मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फुलसर… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

फुलसर… ☆ 🖋 मेहबूब जमादार

आठवांचा छान फुलसर

करतो आहे मला वेडसर

*

तू असल्यावर मला वाटते

माझ्या कवेत आहे अंबर

*

तू गेल्यावर वाढत जाते 

मनामनातील मोठे अंतर

*

दोघांच्या सहवासातील

पसरते  भोवती अत्तर

*

फांद्यावरती झुलत राहते

मैनेचे  ते सुंदर गुज स्वर

*

गोड तुझ्या तू बोलण्यातून

पेरत जातेस हळूच साखर

*

आठवणींच्या त्या मोहोळी

राहावे वाटे रोज निरंतर

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 208 ☆ लतावेल ही… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 208 – विजय साहित्य ?

लतावेल ही ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

आठवणींची लतावेल ही,अंतरातले जीवन गाणे

नऊ दशकांचे नवरस ,स्वर सुरात रंगून जाणे…||धृ.||

*

एक सहस्र, गीते गायन, हिंदी संगीत विश्वात ठसा, 

गानकोकिळा,पार्श्वगायिका,सप्तसुरांचा संगीत वसा

वय तेराचे, उदया आली, स्वरयोगिनी, सूर दिवाणे…||१.||

*

शफी मौलवी, गुरू जाहले, उच्चार कलेची, श्वाससुता

आशा,उषा, मीना,स्वरशाखा, ह्रदयनाथ, भावंडलता

मोगरा फुलला, लतादीदी, अजरामर सुवर्ण नाणे…||२.||

*

शैली आगळी, शारद वाणी, गंधार स्वरयात्रा विरली

वसंत वैभव,गानलता, संगीत क्षेत्री ,ह्रदी ठसली

कल्पवृक्ष कन्येसाठी बाबा,दिनानाथ हे श्वास तराणे..||३.||

*

बोल गीतांचे,अभिजात ते, भारतीयांचा स्वर सन्मान

मंगळा गौर,गीत पहिले, वर्षाव स्वरांचा ,कंठस्नान

मनात माझ्या,पिढ्या पिढ्यांचे,रत्न भारताचे,दैवी गाणे..||४.||

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “अकेला हूॅं मैं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“अकेला हूॅं मैं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

होय मी तुला या किनाऱ्यावर आणून सोडलंय!… आता येथून पुढे तुझा तुला एकट्यानेच प्रवास करायचा बरं!… काही साधनं , सोबती मिळतीलही जर तुझ्या भाग्यात तसा योगायोग असेल तर.. नाही तर कुणाचीच वाट न पाहता, कुणी येईल याच्या भ्रामक अपेक्षेत न राहता पुढे पुढे चालत राहणे हेच तुला श्रेयस्कर ठरणार आहे… जसा मी बघ ना जोवर तू सागराच्या जलातून ऐलतीरावरून पैलतीरी जाण्यासाठी  आलो तुझ्या सोबतीला मदतीला… आणि या किनाऱ्यावर तुला उतरवून दिले… मलाही मर्यादा असतात त्याच्या पलीकडे मला जाता यायचं नाही.. जाता यायचं नाही म्हणण्यापेक्षा जमिनीवर माझा काहीच उपयोग नसतो… हतबल असतो..मनात असलं अगदी शेवटपर्यंत साथ द्यावी पण पण तसं तर कधीच घडणार नसतं मुळी… आता आपल्या त्या प्रवासात किती प्रचंड वादळं येऊन गेलेली आपण पाहिली की.. खवळलेला समुद्र, त्याच्या महाप्रचंड काळ धावून आल्यासारख्या प्रलयंकारी अजस्त्र लाटांचे मृत्यूतांडवाशी केलेला संघर्ष…तो माझ्या तशाच तुझ्याही जिवनाचा अटळ भाग होता… आणि तसं म्हणशील तर जीवन म्हणजे तरी काय संघर्ष असतो कधी आपला आपल्याशी नाही तर दुसऱ्याशी केलेला… साध्य, यश तेव्हाच मिळते.. विना संघर्ष काही मिळत नसते… मग सोबतीला कुणी असतात तर कुणी नसतातही… एकट्याने लढावा लागतो हा अटळ संघर्ष…अंतिम क्षणापर्यंत… आभाळाएव्हढी स्वप्नं दिसतील तुला या तुझ्या जीवन प्रवासात… जी हाती पूर्ण आली तेव्हा म्हणशील याच साठी केला होता हा अट्टाहास..तेव्हा आपसूकच ओठांवर हास्य येते आपल्या… आणि आणि दूर कुठेतरी संगीताची धुन वाजत असलेली कानी पडते… अकेला हूॅं मैं. इस दुनिया में… कोई साथी है तो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ क्षमा ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

?जीवनरंग ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ क्षमा ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

पुण्याच्या आसपासचं गाव. कुटुंब ठिकठाक. एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसून. आज्जी आधीच गेलेली. साहजिकच सुनेवर सर्व भार. आधी किरकोळ कुरबुर. मग बाचाबाची. त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं म्हणणं ‘ घरी बसुन ऐद्यासारखं खाऊ नका. काम करून हातभार लावा संसाराला.’ 

पण बाबा थकलेले. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं. मुलानेही अडवलं नाही. आले पुण्यात. कुणी म्हातारा म्हणुन काम देईना आणि भूक जगू देईना. भीक मागण्यावाचून पर्याय उरला नाही.

बाहेरच मुलाला भेटून, लाज टाकून बाबा विचारायचे, ” येऊ का रे बाळा घरी रहायला? ” 

‘बाळ’ म्हणायचे, ” मला काही त्रास नाही बाबा, पण ‘हि’ला विचारुन सांगतो.” 

पण, ” या बाबा घरी ” असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही !

आता बाबा अट्टल भिकारी झाले…. झाले, की त्यांना केलं गेलं? 

अशीच भीक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली. बोलताना बाबा म्हणायचे, ” डाॕक्टर, म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते. कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण. झुकलेलं आणि वाकलेलं. निष्प्राण वेलीसारखं.! “

बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर माझ्याही !

” नाव, पत्ता, पिनकोड सहित पत्र टाकूनही  पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं. नाहीतर वर्षानुवर्षे पडून राहतं धूळ खात पोस्टातच. तसंच आमचं आयुष्य ! नाव पत्ता सग्गळं बरोबर ! पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणून आम्ही इथं पडलेले.” असं बोलून ते हसायला लागतात. त्यांचं ते कळवळणारं हसू आपल्यालाच पीळ पाडून जातं.

मी म्हणायचो, ” बाबा हसताय तुम्ही. पण हे हसू खोटं आहे तुमचं.”

तर म्हणायचे. “आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं. हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसू कुठुन उसनं आणू ? ” ….  मी निरुत्तर ! 

” वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं. टोपलीत ठेवतं. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली. नंतर कळतं की सुकलेले आहोत म्हणून जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा ?” …  बाबांचं बोलणं ऐकून, मीच आतून तुटून जायचो.

“काहीतरी काम करा बाबा,” असं सांगून मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयार नव्हते.! म्हणायचे, “आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं. किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवून पाया पडतील. श्राद्धाला जेवताना 

‘ चांगला होता हो बिचारा ‘ असं म्हणतील. नाटक असतं हो सगळं आयुष्यच. प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतं इतकंच !”

इतकं असुनही, एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच. बॕटऱ्या विकण्यासाठी त्यांना मदत केली. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता. भीक मागत नाहीत. 

… मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता ! 

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले. मला जरा बाजुला घेऊन गेले. म्हणाले, ” एक गंमत सांगायचीय डाॕक्टर ! सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, “हिने” तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जाऊ दे म्हणते. पाया पडून माफी मागायला तयार आहे. बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळून करु.”

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला/सासऱ्याला भीक मागायला लावली. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली.? 

” डाॕक्टर काय करु ? सल्ला द्या.”

साहजिकच मी बोललो, ” ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली, त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही, पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु ! “

बाबा म्हणाले, ” डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगू? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भीक मागताना ! चालेल तुम्हाला ? मी माझ्या माघारी, त्याला 

भिकारी बनवून जाईन का? अहो, चुकतात तीच पोरं असतात. माफ करतो तोच ‘बाप’ असतो पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी, ‘ क्षमा ‘ म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या डाॕक्टर…

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हाट्सअप… वरदान की शाप ☆ -सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? मनमंजुषेतून ?

व्हाट्सअप… वरदान की शाप ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

व्हाट्सअँप हा प्रकार जितका उपयुक्त आहे तितकाच कंटाळवाणा सुद्धा आहे.

व्हाट्सअँपमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात.पण तितकच काही चुकीचे ज्ञान पण खात्रीपूर्वक खरे असल्यासारखे

बोकाळते, पसरते.लोक शहानिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करतात.आणि करणारी लोक आपल्या  विश्वासाची असल्यामुळे त्या गोष्टींवर  विश्वास ठेवायचा की नाही ह्याबद्दल मन सांशक होते.

ग्रुपवर एखाद्याचा वाढदिवस असला की पूर्ण दिवस सदिच्छांचा भडीमार,केक्स फुलांचे गुच्छ वगैरे चे फोटो अगदी रात्री १२ वाजल्यापासून पाठवायची चढाओढ.सगळ्यांनी पाठवले आणि आपले पाठवायचे राहून गेले तर!

बरं वाढदिवसाचे एकवेळ ठीक त्या व्यक्ती पर्यंत पोहोचून तिला त्यामुळे आनंद मिळेल पण कोणाचे निधन झाले की श्रद्धांजली,rip ची लाईनच लागते.आता सांगा श्रद्धांजली त्या व्यक्तीला समजणार का?आपले समाधान.एरवी ती व्यक्ती जिवंत असताना तिला भेटले असते तर  तिच्या बरोबर दोन घटका वेळ घालवला  असता तर तिला किती समाधान मिळाले असते?जर ती व्यक्ती आजारी असताना तिची विचारपूस केली असती शक्य झाल्यास सेवा केली असती तर खरं.गेल्यावर श्रद्धांजलीचा देखावा कशाला आणि कोणासाठी?

तसेच सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग,रात्री गुड नाईट ती फुले,निसर्ग त्यांचे फोटो कशाला ?जसं काही गुड मॉर्निंग गुड नाईट विश नाही केले तर त्याची सकाळ, रात्र चांगली जाणार नाही.पण ह्या सदिच्छामुळे मोबाईल जाम होतो.पुढील जरुरीचे मेसेज,फोटो यायला रोड जाम होतो.मग सगळे डिलिट करा.

देवाधिकांचे फोटो,त्याचा तर भडीमार.परत डिलिट करायला जिवावर येत.पण नाईलाज 

काही लोकं ह्या जपाची साखळी करा.१०लोकांना पाठवा वगैरे पाठवतात  त्याच्यात पण काही अर्थ नसतो.पण समोरच्याला धर्मसंकट.पुढे साखळी चालू नाही ठेवली तरी पंचाईत पाठवयाचे तर मनाला पटत नाही.

गुड मॉर्निंग,गुड नाईट ह्या मेसेजचा उपयोग एकटी व्यक्ती राहात असेल तर तिची खुशाली रोजच्यारोज इतर नातेवाईकांना समजायला उपयोग होतो.ज्या दिवशी गुड मॉर्निंग मेसेज आला नाही म्हणजे त्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम आहे हे समजून त्याच्या मदतीला जाऊ शकतो.हा व्हाट्सअँपचा मोठा उपयोग आहे.

एखाद्या ठिकाणी लग्न ,मुंजी सारखा प्रसंग आहे एखादी व्यक्ती हजर राहू शकत नाही तर जगभरातून विडिओ कॉल करुन पाहू शकते .जणू काही ती व्यक्ती तिकडे हजर आहे आणि कार्याचा लाभ घेऊ शकते.मुलगा मुलगी जगभर कुठेही असली तरी आई वडिलांना विडिओ कॉल करुन भेटू शकतात.

वर्क फ्रॉम होम करुन करोनाच्या काळात,भरपूर पाऊस असताना घरबसल्या माणसे कामे करू शकली.मुले शाळेत न जाता घरच्या अभ्यास करू शकली.

व्हाट्सअँपचा एक मोठा फायदा ज्या व्यक्तीला ऐकू कमी येते कानाचा प्रॉब्लेम असतो ती व्यक्ती

व्हाट्सअँप वर वाचून,लिहून आपला वेळ आनंदात घालवू शकते बाहेरच्या नातेवाईकांशी मनमोकळे पणांनी टाईप करुन.संपर्कात राहू शकते.

एखाद्या फक्शनचे आमंत्रण एकाच वेळी सगळ्यांना देऊ शकतो.कार्ड काढा त्यावर पत्ते लिहा कॉरिअरने पाठवा तो खर्च,वेळ वाचतो.अपव्यय होत नाही.

शेवटी काय प्रत्येक नाण्याला दोन बाजू  फायदा,त्याच्या बरोबर तोटा हा असणारच.कसा आणि किती त्या व्हाट्सअपचा उपयोग करुन घ्यायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं.

© सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— ज्ञानकर्मसंन्यासयोग— (श्लोक ३१ ते ४२) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्‌ । 

नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ४-३१ ॥ 

*

शेष राहिले यज्ञातुन अमृत त्याचे करिता पान

परब्रह्म परमात्म्आ करीत प्राप्त योगी सनातन

विन्मुख होता यज्ञाला सौख्य नाही त्या इहलोकी

प्राप्त तयाला कसे व्हावे सौख्य कुरुश्रेष्ठा परलोकी ॥३१॥ 

*

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । 

कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥ 

*

विस्तृत करुनी कथिले प्रकार वेदवाणीने यज्ञाचे

कायागात्रमन क्रियेने जाण संपन्न तयांना करण्याचे

अनुष्ठान करावे पार्था तनमनइंद्रिये त्या यज्ञाचे

मोक्ष तयाने मिळेल तुजला मुक्ती बंधन कर्माचे ॥३२॥

*

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप । 

सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ४-३३ ॥ 

*

शत्रुतापना धनंजया जाण यज्ञज्ञान

द्रव्यमय यज्ञाहून अतिश्रेष्ठ ज्ञानयज्ञ 

समस्त कर्मे अखेर समाप्त व्हायाची

ज्ञानामध्ये ती तर विरून जायाची ॥३३॥

*

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । 

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥ 

*

तत्वदर्शी ज्ञान्याकडुनी घेईऔ ज्ञान शिकुनी

सालस सेवा त्यांची करुनी नमन तया करुनी

परमतत्वाचे अधिकारी ते महात्मे श्रेष्ठ ज्ञानी

ज्ञानोपदेश तुजला देतिल प्रसन्न मनी होउनी  ॥३४॥

*

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव । 

येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ४-३५ ॥ 

*

जाणताच त्या ज्ञाना न जाशील पुनरपि मोहाप्रती

समस्त भूता पाहशील पांडवा तू तर माझ्याप्रती ॥३५॥

*

अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः । 

सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ४-३६ ॥ 

*

पाप्यापेक्षा अधिक घडले पाप तुझ्या हातुन

ज्ञाननौका नेइल तुजला पापसमुद्र तरुन ॥३६॥

*

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन । 

ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ४-३७ ॥ 

*

प्रदीप्त वन्ही जैसे करतो काष्ठांसी भस्म

समस्त कर्मा ज्ञानाग्नी तैसा करील भस्म ॥३७॥

*

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । 

तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ४-३८ ॥ 

*

ज्ञानासम नाही काही जगात या पवित्र

काळाने योगसिद्ध आत्म्यात करितो प्राप्त ॥३८॥

*

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः । 

ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९ ॥ 

*

जितेंद्रिय श्रद्धावान तत्पर साधका ज्ञान प्राप्त

ज्ञानप्राप्तिने तयास सत्वर होई परमशांती प्राप्त ॥३९॥

*

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति । 

नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥ 

*

अज्ञ अश्रद्ध संशयात्मा खचित पावे विनाश

न इहलोक तया ना परलोक ना सौख्याचा लाभ॥४०॥

*

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌ । 

आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥

*

कर्मे सारी अर्पण केली विनाश केला संशयाचा

अंतःकरण स्वाधीन ज्याच्या पाश नसे कर्मबंधनाचा ॥४१॥

*

तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः । 

छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४-४२ ॥ 

*

ज्ञानखड्गाने वधुनी अज्ञानसंभव तव संशया

स्थिर होऊनी कर्मयोगे युद्धसिद्ध हो धनंजया ॥४२॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥ 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी ज्ञानकर्मयोग नामे निशिकान्त भावानुवादित चतुर्थ अध्याय संपूर्ण ॥४॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुललेल्या अबोलीस पाहून… — कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुललेल्या अबोलीस पाहून… — कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

फुललेल्या अबोलीचे

लाख फुलांनी असे बोलणे !

 

शब्दावाचून अंगोअंगी

असे जरासे धुंद बहरणे !

 

हिरव्या हिरव्या पानांमधुनी

फिकट केशरी रंग सांडणे !

 

नको कोणते अजून अलंकार,

असेच जरासे नटणे अन् मुरडणे!

 

द्यावे वाटे हृदयीचे असे काही

जरी नसते तुझे काही मागणे !

 

होते पाहून तुजला कृतार्थ

आमचे इथले येणे !

 

कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – “हिंदुस्तानी नीरो” ☆ डॉ कुंवर प्रेमिल ☆

डॉ कुंवर प्रेमिल

(संस्कारधानी जबलपुर के वरिष्ठतम साहित्यकार डॉ कुंवर प्रेमिल जी को  विगत 50 वर्षों से लघुकथा, कहानी, व्यंग्य में सतत लेखन का अनुभव हैं। क्षितिज लघुकथा रत्न सम्मान 2023 से सम्मानित। अब तक 450 से अधिक लघुकथाएं रचित एवं बारह पुस्तकें प्रकाशित। 2009 से प्रतिनिधि लघुकथाएं  (वार्षिक)  का  सम्पादन  एवं ककुभ पत्रिका का प्रकाशन और सम्पादन। आपने लघु कथा को लेकर कई  प्रयोग किये हैं।  आपकी लघुकथा ‘पूर्वाभ्यास’ को उत्तर महाराष्ट्र विश्वविद्यालय, जलगांव के द्वितीय वर्ष स्नातक पाठ्यक्रम सत्र 2019-20 में शामिल किया गया है। वरिष्ठतम  साहित्यकारों  की पीढ़ी ने  उम्र के इस पड़ाव पर आने तक जीवन की कई  सामाजिक समस्याओं से स्वयं की पीढ़ी  एवं आने वाली पीढ़ियों को बचाकर वर्तमान तक का लम्बा सफर तय किया है, जो कदाचित उनकी रचनाओं में झलकता है। हम लोग इस पीढ़ी का आशीर्वाद पाकर कृतज्ञ हैं। आज प्रस्तुत हैआपकी  एक विचारणीय लघुकथा –हिंदुस्तानी नीरो“.)

☆ लघुकथा – हिंदुस्तानी नीरो ☆ डॉ कुंवर प्रेमिल

यूक्रेनियों ने रसियन स्टॉर्म जी की यूनिट को 12 घंटे के लंबे ऑपरेशन में लगभग 1800 मीटर तक खदेड़ दिया-मोबाइल पर समाचार आ रहा था।

कोई हिंदुस्तानी नीरो नीम की छांव में लेट कर बांसुरी बजा रहा था।

हंसकर बोला – सालों से चल रहे इस भयानक युद्ध में पीछे और पीछे घिसटते हुए यूक्रेन ने यदि कुछ मीटर पीछे खदेड़ दिया तो क्या यह छोटी-मोटी कामयाबी है। ‌ उसके हौसले की दाद देनी चाहिए। कहकर हिंदुस्तानी नीरो फिर बांसुरी बजाने लगा।

कहते हैं कभी रोम जल रहा था और कोई नीरो हीरो बना बांसुरी बजा रहा था। उससे कहीं तो हिंदुस्तानी नीरो ज्यादा अच्छा निकला जो एक पिछड़ते देश को मिली छोटी सी कामयाबी पर बांसुरी बजाकर उसकी हौसला अफजाई कर रहा था।

निराशा में आशा के दो बोल भी बहुत मददगार बनते हैं। जीतने वाले की प्रशंसा तो हर कोई करता है पर हारे हुए की बैसाखी बनना छोटी-मोटी इंसानियत नहीं है।

🔥 🔥 🔥

© डॉ कुँवर प्रेमिल

संपादक प्रतिनिधि लघुकथाएं

संपर्क – एम आई जी -8, विजय नगर, जबलपुर – 482 002 मध्यप्रदेश मोबाइल 9301822782

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # 181 ☆ प्रेम डोर सी सहज सुहाई… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना प्रेम डोर सी सहज सुहाई। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – आलेख  # 181 ☆ प्रेम डोर सी सहज सुहाई ☆

वक्त के साथ समझदारी आती है, जिससे अहसास के मूल्य पुनर्जीवित हो जाते हैं। सुप्रभात, शुभरात्रि व शुभकामना संदेश ये सब इसी कड़ी को जोड़ने में मील का पत्थर साबित हुए हैं। सुविचारों के भेजने से सामने वाले की बौद्धिक क्षमता व उसके व्यक्तित्व का आँकलन भी होता है। लोग एक दूसरे से इतनी अपेक्षा रखते हैं कि बिना कुछ किये दूसरा सब कुछ करता रहे अर्थात केवल लेने की चाहत, ये कहाँ तक उचित हो सकता है? इसी सम्बन्ध में एक छोटी सी कहानी है- एक वृक्ष की पहचान व सुंदरता उसके फूल और फल से होती है इसी घमंड में फूल इतरा उठा उसने वृक्ष को खूब खरी- खोटी सुनायी।

आखिर वह भी कब तक चुप रहता उसने कह दिया तुम्हारा स्थायित्व तो एक दिन, एक हफ्ते, एक पक्ष या अधिक से अधिक एक महीने ही रहता है जबकि मैं तो तब बना रहूँगा जब तक जड़ न सूख जाए। वृक्ष की इस बात का समर्थन उसकी शाखाओं ने भी किया।

इस बात से नाराज हो फूल मुरझा कर गिर गया, उसके समर्थन में पत्तियाँ भी झर गयीं। फल सूखा जिससे बीज इधर – उधर बिखर गए, देखते ही देखते सुनामी की लहर उठी और पूरा वृक्ष अकेले शाखाओं के साथ जड़ के दम पर अडिग रहा।

मौसम बदला जिससे कुछ ही दिनों में कोपलें आयीं और देखते ही देखते पूरा वृक्ष हरा- भरा हो गया। फिर से वही क्रम शुरू हो गया, फूल खिलना, मुरझाना, पतझड़ से पत्ते झरना व कुछ समय बाद कोपलों से वृक्ष का भर जाना।

इस पूरे घटना क्रम से एक ही बात समझ में आती है कि जब तक व्यक्ति जड़ से जुड़ा रहेगा तब तक उसके जीवन में आने वाला पतझड़ भी उसे मिटा नहीं पायेगा बल्कि वो और सुंदर होकर निखर जायेगा।

अतः केवल फायदा लेने की प्रवृत्ति से बचें क्या दायित्व हैं, उनका कितना निर्वाह आपने किया इस पर भी विचार करें तभी लोकप्रियता मिलेगी याद रखें अधिकार माँगने से नहीं मिलते उसे आपको कमाना पड़ता है।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – जन्मांतर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – जन्मांतर ? ?

आदमी

जन्म से ही इकट्ठा

करने लगता है

दीवारें,

घर,

पेड़,

रिश्ते,

नाते,

संंबंध,

मित्र,

और बहुत कुछ..,

फिर जब

एक-एक कर

बिखरने लगते हैं

दीवारें,

घर,

पेड़,

रिश्ते,

नाते,

संबंध,

मित्र,

और बहुत कुछ..,

समझ लो

अगला जन्म

तुम्हारी प्रतीक्षा में है!

© संजय भारद्वाज 

(अपराह्न 12 बजे, 6.12. 2017)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares