मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फॅमिली डॉक्टर” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फॅमिली डॉक्टर” ☆ श्री मंगेश मधुकर 

क्लिनिकमध्ये एसी चालू होता तरी घाम फुटलेला कारण समोर डॉक्टर माझे टेस्ट रिपोर्ट तपासत होते.डॉक्टरांच्या म्हणजेच राजाकाकांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखेच शांत आणि गंभीर भाव.त्यामुळे धाकधूक वाढली.

‘मन चिंती ते वैरी न चिंती’ हेच खरं.आता काय ऐकायला लागणार?या विचारानं पोटात भीतीचा गोळा आला. 

“तब्येतीकडे फार दुर्लक्ष केलंलं दिसतंय” राजाकाकांनी विचारलं.

“हा थोडसं!!,”

“थोडसं नाही.भरपूर दुर्लक्ष केलंय.रिपोर्ट खोटं बोलत नाहीत”. 

“एनिथिंग सिरीयस”घाबरून विचारलं पण राजकाकांनी काहीच उत्तर दिलं नाही उलट चेहरा जास्तच गंभीर केला तेव्हा धाबं दणाणलं.माझा केविलवाणा चेहरा बघून राजाकाका हसायला लागले.

“अरे गंमत करतोय.उगीच टेन्शन घेऊ नकोस.रिपोर्ट नॉर्मल आहेत.बीपीचा त्रास सोडल्यास विशेष काही नाही.  गोळी सुरु करावी लागेल.”

“तुमची रिअॅक्शन बघून हादरलो ना.”

“सॉरी!!”

“हुssssश!!सुटलो.सगळं व्यवस्थित आहे ऐकून जीव भांड्यात पडला.आता टेंशन नाही.या तब्येतीच्या नादात बरीच काम राहिलीत.थँक्यू सो मच!!”

“ओ मिस्टर,एकदम उड्या मारू नका.१०० % फिट नाहीयेस.कसाबसा काठावर वाचलायेस.आता लक्ष दिलं नाही तर नंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील.”

“म्हणजे”

“अजून चाळिशी गाठली नाहीस तरी ब्लडप्रेशरचा त्रास.हे चांगलं लक्षण नाही.पळापळ कमी कर.जरा जीवाला विश्रांती दे.लाईफ स्टाईल बदलावी लागेल.”

“येस!!सगळं करतो.आज महत्वाची मिटिंग आहे.आत्ता ऑफिसला गेलं पाहिजे.”

“पालथ्या घड्यावर पाणी!!जरा तुझ्या बायकोला फोन लाव.”

“का?काय झालं?आत्ता तर म्हणालात की सगळं नॉर्मल आहे म्हणून…”

“तुला हॉस्पिटलमध्ये एडमीट करतो म्हणजे गप्प बसशील.सक्तीचा आराम.कंपनीसुद्धा ऑब्जेक्शन घेणार नाही.चार दिवस मस्त निवांत रहा.फक्त मोबाईल मिळणार नाही.चालेल”. 

“प्लीज,प्लीज नको,मी काळजी घेईन.सर्व सूचना फॉलो करीन.बाकी तुम्ही आहातच.”

“हे बऱयं,स्वतः कसंही वागायचं आणि डॉक्टरांना सांभाळायला सांगायचं.मला सांग, भविष्यासाठी प्लानिंग केलं असशीलच.सेविंग,इन्व्हेस्टमेंट,प्रॉपर्टी वैगरे वैगरे….”

“ते तर केलचं पाहिजे ना.” 

“मग ज्याच्या भरोशावर हे सगळे करतोस त्या शरीरासाठी काही इन्व्हेस्टमेंट केलीय का?”

“समजलं नाही”

“बहुतेकजण स्वतःच्या तब्येतीसाठी काहीच करत नाही.स्वतःला गृहीत धरून मला काही होणार नाही.एकदम फिट आहे या भ्रमात राहतात आणि आजारी पडले की घाबरतात.एक गोष्ट कायम लक्षात ठेव अचानक कोणताही आजार होत नाही.आपलं शरीर वेळोवेळी सूचना देतं परंतु त्याकडं दुर्लक्ष केलं जातं.आवश्यक ती काळजी घेतली जात नाही आणि मग त्रास वाढल्यावर डॉक्टरांकडे जातो.तिथंही घाई असतेच.चटकन बरं व्हायचं असतं.”

“काका,मनातलं बोललात.मनकवडे आहात.”

“साधी गोष्ट आहे रे.तब्येत ठणठणीत तर सगळं चांगलं.नाहीतर काहीही उपयोग नाही.स्वतःच्या बाबतीत केला जाणारा बेफिकिरी हा फक्त तुझाच नाही तर अनेकांचा प्रॉब्लेम आहे.” 

“खरंय,कामाच्या टेंशनमुळे खूप दिवस डिस्टर्ब आहे. शांत झोप नव्हती. जेवण जात नव्हतं.डोकं दुखायचं,अस्वस्थ होतो.

खाण्या- पिण्याचं काही ताळतंत्र नव्हतं.कामाच्या नादात त्रासाकडं लक्ष दिलं नाही.आता असह्य झालं तेव्हा तुमच्याकडे आलो.

“अजूनही वेळ गेलेली नाही.आजपासून आधी स्वतः मग फॅमिली आणि नंतर कंपनीचा विचार करायचा. दिवसातली ३० मिनिटं तरी व्यायाम करायचाच.खाण्यावर कंट्रोल ठेव.मी सांगतो तसं वागलास तर काहीही होणार नाही.”जिवलग मित्रासारखं राजकाकांनी समजावून सांगितलं.काकांशी बोलल्यावर एकदम फ्रेश वाटलं.

राजाकाका, वयाची सत्तरी पार केलेली तरीही तरुणांना लाजवेल असा उत्साह, पूर्णपणे फिट, प्रसन्न आणि बिनधास्त डोळे झाकून विश्वास ठेवावा असं व्यक्तिमत्व.आमचे फॅमिली डॉक्टर.आजोबा नंतर बाबा आता मी आमच्या तीन पिढ्या त्यांच्याकडून औषध घेतोय.राजाकाका म्हणजे कुटुंबाचाच भाग.आमच्याप्रमाणे अनेकांचे फॅमिली डॉक्टर होते. 

आजच्या काळात अनेक डॉक्टर्स भरमसाठ फी घेतात,गरज नसताना वेगवेगळ्या टेस्ट करायला लावतात याची राजकाकांना प्रचंड चीड होती कारण काकांची डॉक्टरकी ही ओल्ड मेथड होती.पेशंटचं पूर्ण ऐकून त्याला हवा तेवढा वेळ देऊन त्रास समजून घ्यायचा.त्यावर आधी बिनखर्चाचे उपाय सुचवायचे आणि आवश्यकतेनुसार उपचार करायचे.नेमकी औषधं आणि काळजी घेतली तर पेशंट नक्की बरा होतो हा आजवरचा अनुभव.अगदीच आजार गंभीर असेल तरच आवश्यक तपासण्या करण्याचा सल्ला.पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल तर कोणतीही व्हिजिट फी न घेता स्वतःहून भेटायला जाणार.

त्याकाळच्या  असलेल्या ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेचं “राजाकाका” हे मूर्तिमंत प्रतीक. 

सुमारे २५ वर्षापूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ सगळीकडे होते. त्यांच्याकडे जाताना अपॉटमेंट वैगरेची भानगड नव्हती. पैसे असले-नसले तरी उपचार व्हायचे. औषधं मिळायची. कधी गरज पडली तर एक्स्ट्रा चार्ज न घेता डॉक्टर घरीसुद्धा यायचे. कौटुंबिक समारंभात डॉक्टरांचा सहभाग हा ठरलेलाच. इतर अडी-अडचणींच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला जायचा. पेशंट आणि डॉक्टर एवढ्यापुरतं न राहता परस्परांशी प्रेमाचं ,जिव्हाळ्याचं आणि माणुसकीचं नातं होतं.

—–

आजच्या स्पेशालीस्ट,सुपर स्पेशालीस्टच्या जमान्यात ‘फॅमिली डॉक्टर’ संकल्पना जवळपास संपली.हॉटेलसारख्या टापटीप,चकचकीत क्लिनिकमध्ये डॉक्टर आणि पेशंट यांच्यात फक्त व्यवहार होतो.जेवढ्यास तेवढं बोलणं.आपुलकी वैगेरे काहीही राहिलं नाही.

“माणसापेक्षा पैसा मोठा झाला अन दवाखान्याचं दुकान झालं.” अशावेळी सगळ्यात मोठी उणीव भासतेय ती फॅमिली डॉक्टरांची.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एक मोठी रेष…’ – लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘एक मोठी रेष…‘ – लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

सुनीताबाईंबद्दल मी नव्यानं काय लिहिणार? त्यांचं सगळं आयुष्य महाराष्ट्राच्या पुढ्यात आहे. त्यातला निरलस कष्टाळूपणा, कठोर तत्त्वनिष्ठा, धारदार संवेदनशीलता, कमालीचं औदार्य, शास्त्रकाट्याची कसोटी लावणारी न्यायबुद्धी, कोवळं कविताप्रेम, परिपूर्णतावादी वृत्ती, पुलंच्या कामाचं त्यांनी केलेलं व्यवस्थापन, जीएंशी असलेली त्यांची अपूर्वाईची पत्रमैत्री… सगळंच आपण अनेक दशकं जवळून पाहिलेलं, आदरानं-अप्रूपानं अनुभवलेलं. त्याबद्दल नव्यानं सांगण्याजोगं काही नाही. ते अधिक जवळून बघण्याचं भाग्य मिळालेले, अधिक नेमकीपणी सांगता येणारे, अधिक काळ त्यांना पाहिलेले… अनेक लोक आहेत. मी त्यांच्याहून वेगळं काय सांगणार?

मी वेगळं सांगू शकीन ते बहुतेक माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेबद्दल आणि त्यातून मला मिळालेल्या गोष्टींबद्दल. 

सुनीताबाईंचं लेखन मी वाचलं ते पुलंच्या भक्तीत पूर्णतः बुडून गेल्यावर. ऐन घडणीच्या वयात. चौदा-पंधराव्या वर्षी. आम्हांला दहावीत असताना ‘आहे मनोहर तरी’मधला एक अंश मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला होता. त्या निमित्तानं ‘आहे मनोहर तरी’ हातात आलं आणि मला माझ्या पिंडाला मानवणारं, अगदी जवळचं वाटणारं काहीतरी मिळाल्याचा भास झाला. त्या लेखनातली बंडखोरी, स्वातंत्र्यावरचं प्रेम आणि त्याकरता किंमत मोजण्याची तयारी, अतिशय नाजूक आणि सूक्ष्म भावनांचे पदर उलगडून बघण्याची हातोटी आणि त्यामागची अपरिहार्यता… हे सगळं माझ्या तोवरच्या वाचनापेक्षा पूर्ण वेगळं होतं. माझ्या संवेदनाखोर स्वभावाला ते लेखन फार जवळचं वाटलं. 

त्यापेक्षाही निराळी आणखी एक गोष्ट घडली, असं आता जाणवतं. 

आपण घडतो त्यात निरनिराळ्या बाबींचा हात असतो. प्रत्यक्ष आयुष्यातली उदाहरणं आणि बरावाईट वारसा असतो, तसाच नजरेसमोर वावरणार्‍या – समाजातल्या इतर प्रतिष्ठित उदाहरणांचाही भाग असतो. त्यातल्या कुणाचे प्रभाव आपण आपल्यावर पाडून घ्यायचे हे निवडणारे आपणच असतो. पण मुळात अशा प्रकारची उदाहरणं भोवतालात असावी लागतात. 

सुनीताबाई तशा होत्या. 

त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि गुणवत्ता नाकारण्याची आजघडीला कुणाचीही छाती होणार नाही. पण ‘आहे मनोहर तरी’ प्रकाशित झाल्याच्या अल्याडपल्याडच्या काळात पुलंची लोकप्रियता वादातीतपणे त्यांच्याहून मोठी होती. पुल या नावाला एक जादुई वलय होतं. तसं तर ते आजही आहेच. तेव्हा ते किती प्रभावी असेल, याची कल्पना आपण सहजगत्या करू शकतो. पुलंना आणि त्यांची पत्नी म्हणून सुनीताबाईंना मराठी माणसांच्या जगात मानाची जागा होती. मंगला गोडबोलेंनी सुनीताबाईंच्या चरित्रामध्ये पुल आणि सुनीताबाई यांना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ अशी अतिशय चपखल संज्ञा वापरली आहे. खरोखरच त्या दोघांचं स्थान तसंच होतं. अशा ठिकाणी असणार्‍या सुनीताबाईंनी आपल्या लोकप्रिय कलावंत नवर्‍याच्या सोबत संसाराची धुरा निमूट वाहिली असती आणि मनोभावे त्याच्यासह मिरवलं असतं, तरीही त्यांचा उदो-उदोच झाला असता. पण त्यांनी हा सहज मिळू शकणारा मान नाकारला. त्यांनी या भूमिकेच्या बरोबर उलट वागून दाखवलं. 

‘आहे मनोहर तरी’मधून त्यांनी नवरा म्हणून पुलंच्या वागण्याचं रोखठोक विश्लेषण केलं. आणि पुलंचे दोष त्यांच्या पदरात घातले. वास्तविक पुल हे अशा पिंडाचे होते, की त्यांनी सुनीताबाईंच्या कोणत्याही निर्णयांना कधीही काडीमात्र विरोध केला नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणं तर त्यांच्या स्वभावात नव्हतंच, पण सुनीताबाईंनी स्वतः पुलंच्या बाबतीत घेतलेले निर्णयही त्यांनी विनातक्रार मानले. या व्यवस्थेत सुनीताबाईंची दोन्ही अंगांनी सोयच होती. स्वातंत्र्य तर होतंच, शिवाय कर्कशा न व्हावं लागण्याची सोयही होती. ही व्यावहारिक सोय वापरून मूलभूत प्रश्नांना बगल देता येणं एखादीला सहज शक्य झालं असतं. पण सुनीताबाईंनी तसं केलेलं दिसत नाही. त्यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीबद्दलच प्रश्न उपस्थित केले. ‘वेळोवेळी मी माझे आणि भाईच्याही आयुष्याबाबतचे निर्णय घेत गेले, हे जरी माझ्या पथ्यावर पडत असलं, तरी भाई मात्र वेळोवेळी एखाद्या जाणत्या सहचरासारखं न वागता एखाद्या लहान मुलासारखं आत्मकेंद्री पद्धतीनं वागला आहे,’ या आशयाचा सल त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणी बोलून टाकला. पुलंना गाडी चालवता येत नसतानाही निव्वळ पुरुष असल्यामुळे त्यांना मिळालेल्या ‘शिकिवनाऱ्या बाबा’च्या उपाधीबद्दलचा किस्सा प्रसिद्ध आहे. पण उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यात पुलंबद्दल कुठलाही कडवट सूर नव्हता. पुलंच्या प्रतिभेबद्दल सुनीताबाईंना आदर आणि अप्रूप होतं. तिला निगुतीनं जपण्याचं काम सुनीताबाईंनी जन्मभर केलं. पण आश्चर्य म्हणजे, पुलंच्या, एखाद्या लहान मुलासारख्या आत्मकेंद्री परावलंबित्वाबद्दल तक्रार नोंदवतानाही पुलंबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. त्वेष वा राग नव्हता. लग्नगाठीतून जन्माला येणारे स्त्रीवरचे अन्याय हे पुरुषसत्ताक व्यवस्थेची फळं कशी असतात, याबद्दलचं किंचित कडसर – कडवट नव्हे – भान त्या प्रकटनात भरून राहिलं होतं. दलित लेखकांना उद्देशूनही त्यांनी त्या आशयाचे प्रश्न विचारले होते. ‘तुम्ही शोषित. आम्ही स्त्रियाही शोषित. तुम्हांला तरी आमची दुःखं कळतील असं वाटलं होतं…’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  त्या पुस्तकातली ‘आहे मनोहर तरी गमते उदास’मधल्या उदासरम्य भावाची एक छटा त्यातूनही आलेली होती. 

दुसरं म्हणजे स्त्री म्हणून स्वतःला पडलेल्या शारीर मोहांबद्दल लिहिणं. सुनीताबाई चळवळीत काम करत असताना त्यांना भय्या या आपल्या मित्राविषयी मोह पडला आणि काहीही चुकीचं पाऊल न उचलता त्या मोहातून पार झाल्या, याला कारण भय्याचा भलेपणा, असं त्यांनी प्रामाणिकपणानं नोंदवलं.      

पुल-सुनीताबाईंना मूल नव्हतं. अगदी सुरुवातीच्या काळात एका अगदी साध्याश्या प्रसंगी मन दुखावलं जाण्याचं निमित्त झालं आणि सुनीताबाईंनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. पुढे कारणाकारणांनी ते राहतच गेलं. हा किती मोठा निर्णय! पण सुनीताबाईंच्या त्या निर्णयामागे कुठलाही अभिनिवेश जाणवत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार न माजवता ते अगदी विनासायास वागवणार्‍या व्यक्तीची सहजता त्यात दिसते. तसंच लग्नसंस्थेबद्दलच्या त्यांच्या चिंतनाचंही. ‘मला त्या बाह्य बंधनाची गरज नव्हती. भाईला हवं होतं, म्हणून लग्न केलं; त्याला ते नको असतं, तर मी सहज घटस्फोट देऊ शकले असते,’ असं त्या शांतपणे म्हणून गेल्या. त्यांना स्वतःच्या असामान्यत्वाची लख्ख जाणीव होती, पण त्याच वेळी पुलंच्या स्वभावातल्या मूलपणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सोडून जाण्यातलं क्रौर्यही जाणवत होतं. त्या काळातल्या – आणि खरं तर आजच्याही – स्त्रीस्वातंत्र्याच्या रूढ कल्पना पाहिल्या, तर कितीही मोठा सर्जनशील कलावंत का असेना, पण अशा कलावंत नवर्‍याच्या कारकिर्दीची व्यवस्था पाहणारी स्त्री, हे वर्णन त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या कर्तृत्ववान व्यक्तीला किती बोचणारं-सलणारं ठरू शकेल! पण त्यामध्ये त्यांनी कधीही कुठलंही शरमिंधेपण बाळगलेलं दिसत नाही. एखाद्या कवितेची निर्मिती मिरवावी तितक्याच अभिमानानं त्यांनी स्वतः निरीक्षणं करून बसवलेल्या तूप कढवण्यासारख्या खास कौशल्यांबद्दलही लिहिलं. मन लावून केलेलं, दर्जा राखून केलेलं कुठलंही काम श्रेष्ठच या मूल्यावरचा ठाम विश्वास त्यामागे होता. हे अशाच एखाद्या व्यक्तीला जमेल, जिच्या विचारांमध्ये लखलखीत स्पष्टता आहे. सुनीताबाईंनी ते सहजगत्या तोलून धरलं होतं. 

हे जगावेगळं होतं.   

सुनीताबाईंनी आपल्या नवर्‍याच्या प्रतिमेची तमा न बाळगता असं जाहीर लिहिण्यामुळे – आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पुलंनी ते अत्यंत उमदेपणानं स्वीकारण्यामुळे – फार वेगळा पायंडा पडला. अजिबात कडवट न होता, पण कुठलीही तडजोड न करता केलेला, स्त्रीवादी विचाराचा फार उन्नत आविष्कार बघायला मिळाला; तोही समाजात मानाच्या स्थानी विराजमान असलेल्या एका जोडप्याकडून. याचं मोल माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीनं फार मोठं होतं. स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रीचं आणि ते कुठल्याही अहंकाराशिवाय स्वीकारणाऱ्या पुरुषाचं असंही सहजीवन असू शकतं, असा एक महत्त्वाचा धडा त्यातून मला मिळाला. 

पुढे सुनीताबाईंचं लिहिणं, त्यांची प्रश्नोपनिषद विणत नेणारी शैली, मित्रांच्या काळजी-प्रेमापोटी अतीव कोवळी होऊ शकणारी आणि स्वतःला प्रश्न विचारताना मात्र धारदार शस्त्राचं रूप धारण करणारी  त्यांची संवेदनशक्ती… या गोष्टी वाचनात आल्या. अधिकाधिक आवडत गेल्या. जी. ए. आणि सुनीताबाई या दोघांच्या पत्रव्यवहाराच्या रूपानं निराळ्याच उंचीवरच्या मैत्रीचा आविष्कार बघायला मिळाला, अतिशय कृतज्ञ वाटलं. पण ती सगळी पुढची गोष्ट.   

पुलंच्या नाटकाची रॉयल्टी बुडवून नाटकांचे दडपून प्रयोग होत असत. अशा प्रयोगात सामील होणाऱ्या भल्या-भल्या लोकांना सुनीताबाईंनी कोर्टाच्या नोटिसा बजावल्या. मग ते प्रसिद्ध नट असोत वा पुलंचे मित्र असोत. तसंच दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे त्यांनी दिलेल्या एका देणगीचं. पी. एल. फाउंडेशनला भराव्या लागणाऱ्या कराच्या दृष्टीनं विचार करता ही देणगी पुढच्या आर्थिक वर्षात देणं सोयीचं होतं, म्हणून त्यांनी देणगी उशिरा दिली, पण देणगी देण्याचा निर्णय झाल्यापासूनच्या प्रत्येक दिवसाचं व्याजही देणगीत जमा करूनच. एकदा एखाद्या मूल्याविषयी संपूर्ण विचार करून त्याचा स्वीकार केला, की त्याच्या अंमलबजावणीत मागेपुढे पाहणं नाही. पदरी वाईटपणा येवो वा चांगुलपणा येवो. 

न भिता आणि स्वच्छ विचार करता आला, की तो कुठल्याही टोकापर्यंत नेता येण्याचं धैर्य मिळत असेल? कुणास ठाऊक. मला तो विश्वास त्यांच्या लिहिण्यातून मिळाला खरा. त्यांचं स्थान बघता, तो त्यांच्यामुळे अनेकांना मिळाला असणार. 

त्या स्वतः सिद्धहस्त प्रतिभावंत लेखक होत्या, असं म्हणता येत नाही. त्यांनी स्वतःही तसं कधी मानलं नाही. पण तसं नसताही, आपली योग्यता आणि आपल्या मर्यादा नीट समजून घेतल्या आणि स्वतःशी निर्भयपणे प्रामाणिक राहिलं, तर किती प्रकारे निर्मितिशील असता येतं, याचा वस्तुपाठच जणू त्यांनी त्यांच्या जगण्यातून घालून दिला. इतर अनेक लेखकांबद्दल वाटतो तसा सहज मित्रभाव त्यांच्याबद्दल वाटत नाही, एक प्रकारचा धाक वाटतो. त्यांनी जगताना आखून दिलेली रेष तितकी मोठी होती, याचंच ते द्योतक मानलं पाहिजे! 

बाकी कशापेक्षाही हे मला त्यांचं मोठं योगदान वाटतं.

लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे

संकलक व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आयुष्यातील दु:खांना कोण जबाबदार आहे?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘आयुष्यातील दु:खांना कोण जबाबदार आहे?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले, “आता मी मंदिरात येणार नाही.”

यावर पुजाऱ्याने विचारले – “का?”

ती बाई म्हणाली, “मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते! काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे. काही लोक पूजा, होम हवन प्रामाणिकपणे कमी करतात आणि देखावा अधिक!”

यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला, “ते बरोबर आहे! पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, मी जे सांगतो ते तुम्ही करू शकता का?”

बाई म्हणाल्या, “ठीक आहे. तुम्ही मला सांगा, काय करावे?”

पुजारी म्हणाले, “एका ग्लासात काठोकाठ पाणी भरा. ते ग्लास हातात धरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा करा. अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये.”

बाई म्हणाल्या, “मी हे करू शकते!”

मग थोड्याच वेळात त्या बाईने तसे केले! त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने महिलेला 3 प्रश्न विचारले…

“१) तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का?

२) तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसले का?

३) तुम्हाला कोणी देखावा करताना दिसले का?”

बाई म्हणाली, “नाही, मी काही पाहिले नाही!”

मग पुजारी म्हणाले, “जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता, तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते, जेणेकरून त्यातून पाणी पडू नये. म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही.

आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमात्म्याकडे केंद्रित करा, मग तुम्हाला इतर काहीही दिसणार नाही. सर्वत्र फक्त देवच दिसेल.”

आपल्या आयुष्याचंही असंच आहे.

आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे? देव आहे? कुंडली आहे? की तुम्ही स्वत:?

खरं तर देव नाही, गृह-नक्षत्र किंवा कुंडली नाही, नशीब नाही, नातेवाईक नाहीत, शेजारी नाहीत, सरकार नाही, तुम्ही स्वतः याला जबाबदार आहात.

१) तुमची डोकेदुखी अनावश्यक विचारांचा परिणाम आहे.

२) तुमची पोटदुखी तुमच्याच चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे.

३) तुमचे कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे.

४) तुमचे कमकुवत शरीर/वाढलेली चरबी आणि आजारी शरीर, तुमच्याच चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे.

५) तुमच्या कोर्ट केसेस, तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे.

६) तुमच्यातील अनावश्यक वाद, तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे.

वरील कारणांखेरीज शेकडो कारणे आहेत, ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता. दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता.

यामध्ये कोठेही देव दोषी असत नाही.

जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कुठेतरी आपली चुकीची विचारसरणी याला कारणीभूत आहे.

म्हणून योग्य निर्णय घ्यावा. योग्य गुरुच्या चरणात लीन व्हावे आणि त्यानुसार आपले आयुष्य निरोगी, सुखी समाधानी आणि समृद्ध बनवावे!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “यक्षरात्र” – कवयित्री : अरुणा ढेरे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆

सौ. स्वाती सनतकुमार पाटील

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “यक्षरात्र” – कवयित्री : अरुणा ढेरे ☆ परिचय – सौ. स्वाती सनतकुमार पाटील ☆ 

 पुस्तक – यक्षरात्र

 कवयित्री -अरुणा ढेरे

 प्रकाशन वर्ष -१९८७

मूल्य- २५/

अरुणा ढेरे या कथा, कादंबरी ,काव्य, ललितलेखन, कुमार व किशोर वयोगटासाठीचे लेखन, सांस्कृतिक व ऐतिहासिक लेखन करणाऱ्या मराठीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका आहेत. त्यांचे वडील ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्रीयुत र .चि. ढेरे यांची समृद्ध भाषा श्रीमंती त्यांना लाभली आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहात कवयित्रीच्या 1980 ते 1986 या काळातील एकूण 72 छोट्या कवितांचा संग्रह आहे.

शीर्षक “यक्षरात्र”हे विशेष आहे. यक्ष व रात्र यांनी मिळून यक्ष रात्र हा शब्द तयार झाला आहे. यक्ष सुंदर आणि मायावी असतात. त्यांची तुलना ‘रात्रीशी’ केली आहे. आयुष्यातील धुंद करणाऱ्या, मंतरलेल्या, मायावी रात्रींतील प्रसंगांचे वर्णन यात आहे. या यक्षरात्रींचे कवितेशी संबंध सांगताना त्या म्हणतात , याच मंतरलेल्या रात्रीत नवनिर्मिती होते आणि नवनिर्मितीचे व कवितेचे जन्मोजन्मीचे नाते असते. ‘यक्षरात्र’ या नावाच्या कवितेत त्या म्हणतात,

“….. आणि रंग गर्द क्षितिज पेटले,

       रात्री उजाडले क्षणमात्र 

       तमाने टाकली प्रकाशाची कात, 

        झाली काळजात यक्षरात्र”.

अबोल भावना कवितातून कशा झरतात हे सांगताना, त्या म्हणतात,

     “तुला समजू न शकणाऱ्या         

     जाणिवांचे हुंदके गळाभर दाटून

     येतात आणि फारच असह्य झाले 

     की कविता होऊन कागदावर        

     ठिबकू लागतात .”

आयुष्यातील स्वार्थी नाती व त्यामुळे कवितेला लाभलेले कोरडेपण याबद्दल कवयित्री लिहितात,

   ” पाहिले मोर तत्वांचे,

    ते सर्व पिसे झडलेले,

    अन ओळख हिरवी जिथे,

     ते पान कुणी खुडलेले .”

पुढे एक ठिकाणी त्या लिहितात

“मी माझ्या आत आत उतरते आणि     

नुसतीच बाहेर पाहते …

तेव्हा भीती वाटते.”

 पुढे एके ठिकाणी त्या लिहितात,  

‘शब्दांचे दुःख निराळे.

 ना कळत्या अर्थापाशी मोराचा पंख झळाळे.’

 दुःखातून बाहेर पडून लेखनातून स्वतःची ओळख निर्माण करताना, संघर्ष करताना त्या म्हणतात,

‘ माझी नाव वलवायला मला माझेच हात हवे होते ,

आता हात नाहीत ,

शब्दांचे वागणे बदलले आहे ,

माझे पाणी बदलले आहे,

 माझे जाणे आणि गाणे ही बदलले आहे .,’

विसर पडलेल्या नात्यांबद्दल त्या लिहितात ,

“सागांच्या भिंती मधुनी कोंडल्या सुखाच्या हाका,

 पाखरे विसरून गेली आश्वासक आणाभाका’.

अश्रू लपवून स्मितहास्याने जीवनास सामोरे जाताना,आत्मविश्वास वाढवताना त्या लिहितात ,

“देहाचे पान थरारी ,

मज हवीच माझी माती ,

दुःखाच्या ओटी वरती

 तु लाव स्मिता ची पणती.’

 पतीच्या विरहात ” तू नसताना “या कवितेत त्या लिहितात ,

   ‘तेव्हा या देहस्वी प्रदेशाशिवाय   

   अन्यत्र कुठे तृप्तीची तळी असतील

   असे वाटले ही नव्हते,

   आता आभाळ निवड ,हवा संथ

   आहे, 

  विलासीचंद्र मी जरा काढून ठेवला  

  आहे .”

रात्रीत भेटणाऱ्या प्रेमाची जग जाहीर रीत सांगताना त्या लिहितात,

   “प्रेम भोगावे जरासे पांघरूनि

    वासना, आतडी सजवून भोळी,

    रंगवावा पाळणा”.

 शृंगारसात  त्या लिहितात ,

“उगीच नेसले हिरवी साडी, काळे काठ.

 झुलवीत आले जुन्या नदीचे नवखे घाट,

 पायात पैंजण चांदीचे,

 घुंगुर गाणे धुंदीचे.

 राघू लाल चोळीवरती,

 केसातून पिवळी शेवंती”.

सासुरवाशीणीला “माहेरी बोलवा” या कवितेत त्या लिहितात,

” चार दिवसांवर उभा ओला श्रावण झुलवा.

 न्याया पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा,

 तिच्या अंगावर इथे किती गोंदले निखारे,

 तिथे फिरेल त्यावरी रक्त चंदनाची वारे.

थोडा वेळ दे गारवा, तिला माहेरी बोलवा,

सोसायचाच ना आहे पुन्हा वैशाख वणवा .”

“पाऊस” या कवितेत त्या लिहितात,

आभाळ भरून हे घन ओथंबून असे, प्रसवाचा उत्सव सजवून माती हसे.

पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो खोवून पीस मोराचे कान्हा होतो.

हिमशुभ्र कळ्यांवर तमाम झुकतो, जेव्हा पाऊस रसिक राधेचा राणा होतो.” 

“पाऊस  कुणा राव्याला दाणे देतो ,

तंद्रीत खुळ्या पाण्याला गाणे देतो ,

दिशा मोकळ्या दाही ,

पाण्याला पाऊस रत्न पैंजण देतो.”

आयुष्यात शब्दांचे कवितेचे गाण्याचे महत्त्व सांगताना त्या म्हणतात

    “उघडना ,ओठ जरा .जुळू दे ना 

     गाणे. गाण्या विना खरे का ग

      माणसाचे जिणे?”

अशा अनेक कविता वाचल्यानंतर या काव्यसंग्रहाची वैशिष्ट्ये सांगताना मला आवर्जून सांगावेसे वाटते यातील कित्येक ओळी साड्यांच्या घडी प्रमाणे  हळुवार आयुष्याची रीत उलगडून दाखवतात. यांच्या कविता लयबद्ध आहेत .डोळ्यासमोर खेडेगावातील पावसातले वातावरण, जांभळे डोंगर ,हिरवीगर्द झाडी , गार उनाड वारा, चंदेरी पाणांतून टपटपणारे थेंब ,डोहाकटी नाचणारा मोर ,हिरवा राघू ,साजनाची ओढ हे सोबत असल्याचा भास होतो . कवयित्री शब्दांची धनी आहे. तिच्या पोतडीतून आलेले काही शब्द अगदी नवे कोरे वाटतात. “पायांना भुईच्या रंगाचे धन, चंद्र भाकरीचा तव्यात उतरून घ्यायचा, पानावर चढते चांदी, मोरांचे पंख झाडले इ.अशा अनेक शब्दांना मोरपिसांपरी पावसात न्हात, गार वारा पीत ,कधी विरहाच्या कधी मिलनाच्या स्पर्शांना अनुभवत या कविता जीवनाचं वास्तव स्त्री मनातून सांगून जातात. आणि या संसाराच्या पाशातून मुक्त करत कवयित्रीला लिखाणाचे बळ देतात. त्या उंचीवर बसून ती पुन्हा वळून पाहते तेव्हा तिच्या आयुष्यातले हे क्षण, या रात्री तिला यक्षरात्रीसारख्या भासू लागतात आणि मग खऱ्या अर्थाने प्रत्येकीच्या आयुष्यातली यक्षरात्र त्यां सोबत चमकू लागते. असा अनुभव देणारा हा काव्यसंग्रह नक्की वाचायला  हवा.. 

परिचय : प्रा. सौ स्वाती सनतकुमार पाटील.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #244 ☆ रिश्ते बनाम उसूल… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख रिश्ते बनाम उसूल… । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 244 ☆

☆ रिश्ते बनाम उसूल… ☆

बात जब रिश्तों की हो, तो सिर झुका के जीओ और जब बात उसूलों की हो, तो सिर उठा कर जियो, क्योंकि अभिमान की बात फरिश्तों को भी शैतान बना देती है और नम्रता भी कम शक्तिशाली नहीं है; वह साधारण इंसान को फरिश्ता बना देती है। इससे सिद्ध होता है कि अहं मानव का सबसे बड़ा शत्रु है, जो मानव हृदय में वैमनस्य व ईर्ष्या-द्वेष के भाव जाग्रत करता है तथा स्व-पर को पोषित करता है। दूसरी ओर वह फ़ासलों को इस क़दर बढ़ा देता है कि उनके पाटने का कोई अवसर शेष नहीं रहता। इसीलिए कहा जाता है कि मतभेद भले ही रखो; मनभेद नहीं, क्योंकि विचारधारा की भिन्नता तो समाप्त हो सकती है, परंतु मन में पनपी वैमनस्य की दीवारें सामीप्य भाव को लील जाती हैं। इसलिए कहा जाता है कि ‘दुश्मनी उतनी करो कि दोस्ती व सामीप्यता की संभावना बनी रहे।

‘रिश्ते कंचन व चंदन की तरह होने चाहिए; चाहे टुकड़े हज़ार हो जाएं; चमक व सुगंध अवश्य बनी रहनी चाहिए।’ परंतु यह उस स्थिति में संभव है, जब मानव अपेक्षा व उपेक्षा के भाव से ऊपर उठ जाता है। उस स्थिति में उसे किसी से अपेक्षा, आशा व उम्मीद की आवश्यकता नहीं रहती। वैसे मानव की इच्छा पूर्ति न होने पर उसे निराशा का सामना करना पड़ता है। इसके विपरीत उपेक्षा करने की स्थिति में मन में क्रोध, शंका व संशय की स्थिति उत्पन्न होना स्वाभाविक है, जो उसे अवसाद के भंवर में पहुंचा सकती हैं। यह दोनों स्थितियाँ मानव के पथ में अवरोध उत्पन्न करती हैं तथा उनके अभाव में सहज जीवन की कल्पना करना बेमानी है।

सो! जहां अपेक्षाएं समाप्त होती हैं, सुक़ून वहीं से प्रारंभ होता है। मानव को उम्मीद दूसरों से नहीं, ख़ुद से रखनी चाहिए, क्योंकि वह आपको ऊर्जस्वित करती है तथा आप में साहस व धैर्य को पोषित करती है। मानव सफलता प्राप्ति के लिए संघर्ष की राह को अपनाता है, भले ही हर कोशिश में उसे सफलता नहीं मिल पाती। लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होती है। ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती/ लहरों से डरकर नौका पार नहीं होती’ और ‘करत-करत अभ्यास के,जड़मति होत सुजान’ से भी यह सीख मिलती है कि मानव को सदैव प्रयासरत रहना चाहिए। बीच राह से लौटना श्रेयस्कर नहीं है, क्योंकि उससे पूर्व तो आप मंज़िल पर पहुंच सकते हैं।

आइंस्टीन भी परिश्रम को व्यर्थ नहीं मानते थे बल्कि उसे अनुभव की संज्ञा देते थे। नेपोलियन तो आपदा को अवसर स्वीकारते थे और जिसके जीवन में मुसीबत दस्तक देती थी, उसे दिल से बधाई देते हुए कहते थे कि ‘अब तुम्हें अपनी प्रतिभा दिखाने का अवसर प्राप्त हुआ है।’ इसका प्रत्यक्ष  प्रमाण है आइंस्टीन का बल्ब का आविष्कार करना और नैपोलियन का विश्व विजय का स्वप्न साकार होना और अनेक प्रतिभाओं का जीवन में ‘तुम कर सकते हो’ सिद्धांत को मूलमंत्र स्वीकार कर धारण करना और विश्व में अनेक कीर्तिमान स्थापित करना। मुझे स्मरण हो रही हैं स्वरचित पंक्तियाँ ‘आपदा को अवसर बना लिया कीजिए/ व्यर्थ ही ना दूसरों से ग़िला किया कीजिए।’ जी हाँ! यही संदेश था नेपोलियन का–जो मनुष्य आपदा को वरदान के रूप में स्वीकारता है, वह निरंतर सफलता की सीढ़ियों पर चढ़ता हुआ आकाश की बुलंदियों को छू लेता है। उसे जीवन में कभी भी पराजय का मुख नहीं देखना पड़ता। यही उक्ति  चरितार्थ होती है रिश्तों के संबंध में–शायद इसीलिए ही मानव को स्नेह, त्याग व समर्पण का संदेश दिया गया है, क्योंकि इससे हृदय में अहम् का लेशमात्र भी स्थान नहीं रहता, जबकि अहंनिष्ठ मानव जीवन-मूल्यों का तिरस्कार कर ग़लत राहों पर चल पड़ता है, जो विनाश रूपी बंद गलियों में जाकर खुलता है।

सो! रिश्तों को स्थायित्व प्रदान करने के निमित्त मानव के लिए पराजय स्वीकारना बेहतर विकल्प है, क्योंकि रिश्तों में भावनाओं, संवेदनाओं, एहसासों व जज़्बातों की अहमियत होती है। दूसरी और उसूलों को बनाए रखने की प्रथम शर्त है– सिर उठाकर जीना अर्थात् अपनी शर्तों पर जीना; ग़लत बात पर झुकना व समझौता न करना, जो विनम्रता का प्रतीक है। विनम्रता में सभी समस्याओं का समाधान निहित है। यह स्थिति हमें शक्तिशाली व मज़बूत ही नहीं बनाती, फ़रिश्ता बना देती है। सो! रिश्ते व उसूल यदि सम दिशा में अग्रसर होते हैं, तो रिश्तों की महक जहाँ जीवन को सुवासित करती है, वहीं उसूल उसे चरम शिखर तक पहुंचा देते हैं। परंतु मानव को अपने सिद्धांतों से कभी समझौता नहीं करना चाहिए, बल्कि ‘सिर कटा सकते हैं, लेकिन सिर झुका सकते नहीं’ उसके जीवन का लक्ष्य होना चाहिए। मानव को एक सैनिक की भांति अपनी राह पर चलते हुए अडिग व अटल रहना चाहिए और युद्धक्षेत्र से पराजय स्वीकार लौटना नहीं चाहिए। उसे गोली पीठ पर नहीं, सीने पर खानी चाहिए। जो व्यक्ति अपने सिद्धांतों चलता है, सीमाओं का अतिक्रमण व मर्यादा का तिरस्कार नहीं करता–एक अंतराल के पश्चात् अनुकरणीय हो जाता है और सब उसका सम्मान करने लगते हैं। वह जीवन के अर्थ समझने लगता है तथा निष्काम कर्म की राहों पर अग्रसर हो जाता है। वह अपनी राह का निर्माण स्वयं करता है, क्योंकि लीक पर चलना उसे पसंद नहीं होता। निजी स्वार्थ के निमित्त झुकना उसकी फ़ितरत नहीं होती। ‘ऐ मन! तू जी ज़माने के लिए’ अर्थात् अपने लिए जीना उसे प्रयोजनहीन व निष्फल भासता है। वास्तव में सिद्धांतों व उसूलों पर चलना रिश्तों को निभाने की प्रथम शर्त है।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ ≈ मॉरिशस से ≈ – राज – भोग – ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

श्री रामदेव धुरंधर

(ई-अभिव्यक्ति में मॉरीशस के सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री रामदेव धुरंधर जी का हार्दिक स्वागत। आपकी रचनाओं में गिरमिटया बन कर गए भारतीय श्रमिकों की बदलती पीढ़ी और उनकी पीड़ा का जीवंत चित्रण होता हैं। आपकी कुछ चर्चित रचनाएँ – उपन्यास – चेहरों का आदमी, छोटी मछली बड़ी मछली, पूछो इस माटी से, बनते बिगड़ते रिश्ते, पथरीला सोना। कहानी संग्रह – विष-मंथन, जन्म की एक भूल, व्यंग्य संग्रह – कलजुगी धरम, चेहरों के झमेले, पापी स्वर्ग, बंदे आगे भी देख, लघुकथा संग्रह – चेहरे मेरे तुम्हारे, यात्रा साथ-साथ, एक धरती एक आकाश, आते-जाते लोग। आपको हिंदी सेवा के लिए सातवें विश्व हिंदी सम्मेलन सूरीनाम (2003) में सम्मानित किया गया। इसके अलावा आपको विश्व भाषा हिंदी सम्मान (विश्व हिंदी सचिवालय, 2013), साहित्य शिरोमणि सम्मान (मॉरिशस भारत अंतरराष्ट्रीय संगोष्ठी 2015), हिंदी विदेश प्रसार सम्मान (उ.प. हिंदी संस्थान लखनऊ, 2015), श्रीलाल शुक्ल इफको साहित्य सम्मान (जनवरी 2017) सहित कई सम्मान व पुरस्कार मिले हैं। हम श्री रामदेव  जी के चुनिन्दा साहित्य को ई अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों से समय समय पर साझा करने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है  मारीशस में गरीब परिवार  में बेटी की शादी और सामजिक विडम्बनाओं पर आधारित लघुकथा राज – भोग।) 

~ मॉरिशस से ~

☆ कथा कहानी ☆ — राज – भोग — ☆ श्री रामदेव धुरंधर ☆

कहा जाता है पुराने ज़माने में राज्य संचालन के नाम पर राजाओं के कानों में उल्टे – सीधे मंत्र फूँकने के लिए उनके नौ रत्न होते थे। यह सच हो तो इतनों के ही पेट भरने की खातिर राजाओं को न जाने कितने गरीबों के पेट में लात मारने के लिए सिपाहियों को दौड़ाना पड़ता होगा। गरीब रो – रो कर जब कहे मेरे पेट में लात न मारो तो उनसे कहा जाता होगा लात न मारें तो नौ रत्नों को क्या घास खिला कर चिकन – चाकन मुस्टंडा बनाएँगे। अत: हर हालत में तुम लोग लात खाओ और प्रार्थना में दिल खोल कर कहो उन मुस्टंडों का पेट इतना भर जाए कि भविष्य के लिए भी उन के काम आ सके। उनके लिए यहाँ जो प्रार्थना करो तुम्हारे मरने पर वह प्रार्थना तुम्हारे साथ जाए। भगवान से कहना एक विशेष कारण से प्रार्थना साथ ले कर आए हो। भगवन, अगला जन्म दो तो यह प्रार्थना हमारे साथ ही धरती पर जाए। इस प्रार्थना का मर्म यह है प्रभु, वे जो ‘नौ रत्न’ नाम से जाने जाते हैं उनका स्वास्थ्य इसी तरह अजर अमर हो तभी तो वे अपने सत्ता भोगी राजा के यहाँ नौ रत्न का सुख भोग कर सकेंगे।

यह जिस राजा की कहानी लिखी जा रही है वह निराला राजा था। वह चाहे नौ रानियाँ नहीं रखता, लेकिन रखता तो अठारह रत्न अवश्य रखता। उसने जैसा सोचा वैसा किया। उसने अपने निरालेपन की जय के लिए अठारह रत्न रख कर गरीबों के पेट में दोहरी लात मरवायी। इन अठारह रत्नों के कारनामे तो और निराले हुए। सभी अपनी – अपनी परिभाषा की एक – एक कहानी थे। अठारह रत्नों में जो अंतिम था वह अंधा था। क्रम में जो पहला था वह बहरा था। बाकी जो सोलह रत्न थे वे जब असेंबली में प्रवेश करते थे तो उनका आतिथ्य बहरा करता था और निकलते वक्त अंधा उन्हें रास्ता दिखाता था। इन अठारह रत्नों की बदौलत राजा ने आजीवन राज किया। इस पर एक महाकाव्य लिखा गया है। पर उसका दाम लाखों रूपए है। हमारे वर्तमान में जो राजनेता इस तरह का राजा बनने का शौक रखता है अपने ज्ञान वर्द्धन के लिए जन – कोष से वह महाकाव्य ज़रूर खरीदता है।

© श्री रामदेव धुरंधर

04 / 08 / 2017

संपर्क : रायल रोड, कारोलीन बेल एर, रिविएर सेचे, मोरिशस फोन : +230 5753 7057   ईमेल : rdhoorundhur@gmail.com

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक समीक्षा ☆ संजय दृष्टि – मैं सिमट रही हूँ — कवयित्री – रेखा सिंह ☆ समीक्षक – श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। आज से प्रत्येक शुक्रवार हम आपके लिए श्री संजय भारद्वाज जी द्वारा उनकी चुनिंदा पुस्तकों पर समीक्षा प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)

? संजय दृष्टि –  समीक्षा का शुक्रवार # 8 ?

?मैं सिमट रही हूँ — कवयित्री – रेखा सिंह  ?  समीक्षक – श्री संजय भारद्वाज ?

पुस्तक का नाम- मैं सिमट रही हूँ

विधा- कविता

कवयित्री – रेखा सिंह

प्रकाशन- क्षितिज प्रकाशन, पुणे

? फल्गु की तरह अंतर्स्रावी कविताएँ  श्री संजय भारद्वाज ?

भूमिति के सिद्धांतों के अनुसार रेखा अनगिनत बिंदुओं से बनी है। इसमें अंतर्निहित हर बिंदु में एक केंद्र होने की संभावना छिपी होती है। ऐसे अनेक संभावित केंद्रों का समुच्चय हैं कवयित्री रेखा सिंह। परिचयात्मक कविता में वे अपनी क्षमताओं, संभावनाओं और आत्मविश्वास का स्पष्ट उद्घोष भी करती हैं-

मैं तो रेखा हूँ

मुझमें क्या कमी…!

प्रस्तुत कवितासंग्रह में कवयित्री ने अपने समय के अधिकांश विषयों को बारीकी से छूने का प्रयास किया है। नारी विमर्श, परिवार, आक्रोश, विवशता, गर्भ में पलता स्वप्न, लोकतांत्रिक चेतना, प्रकृति, विसंगतियाँ, धार्मिकता, अध्यात्म जैसे अनेक बिंदु इस रेखा में समाहित है। अपने परिप्रेक्ष्य से शिकायत का स्वर गूँजता है-

मैं गाती / यदि गाने का मौका दिया होता

मैं हँसाती / यदि हँसने का मौका दिया होता

ये शिकायत नारी की विशाल दृष्टि और परिवर्तन की अदम्य जिजीविषा में रुपांतरित होती है। कवयित्री इला के अंतराल में समानेवाली सीता नहीं बनना चाहती। दीपिका तो अवश्य जलेगी भले उजाले में ही क्यों न जलानी पड़े। मीमांसा तार्किक है, उद्देश्य स्पष्ट है-

अंधेरे में जलाऊँगी दीपिका,

क्योंकि उजाले में

दीपिका का अस्तित्व

तुम नहीं समझ सके !

अपराजेय नारीत्व चरम पर पहुँचता है, अभिव्यक्त होता है-

ओ सिकंदर,

तुम, विश्वविजेता बन सकते,

मुझे नहीं जीत सकते..!

पर सिकंदर का प्रेम पाते ही सारी कुंठाएँ विसर्जित हो जाती हैं। प्रेम के आगे सारे वाद बौने लगने लगते हैं। कवयित्री का स्त्रीत्व कलकल प्रवाहित होने लगता है-

आज कोई सिकंदर,

मेरे आगे झुका है,

आज फिर किसी नल ने

दमयंती से स्वयंवर रचाया है,

आ, अब लौट चलें अपनी दुनिया में,

बाकी पल गुज़ार लेंगे हँसते-हँसते..!

मानव के भीतर की आशंका से कवयित्री रू-ब-रू होती हैं, प्रश्न करती हैं-

क्या होती हैं विभ्रम की प्रवृत्तियाँ?

रस्सी को सर्प समझने की रीतियाँ?

रेखा सिंह ने समाज को समग्रता से देखने का प्रयास किया है। ‘सास-बहू’ के उलझे समीकरणों के तार सुलझाने की ईमानदार कोशिश है ‘काश’ नामक कविता। ‘धरातल’ राजनीतिक-सामाजिक विषमता के धरातल पर खड़े देश की सांप्रतिक पीड़ा का स्वर बनती है। ‘जोगी’ ‘स्नातक-भिक्षुक’ बनाती हमारी शिक्षानीति पर व्यंग्य करती है तो ‘जंगल की ओर’ सभ्यता की यात्रा की दिशा पर गंभीर प्रश्न खड़े करती है। ‘आखिर क्यों’ और इस भाव की अन्य कविताएँ आतंकवाद की मीमांसा करने का प्रयास करती हैं।

शासनबद्धता का चोला ओढ़कर अन्याय को रोक पाने में असमर्थता व्यक्त करनेवाले भीष्म पितामह को आदर्श मानने से इंकार करना कवयित्री का सत्याग्रह है। ‘गंगापुत्र’ नामक इस कविता में दायित्व से बचने के बहाने तलाशनेवाली मानसिकता पर कठोर प्रहार है। संवेदना से लबरेज़ संग्रह की इन कविताओं में मनुष्य के सूक्ष्म मन को स्पर्श करने का सामर्थ्य है। ‘पुश्तैनी घर’ में ये संवेदना भारतीय प्रतीकों के संकेत से प्रखरता उभरी है। यथा-

तुलसी का चबूतरा

बन गया दीवार बंटवारे की..!

शहर द्वारा अपहृत होते गाँव ‘अनमोल’ कविता में सजीव हो उठते हैं-

सींचता बही जो बोता है,

उसके अंदर एक बच्चा रोता है..

झारखंड की हरित पृष्ठभूमि में रची गई इन कविताओं में प्रकृति का सुंदर चित्रण हुआ है। अधिकांश कविताओं में ऋतुओं का वर्णन शृंगार रस में हुआ है। संग्रह में कई गीत भी शामिल किए गए हैं। इनमें गेयता और मिठास दोनों हैं। पूरे संग्रह में आँचलिकता मिश्री-सी घुली हुई है और उसकी माटी की सुगंध हर रचना में समाहित है। ‘चंबर’, ‘मोजराई गंध’, ‘तुदन’ जैसे शब्द पाठक को कविता की कोख तक ले जाते हैं। ‘शिवजी की बरात’, ‘कल्पगा की धार’ जैसे प्रतिमान लोकसंस्कृति के स्वर को शक्ति प्रदान करते हैं। पपीहा तो कवयित्री के मन से निकलकर कई बार कविता के अनेक पन्नों की सैर कर आता है। ‘मल्हार’ कविता में पंद्रह अगस्त को तीज-त्यौहार से जोड़ना बेहद प्रभावी और सार्थक बन पड़ा है।

कवयित्री ने नारी विमर्श को एकांगी न रखते हुए एक ही कविता से क्यों न हो, पुरुष के मन की भीतरी परतों को टटोलने का प्रयास भी किया है। रेखा सिंह की कुछ हास्य कविताएँ भी इस संग्रह में सम्मिलित हैं। हास्य रस पर कवयित्री की पकड़ साबित करती है कि वे बहुमुखी प्रतिभा की धनी हैं।

शीर्षक कविता ‘मैं सिमट रही हूँ में प्रयुक्त सिमटना को मैं सकारात्मक भाव से सृजन के लिए आवश्यक प्रक्रिया के तौर पर देखता हूँ। बाहर विस्तार के लिए भीतर सिमटना होता है। यह संग्रह इस बात का दस्तावेज़ है कि कवयित्री का रचना सामर्थ्य लोहे के दरवाज़ों की नींव हिलाने में समर्थ है। कितने ही दरवाज़े लग जाएँ, वह ताज़ा हवा का झोंका तलाश लेंगी।

मैं सिमट रही हूँ,

अपने आप में,

धुआँकश कारागार में,

मेरे इर्द-गिर्द लग गए

लोहे के दरवाज़े..!

कवयित्री ने एक रचना में धरती के भीतर प्रवाहित होती फल्गु नदी का संदर्भ दिया है। रेखा सिंह की ये कविताएँ भी फल्गु की तरह अंतर्स्रावी हैं। भीतर ही भीतर प्रवाहित होने के कारण ये अब तक वांछित प्रकाश से वंचित रही हैं। ये अच्छी बात है कि अंतर्स्राव धरती से बाहर निकल आया है। अब इसे सूरज की उष्मा मिलेगी, चंद्र की ज्योत्स्ना मिलेगी। सृष्टि के सारे घात-प्रतिघात, मोह-व्यामोह, प्रशंसा-उपेक्षा सभी मिलेंगे। इनके चलते परिष्कृत होने की प्रक्रिया भी निरंतर चलती रहेगी।

फल्गु अब संभावनाओं की विशाल जलराशि समेटे गंगोत्री-सी कलकल बहने को तैयार है। अपने भूत को झटक कर उसे भविष्य की यात्रा करनी है।

अतीत के पन्ने,

उलटो न बार-बार,

चलते चलो,

कश्ती कर जाएगी

मझधार पार।

शुभाशंसा।

(श्रीमती रेखा सिंह का पिछले दिनों देहांत हो गया। वर्ष 2009 में प्रकाशित उनके कवितासंग्रह ‘मैं सिमट रही हूँ’ की यह समीक्षा दिवंगत को श्रद्धांजलि स्वरूप प्रस्तुत कर रहे हैं।)

© संजय भारद्वाज  

नाटककार-निर्देशक

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 440 ⇒ बा बू… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “बा बू।)

?अभी अभी # 440 ⇒ बा बू? श्री प्रदीप शर्मा  ?

हमारे बचपन के दोस्तों को अगर हम आज याद करें, तो उनके घरेलू नाम अनायास याद आ जाते हैं, आदमी कितना भी बड़ा हो जाए, उसकी बचपन की

पहचान कभी खत्म नहीं होती। आज जिन्हें लोग सम्मान से बाबूजी कहते हैं, वह बचपन में सिर्फ बाबू था। बचपन का गुड्डू आजकल गुड्डू भैया कहलाता है और कल का सरजू आज सरजू भैया हो गया है।

कहीं कहीं तो बचपन के लाड़ प्यार वाले नाम समय के साथ गुम हो जाते हैं, अब डॉक्टर गुप्ता को फूलचंद कहने वाला कोई नहीं बचा। मां बाप द्वारा बचपन में प्यार से दिया गया नाम, कुछ लोग बुढ़ापे तक अपने दिल में सहेजकर रखते हैं तो कहीं कुछ ऐसे भी बदनसीब होते हैं, जिन्हें बचपन का संबोधन अब नहीं सुहाता।

हाई सोसायटी में ऐसे बचकाने नाम शोभा नहीं देते। कॉल मी नाऊ ओनली प्रो. रस्तोगी। यह क्या रमेश रमेश लगा रखा है।।

उसे घर में बाबू कहते थे, बहुत कम लोग जानते थे। कॉलेज की नई नई दोस्ती थी। कुल इने गिने चार पांच तो सरदार दोस्त थे हमारे बचपन के। एक को हम मिनी कहते थे और एक था सलूजा। किसी को हम खनूजा कहते थे तो किसी को मनजीत। हमें बड़ा आश्चर्य होता था, इतनी कम उम्र में इन सबकी दाढ़ी मूंछ देखकर। हमने भी कभी बढ़ाई थी, लेकिन इतनी भद्दी लगी कि रातों रात साफ कर दी। आज यह हाल है, जिसकी दाढ़ी नहीं, वह मर्द नहीं।

भरे हुए बदन और घनी दाढ़ी मूंछ और साफे में एक लंबा चौड़ा सरदार कहीं से कहीं तक हमारा दोस्त नहीं लगता था, लेकिन हमारी बाबू से बहुत घुटती थी। मोहब्बत किसे कहते हैं, हम भले ही कभी ना जान सके हों, लेकिन एक नज़र में बाबू से हमें कब दोस्ती हो गई, कुछ पता नहीं चला।।

वह बड़ा मिलनसार और अच्छे पैसे वाले घर का था। उसके पिताजी का लकड़ी का व्यवसाय था।

कॉलेज की सभी गतिविधियों में वह सक्रिय भाग लेता था और एक सफल कॉलेज नेता के सभी गुण उसमें विद्यमान थे। दिन भर कॉलेज और शाम को एम.जी.रोड पर एवरफ्रेश के पास हम दोस्तों की शाम की सभा प्रारंभ होती थी। कॉलेज की राजनीति और क्लास की लड़कियों के किस्से कभी खत्म ही होने का नाम नहीं लेते थे।

अन्तरंगता शब्द आत्मीयता का करीबी लगता है। बाबू बहुत अच्छा गाता था। कॉलेज के सोशल गैदरिंग में इसी कारण उसके जलवे थे। फुर्सत के समय में, फिल्म आया सावन झूम के, का रफी का गीत, मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे, इतना तल्लीन होकर गाता था, कि समां बंध जाता था। तब हमने जगजीत सिंह का नाम नहीं सुना था। फिर भी हमारा बाबू किसी जगजीत से कम नहीं था।।

कॉलेज की एक लड़की से उसे एकांगी प्यार हो गया।

उससे मिलने के लिए उसने कॉलेज की ही एक अन्य लड़की को दीदी तक बनाया, लेकिन फिर भी बात नहीं बनी। प्यार में पागल कैसे हुआ जाता है, बाबू को देखकर पता चला। फिल्में देखना और फिल्मी गाने गुनगुनाना हमारा आम शौक था। कॉलेज पढ़ने कौन जाता था, और कौन पढ़ाना चाहता था। वह दौर कॉलेज में जी. टी. (जनरल तड़ी) हड़ताल और कर्फ्यू का था। ले देकर तीन चार कॉलेज तो थे शहर में। मेडिकल कॉलेज, आज का जीएसआयटीएस, क्रिश्चियन कॉलेज और गुजराती कॉलेज के छात्रों में लड़कियों की छेड़छाड़ को लेकर अक्सर मुठभेड़ हुआ करती थी। तब, हम किसी से कम नहीं, जैसी फिल्मों का, कहीं से कहीं तक कोई पता नहीं था।

हो सकता है, हम जैसों से ही प्रेरणा पाकर ऐसी फिल्मों का निर्माण हुआ हो।

बाबू के बड़े भाई बड़े अंतर्यामी थे। बाबू ने कल रात को कौन से फिल्म देखी, वह आसानी से जान जाते थे। हमारे बाबू की एक गंदी आदत थी, जो फिल्म रात को देखी, उसी का गाना सुबह सुबह गुनगुनाने लगते। चोरी के बाद अब कैसे करें सीना जोरी। हा पहा चोर सापड़ला ! आखिर चोर पकड़ा गया।।

हमारी दोस्ती खाने पीने से ही बढ़ती थी। बाबू का बढ़ता शरीर था, जो खाता, नजर आ जाता था। इधर आज एक कचोरी समोसा खाया, उधर दूसरे ही दिन मुंह पर दो मुंहासे नज़र आ गए। जितनी कचोरी समोसे, उतने मुंहासे ! आप आसानी से गिन सकते थे, बाबू ने कल कितनी कचोरी खाई थी।

बाबू का कॉलेज का हमारा सिर्फ एक साल का साथ रहा, फिर हम कहां तुम कहां ! वह कहीं नहीं गया, लेकिन जिन्दगी का ढर्रा ही बदल गया। किबे कंपाउंड पर बाबू ने ऑटो पार्ट्स की दुकान डाल ली। शादी और घर गृहस्थी के बाद किसे यार दोस्त नजर आते हैं। मिलना हो तो दुकान पर आ जा। दोस्त दोस्त होता है, लेकिन ग्राहक भगवान होता है।

एक रविवार मिलता था, वह भी उस त्यागी पुरुष ने मैकेनिक समुदाय को समर्पित कर दिया। बाबू एक पक्का व्यवसायी बन गया।।

एक दिन फुर्सत निकालकर, छुट्टी के दिन, अपॉइंटमेंट लेकर, बाबू के घर पहुंच ही गया कलयुग का यह सुदामा।

घंटी बजाने पर किसी बालिका ने द्वार खोला, किससे मिलना है आपको ? बेटा आपके पापाजी से ! उसने मुझे देखा और भांप लिया, अच्छा आपको बड़े पापाजी से मिलना है। आपके बारे में बता रहे थे। आप बैठिए, अभी आते हैं।

और कुछ ही देर में बड़े पापाजी तशरीफ़ ले आए।

बड़ा परिपक्व और गंभीर हो गया था बाबू। ऑटो पार्ट्स की दुकान बच्चों ने संभाल ली थी। घर नाती पोतों से हरा भरा लग रहा था। आजकल ज्यादा समय गुरुद्वारे में ही दे रहा हूं, बाबू बता रहा था।

दोस्ती के दर से गुरु का द्वार इस उम्र में एक अच्छा विकल्प है, मैं सोच रहा था। हरि का द्वार ही हरद्वार है। वही गुरुद्वारा है और वही तो है हरमंदर। चाय की आखरी चुस्की के साथ ही बाबू के गुरुद्वारे जाने का वक्त हो गया था। दोस्त से विदा तो लेनी ही थी। बचपन तो खैर लौटकर नहीं आता, कुछ दोस्त भी वक्त की तरह हाथ से छूटते चले जाते हैं। दोस्ती भी बहते पानी की तरह ही तो है। बहता पानी निर्मला।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #244 ☆ भावना के दोहे… जल ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं भावना के दोहे… जल)

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 244 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे… जल ☆ डॉ भावना शुक्ल ☆

रोज गिरे बिजली यहाँ, कष्टों का भंडार।

दीन दुखी के भाग में, नहीं सुखद आधार।।

*

बारिश रस्ता भूलती, सूखा पड़ा है गाँव।

गरमी का पुरजोर है, मिले नहीं है छाँव।।

*

बूँद – बूँद जल के लिए, होता हाहाकार।

आखिर ऐसा क्यों हुआ, अब तो करें विचार।।

*

 नैना बहते बाढ़ से, कैसे रोकूँ नाथ।

दर्शन देना प्रभु मुझे, तेरा ही तो साथ।।

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : bhavanasharma30@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #226 ☆ दो मुक्तक… इंसानियत ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है दो मुक्तकइंसानियत आप  श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 226 ☆

☆ दो मुक्तक इंसानियत ☆ श्री संतोष नेमा ☆

धर्म का अपने मान  करो तुम

बेशक खूब गुणगान करो तुम

धर्म  स्थलों को पर मत तोड़ो

गैरों  का न अपमान करो तुम

*

हिंसा  का  धर्म  में  स्थान  नहीं है

तोड़- फोड़ आगजनी शान नहीं है

इंसा  की  इंसा से  नफरत  करना

हैवानियत  है   यह  ज्ञान  नहीं  है

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

रिष्ठ लेखक एवं साहित्यकार

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 70003619839300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares