मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने मराठीचे अवलोकन करताना त्यातील बाराखडी व मुळाक्षरांच्या वेगवेगळ्या दर्शनानी भावली आणि मराठी असल्याचा आनंद झाला. पहा तुम्हालाहि मिळ्तोय का? आणि खरच आवड्ल्यास कॉमेन्ट्स द्यायला,शेअर करायला,लाईक करायला विसरू नका.

ऐका मंडळी सुजाण। मराठीचे हे पुराण।वर्षा तुम्हा समजावूनी सांगतसे॥

मराठी भाषेसी ना तोड। तया नाही कशाची जोड।अमृताहूनी गोड, देववाणी॥

३६ मुळाक्षरांची मुळे। बाराखडीची बारा पाने।हलवूनी कल्पवृक्ष साकार होई॥

आता सारे आपण। बाराखडीचे करू अवलोकन।ठेवूनी ध्यान,कान देऊनी ऐका॥

अ असे निराकार। आत्मा होई मिळता आकार। इजा बिजेने भेटा ईश्वरासी॥

उल्हास मनी दाटे। ऊठोनी मन पळू लागे। एकदा तरी धागे ऐसे जुळावे॥

ओज येता भुईवर। औटघटकाभर। अंबराकडे पाहून अः म्हणा॥ 

मुळाक्षरांकडे आता। नजर आपली करू चला।किती संत अन् देवांनी ही भारली असे॥

 

‘क’ असे विठ्ठल। ठेऊनी ऊभा कटेवरी कर। त्यात  तयाचे रूप दिसतसे॥

‘ख’ असे एकमेव। एकत्र येती दोन जीव। जीव-शीव दर्शन घडतसे॥

‘ग’ वाटे गजानन। पहा जरा देऊन ध्यान। सोंड वळवून बसला असे॥

‘घ’ म्हणजे रिद्धि-सिद्धी। तयार  गणेश सेवेसी। चवरी घेऊन, वारा घालती॥

‘ङ’ म्हणजे लक्ष्मी माता। सजली पहा दागिण्यांनी आता। हिरा तिच्या नथणीचा चमकतो॥

‘च’ कडे जाता नजर।साई मज दिसे सत्वर।हात पसरूनी बसला असे॥

‘छ’ म्हणजे छत्रपती।घोड्यावर बसले तलवार हाती।अन्याय मुळीना खपतसे॥

‘ज’ वाटती गाडगेबाबा।गाडगे हाती घेऊनी ऊभा। स्वच्छता सकला मागतसे॥

‘झ’ वाटतो अर्जून। उभा धनूष्य ताणून । मनोवेध अचूक साधतसे॥

‘ञ’ म्हणजे समर्थ रामदास। दंडूका तयांचा हा खास। मनोभावे त्यास करू वंदन॥

‘ट’ म्हणजे कालीमाता।असूरांचा करी वध आता। चरणावरी माथ टेकवू चला॥

‘ठ’ म्हणजे वाटे जनी। तिचे ते जाते असे बाई।पिठ त्यातून दळू चला॥

‘ड’ म्हणजे असे नारद। उभा दारी शेंडी वर।नारायण जप करीतसे॥

‘ढ’ म्हणजे गोराकुंभार।चाक त्याचे अन् माती त्यावर।आकार मडक्यास देत असे॥

‘ण’ म्हणजे बालाजी रूप। गंध त्याचे सुखवी खूप। श्रीमंतीही वाढवू चला॥

‘त’ म्हणजे देवराज ईंद्र। ऐरावताची ती सरळ सोंड। ऐश्वर्य पाहू डोळाभरी॥

‘थ’ म्हणजे हनूमान।बसला चरणी गदा घेऊन। स्वामीभक्तासही नमू आपण॥

‘द’ असे कोणी योगी। तपश्चर्या करी एका पायावरी। सिद्धी तयास मिळोनी जावो॥

‘ध’ असे हो एकवचनी राम।सज्ज बाण भाता घेऊन। पुन्हा रामयूग मागू चला॥

‘न’ म्हणजे बटू कोणी। आला याचक होऊनी।दान तयास देऊ चला॥

‘प’ म्हणजे सावतामाळी मळ्यातील मचाणावर बसोनी तो राखी मळा॥

‘फ’ म्ह्णजे धन्वंतरी । एका हाती कलश घेऊनी। आरोग्य दान करीतसे॥

‘ब’ म्हणजे तुकाराम। उभे गळ्यात एकतारी घालून । विठ्ठल नाम सदा मुखी॥

‘भ’ म्हणजे बलराज भीम। खांद्यावरी ती गदा घेऊन।शक्तीने तो विजयी होई॥

‘म’ म्हणजे कार्तीकेय। मयूरावर बसून। विश्व प्रदक्षिणेस निघाला॥

‘य’ म्हणजे मीरा भोळी।एकतारी करी घेऊनी।एक पाय्वर घेऊनी बसली असे॥

‘र’ म्हणजे पार्वती देवी।सड्पातळ अन गौर वर्णी।तिजलाही वंदन आता माझे॥

‘ल’ असे हो विष्णूदेव।कमल पुष्पावरी स्वार।तिन्ही लोकांचे नियंत्रण करी॥

‘व’ असेहो सूर्य देव। ऊगवे तो क्षितीजावर।चराचरा चैतन्य देई॥

‘श’ असती विवेकानंद।ऊभे फेटा बांधून।हाताच्या घडीसह चिंतन करती॥

‘ष’ असे सरस्वती देवी।मांडीवरती वीणा ठेऊनी।गान मराठीचे गात असे॥

‘स’ वाटे राधाकृष्ण। ऊभा पाय दुमडून। खांद्यावरी राधा विसावतसे॥

‘ह’ म्हणजे पवनदेव।जोराने ती ऊठे वावटळ।परी सकल विश्व व्यापलेसे॥

‘ळ’ म्हणजे ज्ञानेश्वर।बसले पद्मासन घालून।पसायदान मागती हे॥

‘क्ष’ म्हणजे शंकरदेव।उभे ते डमरू घेऊन।एका हाती त्रिशूळ असे॥

‘ज्ञ’ म्हनजे महिषासूर मर्दिनी।पायी महिषासूर, हाती त्रिशूळ घेऊनी।सकल जनास शांती देई॥

ऐसी सर्व मुळाक्षरे वसती पहा मराठी गृही।बाराखडी सवे त्यास सजवावे॥

करावा त्यांचा आदर।शब्दांस द्यावा आधार।शब्दांगण फुलोनी जाई॥

अक्षरांपासून शब्द बनती।शब्द काव्य अथवा लेखन साकारती।तयातून ग्रंथभांडार निर्मीतसे॥

म्हाणोनी घ्यावी शपथ।वर्णमालेसी कंठात घालेन।तिजला सांभाळेन जन्मभरी॥

उतू नये मातू नये। घेतला वसा टाकू नये।मराठीस करावे आपलीशी॥

प्रसार हिचा करू चला।घट्ट वीण गुंफू चला।मराठीस वंदू मनोभावे॥

बोला पुंडलीक वरदा हारी विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम।

पंढरीनाथ महाराज की जय।मराठी माऊलीचा जय॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

गेल्या दोन दिवसांपासून आमचं कुटुंब एका विचित्र परिस्थितीमधून जात आहे. हे फार गंभीर आहे आणि तुमच्या सोबत हे घडू नये म्हणून हे इथं मांडतोय… २९ तारखेला दुपारी ३.२० वाजता माझ्या बायकोच्या व्हाट्सअपवर एक मेसेज आला ! 

मी ड्युटीवर होतो म्हणून डिटेल्स काही न सांगता ती एवढंच म्हणाली की, ‘ लवकर घरी या फार महत्त्वाचं बोलायचं आहे.’ चार वाजता घरी आलो तर तिने रडायला सुरुवात केली. आधी तिला समजावून सांगितले, शांत केलं आणि काय झालं आहे याबद्दल स्पष्ट विचारलं तेव्हा जे समजलं ते मलाही शॉकिंग होतं. कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून तिला पैशाच्या मागणीसाठी मेसेज आला होता,  ज्यामध्ये —  

‘तुमचा आठशे रुपयांचा EMI बाकी आहे आणि तो भरा अन्यथा तुमचा फोटो व्हायरल करु’ अशी धमकी होती. 

आधी बायकोला पैसे मागितले तेव्हा त्यात काही वाटलं नाही पण समोरच्या व्यक्तीने एक मॉर्फ केलेला फोटो पाठवला. तेव्हा मात्र तिने एका सेकंदात तो फोटो डिलीट केला आणि तो नंबर ब्लॉक करून डिलीट केला.

पॅनिक न होता हे प्रकरण हाताळणं आवश्यक होतं, तिला धीर देणं त्याक्षणी सर्वात महत्वाची गोष्ट होती. समाधानाची गोष्ट हीच होती की, घाबरून जाऊन बायकोने समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवले नव्हते!

आम्ही सायबर क्राईम ऑफिसला जाऊन कंप्लेंट केली. तसेच एक कंप्लेंट जवळच्या पोलिस स्टेशनलाही केली. तसं पाहिलं तर पोलिसांसोबत संपर्क रोजचाच पण आजचं कारण वेगळं होतं. त्यांनी फार शांतपणे सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या आणि समजावून सांगितल्या. काहीही झालं तरी पॅनिक व्हायचं नाही आणि कोणालाही पैसे पाठवायचे नाहीत हे सांगितले… अर्थात आम्ही तेवढे स्ट्रॉंग होतोच! 

काल दुपारी आणखी एका नंबरवरून साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. तसेच ‘तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील प्रत्येकाला फोन/मेसेज करून पैसे मागू’ अशी धमकी दिली. तो नंबर आणि डिटेल्सही पोलिसांना पाठवले. आणखी आठ दहा दिवस हे होतच राहणार आहे. बायकोने याबद्दल व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलं आणि संपर्कातील जवळपास सर्वांना स्वतः सांगितलं जेणेकरून त्यांनाही याबाबत कळावं, त्यांना काही अडचण येऊ नये. 

तिने कोणतंही लोन ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेलं नव्हतं. एक गोष्ट मात्र नक्की की, मोबाईल वापरतेवेळी तिच्याकडून कुठेतरी चूक झाली होती, एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक झालेलं असणार आहे.

आम्हाला हेही माहीत नाही की, समोरील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री! बिहार, झारखंड या भागातील लोक असावेत. पोलिसांनी सांगितलं की दिवसाला किमान चार ते पाच केस आपल्याकडं अशा दाखल होत आहेत. सध्या याचं खूप प्रमाण वाढत आहे.

या प्रकरातून एक गोष्ट तर समजली आहे की, ते लोक माईंड गेम खेळत असतात. आपलं घाबरून जाणं हे त्यांचं भांडवल असतं. आपला मेंदू या गोष्टींसाठी तयार नसतो, बदनामीची भीती असते. हे लोक याच गोष्टींचा फायदा घेतात. जे लोक कोणाला याबाबत बोलत नाहीत, गोष्ट लपवून ठेवतात ते आणखी अडकत जातात. एका पोलिस मित्राच्या म्हणण्यानुसार काही प्रकरणं आत्महत्येपर्यंत सुद्धा पोहोचली आहेत. 

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलेलं बघून माझ्याच ओळखीच्या दोघांनी त्यांच्याबद्दल घडलेले असेच किस्से सांगितले. त्यापैकी एका मुलीने एका मेसेज मुळे घाबरून जाऊन पंचवीस हजार रुपये समोरच्याला दिले होते.

हे सर्व इथं का लिहितोय तर त्याला दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आमचा संदर्भ देऊन कोणी पैसे मागत असेल, धमकी देत असेल तर कोणी लक्ष देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणासोबत असं घडू नये आणि समजा घडलंच तर त्या जाळ्यात अडकू नये!

‘जमतारा’ ही वेब सीरीज ज्यांनी पाहिली असेल त्यांना माहीत असेलच हे सर्व. सीरीजच्या नावातच त्यांनी लिहिलं आहे… सबका नंबर आयेगा ! आपल्या मोबाईलमधली माहिती सुरक्षित नाही. कोणतंही ऍप्लिकेशन घेताना, काहीच न वाचता आपण ‘I Agree’ करतो. कोणत्याही लिंक नकळत उघडतो आणि हे चक्र सुरू होतं. 

आज आमचा नंबर आहे उद्या कोणाचाही असू शकतो… so be careful!

लेखक : डॉ.प्रकाश कोयाडे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जोडणारा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “जोडणारा” – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एका गावात एक शेतकरी राहत होता.रोज सकाळी तो झऱ्यातून स्वच्छ पाणी आणण्यासाठी दोन मोठ्या घागरी घेऊन जात असे. तो त्या  खांबाला बांधून खांद्याच्या दोन्ही बाजूला लटकवत असे .त्यापैकी एकीला कुठेतरी तडा गेला होता. ती फुटलेली होती आणि दुसरी धड,परिपूर्ण होती .अशाप्रकारे तो दररोज घरी पोहोचेपर्यंत शेतकऱ्याकडे फक्त दीड घागरी पाणी उरत असे .

उजव्या घागरीला अभिमान होता की ती सर्व पाणी घरी आणते आणि तिच्यात कोणतीही कमतरता नाही. दुसरीकडे,फुटलेली घागर घरापर्यंत फक्त अर्धेच पाणी पोहोचवू शकत होती  आणि शेतकऱ्यांची मेहनत व्यर्थ, वाया जात होती.या सगळ्याचा विचार करून ती फुटलेली घागर खूप व्यथित व्हायची. एके दिवशी तिला ते सहन झाले नाही.ती शेतकऱ्याला म्हणाली, “मला माझी लाज वाटते. मला तुमची माफी मागायची आहे.”

शेतकऱ्याने विचारले,”का? तुला कशाची लाज वाटते?”

तुटलेली घागर म्हणाली , “कदाचित तुम्हाला माहीत नसेल; पण मी एका ठिकाणी फुटले आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून मी जेवढे पाणी घरी आणायला हवे होते,त्यातील निम्मेच पाणी आणू शकले आहे.ही माझ्यातली मोठी कमतरता आहे आणि त्यामुळे तुमची मेहनत वाया गेली आहे.”

घागरीबद्दल ऐकून शेतकरी थोडासा दुःखी झाला आणि म्हणाला,”काही हरकत नाही. आज परत येताना तू वाटेत पडलेली सुंदर फुले पाहावीस , अशी माझी इच्छाआहे.” तुटलेल्या घागरीने तसे केले.तिला वाटेत सुंदर फुले दिसली.असे केल्याने तिचे दुःख काही प्रमाणात कमी झाले; पण घरी पोहोचेपर्यंत अर्धे पाणी सांडले होते.निराश होऊन ती शेतकऱ्याची माफी मागू लागली .

शेतकरी म्हणाला,”कदाचित तुझ्या लक्षात आलं  नाही.वाटेत सगळी फुलं होती.ती फक्त तुझ्या बाजूने होती . घागरीच्या उजव्या बाजूला एकही फूल नव्हते. कारण तुझ्यातला दोष मला नेहमीच माहीत होता आणि मी त्याचा फायदा घेतला.तुझ्या दिशेच्या वाटेवर मी रंगीबेरंगी फुलांच्या बिया पेरल्या होत्या.

तू त्यांना दररोज थोडे थोडे पाणी पाजलेस आणि संपूर्ण मार्ग इतका सुंदर बनवलास .आज तुझ्यामुळेच मी देवाला ही फुले अर्पण करू शकलो आणि माझे घर सुंदर करू शकलो.

जरा विचार कर, ‘तू जशी आहेस तशी नसतीस,तर मी हे सर्व करू शकलो असतो का?’

आपल्या प्रत्येकामध्ये काही उणिवा असतात,पण या उणिवा आपल्याला अद्वितीय बनवतात.म्हणजे तुम्ही जसे आहात तसेच राहा.त्या शेतकऱ्याप्रमाणे आपणही सर्वांना तो जसा आहे, तसा स्वीकारला पाहिजे.त्याच्या चांगुलपणाकडे लक्ष दिले पाहिजे.जेव्हा आपण हे करू तेव्हा तुटलेली घागरही चांगल्या घागरीपेक्षा अधिक मौल्यवान होईल.

लेखक:अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆

श्री आशिष बिवलकर   

? – एक धागा अंतरीचा गाभा– ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

गुंफल्या या मूक कळ्या 

गजऱ्याची झाल्या शोभा |

शल्य ना मनी कशाचे,

एक धागा अंतरीचा गाभा |

एक एक कळी गुंफली 

एकमेकींचे वाढवले सौंदर्य |

क्षणभंगुर या जीवनात,

जोपासले आनंदाचे औदार्य |

रंग रूप गंध लाभे,

एक दिवसाचा साज |

सुकता कुणी न पाहे,

आनंदे जगून घेती आज |

गजरा म्हणून एक ओळख,

कोणाचे कुंतल सजवती |

हातात कुणाच्या बांधून ,

मैफलीत गंध दरवळती |

प्रारब्ध होई धागा,

गुंफतो आपल्या कर्माच्या माळा |

क्षण क्षण सत्कारणी लावावा,

सार्थ करावा जीवनाचा सोहळा |

आनंद या जीवनाचा,

सुगंधापरी दरवळावा |

सार लाभल्या आयुष्याचा,

कळ्यांना पाहून ओळखावा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

श्री ए के मराठे

? – एक धागा अंतरीचा गाभा… – ? ☆ श्री ए के मराठे ☆

( २ )

कळ्या निमूट ओवून घेतात

गजऱ्यामधे स्वतःला

दोष देत बसत नाहीत

सुईला वा सुताला ll

कारण त्यांना माहीत असतं

हेच त्यांचं काम आहे

क्षणभंगुर मिळालेलं आयुष्य

जगण्यामधेच राम आहे ll

रूप,रंग एका दिवसाचा

गंधही उद्या राहणार नाही

फुल होऊन कोमेजल्यावर

ढुंकूनही कुणी पाहणार नाही ll

म्हणून म्हणतो जसं,जेवढं

मिळालंय जीवन जगून घ्यावं

विषालाही अमृत समजून

हसत हसत चाखून प्यावं ll

कवी : श्री ए के मराठे

कुर्धे, पावस, रत्नागिरी

मो. 9405751698

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 178 – गीत – मैं तुमसे नाराज नहीं…. ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपका एक अप्रतिम गीत – मैं तुमसे नाराज नहीं।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 178 – गीत  – मैं तुमसे नाराज नहीं…  ✍

सच कहता हूँ बोलूँगा,

मैं तुमसे नाराज नहीं।

खामोशी का शाल ओढ़कर, तुम बैठी हो कोने में

बाँच रही हो सुधि की पाती, कितना पाया खोने में।

बिखरे बिखरे केश तुम्हारे मुख पर ऐसे झूम रहे

जैसे चंदा के दरवाजे, आवारा घन घूम रहे।

और तुम्हारी सौंधी अँगुली कुछ लिखती है धूल में।

शब्द होंठ में ऐसे बन्दी जैसे भँवरा फूल में।

बिछल गया माथे से आँचल किस दुनिया में खोई हो

लगता है तुम आज रातभर चुपके चुपके रोई हो।

रोना तो है सिर्फ शिकायत, इसकी उम्रदराज नहीं

टूट टूट कर जो न बजा हो, ऐसा कोई साज नहीं।

ओ पगली, नाराज कहीं करता है कोई अपनों को

दुनिया कितना चाहा करती सुबह सुबह के सपनों को

 *

जो शब्दों में प्रकट हुआ वह पाप भले हो प्यार नहीं

मेरा प्यार पाप बन जाये, यह मुझको स्वीकार नहीं।

शबनम की शहजादी का भी प्यार नहीं सरनाम हुआ

जिस बादल ने आँसू गाये, सिर्फ वही घनश्याम हुआ।

तुझे चाहता हूँ मैं कितना, पूछ न अब मेरे मन से

कोई कितनी प्रीति करेगा, खुद ही अपने जीवन से।

मेरे मन के शीश महल सा वह यमुना का ताज नहीं

शाहजहाँ से मैं ज्यादा हूँ, तू बढ़कर मुमताज कहीं।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 178 – “सिकुड़ते सब्यसाचियों के…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत  सिकुड़ते सब्यसाचियों के...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 178 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “सिकुड़ते सब्यसाचियों के...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

ऐसे कोहरे में ठिठुरन से

सूरज भी हारा

दिन के चढ़ते चढ़ते कैसे

लुढ़क गया पारा

 

जमें दिखे गाण्डीव

सिकुड़ते सब्यसाचियों के

धुंध लपेटे शाल, उलहने

सहें चाचियों के

 

चौराहे जलते अलाव भी

लगते बुझे बुझे

और घरों की खपरैलें

तक लगीं सर्वहारा

 

हाथ सेंकने जुटीं

गाँव की वंकिम प्रतिभायें

जो विमर्श में जुटीं

लिये गम्भीर समस्यायें

 

वृद्धायें लेकर बरोसियाँ

दरवाजे बैठीं

शांति पाठ के बाद पढ़

रहीं ज्यों कि कनकधारा

 

लोग रजाई कम्बल

चेहरे तक लपेट निकले

लगें फूस से ढके फूल के

हों सुन्दर गमले

 

आसमान से नीचे तक

है सुरमई अँधियारा

धुँधला सूरज दिखता

नभ में लगे एक तारा

©  श्री राघवेन्द्र तिवारी

06-02-2024 

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – उनींदा ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – उनींदा ??

आदमी ने स्वप्न देखा,

स्वप्न में

अपना ऊँचा कद देखा,

सपना जारी था;

सपने में

ऊँचे कद को

मध्यम होते देखा,

सपना अब भी

जारी था;

मध्यम कद को

बौना होते देखा,

नींद से हड़बड़ा कर

उठा आदमी,

दुनिया पर अपनी भड़ास

उतारने लगा आदमी,

इधर जच्चा वॉर्ड में

एक मासूम की

किलकारी गूँजी;

उधर श्मशान जाती

यात्रा में

‘राम नाम सत्य है’

का सामूहिक आलाप उठा,

जन्म और मृत्यु

के बीच की

सपनीली दुनिया में

खोया है आदमी,

अपनी ही आँखों में

पलते-बढ़ते-घटते

कद के सच को

काश समझ पाता

उनींदा आदमी!

© संजय भारद्वाज  

(प्रातः 10: 21 बजे, दि.16.12.2015)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ – Nostalgia… – ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)

We present his awesome poem ~ Nostalgia… ~We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.  

☆ Nostalgia ?

The feeling of losing him

is still there, —fervently alive

Whatever happened,

shouldn’t  have happened,

this glumness is still there..!

 

Neither that roof exists there

nor is there that huge tree,

I probed into the reason for

falling of that snuggly tree…

 

Understandably,

the nostalgic memories

got better of him and

it uprooted itself…

 

When have the

results of war

ever been decided

in the battle field..?

 

Till the time,

pining memories

are simmeringly alive,

It wages on, ceaselessly…

 

Now, the only struggle left

is that of forgetting him

to cease the everlasting war..!

 

~ Pravin Raghuvanshi

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Blog Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कहाँ गए वे लोग # १ ☆ कहाँ गए वे लोग – “पंडित भवानी प्रसाद तिवारी” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है। ई -अभिव्यक्ति में आज से प्रत्येक सोमवार आप आत्मसात कर सकेंगे एक नया साप्ताहिक स्तम्भ कहाँ गए वे लोग। इस कड़ी में आज प्रस्तुत है  महाकोशल क्षेत्र के एक लोकप्रिय सौम्य, गरिमामय व्यक्तित्व के धनी, प्रखर कवि, लेखक, पत्रकार, संपादक व  जनेता – “पंडित भवानी प्रसाद तिवारी”)

☆ कहाँ गए वे लोग # १ ☆

पंडित भवानी प्रसाद तिवारी☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

(सौम्य, गरिमामय व्यक्तित्व के धनी, प्रखर कवि लेखक व संपादक)

कवि, पत्रकार और राजनेता के रूप में समान लोकप्रियता के धनी पंडित भवानी प्रसाद तिवारी जनसभाओं में प्रतिष्ठित राजनेताओं और साहित्यकारों के बीच में से श्रोताओं की सहज श्रद्धा और लोकप्रियता के एक मात्र पात्र बनने की सामर्थ्य रखते थे। सात बार जबलपुर नगर निगम के महापौर चुने गए थे, लम्बे समय राज्यसभा सांसद रहे। वे ‘प्रहरी’ पत्रिका के ऐसे सफल सम्पादक थे जिन्होंने देश को समर्थ और लोकप्रिय हरिशंकर परसाई जैसा व्यंग्यकार दिया, परसाई जी की पहली रचना और पहला कालम ‘नर्मदा के तट से’ प्रहरी से ही प्रारंभ हुआ। कवि के रूप में आदरणीय तिवारी जी जन जन के बीच लोकप्रिय थे। राजनीति और साहित्य के पारस्परिक संबंधों के बारे में उनका कहना था…

“जब राजनीति पथभ्रष्ट होती है तब साहित्य विद्रोही हो जाता है”

1942 के जन आंदोलन के समय पंडित भवानी प्रसाद तिवारी जी जबलपुर नगर कांग्रेस के अध्यक्ष थे, और पूरे देश में यह अकेला शहर था जहां सेना के जवान अपनी बैरकों से बाहर आ गए थे,यह तिवारी जी के समर्थ नेतृत्व का ही परिणाम था कि 1942 में जबलपुर का अंग्रेजों भारत छोड़ो आन्दोलन समूचे महाकौशल में जन जाग्रति का वाहक बनकर फैला। सन् 1942 में गिरफ्तार हो उन्हें जेल यात्रा करनी पड़ी,जेल में भी उनका समय व्यर्थ नहीं गया  यहीं उन्होंने रवीन्द्र नाथ टैगोर की ‘गीतांजलि’ का अध्ययन मनन किया और गीतांजलि का अनु -गायन जैसा उनके द्वारा संभव हुआ।आज भी हिन्दी में प्रकाशित कोई भी अनुवाद उसके समक्ष बेसुरा प्रतीत होता है, गीतांजलि अनु गायन के प्रकाशित होते ही उनकी यश-कीर्ति नगर और राज्य की सीमा लांघकर सम्पूर्ण हिन्दी साहित्य में फैली…

‘दिखते हैं प्रभु कहीं,

यहाँ नहीं यहाँ नहीं,

फिर कहाँ? अरे वहाँ,

जहां कि वह किसान दीन,

वसनहीन तन मलीन,

जोतता कड़ी जमीन,

प्रभु वहीं कि जहां पर

वह मजूर करता है

चोटों से पत्थर को चूर’

प्राण पूजा’ और ‘प्राण धारा’ उनके मूल कविता संग्रह प्रकाशित हुए थे,’तुम कहां चले गए’ शोक कविताओं का लघु संग्रह है, ‘जब यादें उभर आतीं हैं’ उनके संस्मरणात्मक वैयक्तिक निबंधों का संग्रह है, ‘गांधी जी की कहानी’ गांधी के महान व्यक्तित्व को सरल भाषा में किशोरोपयोगी बनाने का प्रयास था। कथा वार्ता उनकी कथात्मक एवं समीक्षात्मक रचनाओं का संग्रह है। श्री तिवारी जी की ‘प्रहरी’ पत्रिका में प्रकाशित ‘हाथों के मुख से’ और ‘संजय के पत्र’ , ‘हमारी तुमसे और तुम्हारी हमसे’ जैसे स्तंभों में छपी सेंकड़ों पृष्ठों की सामग्री हिंदी साहित्य के क्षेत्र में रचनात्मक योगदान के रूप में याद रखी जाएगी।

एक पूरी की पूरी साहित्यिक पीढ़ी जिसमें सर्वश्री केशव पाठक, रामानुज लाल श्रीवास्तव, सुभद्रा कुमारी चौहान, नर्मदा प्रसाद खरे, हरिशंकर परसाई, रामेश्वर गुरू, जैसे महान साहित्यकार उनकी प्रहरी पत्रिका में प्रकाशित हुए। राजनेता और पत्रकार से भिन्न उनका साहित्यिक व्यक्तित्व सर्वोपरि था जो उनके इन दोनों रूपों को सहज ही आच्छादित किए रहता था, और मंच से बोलते हुए तिवारी जी के भाषण और भंगिमा में इस व्यक्तित्व का इतना अधिक प्रभाव रहता था कि उनके साहित्यिक श्रोताओं को तिवारी जी की काव्य पंक्तियां याद आने लगतीं थीं। लोग बताते हैं कि होली जैसे जन पर्व के अवसर पर या शरद पूर्णिमा के कवि सम्मेलन में उनकी मधुर संवेदनशील वाणी सहज ही गूंज जाती थी….

‘फूल ने पांवड़े बिछाए हैं,

      कौन ये मेहमान आये हैं ‘

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 293 ⇒ त्याग पत्र उर्फ इस्तीफा… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “त्याग पत्र उर्फ इस्तीफा।)

?अभी अभी # 293 ⇒ त्याग पत्र उर्फ इस्तीफा… ? श्री प्रदीप शर्मा  ?

भोग से विरक्ति को त्याग कहते हैं, और पद से त्याग को त्याग पत्र कहते हैं। जिस तरह निवृत्ति से पहले प्रवृत्ति आवश्यक है, उसी प्रकार त्याग पत्र से पहले किसी पद पर नियुक्ति आवश्यक है। सेवा मुक्त भी वही हो सकता है जो कहीं सेवारत हो। सेवा से रिटायरमेंट और टर्मिनेशन से बीच की स्थिति है यह त्याग पत्र।

सेवा चाहे देश की हो अथवा समाज की, शासकीय हो अथवा गैर सरकारी, जिसे आजकल सुविधा के लिए प्राइवेट जॉब कहते हैं।

जॉब शब्द से काम, धंधा और मजदूरी की गंध आती है, जब कि सेवा शब्द में ही त्याग, सुकून और चारों ओर सुख शांति नजर आती है। शासकीय सेवा, भले ही सरकारी नौकरी कहलाती हो, लेकिन कभी शादी के रिश्ते की शर्तिया गारंटी कहलाती थी। लड़का शासकीय सेवा में है, यह एक तरह का चरित्र प्रमाण पत्र होता था।।

वैसे तो सेवा अपने आप में एक बहुत बड़ा त्याग है, लेकिन कभी कभी परिस्थितिवश इंसान को इस सेवा से भी त्याग पत्र देना पड़ता है। जहां अच्छे भविष्य की संभावना हो, वहां वर्तमान सेवा से निवृत्त होना ही बेहतर होता है। ऐसी परिस्थिति में औपचारिक रूप से त्याग पत्र दिया जाता है और साधारण परिस्थितियों में वह मंजूर भी हो जाता है। आधी छोड़ पूरी का लालच भी आप चाहें तो कह सकते हैं।

एक त्याग पत्र मजबूरी का भी होता है, जहां आप व्यक्तिगत कारणों के चलते, स्वेच्छा से त्याग पत्र दे देते हैं। लेकिन कुछ देश के जनसेवकों पर लोकसेवा का इतना दायित्व और भार होता है, कि वे कभी पद त्यागना ही नहीं चाहते। अतः उनके पद भार की समय सीमा बांध दी जाती है। उस समय के पश्चात् उन्हें इस्तीफा देना ही पड़ता है।।

जो सच्चे देशसेवक होते हैं, वे कभी देश सेवा से मुक्त होना ही नहीं चाहते। जनता भी उन्हें बार बार चुनकर भेजती है। ऐसे नेता ही देश के कर्णधार होते हैं। इन्हें सेवा में ही त्याग और भोग के सुख की अनुभूति होती है।

लेकिन सबै दिन ना होत एक समाना। पुरुष के भाग्य का क्या भरोसा। कभी बिल्ली के भाग से अगर छींका टूटता है, तो कभी सिर पर पहाड़ भी टूट पड़ता है। अच्छा भला राजयोग चल रहा था, अचानक हायकमान से आदश होता है, अपना इस्तीफा भेज दें। आप हवाले में फंस चुके हैं।।

एक आम इंसान जब नौकरी से रिटायर होता है तो बहुत खुश होता है, अब बुढ़ापा चैन से कटेगा। लेकिन एक सच्चा राजनेता कभी रिटायर नहीं होता। राजनीति में सिर्फ त्याग पत्र लिए और दिए जाते हैं, राजनीति से कभी सन्यास नहीं लिया जाता।

आज की राजनीति सेवा की और त्याग की राजनीति नहीं है, बस त्याग पत्र और इस्तीफे की राजनीति ही है। जहां सिर्फ सिद्धांतों को त्यागा जाता है और अच्छा मौका देखकर चलती गाड़ी में जगह बनाई जाती है।

अपनों को छोड़ा जाता है, और अच्छा मौका तलाशा जाता है। जहां त्याग पत्र एक हथियार की तरह इस्तेमाल होता है, और इस्तीफा, इस्तीफा नहीं होता, धमाका होता है।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares