी दी जाती है। साथ ही साथ प्रकृति की पूजा करने वाली यह मसाई जाति की अगली पीढ़ी अंग्रेज़ी तो सीख ही रही है साथ में ईसाई धर्म में परिवर्तित भी होती जा रही है। अगर देखा जाए तो वे अपनी जड़ों से ,मूल संस्कृति से दूर होते जा रहे हैं।

चौथे दिन दिन हम गैंडे देखने गए। अफ्रीकी गैंडों की नाक के ऊपर दो खड्गनुमा सींग होते हैं। ये वास्तव में बाल हैं और इसमें औषधीय गुण होते हैं। इसी कारण चोरी -छिपे इन पशुओं का शिकार किया जाता है। गैंडे घासखोर प्राणी हैं इसलिए जहाँ ऊँची घास होती है वे उसी इलाके में पाए जाते हैं। वन सुरक्षा या रेंजर गैंडे प्रजाति की सुरक्षा में सतर्कता से तैनात रहते हैं। उस दिन केवल हम दोनों ही थे। हम सुबह पाँच बजे ही निकल गए। हमारे साथ पैक्ड नाश्ता और फ्लास्क में भरकर गर्म कॉफी की व्यवस्था दी गई थी। साथ ही कुछ फल, तश्तरियाँ ,पानी की बोतलें, काँटे -चम्मच,छुरी, बटर, सॉफ्ट ड्रिंक के टेट्रापैक एक बड़े से थर्मोकोल के बक्से में पैक कर के दिया गया।

काफी यात्रा के बाद जीप चालक हमें ऐसे स्थान पर ले गया जहाँ नज़दीक से हम गेंडों को देख सकें। गेंडे भी आक्रमक होते हैं। वे अकेले ही घूमते हैं। मादा गैंडा अपने बच्चे के साथ दिखाई देती है। नर मादा केवल तब साथ होते हैं जब प्रजनन या मैथुन क्रीड़ा का मौसम होता है।

हमने दो गर्भवती मादाएँ देखीं जो सुरक्षा के घेरे में रखी गई थीं। हम उन्हें गाड़ी से उतरकर पास जाकर देख सके क्योंकि उनका सेवक उनके साथ ही था। यह एक अद्भुत रोमांचक और अविस्मरणीय अनुभव था हमारे लिए। गेंडे की गर्भावस्था पंद्रह से सोलह माह तक चलती है। शिशु के जन्म के बाद वह तुरंत खड़ा हो जाता है और माँ का ही दूध पीता है। माँ अपने शावक को दो वर्ष तक दूध पिलाती है।

इतनी नज़दीक से गैंडों को देखना इस यात्रा के दौरान मिला पाँचवा बोनस था। लौटते समय दस बज चुके थे। हम एक ऊँची चट्टान के ऊपर जा बैठे। चालक ने दरी बिछाई, फिर साथ लाए गए थर्मोकोल के बक्से से निकालकर हम तीनों ने नाश्ता खाया। चालक ने मसाई लोगों के जीवन के बारे में कई जानकारियाँ दीं। जैसे एक कबीले के लोग अपने कबीले की लड़की से विवाह नहीं कर सकते। दूसरे दूर गाँव की लड़की ब्याहकर लाई जाती है। लड़की अपने साथ दहेज़ के रूप में गायें लाती हैं। नई दुल्हन का कबीले में स्वागत होता है और कई दिनों तक उत्सव मनाया जाता है। उसने यह भी कहा कि आजकल लड़के पढ़ लिखकर , अंग्रेज़ी सीखकर कंप्यूटर पर काम करना सीखने लगे हैं। पर पढ़े लिखे लड़के कबीला छोड़कर अलग शहरों में पक्का घर बनाकर रहते हैं तथा नौकरी करते हैं। इस कारण अब मसाई कबीले घटते जा रहे हैं।

अब हम रिसोर्ट की ओर लौटने लगे, इतने में चालक को वॉकी -टॉकी में एक कॉल आया। उसने तुरंत गाड़ी घुमाई और हमें ऊँचे ऊँचे वृक्षों के बीच ले गया। वहाँ कुछ वृक्षों पर और कुछ नीचे मैदान पर विशाल गिद्धों का झुंड दिखाई दिया जो तीव्र गति से किसी मरे ज़ीब्रा के बचे- खुचे मांस नोचकर खा रहे थे। अद्भुत दृश्य था। आपस में लड़ भी रहे थे और खाते जा रहे थे। यह हमारी यात्रा के दौरान मिला छठवाँ बोनस था।

पाँचवे दिन हम सभी को दोपहर के भोजन के बाद मसाई के विशाल मैदान का चक्कर लगाने के लिए ले जाया गया। बड़ी संख्या में हाथी के झुंड, जिराफ़ उनके बच्चे , ज़ीब्रा दिखाई दिए। दोपहर को तेज़ धूप थी। एक अद्भुत दृश्य देखने को मिला अधिकतर ज़ीब्रा जोड़े में दिखाई दिए और दोनों दो दिशाओं में मुख किए खड़े थे। चालक ने समझाया कि जब ज़ीब्रा एक जगह पर खड़े होते हैं तब आगे और पीछे से किसी आक्रमण से बचने के लिए वे इस तरह खड़े होते हैं। ऐसा करके वे अपने को सुरक्षित कर लेते हैं मुश्किल पड़े दो दौड़ने लगते हैं। हम जब आवास की ओर लौटने लगे तो हमें बड़ी संख्या में शुतुरमुर्ग के झुंड दिखाई दिए। वे तीव्र गति से बस दौड़ रहे थे। जीपचालक ने उनके पीछे जीप दौड़ाई तो उन्होंने अपनी गति बढ़ा दी। हमने ही फिर चालक को उनका पीछा करने से मना किया। हमें यह अनुचित लगा।

हम अब अपने आवास की ओर लौटने लगे। भारी संख्या में विशाल मोटे सींगवाले जंगली भैंस जुगाली करते हुए बैठे थे। उनका आकार विशाल ,तगड़े और भयंकर दिख रहे थे। भोजन के बाद वे सब बैठ जाते हैं और जुगाली करते हैं। वे भी सब झुंड में रहते हैं।

उस दिन शाम को सभी पर्यटकों के लिए शुतुरमुर्ग नृत्य का आयोजन किया गया था। यह नृत्य मसाई जाति के पुरुष ही दिखाते हैं। साथ ही मसाई जाति के नृत्य संगीत आदि का आयोजन भी था।

छठवें दिन ही सुबह को आठ बजे हम उसी स्थान पर लौटकर आए जहाँ हम उतरे थे। कुछ ही समय में विमान आया और हमने अपनी आँखों में अति मनमोहक वन्य जीवन के सुखद दृश्य को सदा के लिए समाहित कर नई ऊर्जा ,नए दृष्टिकोण, नई जानकारी लिए अपनी उड़ान भरी!!

माइग्रेशन के इस दृश्य को देखकर तीन बातें मैंने अपने जीवन में सीखी –

  1. अपने जीवन में कुछ कठिन निर्णय स्वयं को ही लेने पड़ते हैं।
  2. समाज में रहने के लिए कभी – कभी भय को पीछे छोड़कर अगुआ भी बनना पड़ता है जो दूसरों के लिए आदर्श बन जाता है।
  3. अपने कौम, अपने देश के लिए शहीद भी होना पड़ता है।

मनुष्य के जीवन में साधारण से महान बनने की यह यात्रा कठिन अवश्य होती है पर सुखदाई भी।

आज कैमरे में कैद तस्वीरें आनंद दे जाते हैं।

© सुश्री ऋता सिंह

27/9/2012, 1.25 am, मोम्बासा

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares