मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रानपाखरू – भाग ३ – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ रानपाखरू – भाग ३ –  लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

 (मागील; भागात आपण पाहिले – तिनं पार पक्कं ठरीवलं.संध्याकाळची हुरहूर सोडली तर संगी परत घरात हसूखेळू लागली. तिला हसतांना पाहून आतीचा बी जीव भांड्यात पडला.तवर मामाबी दुसऱ्या स्थळांच्या तपासाला लागले. आता इथून पुढे )

येता दिस नव्यासारखा सुरू झाला.

दोघी फुईभाच्यांनी मिळून लोनच्याची तयारी केली.आख्खा दिवस आडकित्त्यानी कैऱ्यांच्या फोडी करन्यात गेला .फोडी साफ करून मिठाचं पानी काढून टाकून हळदमीठ लावून वाळाया घातल्या. करकरीत फोडी आता जरा मऊ पडल्या.

पुढच्या खोलीच्या दाराचे दोन्ही कान उघडल्यावर उन्हाचा कडोसा हक्कान आतमंदी आला व्हता.त्या कडोश्यात न्हालेल्या फोडी हळदूल्या दिसत व्हत्या. जसजसं ऊन चढत गेलं तसतसं फोडींनी अंग चोरलं. आतीच्या कुंकवावानी रंगाच्या लुगड्यावर त्यांचा पिवळा रंग लय तेज दिसत व्हता.

तेवढ्यात त्या समद्या लालपिवळ्या वाळवनावर येक परकरी सावली पडली. जोडीदारीन आली व्हती..

हातात गोधडीचा बोजा.

आती आणि संगीला मोहऱ्या निवडतांना पाहून ती घुटमळली आन हळूच म्हनली,

“मावशे!! संगीला घडीभर पाठवती का माझ्याबरबर  नदीवर?”

आतीनं जरावेळ विचार केला..

“अं..येवढा का गं उशीर आज पान्याला?

बरं जा घेऊन तिला. पन तिन्ही सांज व्हायच्या आधी येऊन लागा बर्का.जा गं संगे! तुझा मामा किर्तनातून परत यायच्या आदी ये “

“हुं” म्हनत हातातलं ताट परातीत सारून संगी पटकन उठली. आतीलाबी वाटलं,

 ‘तेवढाच जीव रमंल पोरीचा.’

दोघी नदीच्या वाटंला लागल्या.जोडीदारीन संगीला उगीच इकडचा तिकडचा विषय काढून बोलतं करायचा प्रयत्न करीत व्हती.संगी वरवर समदं ठीक असल्यासारखं बोलत व्हती.पन अंमळशानं तिचा आतीमामांसमोर घातलेला आनंदी मुखौटा चिरफाटला.जोडीदारनीला समदं समजत व्हतं.

“संगे!! तुला कळलंच असंन ना?”

“काय गं?”

“शिंदेसायबाच्या मोठ्या पोरीचं जमलं म्हनत्यात.”

यदौळ खालमानेनं चालनाऱ्या संगीनं चमकून वर पायलं.तिच्या चेहऱ्याची थरथर व्हवू लागली. निसतंच कानावर पडनारं बोलनं आता थेट काळजात शिरलं व्हतं..जखम करीत व्हतं.ती काई बोलली नाई. आशेचा बारकासा धागाबी तटकन तुटून गेला.काळजाच्या डव्हात गरगरत दिसेनासा झाला.

जराशानं संगीनं मोठा श्र्वास घेतला,सुटल्यासारखं हसली. तिनं मनाच्या पाटीवरून मागल्या ऐतवारचा परसंग पार पुसून टाकला.पैल्यासारख्या..पार पैल्यासारख्या गप्पा सुरू केल्या.जोडीदारनीला हायसं वाटलं.

नदीकाठची त्यांची नेहमीची गप्पांची जागा जवळ आली .दोन काळेभोर ,मोठाले दगड..त्यांच्या बाजूला चाफ्याची चारदोन झाडं जीव खाऊन फुलल्याली.जुन्यापान्या झाडांचा वाळला पाचोळा साऱ्या वाटंवर पायाखाली इथूनतिथून गालिचासारखा अंथरलेला.पोरींच्या पायतळीच्या रेषा त्या वाटेला ठावकी व्हत्या. भुईचंपा,पळशी,पाचुंद्याची फुलं उन्हाला वाकूल्या दाखवीत व्हती. समद्या झाडांवर पिवळ्या,पोपटी,हिरव्या रंगांच्या पानांचे पक्षी अंगभर फुल्लारलेले.नदीवरून गार गार वारं येत व्हतं.मातीचा वल्ला वास मनाचा ताबेदार झाला व्हता.सोबत पाखरांच्या गप्पा..

नदीमायच्या साक्षीनं दोघी गूज बोलू लागल्या.गोधडीला धुता धुता मनबी निर्मळ झालं जनू.

गोधडी वाळू घातल्यावर दोघीही कातळावर ओनावल्या.पाय नदीच्या पान्याबरबर नाचत व्हते.पैंजनं गानी म्हनत व्हती.वल्लं शरीर कातळाच्या खरबरीत पन मायाळू पाठीवर सैलावलं .दोघींचेबी डोळे निळ्या आकाशात ढगांच्या कापूसगोंड्यांकडं टुकूरटुकूर बघत व्हते..     जरावेळ पाठीचा काटा मोडल्यावर जोडीदारीन म्हनली, “संगे चल आपून तो जुना खेळ खेळू…कपच्यांचा.बघू कुनाची कपची नदीवर जास्त उड्या मारती??”

निळ्या आकाशाकडे बघतांना निळ्याच डोळ्यांची मालकीन झालेली संगी निळाईचा हात धरूनच म्हनली,

“चल.”

दोघींच्या चेहऱ्यावर हसन्याचं खुळं फूल उमललं.दोघींनीबी खेळासाठी बऱ्याच कपच्या शोधून   आनल्या.चढाओढीनं नदीच्या डव्हाचा तलम पदर छेदू लागल्या. आधी आधी घटकेत बुडी मारनाऱ्या कपच्या जुन्या दिसांची शपथ आठवल्यावर पान्यावर नाचू लागल्या.तो तो पोरींच्या हसण्याला उफाळ आला.संगीची कपची तर दोन दोन डुबक्या घेत लांबवर पळत व्हती‌.जोडीदारनीला तर काई जमंना.ती फुरंगाटली,

“संगे!! तुझी कपची कसं काय बरं दोन डुबक्या मारती? माझी तर बळंबळं येवढीतेवढी येक उडी मारती आन् खुशाल बुडी घेती बघ..आता गं?”

तेवढ्यात मागून एक कपची तीरासारखी सरसरत आली आन नदीच्या पदराशी नाजूक छेडखानी करीत तीन डुबक्या मारीत दुसऱ्या तीराच्या दिशेनं  गेलीबी. दोघींनाबी काई सुधरलंच नाई. संगीच्या हातातली कपची तशीच व्हती.येवढा नेम कुनाचा बरं? असा आचार करून दोघींनी मागं वळून पाह्यलं.

“काय जमतंय का?” पल्लेदार पुरूषी आवाज आला. मिशीच्या आकड्यावर ताव भरत कूनाचीतरी रांगडी आकृती कातळावर येक पाय ठिवून उभी व्हती.त्याच्या दंडावर तटतटलेले स्नायू संगीच्या नजरेत भरले…

पुन्यांदा.

महिपतरावाचा पोरगा समोर ऐटीत उभा व्हता.जोडीदारीन म्हनली,

“अगं हा तर ऐतवारी आलेला पावनाच दिसतोय..”

संगीनं वळखलं नवतं थोडंच? तिनं तिच्याबी नकळत त्याच्याकडं रोखून बघितलं आन तिची नजर खाली झुकली.तळव्यात घट्ट धरलेली कपची घामेजून चिंब झाली.तिच्या मनात राग व्हताच आन त्याच्या नजरेचा मागबी..

डोळे नको भरायला म्हनून ती मासूळीसारखी तडफडत व्हती.जोडीदारीन त्यांची जुगलबंदी बघत हलकंच चार पावलं मागं सरकली ..सुर्यातळी पाठ करून असलेल्या जोडीदारनीची सावली लांबत गेली.

दोघांमधील जडावल्या बाईसारखी शांतता येकदाची बाळंतीन झाली.संगी रागं भरलेल्या आवाजात बोलली ,

” तुमचं लगीन जमल्याचं साखरपान वाटायला आलात व्हय इथं? शिंदेसायबाचं दुकानातले आयतं बुंदीलाडू आमच्या आदबूनिदबू केलेल्या पुरनपोळीवर भारी पडलं म्हनायचं..”

संगीच्या रागाची आगवळ सुटली होती.तिनं मनातलं गरळ वकून टाकलं आन तोंड पुन्यांदा शिवून टाकलं.. पन दोन्ही डोळ्यांची तळी तिच्या आवरन्याला न जुमानता खळ्ळकन भरून आली. गुलाबपाकळ्यांवानी असलेल्या पातळ नाकपुड्या थरथरू लागल्या.जिवनी बारीक पोरावानी बाबर ओठ काढती झाली.

समोरच्या राकट चेहऱ्यावर आता खट्याळ हसू फुललं व्हतं.त्यादिवशीचं बुजऱ्या हसन्याचं ठिगळ कुडल्याकुडं पांगलं व्हतं.

“अस्सं झालंय व्हय?’

‘ हुं!  तुमाला कोनी सांगितलं ह्ये?”

संगीनं मागं वळून पाह्यलं.तिचे डोळे जोडीदारनीला शोधत व्हते.

“तिकडं काय बघताय? मी सांगितलं तर जमंल ना?”

पोरगा पुन्हा एकदा खोडकर हसला.संगीची सैरभैर नजर पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर गुतली.. त्याच्या गालावरच्या खळीत घट्टमुट्ट अडकून बसली.

“अवो बाईसाहेब!! शिंदेसायबाच्या पोरीची ष्टाईल या गावरान गड्याला कवा रूचायची? शेताच्या बांधावरनं फिरता फिरता तिचं तंगडं मोडाया बसलंय…शेहरातली मड्डम ती. माज्या गळ्यात पट्टा बांधून दाराशी बांधायजोगी..

………..

गावच्या यड्याला गावचंच कोन तरी खूळं मानूस पायजेल…नाय का? जे मानूस गड्याच्या मातकट हातानं खुडलेली चिच्चाबोरं न लाजता खाईल.. शेनामुताचा वास येतो म्हनून पावडरीनं धूत बसनार नाय…” येक गडगडाटी पन मायाळू हसू नजर खाली झुकलेल्या संगीला ऐकायला आलं..तिच्या नजरंसमोर त्याचा मर्दानी हात आला. त्या मोठाल्या तळव्यातली चिच्चाबोरं पाहून संगी हरखली.यदौळ रडू येऊ नाई म्हनून तिनं शिकस्त केली व्हती पन आता मातूर डोळ्यातलं पानी थांबायचं नाव घेत नवतं.दुसऱ्या तळव्यात खाऱ्या पान्याचं तळं भरत चाललं व्हतं.मनातल्या रानपाखरांच्या पंखात आता बेगुमान वारं भरलं व्हतं… 

– समाप्त – 

लेखिका – डॉ. क्षमा शेलार

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी आजी… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझी आजी… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

माझी आजी डोळ्यासमोर येते तेव्हा तिच्या आयुष्याच्या दोन चित्रमालाच डोळ्यासमोर येतात. एक तिचे स्वातंत्र्यपूर्व आयुष्य आणि दुसरं स्वातंत्र्यानंतरचे!

राधाबाई कृष्णाजी पेंडसे, आजोबांची दुसरी बायको ! पहिली फारच लवकर गेली आणि त्यानंतर आजोबांनी दुसरे लग्न केले. कोकणातली आई – बापा विना आजोळी वाढलेली दहा-बारा वर्षाची ती मुलगी आजोबांबरोबर लग्न करून थेट लांब कराची ला गेली ! नव्हता शिक्षणाचा गंध, नव्हता श्रीमंतीचा साज ! केवळ घराला जड होऊ नये म्हणून कोणीतरी लग्नाचा विचार केला आणि ती बोहल्यावर चढली. अशी ही साधीसुधी मुलगी कोकण सोडून दूरवर गेली एका मोठ्या बंगल्याची मालकीण म्हणून ! आजोबांची सरकारी नोकरी होती. ते ऑब्झर्वेटरीत नोकरीला असल्याने कराची जवळील मनोरा बेटावर त्यांचे वास्तव्य होते. दूरवरून येणाऱ्या बोटी, मचवे ह्यांना हवामानासंबंधीचे मार्गदर्शन करण्याचे काम असे. मॅट्रिक झाल्यानंतर नोकरी करणे गरजेचे होते त्यामुळे इतक्या लांब ठिकाणी ते नोकरीसाठी गेले. आजी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी कराचीला गेली. घरी नोकर चाकर होते. दहा-बारा खोल्यांचे घर होते, पण संसार मांडायला लागणारा आधार कुणाचा नव्हता ! आपल्या आपण सर्व शिकायचे. नवऱ्याच्या कडक शिस्तीत राहायचे आणि आज्ञा पालन करायचे एवढेच तिला माहिती ! कधीतरी कोकणात जायला मिळे, पण प्रेमाची माणसे कमीच होती. माहेरची चितळे.. परशुरामाच्या घाटीत राहणारी.. भाऊ वहिनी होते, पण परिस्थिती 

बेताचीच ! दारिद्र्य सगळीकडेच होते, पण भात आणि कुळीथाच्या पिठल्याला कमी नव्हतं ! घाटी उतरायची, चिपळूणला जायचं, काय असेल ते आंबे, फणस, रातांबे विकायचे. चार पैसे मिळत त्यातच बाजार करायचा ! अशा पद्धतीने कोकणातल्या कुटुंबांचा व्यवहार चालत असे.

लग्नानंतर आजी कराचीला गेली. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे दर दोन वर्षांनी एक बाळंतपण होत होतं. सहा मुलं झाली. तीन मुली, तीन मुलगे. सर्वांना एका ठिकाणी राहणं परवडणारे नव्हते ! मग दोन मुलं सातारला काकांकडे वाढली तर  चार मुले कराचीला वाढली. माझे वडील सर्वात मोठे! त्यांचे बालपण  ऐषारामात गेले. कारण आजोबांची नोकरी मानाची होती. मोठ्या मोठ्या इंग्रज साहेबांचा वावर भोवती असे.

राहणीमान चांगले ठेवता येई. कपातून चहा प्यायला मिळे. साहेब लोकांशी संपर्क असल्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. आजोबांना पुस्तकांची प्रचंड आवड होती. विशेष करून इंग्रजीची आवड होती. घरामध्ये पुस्तकांचे शेल्फ भरलेले असे. कराचीजवळचे मनोऱ्याचे घर म्हणजे लौकिक अर्थाने चांगले, सुसंपन्न स्थितीतील घर होते. शिक्षणाची मनापासून आवड असल्यामुळे आजोबांनी आजीलाही लिहा वाचायला शिकवले होते. घट्ट नऊवारी नेसणारी आमची आजी नाकी डोळी नीटस,  उंच, शिडशिडीत बांध्याची होती. मनोऱ्याला काही मराठी कुटुंबही होती. मोजकीच ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे ही मंडळी एकमेकांना धरून असत. वडिलांचे बीएससी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. युद्धाचा काळ असल्याने सेन्साॅर ऑफिसला नोकरी मिळाली होती. लवकरच लग्न होऊन त्यांचे बिऱ्हाड कराचीमध्ये झाले. त्यांच्याबरोबर माझे काका, आत्या ही मंडळी कराचीत घर करून राहिली. आजी मनोरा ते कराची अशा फेऱ्या मारत संसार करत होती.

याच दरम्यान भारताच्या फाळणीच्या गोष्टी सुरू होत्या. आजोबांची रिटायरमेंट झाली,  त्यांना कराचीमध्ये राहण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी कराचीला मोठे घर घेतले. आणि सर्व मंडळी त्या घरात राहू लागली पण १९४७ च्या सप्टेंबर मध्ये फाळणीनंतर अवघ्या एका महिन्यातच सर्व पेंडसे कुटुंबाला पाकिस्तान सोडावे लागले आणि भारतात आपल्या मूळ गावी आयनी मेटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे निर्वासित म्हणून यावे लागले. इथून आजीच्या आयुष्याचा दुसरा कालखंड सुरू झाला ! कराचीचे, मनोऱा बेटावरचे साहेबी जीवन संपले आणि कोकणात आयनी- मेट्याजवळील पाटील वाडी या ठिकाणी आजोबांनी जागा घेतली.  त्या जंगलात झोपडीवजा घर बांधून आजी- आजोबा राहू लागले .मोठ्या बंगल्यात राहणारी आजी आता आजोबांबरोबर झोपडीत राहू लागली. मुलांच्या शिक्षणासाठी चिपळूणला बिऱ्हाड केले होते. पाटील वाडी आणि चिपळूण अशा फेऱ्या करत पुन्हा एकदा आजीच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आजोबांना डायबिटीस होता. कोकणातील कष्टकरी जीवनात आणि निर्मळ वातावरणात त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहिला होता. माझी आजी या सगळ्याला तोंड देत मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी झटत होती. कष्टाची तर तिला कायमच सवय होती. डोक्यावर आंब्याच्या, फणसाच्या पाट्या घेऊन आजी खेडला विक्रीसाठी येत असे. ती दिवसाकाठी आठ दहा मैल सहज चालत असे. आसपासच्या लोकांना ‘निर्वासित म्हणून आलेले पेंडसे’ परिचयाचे होते. काही जण आपुलकीने त्यांना मदत करत असत.

अशीच जीवनाच्या खाचखळग्यातून आजीची वाटचाल ७० सालापर्यंत चालू होती. १९७० साली आजोबा गेले आणि पुन्हा एकदा आजी एकटी पडली.. ती अधूनमधून आमच्याकडे, काकांकडे, आत्याकडे येत जात असे, पण तिला तिथे जास्त काळ करमत नसे. स्वतंत्र विचाराची, कणखर स्वभावाची अशी आजी कोकणात एकटी घरी राही. एकदा ती घरात एकटी आहे असे पाहून चोरांनी कडी काढायचा प्रयत्न केला पण आजी इतकी धीट की तिला जाग आल्याने हातात काठी घेऊन ती दाराजवळ आली आणि चोराच्या हातावर  काठीने मारले. चोर पळून गेले. पण त्यानंतर मात्र तिच्या भाच्याने  तिला आपल्या घरी रोज रात्री झोपण्यासाठी नेण्याचे ठरवले. काही काळ असा गेला. पुढे माझ्या भावाला मुलगा झाला आणि आजीला पंतवंड झाले. त्यानिमित्ताने तिला पुण्यामध्ये आणले आणि परत कोकणात तिला जाऊ दिले  नाही.

आयुष्याचे असे दोन  कालखंड… एक कराचीचा आणि एक कोकणातला – दोन परस्पर विरुद्ध

तिने अनुभवले. नकळत या सर्व गोष्टींचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. कधीतरी ती मनाने मनोऱ्याच्या घरी असे तर कधी कोकणात असे ! आयुष्यात घडलेल्या घडामोडींमुळे तिचे मन अस्वस्थ झाले होते. संकटांना तोंड देऊन ती थकली होती. तिच्याआधी माझे वडील गेले, त्यामुळे मुलगा गेल्याचे दुःख ती विसरू शकत नव्हती. आठवड्यातील सात दिवसातले चार-पाच दिवस तरी तिचा उपासच असे. पण  कष्ट केलेले तिचे शरीर या सगळ्याला तोंड देत होते. शरीर झिजले होते पण तिला कोणताही आजार नव्हता त्यामुळे थकत गेलेली आजी हळूहळू या सगळ्या मोहमायेतून  बाहेर पडली. झाडाचे जीर्ण पान जसे अलगदपणे गळून पडते, तशी माझी आजी म्हातारपणामुळे अनंतात विलीन झाली. माझ्या आत्त्याने पेंडसे कुटुंबाच्या आठवणींचे एक पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाच्या आधारे मला माझ्या आजीचे हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते !

तिच्या स्मृतीला माझा शतशः प्रणाम !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संत एकनाथ  महाराज… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ संत एकनाथ महाराज… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते… त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत…..

एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते… हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या…..

नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला… एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत…..

संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला… ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे…..

’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे… ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले…..

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला… फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Be a CEO of your own life. ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ Be a CEO of your own life. लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

मी आणि ताई आम्ही दोघी बहिणी. मी पुण्यात तर ताई नाशिकला स्थाईक. आज आम्ही दोघी सिनियर सिटीझन आहोत. मी पासष्ट तर ताई सत्तरीला पोचली.

आयुष्याचा आतापर्यंतचा काळ कसा गेला? कळलंच नाही. घर परिवार आमच्या नोकऱ्या, मुलांची शिक्षणं, त्यांच्या नोकऱ्या, त्यांची लग्नं, नातवंडं, मुलांचे अमेरिकेत स्थायिक होणे, आमच्या अमेरिकेच्या फेऱ्या. म्हणजे आमच्या पारिवारिक सिनेमाच्या सोळा रिळापैकी चौदा रीळं तर जवळपास संपली, म्हटलं तरी चालेल.

आता आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरता आली आहे. वय बोलू लागलं आहे. अमेरिकेचे ग्रीन कार्ड आम्ही घ्यावं, याबद्दल बऱ्याच चर्चेनंतर आता मुलांनी म्हणणं सोडून दिले आहे.

आम्ही अमेरिकेला येऊ, पण राहू आम्ही भारतातच. हे नक्की ठरलंय.

 ताई म्हणजे सौ. अनिता अजय देशपांडे यांचा नाशिकला मोठा बंगला आहे. रिटायरमेंट नंतर मागची पंधरा वर्षं त्यांनी बंगल्याचा पूर्ण उपभोग/ आनंद घेतला. त्यांच्या शेजारीच ताईचे मोठे दीर श्री अनिल देशपांडे यांचा बंगला. दोघी जावांचं छान पटतं. दोघांना एकमेकांच्या आधार आहे. बरोबर मोकळेपणाही आहेच. आता मात्र वयाप्रमाणे बंगल्याचे मेंटेनन्स करणं कठीण होतं आहे. त्यानंतर सेफ्टी, security चा प्रश्नही आहेच.

आतापर्यंतच्या सर्व पारिवारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण झाल्या.

आता पुढे काय ? पुढे काय ?

आता स्वतः ची जबाबदारी स्वतःच घ्यायची वेळ आली आहे.

तरुणपणी बघितलेली स्वप्नं – ‘उच्चशिक्षित मुलांनी उंच भरारी घ्यावी’. ती पूर्ण झाली. आता त्या स्वप्नांचे साईड इफेक्ट दिसतायेत. मुलं जवळ नाहीत. तसं बघितलं तर पुण्यासारख्या शहरात प्रत्येक चौथ्या घरी हाच सीन आहे.

स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आपणच घेतलाय/ भोगलाय. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्वप्नांचे साइड इफेक्ट पण gracefully handle करावेच लागतील.

वयाच्या या नाजूक वळणावर, ‘पुढे काय ?’

या प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे. आता प्रत्येक दिवस वेगळा निघतो, शरीराचा प्रत्येक अवयव वेगळा रंग दाखवतोय. वेळेवर सावध होणे गरजेचे आहे.

आज ताईचा फोन आला. म्हणाली,

“अग! पुण्यातील जरा चांगल्या old Age Homes बद्दल विचारपूस करून माहिती पाठव. “

मी म्हटलं, “अग ताई !! हे काय आता, नवीन खूळ तुझ्या डोक्यात आलंय ? चांगला बंगला सोडून Old Age Home वगैरे काय ?”

ताई म्हणाली, “अग! का नाही ? आपले final destination old Age Home ठरविण्यात काय हरकत आहे ?

Safety, Security, medical help, डॉक्टरची सुविधा Dining Mess facility, same age group चे आपल्या सारखेच आपल्याला भेटणार, मग काय हरकत आहे ?

अग !!जसं जसं वय वाढत जाणार तसतसे अनेक प्रश्न समोर येऊ शकतात. आयुष्याचा हाही फेज आरामात पार पडावा, ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते. पण तसे होईलच याची काही गॅरंटी आहे का ?

खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा, वास्तविकता लक्षात ठेवून आपली सोय करून ठेवावी. काही बदल, Planned Change ठरवून करायचे असतात.

हिवाळ्यात हीटर, उन्हाळ्यात कुलर / AC ची सोय करतो ना, तसंच काहीसं हे पण.

ही म्हातारपणाची सोय आहे, ” ताई म्हणाली,

Be a CEO of your own life. •••

Be your own BOSS. •••

माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतची जबाबदारी माझीच आहे ना!

अग !मुलांना आपली काळजी असतेच. पण ते आता आपली मदत कशी करू शकतील ? आपण आपली व्यवस्थित सोय केली तर त्यांना पण काळजी राहणार नाही.

बरं ! जेथे आपलीच मुले आपल्या जवळ नाहीत, तेंव्हा दुसऱ्यांवर भार टाकणंही बरोबर नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणाजवळच एवढा वेळ नाही/नसतो ग. अपेक्षा करणंच चूक आहे.

तेव्हा एखाद्या छान म्हणजे व्यवस्थित सर्व सोई जेथे उपलब्ध असतील, तेथे आपण रहायला जायचं, हे आम्ही ठरवलंय.

भविष्याची सोय करून, आपल्या मनाला जर आपण शाश्वत केलं. तर मन खंबीर राहतं. वर्तमान ही मजेत जगता येतं. मनाला खचू द्यायचं नाही.

‘Life is very unpredictable, ‘ हे लक्षात ठेवून हा निर्णय घेतलाय.

आयुष्यातील कोडी आपल्यालाच सोडवायची असतात.

लाइफचं हे प्रोजेक्ट आपल्यालाच successfully complete करायचं आहे. “

ताई एक वाक्य नेहमी म्हणते,

“कोणाच्या आयुष्यात Option म्हणून नाही जगायचं. नेहमी Perfect And Special जगायचं. “

प्रत्येक वळणावर जरा थांबून आपल्या आयुष्याचे Alignment करावं.

ताई म्हणाली,

“अग !!!

आता वृद्धाश्रम किंवा Old Age Home बद्दल विचार बदलले आहेत. ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाही, ते अशा जागी राहतात, हे असं कोणी आता समजत नाही. “

ताईचा हा निर्णय विचारात घेण्यासारखा आहे.

म्हणतात ना,

प्रार्थना ऐसे करें जैसे सब कुछ भगवान पर निर्भर करता है ।

परंतु प्रयास ऐसे करें जैसे सब कुछ आपपर निर्भर करता है।

लेखिका :सुश्री संध्या बेडेकर.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – पुढे चालत रहाण्यासाठी… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– पुढे चालत रहाण्यासाठी…– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

       .

जोवर पायात ताकत आहे

तोवर तु चालत रहा

साथीला कोणी नसेल तर

आपल्याच सावलीकडे पहा

अंधारात  गेलास तरीही

सावली साथ सोडत नसते

पायाजवळ येत येत ती

आपल्यातच मुरत असते

 उन्हामधे चालता चालता

 थकवा येईल भाजतील पाय

 तसच चालत रहा सतत

 अजिबात  थांबायच नाय

 परिक्षा घेणार आभाळ मग

आपोआप  भरून येईल

 चिंब चिंब  भिजवून  तुला

सारा थकवा घालवून  देईल

आता मात्र  थांब तू  चिंब  हो

 हात पसरून  स्वागत कर

मिठी मारून कवेत घे

पुढ चालत रहाण्यासाठी

पाऊस सारा मुरवून  घे

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 141 – तुम अच्छी लगती हो… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – तुम अच्छी लगती हो।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 141 – तुम अच्छी लगती हो…  ✍

लोग बुरा कहते है मुझको

तुम मुझको अच्छी लगती हो।

जाने तुममें ऐसा क्या है।

अनजाने ही यह लगाव है

तुम जाने क्या सोचा करती

मेरे मन में एक भाव है

ओ, मनभावन सच कहता हूँ

तुम मुझको अच्छी लगती हो।

ऐसा मन पाया है तुमने

जैसे बिल्कुल निर्मल जल हो

धुला धूप में तन है जैसे

दूध नहाया रक्त कमल हो।

राजकुमार अभावों का मैं

तुम मुझको अच्छी लगती हो।

चाहे दूर दृष्टि से हो पर

हरदम मेरे आसपास हो

जब चाहे छूलूँ मैं तुमको

इन प्राणों के बहुत पास हो।

जाने मैं कैसा लगता हूँ

तुम मुझको अच्छी लगती हो।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 140 – “दुर्गम्य पथों का अनुरागी…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  “दुर्गम्य पथों का अनुरागी)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 140 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ दुर्गम्य पथों का अनुरागी ☆

वो जो आत्ममुग्ध थे

अपने उन्नत लेखन पर

चले गये ऐसे ही वे

संक्षिप्त निवेदन पर

 

समझे थे खुद को

दुर्गम्य पथों का अनुरागी

वाणी में लेकर चलते

प्रज्जवलिताआगी

 

उन्हे क्षमा करने का हक

लोगो ने जब पाया

देते रहे चाँदनी तब

उनके आवेदन पर

 

यह मुहावरा बाछें खिलना

आया प्रचलन में

उन की परछाई बन चलना

था अनुशीलन में

 

कई कई उद्धरण बिखरकर

पहुँचे जन-जन तक

जिनमें उनकी ललक दिखी

यश के सम्वेदन पर

 

उनकी दिनचर्या होती थी

दिन का घटना क्रम

दिवस रैन जारी रहता था

यह महानतम भ्रम

 

जिसका अनुमोदन करने को

था उन ने सोचा

माँगेगे हम सिर्फ अमरता

इस आरेखन पर

©  श्री राघवेन्द्र तिवारी

28-05-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – विभाजन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – विभाजन ??

लहरों को जन्म देता है प्रवाह,

सृजन का आनंद मनाता है,

उछाल के विस्तार पर झूमता है,

काल का पहिया घूमता है,

विकसित लहरें बाँट लेती हैं

अपने-अपने हिस्से का प्रवाह,

शिथिल तन और

खंडित मन लिए प्रवाह,

अपनी ही लहरों को

विभक्त नहीं कर पाता है,

सुनो मनुज !

मर्त्यलोक में माता-पिता

और संतानों का

कुछ ऐसा ही नाता है!

© संजय भारद्वाज 

(8.35 बजे, 18 मई 2019)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना संपन्न हुई साथ ही आपदां अपहर्तारं के तीन वर्ष पूर्ण हुए 🕉️

💥 अगली साधना की जानकारी शीघ्र ही आपको दी जाएगी💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ ‘मिलन…’ श्री संजय भारद्वाज (भावानुवाद) – ‘Union…’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem ~ मिलन ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना

? संजय दृष्टि – मिलन ??

नश्वर आशंकाएँ खेत रहीं,

शाश्वत आकांक्षाएँ बनी रहीं,

ठगा-सा तकता रहा संसार,

चलो मिलें फिर देह के पार..!

© संजय भारद्वाज 

मोबाइल– 9890122603, संजयउवाच@डाटामेल.भारत, [email protected]

☆☆☆☆☆

English Version by – Captain Pravin Raghuvanshi

? ~ Union ??

Mortal apprehensions

got annihilated,

Eternal aspirations

remained alive…,

The world kept looking

stunningly bewildered,

Come, let’s meet again

to unite beyond

this mortal body…!

~Pravin

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य # 190 ☆ “सोशल पर अवतरण दिवस…” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है। आज प्रस्तुत है आपका एक व्यंग्य  – सोशल पर अवतरण दिवस)

☆ व्यंग्य — “सोशल पर अवतरण दिवस…” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

अच्छे दिन आने वाले हैं ऐसा सोचकर कितना अच्छा लगता है। दुःख, परेशानियां, मुसीबतों के बीच जब खूब सारे लोग बधाईयां और शुभकामनाएं देने लगते हैं तो अच्छा तो लगता है,वो दिन अच्छा लगता है ये दिन झूठ मूठ का भले हो।साल भर में दो चार बार अच्छे दिन लाने को लिए आजकल सोशल मीडिया बड़ा साथ दे रहा है। आजकल अच्छे दिन का अहसास कराने के लिए अपन झूठ-मूठ के लिए फोटो लगाकर अपना अवतरण दिवस या जन्मदिन की घोषणा कर देते हैं ये बात अलग है कि लोग इस झटके को हैप्पी बनाने के लिए हैप्पी बर्डे का नाम दे देते हैं, जैसे आज मेरा सरकारी जन्मदिन है और अगर इस दुनिया में किसी नकली चीज़ पर भी सरकारी मुहर लग जाए तो वही असली हो जाती है।

मेरा जन्मदिन मेरे बच्चों के अलावा किसी को याद नहीं रहता। घरवाली अक्सर इग्नोर करती है,पर बच्चे मुझे याद दिला देते हैं, फिर भी मै भी भूलने की कोशिश करता हूं। मोबाइल में खामखां केक और लड्डुओं का इतना ढेर लग जाता है कि अगर सब सजा दूं तो लोग घर को मिष्ठान भंडार समझ लें। मुश्किल ये कि आप इन्हें न खा सकते हैं और न पड़ोसी के यहां भिजवा सकते हैं। सबके सब मोबाइल से बाहर निकलते ही नहीं है। जब बहुत दिन हो जाते हैं तो फिर मन में कुलबुलाहट होने लगती है और अचानक दादी असली वाले जन्मदिन की याद दिला देती है मैं सोचता हूं अभी चार महीने पहले तो झूठ मूठ की इतनी बधाई और शुभकामनाएं बटोरीं थीं फिर पोल न खुल जाए पर मौसी उधर देहरादून से फेसबुक में हैप्पी बर्डे की पोस्ट डाल देती है फिर दिन भर बधाई और शुभकामनाओं का तांता लग जाता है हालांकि कि कुछ लोग फोन पर कटाक्ष करने लगते हैं कि यार बताओ कि तुम साल में कितने बार पैदा हुए हो…. अब आप ही बताओ कि बहुत लोगों को यदि अलग माह में मेरा हैप्पी बर्डे मनाने को इच्छा है तो किसी को मैं रोक सकता हूं कई बार तो ऐसा भी होता है कि मगरमच्छ जैसे निष्क्रिय रहने वाले समूह सदस्य भी जन्मदिन का मैसेज पढ़कर तुरंत  तैयार शुदा बधाई प्रेषित करने में देरी नहीं करते , तुरंत फारवर्ड वाला रेडीमेड मैसेज भेज देते हैं, फिर मुझे एक एक सदस्य को अलग अलग धन्यवाद प्रेषित करना ही पड़ता है,डर लगता है कि यदि धन्यवाद नहीं दिया तो सामने वाला नाराज होकर अगली बार  बधाई और शुभकामनाएं न भेजे। समूह के कुछ सदस्य तो समूह के अलावा अलग से भी बधाई का मैसेज भेज देते हैं, अब आप ही बताओ कि मैं अपनी इज्जत कैसे बचाऊं।

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares