हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 166 ☆ # सपने # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# सपने #”

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 166 ☆

☆ # सपने #

एक मज़दूर

छेनी हथौड़े से

तोड़ता रहता है पत्थर

उसकी पत्नी पास बैठी है

टूटी गिट्टी को

रखती है समेटकर

उसका बच्चा

साड़ी के झूले में

टंगा रहता है

पेड़ की डाल पर

वह स्त्री

दोनों को देखतीं हैं

कभी पति तो

कभी बच्चा

कहीं बैठ ना जाए उठकर

दोनों युगल लगें है

रोज की तरह

अपने काम में दिनभर

इस रोज़ी से, कमाई से

घर में चूल्हा जलता है

उन सबका पेट पलता है

दोपहर में

दोनों पति-पत्नी थककर

जब सुस्ताते है

तब भविष्य के बारे मे

सोचते जातें हैं

यह अपार्टमेंट बनते ही

हमें कहीं दूर जाना है

हमारा कहां स्थाई ठिकाना है

पत्नी बोली – सुनो जी!

हमारा बेटा

कब स्कूल जायेगा?

वह कैसे पढ़ पायेगा?

या सारा जीवन

हमारे जैसा ही

पत्थर तोड़ते ही बितायेगा ?

 

वह मजदूर

कुछ सोचते हुए

गमछे से

पसीना पोंछते हुए

बोला –

नहीं -?

मैं अपने बेटे को पढ़ाऊंगा

उसे इंजीनियर बनाऊंगा

वो भी ऐसी कालोनीज

अपार्टमेंट बनायेगा

अपना नाम कमायेगा

वह उठकर

जोर जोर से

पत्थर तोड़ने लगा

मन ही मन

कुछ जोड़ने लगा

उसकी आंखों में

अनगिनत सपने है

स्पष्ट हो या अस्पष्ट

पर उसके अपने है /

© श्याम खापर्डे

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ सामर्थ्य… ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

श्री राजेन्द्र तिवारी

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता ‘सामर्थ्य…’।)

☆ कविता – सामर्थ्य… ☆

बादल का एक टुकड़ा, बरसने के बाद,

लौटते हुए, मेरे आंगन के ऊपर रुक गया,

आंगन की मिट्टी को देखने लगा,

जो बारिश की उम्मीद लगाए बैठी थी,,

कि पानी की बूंदों से उसकी

जलन मिटेगी,

तप्त होकर सौंधी सौंधी महक से, वह भी महक जाएगी,

 पर निराश भाव से वह तकती रही, बादल को,

क्या कहती,, बादल भी तो पुरुष था,

क्या जाने वो स्त्री की व्यथा,,

जलती देह की अगन की तपन,

तभी नम हवा ने आकर मिट्टी को सहलाया,

पुचकारा और कहा,और कहा,

निष्ठुर है ये,व्यथा न जानेगा,

मै बूंदों से कहूंगी,वो तुम्हारी तपन को जानेगी,

और तुमसे मिलकर सृजन करेंगी,उस बीज का, जो मै अपने साथ लाऊंगी,,

वो पेड़ बनेगा,

और फिर बाद ल उस पर बरसेगा, क्योंकि,

वह पेड़ भी पुरुष है,, वही समझेगा,,उसी को,,,

मिट्टी अपनी व्यथा,मजबूरी, परिस्थिति को जान गई,,

हवा से कहा, हां तुम बीज लाओ,

मै सृजन करूंगी, अपनी कोख से,

उस पेड़ का, जो सबको फल दे छाया दे,

और जो जवाब दे बादल के टुकड़े को,

कोई भी कार्य,परोपकार भाव से करो,

वृष्टि भी सम भाव से करो,,

हवा के सहारे न उड़ना पड़े,

इतना सामर्थ्य पैदा करो… 

© श्री राजेन्द्र तिवारी  

संपर्क – 70, रामेश्वरम कॉलोनी, विजय नगर, जबलपुर

मो  9425391435

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तारांगण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तारांगण☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आहे तसाच कच्चा पिकलो अजून नाही

मी अंतरात माझ्या मुरलो अजून नाही

*

तपसाधना कराया विजनात वास केला

ज्ञानात पावसाच्या भिजलो अजून नाही

*

त्यांच्या धिम्या गतीने उलटून काळ गेला

काळासवे सुखाने फिरलो अजून नाही

*

बिथरून खूप राती दाऊन धाक गेल्या

भयमुक्त शांत निद्रा निजलो अजून नाही

*

काळीज जाळणारा सोसून दाह सारा

माळावरी उभा मी वठलो अजून नाही

*

पाठीवरील ओझे फेकून द्यायला मी

लांबून खूप आलो शिकलो अजून नाही

*

झोळी भरून माझी ओसंडते सुखाने

कुठल्याच वैभवाने दिपलो अजून नाही

*

कोरून कातळाला थकलोय खूप आता

स्वानंद जीवनाला भिडलो अजून नाही

*

ठरवून संकटांनी हल्ले बरेच केले

लाचार होउनी मी हरलो अजून नाही

*

निरखून भव्य सारे आकाश पाहिले मी

तारांगणी मला मी दिसलो अजून नाही

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 162 ☆ हे शब्द अंतरीचे… तू आणि मी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 162 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… तू आणि मी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

अनोळखी तू,अनोळखी मी

असेच एकदा कुठे भेटलो

तुला पाहिले सखे अन्

मला मी तिथेच विसरलो

 

का आलीस समोर माझ्या

का नेत्र शर संधान केले

अबोल माझ्या बोलास

तू बोलते केले…

 

मी होतो एकटा जेव्हा

मस्त होते जीवन हे

तुझ्या येण्याने बदल होता

अडखळती पाय माझे…

 

मोगरा फुलला जैसा

तुझी कांती तैसी

चाफ्याच्या सुवास यावा

तुझी अंगकांती बहरली…

 

डोळ्यांत चमक तुझ्या

जादूगार जशी तू

ओठ जसे प्रिये

डाळिंब फुटले…

 

केस मोकळे रेशमी

गालावर बट रुळते

पाहून हे दृश्य सजने

माझी बोबडी वळते

 

पुन्हा तुला पाहावे वाटते

वेड लावले मला तू

अजूनही उभा तिथेच मी

जिथे भेटली होतीस तू…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याचा उद्देश – सिद्धांत ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ आयुष्याचा उद्देश – सिद्धांत  ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा असतात. त्या गोष्टी मिळाव्यात अशी गरजही असते. त्याचा क्रम साधारण पुढील प्रमाणे असतो.

अन्न,वस्त्र,निवारा,पैसा,प्रतिष्ठा व मी कोण? याचा शोध.

त्यातील अन्न,वस्त्र,निवारा,पैसा व भौतिक सुख सुविधा याच्या मागे माणूस लागतो.आणि आपण जेवढे त्याच्या मागे लागतो तितकेच ते पुढे पळते.जशी सावली धरता येत नाही तसेच काहीसे होते. मग ही सावली आपल्या मागे कशी येईल याचा विचार केला पाहिजे. आपण सूर्याकडे पाठ करुन चाललो तर सावली आपल्या पुढे असते.पण सूर्याकडे तोंड करुन चाललो म्हणजे सूर्याला सामोरे गेलो तर सावली मागे येईल. मग हा सूर्य कोण? तर आपण स्वतः …..

स्वतः कोण आहोत? स्वतः मधील क्षमता ओळखल्या तर या सगळ्या सावल्या,भौतिक सुखे,लोकप्रियता आपल्या मागे येते. म्हणजेच आपल्या आयुष्याचा उद्देश आपल्याला माहिती असणे महत्वाचे असते. जगात इतकी माणसे असताना माझा जन्म झाला आहे म्हणजे निसर्गाला माझ्या कडून काही काम करुन घ्यायचे आहे.हे लक्षात घ्यावे.

▪️ आपल्या सभोवती जी वैश्विक शक्ती आहे त्याचे आपण शक्तिशाली मानवी रूप आहोत. आणि या वैश्विक शक्तीला आपल्या कडून काही करून घ्यायचे आहे हे कायम लक्षात ठेवावे.

▪️ स्वतः मध्ये कोणते टॅलेंट म्हणजे दैवी शक्ती आहे याचा शोध घ्यायचा आहे. प्रत्येक व्यक्ती युनिक असते. प्रत्येकाची हुशारी,कौशल्ये वेगळी असतात.

▪️ या वेगळे पणाचा व आपल्यात असलेल्या वैश्विक शक्तीचा उपयोग करुन आपल्या संपर्कात येणाऱ्यांना आपण कशी मदत करु शकतो याचा विचार करायचा आहे.

How can I help? हा विचार प्राधान्याने करायचा आहे.

आपण जे लोकांना देतो ते आपल्याकडे कित्येक पटीने परत येते. म्हणून मला काय मिळणार या पेक्षा माझ्या कडून कोणाला काय मिळणार? माझ्यामुळे किती जण आनंदी होणार? याचा विचार करुन त्या प्रमाणे आचरण केले तर तोच आनंद कित्येक पटीने आपल्या कडे येणार आहे.

या साठी पुढील गोष्टी आचरणात आणाव्यात.

▪️ माझ्यात वैश्विक दैवी शक्ती आहे.माझा जन्म काही कारणा साठी झाला आहे. हे मान्य करावे.

▪️ स्वतः मधील युनिक टॅलेंट म्हणजे वेगळ्या दैवी शक्तीची यादी करावी.

ही यादी करताना काही गोष्टींचे स्मरण केले तर यादी करणे सोपे होईल.

उदा. आई वडील काय केल्यावर शाबासकी देत होते?

माझ्याकडे माणसे कोणत्या गोष्टी मुळे येतात?

माझ्या कोणत्या कृतीने माणसे आनंदी होतात?

माझ्या मधील कोणत्या गोष्टी मुळे मी लोकांना प्रिय आहे?

याचा विचार केला तर आपल्यात कोणते विशेष व इतरांच्या पेक्षा वेगळे गुण म्हणजेच वेगळी दैवी शक्ती आहे ते लक्षात येईल.

▪️ माझ्याकडे अमर्याद पैसा व वेळ असेल तर मी इतरांच्या साठी काय काय करु शकेन याची यादी करणे. जे करावेसे वाटेल ते म्हणजे विशेष गुण आहेत.ज्या गोष्टी करायला आवडतात त्यांची एक यादी करणे.

▪️ माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी कशी व कोणती मदत करु शकेन? ज्या मुळे त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल.

हे जर आपण अंमलात आणले तर नक्कीच आपल्या आयुष्यात एक वेगळा आनंद निर्माण होणार आहे.

हे सगळे करण्याचा उद्देश एकच आहे. तो उद्देश म्हणजे स्वतःला ओळखणे.

स्वतः मधील क्षमता,सकारात्मकता व स्वतः मधील वेगळे पण ओळखणे. एकदा आपण स्वतःला ओळखले की बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येणार आहेत.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किंमत – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ मुलगी – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

      “दुकानात सफाई कामासाठी त्वरीत मुलगा पाहिजे” अशी पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं. “काय पाहिजे?”

      त्याने शांततेने बोर्डाकडे बोट दाखवलं. गार्ड समजला. आत हात दाखवून म्हणाला “राजू शेठ समोरच बसलेत त्यांना भेटून घे.”

      अस्वस्थ मनाने तो आत शिरला. समोरच काऊंटरवर राजूशेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते. कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली. “बोला..”

       “ते… तुम्हांला सफाई कामासाठी मुलगा पाहिजे आहे ना?”

        “हो. तू करणार आहेस का?”

त्याने मान डोलावली. राजूशेठने त्याच्याकडे निरखून पाहिलं. पंधरासोळा वर्षाचा गोरागोमटा स्मार्ट मुलगा. कपडे मात्र साधारण होते. दुकानाच्या सफाईसाठी योग्य आहे असं त्यांना वाटेना. “तुझं नांव?”

“प्रदीप”

“वडील काय करतात?”

“रिक्षा चालवतात”

“कुठे रहातोस?”

“समता नगर”

“ठिक आहे .तीन हजार देऊ तुला महिन्याला.खाडे करायचे नाहीत.खाड्याचे पैसे आम्ही कापून घेतो”

” हो चालेल “

तेवढ्यात ग्राहक आल्यामुळे राजशेठ ओरडून म्हणाले “अरे भास्कर. याला दुकान दाखवून दे.काम समजावून सांग”

भास्कर आला.त्याने प्रदीपला ते तीन मजली दुकान फिरुन  दाखवलं

” तुला सकाळी आठ वाजताच यावं लागेल.फ्लोरींग, काचेची कपाटं,काऊंटर्स,वाँशरुम सगळं साफ करावं लागेल.हे कपड्याचं दुकान आहे.इथे थोडीही धुळ चालत नाही. ग्राहक येतांना धुळ घेऊन येतात.त्यामुळे वारंवार झाडू मारणं,कपड्याने पुसणं करावं लागतं.रात्री आठनंतरच तुला घरी जाता येईल”

प्रदीपने मान डोलावली.

“जा आता.सकाळी आठ वाजताच ये”

प्रदीप गेला.त्याला जातांना पाहून राजूशेठला परत एकदा तो सफाईकामाला योग्य नाही असंच वाटून गेलं.”ठिक आहे.पाहू दोनचार दिवस.नाही पटला तर हाकलून देऊ” ते मनाशीच बोलले.

प्रदीप दुसऱ्या दिवशी आला.त्याने काम करायला सुरुवात केली पण त्याने कधीच सफाईचं काम केलेलं नाही हे त्याच्यासोबत आलेल्या नोकरांच्या लक्षात आलं.ते त्याला वारंवार सुचना देऊ लागले.दहा वाजले.दुकान उघडण्याची वेळ आली तरी त्याची सफाई झाली नव्हती.ते तरी बरं शेठ अकरा वाजता यायचे.नाहीतर त्यांनी प्रदीपला फाडून खाल्लं असतं.दुकान सुरु झालं.साडेअकराला भास्कर वाँशरुमकडे जायला निघाला तर वाँशरुमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता.

“काय रे काय झालं?का रडतोय?”

“नाही.काही नाही” प्रदीपने डोळे पुसले

” तुला काम जमत नाही असं मनोज सांगत होता.कधी काम केलं नाही वाटतं?”

“नाही”

“गरीबी वाईट असते बाबा.काहीही कामं करायला लावते.जमेल जमेल.तीन चार दिवस हाल होतील.मग सवय होऊन जाईल.काही रडू नको.घरी कोण काम करतं?”

” आई आणि बहिण”

” तरीच.कळलं ना कसा त्रास होतो ते?”

प्रदीपने मान डोलावली.

दुपारी भास्कर कस्टमर नाही असं पाहून जेवायला बसला त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं.

” काय रे जेवायचं नाही का?”

प्रदीपने नकारार्थी मान हलवली.

“का?डबा नाही आणला का?”

” नाही”

” ये मग इकडे.आपण दोघंही जेवू”

” नको.मला भुक नाहिये”

“अशी कशी भुक नाही.सकाळपासून काम करतोय.चल मुकाट्याने ये खायला”

तेवढ्यात दोन सेल्समनही डबा घेऊन आले.प्रदिपचा डबा नाही हे पाहून त्यांनी दोन दोन पोळ्या आणि भाजी प्रदिपला एका ताटलीत काढून दिल्या.भुक नाही म्हणणाऱ्या प्रदीपने पाच पोळ्या खाल्ल्या.

“उद्यापासून डबा आणत जा.काय!” भास्करने दम भरला.

“ते…आई आजारी असते त्यामुळे आणता येत नाही”

तिघा सेल्समननी एकमेकांकडे पाहिलं.एक जण म्हणाला

” काळजी करु नको.आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी पण”

प्रदीप काही बोलला नाही.

चारपाच दिवस प्रदीपला काम जमत नाहिये हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली .कुणी काऊंटर पुसून घेतले ,कुणी काचेची कपाटं साफ केली,तर कुणी पंखे,लाईटस्.आठवडाभरात प्रदिपला बऱ्यापैकी काम जमायला लागलं.पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही. राजूशेठला ही गोष्ट माहित नव्हती त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते.भास्करला त्यांनी दोनतीनदा त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा भास्कर म्हणाला “चांगला आहे पोरगा कामाला.मेहनती आहे “

लग्नाचा सिझन होता.ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली.प्रदीपचं कामही वाढलं.वारंवार दुकान झाडणं,पुसणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही.पंधरा दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला.आता तो मोकळेपणाने बोलत होता.फुरसत असली की तो सेल्समनना मदत करायचा.ढिगाने पडलेल्या साड्या,बेडशीट्सच्या घड्या करुन ठेवायचा.ग्राहकांना पसंत न पडलेले रेडिमेड कपडे बाँक्सेसमध्ये व्यवस्थित पँक करुन ठेवायचा.महिना झाला.राजूशेठने प्रदीपच्या हातात तीन हजार ठेवले तेव्हा त्यांना प्रदिपचे डोळे भरुन आल्याचं जाणवलं.

” काय रे काय झालं?”

” काही नाही. पहिला पगार आहे ना म्हणून…”

“अच्छा..”

त्याने डोळे पुसले.शेठजींना आठवलं या महिन्यात प्रदिपने एकही दिवस खाडा केला नव्हता.उलट सिझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरु असायचं तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा.त्याच्या कामावर खुश होऊन राजूशेठने त्याचा पगार चार हजार करायचं ठरवलं.

सोमवार उजाडला.राजूशेठ दुकानात आले.देवांच्या फोटोंची पुजा करुन ते कँशकाऊंटरवर बसत नाही तोच प्रदीप त्यांच्याकडे आला.नमस्कार करुन म्हणाला

“शेठजी माझे बारावीचे क्लासेस पुढच्या आठवड्यापासून सुरु होताहेत तर मी हा आठवडाभरच काम करु शकणार आहे”

शेठजींना धक्का बसला.

“अरे पण तू दुकानात काम करुनही क्लासेस करु शकतो.संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला”

“नाही शेठजी.क्लासेस सकाळी आणि संध्याकाळीही असतात”

आता मात्र शेठजी रागावले.आता पुन्हा दुकानाच्या सफाईसाठी मुलगा बघणं आलं.याच गोष्टीचा त्यांना तिटकारा होता.एकतर माणसं मिळायची नाहीत. मिळाली तरी पैसा देऊनही टिकायची नाही.

“तुला असं एकच महिना काम करायचं होतं तर तसं बोलला का नाहीस?आता या आठदहा दिवसाचा पगार तुला मिळणार नाही” ते रागावून म्हणाले

प्रदीप हसला

“काही हरकत नाही शेठजी”

शेठजींना आश्चर्य वाटलं.एक एक दिवसाच्या पगारासाठी भांडणारी,खाड्याचे पैसे कापले म्हणून वादविवाद घालणारी माणसं त्यांनी बघितली होती.या पोराने तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं.नाहीतरी आजकालच्या तरुण पोरांना पैशाची किंमत असतेच कुठे!

नशिबाने शेठजींना दुसरा माणूस मिळाला.पण तो चार हजार पगारावर अडून बसला.शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं.येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.

– क्रमशः भाग पहिला  

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फलाट… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ फलाट… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

दुपारची वेळ असूनही फलाट सुमसाम होता. गाडी यायला अजून दोन तासांचा वेळ होता. साडेचारची गाडी साडेचारला येईलच याची शाश्वती नव्हती. तोपर्यंत ताटकळणं आलंच. दिवसातून एकदा पॅसेंजर एकदा या दिशेला, दुसरी त्यादिशेला जायची. असलाच कुणी पॅसेंजर तर घ्यायची पोटात. नाहीतर थांब्याची वेळ तीन मिनिटे संपली की निघायची. तसं चाकांचं रूळावरून धावणं अव्याहत. बाकीच्या गाड्या थांबत नव्हत्या. धडधड धावून जात होत्या. फलाट त्यांच्यासाठी सावकाच.

रणरणत्या उन्हात फलाटावर तो एकटाच. स्टेशन तसं छोटं असल्याने छप्पर ही छोटंच. कौलारू. काही कौलं सुटी झालेली. त्यातून उन्हाची तिरीप फलाटावर येणारी तीही नेमकी बाकावर. बाकं ही मोजकीच. कोपऱ्यात मोठं रांजण लावलेलं आडोशाला.त्याला लाल कपडा गुंडाळलेला. तो मात्र ओला होता. माठातलं गार पाणी घशा खाली ढकललं. तेवढंच बरं वाटलं. जंबूखेडा हे काहीसं वेगळं वाटणारं नाव स्टेशनला. ते नाव लाल रंगाने मोठ्या अक्षरात पाटीवर लिहीलेलं ठळकपणे. स्टेशनच्या दोन्ही बाजूला. जिथून स्टेशनला उतार लागतो.पाटीवर गावाच्या नावाखाली एमएसएल ही लिहीलेलं. मीन सी लेवल नऊशे छत्तीस फूट. अर्थात गाड्यांतून मुशाफिरी करणाऱ्या मुशाफिराला त्या आकड्यांशी काही देणं घेणं नव्हतं. दिवसातून एकदा गाडी येते जाते हेच खूप होतं त्यांच्यासाठी.फलाटही फारसा उंच नव्हताच. सिंगल लाईनवर धावणाऱ्या गाडीसाठी फलाटावर दोन्ही बाजूला रूळ असलेले. कधी अवचित काही घडलं तर मालगाडी वा पॅसेंजरही थांबायच्या बराच वेळ दुसऱ्या रूळावर.       फलाट छोटासाच असल्याने नीटनेटका साफ असलेला. दिवसातून दोन वेळा केर काढला तरी पुरे. माणसांची नियमित ये जाच नसलेली तेव्हा कचरा होणार कसा? डोक्यावरून उन्हं कलली तरी फलाट तापलेलाच. घामाच्या धारांनी चिंब होणं होत असलेलं चिकट चिकट. कौलांवर कावळे तेवढे हजर असलेले. त्यांची काव काव अजून दोन तास ऐकावी लागणार. 

गाव तसं पाच मैल लांब तेही छोटंसंच. पाच पन्नास घरं असतील नसतील. आठवड्यातून एकदा आठवडे बाजार भरतो तेव्हा थोडा फार गलबला होतो गावात. एरवी शांतच. गावातली मंडळी दिवसभर शेतात. रात्रीही निजानिज लवकर घडत असलेली. गावाच्या मध्यावर असलेलं देवीचं देऊळ. त्यात गणपती, मारूती, शंकर पिंडीच्या रूपात, देवी समोर सिंह, शंकरा समोर नंदी सगळे गुण्यागोविंदाने नांदत असलेले. गणपतीला दुर्वा, महादेवाला बेल, देवीला लाल फुल, मारूतीला तेल अजूनही वाहिलं जात असलेलं. गाव अजूनही तसंच वीस पंचवीस वर्षांपूर्वी होतं तसंच. बदल तसा फारसा नाहीच. अनोळखी चेहेऱ्यांची भर पडली इतकंच. गावाच्या ओढीने आलो तर गावातल्या खाणाखुणा तशाच मात्र गाव तसं अनोळखीच. घरोघरी ओट्यावर बसून असलेली म्हातारी मंडळी सोडली तर परिचित असलेलं तसं कुणीच नाही. मुद्दाम ओळख लपवली मग. कुणाचाच विचार करायचा नाही हे पंचवीस वर्षांपूर्वी ठरवलं होतं जेव्हा गाव सोडलं होतं तेव्हा. आताही तेच. वेगळा विचार करणं शक्यच नव्हतं. राहत्या घरात दुसरीच माणसं राहत असलेली. शेत जमीनही गेलेली. नदीचं पाणी तर नेहेमीच आटणारं. जेमतेम चारसहा महिने वाहायची तेव्हा. उन्हाळ्यात कोरडीठाक. आताही तशीच होती कोरडीठाक. गावात मोजक्याच विहीरी. त्यावर निभावून नेलं जाई. तेवढाच ओलावा. येणं तर झालं गावात. पण जीव लावणारं, ओलावा देणारं कुणी उरलंच नव्हतं. 

एक कुत्रं धावत धावत गेलं फलाटावरून. तेही पाहत होतं विचित्र नजरेने. कोण हा पाहुणा? त्याचं धावणं पाहिलंन् आठवलं. असाच धावत येत होतो गावातून. गाडीची वेळ झाली की. मग डोकावून डोकावून पाहणं व्हायचं लांबचलांब रूळांवर. वेळ झाली की वेळेवर वा कधी उशिरा ते यायचंच काळं धुड धडधडत, कोळशाचा काळा धूर ओकत. त्या कोळशाच्या धुराचा वास ही खोलवर घ्यावासा वाटायचा. माथी फडकी बांधून असलेले ड्रायव्हर हीरो वाटायचे. कधीकधी गार्ड, स्टेशनमास्तर व ड्रायवरचे बोलणं व्हायचं. तितकाच वेळ गाडी जास्त थांबायची. तेवढ्यात ही गाडीत चढउतर करून घ्यायचो. गाडी हलली की उडी टाकायची. मग इंजिनकडे पळणं व्हायचं. गाडी बरोबर शर्यत लावणं मजेशीरच असायचं. करवंद, जांभळं विकणाऱ्या मुली हमखास असायच्या. मग तो मेवा चाखत चाखत गावाकडे परतणं व्हायचं.  तेव्हा माहित नव्हतं की एके दिवशी डोक्यात राख घालून याच गाडीतून लांब निघून जाणं होणारेय कायमचं. 

गाडी येण्याच्या अर्धातास अगोदर  स्टेशन मास्तरने खिडकी उघडली. सर्वात अगोदर तिकीट काढून घेतलं. थेट मुंबईचं तिकीट काढल्याने स्टेशन मास्तर अचंबित होऊन बघत होते. मागून आणखी एकाने तिकीट काढलं. बस तेवढाच व्यवहार खिडकीवर झाला. पुन्हा बाकावर येऊन बसलो तर स्टेशन मास्तरही शेजारी येऊन बसले.“ नवीन दिसताय गावात? ” चौकशी केलीच त्याने. “ मी इथलाच. ” इतकंच म्हटलं तर त्याच्या डोळ्यात कोण आश्चर्य उमटलेलं. “ कधी बघितलं नाही? ” तसं मग परवाच्या फ्लाईटचं युएसचं तिकीटच त्याच्या हातात ठेवलं. त्याने ते न्याहाळून लगेच परत केलं. दुसरे तिकीट काढलेला सुटेडबुटेड तरूण दुसऱ्या बाकावर ऐटीत बसला होता. त्याच्या पाया जवळ पागोटं घातलेला म्हातारा बसलेला. त्याचं सारखं टुकूरटुकूर पाहणं चाललेलं. काही वेळानं तो आलाच जवळ. पुन्हा एकदा त्याने निरखून घेतलं. हात जोडून राम राम केला.  “ निंबा पाटलाचा पोर ना रे तू! ” आठवत नव्हतं कोण असावा हा. पण जसं तो बोलला तसं लख्खं आठवलं. ज्याच्या अंगाखांद्यावर खेळलो होतो तो हा धोंडू. आता जख्ख म्हातारा झालेला.  पटकन खाली वाकणं झालं. धोंडूने तर  छातीशीच कवटाळलं. त्याच्या डोळ्यात पाणीच पाणी. “ पहाटेच आलास अन् लागलीच निघाला व्हय मुडद्या. ” गळाच दाटून आला. बोलवेचना त्याच्याने. पाण्याची बाटली धरली तर दोन घोट घेत भडाभडा बोलायलाच लागला. “ घराच्या जोत्या समूर उभं राह्यलं तवाच वळखलं तवास्नी. मालकाचं पोर हाय, लई मोठं झालंस रे! कुटं निगून गेला व्हतास. असं कुनी काय निगून जातं का रागास्नी!  तुजी आई गेली झुरून झुरून तुज्यापायी. आबांनी घर शेती विकली गेलं शहरात. तुजी भाऊ बहिणी कुनी फिरकत नाही गावाकडं. तू कसं येणं केलंस? ” आता माझ्या डोळ्यात पाणी. “ गाव आठवलं. गावाकडची माणसं आठवली. देवीच्या देवळातली शाळा आठवली. अन् हा फलाट आठवला बघ अन् आलो तसाच. ”

बराच वेळ धोंडू बोललाच नाही. नुसतं डोळ्यातनं पाणी.  मग स्वगत म्हटल्यासारखा धोंडू बडबडत राहिला. “ हा माझा नातू गाव सोडून शहरात चाललाय. एकेक करून सोडत चाललेत. गाव गाव नाही राहिलं आता. रयाच गेली. जुनी जिव्हाळ्याची माणसं नाही राहिली. विखरून पडलंय गाव. विसरलं ही जाईल काही दिसांत. ”  धोंडू स्वतःतच हरवत चाललेला. इतक्यात गाडीची  शिट्टी वाजली.  फलाटावर गाडी येऊन दिमाखात उभी राहिली. तसं धोंडूने स्वतःला आवरलं. तसं एकमेकांच्या पुन्हा पाया पडणं झालं. मी धोंडूचा खांदा थोपटत म्हटलं. “ गाडीची वेळ झाली की निघून जावं लागतं. थांबणं होत नाही. ” गाडीने वेग घेतला तसा फलाट मागे पडत गेला. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फक्त अर्धा ग्लास पाणी” ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ “फक्त अर्धा ग्लास पाणी” ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेल मधे गेलो होतो..

विषय अर्थातच पाण्याचा होता, गप्पा चालू होत्या, विषय जसा-जसा पुढे सरकत होता, तसं एक observe करत होतो, अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते… गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही…

आमच्याही टेबल वर जाताना मला 4 ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे.

मनाला काहीतरी खटकत होतं.

मिटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेल मध्ये घुसलो. परवानगी घेतली अन वेटर्सचा मॅनेजर होता त्याला भेटलो. 

म्हटलं, हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्ध ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं?

तो म्हटला ज्या वेटरने टेबल क्लिअर केला असेल त्याने ते पाणी बेसिन मधे ओतून दिलं असणार, तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता.!

 म्हटलं विक-डेज मधे तासाला अंदाजे किती लोक येत असतील?

तो म्हटला, नाही म्हटलं तरी 15 ते 20 जण सरासरी. दुपारी लंचला अन रात्री डिनरला जास्त.

म्हटलं. म्हणजे 10 तास हॉटेल चालू आहे असं पकडलं तर साधारण सरासरी 250 जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार!

म्हणजे सरासरी रोज 350 जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं तर अंदाजे 100 लिटर पाणी बेसिन मधे “रोज वाया”.

म्हणजे एक हॉटेल कमीतकमी 100 लिटर “अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी” बेसिन मधे रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेज मधून जाऊन शेवटी नदीच्या इतर ‘घाण’ पाण्यात मिसळतं.

पुण्यात सध्या अंदाजे छोटे मोठे पकडून 6000 च्या वर हॉटेल्स आहेत. 

म्हणजे दिवसाला 6000*100 लिटर,

 म्हणजे 6 लाख लिटर प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला.

हे झालं एका दिवसाचं , असं आठवड्याचं म्हटलं तर 42 लाख लिटर अन वर्षांचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय. या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच.

हे एका शहराचं, अशी महाराष्ट्रात कमीत कमी 15 मोठी शहरं आहेत . मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वगैरे वगैरे कित्येक.

बर हे कोणत्या देशात, कोणत्या राज्यात घडतंय?? तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार जर 4 तासाला एक जण ‘शुद्ध पाण्याअभावी’ होणाऱ्या डायरिया सारख्या रोगाने मरतोय त्या राज्या देशात. म्हणजे एका बाजूला लोक पाण्यावाचून तडपून मरतायत अन दुसऱ्या बाजूला एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय.

बरं हे पाणी येतं कुठून..तर आपल्या आसपासच्या dams मधून. पुण्याच्या आसपास 7 dams आहेत, पुण्याला दरवर्षी साधारण 13 TMC पाणी लागतं, अन यावर्षी उपलब्ध पाणी आहे 17 TMC,  उरलेलं 4 TMC पाणी शेतीला. 

यावर्षी मात्र पाऊस कमी झाल्याने अन पुण्याची लोकसंख्या सतत वाढत असल्याने शेवटी राज्य सरकारने आदेश दिलेत की 17 TMC पाणी हे पुण्याला देण्यात यावं  म्हणजे शेतीला उन्हाळी आवर्तनासाठी पाणी जवळ-जवळ नाहीच!!. म्हणजे आपण जे वाया घालवतोय ते या शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे. “उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय”… हा क्रूर विरोधाभास आहे!

पण हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या “दोन” शब्दांनी.. मोजून दोन… 

इथून पुढं कधीही वेटर समोर तुमच्या ग्लास मधे पाणी ओतत असेल तर त्याला फक्त एवढंच म्हणा … अर्धा ग्लास!! 

याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल, हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!”

फार छोटी गोष्टय,  फक्त दोन शब्द उच्चारायचेत पण तुमचे दोन शब्द तुमचेच 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतात…

लक्षात ठेवा ज्या प्रगत मानवजातीने, सेकंदाच्या दहाव्या भागाच्या प्रिसीजनने परग्रहावर माणूस यशस्वी उतरवलाय,, त्याच मानवजातीला अजून पर्यंत ‘पाणी’ मात्र निर्माण करता आलेलं नाहीये..

मग आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी की… तेही आपल्याच माणसांसाठी…!! 

सो इथून पुढं हॉटेल मध्ये असलो की …. “अर्धाच ग्लास पाणी..!!!”

— ( हे फक्त पुण्यातच घडतं असं समजुन दुर्लक्ष करु नका…. पोस्ट गरजेची म्हणून पाठवली, साभार : डी डी कट्टा ग्रुप)

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हयातीचा दाखला…” – लेखक : श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “हयातीचा दाखला…” – लेखक : श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

काल सकाळी अगदी बँक उघडल्याउघडल्याच बँकेत जाऊन, नियमांनुसार आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून, मी जिवंत असल्याचं सिद्ध करून आलो.वरचं आमंत्रण मध्येच आलं नाही तर पुढचं वर्षभर पेन्शन सुरळीतपणे मिळावं म्हणून. मनात आलं, जवळजवळ चाळीस वर्षं

नोकरी केली; पगार घेतला आता पुढची चाळीस वर्षं पेन्शन खात जगायला मिळालं तर…..!

एक महत्त्वाचं काम हातावेगळं केल्याच्या समाधानात बँकेतून बाहेर पडलो आणि बाजूच्याच टपरीवरच्या ताज्याताज्या भज्यांचा घमघमाट नाकाशी दरवळला. जीभ चाळवली, पावलं थबकली. गरमागरम कांदा भजी आणि मग कडक चहा. सुख म्हणजे आणखी काय असतं, मनात आलं. ऑर्डर देणार तोच… तोच कालपरवाच व्हॉट्सअपवर वाचलेला कुणा डाएटीशीयनचा लेख आठवला…. वयानुसार बीपी-कोलेस्टेरॉल, शुगर किती असावं, कुठल्या वयात काय खावं-काय खाऊ नये, काय करावं-काय करू नये वगैरे वगैरे. हे सगळं पाळणारा शतायुषी होऊ शकतो, असंही त्यात लिहिलेलं आठवलं. शंभर वर्षं पेन्शन खायचं असेल तर आत्ता भजी खाऊन कसं चालेल, मनात आलं. एव्हढा तरी संयम पाळायलाच हवा, स्वतःलाच बजावलं आणि मागं फिरलो.

येताना वाटेवरच्या भाजीमार्केटमधनं मोड आलेली कडधान्यं आणि फळं घेतली. त्या डाएटीशीयनच्या म्हणण्यानुसार माझा आहार आता असाच असायला हवा होता. पुढची ३७ वर्षं आता हेच खायचं. निरामय जीवनाचा मार्ग आता आपल्याला सापडलाय, या आनंदात घराकडे येणारा मार्ग कधी संपला कळलंही नाही.

“पटापट आंघोळ, देवपूजा आटपा हं, आज तुमच्या आवडीची झुणकाभाकर, लसणाची चटणी…” बायकोचं वाक्य पुरं व्हायच्या आतच तिच्या हातात कडधान्य, फळं देत म्हटलं, “सखे, करूया फलाहार, नको झुणकाभाकर अन् जगूया आपण वर्षे शंभर.” काही बोलली नाही ती त्यावर, अवाक् का काय म्हणतात, तशी झाली असणार. तिनं झुणकाभाकरच खाल्ली. वर “नाही जगायचे मज फुकाचे वर्षे शंभर, चवदार चविष्ट खाऊनी मी जगणार मस्त कलंदर” म्हणाली. जेवल्यावर तिखटमीठ लावलेली पेरूची फोड खातखात, “मला नाही अळणी खायला आणि जगायला आवडत,” असंही म्हणाली.

“मी नाही येणार,” मी त्यांना म्हणजे कट्टयावरच्या माझ्या मित्रांना म्हटलं. वीकेंडला कुठल्याश्या रिसॉर्टवर जायचं ठरवत होते सारेजण.

खायचं -प्यायचं, गायचं- नाचायचं, हास्यविनोद – धमालमस्ती. पण मी “नाही” म्हटलं. शंभर वर्षं जगायचं तर असला बेबंदपणा करुन कसं चालेल? “तू आलंच पाहिजे” असा माझा फारच पिच्छा पुरवला त्यांनी, तेव्हा मग मी त्यांना माझा शंभर वर्षं जगण्याचा प्लॅन सांगितला, तर ते हसून कट्टयावरच गडबडा लोळले, म्हणाले, “च्युतिया आहेस साल्या. यातलं काही करणार नाहीस, खाणार-पिणार नाहीस तर मग शंभर वर्षं जगून करणार काय तू?” बँकेत लागण्यापूर्वीचे दिवस आठवले. नोकरीच्या शोधात असतांना दिलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं की मी असाच खजील होऊन समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्यांकडे बघत बसत असे.

“ऐकताय का, शेजारच्या जोशीवहिनी विचारत होत्या, चारधाम यात्रेला येताय का म्हणून. ते दोघं जातायत. एकमेकांना कंपनी होईल, ट्रिपही होईल आणि वर तीर्थयात्रेचं पुण्यही पदरी पडेल म्हणत होत्या. जाऊया ना?” रात्री बेडवर पडतापडता बायको विचारत होती. “छे, अजिबात नको. डोंगरदऱ्यांतून घोड्यावर बसून देवदर्शनाला जायचं म्हणजे केवढं रिस्की. च्यायला! घोड्याचा पाय घसरला तर वर जाऊन समोरासमोरच देवाचं दर्शन व्हायचं. त्यापेक्षा शंभर वर्षं पेन्शन घेत, देव्हाऱ्यातल्या देवाचं रोज दर्शन घेतलेलं बरं.” मी तिचा प्रस्ताव धुडकावून लावला. ती पुन्हा उठून बसली, म्हणाली, “शंभर वर्षं जगायचं, हे काय खूळ डोक्यात शिरलंय हो तुमच्या? आहे ते आयुष्य मजेत जगावं की माणसानं. पाडगांवकरांची कविता वाचली आहे ना तुम्ही … ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा!’ तिने अख्खी कविता ऐकवायच्या आत डोक्यावरनं पांघरूण घेऊन झोपल्याचं सोंग घेऊन मोकळा झालो.

“गुड मॉर्निंग मंडळी,” वरच्या मजल्यावरचे पाटीलकाका हातातलं नुकतंच उमललेलं टवटवीत जास्वंदाचं फूल बायकोच्या हातात देत सोफ्यावर विसावले.

बायकोनं दिलेल्या थालीपीठाचा तुकडा मोडत ते मला काही विचारणार, तोच बायको म्हणाली “ते नाही खायचे असलं काही. काल हयातीचा दाखला देऊन आल्यापासून शतायुषी व्हायचं खूळ शिरलंय त्यांच्या डोक्यात.”

“च्यामारी, काय करणार आहेस रे तू शंभर वर्षं जगून? म्हणजे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे आणि त्यासाठी जगायचं असेल इतकं, तर ठीक आहे. अदरवाईज हे नाही खाणार, ते नाही करणार, तिकडे नाही जाणार असं करत घरकोंबड्यासारखं शंभर वर्षं जगण्यात कसली मजा आहे? काही समजत नाही बुवा मला. एकविसाव्या वर्षीच समाधी घेणारे आपले ज्ञानोबा, पन्नासाव्या वर्षीच स्वर्गस्थ झालेले छत्रपती शिवाजी महाराज हे कुठे जगले होते शंभर वर्षं? पण ते काय करून गेले त्यांना मिळालेल्या आयुष्यात, हे वेगळं सांगायला नको. महर्षी कर्वे एकशे चार वर्षं जगले; पण स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी. तसं काही करणार आहेस का तू? वाटत तर नाही तसं – तुला काय आज ओळखतोय का मी? अरे आपण छोटी माणसं. म्हणूनच सांगतोय – माणसानं जिंदादिल रहावं नेहमी. खावं-प्यावं, हिंडावं-फिरावं, छंद जोपासावेत आणि हो, अडलेल्या नडलेल्यांना जमेल-झेपेल इतपत मदतही करावी. हा खराखुरा हयातीचा – तुझ्यातला माणूस जिवंत असल्याचा दाखला. काल बँकेत जाऊन करून आलास ती तू हयात असल्याची कागदोपत्री नोंद.”

दरवाज्यापर्यंत पोचलेले पाटीलकाका परत वळले आणि राजेश खन्नाच्या स्टायलीत म्हणाले … “बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए,लंबी नहीं….”

मनापासून हसलो. काकांनी दिलेलं जास्वंदाचं फूल आता जरा जास्तच टवटवीत दिसत होतं.

थालीपीठ खातखात “जिंदगी एक सफर है सुहाना” गुणगुणलो.

लेखक :श्री.मिलिंद पाध्ये

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “सांजधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “सांजधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सूर्य अस्ताला चालला आहे. सर्वत्र केशरी संधीप्रकाश पसरला आहे. तेच प्रतिबिंब जलात असून जलकाठावर असलेल्या एका झाडावरून एक पक्षी ओरडत आहे. असे एक साधारण संध्याकाळचे चित्र.

त्यावरील शिर्षक सांजधून हे तो पक्षी ओरडत नसून एक धून गात आहे असे सुचवते.

मन सांजेप्रमाणे विभोर होते आणि मनात संध्या समयीची हुरहूर जाणवते.

साधारण संध्याकाळ झाली की देवघरात दिवा लावतात. तसाच सृष्टीच्या घरातील क्षितिजावरील देवघरात हा संध्यादीप कोणी लावला आहे असा विचार मनात येतो.

संध्याकाळ जाऊन आता अंधार पडणार आहे ती कातरता नकळत मनाला जाणवते. तशीच ती ढगांच्या कडेवरही जाणवते.

मग उगचच तो पक्षी चकोर पक्षी आहे आणि आता आकाशात चंद्र उगवेल म्हणून ते चांदणे प्यायला सज्ज होऊन चोच उघडून बसला आहे असे वाटते.

सूर्यबिंब हे अस्ताला गेले तरी चराचर जागृत राहणार आहे हे झाडाच्या आणि पक्षाच्या छबीतून समजते.

एका दिवसाची कहाणी संपत असली तरी मनात उद्याची आशा देणारी छान स्वप्नांची रजनी प्रदान करणारी अशी संध्याकाळ वाटते.

भगवेपणामुळे सन्यस्त योग्या प्रमाणे वाटणारा सूर्य मनाला धीरगंभीरताही प्रदान करतो.

असे संध्याकाळचे अनेक अर्थ सांगणारे हे चित्र आहे.

पण सरळ सरळ असे वाटणारे चित्र जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले तर हे एक सांकेतिक अर्थ सांगणारे चित्र वाटते. सगळ्यांनाच हे माहित आहे की शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली होती. मग त्या सोन्याच्या स्पर्शाने सगळी भूमी सोन्याची झाल्यासारखी वाटून त्या भूमीवर येणाऱ्या झाडांना सोन्याची फळे येतील ही ग्वाही तो पक्षीही सकलांना देत आहे.

म्हणूनच की काय पण शिवाजी महाराजांनी फडकवलेली ही भगवी पताका रोज आपण विसरलो तरी निसर्ग विसरत नाही आणि नेमाने ही पताका फडकवतो असे वाटते.

गुढार्थ बघितला तर कोणी सन्यस्त योगी सूर्य रूपाने येणार तो जाणार असे शिकवून आता जो क्षण लाभला आहे तो आनंदाने जगून घ्या सन्मार्गी लावा असा संदेश देत आहे.

पुस्तकाच्या अंतरंगात डोकावले की कळते हे श्री मोहनलाल वर्मा यांच्या हिंदी भाव कथानचा मराठी अनुवाद आहे. मग असे वाटले हे त्या भाव कथानंमधील वेगवेगळे भावरंग दाखवून सुरेखशी संध्याकाळ स्वतः एक सांजधून गात आहे.

खरच वेगवेगळ्या कथामधील वेगवेगळे भाव पण एकाच मनात दाटणारे असे एकाच चित्रात दाखवणारे हे चित्र वरवर पाहाता अगदी साधे वाटते पण खूप सारे भाव जगवणारे आहे.

इतके छान मुखपृष्ठ चित्र देणाऱ्या श्री अन्वर पट्टेकरी, प्रकाशक पराग लोणकर :-प्रियांजली प्रकाशन आणि लेखिका सौ उज्ज्वला केळकर यांना खूप खूप धन्यवाद

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares