मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ माणुसकी… ☆ डॉ. शैलजा करोडे

घड्याळात रात्रीच्या नऊचे ठण ठण ठण ठण टोले पडले तसे तशी माझी चिंता अधिकच वाढली. माझ्या समोर बाबांचं कलेवर सकाळी बारा वाजेपासून पडलेलं, त्यांचा अंत्यविधी करायचा होता.या पंधरा मजली इमारतीत हजारों कुटुंबे होती, पण कोणाचाच कोणाशी संपर्क नाही. शेजारच्या फ्लॅटमध्ये काय घडतंय हे ही कोणाला माहित नसायचं. जो तो आपापल्या कोषात मग्न. दरवाजे बंद करून तीन चार रूमच्या त्या सदनिकांमध्ये प्रत्येक जण मोबाईल, काम्युटरवरील WhatsApp, Facebook book, Twitter, Instagram च्या आभासी जगात व्यस्त.

सकाळीच मी आमच्या अपार्टमेंटच्या समूहावर बाबांच्या निधनाची पोस्ट टाकलेली. प्रत्येकाचे RIP, भावपूर्ण श्रध्दांजली, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, तुम्हांस दुःख सहन करण्याची शक्ती, ओम शांती सारख्या मेसेजेसनी WhatsApp फुल झालं. Vertually सगळं झालं म्हणजे जणू संपलं, केलंय आपण सांत्त्वन हीच धारणा सगळ्यांची. पण कोणी प्रत्यक्ष येऊन मला भेटले नाही, मदत करणे तर दूरच.

बरे माझे नातेवाईकही भरपूर, सांगायला खंडीभर आणि कामाला नाही कणभर अशा वृत्तीचे. बाबा आजारी असल्याचं मी सगळ्यांना कळविलेलं.

“चांगल्या डाॅक्टरला दाखवा, ट्रिटमेंट करा, काळजी करु नका,  होतील बाबा बरे, अशा संदेशांनी, होय संदेशच, आभासी जगातला. कोणी video call वरही बोलले, पण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यय त्यात कसा येणार.

प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती नाही येण्याची.कोणाच्या घराचं बांधकाम, मुलांच्या परीक्षा, नोकरीतून रजा न मिळणं, कोणाचा भराला आलेला शेती हंगाम, अर्थात कोणी येणार नव्हतंच.

“अहो, काहीतरी करा ना. रात्र वाढतेय, पिंटू ही पेंगुळलाय, पण झोपत नाहीय. आजोबांना सारखं उठवायला सांगतोय, कसं समजावू त्याला.”

“होय ग, मी प्रयत्न करतोय, कोणाला तरी बोलावतो मदतीला”

साडेनऊचा टोला घड्याळाने दिला.हे घड्याळही बाबांच्याच पसंतीचं, जुन्या काळातलं, ठण ठण टोल देणारं, माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये विराजमान झालेलं, अनेक वेळां दुरूस्त करून कार्यरत ठेवलेलं…

दुपार पासून मी मदतीसाठी उंबरठे झिजविले. जोशींकडे गेलो तर दरवाजा उघडून तेच बाहेर आले, “नाही जमणार हो मला यायला, माझ्या मुलाची दहावीची परीक्षा चालू आहे, त्याला आणायला जायचंय.”

चौथ्या माळ्यावरील गुप्तांकडे गेलो. अरे भाईसाहब, मेरा छोटा भाई आ रहा है विदेशसे, उसे लेनेके लिए एअरपोर्ट जाना है मुझे…

तेराव्या माळ्यावरील मायकल फर्नांडीस म्हणाला, “आलो असतो रे, पण आज आमची अल्कोहोल अँनानिमसची मिटींग असते दर रविवारी. प्रबोधनात्मक भाषण तर असतेच, पण मला रूग्णांचे समुपदेशनही करावे लागते. घाबरु नकोस. धीर धर,स् वतःला सांभाळ.”

सी विंगमधील पराडकरांकडे गेलो तर, अरे आज आमचं दासबोधाचं निरूपण असतं अशा अशौच (मयतीत जाणं,सुतकीय कार्य) प्रसंगी आज नाही येता येणार मला.

शेजारचा “स्वामीनाथन” नात्यातील लग्नासाठी जाणार होता तर दहाव्या माळ्यावरील “सुत्रावे” वीकएंडला गेलेला….

दुसर्‍या माळ्यावरील “कोटनाके” कवी संमेलनासाठी जाणार होते. प्रत्येकाची काही ना काही कामे. घाबरू नको, येईल कोणी मदतीला ही कोरडी सांत्वनपर वाक्ये.

काय करू..? आज पावसानेही हैराण केलेलं. दिवसभरात पावसाची रिप रिप चालू होती, आता त्याचाही जोर वाढला होता, मला तर भडभडून आलं.

मुंबईच्या उपनगरातचं माझ्या पत्नीची बहीण राहात होती, पण तिलाही नववा महिना असल्याने माझा साडूही येऊ शकत नव्हता. 

शेवटी मनाचा निग्रह करून उठलो, माझ्या इमारतीच्या समोरच भाजी विकणारा संतोष राहात होता. हातगाडीवरचं त्याचा भाजीचा ठेला होता.

“संतोष” माझा काहिसा कापरा, आर्त, दाटलेला, अवरूध्द स्वर ऐकून तो म्हणाला, “काय झालं साहेब,,,काही अडचण आहे काय ? रडताय कशापायी”

अरे दुपारी बाबा वारले,आता दहा वाजत आलेत,अजूनही मी त्यांची अंतेष्टी करु शकलो नाही. मदतच नाही मिळाली रे मला कोठे.”

“ओह…बाबा गेलेत.आपण करू बाबांची अंतेष्टी.काळजी करू नका. माझे चार दोस्त आताच बोलावतो. करू आपण सगळं व्यवस्थित”. त्याने फटाफट मोबाईल वरुन आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधला.

ये महेश, येतांना अंतेष्टीचं सगळं सामान घेऊन येशील ? होय आपल्या बाबासारखेच आहेत ते. या कार्याला आपला हातभार लागलाच पाहिजे. दिनेश, शिवा आणि मधुकरलाही सांगशील…

सगळं कसं फटाफट झालं पाहिजे, रात्र वाढतेय, पाऊसही हैराण करतोय.

संतोष व त्याच्या मित्रांनी बाबांची आंघोळ घालण्या पासुन तर तिरडी बांधण्या पर्यंतची सगळी कामे अर्ध्या तासात उरकली.

“मी वैकुंठरथाची व्यवस्था करतो” “अहो निलेश दादा कशाला वैकुंठ रथ हवा, माझा भाजीचा ठेला आहेच की आणि मोठी छत्रीही, बाबांना अजिबात ओलं होऊ देणार नाही.

चितेची लाकडेही संतोष व त्याच्या मित्रांनी फटाफट रचली. बाबांना सरणावर ठेवलं आणि माझ्या संयमाचा बांधच फुटला. संतोषनं मला सावरलं, माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सहारा देत, मला मुखाग्नी द्यायला लावला. पाणी पाजण्यासाठी माझ्यासोबत तोही चितेभोवती फिरला. बराच वेळ माझ्या खांद्यावर थोपटत राहिला. चितेच्या ज्वाळा कमी झाल्या तशी संतोष म्हणाला, “चला दादानु, घरी चला… वहिनी वाट बघत्याल “संतोषनं मला घरी सोडलं. 

“येतो दादा”…

“थांब संतोष” मी खिशात हात घालून दोन दोन हजाराच्या तीन नोटा काढल्या, “घे संतोष”…

हे काय दादानु, पैसे नकोत मला.” 

“अरे तुम्ही खर्च केलात, वेळेवर धावून आलात, ही माझ्यासाठी फार मोठी मदत होती, याचं मूल्य पैशात होण्यासारखं नाहीच आहे. पण शेवटी हा व्यवहार आहे. घ्या हे पैसे”

दादानु…”तुमचे बाबा आमचे बी बाबाच की. नको मला पैसे.

शेवटी काय असतं दादानु, “माणूस मरतो हो, माणुसकी नाही. इथे व्यवहार गौण ठरतो दादा, येतो मी…”

वहिनीस्नी सांभाळा. पिंटूच्या आणि तुमच्या खाण्यासाठी काही घेऊन येतो.

बाहेर पाऊसही आता मंदावला होता. बाबांना निरोप देण्यासाठीच जणू त्यानेही हजेरी लावली होती… 😥

या आभासी जगातही कोठेतरी माणुसकी अजूनही शिल्लक होती…..!

नर देह दुर्लभ या जगी

नराचा नारायण व्हावा

माणूस बनून माणुसकी जपण्याचा

अट्टाहास मनी बाळगावा.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नेमकं जगावं कसं ? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नेमकं जगावं कसं ? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नेमकं जगावं कसं ?  तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं…! 

तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही….! 

आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत… आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची…! 

चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच…. परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं….,! 

“पुढे चला… पुढे सरका….” असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस….

खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच… 

पण कुणावर विशेष लोभ नाही…

कोणावर राग तर मुळीच नाही… 

कुणाचा द्वेष नाही… 

कुणाचा तिरस्कार नाही… 

आपला संबंध फक्त तिकिटापुरता… ! 

कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही… 

कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही… 

दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं… 

येईल तो येऊ दे…. जाईल तो जाऊ दे…

मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते…. 

प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं …. 

आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं…. 

पण त्या गावात अडकायचं नाही…. 

आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या “ठेसनावर” जायचं….

“शिंगल” बेल मारली की थांबायचं… “डबल” मारली की निघायचं…. बास, इतके साधे नियम पाळायचे…. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही…! 

हा शेवटचा स्टॉप आहे….समद्यानी उतरून घ्या… असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की “आपल्या घरी” निघून जायचं…. ! 

उद्या कुठे जायचं ?  कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल…. ? हे ठरवणारा वेगळा असतो… 

उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही… ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही…. सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही…

शाश्वत एकच आहे… तो म्हणजे प्रवास…! 

आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही… प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…! 

आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही… प्रवास सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…! 

वैद्यकीय

  1. नेहमीप्रमाणेच या महिन्यात सुद्धा रस्त्यावर अनेक लोक असे सापडले, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, अक्षरशः हात किंवा पाय कापावे लागले,अनेक गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं…. पाण्याबाहेर माशाला काढल्यानंतर तो जसा तडफडेल, तसे तडफडणारे लोक पाहिले… कागद फाटतो तसा, गाल फाटलाय… गळा कापलाय… नारळ फुटतो, तसं डोकं फुटलंय… आणखी हि बरंच काही दिसतं…!

डॉक्टर असून सुद्धा, हे पाहताना माझी चलबीचल होते… शेवटी मी सुद्धा माणूसच आहे…! 

माझ्याही पेक्षा जास्त, तुम्ही सर्व संवेदनशील आहात आणि म्हणून मी असे कोणतेही फोटो / व्हिडिओ शेअर करत नाही…! 

असो… 

पण हि माझी माणसं कालांतराने बरी होतात… रानफुलं हि…. यांना ना पाणी लागत… ना खत लागत… ना मशागत….! 

“प्रेमाचं” आणि “मायेचं” टॉनिक यांना पुरतं…!!! 

जवळपास दोनशे किलोचं साहित्य मी माझ्या गाडीवर आणि बॉडीवर घेऊन रोज फिरत असतो दिवसभर…. पण आतली गोष्ट सांगतो…. माझ्याकडे कोणतंही औषध नसतंच मुळात… ! 

मी फक्त “प्रेमायसिन” आणि “मायामायसिन” हे दोनच टॉनिक घेऊन फिरत असतो…!

हिच दोन औषधे, सर्वच्या सर्व रोगांवर जालीम इलाज आहेत…. !

अं… हं…. !  मेडिकलमध्ये मिळणार नाहीत हि औषधे…  

तुम्ही “तुमचा कप्पा” खोला…  प्रेमायसिन आणि मायामायसिन…  आधीपासूनच निसर्गाने आपल्याला भरभरून दिली आहेत… ती तुम्हाला या कप्प्यात मिळतील….

गरज आहे; ती हि औषधे मनापासून वापरण्याची … !!! 

या औषधांना एक्सपायरी डेट नसते…. कधीही कुठेही ही औषधे वापरता येतात… कोणताही साईड इफेक्ट नाही…. 

झालाच तर फक्त फायदा आणि फायदाच होतो … देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही…! 

Try करके देखो, अच्छा लगता है …!!!

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

  1. एक प्रौढ महिला…. घरात सर्व लोक असूनही, मुलाबाळांनी तिचा गोडवा पातेल्यात काढला,या गोडव्याचा आमरस करून खाऊन झाल्यानंतर, तिला कोय म्हणून उकिरड्यावर फेकून दिलं ….
  2. म्हाताऱ्या सासू सोबत जगणारी, एक तरुण महिला; आपल्या मुलांना घेऊन जगण्याची लढाई लढत आहे… नवरा नावाचा प्राणी”बेधुंद” असतो…मुलं आणि सासूला जगवण्यासाठी थोडा वेळ हि ताई काम करते…. थोडा वेळ सासूसह भीक मागते…! (हिच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी आपण घेतली आहे)
  3. चुकून मार्ग चुकलेला एक तरुण… !

आपणही आडवाटेवर खूपदा चुकून चुकतो… चुकायची इच्छा कुणाचीच नसते, परंतु परिस्थिती रस्ता चुकायला लावते… मग एखाद्याची आपण वाट पाहतो… कोणीतरी येईल आणि मला रस्ता दाखवेल…

आपण रस्त्यावरच्या एखाद्याला पोटतिडकीनं पत्ता विचारतो…. तेव्हा एखादा “तो”, तोंडातली तंबाखूची गुळणी आवरत, पण अगदी मनापासून आपल्याला सांगतो…”आता सरळ जावा… मंग दोन फाटे फुटतील, तिथं डाव्या हाताला वळा…. थोडं फुड गेला की एक चौक लागंल… चौकातनं उजव्या हाताला वळा… तीतं मारुतीचं मंदिर लागंल… मारुतीच्या मंदिराला वळसा घातला की मंग आलं तुमचं ठिकाण…!”

भेटलेला “हा” आपल्या आयुष्यातला वाटाड्या…!!!

पत्ता सोपाच असतो, परंतु कोणीतरी सांगितल्याशिवाय कळत नाही…! 

जेव्हा आपण चुकलेलो असतो, तेव्हा एखाद्या अशा पत्ता सांगणाऱ्या “वाटाड्याची” मात्र गरज असते…

आपणा सर्वांच्या मदतीने या तरुणाचा मी वाटाड्या झालो… ! 

या तिघांनाही आपण स्वतंत्रपणे तीन हात गाड्या घेऊन दिल्या आहेत… 

यावर ते भाजीपाला विकतील, लिंबू सरबत विकतील किंवा भंगाराचा व्यवसाय करतील…. काहीही करोत… पण माणसं म्हणून जगतील…!

रस्ता वर्षानुवर्ष तिथेच होता….पोचायचं ठिकाण सुद्धा वर्षानुवर्ष तिथंच जवळच होतं… ते वाट चुकले होते… मी फक्त तुमच्या साथीने;  “वाटाड्या”  होऊन त्यांना वाट दाखवली…. बाकी माझं काहीही कर्तुत्व नाही…. !!! 

4. जिला कुणीही नाही अशी एक मावशी, दोन लहान मुलं पदरात असणारी एक विधवा ताई…. फरशीवर पाणी सांडल्यानंतर ते अस्ताव्यस्त जसं कुठेही दिशाहीन फिरतं तसाच दिशाहीन फिरणारा एक तरुण….!

तिघेही गटांगळ्या खात होते…. फक्त एका काडीचा आधार हवा होता… आपल्या सर्वांचे वतीने तिघांनाही हा काडीचा आधार दिला आहे. 

 तिघांनाही छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीने आर्थिक मदत केली आहे. 

वरील सहा जणांच्या आयुष्याविषयी जर लिहायचं ठरवलं तर सहा स्वतंत्र पुस्तक होतील….! 

तुटून फुटून गेली होती ही माणसं…. पण हरकत नाही, आयुष्याला आकार द्यायला स्वतःला तोडून फोडूनच घ्यावं लागतं…! 

भीक न मागता यांना काम करायला सांगितलं आहे… त्यांना हे सुद्धा सांगितलं आहे की, फक्त नशिबावर विश्वास ठेवू नका… निसर्गाने सुद्धा हाताच्या रेषांआधी प्रत्येकाला बोटं दिली आहेत…. ती काम करण्यासाठी… मेहनत करण्यासाठी… भविष्य बघण्यासाठी नव्हे…! 

शैक्षणिक 

दुसरी- तिसरी -पाचवी, सातवी- बीबीए – कम्प्युटर सायन्स – यूपीएससी… आमची मुले या इयत्तांमध्ये शिकतात…! 

या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत…! 

माझ्या आयुष्यावर जे पुस्तक लिहिलं आहे…. ते आपण विकत घेतलं आणि म्हणून मी या मुलांच्या फिया भरू शकलो…! 

जी मुलं राहिली असतील त्यांच्या फीया जूनच्या पहिल्या आठवड्यात भरणार आहोत…! 

ज्यांना या अगोदर शाळाच माहीत नव्हती, अशा सर्व मुला मुलींना मॉडर्न स्कूल, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन देत आहोत. 

यातला एक जाणता मुलगा परवा रागाने मला म्हणाला, ‘असल्या भिकारी आई बापाच्या घरात माझा जन्म झाला म्हणून माझं आयुष्य वाया गेलं… चांगल्या घरात जन्मलो असतो तर माझ्या आयुष्याची अशी वाट नसती लागली… मला जर वरदान मिळालं; तर मी पहिल्यांदा आई बाप बदलेन…’ 

त्याला फक्त इतकंच सांगितलंय…. ‘आतापर्यंत भर समुद्रात जे जहाज तुला घेऊन आलंय त्या जहाजाला विसरू नकोस… या जहाजाविषयी कृतज्ञता बाळग… नाहीतर इथपर्यंत सुद्धा आला नसतास…. वादळ आलं; की दिशा बदलायची असते बाळा… जहाज नव्हे…! 

डोळे तपासणी

ज्यांना डोळ्यांचे काही त्रास आहेत, अशा सर्वांना आपण महिन्यातील एका दिवशी, एका ठिकाणी जमा करतो आणि त्या सर्वांना एकत्रितपणे घेऊन डोळे तपासणी / ऑपरेशन साठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिथे एक तर त्यांना चष्मा मिळतो किंवा डोळ्यांचं ऑपरेशन होतं. 

परंतु आमच्याकडे असे अनेक लोक आहेत, ज्यांना इतके शारीरिक त्रास आहेत की, त्यांना आमच्याबरोबर, आमच्या गाडीत बसून तिथं येणं सुद्धा जमत नाही… ऑपरेशन आणि तपासणी तर दूरच…

अशांसाठी आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे. रस्त्यावरच डोळे तपासणी करून आम्ही रस्त्यावरच आता त्यांना चष्मे द्यायला सुरुवात केली आहे. 

जवळपास अंधत्व आलेल्या माझ्या या लोकांना जेव्हा दिसू लागतं… तेव्हा माझ्या नजरेत नजर घालून माझ्याशी ते मायेनं बोलतात… आणि त्या प्रत्येक डोळ्यात मला मग सूर्य दिसतो…. ! 

सुरकुतलेले खरबरीत हात मग किरण होऊन माझ्याकडे झेपावतात…. आणि हे किरण, माझ्या मस्तकाचे, गालाचे आणि हाताचे मुके घेतात…! 

आणि मग सुर्य आकाशात नाही… तो आपल्या आई – बाबा,आजी आणि आजोबाच्या डोळ्यात आपल्याच घरी आहे हे उमगतं…! 

कोण म्हणतं सूर्याजवळ जाणं अशक्य आहे…? आपले बाबा आणि आजोबा यांच्या जवळ एकदा मनापासून जाऊन बघा… सूर्य तिथे भेटेल…! 

चंद्रावर जाण्यासाठी कोणत्याही यानाची गरज नाही… आईचे / आजीचे पाय एकदा मांडीवर घेऊन बघा…. चंद्र तिथे भेटेल…!!

जे काही थोडंफार करू शकलो तुमच्या साथीनं, त्या प्रत्येक वेळी डोळ्यातून आनंदाश्रू गालावर ओघळले… 

अश्रूंचा हा खारट स्वाद कोणत्याही मिठाई पेक्षा कमी नव्हता…! 

माझ्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण केवळ तुम्हा सर्वांमुळे आले आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपल्या सर्वांच्या पायाशी सविनय सादर…!!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पाऊसवेडे कवी…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पाऊसवेडे कवी…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

जीवघेण्या ग्रीष्म ऋतूची काहिली पृथ्वीचे अंग प्रत्यंग जाळतेय. जागोजागी भेगा पडून विच्छिन्न झालेली ही वसुंधरा जणू भग्न मूर्तीसारखी भकास बघतेय एकटक आसमंताकडे! या कोमलांगी प्रेयसीला समीराचे उष्ण श्वास अंतर्बाह्य पोळत आहेत, त्यावर ‘चंदनाची चोळी’ देखील शीतलता प्रदान करायला असमर्थ आहे! नजरेत प्राण एकवटून तिच्या अंतरीची आस वाट बघतेय, कुठं दिसतोय का ‘शामलवर्णीय मेघदूत’ अन त्याची चंचल खट्याळ सखी विद्युल्लता! कारण या दूताने ग्वाही दिल्याशिवाय तिचा प्रियतम अवतरतच नाही. अन एक दिवस या जीवघेण्या प्रतीक्षेचा अंत होतो. श्यामवर्णी मेघांच्या सेनेची अति जलद गरुडभरारी आसमंतात दृष्टिपथास येते! एका बाजूने आक्रमण करीत करीत संपूर्ण नीलाकाशाला व्यापून टाकीत युद्ध जिंकल्याच्या आनंदात त्यांचे गडगडाटी हास्य पृथ्वीला तिच्या प्रियकराची चाहूलच वाटते. मेघाच्या संगती त्याची प्रेयसी विद्युलता आपले चपलांगी हास्य करीत मेघांना रुपेरी रंगाने सजवते. हा जामानिमा तयार झाला की येतो पाऊस. आपल्या प्रेयसी वसुंधरेला कोवळ्या नाजूक सरींच्या स्पर्शाने हलकेच गोंजारून मग मात्र आवेगाने तिचे अंग अंग आपल्या सहस्रबाहू जलधारांनी कवेत घेत बरसतो! या प्रणयाचे साक्षीदार असतात वृक्षलता, आनंदाने आपला पिसारा फुलवून नर्तन करणारे मयूर आणि पावसाच्या एका थेंबानेच तृप्त होणारा चातक!

मंडळी, पाऊस म्हटला की सामान्यजनांना सय येते ती वाफाळलेल्या अदरक घातलेल्या कडक मीठी चाय अथवा जायफळ घातलेल्या धुंद वाफेने गंधाळलेल्या कॉफीची, सोबतीला गरमागरम कांद्याची किंवा तत्सम भजी असली तर ब्रम्हानंदी टाळी लागलीच म्हणून समजा आमची! पण या ‘कवी’ नामक फुलपाखरी गिरकी घेत पावसाचा अनुभव घेणाऱ्या व्यक्तींची जातकुळीच वेगळी हो! आपण त्यांच्या शब्दभ्रमाच्या भुलभुलैयात मस्तपैकी जाणून बुजून बंदिस्त होऊन मज्जा मज्जा करीत ‘अंगे भिजली जलधारांनी’ असा अनुभव घ्यायचा!      

या मनोहर हिरवाईने लगडलेल्या, रंगीबेरंगी सुमनांच्या ताटव्याने बहरलेल्या वर्षाऋतूचा देखणा नायक असतो ‘पाऊस’! मराठी माणसाच्या मनांमनांत रुजलेले हिरवेजर्द काव्य म्हणजे बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांचे ‘बालभारती’ त प्रस्थापित ‘श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे । क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।’ ही आद्य पाऊस कविता! कितीही वेळा वाचा, हिची सर्वकालीन हिरवीकंच हिरवाई कधीच कोमेजत नाही. या बहुप्रसवी भूमीचे सृजन याच पावसाने फुलते. उन्हाने त्रासलेल्या मानवाला तर हा पाऊस म्हणजे आनंदच नव्हे तर नवसंजीवनी देणारा ठरतो. म्हणून तर पावसाळा हा ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’ (कवयित्री-शांताबाई शेळके) आहे.   

‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा, 

पाचूचा वनी रुजवा

युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा’

लहान मुलांची (त्यांच्या लहानपणापासूनच) अन पावसाची गट्टी अश्शी घनदाट असते, की ‘ये रे ये रे पावसा रुसलास का माझ्याशी गट्टीफू केलीस का’ (कवयित्री-वंदना विटणकर) असे ती त्यालाच विचारतात. उत्तर मिळाले नाही तर मग ही मुले पाऊसदादाला सरळ एका ढब्बू पैशाचे आमिष द्यायलाही कमी करत नाहीत.  म्हणून तर अखिल बालक  मंडळी पहिल्या पावसाची एंट्री व्हावी म्हणून ‘ये रे येरे पावसा तुला देतो पैसा’, असे घोकत असतात. गोड छकुल्याने असा पैसा दिला की, गहिवरलेला आज्ञाधारक पाऊस लगेच हजर झालाच म्हणून समजा!  

आता बाळ थोडं मोठं झालं की त्याला अवचितच शाळा नामक खलनायिका भेटते. मग काय आता कवितेचा रागरंगच बदलतो. ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’ (कवी-मंगेश पाडगावकर) असे म्हणत शाळेला वैतागलेली पोरं मग डायरेक्टली भोळ्या शंकरालाच साकडे घालतात. बघा कशी गंमत आहे, धो धो पाऊस अंगणात अन रानावनात कोसळतोय अन ही आई नावाची बाई मुलाला घरात कोंडून ठेवतेय! किती हा हिचा जाच! मग तिची विनवणी अन लांगूल चालन करावे लागणारच ना. ‘ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे’ (आमच्या अति लाडक्या कवयित्री-वंदना विटणकर) अन एकदाचं बाहेर पडलं की धुमशान पळतंय कसं बघा पोरगं पावसाच्या सरी झेलायला, अन गम्माडी गंमत करायला, दोस्तांबरोबर फेर धरत गाणी हवीच- ‘पिरपिर पिरपिर पावसाची, त्रेधा तिरपिट सगळ्यांची’ (परत वंदनाताईच हो!) किंवा झालंच तर ‘अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ । ढगाला उन्हाची केवढी झळ । थोडी न् थोडकी लागली फार । डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।’ (कवी- संदीप खरे)

मैत्रांनो, आता जाऊ या तिथं, जिथं राधा अधीर होऊन म्हणतेय ‘रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणिच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे?’ (जनकवी पी. सावळाराम) निसर्ग कवी बा. भ. बोरकरांची ‘सरींवर सरी आल्या ग’ ही सदा प्रफुल्लित कविता आठवते कां? गोकुळात बरसणारा पाऊस, हिरवेगार कदंब वृक्ष, यौवनाच्या उंबरठ्यावर थबकलेल्या वेली, मेघांची गर्जना, विजेची पैंजणे आणि कृष्णधुन आळवणारी त्याची वेणू, यांच्या तालासोबत मनमोहक रंगांनी सजलेले आपले पिसारे फुलवीत मिरवणारे मयूर! त्यांच्यासोबत दुग्धधारांसारख्या भासणाऱ्या धवल जलधारांत सचैल न्हालेल्या गोपींचे कृष्णाशी एकरूप होण्याचे वर्णन बोरकरांनीच करावे! (ही समग्र कविता ऐकावी यू ट्यूब वर पु ल देशपांडेंच्या स्वरात!) 

☆ सरिंवर सरी: सरिंवर सरी… ☆

सरिंवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग

गोपी झाल्या भिजून-चिंब, थरथर कापती निंब-कदंब

घनांमनांतुन टाळ-मृदंग, तनूंत वाजवी चाळ अनंग

पाने पिटिती टाळ्या ग, सरिंवर सरी आल्या ग

मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधून

वनांत गेला मोर भिजून, गोपी खिळल्या पदी थिजून

घुमतो पावा सांग कुठून? कृष्ण कसा न उमटे अजून?

वेली ऋतुमति झाल्या ग, सरिंवर सरी आल्या ग

हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग

दुधात गोकुळ जाय बुडून, अजून आहे कृष्ण दडून

मी-तू-पण सारे विसरून, आपणही जाऊ मिसळून

सरिंवर सरी आल्या ग, दुधात न्हाणुनि धाल्या ग

सरिंवर सरी: सरिंवर सरी….

कवी ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो’ ही कविता मेघांनी आच्छादलेल्या आकाशासारखी गूढरम्य आहे. जणू विरहाचे दुःख डोळ्यांच्या पापण्यांतच थिजल्यासारखे वाटते!  

‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने’

मंडळी या निसर्गराजाच्या वर्षाऋतूत भावानुरागी कवीचे मन बरसणाऱ्या जललहरीं सोबत थुई थुई नाचत असते. या पावसाचे नखरेल रुप विविधरंगी आणि बहुढंगी! कधी कोमल हलकेच थेंबाथेंबाने अंगण भिजवणारा रोमांचकारक शिडकावा जणू स्मितहास्याची हळुवार लकेर, वा मंद शीतल समीराची झुळुकच, अथवा रसरंगात दंग असलेल्या मैत्रिणींच्या अंगांवर शिंपडलेले तजेलदार गुलाबपाणी समजा! या पावसाचा मूड पण वेगवेगळा असतो बरं कां! एखाद्या मैफिलीत जाणत्या शास्त्रीय गायकासारखा इंद्रधनुष्याच्या किनारीने नटलेली निलाकाशी शाल पांघरून कधी द्रुत तर कधी विलंबित तालात तो गायनी कला दर्शवतो, तर कधी हाच पाऊस नद्या, नाले, तडाग इत्यादींची तृष्णा एकाच वेळी भागवण्याकरता रसरसून अतिवेगाने अविरत बरसत असतो. 

ग्रीष्म ऋतूच्या गर्मीत तिष्ठत असलेल्या विराणी धरेला पहिल्याच भेटीत हळुवारपणे कवेत घेत तिच्यावर मृदगंधाची पखरण करणारा हा पहिला पाऊस तर कवीला अतिप्रिय, त्याच्या प्रणयिनीची आठवण करून देणारा! मंगेश पाडगावकर यांच्या प्रणयधुंद कवितेतील या ओळी पहिल्या ओलेत्या भेटीचे अत्तर शिंपीत येतात.  

‘भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।

धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।

ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।

श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।’

मैत्रांनो, या रमणीय वर्षा ऋतूचा अनुभव घेतल्यानंतर आता लेखाच्या अंती याच पावसाचे रौद्ररूप देखील स्मरण्याची वेळ आलीय! आकाश भयावह काळ्याकभिन्न राक्षससदृश मेघांनी संपूर्णपणे आच्छादलेले, त्यातच मध्ये मध्ये आपली समग्र शक्ती एकवटत सुरु असलेले विजेचे भीषण तांडव, नदी नाल्यांचा जीवानिशी मांडलेला आकांत ऐकणारे कुणीच नाही. ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ (कवी- ग. दि. माडगूळकर) असा प्रलयंकारी घनघोर पाऊस वेड्यासारखा मुसळधार कोसळतोय. इतके दिवस पेरणी करून आकाशात डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थिजले. अन आता त्याच पिकाची नासाडी करीत त्याच्या कमकुवत खोपट्याकडे तुच्छ नजरेने पाहणाऱ्या मस्तवाल पावसाला शेतकऱ्याची कारभारीण शिवी घालतेय, ‘आरं गाभ्रीच्या पावसा!’ (कवी – स्वप्निल प्रीत) 

‘आरं गाभ्रीच्या पावसा! आता कशी दया आली 

कवतिक नाही तुजं, जवा तहान आटली ।।धृ।।

ओली ठिगळाची चोळी, वर छप्पर गळते

कागदाच्या होडीवानी माजं खोपटं बुडते ।।१।।

आला पडशाचा ताप, कशी जाऊ मी कामाले

तुझा नाचणारा मोर, घास देतो का पोटाले ।।२।।

रित्या पोटी बाप ग्येला, डोळं होतं आभायाला

फक्त आईच्या डोयांत, तवा पाऊस पाह्यला ।।३।।

त्याच दुष्काळात माझं, सारं सपान सुकलं

आता नको तुझी माया, मन तुले उबगलं ।।४।।

प्रिय वाचकांनो, वरील लेखाकरता मी मुद्दामच बहुतेक गेय कविता निवडल्या आहेत. तुम्हाला भावणारी पावसाची नटरंगी रूपे एन्जॉय करतांना वाफाळत्या ‘चाया गरम’ बरोबर यू ट्यूबवर या कवितांचा आशयघन आस्वाद घ्यायला मात्र विसरू नका बरं कां! धन्यवाद! 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘निरागसता आणि इमानदारी…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘निरागसता आणि इमानदारी…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं..

साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्‍यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, “व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?” मास्तर मंजे कंडक्टर.

मी म्हटलं आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं.

आरं देवा… मंग तिकीट??

त्ये खालीच, ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय.

मग आता???

“तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही.”

“दुसरी इयत्ता पास हाय म्या. म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.

त्ये मरुदे तिकडं. वाचाय येतंया मला.

सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले. गडबडीत बाकी न्हाय वाचलं.”

“अहो आज्जी. आपण फक्त सांगू तसं. असंबी त्ये बेंन कुणाचं काय ऐकत नाहीत, तरिबी उगा वाईच खडा टाकून बघू. त्येबी, तपासणीसाठी आले तर मग बघू…”

दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही.

डोक्यावरचा पदर सावरत, हळूच म्हणाली,

“नशिबी गरिबी पूजल्या, त्ये परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेक्कार.”

ह्या सगळ्या झांगड गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टॅण्ड मध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं, बाहेर कुणी तपासनीस नव्हता. आजीला म्हटलं, “आज्जी, आता सुमडीत उतरा. अन हिकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या भैर पडा.”

आजी कैच बोलली नै.

बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आज्जी दिसली. म्हंटलं…

“आज्जी अजून इथंच?”

आज्जीनं चोळीत खुपसलेलि पर्स काढली, त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं.

आज्जीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काऊंटर वरनं काढलं होतं. मला म्हणाली

“टाक फाडून. म्या भैर आल्यावर फाडणारंच व्हते.

माघारी जाताना मात्र, न इसरता आधी तिकीट काढील.”

म्हटलं, आज्जी…. “पैकं जास्त झालं असतील तर नाष्टा द्या हॉटेलात…”

आज्जी हसली…. म्हणाली “जिच्या दर्शनाला आले, त्या अंबा बाईनं तिची जबाबदारी पार पाडली.

कुठलं गालबोट नं लावता आणलं इथवर. वाटेत उतरवलं असते मला, पकडलं गेले अस्ते तर. पण त्या अंबा बाईनं चार चौघात लाज राखली.

दंड भराय इतकं पैकं न्हाईत पण मग आता म्या किमान हाय तेव्हढं तिकीट काढून, फाडून टाकलं म्हंजे झालं की रं हिशेब बराबर….आता जाताना मात्र इस्रायची न्हाई तिकीट काढायला.

महालक्ष्मीच्या दारात जायचं अन त्येबी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून… हे बरं न्हाई …”

मी काहीच नं बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आज्जी गेली अंबाबाई च्या दर्शनाला. मी मात्र तिथनंच हात जोडले.

ढीग इयत्ता गिरवल्या तरी ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही, हेच खरं.

असली गोडं माणसं म्हणजे आपल्या समाजातली श्रीमंती आहे, एखादेवेळी आर्थिकदृष्ट्या दुबळं असतीलही, तो भाग अलाहिदा पण निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी ही लोकं, मातीशी घट्ट जोडलेली आपल्या महाराष्ट्राची मुळ ओळख म्हणजे हीचं सोन्यानं बनलेली माणसं.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जायचेच जर न येण्यासाठी … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ जायचेच जर न येण्यासाठी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

पुन्हा परत ना इथे यायचे

ठरवूनच ती निघून गेली

ती येण्याची वाट परंतू

इथे वाट पहात थांबली

*

 त्या वाटेवर तिच्याचसाठी

 मऊ रेशमी हिरवाई आली

 अन् वाटेच्या अगदी मध्ये

 झाड उभे विश्रांतीसाठी

*

 येणार जर नव्हती तु तर

 वाट कशाला आखीव मागे

 पाहणारा गुंततो  आपसूक

 आठवणींचे उलगडून धागे

*

  जायचेच जर न येण्यासाठी

  काहीही  ठेवावे  ना  पाठी

  खाणाखुणा नष्ट कराव्या

  हवे ते जपती काळीजकाठी

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-25 – पेंटर आर्टिस्ट से कार्टूनिस्ट तक संदीप जोशी… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग -25 – पेंटर आर्टिस्ट से कार्टूनिस्ट तक संदीप जोशी… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)

चंडीगढ़ की यादों में गुलाब की तरह महकती एक याद हैं – संदीप जोशी ! वही संदीप जोशी, जिसके बनाये कार्टून आप देखते हैं, सुबह सुबह ‘दैनिक ट्रिब्यून’ में ताऊ बोल्या’ व ‘द ट्रिब्यून’ में ‘ इन पासिंग’ के रूप में ! जी हां, आज उसी की बात होगी, जो‌ उत्तरी भारत के प्रमुख कार्टूनिस्टों में से एक है।

मेरी पहली पहली मुलाकात करवाई थी, खटकड़ कलां के गवर्नमेंट आदर्श सीनियर सेकेंडरी स्कूल के सहयोगी डाॅ सुरेंद्र मंथन ने ! जरा यह भी बताता चलूँ कि डाॅ सुरेंद्र मंथन ‘द ट्रिब्यून’ के चंडीगढ़ के स्टाफ रिपोर्टर श्याम खोसला के छोटे भाई थे। तो एक बार जिन दिनों डाॅ वीरेंद्र मेहंदीरत्ता पंजाब विश्वविद्यालय के हिंदी विभाग के अध्यक्ष थे तब उन्होंने दो दिवसीय कहानी कार्यशाला आयोजित की थी, जिसमें डाॅ महीप सिंह मुख्यातिथि थे और पहले दिन सबसे पहले मेरी ही कहानी ‘ अगला शिकार ‘ का पाठ करवाया गया।

पहले दिन का सत्र समाप्त होते ही एक  छोटा सा लड़का डाॅ मंथन को मिलने आया। वह संदीप जोशी था। चर्चित कथाकार बलराज जोशी का बेटा ! बलराज जोशी से मेरी मुलाकात फूलचंद‌ मानव ने ही करवाई थी और चंडीगढ़ के सेक्टर बाइस स्थित काॅफी हाउस में काॅफी की चुस्कियों के बीच मैं अनाड़ी, अनजान सा कथाकार कहानी लिखने का ककहरा सीख रहा था ! फिर बलराज जोशी असमय ही चले गये दुनिया से, पीछे एक बेटा और पत्नी को संघर्ष के लिए जूझने के लिए ! जोशी की पत्नी को पति की जगह अनुकम्पा आधार पर जाॅब भी मिल गयी और सरकारी आवास भी सिर ढंकने के लिए ! वहीं संदीप जोशी से मेरा परिचय करवाया डाॅ मंथन ने और बड़े आग्रह से कहा कि संदीप बहुत ही शानदार पेंटिंग्स बनाता है, क्यों न एक फीचर संदीप पर लिख दूँ ‘दैनिक ट्रिब्यून’ में ! मैंने कहा कि क्या ऐसे अचानक मुलाकात के बाद खड़े खड़े फीचर लिखा जाता है ! मुझे स़दीप की पेंटिंग्स देखनी पड़ेंगी ! उस दिन रहने का इंतज़ाम विश्वविद्यालय में ही था लेकिन डाॅ मंथन ने सुझाव दिया कि आप संदीप के साथ इसके घर आज रह लीजिए, और देख लीजिए इसकी पेंटिंग्स ! सुझाव अच्छा लगा और मैं अपना बैग लिए संदीप जोशी की साइकिल के पीछे बैठकर इनके सरकारी आवास पर पहुँच गया। वहाँ इनकी मम्मी ने बड़ा अच्छा दाल भात बनाया और जब हम दोनों फ्री हुए खाने पीने से तब मैंने कहा कि अब दिखाओ अपनी पेंटिंग्स ! एक कमरे में संदीप की पेंटिंग्स खाकी कवर्ज में लपेटीं बड़े करीने से रखी थीं। वह एक एक कर कवर उतार कर पेंटिंग्स दिखाता गया और एक पेंटिंग जो मुझे पसंद आई उसकी फोटोकॉपी डाक से भेजने की कहकर मैं नवांशहर लौट आया। कुछ दिनों बाद डाक में फोटोकॉपी मिल गयी जो ‘दैनिक ट्रिब्यून’ में फीचर के साथ प्रकाशित भी हो गयी। मैं नवांशहर से ‘दैनिक ट्रिब्यून’  का अंशकालिक रिपोर्टर था और जब भी चंडीगढ़ जाता तब ‘दैनिक ट्रिब्यून’ कार्यालय जरूर जाता। संदीप जोशी पर लिखे फीचर के बाद जब ऑफिस गया तब समाचार संपादक व मेरे पत्रकारिता के गुरु सत्यानंद शाकिर ने संकेत से अपनी ओर बुलाया। वे मुझे मेरे प्रकाशित समाचारों पर टिप्स देते रहते, कभी डांट देते तो कभी सराहते ! उस दिन सराहना मिली कि संदीप जोशी पर लिखकर बहुत अच्छा किया, मैं भी बलराज जोशी का मित्र रहा हूँ और मैं इस परिवार की मदद करना चाहता हूँ लेकिन मेरे पास इनकी कोई जानकारी नहीं थी। तुम एक उपकार और कर दो, उनके बेटे संदीप को मिला दो ! मैंने कहा कि आज ही मिलवाता हूँ और मैं लोकल बस में सेक्टर बाइस स्थित संदीप के घर पहुँच गया। जब सारी बात बताई तब संदीप ने अपनी साइकिल उठाई और मुझे पीछे बिठाकर सेक्टर 29 तक ‘दैनिक ट्रिब्यून’ के ऑफिस तक ले गया ! सत्यानंद शाकिर के सामने संदीप को ले जाकर खड़ा कर दिया। उनके मन में पहले से ही कुछ चल रहा था। वे संदीप जोशी और मुझे संपादक राधेश्याम शर्मा के पास ले गये और संदीप पर प्रकाशित मेरा फीचर दिखाकर संदीप के बारे में कुछ प्लान करने की कही और कुछ दिन बाद ‘दैनिक ट्रिब्यून ट्रिब्यून’ में ‘ताऊ बोल्या’ कार्टून के साथ संदीप जोशी का कायाकल्प एक कार्टूनिस्ट के रूप में हो चुका था ! फिर सन् 1990 में मैं ‘दैनिक ट्रिब्यून में उप संपादक के तौर पर आ गया। संदीप तब तक अपनी पढ़ाई पूरी कर चंडीगढ़ प्रशासन में अच्छी नौकरी पा चुका था और अब उसके पास चमचमाता स्कूटर था। उसका कार्टून कोना अब भी बरकरार था। एक दिन संदीप मेरे पास सलाह लेने आया कि उसे ‘जनसत्ता’ के प्रमोद कौंसवाल यह ऑफर दे रहे हैं कि ‘जनसत्ता’ में कार्टून बनाने का काम शुरू करवा देता हूं, जो अस्थायी नहीं बल्कि स्थायी नौकरी के रूप में होगा ! संदीप मेरे से सलाह मांगने आया था कि यह पेशकश स्वीकार कर‌ लूं या नहीं ?

मैंने कहा- संदीप कार्टून के कैरीकैचर रोज़ रोज़ लोकप्रिय नहीं होते ! इसी ‘ताऊ बोल्या’ ने तुम्हें चौ देवीलाल से पांच हज़ार रुपये का इनाम दिलवाया और नये कार्टून को लोकप्रिय होने में समय लगेगा और यह जरूरी नहीं कि लोगों को पसंद आये या न आये ! इस तरह मेरी राय संदीप को सही लगी और उसकी लम्बी पारी आज तक जारी है।

इसके बाद मैंने ‘द ट्रिब्यून’ के सहायक संपादक कमलेश्वर सिन्हा को जानकारी दी कि संदीप को कैसी ऑफर आ रही है। इसके बारे में कुछ सोचिए ! अब आगे क्या हुआ या कैसे हुआ, मैं नही जानता लेकिन संदीप जोशी ‘ट्रिब्यून’ में स्थायी तौर पर आ गया और इस तरह कार्टूनिस्ट के तौर पर हम उसे आज तक देख रहे हैं। उसके बनाये दो कार्टूनों का आनंद लीजिए ! पहला जब चौ बंसीलाल को केंद्र से हटाकर हरियाणा का मुख्यमंत्री बनाया गया था और उन्हें बगल में फाइलें दबाये दिखा कर नीचे कैप्शन‌ थी – इबकि बार मैं इमरजेंसी लगाने नहीं आया ! यह ह्यूमर नहीं भूला। इसी तरह दूसरा कार्टून याद है। ‌मैं हिसार आ चुका था। ‌कार्टून था चौ भजनलाल पर ! गोलमेज़ के एक तरफ कांग्रेस हाईकमान सोनिया गाँधी बैठी हैं और सामने चौ भजनलाल !

नीचे कैप्शन थी – यो कैसी मीटिंग होवे? एक को हिंदी को न आवै और दूजे को अंग्रेज़ी ! उस दिन चौ भजनलाल हिसार में ही थे और मीडिया को बुला रखा था। मैं ‘दैनिक ट्रिब्यून’ साथ ही ले गया और चौ भजनलाल को वह कार्टून दिखाया। वे बहुत हंसे और बोले- इतनी अंग्रेज़ी तो आवै सै !

तीसरी बार संदीप ने फिर सलाह मांगी, जिन दिनों मैं ‘दैनिक ट्रिब्यून’ से इस्तीफा देकर हरियाणा ग्रंथ अकादमी का उपाध्यक्ष हो गया था। ‌संदीप को हरियाणा साहित्य अकादमी पुरस्कृत करने जा रही थी और वह असमंजस में था कि पुरस्कार ग्रहण करे या नहीं ? मैने सलाह दी कि यह तुम्हारी अपनी प्रतिभा का सम्मान है, ले लो और वह पुरस्कार लेने समारोह में आया। एक बार वह हिसार के बड़े स्कूल  विद्या देवी ज़िंदल स्कूल की आर्टिस्ट कार्यशाला में आया, तब मुझे इतनी खुशी हुई कि उसे अपने घर बुलाया और मीडिया के मित्रों को भी बुला लिया ! इस तरह अनजाने ही मैं संदीप जोशी की ज़िंदगी के महत्त्वपूर्ण मोड़ों पर मैं शायद उसके साथ रहा ! अब वह रिटायरमेंट के निकट है और सोच रहा है कि फिर से कार्टूनिस्ट से पेंटर आर्टिस्ट बन‌ जाये और अपने कथाकार पिता बलराज जोशी पर किताब प्रकाशित करने की योजना भी है !

मेरे अंदर से आवाज़ आती है कि कहीं मुझसे कोई भूल‌ तो नहीं हुई, एक प्रतिभाशाली पेंटर आर्टिस्ट को कार्टूनिस्ट बनने की ओर‌ सहयोग करके?

शायद आज इतना ही काफी! कल फिर मिलते हैं!

क्रमशः…. 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – “महबूबा” ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। क्षितिज लघुकथा रत्न सम्मान 2023 से सम्मानित। अब तक 450 से अधिक लघुकथाएं रचित एवं बारह पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं  (वार्षिक)  का  सम्पादन  एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन। आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है, जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं। आज प्रस्तुत हैआपकी  एक विचारणीय लघुकथा – “महबूबा“.)

☆ लघुकथा – महबूबा ☆ डॉ कुंवर प्रेमिल 

एक वृद्ध महाशय अपनी छड़ी टेकते हुए पार्क में दाखिल हुए। उनके होंठ एक फिल्मी गीत गुनगुना रहे थे।

-आने से उसके आए बहार–बड़ी मस्तानी है मेरी महबूबा—महबूबा।

तभी एकाएक  सामने आई युवती को देखकर वह सकपका गए।

कहीं यह युवती छेड़छाड़ का उलाहना देकर तिल का ताड़ ना बना दे। वृद्धों पर इस तरह के इल्जाम जब तब लगते रहे हैं।

वह रास्ता बदलकर पतली गली से निकलना ही चाहते थे कि तरुणी बोली – ‘दादाजी आप तो इस उम्र में भी इतना अच्छा गा लेते हैं। यह गाना वहां बेंच पर बैठकर सुनाइए न, मजा आ जाएगा।’

वृद्ध महाशय अपनी आंखें झपकाने लगे। यह अजूबा कैसे हुआ, उसे तो इस युवती की अभद्र भाषा से दो चार होना था।

भाव विभोर होकर बोले – अरे कुछ खास नहीं बेटी, मन बहलाने के लिए थोड़ा बहुत गा लेता हूं।

मेरी पत्नी को भी यह गाना पसंद है। छै महीने अस्पताल में रहकर वह आज ही घर लौटी है। मैं गाने को उसे सुनाने के लिए रिहर्सल कर रहा हूं।

उधर युवती सोच रही थी – कौन कहता है कि सारे बुजुर्ग एक से होते हैं जो अपने चेहरे पर एक दूसरा चेहरा लगाकर  घर से बाहर निकलते हैं। जिन पर महिलाओं को छेड़छाड़  का इल्जाम जब तब लगता रहता है।

युवती के चेहरे पर एक गुनगुनी मुस्कान खेलने लगी। उसे लगा कि यह वृद्ध महाशय थोड़ी देर के लिए ही सही अपने जवान जिस्म में परिवर्तित हो गए हैं और वह उनकी महबूबा बन गई हैं।

❤️

© डॉ कुँवर प्रेमिल

संपादक प्रतिनिधि लघुकथाएं

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चुप्पी – 23 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  चुप्पी – 23 ? ?

(लघु कविता संग्रह – चुप्पियाँ से)

मेरी चुप्पी का

जवाब पूछने आया था वह,

मेरी चुप्पी का

एन्सायक्लोपीडिया

बृहद शब्दकोश देखकर

चुप हो गया!

© संजय भारद्वाज  

प्रातः 9:45 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना ज्येष्ठ पूर्णिमा तदनुसार 21 जून से आरम्भ होकर गुरु पूर्णिमा तदनुसार 21 जुलाई तक चलेगी 🕉️

🕉️ इस साधना में  – 💥ॐ नमो भगवते वासुदेवाय। 💥 मंत्र का जप करना है। साधना के अंतिम सप्ताह में गुरुमंत्र भी जोड़ेंगे 🕉️

💥 ध्यानसाधना एवं आत्म-परिष्कार साधना भी साथ चलेंगी 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #244 – 129 – “उम्मीद ए वफ़ा फिर दगा दे गई है…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल “उम्मीद ए वफ़ा फिर दगा दे गई है…” ।)

? ग़ज़ल # 129 – “उम्मीद ए वफ़ा फिर दगा दे गई है…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

मिला हमको भी हमसफ़र ज़िंदगी का,

मगर मुख़्तसर था सफ़र ज़िंदगी का।

*

मुश्किलें  इस  कदर सिर पर आईं,

हमदम बन बैठा क़हर ज़िंदगी का।

*

उम्मीद ए वफ़ा फिर दगा दे गई है,

किस तरह अब कटे पहर ज़िंदगी का।

*

न  होंगी  कम  दिक़्क़तें मेरी रोने से,

ग़म मुझे मिला इस कदर ज़िंदगी का।

*

सरेशाम  अंधेरा  छाया  है ‘आतिश’,

किस तरह अब हो बसर ज़िंदगी का।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ – Bemused Life… – ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem ~ Bemused Life ~We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.  

☆ ~ Bemused Life  ~? ☆

O’ Life! I gave you so much of my sweat and

blood but you’ve given me hardly anything 

If you want, you can search my blank hands

There is nothing  left  in these bare hands,

except for a few meaningless cursed lines…

Isn’t there anything left for me in your lap?

I’ve seen so many human demigods here that

in front of whom the real God fades away

Oh God, why’ve you sent such a lacklusterless    

spring this time, with no greenery at all…

But my heart is too stubborn like a wilful child

Either it wants everything or nothing at all..!

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares