हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 54 ⇒ रिश्ता और प्यार… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “रिश्ता और प्यार।)  

? अभी अभी # 54 ⇒ रिश्ता और प्यार? श्री प्रदीप शर्मा  ? 

क्या प्यार रिश्ता देखकर किया जाता है, क्या जहां रिश्ता नहीं होता, वहां प्यार नहीं होता! क्या प्यार को कोई नाम देना जरूरी है, क्या प्यार को केवल प्यार ही नहीं रहने दिया जा सकता। एक ही सिक्के के दो पहलू हैं रिश्ते और प्यार। लेकिन यार के सिक्के में दोनों तरफ बेशुमार प्यार ही प्यार भरा रहता है।

इंसान अकेला पैदा जरूर होता है, लेकिन कभी अकेला रह नहीं पाता। वह जन्म से ही रिश्तों की कमाई करता चला जाता है। रिश्ते बढ़ते चले जाते हैं, प्यार परवान चढ़ा करता है। कितना प्यारा बच्चा है, किसका है। ।

रिश्ते हमें जोड़ते हैं, प्यार भी हमें जोड़ता है। जब तक रिश्तों में स्वार्थ और खुदगर्जी नहीं आती, प्यार भी कायम रहता है। चोली दामन का साथ नजर आता है दोनों में। लेकिन जब रिश्ते टूटते हैं, प्यार को भी चोट लगती है।

लोग प्यार में भी धोखा खाते हैं और रिश्ते भी बनते बिगड़ते रहते हैं। अचानक ऐसा क्या हो जाता है जो मलंग को यह कहना पड़ता है ;

कसमें वादे प्यार वफा

सब बातें हैं, बातों का क्या।

कोई किसी का नहीं

ये झूठे, वादे हैं, वादों का क्या। ।

क्यों ऐसे वक्त हमें जगजीत यह कहते हुए नजर आ जाते हैं ;

रिश्ता क्या है तेरा मेरा

मैं हूं शब और तू है सवेरा

रिश्तों में दरार आई

बेटा ना रहा बेटा

भाई ना रहा भाई। ।

कुछ रिश्ते हमारे बीच ऐसे होते हैं, जिन्हें हम कोई नाम नही दे सकते, लेकिन उनका अहसास हमें निरंतर होता रहता है। हम एक फूल को खिलते देखते हैं, किसी पक्षी को दाना चुगते देखते हैं, किसी अबोध बालक को किलकारी मारते देखते हैं, आसमान में बादलों की छटा देखते हैं, झरनों की कलकल और पक्षियों के कलरव हमें एक ऐसे अनासक्त जगत में ले जाते हैं, जहां सभी सांसारिक नाते रिश्ते गौण हो जाते हैं और मन में केवल यही विचार आता है ;

तेरे मेरे बीच में

कैसा है ये बंधन अनजाना

मैने नहीं जाना, तूने नहीं जाना …

अब आप इसे प्रकृति प्रेम कहें अथवा ईश्वरीय प्रेम, रिश्ता कहें या बंधन, लेकिन सिर्फ हम ही नहीं पूरी कायनात हमारे साथ यह पंक्ति दोहराती नजर आती है ;

क्या धरती और क्या आकाश

सबको प्यार की प्यास

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 132 ☆ # संबंध… # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# संबंध… #”

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 132 ☆

☆ # संबंध… # ☆ 

जब जब भी मैंने

जोड़ना चाहा

वो जुड़ ना सके

जो मुझसे लड़ झगड़कर

दूर गये,

वो मुझसे मिलने

फिर मुड़ ना सके

 

फासला बढ़ता गया

हर पल

 हर मोड़ पर

मैंने कितना चाहा

उन्हें अपना बनाऊं

पर वे आ ना सके

अपना  हठ छोड़कर

 

समय ने तो खाई यां

बना डाली

हर कदम पर

जो भर ना सकी

मै उनपर सेतु बनाने

लड़ता रहा जीवनभर

कोई भी युति

काम कर ना सकी

 

वो कमियां अब

झिल बन गई है

समंदर में मिल गई है

मै टूटी हुई नाव से

कमजोर पतवार से

मंथर गति से चलकर

उन्हें सहेजना चाहता हूं

पर मेरी सारी शक्ति लील गई है

 

टूटने की पीड़ा

वो ही जानता है

जिसका सपना

देखते देखते टूटता है

अपनो से बिछड़ने का गम

वो ही जानता है

जिसका अपना उससे

सदा के लिए रूठता है

 

पानी के बुलबुले से

यह संबंध

कहां टिकते हैं

हम चाहे जितना

जतन करलें

यह दुनिया के बाजार में

स्वार्थ के हाथों में बिकते है /

 

© श्याम खापर्डे

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आधार तू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

आधार तू ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जननायका जनलोक हे म्हणती तुला करुणाकरा

जगजीवना आधार तू व्हावे मला शशिशेखरा

 

आनंदल्या गोपांसवे लीला तुझ्या वृंदावनी

राधा सखी आजन्म ही आहे तुझी मुरलीधरा

 

बांधील तू आहेस ना विश्वास या तारावया

लक्ष्मीपते वसतोस तू शेषावरी कमलाकरा

 

उद्धारण्या  देवादिका निळकंठ तू झालास ना

रिझवायला माथी तुझ्या गंगा वसे गंगाधरा

 

व्योमात तू रोमात तू प्रांणातही तू सर्वदा

असते कशी सजिवातही वस्तीतुझी धरणीधरा

 

जगणे असो मरणे असो लय पावते चरणी तुझ्या

पद्माकरा सृष्टीस या सांभाळ तू राजेश्वरा

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 133 ☆ अभंग – एक कृष्ण सखा ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 133 ? 

☆ अभंग – एक कृष्ण सखा ☆

श्रीकृष्ण भक्तीचे, महत्व ओळखा

स्वतःला पारखा, स्व-बुद्धीने.!!

 

स्वतःच्या मुक्तीचा, विचार करावा

सार ही जाणावा, जीवनाचा.!!

 

इथे नाही कुणी, वाली या जीवाचा

आणि कैवाराचा, योग्य-भावे.!!

 

एक कृष्ण सखा, तोचि देव खरा

जीवाचा सोयरा, नित्य-कृष्ण.!!

 

कवी राज म्हणे, देव हा स्मरावा

हृदयी धरावा, मनोभावे.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ शब्द… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

शब्द.  अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे

“शब्द.” मूल बोलू-चालू लागण्यापूर्वी च ऐकण्याच्या माध्यमातून  ‘अडगुलं-मडगुलं’ सारखी बडबडगीतं ऐकतं नि मोठं होतं.चिऊकाऊच्या गोष्टी ऐकत, चांदोबाकडे पाहत, आजुबाजुचा परिसर न्याहाळत ते भोवताल समजून घेतं.लहानपणी आकलनक्षमता जास्त असते त्यामुळे मूल पटकन शिकतं.अक्षर ओळख झाल्यानंतर कांही काळ गेला कि तेच मूल मोठ्या टाइपमधील गोष्टींच पुस्तक वाचू लागतं ,यातून पुढे वाचनाची आवड निर्माण होते नि वाचनाची सवय जडते.

शब्द एकदा जवळचे झाले कि मग ते सर्वस्वच बनतात.संत तुकाराम महाराज तरी म्हणतात

आम्हां घरी थन शब्दांचीच रत्ने

शब्दांचीच शस्त्रे यत्नें करू ||१||

शब्दची आमुच्या जीवाचे जीवन

शब्दे वाटू धन जन लोका  ||२||

तुका म्हणे पहा,शब्दची हा देव

शब्देचि गौरव ,  पूजा करू ||३||

केवढा अर्थ भरला आहे या अभंगात.आपण थन कशाला म्हणतो तर सोने,चांदी,रत्ने,माणके,रुपये इ.ना.पण तुकाराम महाराज शब्दांनाच धन मानतात.कारण त्यांच्याकडं शब्दांच असं ऐश्व्य आहे कि जे हिरावून घेताच येणार नाही.शब्दांनाच ते शस्त्र मानतात .हे सुद्धा पटतं कारण महात्मा गांधींच्या “चले जाव “किंवा “छोडो भारत ” या शब्दात शस्त्रासारखं सामर्थ्य होतंं ज्यामुळं ब्रिटीश साम्राज्य हादरलं.अजूनही शिकण्यापूर्वी किंवा शिटताना प्रारंभी श्री सरस्वतीची,शब्द ब्रह्माची पूजा करतात.

संत रामदास स्वामी सुद्धा म्हणतात _

नाना शब्द,नाना स्पर्श  |

नाना रुप नाना रस |

नानागंध ते विशेष |

नरदेह जाणे ||

एवढच म्हणून ते थांबत नाहीत तर ते देवाजवळ मागण मागतात

कोमल वाचा दे रे राम |

संगीत,गायन दे रें राम |

आलाप,गोडी दे रे राम

रसाळ मुद्रा दे रे राम |

शब्द मनोहर देरे राम ||

म्हणूनच या शब्दांशी मैत्री करु या

शब्दसंग्रह वाढवू या नि त्याचबरोबर शब्दांची गोडी जाणु या नि कटु शब्द टाळू या.

खरोखरच शब्द हे सुंदर आहेत.मनातल्या भावना आपण शब्दातूनच व्यक्त करतो. अगदी एकाक्षरी हुंकारातुनही हे घडू शकतं.

उदा.” हं ” हा शब्द कधी संमती दर्शवितो,तर कधी समाधान.कधीकधी तिरस्कार किंवा क्रोध सुद्धा हुंकारातूनच प्रगटतो.

गोड शब्द दुसर्याला आपलसं करुन घेतात नि नाती जोडतात. याउलट कटु शब्द दुरावा निर्माण करतात नि नाती तोडतात.अशक्य वाटणारं मोठं काम नुसत्या गोड शब्दांच्या वापरातून पूर्ण होतं.म्हणूनच या शब्दास आपण

“शब्दब्रह्म “म्हणुया नि नि नि:शब्द होऊन शब्दांपुढे नतमस्तक होऊ या. 🙏

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रानपाखरू – भाग २ – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ रानपाखरू – भाग २ –  लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(मागील; भागात आपण पहिले –   “आता तू म्हनशील..मग या वर्सालाच का घाट घातला? तर बयो त्याचं असंय..सांजसकाळ तू लगीन करून दुसऱ्याच्या घरला जाशीन. उद्याला तुझ्या सासूनं म्हनाया नको, का ही पोर बिनआईची म्हनून हिला कुरडया येती नाईत.तिच्या आतीनं येवढंबी शिकवलं नाई..”)

बोलता बोलता आतीचं हुरदं दाटून आलं.  आता इथून पुढे)  

संगी खाली बघत गहू खालवर करीत उपसत व्हती . आतीनं नीट केलेल्या गव्हाचं पानी बदलीत व्हती .जरा ईळ गव्हाची वली रास रांजनात सांडन्याचा आवाज,पान्याचा चुबूक चुबूक आवाज येत राह्यला.समजूतीचं पानी गव्हात मुरत व्हतं,अवखळ नादीक असं काई निथळून जात व्हतं.

मध्यान्हीला गुंजाळाच्या तात्यानं फटफटीवर जाता जाता पारावर बसलेल्या मामांना हाळी दिली.मामांबरोबरची सगळी माणसं वळू वळू पाह्या लागली.

“ओ शंकरराव!! रांजनगावचे पावने येत्या ऐतवारी येनार हाईत.तयारीत ऱ्हावा ss”

मामांनी घरी आल्या आल्या ही बातमी आतीला सांगातली.आती खुश तर झाली पण ‘कसं व्हैल? काय व्हैल? समदं बैजवार झालं म्हंजे बरं..’ असा तिला काळजीकाटा लागला. कायतरी आठवल्यासारखं करीत आती म्हनली,

“तात्यानं निरोप दिला तवा कोनी ऐकलं तर नाई ना? नाई म्हंजे कोन कसं..कोन कसं..काईकाईंना बघवत नाई दुसऱ्याचं चांगलं.तुमीबी सांगू नका इतक्यातच कोन्ला.नाईतर समद्या जोडीदारांना दवंडी देताल..”

“दवंडी तर कवाच दिली तात्यानं..फटफटीवरून जाताजाताच मोठ्यांदी बोलला.समद्यांनीच ऐकलं.”   “घाऱ्या शिरप्यानंबी ऐकलं काय?” आतीनं धसकून विचारलं.

“म्हनलो ना समद्यांनीच ऐकलंय”

आती वैतागली.घाऱ्या डोळ्याच्या मानसांचा तिला कदीच भरवसा वाटला नव्हता.

आतीनं सांजच्याला तीन वाटांची माती, डोईची केसं,सात लाल मिरच्या,शिराईचे फड आन उलसिक तुरटी घेऊन संगीची नजर काडाया घेतली.नजर काढता काढता आती म्हनत व्हती,

“आल्यागेल्याची, पाप्याची, चांडाळाची समदी वाईट नजर जाऊंदे मसनात…

संगे!! सासरी एखांदातरी नासका कांदा असतो बघ..ज्याला दुसऱ्याचं उनंदुनं काढाया लय आवडतं..अशांचे हसून दात पाडता आले पायजेल.शेवटी सासर ते सासरच”

संगी मुकाट हुं हूं करत होती.बाईची नांदनूक यवढी अवघड असती? ती ईच्चारच करीत राह्यली.

बघता बघता ऐतवार आला…

ऐतवारच्या पहाटपासून आती आन् संगी उठली व्हती.घरच्या गावठी हरबऱ्याच्या डाळीचं पायलीभर पुरन तिनं शिजाया घातलं .संगीला पुरन वाटाया बसवून सोत्ता आमटीचा मसाला भाजू लागली.घरच्या काळ्या मसाल्याचा खुमास वास शिवारभर सुटला .जरावेळानं संगीची जोडीदारीनबी मदतीला आली.पटपटा हात चालवून त्या तिघींनी समदा सैपाक उरकत आनला.न्याहारीच्या वक्तापर्यंत पावनी येतीन असा आवाका व्हता पन उन्हाचा तडाखा वाढत चालला तरीबी पावन्यांचा पत्ता नवता. मामा घराभाईरच्या खाटंवर रस्त्यावर नजर ठिवूनच बसले व्हते. कुडच गाडीची धूळ उठतांना दिसत नवती. रस्त्यावर निस्तं भगभगतं ऊन बेडूकगिळल्या अजगरावानी पसारलं व्हतं. अजूनतर सूर्य माथ्यावरबी आला नवता तरी ऊन चटचटा भाजीत व्हतं.

पुरनपोळ्यांच्या चळतीवर माश्या घों घों करू लागल्या.आतीनं त्येच्यावर ठोक्याची पितळी उपडी टाकली.न्याहारीसाठीचे पोहे भिजट व्हऊन चालले.

संगीच्या केसात माळलेल्या गजऱ्याची टवटवी तिच्या चेहऱ्यावानीच कोमावली व्हती.आतीनं एकदम विचारलं,

“यंदाच्या ऐतवारीच म्हनले व्हते ना? तात्यानं नीट निरोप दिला ना?  तुमी परासलं का नाई नीट?”

” हा मंग! पाडव्यानंतरचाच ऐतवार..मी चांगलं ठाकूनठोकून इचारलं की तात्याला”

“आस्सं! पाडव्यानंतरचा ऐतवार हाच ना गं पोरीओ?”

“व्हय गं मावशे! हाच ऐतवार..येतीन वली.नको तकतक करू तू.उन्हामूळं थांबत थांबत येत असतीन.”    जोडीदारीन म्हनली.

थांबतीन कशाला? मोठे बागायतदार हाईत.चारचाकी हाये घरची…

…मरूंदे!! पावनी येतीन तवा येतीन.तवर घोट घोट च्या तरी घेऊ पोरीओ”

आतीनं आमटीचं भगूनं औलावर ठिवलं आन चुलीवर चहाचं आधन टाकलं. वट्यावरच्या तुळशीपासल्या गवत्याची दोन पानं चुरडून आधनात टाकली.च्या ला कढ आला नाई कुडं तोच मामांची हाळी आली.आतीनं पुढल्या दारातून पायलं तर मामा छातीला येक हात लावीत पळतच आतमंदी आले,

“अगं!! पावनी आलीत बर्का!!”

संगीच्या काळजातून लक्कन गोळा सरकून गेला.छाती धाडकनी धडकत व्हती. आतीनं त्याच च्या त पानी वाढीवलं.पटकनी पदर सावरीत भरला तांब्या मामांकडे दिला. मामांनी मोठ्यांदी हसत पावन्यांना  ‘रामराम,श्यामश्याम’ केलं. महिपतरावाशी वळख व्हतीच.बाकीची पावनीबी मोकळंढाकळं बोलत व्हती. जोडीदारीन खिडकीच्या फटीतून समदं लक्ष देऊन बघत व्हती.पोराचे हावभाव बारकाईने बघत ती खुसफूसली,

“संगे! पोरगा लय चिकना हाय बघ.आक्षी कपिल देव सारखा”.आती जिवाचा कान करून बैठकीच्या खोलीतली बोलनी ऐकत व्हती.तिचं लक्ष नाई आसं पाहून जोडीदारनीनं पटकनी संगीलाबी खिडकीपाशी बोलवलं.तिनं खिडकीच्या फटीतून दिसनाऱ्या चेहऱ्याकडे पाह्यलं आन तिच्या काळजात लकलक व्हायला लागलं. तरनाताठा, रूबाबदार,‌ येक बारकं लिंबू लपल येवढा भरघोस मिशीचा आकडा, घाटदार दंडावर तटतटलेला काळ्या धाग्यातला ताईत आन या समद्या पैलवानी बाजाला ठिगळावानी दिसनारं बुजरं हसू.संगीनं त्या चेहऱ्यावर तिच्याबी नकळत जीवाची कुरवंडी करून टाकली.नजर आपोआपच खाली झुकली.बोटं पदराशी चाळा करू लागली.काळजाचं रानपाखरू कवाच त्याच्या खांद्यावर जाऊन बसलं व्हतं. जोडीदारीन कायतरी आंबटचिंबट बोलली. संगीनं डोळे मोठे केले.लाजनारी संगी आक्षी जिवतीवानी दिसत व्हती.

तितक्यात ‘पोरीला बोलवा’ असा पुकारा झाला.आती पदराची सळसळ करीत आत वळली. संगीच्या हातून च्या पाठवला गेला.तिची लांबसडक बोटं लाजेनं थरथरत व्हती. कपबशीबी कापरं भरलं.  मनात गोड हुरहूर सुरू झाली व्हती. सपनांची पाखरं गिर्र गिर्र गिरक्या घेत होती.महिपतरावानं आन दुसऱ्या येका हुलबावऱ्या पावन्यानं काय काय प्रश्न इचारले ह्ये आता तिच्या ध्यानातबी नवतं.

ती आत आल्यावर लगेचच मामांनी पावन्यांना न्याहारीचं ईचारलं.हुलबावरा पावना भसकनी म्हनला,

“अवो नाई नाई.येतांना त्या शिंदेसायबांकडं बुंदीलाडूची न्याहारी करून आलो आम्ही.म्हनून तर उशीर झाला इकडं यायला. त्यांच्याबी दोन पोरी लग्नाला आल्यात ना!”

महिपतरावानी पावन्याला कोपर ढोसून इशारा केला आन तो सोत्ता मोठ्यानं म्हनला,

“अवो शिंदेसायेब सहजावारी रस्त्यावर भेटलं. म्हने चला च्या घेऊ एक कप..आता येवढ्या मोठ्या मानसाला नाई म्हंता नाई येत ना..मग गेलो जरायेळ..नाईतर इकडंच यायला निघालो व्हतो.” त्यानी इषय हुशारीनी बदलला. हुलबावरा वरमून गप्प बसला व्हता.

संगीच्या मनातली पाखरं चिडीचूप झाली.आतीबी ईचार करू लागली,

“म्हंजे हा पावना आधीच दोन पोरी पाहून आलाय व्हय?शिंदेसाह्येब पोरीच्या वजनाइतकं म्हनलं तरी सोनं देईल खुशाल.महिपत्या वंगाळच शेवटी.पैशापुडं नांगी टाकली आसंन त्यानं.मोठ्याचीच लेक करायची व्हती तर आलाच कशाला इथं? उगाच पहाटपासून आदबाया लावलंय.”

पावनी आलीच हाईत तर साजरी करायची म्हनून जेवनंखावनं चालली खरी पन त्याच्यात राम नवता. आग्रह केल्यावर पावनी नकं म्हनू लागली तवा आती बोललीच,

“शिंदेसाह्यबाकडं पोट भरलं असंन तुमचं..नै का?”

तिचं कुजक्यावानी बोलनं मामांना समजलं व्हतं.त्यांनी पावन्यांच्या नकळत आतीवर डोळे वटारले. संगी गुमान वाढत व्हती.पोरगाबी मुकाट जेवत व्हता.

पावनी गेल्यावर समदी थकून बसली.आतीच्या डोक्यात राग मावत नवता. मनात उलटेपाल्टे इचार चालले व्हते.डंख मारीत व्हते.

‘पोरगा देखना ,महिपत्या तालेवार .त्यांना उचलू उचलू धरतील अशाच ठिकानी सोयरीक करतीन.आपली गरीबाची पोर कवा आवडायची त्यानला? पन मंग आलीच कशाला इथं? उगाच पुरनावरनाचा घाट घालायला लावला.पोरीला हुरहूर लागली असंन.तिच्या जिवाला काय वाटत असंन?’

संगीचं मन मातूर कायतरी येगळंच म्हनत व्हतं,

‘पोरगा तर लय आवडला.असाच तर पायजेल व्हता..रूतून बसलाय काळजात पन् तरीबी जिथं आतीमामांना कायम खाली पाह्यची वेळ येईल आसं सासर मला नकोच. दिसत्यात फक्त मोठ्या घरची. पन त्यांचे वासे पोकळ असत्यात. उगाच आशा लावून ठिवायचं काय कारन पडलंय?कसा गचबशावानी जेवत व्हता.आवाजबी ऐकला नाई त्याचा. मरूदे..कितीबी आवडला तरी त्याचा ईचार नाई करायचा आता’

तिनं पार पक्कं ठरीवलं.संध्याकाळची हुरहूर सोडली तर संगी परत घरात हसूखेळू लागली. तिला हसतांना पाहून आतीचा बी जीव भांड्यात पडला.तवर मामाबी दुसऱ्या स्थळांच्या तपासाला लागले.

लेखिका – डॉ. क्षमा शेलार

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सैतानी क्रौर्य —” ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? मनमंजुषेतून ?

☆ “सैतानी क्रौर्य —” ☆ श्री संभाजी बबन गायके 

नमस्कार,

‘ द केरला स्टोरी ‘ हा बहुचर्चित सिनेमा बघितला. धर्मांध झालेली  माणसे पशुपेक्षा किती क्रूर वागतात  हे पाहून मनाचा  थरकाप उडाला.  काफिरांच्या  मुलींना पद्धतशीरपणे  ट्रॅप करून  त्यांचे योनशोषण करणे, त्यांना हिंदू धर्माचा  तिरस्कार करायला लावणे, प्रेग्नेंट करून त्यांना धर्मांतर करायला लावणे, धर्माचे  युद्ध खेळणारे सैनिक म्हणून सिरीयात  पाठवणे, माणसांच्या  रूपातील हैवानांच्या लैंगिक वासना  भागवण्यासाठी मुलींना गुलाम ( sex slave) करणे, वापरून झाल्यावर निर्दयीपणे  हत्या करणे.. एकापेक्षा एक भयानक  वास्तव त्यात दाखवले  आहे.

मला  जुळ्या मुली आहेत, आई  वडील  म्हणून त्यांना चांगले  संस्कार देण्याचं आमचं  कर्तव्य डोळ्यात तेल घालून  आम्ही पार पाडत  असतो. पण  हा सिनेमा बघितल्यावर शांतीधर्मीय मुलांच्यापेक्षा त्यांच्या मुलींची  भीती  जास्त वाटू  लागली आहे. या सिनेमात असिफा  नावाची  मुलगी एजंट  बनून कसं  पद्धतशीरपणे  तिच्या रूममेटचे  ब्रेनवॉश करत  असते हे दाखवलं आहे. जर एखादी असिफा आपल्या मुलींची  मैत्रीण झाली तर .. या विचाराने झोप उडाली  आहे.

हा चित्रपट मनोरंजन म्हूणन नका  बघू, आपल्या डोळ्यात अंजन  टाकण्याचं  काम  या सिनेमाने केले आहे. कोणत्याही प्रकारचा  तेढ  निर्माण व्हावा हा मुळीच  हेतू नाही.

मी तर म्हणतो शांतीधर्मिय मुलींनी पण हा सिनेमा बघावा. अरब  देशांच्या मानाने हिंदुस्थानमध्ये स्त्री किती सुरक्षित आहे हे त्यांना कळेल.

द केरला  स्टोरी पाहून  सुचलेले पुढील काव्य आपण  वाचावे  आणि आपल्या मित्र मंडळीना फॉरवर्ड.. शेअर  करावे…

 द केरला स्टोरी

तुमच्या आमच्या  वेलीवर,

उमलणारी सुंदर कळी !

लव्ह जिहादच्या विखराला,

पडतेय नकळत बळी !

 

घरातल्या ओसरीवर,

मुक्त बागडणारी ती चिमणी !

भुर्रर्रकन कुणा संगे उडून जाई,

शिक्षा ठरावी ती जीवघेणी !

 

एखादे नासके फळ ,

संपूर्ण पेटीच  नासवते !

एखादी असिफाची संगत,

तुमच्या मुलींना फसवते !

 

आंधळ्या जिहादी प्रेमासाठी,

कुठल्याही थराला जाऊन झुकते !

गतप्राण झालेल्या बापाला,

काफीर म्हणत तोंडावर थुकते !

 

भाबड्या मुलींच्यासाठी,

प्रेमाचे  जाळे  विणले जाते !

जातीनुसार पटवणाऱ्याला,

इनामाची बोली मात्र मिळते !

 

त्या बनतात मुलं काढायचं यंत्र,

नंतर दिला जातो काडीमोड !

उशीर झालेला  असतोच तिला,

आयुष्यभराची मोडते खोड !

 

कुणी फसते इसिसच्या जाळ्यात,

पाठवली जाते तिला सिरीयात !

वासनाधुंद लांडगे लचके तोडती,

आयुष्य होऊन जाते तिचे बरबाद !

 

हजारो कोवळ्या कळ्या,

कुस्करल्या गेल्यात आजवर !

पस्तीस तुकडे बघितले तरी,

अक्कल कशी न येई ठिकाणावर !

 

द केरला स्टोरी

आहे धकधकते वास्तव !

तुम्हा आमच्या पदरातला,

दाखवणारा विस्तव !

 

तरुण मुलींनी तर बघाच,

त्यांच्या पालकांनी ही बघावा !

राष्ट्रापुढचा भविष्यातला धोका,

आजच पाहून तो ओळखावा !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सेंगोल — राजदंड” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ““सेंगोल — राजदंड”  ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

“सेंगोल” – या राजदंडाची उंची ५ फूट आहे. तो चांदीचा असून त्यावर सोन्याचे पाणी दिलेले आहे. त्याच्या माथ्यावर शिवाचे प्रिय वाहन “नंदीबैल”  विराजमान आहे, ज्याला निष्पक्षता आणि न्यायाचे मूर्त स्वरूप मानले गेले आहे. हा राजदंड राजाने हाती धारण करणे म्हणजे धर्माशी अतूट, अविचल आणि तत्त्वनिष्ठ राहून शासन करण्याची जबाबदारी पार पाडणे.                                            

१४ ऑगस्ट १९४७ रोजी,  शेवटचा ब्रिटिश व्हॉईसरॉय – लॉर्ड माऊंटबॅटन यांना सत्तांतराचे प्रतीक म्हणून काही दृष्यस्वरूपातील चिन्ह हवे होते. तसे त्यांनी पं.नेहरूंना सुचवले. त्यावेळी ब्रिटिश भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल होते – माननीय सी. राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी. ते थोरापल्ली, जिल्हा कृष्णगिरी, तामिळनाडू (तेव्हाचे मद्रास राज्य) येथील रहिवासी होते. त्यांच्या मनावर चोल राजवंशाचा मोठा प्रभाव होता. राजसत्तेच्या सत्तांतराच्या समारंभात हा ‘सेंगोल’ (राजदंड) विधिपूर्वक नव्या शासकाच्या हाती सुपूर्द करण्यात येई. राजाजींनी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील “थिरूवदुथुराई अधिनाम (मठ),  (Thiruvaduthurai Adheenam (Mutt) या धर्मपीठाशी संधान साधून चेन्नईतील “व्युमिडी बंगारू चेट्टी” या सराफी-पेढीकडून हा “सेंगोल” तयार करून घेतला. त्यावेळी त्याची किंमत रू.१५,०००/- होती.             

                                             

अशा रीतीने १४ ऑगस्ट १९४७ रोजी हा “सेंगोल” (राजदंड) पं. नेहरूंच्या घरी त्यांचे हाती या मठाच्या साधूंकडून विधीपूर्वक सुपूर्द करण्यात आला.

तो ‘सेंगोल’ (राजदंड) अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील संग्रहालयात वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रदर्शित करण्यात आला होता.          

मात्र आता, कालच उद्घाटन झालेल्या नव्या संसद-भवनामध्ये, लोकसभा अध्यक्षांच्या सन्मान्य आसनाशेजारी त्याची सन्मानपूर्वक स्थापना होत असून, ती तामिळनाडूतील त्याच मठाच्या साधूंकडून विधिपूर्वक केली जाईल.

माहिती संग्रहिका :: सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-9… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-9…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

की गोडीनेच आपुली गोडी

अनुभवावी घेऊनि तोंडी?

तैसी आपुली एकमेका आवडी

इंद्रियातीत परमात्मस्वरूप गोडी॥४१॥

 

आतुर मी घेण्या तुझी भेट

आत्मतत्त्वाचे परि साटंलोटं

केवळ उपाधी, देह देहाच्या भेटी

आत्मतत्वांच्या भेटी, हो सिद्धभेटी

भयभीत मी, न बिघडो सिद्धी

भेटीची, देहभेटीच्या उपाधी॥४२॥

 

तव भेटीचा मी विचार करिता

तुझे मन मायावी नेते द्वैता

मनास येवो अवस्था उन्मनी

तरीच होशील आत्मज्ञानी

दोन आत्म्यांची न होता भेट

तव दर्शन कैसे होई सुघट॥४३॥

 

तुझी कल्पना, वागणे, बोलणे;

चांगले असणे अथवा नसणे

न स्पर्शी ते स्वरूपा तटस्थ

कर्माकर्म केवळ इंद्रियस्थ॥४४॥

 

चांगया तुजसाठी करणे वा

न करणे, हा विकल्प नसावा

देहेंद्रियांनी व्यवहार करावा

तो आत्मस्वरूपी न घडावा

आत्मतत्वाचा मी उपदेश करावा

तो मीपण माझे जाई लयत्वा॥४५॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बदक की गरुड ? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बदक की गरुड ? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी  गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जिच्यावर लिहिले होते की

बदक की गरुड

तुमचे तुम्हीच ठरवा.

दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट, वर टाय.

ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला.  आणि बोलला,

” माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जोपर्यंत मी तुमचे सामान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे, सर.”

त्या कार्ड वर लिहिले होते,

जॉन चे मिशन

माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.

मी भारावून गेलो होतो.

गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती.

जॉनने मला विचारले.

“आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?”

मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. “नाही, मला ज्यूस हवा आहे.”

तात्काळ जॉन उत्तरला…

“काही हरकत नाही सर, माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत. ह्यापैकी एकात ज्यूस, एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे.”

तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत.

जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता.

मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण

पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण  स्वरात विचारले. “सर, एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?” त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे ?

न राहवून मी त्याला विचारले,

” तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?”

त्यावर तो उत्तरला, “नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरुवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे.  आणि असमाधानी राहत असे. पण एकदा एका डॉक्टरकडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले.

त्यांनी एक पुस्तक लिहिले होते.  त्याचे नाव होते. ” तुम्ही जे कोणी आहात त्याने फरक पडतो” ज्यात  पुढे लिहिले होते.  जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत, तर खरेच तसेच होईल.  तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल.

बदक बनू नका

गरुड बना

बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.

आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे.

म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले.

मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ, गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.

मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो.

आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे.

तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात. किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी  अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालकाद्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो.

जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लिमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे.  जॉनने  बदका सारखे सतत आवाज करत, सतत तक्रार करणे सोडून दिले आहे.  आणि गरुडासारखी भरारी मारायला सुरुवात केली आहे.

तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि  कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.

तुम्ही काय ठरवले आहे ?

बदकासारखे सतत आवाज करत (रडत), तक्रार करत राहणे की गरुडासारखे सगळ्यांपेक्षा वर उडण्याचे ?

लक्षात ठेवा….

निर्णय तुमचा आहे

हे कुलूप फक्त आतून उघडते….

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares