मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोष ना कुणाचा… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दोष ना कुणाचा… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(दुसरं म्हणजे, बेंगलोरमध्ये पुढील शिक्षणासाठी चांगली सोय होती. आणि अतिशय महत्त्वाचे कारण – मुंबईच्या घामट हवेपेक्षा बेंगलोरची थंड हवा मला मानवणारी होती.) – इथून पुढे – 

शेवटी बेंगलोरला जायचा दिवस उजाडला. माझी सायंकाळची ६ ची ट्रेन होती. सकाळपासून मिता आमच्याकडेच होती. आईला जेवणात मदत कर, माझी कपडे इस्त्री करुन दे, माझ्या बुटांना पॉलीश कर. मिता नुसती धावत होती. शेवटी दुपारी ४ वाजता मी, आई, मुन्नी आणि मिता टॅक्सी करुन निघालो. बाबा परस्पर सीएसटी स्टेशनवर येणार होते. मी एवढ्या लांब जाणार म्हणून आई फार नर्व्हस झाली होती. टॅक्सीत सर्वजण गप्प गप्प होते. टॅक्सी स्टेशनवर पोहोचली, मिताला माझ्या दोन्ही हॅण्डबॅग खांद्याला लावल्या. मी एक सुटकेस घेतली. मिताने आईला आणि मुन्नीला घ्यायला काहीच सामान ठेवले नाही. गाडी लागलेली होती. माझ्या आधी मिता गाडीत चढली आणि बर्थ नंबर शोधून माझे सामान बर्थवर लावलेसुध्दा. आई म्हणाली, ‘‘मुन्नी ती मिता किती चटपटीत बघ, नाहीतर तू. ’’ मुन्नीला पण लटका राग आला. हो, हो, मिता चटपटीत आणि मी आळशी. बसवून ठेव मिताला मांडीवर. सर्वजण खूप हसलो.

गाडी सुटायची वेळ झाली आणि मी सोडून सर्वजण खोली उतरले. मला सर्वजण खिडकीतून हात दाखवत होते. मी पाहिलं, मिता रडवेली झाली होती. पर्समधील छोटा रुमाल हलवत होती परत डोळ्यांना लावत होती. मी मुन्नीला आणि मिताला म्हणालो, आईबाबांना सांभाळा गं. आणि गाडी सुटली. गाडी बरोबर मिता धावत धावत रुमाल दाखवत होती. गाडीचा स्पीड वाढला आणि प्लॅटफॉर्मवर आई, मुन्नी आणि मिता लांब लांब दिसायला लागली.

मी बेंगलोरला आलो. कंपनीने जागा दिली होती. कंपनीत जीव तोडून काम केले. पदोन्नती मिळत होती. मुंबईला सहा महिन्यानंतर जात होतो. दरम्याने मुन्नी आणि मिता ग्रॅज्युएट झाल्या. मुन्नीला संस्कृतमध्ये पी. एच्. डी. करायचे होते म्हणून तिने पुणे युनिव्हरसिटीमध्ये अ‍ॅडमिशन घेतले आणि ती पुण्याला गेली. मिता अभ्यासात यथातथाच होती. ग्रॅज्युएशननंतर तिने शिक्षण थांबविले आणि तिच्या आवडत्या कथक नृत्यामध्ये तिने जीव झोकून दिला. मी बेंगलोरमध्ये आणि मुन्नी पुण्याला. बाबा नेहमी प्रमाणे त्यांच्या व्यवसायात. आई घरी एकटी होत होती. पण मिता सकाळ संध्याकाळ घरी येऊन सर्वकाही पाहत होती. आईला घेऊन बाजारात जाणे, डॉक्टरकडे जाणे, बारीकसारीक सर्व गोष्टी मिताच पाहत होती. मिता आईजवळ येऊन जाऊन असते म्हणून मी आणि मुन्नी निर्धास्त होतो. मी मुंबईत आलो कि, मिता तिच्या क्लासची वेळ सोडून आमच्या घरी येत होती. माझ्या आवडीचे पदार्थ घरात शिजत होते. माझ्या खोलीत आवडती पुस्तके, कॅसेट ठेवली जात होती. पण मी मुंबईत जास्त काळ राहू शकत नव्हतो. आत फक्त एक वर्ष. एम. बी. ए. पुरे करावे आणि मिताला लग्नाचे विचारावे. मी तिचा होकार गृहित धरला होताच पण….

काल मी मुंबईत आलो, आणि आईने मिताच्या लग्नाची बातमी सांगितली आणि मी सटपटलो. आईने सांगितलेली हकिकत अशी, तिच्या मावशीने हे स्थळ आणले. मुलगा मावशीचा पुतण्या. गेली चार वर्षे ऑस्ट्रेलियात असतो. इंजिनिअर आणि देखणा. एकुलता एक मुलगा. नकार देण्यास काही कारणच नव्हते म्हणे.

संपूर्ण रात्रभर मिताला प्ाहिल्यांदा पाहिले त्यापासून आतापर्यंतचा काळ चित्रपटासारखा समोर येत होता. या कुशीवरुन त्या कुशीवर होत रात्रभर जागा होतो. आयुष्याची जोडीदार म्हणून मिताशिवाय कुणाचा विचारच केला नव्हता. आता पुढे काय? ओळखीच्या अनेक मुली मिताच्या जागेवर उभ्या करुन पाहिल्या. पण छे. माझं मन समजणारी मिता म्हणजे मिताच. तिची जागा दुसरी कुणीच घेऊ शकत नाही.

पुरी रात्र न झोपता मी अंथरुणातून बाहेर पडलो. चहा घेताना आई माझ्याकडे पाहून म्हणाली, अरे वल्लभ चेहरा असा काय? डोळे किती लाल. रात्रभर झोपला नाहीस की काय? काल मिताच्या लग्नाची बातमी ऐकलीस तेव्हापासून तू बेचैन झालास. अरे गोष्टी वेळच्यावेळी कराव्यात रे. मग पश्चाताप करुन काय उपयोग? चहा घेऊन मी उठलो आणि बाहेर जायची आवराआवर करु लागलो. एवढ्यात बेल वाजली. आईने दरवाजा उघडला. अग मिता, ये ये आत. मुन्नीने बातमी कळविली. पण तू केव्हा सांगणार म्हणून वाट पाहत होते. बस, बस, वल्लभ आलाय काल. आठ दिवसांची रजा घेऊन आलो म्हणाला, पण काल रात्रौ म्हणाला, उद्या रात्रौ म्हणजे आजच्या रात्रीच्या विमानाने निघणार. इथे आल्यानंतर काहीतरी बिनसलं त्याच. ’’ मी माझ्या खोलीतून आईचे बोलणे ऐकत होतो. ‘‘तुम्हाला आधी कळविले नाही. मुन्नीच्या आई राग मानू नका, सारे कसे अचानक झाले. ’’ मिताचा रडवेला आवाज मला ऐकू आला. ‘‘मावशीने माझ्या आईला तिच्या पुतण्याबद्दल विचारले. तो ऑस्ट्रेलियाहून आलाय आणि लग्न करुनच जाणार म्हणाली, आईबाबा एवढे खूश झाले की मला हो नाही विचारण्याची संधी न देता सर्व काही ठरवून मोकळे. माझा काही निर्णय होत नव्हता तो पर्यंत लग्नाची तारीख, हॉल सर्वकाही ठरवून झाले. ’’ आता मिताचे हुंदके मला स्पष्ट ऐकू येत होते. मला काय वाटले कोण जाणे. तिरमिरीत खाड्कन माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर पडण्याच्या दरवाजाजवळच आई आणि मिता बोलत होत्या. रडवेली मिता मला पटकन सामोरी आली. तिच्याकडे दुर्लक्ष करुन मी आईला म्हणालो, आई मी बँकेत जातो. मी बाहेर पडणार एवढ्यात आई म्हणाली, अरे वल्लभ, मिता तिच्या लग्नाचे सांगायला आली रे.. मी चटकन मागे आलो आणि जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहून ‘‘अभिनंदन’’ म्हणालो, आणि धाड्कन दरवाजा लावून बाहेर पडलो. बाहेर आलो. पोर्चमध्ये जाऊन किल्लीने गाडीचा दरवाजा उघडला. आत बसलो. गाडीचा दरवाजा, खिडक्या सर्व बंद केल्या आणि स्टिअरिंगवर डोके ठेवून ओक्साबोक्सी रडू लागलो.

– मिता –

धाड्कन दरवाजा बंद करुन वल्लभ बाहेर चालता झाला. मला माझे अश्रू आवरतच नव्हते. मुन्नीच्या आईने मला जवळ घेतले. योग्य वेळी मन मोकळं करावं गं मिता. एकदा वेळ सटकली की हळहळण्या शिवाय हातात काही राहत नाही. माझं रडू काही आवरत नव्हतं. शेवटी मुन्नीच्या आईला, येते म्हणून सटकले. आता कसला निर्णय घेण्याची क्षमता आहे का माझ्यात? बाबा कालपासून आमंत्रणे द्यायला नातेवाईकांकडे जाऊन आले सुध्दा. मनात असेल तर वल्लभने आणि वल्लभच्या आईने पुढाकार घ्यायला नको? 

चार दिवसापूर्वी तिला पाहून गेलेला मावशीचा पुतण्या विनोद आठवला. खरच त्याच्यात काहीच दोष नव्हता. सुशिक्षित, उमदा, देखणा, स्थिरस्थावर सर्व काही उत्तम. पण वल्लभ….

कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मुन्नीची ओळख झाली आणि तिच्या बडबड्या स्वभावामुळे ती मैत्रीणच झाली. एक दिवस ती फार आनंदात होती. म्हणाली, माझ्या दादाला व्हि. जे. टी. आय. मध्ये अ‍ॅडमिशन मिळाली. त्यांच्या एवढ्या मोठ्या कॉलनीत प्रथमच. तिच्या घरी फार आनंद होता म्हणे. मना म्हणाली तू चल आमच्या घरी. मी तिच्या घरी जायला निघाले. तिच्या दादाचे कसे अभिनंदन करावे? असा विचार करताना कॉलेजमधल्या आवारात पिवळ्या गुलाबावर कळी फुलली होती. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच ती खुंटली आणि पर्समध्ये टाकली.

– क्रमशः भाग दुसरा 

 © श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ ‘होलिकोत्सवाचे बदलते रंगरूप’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

☆ ‘होलिकोत्सवाचे बदलते रंगरूप’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय वाचकांनों !  

आपण सर्वांना होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा !

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ अथवा ‘होली आई रे कन्हाई, रंग छलके सुना दे जरा बांसुरी’ सारखी कर्णमधुर गाणी टीव्ही वर पाहिली, की रंगपंचमीची सुरुवात फार आधीपासून झाली हे लक्षात येते. गुलालाने गुलाबी अन केशरी सुगंधी जलाने रंगलेल्या कृष्ण, राधा आणि गोपिकांच्या सप्तरंगी होलिकोत्सवाचे वर्णन आपल्याला सुपरिचित आहे. राधा आणि गोपींबरोबर कृष्णाची रसिक रंगलीला ब्रजभूमीत ‘फाग लीला’ म्हणून ओळखली जाते. ब्रज भाषेचे प्रसिद्ध कवी रसखान यांनी राधा आणि गोपी यांच्या सोबत कृष्णाने खेळलेल्या रंगोत्सवाचे अतिशय रसिकतेने ‘फाग’ (फाल्गुन महिन्यातील होळी) या सवैये काव्यप्रकारात बहारदार वर्णन केले आहे. उदाहरणादाखल दोन सवैयांचे वर्णन करते.

रसखान म्हणतात-

खेलिये फाग निसंक व्है आज मयंकमुखी कहै भाग हमारौ।

तेहु गुलाल छुओ कर में पिचकारिन मैं रंग हिय मंह डारौ।

भावे सुमोहि करो रसखानजू पांव परौ जनि घूंघट टारौ।

वीर की सौंह हो देखि हौ कैसे अबीर तो आंख बचाय के डारो।

(अर्थ: चंद्रमुखीसम ब्रजवनिता कृष्णाला म्हणते, “आज ही फाल्गुन पौर्णिमेची होळी बिनदिक्कत खेळ. तुझ्याशी ही धुळवड खेळून जणू आमचे भाग्यच उजळले आहे. मला गुलालाने रंगव, हातात पिचकारी घेऊन माझे मन तुझ्या रंगात रंगवून टाक. ज्यात तुझा आनंद समाहित आहे, ते सर्व कर. पण मी तुझ्या पाया पडते, हा घुंघट हटवू नकोस आणि माझी तुला शपथ आहे. हा अबीर माझ्या डोळ्यांत नको टाकूस, इतरत्र टाक, अन्यथा तुझे सुंदर रूप बघण्यापासून मी वंचित राहून जाईन!”)

रसखान म्हणतात-

खेलतु फाग लख्यी पिय प्यारी को ता सुख की उपमा किहिं दीजै।

देखत ही बनि आवै भलै रसखान कहा है जो वारि न कीजै॥ 

ज्यौं ज्यौं छबीली कहै पिचकारी लै एक लई यह दूसरी लीजै। 

त्यौं त्यौं छबीलो छकै छवि छाक सो हेरै हँसे न टरै खरौ भीजै॥

(अर्थ: एक गोपी तिच्या मैत्रिणीला फाग लीलेचे वर्णन करतांना सांगते, “हे सखी! मी कृष्ण आणि त्याच्या प्रिय राधेला होळी खेळतांना पाहिले. त्या वेळेला जी शोभा पाहिली, तिची तुलना कशी होणार? ते शोभायमान दृश्य अतुलनीय होते. अगं, त्यावर ओवाळून न टाकण्याजोगी एकही वस्तू शोधून सापडणार नाही. सुंदरी राधा जसजशी कृष्णाला आव्हान देते आणि त्याच्यावर एका मागून एक रंग उधळते, तसतसा कृष्ण तिच्या सौंदर्याने अधिकच वेडा होत जातो. राधेची पिचकारी पाहून तो हसत बसतो, पण तिथून पळून न जाता तिथेच उभे राहून तिने उडवलेल्या रंगात चिंब भिजत राहतो.”) 

या फाल्गुन महिन्यात केशरी अग्निपुष्पांचे वस्त्र लेऊन पलाश वृक्ष ऐन बहरात आलेले असतात. (त्याच पुष्पांना पाण्यात भिजवून सुंदर नैसर्गिक केशरी रंग तयार होतो). ही दैवी अन पावन परंपरा जपणारी गुलाल आणि इतर नैसर्गिक रंगांसमेत खेळल्या जाणारी होळी म्हणजे मथुरा, गोकुळ आणि वृंदावनातील खास आकर्षण. तिथे हा सण सार्वजनिक रित्या चौका-चौकात वेगवेगळ्या दिवशी खेळल्या जातो, म्हणूनच ही होळी फाल्गुन पौर्णिमेच्या महिनाभर किंवा पंधरा दिवस आधीच सुरु होते.  

मथुरेजवळ एक मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करतांनाचा माझा अनुभव अविस्मरणीय असाच होता. धुळवड जोरदार होतीच, पण होळीच्या या दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने होळी पोर्णिमेलाच सकाळी कॉलेजचे तमाम कॉरिडॉर गुलालाने रंगून गेले होते. अख्या स्टाफने कॉलेजमध्ये अशी ‘धुळवड’ खेळल्यावर दुपारी १२ वाजता पोबारा केला. होळी पोर्णिमेलाच ही अग्रिम धुळवड झाल्यावर मग दुसऱ्या दिवशी सार्वजनिक धुळवड अर्थातच आपापल्या परिसरात साजरी केली गेली. मी मात्र बघायला जाणे शक्य असूनही बरसाना (राधेचे मूळ गाव) ची लठमार होळी बघितली नाही, त्याचे वैषम्य नक्कीच आहे. लठमार होळीचे हे जबरदस्त आकर्षक दृश्य दिसते राधेच्या गावात बरसानात, मथुरा, गोकुळ, वृंदावनातील अन स्थानिक पुरुष मंडळींना बरसानाच्या महिलांच्या लाठ्यांचा प्रतिकार करतांना बघून मजा येते. तसेही त्या भागात राधेवरील नितांत भक्ती दिसून येते. तेथील लोक बहुदा एकमेकांना अभिवादन करतांना ‘राधे-राधे’ म्हणतात.

आमच्या लहानपणी प्रत्येक घरी ऐसपैस अंगण असायचे अन घरोघरी होळी पेटवली जायची. होळीसाठी जुनी लाकडे, जुन्या झाडांच्या वाळलेल्या काटक्या, जीर्ण झालेले लाकडी सामान, इत्यादी गोळा व्हायचे. शेण गोळा करून त्याच्या लहान लहान गोवऱ्या थापायच्या अन प्रत्येक गोवरीच्या मध्ये एक छिद्र ठेवायचे, अशा गोवऱ्यांची माळ तयार करून पेटलेल्या होळीला अर्पण करायची. आता अशा माळा विकत घेता येतात. या होलिकोत्सावाची प्रसिद्ध कथा अशी की, होलिका या हिरण्यकश्यपूच्या बहिणीला अग्नीपासून भय नव्हते. याच कारणाने हिरण्यकश्यपूच्या पुत्राला म्हणजेच विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी ती पेटलेल्या अग्निकुंडात त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसली. मात्र प्रत्यक्ष विष्णूची कृपा असल्याने प्रल्हाद जिवंत राहिला, आणि होलिका राक्षसी जळून खाक झाली. त्याचेच प्रतीक म्हणून दर फाल्गुन पौर्णिमेला अग्नी पेटवून त्यात आपल्या घरातील आणि समाजातील वाईट गोष्टी जाळून टाकणे हे अपेक्षित असते. मात्र निरोगी वृक्षांची कत्तल करून आणि जंगलतोड करून लाकडे जमा करून होळी पेटवणे योग्य नाही. झाडांचा नाश म्हणजे पर्यावरणास हानी पोचवणे होय. आधीच अतोनात वृक्ष तोड झाल्याने दूषित पर्यावरणाची समस्या गंभीर होते आहे. त्यात भर टाकून अशी होळी पेटवणे अयोग्य आहे. आजकाल प्रत्येक मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये होळी पेटवतात. त्यापेक्षा दोन तीन किंवा जवळपासच्या परिसरातील लोकांनी एकत्र येऊन प्रतीकात्मक लहानशी होळी पेटवून हा सण साजरा करावा असे मला वाटते.

माझ्या लहानपणीच्या धुळवडीच्या रम्य आठवणी पाण्याशी निगडित आहेत. नागपूरला आमच्या आईवडिलांच्या घरी खूप मोठं अंगण होतं. त्यात एक बरीच मोठी कढई होती, म्हणजे साधारण ३ वर्षांच मूल उभे राहील इतकी. त्याचा उपयोग एरवी १०० हून अधिक असणाऱ्या आमच्या झाडांना पाणी देण्याकरता होई. माझे ते आवडते काम होते. कढईत पाणी भरण्याकरता एक नळ होता, अन त्याला जोडलेल्या लांबच लांब पाईपने झाडांना पाणी देणे, खास करून उन्हाळ्यात अति शीतल असे काम होते. मात्र धुळवडीच्या दिवशी त्याच पाण्यात रंग मिसळून एकेकाला बुचकळून काढणे अन पिळून काढणे हा आमचा प्रिय उद्योग असायचा. अशीच सिमेंटची टाकी प्रत्येकाच्या घरी असायची, त्यांत एकामागून एक अशा आंघोळी करणे आणि जिथे जे मिळेल ते विनासंकोच खाणे, अशी धुळवड साजरी व्हायची.

कराड, कोल्हापूर अन सांगली पासून प्रत्येकी अंदाजे ४० किमी दूर असलेल्या इस्लामपूर येथे मी २०१६ ला नोकरीच्या निमित्याने गेले. तिथे धुळवडीचा (होळी पेटण्याचा दुसरा दिवस) इतर दिवसांसारखा एकदम नॉर्मल होता. मला कळेना, हे काय? चौकशी केल्यावर कळले की इथे ‘रंगपंचमी’ साजरी होते. रंगपंचमी म्हणजे होळी पौर्णिमेपासून पाचवा दिवस. मात्र मला हे माहितीच नव्हते. सुट्टी मिळो न मिळो, इथे रंगपंचमीच्या दिवशी सगळे आवर्जून सुट्टी घेतात. आमच्या मेडिकल कॉलेजमधील मुले भारताच्या विविध भागातील असल्यामुळे त्यांनी आपली डबल सोय केली, म्हणजेच धुळवड आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी मस्ती! 

आता मोठ-मोठ्या निवासी संकुलांत धुळवड साजरी होते. हौसेला मोल नाही हेच खरे. बहुदा बॅकग्राऊंडला तत्कालीन चालणारी डिस्को गाणी अन त्यावर सानथोरांनी एकत्र येऊन आनंदाने बेधुंद नृत्य करणे हा अविभाज्य भाग! तसेच यासोबत कुठे कुठे (पाण्याचा अल्पसंचय असतांना देखील) कृत्रिम कारंज्यांची व्यवस्था आणि त्यात सचैल भिजणे. हा पाण्याचा अपव्यव खरंच अस्वस्थ करणारा आहे. त्यासोबत धुळवडीला मद्यपान आणि मांसाहार असलेल्या पार्ट्या देखील होतात. एकमेकांना रंगात रंगवून एकात्मकता वृद्धिंगत करणे हा धुळवड साजरी करण्यातला मूळ विचार आहे. मात्र त्याचे विकृत रूप समोर आले की दुःख होते. ज्यांचा कातडीवर वाईट परिणाम होतो आणि जे सतत धुवूनही जाता जात नाहीत असे केमिकल्स असलेले भडक रंग, तसेच चिखलात खेळणे, अचकटविचकट बोलणे, स्त्रियांची छेड काढणे, अश्लील शिव्या देणे, नशेत धुंद होऊन भांडण तंटा करणे, एकमेकांच्या जीवावर उठणे, कधी कधी तर चाकूने हल्ले करणे, खून करणे, इथवर अपराध होतात. या दिवशी वातावरण असे असते की, कांही ठिकाणी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची देखील भीती वाटते. होळीचे हे अनाकलनीय बीभत्स रूप आपल्या संस्कृतीत बसत नाही. या सर्वच असामाजिक वागणुकींला आळा बसायला हवा. पोलीस त्यांची ड्युटी करतातच, पण समाजभान नावाची चीज आहे ना! आपला सण साजरा करतांना इतरांच्या सुखाची आपण ‘होळी’ तर करीत नाही ना याचे स्मरण असू द्यावे.

मैत्रांनो, होळी हा सामाजिक एकात्मकतेचे प्रतीक आहे, म्हणूनच कोरड्या, सुंदर पर्यावरण स्नेही विविध रंगांचा वापर करून, वृक्षतोड न करता आणि व्यसनाधीन न होता हा राष्ट्रीय एकात्मकतेचा प्रतीक असा होलिकोत्सव आनंदाने साजरा करावा असे मला वाटते, अन तुम्हाला?  

गीत – ‘नको रे कृष्ण रंग फेकू चुनडी भिजते’ गीतप्रकार-हे शामसुंदर (गवळण) गायिका- सुशीला टेंबे, गीत संगीत-जी एन पुरोहित

‘होली आई रे कन्हाई’- फिल्म- मदर इंडिया (१९५७) गायिका- शमशाद बेगम, गीत- शकील बदायुनी, संगीत-नौशाद अली

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चाटण संस्कृति… – लेखिका :श्रीमती योगिनी श्रीनिवास पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ चाटण संस्कृति… – लेखिका :श्रीमती योगिनी श्रीनिवास पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आमच्या घरी जेवणं झाली की त्यानंतर आमचे वडील ताट ‘चेक’ करायचे.पान स्वच्छ लागायचं.

खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून  खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत.

माझ्या आयुष्यातला चाटण संस्कृतीतला जॉय, माझ्या लहानपणी, जॉय नामक वर्षाकाठी एकदाच मिळणाऱ्या आईसक्रीमपाशी सुरू झाला होता! त्या कपाचे पातळ कव्हरापासून  चाटणप्रवास सुरु झाला.

या प्रवासातला प्रामाणिक साथीदार म्हणजे दुधाचं पातेलं. ते घासायला टाकण्यापूर्वी अंगठ्याने त्याला खरवडून घेऊन चाटतानाचा तो समाधीक्षण अवर्णनीय असतो. दुधाच्या पातेल्याच्या इतकंच आमटीचं पातेलं चाटण म्हणजे ‘सुख दुःख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ.’दूध आणि आमटी याला समान न्याय देण्याइतकं गीतातत्त्व अंगात मुरणं ही या चाटणसंस्कृतीची देन आहे.

रात्रीचं जेवण झालेलं असतं. शेवग्याच्या शेंगांची ओलंखोबरं आणि चिंचगूळ घालून केलेली अमृततुल्य आमटी संपलेली असते, पण त्या रिकाम्या पातेल्याच्या आतल्या भिंतींना जे अमृतकण चिकटलेले असतात, ते बोटाने निपटून चाटून साफ करताना जो काही निर्मळ आनंद मिळतो, तो ते पातेलं चाटणाऱ्यानेच अनुभवावा.

तुम्ही काजू शेंगदाणे घालून मस्त आटवलेली अळूची भाजी (पुण्यात फदफदं म्हणतात) खाल्लेली असेल, पण पंगतीच्या शेवटी उरलेली भाजी, वाटीत ट्रान्सफर केल्यानंतर पातेल्याच्या आत चिकटलेली अळूची-साय कधी खाल्ली आहे?बेफाट लागते!

माझी नणंद गव्हल्याच्या खिरीचं पातेलं, खीर संपल्यानंतर मागून घेते आणि रिकाम्या पातेल्याला स्वच्छ करते.

सासूबाई तर गोडाचा शिरा संपल्यानंतर गार झालेली कढई घेऊन त्यात इवलं दूध टाकून ठेवायच्या आणि पातेले निपटून घ्यायच्या.

पिठल्याच्या कढईच्या तळाशी जमलेली खमंग खरवड बेसुमार चविष्ट लागते. आणि, ती मन लावून खरवडणारं ध्यान, किती सुंदर दिसतं ते साक्षात तुकोबाच सांगू शकतील.

या चाटण संस्कृतीला समजूतदारपणाचे आणि सिव्हिक सेन्सचे अनेक पदर आहेत.

ताट अथवा पातेलं इतकं स्वच्छ निपटावं की त्यातले अन्नकण पूर्णत्वाने संपावे, ते घासणाऱ्या बाईला त्याची घाण वाटू नये आणि बरबटलेलं ताट घासताना व्यय होणाऱ्या पाण्याचीही केवढीतरी बचत व्हावी.

आमचा हा चाटून पुसून खाण्याचा अलिखित नियम हा फक्त पातेलं आणि कढई पुरता मर्यादित नव्हता तर तो आंब्याच्या फोडी आणि कोयी खातानाही लागू व्हायचा.

‘खाऊन माजावं, टाकून  माजू नये’, ‘भूखी तो सुखी’ अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांमध्ये लहानपण घालवलेल्या आम्हा सर्वांनाच, अन्न टाकण्याचा मोठाच तिटकारा. एकतर आम्ही जास्त अन्न शिजवत नाही आणि समजा जास्त शिजून उराउरी झालीच तर ती टाकून कधीच देत नाही.

आमटीची थालिपीठं, फोडणीचा भात, किंवा फोडणीची पोळी असेल किंवा, कोबीच्या उरलेल्या भाजीचे पराठे किंवा कोथिंबीर माठ पालक यांच्या कोवळ्या देठाचं बनवलेलं सुप असेल.

तुपाच्या बेरीमध्ये कणिक भिजवण्यापासून ते त्याचा गूळ घालून केलेल्या वड्यापर्यंतचा कायापालट असेल. अशी टाकाऊतुन टिकाऊची संस्कृती किंवा कचऱ्यातून पुनर्निर्माणाची कला जोपासणाऱ्या मला, या दिवाळीत मोठाच धक्का बसला.

घरी केलेला ताजा चिवडा आणि बेसन लाडू एका ओळखीच्या बाईने लेकाला खायला दिले, त्यानेही “ममी, यम्मी”करत खाल्ले. (मम्मी आणि यम्मी हे शब्द ऐकल्यावर का कुणास ठाऊक एक कानफटात मारावीशी वाटते. तसेच मराठी घरात मोठया बहिणीला ताई न म्हणता दीदी शिकवले जाते त्याचाही राग येतो)

असो खरा कानफटात मारायचा प्रसंग तेव्हा उदभवला, जेव्हा मी त्याची ताटली घासायला टाकली. मी पाहाते तो त्यात चिवड्यातून वेचलेले दाणे आणि लाडवातून उपटलेले बेदाणे त्याने चक्क टाकून दिलेले होते. त्याला विचारल्यावर ”हल्ली मला नाही आवडत तो कचरा,“ इतकं सरळ सोपं उत्तर आलं.

बारकाईने पाहिल्यावर अशा टाकणं-प्रसंगांची न संपणारी मालिकाच माझ्या डोळ्यापुढे तरळली.

माझा एक भाऊ पोहे आणि उपम्यातून मोहोरी निवडून बाजूला ठेवतो आणि मी फारफार तर मोहोरी कढीपत्ता मिरची असा सो कॉल्ड कचरा टाकणाऱ्यांना एकवेळ माफ करू शकते, पण बुफेच्या रांगेत उभे राहून भुकेकंगाल राष्ट्रातुन आल्यासारखं बदाबदा वाढून घेऊन, नंतर अन्न टाकून देणाऱ्यांना कधीही माफ करू शकणार नाही.

काहीजण पुलावातून काजू बाजूला निवडून ठेवतात आणि कितीतरीजण न आवडत्या भाज्या पुलावातून निवडून टाकून देतात आणि “नाही आवडत आम्हाला त्या भाज्या”असं निर्लेप स्पष्टीकरण देतात.

गुळाच्यापोळ्या खाताना, गूळ पसरलेला भाग सोडून उरलेल्या निर्गुळपोळीच्या चंद्रकोरी टाकणाऱ्यांचीही एक जमात असते.

पावाच्या कडा टाकून मधला मऊभाग खाणारे महाभागही असतातच की.

मसालादूध म्हणजे माझा जीव की प्राण!!

पण त्यात जीव ओतून घातलेलं केशर आणि सुकामेव्याचं वैभव, तळाशी जाऊन बसतं ही एक समस्याच आहे. आणि हल्लीच्या पिढीच्या माजखोर पाईकांना ते चाटायला आवडत नाही आणि टाकण्यात काही गैरही वाटत नाही.

मी मसाला दुधाच्या ग्लासच्या तळाशी चिकटलेली सुकामेवापूड बोटाने चाटून न खाणाऱ्याला कधीच क्षमा करू शकत नाही.

माझ्या एका मैत्रिणीकडे भरली वांगी प्रचंड आवडतात. ती करतेच अप्रतिम.पण तिची मुलं वांग्याला चिकटलेला मसाला खाऊन वांगी चक्क टाकून देतात. मी तिला सुचवणार आहे की एक दिवस मसाल्याचा गोळाच दे डब्यात भाजी म्हणून. कशाला ती वांगी फुकट घालवायची!!

अशा टाकण-संस्कृती पाईकांना शनिवारवाड्यावर जाहीर फटके अशा शिक्षा ठोठावल्या पाहिजेत

बरं ही टाकणं मंडळी स्वतः चाटून पुसून घेत नाहीतच पण इतरांनी कुणी चाटायला घेतलं की त्यांना एमबॅरॅसिंग वाटतं (टाकताना बरं नाही वाटत एमबॅरॅसिंग).

खूप जणांना सवय असते,ते पूर्ण चहा पीत नाहीत,तळाशी उरवतात…म्हणजे आम्ही वेडेखुळे म्हणून गाळून देतो की काय याना चहा!!

काहींना चहावर जमलेली साय त्याच कपाच्या कडांवर फाशी दिल्यासारखी टांगून ठेवण्याची सवय असते.जी बघताना घाण वाटते.

पुन्हा तो कप साफ करणाऱ्याचा विचार केला आहे का कधी?

ह्या मुलांनी खाल्लेल्या हापुसच्या फोडी बघितल्या आहेत? विलक्षण वेदनादायी आहे त्या खाल्लेल्या फोडी टाकणं!शरीराचा नक्की कुठला अवयव वापरतात फोडी खाताना देवच जाणे. दात नामक अवयव तोंडात असताना, आंब्याच्या फोडीला इतका गर शिल्लक राहूच कसा शकतो? आमच्यावेळी आम्ही आंब्याच्या कापट्या खाताना, जबड्यातला सर्वात तीक्ष्ण दात वापरून त्याचं अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक करायचो,आणि त्यानंतर बाठ कुणी चाखायची यावरून युद्धं व्हायची ती वेगळीच.

हल्लीच्या फूड फूड वगैरे चॅनेलवर येणारे समस्त कपूर-खन्ना लोक, पदार्थ करुन झाल्यावर ज्या बेपर्वाईने ती पातेली आणि कढया सिंकमध्ये टाकतात, ते पाहून अंगावर काटा येतो.

खरवडून घेणे, निपटून घेणे, चाटून घेणे, पुसून घेणे, विसळून घेणे या स्वैपाकघरातल्या पाच क्रियापदांची ओळख हल्लीच्या पिढीला करून द्यावी वाटते. 

आतेसासूबाईंकडे एकदा गेले होते. त्या गुळाच्या पोळ्यांसाठी गूळ,किसत होत्या. किसण्याचे काम झाल्यावर त्यांनी किसणीखाली स्टीलचे ताट ठेवून त्या किसणीवर पाणी ओतले आणि म्हणाल्या दुपारपर्यंत हा किसणीला चिकटलेला गूळ विरघळून त्याचं पाणी होईल, मग मी ते आमटीसाठी वापरीन.

मला त्यांच्या काटकसरीपणाचं आणि कल्पकतेचंही कौतुक वाटलं.आता काही लोकांना या कृतीला ‘किती तो कर्मदरिद्रीपणा’ असं म्हणावंसं वाटेलही, पण उलटपक्षी मीच असं म्हणणाऱ्यांना विचारदरिद्री म्हणेन.

बटाटेवडे अथवा भजी करून झाल्यावर परातीला चिकटलेला पिठाचा, ओवा-मीठ- तिखट – कोथिंबीर-कांदा युक्त चविष्ट ऐवज, सिंकस्वाहा करण्याऐवजी, विसळून आमटीत ढकलावा,त्या आमटीची चव अप्रतिम लागते.

आणि ती आमटी यदाकदाचित उरलीच तर दुसऱ्यादिवशी थालीपीठार्पण करावी.काय जबरदस्त होतं त्या थालीपीठाचं. मुळात भाजणीचं थालीपीठ चविष्टच असतं पण उरलेल्या आमटीला पोटात आश्रय दिल्यावर थालीपीठ जणू कातच टाकतं.

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्मच्याही पलीकडे नेणारी एक ऋणजाण भावना आहे.ती, गुडघा गुडघा चिखलात भात लावणी करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल असेल.उन्हातान्हात राबणाऱ्या मजुराविषयी असेल.

पेरणी,लावणी,छाटणी, कापणी करणाऱ्या घट्टे पडलेल्या हातांबद्दल असेल.त्याहीपुढे,  रात्रीबेरात्री वाहने चालवून शेतातील धान्य आपल्यापर्यंत वाहून आणणाऱ्या वाहन चालकांबद्दल असेल.ज्या रस्त्यांवरून ती वाहने धावतात तो तयार करणाऱ्या मजूरांबद्दल असेल.शेतातून सुरू होणारी ही ऋण-जाण-साखळी, वाटेतल्या अनेक कष्टकऱ्यांपासून ती अगदी पोळ्यावाल्या काकूंपर्यंत, नव्हे त्याहीपुढे भांडी घासणाऱ्या सखूपर्यंत येते. मला टाकलेल्या अन्नात हे सगळे चेहेरे दिसतात.

काही वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनी संस्थेत एका शिबीरात सहभागी झाले होते.त्यांच्या कॅन्टीनमध्ये गेले असता, तिथे मनाला भिडणारा एक श्लोक-संदेश भिंतीवर लावला होता :

वदनी कवळ घेता,नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते,आपुल्या बांधवांचे

कृषिवल कृषी करुनि,अन्न ते निर्मितात

कृषिवल कृषी कर्मी,राबती दिन – रात

स्मरण करून त्यांचे,अन्न सेवा खुशाल

उदर भरण आहे,चित्त होण्या विशाल.

जुनं-नवं, आमची पिढी-तुमची पिढी,यापलीकडे जाऊन,विविध मतभेद टाळून,निदान अन्न-ऋण-स्मरण या विषयावर एकमत व्हायलाच हवे, नाही का?

लेखिका :श्रीमती योगिनी श्रीनिवास पाळंदे

पुणे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आजची सावित्री –  डॉ. रीना कैलास राठी”… शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “आजची सावित्री –  डॉ. रीना कैलास राठी”… शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र !

काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र !

नाशिक येथील सुयोग हॉस्पिटल मध्ये  नेहमीप्रमाणे पेशंट व नातेवाईक यांची ये जा सुरू होती. हॉस्पिटलमध्ये कर्तव्यदक्ष डॉक्टर कैलास राठी व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर रीना राठी हे नेहमीप्रमाणे आपले राऊंड घेत होते. डॉक्टर रीना आपल्या बाल रुग्णांची तपासणी करावयास निघून गेल्या. राउंड संपवून त्या परत डॉक्टर कैलास राठी यांच्या केबिन कडे येत असताना त्यांना ‘ती’ व्यक्ती पळताना दिसली. अरे ही व्यक्ती अशी का पळत असावी एवढा क्षणभर विचार मनात येईपर्यंत मागून कर्मचाऱ्यांचा पकडा ! पकडा त्याला त्याने सरांना मारले ! असा आरडाओरडा सुरू झाला. हे ऐकताच रीनाच्या डोक्यात त्याने हातापायी केली असेल असेच आले, परंतु त्यांनी डॉक्टर कैलास यांच्याकडे धाव घेतली. पाहते तर काय ? सगळीकडे जणू रक्ताचा सडा पडला होता. तिचा जीवन साथी खाली पडला होता. तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

क्षणभर डोळ्यापुढे अंधारी आली, पण क्षणभरच! पुढच्या क्षणी ही सावित्री यमाशी दोन हात करायला सज्ज झाली. आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रदीर्घ अनुभवाने व समय सूचकतेने तिने सगळे उपचाराचे चक्र फिरवले. हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आपल्या लाडक्या सरांना सावरायला पुढे सरसावला व डॉक्टर रीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले.

परंतु त्या क्रूर, विकृत व्यक्तीने कोयत्याचे एवढे वार केले होते की रक्त कुठून येत आहे हेच कळेना! डॉक्टर कैलास यांच्या डोक्यावर व मानेवर एवढे जीव घेणे वार केले होते की कुठल्या घावावर प्रथम उपचार करावा असे झाले. परंतु डॉक्टर राठी यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत झालेला स्टाफ व डॉक्टर रीना यांच्या सूचनेनुसार अजिबात वेळ न घालवता उपचार सुरू झाले. एखादा सामान्य व्यक्ती अशा हल्यानंतर कुठलाच नसता पण हे डॉक्टर कैलास राठी, खरोखरच लढवैये व जबरदस्त इच्छाशक्तीचे धनी ! संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले असताना आपल्या पत्नीस काय उपचार द्यावे ही सूचना देत होते! जातीचे डॉक्टर ते !

पतीवर उपचार करताना डोक्यात फक्त त्यांना वाचवण्यासाठी काय काय करावे लागणार हेच विचार चक्र रीना यांच्या डोक्यात सुरू होते व त्या अन्वये त्या स्टाफला बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन सूचना देत होत्या. आपल्या सगळ्या भावना बाजूला जाऊन एक डॉक्टर बनवून त्यांनी एक ना अनेक बाबी लक्षात घेऊन डॉक्टर कैलास यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये ताबडतोब हलवण्याचा निर्णय घेतला व आपली समय सूचकता दाखवली. हा हा म्हणता ही वार्ता सगळीकडे पसरली. नातेवाईक, मीडिया, राजकारणी, समाजकारणी, शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, विविध स्तरातील व्यक्ती अपोलो हॉस्पिटलच्या बाहेर जमा झाली. डॉक्टर राठी यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा निषेध होऊ लागला.

आयसीयू मध्ये अपोलो हॉस्पिटलचे निष्णात डॉक्टर्स व सुयोग हॉस्पिटलच्या तज्ञांची टीम यांनी आपले शर्थीचे प्रयत्न सुरू केले व डॉक्टर राठी यांच्यावर उपचार सुरू झाले.

आता या सावित्रीच्या, रीनाच्या लढाईचा दुसरा पर्व सुरू झाला. कैलास राठी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ती खरोखरच भयानक रात्र होती डॉक्टर रीना यांनी प्रण केला की सकाळचा स्कॅन होईपर्यंत मी पाण्याचा घोट ही घेणार नाही! इकडे राठी कुटुंबातील व्यक्तींच्या जीवाची घालमेल काय सांगावी ? घरी त्यांची आई  लेकाच्या जीवासाठी देवाला साकडे घालत होती. डॉक्टर राठी यांचे अपत्य वृंदा  व राम दोघांना तर धक्क्यातून सावरणे अवघड झाले होते. परंतु आई-वडिलांनी दिलेली सकारात्मक दृष्टी व विचारसरणी त्यांना सांगत होती आमचे वडील यातून हमखास सुखरूप बाहेर पडतील! सकाळी ही वृंदा, सावित्रीची लेक सहा वाजताच पोहोचली आपल्या आई-वडिलांकडे ! सात वाजता स्कॅन चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर या सुकन्याने आपल्या आईला प्यायला पाणी दिले रात्रभर नाना  विचारांचे काहूर मनात असलेल्या व अस्वस्थ मन झालेल्या सगळ्यांना आशेचा किरण दाखवण्यासाठी ही हिम्मतवान सावित्री उभी राहिली. आपल्या डोळ्यातील अश्रू कुठेतरी आत लपवून, आत्मविश्वासाने भरलेल्या  डॉक्टर रीनाने सगळ्यांना एकच सांगितले बी पॉझिटिव. . कैलास शंभर टक्के बाहेर पडणारच आहे, नव्हे त्याला यातून बाहेर पडावेच लागेल. तुम्ही सगळे फक्त देवाचे नामस्मरण करा व विश्वास ठेवा की कैलास सुखरूप आहे ! सुखरूप आपल्यासमोर येतील ! काय हा विश्वास !काय तो देवावर भरोसा! सगळे काही प्रशंसनीय ! चोहो बाजूने देवाचा धावा सुरू झाला. डॉक्टर आपल्या विज्ञानाने व परिवार आपल्या प्रार्थनेने कैलास यांच्यावर उपचार करू लागले. इथे प्रत्ययास आले देव तारी त्याला कोण मारी?

डॉ. कैलास उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. परंतु हे डॉ कैलास पेशंटच्या भूमिकेत येतच नव्हते. त्यांच्यातला डॉक्टर सजक होता. आपले औषध उपचार ते सजक पणे करून घेत होते.

आय सी यु मध्ये  डॉक्टर रीना यांच्या बरोबरीने डॉ. प्राजक्ता ही आपल्या सरांच्या उपचारासाठी डोळ्यात तेल टाकून रात्रीचा दिवस करत होती. डॉ. राठी यांना वाचण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

यातच डॉ. कैलास यांच्या प्रकृती च्या काळजीने त्यांना मुंबई येथे हलवावे असे सांगण्यात येऊ लागले. परंतु, सगळी परिस्थिती पाहता, सगळे निष्णातडॉक्टर वरच्या विश्वासाने डॉ रीना यांनी खूप नम्रपणे हे नाकारले व स्वतःच्या जबाबदारीवर डॉक्टर कैलाश यांचे सर्जरी पुण्यभूमी नाशिकमध्ये डॉक्टर एखंडे व डॉक्टर बिर्ला यांच्याकडून करण्याचे निश्चित केले. त्यांच्या निर्णय क्षमतेला सलाम ! 

सर्जरी करावयाचे ठरल्यापासून विविध स्तरातील लोकांकडून प्रार्थना होऊ लागली. इथे जात पात, धर्म भेद कुठल्या कुठे पळाला! उगवच्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्यासाठी नमाज अदा केली! बोहरी समाजाकडून त्यांच्यासाठी पवित्र जल आले! हिंदू समाजात विविध धार्मिक विधी सुरू झाल्या ! राठी कुटुंबांनी माणूस कमावल्याची ही साक्ष होती. राठी दाम्पत्यांनी कधी कोणाचे वाईट चिंतले नाही. आपल्या परिने ते सर्वांना नेहमीच मदत करत आले त्यांच्या सत्कर्माचा त्यांनी केलेले संचितकर्माचे फळ म्हणजे डॉक्टर कैलास यांचे ऑपरेशन सुखरूप पार पडले.

आजपर्यंत हजारो बालकांना डॉक्टर रिना यांनी व अनेक पीडित रुग्णांना डॉक्टर कैलास यांनी प्राण दान दिले आहे. ते त्यांचे कर्तव्य जरी असले तरी देवाने त्यांचे प्राण वाचवून त्यांच्या सत्कर्माचे फळ त्यांना दिले. ह्या लढ्यात रिनाला खंबीर पाठिंबा होता तो वसू दीदी, पिटू दीदी, उगाव येथील राठी परिवार, सातपूर चा मुंदडा परिवार मालेगाव चा कलंत्री परिवार व तिचा सर्व मित्र परिवार ज्यांच्या शुभेच्छा मुळे ती ही लढाई जिंकु शकली. र्डॉक्टर रीना राठी या सावित्रीने एका आईसाठी त्यांचा मुलगा, बहिणींसाठी भाऊ व मुलांसाठी वडील, सुयोग हॉस्पिटलचा कुटुंबप्रमुख व आपले सौभाग्य आपल्या जिद्दीने, समय सूचकतेने व सकारात्मक विचाराने परत आणले ! व्हेंटिलेटर निघेपर्यंत अन्नाचा दाणाही न खाणाऱ्या रीनाला व तिला साथ देणाऱ्या तिच्यासाठी उभ्या असलेल्या तिच्या परिवाराला माझे त्रिवार वंदन !

शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे

प्रस्तुती : मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “स्वप्नातले घर…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “स्वप्नातले घर– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

अशी असावी खोली माझी

पुस्तक भरल्या  भिंतीची

नजरेपुढती शब्द  खजिना

विट न दिसावी मातीची

*

 विशाल नभ अथांग सागर

गवाक्षातून   दिसो निरंतर 

 हिरवेगार  झाड  देईल

 झुळूक मधूनच स्फूर्ती जागर

*

 स्वप्नातील घर अनुभवास्तव

 बिछायतही मृदू मुलायम

 लिखाणाची  जुळणी कराया

 असेच असावे सारे सक्षम

*

  लिहा वाचण्यासाठी सांगा

  स्वर्गी असेल का अशी जागा

   शांत निरामयता  मिळवाया

   हीच अशीच ,हवी मज जागा

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-10 – उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-10 – उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)

मित्रो, जालंधर, एक ऐसा शहर, जहाँ मेरा साहित्यिक जीवन शुरू हुआ। यही वह शहर है, जहाँ मैंने साहित्य में अच्छे- बुरे, खट्टे- मीठे अनुभव प्राप्त किये! यही वह शहर है, जहाँ मैंने साहित्य व साहित्यकारों के चेहरों को बड़े गौर से देखना और समझना शुरू किया।

इन चेहरों में डाॅ चंद्रशेखर भी एक हैं, जो लायलपुर खालसा काॅलेज, जालंधर में हिंदी विभाग के अध्यक्ष थे और‌ उन्होंने पंजाब में हिंदी के लिए बहुत ज्यादा योगदान दिया – एक मिशनरी की तरह! वे मेरी मुंह बोली बहन‌ डाॅ देवेच्छा के पति थे और मेरा जालंधर में एक ठिकाना इनका घर‌ भी था, जो बस स्टैंड के दायीं‌ ओर रणजीत नगर में था। वे गुरु नानक देव विश्वविद्यालय से बीए के उन छात्रों को चुनते जिनके बहुत अच्छे अंक आये हों! संयोग से एक वर्ष ऐसा आया जब विश्वविद्यालय में बीए अंतिम वर्ष में मैं 76‌ अंक लेकर सर्वप्रथम था, तो वे जब नवांशहर आये देवेच्छा जी के पास तो मुझे बुला कर खालसा काॅलेज में हिंदी एम ए में दाखिला लेने के लिए कहा ! इस पर मेरी बहन ने कहा कि कमलेश नहीं जा सकता जालंधर! इसकी परिस्थितियां ऐसी नहीं! इसके पिता नहीं रहे और‌ घर में बड़ा बेटा होने के कारण शहर छोड़कर नहीं जा सकता और यह मेरे पास बी एड करेगा , बाद में कोई भी डिग्री ले ले! इस तरह मैंने बीएड की लेकिन मेरा आना जाना बना रहा। ‌रणजीत नगर के आवास की सीढ़ियां तय करते मैंने मोहन सपना, सेवा सिंह, कैलाश नाथ भारद्वाज, कुलदीप अग्निहोत्री और हिमाचल के गौतम व्यथित को न केवल देखा बल्कि जाना और समझा! डाॅ चंद्रशेखर अपने छात्रों को बहुत प्यार करते थे और‌ कैलाश नाथ भारद्वाज के संपादन में ‘ रक्ताभ’ पत्रिका भी फगवाड़ा से शुरू करवाई । वे आकाशवाणी, जालंधर के निर्देशक विश्ववर्धन प्रकाश दीक्षित ‘बटुक’ के साथ अच्छे से घुले मिले थे और‌ मुझ जैसे न जाने कितने नये लेखकों को आकाशवाणी के स्टुडियो तक पहुँचाया ! वे तब आकाशवाणी के लिए खूब ‘ध्वनि नाटक’ लिखते थे, जिनमें मुझे ‘ कटा नाखून’ की याद है!  उन्हें ध्वनि नाटकों पर राष्ट्रीय पुरस्कार भी मिले‌! इसी तरह डाॅ चंद्रशेखर हिंदी को लेकर बहुत भावुक होकर कहते थे कि

यह हिंदी सिर्फ हिंदी नहीं है

यह भारत माता के माथे की बिंदी है!

उन्होंने मुझे अपने छात्रों जैसा ही स्नेह दिया, बेशक हिंदी एम ए नहीं की बल्कि बी एड के बाद हिमाचल प्रदेश विश्वविद्यालय से पत्राचार से हिंदी एम ए कर सका! वे मुझे काॅलेज के हर कार्यक्रम में आमंत्रित करते! इस तरह मैं उनके छात्रों के करीब आता गया !  वे एक आदर्श प्राध्यापक थे, जो अपने प्रिय शिष्यों को सिर्फ हिंदी ही नहीं पढ़ाते थे बल्कि उनकी ज़िंदगी भी संवारते थे और रचनायें भी! ‌डाॅ चंद्रशेखर ने पूर्व राष्ट्रपति ज्ञानी जैल सिंह की जीवनी भी लिखी और उनसे राष्ट्रपति भवन में पंजाब के लेखकों को सम्मानित भी करवाया!

आज डाॅ कैलाश नाथ भारद्वाज पंजाब हिंदी साहित्य अकादमी को चला रहे हैं और‌ डाॅ चंद्रशेखर की स्मृति में सम्मान प्रदान करते हैं, जो सम्मान मुझे भी एक वर्ष यह प्रदान किया गया ! डाॅ सेवा सिंह गुरु नानक देव विश्वविद्यालय, अमृतसर के हिंदी विभाग में रहे और आजकल कपूरथला में रहते हैं। इसी प्रकार डाॅ कुलदीप अग्निहोत्री आजकल‌ हरियाणा साहित्य अकादमी के कार्यकारी उपाध्यक्ष हैं। वे अच्छे विचारक भी हैं।  वे पंजाब स्कूल एजुकेशन बोर्ड के उपाध्यक्ष ह नहीं बल्कि धर्मशाला (हिमाचल) के केन्द्रीय विश्वविद्यालय के कुलपति भी रह चुके हैं।

यही नहीं डाॅ गौतम व्यथित हिमाचल से ‘बागेश्वरी’ पत्रिका निकाल रहे हैं जिसमें वे मुझसे भी बहुत प्यार से रचनाएँ आमंत्रित करते हैं। इसी प्रकार इनके प्रिय शिष्यों में से एक मोहन सपरा जो नकोदर के डी ए वी काॅलेज में हिंदी विभाग के वर्षों अध्यक्ष रहे और‌ नकोदर से ही, ‘फिर’ नाम से हिंदी पत्रिका निकालते रहे और पिछले कई वर्षों से वे जालंधर में बसे हुए हैं। ‘फिर’ का स़पादन बहुत अच्छा होने के बावजूद कभी मोहन सपरा इसे नियमित प्रकाशित नहीं कर पाये ! उन्होनें’ आस्था प्रकाशन भी शुरू किया पर प्रकाशित कृतियों को बेचने के पैंतरे नहीं जानते या अपनाते! जिससे वे प्रकाशन तो करते हैं लेकिन विक्रय नहीं कर पाते। उनकी प्रकाशन की समझ बहुत बढ़िया है। उन्होंने मेरी इंटरव्यूज की पुस्तक ‘ यादों की धरोहर’ के दो संस्करण प्रकाशित किये! उन्हें यह मलाल है कि शानदार लंबी कवितायें लिखने के बावजूद उनका लंबी कविता में कोई खास जिक्र नहीं!

चलिए, इस बात को छोड़कर उनके कवि पक्ष की बात करते हैं। उनकी पहली काव्य कृति थी ‘कीड़े’ और फिर हाल ही के वर्षों में प्रेम के रंग भी खूब चर्चित रही। अनेक काव्य संकलन और पंजाब शिरोमणि साहित्यकार होने के साथ साथ वे हरियाणा साहित्य अकादमी से भी सम्मानित हो चुके हैं! हरियाणा के वरिष्ठ आईएएस रमेंद्र जाखू को  साहित्यिक क्षेत्र में लाने में बड़ा सहयोग दिया!

आज लगता है कि डाॅ चंद्रशेखर स्कूल के सभी छात्रों को मैंने याद करने की छोटी सी कोशिश भर की है! हां, आज आंखें भीग गयीं डाॅ चंद्रशेखर को याद करते क्योंकि वे सन्‌1989 में 29 अगस्त को दिल्ली से अपनी कार‌ ड्राइव करते लौट रहे थे कि करनाल के निकट हरियाणा रोडवेज की बस से सीधी टक्कर में वे हमसे बिछड़ गये!

अब आज आगे लिख पाना बहुत मुश्किल लग रहा है और डाॅ चंद्रशेखर को याद करते इतना ही कहूँगा :

उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो

न जाने किस गली में

ज़िंदगी की शाम हो जाये!

क्रमशः…. 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #228 – 115 – “कहता जंग जीती है मैंने, अरे जीतकर हारा है…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी भावप्रवण ग़ज़ल कहता जंग जीती है मैंने, अरे जीतकर हारा है…” ।)

? ग़ज़ल # 114 – “कहता जंग जीती है मैंने, अरे जीतकर हारा है…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

ये हमने  जो गुजारा है,

ये जीवन है या कारा है।

*

न आज़ाद  परिंदों जैसा,

देह  घरौंदा  हमारा  है।

*

क्यों अब तू हैरान रहता,

यही  पिंजर  गवारा है।

*

प्यार कभी  न ठुकराना,

न फिर मिलना दुबारा है।

*

यहीं   झगड़ेंगे  उलझेंगे,

न  कोई  दूसरा चारा है।

*

कहता जंग जीती है मैंने,

अरे  जीतकर  हारा  है।

*

है आतिश की क़िस्मत वही,

बुझना  सबको  न्यारा  है।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मृत्यु ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – मृत्यु ? ?

बूढ़ा हो चला हूँ;

कभी भी मर जाऊँगा,

बुज़ुर्ग का संवाद जारी था..,

मेरी आँखों में

उतरने लगे दृश्य-

सड़क-दुर्घटनाओं में

नौजवान बाइक सवारों की

नित होनेवाली

आकस्मिक मृत्यु के,

रैगिंग, आपसी संघर्ष

लेन-देन, क्रोध और

अधिकांशतः अकारण

नये खून की हत्याओं के किस्से,

परीक्षा-नौकरी-प्रेम में

असफलता के चलते;

मौत के गले लग जानेवाले

युवाओं के समाचार,

यहाँ तक कि

कुछेक को कोख में भी

मरणांतक पीड़ाएँ होती,

बूढ़ा होना, मरने की

अनिवार्य शर्त नहीं होती!

© संजय भारद्वाज  

(22 अगस्त 2016, रात्रि 8:57 बजे)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ महाशिवरात्रि साधना पूरा करने हेतु आप सबका अभिनंदन। अगली साधना की जानकारी से शीघ्र ही आपको अवगत कराया जाएगा। 🕉️💥

 अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Common Man… ☆ Hemant Bawankar ☆

Hemant Bawankar

 

Common Man… ☆ Hemant Bawankar ☆

‘Time’

heals

big wounds.

 

Today,

RK Laxman’s

symbol of a “common man”

stands watching

speechless

in Symbiosis campus

passing through

the cycle of time.

Searching its existence

in the aging cartoons

on which

settling,

the dust of time.

 

Whether

like the other cartoon characters

in the world,

his fate

was limited

up to this?

Up to his

creator’s journey

to heaven?

 

No …. No.

He wriggles everyday

when falls on him

first rays of the sun

to

the last rays of the sun

and

all night in the pitch-black darkness.

 

He is eager

for lodging

his presence

in

current topics

socio-political scenario

national and international scenario

the relevant compositions

in cartoons

in poems

in satire

and even in occasional columns

as always

only by staying neutral

like a ‘common man’

 

One says

‘time’

heals

big wounds.

 

(This poem has been cited from my book The Variegated Life of Emotional Hearts”.)

© Hemant Bawankar

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM 

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 318 ⇒ उखड़े हुए लोग… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “उखड़े हुए लोग।)

?अभी अभी # 318 ⇒ उखड़े हुए लोग? श्री प्रदीप शर्मा  ?

कभी मैं भी इसी जमीन से जुड़ा था, इसी मिट्टी में पला बढ़ा था।  आज जहां चिकने टाइल्स का फर्श है, कल वहां गोबर से लिपा हुआ आंगन था।  एक नहीं, तीन तीन दरख़्त थे।  कल कहां यहां सोफ़ा, कुर्सी, कूलर और ए सी थे, बस फकत एक कुआं और ओटला था।  

सर्दी में धूप और गर्मी में नीम की ठंडी ठंडी छांव थी, बारिश में पतरे की छत टपकती थी, आसमान में बादल गरजते थे, बिजली चमकती थी।  तब दीपक राग से चिमनी, कंदील नहीं जलती थी, केरोसीन के तेल से ही स्टोव्ह भी जलता था।।  

घरों में लकड़ी का चूल्हा तो था, पर गैस नहीं थी।  सिगड़ी भी कच्चे पक्के कोयले की होती थी, सीटी वाले कुकर की जगह तपेली और देगची में दाल चावल पकते थे।  बिना घी के ही चूल्हे पर फूले हुए फुल्कों की खुशबू भूख को और बढ़ा देती थी।  तब कहां नमक में आयोडीन और टूथपेस्ट में नमक होता था।  

मौसम के आंधी तूफ़ान को तो हमने आसानी से झेल लिया लेकिन वक्त के तूफ़ान से कौन बच पाया है।  पहले मिट्टी के खिलौने हमसे दूर हुए, फिर धीरे धीरे मिट्टी भी हमसे जुदा होती चली गई।  वक्त की आंधी में सबसे पहले घर के बड़े बूढ़े हमसे बिछड़े और उनके साथ ही पुराने दरख़्त भी धराशाई होते चले गए। ।  

इच्छाएं बढ़ती चली गई, भूख मरती चली गई।  

सब्जियों ने स्वाद छोड़ा, हवा ने खुशबू।  रिश्तों की महक को स्वार्थ और खुदगर्जी खा गई, अतिथि भी फोन करके, रिटर्न टिकट के साथ ही आने लगे।  दूर दराज के रिश्तेदारों के पढ़ने आए बच्चे घरों में नहीं, हॉस्टल और किराए के कमरों में रहने लगे।  

सब पुराने कुएं बावड़ी और ट्यूबवेल सूख गए, घर घर, बाथरूम में कमोड, शॉवर और वॉश बेसिन लग गए।  पानी का पता नहीं, गर्मी में चारों तरफ टैंकर दौड़ने लग गए।  सौंदर्यीकरण और विकास की राह में कितने पेड़ उखाड़े, कितने गरीबों के घर उजाड़े, कोई हिसाब नहीं।।  

पहले जड़ से उखड़े, फिर मिट्टी से दूर हुए, पुराने घर नेस्तनाबूद हुए, बहुमंजिला अपार्टमेंट की तादाद बढ़ने लगी।  अपनी जड़ें जमाने के लिए हमें अपनी मिट्टी से

जुदा होना पड़ा, संस्कार, विरासत और परिवेश, सभी से तो समझौता करना पड़ा।  कितने घर उजड़े होंगे तब जाकर कुछ लोगों को मंजिलें मिली होंगी।  अपनी मंजिल तक अब आपको लिफ्ट ले जाएगी।  इसी धरा पर, फिर भी अधर में, क्या कहें, उजड़े हुए, उखड़े हुए अथवा लटके हुए ;

न तू ज़मीं के लिए है,

न आसमां के लिए।  

तेरा वजूद है अब

सिर्फ दास्तां के लिए।।  

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares