मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – १ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – १ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा. माझ्या देशातल्या मातीत, पानोपानी सोने आहे. पण त्याची जाणीव तुम्हा आम्हाला नसते. चमकणाऱ्या विदेशी वस्तू आम्हाला आकर्षित करतात. पण जे चकाकते ते सगळेच सोने नसते ही गोष्ट आम्ही सोयीस्कर विसरतो. जेव्हा आमच्या हळदीवर, बासमती तांदळावर, कडुलिंबाच्या औषधी उपयोगांवर दुसऱ्या देशांनी पेटंट घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे आम्हाला जाग आली. अन्यथा आपल्या गोष्टींचे महत्व आम्हाला कुठे ? पूर्वी आमच्या दंतमंजनात कोळसा आणि मीठ आहे म्हणून हिणवणाऱ्या विदेशी कंपन्या आज मोठ्या गर्वाने आमच्या टूथपेस्टमध्ये कोळसा, मीठ वगैरे आहे म्हणून टेंभा मिरवतात. तेव्हा आम्हाला त्याचे महत्व कळते. एखादी गोष्ट जोपर्यंत दुसरे लोक सांगत नाहीत, तोपर्यंत आम्हाला त्याचे महत्व कसे बरे पटावे ? वस्तूंच्या बाबतीतच काय, पण माणसांच्या बाबतीत सुद्धा आम्ही असेच वागतो. स्वामी विवेकानंद जोपर्यंत अमेरिकेतील शिकागो येथे आपले विचार प्रकट करून जगन्मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला सुद्धा त्यांचे महत्व कळत नाही. स्वदेशी वस्तू, स्वदेशी वनस्पती, स्वदेशी खाद्यपदार्थ आणि आमच्याकडील विचार, सेवा आणि बुद्धिमत्ता यांचा वरदहस्त असलेली माणसे या सगळ्यांचे महत्व आम्हाला कधी कळणार ?  

व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या सगळ्या घोषणांचे म्हणूनच महत्व आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, म्हणून मी हे म्हणतो असे बिलकुल नाही. हा निर्णय आजच्या काळाला सुसंगत आणि आवश्यक असा आहे म्हणूनच त्याचे महत्व समजून घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवातीला लोकमान्य टिळक आणि नंतर म, गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता. स्वदेशी चळवळीची गरज आजही तेवढीच आहे. फक्त आज संदर्भ बदलले आहेत. त्या काळात तो लढा ब्रिटिश सत्तेविरुद्ध होता. आज आपल्याला आपल्या स्वतःसाठी तो लढायचा आहे. जागतिकीकरण, खुल्या अर्थव्यवस्थेच्या या काळात आपल्याला घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत, पण तारतम्याने विचार करावा लागेल. त्याबाबतचे राजकीय, राष्ट्रीय धोरण राज्य सरकारे, केंद्र सरकार भलेही ठरवील. ते त्यांना ठरवू देत, पण तुम्ही आम्ही आहार विहार, आचार विचाराने स्वदेशी होऊ या. 

स्वदेशीची जादू कोरोना काळात आपण अनुभवली आहे. लोकल उत्पादने, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन या गोष्टींनी आम्हाला त्या वेळी फार मोठा मदतीचा हात दिला आहे. आपल्या मागण्यांची पूर्तता केली आहे. या लोकललाच आपला जीवनमंत्र बनवला पाहिजे. या कोरोना काळातच आपण अनेक अवघड गोष्टी करून दाखवल्या आणि स्वदेशीची जादू पाहिली आहे. कोरोना काळात ज्यांची तीव्रतेने आवश्यकता भासली असे व्हेंटिलेटर आपल्या देशात कितीसे बनत होते ? पण कोरोनाचे संकट आले आणि अनेक कंपन्यांनी यात आघाडी घेवून ते बनवायला सुरुवात केली. मग भारतानेच अनेक देशांना व्हेंटिलेटर पुरवले. त्याच पद्धतीने कोरोना लशींवर भारतीय वैद्यकीय संस्थांनी संशोधन करून विक्रमी वेळेत लशी तयार केल्या. यापूर्वी मिसाईल मॅन आणि आपले माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली आपण स्वदेशीचा वापर करून अण्वस्त्रे तयार केली. आज आपण अनेक उपग्रह, चांद्रयान बनवतो आहे, त्यांचे प्रक्षेपण करतो आहोत.

या सगळ्या गोष्टी अभिमान वाटावा अशा निश्चितच आहेत. पण आमच्या आचार विचारात, जगण्यात स्वदेशी आले आहे का ? आमच्या जगण्याचा तो एक भाग झाला आहे का या प्रश्नाचे उत्तर निश्चितच नकारार्थी द्यावे लागेल. राज कपूरच्या ‘ श्री ४२० ‘ या चित्रपटात एक गाणे आहे. ‘ मेरा जुता हैं जपानी, ये पतलून इंग्लीस्तानी, सरपे लाल टोपी रुसी, फिर भी दिल हैं हिंदुस्तानी ‘ असे गाणे आहे. त्यात त्याच्या वापराच्या सगळ्या वस्तू जरी विदेशी असल्या तरी मन मात्र हिंदुस्तानी आहे. पण यात आता बदल व्हायला हवा. केवळ ‘ दिलच हिंदुस्तानी ‘ असून भागणार नाही, तर वापरातील सर्वच वस्तू स्वदेशी असायला हव्यात. कदाचित आपल्याला माझे म्हणणे पटणार नाही, कोणाला माझा सूर नकारार्थी वाटेल तर अजून कोणी म्हणेल की असे काय आहे त्यात, ज्याबद्दल तुम्ही सांगताय ? पण ज्यावेळी मला काय म्हणायचे आहे हे आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला माझे म्हणणे पटेल. तोपर्यंत स्वदेशीची जादू कळणार नाही. आमच्या आहारातील खाद्यपदार्थ, आमची पेये, आमच्या वनस्पती, झाडे, वृक्ष, वेली, आम्ही घेत असलेली पिके, वापरत असलेली खते, कीटकनाशके, आमचा आयुर्वेद,आमचा योग या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने स्वदेशी हव्यात. कशासाठी ? या सगळ्या गोष्टी आमचे जीवन समृद्ध आणि आरोग्यसंपन्न करणाऱ्या आहेत. 

आपण सुरुवात खाद्यपदार्थांपासून करू. एकदा मी आणि माझे कुटुंबीय एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो होतो. त्या हॉटेलमध्ये पिझ्झापासून ते थालीपीठापर्यंत सर्व पदार्थ उपलब्ध होते. मला तिथले थालीपीठ खाण्याची इच्छा होती. तिथे आलेली तरुणाई मात्र पिझ्झावर ताव मारत होती. आणखी एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे विविध प्रकारचे बर्गर्स उपलब्ध होते आणि त्या सोबत पिण्यासाठी पाणी नव्हते तर तिथे दिले जाणारे कोल्ड ड्रिंक घ्यायचे होते. या सगळ्या प्रकारांनी मी विचारात पडलो. हे सगळे पदार्थ कितपत आरोग्यदायी आहेत, यावर माहिती घेऊ लागलो. 

पिझ्झा, बर्गर, नूडल्स, फ्राईज, पॅटिस, पेस्ट्री, कुकीज, मोमोज, चाऊमिन यासारख्या पदार्थांना फास्ट फूड किंवा जंक फूड असे नाव आहे. यातील बरेचसे पदार्थ मैद्यापासून बनलेले असतात. पाव, बिस्कीट आदी सगळे बेकरी प्रॉडक्ट्स सुद्धा मैद्यापासूनच बनतात. मैदा हा पोटाच्या तक्रारी वाढवणारा आणि अजिबात फायबर नसलेला पदार्थ आहे. हे सगळे पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स कधीतरी ठीक आहेत पण वारंवार खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. या पदार्थांमध्ये कॅलरीज आणि अतिरिक्त साखर असते. पौष्टिक तत्वे मात्र नगण्यच असतात ! जास्त फॅट, अतिरिक्त साखर आणि मीठ यामुळे हे पदार्थ चविष्ट तर बनतात पण आरोग्यावर दुष्परिणाम करतात. रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात. या पदार्थानी टाईप टू डायबिटीस, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. वजनात वाढ होणे, श्वसन संस्थेचे आजार बळावणे असेही दुष्परिणाम होऊ शकतात. 

चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो नावाचा घटक वापरतात. त्याला चायनीज सॉल्ट असेही म्हटले जाते. त्यामुळे खाद्यपदार्थांना एक वेगळी चव येते. तरुणाई विशेष करून या पदार्थांकडे आकृष्ट होते. या पदार्थांची लहान मुलांना लवकर सवय लागते. पण वारंवार असे पदार्थ खाणे आरोग्याला घातक ठरते. आपल्याकडील भाकरी, पोळी, भाज्या, पोहे, थालीपीठ इ देशी पदार्थात भरपूर फायबर्स असतात. आरोग्यासाठी ते उपकारक असतात. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. आपण ते करताना अतिरिक्त साखर, मीठ इ चा वापर करत नाही. त्यामुळे त्यांच्या दुष्परिणामापासूनही दूर राहतो.

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग  ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले –‘तुम्हाला मुलांना समुद्रावर मोकळ सोडायला कोणी सांगितल होत? आता काय जबाब देणार पालकांना? आता तेथल्या पोलिसांना तक्रार द्या. दुसरा काही उपाय दिसत नाही मला.’ अस म्हणून जोंधळेंनी खाड्कन फोन आपटला. आता इथून पुढे)

पाटणकर घाबरले. चव्हाण मॅडम थरथरु लागल्या. कोण मुल आलेली नाहीत याची चौकशी करताना संस्थेच्या सदस्या साळगांवकर मॅडम यांची कन्या आलेली नव्हती. पाच वाजले तरी मुलं आली नाहीत. शेवटी पाटणकरांनी कळंगुट पोलिस स्टेशनला तक्रार दिली. दोघांची नावे आणि फोटो दिले. इन्स्पेटर ने जवळपास कुठल्या बिचवर सतरा-अठरा वर्षाची मुलं समुद्रात बुडाली होती काय ? याची चौकशी केली. सुदैवाने त्या दिवशी संपूर्ण गोव्यात कसलीही  दुर्घटना झाली नव्हती. मग इन्सपेटरनी कळंगुट च्या आसपास सर्व हॉटेल्स, बीअर बार, लॉजेस मध्ये फोटो पाठवून चौकशी करण्याची ऑर्डर दिली. यावेळेपर्यंत गाडीत बसलेल्या मुलांनी आपापल्या घरी ही बातमी कळविली होती. त्यामुळे गावात सगळीकडे ही बातमी पसरली. पाटणकरांना आणि चव्हाण मॅडमना फोनवर सतत फोन येत होते. पण त्यांनी ते न घेण्याचे ठरविले.

पंधरा मिनीटांनी एका बार वाल्याचा मेसेज आला. सव्वा तीन वाजता एक मुलगा आणि एक मुली आपल्या बार मध्ये बीअर पीत बसली होती. मग ते टॅसीच्या शोधात रस्त्यावर फिरत होते. ताबडतोब शहरातील सर्व टॅसीवाल्यांची चौकशी झाली. रात्री आठ वाजता निरोप आला. एका टॅसीवाल्याने दोघांना कर्नाटक सीमेपर्यंत सोडल होत. तेथील आजूबाजूच्या लॉजवर चौकशी केली गेली आणि रात्री नऊ वाजता एका लॉज मध्ये हा मुलगा आणि मुली सापडली.

गावात जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यात साळगांवकर बाईंची मुलगी असल्याने जास्त खमंग चर्चा. एव्हाना गावातून दहा-बारा गाड्या माणसे भरुन कळंगुट पोलिस स्टेशन कडे आल्या होत्या. साळंगावकर बाई आणि तिचा नवरा पोलिस स्टेशनमध्ये आले आणि ते पाटणकरांना शिव्या घालू लागले. रात्री अकरा वाजता पोलिसांनी त्या मुलांना कळंगुट पोलिस स्टेशनवर आले. कळंगुटच्या आमदाराच्या मदतीने सर्व प्रकरण मिटवले आणि पालकांनी मुल आपल्या ताब्यात घेतली आणि रात्री बारा वाजता सहलीसाठी बाहेर पडलेली मुलं, पाटणकर सर, चव्हाण मॅडम आणि गावाकडून आलेल्या गाड्या गावाकडे निघाल्या. पाठीमागुन साळगांवकर मॅडम, साळगांवकर आणि त्यांच्या वाडीतील अनेकजण येत होते. साळगांवकर आणि साळगांवकर मॅडम दात ओठ खात होते. अख्या गावात तोंड दाखवायला जागा नव्हती आणि हे सर्व त्या पाटकरांमुळे. साळगांवकर बाई बडबडू लागल्या. तरी मी चेअरमनांना सांगत होते. ‘त्या मुर्ख माणसाला शाळेत घेऊ नका. पण चेअरमन म्हणाले सहा हजारात या गावात कोण येणार?’

साळगांवकर, शिव्या घालत बोलू लागला. त्या चेअरमनला मग बघतो. आधी या पाटणकराला बघतो. एकतर मुलांना बीचवर एक तास सोडला आणि मग पोलिस तक्रार करतो. केवढी बेअब्रु झाली माझी. नाही या पाटणकरला ठार मारला तर नावाचा साळगांवकर नाही.

‘अहो,त्याला ठार मारु नका हा. तुरुंगात जाल. मोडून ठेवा फत. आधीच या कार्टीची मला काळजी लागली. त्या पोराबरोबर पळून जात होती. आता हीची शाळा बंद. मुंबईला ताईकडे पाठविते हिला आणि लग्न करुन देते.’

मिराशींच्या घरात पण जोरात चर्चा सुरु होती. मिराशी बायकोला सांगत होते.

‘त्या साळगांवकराचा पॉर लय चालू आसा. तेच्या बापाशीक मी सांगलेलय ह्या कोणाकोणाबरोबर फिरत असता. तेचा लवकर लगीन लावन टाक पण झाला ता बरा झाला. साळगांवकरनीचो तोरो जरा कमी होतोलो. नाहीतरी चेअरमनांच्या संगतीत हीका वाटा होता सगळी शाळा आपल्या खिशात.’

एवढ्यात भयभीत झालेली पाटणकरांची बायकोवनिता आपल्या मुलाला कमरेवर मारुन आली. मिराशींना म्हणाली. ‘भावोजी, शाळेकडे माणसा जमली आसत. पाटणकरांका मोडून ठेवतलव असा बडबडतत. माका भीती वाटता. ’

‘वहिनी घाबरु नकात . मी कसा काय ता बघतयं. मी पण शाळेकडे जातय.’ अस म्हणून मिराशी आपल्या स्कूटरवर बसून शाळेकडे गेले. घाबरलेल्या वनिताने आपल्या भावाला कनेडीत फोन केला आणि त्याला ही बातमी सांगितली आणि साळगांवकरच्या वाडीतले लोक पाटणकरांना मारण्याची भाषा बोलत आहेत अशी बातमी दिली. भाऊ म्हणाला, वनिता घाबरू नकोस. मी दहा मिनिटात गाडी घेऊन निघतय.

रात्रौ अडीच वाजता सहलीची बस शाळेकडे पोहोचली. मुलांचे पालक शाळेकडे उभे होतेच. मुल पटापट उतरली आणि आपल्या पालकांकडे गेली. पाटणकर, चव्हाण बाई उतरले. बस पाठोपाठ साळगांवकरांची गाडी आली. दारु पिऊन टाईट झालेल्या साळगावकराने कमरेचा पट्टा काढला आणि तो पाटणकरांना बडवू लागला. सर्व पालक पाटणकर पट्टयाचा मार कसा खातात याची मजा घेत होते. एवढ्यात मिराशी पुढे आले आणि साळगावकरांनी उगारलेला पट्टा त्यांनी हवेतच हातात पकडला आणि खेचून घेतला. मिराशी ओरडून म्हणाला, ‘हरामखोर साळगांवकरा, या गरीब मास्तराक मारतस? तुझ्या पोरीन शेण खाल्ल्यान आणि त्या मास्तराक जबाबदार धरतस?’

‘मग? त्याने मुलांना बीचवर का सोडल? आणि मग पोलिस तक्रार का केली?’

‘अरे, मुलं सहलीला गेली होती ना? मनासारखं फिरु दे त्यांना म्हणून सोडली. बाकीची वीस मुलं वेळेत गाडीत आली. तुझा चेडू आणि तो फर्नाडिसाचो झील तेवढे पळाले ह्या दोघांका मी देवळाच्या पाठीमागे कितीवेळा बघलय. तुका सांगलेलय ह्या चडवार लक्ष ठेव. आता पाटणकरांवर हात उचलशीत तर मुळासकट उपटून टाकीन लक्षात ठेव.’

साळगांवकर जळफळत होता. पाटणकरांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होता. एवढ्यात कनेडीहून पाटणकरांचा मेहूणा दोन गाड्या भरुन माणसे घेऊन आला. पटापट दरवाजे उघडले गेले आणि हातात दांडे घेतलेले दहा जण बाहेर आलेत. पाटणकरांच्या मेहुण्याने हातात सुरा घेतला आणि पट्टा हातात घेतलेल्या साळगांवकराच्या मानेवर लावला.

‘वा रे मुडद्या, या गरीब शिक्षकावर हात टाकतस? कित्या तो शिक्षण सेवक आसा म्हणून? पैशानं गरीब आसा म्हणून? भानगडी केल्यान तुझ्या चेडवान आणि या पट्टयान मारतस या मास्तरास. थांब तुझो कोथळो बाहेर काढतय.’

पाटणकरांच्या मेहुण्याने सुरा पोटावर लावताच साळगांवकर रडू लागला. हातापाया पडू लागला. साळगांवकरांची मित्रमंडळी एवढी सगळी  दांडे हातात घेतलेली माणसे बघून पळू लागली. मिराशी पुढे झाले आणि त्यांनी मेहुण्याला थांबविले. ‘रक्तपात करु नको बाबा. पोलिस मागे लागतले. एकवेळ सोड तेका.’

मेहुण्याने सुरा बाजूला केल्या आणि साळगांवकरांच्या दोन थोबाडीत दिल्या. बरोबरीच्या साथीदारानी दांड्यानी त्याच्या पाठीवर मारले. साळगांवकर गुरासारखा ओरडू लागला. मिराशीनी दोघांना दूर केले. मग मेव्हण्याने साळगांवकरांच्या मानेला धरले आणि उचलून पाटणकरांच्या पायावर घातले. पाया पड तेंच्या. अरे डबल ग्रॅज्युएट माणूस आसा तो. शिक्षण सेवक झालो म्हणून तुमका तेंची किंमत नाय. साळगावकर लंगडत लंगडत बाजूला झाला. मग मेहुणा पाटणकरांकडे वळला. पाटणकरांची पाठ, मान, दंड रक्ताने माखले होते.

‘चला भावोजी, तुमका डॉटरकडे नेऊन मलमपट्टी करुक होयी आणि आजपासून ह्या गाव आणि ही शिक्षण सेवकाची नोकरी सोडायची. तुम्ही कितीही हुशार असलात कितीही शिक्षण घेतलात तरी तुम्ही शिक्षण सेवक झालात की तुमची किंमत शून्य. ही असली नोकरी करण्यापेक्षा मी तुमका धंदो काढून देतय.’

मेहुण्याने पाटणकरांना गाडीत घेतले. वाटेत बहिणीच्या घरी जाऊन घरातील सर्व सामान आणि बहिणीला आणि तिच्या मुलाला घेऊन कणकवली गाठली.

पंधरा दिवसांनी कणकवलीत ‘पाटणकर हेअर कटींग सलून एसी’ सुरु झाला. पाटणकरांच्या मेहुण्याने आपला अनुभवी कारागिर सोबत दिला. हळूहळू पाटणकरांनी सर्व शिकून घेतले. दोन महिन्यांनी ते सलून मध्ये व्यवस्थित काम करु लागले. पाटणकर हेअर कटींग सलूनला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. एका वर्षात दुसरे सलून कणकवली स्टेशनजवळ काढले.

आता पाटणकर मजेत आहेत. व्यवसायात चांगले पैसे मिळवत आहे. बायको -मुलगा खूष आहेत. तरीपण पाटणकरांच्या झोपेत आर्किमिडीज, न्यूटन येतो. स्पेट्रम थिअरी येते. सरफेस टेंशन येते आणि मग अजून आपण शिक्षण सेवक असल्याचे त्यांच्या स्वप्नात येते आणि ते घाबरतात. मग जाग आल्यावर आपण पाटणकर हेअर कटींग सलून चे मालक असल्याचे तेंच्या लक्षात येते आणि ते कुशीवर वळतात आणि ते गाढ झोपी जातात.

 – समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मॅजिक राॅक्स… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

मॅजिक राॅक्स… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

शनिवारी सकाळी मेघाचा, माझ्या मैत्रीणीचा हॉस्पिटलमधून फोन आला. “अंजूला मुलगी झाली. अंजू बरोबर दोन तास बसायला येतेस का? अमित नेमका कामासाठी बाहेरगावी गेलाय.”

मी अंजूसाठी तिला आवडणारी सालीच्या मुगाची खिचडी-कढी केली. पापड भाजले व डबे भरले. आल्याचा चहा थर्मास मध्ये भरला. गुलाबी कार्नेशनच्या फुलांचा गुच्छ घेतला आणि हॅास्पिटलमधे पोचले.

मी हॅास्पिटलच्या लॅाबीकडे जात असताना मेघाचा टेक्स्ट आला.. “डॅाक्टरांचा राऊंड झाला की मेसेज करते.”

मी लॉबीमध्ये बसले. आजूबाजूला बसलेले काळजीग्रस्त चेहरे, थकलेली शरीरे आणि नश्वर देह जवळून बघत होते. विधात्यानं रेखाटलेल्या आयुष्यरेषा लांबवण्याच्या प्रयत्नात दमून जाणारे जीव आपण ! पृथ्वीतलावरचा कितीही पैसा टाकून विकत न मिळणारा “वेळ” कसा वाढवता येईल त्यासाठी सर्व धडपड ! 

तेवढ्यात समोर लहान मुलांच्या वॅार्डमधे गडबड दिसल्याने विचारांची श्रुंखला तुटली. पोटात कालवलं.

 “ परमेश्वरा लहान मुलांना का आजार देतोस रे बाबा ” म्हणत असतानाच नीना दिसली.

नीना माझी आवडती विद्यार्थिनी ! सेवा करण्यासाठीच जन्माला आलेली !  उंच बांध्याची, हसताना मोहक खळया पडणारी अंतर्बाह्य सुंदर नीना नर्सच्या निळ्या कपड्यात फारच गोड दिसत होती. मी दिसताच लहान मुलीसारखी पळत आली.

“Mrs Ranade, so good to see you.” 

“कशी आहेस नीना” म्हणत मी तिला घट्ट मिठी मारली. “पेडियाट्रिक वॉर्डमध्ये काम करतेस हल्ली? ठीक आहे ना सगळं?” मी विचारले.

हातातला स्टेथास्कोप तिच्या ऍप्रनच्या खिशात ठेवत ती म्हणाली, ” हो. आजची गडबड फार वेगळी आहे. आमचे छोटे पेशंटस एकदम खूष आहेत आज. अनेक शाळांकडून त्यांना आज मॅजिक रॅाक्सची भेट आली आहे. खरं तर त्याला “काइंडनेस रॉक्स”(Kindness Rocks) म्हणतात, पण मी त्यांना “मॅजिक रॅाक्स” म्हणते.

“मॅजिक रॅाक्स?? मी काही शाळांच्या पटांगणात कधी एखाद्या झाडाच्या बुंध्याशी, कधी बागेत, कधी बीचवर, रंगीबेरंगी, छान मजकूर लिहिलेले लांबट गोलाकार दगड बघितले आहेत. पण तो मुलांचा चित्रकलेचा प्रोजेक्ट वगैरे असावा यापलीकडे त्याचा फारसा विचार केला नव्हता. तेच का मॅजिक रॅाक्स?” मी नीनाला विचारले.

तेवढ्यात तिथे असणाऱ्या १४ वर्षाच्या पेशंटला नीना म्हणाली, “अरे, मॅडमना दाखव ना तुला आज काय मिळाले ते?”

त्याने उत्साहाने छोटी केशरी रंगाची गिफ्ट बॅग उघडली. त्यातून एक लांबट, गोलाकार दगड बाहेर काढला. हाताच्या तळव्यात मावेल एवढा. तो लांबट दगड वरून सपाट होता त्यामुळे आपण पाटीवर लिहितो तसे त्यावर लिहिणे शक्य होते. तो दगड पांढऱ्या रंगाने रंगवला होता. त्यावर केशरी बास्केटबॉलचे चित्र काढले होते. शेजारी लिहिले होते,” यार, लवकर बरा हो. पुढच्या मॅचला तू हवासच.”

तो त्याच्या प्लास्टरमधे असलेल्या पायाकडे बघत म्हणाला, “ नक्की खेळू शकेन मी पुढची मॅच.” आपण पुढची मॅच खेळत आहोत हे चित्र त्याच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत होते.

“ मिसेस रानडे ”, नीना म्हणाली, ” मनाने घेतले मॅच खेळायची की बघता बघता हा पळायला लागेल बघा. माझं काय होणार, कसं होणार म्हणून रडत बसले की हिलींगला वेळ लागतो.. मनाची शक्ती प्रचंड असते. ती नाही कळत आपल्याला ! ती शक्ती मॅजिक रॅाक जागी करतो असं मला वाटतं. “

“पेडियाट्रिक वॉर्डच काय..हल्ली सर्व पेशंटना…. जगातल्या सर्व पेशंटना हं ” म्हणत तिने माझ्याकडे वळून बघितलं.. “ हे उभारी देणारे रंगीबेरंगी रॅाक्स सुंदर संदेश घेऊन भेट म्हणून येतात. पेशंटचा मूड एकदम इतका सुधारतो की विचारू नका !”

पुढच्या खोलीत छोटा पेशंट होता. सात वर्षाचा ! त्यानेही आम्हाला त्याला आलेली भेट दाखवली. त्याच्या हातातल्या मॅजिक रॅाकवर शब्द होते “बी (Bee) हॅपी.” आणि त्यावर एक हसरा चेहरा, एक सूर्य, आणि एक मधमाशी (Bee) काढली होती. चित्रकार अगदी बिगरीतला होता हे दिसतच होते.

तो मुलगा म्हणाला, ” निखिलला चित्रं काढता येत नाहीत.. ही मधमाशी, हा चेहरा…हाहाहा..म्हणत तो मनापासून  हसत होता.

नीना म्हणाली,” बघितली मॅजिक रॅाकमधली शक्ती? साहेब सकाळी रडत बसले होते आणि आता बघा.”

पुढे लागलेल्या वॉर्डमध्ये एक इन्स्पेक्टर काका होते.  नीना म्हणाली,” यांना शेजाऱ्याच्या १० वर्षाच्या मुलाने फार सुंदर रॅाक पाठवलाय.”  निळसर रंगाने रंगवलेल्या त्या दगडावर युनिफॉर्ममधल्या पोलिसांचे चित्र काढले होते. खाली लिहिले होते, ” काका तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. लवकर बरे व्हा आणि घरी या. हसायला विसरू नका.” नीना म्हणाली, “काका तुम्हाला मॅजिक रॅाक पाठवलेल्या मुलाला कॅडबरी द्या बरं का !” काकांनी त्यांचा रॅाक उचलून कपाळाला लावला. म्हणाले, ” भलेभले मला रडवू शकत नाहीत पण या पोरानं ही भेट पाठवून रडवलं बघा.”

लहानपणी जादूचा दिवा, जादूची सतरंजी वगैरे पुस्तकं वाचताना भान हरपल्याचे आठवत होते. पण एकविसाव्या शतकातला मॅजिक रॅाक मला नि:शब्द करून गेला होता.

एक साधा दगड .. पण त्याला शेंदूर लागला की त्याचा देव होतो.. एक साधा दगड.. पण त्याला छिन्नी हातोडा लागताच त्यातून हवा तो ईश्वर प्रकट होतो..  तसाच एक साधा दगड…ज्याच्यावरचे संदेश माणसाला उभारी देतात. “ तुम्ही एकटे नाही..आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर ” म्हणतात. 

काय लागतं माणसाला कठीण परिस्थितीतून जाताना? …… 

कुणीतरी आपलं हित चिंतत आहे, कुणीतरी आपली आठवण काढत आहे, कुणीतरी आपलं भलं व्हावं म्हणून प्रार्थना करत आहे.. बस. . एवढंच हवं असतं…. मॅजिक रॅाकवर आलेले निरागस संदेश किती जणांचं  मनोधैर्य वाढवत होते. हिलींग घडवून आणत होते…. सगळेच अगम्य !

आता मला ठिकठिकाणी बघितलेले ” मॅजिक रॅाक्स ” आठवू लागले. जवळच्या बीचवर मला मॅजिक रॅाक दिसला होता. त्यावर सोनेरी रंगात लिहिले होते..  “ एखाद्या ढगाळलेल्या आयुष्यातले इंद्रधनुष्य बन !”

एकदा टीव्हीवर एका जवानाने त्याच्या मुलाखतीत ” तू घरी येण्याची मी वाट बघतेय.” लिहिलेला रॅाक दाखवला होता. मुलांनी शाळेत जे मॅजिक रॅाक्स विखुरले होते त्यावर “तू एकटा नाहीस”, “क्षमा”, “दया”, “आनंद”, “Love”, “Keep trying” असे शब्द लिहिले होते. एकावर “बाजीगर” लिहिलं होतं. “तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्यातच आहे ” लिहिलेला गुलाबी मॅजिक रॅाक जाणाऱ्या-येणाऱ्याला  क्षणभर थांबावयास भाग पाडून अंतर्मुख करत होता.

कठीण आजाराशी झुंज देणाऱ्या एका मैत्रिणीला ”The worst is over” लिहिलेला रॅाक दिसल्याने आपण आता बरे होणार असा संदेश “वरून” आला आहे असं वाटलं होतं. मॅजिक रॅाक्स ठेऊन शुभशकून निर्माण करणाऱ्या काही परोपकारी जीवांना आयुष्याचा खरा अर्थ कळला होता. 

मनात आलं….. कागदावरचा संदेश व मॅजिक रॅाकवरचा संदेश यात पहिला फरक आहे स्पर्शाचा ! ज्या मातीतून आपण निर्माण होतो आणि ज्या मातीत परत जातो तिथला दगड हा नैसर्गिक घटक आहे, म्हणून कदाचित त्याच्याशी पटकन नातं जुळत असावं. देवळातल्या गाभाऱ्याशी  व  तिथे असणाऱ्या अभिषेक पात्रातून थेंब थेंब पडणाऱ्या जलाबरोबर जसं तत्क्षणी नातं जुळतं तसंच ! 

विचारांची आवर्तनं, मेघाचा टेक्स्ट आला “वर ये” , म्हणून थांबली. नीनाने मला दगडातला देव दाखवल्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानले. “उद्या जेवायला ये” म्हटलं व थेट हॉस्पिटलच्या अंगणात गेले. एक लांबट गोलाकार बदामी रंगाचा दगड उचलला. तिथल्या नळावर धुऊन रुमालाने कोरडा केला.  पर्समधून गुलाबी शार्पी काढून त्यावर लिहिलं,

“अंजू-अमित तुम्ही खूप छान आई बाबा होणार आहात. तुमच्या प्रिन्सेसला खूप खूप शुभेच्छा ! “

घाईघाईने अंजूच्या खोलीकडे गेले.  तिला सर्व भेटी दिल्या व “मॅजिक रॅाक” पण  दिला.  तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले. मावशी “काइंडनेस रॉक“ बनवलास ना माझ्यासाठी! सो वंडरफुल ! तुला कसे माहिती असते ग हे सगळे?”

मी गालातल्या गालात हसत तिला जवळ घेतले आणि म्हणाले, ” तू घरी आलीस ना की तू, मी व तुझी आई “धन्यवाद” देणारे रंगीबेरंगी मॅजिक रॅाक्स बनवू. तुझ्या प्रिन्सेसचं नाव लिहू त्यावर ! बाळाच्या बारशाला छान रिटर्न गिफ्ट होईल ना?”

एक लहानशी गोष्ट माणसासाठी काय करू शकते याचे हे उदाहरण आहे. 

लेखिका : सुश्री ज्योती रानडे.

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक तरी घास अडावा ओठी !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक तरी घास अडावा ओठी !” ☆ श्री संभाजी बबन गायके 

कॅप्टन अनुज नय्यर 

खूप व्रात्य होता हा मुलगा. उंच शिडशिडीत बांधा आणि अभ्यासासोबत खेळात अत्यंत कुशल ! पण त्याच्या खोड्या सर्वांना पुरत्या जेरीस आणणाऱ्या असत. गणिताच्या शिक्षकांचा हा तसा लाडका पण त्याच्या या स्वभावाचे गणित त्या शिक्षकांना कधी सोडवता आले नाही ! त्याला ते ‘उत्साहाचं गाठोडं’ म्हणत असत. 

असेच एका दिवशी साहेबांनी कुणाची तरी कुरापत काढली आणि सुंबाल्या केला. सर्वच त्याला शोधत होते… सरांनी तर चक्क फळ्यावर  लिहिले…. Wanted Anuj…. dead or alive! अर्थात हे सगळं गंमतीत! कारण  त्याच फळ्यावर दिलेलं गणित वर्गात अनुज शिवाय दुसरं कुणीच सोडवू शकत नव्हते! स्वारी मात्र दुसरीकडेच कुठे तरी नवीन खोडी काढण्यात दंग होती!

व्हॉलीबॉल खूप खेळायचा अनुज ! वडील म्हणायचे,”अरे, शर्ट खराब होईल !” तर यावर पठ्ठ्या शर्ट काढून खेळू लागला ! मग नंतर पँट खराब होईल असं वडील म्हणू लागले तेव्हा साहेब फक्त हाफ पँट घालून खेळत… पण खेळ पाहिजेच. पोराने चाळीतल्या एकाही घराची खिडकीची काच फोडायची म्हणून शिल्लक ठेवली नव्हती… पण तरीही त्याच्यावर कुणी डाफरलं नाही.. कारण पोरगं गुणाचं होतं. सर्वांच्या मदतीला धावून जायचं तर त्याच्या स्वभावाचा एक भागच होता.

पुढे अनूज आर्मी स्कूल मध्ये पुढील शिक्षणासाठी गेला आणि एक सच्चा सैनिक आकार घेऊ लागला… शाळेच्या अभ्यासात आणि खेळांच्या मैदानात ! पाहता पाहता अनुज सैन्य अधिकारी प्रशिक्षणासाठी निवडला गेला आणि तेथून उत्तीर्ण होऊन हा प्राध्यापक नय्यर साहेबांचा मुलगा सैन्य अधिकारीही झाला !

‘ तुला सैनिकच का व्हायचं रे? ‘ असं त्याला कुणीतरी तो अगदी लहान असताना विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, ” मला सियाचीन मध्ये जाऊन बघायचं आहे, थंडीचा माणसावर काय परिणाम होतो ते !”

आणि कर्मधर्मसंयोगाने त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली ती कारगिल मध्ये, आणि सहकारी होते लढाऊ जाट रेजिमेंटचे. एका वादळाला आणखी काय हवं असतं.. त्याला गर्जायचं असतं… फक्त वातावरण तयार झालं पाहिजे !

सैन्यात येऊन अनुजसाहेबांना जेमतेम दोन वर्षे झाली होती. जाट पलटणी मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून जबाबदारी मिळाली. मोकळा वेळ मिळाला की साहेब आई वडिलांना, मित्रांना पत्र लिहीत.. अगदी नेमाने ! इतके की सहकारी त्यांना letter man संबोधू लागले ! त्यांच्या अनेक पत्रांतून त्यांनी आपल्या देशसेवेच्या कल्पना मांडल्या होत्या. ‘सामान्य निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या अतिरेक्यांना यमसदनी पाठवणे हा आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे, असे ते नेहमी म्हणत. 

१९९९…. आपला देश क्रिकेटच्या विश्वचषकाच्या धुंदीत होता. तिकडे पाकिस्तान भारतीय हद्दीत घुसत होता…. लपून छपून ! छुप्या रीतीने पाकिस्तानी सैनिकांनी नागरिकांच्या वेषांत कारगिलच्या उंचच्या उंच पहाडांवर भारतीय भूभागावर हल्ला करता येईल अशा जागा पटकावून ठेवल्या होत्या. 

या घुसखोरीची खबर मिळाली तेव्हा तसा खूप उशीर झाला होता. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे छिन्नविछिन्न देह पाहून आपल्या सैनिकांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती ! आहे त्या परिस्थितीत, साधनसामुग्रीत भारतीय सैन्याने घुसखोरी मोडून काढण्याची मोहिम सुरू केली.

आपण युद्धक्षेत्रातच नेमणूकीस आहोत, याची खबर अनूजसाहेबांनी घरी लागू दिली नव्हती. उंच पहाडावरील एक महत्त्वाची जागा आपल्या ताब्यात घेणे अतिमहत्त्वाचे होते. सोळा हजारापेक्षा जास्त फूटावर असलेल्या त्या ठिकाणी चढाई करणे केवळ अशक्यप्राय गोष्ट. आणि हे करताना हवाईदलाची मदत घेणे गरजेचे होते. परंतू हवाईदलाची मदत पोहोचेपर्यंत थांबण्यात धोका होता.. पाकिस्तान आपली पकड अधिक मजबूत करू लागला होता… उशीर म्हणजे नुकसान !   

६ जुलै १९९९. उद्या सकाळी पहाडावर कब्जा करायला निघायचं होतं. अनूज साहेबांनी वडिलांना फोन लावला. सांगितलं नाही नेमकं कुठं हल्ला करणार आहेत ते, पण ‘मोठी कामगिरी करायला निघालोय’ एवढं मात्र सांगितलं.

प्राध्यापक नय्यर त्यांना म्हणाले होते, “देखो ! हार कर नहीं आना ! वरना मैं तुम्ही गोली मार दुंगा !” अर्थात हे सर्व प्रेमात आणि मुलावरच्या विश्वासानं बोललं जात होतं. हे दोघं केवळ मुलगा आणि वडील नव्हते तर दोन दोस्त होते, सखे होते !

त्यावर अनूज साहेब म्हणाले होते, “आपका बेटा हूँ… हारने की बात सोच भी नहीं सकता !” 

या पूर्वीच्या पत्रात त्यांनी स्पष्टच लिहिलं होतं…. ‘देशाप्रती असलेलं माझं कर्तव्य पूर्ण करण्याआधीच मरण्याएवढा मी बेजबाबदार नाही पपा ! भारतीय सेना आणि भारतीय जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो पाहून यावेळी मरणाचा विचार करणं अतिशय गैर ठरेल. शेवटच्या शत्रूच्या शरीरातून प्राण निघून जाईपर्यंत मी माझे श्वास घेतच राहीन… जयहिंद !’

पहाडावर चढाई सुरू झाली. पुढच्या तुकडीच्या हालचाली शत्रूने वरून अचूक टिपल्या आणि आगीचा वर्षाव सुरू केला. त्यात आघाडीचे सैन्याधिकारी, सैनिक जखमी झाले, धारातीर्थी पडले. मोहिम अयशस्वी होण्याची चिन्हे होती. 

दुसरी ताजी कुमक पहाडावर पाठवण्यात आली. यात अनूजसाहेब होतेच. पहाडावरून येणाऱ्या बातम्या त्यांच्याही कानी पडत होत्या. पहाडावर जाताना पुरेसा दारूगोळा सोबत असलाच पाहिजे, याचा त्यांना अंदाज होताच. वरिष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता त्यांनी आपली बॅग़ भरायला आरंभही केला होता. एखादं लहान मूल जसं कुठं बाहेर जायचं असल्यास आपल्या पिशवीत जमतील तेवढी खेळणी भरून घेतं ना, त्यातीलच हा प्रकार. 

वरिष्ठ साहेब त्यांच्या पाठीमागेच उभे होते… त्यांनी हाक मारताच… अनूजसाहेब म्हणाले….”आया साहब ! बस और थोडे हॅन्डग्रेनेड्स ले लू ! इनकी जरुरत पडेगी !” जणू खेळायला निघालेल्या ह्या पोराचा खेळ प्रत्यक्ष मृत्यूच्या अंगणात ठरलेला होता. 

योगायोगाने जेव्हा अनूजसाहेब आपली युद्धाची तयारी करीत होते त्यावेळी दिल्लीत त्यांच्या मातोश्री त्यांच्यासाठी खाद्यपदार्थांच्या पिशव्या भरत होत्या…. कारगिलमधे लेकाला पाठवण्यासाठी. आणि दुसऱ्या एका घरात आणखी एक व्यक्ती अनूजसाहेबांसाठी चॉकलेट्स पॅक करीत होती… त्यांची जीवाची मैत्रिण… टिम्मी ! 

थोड्याच दिवसांत अनूज आणि टिम्मी विवाहबद्ध होणार होते… दोघांनी एकाच नजरेने स्वप्नं पाहिली होती ! साहेबांच्या बोटांत सोन्याची एंगेजमेंट रिंग शोभत होती. मोहिमेवर निघताना अनूजसाहेबांनी आपली ही अंगठी आपल्या मोठ्या साहेबांच्या हवाली केली…. ” मी परत नाही येऊ शकलो तर ही माझी लाखमोलाची ठेव माझ्या प्रेयसीच्या हाती सोपवा !”

चढाई सूरू झाली ! अनूजसाहेबांचे वरिष्ठ मेजर रामपाल साहेब आघाडीवर होते. लढताना जबर जखमी झाले. त्यांना मागे आणावे लागले. त्यांची जागा अनूजसाहेबांनी घेतली. त्यांना आता कॅप्टन म्हणून बढती मिळाली होती… भर युद्धाच्या दिवसांत ही बढती म्हणजे देशाने खांद्यावर दिलेली एक मोठी जबाबदारी. 

निकराचा हल्ला करीत निघाले साहेब आणि त्यांचे बलवान जाट सैनिक. चढाई सोपी नव्हती… सोळा हजार फूट…. कडेकपारी…. पाय निसटला की जीवन निसटून जाईल याची खात्री… वरून प्रचंड गोळीबार होत होता. 

सैनिकांजवळचे अन्न पदार्थ संपले ! पोटात भुकेचा वणवा भडभडून पेटलेला होता. पण लढण्यासाठी दारूगोळा महत्त्वाचा होता. अन्नाचं ओझं होईल….! त्या बहाद्दरांनी अन्नाऐवजी बंदुकीच्या गोळ्या, हातबॉम्बचं ओझं सोबत नेणं पसंत केलं…. ‘सैन्य पोटावर चालतं’ ही म्हण या शूरांनी इथं खोटी ठरवली एका अर्थानं !

उपाशीपोटी लढणं….. कल्पना तरी करवते का सामान्य माणसांना? पण असामान्य माणसांची कथा आहे ही…. आणि खरी आहे ! 

अनूजसाहेब सर्वांत पुढे होते. उंचावरच्या सांदी कोपऱ्यात पाकिस्तानचे चार बंकर्स होते. त्यात बसून ते आरामात फायरिंग करीत होते. साहेबांनी गोळीबाराच्या पावसात पुढे धाव घेतली आणि पहिले तीन बंकर्स उध्वस्त केले… त्यातील नऊ शत्रू थेट वरती पाठवले…. त्यांच्या मशिनगन्स निकामी केल्या…. पण… चौथा बंकर ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात तिकडून आलेल्या एक आर.पी.जी.गोळ्याने त्यांच्या शरीराचा वेध घेतला…. रॉकेट प्रॉपेलर गन ! हिच्यातून गोळी नाही तर बॉम्बच डागला जातो एक प्रकारचा. त्या अस्त्राने या अभिमन्यूचे प्राण हिरावून नेले ! 

तोवर कामगिरी फत्ते झाली होती…. पहाड ताब्यात आला होता… पाकिस्तानची राक्षसी पकड त्यामुळे ढिली पडणार होती ! पुढे विजय आवाक्यात होता, दृष्टीपथात होता ! पण हे पहायला कॅप्टन अनूज नय्यर आणि त्यांचे काही साथीदार या जगात नव्हते ! 

प्राध्यापक एस.के.नय्यर यांच्या घरातील टेलिफोन खणखणला…. लष्करी अधिकारी होते फोनवर…. “जयहिंद सर….” आणि असंच काही बोलून ते अधिकारी नि:शब्द झाले काही वेळेसाठी….

नय्यर साहेब म्हणाले….. ” माझा लेक लढतानाच मरणाला सामोरं गेला ना?”

” सर, केवळ भारतीय सेनाच नव्हे तर संपूर्ण भारत देश आपल्या सुपुत्राचा ऋणी राहील कायम !” ते अधिकारी कसेबसे म्हणू शकले ! काय बोलणार अशा वेळी? 

केवळ चोवीस वर्षे वयाचे, केवळ दोनच वर्ष लष्करी सेवा झालेले कॅप्टन अनूज नय्यर… मरणोपरांत महावीर चक्र ! त्यांनी आपले शब्द खरे केले…. शत्रूचा नि:पात झाल्यावरच आपला श्वास थांबवला ! 

 ७ जुलै….. या पराक्रमाचा स्मरण दिन ! भावपूर्ण आदरांजली हे महावीर योद्धा !

…  जय् हिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वास्तुशास्त्र… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वास्तुशास्त्र… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

” हे घ्या आई तीन हजार , ठेवा तुमच्याकडे .”… नवीन सुनबाई ऑफिसला जाताजाता अगदी सहज 

म्हणाली . आणि सासुबाईंचे डोळे भरून आले .

” मला कशाला ग एवढे लागतात ? “

” अहो , दिवस भर किती गोष्टींना पैसे लागतात बघतेय न मी एक महिन्यापासून . दारावर भाजी , फळवाले येतात . कधी कामवाली जास्तीचे पैसे मागते . शिवाय तुमची भिशी असते. राहू द्या तुमच्याजवळ .”

” अग , पेन्शन मिळते तुझ्या सासऱ्यांची .ते असतांना त्यांच्याकडे मागत असे , आता न मागता महिन्याच्या महिन्याला सरकार देते .” .. सासू हसून म्हणाली .

” तुम्ही भिशीच्या ग्रुपबरोबर सिनेमा , भेळ पार्टी , एखादं नाटक, असे कार्यक्रम ठरवत जा . जरा मोकळं व्हा आई . ह्यांनी सांगितलंय मला तुम्ही किती त्रासातून कुटुंब वर आणलंय ते . मोठे दादा तर वेगळे 

झालेत , ताई सासरी खूष आहेत . मग तुम्ही पण आता आपलं जग निर्माण करा .मला माहितेय तुम्ही तुमच्या अनेक इच्छा दाबून टाकल्यात … आता जगा स्वतःसाठी . “

” इतक्या लहान वयात हे शहाणपण कुठून आलं ग तुझ्यात ?”

” मी दहा बारा वर्षांची असेन. आजी आत्याकडे निघाली होती. आईने पटकन सहाशे रुपये काढून 

हातावर ठेवले . म्हणाली , ‘ तिथे नातवंडांना बाहेर घेऊन जा , ‘आजी कडून’ म्हणून काही खाऊ पिऊ घाला , खेळणी घेऊन द्या ….’ आजी आईच्या गळ्यात पडून गदगदून रडली होती . ‘ एवढे पैसे कधी 

मोकळेपणाने खर्चच केले नाहीत ग ‘  असे म्हणाली होती … तेव्हापासून आजी आणि आई जश्या जिवलग मैत्रिणीच झाल्या . ……आई , मला माहितेय , घरचे खटले सांभाळायला तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली न ? किती वाईट वाटलं असेल . किती मन मारावं लागलं असेल ….शिवाय प्रत्येक लहान मोठ्या घरच्याच खर्चासाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागले असतील … तेव्हा नवरे देखील उपकार केल्यासारखे बायकोच्या हातात पैसे ठेवत ……….तुमची पेन्शन राहू द्या आई .मला कधी कमी पडले तर मी तुमच्याचजवळ मागेन . ” 

” अग , सगळं आजच बोलणार आहेस का ? जा आता तुला उशीर होईल. “

“मला बोलू द्या आई .हे मी माझ्या समाधानासाठी करतेय  . आई म्हणते , की अठरा तास घरात राबणारी बाई कुणाला कधी समजतच नाही. तू मात्र तुझ्या सासूच्या कष्टाची कायम जाणीव ठेव . प्रेम पेर , प्रेमच उगवेल . “

…. सासूने भरल्या मनाने सुनेच्या गालावर थोपटले . ती दिसेनाशी होईपर्यंत दारात उभी असतांना 

तिच्या मनात आले … 

‘ सून आल्यावर मी आणखीनच घरात अडकेल असे वाटले होते. तू उलट  कवाडं उघडून मला बाहेरचे मोकळे आकाश दाखवलेस ….. ‘ 

…… ज्या घरात लेकी सुना सासूचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतोच मुळी. 

जेथे असेल आपुलकी .. प्रेम .. जिव्हाळ्याचे अस्र … 

….. तेथे फिके पडते वास्तुशास्त्र. 

खरंच ,,,,,,, सासू अन सुनेमधे असा बदल झाला तर …. 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 15 – पूजी जाने लगी नग्नता… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – पूजी जाने लगी नग्नता…।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 15 – पूजी जाने लगी नग्नता… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

आम आदमी की पीड़ा

से विमुख हुआ चिन्तन

पूजी जाने लगी नग्नता

इतना हुआ पतन

 

बुद्धिवादियों की कविता है

नीरस और उबाऊ

मात्र मंच की चुहुलबाजियाँ

औ मसखरी बिकाऊ

नैतिकता औ राष्ट्रवाद से

वंचित हुआ सृजन

 

कविता में युगबोध नहीं

बस आडम्बर है झूठा

मौलिकता है लुप्त

षिष्टपेषण मिलता है जूठा

मजदूरों की किस्मत में

संत्रास, भूख, ठिठुरन

 

आम आदमी की पीड़ा को

जिन कवियों ने गाया

अकादमिक सम्मान कभी भी

उन्हें नहीं मिल पाया

आज चाटुकारी, जुगाड़ से

होता अभिनन्दन

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 92 – मनोज के दोहे… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे…”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 92 – मनोज के दोहे… ☆

१ अंकुर

अंकुर निकसे प्रेम का, प्रियतम का आधार।

नेह-बाग में जब उगे, लगे सुखद संसार ।।

☆ 

२ मंजूषा

प्रेम-मंजूषा ले चली, सजनी-पिय के द्वार।

बाबुल का घर छोड़कर, बसा नवल संसार ।।

☆ 

३ भंगिमा

भाव-भंगिमा से दिखें, मानव-मन उद्गार।

नवरस रंगों से सजा, अन्तर्मन  शृंगार।।

☆ 

४ पड़ाव

संयम दृढ़ता धैर्यता, मंजिल तीन पड़ाव ।

मानव उड़े आकाश में, सागर लगे तलाव।।

☆ 

५ मुलाकात

मुलाकात के क्षण सुखद, मन में रखें सहेज।

स्मृतियाँ पावन बनें, बिछे सुखों की सेज।।

 ©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मौन… ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – मौन… ??

उनके शब्दों से

उपजी वेदना

शब्दों के परे थी

सो होना पड़ा मौन,

अब अपने मौन पर

शब्दों से उपजी

उनकी प्रतिक्रियाएँ

सुन-बाँच रहा हूँ मैं..!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ महादेव साधना- यह साधना मंगलवार दि. 4 जुलाई आरम्भ होकर रक्षाबंधन तदनुसार बुधवार 30 अगस्त तक चलेगी 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नमः शिवाय 🕉️ साथ ही गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ  🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 119 ⇒ तमीज और तहजीब… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “तमीज और तहजीब”।)  

? अभी अभी # 119 ⇒ तमीज और तहजीब? श्री प्रदीप शर्मा  ? 

• Manners & Etiquettes

विद्या ददाति विनयम् !

जहां शिक्षा है, वहां संस्कार है। हमने साक्षरता पर अधिक जोर दिया है, डिग्रियों पर दिया है, लेकिन बुद्धि, ज्ञान और विवेक पर नहीं दिया। मानवीय गुणों के अभाव के कारण अभी तक हमारी शिक्षा अधूरी ही साबित हुई है ;

दया, धर्म का मूल है

पाप मूल अभिमान।

तुलसी दया न छोड़िए

जब तक तन में प्राण। ।

हम मूक प्राणियों पर तो दया का ढोंग करते हैं, कहीं कबूतरों को दाना चुगाते हैं, तो कहीं चींटियों तक को आटा डालते हैं, लेकिन आपस में इंसान से नफरत और दुश्मनी पालते हैं। कहीं पैसे के लिए, तो कहीं पानी के लिए, एक दूसरे के खून के प्यासे हो जाते हैं।

नीति का तो पता नहीं, और राजनीति करते नजर आते हैं। और शायद यही कारण है कि हमारी कथनी और करनी में जमीन आसमान का अंतर है। हमारे पांव तो जमीन पर नहीं, लेकिन हम आसमान छूना चाहते हैं।

तमीज को हम मैनर्स कहते हैं, मैनर्स यानी इंसानों वाली हरकतें। लोक व्यवहार हमारी तहजीब का एक हिस्सा है। एक सभ्य समाज की नींव माता पिता के संस्कार, स्कूल में शिक्षक की शिक्षा दीक्षा और जीवन में सदगुरु के शुभ संकल्प पर ही मजबूत होती है। ।

सभ्यता की अपनी अलग परिभाषा है। एक गांव का अनपढ़ किसान अथवा आदिवासी भी सभ्य हो सकता है और शहर का कथित पढ़ा लिखा इंसान भी असभ्य। लेकिन हमने सभ्यता को शिक्षा, पद, पैसा और कपड़े लत्ते से जोड़ लिया है, और इसीलिए आज की आधुनिक पीढ़ी पढ़ लिखकर भी असभ्य और अनैतिक होती जा रही है, जिसका असर उन लोगों पर पड़ रहा है, जिन्हें अच्छी शिक्षा और संस्कार नहीं मिले हैं। गुड़ गोबर एक होना इसी को कहते हैं।

एक समय था, जब हर छोटी बड़ी सरकारी अथवा गैर सरकारी नौकरी के लिए चरित्र प्रमाण पत्र मांगा जाता था, तब भी भले ही यह एक महज औपचारिकता मात्र ही हो, लेकिन नौकरी का चरित्र से क्या संबंध। आपकी निजी जिंदगी आपकी है। ढंग से काम करो, और ऐश करो। ।

छोटी मोटी नौकरियों के लिए मेडिकल सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट और ड्राइविंग लाइसेंस ही काफी है। एक पेशेवर ड्राइवर के लिए शराब पीकर वाहन चलाना अपराध है, बाकी उसके चाल चलन की जिम्मेदारी प्रशासन की नहीं है। चोरी, डकैती, स्मगलिंग जैसे अपराध तो पकड़े जाने पर ही सामने आते हैं। पुलिस और प्रशासन कोई भगवान नहीं, जो हर आती जाती गाड़ी पर निगरानी रखता फिरे।

आज के युग में सभी अपराधों की जड़ है, easy money ! पैसा कमाना आर्थिक अपराध नहीं। रिश्वत अगर अपराध होती, तो लोगों के घर ही नहीं बनते, गाड़ी बंगले कार जहां, वहीं तो है भ्रष्टाचार।

फिर भी आप easy money को काला पैसा, यानी ब्लैक मनी नहीं कह सकते। पैसा दिमाग और सूझ बूझ से कमाया जाता है। हर ईमानदार गरीब नहीं होता और हर बईमान अमीर भी नहीं हो सकता। सबका नसीब अपना अपना। ।

जहां तमीज नहीं, तहजीब नहीं, वहां बदतमीजी और बदमिजाजी है। आप किसी को तमीज नहीं सिखला सकते। किसी का अच्छा व्यवहार किसे नहीं सुहाता, लेकिन किसी का दुर्व्यवहार आपको मानसिक चोट पहुंचा सकता है। पुरुष हो या महिला, दुर्व्यवहार आजकल आम बात है।

जिनके अपने वाहन नहीं होते, उन्हें पब्लिक ट्रांसपोर्ट का ही सहारा लेना पड़ता है। पहले आप डिजिटल अपडेट हों, अपनी आर्थिक स्थिति अनुसार ओला, जुगनू अथवा उबेर बुक करें। कभी कभी जल्दी में, चलते रिक्शा को भी रोक लेना पड़ता है। बुक किए वाहन का तो हमारे पास ऑटो नंबर सहित पूरी जानकारी होती है, लेकिन तत्काल उपलब्ध वाहन और चालक की हमारे पास कोई जानकारी नहीं होती। ।

पांचों उंगलियां बराबर नहीं होती। अच्छे बुरे सभी तरह के लोग हर पेशे में होते हैं, आपसे कौन टकराता है, यह तो आप भी नहीं जानते। मेरा अब तक का अनुभव इतना बुरा भी नहीं रहा। लेकिन पिछले दिनों एक ऑटो चालक की बदतमीजी और बदमिजाजी ने तो सभी हदें पार कर दी।

जब हम दूध से जलते हैं तो छाछ भी फूंक फूंककर पीने लगते हैं। इतनी बेपरवाही भी अच्छी नहीं। अपनी सुरक्षा के लिए पहले ऑटो का नंबर नोट करें, उसके बाद ही यात्रा सुख का आनंद लें। आजकल तो मोबाइल ने यह काम भी आसान कर दिया है। ।

फिर भी कहने वाले तो कहते ही रहते हैं ;

हर शाख पे उल्लू बैठा है

अंजामे गुलिस्तां क्या होगा

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – यायावर जगत # 21 – यात्रा वृत्तांत – मॉरिशस की मेरी सुखद स्मृतियाँ ☆ ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

(सुप्रतिष्ठित साहित्यकार सुश्री ऋता सिंह जी द्वारा ई- अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख श्रृंखला को स्नेह प्रतिसाद के लिए आभार। आप प्रत्येक मंगलवार, साप्ताहिक स्तम्भ -यायावर जगत के अंतर्गत सुश्री ऋता सिंह जी की यात्राओं के शिक्षाप्रद एवं रोचक संस्मरण  आत्मसात कर सकेंगे। इस श्रृंखला में आज प्रस्तुत है आपका यात्रा वृत्तांत – काज़ीरंगा)

☆ साप्ताहिक स्तम्भ –यात्रा संस्मरण – यायावर जगत # 21 ☆ 
? मेरी डायरी के पन्ने से…  – यात्रा वृत्तांत – मॉरिशस की मेरी सुखद स्मृतियाँ ?

June 2023 में पाँच अरबपतियों को लेकर टाइटैनिक दिखाने की यात्रा के लिए निकली पनडुब्बी का मलबा मिला है। एक अति उत्कृष्ट, अति उत्तम अत्याधुनिक पनडुब्बी जिसमें 96घंटे तक की ऑक्सीजन की व्यवस्था थी, फिर भी किसी कारणवश समुद्र की सतह पर यह पनडुब्बी लौटकर न आई। टाइटैनिक से चार सौ मीटर की दूरी पर पनडुब्बी में विस्फोट हुआ और भीतर बैठे लोगों के चिथड़े उड़ गए।

इस अत्यंत दुखद घटना को सुनकर, उसकी तस्वीरें देखकर, दर्दनाक घटना का विस्तार पढ़कर मैं भीतर तक सिहर उठी।

मुझे अपनी एक अद्भुत यात्रा आज अचानक स्मरण हो आई। यद्यपि मेरी यात्रा सुखद तथा अविस्मरणीय रही। बस दोनों में समानता पनडुब्बी द्वारा समुद्र के तल में जाने की ही है।

2002 दिसंबर

यह महीना मॉरिशस में बारिश का मौसम होता है। हमारे विवाह की यह पच्चीसवीं वर्षगाँठ थी और हम दोनों ने ही इसे मॉरिशस में मनाने का निर्णय बहुत पहले से ही ले रखा था।

मॉरिशस एक सुंदर छोटा देश है। समुद्र से घिरा हुआ यह देश अपनी प्राकृतिक सौंदर्य के लिए अत्यंत प्रसिद्ध है। यह सुंदर द्वीपों का देश हिंद महासागर में बसा है। । सभी द्वीपों पर जनवास नहीं है। कई लोग इस राज्य को भारत से दूर छोटा भारत भी कहते हैं क्योंकि यहाँ बड़ी संख्या में भारतीय रहते हैं।

मॉरिशस में अनेक भाषाएँ बोली जाती हैं। अंग्रेज़ी और फ्रेंच यहाँ की मुख्य भाषाएँ तो हैं ही साथ ही यहाँ बड़ी संख्या में रहनेवाले भारतीय भोजपुरी भी बोलते हैं जो बोली मात्र है।

सन 1800 के दशक में भारत पर ही नहीं पृथ्वी के कई देशों पर अंग्रेज़ों का आधिपत्य रहा है। हर जगह से ही काम करने के लिए मज़दूर ले जाए जाते थे। क्या अफ्रीका और क्या भारत।

उन दिनों भारत में अकाल पड़ने के कारण अन्न का भयंकर अभाव था। लोग भूख के कारण मरने लगे थे। ऐसे समय पाँच वर्ष के एग्रीमेंट के साथ मजदूरों को जहाज़ द्वारा मॉरिशस ले जाया जाता था।

ये मजदूर अनपढ़ थे। एग्रीमेंट को वे गिरमिट कहा करते थे। आगे चलकर अफ़्रीका और अन्य सभी स्थानों पर भारत से ले जाए गए मजदूर गिरमिटिया मजदूर कहलाए। यह बात और है कि अंग्रेज़ों ने उन पर अत्याचार किए, वादे के मुताबिक वेतन नहीं देते थे। पर मजदूरों के पास लौटकर आने का कोई मार्ग न था।

मॉरिशस गन्ने के उत्पादन के क्षेत्र में बहुत आगे था। बड़ी मात्रा में यहाँ शक्कर की मिलों में शक्कर बनाई जाती थी। खेतों में गन्ने उगाने, कटाई करने, मिल तक गन्ने ले जाने और शक्कर उत्पादन करने तक भारी संख्या में मजदूरों की आवश्यकता होती थी। यही कारण था कि बिहार से बड़ी संख्या में मजदूर वहाँ पहुँचाए गए। आज़ादी के बाद सारे मज़दूर वहीं बस गए।

आज यहाँ रहनेवाले भारतीय न केवल यहाँ के स्थायी निवासी हैं बल्कि उच्च शिक्षित भी हैं और अधिकांश होटल, जहाज, भ्रमण तथा अन्य व्यापार के क्षेत्र में भारतीय ही अग्रगण्य हैं।

हिंदू धर्म को भी मॉरीशस में भारतीयों द्वारा ले जाया गया था। आज, मॉरीशस में हिंदू धर्म सबसे अधिक पालन किया जाने वाला धर्म है।

यहाँ कई मंदिर बने हुए हैं। श्रीराम -सीता माई और लक्ष्मण का भव्य मंदिर है। राधा कृष्ण, साईबाबा का भी मंदिर है। कुछ वर्ष पूर्व बालाजी का भी मंदिर बनाया गया है।

यहाँ एक झरने के बीच एक विशाल शिव लिंग है। यहीं पर बड़ी -सी माता की मूर्ति भी है। आज सभी जगहों पर आस पास अनेक छोटे -बड़े मंदिर बनाए गए हैं। शिव लिंग पर जल चढ़ाने के लिए ऊँची सीढ़ी बनी हुई है।

मेरा यह अनुभव साल 2002 का है। आज इक्कीस वर्ष के पश्चात यह राज्य निश्चित ही बहुत बदल चुका होगा।

हम पोर्ट लुई अंतर्राष्ट्रीय हवाई अड् डे पर उतरे, उन दिनों यह एक छोटा-सा ही हवाई अड् डा था। मृदुभाषी तथा सहायता के लिए तत्पर लोग मिले। हमें इस द्वीप समूह के राज्य में अच्छा स्वागत मिला।

गाड़ी से हम अपने पूर्व नियोजित होटल की ओर निकले। गाड़ी होटल की ओर से ही हमें लेने आई थी जिस कारण हमें किसी प्रकार की चिंता न थी।

सड़क के दोनों ओर गन्ने के खेत थे। बीच -बीच में लोगों के घर दिखाई देते। हिंदुओं के घर के परिसर में छोटा – सा मंदिर दिखाई देता और उस पर लगा नारंगी रंग का गोटेदार झंडा। अद्भुत आनंददायी अनुभव रहा।

हम जिस दिन मॉरिशस पहुँचे उस दिन शाम ढल गई थी इसलिए थोड़ा फ्रेश होकर होटल के सामने ही समुद्र तट था हम वहाँ सैर करने निकल गए। सर्द हवा, चलते -फिरते लोग साफ – सुथरा तट मन को भा रहा था।

दूसरे दिन सुबह हम एक क्रेटर देखने गए। यह विशाल क्रेटर एक पहाड़ी इलाके पर स्थित है। इस पहाड़ी पर खड़े होकर नीचे स्थित समुद्र, दूर खड़े पहाड़ की चोटियाँ आकर्षक दिख रहे थे।

वह विशाल क्रेटर हराभरा है। कई विशाल वृक्ष इसके भीतर उगे हुए दिखाई दिए। यह क्रेटर गहरा भी है। बारिश के मौसम में कभी – कभी इसके तल में काफी पानी जम जाता है। यहाँ के दृश्य अति रमणीय और आँखों को ठंडक पहुँचानेवाले दृश्य थे। इसे हम ऊपर से ही देख सकते थे इसमें उतरने की कोई सुविधा नहीं थी। लौटते समय हम कुछ मंदिरों के दर्शन कर लौटे। शिव मंदिर में सीढ़ी चढ़कर शिवलिंग पर जल डालने का भी सौभागय मिला।

तीसरे दिन हम कैटामरान में बैठकर विविध द्वीप देखने गए। यह कैटामरान तीव्र गति से चलनेवाली छोटा जहाज़नुमा मोटर से चलनेवाली नाव ही होती है जिसमें दोनों छोर पर जालियाँ लगी रहती हैं। इन जालियों पर लोग लेटकर यात्रा करते हैं। पीठ पर समुद्र का खारा जल लगकर पीठ की अच्छी मालिश होती है ….. बाद में पीठ में भयंकर पीड़ा होती है। हमारी नाव में छह जवान लोगों ने इसका आनंद लिया और वे उस पीड़ा को सहने को भी तैयार थे यह एक चैलेंज था।

हम दो – तीन द्वीपों पर गए। एक द्वीप पर ताज़ी मछलियाँ पकड़ी गईं और नाव पर पकाकर सैलानियों को खिलाई गईं। हम निरामिष भोजियों को सलाद से काम चलाना पड़ा।

इससे आगे एक और द्वीप पर गए जहाँ पानी में उतरकर तैरने और स्नॉकलिंग के लिए कुछ देर तट पर रुके रहे। वहाँ रेत से मैंने ढेर सारे मृत कॉरल एकत्रित किए, शंख भी चुने। वहाँ की रेत बहुत शुभ्र और महीन है। पानी अत्यंत स्वच्छ और गहरा नीला दिखता है।

चौथे दिन हम पहले एक अति वयस्क कछुआ देखने गए जिसकी उम्र तीन सौ वर्ष के करीब बताई गई थी। उस स्थान के पास सेवन लेयर्स ऑफ़ सैंड नामक जगह देखने गए। यहाँ ज़मीन पर सात रंगों की महीन रेत की परतें दिखीं। छोटी सी नलिका में ये रेत भरकर सॉविनियर के रूप में बेचते भी हैं। मॉरिशस में भी रुपया चलता है पर वह उनकी करेंसी है जो भारत की तुलना में बेहतर है। एक सौ मॉरिशस रुपये एक सौ अट्ठ्यासी भारतीय रुपये के बराबर है। (जनवरी 2023 रिपोर्ट)

इसी स्थान से थोड़ी दूरी पर हमने बड़े -बड़े धारणातीत तितलियों के झुंड देखे। ये नेटवाले एक बगीचे में दिखाई दिए। इस स्थान का नाम है ला विनाइल नैशनल पार्क यहाँ बहुत बड़ी संख्या में नाइल नदी के मगरमच्छ भी पाले जाते हैं। कुछ वर्ष पूर्व तक मगरमच्छ के चमड़े से वस्तुएँ बनाने के व्यापार चलता था। अब यह गैर कानूनी है।

इसी शहर में नाव बनाने के कारखाने भी हैं। साथ ही घर में सजाकर रखने के लिए भी छोटी-छोटी आकर्षक नावें हाथ से बनाई जाती हैं। सैलानी सोवेनियर के रूप में उन्हें खरीदते हैं। यह कुटीर उद्योग नहीं बल्कि बड़ा व्यापार क्षेत्र है। सैलानी सोवेनियर के रूप में नाव, जहाज़ आदि छोटी -छोटी सजाने की वस्तुएँ खरीदते हैं।

पाँचवे दिन हम एक और द्वीप में गए जहाँ अफ्रीका के निवासियों ने अपने ड्रम और नृत्य द्वारा हम सबका मनोरंजन किया। इस द्वीप पर ताज़ा भोजन पकाकर स्थानीय विशाल वृक्षों के नीचे मेज़ लगाकर बड़े स्नेह से सबको भोजन परोस कर खिलाया गया। मॉरिशस में आमिष भोजन ही अधिक खाते हैं। बड़ी- बड़ी झींगा मछली जिसे लॉबस्टर्स कहते हैं, खूब पकाकर खाते हैं। हम निरामिष भोजियों को

पोटेटो जैकेट विथ सलाद खिलाया गया। यह अंग्रेज़ों का प्रिय भोजन होता है। बड़े से उबले आलू के भीतर बेक्ड बीन्स और चीज़ डालकर इसे आग पर भूना जाता है। होटलों में इसे आज माईक्रोऑवेन में पकाते हैं। संप्रति लंडन में भी हमें इस व्यंजन का आनंद लेने का अवसर मिला।

छठवें दिन हम सुबह -सुबह ही एक जहाज़ में बैठकर समुद्र के थोड़े गहन हिस्से तक गए। हमें सी बेल्ट वॉकिंग का आनंद लेना था।

हमारे सिर पर संपूर्ण काँच से बनी पारदर्शी हेलमेट जैसी ऑक्सीजन मास्क पहनाई गई। फिर हम जहाज़ की एक छोर से सीढ़ी द्वारा समुद्र के तल पर उतरे। यह सीढ़ी जहाज़ के साथ ही समुद्र तल तक होती है। यह गहराई तीन से चार मीटर की होती है। हमारे हाथ में ब्रेड दिया गया और मछलियाँ उसे खाने के लिए हमारे चारों तरफ चक्कर काटने लगीं।

मछलियों के झुंड को अपने चारों ओर तैरते देख मैं भयभीत हो उठी और गाइड से मुझे ऊपर ले जाने के लिए इशारा किया। बलबीर काफी देर तक समुद्र तल में चलते रहे और मछलियों को ब्रेड भी खिलाते रहे। मौसम वर्षा का था, आसमान में मेघ छाया हुआ था जिस कारण पानी के नीचे प्रकाश भी कम था। मेरे घबराने का वह भी एक कारण था। खैर यह हम दोनों के लिए ही एक अलग अनुभव था।

उस दिन हमारे विवाह वर्षगाँठ की पच्चीसवीं सालगिरह का भी दिन था तो हमने पनडुब्बी में बैठकर समुद्र के नीचे घूमने जाने का भी कार्यक्रम बनाया था। दोपहर को एक लोकल रेस्तराँ में मन पसंद भोजन किया और दोपहर के तीन बजे पनडुब्बी सैर के लिए ब्लू सफारी सबमरीन कंपनी के दफ्तर पहुँचे।

हमसे कुछ फॉर्म्स पर हस्ताक्षर लिए गए कि किसी भी प्रकार की दुर्घटना के लिए कंपनी ज़िम्मेदार नहीं है। यह उस राज्य और कंपनी का नियम हैं। सबमैरीन के विषय में साधारण जानकारी देकर हमें पनडुब्बी में बिठाया गया। कैप्टेन एक फ्रांसिसी व्यक्ति था। उसने बताया कि हम दो घंटों के लिए सैर करने जा रहे थे। पनडुब्बी पैंतीस मीटर की गहराई तक जाएगी। थोड़ी घबराहट के साथ हम दोनों अपनी सीटों पर बैठ गए।

पाठकों को बताएँ कि इसमें केवल छह लोगों के बैठने की जगह होती है। भीतर पर्याप्त ऑक्सीजन की मात्रा होती है जो चार दिनों तक पानी के नीचे रहने में सहायक होती है। हम कुल चार लोग थे और कप्तान साथ में थे।

हम धीरे -धीरे पानी में उतरने लगे। चारों तरफ अथाह समुद्र का जल और समुद्री प्राणियों के बीच हम ! अद्भुत रोमांच की अनुभूति का क्षण था वह। आज भी उसे याद कर रोंगटे खड़े होते हैं। कई प्रकार की रंग- बिरंगी मछलियाँ हमारी खिड़कियों से दिख रही थीं। जल स्वच्छ!जब कोई बड़ी मछली रेत से निकलकर बाहर तैरती तो ढेर सारी रेत उछालकर अपनी सुरक्षा हेतु एक धुँधलापन पैदा कर देती।

धीरे -धीरे हम समुद्री तल पर उतरने लगे। हमें एक ऐसे जहाज़ के पास ले जाया गया जो कोई चालीस वर्ष पूर्व डूब गया था और अब उस पर जीवाश्म दिखाई दे रहे थे। कुछ दूरी पर एक खोह जैसी जगह पर बड़ी – सी ईल अपना मुँह बाहर किए बैठी थी। कैप्टेन ने बताया कि उसे मोरे ईल कहते हैं। वे बड़ी संख्या में हिंदमहासागर में पाए जाते हैं। उसके मुँह के छोटे छोटे दाँत स्पष्ट दिखाई दे रहे थे। अचानक एक ऑक्टोपस अपने अष्टपद संभालता हुआ झट से पास से निकल गया। हमें तस्वीर लेने का भी मौक़ा नहीं मिला। हमारी पनडुब्बी अभी नीचे ही थी कि हमें कुछ स्टिंग रे दिखे, अच्छे बड़े आकार के थे सभी।

और भी कई प्रकार की बड़ी मछलियाँ दिखाई दीं। क्या ही अद्भुत नज़ारा था। समुद्री तल में रंगीन कॉरल्स बहुत आकर्षक दिखाई दे रहे थे। नीचे कुछ बड़े आकार के केंकड़े भी दिखे।

समुद्र में कई अद्भुत वनस्पतियाँ भी थीं।

कप्तान ने बताया कि उन वनस्पतियों को ईलग्रास कहते हैं। वे पीले से रंग के होते हैं। इन वनस्पतियों पर कई जीव निर्भर भी करते हैं। कप्तान ने बताया कि चूँकि हिंद महासागर, महासागरों में तृतीय स्थान रखता है साथ ही यह पृथ्वी के तापमान और मौसम को प्रभावित भी करता है तथा कुछ हद तक उस पर अंकुश भी रखता है।

अब धीरे -धीरे हम ऊपर की ओर आने लगे। कई विभिन्न मछलियों की प्रजातियाँ पनडुब्बी को ऊपर आते देख तुरंत ही गति से दूर चली जातीं जिन्हें देखने में आनंद आ रहा था। हम जब अपनी यात्रा पूरी करके बाहर निकले तो हमें सर्टीफ़िकेट भी दिए गए। हम दोनों के लिए यह सब चिरस्मरणीय यात्रा रही।

हम होटल लौटकर आए। तो रिसेप्शन में बताया गया कि होटल के मालिक द्वारा हमारे खास दिन के लिए एक छोटा आयोजन रखा गया था। हम रात्रि भोजन करने के लिए जब होटल के रेस्तराँ में पहुँचे तो वहाँ लाइव बैंड बजाकर हमारा स्वागत किया गया। उपस्थित अतिथियों ने खड़े होकर तालियाँ बजाकर हमें शुभकामनाएँ दीं। फिर वहाँ का भारतीय मैनेजर एक बड़े से ट्रे में एक सुंदर सुसज्जित केक ले आया। केक कटिंग के समय फिर लाइव बैंड बजा और सभी अतिथि हमारी मेज़ के पास आ गए। सबने मिलकर हमारी पच्चीसवीं एनीवर्सरी का आनंद मनाया।

हम दोनों अत्यंत साधारण जीवन जीने वाले लोग हैं, इस तरह के आवभगत के हम आदि नहीं थे न हैं। देश से दूर परदेसियों के बीच अपनापन मिला तो आनंद भी बहुत आया।

अगले दिन रात को हम भारत लौटने वाले थे। देर रात हमारी मुम्बई के लिए फ्लाइट थी। होटल का मैनेजर भारतीय था। वह मुम्बई का ही मूल निवासी भी था। उसने अपने घर पर हमें डिनर के लिए आमंत्रित किया। उसकी पत्नी ने काँच की तश्तरी में पेंट करके हमें उपहार भी दिए।

इस प्रकार के अपनत्व और स्नेह सिक्त अनुभव को हृदय में समेटकर आठ दिनों की यात्रा समाप्त कर हम स्वदेश लौट आए। आज इतने वर्ष हो गए पर सारी स्मॅतियाँ किसी चलचित्र की तरह मानस पटल पर बसी हैं। सच आज भी वहाँ के भारतीय हमसे अधिक अपनी संस्कृति से बँधे और जुड़े हुए हैं।

© सुश्री ऋता सिंह

10/12/2022, 10.30 pm

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares