मराठी साहित्य – विविधा ☆ ‘मनाच्या लहरी‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ मनाच्या लहरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मनाच्या लहरी की लहरी मन !!!

अर्थात वरील विषय वाचल्या वाचल्या आपल्या मनात देखील असाच विचार आला असेल. हो न ? अहो, साहजिकच आहे. कळायला लागल्यापासूनची मनुष्याला असलेली मनाची सोबत मनुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम असते.

मन कसं असतं ? याची विविध उत्तरे देता येतील. आणि ही सर्व उत्तरे जरी खरी असली तरी मोठी गमतीशीर आहेत. कोणी त्याला चंचल म्हणेल, कोणी अचपल म्हणेल. कोणी अधीर म्हणेल तर कोणी बधिर म्हणेल. कोणी मनाला धीट म्हणेल तर कोणी सैराट म्हणेल. इतकं सार वर्णन केलं तरी कोणीही मनाचे इत्यंभूत वर्णन केले आहे असे छातीठोक पणे सांगू शकत नाही. कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्या प्रमाणे आपले मन कसे आहे ? तर

“अचपळ मन माझे नावरे आवरीता’

आपले मन हे समुद्रासारखे विशाल असते, अथांग असते. कधी कधी तर स्वतःला देखील आपल्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. एकाच वेळेला मन हे खंबीरही असते आणि तितकेच नाजूकही असते. ज्या प्रमाणे समुद्राच्या लाटांमध्ये फेस असतो, वाळू असते आणि लाटांबरोबर वाहून येणारे ओंडके सुद्धा असतात. अर्थात या ओंडक्याचा समुद्राच्या स्वाभाविक गती-प्रगती मध्ये फारसा फरक पडत नाही. पण मनुष्याच्या बाबतीत बरेच वेळा उलट घडते. कारण मनुष्याला आपले मन सागरा इतके विशाल करणे जमतेच असे नाही. ज्याप्रमाणे शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी किंवा योग्य त्या प्रमाणात ताणण्यासाठी व्यायामाची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे मनाचे व्यायाम करणारा मनुष्य आपले मन योग्य त्या वेळी योग्य त्या प्रमाणात ताणू शकतो, विशाल करू शकतो. अर्थात हा सरावाचा भाग आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही.

गुंतणं हा आणिक एक मनाचा रंग आहे किंवा स्वभाव आहे. मनाच्या ह्या स्वभावाचा गैरफटका बरेच वेळा मन धारण करणाऱ्या देहाला सोसावा लागतो, मग त्याची इच्छा असो व नसो.

मन हे एक न दिसणारं तरीही असणार मानवाचे महत्वाचे इंद्रिय आहे. आजपर्यंत भलेभले थकले, पण मनाचा अंत खऱ्या अर्थाने लागला असे म्हणणारे अतिदुर्मिळ!! मला मन कळलं, मी कोणाच्याही मनातलं जाणू शकतो असे म्हणणे म्हणजे मोठी गंमत. कारण मनुष्य स्वतःच स्वतःचे मन जाणू शकत नाही तिथे दुसत्याचे मन काय जाणणार ? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की मन म्हणजेच ‘मी’ आहे. त्यामुळे भगवंताचा शोध आणि ‘मी’ चा शोध यामध्ये मूलभूत फरक काहीच नाही. पण व्यक्तिसापेक्ष त्यात फरक मानला जातो. म्हणून काही लोकं बाहेर देव शोधतात, तर काही आपल्या अंतरात देवाचा शोध घेतात.

सर्व संतांनी मनाचे वर्णन केले आहे.

“अचपळ मन माझे नावरे आवरीता”

 – समर्थ रामदास

मन वढाय वढाय 

उभया पिकाताल ढोर

किती हाकल हाकलं

फ़िरि येत पिकावर

 – संत कवयित्री बहिणाबाई

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धिचे कारण”,

–  संत तुकाराम महाराज

“तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी”, अशी काहीशी अवस्था प्रत्येक मनुष्याची असते. मनाचे वर्णन कितीही केले तरी कमीच पडेल. मनाच्या लहरी किती आणि कशा कार्यरत असतात याचे नेमके असे कोष्टक नाही. मन स्थिर करणे म्हणजे एका अर्थाने त्या लहरींवर स्वार होणे. दैनंदिन जीवनात सामान्यपणे मनाच्या लहरी मनुष्यावर स्वार होतात आणि मनुष्याची अक्षरशः फरफट होते. खरंतर मनुष्याने या चंचल लहरींच्या छाताडावर स्वार होऊन जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे. थोड्याश्या प्रयत्नाने हे सहज साध्य होऊ शकते, फक्त तशी प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी.

“मनातल्या मनात डोकावता यावे।

मनातल्या शक्तीला जागवता यावे।

लहरी मनाच्या जाणता यावे, आणि।

जाणलेल्या लहरींवर स्वार व्हावे।।”

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माझं काय चुकलं ??? — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ माझं काय चुकलं ???  — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

शाळेपासूनच्या त्या दोघी घट्ट जिवलग मैत्रिणी. एका बाकावर बसणाऱ्या अभ्यास एकत्र करणाऱ्या आणि वर्गात मोठमोठ्यांदा हसल्याने बाईंची शिक्षा सुद्धा एकत्रच खाणाऱ्या. सगळ्या शाळेत यांची जोडी अगदी प्रसिद्ध होती. शाळेच्या गॅदरिंगमध्ये सख्या पार्वत्या, हरतालका असे फिशपॉंड्सही याना मिळालेले! मोना आणि सीमा यांची जोडी होतीच तशी. जवळच रहायच्या दोघीही आणि अजिबात करमत नसे एकमेकांशिवाय दोघीना. खरं तर मोना जास्त हुशार होती. तिचं गणित म्हणजे अतिशय उत्तम आणि सीमाच्या भाषा उत्कृष्ट ! निबंधाचे बक्षीस सीमाला दर वर्षी ठरलेलेच ! मोनाची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सीमाला आई नव्हती आणि भाऊ फारसा न शिकता कुठे तरी नोकरी करायचा. पण सीमा फार समजूतदार होती. आहे त्यात आनंदी रहायचा स्वभाव होता सीमाचा.

मुली मोठ्या झाल्या आणि मोना कॉलेजला सायन्सला गेली. सीमा आर्टस्ला. दोघींच्या वाटा वेगळ्या झाल्या पण मैत्रीत कधी अंतर नाही पडलं. कायम भेटत राहिल्या दोघीही. सीमा बी ए झाली आणि तिनं बी एड केलं. तिला एका चांगल्या शाळेत नोकरीही मिळाली. मोना एका कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून लागली. मोनाला तिच्याच कॉलेज मधल्या एका सहकाऱ्याने मागणी घातली आणि मोनालाही तो आवडला होताच. आईवडिलांचीही या जावयाला पसंती होती आणि मोनाचं लग्न थाटामाटात झालं देखील. मोना आपल्या संसारात रमून गेली.

सीमाच्या लग्नाचं बघायला मात्र कोणीच नव्हतं आणि तिच्या मावश्या मामांना सीमा कधी फारशी चिकटून नव्हतीच. वय वाढत गेलं आणि सीमा शाळेतही प्रिंसिपल होणार होती काहीच वर्षात. मोनाला या काळात दोन मुलं झाली आणि अजूनही सीमाची आणि तिची मैत्री घट्ट होतीच.

मोनाच्या घरी वेगळीच कथा होती. घरचे लोक, भाऊ, आईवडील सगळ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन मोनाच्या मोठ्या दिरानं एका पंजाबी मुलीशी लग्न केलं मुंबईला बदली करून घेतली. संतोषला नोकरी चांगली होती. चार वर्षे चांगली गेली आणि नंतर मात्र सतत भांडणं होऊ लागली त्यांची ! एक दिवस ती मुलगी न सांगता सगळे दागिने पैसे घेऊन निघूनच गेली. सगळं घर धुवून नेलं तिनं. ऑफिस मधून येऊन बघतो तर अक्षरशः घर रिकामे. तिने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि संतोषचा एक वर्षात घटस्फोट झाला. घरचे सगळे हताश झाले. हे होणार हे माहीतच होते सगळ्याना, पण त्यावेळी संतोष कोणाचे ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. आता मात्र आईवडिलांना त्याची काळजी वाटायला लागली. तरुण मुलगा एकटा असा कसे आयुष्य काढणार असं वाईटही वाटू लागलं त्यांना.

मोनाला हे सगळं दिसत होतं. ती सीमाच्या घरी गेली आणि म्हणाली ‘चल. बाहेर कुठेतरी मस्त खाऊया काहीतरी. आज मी डबा विसरले न्यायला ! तू नको आता घरी करत बसू बरं का. चल बघू. ‘ मोनाने सीमाला बाहेरच काढले. एका छानशा हॉटेल मध्ये गेल्या दोघी. ‘सीमा, तुझ्या लग्नाचं बघायला तर कोणाला सवडच नाही. तिशी उलटून गेली आपली. करणारेस का लग्न कोणी मिळाला तर?’ सीमा म्हणाली, ‘ मिळायला नको का? करीन मला त्याने पसंत केले तर. मला नाहीये का ग हौस संसाराची? पण कोण बघणार मला स्थळ?’

मोना म्हणाली, “ हे बघ सीमा. नीट ऐकून घे. माझे भावजी अतिशय चांगले आहेत. करतेस का त्यांच्याशी लग्न? “ मोनाने तिला सगळी हकीगत सांगितली.

त्यांचे पहिले लग्न, मग घटस्फोट, सगळं नीट सांगितलं आणि म्हणाली, “ बघ निर्णय तुझ्या हातात आहे. माझी जबरदस्ती तर मुळीच नाही. पस्तिशी उलटलेल्या बाईला आता प्रथमवर मिळणंही अवघडच. पाहिजे तर भावजीना भेट, बोला दोघे आणि मगच निर्णय घ्या. हे काही नवथर तरुण मुलांचं लग्न नाही तर तडजोडही आहेच सीमा. सावकाश सांग घाई नाही. ”

सीमा संतोष बाहेर चार वेळा भेटले. , सीमा म्हणाली “ मोना माझी आणि संतोषचीही हरकत नाही लग्नाला. मला नोकरी सोडावी लागेल पण मी दोन वर्षे पुरी करीन म्हणजे मला ऐच्छिक निवृत्ती घेता येईल आणि पेन्शन मिळेल. संतोष मुंबईहून अप डाऊन करील. चालेल ना? मी मग तुझ्या घरीच राहीन. कधीकधी मी जाईन मुंबईला. हे चालेल का?आधीच तुझ्या घरात खूप माणसं आहेतच. ” 

मोना म्हणाली “काही हरकत नाही सीमा!भावजी आणि तुझंही घर उभं रहाणार असेल तर ही तडजोड तू जरूर कर. नोकरीचे सगळे फायदे घे आणि मग जा मुंबईला. दोन वर्षे कशीही जातील ग. ‘

मोना अतिशय सरळपणे म्हणाली. घरी जाऊन सासू सासऱ्यांना हे सांगितले आणि सीमा संतोष पण तयार आहेत लग्नाला हेही सांगितले. सगळ्याना खूप आनंद झाला. ओळखीचीच मुलगी घरी येणार याचा आनंद आणि विश्वास सुद्धा होता सगळ्याना.

अगदी साधं लग्न करून सीमा मोनाच्याच घरात आली. तिचीही नोकरी चालू ठेवणार होतीच ती. मोनाची तर सकाळी केवढी धावपळ असायची. पोळ्याच्या बाई उशिरा येत त्या आधी मोना आपल्या पुरत्या चार पोळ्या करून घेई आणि बाकी सगळं बाई आल्या की उरकत. सासूबाई खूप मदत करायच्या मोनाला. बाईंकडून सगळं करून घ्यायचं, मुलांचे डबे भरून द्यायचे. सगळं नीट सुरळीत चालायचं. सीमा संतोष आठ दिवस बाहेर फिरून आले. चार दिवसांनी संतोष मुंबईला जाणार होता आणि सीमा पण शाळेत जाणार होती.

मोना घाईघाईने आवरून डबे भरून निघून गेली. सासूबाई उठून बघतात तर सीमा अजून उठली नव्हतीच. त्या मुकाट्याने स्वयंपाकघरात गेल्या आणि बाकीचे काम चालू केले त्यांनी.

आठ वाजता सीमा उठून स्वयंपाकघरात आली. सासूबाई म्हणाल्या, “ चहा घेतेस ना? घे आणि उद्यापासून लवकर उठ. तिकडे काय करत होतीस तू डब्याचे? “.. “ मी माझ्या पुरत्या दोन पोळ्या भाजी करून नेत होते. शाळा 11 वाजता असते माझी. लवकर उठून काय करायचं असतं मला? “

“ हे बघ. इथे तू सासरी आली आहेस ना. मोना काहीच बोलणार नाही पण मी सांगते. मला मदत करत जा आणि अशी एकटीपुरती भाजी पोळी नाही करून चालणार. बाई येतीलच पण त्यांनाही मदत लागते ती करायला हवी. उद्या येताना मोनाला विचारून किती लागते काय लागते ते सामानही आण. सीमा, घर हे सगळ्यांचं असतं. नशीब थोर म्हणून अशी चांगली मैत्रीण आणि चांगलं घर मिळालं तुला. ” सासूबाई तिथून निघून गेल्या.

सलामीलाच ही चकमक झाली तर आता पुढं कसं व्हायचं असा विचार पडला सासूबाईंना. होईल ते बघावे असा विचार करून त्या गप्पच बसल्या. तयार असलेली भाजीपोळी घेऊन सीमा निघून गेली. ना तिने मागचे आवरले ना जाताना सांगून गेली कोणाला ! 

मोना संध्याकाळी घरी आली. सासूबाईंनी हे सगळं सांगितलं आणि म्हणाल्या, ” कठीण आहे हो मोना.. अग, काय तुझी मैत्रीण !अशीच का वागायची ही माहेरी? “ मोना म्हणाली, “ जाऊ द्या हो आई. बघूया काय काय होते ते. आपलं जाऊ दे. , भावजींचा संसार झाला म्हणजे पावलं. ” संध्याकाळी सीमा घरी आली. संतोष मुंबईला गेलेला होता. आता सीमाला दोन वर्षे मोनाकडे राहून काढायची होती. मोना संध्याकाळी तिच्या खोलीत गेली. “ घे ग मस्त गरम चहा. चल, बाल्कनीत बसून घेऊया “

सीमा म्हणाली, “ मोना, मला कामाची सवय आहे पण माणसांची नाही. मला समजत नाही कसं वागायचं ते. आमच्या घरी तू बघतेस ना बाबा, मी आणि भाऊ. कोणी कोणाच्या अध्यात मध्यात नसते. मला इतक्या माणसात वावरायची सवय नाही ग. तू शिकव मला मी शिकेन. ” मोना बरं म्हणाली. मनात म्हणाली, माणूस संगतीला आणि पंक्तीला आल्याशिवाय समजत नाही हेच खरं.

दुसऱ्या दिवशी मोनाला सुट्टी होती. तिने सीमाला हाक मारली. अजून उठली नव्हतीच ती. “ सीमा, आज आपल्या बाई येणार नाहीयेत. चल दोघी मिळून करून टाकूया स्वयंपाक “. मोना म्हणाली.

सीमा म्हणाली, “ काय करायचं ते सांग मला. मला सगळं उत्तम येतं करता. आज बघ मी करते ते आवडतं का. तू बस ना बाहेर. फक्त मला अंदाज सांग हं मोना. मला समजणार नाही म्हणून. ” मोनाने सगळं सांगितलं आणि ती स्वयंपाकघराच्या बाहेर आली.

सासूबाई हळूच म्हणाल्या, ” बाई ग. करणार का ही नीट सगळं? पिठलं भात करायची वेळ येते आपल्यावर? “ हसून मोना म्हणाली “ बघूया. मलाही माहीत नाही हो तिला काय येतं ते “.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ८ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे – संपर्क क्र. ९८६९४८४८०० )

(काही तांत्रिक कारणामुळे ” माझी जडणघडण ” या लेखमालिकेचा भाग आठवा दि. २७/८/२४ रोजी प्रकाशित होऊ शकला नाही, तो आजच्या अंकात प्रकाशित करत आहोत. वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)

 आनंद
आमच्या घरासमोर “गजाची चाळ” होती. वास्तविक चाळ म्हटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येते तशी ती चाळ नव्हती. एक मजली इमारत होती आणि वरच्या मजल्यावर गजा आणि दोन कुटुंबे आणि खालच्या मजल्यावर तीन कुटुंबे राहत होती. पण तरीही गल्लीत ती “गजाची चाळ” म्हणूनच संबोधल्या जात असे. गजा मालक म्हणून तो राहत असलेला घराचा भाग जरा ऐसपैस होता. वास्तविक गल्लीतल्या कुठल्याच घराला (आमच्याही) वास्तू कलेचे नियमबद्ध आराखडे नव्हतेच त्यावेळी. कुठेही कशाही लांब अरुंद खोल्या एकमेकांना जोडल्या की झाले घर. पण अशा घरातही अनेकांची जीवने फुलली हे महत्त्वाचे.

गजाच्या घरात त्याची आई आणि त्याच्या लांबच्या नात्यातील बहिण “शकू” राहायचे आणि येऊन जाऊन बरीच माणसं असायची तिथे. कधी कधी गजाचे वडीलही दिसायचे मात्र गजा आणि शकू या बहीण भावांच्या नात्याबद्दल मात्र बऱ्याच गूढात्मक चर्चा घडायच्या.

गजाकडे आम्हा मुलांचं फारसं जाणं-येणं नव्हतं, पण गजाच्या शेजारी राहणाऱ्या दिघ्यांच्या कुटुंबातला आनंद आमच्यात खेळायला यायचा. आनंद, दिवाकर, अरुणा आणि त्याचे आई वडील असा त्यांचा परिवार होता.

आनंदची आई भयंकर तापट होती आणि सदैव कातावलेली असायची. त्यामुळे आम्ही आनंदच्या घरी खेळायला कधीच जात नसू पण आनंद मात्र आमच्यात यायचा. आम्ही त्याला आंद्या म्हणायचो. पुढे तोच “आंद्या” “आनंद दिघे” नाव घेऊन शिवसेनेचा एक प्रमुख नेता म्हणून नावारूपास आला ते वेगळं. पण माझ्या मनातला “आनंद” मात्र त्यापूर्वीचा आहे.

बालवयात आम्हा साऱ्या मुलांना फक्त खेळणं माहीत होतं. भविष्याची चिंताच नव्हती. पुढे जाऊन कोण काय करेल, कसे नाव गाजवेल याचा विचारही मनात नव्हता आणि “आनंद” अशा रीतीने लोकनेता वगैरे होण्याइतपत मजल गाठेल असे तर स्वप्नातही वाटले नाही कारण साध्या साध्या खेळात सुद्धा तोच प्रथम आऊट व्हायचा आणि आऊट झाल्यावर कोणाच्यातरी घराच्या पायरीवर गालावर हात ठेवून, पाय जुळवून पुढचा खेळ पहात बसायचा तेव्हा तो अगदी “गरीब बिच्चारा” भासायचा.

आज हे लेखन करत असताना खूप आठवणी उचंबळत आहेत. “आनंदची” खूप आठवण येत आहे. पुन्हा लहान होऊन त्याच्याशी संवाद साधावासा वाटतोय. तो आता या जगातही नाही. मनात दाटलेल्या भावना पत्रातूनच व्यक्त कराव्यात का ? कदाचित पत्र लिहिताना क्षणभर तरी त्याच्याशी बोलल्यासारखे वाटेल म्हणून.

प्रिय आनंद,
स. न. वि. वि.
खरं म्हणजे मला, तुला पत्र लिहिताना “सनविवि” वगैरे ठरलेले मायने नव्हते घालायचे. कारण त्यामुळे आपल्या मैत्रीच्या नात्यात उगीचच औपचारिकपणा जाणवतो. आपल्या मैत्रीत आपलं निरागस, आनंदी, खेळकर बाल्य अशा पारंपरिक शब्दांनी उगीचच बेचव होतं. आणि मला ते नको आहे.
मी तुझा बायोपिक पाहिला. आवडला. तुझ्या भूमिकेतल्या त्या नटाने सुरेख अभिनयही केलाय. संहिता लेखन छान. तुझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर वास्तववादी प्रकाश पाडलाय. पण चित्रपट बघताना मला मात्र, ’टेंभी नाका, धोबी गल्ली ठाणे’ इथला अर्ध्या, खाकी चड्डीतला, मळकट पांढर्‍या शर्टातला मितभाषी, काहीसा शेमळट, भित्रा, गरीब स्वभावाचा पण एक चांगल्या मनाचा आनंद नव्हे आंद्या आठवत होता. जो माझा बालमित्र होता. तो मात्र मला या चित्रपटात सापडला नाही. आणि मग माझं मलाच हंसू आलं अन् वाटलं तो कसा सापडेल ? इथे आहे तो एक जनमानसातला प्रमुख राजकीय नेता आणि माझ्या मनातला आनंद होता तो माझ्याबरोबर, विटीदांडु खेळणारा, गोट्या, डबा ऐसपैस, थप्पा, लगोरी खेळणारा आनंद.. आईची रागाने मारलेली हाक ऐकली की खेळ अर्धवट सोडून पटकन घाबरत, धावत घरी जाणारा आनंद. लहान भाऊ, बहिणीला सांभाळणारा आनंद.
एकदा मी तुला विचारलं होतं “तू आईला इतका कां घाबरतोस ?”
तू एव्हढंच म्हणाला होतास, “मला तिला आनंदी ठेवायचे आहे.. ”
आनंद, तुझ्या नावात आनंद होता पण तू कुठेतरी अस्वस्थ, खिन्न होतास का ? लहानपणी कळत नव्हते रे या भावनांचे खेळ.
एक साधं गणित मी तुला सोडवून दिलं होतं आणि तुझी खिल्लीही उडवली होती.
“काय रे ! इतकं साधं गणित तुला जमलं नाही ? इतका कसा ढब्बु ?” तू वह्या पुस्तकं घेऊन फक्त निघून गेलास.
पण नंतर तू किती मोठी राजकीय गणितं सोडविलीस रे..
पुढच्या काळात तुझ्याविषयीच्या पेपरात येणार्‍या बातम्या, फोटो. लोकप्रियता वाचून मी थक्क व्हायची. अरे ! हाच का तो आनंद ? मी कधी विश्वासच ठेऊ शकले नाही.
मी माहेरी ठाण्याला असताना एक दोनदा तुला भेटलेही होते. पण तू घोळक्यात होता. माझा बालमित्र आनंद, तो हा नव्हता. वाईट वाटले मला.
पेपरात जेव्हां तुझ्या निधनाची बातमी वाचली, उलट सुलट चर्चाही वाचल्या. एका राजकीय नेत्याचे ते निधन होते. पण माझ्यासाठी फक्त माझ्या बालमित्राचे या जगात नसणे होते हे तुला कसे कळावे आणि त्यासाठी माझ्या डोळ्यात अश्रू होते.
चित्रपट बघून मी घरी आले. मैत्रीणीचा फोन आला.
“कसा वाटला मुव्ही ?”
“छानच”
अग ! आनंद आमच्या धोबी गल्लीत आमच्या घरासमोर रहायचा…
पण हे काही मी नाही सांगितले तिला.
कारण आपलं वेगळं नातं मी मनात जपलंय. उगीच एका राजकीय नेत्याशी असलेल्या नात्याचं मला मुळीच भांडवल करायचं नव्हतं आणि नाही. माझ्यासाठी फक्त ढब्बु आंद्या. कसं असतं ना लहानपण ? मुक्तपणे एकमेकांशी भांडणे, वाट्टेल ती नावे ठेवणे, टिंगलटवाळी करणे आणि तरीही मैत्रीच्या नात्यात कधीही न येणारी बाधा.. म्हणून का ते रम्य बालपण ?
पण आनंद मला मनापासून तुझा अभिमान आहे. तुझ्या बालवयातल्या प्रतिमेसकट.

तुझी
बालमैत्रीण.

माझं पत्र वाचून तुला नक्की काय वाटेल याचा विचार करत असताना मला आताही “गजाची चाळ” आठवते.
काही वर्षांपूर्वी बदललेल्या धोबी गल्लीत गेले होते तेव्हा “गजाच्या चाळीचा” चेहराच बदलला होता. त्या संपूर्ण इमारतीचं शिवसेनेच्या कार्यालयात रुपांतर झालं होतं. त्या कपाळावर गंध, दाढीधारी प्रतिमेत लपलेला आनंदचा चेहरा मी शोधत राहिले…

क्रमश: भाग आठवा.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी घर आवरत्येय… मोकळी होत्येय की गुंतत्येय !!!!! ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

मी घर आवरत्येय… मोकळी होत्येय की गुंतत्येय !!!!! डॉ. माधुरी जोशी 

अखेर सह्या झाल्या. बिल्डिंग री डेव्हलपमेंटला गेल्याचं शिक्कामोर्तब झालं…. थोडा अवधी होता हातात… नवीन जागा मिळण्याचा भविष्यातला आनंद खुणावत होता…. आणि या भिंती मधला सारा भूतकाळ सतत सामोरा येत होता… आता चमचा नॅपकिन्स पासून कागदपत्रांपर्यंत किती आणि काय काय आवरायचं होतं. मनात ही वास्तू, आणि काही वस्तू सोडून जायची हलकीशी वेदना होती… पण घर आवरायलाच हवं होतं आणि खरं म्हणजे मनही!!! कामाला लागले आणि लक्षात यायला लागलं आवरणं कमी होतंय आणि आठवणींच्या साम्राज्यात गुंतणंच वाढतंय…

किती खोलवर रुजलेल्या, रुतलेल्या स्मृती.. एकेक आठवणींचं गाठोडं…. समोर आलेली फोटोंची पिशवी तर मनाला सगळ्यात जीवंत करणारी… सणवार, वाढदिवस, लग्नकार्य, ट्रीप्स, बक्षिस समारंभ, ट्रॉफ्या, एअरपोर्टवर मुलांना शिक्षणासाठी जातांना भरल्या डोळ्यांनी हासत दिलेले निरोप, दृष्टी आड, काळाच्या पडद्याआड झालेले वडीलधारे, कुणी सोबती, कुणी अगदी क्वचित भेटलेले तरी जवळचे, वाड्यातले, किती किती आठवणी…

तर काही कागदावर पेनानं उमटलेली अक्षरं, मनातल्या विचारांना सजवणारी… सुख दुःखाची, यशापयशाची, मन मोकळं करणारी…. कधी वर्तमानपत्रांनी दाद देऊन छापलेली, काही कविता, कार्यक्रमाची निवेदनं, त्यावरंच कुठल्याशा कोपऱ्यात लिहीलेले पत्ते, फोन नंबर्स…. चाललं मन गुंतत….

आणि अभ्यास, नोट्स, नोंदी, फेअर वर्क…. माझं संगीतातलं, मुलांचं इंजिनिअरिंगचं, यांचं गड किल्ल्यांचं… सुटत चाललेले, पिवळे पडलेले, क्वचित तुकडे पडणारे…. किती किती जुने कागद…. खूप दिवसात सापडंत नव्हतं ‘ ते ‘ पुस्तक…. कशात तरी दडलेलं. आनंदाच्या भरात तेच चाळलं… गुंतलं वेडं मन… अचानक सामोऱ्या येणाऱ्या जुन्या पावत्या… बिलं…. जगण्यातला इतक्या वर्षांचा आर्थिक आलेख मांडणाऱे… फोडायचंच राहिलेलं एखादं आहेराचं पाकिट आणि अमक्याकडून केंव्हातरी आलेला पण आज मिळालेला आहेर… आपलेच पैसे परत छुपा आनंद देणारे… मग ते पाकिट देणाऱ्यांच्या आठवणी… एखादी कपड्याखाली जपून ठेवलेली अन् आता चलनातंच नसलेली नोट…. चाललं… चाललं मन हिंडायला…. गंमत म्हणजे हे सारं आपल्या जागी होतंचकी.. निवांत, शांत पहुडलेलं…. या इथून निघण्यानी ते निघालं जागेवरून…. मोकळा श्वास घेतला कागदांनी…. स्मृती वगैरेंचे कागद परत आत गेले पाऊचमधे आणि सटरफटर गेले केराच्या टोपलीत… किती पसारा, , किती कागद, , किती काय जपलेलं, चुकून राहिलेलं, उगीच सांभाळलेलं…. आवरलं ते सगळं खरं पण मन मात्र आठवणींच्या गुंत्यात गुंतलेलं राहिलं….

इथून निघेपर्यंत स्वयंपाकघरात जेवणखाण बनणार होतं… ते शेवटी आवरू असं ठरवलं खरं…

पण रोज लागणाऱ्या भांड्यांपेक्षा किती तरी जास्त काही भांडी होतीच…. अनेक वर्ष जमवलेली. भांडी…. २५ लोक आले तरी घरात तयार असणारी वेळोवेळी घेऊन जमवलेली, हौसेची, आवडीची, मुलांची मुद्दाम नावं घालून घेतलेली, तर काही आहेरात आलेली, नावं नसलेली पण पदार्थ घालून शेजारपाजारची आलेली कन्फ्यूज्ड भांडी, मी जपून ठेवून मालक शोधणारी, काही तर बॉक्स मधूनही न निघालेली… कप, मग्ज्, न लागणाऱ्या बशा, दह्या दुधाचे सट, गंज, कल्हई लावलेली पितळी पातेली… लोखंडी तवे कढया पळ्या…. बापरे…. ४६ वर्षांचा पसारा…. सासुबाईंच्या वजनदार पितळी, स्टीलच्या भांड्यापासून अगदी निर्लेप तरीही हवाहवासा…. प्राणपणानी जपलेला, वाढवलेला पसारा… सारं सोबत होतं इतकी वर्षं….

पण आता मन आवरायला हवं होतं… मोजकं, गरजेचं, चांगलं, ठेवून मोकळं व्हायचं होतं… आणि मग भांडी निवडली…. गुंतलेल्या माझ्याच मनाविरुद्ध जणू लढंत राहिले….

मग असेच नातवंडांचे खेळ, कपडे, अगदी बॉक्स सुद्धा न उघडलेल्या गिफ्टस्,…. सगळं काढतांना मन अस्थिर… टाकणाऱ्या हाताला परत मागे खेचणारं… कधी आठवणींची कासाविशी कधी दुर्लक्ष झाल्याचा अपराधीपणा….

आवरणं कसलं…. मनाचं धावणं चारही दिशांना…. भूतकाळात.. कसं आवरायचं? आठवणींच्या गुंत्यातून कसं अलगद, न दुखावता सोडवायचं?यातलं काय ठेवावं? काय टाकावं? आता कुणाला दाखवायच्या आहेत त्या ट्रॉफ्या, सर्टीफिकेट्स, पत्र, लेख….. मुलं तर सगळ्यातून दूर… १००% प्रॅक्टीकल सल्ला देणारी…. नवीन पिढीच अशी… न गुंतणारी… स्पष्ट…..

आम्ही फार गुंतलोय का ? फारच भावनिक आहोत का?चुकलं का?

नाही नाही…. मन कबूल होत नाही…. कारण आम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर क्षण अन् क्षण जगलो…. जे, जसं, जेंव्हा, जेवढं मिळालं त्यात आनंदात राहिलो. म्हणून तर पुढे श्रीमंत सिल्क नेसलो तरी आईच्या मायेचा चिटातला फुलांचा फ्रॉक, खणाचं परकर पोलकं आजही मनाजवळ आहे…. मुलांच्या घरात बॉयलर आले तरी तांब्याच्या लालभडक बंबाच्या ठिणग्या आणि पत्र्याच्या बादलीतल्या वाफाळत्या पाण्याची ऊब सोबत आहे… मिक्सर आले तरी पाटावरवंट्याचं खसखशीत वाटंण चवीत आहे…. वस्तू नाहीत पण आठवणी घट्ट आहेत…. मन गुंतून राहिलंय आजवर…

बरं या आठवणींचं तरी असं आहे…. आज फ्रीज जवळ गेलं की क्षणात विसरायला होतं काय घ्यायला आलो होतो ते… पण त्याच मनात ५वी, ६वी मधल्या नाना वाड्यातल्या शाळेत काव्य गायनासाठी गायलेल्या कविता लख्खं स्मरणात आहेत. किती उतारे, नाटकातले संवाद, समुहगीतं, अभंग, भावगीतं बंदिशी, तराणे…. मग शिक्षिकेची नोकरी करतांना मुलींचं यश, ते आलेले नंबर, त्या घोषणा…… हे सगळं आठवणीत आहे कारण सारं मन लावून, जीव ओतून केलंय. आज हे फोटो, सर्टिफिकेट्स पुन्हा ४० /५० वर्ष मागे नेतात ते त्या जिव्हाळ्यामुळे…

तेच स्वैपाकात.. प्रेमानं, मायेनं खाऊ घालण्याच्या भावनेत आहे. मग ती लोखंडी, पितळी, जाडजूड स्टीलची जुनी भांडी पण मऊ स्पर्श देतात. केवढी सेवा दिली त्यांनी…. ती टाकायची, नाकारायची कशी? ते कागद, पत्रं फोटो, ती पत्र, सर्टीफिकेट्स, भांडी, कपडे साऱ्यांनी तर सोहळा केला जगण्याचा…. पण मग मी मनाची समजूत घालते…. परत परत चाळण लावते…. मोजकं ठेवते…. काही दूर सारते… डोळे भरून पाहून घेते. तासाभरात आवरुया असं ठरवते सकाळी आणि दिवस कलायला येतो तरी मी त्याच पसाऱ्यात असते. पत्रं, भांडी, फोटो, पावत्या, पुस्तकं, कपडे सगळं सगळ्यांकडे आहेच…. एक गोड पसारा आयुष्यभर मांडलेला…

… सगळ्यांचं असंच होतं असेल का?आवरायला काढलं खरं…

पण किती प्रसंग, विषय, घटना, आनंद, दु:ख, यश अपयश… कुठेकुठे मन हिंडून येतं… हिंडवून आणतं….

पण भावनिक मनाला प्रॅक्टिकल मन समजावतं…. आवरायला लावतं सामान आणि भावना !!! तरी भावनिक मन चोरून याच्या नकळत काही पिशवीत भरतंच…………… आवरण्यातली ही गुंतवणूक !!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लेखन ‘कला’… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ लेखन ‘कला’… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ना. सी. फडके

अप्पांनी रात्रीच मनाशी जुळवाजुळव करून कादंबरीचा आराखडा डोक्यात तयार करून ठेवला होता. पांढऱ्याशुभ्र कोऱ्या.. गुळगुळीत कागदांचा गठ्ठा.. पेन जागेवर आहे ना हे पाहीलं. त्यांनी विजयला सांगितले.. आज लेखनाला बसायचे आहे. आपल्या ‘दौलत’ बंगल्याच्या पश्चिमेकडे तोंडात करून असलेल्या खिडकीजवळचे टेबल म्हणजे त्यांची लिहीण्याची जागा.

स्नान वगैरे करुन.. शुचिर्भूत होऊन अप्पा आपल्या रिव्हॉलवींग चेअरवर बसले. बाजुला लेखनिक म्हणून त्यांचा मुलगा विजय.

हे अप्पा.. म्हणजेच जुन्या पिढीतील लोकप्रिय लेखक ना. सी. फडके. ते ज्या खुर्चीत बसले होते ती त्यांना भेट म्हणुन मिळाली होती. त्यांच्या पन्नासाव्या कादंबरीच्या.. ‘कुहु!कुहु!’ च्या प्रकाशन सोहोळ्यात.

तर अप्पांनी मजकूर सांगायला सुरुवात केली. अत्यंत वेगात. तो लिहुन घेतांना विजयची धांदल होई. ऱ्हस्व.. दीर्घ सांभाळायचे आणि अक्षरही सुंदर काढायचे यावर अप्पांचा कटाक्ष. चतकोर आकाराची १५-१६ पानं लिहुन झाली की अप्पा थांबत.

‘छान लिहिलं आहेस’ या अप्पांच्या शाबासकीसाठी विजय थांबुन राही. त्यांनी तसं म्हटल्यावर त्याचं हात दुखणं वगैरे पळुन जाई.

आप्पांच्या तोंडातून निघालेला शब्द अंतिम असे. सगळा पुर्ण विचार करुनच ते कथन करायला बसत. रात्री जेवण झाल्यावर पुन्हा एकदा ते आपल्या टेबलपाशी येत. लिखाणातल्या शुद्धलेखनाच्या चुका शोधून काढत. बाजूला असलेल्या समासात दुरुस्त्या लिहून ठेवत.

अशी फायनल झालेली कॉपी बघत रहावी अशी असायची. शिस्तबध्द.. नेटकेपणा.. आणखी देखणेपण लगेच नजरेत भरे.

अप्पांचे चिरंजीव विजय फडके सांगतात..

“आप्पा त्यांच्या खोलीत नसताना त्यांची फाईल उघडून ती बघावीशी वाटे. कागदावरच्या मार्जिनमध्ये आप्पांनी त्यांच्या झोकदार अक्षरात लिहीलेल्या शुध्दलेखनाच्या चुका बघाव्याशा वाटत. शाळेतल्या शिक्षकांनी शिकवलेलं शुध्दलेखन माझ्या लक्षात नाही.. पण अप्पांच्या हाताखाली काम करता करता आपोआप लेखन शुद्ध होत गेलं. “

शेकड्यांनी कादंबऱ्या लिहिणारे सिध्दहस्त लेखक ना. सी. फडके. आणि त्यांचे लेखनीक म्हणुन काम करणारे त्यांचे चिरंजीव विजय फडके. दोघेहि ग्रेटच. आजच्या कॉम्प्युटर टायपिंगच्या जमान्यात तर ते अधिक मोठे वाटतात.

या महान लेखकाला ही एक आदरांजली !!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेंगदाणा विडंबन… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ शेंगदाणा विडंबन… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

भाजून सोलणे अन्

निवडून ते पहाणे

मी ओळखून आहे

कुठल्या डब्यात दाणे ॥धृ॥

 

जाता घरातूनी तू

घेईन एक वाटी

खाईन मस्त दाणे

येईल मौज मोठी

हे स्वप्न जीवघेणे

भरतो सुखे बकाणे ॥१॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे…

 

हाती डबा जयाच्या

त्याला कसे कळावे

पोटात भूक ज्याच्या

त्यालाच दु:ख ठावे

लपवून लाख ठेवा

शोधू आम्ही दिवाणे ॥२॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे…

 

पोटास वेदनांचा

का सांग त्रास व्हावा ?

इतका चविष्ट खाऊ

का औषधी नसावा ?

येवो कळा कितीही

सोडू आम्ही न खाणे ॥३॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे…

कवी : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’ – लेखिका : सुश्री वर्षा कुवळेकर ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’ – लेखिका : सुश्री वर्षा कुवळेकर ☆ परिचय – सौ.अश्विनी कुलकर्णी   

 पुस्तक : सावळ्या विठ्ठलाच्या देशात

 लेखिका : सुश्री वर्षा कुवळेकर

 परिचय : सौ अश्विनी कुलकर्णी 

साहित्य सारांश पुरस्काराच्या निमित्ताने वर्षाताईंची भेट झाली. त्या माझ्या शेजारीच बसल्या होत्या. दोन तीन तास आम्ही एकत्र होतो. बोलता बोलतांना त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी समजल्या, विचारांची देवाण घेवाण झाली. खूप बरं वाटलं त्यांना भेटून! मी माझा कवितासंग्रह त्यांना दिला आणि त्यांनी त्यांचं पुस्तक मला दिलं. त्यांच्या पुस्तकाचं नाव ‘ सावळ्या विठ्ठलाच्या देशात ‘!

‘सावळ्या विठ्ठलाच्या देशात’! हे पुस्तकाचे नावच मला इतकं आवडलं की केव्हा एकदा ते मी वाचते असं मला झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी वाचण्यासाठी घेतलं. विविध विषयांचे ज्ञान असलेल्या प्रख्यात व्याख्यात्या धनश्री लेले यांनी लिहिलेली प्रस्तावना त्यानंतर वर्षाताईंची स्वतःच मनोगत यातून पुढील पुस्तकाचा म्हणजेच प्रवास वर्णनाचा ट्रेलर डोळ्यासमोर उभा राहिला म्हणायला हरकत नाही.

नवीन देश, नवीन वातावरण तिकडे जाण्याची उत्सुकता भीती त्यांच्या लिखाणातून प्रथम जाणवली. त्यांच्या केनियाला जाण्याच्या तयारीपासूनच लिखाण त्यांनी खूप मनापासून लिहिलं आहे. अगदी सुरुवातीपासून ज्या लसी त्यांनी घेतल्या, अर्थात त्या घ्याव्यात लागतात. इतर तयारी केली तिथपासून त्यांनी जी घोडदौड सुरू केली यांच्याही त्यांच्या नोंदी महत्वाच्या आहेत.

अलिबागच्या वर्षाताई, केनीयाला गेल्यावर अनेक अनुभवातून त्यांना काय काय वाटत गेलं हे त्यांच्या रोजच्या दैनंदिनीतून आपल्याला समजू शकत. साठीहून अधिक वय असणाऱ्या वर्षाताई! त्यांची जिज्ञासा वाचून खूप आश्चर्य वाटलं की त्यांना नवीन शहर फक्त जाणून घ्यायचे नव्हतं तर त्याच्यावर लिहावसं वाटलं. सुरुवातीपासूनच लिहावंसं वाटलं आणि त्यांनी त्या पद्धतीने तिथे गेलेल्या दिवसापासून लिहायला सुरुवात केली. एकटेपणा सांभाळणं अवघड असतं असं त्या म्हणाल्या पण ते सांभाळायचा एक विधायक धागा त्यांना नक्कीच मिळाला आहे, असं मी म्हणेन. हा धागा म्हणजे लिखाण! अशा पद्धतीने वेगळ्या आणि अगदीच अनोख्या देशांमध्ये इथल्या बारीकसारीक गोष्टी पासून मोठ्या गोष्टी पर्यंत सगळे लिहिणं साधी गोष्ट नाही.

तिथलं वातावरण, तिथला आहार, खाणं-पिण हे खूप वेगळं आहे. आपल्या पदार्थापेक्षा खूपच तफावत. सुरुवातीला तर हॉटेल मधील काही पदार्थ बघूनही ते त्यांना नको वाटले. त्याबद्दल त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर जशी माहिती होत गेली तस तशी त्यांना दुकान आणि भारतीय पदार्थ कळले तेव्हा त्यांना कसं बरं वाटलं, भारतातील लोकं भेटली तेव्हा कसं वाटलं त्याबद्दल त्यांनी लिहिलंय.

तिथली गरिबी… इंग्रजांनी तिथल्या लोकांना कसं गुलाम केलं हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा तिथे आलेली गरीबी याबद्दल त्यांनी सांगितलं. ही नवी माहिती आहे. तिथे संध्याकाळी सात नंतर घराच्या बाहेर पडलं तर लूटमार करतात, खून करतात. मध्यंतरी मी ही याबद्दल वाचलं होतं… पण त्यांच्या पुस्तकातून हे खरंच आहे हे ठळक झालं. तिथले लोक गरीब असले तरीसुद्धा प्रेमाने वागलं तर प्रेमळ आहेत हेही त्यांच्या लेखनातून लक्षात आल.

त्यांनी तिथले काही ठिकाणचे रस्ते, माती, अस्वछता पाण्याचा प्रॉब्लेम, दुकाने, उद्योग, वाहतूक, काही बेदरकार लोक, झोपडपट्ट्या आणि विकसित भागातील लोक याची तफावत या सर्वांचा जणू बारकाईने अभ्यास केला. विकसित भागाचाही त्यांनी दौरा केला.

एकंदरीतच त्यांनी साधसरल, सोपं सर्वाना समजेल अस, प्रवाही लिखाण केले आहे. त्यामुळे ते लगेच भावत!

त्यांचं लिखाण हे फक्त लिखाण राहणार नाही… यातून काय मिळेल? तर भारतीय नागरिकांना जेव्हा केनियाला जाण्याचे प्रसंग येतील त्या वेळेस वर्षाताईंनी पुस्तकाद्वारे केलेले अनुभव कथन/प्रवासवर्णन हे एक उत्तम गाईड ठरेल. त्या अनुभव भारतीयांना तिथे जाण्यासाठी आणि जगण्यासाठी सुसह्य होईल. अस मी ठामपणे सांगेन. या पद्धतीचे लेखन त्यांनी केलेलं आहे. कुठेही, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळताना दुसर्यांनाही सांभाळून घेणं. कोणतीही तक्रार न करता वेगळ्या देशात एकरूप होताना

‘परिस्थितीशी समायोजन करून, तिच्याशी मैत्री करणं’ हा त्यांचा स्वभाव दिसून आला. तिथल्या लोकांना जीव लावत त्यांचीही ‘मम्मा’ होत, त्यांनी हे दाखवून दिलं.

दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला गुंतवून घेण्यासाठी वाचनाइतकच, लेखनासारख दुसरं साधन नाही अस मला तरी वाटत. लिखाणाची आवड, जिज्ञासू वृत्ती आणि इच्छा शक्ती याचा त्रिवेणी संगम होऊन ह्या पुस्तकाचा जन्म झाला आहे असं मी म्हणेन.

‘स्त्री ही सृजनाचे सृजन आहे ‘! अस मला नेहमी वाटत. या पुस्तकाच्या रूपाने वर्षा ताईंनी हे सिद्ध केलंय.

इतकं सुंदर प्रवास वर्णन आपण रसिकांपर्यंत पोहोचवलत, त्याबद्दल धन्यवाद आणि ताईं पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा!

© परिचय : सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, कवयित्री, लेखिका, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – asharticles831@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #247 ☆ शिकायतें नहीं वाज़िब… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख शिकायतें नहीं वाज़िब… । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 247 ☆

☆ शिकायतें नहीं वाज़िब… ☆

न जाने कौन सी शिकायतों का हम शिकार हो गये/ जितना दिल साफ रखा, उतने हम गुनहग़ार हो गये–गुलज़ार जी की यह पंक्तियाँ हमें जीवन के कटु सत्य से अवगत कराती हैं। मानव जितना छल-कपट, राग-द्वेष व स्व-पर से दूर रहेगा, लोग उसे मूर्ख समझेंगे; अकारण दोषारोपण करेंगे और उसका उपहास करेंगे–जिसका मूल कारण है आत्मकेंद्रिता का भाव अर्थात् स्व में स्थित रहना और बाह्याडंबरों में लीन न होना तथा अपने से इतर व्यर्थ की बातों का चिंतन-मनन न करना। ऐसा इंसान दुनियादारी से दूर रहता है, मानव निर्मित कायदे-कानूनों की परवाह नहीं करता तथा प्रचलित परंपराओं, मान्यताओं व अंधविश्वासों में लिप्त नहीं होता। ऐसे व्यक्ति से लोगों को बहुत-सी शिकायतें रहती हैं, जिससे उसका दूर का नाता भी नहीं होता।

वैसे भी आजकल लोग शुक्रिया कम, शिकायतें अधिक करते हैं। वैसे तो यही दुनिया का दस्तूर है। शिकायत करने से अहम् का पोषण होता है और शुक्रिया करते हुए अहम् का विगलन व विसर्जन होता है और दूसरे को महत्ता देने का भाव रहता है, जो उन्हें स्वीकार्य नहीं होता। शिकायतें न करने से दोनों पक्षों का हित होता है।

शिकायत व निंदा का निकट का संबंध है। शिकायतें आप व्यक्ति के मुख पर करते हैं और निंदा उसके पीछे करते हैं। यदि हम दोनों में भेद करना चाहें, तो शिकायतें निंदा से बेहतर हैं और उनका समाधान भी लभ्य होता है। शायद! इसलिए ही कबीर ने निंदक को अपने समीप  रखने का संदेश दिया है, क्योंकि वह आपको आपकी कमियों, दोषों व सीमाओं से अवगत कराता है तथा स्वयं से अधिक अहमियत देता है; अपना अमूल्य समय आपके हित नष्ट करता है। है ना वह आपका सबसे बड़ा हितैषी? चलिए, उसके द्वारा निर्दिष्ट सुझावों पर ध्यान दें।

शिकायतें यदि स्वार्थ हित की जाती है तो उन पर ध्यान ना देना उचित है। यदि वे वाज़िब हैं, तो उसे दूर करने का प्रयास करें। इससे आत्मविश्वास ही नहीं, परहित भी होगा। परंतु यह तभी संभव है, जब आपके हृदय में किसी के प्रति मलिनता का भाव ना हो। उसके लिए आवश्यक है, अपने हृदय को गंगा जल की भांति पावन व निर्मल रखने की। जैसे गंगाजल बरसों तक पवित्र रहता है, उसमें कोई दोष उत्पन्न नहीं होता, हमें भी स्वयं को माया-मोह के बंधनों से मुक्त रखना चाहिए। ‘ब्रह्म सत्यं, जगत मिथ्या’ को स्वीकारते हुए मानव शरीर को पानी के बुलबुले की भांति नश्वर, क्षणिक व अस्तित्वहीन स्वीकारना चाहिए और संसार को दो दिन का मेला, जहां मानव को दिव्य खुशी पाने के लिए एकांत में रहना अपेक्षित है, क्योंकि मौन हमें ऊर्जस्वित करता है।

समय नदी की भांति निरंतर गतिशील है तथा प्रकृति पल-पल रंग बदलती है। मौसम भी आते- जाते रहते हैं। इस संसार में जो भी मिला है, प्रभु का कृपा प्रसाद समझ कर स्वीकारें, क्योंकि सब यहीं छूट जाना है। ‘यह किराए का मकाँ है/  कौन तब तक ठहरेगा/ खाली हाथ तू आया है बंदे! खाली हाथ तू जायेगा।’  वैसे शिकायत अपनों से होती है, गैरों से नहीं, क्योंकि शिकायत का सीधा संबंध निजी स्वार्थ से होता है; दूसरों के हृदय में आपके प्रति ईर्ष्या भाव नहीं होता– क्योंकि उनका आपके साथ गहन संबंध नहीं होता। अपनों की भीड़ में अपनों को तलाशना दुनिया का सबसे कठिनतम कार्य है। अक्सर अपने ही आप पर पीछे से वार करते हैं। इसलिए मानव को यह सीख दी गई है कि ‘पीठ हमेशा पीछे से मज़बूत रखें, क्योंकि शाबाशी और धोखा दोनों पीछे से मिलते हैं।’ जो इंसान दूसरों पर अधिक विश्वास करता है, सबसे अधिक धोखे खाता है।

बहुत कमियाँ निकालते हैं हम, दूसरों में अक्सर/ आओ! एक मुलाकात हम उस आईने से भी कर लें’ अर्थात् दूसरों से शिकायतें व दोषारोपण करने से पूर्व आत्मावलोकन करना अत्यंत आवश्यक है। आईना हमें हक़ीक़त से परिचित कराता है, अपने पराये का भेद बताता है/  ज़िंदगी कहाँ रुलाती है हमें/ रुलाते तो वे लोग हैं/  जिन्हें हम अपनी/ ज़िंदगी समझ बैठते हैं। वैसे भी सुक़ून बाहर से नहीं मिलता, इंसान के अंतर्मन में बसता है। बाहर ढूंढने पर तो उलझनें ही मिलेंगी। सो! ‘उलझनें बहुत हैं, सुलझा लीजिए/  बेवजह न किसी से ग़िला कीजिए।’ जी हाँ! मेरे गीत की पंक्तियाँ इसी कटु यथार्थ से परिचित कराती हैं कि जीवन में उलझनें बहुत है। परंतु हमें उनका समाधान अपने अंतर्मन में ढूँढना चाहिए, क्योंकि जब समस्या हमारे मन में है तो समाधान दूसरों के पास कैसे संभव है?

हम अपने मन के मालिक हैं और उस पर अंकुश लगा दिशा परिवर्तन कर सकते हैं। परंतु है तो यह अत्यंत कठिन, क्योंकि वह तो पल भर में तीन लोगों की यात्रा कर लौट आता है। ‘मन को मंदिर हो जाने दो/ देह को चंदन हो जाने दो/ मन में उठ रहे संशय को/ उमड़-घुमड़ कर बरस जाने दो’ स्वरचित गीत की पंक्तियाँ इसी भाव को प्रकट करती हैं। यदि मन मंदिर होगा, तो देह चंदन की भांति पावन रहेगी और मन प्रभु चरणों में समर्पित होगा। ऐसी स्थिति में संदेह, संशय व शंका के बादल बरस जाएंगे और मन उस दिशा  की ओर चल निकलेगा। ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ यदि आपका हृदय पवित्र है, तो आपको गंगा स्नान की आवश्यकता नहीं है। इसलिए इसमें दुष्भावनाओं का वास नहीं होना चाहिए। परंतु 21वीं सदी इसका अपवाद है। आजकल वही व्यक्ति दोषी ठहराया जाता है, जिसका हृदय निर्मल, निश्छल व पवित्र होता है तथा उसमें कलुषता नहीं होती। ‘शक्तिशाली विजय भव’ आज का नारा है। निर्बल पर प्रहार किए जाते हैं। वैसे तो यह युगों-युगों की परंपरा है। आइए! स्वयं को इस जंजाल से मुक्त रखें। सरल, सहज व सामान्य जीवन जीएँ। अपेक्षा व उपेक्षा से दूर रहें, क्योंकि यह संसार दु:खालय है। जीवन अनमोल है और हर पल को अंतिम जानकर जीएँ। पता नहीं, यह हंसा तब उड़ जाएगा। खाली हाथ तू आया है/ खाली हाथ तू जाएगा। ‘जितना दिल साफ रखा/ उतना हम गुनहगार हो गए।’ परंतु हमें यही सोचना है कि जीवन यात्रा बहुत छोटी है। हमें तेरी-मेरी अर्थात् निंदा-स्तुति के जाल में नहीं फँसना है ।भले ही हम पर कितने ही इल्ज़ाम लगाए जाएं। झूठ के पाँव नहीं होते और सत्य सात परर्दों के पीछे से भी उजागर हो जाता है। संघर्ष अखरता ज़रूर है, लेकिन बाहर से सुंदर व भीतर से मज़बूत बनाता है।

समय और समझ दोनों को दोनों एक साथ किस्मत वालों को मिलते हैं, क्योंकि अक्सर समय पर समझ नहीं आती और समझ आने पर समय निकल चुका होता है। सो! दस्तूर-ए- दुनिया को समझिए, पर अपने मन को मालिन मत होने दें। ‘ज़िंदगी में समझ में आ गई तो अकेले में मेला/ समझ में नहीं आई तो मेले में अकेला।’ सो! चिंतन-मनन कीजिए और प्रसन्नता के भाव से ज़िंदगी बसर कीजिए। शिकायतें तज, शुक्रिया करें और जो मिला है, उसी में संतोष से रहें। यह जीवन व समय बहुत अनमोल है, लौट कर आने वाला नहीं। हर लम्हे को अंतिम साँस तक खुशी से जी लें।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ कैंसर हॉस्पिटल ☆ श्रीमति लतिका बत्रा ☆

(पुकारा है ज़िन्दगी को कई बार -Dear CANCER … ये पुस्तक है कैंसर से संघर्ष और जीजिविषा की श्रीमति लतिका बत्रा जी की आत्मकथात्मक दास्तान। श्रीमति लतिका बत्रा जी के ही शब्दों में – “ये पुस्तक पढ़ कर यदि एक भी व्यक्ति का जीवन के प्रति दृष्टिकोण सकरात्मकता से रौशन हो जाये तो अपना लिखा सफल मानूँगी।”
आज प्रस्तुत है उनकी ही कविता – “कैंसर हॉस्पिटल”। कैप्टन प्रवीण रघुवंशी जी ने इस कविता का अंग्रेजी भावानुवाद Oncology Sanatorium” शीर्षक से किया है।)
आप इस कविता का भावानुवाद इस लिंक पर क्लिक कर पढ़ सकते हैं। 👉 Oncology Sanatorium – Captain Pravin Raghuvanshi, NM  

? कविता – कैंसर हॉस्पिटल – श्रीमति लतिका बत्रा ? ?

?

जीवन को लेकर दौड़ती – भागती सड़क

उस पार–                                                           

गदराये गुलमोहर और गेरुए पलाश

और

एक भव्य इमारत।

पसरी है एक अभिशप्त सृष्टि

और मृत्यु की वर्तनी

काँच के विशालकाय स्वचालित द्वारों की

कोई देहरी है ही नहीं

फिर भी,

लाँघ कर चले आये हैं भीतर

क्षोभ और ग्लानियों से भरे

सैंकड़ों संतप्त चेहरे

देहें कैद हैं युद्धबंदियों सी

ढो़ रहे हैं सभी  –

अभिशापित कीटों से भरे बंद बोरे

अतीत और वर्तमान के सारे

कलुषित कर्मों की व्यथा भरे ।

चिपके हैं आत्म वंचनाओं के कफ़न

जीवन की हर आस को कुतर कर ।

रोगी हैं सब ।

कुछ सद्यः परिव्राजकों से

घुटे सिर

परिनिर्वाणाभिमुख नहीं ,

अवस्थित है — उपालम्भ

पीड़ाओं से संतप्त।

भोग कर आये हैं जो

संघाती व्यथाओं का विस्तार

उसी में लौटने को विकल हैं

प्रकांड अभिलिप्साएँ ।

 *

कुछ योद्धा — दृढ़ – संकल्पी

भीमाकार विचित्र अद्भुत मशीनों को

साधते —

नील वस्त्र धारी ,

वीतरागी निर्लिप्त कर्मठ

यांत्रिक मानव

आदतन कर्मरत

निर्वस्त्र मांसल रोगी देहें

बाँध कर उन मशीनों में,

जाँचते-

टटोलते रोग

कामुकता – जुगुप्सा —

हर भाव है निषिद्ध यहाँ —

हर द्वार पर उकेरी गई है पट्टिका

 “प्रवेश  प्रतिबंधित “

 *

गले में स्टेथस्कोप डाले

धवल कोट धारी

शपथ बद्ध हैं—

नहीं होते द्रवित विचलित कंपित

विशिष्ट योग्यताओं का ठप्पा लगा है

 वेदना संवेदना पर

जिस की परिधि में हर देह  है बस एक

” ऑब्जेक्ट “

 *

ठसाठस भरे हैं लोग पर —

कोई भी वेदना – संयुक्त नहीं है

संवेदना से ।

अनुभूतियों के फफूँद लगे बीजों से

उपजती नहीं सहानुभूतियाँ

 *

अपनी संपूर्ण विचित्रता समेटे

औचक ही कहीं, कभी दिख जाती है

संभ्रमित जीवन वृत्तियाँ

जब

गुलाबी कोट पहने एक स्वप्नद्रष्टा

स्वयंमुग्धा नर्स दिख जाती है

कोहनियों भर

सुनहरा लाल चूड़ा पहने ….

जिजीविषा का आभा मंडल

बुहारता चलता है

उसके कदमों के नीचे

मृत्यु के इस शहर का हर काला साया ।

 *

बाकी…

वृत्तियाँ तो सभी कर्मरत हैं यहाँ

छटपटाता हुआ पीड़ाओं से

युद्धरत है हर कोई – द्रवित – विगलित

दर्द  —

सधन मृत्यु का

चश्मदीद गवाह बना बैठा है हर चेहरा

प्रतीक्षारत —

आशाओं के दरदरे हाथों में थाम कर

एक चुटकी ज़िन्दगी।

 *

कैंसर हॉस्पिटल है ये ।

?

© श्रीमति लतिका बत्रा   

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ – ‘Oncology Sanatorium’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present an English Version of Mrs. Latika Batra’s Hindi poetry “कैंसर हॉस्पिटल.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

(Famous book of Mrs Latika Batra “पुकारा है ज़िंदगी को कई बारDear Cancer)

? Oncology Sanatorium ? Captain Pravin Raghuvanshi, NM ??

(Here’s the saga of Mrs Latika Batra… A real-life story based on her personal life-experience… She defeated the Cancer in her resolute battle against it… faced countless challenges… some owing to dreaded disease while other ones due to the human negligence… Ultimately, she emerged victorious…! Salute to her fighting spirit…!)

?

On the farthest end of the road,

adorned with the Gulmohar and

bright ochre-coloured flowering

palash trees, stands  a  haughty  

gigantic  skyscraper,  on  a  lush

green sprawling landscaped  field,

known as the  “Cancer Hospital..!”

An  abominable world is laid out there

Where death manifests its remorseless

face,  routinely putting a full  stop to

countless,  –otherwise  happy  lives…

 *

On the entrance, there’s no threshold

at its  huge  glass automatic doors

A sea of humanity, -traumatized with

agonisingly crestfallen countenance,

fill  up  the  vast  entrance  hall,

wherein countless animated bodies

are imprisoned  there like hordes of

battle  weary  prisoners  of  war…

 *

Laden with unbearable weights of

worries,  hopelessness;  as  if  they 

are carrying heavy sacks of loathful

abominable insects on their shoulders

 *

As if,  the outcome of all their tainted

deeds of past Karma are manifesting

in the excruciating pain and suffering

The shrouds of self-defeating faith,

an invisible placard of diffidence is

stuck around their necks, gnawing

away  the  last  ray  hope  of  life.

 *

All are ailing; yes, sick to their

inner core,  in  the  clutches  of

cancer, totally  indisposed  off,

in the realm of utter despair…

 *

Like a group of monks, wandering

around with their clean shaven heads

but  not  in  the  quest  of Nirvana,

Their  loathsum  state  defines the

precarious  condition  they  are  in…

Agony, despair, unbearable pain

Those who have experienced the

vastness of their sufferings are

accompanying  them,  with  the

hope against the hopes to return

to  some semblance  of  normalcy…

 *

But  some  defiant never-say-die

warriors, with their steely resolve

are also there, determined not to be

vanquished, till their last breath…

 *

Operating huge, strange and

monstrous machines, are those

operators, –the robotic humans,

wearing gleaming blue outfits,

Dispassionate, detached, but

hardworking  like  machines…

 *

Routinely engaged in their standard  

procedures of binding unclothed, barely

fleshy, sick bodies in those machines, as

they keep probing and diagnosing diseases

 *

Carnality, debauchery, amorousness and

every perverted emotion is forbidden here —

Every door here reflects a signage to be

followed  as  gospel: “Entry Prohibited”

 *

Donning a white coat wearing a stethoscope

around the neck with nonchalant look in eyes

are supremely experienced skilled doctors

who are bound by oath to serve the humanity

They are not moved, disturbed, or shaken

They have endowed special abilities on

deciphering the pain sensation & symptoms

In their kingdom every patient is an ‘object’

 *

People  here, are  packed  to  the  brim but

apparently  no  one  is  connected  through

pain  or  sympathy  with  each  other, as the

adage  goes: “Sympathy  does  not  grow

out  of fungus-infested seeds of feelings!”

 *

Confused life cycles are seen somewhere,

sometimes, with all their strangeness.

 *

When a dreaming, self-obsessed nurse

wearing a pink coat is seen, with golden

bangles  reaching  up  to  her  elbows…

The unfazed  ‘will to live’  sweeps  away

the  dark  shadow  of  this  ‘hamlet  of

death’  right  beneath  her  feet.

 *

The rest of the instincts are playing their

roles scrupulously as everyone is fighting

with his agony, melting in excruciating pain.

 *

Every  face  present is  an eyewitness to  the

impending death, awaiting for the eternal rest

But,  still  holding their faith is a  pinch  of  life  

in  the  providential hands of unending hope..!

 *

Yes,  this  is  the  cancer  hospital,  with  a  

conundrum,  is  it  sanatorium  or  hospice?

The answer remains: it depends on the will to

fight  to stay alive or just surrender meekly..!

?

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares