हिन्दी साहित्य – कविता ☆ मन की अदालत… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ मन की अदालत ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

आईने के सामने खडी थी मैं

इतने में आवाज आयी

आजकल कैसा चल रहा है?

 

 वैसा कुछ खास नहीं 

 

नई किताब लायी नहीं 

पूरानी अलमारी से निकाली नहीं 

 

इतना समय नहीं मिलता

मोबाईल….

 

हाँ हाँ ….रहेने दो

मुझे मालुम है

 

नया कुछ कंठस्थ किया है?

 

जी नहीं 

 

नीचे देखना बंद करो

ऑंखें मिलाकर बातें करो

 

लग रहा था जैसे कटघरे में खडी हूँ 

 

तुम्हारे सामने क्या आयी

तुम तो बस..

मेरी गलतियाँ निकालने लगे

 

ऑंखे तो अपने आप भर गयी..

 

अरे पगली समझ भी जाओ

घर में और कोई बडा है क्या

एक मैं जो हूँ..

तुमसे सच्ची बात करता हूँ 

वरना तुम आगे बढना भूल जाओगी

 

चलो अब  मुस्कुराओ

आज के लिए इतना काफी है

 

मै गुस्से में थी..

लेकिन सोचने लगी..

अरे ये सच भी तो है..

 

बाद में समझ गयी

अरे हाँ….

 

आईने जैसा सच्चा मित्र नहीं  है..

उसका फैसला कभी गलत नहीं  होगा

 

आजकल…

एक अजीब सी बात हो गई है

मेरे उपर ही मेरा  मुकदमा चल रहा है

आरोपी  भी मैं और जज भी मैं 

 

लेकिन ..

अब मजा आने लगा है

 

तुम भी कर लो उसी से दोस्ती

आजकल मेरी हो गयी है

मैं खुश हूँ 

आप भी रहोगे …

 

इतने में आवाज आयी

 अगली तारीख में फिर सुनवाई होगी

 

जी हाँ..

हाजिर हो जाऊंगी… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय 

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 159 ☆ ‘चारुचन्द्रिका’ से – कविता – “परीक्षाओं से डर मत मन…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक भावप्रवण रचना  – “परीक्षाओं से डर मत मन। हमारे प्रबुद्ध पाठकगण प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे।) 

☆ ‘चारुचन्द्रिका’ से – कविता – “परीक्षाओं से डर मत मन” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

धरा को जब तपा दिनभर प्रखर रवि झुलस देता है

तभी चंदा की शीतल चाँदनी की रात होती है।

क्षितिज तब जब कभी नभ को सघन घन घेर लेते हैं

कड़कती बिजलियाँ, तब ही सुखद बरसात होती है।

डुबा चुकता है जब बस्ती उतरता बाढ़ का पानी

हमेशा धैर्य से ही सब दुखों की मात होती है।

निराशा के अँधेरों में कोई जब डूब जाता है

अचानक द्वार पै कोई खुशी बात होती है ॥

परीक्षाओं से डर मत मन ये तो हिम्मत बढ़ाती है

सही जीवन की इनके बाद ही शुरुआत होती है।

नहीं होता किसी के साथ जब कोई अँधेरे में तो

तब हरदम अंजाने उसके हिम्मत साथ होती है॥

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 96 ☆ मुक्तक ☆ ।।युग पुरूष स्वामी विवेकानंद जी की जयंती (12 जनवरी)।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

☆ “श्री हंस” साहित्य # 96 ☆

☆ मुक्तक ☆ ।।युग पुरूष स्वामी विवेकानंद जी की जयंती (12 जनवरी)।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस” ☆ 

।। राष्ट्रीय युवा दिवस।।

[1]

अल्प आयु में ही दिया था, अमर दर्शन इतिहास।

देश भारत को किया था, सर्व विश्व सुविख्यात।।

स्वामी रामकृष्ण परमहंस के, वे सर्वसिद्ध अनुयायी।

स्वामी विवेकानंद नाम से, हुए विश्व में विख्यात।।

[2]

युवा पीढ़ी की सोच अध्यात्म, का अनुपम मेल।

शिकागो सम्मेलन में चली, विचारों की अदभुत रेल।।

नवभारत निर्माण संकल्प, लिया यौवनकाल में ही।

नरेंद्र बने स्वामी विवेकानंद था, दर्शन का अलौकिक खेल।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेलीईमेल – Skkapoor5067@ gmail.com, मोब  – 9897071046, 8218685464

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ – दोहों में स्वामी विवेकानंद – ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे ☆

प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे

☆ – दोहों में स्वामी विवेकानंद  ☆ प्रो. (डॉ.) शरद नारायण खरे 

प्रखर रूप मन भा रहा, दिव्य और अभिराम।

स्वामी जी तुम हो सदा, लिए विविध आयाम।।

स्वामी जी तुम चेतना, थे विवेक-अवतार।

अंधकार का तुम सदा, करते थे संहार।।

जीवन का तुम सार थे, दिनकर का थे रूप।

बिखराई नव रोशनी, दी मानव को  धूप।।

सत्य, न्याय, सद्कर्म थे, तेज अपरिमित माप।

काम, क्रोध, मद, लोभ हर, धोया सब संताप।।

गुरुवर तुमने विश्व को, दिया ज्ञान का नूर।

तेज अपरिमित संग था, शील भरा भरपूर।।

त्याग, प्रेम, अनुराग था, धैर्य, सरलता संग।

खिले संत तुमसे सदा, नवजीवन के रंग।।

था सामाजिक जागरण,  सरोकार, अनुबंध।

नित्य, सतत् आती रही, कर्मठता की गंध।।

सुर, लय थे, तुम ताल हो, बने धर्म की तान।

गुरुवर तुम तो शिष्य का, हो नित ही यशगान।।

मधुर नेह थे, प्रीति थे, अंतर के थे भाव।

गुरुवर तुमसे धर्म को, सौंपा पावन ताव।।

वंदन, अभिनंदन करूँ, थे गुरुवर तुम नित्य।

थे तुम खिलती चाँदनी, दमके बन आदित्य।।

© प्रो.(डॉ.)शरद नारायण खरे

प्राचार्य, शासकीय महिला स्नातक महाविद्यालय, मंडला, मप्र -481661

(मो.9425484382)

ईमेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सृष्टी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ सृष्टी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(षडाक्षरी)

  ढगाळ आभाळ ,

  अवचित वेळी !

  थंडीला वेढून ,

 हवा पावसाळी!…..१

 

        चाहूल थंडीची

        सरे पावसाळा ,

        अचानक वाजे,

        पावसाचा वाळा……२

 

  पाऊस न् थंडी,

   निसर्ग सजला,

  गारव्यात याच्या,

   माणूस भिजला …..३

 

        ऋतू चक्रामध्ये,

        मनस्विनी सृष्टी!

        दिसते सर्वांना,

        तिची चमत्कृती!….४

 

  नकळत सारी,

   सृष्टी ही गोठली!

  थंडी च्या ऋतूत,

    ‘स्ट्यॅच्यू’ हीच झाली!…५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ लाभो सानिध्य थोरांचे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ लाभो सानिध्य थोरांचे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

लाभो सानिध्य थोरांचे

सार्थक हो जीवनाचे

पूज्य भाव त्यांच्या प्रति

विचारांच्या आदर्शांचे

 

अनुभवी असे बोल

ज्ञान बुध्दी त्यांच्याकडे

उपदेश अनमोल

नेती कसे उंचीकडे

 

धन्य धन्य हे जीवन

आशीर्वाद मिळे जर

वाटचाल होते सोपी

खडतर मार्गावर

 

दिशा मिळे आपोआप

सल्ला थोरांचा मानावा

ध्येयाकडे जाण्यासाठी

त्यांचा आधार शोधावा

 

छत्रछाया कृपा त्यांची

नित्य सहज लाभावी

जीवनाची इतिश्रीही

सानिध्यात त्यांच्या व्हावी

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “याला जीवन ऐसे  नाव….” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “याला जीवन ऐसे  नाव….” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

याला जीवन ऐसे नाव गुलजार ह्यांच्या रचना वाचल्यावर त्या मनात घट्ट रुतून बसतात, भावतात आणि विचारात देखील पाडतात. परवा गुलजार ह्यांच्या खूप आवडतील अशा आशयपूर्ण चार ओळी मैत्रीणीने पाठविल्यात. त्या पुढीलप्रमाणे.

“इतनी सी जिंदगी है, पर ख्वाब बहुत है ।

जुर्म का पता नही, साहब मगर इल्जाम बहुत है।।

खरचं तसं बघितलं तर ह्या मानवजन्माला आलो आणि अवघी एकच इनिंग खेळायचं परमिट मिळालं.त्या अवघ्या पूर्ण हयातीत बालपण आणि म्हातारपण हे तसे बघितले तर जरा परस्वाधीनंच. फक्त जे काही तरुणपण शिल्लक उरतं त्यात आपलं कर्तृत्व दाखवावं लागतं.

हे आपलं कर्तृत्व दाखविण्यासाठी आपण आपल्या जिवाचा आटापिटा करतो जेणेकरून जनतेच्या,लोकांच्या नजरेसमोर आपली उर्जितावस्था आली पाहिजे. सध्याचं आपलं जगं हे खूप आभासी जगं तयार झालयं.ह्या आभासी जगाचा हिस्सा काही मूठभर मंडळी सोडली तर जवळपास सगळेजणं बनतात.

ह्या आभासी जगात वावरण्यासाठी मग “माझा सुखाचा सदरा “ह्याच प्रेझेंटेशन जगासमोर केल्या जातं.कित्येक भावंड सोशल मिडीयावर भाऊबीज, राखीपोर्णिमेचे फोटो धूमधडाक्यात व्हायरल करतांना प्रत्यक्षात मात्र वयस्कर पालकांची जबाबदारी घेतांना वा मालमत्तेची वाटणी करतांना एक वेगळचं चित्र आपल्यासमोर आणतात. तसेच एकमेकांच्या आचारविचारात साधर्म्य नसलेली जोडपी “मेड फाँर इच अदर”भासवतं अँनिव्हर्सरी केक कापतांनाचे फोटो अपलोड करतात.प्रत्यक्षात ही धडपड, द्राविडीप्राणायाम, आटापिटा कशासाठी केल्या जातो हे एक न उलगडलेले कोडेच.काही वेळा आपल्याला इतरांसाठी पण जगावं लागतं म्हणां. कदाचित त्यासाठी असावं.

ह्या आपल्या छोट्याशा आयुष्याच्या तरुणपणाच्या काळात माणूस मात्र स्वप्नं खूप विणतो आणि हे स्वप्नं विणणं अगदी स्वाभाविक असतं.जणू “करलो दुनिया मुठ्ठीमे”सारखीच अवस्था जवळपास प्रत्येकाच्या जीवनात येतेच.

खरचं ही स्वप्नं विणतांना पण खूप मजा येते.काही स्वप्नं ही नशीबाने आपोआपच आपलं काही कर्तृत्व खर्च न करताच पूर्ण होतात,काही स्वप्नं ही धडपड करुन, जिवाचा आटापिटा करुन माणूस पूर्ण करतो.ह्यात त्रास,दगदग, मनस्ताप हा होतोच पण स्वप्नपूर्ती नंतरचा आनंद पण खूप सुख देऊन जातो.काही स्वप्नं ही तशी आवाक्याबाहेरची असतात, आपल्याला कळतं ही अशक्यप्राय आहेत पण तरीपण कुठेतरी असंही वाटत असतं एखादा चमत्कार घडेल आणि कदाचित आपलं हे स्वप्नं पूर्णत्वास जाईल सुध्दा.

ही स्वप्नं उराशी बाळगतं बाळगतं एकीकडे आपण आपल्या जबाबदा-या पार पाडण्याचे काम पण लिलया करीत असतोच.जो घरातील सर्वात जास्त जबाबदार व्यक्ती असतो त्याच्या माथी वाईटपणा हा अटळंच.आपल्या जबाबदा-या पार पाडतांना त्याला कित्येक जणांच्या रोषाला कारणीभूत व्हावं लागतं तर कित्येकांच्या नाराजीचं कारण म्हणजे जबाबदा-यांच ओझं वाहणारी व्यक्ती असते.

जबाबदा-या उचलतांना प्रसंगी व्यक्तींना काही वेळ कठोर भूमिका पण नाईलाजाने घ्यावी लागते.हे सगळं करीत असतांना नशीबाने चांगुलपणा पदरी पडला तर आपण नशीबवान खरे.

ह्या सगळ्या जबाबदा-या स्विकारतांना, प्रमुख भूमिका बजावीत असतांना,ब-याच वेळा घडलेल्या घटनांचे पडसाद जर सकारात्मक उमटले तर काहीच प्रश्न नसतो पण चुकून जर का काही उन्नीस बीस झाले वा पडसाद नकारात्मक उमटले तर दोष हा जबाबदार व्यक्तीच्याच माथी येतो.कित्येकदा आपला स्वतः चा गुन्हा,अपराध नसतांनाही आळ,आरोप हा अंगावर येऊन पडतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माणुसकीचं दान ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ माणुसकीचं दान ☆ श्री दीपक तांबोळी

“तुषार तू म्हणत होतास ना की तुला काहीतरी समाजसेवा करायचीये म्हणून.ती संधी चालून आलीये बघ.येत्या वीस तारखेला आपण एका आदिवासी पाड्यावरच्या आदिवासींना दिवाळीनिमित्त कपडे देणार आहोत.तुझ्याकडचे जुने पण चांगल्या स्थितीत असलेले कपडे काढून ठेव.आणि हो!यावेळी जी माणसं वस्त्रदान करतील त्यांचे फोटो आपण वर्तमानपत्रात देणार आहोत “

तुषारचा सामाजिक कार्यकर्ता असलेला मित्र,प्रताप फोनवर बोलत होता.

“ओके प्रताप.मी तयार आहे.माझ्याकडे बरेच जुने कपडे आहेत.ते काढून ठेवतो” तुषार आनंदाने म्हणाला.

काहीतरी समाजसेवा करावी असं बऱ्याच दिवसांपासून तुषारच्या मनात होत़ं.या कार्यक्रमाने त्या समाजसेवेला सुरुवात होणार होती.शिवाय प्रताप म्हणाला तसे वर्तमानपत्रात फोटो छापून आले तर दुधात साखरच पडणार होती.

” अहो ऐकताय का?”

शितलच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली.

” बोल काय म्हणतेय?”

“आपली कामवाली म्हणत होती साहेबांचे आणि आकाशचे काही जुने कपडे असतील तर दिवाळीसाठी द्या म्हणून “

” अगं आताच मी प्रतापला कबूल केलंय आदिवासींना कपडे द्यायचं.यावर्षी राहू देत कामवालीला.पुढच्या वर्षी बघू ” तुषार जरा चिडूनच बोलला.

” अहो.तुम्हांला माहितेय ना,तिचा नवरा टी.बी.च्या आजारामुळे घरीच असतो.मुलं लहान आहेत.कमावणारी ही एकटीच.तेही महिन्याला फक्त दिडदोन हजार कमावणार.काय होत असेल त्यात?आपल्या आकाशचा एक ड्रेस येतो ३-४ हजारात.ती अख्खं कुटुंब चालवते त्या दिडदोन हजारात ” शितल त्याला समजावू लागली.

“असू दे.असंही तू तिला नेहमीच काही ना काही देत असते.यावेळी नाही दिलं तर काय बिघडलं?आणि आता मी प्रतापला कबूल करुन बसलोय.समाजसेवा करायची चांगली संधी आलीये तर त्यात तू विघ्न आणू नकोस “

तुषार चढ्या आवाजात म्हणाला तशी शितल चुप बसली.

शेवटी तो दिवस उजाडला.तुषार त्याचे स्वतःचे आणि आकाशचे जुने इस्त्री केलेले कपडे घेऊन आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी निघाला.मुख्य रस्त्यापासून ७ किलोमीटर आत जंगलात असलेल्या त्या पाड्यावर पोहचायला त्याला तब्बल एक तास लागला इतका तो रस्ता खराब होता.पाड्यावर पोहचल्यावर मात्र तिथलं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होत असेल याची त्याला कल्पना नव्हती.तिथं एक मोठा शामियाना उभारलेला होता.त्यात पन्नास एक खुर्च्या ठेवलेल्या होत्या.त्याने चौकशी केली तेव्हा मंत्री,खासदार,आमदार आणि कलेक्टरपासून सरपंचापर्यंत सारेच झाडून हजर रहाणार असल्याचं त्याला कळलं.गरीब आदिवासींना जुने कपडे देण्याच्या कार्यक्रमात या राजकारणी लोकांची उपस्थिती कशासाठी?असा त्याला प्रश्न पडला पण  व्हि.आय.पी.व्यक्तींसोबत आपले फोटो निघणार या विचाराने तुषार खुश झाला.

पाहुण्यांना यायला उशीर होता म्हणून तिथे उपस्थित असलेल्या आदिवासी तरुणाशी तुषार बोलू लागला.त्या तरुणाच्या बोलण्यावरुन तुषारला कळलं की पाचशे लोकवस्तीच्या त्या पाड्यावर कसल्याही सुविधा नव्हत्या.दोन किलोमीटरवरुन पाणी आणावं लागत होतं.म्हणायला वीजेचे खांब होते पण दिवसातून दोनतीन तासच वीज उपलब्ध असायची.काही बिघाड झाला तर आठवडा आठवडा कुणी तो दुरुस्त करायला येत नव्हतं.पाड्यावर दवाखाना नव्हता.तिथून अठरा किमी.वरच्या गावात सरकारी दवाखाना होता पण तिथे डाँक्टर क्वचितच उपलब्ध असायचे.खराब रस्त्यामुळे शहरात जाणयेणंही खुप त्रासदायक होतं.पावसाळ्यात तर त्या रस्त्यात इतका चिखल व्हायचा की मुख्य रस्त्यावर जाणंही अशक्य होऊन बसायचं.बऱ्याचदा गंभीर रुग्ण रस्त्यातच दगावायचे.अडल्यानडलेल्या गर्भारणी दवाखान्यात पोहचण्या अगोदरच प्रसुत व्हायच्या. कुणीही या पाड्याकडे लक्ष देत नव्हतं.आदिवासींच्या जीवनमरणाशी जणू कुणालाच काही देणंघेणं नव्हतं.मात्र निवडणुका आल्या की महिनाभर राजकीय पुढाऱ्यांची तिथं वर्दळ असायची.अनेक आश्वासनांची खिरापत वाटली जायची.सुधारणांची प्रलोभनं दाखवली जायची.मात्र निवडणुका संपल्या की कुणीही इकडे ढुंकूनही पहात नव्हतं.ते ऐकून तुषार अस्वस्थ झाला.आपण शहरात किती सुखासीन आयुष्य जगतोय याची त्याला जाणीव झाली.

कार्यकर्त्यांची वर्दळ सुरु होती.हळूहळू एकेक पाहुणा यायला सुरुवात झाली.मंत्री महोदय तब्बल दोन तास उशीराने उगवले.त्यांच्यासोबत आलेल्या  आलिशान गाड्यांचा ताफा पाहून तुषारच्या मनात विचार आला की २५-३० लाखाच्या गाडीत फिरणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांना अख्ख्या आदिवासी पाड्याला नवीन कपडे घेऊन देणं सहज शक्य होतं .पण ते खिशातली दमडीही खर्च करण्याची दानत दाखवत नाहीत. सामान्य माणसाला मात्र दानाचं आवाहन करत असतात.निवडणुका आल्या की मग मात्र दानशुरपणाचा आव आणतात.

भाषणांची सुरुवात झाली.प्रत्येक वक्ता आपल्या भाषणात त्याला गरीबांचा किती कळवळा आहे हे मोठ्या हिरीरीने मांडत होता.त्याचबरोबर  प्रतापची स्तुती करत होता.त्या स्तुतीने प्रतापचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.ते पाहून तुषारला मात्र प्रतापसारख्या समाजसेवकाकडे कसलाही उद्योगधंदा न करता सोळा लाखाची गाडी आलीच कशी हा प्रश्न पडला होता.

भाषणं संपता संपत नव्हती. दुपारचे दोन वाजून गेले.तोपर्यंत समोर उन्हात बसलेले आदिवासी कंटाळून गेल्याचं तुषारला स्पष्ट जाणवत होतं.तो स्वतःही कंटाळून गेला होता.कार्यक्रम वस्त्रदानाचा आहे की राजकीय पक्षांच्या प्रसिध्दीचा हेच त्याला कळेनासं झालं.

शेवटी एकदाची भाषणं संपली.मग मंत्री,खासदार ,आमदार आणि प्रतिष्ठितांच्या हस्ते वस्त्रदान झालं.आदिवासींना कपडे देतांना प्रत्येक पुढारी हौसेने फोटो काढून घेत होता. कपडे वाटून झाले आणि ज्याची तुषार आतुरतेने वाट पहात होता तो क्षण आला.सगळ्या वस्त्रदात्यांना बोलावून प्रतिष्ठितांसोबत फोटोसेशन झालं.मंत्री,आमदार, खासदारांसोबत फोटो काढून घ्यायची प्रत्येकाला घाई झाली होती.त्यासाठी प्रचंड रेटारेटी सुरु होती.ही समाजसेवा आहे की पब्लिसिटी स्टंट हेच तुषारला समजेनासं झालं.कपडे मिळालेले आदिवासी केविलवाण्या नजरेने हा तमाशा पहात होते.

वैतागलेल्या अवस्थेत तुषार घरी आला.कार्यक्रम कसा झाला हे शितलला सांगण्याचीही त्याला इच्छा उरली नाही.

दुसऱ्या दिवशी तो उत्सुकतेने सात आठ वर्तमानपत्रं विकत घेऊन आला.बातमी होती पण सर्व वर्तमानपत्रात मंत्री,आमदार,खासदार आणि त्यांच्यासोबत प्रतापचे फोटो होते.एकाही वर्तमानपत्रात तुषारचा फोटो नव्हता.चमकोगिरी करणाऱ्या या लोकांचा त्याला संताप आला.त्या संतापातच त्याने प्रतापला फोन लावला.त्याने तो उचलला नाही. तीन चार वेळा प्रयत्न केल्यावरच त्याने तो उचलला.

” यार प्रताप ज्यांनी कपडे दान केले त्यांचा कुणाचाच फोटो पेपरमध्ये नाहीये.सगळे मंत्री आणि आमदार,खासदारांचेच फोटो आहेत.” तुषार जरा रागानेच बोलला.

” हो मी पाहिले फोटो.आपण तर सगळे फोटो दिले होते.पण जागेअभावी त्यांनी ते दिले नसावेत.आणि हे तर तुलाही माहितेय तुषार की न्युज व्हँल्यू असल्याशिवाय पेपरवाले कोणतेही फोटो आणि बातमी टाकत नाहीत आणि राजकारणी व्यक्तींशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला न्युज व्हँल्यू येत नाही म्हणून त्यांचेच फोटो पेपरमध्ये टाकावे लागतात.हाच कार्यक्रम आपण राजकारणी पुढाऱ्यांना न बोलावता केला असता तर वर्तमानपत्रांनी त्या कार्यक्रमाची दखलसुध्दा घेतली नसती किंवा घेतलीही असती तर ती बातमी अगदी छोटीशी एखाद्या कोपऱ्यात टाकली असती.अशा बातमीला काहीच किंमत नसते “

तुषार काय समजायचं ते समजला.जे खरे दानी होते त्यांना कुणीही किंमत देत नव्हतं.भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या,जनतेच्या पैशावर ऐश करणाऱ्या, गरीबांचा वाली असण्याचं सोंग घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे आणि स्वतःच्या प्रसिध्दीसाठी समाजसेवेचं नाटक करणाऱ्या प्रतापसारख्या समाजसेवकांचे फोटो मात्र वर्तमानपत्रात दिमाखात झळकत होते.तुषारने न बोलता फोन कट केला.या अशा दिखावू समाजसेवेत फक्त वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळते म्हणून सहभागी झाल्याबद्दल त्याने स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहीली.

दुसऱ्या दिवशी तो शितलला म्हणाला “अगं,आपल्या कामवालीला तिच्या नवऱ्याचे आणि मुलांचे जुने कपडे मापासाठी आणायला सांग.मी माझ्या काही मित्रांशी बोललोय.ते त्यांचे जुने कपडे देणार आहेत “

शितलला एकदम हायसं वाटलं.

“चला बिचारीची दिवाळी आनंदात तरी जाईल ” ती समाधानाने म्हणाली.

धनतेरसच्या दिवशी तुषारने शितलला सांगून कामवाली आणि तिच्या कुटुंबाला घरी बोलावून घेतलं.त्यांना बसायला सांगून तुषार घरातून कपड्यांच्या पिशव्या घेऊन आला.त्याच्या हातातल्या रेडिमेड कपड्यांच्या  पिशव्या पाहून शितलला आश्चर्याचा धक्काच बसला.

“अहो हे तर नवे कोरे कपडे दिसताहेत.तुम्ही तर जुने कपडे देणार होतात ना?”

” हो शितल.पण माझ्या लक्षात आलं की यांना जुने कपडे द्यायचे आणि आपण मात्र नवीन कपड्यांनी दिवाळी साजरी करायची?माझ्या मनाला ते पटेना म्हणून त्यांच्या मापाचे नवीन कपडेच विकत घेऊन आलो “

कामवालीचे आणि तिच्या नवऱ्याचे डोळे अश्रूंनी भरुन आले.तिच्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.तुषार त्यांना कपडे देत असतांनाच शितल आतून नवीकोरी साडी घेऊन आली आणि कामवालीला देऊन म्हणाली, ‘”सगळ्यांना नवीन कपडे झाले मग तूच कशाला मागे रहातेस?तुही नवीनच साडी घे.”

तेवढ्यात आकाश मोबाईल घेऊन पुढे आला.

” थांबा आई बाबा .कपडे देतांना फोटो काढू या”

तुषार त्याला थांबवत म्हणाला, “नको बेटा फोटो नको काढू.ही काही राजकारण्यांची दिखावू आणि स्वार्थी समाजसेवा नाहीये.हे माणुसकीचं वस्त्रदान आहे “

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-1 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-1 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

(गदिमांच्या आंघोळीच्या ‘मिशा’ ते ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’.) 

गदिमांच्या आयुष्यात घडलेल्या काही गंमतशीर गोष्टी, त्यांच्या काही सवयी ज्या तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील !.

गदिमांना त्यांच्या मित्रांना गंमतशीर नावांनी हाक मारण्याची सवय होती. नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मधुकर कुळकर्ण्यांना “पेटीस्वारी”, राम गबालेंना “रॅम् ग्याबल”, वामनराव कुळकर्ण्यांना “रावराव”, पु.भा.भाव्यांना ‘स्वामी’, पु.ल.देशपांड्यांना ‘फूल्देस्पांडे’. राजा मंगळवेढेकर यांना ‘मंगळ’, ‘राजा ऑफ मंगळवेढा’. पंचवटीत येणारा नवखा असेल तर ‘या’ असे भारदस्त आवाजात स्वागत व्हायचे. सलगीच्या लोकांना ‘क्यो गुरू’, ‘काय माकडेराव?’, ‘कसं काय फास्टर फेणे?’ असे स्वागत ठरलेले असायचे. अनेक मित्रांची अशी वेगवेगळी नावे ठरलेली असायची.

पु.भा.भावे म्हणजे गदिमांचे खास मित्र! तेही गदिमांना काही नावाने हाक मारत – गम्पटराव, बुवा, स्वामी, डेंगरु, लाल डेंगा, वुल्फ ऑफ माडगूळ, चित्तचक्षुचमत्कारिक!.. आणि गदिमांकडून चक्क त्या नावांस प्रतिसादही मिळत असे!.

त्या काळात जशी गदिमा-बाबूजी जोडगोळी प्रसिद्ध होती, तशी त्याच्या आधी एक त्रिकुट प्रसिद्ध होते – ‘लाड-माड-पाड’.. लाड म्हणजे गीतरामायणाचे जनक सीताकांत लाड, माड म्हणजे ग.दि.माडगूळकर व पाड म्हणजे पु.ल.देशपांडे!

गदिमा आनंदात असले, कुठले काम किंवा गोष्ट मनासारखी झाली, किंवा आवडली, तर त्यांचे वाक्य असे –  ‘गुड रे, गुड गुड गुड गुड गुड गुड….’, तर कधी ‘बेस्टम बेस्ट आणि कोपरानं टूथपेस्ट!’

एकदा गदिमांचा संबंध कोल्हापूरच्या ‘उत्तमराव शेणोलीकर’ नावाच्या गृहस्थांशी आला. त्यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी त्या नावाचे रूपांतर ‘उत्तमराव’ –> ‘बेष्टराव’ शेणोलीकर असे करून टाकले. घरात कुठला चांगला पदार्थ झाला की त्यांचे पेट वाक्य ठरलेले असे, ‘एकदम ‘बेष्टराव शेणोलीकर’ झाला आहे!’

गदिमांना एक फोन आला, त्यांनी स्वतःच उचलला, समोरून आवाज आला, “मला ग.दि.माडगूळकर यांच्याशी बोलायचे आहे. मी ‘सत्येन टण्णू बोलतो आहे.” गदिमांना वाटले कोणीतरी गंमत करतो आहे. त्यांनी हे आडनाव ऐकले नव्हते. ते लगेच उत्तरले, “मी माडगूळकर अण्णू बोलतो आहे, बोला!”

गदिमांनी मराठी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवले होते. ते इतके व्यस्त असत की, सकाळी एक, दुपारी एक व रात्री एक अश्या तीन चित्रपटांच्या कथा ते दिवसभरात लिहायला बसत. कधी कधी त्यात साहित्यिक कार्यक्रम असत. ते १२ वर्षे आमदार होते, त्या संबंधित कार्यक्रम असत. ते तयार होत. जाणे आवश्यक असे, पण कंटाळले की तयार होऊन म्हणत, ‘आम्ही नाय जायचा’, नाही जायचा की अजिबात नाही जायचा…’ मग अगदी मुख्यमंत्र्या॓चीही भेट ठरलेली का असेना!

बऱ्याच वेळा सकाळी उठल्यापासून मित्रांच्या बैठकी रंगत. विद्याताई मधूनच राहिलेल्या आंघोळीची आठवण करत. शेवटी गदिमा नाखुषीने उठता उठता म्हणत, ‘पाच मिनिटात आंघोळीच्या मिशा लावून येतो!’ ‘आंघोळीच्या मिशा’ हे एक गंमतशीर प्रकरण होते. एक गाणे होते गौळण खट्याळ कृष्णाला यमुनेच्या काठावर लाडिक रागाने म्हणत असते, ‘आंघोळीच्या मिषाने भिजविलेस अंग…’ पण एकदा गदिमांच्या नेम्याला (नेमीनाथ उपाध्ये उर्फ पुणे आकाशवाणीचे ‘हरबा’) प्रश्न पडला की ‘आंघोळीच्या मिशा’ कसल्या?  आणि तेव्हापासून गदिमा ‘आंघोळीच्या मिशा लावू का?’, ‘आंघोळीच्या मिशा लावून टाकतो म्हणजे सुटलो’, अशीच स्नानाच्या बाबतीत भाषा वापरत असत.

गदिमांचे एक मित्र होते ‘बाळ चितळे’ नावाचे. त्यांची एक वेगळीच तऱ्हा होती. सगळ्यांसारखे न करता वेगळे काहीतरी करायचे. उदा. सगळेजण हॉटेलमध्ये गेले आहेत व सगळ्यांनी डोसा मागविला, तर हे मिसळ मागविणार! अगदी सगळे करतील, त्याच्या बरोबर उलटे करायचे. यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आमच्या घरात कोणी असे वेगळे वागायला गेला की त्याला ‘बाळ चितळे’ ही पदवी मिळत असे!.

गदिमांना कधी कधी छोटे अगदी सर्दीसारखे आजार पण सहन होत नसत. मग अगदी शिंक आली तरी त्यांचे मरणवाक्य सुरू होई, ‘मरतंय की काय आता!’ बिलंदरपणा हा त्यांच्यात ठासून भरलेला होता. हे सर्व गुण जन्मजात माडगूळच्या मातीतून आलेले होते. एकदा माडगूळ गावात सभा झाली. सभेनंतर एकाने टेबल-खुर्ची-सतरंजी या सकट अध्यक्ष, वक्ते यांचे आभार मानले. ते आभाराचे भाषण सीतारामबापू नावाच्या सरपंचाना इतके आवडले की, पुढे बोलताना बापू आभार शब्दाशिवाय बोलेनासेच झाले. अगदी त्यांना कोणी सांगितले की, ‘अमक्या तमक्याला मुलगा झाला’. तर ते चटकन म्हणायचे, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ कोणी बातमी दिली की कडब्याच्या गंजीला आग लागली, तर बापू झटक्याने म्हणणार, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ शेवटी सगळ्या गावाने त्यांचे नाव ‘आभार सीताराम’ असे ठेवले होते. तर सांगायचे असे की, हे विनोदी गुण बहुतेक गदिमांना आपल्या गावाकडच्या मातीतून व माणसांकडून उपजतच मिळाले होते.

गदिमांच्या धाकट्या भावाचे लग्न होते. वऱ्हाड घेऊन मंडळी लग्नघरी गेली. नवरा मुलगा बघायला नवरीच्या मैत्रिणींची पळापळ सुरू झाली. नवरा मुलगा कुठला, हे कोणालाच माहीत नव्हते. एक कोणीतरी मैत्रीण मोठ्याने गावाकडच्या टोनमध्ये म्हणाली, ‘कोन्ता ग कोन्ता?’ झालं. पुढचे अनेक दिवस कुठल्याही बाबतीत चौकशी करायची असेल तर गदिमांचे वाक्य तयार असे ‘कोन्ता ग कोन्ता?’ एखादे वाक्य दुसऱ्याला कंटाळा येईपर्यंत लावून धरणे, हे आम्हा माडगूळकरांचे खास वैशिष्ट्य!.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री सुमित्र माडगूळकर

प्रस्तुती : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

बापाच्या काळजावरचा गोवर्धन ! – भाग – 1 ☆ श्री संभाजी बबन गायके 

वासुदेव दादाला शब्द दिला होता खरा…पण प्रत्यक्षात तो शब्द पाळण्याची वेळ आली तेंव्हा यशोदेच्या शेजारून तिला अलगद उचलताना हात प्रचंड थरथरू लागले!

पुरूषांचं काळीज पाषाणाचं असतं तसं माझंही असेल असा माझा समज होता. पण याच पाषाणातून कधी माया पाझरू लागली ते माझं मलाही समजलं नाही…होय माझ्या पोटी माया उपजली आहे!

आणि या पाझरानं आजच्या या भयाण रात्री महाप्रलयाचं रूप धारण केलं आहे. यमुनेच्या उरात जलप्रलय मावत नाहीये. तिला आणखी दोनचार काठ असते तरीही ते तिला अपुरेच पडले असते त्या रात्री. वीजांचा एरव्ही लपंडाव असतो पावसाच्या दिवसांत. पण आज त्या लपत नव्हत्या…आभाळात ठाण मांडून होत्या! एक चमकून गेली की तिच्या पावलावर पाऊल टाकून दुसरी वीज धरणीला काहीतरी सांगण्याच्या आवेगात आसमंत उजळून टाकीत होती. या दोन क्षणांमधल्या अवकाशातच काय ती अमावस्या तग धरून होती. अमावस्येला निसर्गाने जणू आज खोटं पाडण्याचा चंग बांधला होता. अमावस्या म्हणजे काळामिट्ट अंधार….पण आजच्या रात्री अंधाराने काळेपणाशी फारकत घेतली होती….जगाचं माहित नाही…पण मला तरी स्पष्ट दिसत होतं…सारं काही!

दूर मथुरेच्या प्रासादातले दिवे लुकलुकत होते. आणि तिथून जवळच असलेल्या कारागृहाच्या भिंतीवरच्या पहारेक-यांच्या हातातील मशाली लवलवत होत्या…काहीतरी गिळून टाकण्यासाठी. या कारागृहाने आजवर सात जीव गिळंकृत केले होतेच. त्याच्या भिंतींवर रक्ताचे डाग सदोदित ताजेच भासत असत. सुरूवातीपासून आठ जन्म मोजायचे की शेवटापासून मागे मोजत यायचे हा प्रश्न नियतीने कंसाच्या मनात भरवून दिला होता. पाप कोणताही धोका पत्करत नाही. धोका पत्करण्याचा मक्ता तर पुण्याने घेतलेला असतो. पापाला अनेक सल्ले मिळतात आणि पुण्याला सल्ल्याची आवश्यकताच नसते.!

आज देवकी गर्भारपणाच्या नवव्या महिन्यानंतरच्या नवव्या दिवसात गवताच्या गंजीच्या बिछाण्यावर

निजून आहे. आणि याची तिला सवय झालीये गेल्या सात वर्षांपासून. खरं तर ती राजकन्या. सोन्याचा पलंग आणि रेशमाची सेज तिच्या हक्काची होती. पण दैवगतीपुढे तिचाही नाईलाज होता. तिची कूस माध्यम होणार होती एका धर्मोत्थानाची. पण त्यासाठी तिला एक नव्हे, दोन नव्हे तर आठ दिव्यांतून जावे लागणार होते. पण कसं कुणास ठाऊक आज तिला प्रसुतीपूर्व कळा अशा जाणवतच नव्हत्या..आधीच्या खेपांना जाणवल्या होत्या तशा. आज अंगभर कुणीतरी चंदनाचा लेप लावल्यासारखं भासत होतं. रातराणी आज भलतीच बहरलेली असावी कारागृहाबाहेरची. पहारेकरी देत असलेले प्रहरांचे लोखंडी गोलकावरचे कर्णकर्कक्ष ठोके आज तसे मधुर भासत होते. घटिका समीप येऊ लागली होती. आज तो येणार..आठवा! त्याच्या आठवांनी आत्मा मोहरून गेला होता. पावसाची चिन्हं होती सभोवती आणि वा-यातून पावा ऐकू येऊ लागला होता.

यशोदेच्या दालनाबाहेर मी दुस-या प्रहारापासूनच येरझारा घालीत होतो, याचं सेविकांना आश्चर्य वाटत नव्हतं. या गोकुळाच्या राज्याला वारस नव्हता लाभलेला अजून. बलराम होता पण तो यशोदेचा नव्हता. वासुदेवाचा होता. आम्हांला आपलं बाळ असण्याचा कित्येक वर्षांनी योग आला होता. राजाला चैन कसे पडेल? त्यात हा पाऊस! एखाद्या अनाहूत पाहुण्यासारखा….घडणा-या सर्वच घटनांचा साक्षीदार होण्याचा प्रयत्न करणारा. तो जा म्हणता जाणार नाही!

मध्यरात्र जवळ येऊन उभी आहे सर्वांगी थरथरत. तिलाही जाणीव झालेली असेलच की तिच्या उदरातून उदय होऊ पाहणा-या विश्वाची. माझ्या महालाबाहेर पहा-यावर असणारे गोपसैनिकही आता पेंगळून गेले आहेत. दिवसभर गायी चारायला जाणारी आणि दिवेलागणीला गोकुळात येणारी माणसं ती. त्यांनाही प्रतिक्षा होती त्यांच्या राजाच्या भविष्याची. सुईणी तर दुपारपासूनच सज्ज होत्या. दासी आज त्यांच्या घरी जाणार नव्हत्या. कोणत्याही क्षणी जन्माचं कमलदल उमलेल ते सांगता येत नव्हतं. गोठ्यांतील गायींचाही आता डोळा लागलेला असावा कारण त्यांचं हंबरणं कानी येईनासं झालं होतं आणि त्यांच्या वासरांचे नाजूक आवाजही. पोटभर दूध पिऊन झोपली असतील ती लेकरं.

यशोदेला कळा सुरू होऊन आता तसा बराच उशीर झाला होता. ती प्रचंड अस्वस्थ होती पण तिच्या डोळ्यांत आज निराळीच चमक. अंग चटका बसावा इतकं उबदार लागत होतं. सुईणी सांगत होत्या तशी यशोदा कळा देत होती पण तिची सुटका काही होत नव्हती.

माझी एक नजर यशोदेच्या कक्षातून येणा-या आवाजाकडे तर एक नजर यमुनेपल्याडच्या काठाकडे खिळून राहिलेली होती. आज त्या काठावरून या गोकुळाच्या काठावर प्रत्यक्ष जगत्जीवनाचं आगमन होणार होतं. पण यमुना तर आज भलतीच उफाणलेली! तिला काय झालं असं एकाएकी. असे कित्येक पावसाळे पाहिले होते मी आजवर पण आजचा पाऊस आणि आजची यमुना…न भूतो! पण माझी ही अवस्था कुणाच्या ध्यानात येण्यासारखी परिस्थिती नव्हती. यशोदा तर भानावर असण्याचा प्रश्नच नव्हता. एका जीवाला जन्माला घालताना तिचा जन्म पणाला लागलेला होता.

कळा देऊन यशोदा क्लांत पहुडलेली….सुईणीच्या,दासींच्या पापण्या अगदीच जडावलेल्या होत्या. मानवी देहाच्या मर्यादा त्यांनाही लागू होत्या. त्या निद्रेच्या पांघरूणाखाली गडप झाल्या…तारका काळ्या ढगांनी व्यापून जाव्यात तशा. त्या रात्रीतील सर्वांत मोठी वीज कडाडली आणि इकडे यशोदा प्रसुत झाली….आणि लगोलग तिला बधिरतेने व्यापलं…ती स्थळ-काळाचे भान विसरून गेली. गायींसाठीच्या चा-याचं प्रचंड ओझं डोक्यावरून खाली उतरवून एखादी गवळण मटकन खाली बसावी तशी गत यशोदेची. बाळाच्या श्वासांचा स्पर्श गोकुळातल्या हवेला झाला आणि सर्वकाही तिच्या प्रभावाखाली आलं. मायेचा प्रहर सुरू झाला होता…गोकुळ भारावून गेलं होतं…निपचित पडलं होतं आणि माया गालातल्या गालात मंद स्मित हास्य करीत कक्षाच्या दरवाज्याकडे पहात होती.

मी लगबगीने आत शिरलो तसा माझ्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश आला. डावा हात डोळ्यांवर उपडा ठेवीत ठेवीत मी यशोदेच्या पलंगापर्यंत पोहोचलो…ती निपचित झोपलेली…तिच्या चेह-यावर पौर्णिमेचं चांदणं.

मला आता थांबून चालणार नव्हतं. वासुदेव यमुना ओलांडून येतच असावा….मला यमुनातीरी पोहोचलं पाहिजे. आणि मी लगबगीनं बाळाच्या मानेखाली हात घातला आणि तिच्या डोळ्यांकडे लक्ष गेलं. कक्षातील दीप अजूनही तेवत होते. बाहेरचा थंड वारा गवाक्षांचे पडदे सारून आत घुसण्याचा प्रयत्न करीत होता. हे तर मुलीचे डोळे….माझ्या मुलीचे डोळे! डोळ्यांच्या मध्यभागी जणू सारी काळी यमुना जमा झालेली. आणि त्या दोन डोहांभोवती पांढरे स्वच्छ काठ. आता मात्र माझी नजर खिळून राहिली….मी सारे काही विसरून जातो की काय असं वाटू लागलं. आणि ठरलंही होतं अगदी असंच…मी सारं काही विसरून जाणार होतो नंतर.

मायेच्या पुरत्या अंमलाखाली जाण्याआधी तिला उचलली पाहिजे सत्वर असं एक मन सांगत होतं पण बापाचं काळीज….गोकुळाच्या वेशीवर असलेला सबंध गोवर्धन येऊन बसला होता काळजावर. आणि तो हलवायला अजून कृष्ण गोकुळात यायचा होता! तोपर्यंत हे ओझं मलाच साहावं लागणार होतं!

वासुदेवाला शब्द देताना किती सोपं सहज वाटलं होतं सारं! दैवाची योजनाच होती तशी. मथुरेत देवकीनंदन येतील आणि गोकुळात नंदनंदिनी. तो वासुदेव-देवकीचा आठवा तर ही माझी,नंद-यशोदाची पहिली! बाप होण्याची स्वप्नं पाहून डोळे आणि मन थकून गेलं होतं. यशोदा गर्भार राहिल्याचं समजताच मला आभाळ ठेंगणं झालेलं होतं. गाईला वासराशिवाय शोभा नाही आणि आईला लेकराशिवाय. शेजारच्या गोठ्यांतील गायींची वासरं पाहून इकडच्या गायी कासावीस झालेल्या पाहत होतो मी. आणि आता माझा मळा फुलणार होता…..मी आणि यशोदा..आमच्या दोघांच्या मनांची रानं अपत्यप्राप्तीच्या सुखधारांनी आबादानी होऊ पहात होती. स्वत:च्या शिवारात आता स्वत:ची बीजं अंकुरणार होती…ही भावना ज्याची त्यालाच समजावी अशी!

कंसाने सात कळ्या खुडून पायातळी चिरडल्या होत्या आणि आता फक्त एक कळी यायची होती वेलीवर. काटेरी कुंपणाआड वेल बंदिस्त होती. वा-यालाही आत जाण्यास कंसाची अनुमती घ्यावी लागत होती. देवकीच्या उदरातून अंकुरलेला जीव मोठा होऊन त्याला संपवणार होता म्हणून तो मोठा होऊच द्यायचा नाही असं साधं सरळ गणित त्याचं. योगायोगच म्हणावा की यशोदाही याचवेळी आई होणार होती. पण मीही बाप होणार होतो याचा मला विसरच पडून गेला होता म्हणा !

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares