हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 142 ☆ # लिव-इन और ब्रेक-अप… # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी समसामयिक घटना पर आधारित एक भावप्रवण कविता “# लिव-इन और ब्रेक-अप… #”

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 142 ☆

☆ # लिव-इन और ब्रेक-अप… #

महानगर की चकाचौंध में

दो पंछी उड़ रहे थे

कभी-कभी, कहीं-कहीं पर

आपस में जुड़ रहे थे

बार-बार टकराने से

दोनों हिल गये

उनके बेकाबू दिल

आपस में मिल गये

प्यार की सौंधी-सौंधी खुशबू से

सराबोर हुए

बार-बार मिलने को

बेकरार हुए

मल्टीनेशनल कंपनी में

कार्यरत थे

मोटी तनख्वाह के कारण

जीवन में मस्त थे

दोनों लिव-इन-रिलेशनशिप में

रहने लगे

प्यार के समंदर में बहने लगे

कुछ समय जवानी की

रंगीनियों में बीत गया

प्यार का खुमार भी

धीरे-धीरे रीत गया

तब

दोनों के बीच दूरियां बढ़ गई

‘रिलेशनशिप’ इगो की भेंट चढ़ गई

दोनों लड़कर एक दूसरे से

अलग हो गए

प्यार भरे रिश्ते

कहीं खो गए

 

आजकल लिव-इन और

ब्रेक-अप साथ साथ चल रहे हैं

युवा पीढ़ी के रिश्ते

हर रोज जल रहे हैं

क्या युवा पीढ़ी

विवाह का अर्थ

समझ पायेंगे?

पति-पत्नी के

संबंधों को निभायेंगे ?

या

लिव-इन और ब्रेक-अप के

जाल में फँसते ही जायेंगे ?/

© श्याम खापर्डे

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सत्य… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सत्य ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

जेव्हा जेव्हा दर्पणी बघते

आयन्यात मी रूप पाहते

सांगे दर्पण मजसी हासून

कशास बाई असे मुखवटे

 

यौवन आता तुझे संपले

वेलीवरचे फूलही सुकले

कशास आता रंगरंगोटी

केस रुपेरी भाळी चमकले

 

सुरुकुतलेले तुझे वदन

त्या वदनाला कशास आवरण

सर्वांगावर जरा पसरली

कुठे कुठे तू देशील लिंपण

 

उघड मनाच्या कवाडाला

स्वीकारून तू सत्याला

जगत रहा क्षण आनंदाचे

खुलवील तुझ्या रूपाला

 

सुविचारांचे देणे घेणे

तुझे हासणे तुझे बोलणे

सन्मान तुझ्या व्यक्तित्वाला

वदनावरती तेज विलसणे

 

घटका जाती पळे जाती

वय वर्षे हरवती

हरित तृणांच्या मनावरती

आयुष्ये खेळती

 

आरशाने कथन केले

सत्य उपदेशीले

कधीच नाही खोटे बोलत

आता मी जाणीले

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

राज कपूर, हिंदी चित्रपट सृष्टीचा शोमॅन. सगळे कलाविष्कार शो करणारा तो शोमॅन राजकपूर. त्या कलाकाराचे कौतुक करायला कवी निशिकान्त श्रोत्री यांनी वाहिलेल्या अनोख्या काव्यांजलीचे रसग्रहण करायचा मला मोह झाला….

कलाविश्वात आणि मनोरंजन विश्वात चित्रपटसृष्टीचे स्थान खूपच वरचे आहे. उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करणारे प्रतिभावंत लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री यांची मोठी  आहे मांदीयाळी आहे. राज कपूर हे यातलेच एक लोकप्रिय नाव.  ‘राजकपूर’ ही डॉ. निशिकांत श्रोत्री यांची  एक आगळी वेगळी कविता आहे. राजकपूर म्हणजे एक यशस्वी अभिनेता, निर्माता, आणि दिग्दर्शक. त्याच्या अनेक सिनेमांनी यशाचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. यातीलच अतिशय गाजलेले तीन यशस्वी चित्रपट म्हणजे आवारा,  श्री ४२०, जागते रहो. याच तीन चित्रपटांच्या कथानकावर आधारित,   एकदम वेगळेच हटके काव्यसूत्र असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे.

☆ राजकपूर … कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||ध्रु||

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी    ||१||

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||२||

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||३||

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री

मो. ९८९०११७७५४

☆ शोमॅन…राजकपूर — कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||ध्रु||

चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथानक, संगीत, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असतो. या सर्वच आघाड्यांवर राज कपूरनी वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आणि त्या जास्तीतजास्त लोकप्रिय बनवल्या. त्याच्या गाणी आणि संगीतांने बहार उडवून दिली. राज कपूर यातला एक चांगला जाणकार होता. मूळामध्ये तो एक अस्सल हिंदुस्तानी कलाकार होता. एक यशस्वी चित्रपट कसा बनवायचा यात तो माहीर होता. म्हणून तो ‘या सम हा !’ अशा पदापर्यंत पोहोचला होता.

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||१||

प्रत्येक जीवाला आयुष्यात वात्सल्याची ओढ असते. तितकीच प्रेमाची, मायेची पण आस असते. यासाठी फक्त नातीच गरजेची नसतात तर त्या बरोबरीने चांगले संस्कारही होणे खूप गरजेचे असते. हाच संदेश विनोदी ढंगाने हसवत हसवत  ‘आवारा’ हा सिनेमा देतो. ही गोष्ट कवीने अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितली आहे. माणूस प्रेम, वात्सल्य, माया मिळाली की शांत, संयमी, विवेकी बनतो. या उलट यापासून वंचित असणारे जीव भडक स्वभावाचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनतात. प्रेम, जिव्हाळाच त्यांना पुन्हा सन्मार्गावर आणतो. हेच रंजक पद्धतीने हा सिनेमा सांगतो. प्रेक्षकांची अचूक नस ओळखून अतिशय मनोरंजक पद्धतीने कथानक फुलवत नेलेले आहे. अर्थपूर्ण गाणी आणि श्रवणीय संगीताने चित्रपट खूप लोकप्रिय झाला.

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||२||

राज कपूरचा दुसरा लोकप्रिय चित्रपट म्हणजे श्री ४२०. त्याचीच ही कथा. देशामध्ये बेकारी वाढल्यामुळे त्यात शिकलेले लोकही भरडले जातात. अशावेळी धन दांडगे लोभापायी त्यांची फसवणूक करतात. दीनदुबळ्यांची परिस्थिती आणखीनच हलाखीची बनते. ही सर्व परिस्थिती कवीने पहिल्या दोन ओळींमध्ये नेमक्या शब्दात वर्णन केलेली आहे. हे पाहून नायक  धनाढ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. अगदी चारसोबीसी करून गरिबांना न्याय मिळवून देतो आणि तो श्री चारसोबीस ठरतो. कारण तो सर्व सामान्यांसाठी लढणारा एक सर्वसामान्य नायक असतो.

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||३||

धनाढ्यांच्या मुखड्यामागे पाप दडलेले असते त्यामुळे गरजवंत कायम वंचितच रहातात. पण हा काळा पैसा, ही बनवेगिरी या मागचा खरा गुन्हेगार कोण ते कळतच नाही. या खोट्या मुखवट्यां मागचे खरे चेहरे आणि बंद दाराच्या आत चालणारे भ्रष्ट उद्योग बघून नायक सर्व सामान्यांना त्याची जाणीव करून देतो आणि जागते रहो अशी साद घालतो. राज कपूरच्या ‘ जागते रहो ‘ चित्रपटाची ही कहाणी. कवीने अतिशय मोजक्या पण अचूक शब्दात ती सांगितली आहे.

सर्व सामान्यांची दीनदुबळी दुनिया त्याच वेळी धनाढ्य, ढोंगी, अत्याचारी लोकांचे अन्यायी जग आणि या अन्यायाविरुद्ध झगडणारा सामान्यातलाच एक नायक हे या तीनही चित्रपटातले सूत्र आहे. केवळ चार ओळींमध्ये ते नेमके कथानक सांगणे हे कवीचे खास कसब आहे. कसलेही बोजड शब्द, अलंकारिक भाषा न वापरता साध्या सरळ शब्दात सहजपणे पण परिणामकारक पद्धतीने ते सांगितले आहे. एक लयबद्ध अशी ही कविता राज कपूरच्या चित्रपट कारकीर्दीतील या तीन महत्त्वाच्या सिनेमांची उत्तम दखल घेणारी आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – पाऊस…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – पाऊस…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

पाऊस सगळीकडे सारखाच पडतो.. बालपणात कोसळणाऱ्या पाऊस धारा कागदी होडी करून अंगणातल्या पाण्यात सोडणारा हा पाऊस, कसलीच कोणतीच तमा न बाळगणारा चिंब भिजून आनंदाने उड्या मारणारा हा पाऊस.. नकळत आपलं बालपण डोळ्यासमोर आणतो.. . आपलं लेकरू पावसात भिजून आजारी पडेल म्हणून काळजी करणाऱ्या आई कडे दुर्लक्ष करून हे बालिश बालपण ये आई मला पावसात जाऊदे! एकदाच ग  भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे .. म्हणत पावसाचा आनंद घेत उड्या मारत राहतं.. पावसात चिंब भिजून कुडकुडत आईच्या पदराची  ऊब मिळताच मात्र समाधानाने आईच्या कुशीत शिरतो तो अल्लड बालिश पाऊस.. . आईचा लाडिक ओरडा आणि सोबत मायेने भरलेला उन उन दुधाचा पेला पिवून दुसऱ्या दिवशी पुन्हा पावसात भिजण्याची स्वप्न बघत मायेच्या कुशीत शिरणारा बालिश पाऊस वेगळ्याच दुनियेची सफर घडवतो.. . कॉलेज च्या खिडकीतून कोसळणाऱ्या पाऊस धारा पाहून नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली तरुण पोरं पोरी प्यार हुवा इकरार हुआ म्हणत एकच छत्रीत आपल्या प्रियकर/ प्रेयसी सोबत नव जीवनाची स्वप्न पाहणारा हा पाऊस रोमँटिक होऊन जातो.. गुलाबी प्रेमाची बरसात करणाऱ्या ह्या पावसाच्या सरी मोगऱ्याचा गंध घेऊन येतात.. नुकतीच लग्न बंधनात बांधली गेलेली जोडपी त्यांच्यासाठी हा पाऊस वेगळचं गोड स्वप्न घेऊन येतो.. खिडकीतून बरसणाऱ्या जलधारा पाहताना आपल्या सख्याची वाट बघणारा स्वप्नाळू पाऊस, दमून भागून आलेला आपल्या सख्याची एक प्रेम भरली नजर पडताच ह्या प्रेम सरीत चिंब भिजून जाते.. पाऊस किती स्वप्न, किती नव्या आशा घेऊन येतो.. हाच पाऊस म्हातारपणात मात्र जून्या आठवणींना उजाळा देत कानटोपी आणि शाल शोधत बसतो.. पावसाची चाहूल लागताच छत्री, रेनकोट यांची तजवीज करू पाहणारा पाऊस आपलं वय वाढलंय ह्याची जाणीव करून देतो.. शेतकरी राजासाठी तर पाऊस म्हणजे निसर्गाचं वरदान च जणू.. पावसाच्या प्रतिक्षेत काळ्या मातीची मशागत करू लागतो.. पावसाची पहिली सर कोसळताच पेरणीसाठी लगबग करवणारा हा पाऊस.. नवीन आशा, नवीन स्वप्नं घेऊन येतो.. कधी ह्याचं रौद्र रूप अनेकांना रडवतं, अनेक संसार उध्वस्त करतं, कधी  किती तरी सप्नांची राखरांगोळी होते.. मृत्यूचा खेळ असा काही रंगतो की अश्रुंच्या सरी वर सरी बरसु लागतात.. पाऊस काय किंवा नैसर्गिक कोणतीही आपत्ती काय? ह्या सगळ्या आपत्तीसाठी कुठे तरी आपण मनुष्य च कारणीभूत आहे हे मात्र सोयीस्कररीत्या विसरतो.. पावसाळा आला की अनेक पर्यावरणप्रेमी मंडळी वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम घेतात.. एकदा झाडं लावून फोटो काढले आणि स्टेटस ठेवलं की मग वर्षभर मोकळे.. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.. बाकी काहीही असलं तरी पाऊस आणि माणसाचं नातं मात्र अबाधित राहत.. काही वेळा कडू आठवणींसोबत तर बऱ्याच वेळा गोड, गुलाबी आठवणींची बरसात करणारा हा पाऊस आयुष्य जगण्यासाठी नवी प्रेरणा घेऊन येतो हे मात्र नक्की..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

मागील भागात आपण पहिले –  ह्या बघा आमचो मांगर आसा. बंद असता. तुमका जमला तर रवा.

पण भाडा?

ह्या पगारात भाडा काय देतालात ओ? भाडा नको. फत माझो झील आसा आठवीत तेच्या अभ्यासार लक्ष ठेवा. ‘ –  आता इथून पुढे )

हो. हो. निश्चित. पण पाण्याची सोय वगैरे ?

विहीर आसा. भरपूर पाणी. मांगरात एक मोरी आसा. विठू, मास्तरांका मांगर उघडून  दाखव. दुकानदार मिराशी चा नोकर विठू पुढे चालू लागला तसे मास्तर तेच्या मागून गेले. पाटणकरांनी मांगर पाहिला. जागा बरी होती. बाहेर एक खोली आत एक. त्याखोलीत मोरी. मांगराला मागचे दार होते. थोड्या अंतरावर विहीर होती. विहीरीवरुन बायका पाणी नेत होत्या. म्हणजे बायकोला वनिताला सोबतीण मिळणार. पाटणकरांना जागा बरी वाटली. त्यांनी दुकानदार मिराशींना सांगून टाकले. रविवारी सामान घेवून येतो. मिराशी म्हणाले, भाडा नको. पण लाईट बिल तेवढा भरा. पाटणकर घरी जायला निघाले. त्यांचे लक्ष परत त्या छोट्याशा सलून कडे गेले. आता सलून मध्ये कुणीतरी दाढी करायला बसला होता. ह्या व्यवसायामुळे आपली भावंडे, आई-वडिल दोन घास जेवतात. ह्या सलूनाचा पाटणकरांना आधार वाटला.

रविवारी सकाळी पाटणकरांची बायको वनिता आपल्या दोन वर्षाच्या मुलासह एस.टी ने आली. त्याच्या आधी पाटणकर येवून पोचले होते. मिराशींच्या दुकानातील झाडूने त्यांनी मांगर स्वच्छ केला आणि सोबत आणलेल्या कळशीने दोन बादली पाणी भरुन ठेवले. मिराशींच्या बायकोने चूल पेटवायला म्हणून सोडणे, झावळ्या, थोडी लाकडे दिली. वनिता ने सोबत आणलेल्या तांदळाची पेज आणि मिराशींच्या वाट्यावर चटणी वाटली. मिराशींच्या दुभत्या म्हशी होत्या, त्यामुळे दुधाचा प्रश्न मिटला. आणि पाटणकरांचा संसार या नवीन गावात सुरु झाला.

दुसर्‍या दिवशी पाटणकर शाळेत हजर झाले. अकरावी साठी फिजिक्स शिकवायला वर्गात गेले. मुला-मुलींची ओळख करुन घेताना त्यांच्या लक्षात आले की मुल त्यामानाने मोठी आहेत. बहुतेकजण अठरावर्षापेक्षा जास्त वयाची होती. चौकशी करताना समजले, हुशार मुलं दुसरीकडे शिकायला गेली आणि ज्या मुलांना पुढे शिकायच नव्हत ती मुलं या शाळेत येत होती. पाटणकरांनी फिजिक्स मधल सरफेस टेंशन हा धडा शिकवायला सुरुवात केली. त्यांनी फळ्यावर डायग्राम काढून थोड इंग्रजीत, थोड मराठीत शिकवायला सुरुवात केली. काही वेळा नंतर शिकवलेल्या अभ्यासाच्या नोटस् लिहायला घातल्या. सहजच, ते खाली उतरुन विद्यार्थ्यांच्या वह्या बघायला गेले तर त्यांना आश्चर्य वाटले. बहुतेक मुलांनी काहीही वहीत लिहीले नव्हते. मुलांचे म्हणणे त्यांना इंग्रजी लिपी व्यवस्थित येत नाही. त्यांनी एका मुलीला उठविले. अगं, मी घातलेले तु का लिहीत नाहीस?

सर, आमका इंग्रजी येना नाय. मराठी येता. मराठीत अभ्यास घाला.

अगं, पण परिक्षा इंग्रजीत असते. सर्व सायन्स इंग्रजीत शिकावे लागते.

पण आमका इंग्रजीची भिती वाटता.

मग दहावीत पास कसे झालात तुम्ही?

एक मुलगा मागून ओरडला. कॉपी करुन.

म्हणजे?

आमचे इंग्रजी चे शिक्षक चाळीस मार्काचा सगळ्यांका सांगत. म्हणून आम्ही पास झालो.

मग तुम्ही सायन्स ला का अ‍ॅडमिशन घेतलीत?

आमका पुढे नर्सिंग करुचा आसा. बारावी सायन्स झालव की नर्सिंग मध्ये अ‍ॅडमिशन गावतली.

मग बारावी पास व्हायला लागेल ना?

दहावी पास झालव तसे बारावी पास होतोलव.

पाटणकरांनी डोयाला हात लावला. लेचर संपल्यानंतर त्यांना केमिस्ट्री शिकवणारे सावंत सर भेटले. सावंत सर, गेली दहा वर्षे म्हणजे सुरुवातीपासून येथे केमिस्ट्री शिकवत होते.

‘सावंत सर, मी आता अकरावी वर फिजिक्स शिकवण्याचा प्रयत्न केला, पण मुलांना साधं एबीसीडी येत नाही. त्यामुळे मी नोटस् घालत होतो ती कोणी लिहून पण घेतली नाहीत.’

‘त्यात नवीन ते काय? मी गेली दहा वर्षे इथे शिकवतोय. अशीच मुले आहेत या ठिकाणी.’

‘मग, ती बारावी पास कशी होणार?’

‘नाही होईनात. आपल्याला पगार मिळण्याशी मतलब. मी परमनंट शिक्षक आहे. माझ कोणी काही करु शकत नाही आणि  मॅनेजमेंट ने जास्त गडबड केली तर आमची युनियन आहे. मी घाबरत नाही कोणाला. तुझ काय ते बघ कारण तु शिक्षण सेवक.’

‘होय ना, सावंत सर. मी शिक्षण सेवक आहे. मला मॅनेजमेंट विचारत राहणार.’

‘हे बघ पाटणकर, तुला इथे टिकायचे असेल तर सांगतो. तु शिकवण्याचे काम करतो. प्रॅटीकल्स घे. सर्व चाचणी परिक्षेत मुलांना पास कर. अकरावीत सर्वांना पास कर कारण ते तुझ्या हातात आहे. बारावीत बघू, त्यांच्या काय नशिबात असेल ते. दोन वर्षांनी दुसरीकडे नोकरी बघ.’

पाटणकर गप्प झाले. शांतपणे फिजिक्स शिकवू लागले. प्रॅटीकल्स घेऊ लागलेत. चाचणी परिक्षेत मुलांना पास करु लागले.

पाटणकरांची बायको वनिताने आजूबाजूच्या बायकांबरोबर ओळख वाढविली. मिराशींच्या घरी तिचे जाणे येणे होतेच. काही हवे असले तर मिराशींची बायको तिला द्यायची.

संस्थेने पहिले दोन महिने पाटकरांना सहा हजार रुपयाप्रमाणे मानधन दिले. तिसरा महिना संपला चौथ्या महिन्याची दहा तारीख आली तरी पैशाचा पत्ता नाही. वनिता नवर्‍याकडे एकसारखी पैसे मागत होती. घर सामानाला पैसे हवे होते. मिराशींची उधारी चालू होती. भाजीला पैसे हवे होते. दुधाचे पैसे  द्यायचे होते. चौथ्या महिन्याची पंधरा तारीख आली तसे पाटणकर क्लार्क कोळंबकर ना भेटायला गेले.

‘कोळंबकर, अहो माझा पगार नाही दिला. आज पंधरा तारीख. मी माझा संसार कसा चालवू?’

‘अहो, पाटणकर. ह्यो सरकारचो पगार न्हय. एक तारखेक गावणारो. हेका मानधन म्हणतत. मुला जेव्हा फीचे पैसे भरतली त्यातून तुमचा मानधन.’

‘पण केव्हा मिळेल.?’

‘तुम्ही चेअरमनांका विचारा मी काय सांगू?’

दुसर्‍या दिवशी शाळा सुटल्यावर पाटणकर चेअरमनांच्या घरी गेले. तर चेअरमन सोसायटीत गेले होते. पाटणकर चौकशी करत सोसायटीत गेले. चेअरमन दोस्तांसमवेत गप्पा मारत बसले होते. पाटणकरांनी त्यांना नमस्कार केला.

‘हा काय पाटणकर इकडे कसो काय?’

‘साहेब, मागील महिन्यात पगार नाही झाला. पंधरा तारीख आली म्हणून आलो होतो.’

‘हे बघ पाटणकर, शिक्षक सेवकांचो पगार म्हणजे मानधन. एक तारखेक मिळात हेची गॅरंटी नाय. या आधी जे होते तेंका पण वेळेत कधी पैसे मिळाक नाय. मुलांकडून जसे पैसे जमतीत तसे पैसे देणार. संस्थेकडे पैसे नाहीत बाबा. नोकरी स्विकारताना विचार करायला हवा होतास तु. ’

‘पण साहेब, माझ कुटुंब…’

‘हे बघ मी काही करु शकत नाही. तु जा. ’

पाटणकर निराश मनाने बाहेर पडले. घरी येऊन वनिताला सर्व परिस्थिती सांगितली. वनिता दुसर्‍या दिवशी भावाकडे कनेडीला गेली. तिच्या भावाचे कनेडीत आणि कणकवलीत दोन सलून होती. तिने भावाला सर्व परिस्थिती सांगितली.

‘वनिता, भावोजींका सांग. तुमका पगार देनत नाय तर नोकरी सोडा आणि बर्‍यापैकी सलून घाला. मी मदत करतय. अगो, आमच्या धंद्यात काय कमी नाय. दाढी करुक आम्ही चाळीस रुपये घेतो आणि केस कापूक शंभर रुपये. एसी सलून घातला तर केस काळे करुक पाचशे रुपये घेतो आणि लोक आनंदान देतत. दिवसाचो खर्च वजा करुन दीड दोन हजार रुपये खय गेले नाय. ’

‘सांगतय मी तेंका. पण तेंनी शिक्षण घेतला ना. डबल ग्रॅज्युएट आसत. सासर्‍यानी मोठ्या अपेक्षेन एका झीलाक कोल्हापुराक पाठवून शिकवल्यानी. तेंका काय वाटात? वनिताच्या भावाने दोन हजार रुपये दिले आणि वहिनीने तांदूळ, गहू, शेंगदाणे, कुळीथ वगैरे दिले. वनिताला खर म्हणजे भावाकडे मागणे कमीपणाचे वाटत होते. पण नवर्‍याचा पगार सुरु झाला की दादाचे पैसे परत करु असे तिने ठरविले.

संस्थेकडून पगाराचे असेच सुरु होते. दोन महिन्यानी सहा हजार मिळाले पुन्हा दोन महिने नाही. कसा तरी संसाराचा गाडा पाटणकर आणि वनिता ओढत होते. सरकारचे धोरण बदलेल आणि आपणास परमनंट शिक्षकाचा पगार मिळेल या आशेवर ते होते. हळू हळू दसरा, दिवाळी जवळ आली आणि वनिता च्या चुलत बहिणीचे लग्न ठरले. पाटणकरांच्या मावस भावाचे लग्न ठरले. ही तर घरातली लग्ने. लग्नाला जायला हवेच. वनिता नवर्‍याला म्हणाली, ‘आता दिवाळीत दोन लग्ना आसत. घरचीच लग्ना. दागिने जावंदे, खोटे दागिने घालूक येतत. पण कपडे तरी हवेत. माझे साडये जुने झालेत. दोन साड्या, ब्लाऊज, शाम्याक  दोन ड्रेस आणि लग्नाक अहेर करुक होयो. तेनी आपल्या लग्नात अहेर केल्यानी. पैशाची सोय करुक होयी. मागे  दादान पैसे दिल्यान, आता तेच्याकडे परत पैसे कशे मागतले?’

‘नको, आता दादाकडे मागू नको. मी बघतय कोणाकडे तरी.’

पाटणकरांच्या लक्षात आले. आपले दोन सहकारी आहेत. सावंत आणि जांभळे. दोघेही परमनंट आहेत शिवाय जांभळेंची बायको शिक्षिका आहे. म्हणजे पैशाचा काही प्रॉब्लेम नाही.

– क्रमश: भाग २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एका संध्याकाळी सगळी कामं आटोपून मंदिराबाहेरील एका आडबाजूच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.  घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणून मोबाईल काढला…. बघतो तो हँग झालेला… बापरे..  बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे  करायचे? मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालू झाला… वैताग आला… मोबाईल काही सुरु होईना …. 

काय करावं या विचारांच्या  तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं, ‘ कोण हाय …? ‘ मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघून भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी…. 

आधी घाबरलो पण नंतर चिडून विचारलं , “ काय बाई ही काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येऊन अशी अंगावर हात ठेवतेस … घाबरलो ना मी…! “

तशी म्हणाली, “ आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती. या टायमाला मी हितंच बसून भाकर खाती… मापी करा, मी जाती दुसरीकडं … “ मी ओशाळलो, म्हटलं, “ नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे… “

तिला बघून अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो “ डोळे कशानं गेले?”  म्हणाली,” लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं. लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली. नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, १७ वर्साची व्हते मी तवा…. “

“ अरेरे ! तुमच्या आईबापाच्या  आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे. आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर ही वेळ नसती आली… बेअक्कल असतात लोकं…”  मी सहज बोलुन गेलो. 

यावर मला वाटलं माझ्याच सुरात सूर मिसळून ती आता त्यांना शिव्या शाप देईल. पण नाही..  ती म्हणाली, “ नाय वो, कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं… खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटून आपटून माजा बाप गेला …त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं… डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्यापेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया … “ ती हसत म्हणाली…

…. वाईटातून सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती ही बाई ?

तरी मी म्हणालो, “ मग भगताचं काय … ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ? “

म्हणाली, “ आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त … माज्या नशीबाचे भोग हुते ते … त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई… कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई… ! डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणूनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात… आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल…?” 

‘ Intention is important behind every action ‘ .. 

.. या वाक्याचं सार या बाईने किती सहज सांगितले …!!!

“ पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहीही न बघता कशा राहू शकला? “

म्हणाली, “ न बघता? काय बघायचं राहिलंय … आवो सगळं बगुन मनात साटवलंय …. वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय,  पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय …. तुमी काय बगीतलं ह्यातलं …? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ? “

…… तिच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे ! 

“ आज्जी तुमचं लग्न ….? “ मी चाचरत विचारलं… आज्जी म्हणाली, “ झालं हुतं की,  त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला …. पदरात एक पोरगी टाकली. त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती … म्हणलं चला चांगलं दिवस आलं … पन त्योबी दोन वर्षातच गेला…… बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला…. ! “  

“ आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? “  आज्जी भकास हसली, म्हणाली,” तिच्या विसाव्या वर्षी ती गेली तिच्या बापामागं त्याला शोधायला … आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील …. स्वर्गात म्हणं नाच-गाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा…..”  असं म्हणून आज्जी हसायला लागली… 

…. पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना…. इतकं सगळं भोगूनही ही इतकी निर्विकार ! 

“ आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा पण ? “

“ कुणाचाच न्हाई. परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला… आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ… भाकर मिळाली तर म्हणायचं .. आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु….दोष कुनाला द्यायचा न्हाई… वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काही कारणच नाही…” 

“ ते कसं आज्जी ? मला नाही समजलं …”

“ ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन… आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी  बोलता येतंय ना मला ??? “

.. .. काय बोलावं मलाच कळेना. या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? ‘वयामुळं हा पोक्तपणा आला असेल, की भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?’ …. 

…… कारण काहीही असो ..  एवढ्या सुंदर विचारांची, वाईटातून चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी ती आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!!  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ आनंदकंद ऐसा… भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

१८५७ पूर्वीचा भारत

(मागील भागात आपण पाहिले की फॅनी पार्कस् हिला भारतासंबंधी कुतूहल होते. भारतात अनुभवलेल्या विविध विषयांचे सचित्र वर्णन तिने केले आहे. आता त्या पुढील भाग…)

हिंदुस्थानातल्या अनेक प्रकारच्या झाडांची माहिती, त्यांचे उपयोग, धनुष्य बनविण्याची पद्धत, सतार कशी बनविली जाते, स्थानिक भाषेतील म्हणी व वाक्प्रचार असे अनेक विषय फॅनीच्या लिखाणात येतात. वन्य प्राणी, कीटक, जीवजंतू यांचीही ती अभ्यासक होती.

फॅनीने लिहिले आहे की, ‘कंपनी सरकार नेटिवांच्या अंधश्रद्धेचा फायदा उकळते. प्रयागला संगमावर स्नान करण्यासाठी प्रत्येकी एक रुपया कर द्यावा लागतो. एक रुपयात एक माणूस महिनाभर सहज जेवू शकतो हे लक्षात घेतले तर हा कर भयंकर आहे.’

सुरुवातीला आलेल्या काही इंग्रजांनी मुगल राजघराण्यात विवाह केले होते आणि त्यांच्यासारखे ऐश्वर्य उपभोगत होते. अशा अँग्लो- इंडियन्सना व्हाईट मुघल्स म्हटले जाई.

बर्मा वॉरवर गेलेल्या काही परिचितांकडून फॅनीला हिंदू ,बौद्ध देवदेवतांच्या मूर्ती भेट मिळाल्या होत्या. त्यातील एक सोन्याची, काही चांदीच्या आणि बाकी ब्रांझ आणि संगमरवराच्या होत्या. अनेकांनी अशा मूर्ती फोडून त्यांच्या डोळ्यांच्या जागी बसविलेले हिरे काढून घेतले. काही मूर्तींच्या तर डोक्यात हिरे साठवलेले होते. फॅनीने आठवण म्हणून मिळालेल्या मूर्ती तशाच ठेवल्या.

प्रचंड टोळधाडीमुळे फॅनी उदास झाली. त्यावेळेच्या भीषण दुष्काळाचे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. आई- वडील धान्यासाठी, पैशासाठी आपली मुलेही विकत होती.

महादजी शिंदे यांचा दत्तक मुलगा दौलतराव यांची विधवा पत्नी बायजाबाई शिंदे यांची व फॅनीची चांगली मैत्री झाली होती.

हिंदू धर्माप्रमाणेच फॅनीने मोहरमचा सण, त्या मागची कथा, प्रेषितांच्या कुटुंबाची माहिती,शिया आणि सुन्नी यामधील फरक या सगळ्याविषयी लिहिले आहे. वाघाच्या शिकारीच्या अनेक कहाण्या तिने लिहिल्या आहेत. उच्च स्तरातील इंग्रजांची आयुष्यं सुखाची होती. त्यांच्याकडे सगळ्या कामांसाठी नोकर- चाकरांची फौज होती. संस्थानिकांकडून त्यांना किमती हिरे माणके  अशा भेटींनी भरलेली ताटे मिळत असत. इंग्रज परके आहेत, शत्रू आहेत ही जाणीव भारतीय नेणीवेत उरली नव्हती.

तीव्र उन्हाळ्यामुळे आजारी पडून फॅनी मसूरीजवळच्या थंड हवेच्या ठिकाणी जवळपास सहा महिने राहिली. तिथेही तिने पहाडात फिरुन, माहिती गोळा करून तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशाचा आणि हवामानाचा दस्तऐवज करून ठेवला आहे. पहाडातला पाऊस, दरडी कोसळणे भूकंपाचे हलके धक्के, तिथली माणसे, झाडे, इतर वनस्पती, पक्षी, फुलपाखरे या सगळ्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. पहाडी बायकांचे जिणे फार कष्टप्रद असते असेही लिहिले आहे.

फॅनी स्वतंत्र बुद्धिमत्तेची आणि भारताविषयी प्रेम असणारी होती. हा भारत तिचा तिने शोधलेला होता. तीव्र निरीक्षण शक्ती आणि रसाळ लेखणी यामुळे तिचे लेखन आजही टवटवीत वाटते. घोड्यावर बसून फिरणारी, सतार वाजवणारी, उर्दू बोलणारी, सिगरेट ओढणारी, देवळांमध्ये, घाटांवर, बाजारात फिरणारी, गलबत घेऊन एकटीच प्रवासाला जाणारी ही मेम हे भारतीयांसाठीही एक आश्चर्यच होते.

अभ्यासू लेखिका सुनंदा भोसेकर यांचा ऋतुरंगमधील फॅनीने पाहिलेल्या भारतावरील लेख मी वाचला होता. आवडलेल्या लेखांच्या झेरॉक्स प्रति   जमविण्याची मला आवड होती. करोनाच्या कंटाळवाण्या काळात कपाट आवरताना निराश मनःस्थितीत यातील बहुतेक सर्व लेखांना मुक्ती मिळाली .सुनंदाताईंना या लेखासाठी जेव्हा मी मेल केली तेव्हा अगदी तत्परतेने त्यांचे उत्तर आले. हा लेख माझ्या अजून लक्षात आहे याचेच कौतुक करून त्यांनी मला ऋतुरंग आणि शब्द रुची मधील त्यांच्या लेखांची पीडीएफ लगेच पाठविली. त्यांनी असेही कळविले की, फॅनीने पाहिलेल्या भारताचे लेख समाविष्ट असलेले त्यांचे पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. भारतात येऊन गेलेल्या परदेशी प्रवाशांविषयी त्यांच्या स्वतःच्या प्रवास वर्णनावर आधारित लेखमाला या पुस्तकात असेल चंद्रगुप्ताच्या दरबारात आलेल्या  मेगास्थेनिसपासून जहांगीराच्या दरबारात आलेल्या थॉमस रो पर्यंतचे लेख या पुस्तकात असणार आहेत. आपण या पुस्तकाची वाट पाहूया.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईलाही द्यावं कधी माहेरपण… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आईलाही द्यावं कधी माहेरपण… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

कबूल आहे तिचंच असतं घर

पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

 

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी

पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी 

नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी

फार नाही, पुरेल तिला मदत जराशी

लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून

सांगावं मनातलं काही जवळ बसून

ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण

आईलाही द्यावं कधी माहेरपण

 

आई राहून सासरी लेकीला माहेर देते

पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?

जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण

मग आईला कुठलं माहेरपण?

 

तिला ओळखणारं तिचंच अंगण

समजूतदारपणावर विश्वासलेलं मोकळेपण

शरीर मनाला विसाव्याचे क्षण

आईलाही हवं असेल का माहेरपण?

 

आईलाही हवा असेल कधी विसावा

वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा

ज्या हातांना तिनेच लावलंय वळण

आईलाही द्यावं कधी माहेरपण…… 

 

 देवाने एका ‘आई’ ला प्रश्न विचारला.

… .’ तुमच्या आयुष्यातून सर्व सुख: काढून घेतले…आणि विचारलं दुसरं काही मागा….  तर तुम्ही काय मागणार..?? ‘ 

….त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;..

” माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार …. कारण, त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख काहीच नाही. “ 

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फक्त भेट…” ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “फक्त भेट…” 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा 

काय चाललंय मनात तुझ्या 

भेटून फक्त बोलत जा 

मोकळं सोड स्वतःला जरा 

कधीतरी मोकळं होत जा 

हलकं वाटेल तुझंच तुला 

मन रिकामं करत जा 

जुन्या आठवणी गप्पागोष्टी 

आमच्यात सुद्धा रमत जा 

आलेच कधी वाईट विचार 

बिनधास्त फोन करत जा 

काय आहे आयुष्य अजून 

निदान मनातले वाटत जा 

पहा किती फरक पडतो 

आनंद तेव्हढा लुटत जा 

पन्नाशीला आलोय आपण 

संपर्कात तेव्हढं रहात जा 

काय हवं काय नको तुला 

कुणाला तरी सांगत जा 

मित्र असतात कशासाठी 

मैत्री तेव्हढीच जपत जा 

आम्ही फक्त मस्त जगतो 

तसाच मस्त जगत जा 

पैसा नाही लागत त्याला 

मनातले मात्र सांगत जा 

पार्टी नकोय मित्रा तुझी 

येवून फक्त भेटत जा …… 

           येवून फक्त भेटत जा …… 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #204 ☆ व्यंग्य – सुदामा के तन्दुल ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक सार्थक एवं विचारणीय व्यंग्य सुदामा के तन्दुल। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 204 ☆
☆ व्यंग्य ☆ सुदामा के तन्दुल

चुनाव के बादल गहरा रहे थे। पता नहीं कब बरस पड़ें। मंत्री जी ने अपने चुनाव क्षेत्र का ‘टूर’ निकाला। अब अपनी जनता की सुध लेना बहुत ज़रूरी हो गया था। यह बंगला, ये कारें, यह रुतबा सब जनता की मेहरबानी से है। दुबारा जनता की खोज-खबर लेने के दिन आ गये। 

मंत्री जी अपने फौज-फाँटे के साथ जमालपुर के डाक बंगले में रुके। उनके पहुँचते ही डाक-बंगला तीर्थ स्थल बन गया। लोगों की भीड़ बढ़ने लगी। कुछ उनके परिचय के आदमी, कुछ अपने परिचय को भुनाने के इच्छुक, कुछ ऐसे ही कि ‘जगदीश भैया आये हैं, चलो मिल आते हैं’ वाले। बहुत से सयाने यह देखने आये कि ‘जगदिसवा अब हमें पहचानता है कि मिनिस्टर बन के भूल गया।’

बड़ी रात तक मंत्री जी अपने ‘आदमियों’ से घिरे, अपनी घटती लोकप्रियता को फिर से ऊपर ढकेलने की तरकीबें सोचते रहे। बहुत उधेड़बुन हुई, लेकिन साफ-साफ कुछ बात बनी नहीं। तरकीब ऐसी हो कि सब विरोधी चारों खाने चित्त गिरें।

सबेरे मंत्री जी उठे तो मन परेशान था। कौन सा दाँव लगायें कि दंगल जीत लें? मंत्री जी नाश्ता करते जाते थे और सोचते जाते थे। सामने गांधी जी का चित्र टँगा था। वही, घुटने तक धोती और हाथ में लाठी। मंत्री जी के दिमाग में कुछ कौंधा। लो, समाधान सामने है और ढुँढ़ाई दुनिया भर में हो रही है। जनता का मन जीतने के लिए अपने को गरीब जनता जैसा ही बनाना होगा। शान-शौकत दिखाने से वोट नहीं मिलने वाले।

निजी सचिव को बुलाया, कहा, ‘अस्थाना साहब, आज हम किसी गाँव के गरीब की झोपड़ी में विश्राम करेंगे। यह कूलर, यह पंखा सब बेकार। दोपहर का भोजन भी वहीं करेंगे। जो गरीब खाएगा वही खाएँगे। हमारे और गरीब के बीच भेद रहेगा तो हम उसका दिल कैसे जीतेंगे?’

अस्थाना साहब की सिट्टी-पिट्टी गुम। यह कहाँ की मुसीबत आ गयी। भीतर से गुस्सा उठा— कहाँ कहाँ के खब्त इन पर सवार होते रहते हैं।

ऊपर से विनम्रता से बोले, ‘मैं कोई माकूल घर देख कर आपको सूचित करता हूँ सर।’

अस्थाना साहब सुरक्षा अधिकारी को लेकर निकले। सोचा, कस्बे का कोई घर चुनना ठीक नहीं। कस्बे के लोग बदमाश होते हैं। विरोधी लोग खामखाँ कोई तूल खड़ा कर देंगे। कस्बे से तीन चार मील दूर एक गाँव में गये। सरपंच से मुलाकात की, और सुखलाल का घर चुन लिया।

सुखलाल के घर में यह फायदा कि वह एक तो इतना गरीब घर नहीं की घुसते ही घिन आये। यानी कि ज़रा कायदे का गरीब। दूसरे, उसका घर सरपंच के घर के एकदम पास, करीब करीब सरपंच साहब की छत्रछाया में था। तीसरी बात यह कि सुखलाल के घर के पीछे एक दरवाज़ा था,कि कुछ चुपके से घर के भीतर  ‘स्मगल’ करना हो तो पीछे से चुपचाप लाया जा सके। यह बड़ी भारी सुविधा थी।

सरपंच साहब से कहकर सुखलाल के घर के आसपास सफाई करा दी गयी। घर की भी सफाई हुई, लेकिन इस तरह कि सब स्वाभाविक लगे। सालों से पल रहे जाले-जंगल साफ हो गये। मुद्दत से स्थायी आश्रय पाये कीड़ों- मकोड़ों को खदेड़ दिया गया। बहुत सा अंगड़-  खंगड़ दूर फेंक दिया गया। कुछ गैर-ज़रूरी सामान दूसरे घरों में स्थानांतरित कर दिया गया। सुखलाल को एक सलीके का गरीब बना दिया गया।

सुखलाल साफ-सुथरा कुर्ता धोती पहने यह सब भागदौड़ देखता घूमता था। कुर्ता सरपंच साहब का था, धोती नयी-नयी अस्थाना साहब ने बनिये के यहाँ से उठवा दी थी। घर की सफाई हो गयी। सामने की ऊँची नीची जमीन भी ठीक हो गयी। रास्ते में उगे आलतू फालतू झाड़ साफ हो गये। मिट्टी से सारा घर पोत दिया गया। टूट-फूट सुधर गयी। एक तरफ तुलसी का बिरवा कहीं से लाकर लगा दिया गया। नया घड़ा पानी से भर कर रख दिया गया। उस पर सब तरफ ‘साँतिये’ बना दिए गये। दरवाज़े पर आम के पत्तों की झालर लटका दी गयी।

सुखलाल कमर पर हाथ धरे दूल्हे के बाप की तरह घूमता था। कोई उसे कुछ करने ही नहीं देता था। सब काम अपने आप हो रहा था। पूरे गाँव के लोग उसे और उसके घर को ईर्ष्या से देखते थे।

सुखलाल के घर में दो झिलंगी खाटें थीं, ऐसी कि कोई अच्छा पाला-पोसा शरीर उन पर रख दिया जाए तो मूँज का दम टूट जाए। उन दोनों खाटों को घर से बाहर कर दिया गया। सरपंच साहब के घर से दो मजबूत, कसी हुई खाटें आयीं कि गरीबी का भ्रम भी बना रहे और मंत्री जी के शरीर को तकलीफ भी न हो।

आसपास के घरों में मंत्री जी के सहायकों और पुलिस वालों के विश्राम की व्यवस्था कर दी गयी। मंत्री जी का हुकुम था कि उन्हें छोड़कर बाकी लोग अपने अपने भोजन की व्यवस्था करके लायेंगे, लेकिन ऐसा कैसे होता? सरपंच को इशारा मिल गया था कि सबके लिए व्यवस्था करनी है। इशारा नहीं भी होता तो सरपंच साहब इतना गलत काम कैसे होने देते?

इसलिए सुखलाल के घर के पीछे भट्टी बनाई गयी। उस पर गाँव की पाक कला में कुशल महिलाओं को लगाया गया। सुखलाल की बीवी को उसके पास भी फटकने नहीं दिया गया। उसके बच्चे सकते की हालत में दूर खड़े सारा तमाशा देखते रहे। सुखलाल के घर के सामने तो थोड़े से ही लोग थे, लेकिन घर के पीछे मेला लग गया था। वही से सारा सामान ‘सप्लाई’ होना था। करीब बारह बजे मंत्री जी लाव-लश्कर के साथ पधारे। दरवाज़े पर उनकी आरती हुई। सुखलाल को उनके सामने पेश किया गया। मंत्री जी बोले, ‘भाई सुखलाल, आज हम तुम्हारे ही घर भोजन और विसराम करेंगे।’

सुखलाल बोला, ‘हमारे बड़े भाग हजूर।’

मंत्री जी हाथ उठाकर बोले, ‘हजूर वजूर मत कहो। प्रजातंत्र में सब बराबर हैं। न कोई छोटा, न कोई बड़ा। समझे?’

‘ऐसा न कहें हजूर।’

‘फिर वही हजूर? यह हजूर हजूर बन्द करो।’

सुखलाल बोला, ‘आप बड़े हैं मालिक। हम आप की बराबरी के कैसे हो सकते हैं? आपको हजूर न कहें तो क्या कहें?’

मंत्री जी हार गये। बोले, अच्छा चलो, तुम्हारे घर में चलते हैं।’

भीतर गये तो देखा मूँज की खाट पर नया दरी-चादर और उस पर गुदगुदा तकिया। मंत्री जी समझ गये, लेकिन अनदेखा कर दिया। तकिये के सहारे उठंग गये। गाँव के लोग खाट के पास सिमट आये। दुनिया भर की फरियादें, रोना-धोना। अस्थाना साहब हाथ में नोटबुक लिये सब के नाम और शिकायतें नोट करते थे। गाँव वालों को लगता था आज सारे संकट टल गये। दो घंटे तक यह कचहरी चलती रही।

घंटे बाद अस्थाना साहब आकर फुसफुसाये, ‘सर, खाना तैयार है।’

मंत्री जी मुड़कर सुखलाल से बोले, ‘कहो सुखलाल जी, हमें क्या खिलाओगे?’

सुखलाल हड़बड़ा गया। उसे पता नहीं था कि भट्टी पर क्या पक रहा है। उसने अस्थाना साहब की तरफ देखा। अस्थाना साहब बोले, ‘बताओ भई।’

सुखलाल क्या कहे? कुछ मालूम हो तो बताये।

मंत्री जी फिर मिठास के साथ बोले, ‘बताओ सुखलाल।’

सुखलाल ने पीछे आटे का बोरा देख लिया था। बोला, ‘हजूर, रोटी खिलाएंगे, और फिर जो सरपंच साहब की मरजी।’

अस्थाना साहब उसे घुड़क कर बोले, ‘सरपंच साहब की मरजी का क्या मतलब? खिलाना तो तुम्हें है।’

मंत्री जी भाँप कर बोले, ‘अच्छा, जो भी हो ले आओ।’

सरपंच साहब की पत्नी लंबा घूँघट खींचकर काँसे की चमकती थाली में भोजन रख गयी— दाल, सब्जियाँ, चटनी, रायता, रोटी, चावल। चावल बहुत बढ़िया तो नहीं, लेकिन मामूली भी नहीं। रोटियों में लगे घी का स्पष्टीकरण अस्थाना साहब ने दिया, ‘सर, इसके भाई के घर में गाय है। वहीं से घी और दही माँग लाया। हमने मना किया था, लेकिन नहीं माना।’

मंत्री जी मुस्कराये, पूछा, ‘किसने पकाया है?’

सुखलाल फिर चक्कर में। अस्थाना जी ने उसका उद्धार किया, कहा, ‘इसकी घरवाली ने, सर।’

मंत्री जी बोले, ‘वाह! बड़े भाग्यवान हो, सुखलाल।’

बड़े प्रेम से भोजन हुआ। पीछे पड़ी हुई मंत्री जी की बारात ने भी भोजन किया।

फिर मंत्री जी बोले, ‘भई, अब हम थोड़ा आराम करेंगे।’

थोड़ी देर में वे सो गये। नाक बजने लगी। सुखलाल खड़ा उन्हें पंखा झलता रहा।

तीन घंटे बाद मंत्री जी की नींद टूटी। अँगड़ाई लेकर उठे। बोले, ‘आज जैसी सुख की नींद बहुत दिन बाद आयी। गरीब के घर जैसा चैन और शांति कहीं नहीं। सच कहा है कि गरीब आदमी भगवान का रूप होता है।’

अस्थाना जी से बोले, ‘अस्थाना जी,आज भोजन में जो स्वाद मिला वह अपने बंगले के भोजन में कभी नहीं मिला। आत्मा तृप्त हो गयी। रोटी चटनी से ज्यादा स्वादिष्ट भोजन संसार में नहीं।’

फिर सुखलाल से बोले, ‘सुखलाल भाई, अब हम जाएँगे। आपके घर में और आपके भोजन में हमें बहुत आनन्द मिला। हम आपके हैं। हमें अपना समझिए। ऊपरी टीम- टाम देखकर हमें अपने से अलग मत समझिए।’

इसके बाद मंत्री जी सब को हाथ जोड़कर अपने काफिले के साथ चले गये। थोड़ी देर पहले का गुलज़ार वीरान हो गया। पीछे रह गये सामान को सहेजते सरपंच साहब और गाँव वाले। जैसे बारात की विदा हो जाने के बाद लड़की वाले रह जाते हैं।

मंत्री जी के जाने के बाद सुखलाल सरपंच से बोला, ‘हजूर, हमें भी भोजन दिलवा दो। हम तो रह ही गये।’

सरपंच जी ज़ोर से हँसे, बोले, ‘वाह! तुम्हारे नाम से दुनिया भोजन कर गयी और तुम्हीं रह गये?’

सुखलाल सपरिवार भोजन करने बैठा। सरपंच जी सामान समिटवाने में लगे थे। खाते-खाते सुखलाल कुछ सोच कर सरपंच से बोला, ‘हजूर, एक अरज है। अगली बार जब मंतरी जी आएँ तो हमारे घर में ही रहवास और भोजन होवे।’

सरपंच जी उसकी बात सुनकर हँसते-हँसते लोटपोट हो गये और सुखलाल झेंप कर सिर खुजाने लगा।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares